Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉ. महाजनांच्या केटूके मोहिमेची अमेरिकेत नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी दहा दिवस, दहा तास आणि एक मिनिटात पूर्ण केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी (केटूके) या ३ हजार ८५० किलोमीटरच्या मोहिमेची अमरिकेतील वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनच्या (डब्ल्यूयूसीए) विक्रमांच्या वहीत नोंद झाली आहे. याबाबतचा ईमेल डॉ. महाजन यांना प्राप्त झाला असून, डब्ल्यूयूसीएच्या संकेतस्थळावरही याबाबत नोंद झाली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ८५० किमीचे अंतर ५ डिसेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान अवघे १० दिवस १० तास आणि १ मिनिटात एकट्याने पूर्ण करण्याचा विक्रम डॉ. महेंद्र महाजन यांनी केला होता. या विक्रमाची नोंद घेण्यासाठी डब्ल्यूयूसीए तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांना कळविण्यात आले होते. विशेष म्हणजे ही मोहीम विक्रमी काळात पूर्ण करण्यासाठी डब्ल्यूयूसीए आणि गिनिजकडून जास्तीतजास्त १२ दिवसांचा कालावधी मिळाला होता.

मोहीम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण माहिती डब्ल्यूयूसीएला पाठविण्यात आली. त्याची दखल घेत माहितीची सत्यता पडताळून डब्ल्यूयूसीएने विक्रमाची खातरजमा करून अखेर क्रॉस कंट्री प्रकारात 'इंडिया नॉर्थ टू साऊथ' या नावाने विक्रमाची नोंद घेतली आहे.

नाशिकचा अभिमान

या विक्रमाची नोंद करताना विक्रम पूर्ण करणाऱ्याचे मूळ गाव नाशिक, महाराष्ट्र अशी केली गेल्याचा खूप अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया डॉ. महाजन यांनी दिली. डब्ल्यूयूसीएने मोहिमेबाबतचा संपूर्ण अनुभव नोंदपत्रिकेवर नोंदवून घेतला आहे. त्यांच्या संकेतस्थळावर हा अनुभव वाचण्यास उपलब्ध असल्याचे महाजन यांनी सांगितले.

या मोहिमेत 'खेलो इंडिया' आणि 'तंबाखू बंद' अभियानाला समर्थन करण्यात आले. या विक्रमाच्या नोंदीचे संपूर्ण श्रेय डॉ. महाजन यांनी त्यांच्या या मोहिमेतील क्रू मेंबर्स किशोर काळे, अॅड. कबीर राचुरे, अॅड. दत्ता चकोर, विजय काळे, सागर बोंदार्डे आणि संदीप परब तसेच भाऊ सायकलिस्ट हितेंद्र महाजन, प्रवीण पाटील, प्रशिक्षक मितेन ठक्कर, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खबिया आणि सायकलिस्ट परिवाराला दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आहार फेरफारप्रकरणी कारवाईचे आदेश

$
0
0

मंत्री जयुकुमार रावल यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत प्रशासनाकडेदेखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्षात ही बाब तपासण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांनी अचानक धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील छात्रालयाला भेट दिली. या भेटीत मंत्री जयकुमार रावल यांनी शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थांचा फेरफार करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कडक कारवाई करण्याची आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालकमंत्री जयकुमार रावल हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक धडगाव तालुक्यातील वडफळ्या गावातील नरेंद्र नवोदय छात्रालयाला भेट दिली. या वेळी शालेय पोषण आहारातील वेळापत्रकानुसार मुलांना जेवण मिळत आहे की नाही याची पाहणी मंत्री रावल यांनी केली. तसेच पोषण आहारातील खिचडी स्वतः खाऊन खाद्य पदार्थांचा दर्जाही तपासला. यामध्ये छात्रालयात खिचडी तर दिली जात होती. पण वेळापत्रकानुसार मटकी ऊसळ मात्र दिली गेली नव्हती. याबद्दल रावल यांनी नाराजी व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांना पोषण आहार न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

शालेय पोषण आहाराची आदिवासी पाड्यांवरील शाळांमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी अचानक वडफळ्या गावातील नरेंद्र नवोदय छात्रालयाला भेट दिवून पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या अचानक दिलेल्या भेटीमुळे स्थानिक नागरीकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी जयकुमार रावल यांनी स्थानिक पालक, नागरिकांशी संवादही साधला. पोषण आहारातील खिचडीही खाल्ली. स्वयंपाकखोली, शाळेची पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जर यापुढे विद्यार्थ्याच्या कोणत्याही तक्रारी असतील याबाबत संबंधित विभागाने सोडविल्या नाहीत तर मी स्व:ता येवून प्रश्न मार्गी लावेल, कोणताही विद्यार्थी शालेय शिक्षण व पोषण आहारापासून वंचित राहीला तर याला शिक्षण विभाग जबाबदार असेल, असेही मंत्री रावल यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईएनटी

$
0
0

ईएनटीबाबत जनजागृती व्हावी

डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाक, कान व घसा या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची खूपच गरज आहे. या क्षेत्रातील डॉक्‍टरांनी एकत्र येऊन या आजारांबाबतच्या नवनवीन शोधांबाबत जे प्रात्यक्षिके केले आहेत त्यावरून या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे. या सुवर्ण महोत्सवी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन नाशिकला मिळाले यातच आनंद असल्याचे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मानद उपकुलगुरु डॉ. दिलीप म्हैसकर यांनी केले.

कान नाक घसा तज्ज्ञांची सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषद मेंटकॉन २०१८ च्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. म्हैसकर बोलत होते. कान, नाक व घसा तज्ज्ञांच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पन्नासाव्या वार्षिक राज्यस्तरीय परिषदेचे यजमानपद नासिक शाखेला मिळाले आहे. दोन दिवस सुरू असलेल्या या परिषदेत नाक कान व घश्यांच्या विकारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यावर दिवसेंदिवस होणाऱ्या संशोधनावर देशभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या डॉक्‍टरांनी मत व्यक्‍त केले. मानवाला या तीनही अवयवांमधून खूप मोठी दैवी देणगी मिळाली असून या ज्ञानेंद्रियांचा अभ्यास व चर्चा होण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्‍त करण्यात आले. या परिषदेत शासकीय संस्थेतील तसेच खासगी सेवेतील जवळपास आठशे तज्ज्ञांचा सहभाग नोंदविला होता.

