भागवत कथेची जेलरोडला समाप्ती म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड जेलरोडच्या टाकळी रोडवरील शिवरामनगरमध्ये माऊली प्रतिष्ठानतर्फे पुंडलिक आढाव यांच्या स्मणार्थ श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ झाला. त्र्यंबकेश्वर येथील धर्मशास्त्रचार्य जगदीश महाराज जोशी यांनी भागवत निरूपण केले. रामदास महाराज शेगावकर, शिवरामबाबा म्हसकर, नामदेव आढाव, श्रीकांत आढाव, कृष्णा आढाव, शिवम आढाव, ओंकार आढाव, आदित्य आढाव, अच्युत हरक, ओम भुसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. मनोहर महाराज सायखेडे यांनी काल्याचे कीर्तन केले. जगदीश महाराज जोशी म्हणाले की, भारतीय संस्कृती व तत्वज्ञान हे विज्ञाननिष्ठ असून मानवी जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. भारतीय तत्वज्ञान जीवनाला कसे आधारभूत आहे याचे चिंतन भागवत ग्रंथातील पंचम स्कंधातून विशेष रूपाने पाहावयास मिळते. आजच्या आधुनिक व धावपळीच्या युगात मानवी जीवनात शांती, समाधान व सुख प्राप्त व्हावी यासाठी संत वाङमय, वेदशास्त्र व पुराणाशिवाय पर्याय नाही, हे सांगताना त्यांनी विविध उदाहरणे दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट