Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कोंडीचेही सेलिब्रेशन!

$
0
0

वाहतूक कोंडी कॅप्शन - पंकज चांडोले

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि वाहन तपासणीची कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे नाशिककरांना विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. द्वारका चौकात दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर सायंकाळी कॉलेजरोडवर मॉडेल कॉलनी चौकात वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे सरत्या वर्षात जणू वाहतूक कोंडीनेही सेलिब्रेशन केले की काय, असा प्रश्न उपस्थित होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासींच्या दारी, आरोग्य सुविधांची नांदी

$
0
0

दळवटला ग्रामीण रुग्णालय बांधकामास हिरवा कंदील

दीपक महाजन, कळवण

तालुक्यातील दळवट या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागात आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामास सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या कामाच्या निविदा निघाल्याने आदिवासी जनतेने स्वागत केले आहे.

दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळातच ग्रामीण रुग्णालयासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यास २०१६ मध्ये १२ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मंजुरीही मिळाली. सद्या दळवटला जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने आदिवासी बांधवांमध्ये दुर्लक्षित भूमिका घेतली जाते. आरोग्य योजनांचा लाभ या भागाला व्हावा व अंधश्रद्धा दूर व्हावी या उद्देशाने या ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र अपुरे पडत असल्याने नव्याने होणारे ग्रामीण रुग्णालय आदिवासींचे आरोग्यमान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. मंजुरी मिळालेल्या जागा ग्रामपंचायतमार्फत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावे वर्ग होण्यासाठी दोन वर्षांच्या अधिक काळ गेला. शिवाय या रुग्णालयाचा मूळ टाईप प्लॅन एकमजली होता; मात्र तो जागेअभावी दुमजली करण्यात आला. त्यासाठी आवश्यक ना हरकती तसेच मुंबई मंत्रालयातील आर्किटेक्ट कक्ष मंजुरी मिळण्यासही विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पवार यांच्या मूळगावी होणाऱ्या या रुग्णालयाच्या पूर्तीसाठी पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्नुषा व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी पाठपुरावा केला.

वैद्यकीय खात्याकडून स्वतंत्र निधी

१२ कोटी रुपये खर्चाच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी ९ कोटी ६९ लाख ७० हजार ३३९ इतक्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. वर्षभरात याचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. येथे अन्य सेवा, सुविधा मिळवण्यासाठी खर्चाची तरतूद असून, जीएसटी १८ टक्के लागणार आहे. वैद्यकीय खात्याच्या स्वतंत्र निधीतून हे ग्रामीण रुग्णालय होत आहे.

ए. टी. पवार यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालय दळवटला व्हायला हवे होते. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे त्यास विलंब झाला आहे. देर आये दुरुस्त आये असं समजून या रुग्णालयाची निर्मितीसाठी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सतत पाठपुरावा केला होता. या रुग्णालयामुळे गोरगरीब आदिवासी बांधवांना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल.

- जयश्री पवार, सदस्य, जिल्हा परिषद

दळवट हे आदिवासी पट्ट्यातील केंद्रस्थानी असलेल्या गावात ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत व्हावी म्हणून लालफितीत अडकलेल्या कामाच्या निविदा काढण्यासाठी स्थानिक आमदार जे. पी. गावित यांनी वेळोवेळी सूचना दिल्या. कामाचा दर्जा उत्कृष्ट असण्यासाठी व रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी आमदारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

- हेमंत पाळेकर, माकप सरचिटणीस, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव सी एम चषक

$
0
0

सीएम चषकाचे पारितोषिक वितरण

मालेगाव : देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएम चषक स्पर्धा मालेगाव बाह्य व मध्य मतदार संघात पार पडल्या. या चषकचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सटाणा नाका परिसरातील एकता जिमखाना येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पाटील यांच्यासमवेत उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रदीप बच्छाव, मालेगाव महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