यावेळी या परिषदेसाठी देशविदेशातील बार्सिलोना येथील डॉ. प्रो. मॅन्युअल स्पेर्केलसन, इंग्लंड येथील डॉ. ख्रिस्तोफर अल्ड्रेन व डॉ विनिध पालेरी यांचेसह जयपूर येथील डॉ. सतीश जैन व त्रिची येथील डॉ. जानकीराम या तिन्ही अवयवांच्या विविध आजारांवर कशा पद्धतीने उपचार पद्धती निघाली आहे याची सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या परिषदेला खास परदेशातील काही डॉक्‍टर आले होते. या परिषदेसाठी शोधू जाता संवेदनांची पाळंमुळं या ज्ञानकुंभाचे घोषवाक्य असल्याचे डॉ. पुष्कर लेले यांनी यावेळी सांगितले.

परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष डॉ. शिरीष घन, खजिनदार डॉ. राजेंद्र पगारे, अभ्यास समिती प्रमुख डॉ. उमेश तोरणे व सहसचिव डॉ श्रीया कुलकर्णी यांच्यासह नाशिकमधील कान नाक घसा तज्ज्ञ प्रयत्नशील होते. यावेळी नाशिक शाखेच्या वतीने डॉ. प्रदीप गोंधळे व डॉ. एस. बी. ओगले यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रांकडून हत्या

$
0
0

पेट्रोलवरून वाद; तीन संशयित सातपूर पोलिसांच्या ताब्यात

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शिवाजीनगरमधील दोन मित्रांमध्ये चक्क पेट्रोलच्या किरकोळ वादातून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर एमआयडीसीत घडली. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी तीन संशियत तरुणांना अटक केली आहे. भाईगिरी करणारे कुठल्या स्तराला जाऊ शकतात याचेच हे उदाहरण मानले जात आहे.

अमोल अशोक बागले (वय २५, रा. साईबाबा उद्यानाजवळ, शिवाजीनगर) असे घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोकेश अशोक थोरात (वय १८), किरण मधूकर बिन्नर (वय २१) आणि सुनील पंडित खरात (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. अमोल हा त्याचा चुलत भाऊ सचिन भाईदास बागले (२९) याच्यासोबत सीएट कंपनीसमोरून रविवारी (दि. १६) रात्री साडेदहा वाजता जात होता. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने अमोलने लोकेश या आपल्या मित्रास पेट्रोल घेऊन येण्यास सांगितले. पेट्रोल घेऊन गेल्यावर 'इतका उशीर का झाला', असे अमोलने लोकशला विचारले. यात त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. लोकश सोबत किरण व सुनील यांनी अमोलला पकडले. लोकेशने खिशातून बटनाचा चाकू काढून अमोलच्या पोटात वार केले. यानंतर घटनास्थळावरून तिघांनी संशयितांनी पोबारा केला. जखमी अमोलला त्याच्या चुलत भाऊ सचिन याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अमोलला पोटात गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान अमोलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करीत संशयित आरोपींना ताब्यात घ्या, अशी मागणी केली. या प्रकरणी सातपूर पोलिसात सचिन बागले याच्या फिर्यादीवरून लोकेश, किरण व सुनील या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. एच. चव्हाण करत आहेत.

भाईगिरीच्या नादात गमवला जीव

अमोलहा हा खासगी चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. मुख्य संशयित आरोपी असलेला लोकेश हा कॉलेजमध्ये एफवायबीएचे शिक्षण घेत आहे. तर किरण व सुनिल कंपनीत कामाला जात असल्याचे सातपूर पोलिसांनी सांगितले. लग्नाला सोबत नेले नाही म्हणून अमोलचा त्याच्या मित्रांवर अगोदरचराग होता. अमोल अनेकदा त्याच्या मित्रांशी भाईगिरीच्या भाषेत बोलत असते. त्याच्या या भाईगिरीचा मित्रांना राग येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भाईगिरीच्या नादात अमोलला जीव गमवला.

आरोपींसोबत घटनास्थळाची पहाणी

अमोलच्या खुनात मुख्य संशयित आरोपी असलेला लोकेश यास पोलिसांनी सोबत घेत घटनास्थळाची सोमवारी पाहणी केली. यावेळी सीएट कंपनीला लागून असलेल्या नाल्यात बटन चाकू फेकल्याचे लोकेशने कबूल केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस चाकूचा शोध घेत होते. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त पाटील, सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यासाठी धाव

$
0
0

नाशिक : प्रत्येकाने तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी व्यायामाची आस धरणे अपेक्षित आहे. हा संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी नाशिकच्या सुभाष जांगडा यांनी नाशिक ते शिर्डी हे १०० किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव सुभाष जांगडा हे गेल्या चार वर्षांपासून वर्षातून एकदा नाशिक ते शिर्डी हे अंतर धावत पूर्ण करीत आहेत. त्यांनी यंदा 'स्वस्थ भारत' हा संदेश देण्यासाठी धाव घेतली. नाशिक ते शिर्डी हे अंतर त्यांनी १० तास १५ मिनिटांत पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौराष्ट्रचा बाद फेरीचा मार्ग मोकळा

$
0
0

महाराष्ट्रावर पाच गडी राखून विजय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआयच्या वतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात आयोजित महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात सौराष्ट्र संघाने ५ गडी राखून महाराष्ट्र संघावर विजय मिळवला. या विजयामुळे सौराष्ट्रची गुणसंख्या सहा झाली आहे. सौराष्ट्र संघाचा बाद फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यांना मुंबई येथील वानखेडे मैदानावर होणाऱ्या होणाऱ्या सामन्यात मुंबई संघाचा सामना करावा लागणार आहे.

