म. टा. वृत्तसेवा, पंचवटी सकल नाथपंथी समाज संघटनेच्या विभागीय मेळाव्यात संघटनेचा उद्देश आणि संघटनेची बांधणी या विषयावर चर्चा करण्यात आली. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचा अजेंडा मांडण्यात आला. नाशिक विभागातील सकल नाथपंथी समाज संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गोविंद इंगळे होते. अमृतधाम येथील शिवगोरक्ष योगपीठ येथे झालेल्या कार्यक्रमास सकल नाथपंथी समाज संघटनेचे नाशिक येथील राज्य सचिव चंद्रकांत देवगुणे, जालना येथील राज्य सचिव सखाहरी चंद्रहास, जळगाव येथील राज्य सचिव प्रा. डॉ. एस. के. जोगी, मुंबई येथील राज्य सचिव सुनीता महाले आदी उपस्थित होते. समाज संघटनेची बांधणी करणे कसे गरजेचे आहे, या बांधणी मागील उद्देश याची राहुल बोरकर यांनी माहिती दिली. किशोर लाड यांनी संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मांडला. अतुल सोनारे, प्रवीण चव्हाण, राहुल रुद्रवंशी, शंतनू शिंदे, ज्ञानेश्वर सोमोसे, मधुकर शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. भाऊसाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विनायक लाड यांनी प्रास्ताविक केले. माणिक कानडे यांनी आभार मानले. समाज प्रबोधनाची गरज नाथपंथी समाजाला आजही प्रबोधनाची गरज आहे. समाज प्रबोधनाची काम समाजातील नेते आणि साधुसंतांनी करायला पाहिजे. समाजाच्या पतपेढी, बँक, शिक्षणसंस्था असावी. वस्ती, गाव, रस्ता, चौक यांनी नवनाथांची नावे दिली जावी. समाजाच्या संप्रदायाची परंपरा, ग्रंथ, उपासना यांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, असे डॉ. एस. के. जोगी यांनी सांगितले. लोगो : सोशल कनेक्ट
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट