Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू

$
0
0

उपचारादरम्यान

चिमुरड्याचा मृत्यू

देवळाली कॅम्प : येथील एअर फोर्स स्टेशन ते लहवित दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी चार वर्षीय शिवमचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी ढेरिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक नवनाथ कोठुळे यांच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहवित येथे राहणारे वामन ढेरिंगे हे गुरुवार (दि. ४) आपल्या नातवांसह यात्रेहून परतत असतांना चौधरी मळा येथून भगूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोने (एमएच १५ सीके ५३८४) धडक दिली. यात ढेरिंगे यांच्यासह आठ वर्षीय सत्यम व चार वर्षीय शिवम यांचा अपघात झाला. तिघांनाही उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शिवमचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयो लाल झुलेलाल’चा जयघोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भगवान झुलेलाल यांची वेशभूषा असलेला चित्ररथ, ढोल ताशांचा दणदणाट अन् जय झुलेलालचा जयघोष करीत सिंधी बांधवांचा जल्लोष असे चैतन्यमय वातावरण शनिवारी सायंकाळी जुने नाशिक परिसरात पहायला मिळाले. निमित्त होते, 'भगवान झुलेलाल जयंती मिरवणुकीचे'.

सिंधी समाजबांधवांच्या वतीने चेट्रिचंड महोत्सवानिमित्त आणि भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. शालिमार येथील झुलेलाल मंदिरापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. भगवान झुलेलाल यांची प्रतिमा व प्रज्ज्वलित ज्योतीसह मिरवणूक काढण्यात आली. शालिमारपासून सुरू झालेली मिरवणूक मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डमार्गे पंचवटी कारंजा येथे विसर्जित झाली. मिर‌वणुकीच्या विसर्जनावेळी भगवान झुलेलाल यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान ढोल ताशांच्या निनादात सिंधी बांधवांचा जल्लोष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यात शहरातील सर्व भागातून सिंधी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीचे संयोजन नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष नानिकराम मदनानी, राजू पंजाबी, शंकर जयसिंघांनी, किशोर अमरनानी, गुंदू खुबानी, मुकेश वालेचा, दीपक पंजाबी, सुरेश करमचंदानी, हरीश कटारिया, अशोक पंजाबी आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठमध्ये पकडली १९ लाखांची रोकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठ तालुक्यातील पिठुंदी नाका येथे एका खासगी वाहनातून आणण्यात येत असलेली सुमारे १९ लाखांची रोकड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे तैनात एसएसटी पथकाने ताब्यात घेतली. शनिवारी (दि. ६) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ही रक्कम कोणासाठी व कशासाठी आणण्यात येत होती, याची चौकशी आयटी विभागाकडून करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक काळात आचारसंहिताभंगाचे प्रकार उघडकीस आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. चोरट्या मार्गाने मद्य, रोकड जिल्ह्यात आणली जाऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने ठिकठिकाणी पथके तैनात केली आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघांतर्गत समाविष्ट महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पेठ तालुक्यातील पिठुंदी नाका येथे एसएसटी पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक कर्तव्यावर असताना शनिवारी मध्यरात्री साडेतीन वाजता एमएच १५/जीआर ४००७ हे सुरतहून आलेले क्रेटा वाहन तपासणीसाठी थांबविण्यात आले. या वाहनामध्ये विनायक भाऊसाहेब खरात व प्रदीप रामदास शेटे (रा. चांदोरी, ता. निफाड) हे दोघे होते. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोकड आढळून आली. पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली असून, ती कोणासाठी आणि कशासाठी आणण्यात येत होती याची चौकशी केली जाणार आहे. ही रोकड पुढील चौकशीसाठी आयकर विभागाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांना याबाबतची माहिती दिली असून, मांढरे यांनी पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी निश्चितीनंतरही दिंडोरीत धाकधूक कायम

$
0
0

भाजपसह 'राष्ट्रवादी'च्या उमेदवारालाही चिंता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळूनही बदलाच्या चर्चेमुळे उमेदवारांमध्ये धाकधूक आहे. अनेक ठिकाणी ऐनवेळी उमेदवार बदलले जात असल्याने उमेदवारांची चिंताही वाढली आहे. या मतदारसंघात आता त्याची शक्यता कमी असली तरी राजकारणात काही होऊ शकते. हे वाक्य सर्वांची धडकी भरणारेच आहे. त्यामुळे या अधिकृत उमेदवारांची चिंता ९ एप्रिलनंतरच मिटणार आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २ एप्रिलपासून सुरुवात झाल्यानंतर या मतदारसंघात आतापर्यंत अवघ्या दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारी या सर्वांचे गर्दी उमेदवारी भरण्यासाठी नाशिक येथे होणार आहे. एकूण ३० जणांनी आतापर्यंत ५८ उमेदवारी अर्ज आतापर्यंत नेले आहे. पण, प्रत्यक्षात किती उमेदवार अर्ज भरतात आणि शेवटपर्यंत टिकतात हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या हालचालीकडे दोन्ही पक्षाचे लक्ष आहे. या ठिकाणी मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये असणार आहे. तर माकपने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उभा केला आहे. राष्ट्रवादीतर्फे धनराज महाले, भाजपतर्फे डॉ. भारती पवार तर माकपतर्फे जीवा पांडू गावित हे रिंगणात आहे. तसेच वंचित बहुजन आघीडीने बापू बर्डे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढतीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बिगर आदिवासी मते अधिक

