Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

साडेनऊ हजार मतदारांची नोंदणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोंदणी न केलेल्यांसाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा विशेष मतदार नोंदणी मोहीम घेतली. यात जिल्ह्यातील ९ हजार ४५७ जणांची नोंदणी करण्यात आली. ५ हजार २३६ पुरुष व ४२२१ महिलांचा यात समावेश आहे. नवीन मतदार नोंदणीत ७ हजार ८८० जणांनी फॉर्म भरून दिले असून, त्यात पुरुष ४ हजार ४५३, तर महिलांची संख्या ३ हजार ४२७ आहे.

याअगोदर मतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी रोजीदेखील विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पण, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा २ व ३ मार्च रोजी जिल्ह्यात झालेल्या या विशेष मोहिमेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. नोंदणी करू न शकलेल्या मतदारांसाठी ही विशेष मोहीम १५ विधान सभा मतदार संघांत झाली. आता त्याची आकडेवारी समोर आली आहे. सर्वाधिक १ हजार ७५६ जणांची नोंदणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून झाली आहे. त्याखालोखाल सिन्नर विधानसभा मतदार संघात १ हजार ८५ इतकी नोंदणी झाली आहे. सर्वात कमी मतदार नोंदणी मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात अवघी १३४ इतकी झाली आहे.

या अभियानात सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले. त्यात नमुना क्र. ६ हा नवीन नोंदणीसाठी होता. ७ क्रमांकाचा फॉर्म मतदाराचे नाव वगळण्यासाठी होता. ८ क्रमांकाचा फॉर्म दुरुस्तीसाठी होता. ८ अ चे अर्ज हे भाग बदलाविषयी होते. त्यात नाव नोंदणीसाठी ७ हजार ८८०, वगळण्यासाठी ३०१, दुरुस्तीसाठी १ हजार ९ तर भाग बदलण्यासाठी ९७३ अर्ज आले.

चावडी वाचन

सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून, गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनीदेखील या मोहिमेची माहिती नागरिकांना द्यावी. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीदेखील या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळा प्रवेशप्रक्रियेची आजपासून लगीनघाई

$
0
0

आरटीई अंतर्गत ४५७ शाळांमध्ये ५,७६४ जागांसाठी होणार प्रवेश प्रक्रिया

\B...

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आजपासून (५ मार्च) अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. अद्याप, जिल्ह्यातील शाळांची नोंदणी सुरू असल्याने या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या आरटीई प्रवेशाची पालकांमध्ये प्रतीक्षा आहे. प्रवेशासाठी पालकांना आवश्यक कागदपत्रांची तयारी करता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रबोधन करण्यात आले. मात्र, अर्जप्रक्रियेसाठी तारीख पुढे ढकलली जात असल्याने पालकांची प्रतीक्षा कायम आहे. प्रारंभी, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अर्जप्रक्रिया सुरू होणार असल्याचा अंदाज होता. मात्र, शाळांची, कागदपत्रांची पडताळणी व सरकारी सूचना यामुळे यंदा प्रक्रियेला विलंब झाला. २५ फेब्रुवारी रोजी सुरू होणारी अर्जप्रक्रिया पुढे ढकलून ५ मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, आज (५ मार्च) पासून ही प्रक्रिया सुरू होऊन २२ मार्चपर्यंत अर्जप्रक्रिया सुरू राहणार आहे. https://rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटवर पालकांना अर्ज करता येणार आहे.

...

\Bयंदा प्रक्रियेला विलंब

\Bगेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच अर्जप्रक्रिया सुरू झाली होती. ४६६ शाळांमध्ये ६ हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांतून चार प्रवेश फेऱ्यांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली होती. त्यापैकी ४ हजार ६४६ बालकांनी प्रवेश घेतला होता. १३ मार्च रोजी पहिली सोडत काढून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली होती. यंदा मार्चअखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत निघेल, असे सांगण्यात येत आहे.

...

