Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रांत, तहसीलदारांना निवडणूक प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, पुढील आठवड्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांनाही १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील गावागावांत इव्हीएमसह व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

नववर्षात लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने आतापासूनच कंबर कसली आहे. मतदार पुनरीक्षण कार्यक्रमानंतर ११ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. लोकसभेसाठी प्राप्त झालेले ९४२२ बॅलेट युनिट, ५४७९ कंट्रोल युनिट आणि तेवढ्याच व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता जनतेपर्यंत पोहोचावी याकरिता यंदा जनजागृतीवर अधिक भर देण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशिनबाबत गावागावात जनजागृती करण्यात येणार असून, १५ डिसेंबरपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी १० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक निश्चित करण्यात आले असून, त्यांना १२ व १३ डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी (दि.१०) सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

...

निवडणूक कामकाजाचा आझावा

शुक्रवारी दुपारी भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अश्विनीकुमार यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाकडून निर्गमित केल्या जाणाऱ्या सूचना अभ्यासता का नाही, असा थेट सवाल त्यांनी राज्यातील काही विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारला. आयुक्तांकडून होणाऱ्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अधिकाऱ्यांसह यंत्रणेची भंबेरी उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

$
0
0

मंत्री दादा भुसे यांची ग्वाही

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या कन्सरा माऊली आणि उन्हादेव यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कळवण तालुक्यातील मौजे जामले (दळवट) गोधनपानी डोंगर येथे सभामंडप उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार जीवा पांडू गावित, काशिनाथ बहिरम, नगराध्यक्ष मयूर बहिरम, पंचायत समिती सभापती काशिनाथ गायकवाड, सरपंच एकनाथ बागूल आदी उपस्थित होते. यावेळी भायांचे आणि पावरी नृत्य सादर करण्यात आले.

भुसे पुढे म्हणाले की, उत्सवाच्या निमित्ताने संस्कृती जोपासली जाते आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. चांगल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासोबत मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढीचा विकास होईल. आदिवासी भागात काही ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती असल्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असेही भुसे म्हणाले. संस्कृतीची जोपासना करताना विद्यार्थ्यांनी शासनाच्या सुविधा आणि योजनांचा लाभ घेऊन शैक्षणिक प्रगती करावी, असे आवाहन आमदार गावित यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे येथील खंडणीच्या गुन्ह्यात एकास अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुलीस ठार मारण्याची धमकी देत पित्याचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या टोळीतील एका सदस्यास क्राईम ब्रँचच्या पथकाने शनिवारी नाशिकरोड भागात अटक केली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.

फैसल अब्दूल रज्जाक (रा. घासमंडई, सिटी चौक, औरंगाबाद) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देवून ठाणे येथील भावेशभाई करमसीभाई सवानी (रा. मिरारोड पूर्व) यांचे गेल्या रविवारी (दि.२) अपहरण करण्यात आले होते. मीरारोड येथील सेंट झेवीयर्स हायस्कूल येथून सवानी आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. पाच अपहरणकर्त्यांनी १३ लाख रुपयांची खंडणी मागून पैसे मिळाले नाही तर मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यावेळी सवानी यांना मारहाण करीत त्यांची क्रिएटा कार पळवून नेली होती. या प्रकरणी ठाणे ग्रामीणच्या नयानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीतील एक संशयित नाशिकरोड येथे येत असल्याची माहिती शनिवारी, (दि. ८) सकाळी युनिट एकचे कर्मचारी विशाल काठे यांना मिळाली. यानंतर युनिटीचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाशिकरोड येथे धाव घेवून संशयितास अटक केली. त्यास लागलीच ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार यवाजी महाले, पोपट कारवाळ, आसीफ तांबोळी, शिपाई विशाल काठे, विशाल देवरे, प्रविण चव्हाण आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असुरक्षिततेचा ‘बाजार’