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात बिगर आदिवासी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे उमेदवारांची मदार या मतदानावर जास्त असणार आहे. एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी दिंडोरी व कळवण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. निफाड, येवला, चांदवड व नांदगाव हे बिगर आदिवासी मतदारसंघ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध नेत्यांच्या भेटीगाठींवर भर

$
0
0

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मालेगाव मध्य मतदारसंघातील माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मौलाना मुफ्ती इस्माईल व जनता दल नेते बुलंद इक्बाल यांची भेट घेतली. तसेच मौलाना मुफ्ती यांच्या संपर्क कार्यालयात जाऊनही आमदार पाटील यांनी भेट घेत चर्चा केली. तसेच तेहरी चौकातील जनता दल पक्ष कार्यालयात बुलंद इक्बाल यांची त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांसमवेत सुमारे तासभर भेटीत चर्चा झाली. यावेळी 'राष्ट्रवादी'चे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेस उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी दोन्ही नेत्यांना पाठिंबा संदर्भात पत्र दिले तसेच धर्मनिरपेक्ष उमेदवार असल्याने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. दरम्यान, मुफ्ती तसेच बुलंद इक्बाल यांनीही पाठिंबा संदर्भात संसदीय समितीच्या बैठकीत चर्चेअंती निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दोन्ही नेत्यांनी पाटील यांना देत पाठिंबा संदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा सुव्यवस्थेच्या पाहणीसाठीही निरीक्षक

$
0
0

उत्तराखंडमधील डीआयजी उद्या येणार शहरात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसाकडून विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणूक काळात पोलिसांकडून होणाऱ्या कार्यवाहीचे निरीक्षण करण्यासाठी यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उत्तराखंडमधील डी. आय. जी. एन.एस नापालचायल हे सोमवारी (दि. ८) नाशिकमध्ये निरीक्षक म्हणून दाखल होणार आहेत.

लोकसभा निवडणूक शांततामय वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाकडून यंदा विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने कायदा आणि सुव्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकसह दिंडोरी, धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघांसाठी उत्तराखंडमधील डीआयजी नापालचायल हे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. नाशिकमध्ये ते सोमवारी येणार आहेत. निवडणूक काळात त्यांचे नाशिक विभागातच वास्तव्य राहणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीवर त्यांचे लक्ष असणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सरकारी विश्रामगृह येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांना गळती; तरी आरोग्य सर्वांसाठी!

$
0
0

तज्ज्ञ डॉक्टरांअभावी सार्वजनिक आरोग्य सुविधा विस्कळीत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'सार्वत्रिक आरोग्यसेवेची उपलब्धता प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी' अशी घोषणा जागितक आरोग्य दिनानिमित्त देण्यात आली आहे. मात्र, डॉक्टरांना गळती अन् आरोग्य सर्वांसाठी असा विरोधाभास यानिमित्ताने समोर येतो आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी एक घोषवाक्य ठरवून त्यादृष्टीने उपाययोजना राबविण्यासाठी सदस्य देशांना उद्युक्त करते. नाशिकचा विचार करता पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध असताना तज्ज्ञ डॉक्टरांअभावी सार्वजनिक आरोग्य सुविधा विस्कळीत झाल्याचे दिसते. जिल्ह्याभरात १३४ तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता असून, या जागा भरण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्याला मुलाखती पार पडल्या. मात्र, या खटाटोपातून अवघे २२ डॉक्टर्स शासकीय सेवेत दाखल करून घेण्यात प्रशासनाला यश मिळाले. १३४ पैकी जवळपास ११२ जागा अद्यापही रिक्त आहेत. या व्यतिरिक्त मागील वर्षापासून अनेक डॉक्टर्स निवृत्त झाले किंवा सेवा सोडून निघून गेले. नवीन तज्ज्ञ डॉक्टर्स मिळत नाही आणि आहे ते निवृत्त होत आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. याबाबत बोलताना शासकीय सेवेतील काही डॉक्टरांनी सांगितले, की सरकारी आणि खासगी असा फरक केला की डॉक्टरांना आर्थिकदृष्ट्या खासगी क्षेत्र समाधानकारक वाटते. वस्तुस्थिती तीच आहे. एखादा व्यक्ती शिक्षण घेतला की नोकरी स्वीकारताना ज्या बाबींकडे लक्ष पुरवितो, तीच बाब येथेही होते. आज शासकीय सेवेतील डॉक्टरांना आणि सरकारी अथवा निमसरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी वेतन मिळते. दुसरीकडे सुरक्षितता हे एक महत्त्वाचे कारण आहे. तनमनधनाने काम करणाऱ्या डॉक्टरांना अनेक संकटांना समोरे जावे लागते. तिथे त्यांना दिलासा मिळत नाही. सार्वजनिक आरोग्यसेवेत दाखल होण्यासाठी नवीन तज्ज्ञ डॉक्टरांना काहीही कारण सापडत नाही. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता हळूहळू वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढविले. राज्य सरकारने याच धर्तीवर काम करायला हवे, असे मत डॉक्टरांकडून व्यक्त केले जाते आहे. आज नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध असताना फक्त डॉक्टरांच्या अभावामुळे याचा थेट फायदा होत नसल्याची खंत व्यक्त होते आहे.