तालुकानिहाय शाळा व उपलब्ध जागा

तालुका - शाळा - जागा

बागलाण - ४५ - ४३६

चांदवड - १९ - १७७

देवळा - १४ - १६९

दिंडोरी - ३० - ३२७

इगतपुरी - २२ - १८७

कळवण - १६ - १४४

मालेगाव - ३७ - ४०८

नांदगाव - १८ - १९२

नाशिक - १९ - २२१

निफाड - ५२ - ६८५

पेठ - १ - १३

सिन्नर - ३८ - ४१५

सुरगाणा - २ - १५

त्र्यंबक - ६ - २७

येवला - ३३ - २८७

मालेगाव मनपा - १३ - २०१

नाशिक मनपा - ९२ - १८६०

एकूण - ४५७ - ५७६४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बम बम भोले’चा गजर

$
0
0

शहरभरात महाशिवरात्रीचा उत्साह

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमवार व महाशिवरात्र असा दुहेरी योग जुळून आल्याने शहर व परिसरातील मंदिर 'बम बम भोले'च्या गजराने दुमदुमून गेली होती. शिवालयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळांसह शिवमंदिर व्यवस्थापन आणि शिवभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

महाशिवरात्रीपासून सोमवारी पहाटेपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली. रूद्राभिषेक, शिवस्तोत्रांचे पठण, महाआरती, महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती. पहाटेपासूनच भाविकांनी शिवदर्शनासाठी मंदिरांमध्ये रांगा लावल्या होत्या. शिवरात्रीची शासकीय सुटी असल्याने पंचवटीतील कपालेश्वर, गंगापूर रोडवरील सोमेश्वरसह त्र्यंबकेश्वर व परिसरातील प्राचीन शिवमंदिरांमध्ये भाविकांनी उपस्थिती लावली. सेवाभावी मंडळांच्या वतीने मंदिरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांसाठी पादत्राणे सुविधा, पाणीव्यवस्था आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी व्यवस्थापनासाठी योगदान दिले. रविवारला जोडून शिवरात्रीची सुटी आल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरास भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे गोदाकाठ परिसर आणि पंचवटीतही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात काही ठिकाणी शिवरात्रीनिमित्त पालखीही काढण्यात आली. सायंकाळनंतर शिवमंदिरांमध्ये गर्दी वाढत गेली.

...

गोदाकाठची शिवमंदिरे गजबजली

गोदेच्या काठावर कपालेश्वर मंदिराच्या व्यतिरिक्त इतरही शिवमंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नारोशंकरासह विविध प्राचीन शिवमंदिरांमध्ये सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी हजेरी लावली होती. काही दिवसांअगोदरच या मंदिरांमध्येही उत्सवाची पूर्वतयारी करण्यात येत होती. यानिमित्ताने मंदिरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावटीवरही भर देण्यात आला. शिवरात्रीनिमित्त भाविकांच्या वतीने विविध धान्य, दक्षिणा आदी वस्तूंच्या दानावरही भर देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाइक रॅली’तून मिळणार सक्षमतेची ग्वाही

$
0
0

महिलावर्गाचा उत्साह शिगेला; नावनोंदणीला वाढता प्रतिसाद

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराची धुरा समर्थपणे पेलण्यासह देशावर आलेले संकट पेलण्याची शक्ती... जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात स्वत:चं नवं कर्तृत्व सिध्द करण्याची जिद्द... त्यासह येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात सक्षमतेची प्रचीती देणारी नारीशक्ती रविवारी एकवटणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमन बाइक रॅली'त नारीशक्ती सक्षमतेची ग्वाही देत दोन तास बाइकच्या वेगावर स्वार होणार आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'ऑल वूमन पॉवर रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० मार्च) सकाळी ७.३० वाजता या बाइक रॅलीला प्रारंभ होईल. त्यासाठीच्या नावनोंदणीला सुरुवात झाली असून, कॉलेजच्या तरुणींसह गृहिणी, महिला बचतगट, ऑफिस महिलांचा ग्रुप मोठ्या संख्येने नावनोंदणी करीत आहे. दरवर्षी सामाजिक भान जपत, नेतृत्व कौशल्याची जोड देत, नटून थटून बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलावर्गाचा उत्साह अधिक असतो. यंदादेखील महिलांच्या उत्साहाला उधाण आले असून, रविवारी होणाऱ्या रॅलीसाठी महिलांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. रॅलीत मैत्रिणींसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल, शिवाय नव्या मैत्रिणीदेखील जोडल्या जातील. त्यामुळे महिला दिनाचं खास सेलिब्रेशन करणं महिलांना शक्य होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे नारीशक्ती जिंदाबाद, आव्वाज कुणाचा, हमसे बढकर है कौन, असा थक्क करणारा उत्साह घेऊन साऱ्याजणी नाशिकच्या बाइक रॅलीत दाखल होतील. प्रत्येक क्षणागणिक वाढणारा उत्साहाचा पारा यंदाही वरचढ राहणार आहे. कलात्मक संकल्पनातून केल्या जाणाऱ्या प्रबोधनाला पारितोषिके जिंकण्याची संधीही मिळणार आहे. उत्साहाच्या या पर्वणीत सहभागी होण्यासाठी तुम्हीदेखील मागे राहू नका. आजच तुमचे नाव नोंदवा अन् बाइक रॅलीतील तुमचा सहभाग निश्चित करा.

