Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नववर्ष उत्साहाचा ‘बंदोबस्त’

$
0
0

मद्यपी, रॅश ड्रायव्हर्स पोलिसांचे लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्ष स्वागतास गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. जवळपास दोन हजार पोलिस शनिवारपासून (दि. २९) रस्त्यावर उतरणार आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, छेडछाड किंवा हाणामारीसारखे प्रकार रोखण्याकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, परिमंडळ एक आणि दोन यांच्या स्तरावर वेगळा बंदोबस्त असणार आहे.

पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक जवानांसह स्ट्रायकींग फोर्स आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. नववर्ष स्वागतासाठी तरुणाईची जोरदार तयारी असून, व्यावसायिकांनीही कंबर कसली आहे. शहर आणि शहराबाहेर पार्ट्यांचे आयोजन केले जातात. मात्र, उत्सहाच्या भरात अनेक वाहनचालक रॅश ड्रायव्हिंग अथवा ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह करतात. त्यामुळे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता वाढते. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की टवाळखोरी, रॅश ड्रायव्हिंग आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे खपवून घेतले जाणार नाही. घरातून बाहेर पडणाऱ्या युवा व तरुण मंडळींना याबाबत घरातून सुद्धा समजावून सांगणे आवश्यक आहे. शनिवार ते सोमवार या तीन दिवसात टप्प्याटप्प्याने बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, ठिकठिकाणी बॅरेकेडिंग लावण्यात येणार आहे. दरम्यान, यावर्षी प्रथमच कोटपातंर्गंत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या अथवा हुक्का ओढणाऱ्यांना सुद्धा रडारवर घेतले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे पार्ट्यांमध्ये ड्रग्जचे चलन नाही. मात्र, याबाबत देखील वेगवेगळ्या पातळ्यांवर माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

मद्यपींविरोधात विशेष मोहीम

गर्दीची ठिकाणे विशेषतः मार्केट, मॉल्स, हॉटेल्स अशा ठिकाणी लक्ष पुरवण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून मद्यपी वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहर वाहतूक शाखेकडे १५ ब्रेथ अॅनालायझर मशिन्स आहेत. या मशिन्स आधुनिक असून, त्याचा फायदा गत वर्षापासून होतो आहे. या वर्षी आतापर्यंत ४४१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली असून, मद्यपी चालकांकडून सात लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उत्साह हा समजून घेण्यासारखा असतो. मात्र, उत्साहाच्या भरात स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे, कायदा व सुव्यवस्थेला आवाहन देणे खपवून घेतले जाणार नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

वर्ष- मद्यपी चालकांवर कारवाई- दंड वसूल

२०१६-४६०-२,६७,०००

२०१७-६०५-७,८३,३१०

२०१८-४४१-७,७६,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकवीस कोटींवरून गदारोळ

$
0
0

राधाकृष्णन बी यांनी नियमाबाह्य पैसे अदा केल्याचे उघड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील सर्व्हे क्रमांक ७०५ मधील आरक्षित भूखंडाचा २१ कोटींचा मोबदला संशयास्पद पद्धतीने अदा केल्याप्रकरणी तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा विद्यमान जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या भूखंडाचा २१ कोटींचा विषय स्थायी समितीच्या सभापटलावर सादर करणे आवश्यक होते, अशी कबुली नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे.

सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी २१ कोटींच्या मोबदला प्रकरणाची चौकशीचे आदेश देत सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपसह सर्वपक्षीय १४ सदस्यांनी सभागृहात फलक झळकवत ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केल्याने सभा वादळी ठरली. विशेष म्हणजे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या सभापतींवर गंभीर आरोप केले.

स्थायी समितीची सभा सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पहिल्याच सभेत अपेक्षेप्रमाणे २१ कोटींच्या भूसंपादन प्रकरणावरून गदारोळ झाला. मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक ३२/१०/१ अ (पै) मधील प्राथमिक शाळा व १५ मीटर डी. पी. रोड तसेच मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे क्र. २५, २६/२/१, २६/१, १००२, २८ पै मधील डी. पी. रोड भूसंपादन प्रकरणातील शिल्लक १३ कोटींच्या मोबदला अदा करण्याचा प्रस्ताव ठेवला प्रशासनाने ठेवला होता. त्यावरून सदस्यांनी प्रशासनाची कोंडी केली. या दोन विषयांच्या पार्ट पेमेंटचे प्रस्ताव जसे आले, तसाच गंगापूररोडवरील सर्व्हे क्र. ७०५मधील आरक्षणाच्या भूसंपादन प्रकरणात प्रशासनाने स्थायी समितीवर प्रस्ताव सादर न करता उर्वरित २१ कोटींचा मोबदला परस्पर अदा कसा केला, असा जाब सभागृह नेते पाटील यांनी प्रशासनाला विचारला.