000

'उज्ज्वला'साठी आवाहन

निफाड : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी गॅस कनेक्शन नाही त्यांनी अर्ज करावेत असे आवाहन एलपीजी गॅसचे जिल्हा नोडल ऑफिसर प्रतीक श्रीवास्तव यांनी केले आहे. निफाड येथे राजेश्वरी भारत गॅसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजेश्वरी भारत गॅसचे संचालक शरद सांगळे, मनोहर सांगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध युवकांनी केलीदुर्गम अंजनेरी सर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरूडझेप प्रतिष्ठान गेली दोन दशके विविध सामाजिक उपक्रम राबवत आपली वेगळी ओळख टिकवून आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त यंदा त्रंबकेश्वरजवळील अंजनेरी येथे नाशिकच्या अंध युवकांना घेऊन मोहीम आयोजित करण्यात आली होती. संकेत भानोसे या १६ वर्षीय युवा दुर्ग संवर्धकाने मोहिमेचे नेतृत्व केले. सागर बोडके, बाळू पोरजे, सुरज पाटील, राहुल धामणे, किरण धामणे, सुरेश भोईर, ज्ञानेश्वर साबळे हे सर्व अंध दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. डॉ. संदीप भानोसे, श्याम कुलथे आणि संकेत भानोसे यांनी दुर्गवरील प्लास्टिक गोळा केले, तसेच पाण्याच्या लाइनसाठी चर खोदला.

अंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे. येथे अनेक जैन लेणी आहेत. अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय आहेत. पठारावर पोहोचल्यावर अंजनीमातेचे मंदिर लागते. मंदिर प्रशस्त असून, मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते, तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनीमातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरून वैतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे. पठारावर तलाव आहे. वन खात्याने उत्तमरीत्या पायऱ्या व रेलिंग बनविल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तिपाई’ पुस्तकाचे आज प्रकाशन

$
0
0

नाशिक : पुण्यातील वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या 'तिपाई' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे. ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने अध्यक्षस्थानी असतील. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, प्रसिद्ध साहित्यिक विवेक उगलमुगले, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलास पोतदार आदी प्रमुख पाहुणे असतील. यापूर्वी नानासाहेब बोरस्ते यांच्या 'अंतरीच्या नाना कळा' आणि 'गावशीव' या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाची पार्टी भोवली; दीडशे तळीराम पोलिसांच्या हाती

$
0
0

नाशिक:

नववर्षाचे स्वागत करताना मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्या तब्बल १५० वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत कोर्टात पाठवले. संध्याकाळपासून सुरू झालेल्या कारवाई दरम्यान सापडलेल्या तळीरामांना नव वर्षाचे सेलिब्रेशन चांगलेच महागात पडले. याबरोबर पोलीस आणि वाहतूक विभागांनी केलेल्या कारवाईत देखील काही वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले.

कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी शहर पोलिसांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून तयारी केली. यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर २६ नाकाबंदी आणि ३९ फिक्स पाँईंट तैनात होते. मोकळे रस्ते मिळाल्यानंतर रॅश ड्रायव्हींग होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरकेडिंग केले. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि अपघात झाले नाहीत. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करणारे वाहन चालक रडारवर घेण्याचे नियोजन पोलिसांनी केले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आपल्याकडील १५ ब्रेथ अॅनालायझरचा वापर करीत मद्यपी वाहन चालकांचा शोध घेतला. संध्याकाळी १० ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत तब्बल १५० मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या हाती लागले.

गत वर्षी याच दिवशी अवघे २८ मद्यपी चालकांवर कारवाई झाली होती. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की,' ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने अल्कोहोलची तपासणी केल्यानंतर वाहनचालकांना थेट सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात मद्यपी वाहनचालकांना कोर्टात पाठवले जाते. वाहतूक पोलीस जागेवर पावती फाडत नाहीत. संबंधीत १५० वाहनचालकांना देखील कोर्टात पाठवण्यात आले असून, त्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंड होऊ शकतो. दरम्यान, नाकाबंदी शिवाय शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या कार्यक्रमाजवळ पोलिसांची गस्तही सुरू होती. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक तैनात करण्यात आले होते. ३१ डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, मुख्यालयातील ३०० कर्मचारी, १३ स्ट्रायकींग फोर्स, दोन आरसीपी प्लाटून, दोन जलद गती पथक आणि पोलीस स्टेशनचा मिळून जवळपास तीन हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर होता. या बंदोबस्तासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाला फुटीची बाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी या संपामध्ये फूट पडल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ९६६ कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभागी होऊन कामबंद ठेवले, तर ३९४ कर्मचारी कामावर हजर झाले. अत्यावश्यक कामकाजावर या संपाचा परिणाम झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, संपकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने दिल्याने सायंकाळी उशिरा हा संप मागे घेण्यात आला.

नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील कर्मचारी सरकारी असले तरी त्यांना वेतन आयोग लागू होत नाही. आम्हालाही वेतन आयोग लागू व्हावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांकडून राज्य सरकारकडे केली जात आहे. सरकारचे मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी संप पुकारण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण १५ नगरपालिका व नगरपंचायती आहेत. त्यामध्ये मनमाड, सिन्नर, येवला, नांदगाव, सटाणा, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्‍वर, चांदवड या नऊ नगरपालिका तर निफाड, कळवण, देवळा, दिंडोरी, पेठ व सुरगाणा या सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये वर्ग तीन आणि चारचे १३६० कर्मचारी आहेत. वर्ग तीनचे २२३ आणि वर्ग चारचे ७४३ असे ९६६ कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले. परंतु, वर्ग तीनचे ४७ आणि वर्ग चारचे ३४७ असे ३९४ कर्मचारी या संपामध्ये सहभागी न होता कामावर हजर झाल्याने संपाबाबत संघटनांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले.

कामकाज ठप्प

जिल्ह्यात १५ नगरपालिका आणि नगरपंचायती असून त्यापैकी सिन्नर, येवला, इगतपुरी, निफाड, सुरगाणा, दिंडोरी आणि देवळा या सात नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांनी १०० टक्के संप पाळला. त्यामुळे या नगरपालिकांमधील कामकाज ठप्प झाले.

लोकल सेवेसाठी

सत्यनारायण पूजा

जेलरोड : नाशिक-कल्याण, इगतपुरी-नाशिक तसेच इगतपुरी-मनमाड अशी लोकल सेवा रेल्वेने सुरू करावी या मागणीसाठी मंगळवारी नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात सत्यनारायण पूजा करण्यात आली. प्रवाशांना प्रसादाचेही वाटप करण्यात आले. पंचवटी मध्य प्रवाशी रेल्वे संघाने यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी संघाचे अध्यक्ष वसंत निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे, कोषाध्यक्ष मनोहर पगारे, पोपट नागरे, राजू वाघमारे, अऩिल नागरे, साहेबराव खर्जुल, संतोष शेलार आदी उपस्थित होते. लोकल सुरु करावी या मागणीसाठी या प्रवाशी संघातर्फे बारा वर्षांपासून सत्यनारायण पूजा घातली जाते. या गांधीगिरी आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कुंदन महापात्रा, रेल्वे पोलिस बलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण यांनाही देण्यात आले. त्यांनतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वर्षात सव्वाशे कोटींचे रस्ते

$
0
0

नाशिक : सत्तारुढ भाजपने तुकाराम मुंढेंच्या त्रिसूत्रीत अडकलेल्या रस्त्यांचा मार्ग मोकळा करून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या वर्षात तब्बल सव्वाशे कोटींचे नवे रस्ते नाशिककरांना मिळणार असून, त्या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने मार्गी लावले आहेत. नागरी भागातील कॉलनीअंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरणाबरोबरच अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्ते डांबरकरीणाच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना आता मुहूर्त लाभला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरीत पडून युवतीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडल्याने १४ वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

तामसवाडी शिवारात रामू बाजीराव धोत्रे हे कुटुंबासह ऊस तोडणीसाठी वास्तव्यास आले आहे. त्यांच्यासोबत त्यांची भाची वैशाली नवनाथ माने (रा. वाळूंज, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) राहत होती. पिण्याचे पाणी आणण्यासाठी प्रकाश देवकर यांच्या शेतातील विहिरीवर वैशाली मंगळवारी (दि. १) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गेली होती. पाणी भरत असतांना कठड्यावरून घसरून ती विहिरीत पडली. यात तिचा मृत्यू झाला. तामसवाडीचे पोलिस पाटील पांडुरंग शिंदे यांनी सायखेडा पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी त्रिभुवन यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. वैशालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड येथे पाठवण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातात तरुणाचा अंत