...

डॉक्टरांची कमतरता असली तरी ती भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. खासगी डॉक्टरांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये सेवा देता येते. त्यासाठी काही नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहे. डॉक्टरांची संख्या हळूहळू वाढेल.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आइस्क्रीमची रेसिपी आज समजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध फ्लेवर्सचे आईस्क्रीम घरच्या घरी बनवता यावे, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'तर्फे 'अॅडव्हान्स आईस्क्रीम मेकिंग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (७ एप्रिल) दुपारी १२ वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज येथे आईस्क्रीम ही कार्यशाळा घेण्यात येईल.

या कार्यशाळेत संडे आईस्क्रीम, फ्राईड आईस्क्रीम, ब्लॅक फॉरेस्ट केक आईस्क्रीम असे विविध प्रकारचे आईस्क्रीम शिकविण्यात येतील. रितू मेहरा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

...

\B'मटा' संगे शिका

आज डेझर्ट मेकिंग \B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेझर्ट हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रकार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गोड डेझर्ट आकर्षित करीत असतात. हल्ली तर परदेशात आवडीचे असलेले डेझर्ट आपल्याकडेही सहजपणे मिळतात. परंतु, असे डेझर्ट घरी बनविण्याची मजा वेगळीच असते. हे ओळखत महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे डेझर्ट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज, शालिमार येथे हे वर्कशॉप होणार आहे. फज ब्राउनी, रेड वेलवेट लावा केक, चिया फ्रुट कस्टर्ड पुडिंगचे विविध प्रकारचे डेझर्ट रितू मेहरा यावेळी शिकविणार आहेत. कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शोभायात्रेने हिंदू नववर्षाचे स्वागत

$
0
0

राम मंदिर संस्थानातफे उत्सव; रथ चौकात उभारली गाव गुढी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव नगररचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शहरातील विविध पंथ, संप्रदाय, सामाजिक संस्था, भजनी मंडळे, गणेश मंडळांकडून शोभायात्रा काढून हिंदू नववर्षाचे शनिवारी (दि. ६) जल्लोषात स्वागत करण्यात आले. या निमित्त शहरातील रथ चौकात परंपरेप्रमाणे गावगचढी देखील उभारण्यात आली.

शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अश्‍वाच्या पाठीवर गुढी अग्रभागी होते. त्यानंतर शोभायात्रेत साई बाबा, श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच अनेक संताच्या वेशभूषा परिधान केलेले बालक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी महिलांनीदेखील पारंपरिक मराठमोळा पोशाख परिधान केला होता.

शोभायात्रेला विसनजी नगरातील पंचमुखी गणपती मंदिरापासून सुरुवात झाली. शोभायात्रा जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, साने गुरूजी चौक, बळीरामपेठ, शिवाजी चौक, राष्ट्रीय संस्कार केंद्र, गांधी मार्केटमार्ग सुभाष चौक, सराफ बाजारमार्गे रथचौकात उभारण्यात आलेल्या गावगुढींचे मंगेश महाराज जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलाभ रोहन, प्रभाकर पाटील, शनीपेठ पोलिस स्टेशन निरीक्षक विठ्‌लराव कोलते, जिंतेंद्र सांगोरे, योगेश कासार, अशोक माळी, बापू सपके, राजू कोळी, अमित भाटीया आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा जुने जळगावातील श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावगुढीचे पूजन करून व महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर लेझीमचा ठेका धरला होता.