भूसंपादन मोबदल्यासाठी तत्कालीन प्रभारी आयुक्त व विद्यमान जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कशा संशयास्पदरित्या मोबदला अदा केला, याची कहाणीच पाटील यांनी मांडली. स्थायीचा विरोध असताना मोबदला कसा दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चौकशी होईपर्यंत मोबदला देऊ नये असे सांगत, चौकशी समिती गठीत केली नाही तर, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. गतसभेत सभापतींनी जाहीर केल्यानुसार टीडीआर आणि घंटागाडी प्रकरणाच्या चौकशीसाठीही तात्काळ समिती गठीत करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

उद्धव निमसे, मुशीर सय्यद, प्रवीण तिदमे यांनीही मोबदल्याप्रकरणी आक्रमक भूमिका मांडत चौकशी समिती तात्काळ गठीत करण्याची मागणी केली. दहा सदस्यांनी लेखी पत्र सादर करत मोबदला प्रकरण तसेच टीडीआर आणि घंटागाडी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचे तसेच तोपर्यंत सभेच्या पटलावरील विषय क्रमांक १७७ ते २०१ असे सर्व २५ प्रस्ताव तहकूब करण्याची सूचना मांडली. हे विषय मंजूर केल्यास सभापती जबाबदार असतील असा इशारा सदस्यांनी केला. सभापतींनी २१ कोटींच्या चौकशीचे आदेश अन्य विषय तहकूब करत सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत निषेधाचे फलक झळकवले.

विरोधकांना हर्षवायू

स्थायी समिती सभापतींविरोधातील आंदोलनात विरोधकांसह सत्तारूढ भाजपचेही आठ सदस्य सामील झाल्याने भाजपची शोभा चव्हाट्यावर आली. भाजपमधील या अंतर्गत वादाने विरोधी पक्षांना चांगलाच आनंद झाला. स्थायी समितीला डावलून नियमबाह्य पद्धतीने २१ कोटींचा मोबदला अदा करण्यात आल्याचा आरोप करत भाजपचा हाच का पारदर्शक कारभार, असा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. सभागृह नेते आणि स्थायी सभापती यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रर्त्यारोपाच्या फैरी पाहून विरोधकांनी दोघांवर टीका करणे अपेक्षित होते. परंतु, विरोधकही पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले. घंटागाडी आणि टीडीआर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत न झाल्यास पुढील सभेतही आंदोलन करण्याचा इशारा मुशीर सय्यद यांनी दिला.

स्थायी समितीला डावलून परस्पर अदा करण्यात आलेल्या २१ कोटींच्या मोबदलाप्रकरणात सभापतींचाच हात आहे. घंटागाडी आणि टीडीआरबाबतही चौकशीचे आदेश होऊनही कारवाई झालेली नाही. निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने नाशिककरांना पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली होती. सभापतींना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले.

- दिनकर पाटील, सभागृह नेता

सदस्यांच्या मागणीनुसार सभेत २१ कोटींच्या मोबदल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. या प्रकरणासह घंटागाडी आणि टीडीआर घोटाळ्याची तटस्थपणे चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे. नवीन आयुक्त आल्याने घाईत चौकशी समिती गठीत करणे आपल्याला योग्य वाटले नाही.

- हिमगौरी आहेर-आडके, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेले मुंढेंचे भेव, पालिकेत परतले देव!

$
0
0

लोगो- चर्चा तर होणारच!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांनी घेतलेले निर्णय एकापाठोपाठ एक फिरविण्याचा सपाटा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. अधिकारीही यासाठी सरसावले असून, पालिकेच्या कार्यालयातील देवदेवतांच्या तसबिरी पुन्हा पालिकेत परतू लागल्या आहेत. शहर अभियंता कार्यालयातील हटविण्यात आलेला देव्हारा पुन्हा नव्याने तयार केला जात असून, येथे पुन्हा श्रीगणेशाची पुनर्स्थापना करण्याची लगबग सध्या सुरू आहे.

तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अधिकारी, पदाधिकाऱ्यांपाठोपाठ देवदेवतांनाही झटका दिला होता. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मुंढे यांचा पहिला फटका महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील देव-देवतांच्या प्रतिमांना बसला होता. अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह विभागीय कार्यालयांतील देव-देवतांच्या प्रतिमा, मूर्ती आणि देव्हारे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. शासकीय आदेशाचा आधार घेत, कार्यालयाचे धार्मिकीकरण नको, अशी भूमिका यामागे होती. सर्वप्रथम आयुक्तांच्या दालनातील दत्ताची प्रतिमा आणि आयुक्तांच्या सचिवालयातील देवांच्या प्रतिमा त्यांनी हटविल्या होत्या. मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाशेजारीच असलेल्या शहर अभियंता कार्यालयात श्री गणेशाचा छोटेखानी देव्हारादेखील मुंढे यांनी हटविला होता. या निर्णयावरून मुंढेंवर टीकाही झाली होती. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकत मुंढे यांनी आपल्या शासकीय वाहनातील मूर्तीही हटवली होती. परंतु, मुंढे यांच्या बदलीनंतर आता या देवदेवतांची देव्हाऱ्यात वापसी होत आहे. अनेक कार्यालयांमध्ये पुन्हा देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यास सुरुवात झाली आहे. शहर अभियंता कार्यालयातील देव्हारा उभारण्याचे कामही सुरू झाले असून, या ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