निफाड : निफाड-औरंगाबाद महामार्गावर मंगळवारी दुपारी तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. दिगंबर भानुदास जाधव (रा. गायत्रीनगर, निफाड) असे या तरुणाचे नाव आहे. कामानिमित्ताने निफाडहून नैताळे गावाच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरने दिगंबरला जोरात धडक दिली. उपजिल्हा रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत निफाड पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कृती समितीचा सात जानेवारीला संप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी सोमवारी, सात जानेवारी रोजी लाक्षणिक संप करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

चारही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि ऊर्जा-उद्योग धोरणाबाबत कृती समिती व्यवस्थापनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. वेळोवेळी बैठका झाल्या. मंत्री व व्यवस्थापन पातळीवर वाटाघाटीही झाल्या. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. कृती समितीची बैठक पुणे येथे डिसेंबरमध्ये झाली. त्यावेळी सरकारबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरण कंपनीतील प्रस्तावित पूनर्रचना ही संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावी, महापारेषणमधील स्टाफ सेटअप लागू करताना आधीची एकूण मंजूर पदे कमी करू नयेत, सरकार व व्यवस्थापनाने खासगीकरण धोरण थांबवावे, मालेगाव, मुंब्रा, शिळ, कळवाचे विभाग फ्रेन्चाईजवर खासगी भांडवलदार कंपनींना देऊ नये, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरावीत, बदली धोरणाच्या पुनर्विचार संघटनेबाबत चर्चा करून राबवावे, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना कायम करावे, समान काम समान हा सुप्रिम कोर्टाचा निकाल लागू करावा, २१० मेगावाटचे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या आहेत.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर, वीज कामगार महासंघाचे शंकर पहाडे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे आर. टी. देवकांत, सबोर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनचे सुनील जगताप, विज तांत्रिक कामगारचे सैय्यद जहिरोद्दिन, इंटकचे हिंदुराव पाटील आदींची नावे निवेदनावर आहेत. निवेदनेच्या प्रति मुख्यमंत्र्यांसह एमएसईबी होल्डिंग, महानिर्मिती, महावितरण, महापारेषण या चार कंपन्यांच्या मुख्यालयाला देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट कोलमडणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीच्या वादातून घरपट्टीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला लगाम लागला असतानाच, आता नगररचना विभागातून मिळणारे पालिकेचे विकासशुल्कही मोठ्या प्रमाणावर थकल्याचे समोर आले आहे. अपेक्षित २६३ कोटींपैकी अवघे ३४ कोटीच तिजोरीत जमा झाले आहेत. यामुळे पालिकेचे बजेट कोलमडणार आहे.

तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उत्पन्नवाढीसाठी नगररचना आणि घरपट्टी विभागावर लादलेल्या अवाजवी अपेक्षांचा फुगा फुटला आहे. नगररचना विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, त्यातच ऑटो डीसीआर प्रणालीने विकासकांच्या नाकी नऊ आणले आहेत. गेल्या वर्षी प्रशासनाने विकासशुल्क, कम्पाउंडिंग पॉलिसी तसेच कपाट नियमितीकरणातून मिळणाऱ्या उत्पन्नासह नगररचना विभागाला २६३ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. सन २०१८-१९ च्या बजेटमध्ये या संदर्भातील तरतूद करण्यात आली होती. परंतु, डिसेंबरअखेर पालिकेच्या झोळीत अवघे ३४ कोटी रुपयेच जमा झाले आहेत. कम्पाउंडिंग पॉलिसीला मुदतवाढ दिल्याने यातून मिळणारे उत्पन्न लांबणीवर पडले आहे. विकास शुल्कातून १६० कोटी उत्पन्न अपेक्षित असताना ११ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. हार्डशीप प्रीमियममध्ये ३५ कोटी अपेक्षित असताना २ कोटी ५७ लाख रुपयेच जमा झाले आहेत. टीडीआर हस्तांतर शुल्कातून ३५ कोटी मिळणे अपेक्षित असताना २ कोटी ५६ लाख रुपये मिळाले आहेत. अनधिकृत बांधकाम, अवैध भोगवट्यातून ९ कोटी उत्पन्न गृहीत धरले असतांना यातून केवळ एक कोटी रुपयेच मिळाले आहेत. जीना पॅसेज प्रीमियमपोटी ६ कोटी अपेक्षित असताना १ कोटी ७ लाख रुपये मिळाले आहेत. दोन वर्षांपूर्वी तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगररचना विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्याअंतर्गत टीडीआर वापरावर ५ टक्के सेवासुविधा शुल्क लागू केले होते, तर नऊ मीटर रस्त्यावर प्रीमियम एफएसआय लागू केल्याने सन २०१७-१८ मध्ये ७७ कोटींचे उत्पन्न पालिकेला नगररचना विभागाकडून मिळाले होते. परंतु, यंदा नऊ महिन्यांत अवघे ३४ कोटी रुपयेच मिळाले आहेत. याचा थेट परिणाम आता बजेटवर होणार आहे.