$
0
0

निफाडच्या आठवडे बाजाराला अतिक्रमणाची समस्या

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शिर्डी-सुरत अर्थात निफाड पिंपळगाव या मुख्य मार्गावर दर शुक्रवारी निफाडचा आठवडा बाजार भरतो. मात्र बाजारात भाजीपाला, फळे व इतर वस्तूंचे विक्रेते एकमेकांशी स्पर्धा करताना थेट रस्त्यावर दुकान मांडतात. त्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांचाही जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे आठवडे बाजाराच्या दिवशी निफाड नगरपंचायतीने पांढऱ्या रंगाची पट्टी आखून देत होते. त्यापुढे कोणीही दुकान लावू नये, असा नियम आहे. मात्र चार ते पाच आठवड्यांपासून ही 'सीमारेषा' आखून देण्याबाबत पालिका उदासीन दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

तालुक्याचा बाजार असल्याने निफाडमध्ये दर शुक्रवारी मोठी गर्दी असते. हा बाजार निफाड-पिंपळगाव मार्गावर भरतो. निफाड नगरपंचायतीला वार्षिक लिलावाच्या माध्यमातून मोठे आर्थिक उत्पन्नही मिळते. तरी देखील या बाजाराच्या सुरक्षेकडे नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. सुरत शिर्डी मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने यापूर्वीही अपघात झाले आहेत. त्यामुळे हा बाजार मध्यंतरी निफाड मार्केट कमिटीत स्थलांतर करण्यात आला होता. मात्र नंतर तांत्रिक कारणाने बाजार पुन्हा याच मार्गावर भरत आहे. बाजाराच्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने नगरपंचयातीकडून पांढरी सीमारेषा आखून दिली जात होती. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण कमी झाले होते. मात्र आता ही सीमारेषा आखून न दिल्याने दुपारी चारनंतर सायंकाळी सातपर्यंत दोन्ही बाजूने व्यावसायिक स्पर्धा करीत अतिक्रमण करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि अपघात घडतात.

याच मार्गावर बस स्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, निफाड जिल्हा न्यायालय, वैनतेय विद्यालय, प्राथमिक विद्या मंदिर आहे. त्यामुळे सायंकाळी पाचच्या दरम्यान शाळा सुटलेली असल्यामुळे बाजारासाठी येणाऱ्यांची गर्दी आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेय शिवाय अपघाताचा धोका संभावतो.

ऊस वाहतुकीचा धोका

सध्या ऊसतोडणी सुरू आहे. याच मार्गावरून ट्रॅकटरला दोन ट्रॉल्या जोडून व मालट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक केली जाते. बाजारात ज्या ठिकाणी गर्दी जास्त असते तिथे तीव्र उतार आहे. अतिरिक्त लोडमुळे हे ट्रॅक्टर उलण्याचा धोका आहे. यापूर्वी याच ठिकाणी उसाच्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन अपघात झाले आहे

निफाडच्या आठवडे बाजाराबाबत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य कारवाई येत्या काळात केली जाईल. तशा सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील. तसेच अतिक्रमणाची मार्किंग यापूर्वी केली असून त्याचीही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

--संगीता नांदूरकर, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट न्यूज - बागेश्री

$
0
0

अंनिसचे नोंदणी अभियान

नाशिक : १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सभासद नोंदणी अभियान राबविले जात आहे. ९ ऑगस्टला संघटनेला तीस वर्षे पूर्ण होत आहे त्यादृष्टीने हे अभियान जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये सुरू आहे. नोंदणीसाठी प्रा. सुशीलकुमार इंदवे (९४२३९२५१८८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--

मनशक्तीची रोगविषयक कार्यशाळा

नाशिक : मनशक्ती नाशिक शाखेच्या वतीने आज (९ डिसेंबर) रोगविषयक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत आजारांच मूळ, आजार होऊ नये म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

----

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

नाशिक : गरुडझेप अॅकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज (९ डिसेंबर) संभाजी स्टेडियमजवळील बुरकुले लॉन्स येथील गरुडझेप अॅकॅडमीत सकाळी १० वाजता शिब्र होईल. संस्थेचे संचालक प्रा. एस. एस. सोनवणे हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----