‘स्वच्छ भारत’चा संदेश
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री संप्रदाय सेवा मंडळाच्या जळगाव शाखेतर्फे शनिवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ‘आपला भारत स्वच्छ भारत’, ‘स्त्री-पुरूष समानता’, ‘धुम्रपान छोडो, आयु बढाओ’, ‘पाणी वाचवा’ यांसारखे संदेश देण्यात आले. विसनजी नगरातील गायत्री मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात करून नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक, सराफ बाजार मार्गे, रथ चौक येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन
जळगाव शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुढीपाडवा उत्सव व पथसंचलन साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (दि. ६) सकाळी पथसंचलन करण्यात आले. वाल्मिक नगरातील नगरपालिका शाळा, शिवाजीनगर नगरपालिका शाळा क्र. १, इंदिरा मैदान, खेडी गाव, शिव कॉलनी, आशाबाबा मंदिरासमोरील मैदान, प्रेमनगरातील वरद विनायक गणपती मंदिरात पथसंचलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान जनजागृतीसाठी दिल्लीत उभारली गुढी

$
0
0

नाशिक सायकलिस्टचा ७२ तासात मुंबई ते दिल्ली प्रवास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सहा सायकलिस्ट मतदान जनजागृतीचा संदेश देत सायकलवर स्वार झाले अन् अ‌वघ्या ७२ तासांत त्यांनी मुंबई ते दिल्ली हे अंतर पूर्ण केले. १ हजार ४४० किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर दिल्लीतील इंडिया गेट येथे सायकलिस्टनी मतदान जनजागृतीची अनोखी गुढी उभारत सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशात सुरू असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, हा संदेश देण्यासाठी नाशिक सायलिस्टनी 'सायकल रॅली' मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत ३ एप्रिल रोजी मुंबई येथून सायलिस्टनी मतदान जनजागृतीचे फलक हाती घेत दिल्लीच्या दिशेने सायकलिंग करण्यास सुरुवात केली. मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी सायकलिस्ट रॅलीला मुंबईच्या हुतात्मा चौकात हिरवा झेंडा दाखवला. ७२ तासांनंतर म्हणजेच, ६ एप्रिल रोजी सायकलिस्टने दिल्ली गाठली. नाशिकच्या चंद्रकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली, श्रीराम पवार, मोहन देसाई, राजेंद्र गुंजाळ, रवींद्र दुसाने आणि पूर्वांश लखलानी या सायकलस्वारांनी ही मोहीम राबविली. महाराष्ट्रात मतदानाची सर्वात कमी टक्केवारी दक्षिण-मुंबईत असल्याने तेथून जनजागृती सायकल रॅलीस प्रारंभ केल्याचे सायकलिस्ट म्हणाले.

अशी निघाली रॅली

मुंबईहून सुरू झालेली रॅली गुजरातमधील वापी, सुरत, राजस्थानमधील ब्यावर आणि हरियाणा व उत्तर प्रदेश मार्गे दिल्लीत पोहोचली. दरम्यान सायकलिस्टकडून अनेक ठिकाणी 'मतदान करा, अधिकार बजावा' असे संदेश दिला. मतदान करण्याची शपथही नागरिकांना देण्यात आली.

दिल्ली गौरव

प्रवासात सायकलिस्टला उष्णतेच्या प्रखर झळांसह जयपूर येथे सोसाट्याचा वारा आणि गारपीटांसह झालेल्या पावसाचा सामाना करावा लागला. अखेरीस ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ७.३० वाजता दिल्लीतील इंडियागेट येथे गुढी उभारत मतदान जनजागृती प्रवासाची सांगता करण्यात आली. त्यावेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायकलस्वारांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध पत्नीची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पतीने छळ करून आपल्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पत्नीने उपनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. त्या महिलेचे पती नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण अकादमीतील (पीटीसी) निवृत्त सहाय्यक पोलिस संचालक आहेत.

पन्नास वर्षांची ही महिला एका साप्ताहिकाची संपादक असून, मुलासह नाशिकरोडला राहते. एप्रिल १९९९ मध्ये ती वसई पोलिस ठाण्यात बातमीसाठी गेली असता तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिलीप जगताप यांच्याशी परिचय झाला. त्यांनी लग्नाची मागणी केली. नंतर जगताप यांनी घरी वारंवार जाऊन लग्नाची मागणी केली. तेव्हा महिलेने आपल्या कुटंबियांसमोर त्यांना आपण घटस्फोटीत असून एक मुलगा असल्याचे सांगितले. तेव्हा दोघांची जबाबदारी घेण्याचा ग्वाही दिल्यानंतर महिलेने विवाहाला संमती दिली. २००२ साली विवाह झाला. दोघांनी मिळून मीरारोड, मुंबईला प्लॅट घेतला. जगताप पत्नीसोबत दररोज अनैसर्गिक कृत्य केले. २००७ साली दिलीप जगताप यांना नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण अकादमीत बढती मिळाली. येथेही जगताप यांनी पूर्वीप्रमाणेच त्रास दिला. त्यामुळे अखेर पत्नीने त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक - महावीरचे विद्यार्थी 'गगनांत-२०१९' स्पर्धेत प्रथम