विघ्नहर्ता धावेल काय

तुकाराम मुंढे यांच्या जवळकीमुळे शहर अभियंता संजय घुगे यांच्यावर सध्या अनेक संकटे घोंघावत आहेत. विशेष म्हणजे श्रीगणेशाचा देव्हारा काढल्यापासून शहर अभियंत्यांच्या खुर्चीमागे शुक्लकाष्ठ सुरू झाले आहे. यू. बी. पवार यांच्यापाठोपाठ घुगेंवरही आता चौकशीचे संकट ओढावले आहे. स्वागत हाइट्स प्रकरणातही त्यांची चौकशी सुरू असून, अनेक सदस्यांच्या ते रडारवर आहेत. त्यामुळेच त्यांनी हे संकट टळावे यासाठी पुन्हा श्री गणेशाला साकडे घातले असून, काढलेला देव्हारा पुन्हा बसविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विघ्नहर्ता त्यांच्यावरील विघ्न टाळेल का, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल बंदबाबत आज होणार निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य दिल्याने गुरुवारी (दि.२७) सायंकाळी देशभर केबलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, बुधवारी सायंकाळपर्यंत याबाबतची सूचना प्राप्त न झाल्याने नाशिकमधील केबल सेवा पुरविणाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सेवा बंद ठेवावी की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारी (दि. २७) दुपारपर्यंत घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने केबल व्यावसायिकांसाठी नवी नियमावली लागू केली असून त्यामुळे केबल सेवा आता पॅकेज स्वरूपात उपलब्ध होणार आहे. 'ट्राय'च्या नियमानुसार १३० रुपये एवढ्या किमान मासिक खर्चामध्ये ग्राहकांना बेसिक फ्री चॅनल्सचे पॅकेज उपलब्ध होणार असले तरी अन्य चॅनल्सच्या सेवा घेण्यासाठी त्यांना दरमहा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी 'ट्राय'ने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रत्येक चॅनलची एमआरपी निश्चित करण्यात आली आहे.

नव्या वर्षात केबल, डिश, आयपी टीव्ही आणि हिट्स या सेवा क्षेत्रात केंद्र सरकारने मोठा बदल केला असून सध्याचे पॅकेज २९ डिसेंबरला बंद होणार आहे. निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास केबल सेवा पुरविणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूदही 'ट्राय'ने केली आहे. 'ट्राय'च्या या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी केबल व्यावसायिकांनी गुरुवारी (दि.२७) सायंकाळी सात ते दहा यावेळेत केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ८०० हून अधिक केबल व्यावसायिक असून सुमारे पाच लाख ग्राहक आहेत. केबल सेवा बंद ठेवण्याबाबतच्या सूचना अद्याप प्राप्त झाल्या नसल्याची माहिती शहरातील काही केबल व्यावसायिकांनी दिली आहे. याबाबत संघटनेची बैठक गुरुवारी दुपारी होणार असून त्यात निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीप्रकरणी दहा जणांची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक महापालिकेत नोकर भरती सुरू असल्याचे सांगून, निलंबित महापालिका कर्मचाऱ्याने तब्बल ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सचिन जीभाऊ सूर्यवंशी (रा. अमोल भवन, दत्तनगर, पेठरोड) याने नाशिक महापालिकेत नोकर भरती सुरू असल्याचे सांगून, तिघा भावडांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली होती. निलंबित असलेल्या सूर्यवंशी याने पेठरोडवरील भक्तीधाम समोर राहणाऱ्या प्रमिला नामदेव बागूल यांच्यासह बहीण सारिका व चुलतभाऊ अमित यांनी वेळोवेळी संशयित सूर्यवंशी यास नोकरीच्या आशेने ८ लाख रुपये दिले. बागूल यांना शंका आल्याने त्यांनी महापालिकेत शहानिशा केली असता, सूर्यवंशी याने दिलेले नियुक्ती पत्र बनावट असल्याचे समजले. पैसे परत मिळत नसल्याचे पाहून त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून सोमवारी (दि. २४) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार मार्तंडराव शेषराव म्हस्के (रा. डोंबिवली पूर्व, मुंबई), सोपान संजय वाणी (रा. मखमलाबाद रोड, नाशिक), दीपक मुरलीधर सूर्यवंशी (रा. मालेगाव, जि. नाशिक), गोरख बापू शिंदे (रा. मालेगाव, जि. नाशिक), विजय यशवंत कदम (रा. मालेगाव, जि. नाशिक), आदित्य भीकन चौधरी (रा. मालेगाव कॅम्प, जि.नाशिक), संतोष नाजू आहेर (रा. गोविंद नगर, मुंबई नाका, नाशिक), रवींद्र अशोक ठाकरे (रा. बेलापूर, मुंबई) आणि अन्य एकजण यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, याप्रकरणी फसवणूक झाल्याचा आकडा तब्बल ४२ लाखांवर गेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा लागवड सोमवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील पशुधनाला दुष्काळी परिस्थितीमध्ये चाराटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी जलाशयांमधील जलविरहीत गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवडीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. यासाठी जिल्ह्यात १२७८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध झाले असून त्यावर १७६६ शेतकऱ्यांची चारा लागवडीची तयारी दर्शविली आहे. चारा लागवडीला सोमवारपासून (दि. ३१) सुरुवात होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी बुधवारी दिली.