पहिल्या दिवशी झालेल्या खेळात सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघापुढे ३९८ धावांचे आव्हान उभे केले त्याला तोंड देतांना महाराष्ट्राच्या संघाने २४७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे महाराष्ट्राच्या संघावर १५१ धावांचा लीड झाला. दुसरा डाव खेळताना सौराष्ट्र संघाने महाराष्ट्राच्या संघाला खेळण्याची संधी दिली. रविवारचा खेळ संपला त्यावेळी महाराष्ट्राची धाव संख्या ३ बाद १५७ इतकी होती. महाराष्ट्र संघाने अवघ्या सहा धावांचा लीड केला. सोमवारी महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात रोहीत मोटवानेचा खेळ महाराष्ट्राच्या संघाला त्याच्या उद्दिष्टांपर्यंत जाण्यास पूरक ठरला. रोहीतने १४ चौकार टोलवत १९० चेंडूंमध्ये १२० धावा केल्या. या सामन्यात शतक करणारा रोहीत हा एकमेव खेळाडू ठरला. सुरुवातीला खेळायला आलेल्या महाराष्ट्र संघाच्या जय पांडे याने ४ चौकार मारत ६० चेंडू मध्ये २६ धावा केल्या. चेतन सकारियाने टाकलेल्या चेंडूवर अर्पित वासवदाने त्याचा झेल पकडला. चिराग खुराना याने २४ चेंडूत १५ धावा केल्या. हार्दिक राठोडने टाकलेल्या चेंडूवर स्नेल पटेल याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या महाराष्ट्राचा उपकर्णधार रोहुल त्रिपाठी याला जम बसवता आला नाही. त्याने दोन षटकार, पाच चौकार मारत १६ चेंडूत ३८ धावा केल्या. धमेंद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्यानंतर महाराष्ट्राचा कर्णधार अंकीत बावने मैदानात उतरला. एक षटकार, दोन चौकार मारत ७१ चेंडूत त्याने अवघ्या २५ धावा केल्या. हार्दिक राठोडने टाकलेल्या चेंडूवर स्नेल पटेल याने त्याचा झेल पकडला. त्यानंतर नौशाद शेख खेळायला आला. याने चार चौकार मारत ४२ चेंडू मध्ये २६ धावा केल्या. धमेंद्र जडेजाच्या चेंडूवर विश्वराज जडेजा याने त्याचा झेल टिपला. यानंतर महाराष्ट्राच्या संघाची अधोगती सुरू झाली. महाराष्ट्राचा अघाडीचा फलंदाज केदार जाधव मैदानात उतरला यावेळी त्याच्यात असलेला अती आत्मविश्वास त्याच्या फलंदाजीला मारक ठरला. धमेंद्र जडेजाने टाकलेल्या पहिल्या चेंडूतच तो झेलबाद झाला. स्नेल पटेल याने त्याचा झेल पकडला. यानंतर अक्षय पालकर याने ३२ चेंडूत १ धाव केली. सत्यजीत बच्छाव आपल्या घरच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. पहिल्या चेंडूतच तो पायचित झाला. त्यानंतर अनुपम संकलेचा खेळायला आला. याला देखील पहिल्या चेंडूतच तंबुत परतावे लागले. धमेंद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर अर्पित वासवदा याने त्याचा झेल पकडला. समद फल्लाह याने एक षटकार, एक चौकार मारत १४ चेंडूत १२ धावा केल्या. यावेळीही धमेंद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर हार्विक देसाई याने झेल पकडला. सामना महाराष्ट्राची फलंदाजी संपली त्यावेळी महाराष्ट्राचे सर्वबाद २६७ धावा झाल्या. दुसऱ्या डावात खेळायला आलेल्या सौराष्ट्र संघाने अत्यंत आत्मविशावासाने खेळी केली. सौराष्ट्र संघाला ११६ धावा करण्याचे उद्दिष्ट होते. दुसऱ्या डावात हार्विक देसाई सौराष्ट्र संघाकडून मैदानात उतरला. त्याने चार चौकार मारत ८९ चेंडूत ४४ धावा केल्या. सत्यजीत बच्छाव ने टाकलेल्या चेंडूवर रोहीत मोटवाने याने त्याचा झेल पकडला. स्नेल पटेल याने ३३ चेंडूत १५ धावा केल्या समद फल्लाह याने टाकलेल्या चेंडूवर तो पायचीत झाला. विश्वराज जडेजायाने २१ चेंडूत ३ धावा केल्या चिराग खुराना ने टाकलेल्या चेंडूवर तो त्रिफळा चीत झाला. शेलडॉन जॅक्सन याने सहा चेंडूत ७ धावा केल्या सत्यजीत बच्छाव ने टाकलेल्या चेंडूवर तोही त्रिफळा चीत झाला. अर्पित वासवदा याने २९ चेंडूत २८ धावा केल्या चिराग खुराना याने टाकलेल्या चेंडूवर नौशाद शेक याने झेल पकडला. कमलेश मकवाना ९ धावा, प्रेरक मंकड ७ धावा करुन नाबाद राहिले. सौराष्ट्र संघाने महाराष्ट्रावर ५ गडी राखून विजय मिळवला. सौराष्ट्रची धाव संख्या ५ गडी बाद १२० झाली.

सौराष्ट्रचा धमेंद्र जडेजा सामनावीर

सौराष्ट्रचा गोलंदाज धमेंद्र जडेजा याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या इनिंग मध्ये १ आणि दुसऱ्या डावात ७ असे एकूण ८ बळी घेतले.

…..

नाशिकमध्ये उत्तम प्रकारची खेळपट्टी तयार करण्यात आली होती. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना साथ देणारी होती. त्याचा आमच्या संघाने फायदा करून घेतला. एनडीसीएने जी व्यवस्था केली होती त्याच बरोबर येथील स्थानीक प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही हा सामना जिंकू शकलो.

--जयदेव उनाडकट, कर्णधार, कप्तान

…..