...

\B'अशी करा नावनोंदणी'\B

'ऑल वूमन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड 58888 या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल. तसेच ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

--

\B'ऑल वूमन बाइक रॅली'\B

\Bकधी - \Bरविवार १० मार्च २०१९

\Bवेळ - \Bसकाळी ७.३० ते १०

\Bकुठे - \Bईदगाह मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा वाचविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना आवाहन

$
0
0

मनमाड : येथील सर्वात जुन्या व स्वातंत्र्यपूर्व काळातील इंडियन हायस्कूलला रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याची नोटीस दिल्यानंतर शाळा वाचविण्यासाठी सोशल मीडिया वरून आता शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना भावनिक साद घालून रेल्वे विरुद्धच्या संभाव्य जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. रेल्वेविरुद्ध आता एकत्र लढा उभारण्या संदर्भात संचालक प्रयत्नशील असल्याचे सोमवारी संस्थेचे संचालक डॉ. सी. एच. बागरेचा, राजेंद्र गुप्ता, विकास काकडे यांनी सांगितले. दरम्यान शाळा हलविण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला आव्हान दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमाचा राज्यस्तरीयक्रीडा महोत्सव

$
0
0

निमाचा राज्यस्तरीय

क्रीडा महोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा) या संघटनेच्यावतीने गोल्फ क्लब मैदानावर ८ ते १० मार्च कालावधीत जिल्हा अंतर्गत आणि राज्यस्तरीय क्रिकेट क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात येणार आहे. वैद्यकिय व्यवसायिकाच्या आरोग्यदायी स्वाथ्यच्या विचार करून जिल्ह्य अंतर्गत क्रिकेट स्पर्धा 'निमा करंडक' या नावाने आयोजन गेल्या सहा वर्षांपासून नाशिक निमा शाखा राबवित आहे. यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील डॉक्टरांचे संघ नाशिक शहरात दाखल होणार आहेत.

या क्रिकेट महोत्सवाप्रसंगी पहिल्या दिवशी ८ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील तालुकास्तरीय डॉक्टरांच्या स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, निमाचे राष्ट्रीय शाखेचे सहखजिनदार शैलेश निकम, निमा राज्य शाखेचे खजिनदार डॉ. भूषण वाणी, उपसचिव डॉ. अनिल निकम तसेच प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्‍त्या व नाशिक महापालिकेच्या प्रभाग पश्‍चिम समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील निमा नाशिक, सातपूर, पाथर्डी, पंचवटी, दिंडोरी, पेठ, आयएमए, शिवगर्जना लासलगाव हे संघ सहभागी होणार आहेत.

महोत्सवाचा राज्यस्तरीय स्पर्धा या ९ व १० रोजी आयोजित करण्यात आल्या असून त्यात यात नांदेड, नागपूर, शेवगाव, आंबेगाव-जुन्नर, राजगुरुनगर, शिरूर, शहापूर, बार्शी, बुलढाणा, शिरपूर-धुळे, परभणी विविध जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. १० मार्च रोजी क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी परितोषिक वितरणासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विजेत्या संघाला विजेता संघाला चषक व ३१ हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला चषक व २१ हजार रुपये रोख व याबरोबरच उत्कृष्ट खेळाडूना विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपवासामुळे दूधदरात वाढ

$
0
0

\Bमहाशिवरात्री व सोमवारमुळे झाली वाढ\B

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाशिवरात्री व सोमवार असा दुहेरी योग जुळून आल्याने सोमवारी (दि. ४) दूध विक्रेत्यांनी दूध दरात पाच ते दहा रुपयांची वाढ केली होती. उपवासामुळे मागणी वाढल्याने ही वाढ एका दिवसापुरतीच असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. यामुळे ग्राहकांना जादादराने दूध खरेदी करावे लागले. याशिवाय दही व ताकालाही चांगली मागणी होती.

महाशिवरात्री व सोमवारनिमित्त अनेक भाविक भगवान महादेवांना दुधाचा अभिषेक घालतात. ठिकठिकाणच्या मंदिरात पूजा, अर्चना केली जाते. तसेच घरातील लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच उपवास असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली होती. यामुळे सोमवारी दुधाचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले होते. ६० ते ६५ रुपये लिटरने दुधाची विक्री करण्यात आली. दुधाबरोबरच ताक व दहीलाही चांगली मागणी होती. दहीची १०० रुपये किलोने विक्री झाली.