धरणांमधील पाणी पातळी खालावल्याने उपलब्ध गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १५०० हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. चारा लागवडीसाठी व्यक्ती आणि संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. चारा लागवडीची तयारी दर्शविणाऱ्या १७६६ जणांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. चारा लागवडीसाठी आजमितीस १२७८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध झाले असून दोन दिवसांत ३७१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये मका १७५ क्विंटल, ज्वारी १४० क्विंटल, बाजरी ४२ तर अन्य चाऱ्यासाठी १४ क्विंटल बियाण्यांचा समावेश असणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून सोमवारपासून चारा लागवडीला सुरुवात होईल, अशी माहिती खेडकर यांनी दिली. संबंधितांना चारा आणि पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चाऱ्याचे दर जिल्हाधिकारी ठरविणार असून चारा विक्रीतून उपलब्ध होणारे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

इगतपुरीत सर्वाधिक क्षेत्र

इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ३४९.२४ हेक्टर क्षेत्र चारा लागवडीसाठी उपलब्ध झाले आहे. तेथे ४२५ शेतकरी तसेच संस्थांनी चारा लागवडीची तयारी दर्शविली आहे. त्या खालोखाल दिंडोरीत २६२.६३ हेक्टर क्षेत्रचारा लागवडीसाठी उपलब्ध झाले असून ३७३ शेतकऱ्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मालेगावात २१६.७७ हेक्टरवर १७१ शेतकऱ्यांनी चारा लागवडीची तयारी दाखविली असून नाशिक तालुक्यात १२१.३० हेक्टरवर १६१ शेतकरी चारा लागवड करणार आहेत. मृद व जलसंधारण विभागाकडील २१३.५९ हेक्टर क्षेत्रासाठी ३६४, जिल्हा परिषदेअंतर्गत २०३.९५ हेक्टरसाठी ४१८ तर जलसंपदा विभागाकडील ८६१.२२ हेक्टर क्षेत्रासाठी ९८४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देशव्यापी संपात सहभागी व्हावे!’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून खाली खेचण्यासाठी तसेच कामगार भरती करताना वापरण्यात येत असलेली कंत्राटीकरण तसेच खासगीकरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील कोट्यवधी कामगारांनी ८ व ९ जानेवारी रोजी अखिल भारतीय संप पुकारला आहे. या संपात राज्यातील सर्व संघटित, असंघटित कामगार संघटनांनी सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे.

'इंटक'चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कर्मचारी कृती समितीच्या वतीने या संपात आम्ही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे छाजेड यांनी सांगितले.

केंद्र सरकार सार्वजनिक बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे यासह संरक्षण क्षेत्रात देखील खासगीकरण व कंत्राटीकरण करीत आहे.

संपामध्ये इंटक, आयटक, सीटू, एचएमएस, टीयूसीसी, एआययूटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, यूटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राय सर्व श्रमिक संघ, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, बँक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राय सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी (नर्सेस व इतर), अंगणवाडी, आशा, अंगमेहनती कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षा, पारी, फेरीवाले, बांधकाम, घर कामगार क्षेत्रातील संघटित, असंघटित सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीबाबत ‘आयमा’त उद्या बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीज दरवाढ, पेनल्टीसह संपूर्णपणे रद्द व्हावी व ऑगस्ट २०१८ पर्यंतचे दर पुढेही नोव्हेंबर २०१६ च्या आयोगाच्या आदेशानुसार लागू व्हावेत व स्थिर रहावेत या मागण्या व कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना व वीज ग्राहक संघटनांची बैठक शुक्रवारी (दि. २८) अंबड येथील आयमा हॉल येथे दुपारी २ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज ग्राहकांवरील जाहीर केलेली दरवाढ ३ टक्के ते ६ टक्के आहे. प्रत्यक्षात मात्र पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्ह नाही व पेनल्टी लागू झाल्याने ८० टक्के औद्योगिक ग्राहकांच्या वीजबिलात २० टक्के ते २५ टक्के वाढ झालेली आहे. यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बैठकीत निमा, आयमा, लघु उद्योगभारती, वीज ग्राहक समिती, नाशिक जिल्हा वीज ग्राहक संघटनाचे पदाधिकारी व नाशिकमधील सर्व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्योजकांनी व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने बैठकीत उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरीय समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोठले

$
0
0

काश्मीर गोठलेलेच

काश्मीरमधील शीतलहर अधिक तीव्र झाली असून, राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान उणे अंश सेल्सिअस होते. पाण्याचे साठे गोठण्याबरोबरच निवासी भागांत पाणीपुरवठ्यावरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. लेह शहरात उणे १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडवर अतिक्रमण हटाव

$
0
0

गंगापूररोडवर अतिक्रमण हटाव

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

'ना फेरीवाला क्षेत्र' असताना त्याठिकाणी टपरीधारक व फळे विक्रेत्यांनी दुकाने थाटलेल्या हॉकर्सविरोधात महापालिकेच्या सातपूर विभागाच्या वतीने गंगापूर रोडवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

आनंदवली गावापासून ते जेहान सर्कलपर्यंत 'ना फेरीवाला झोन' जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच फळ विक्रेत्यांचे वजनकाटे जप्त करण्यात आले. यावेळी रस्त्यालगत असलेल्या मटण, चिकन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या फेरीवाला क्षेत्रातच आपला व्यवसाय करावा, अशा सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्या. विक्रेत्यांचे जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले. मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्तही होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा २० पैसे किलो; बळीराजाची थट्टा!