$
0
0

महावीरचे विद्यार्थी 'गगनांत' स्पर्धेत प्रथम

फूल बॉडी एक्सो स्केलेटन ठरला प्रथम क्रमांकाचा प्रकल्प

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणतेही वजन उचलताना कंबर, पाठीचा कणा यावर मोठा ताण येत असतो. अनेकदा वजन उचलल्यामुळे बरी न होणारी दुखापतही होत असते. हे टाळण्यासाठी श्री महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर पॉलिटेक्निकच्या मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी फूल 'बॉडी एक्सो स्केलेटन' या नावीन्यपूर्ण आणि समाजपयोगी प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प पीव्हीजी कॉलेज, नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या 'गगनांत-२०१९' या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

औद्योगिक वसाहतीत हजारो मजूर काम करत असतात. वेल्डिंग करताना वस्तुंचा भार पेलवावा लागणे, शेतकऱ्यांना उत्पादीत मालाची कॅरेट्स उचलावी लागणे, पेस्ट्रिसाइडच्या कॅन्स अथवा अन्य कारणांसाठी वजन उचलण्याची कामे अनेक क्षेत्रांमध्ये करावी लागतात. ही कामे सोपी करण्यासाठी महावीर पॉलिटेक्निकच्या यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे, संकल्प नेटके, ऋतिक वाघुलीकर, सोमेश सूर्यंवंशी या विद्यार्थ्यांनी 'फूल बॉडी एक्सो स्केलेटन' हा प्रकल्प तयार केला आहे. वजन उचलणे आणि वजन पेलवणे या दोन्हीही क्रिया यामुळे सहज शक्य होणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रकल्पाची उपयुक्तता जाणून घेत त्यास प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. सामजिक प्रश्नावर तोडगा काढणाऱ्या या विद्यार्थ्यांचे श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय विश्वस्थ राहुल संघवी, डीन डॉ. प्रियांका झवर, महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, प्रा. राजीव शिंदे, प्रा. पूजा भालेराव, प्रा. वर्षा गाढे, प्रा. नंदिनी खुटाडे, जगदीश कोल्हे, प्रा. गौरव चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

- -

फूल बॉडी एक्सो स्केलेटन प्रकल्पाद्वारे व्यक्तीने उचललेले वजन हे हातावरील फ्रेमच्या सपोर्टरच्या सहाय्याने हलके वाटते. उचललेले वजन हे प्रथम बॅक फ्रेमवर जाऊन मग ते हिप जॉइंटवर आणि नंतर दोन्ही पायांकडे समांतर विभागले जाते. यावेळी मिळणाऱ्या न्युमेटिक लिफ्टचा फायदा त्या मजूराला मिळू शकतो. शंभर किलो वजनापर्यंत हे वजन या फ्रेमच्या सहाय्याने पेलने शक्य आहे.

- यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लार्इफोलॉजी : किरण भालेराव

$
0
0

लार्इफोलॉजी : किरण भालेराव

जगण्याची कला

आयुष्य प्रवाही असतं…. ते सतत बदलत असतं… काळाचं आणि वेळेचं भान ठेवून आपणही बदलायला हवं.… पण हा बदल होत असताना आपली तत्त्व आणि मूल्य जपणं, त्यांचं संवर्धन करून ती लोककल्याणासाठी वापरणं, हीच तर खरी जगण्याची कला आहे.

---

१९७७ सालापासून माझ्या वडिलांनी १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला जुने सिडको येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं छत्रपती शिवाजी मार्केट येथे ध्वजारोहण करण्यास सुरुवात केली. समाज कार्यासोबत राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एैक्य जपण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. तेव्हापासून न चुकता सिडकोच्या शिवाजी कॉम्प्लेक्सवर ध्वजारोहणाची सुरुवात झाली. २००४ साली त्यांना देवाज्ञा झाली. तेव्हापासून हा उपक्रम खंडीत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण, मला हा उपक्रम खंडीत होऊ द्यायचा नव्हता, म्हणून मी ही जबाबदारी घेण्याचं ठरवलं आणि बाबा गेल्यानंतरही खंड पडू न देता हा उपक्रम तसाच चालू ठेवला. आजही हा उपक्रम मी, माझे मित्र आणि अर्थातच माझ्या बाबांना त्या काळी ज्या त्यांच्या मित्रांनी साथ दिली ते सर्व मित्र मिळून हा उपक्रम राबवतो.

२००४ साली जेव्हा मी या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आम्ही जेमतेम १० तो १५ लोक मिळून हा उत्सव साजरा करत असू. मोजक्या लोकांमध्ये फार काही गाजावाजा न करता केवळ राष्ट्रप्रेम या एकमेव भावनेने सारे न चुकता जमत आणि कार्यक्रम पार पाडतो. पण हळूहळू आमच्या लक्षात आलं की, या उपक्रमासोबत आपण समाज प्रबोधनाचं कार्य करू शकतो. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाचं आपण देणं लागतो. त्यामुळे कोणताही स्वार्थ उराशी न बाळगता आम्ही या उपक्रमाद्वारे समाज प्रबोधनाचे वेगवेगळे उपक्रम राबवू लागलो.