...

बाजारात फळांची रेलचेल

महाशिवरात्र व सोमवार यामुळे बाजारात फळांची रेलचेले होती. मागणी अधिक असल्याने रविवारपासूनच विक्रेत्यांना फळांचा जादा साठा करून ठेवला होता. फळांच्या दरातही किरकोळ वाढ करण्यात आली होती. असे असूनही फळांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

द्राक्षांची बाजारात आवक वाढली असून, दर सर्वसामान्यांच्या आवकेत आले आहेत. यामुळे मागणीही वाढली आहे. द्राक्षांना किलोला ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. संत्रीची आवक वाढल्याने दर थोडे कमी झाले आहेत. संत्री ३० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. याशिवाय टरबूजची आवक वाढू लागली आहे. टरबूजला किलोला १५ रुपये दर मिळत असून, नगनुसारही विक्री होत आहे. अॅपल बोरची आवक थोडी कमी झाली असली तरी दर मात्र ४० रुपये किलोवर टिकून आहे.

....

किलोचे दर

द्राक्ष - ५०

सफरचंद १०० ते १६०

संत्री - ४०

पपई - ३०

टरबूज - १५

अॅपल बोर - ४०

चिक्कू - ६०

डाळिंब - ८०

केळी - ३० रुपये डझन

किवी - ४० रु. नग

ड्रॅगन - १०० रु. नग

शहाळे - ४० रु. नग

....

भाजीपाल्याचे दर टिकून

भाजीपाल्याच्या दर गेल्या आठवड्याप्रमाणेचे टिकून आहेत. पालेभाज्यांचे दर जैसे थे आहेत. मेथी, कोथिंबीरची जुडी ५ ते ७ रुपये, तर शेपू व पालकची ५ रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. कांदापातच्या जुडीला १० रुपये दर मिळत आहे. कारले, गिलके व दोडके यांचे किलोचे दर ५० ते ६० रुपयांवर टिकून आहेत. वांगे मात्र स्वस्त झाले आहेत. वांग्याचे दर २० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मिरची ५० रुपये, टोमॅटो २० रुपये, काकडी २० रुपये, तर शेवगा ६० रुपये किलोने विक्री होत आहे. तसेच कडधान्याचे दरही जैसे थे आहेत. मटकी ४८ रु., पांढरा वाटाणा, हरभरा, मसूर, चवळी यांचे दर किलोला ६० रुपये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक

मंगळवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक…… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाडी पार्किंगवरून टाकळीमध्ये मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रस्त्यात गाडी का उभी केली, असे विचारणाऱ्याला आगर टाकळीतील रामदास स्वामीनगर येथे सहा जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवीण वसंत पवार (४६) व त्याचा भाऊ दिलीप (रा. रामदासस्वामी नगर) हे दोघे भाजीपाला घेऊन घरी जात असताना रामदासस्वामी नगर येथील चौकात मधोमध चारचाकी वाहन उभे होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. प्रवीण याने 'रस्त्यात वाहन का उभे केले', असे नानू साळवे याला विचारले. यामुळे संतापलेल्या नानूने शिवीगाळ करून प्रवीणला लाथाबुक्क्याने मारहाण केली. नानूचे साथीदार रोहित मल्ला व रंका साळवे यांनीही प्रवीणला मारले. तसेच चंद्रमणी जगताप, राजेंद्र जगताप यांनीही त्याला मारहाण केली. जखमी अवस्थेतील प्रवीणला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी नानू साळवे, अंकुश साळवे, चंद्रमणी जगताप, शुभम वर्मा, राजेंद्र जगताप, भारत रामअवतार मल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संदर्भ सेवा’च्या खिडक्यांना जाळीकवच

$
0
0

\B- \Bजाळ्यांसाठी २० लाखांची तरतूद

- रुग्णांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये उंच मजल्यांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी उड्या मारून आत्महत्या केल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भविष्यातसुद्धा हा धोका कायम असल्याने हॉस्पिटलमधील खिडक्यांना जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने २० लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे हा निधी हॉस्पिटलमार्फतच सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे.