$
0
0

वैजापूर : एकीकडे अस्मानी संकटाने शेतकरी देशोधडीस लागला असताना बाजार समितीतल्या सुल्तानी संकटाने त्याच्या गळ्याचा फास पुन्हा करकचून आवळा आहे. त्याचा प्रत्यय बुधवारी बाजार समितीत आला. येथे चक्क २० पैसे किलोने कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी लिलाव बंद पाडले. सध्या बाजार समितीच्या नागपूर - मुंबई महामार्गावरील कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक होत आहे. लाल कांद्याला उन्हाळी कांद्याच्या तुलनेत चांगले म्हणजे क्विंटलमागे साधारणत: ५०० रुपये ते १००० रुपये भाव मिळत आहे. उन्हाळी कांद्याला हाच दर क्विंटलमागे २०० रुपये ते ५०० रुपये आहे. साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने सध्या बाजारात उन्हाळ या कांद्याची मोठी आवक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईला मारणाऱ्या मुलास जन्मठेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचा हत्या करणाऱ्या नराधमास जिल्हा कोर्टाने बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या कोर्टात सुरू होता.

अशोक लक्ष्मण वटाणे (२७, रा. टिटवे, ता. दिंडोरी) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील बेघर वस्तीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. या ठिकाणी शांताबाई लक्ष्मण वाटाणे या आरोपी मुलगा अशोक आणि सुनासह राहत होत्या. अशोकला दारू पिण्याचे व्यसन होते. कामधंदा न करता सतत आईकडून पैसे मागणाऱ्या अशोकला याचमुळे पत्नीही सोडून गेली होती. अशोकने १५ एप्रिल २०१५ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आईकडे दारुसाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या अशोकने घरातील चूल फुंकण्यासाठी वापरली जाणारी फुंकणी व लाकडी ठोकळ्याने शांताबाईच्या डोक्यावर प्रहार करून केला. यात वर्मी घाव बसलेल्या शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या प्रकरणी काशिनाथ नथू पवार (रा. टिटवे, ता. दिंडोरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली. या खुनाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक एम़. डी. खोडवे यांनी केला. सरकारपक्षातर्फे अॅड. विद्या जाधव यांनी सात साक्षीदार तपासून पोलिसांनी जमा केलेले परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. या आधारे कोर्टाने अशोकला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुलवाडे-जामफळ’साठी ४४ कोटी निधी

$
0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना ही शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि. २६) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यावेळी बोलत होते. दुष्काळाचे मोठे संकटदेखील जिल्ह्यावर असून, प्रशासकीय स्तरावर पाण्याच्या उपाययोजनांसाठी निरनिराळे उपक्रम राबविण्यासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धुळे जिल्ह्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती असल्याने शासनाने गंभीर दुष्काळग्रस्त भागात विविध सवलती लागू केल्या आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये ४४ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर सर्व नागरिकांनी जपून करावा. जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी ४.२९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, यामध्ये दहा गावांसाठी टँकरने पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच ५२ गावांसाठी ६० विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शहाराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी अक्कलपाडा धरणातून नवीन १४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेला लवकरच मान्यता देवून ते काम लवकरच पूर्ण करण्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दोंडाईचात नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा शुभारंभदेखील बुधवारी (दि. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोंडाईचा नगरपरिषदची सुसज्ज नवीन इमारतमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यासाठी नागरिकांचे कोणतेही काम अपूर्ण राहणार याची काळजी घेवून चांगली सेवा कशी देता येईल हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाने निधी उपलब्ध करुण दिला आहे. मात्र नागरिकांनी स्वच्छ शहर सुंदर शहरासाठी प्रयत्न करावेत. तसेच दुष्काळ भागातील सर्व नागरिकांसाठी गहू आणि तांदूळ देण्यात येणार आहेत. शासनाने ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील गंभीर दुष्काळी तालुके घोषित केले आहेत. दुष्काळावर मात करून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी नगराध्यक्षा लोकनियुक्त नयनकुंवर रावल, उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबन चौधरी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि दोंडाईचा शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

अशी आहे इमारत!
या नवीन इमारतीचे एकूण चार प्रशस्त मजले असून, ३१ हजार ६३२ चौरस फूट बांधकाम झाले आहे. या नूतन प्रशासकीय इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्ष दालन, उपाध्यक्ष दालन, भव्य सभागृह, समिती सभागृह, सभापती दालन वातानुकूलित व प्रशस्त स्वरूपाची आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व प्रशस्त दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीत नागरी सुविधा केंद्र असून जन्म नोंद, विवाह नोंद, ना-हरकत तसेच इतर दाखले याठिकाणी मिळणार आहेत. सभागृहामध्ये सभेच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र व आधुनिक साऊंड सिस्टिमची व्यवस्था असून, संपूर्ण इमारतीत आधुनिक फर्निचर करण्यात आले आहे. स्वच्छता गृह, स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा व सुरक्षेसाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरा व सभागृहमध्ये प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चेतक’चे उत्तम ब्रॅडिंग

$
0
0

सारंगखेडा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि सर्वात मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत बुधवारी (दि. २६) आयोजित अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चेतक महोत्सव घोड्यांचा ऐतिहासिक सोहळा आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. चांगल्या प्रसिद्धीमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. एक कोटी किंमतीपेक्षा अधिक किंमतीचे घोडे महोत्सवात येत आहेत. येथील एकमुखी दत्ताच्या आशीर्वादाने महोत्सवाचा अधिक विस्तार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य असून, शुभेच्छा देण्यासाठी ते सारंगखेडा येथे आले असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अकोला येथून महोत्सवासाठी घोडेस्वारी करीत आलेल्या अकरावर्षीय राजवीरसिंह नागरा या बालकाचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अश्वस्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी अश्व खेळ आणि अश्वनृत्याची पाहणी केली. यातील साहसी खेळ प्रकाराबाबत कौतुकोद्गार काढले. तसेच बचतगट प्रदर्शनाची पाहणी देखील केली.

टेन्ट सिटीची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तापी नदीच्या तिरावर पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या टेन्ट सिटीची पाहणी केली. या राहुट्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेले रेस्टॉरंट, स्पा, एसी आणि नॉन एसी टेंट, दोन दरबारी टेंट, कॅरम, चेस आणि बिलीअर्डस यांसारख्या खेळांचीदेखील सुविधा करण्यात आली आहे. दरबारी टेन्टमधील सुविधा लक्षात घेता यामुळे याठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटक चेतक महोत्सवाकडे आकर्षित होतील, असेही मुख्यंमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून धर्मा पाटलांची पत्नी, मुलगा ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा । धुळे

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राषण करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचे हाल अजूनही सुरूच आहेत. धर्मा पाटील यांची पत्नी सखुबाई व मुलगा नरेंद्र पाटील यांना दोंडाईचा पोलिसांनी बुधवारी कोणत्याही कारणाशिवाय ताब्यात घेऊन डांबून अर्धा दिवस डांबून ठेवलं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करू नये म्हणून या मायलेकांना ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आल्यानं संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी व सरकारनं याचा खुलासा करावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

'चेतक फेस्टिव्हल'च्या निमित्तानं मुख्यमंत्री बुधवारी धुळे-नंदुरबारच्या दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बुधवारी सखुबाई व नरेंद्र पाटील यांना सकाळी सात वाजता विखरण येथून पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोरे आणि त्याचे सहकारी यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले. त्यामुळं या दोघांनाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहावे लागले.

खरंतर आपण कुठल्याही प्रकारचं अनुचित कृत्य करणार नाही, अशी लेखी हमी नरेंद्र पाटील यांनी पोलिसांना दिली होती. तरीदेखील त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळं त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याला कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतले याचा खुलासा पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला आहे. सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती यातून दिसून येते, अशी टीका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मंत्रालयात आत्महत्या केलेला शेतकरी धर्मा पाटील याची पत्नी आणि मुलाला डांबून ठेवण्याचा प्रकार संतापजनक आहे. धर्मा पाटीलला हे सरकार न्याय देऊ शकले नाही. तो शेतकरी होता म्हणून त्याच्या कुटुंबीयांनाच गुन्हेगार ठरवून धोकादायक गृहीत धरणे घातक आहे. करून करून काय केलं असतं त्यांनी? सत्तेत बसलेली माणसे भयभीत आहेत. ते स्वत:च्या सावल्यांनाही घाबरत असल्याचं दिसतं,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाड तालुका गारठला;१.८ अंश तापमानाची नोंद

$
0
0

नाशिकः

बुधवारी ११ अंश सेल्सिअस इतकी तापमान नोंद झालेल्या निफाड येथील गहू संशोधन केंद्रात तापमानाचा पारा अवघ्या १२ तासात १० अंशांनी उतरल्याने निफाड तालुक्यात हुडहुडी भरली आहे. या हंगामात ६ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली आले होते. त्यानंतर ८,९, १०,११ अंशापर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले थंडी स्थिर झाली. असे वाटत असतानाच गुरुवारी सकाळी ७ वा राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली. थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.