आयुक्तांची कसोटी

कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत दाखल केलेले प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी अजून सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यातच नगररचना विभागाकडून या तीन हजार प्रकरणांच्या छाननीसाठी सरकारकडे कर्मचारी मागितले आहेत. परंतु, अद्याप त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ऑटो डीसीआरला गती दिली असली तरी तीन महिन्यांत उत्पन्न २६३ कोटींपर्यंत जाईल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांची कसोटी लागणार आहे.

नगररचनात 'संगीत खुर्ची'

नगररचना विभागात सध्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांची वानवा आहे. या विभागात काम मिळ‌विण्यासाठी पूर्वी मोठी स्पर्धा होती. परंतु, मुंढे यांनी लावलेल्या शिस्तीमुळे या विभागात काम करायला कोणीच तयार होत नव्हते. त्यातच २१ कोटींच्या वादामुळे नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे दीड महिन्यापासून रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत तीन जणांकडे पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे पालिकेचे उत्पन्न घटत असताना नगरररचनात मात्र संगीत खुर्चीचा खेळ रंगला आहे.

वर्ष उद्दिष्ट मिळालेले उत्पन्न

२०१५-१६ - १०५ कोटी ४४ लाख ४६ कोटी १५ लाख

२०१६-१७ - ९० कोटी ६७ लाख ९९ कोटी ५८ लाख

२०१७-१८ - ९१ कोटी ७५ लाख १६८ कोटी

२०१८- १९ - २६३ कोटी ३४ कोटी (डिसेंबर १८)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅलरीतून पडल्याने बालकाचा मृत्यू

$
0
0

नाशिक : अंबड एमआयडीसी भागातील दत्तनगर येथील अंशुमन अजय शर्मा (रा. पाण्याची टाकी, अंबड) या साडेतीन वर्षाच्या बालकाचा गॅलरीतून तोल जाऊन मृत्यू झाला. अंशुमन मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गॅलरीत खेळत असताना ही घटना घडली. घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वडील अजय शर्मा यांनी सिव्हिलमध्ये दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी अंशुमनचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना सोसवेना गारठा, पारा ६ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी ६.२ अंश सेल्सियस ऐवढे किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

थंडीच्या कडाक्यामुळे जिल्ह्यातील निफाड तालुका देशभरात प्रसिद्ध झाला आहे. गत आठवड्यात निफाडमध्ये १.७ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी निफाडचे किमान तापमान ३.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले, तर जिल्ह्याचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे ६.२ आणि ३० अंश सेल्सियस ऐवढे नोंदविण्यात आले. थंडीचा कडाका कायम असून जिल्ह्यात आठवडाभर किमान तापमान ६ ते ७ अंश सेल्सियस दरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान-३साठी

$
0
0

सोमेश्वरही

गजबजले!

नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकमधील पर्यटन आणि धार्मिकस्थळे गर्दीने गजबजली आहेत. नाशिककरांचे फेवरीट असलेल्या सोमेश्वर येथे दर्शनाबरोबरच बोटिंगचाही आनंद भाविक घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहस्त्रदीप प्रज्ज्वलनाने नववर्षाचे स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना अभंग, भजन गात आणि प्रवचनांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. रामकुंड परिसरात सहस्त्रदीप प्रज्ज्वलीत करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. स्वामी सखा मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट व शिवनेरी मित्रमंडळ यांच्यातर्फे हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे घेण्यात आला.