हॉर्ट, किडनी यासह इतर महत्त्वाच्या गंभीर आजारांवर संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. शंभर बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलला तीन मजले असून, येथे सतत रुग्णांची वर्दळ असते. नाशिक आणि मराठवाडा विभागातील रुग्ण उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मुळात या ठिकाणी दाखल होणारे रुग्ण मानसिक व आर्थिक परिस्थितीने गांजलेले असतात. याच मानसिकतेतून संधी मिळताच रुग्ण हॉस्पिटलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतात. ९ फेब्रुवारी रोजी जवाहरलाल रामकिसन गुप्ता (वय ४८, रा. श्रीरामनगर, घोटी, ता. इगतपुरी) यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी १२ जानेवारी रोजी रहीमखान नबीखान पठाण (वय ५२, रा. मालेगाव) यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तसेच यापूर्वी असे प्रकार सातत्याने घडले आहेत. हॉस्पिटलच्या सर्व खिडक्यांना तसेच ओपन स्पेसमध्ये जाळ्या बसविण्याचा एक प्रस्ताव लालफितीत अडकला होता. त्यामुळे येथे जाळ्या बसविणे शक्य झाले नाही.

...

आत्महत्येच्या घटनांनंतर आली जाग

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील घटनांनी आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. या कामासाठी निधीची जमवाजमव करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यात आरोग्य विभागाने या कामास २० लाखांच्या खर्चास मंजुरी दिली. संदर्भ सेवा हॉस्पिटलला विम्याची रक्कम मिळते. त्यातूनच ही रक्कम काढून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम कधी आणि कसे पूर्ण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटच्या प्रतींवरून विरोधक आक्रमक

$
0
0

मंजुरीसाठी गुरुवारी विशेष महासभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकून अर्थसंकल्पाची मंजुरी रखडू नये यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गुरुवारी (दि. ७) महासभा बोलविण्यात आली आहे. परंतु, अर्थसंपल्पाच्या प्रती नगरसेवकांना न मिळाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मूळ अर्थसंकल्पाच्या प्रती वेळेत न मिळाल्याचे कारण देत, विरोधकांकडून महासभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीने प्रशासनाने सादर केलेले २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट मंजुरीसाठी महासभेकडे पाठवले आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्थायी समितीला १८९४.५० कोटींचे प्रारूप अर्थसंकल्पीय बजेट सादर केले. स्थायी समितीने त्यात ८९ कोटींची वाढ सूचवल्याने हे बजेट १९८३ कोटींपर्यत पोहचले. लोकसभा निवडणुकीची घाई असल्याने भाजपला हे बजेट आचारसंहितेपूर्वीच अंमलबजावणीला पाठवायचे आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने स्थायीचे बजेट प्राप्त होताच, त्याला मंजुरीसाठी गुरुवारी सकाळी १० वाजता विशेष सभा बोलवली आहे. या बजेटमध्ये पुन्हा महासभेकडून ७० कोटींची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेचे हे वाढीव बजेट दोन हजार कोटींवर गेले असून प्रशासनाकडे छपाईसाठी पाठवण्यात आले आहे. बजेटवर अभ्यास करण्यासाठी सदस्यांना किमान सात दिवस आधी बजेटच्या प्रति मिळणे आवश्यक होते. परंतु, महासभेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असतांनाही, बजेटच्या प्रति सदस्यांच्या हाती पडलेल्या नाहीत. त्यामुळे विरोधक यावरून सत्ताधारी भाजपला घेरण्याच्या तयारीत आहेत. बजेट तयार नसतांना महासभा कशी बोलवली, असा सवाल आता विरोधकांकडून केला जात असून भाजपची या विषयावरून महासभेत कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटवरून महासभा वादळी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्री रुग्णालयास लाभला मुहूर्त

$
0
0

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज भूमिपूजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या वादात अडकलेले शहरातील पहिले स्री रुग्णालय अखेर मार्गी लागले असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते या रुग्णालयाची कोनशिला मंगळवारी (दि. ५) ठेवण्यात येणार आहे.

माजी आमदार वसंत गिते यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची अखेर सरशी झाली असून सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय असे या रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील पहिले स्री रुग्णालय दृष्टीपथास आले आहे. आमदार विकास निधीतून ४२ कोटींच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असून त्यात गोल्फ क्लब मैदानाच्या सुशोभिकरणाचाही समावेश आहे.

राज्य सरकारने शहरात मंजूर केलेले पहिले स्री रुग्णालय हे पाच वर्षापासून आ. फरांदे आणि वसंत गिते यांच्यातील वादात अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आ. फरांदे यांच्या बाजूने कौल दिला. आता भाभानगरमध्येच हे रुग्णालय साकारले जाणार आहे. आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्री रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याची माहिती दिली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कोनशिला बसविण्यात येणार आहे. या रुग्णालयासह साईनाथनगर चौफुली ते वडाळा चौफुली दरम्यान मंजूर झालेल्या सायकल ट्रॅकचे, पाच कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचेही भूमिपूजन केले जाणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले आहे.