पाणी उतरलेले द्राक्षमणी तडकण्याची भीती आहे. तर ज्या द्राक्षमण्यात पाणी उतरले नाही त्याची फुगवन क्षमता थांबेल असे सोनेवाडी येथील द्राक्ष निर्यातदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले. थंडीपासून द्राक्षबागाना ऊब मिळावी यासाठी द्राक्षबागांमध्ये शेकोटी केल्याचे चित्र काही भागात होते तर काही ठिकाणी जुन्या साड्या आणि शेडनेट लावून थंडीपासून बचावाचा प्रयत्न करताना द्राक्ष उत्पादक दिसत होते . विशेष म्हणजे म्हणजे गोदाकाठ भागातील उसाच्या शेतात उसाच्या पाचाटावर थंडीमुळे दवबिंदू गोठून बर्फ तयार झालेलही पाहायला मिळालं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकः रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

$
0
0

मनमाड

धावत्या 'पवन एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना मनमाड रेल्वे व सुरक्षा बलाच्या पोलिसांनी बुधवारी रात्री मनमाड स्थानकात शिताफीने अटक करून चाकू व मुद्देमाल जप्त केला आहे. प्रवाशांच्या प्रसंगावधानतेमुळे चोरांना गजाआड करणे पोलिसांना शक्य झाले. बुधवारी रात्री दरभंगा कुर्ला पवन एक्सप्रेस जळगाव स्थानकातून सुटल्यानंतर रेल्वेच्या जनरल डब्यात चार चोरट्यानी प्रवाशांना मारहाण करत, चाकूचा धाक दाखवत लुटण्यास सुरुवात केली, या मुळे प्रवासी वर्गात घबराट पसरली, प्रवाशांनी रेल्वे मनमाड नजीक पानेवाडी येथे आल्यावर साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि चाकूचा धाक दाखविणाऱ्या चोराला प्रवाशांनी धाडसाने पकडले, व मनमाड रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली.

'पवन एक्सप्रेस' मनमाड स्थानकात येताच मनमाड रेल्वे पोलिसांनी संपूर्ण रेल्वेत कसून तपासणी करून वेगवेगळ्या डब्यात लपलेल्या तिघांना शिताफीने अटक केली. तसेच प्रवाशांनी पकडलेल्या म्होरक्याला ताब्यात घेऊन चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. नाला सोपारा व मुंबई येथील तिघांच्या फिर्यादी वरून जळगाव जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर कुटुंबिय रंगले काव्यात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'अडगुळं मडगुळं'पासून गीत रामायणापर्यंतच्या विविध काव्यप्रकाराच्या वर्षावात नाशिककर रसिक रंगले आणि चिंब झाले. विसूभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगलंय काव्यात' या एकपात्री नाट्यानुभाद्वारे श्रोत्यांनी काव्यानंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण अविष्कार अशी काव्याची सुंदर व्याख्या मांडत विसूभाऊंनी मराठी कवितेतील भावना, उत्कटता आणि सौंदर्य विविध कवितांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवले. प्रा. मो. द. देशमुख यांच्या 'उन उन खिचडी' सारख्या कवितेद्वारे कवितेचे नाजूक पैलू मांडले.

बाबा आमटे, ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी, यशवंत देव, गोविंदस्वामी आफळे, प्र. के. अत्रे, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर यांच्यासारख्या कवी-गीतकारांपासून अलीकडच्या काळातील नवकवींच्या कविता त्यांनी सादर केल्या.

'आज मरूनिया जीव झाला मोकळा' अशा कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना प्रकट झाल्या, तर 'जा बाई आई सांगू नको बाई, मला पावसाच्या धारांशी खेळायची घाई' या गीतातून बालसुलभ भावना अलगतपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या. 'सखी स्वस्त झाल्या खारका'सारख्या विडंबन गितांनी श्रोत्यांना खळखळून हसविले, तर 'विसरून गेला का सत्तावन' अशा ओळींनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले.

मराठी श्रेष्ठतम भाषा असून, हे वैभव टिकविण्याचे आणि आपली संस्कृती जपण्याचे आवाहन विसूभाऊंनी कार्यक्रमातून केले. मातृभाषा समृद्ध असून, या भाषेत बोलण्याचा अभिमान बाळगा, असे आवाहन त्यांनी केले.

विसूभाऊंनी वात्रटीका, लोचटीका, मुक्तछंद, बालगीते, विडंबन, लावणी, देशभक्तीपर गीते, अभंग, भक्तीगीते, भावगीते असे विविध प्रकार सादर केले. बालगीतांचे बारा प्रकार आणि लावणीच्या विविध प्रकारांची माहिती त्यांनी दिली. त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ओंकार वैरागकर यांनी त्यांना तबल्याची साथ केली. कार्यक्रमाची सांगता साने गुरुजींच्या 'बल सागर भारत होवो' या गीताने झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पवन’मध्ये प्रवाशांना मारहाण; चौघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दरभंगा येथून कुर्ला येथे जाणाऱ्या धावत्या पवन एक्स्प्रेसमध्ये बुधवारी रात्री जळगाव स्थानकानजीक चोरट्यानी प्रवाशांना मारहाण करून लुटमार केली. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे चौघांना मनमाड रेल्वे स्थानकात मुद्देमालासह अटक करण्यात आली. मनमाड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेतील नालासोपारा येथील प्रवाशांनी फिर्याद दिली.