पसामध्ये सृजनोत्सव

नाशिक : सृजन नृत्य विद्यालय आणि साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान यांच्यातर्फे सृजनोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. आज (९ डिसेंबर) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात नाशिकच्या शिल्पा देशमुख आणि त्यांच्या विद्यार्थिनी नृत्य सादर करणार आहेत. तसेच पुण्याच्या अंजली बागल, अरविंद घोष यांच्या कवितांवर आधारित भवानी भारती ही नृत्यप्रस्तुती करणार आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सृजन विद्यालयाच्या शिल्पा देशमुख यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरला दिलासा नाहीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या संशयितांपैकी एक असलेल्या परिक्षीत औरंगाबादकर याचा सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळाला आहे. मिरजकरचा लेखापाल असलेल्या औरंगाबादकरच्या मागावर पोलिस असून, त्यास अटक झाल्यानंतर या गुन्ह्यावर नव्याने प्रकाश पडू शकतो. दरम्यान, अटकेतील संशियतांनी अद्याप कोर्टाच्या आदेशानुसार पैसे भरले नसल्याने त्यांचीही सुटका होऊ शकलेली नाही.

मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल आहे. २५ हजार ४३९ ग्रॅम सोने आणि २५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी व भारत सोनवणे यांना १५ कोटी रुपये कोर्टात भरण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आर. देशमुख यांनी ३० ऑक्टोबर रोजी दिले होते. जामीनासाठी कोर्टात अर्ज करणाऱ्या या संशयित अर्जदारांना कोर्टाने ही महत्त्वपूर्ण अट टाकली. जवळपास महिना उलटून गेला तरी संशयितांनी कोर्टात पैसे जमा केलेले नाही. त्यामुळे त्यांची सुटका झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कोर्टाचे आदेश पाळले गेले नसल्याने संशयितांना वरिष्ठ कोर्टात धाव घेता आलेली नाही.

दरम्यान, या गुन्ह्यात एक महत्त्वाची कडी असलेल्या सीए परिक्षीत औरंगाबादकर यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. औरंगाबादकर यांनी हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादकर यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले आणि आणखी काही आरोपी फरारच आहेत. संशयित आरोपी मोबाइलचा वापरच करीत नसल्याने त्यांचे लोकेशन काढणे अवघड होऊन बसले आहे. संशयित आरोपींच्या मालमत्तांचा शोध सुरू असला तरी हर्षल नाईकला अटक होणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस ९ डिसेंबर

$
0
0

वाढदिवस ९ डिसेंबर

कविता राऊत, धावपटू

राजा पाटेकर, कलाकार

दीपाली बैजू, डीजीएम, मेगाफाईन

शरद पाटील, डॉक्टर

झुंबरलाल भंडारी, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारीसह एकास अटक

$
0
0

नाशिकरोड : तलवार बाळगल्याप्रकरणी एका युवकास नाशिकरोड पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. प्रशांत अरुण वाघ (वय २८, रा. कोटमगाव) असे तलवार बाळगणाऱ्या युवकाचे नाव आहे. सिन्नर फाटा तेथे हा युवक संशयास्पदरित्या हालचाल करताना गस्तीवर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर यांना दिसून आल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पाठलाग करून पकडल्यावर याच्या कमरेला एक म्यानात ठेवलेली तलवार पोलिसांना आढळून आली. प्रशांत वाघ याच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संरक्षणाची फिटेना हौस!