नवीन वर्षाचे स्वागत करताना आयोजित स्वरधारा या कार्यक्रमात गणेशवंदना, सरस्वती वंदना, शिववंदना अशी विविध भक्तीमय गीत आणि भजनांच्या सूरांनी गोदाकाठाचे वातावरण भक्तीमय होऊ गेले. सारेगम लिटील चॅम्प विजेत्या अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि नाशिकच्या मीना परुळेकर-निकम यांनी भजन व अभंगाचे गायन केले. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याकडे वाढलेल्या युवापिढीला भारतीय संस्कृतीचे संस्कार देण्याचा प्रयत्न गेली. स्वामी सखा मित्रमेळातर्फे १७ वर्षांपासून करण्यात येत आहे. यंदाही पंचम पीठाधीश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या उपस्थितीत सहस्त्रदीप प्रज्ज्वलीत करण्यात आले. याप्रसंगी प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले. कडाक्याच्या थंडीतही या सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी आणि सोहळा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशोधन जागरुतेसाठी झोकून द्या!

$
0
0

जपानच्या विद्यापीठातील डॉ. पंकज कोईनकर यांचे मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जपानमध्ये प्राध्यापक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. दिवसातील तब्बल १२ ते १४ तासांपर्यंत ते अविरत परिश्रम घेतात. सामाजिक जाणिवेतून घेतलेल्या या जबाबदारीस न्यायसुद्धा देतात, असे प्रतिपादन जपानच्या तोकुशिमा विद्यापीठातील डॉ. पंकज कोईनकर यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या इन्स्ट्रुमेंटेशन अॅण्ड कंट्रोल या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील, प्राचार्य एन. बी. देसले, डॉ. एन. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. कोईनकर हे तोकुशिमा विद्यापीठाच्या ऑप्टिकल सायन्स विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जपानमधील विद्यार्थी हे अधिकाधिक वेळ प्रयोगशाळेत प्रकल्प किंवा प्रबंधांसाठी देतात. आपल्याला पडलेले प्रश्न, शिक्षकांना सतत विचारात रहा. एखादा विषय नवीन असला तरीही त्यावर स्वयं-अध्ययनाची सवय लावून घ्या. आव्हाने स्वीकारून स्वत:कडून नेहमी मोठ्या ध्येयाची अपेक्षा करा, असे ते यावेळी म्हणाले.

डॉ. कोईनकर म्हणाले, की जपानमधील शिक्षक हे उत्तम करिअरसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करतात. संशोधनासाठी जागरुकता वाढविण्याचे काम करतात. जपानी शिक्षक दिवसातून १२ ते १४ तास काम करतात. ते विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करतात आणि त्यांच्या संशोधनात सहभागी देखील होतात. समाजासाठी आपले योगदान संशोधनातून कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करतात. चांगल्या कामासाठी विद्यार्थ्याच्या पाठीशी सतत उभे राहतात. सर्वसाधारण व मेहनती विद्यार्थ्यांवरही विशेष लक्ष केंद्रीत करतात. नाविन्याची व संशोधनाची कास धरतात, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०१९ मेणबत्यांनी नववर्षाचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगापूररोड येथील नवश्या गणपती मंदिरात २०१९ मेणबत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील प्रांगणात मेणबत्त्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. त्यामुळे मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.

श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत दीपोत्सवाने करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सवास श्रींच्या आरतीने प्रारंभ झाला. यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक श्रींची आरती केली. मंदिर परिसरात काढण्यात आलेल्या सुबक रांगोळ्यांवर २०१९ मेणबत्या लावण्यात आल्या. दीपोत्सवाच्यानिमित्ताने मंदिरात करण्यात आलेली रोषणाई आणि हजारो मेणबत्यांच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला. यावेळी गणरायाच्या दर्शनासाठी आणि मेणबत्या प्रज्वलित करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. नववर्ष सुखा-समाधानाचे आणि समृद्धीचे जावो, सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशी प्रार्थना भक्तांनी केली. रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव पाहण्यासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ होता. दीपोत्सावाचे संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव, उपाध्यक्ष रामचंद्र जाधव आणि सचिव अरुण गलांडे यांसह पदाधिकाऱ्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पी.एचडी.धारकांचाउद्या सन्मान