चार वर्षांचा संघर्ष

आपण या रुग्णालयासाठी चार वर्षांपासून संघर्ष केला असून त्यामुळे महिलांना मध्यवर्ती ठिकाणी उपचारासाठी एक रुग्णालय उपलब्ध झाले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात १२ ओपीडी असणाऱ्या या वास्तूत आयसीयू, एनआयसीयू देखील असणार आहेत. तसेच तीन ऑपरेशन थिएटरही येथे असेल, असेही आमदार फरांदे यांनी सांगितले.

गोल्फ क्लबचे बदलणार रुपडे

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अर्थात गोल्फ क्लब येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या कामांचेही भूमिपूजन केले जाणार आहे. या मैदानात ७.५ मीटर रुंदीचा मातीचा जॉगिंग ट्रॅक, तीन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक, योगासाठी स्वतंत्र जागा, ग्रीन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा, फुटबॉल व क्रिकेटसाठी स्वतंत्र ग्राउंड, क्रिकेटच्या सरावासाठी नेट, महिला व पुरुषांसाठी ई-स्वच्छतागृह, लहान मुलांच्या खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, पेव्हर वाहनतळ व्यवस्था, बसण्यासाठी स्वतंत्र लॅान व्यवस्था, फुलांचे आकर्षक गार्डन असे विविध कामे केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ आग फटाक्यांमुळेच;

$
0
0

शालेय व्यवस्थापनाचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चेहेडी नाका येथील आदर्श विद्यामंदिराच्या स्नेहसंमेलनप्रसंगी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लागलेली आग ही एका वाढदिवसानिमित्त हुल्लडबाजी घालणाऱ्या तरुणांनी उडविलेल्या फटाक्यांमुळेच लागली होती. स्नेहसंमेलन आणि आग यांचा काहीही संबंध नाही, असा दावा शालेय व्यवस्थापनाने केला आहे.

'स्नेहसंमेलनात आग' या मथळ्याखाली सोमवारी 'मटा'त प्रकाशित झालेल्या वृत्तानंतर शालेय व्यवस्थापनाने बाजू मांडली आहे. याबाबत माहिती अशी, की रविवारी चेहडी नाका परिसरातील संस्थेत आयोजित स्नेहसंमेलनादरम्यान शाळेजवळ आग लागली होती. या परिसरातील रस्त्याच्या चौफुलीवर रात्री काही लोकांनी वाढदिवस साजरा करताना फटाके फोडले. या फटाक्याची एक ठिणगी जवळील शेतातील गंजीवर पडून ही आग लागली. स्नेहसंमेलनाचे नियोजन आणि लागलेली आग यात काहीही संबंध नसून उलट संयोजकांनी संमेलनस्थळी पाच अग्निरोधक सिलिंडर व प्रतिबंधक यंत्रणा सज्ज ठेवली होती. परिणामी, घटनास्थळी विद्यार्थी व पालकांचा गोंधळ झाला नाही. पालकांनी यावेळी सादर सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बहुसंख्येने उपस्थिती लावली, असा खुलासा समता समाज विकास संस्थेच्या मानद सचिव मनीषा विसपुते, अध्यक्ष मधुकरराव सातपुते, समन्वयक रविकिरण औटे यांनी केला आहे. याशिवाय या परिसरात रात्री उशिराच्या वेळेत चौकाचौकात तरुणांचे वाढदिवस साजरे केले जातात. परिसरात बेकायदा गर्दी जमवून रहदारीसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा रस्ताही यामुळे अडला जातो. या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशीही मागणी औटे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री रुग्णालयास लाभला मुहूर्त

$
0
0

नाशिक : भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या वादात अडकलेले शहरातील पहिले महिला रुग्णालय अखेर मार्गी लागले असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते या रुग्णालयाची कोनशिला मंगळवारी (ता. ५) ठेवण्यात येणार आहे. माजी आमदार वसंत गिते यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची अखेर सरशी झाली असून सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय असे या रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्टेशनची ‘एजीएम’कडून पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेचे मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) डॉ. आर. बद्री नारायण यांनी सोमवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनला भेट दिली. स्थानकातील प्रवासी सुरक्षा व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