हा सामना आमच्या चागलाच स्मरणात राहिल. येथील खेळपट्टी अतिशय उत्तम होती. यापुढे मंबई विरुद्ध होणाऱ्या सामन्यावर आमचे लक्ष आहे. २२ डिसेंबर पासून हे सामने होणार आहेत.- सितांशू कोटक, सौराष्ट्र प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार नोटिसांचा खुलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बजावलेल्या घरपट्टीच्या नोटिसांबाबत सुमारे दहा हजार नोटिसांना उत्तर प्राप्त झाले आहे. नागरिकांनी जोडलेल्या पुराव्यांच्या आधारे हे लक्षात येत आहे की काही बाबी चुकीच्या घडल्या आहेत. त्यामुळे घरपट्टीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

सध्या शहरात ज्वलंत असलेला वाढीव घरपट्टी व ऑटो डीसीआर या विषयावर नरेडको पदाधिकाऱ्यांनी आयुक्त गमे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. घरपट्टीतील वाढीव दर, चालू बांधकाम, चुकीची नावे, चुकीच्या कालावधी, चुकीच्या दराने आकारलेली घरपट्टी अश्या अनेक समस्यांकडे नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली. यामुळे शेकडो नाशिककर चिंतेत आहेत. बांधकाम क्षेत्रातील विविध संकटांमुळे नाशिकचा विकास खुंटला असल्याचे नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सांगितले. नोटिसांमध्ये चुकीच्या गोष्टी असल्याचे नरेडको पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत लवकरच नरेडको नाशिकच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विशेष बैठक घेऊन हा विषय निकाली काढण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. ऑटो डीसीआर विषयी ज्या महत्त्वाच्या त्रुटी आहेत त्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. हे अतीमहत्वाचे विषय असून त्यात तातडीने लक्ष घालणार असल्याचे सांगितले. नरेडको नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन स्वागत केले. या प्रसंगी नरेडको नाशिकचे अभय तातेड, सुनील गवादे, राजन दर्यानी, अमित रोहमारे, मयूर कपाटे, राजेंद्र बागड आदी पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच सहाय्यक संचालक नगर रचना मनपा नाशिक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे नरेडको नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परजिल्ह्यांसाठी चाराबंदी!

$
0
0

जिल्हाबाहेर किंवा परराज्यात चारा नेता येणार नाही

..

- जिल्ह्यात १२०० हेक्टरवर चारा लागवडीची तयारी

- ४८ हजार टन चारानिर्मितीचे ध्येय

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या झळा आणि दुष्काळाची दाहकता त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असला तरी भविष्यात चाराटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी घातली आहे.

पावसाने यंदा नाशिक जिल्ह्याकडेच नाही, तर राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या हंगामातही टँकरच्या पाण्याने जिल्हावासीयांची तहान भागविण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. दिवसेंदिवस जिल्ह्यात टँकरची मागणी वाढतच असून, आजमितीस १०१ टँकरद्वारे अनेक गावांमधील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून, जलाशयांमधील उपलब्ध पाण्यावरच जिल्ह्याची जूनपर्यंतची भिस्त असणार आहे. त्यामुळे पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करा, असे आवाहन यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न असल्याने चाराटंचाईदेखील उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे धरणांच्या गाळपेरा क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. जिल्ह्यातही १२०० हेक्टरवर चारा लागवड करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या माध्यमातून रब्बी हंगामात ४८ हजार टनाच्या आसपास चारा मिळणार आहे. जिल्ह्यात मेंढ्या, शेळ्या वगळता १२ लाख ३७ जनावरे आहेत. या जनावरांना चारा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.

..

दोन महिने बंदी

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. जिल्ह्यात उत्पादित चारा येथील पशुधनास पुरेसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातून परराज्यात चारा वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. चाऱ्याच्या वाहतुकीतून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील शिल्लक चारा अन्य जिल्ह्यात व परराज्यात जाऊ नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यापर्यंत जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी घातली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांना आता ‘वेळेतच’ भेटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दररोज भेटणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आयुक्त गमेंनी नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांना भेटण्यासाठी वेळे निश्चित केली आहे. आयुक्त आता आठवड्यातील तीन दिवसच नागरिक आणि लोकप्रतिनिधींना भेटणार असून, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच भेटण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त गमे यांनी पदभार घेतल्यापासून त्यांना भेटणाऱ्यांसह कामासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दररोज नागरिकांसह नगरसेवक, लोकप्रतिनिधी येऊन त्यांना भेटतात. त्याचा परिणाम आयुक्तांच्या दैनंदिन कामकाजावर झाला आहे. गमे हे पालिकेत येणाऱ्या प्रत्येकाचे ऐकून घेत असल्याने व त्याच्या तक्रारींची दखल घेत असल्याने भेटणाऱ्यांची संख्या अधिकच वाढली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या सोयीने आयुक्त गमे यांनी आता नागरिकांसह लोकप्रतिनिधींना भेटण्याची वेळ निश्चित केली आहे. पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांना आता सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३.३० ते ४ वाजेपर्यंत आयुक्तांना भेटता येणार आहे, तर याच दिवशी दुपारी ४ ते ५ दरम्यान नागरिकांना भेटता येणार आहे. प्रशासकीय दौरे व सुटी दिवस वगळून ही वेळ देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन तरुणांवर कोयत्याने वार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पोलिसांत केलल्या तक्रारीचा वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून घेत कोयता व तलवारीच्या सहाय्याने तीन जणांवर शस्त्राने वार केल्याची घटना सातपूर, गणेशनगर भागात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. विशाल यशपाल शर्मा (रा. मुंबई नाका) यांच्या फिर्यादीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश फलके, अजय बनसोड व करण नरेश धुळे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तिघांसह त्यांच्या इतर मित्रांनी वाद असलेल्या तीन जणांना गणेशनगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे बोलावले. यावेळी संशयितांसह त्यांच्या मित्रांनी कोयता व तलवारीच्या सहाय्याने विशालसह तीन जणांना गंभीर जखमी केले. हल्ल्यात जखमी झालेले अर्जुन खरादे (रा. कामगारनगर), विरेंद्र शर्मा (रा. मुंबई नाका) आणि दीपक (पूर्ण नाव माहित नाही) यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तात्काळ तक्रार नोंदवून घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरी राऊत अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काशिनाथ घाणेकर’चे दिग्दर्शक रसिकांच्या भेटीला

$
0
0

'आयाम'तर्फे २५ रोजी आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अस्सल कलावंताच्या आयुष्यातील कंगोरे समजावून घेणे अन् त्याच्यातील ओसंडून वाहणाऱ्या प्रतिभेची एका मोठ्या कालखंडानंतर तितक्याच ताकदीने मांडणी करणे हे काम वाटते तितके सोपे नाही. तरीही, '...आणि काशिनाथ घाणेकर' या चित्रसृष्टीवर शब्दश: अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ही किमया लिलया घडविणारे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हे नाशिककरांच्या भेटीला मंगळवारी, २५ डिसेंबर रोजी येणार आहेत.

सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत 'आयाम' या संस्थेच्या वतीने शंकराचार्य न्यासच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे. मराठी नाट्यसृष्टीस पाच दशकांपूर्वी सोनेरी स्वप्ने दाखविणाऱ्या नटाच्या व्यक्तिमत्वाचे गूढ पदर या चित्रपटात दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी तितक्याच ताकदीने उलगडले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाला उत्तूंग कलाविष्कारातून या चित्रपटाचे नायक सुबोध भावे यांनीही तितक्याच ताकदीची साथ दिली आहे.

कलेसाठी हयातभर संघर्षरत असणाऱ्या कलावंताच्या आयुष्यातील उत्कट भावाविष्कार या चित्रपटात तितक्यात प्रभावीपणे मांडण्यात आल्याने वाचकांना खिळवून ठेवण्यात अन् अभिरुचीच्या कसोटीवर उत्तीर्ण होत नवे झेंडे कलाकृतीने मराठी चित्रसृष्टीत रोवले आहेत. अशा दर्जेदार कलाकृतीचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याशी कल्याणी पंडित या संवाद साधणार आहेत. या उपक्रमाच्या आयोजनासाठी जयंत जोगळेकर यांचे सहकार्य लाभले असून मीडिया पार्टनर म्हणून 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहकार्य लाभले आहे. या संवाद सोहळ्यासाठी रसिकांना मुक्त प्रवेश आहे. या पर्वणीचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन 'आयाम'चे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, विश्वस्त शुभदा देसाई आणि आयाम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्समधून पेंडलची चोरी

$
0
0

पर्समधून

पेंडलची चोरी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबई येथुन आलेल्या व कहांडळवाडी (वावी, ता. सिन्नर) येथे जाण्यासाठी नाशिक शिर्डी बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून पाच तोळे वजनाचे ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल चोरट्यांनी लाबविल्याची घटना नाशिकरोड बसस्थानकात घडली.

वंदना विश्वास घेगडमल (वय ४५, रा. सोमय्या ट्रस्ट, टिळकनगर, मुंबई) ही महिला आपल्या पतीसह गावी कहांडळवाडी येथे जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकात नाशिक-शिर्डी बसमध्ये बसल्या होत्या. तिकीट काढण्यासाठी पैसे काढतेवेळी त्यांच्या पर्सची चेन उघडलेली आढळल्यानंतर पर्समध्ये ठेवलेले पाच तोळे सोन्याचे पेंडल चोरीस गेल्याची बाब उघड झाली. यावेळी वंदना घेगडमल यांनी बसमधील प्रवाशांसह बसस्थानकावरही शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी तात्काळ नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजावर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाही नायलॉन मांजाच्या निर्मितीसह विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. दरवर्षी आदेश काढण्याचा सोपस्कार पार पाडला जात असला तरी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असल्याचे चित्र शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही आहे. यंदा तरी नायलॉन मांजाचा वापर थांबवून मुक्या जीवांना वाचविण्यात प्रशासनाला यश येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मकर संक्रांतीचा सण समीप येऊ लागला की आकाशात विविधरंगी पतंगांची गर्दी होऊ लागते. बच्चे मंडळींना आतापासूनच पतंगोत्सवाचे वेध लागले असून शनिवार, रविवारसह सुटीच्या दिवशी पतंग उडविण्यास बच्चे मंडळींकडून पसंती दिली जाऊ लागली आहे. पतंग उडविण्यासाठी कोणताही दोरा पुरेसा असला पंतंगांचा काटाकाटीचा खेळ लावण्यासाठी मात्र बच्चे मंडळींना नायलॉनचा मांजाच हवा असतो. या धारदार मांजामुळे पक्षी इतकेच नव्हे तर नागरिकांनाही गंभीर इजा झाल्याचे कितीतरी प्रकार शहरात घडले आहेत. त्यामुळेच या मांजाच्या निमिर्तीसह विक्री आणि वापरावर दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. यंदाही अशा प्रकारच्या बंदीचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी काढले आहेत. ३१ जानेवारी २०१९ पर्यंत बंदी ही बंदी लागू राहणार आहे. विक्रेते आणि वापरकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर कारवाई करणारी स्वतंत्र यंत्रणा प्रशासनाकडे कार्यरत नसल्याने या सर्वांचेच फावते आहे. गतवर्षी काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. परंतु प्रत्यक्षात वापर होतो त्यापेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे.

आपणही कळवा

नायलॉन मांजाला बंदी असली तरी त्याचा वापर होत असल्याचे वारंवार समोर येते. यासंदर्भातील आपले अनुभव तसेच माहिती आपण मटा सिटिझन रिपोर्टर अॅपद्वारे कलवू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कामगार नोंदणीला तूत ब्रेक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्यासाठी सुरू केलेले विशेष नोंदणी अभियान तूर्त थांबविण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून दर बुधवारी नाशिकच्या उद्योग भवन येथे असलेल्या कामगार विभागात होणारी प्रचंड गर्दी यामुळे आता दिसणार नाही. ही नोंदणी तूर्त थांबविण्यामागे अनेक कारणे असली तरी त्याबाबत कामगार विभागाने मात्र फारसे बोलणे टाळले आहे. आतापर्यंत तीन बुधवारी तीन हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे.

या नोंदणी अभियानात एजंटचा झालेला सुळसुळाट, बोगस नोंदणीसाठी दाखल होणारी कागदपत्रे यामागील कारणे असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे ही नोंदणी करण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ग्रामीण व शहरी भागात सर्वत्र नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकारी नेमले आहेत. पण, जिल्ह्यातील सर्वच कामगार हे कामगार विभागात येत असल्याचे समोर आले आहे. या नोंदणीची जबाबदारी ग्रामीण भागासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, महानगरपालिकेसाठी वार्ड ऑफीसर, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, उद्योग क्षेत्रात कामगार कल्याण मंडळ व कामगार विभागाकडे दिली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, पाणीपुरवठाच्या सर्व उपअभियंताने सुध्दी ही नोंदणी करायची आहे. पण, कामगार विभागानेच आतापर्यंत ही नोंदणी केली आहे.