$
0
0

खासगी व्यक्तींच्या संरक्षणावरून पोलिसांमध्ये असंतोष

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिरवण्यासाठी अलिशान वाहन, मोठा बंगला इतकेच अपेक्षित नसते. त्याला जोड दिली जाते ती पोलिस बॉडीगार्ड्सची! अर्थात यातील गरज आणि मिरवणे हे अंतर फारच सूक्ष्म असल्याने पोलिसांना अगदीच कामाला ठेवल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. सध्या शहर पोलिस दलात याच कारणांमुळे असंतोष असून, यात काय घडामोडी होतात याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खासगी व्यक्तीच्या पोलिस संरक्षणाबाबत सरकारने कडक धोरण जाहीर केले आहे. संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तीकडून दोन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महिन्याकाठी दीड लाख रुपये घेतले जातात. नाशिकमध्येही असे काही 'रत्न' आहेत. मात्र, पद आणि प्रतिष्ठा वापरून चक्क पोलिसांनाच पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर येतो आहे. यावरून पोलिस दलात बरीच खडाखडी सुरू आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीसह इतरांची सुरक्षाही कमी केली आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, गरज आणि मिरवणे यात फरक असून, पोलिसांचा वापर मिरवण्यासाठी होऊ देणे योग्य वाटत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. अगदी करोडपती व्यक्तीही संरक्षणासाठी आकारण्यात येणारे शुल्क अदा करीत नाही. बऱ्याचदा बळजबरीने पैसे काढावे लागतात. बॉडीगार्ड पुरविण्याचा निर्णय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कमिटी घेते. या कमिटीने नकार दिल्यानंतर काही 'उद्योगपतींनी' थेट गृहराज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून बंद केलेली सुविधा परत मिळवली. यामुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे. आपल्या हितसंबंधाचा वापर करून शहरासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्तीच पोलिसांचा गैरवापर करू लागले, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न खुद्द पोलिसांकडून उपस्थित होऊ लागला आहे. अनेकदा बॉडीगार्ड्स म्हणून दिलेल्या पोलिसांना परजिल्ह्यात नेण्यात येते. या संरक्षणाचा वापर करून काही काळे धंदे करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला. मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात येते आहे.

...

दोघांनाच कायेदशीर संरक्षण

शहर पोलिसांतर्फे सध्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे आणि जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात येते. मात्र, हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित खासगी व्यक्तींबाबत पैशांची आणि पोलिसांच्या संरक्षणाच्या गैरवापराची ओरड जोरदार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा’ जातप्रमाणपत्र मिळणार सेतू कार्यालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आता जातीच्या आणि जात वैधता प्रमाणपत्राचा नमुना देखील शुक्रवारच्या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सेतू कार्यालये आणि महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातून अन्य दाखल्याप्रमाणेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या आरक्षणाद्वारे मिळणारे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला (एसबीसी) जातीचा दाखला अनिवार्य असणार आहे. हा दाखला मिळविण्यासाठीचा अर्जाचा नमुना आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या अर्जाचा नमूना सरकारने तयार केला असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णयाद्वारे तो उपलब्ध करून दिला आहे. सचिव दिनेश वाघमारे यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांना निर्गमित केले आहेत.

हे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सेतू आणि महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातूनच या दाखल्यांचे वितरण करावे लागेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. परंतु त्यासाठी संबंधित सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करणे अनिवार्य ठरणार आहे. आरक्षणाचा लाभ दिला जाणाऱ्या प्रत्येक जातीसाठी विशिष्ठ क्रमांक देण्यात आला आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी एक क्रमांक निश्चित करावा लागेल. तो क्रमांक सेतू तसेच महाऑनलाइन केंद्रांच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केल्यानंतरच प्रत्यक्ष दाखले वितरण करणे शक्य होऊ शकेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका होता पक्षीमित्र : बिश्वरूप राहा!

$
0
0

कुठलेही सामाजिक कार्य पुढे जाते ते प्रबोधनात्मक, रचनात्मक व संघर्षात्मक या तीन अंगांनी. थोडीच लोक अशी असतात जी याचा सर्वसमावेशक उपयोग करतात. राहा सरांनी या तिन्ही अंगांचा उपयोग तर केलाच; पण त्याला संशोधनाची जोडीही दिली.