पूर्वी मी बँकेत नोकरी करायचो आणि आता मी नोकरी सोडून पूर्णपणे अभिनय क्षेत्रात काम करतो आहे. मी एक कलाकार आहे. त्यामुळे कलेच्या माध्यमातून मी सतत कोणत्या ना कोणत्या कामाद्वारे लोकांपुढे येत असतो, म्हणून मग ठरवलं की आपण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला कलेच्या माध्यमातून जनजागृती आणि समाज प्रबोधन करायचं. त्यासाठी वेगवेगळ्या कलाकारांना आम्ही ध्वजारोहणाला आमंत्रित करू लागलो. नामवंत कलाकारांनी ध्वजारोहणाला यायला सुरुवात केली आणि या कार्यक्रमाला गर्दी जमायला लागली. त्यामुळे आमचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येऊ लागले. ढोल पथक, लेझिम, नॄत्य सादरीकरण अशा वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण इथे होऊ लागलं आणि बघता बघता आज ५०० ते ६०० लोक दर वर्षी या कार्यक्रमाला हजेरी लावू लागले.

माझा चेहरा चित्रपट व मालिकांमुळे लोकांना परिचित आहे. कला क्षेत्रात काम करताना प्रसिद्धी तर मिळतेच पण समाजाकडून तेवढंच प्रेमही मिळू लागते हे मी अनुभवलं आहे. समाजाचे हे ऋण फेडण्यासाठी आपल्या कुवतीप्रमाणे आपण कार्य करत रहाणं गरजेचं असतं. पूर्वी बँक कर्मचारी म्हणून माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. आता ते अभिनेता म्हणून मला ओळखतात… निश्चितच कलाकार या ओळखीला एक वलय असतं…. त्याचा फायदाही होतोच… पण तो फायदा आपाल्याकडून पुन्हा समाजापर्यंत पोहोचवताना जो आनंद आणि जे समाधान मनाला मिळतं ते काही औरच…. स्वच्छता, प्रदुषण, वनसंवर्धन, राष्ट्रप्रेम, सामाजिक ऐक्य अशा वेगवेगळ्या विषयांना दर वर्षी लोकांपुढे मांडून जनजागृती करणं हे आमचं ध्येय असतं. आपण जसजसे मोठे होत जातो तसतशा आपल्या जबाबदाऱ्या वाढू लागतात… प्रसिद्धीचं पण तसंच आहे.… पूर्वी प्रसिद्धीचं वलय मलाही आकर्षित करायचं. पण आता प्रसिद्धीसोबत येणाऱ्या जबाबदारीचंही भान येऊ लागलं आहे…. आयुष्य प्रवाही असतं… ते सतत बदलत असतं.… काळाचं आणि वेळेचं भान ठेवून आपणंही बदलायला हवं.… पण हा बदल होत असताना आपली तत्त्व आणि मूल्य जपणं आणि त्यांचं संवर्धन करून ती लोककल्याणासाठी वापरणं, हीच तर खरी जगण्याची कला आहे.

(लेखक प्रसिद्ध अभिनेता आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रशिक्षणात सारेच घामाघूम मालेगावी रविवारी पा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणूक जाहीर झाली तशी राजकीय पक्षांबरोबर प्रशासन देखील कामाला लागले आहे. धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत येणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदार संघातील मतदान कर्मचाऱ्यांना रविवारी उपकार सिनेमागृहात दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान सारे कर्मचारी आणि अधिकारी मात्र घामाघूम झाले. शहराचे तापमान ४२ अंशापर्यंत गेल्यामुळे दिवसभर खूप उकाडा होता.

मालेगाव बाह्य मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम, निवडणूक नायब तहसिलदार रमेश वळवी, पुरवठा निरीक्षक अधिकारी पी. बी. मोरे आदी उपस्थित होते. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील ३०८ मतदान केंद्रांसाठी २१०९ मतदान कर्मचाऱ्यांना रविवारी मतदानकेंद्रावरील प्रत्यक्ष कामकाज याबाबत हे प्रशिक्षण देण्यात आले. वाढत्या उन्हाचा तडाखा जसा राजकीय पक्षांना प्रचारात बसतो आहे. तसा तडाखा रविवारी मतदान कर्मचाऱ्यांनाही बसला. रविवारी सकाळ सत्रातील प्रशिक्षण आटोपल्यानंतर दुपार सत्रातील प्रशिक्षणासाठी आलेल्यांची मात्र उन्हामुळे लाहीलाही झाली. रविवारी कमाल तापमान ४२ अंशाच्यापुढे गेल्याने दुपारी आलेल्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. अनेकांनी दुपारच्या वेळेला प्रशिक्षण ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षण स्थळी पाण्याची सुविधा असली तरी उन्हाच्या झळा आणि उकाडा यामुळे सारेच हैराण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहावीतील मुलगी गर्भवती