...

काय आहे योजना

बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व आर्थिक लाभ व्हावा, यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने २८ योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी कामगारांची नोंदणी आवश्यक आहे. या नोंदणीसाठी वर्षभरात ९० किंवा त्यातून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे, रहिवासी दाखला, छायाचित्र ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकची सत्यप्रत आवश्यक आहे. त्यासाठी नोंदणी फी २५ रुपये, तर वर्गणी दरमहा १ रुपया आहे. पाच वर्षाकरिता ही वर्गणी ६० रुपये आहे.

...

योजनेचा फायदा

नोंदणी केलेल्या कामगारांना सर्वाधिक फायदा तूर्त दोन योजनेतून होत आहे. या कामगारांना अवजारे खरेदीसाठी पाच हजार अर्थसहाय्य व दोन कीट दिल्या जातात. एका किटमध्ये हेल्मेट, गम बूट, तर दुसऱ्या किटमध्ये पाण्याची बाटली, चटई, डब्बा व बॅटरी दिली जाते. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका योजनेत वर्षभरासाठी पाल्यास पहिली ते सातवी २५०० रुपये आठवी ते दहावी पाच हजार रुपये शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते. या व्यतिरिक्त अनेक योजना आहेत.

....

विभाग - नोंदणी- लाभार्थी - लाभ

नाशिक - २७ हजार ७४० - २८५८ - १ कोटी ३२ लाख ९३ हजार ७००

मालेगाव - ८ हजार ७९८ - ८०० - ३४ लाख ६२ हजार ६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद महिंद्रा वाद संपुष्टात

$
0
0

नाशिकच्या बच्छाव यांच्या कंपनीस पाच लाखांचा दंड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आंनद महिंद्रा हे नाव कंपनीसाठी वापरण्याबाबत कोणताही हेतू नाही. त्यामुळे हे नाव मागे घेण्यास तयार असल्याचे सांगत महिंद्रा बच्छाव यांनी पुढील वाद वाढविण्यास नकार दर्शविला. न्यायमूर्ती एस. जी. काथावाला यांनी त्यास परवानगी दिली. मात्र, हा निर्णय घेण्यास बराच वेळ घालविल्याने बच्छाव यांना पाच लाखांचा दंड देखील सुनावला. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आनंद महिंद्रा विरुध्द आनंद महिंद्रा हा वाद अखेर संपुष्टात आला.

नावाचा हा वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. नाशिकमध्ये बिल्डर आणि उद्योजक महिंद्र आनंद बच्छाव यांनी काही वर्षांपूर्वी अंबड परिसरात आयटी कंपनी सुरू केली होती. वडील आणि स्वत:च्या नावामुळे त्यांनी या कंपनीस आनंद महिंद्र आयटी कंपनी असे नामकरण केले. अर्थातच ही माहिती महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीपर्यंत पोहचली. त्यांनी वकिलामार्फत नोटीसा पाठवली. बच्छाव यांनी हे नाव काढून टाकावे, अशी मागणी नोटीसीद्वारे करण्यात आली. मी माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नावाचा वापर केला असून, त्यात काहीही गैर नसल्याचा मुद्दा बच्छाव यांनी नोटीसीला उत्तर देताना मांडला. यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतर्फे अॅड. हिरेन कमोद यांनी न्यायमूर्ती एस. जी. काथावाला यांच्या कोर्टात दावा दाखल केला. माझ्या आणि वडिलांच्या नावाचा वापर यात झाला असून, त्यात काहीही गैर नसल्याचा मुद्दा बच्छाव यांच्यातर्फे उपस्थित करण्यात आला. मात्र, अंतिम सुनावणी होईपर्यंत आयटी कंपनीचे नाव आणि वेबसाईटवरील नाव काढून टाकण्याचे आदेश दिले. गत सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान बच्छाव यांनी नाव बदलण्याबाबत मुदत मागितली होती. त्याबाबत आज, सोमवारी (दि.१७) सुनावणी झाली. सुनावणी सुरू होताच बच्छाव यांनी हा वाद थांबवयाचा असून, कोर्टाचा अंतिम आदेश मान्य असल्याचे सांगितले. यावर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतर्फे अॅड. हिरेन कमोद यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्हाला महिंद्रा बच्छाव ग्रुप अथवा इतर नावांबाबत हरकत नाही. मात्र, महिंद्रा ग्रुप, आंनद महिंद्रा ही आमच्या कंपनीची ओळख असून, या नावाचा वापर होता कामा नये, असे कमोद यांनी स्पष्ट केले. कोर्टानेही हा युक्तीवाद मान्य केला. मात्र, आजवर आलेल्या नोटीसा आणि त्यानुसार पुढे उद्भवलेल्या वादामुळे हायकोर्टाने बच्छाव यांना पाच लाखांचा दंड ठोठावला.

दंडाची रक्कम चॅरेटीमध्ये

नावाच्या वापराबाबत कंपनीने १० कोटीचा दावा केलेला होता. त्यामुळे कोर्टाने सुनावलेल्या दंडाच्या रक्कमेचे काय करायचे, असा प्रश्न न्यायमूर्तींनी अॅड. कमोद यांनी विचारला. काही वेळा अशी रक्कम कंपनी घेत असते. मात्र, ही रक्कम आम्हाला म्हणजे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीला नको, तर ती धर्मादाय संस्थेला देण्यात यावी, असे अॅड. कमोद यांनी स्पष्ट केले. दंडाची रक्कम आठवड्याभरात जमा करण्याचे आदेश कोर्टाने यावेळी दिले.

आमचे इतर काही प्रोजेक्ट असून, त्यात दोन नावांचा वापर केला गेला आहे. या प्रोजेक्टच्या नावाबाबतही तसेच होते. नावाच्या वापराबाबत इतर कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे कोर्टात जाण्याचा पर्याय स्विकारला. आजच्या निकालाबाबत समाधानी आहोत.