बुधवारी रात्री पावणे दहा वाजता एक्स्प्रेस जळगाव स्थानकातून सुटल्यानंतर जनरल डब्यातील सहा चोरट्यांनी प्रवाशांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत, तसेच चाकूचा धाक दाखवत लुटण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी धाडस दाखवून चोरट्यांना प्रतिकार करीत चौघांना पकडून ठेवले. त्यातील दोघे इतरत्र पळून गेले. मनमाड नजीक पानेवाडी येथे साखळी ओढून रेल्वे थांबविली. त्यानंतर मनमाड रेल्वे पोलिसांनी पवन एक्स्प्रेस रात्री १२च्या सुमारास मनमाड स्थानकात येताच पोलिस निरीक्षक के. डी. मोरे आणि त्यांच्या पथकाने चौघांना अटक केली. गोपाळ शेवडे (वडाळी), अंकुश पवार (वरणगाव), संजय बोरसे (कजगाव), आकाश शेवरे (वडाळी) यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामकोत ‘प्रगती’च

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोहनलाल भंडारी व वसंत गिते यांच्या नेतृत्वाखालील बागमार समर्थकांच्या प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. सहकार आणि नम्रता पॅनलचा धुव्वा उडाला. साडेचार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात प्रगती पॅनलने एकहाती यश मिळवत सत्ता हस्तगत केली आहे.

शेड्युल बँकेचा दर्जा असलेल्या या बँकेत १ लाख ७६ हजार २६२ मतदार आहेत. त्यापैकी ६३ हजार ८३९ सभासदांनीच मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी अवघी ३६.२१ झाली. त्यामुळे या निवडणुकीचे अंदाज बांधणे सर्वांसाठी अवघड होते. पण, दोन दिवसांच्या मतमोजणीत मतदारांनी प्रगती पॅनलला पसंती देत त्यांच्या पारड्यात मते टाकली. या निवडणुकीत प्रगती पॅनलविरोधात गजानन शेलार, भास्करराव कोठावदे, ललित मोदी व अजय ब्रह्मेचा यांनी सहकार पॅनल रिंगणात उतरवले होते. तर अजित बागमार यांनी नम्रता पॅनल उभे केले होते. पण, या निवडणुकीत मतदारांनी दोन्ही पॅनलला नाकारत प्रगतीच्या एकहाती सत्ता दिली.

२३ डिसेंबर रोजी या बँकेसाठी ३०१ मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यानंतर बुधवारी दोन फेऱ्यांची मतमोजणी करण्यात आली. त्यासाठी १०४ टेबल ५०० कर्मचारी मतमोजणीसाठी ठेवण्यात आले होते. पहिल्या फेरीत १६ हजार ५०० मतांची मोजणी करण्यात आली. त्यात प्रगती पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार आघाडीवर होते. सहकार पॅनलचे एकमेव गजानन शेलार आघाडीवर होते. दुपारी दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाली. त्यात प्रगतीचे १९, तर सहकारचे २ उमेदवार आघाडीवर होते. त्यात शेलार यांच्यासह भास्करराव कोठावदे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर गुरुवारी तिसऱ्या व अखेरच्या फेरीची मोजणी करण्यात आली. त्यात २६ हजार ५०० मतदान होते. या मतमोजणीत प्रगतीने सर्वच जागांवर आघाडी घेऊन विजय निश्चित केला.

छाजेड, गीतेंना सर्वाधिक मते

प्रगतीचे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी या निवडणुकीत सर्वाधिक ३४ हजार १०८ मते ही महिला गटातील शोभा जयप्रकाश छाजेड यांना मिळाली, तर सर्वसाधारण गटात सर्वाधिक ३२ हजार ४६८ मते वसंत गिते यांना मिळाली. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती गटात प्रशांत अशोक दिवे यांनी ३१ हजार १७२ मते घेतली. सहकारचे गजानन शेलार यांनी या निवडणुकीत एकतर्फी लढत देत २३ हजार ५५ मते मिळवली. त्यांना विजयासाठी १३९७ मते आवश्यक होती. त्यांच्या खालोखाल भास्करराव कोठावदे यांनी २१ हजार ८२६ मते, ललित मोदी यांना २० हजार ५७८ तर अजय ब्रह्मेचा यांना २०३९८ मते मिळाली. या निवडणुकीत नम्रताच्या अजित बागमार यांना अवघी ९ हजार मते मिळाली.

'सहकार'ने केला विजयी सत्कार

निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजयी प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा हार घालून सत्कार करीत सहकाराचे दर्शन घडवले. यावेळी गजानन शेलार यांनी बँकेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन महिनाभरापासून निवडणुकीत आलेली कटूताही कमी केली. प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी संभाजी स्टेडियमच्या मतमोजणी केंद्रासमोर फटाके फोडत जल्लोष केला. त्यानंतर चांदीच्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रचार कार्यालयात सर्व उमेदवार व कार्यकर्ते गोळा झाले. त्यानंतर येथे सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.

बँकेत सात नवे चेहरे

बँकेत २१ पैकी १४ संचालक हे पुन्हा निवडून आले आहेत, तर ७ संचालक नवीन आहेत. त्यात रंजन ठाकरे, प्रशांत दिवे, सुनील धाडीवाल, महेंद्र बुरड, गणेश गिते, अशोक सोनजे, हरीश लोढा यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images