$
0
0

शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पेठ तालुक्यातील खरपडी येथील शासकीय आश्रमशाळेतील सहावीतील मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असून, त्याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याविरुद्ध मुलीच्या पालकांनी हरसूल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघेही पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलींची नियमित आरोग्य तपासणी होत असते. मात्र, तीन महिने उलटले तरी याबाबत आश्रमशाळेच्या अधीक्षकांना हा प्रकार कसा लक्षात आला नाही, याबाबत चर्चा होत आहे. या प्रकरणाने आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या पालकांपासून दूर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार रविवारी उघड झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या दोघांचेही लग्न लावून देण्याची तयारी दोन्ही कुटुंबांनी दाखवली; मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, हरसूल येथे ग्रामीण रुग्णालय असताना त्र्यंबकेश्वर येथे वैद्यकीय तपासणी करता येणार नाही, म्हणून त्यांना परत पाठविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युती झाली म्हणून मतभेद मिटले नाहीत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, राम मंदिर या तीन प्रश्नांची उत्तरे भाजपकडून घेण्यात आल्यानंतरच शिवसेनेने युती केली. हिंदुत्ववादी व विकासवादी पक्ष एकत्र आल्याने देशाचा फायदा होईल. युती झाली म्हणून मतभेद मिटलेत, असे नाही. नोटाबंदीस आमचा अजूनही विरोध आहे. जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांना आमचा पाठिंबा राहील, असे सांगत शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

नाशिक येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदावर आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमात ते बोलते होते. यावेळी ओंकार रोकडे या तरुणाने भाजप व शिवसेना युती का केली, हा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असताना भाजपबरोबर वैचारिक मतभेद होते, असे सांगितले. पण, आता युती झाली असल्याचे सांगून त्यामागची कारणेही सांगितली. या कार्यक्रमात सायली निकम, राहुल चौधरी, मानसी खरकोतकर यांच्यासह अनेक तरुणांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाअगोदर विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नाशिकच्या तरुणांचा नाशिक ढोल, रॉक शो झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी, खासदार हेमंत गोडसे यांनी काय काम केले? नाशिकला विद्यापाठीचे उपकेंद्र केव्हा होईल? रोजगाराची संधी केव्हा मिळेल? यांसारख्या प्रश्नांना उत्तरे देत त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले. शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत अभ्यासक्रम बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमाला नाशिकच्या तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे हा कार्यक्रम चांगलचा रंगला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हलक्या फुलक्या प्रश्नांवर ठाकरे यांनी साधलेल्या संवादामुळे तरुणाईने हा कार्यक्रम चांगलाच एन्जॉय केला. नेहमीच्या चाकोरीपेक्षा हटके असलेल्या 'आदित्य संवाद' या कार्यक्रमात तरुणाई हरखून गेल्याचे चित्र डोंगरे वसतिगृह येथे रविवारी दिसून आले.

प्रश्नांचा भडिमार अन् हशा

या कार्यक्रमात नाशिकच्या युवक व युवतींनी त्यांच्यावर प्रश्नांचा जणू भडिमारच केला. मोकळ्या मैदानात तिन्ही बाजूंनी असलेल्या खुर्च्या व त्यात मधोमध केलेल्या रॅम्पमुळे सर्वांशी संवाद साधणे सोपे गेले. यावेळी एका सीनिअर केजीच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्याची खूण केल्यामुळे आदित्य यांनी त्याला स्टेजवर नेले. त्यावेळी आदित्य यांनी सांग काय आहे तुझा प्रश्न, म्हटल्यावर त्या लहान मुलाने 'काहीच प्रश्न नाही' असे सांगितले. त्यामुळे एकच हशा पिकला.

'नीलेश राणे'मुळे विकेट

या कार्यक्रमात पहिलाच प्रश्न नीलेश राणे नावाच्या व्यक्तीचा आल्यामुळे आदित्य ठाकरेंची विकेट पडली. यावेळी त्यांनी 'अरे बापरे' म्हणत नाशिकच्या नीलेश राणेच्या आदिवासी मुलांच्या क्रीडा सुविधेसंदर्भातील प्रश्नाला साजेसे उत्तर देत वातावरण हलके फुलके केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शास्त्रीय बंदिशी अन् उपशास्त्रीय गीतांची सुरेल पेशकश... गायक अन् वादकांच्या जुगलबंदीने तृप्त झालेले कान अशा अशा स्वराविष्काराच्या आनंन्नुभूतीने नाशिककरांची मराठी नववर्षाच्या प्रारंभीची सायंकाळ श्रीमंत झाली. अभिजात भारतीय संगीताच्या दुर्मिळ कलाविष्काराने नाशिककरांना केवळ मंत्रमुग्धच केले नाही, तर सुरावटींमधून शब्दांच्या पलीकडची अनोखी सफरही घडविली. निमित्त होते महेश काळे या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायकाच्या गीतमैफलीचे.