- महिंद्रा आनंद बच्छाव, उद्योजक

आनंद महिंद्रा वा महिंद्रा ग्रुप या नावाच्या वापराबाबत आमचा आक्षेप असून, बच्छाव यांनी तो आक्षेप मान्य केला. तसेच, कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले.

- अॅड. हिरेन कमोद, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारणांची ही यादी सोडून बोला!

$
0
0

वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारांना 'मार्गदर्शन'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नावडत्याला मीठ आळणी, या म्हणीचा वाहतूक पोलिसांना पदोपदी प्रत्यय येऊ लागला. विशेषत: हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांची कैफियत विविध कारणांमधून समोर येऊ लागली. एकाचवेळी शेकडो दुचाकीस्वारांचे हेल्मेट चोरीला जाणे, रोजच घालतो पण आज राहिले किंवा जवळच काम होतो म्हणून हेल्मेट विसरलो, अशी कारणे पोलिसांवर धडकू लागली. यावर उपाय म्हणून या कारणांची एक यादीच वाहतूक पोलिसांनी तयार केली आहे. यादीतील कारण नसेल तरच कैफियत मांडा किंवा थेट पैसे भरून निघा, असा सल्ला वाहतूक पोलिसांकडून दिला जातो आहे.

शहरात मागील सहा महिन्यांपासून हेल्मेट वापराबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरात सातत्याने अपघात होत असून, यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वार प्रथम क्रमांकावर आहेत. यातील ९० टक्के व्यक्ती तरुण असून, ८५ टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. हेल्मेटमुळे जीव वाचतो, ही संकल्पना दुचाकीस्वारांमध्ये रुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगवेगळे प्रयत्न केले. मात्र, त्याचा फारसा परिणाम होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने थेट दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

हेल्मेटचा वापर करण्यात आलेला नसेल तर दुचाकीस्वाराकडून ५०० रुपये दंड आकारला जातो. दंडाची रक्कम मोठी असल्याने दुचाकीस्वारांना इकडे आड अन् तिकडे विहीर असा अनुभव येतो. पोलिसांची कारवाई सुरू होताच वाहनचालक अधिकाऱ्यांना भेटून विविध कारणे पुढे करून दंडात्मक कारवाई करू नये, यासाठी विनंती करतात. शेकडो नागरिक एकसारखीच विनंती करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या कारणांची लेखी यादीच तयार केली आहे. ही यादी वाहतूक पोलिस जवळ बाळगतात. कोणी कारण सांगण्यास सुरुवात केली ती यादी वाहनचालकाकडे दिली जाते. या कारणांव्यतिरिक्त दुसरे कारण असल्यास सांगावे, अन्यथा दंड भरून जावे, अशी सूचनाही यात केली आहे.

या कारणांवर जोर

दररोज घालतो आजच राहिले.

हॉस्पिटलला चाललो अर्जंट आहे.

मयतीला चाललो म्हणून राहिले.

नातेवाइकाचा अपघात झाला म्हणून घाईत निघालो.

कालच चोरीला गेले.

घरी राहिले लगेच आणून दाखवितो.

जवळच राहतो लगेच घेऊन येतो.

फक्त एक वेळेस माफ करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवितव्य शासन हाती!

$
0
0

धार्मिक स्थळांबाबत आयुक्त आणि आमदारांच्या बैठकीत मंथन

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कॉलनी अंतर्गत मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे नियमितीकरणाचा महासभेचा ठराव शासनाने मंजूर केल्यानंतर आणि शहर विकास नियंत्रण नियमावलीत तसा बदल केल्यानंतरच शहरातील धार्मिक स्थळे वाचणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत समोर आले आहे. उर्वरित धार्मिक स्थळांबाबत उच्च न्यायालयाच्या फेरप्रक्रियेच्या निर्देशानुसार विश्वस्तांना आणखी तीन महिने पुरावे दाखल करण्यासाठी मिळणार असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांचे भवितव्य आता शासन आणि आमदारांच्या हाती राहणार आहे.

शहरातील ५७५ धार्मिक स्थळांबाबत फेरप्रक्रिया राबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मनपा प्रशासनाने त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. या धार्मिक स्थळांबाबत फेरनोटिसा देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत शासनाच्या आदेशाप्रमाणे गठीत समितीची बैठक पार पडली. त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली. परंतु, या कारवाईला महासभेचा मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे नियमितीकरणासंदर्भात महासभेने १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय करण्यासंदर्भात मंजूर केलेल्या ठरावाची अडचण झाली आहे. कॉलनी अंतर्गत मोकळ्या भूखंडांवर नियमानुसार १० ते १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय आहे. महापालिका कायद्यातील या तरतुदीचा आधार घेत मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे नियमित करण्याची मागणी धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी यापूर्वी केली होती. त्यानुसार महासभेत ठरावदेखील करण्यात आला. हा ठराव ३७ (१) च्या कारवाईसाठी अर्थात शासनाच्या मंजुरीसाठी महापालिकेने पाठविला आहे. परंतु, हा ठराव अद्यापही शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे हा ठराव प्राप्त झाला नाही, तर जवळपास ७२ धार्मिक स्थळांवर कारवाई अटळ आहे. त्यामुळे विश्वस्तांनी दोन दिवसापूर्वीच शासनाकडून हा ठराव मंजूर करण्यासाठी आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.

कृती समितीच्या इशाऱ्यानंतर सोमवारी शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासोबत महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, मनसे गटनेते सलिम शेख यांची आयुक्तांसोबत बैठक झाली. यात धार्मिक स्थळांबाबत चर्चा झाली. त्यावेळी आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानुसार फेरप्रक्रिया केली जात असून, महिनाभरात धार्मिक स्थळांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन महिन्यांची संधी दिली जाणार असून, तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे या तीन महिन्यांत धार्मिक स्थळांचे कागदोपत्री पुरावे तयार होणार आहेत. आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त अशा तीन जणांची समिती ही त्याचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे गमे यांनी लोकप्रतिनिधींना सांगितले.

मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांबाबतचा प्रलंबित ठराव शासनाकडून वेळेत मंजूर होऊन आला आणि त्यासंदर्भात शहर विकास नियंत्रण नियमावलीत दुरुस्ती झाली, तरच मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांना दिलासा देता येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच, धार्मिक स्थळाचे कोणतेही फेरसर्वेक्षण होणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे या धार्मिक स्थळांचे भवितव्य आता शासन आणी त्याचा पाठपुरावा करणाऱ्या आमदारांच्या हाती राहणार आहे.

....

घरपट्टीचा निर्णय अभ्यास करून होणार

या बैठकीत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी एकतर्फी वाढवलेल्या करयोग्य मूल्यांच्या विषयासह वाढीवर घरपट्टीच्या बिलांसोबतही चर्चा झाली. नागरिकांच्या हाती बिले पडल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या आहेत. हे सर्वेक्षणच बोगस असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. त्यावर प्रशासनानेही या घरपट्टीच्या बिलाबाबत मोठ्या तक्रारी असून, त्यात तथ्य असल्याचे सांगण्यात आले. त्यावर आमदारांनी हा निर्णय रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्त गमे यांनी आपण या संदर्भात अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवराजला मिळणारका खरेदीदार?

$
0
0

युवराजला मिळणार

का खरेदीदार?

आयपीएल लिलाव

वृत्तसंस्था, जयपूर

पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट लीगसाठीचा या वर्षीचा दुसरा लिलाव आज (मंगळवार) होत आहे. बेंगळुरू ऐवजी जयपूरमध्ये होणाऱ्या या लिलावात डावखुरा फलंदाज युवराजसिंगला खरेदीदार मिळणार का, याबाबत चर्चा आहे.

गेल्या वर्षीच्या लिलावात युवराजसिंगची आधारभूत किंमत २ कोटी रुपये होती. त्याच्यावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १६ कोटी रुपये बोली लावून संघात सामावून घेतले होते. मात्र, युवराजला आपल्या किमतीला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला आठ लढतींत केवळ ६५ धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाब संघाने त्याला करारमुक्त केले. ३७ वर्षीय युवराजसिंग भारताकडून शेवटचा सामना जून २०१७मध्ये खेळले होता. या वेळी युवराजने आपली आधारभूत किंमत १ कोटी रुपये ठेवली आहे. त्याच्यासह वृद्धिमान सहा, महंमद शमी, अक्षर पटेल यांचीही तेवढीच किंमत आहे.

या वेळी लिलावात एकूण ३४६ क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. यातील केवळ ७० खेळाडूंची खरेदी होऊ शकते. त्यातही २० परदेशी खेळाडू असतील. यातील एकाही भारतीय खेळाडूची आधारभूत किंमत २ कोटी रुपये नाही. ब्रेंडन मॅकलम, ख्रिस वोक्स, लसिथ मलिंगा, शॉन मार्श, सॅम करन, कॉलिन इंग्राम, कोरी अँडरसन, अँजेलो मॅथ्यूज आणि डी. शॉर्ट या नऊच खेळाडूंचा २ कोटींच्या यादीत समावेश आहे. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, जॉनी बेअरस्टो, अॅलेक्स हेल्स यांनी आपली आधारभूत किंमत १.५ कोटी रुपये ठेवली आहे. चेतेश्वर पुजाराची किंमत ५० लाख रुपये, तर इशांत शर्माची किंमत ७५ लाख रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राफेलवर चर्चेसाठी सरकार तयार

$
0
0

पी. मुरलीधर राव यांचे सूतोवाच

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राफेल करारावरून काँग्रेस पक्ष राजकीय लाभासाठी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितेबाबत खेळ करीत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार पी. मुरलीधर राव यांनी केला आहे. राफेलबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन असून, त्यांचे आरोप कोणत्या आधारावर आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राफेल प्रकरणावर भाजप सरकार हे संसदेत चर्चा करायला तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने देशातील प्रमुख शहरांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नाशिकमध्येही पी. मुरलीधर राव यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून राफेलबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांना उत्तरे देण्यात आली. काँग्रेसकडून राफेलबाबत देशभरातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. राजकीय लाभासाठी काँग्रेस पक्ष हा राफेल कराराकडे बघत असून, सुरक्षिततेच्या महत्त्वाच्या विषयावरही राजकारण केले जात आहे. भाजपने देशाची एकता आणि अखंडेतबाबत कधीच राजकारण केले नाही. काँग्रेस कार्यकाळातही सुरक्षिततेबाबत भाजपने नेहमीच सहकार्य केले आहे. भाजपच कायमच पार्टी विथ डिफरन्स आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही तीच अपेक्षा असताना, काँग्रेस आरोप करून राजकीय लाभ घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राफेल प्रकरणात काँग्रेसला तोंड लपवायला जागा नाही. राफेल खरेदीसाठी उशीर काँग्रेसमुळेच झाला असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र तरीही राफेल प्रकरण काँग्रेसने प्रचाराचा मुद्दा केला, असे राव यांनी सांगितले.

..

काँग्रेसने माफी मागावी

राहुल गांधींच्या आरोपांचा आधार काय हे त्यांनी उघड करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी होती. परंतु, न्यायालयाचा निर्णय राहुल गांधी मानायला तयार नाहीत. काँग्रेसकडून देशहिताबाबत गद्दारी करीत असल्याचे सांगत राव यांनी काँग्रेसला संसदेत चर्चेचे खुले आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७९ कर्मचाऱ्यांना झेडपीत पदोन्नती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली.

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना परिचर (गट -ड) संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक लिपिक (गट क) संर्वगात पदोन्नती देण्यात येते. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील पत्रानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी प्रशासन विभागाने १६२ पात्र कर्मचाऱ्यांचा यादी तयार केली होती. या कर्मचाऱ्यांना समुपदेशानासाठी बोलविण्यात आले होते. यातील ११ कर्मचारी अपात्र, तर ७२ कमर्चाऱ्यांनी पदोन्नतीस नकार दिल्याने उर्वरित ७९ जणांना पदोन्नती देण्यात आली. यावेळी उमेदवारांना उपलब्ध जागांची माहिती देण्यात येऊन त्यातील तीन जागांचा प्राधान्यक्रम देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images