$
0
0

\B

\Bनाशिक : ईश्वर नागरी सहकारी पतसंस्था आणि मिरद्या सोशल अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पी.एचडी.प्राप्त महिलांचा बुधवारी (ता. ३) सन्मान करण्यात येणार आहे. शरणपूर रोड येथील वैराज कलादालन येथे सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा गुणगौरव सोहळा होईल. सोहळ्यात प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्ष स्वागताला अपघातांचे गालबोट

$
0
0

सहा वर्षांच्या चिमुरडीसह तरुणाचा मृत्यू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका सहा वर्षांच्या बालिकेसह तरुण ठार झाला. या अपघातांमध्ये तीन जण जखमी झाले असून, रस्ते अपघातांना मद्यप्राशन कारणीभूत ठरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

अपघाताची घटना सोमवारी, ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता गंगापूररोडकडून सुला वाईनकडे जाणाऱ्या रस्त्यावर कानेटकर गार्डनजवळील विटभट्टीसमोर झाली. भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाचालकाचे (एमएच १५ एफक्यू १६०४) नियंत्रण सुटले. वेगात असलेली रिक्षाने दोन ते तीन पलट्या घेत समोरून येणाऱ्या कारला जाऊन धडक मारली. यामुळे रिक्षात बसलेल्या राशी राजेश चौधरी (६, सावता माळी बस स्टॉपसमोर, श्रमिकनगर) या चिमुरडीच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन तिचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात रिक्षातील राजेश चौधरी (४५), रिया राजेश चौधरी (४२) ऋतिक चौधरी (अडीच वर्ष) हे जखमी झाले. जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी कारचालक सारिका आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूररोड पोलिसांनी रिक्षाचालक विठ्ठल साहेबराव पाटील (रा. सद्गुरूनगर, दसकरोड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नववर्ष स्वागतास जाणाऱ्या चौधरी कुटुंबाने ही रिक्षा बुक केली होती.

अपघाताची दुसरी घटना विहितगाव येथील विटभट्टी रस्त्यावर झाली. भरधाव जाणारी दुचाकी चारीत जाऊन विक्की राजू राजपूत (३०, रा. मालवाडी लहवित) या तरुणाचा मृत्यू झाला. विक्की रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या दुचाकीवर घराबाहेर पडला. रोकडोबा वाडीलगतच्या वीटभट्टी परिसरात भरधाव जात असताना नियंत्रण सुटून त्याची दुचाकी चारीत गेली. सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. राजपूतचा मित्र संदीप घोष याने धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. भरधाव गाडी चालवून स्वत:च्या मरणास स्वत: कारणीभूत ठरल्या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

कारची दुचाकीस धडक

कॉलेज रोडवर भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने भूषण वैशंपायन (३६) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर कारचालकाने पळ काढला. अपघातात वैशंपायन यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनांमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचा प्रकार असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिरावणीकरांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी योजनांच्या माध्यमातून घरकुल मिळालेल्या लाभार्थींशी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस बुधवारी (दि. २) सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिल्यांदाच लोकसंवाद या उपक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत. नाशिकसह चार जिल्ह्यांत लाइव्ह टेलेकास्टद्वारे हा संवाद साधण्यात येणार असून, त्यासाठी नाशिकमधील महिरावणी गावाची निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, सर्वांसाठी घर यासारख्या योजनांच्या माध्यमातून सरकारने अनेक बेघरांना घरे दिली आहेत. राज्यभरातील अशा लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लोकसंवाद हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येत असून, लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येकी १५ लाभार्थींशी संवाद साधण्यात येणार आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे रमाई आवास योजनेच्या चार लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून टॅबद्वारे मुख्यमंत्री त्यांच्याशी लाइव्ह संवाद साधणार आहेत. लाइव्ह संवादासाठी नाशिक, नागपूर, ठाणे, सांगली आणि लातूर या पाच जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका गावाची निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी महिरावणी या गावाची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images