रेल्वेस्टेशनमधील चारही प्लॅटफार्म, बुकिंग व रिझर्व्हेशन ऑफिस, सरकते जिने, रेल्वे सुरक्षा कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आदींची त्यांनी पाहणी करून सूचना केल्या. स्टेशनमधील स्वच्छतेबाबत पाहणी करतानाच कंत्राटी सफाई कामगारांशी संवाद साधून त्यांना योग्य ते मानधन मिळते की नाही याची माहिती घेतली. या कामगारांना कागदोपत्री जेवढा पगार दाखवला जातो, त्यापेक्षा कमी पगार त्यांच्या हातात मिळतो असे पत्रकारांनी निर्देशनास आणून दिले असता कामगारांनीच याबाबत जागरुक रहावे, रेल दृष्टी या संकेतस्थळावर कंत्राटाची सर्व माहिती दिलेली आहे, असे त्यांनी सांगितले. नाशिक-कल्याण लोकल नाशिककरांच्या सेवेत कधी रुजू होणार याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. स्टेशनमधील विकासकामे प्रगतिपथावर असून, त्रुटी दूर केल्या जात असल्याचे ते म्हणाले.

यावेळी स्टेशनमास्तर आर. के. कुठार, भुसावळचे वरिष्ठ तिकीट अधिकारी अजयकुमार, वरिष्ठ डीसीएम आर. के. शर्मा, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, अभियंता एस. जी. सैय्यद, गणेश पाटील, एम. बी. डोके, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, संजय गांगुर्डे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वराजतर्फे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अस्मिता रॅली

$
0
0

स्वराजतर्फे गुरुवारी

अस्मिता रॅली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वराज फाउंडेशन व आकार फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक संदेश देण्यासाठी व महिलांची अस्मिता उंचावण्यासाठी अस्मिता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (७ मार्च) सायंकाळी ६.३० वाजता डोंगरे वसतिगृह येथून या रॅलीची सुरुवात होणार आहे. गंगापूर रोड, कॉलेजरोड या भागात या रॅलीचे संचलन होणार आहे. या अस्मिता रॅलीमध्ये महिला ढोल पथक महिला लेझीम पथक मुलींचे कराटे प्रात्यक्षिक बेटी बचाव अवयव दान प्रदूषण टाळावे शिक्षण अशा विषयाचे विविध संदेश या रॅलीमध्ये देण्यात येणार येणार आहे. तसेच झाशीची राणी, इंदिरा गांधी, कल्पना चावला अशा विविध महिला नेतृत्वाचे प्रतीक म्हणून वेशभूषा करण्यात येणार आहेत या अस्मिता रॅलीमध्ये शहरातील महिला संस्था व शहरातील महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद हास्य क्लबचा वर्धापनदिन

$
0
0

आनंद हास्यक्लबतर्फे

निरोगी रहा कार्यक्रम

नाशिकरोड : नाशिकरोडच्या आनंद हास्य योग क्लब आणि अपोलो हॉस्पिटलतर्फे काळजी मानसिक व शारीरिक आरोग्याची हसा व निरोगी रहा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्लबच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकरोडच्या ऋतुरंग भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. क्लबचे अध्यक्ष वसंतराव पेखळे, वैशाली सहस्त्रबुध्दे, आशा बोराडे, विद्या माळवे, सुरेखा दुसाने, नंदा शेळके, निशा काथवटे, विजया करवा आदींची यावेळी उपस्थिती होती.

मेंदू व मणके शस्त्रक्रियात्जज्ञ डॉ. संजय वेखंडे, किडनी विकारतज्ज्ञ डॉ. प्रकाश उगले, अस्थिरोग व गुढ़घेबदल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अनिल जाधव, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. प्रवीण गोवर्धने यांची व्याख्याने झाली. निरोगी आरोग्यासाठी हास्ययोग कसा पूरक आहे याविषयी क्लबचे अध्यक्ष वसंतराव पेखळे यांनी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता परिवर्तनाची आवश्यकता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आता परिवर्तनाची आवश्यकता व राष्ट्रीय गरज आहे. देशावर भाजपची राष्ट्रीय आपत्ती आली आहे. त्यासाठी जागृत राहावे लागेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

चोपडा लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघ 'कार्यकर्ता संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळी ती यंत्रे तपासून घ्यावीत. भाजप रडीचा डाव खेळणार असले, तरी परिवर्तन होणार आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती, ती राज्ये त्यांच्या हातातून गेल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या कामांचे कौतुक करुन त्यांच्यामुळे नाशिकचा चेहरा बदलल्याचे सांगितले. नाशिकची संपूर्ण जबाबदारी भुजबळांकडे आहे. त्यामुळे या विकास पुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या शेतकरीविरोधी भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राफेल, नोटाबंदी व भाजपच्या कारभाचे वाभाडे काढून शेतकऱ्यांना दिलेल्या योजनांवर टीका केली. रोजगार देण्यातही सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाच वर्षात माझ्या काळात जवळपास पूर्ण झालेले प्रकल्प सुरू केले नसल्याचे सांगत सरकारवर टीका केली. माजी आमदार अपूर्व हिरे यांनी सिडकोचा प्रश्न मांडत महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, गटनेते गजानन शेलार, नगरसेविका सुषमा पगारे, समीना मेमन, विष्णूपंत म्हैसधूणे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार हेमंत टकले, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी आमदार जयवंत जाधव यांनी केले.

'मुख्यमंत्र्यांनी नाशिकला काय दिले?'

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक सोळाव्या स्थानी होते, आज ते शंभरातही नाही. आता नाशिकची जागा नागपूरने घेतली. नागपूरने पुढे जावे. पण, मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असताना नाशिक गायब झाले कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी राज्यसरकारने आपला वाटा जाहीर केला आणि त्यानंतर केंद्रीय बजेटमध्ये मंजुरी मिळाली. मात्र, अद्याप ते झाले नाही. आता पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा घाट घालून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. नाशिकमध्ये बोट क्लब, कालाग्रामसारखे अनेक प्रकल्प पूर्ण केले, तसेच अनेक प्रकल्पांचे काम सुरू करून दिले. ते दत्तक पित्याने पूर्ण करून प्रकल्प का सुरू केले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला नेमके काय दिले, असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'चौकीदारही चौर है' असे म्हणणारे उद्धव ठाकरे पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसले आहेत. सरकारने जनतेला फसवले असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी कबूल केले आहे. सरकारचे निर्णय जनतेच्या विरोधात गेले असतील तर त्याला शिवसेनादेखील तितकीच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

एका परिवारावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोनच गोष्टी सांगतात. ते सांगतात 'देश मजबूत हाथों मैं हैं', तर दुसरे 'एका परिवाराने देशाचे वाटोळे केले'. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाला मजबूत करण्याचे काम केले. या परिवारातील दोन पंतप्रधानांची हत्या झाली. पंतप्रधांनानी जपून बोलले पाहिजे. इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे केले, तर राजीव गांधी यांनी देशाला विज्ञानाची दृष्टी दिली, असेही ते म्हणाले.

निवडणुका एप्रिलमध्ये

लोकसभा निवडणुका ७ किंवा ८ मार्चला जाहीर होतील व एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल, असे सांगत पवार यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरली नाही तरी निघाली...

$
0
0

प्रवाशांअभावी धावली एसटी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या फुल्ल झाली की, एसटी निघते, असे सर्वसाधारण दृश्य दिसून येते. मात्र, महाशिवरात्रीच्या दिवशी 'भरली की निघाली' हे वाक्य सफशेल फोल ठरले. भाविकांच्या गर्दीअभावी अवघ्या तीन ते चार प्रवाशांसाठी एसटी बस सीबीएस येथून त्र्यंबककडे रवाना करण्यात आल्या.

महाशिवरात्रीसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली होती. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकनगरीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता ७० हून अधिक बस त्र्यंबकसाठी तयार ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सोमवारी भाविकांनी एसटी बसकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. सकाळी ९पर्यंत प्रवाशांची संख्या चांगली होती. पण, त्यानंतर एसटीला प्रवाशी मिळेनासे झाले. सकाळी ११ नंतर सीबीएस येथील जुने मेळा बस स्थानक येथून त्र्यंबककडे जाणाऱ्या बसेस अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या प्रवाशांसहित सोडण्यात आल्या. खासगी वाहतुकीवर प्रवाशांच्या कमतरेचा परिणाम जाणवला. मेळा बस स्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सी तासन् तास प्रवाशांची वाट पाहत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात दुमदुमली शिवमंदिरे

$
0
0

येवला : 'शिवशंभो, नमामि शंभो', 'हर हर महादेव' असा जयघोष करीत येवला शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील मंदिरामंमध्ये भाविकांनी शिवमहिमा वर्णिली. शहरातील पुरातनकालीन मोठे महादेव मंदिर, बसस्थानकानजीकचे जुने शिवमंदिर, बदापूर रोडवरील रोकडोबा महाराज मंदिर यासह तालुक्यातील पाटोदा येथील रामेश्वर मंदिर, अंदरसूलचे प्राचीन नागेश्वर मंदिर, चिचोंडी येथील राघवेश्वर मंदिर,तसेच मुखेड, नगरसुल आदी ठिकाणच्या शिवमंदिरात दिवसभर शिवभक्तांची मोठी गर्दी दिसत होती. अंदरसूल येथील श्री क्षेत्र नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला. सावता युवक गणेश मंडळ यांनी नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images