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या सदस्यांसाठी मराठी नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोडवरील सावरकरनगर येथे नंदनवन लॉन्समध्ये आयोजित या मैफलीस नाशिकमधील दर्दी रसिकांनी तोबा गर्दी केली होती.

मैफलीच्या प्रारंभीच महेश काळे यांनी प्रसिद्ध अशी 'ला दे ला दे पिया' ही बंदिश सादर करीत रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. काळे यांची ताकदीची गायकी, प्रत्येक शब्दावर चढविला जाणारा सुरांचा साज अन् आलापीसमवेत वादकांचा रंगलेल्या जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी 'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' हे रसिकप्रिय गीत त्यांच्या आगळ्यावेगळ्या अंदाजात सादर केले. नाशिककर रसिकांनीही त्यांच्या या गायकीला टाळ्यांच्या कडकडाटात मनमुराद दाद दिली. या गीताच्या सादरीकरणातून जणू काळे यांनी सूरावटींतून रसिकांना शब्दांच्या पलीकडील सुश्राव्य दुनियेची सफर घडविली. त्यानंतर त्यांनी संत चोखामेळा यांची 'आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण' या रचनेसह रसिकांच्या आवडीची अनेक गाणी सादर केली. संवादिनीवर राजू तांबे यांनी साथसंगत केली. प्रसाद पाध्ये (तबला), श्रुती भावे (व्हायोलिन), सूर्यकांत सुर्वे (तालवाद्ये) यांनी काळे यांना साथसंगत करीत मैफल अधिकच बहारदार केली.

-----पॉइंटर्स---

स्वागत यात्रांतून जनजागृती -२

...तर नाशिकरोडला पाणीबाणी-३

करवसुलीसाठी नोटिसा -४

भयकंप अन् थरार -५

'फिशिंग'चा वाढता धोका -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाल पाटलांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत आदर्श आचारसंहितेची प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. धुळे लोकसभेचे काँग्रेस उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी सभेस परवानगी घेतली नाही म्हणून तालुका पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शुक्रवारपासून आमदार कुणाल पाटील यांचा प्रचारार्थ मालेगावात दौरा सुरू आहे. शुक्रवार ५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान तालुक्यातील सौंदाणे गावी ग्रामपंचायत समोरील सभामंडपात त्यांनी सभा घेतली होती. उमेदवारांना सभेच्या परवानगीसाठी मालेगाव बाह्य मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी एक खिडकी योजना सुरू केली आहे. दरम्यान आचारसंहिता भंगची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सभेच्या परवानगी बाबत अर्ज दिलेला आहे किंवा नाही याची खात्री केली असता सभेची परवानगी घेतली नसल्याचे समोर झाले. यामुळे पोलिस शिपाई सचिन बाबूलाल दळवी यांच्या फिर्यादीवरून कुणाल पाटील यांच्यासह ६० ते ७० जणांवर विनापरवानगी सभा घेवून कायद्याचे उल्लंघन केले.

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आमदार कुणाल पाटील आज (दि. ८) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वा. धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालय देवपूर येथून रॅली निघणार आहे. दुपारी ११.४५ वा. पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमरीश पटेल, रोहीदास पाटील, हेमंत देशमुख, डॉ. प्रशांत हिरे, राजवर्धन कदमबांडे, आमदार असिफ शेख, दीपिका चव्हाण, महापौर रशीद शेख, मौलाना मुफ्ती इस्माईल, डॉ. अद्वय हिरे, प्रसाद हिरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, संजय चव्हाण आदी उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगरवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील धनगरवाडी (पिंपळगाव) येथील ५० वर्षीय रमेश मारुती डुंबरे या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून झाडाला फाशी घेत रविवारी आत्महत्या केली. सिन्नरपासून पूर्व भागातील ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडी येथे ही घटना घडली. रमेश डुंबरे यांनी रविवारी पहाटे साडेपाच वाजता शेतातील निंबाच्या झाडाला फाशी घेतली. कालच त्यांनी शेतातील कांदे काढून ठेवले होते. पत्नी जयश्री या सकाळी झोपेतून उठल्यानंतर कांद्यावर पात टाकण्यासाठी शेतात आल्या. त्यावेळी पतीला त्यांनी बांधावर उभ्या अवस्थेत पाहिले. त्यांनी बांधावर काय करतात? असे विचारता त्यांना पतीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या गळ्यात दोरी होती व ते मृतावस्थेत आढळले. नंतर त्यांनी आरडाओरड करून कुटुंबातील व्यक्तींना घटनास्थळी बोलावले. ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी सिन्नरला पाठविला. सिन्नरच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर धनगरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्जाळा कंटाळून घेतला निर्णय

घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात सोसायटी व बँकेच्या कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी सदर नोट जप्त केली आहे. डुंबरे यांच्या नावावर धनगरवाडी शहरात दीड एकर जमीन आहे. यापूर्वीही धनगरवाडी गावात दोन शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. डुंबरे त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. मुसळगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images