अजित बर्जे, नाशिक रोड

Top of the World...! कुठल्याही मित्राने कधीही फोन केला व हाऊ आर यू असे विचारले. की विशिष्ट लकबीत हमखास मिळणारे हे उत्तर ठरलेले. मित्रांसमवेत दिलखुलास रमणारा हा अवलिया निसर्गाचा विषय आला, की मात्र गंभीर होत परिचितांबरोबरच कुठल्याही उच्चपदस्थाला पर्यावरणाच्या दुर्गतीविषयी खडे बोल सुनवायला मागे- पुढे पाहायचा नाही. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांपासून ते देश पातळीवरील पर्यावरण क्षेत्राशी निगडित, नावाजलेल्या संस्था, संघटना व व्यक्तींना बिश्वरूप राहा माहिती नसतील असे विरळच. अशा या निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या व त्याच्या रक्षणासाठी झपाटलेपणापासून कार्य करणाऱ्या व्यक्तीचे अकाली जग सोडून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.

मित्र परिवारामध्ये 'शाँखो' नावाने परिचित असलेले हे उमदे व्यक्तिमत्त्व वयाच्या साठीतही शाळेतल्या सवंगड्यांशी ऋणानुबंध जपून होते. स्वत: अतिशय निर्मळ मनाचे असल्याने नवख्या व्यक्तीवरही चटकन विश्वास टाकून त्याला आपलेसे करून घ्यायचे. मनस्वी व दिलदार असलेला हा माणूस मुळातच साहसी व उत्साही असल्यामुळे स्वच्छंदपणे जगला. शालेय जीवन मुंबईत तर महाविद्यालयीन शिक्षण मदुराईत झाले. मसाल्याच्या बांगा असलेल्या मित्रांमुळे तमिळनाडूतील जंगलात फिरताना निसर्गाची ओळख झाली व पुढे नोकरीनिमित्त पुन्हा मुंबईत आल्यावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या रूपाने बहरली. पुढे ट्रेकिंगची आवड जोपासताना त्याला फोटोग्राफीचीही जोड मिळाली. स्वभावत:च कुठलीही गोष्ट मनापासून करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे निसर्गछायाचित्रणाला जी चिकाटी व सहनशीलता लागते, त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले व त्याचा प्रत्यय काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने आले.

कालांतराने वडिलांच्या व्यावसायिक निवृत्तीनंतर त्यांनी नाशिकला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला व राहा सरांना त्या रूपाने एक वेगळे विश्व खुले झाले. टेक्स्टाइल व स्पेशालिटी फॅब्रिकशी संबंधित विविध व्यवसाय-नोकरी करताना त्यांनी नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वत:चा उद्योग सुरू केला. त्यातही पुढे ठराविक उत्पादनाची नियमित मागणी सुरू झाल्यामुळे उद्योगाचे दैनंदिन कामकाज आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपवून नाशिक जिल्हा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात झाली. अल्पावधीतच काही समविचारी मित्रांबरोबर त्यांनी एका अनौपचारिक निसर्गगटाची स्थापना केली. पुढे निसर्गकार्याला ठोस स्वरूप देण्याची गरज लक्षात आल्यावर नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या नावाची संस्था २००२ मध्ये रीतसर स्थापन केली गेली, ज्याचे ते संस्थापक अध्यक्ष झाले. त्यातून त्यांच्या कार्याची पट विस्तारला व पुढे त्यांचा नियमितपणे बीएनएचएस, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, वर्ल्डवाइड फंड-नेचर, सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री आदी संस्थांशी निकटचा संबंध प्रस्थापित झाला. मध्यंतरी त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत त्यांना सरकारतर्फे नाशिक जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षकपद देण्यात आले, जे पुढे त्यांनी प्रभावीपणे वीस वर्षे सांभाळले.

यात दरम्यान साधारण २००२-२००३ मध्ये माझा त्यांच्याशी परिचय झाला. आजसारखे त्या वेळी नांदूरमध्यमेश्वर, काही मोजके पक्षी मित्र व निरीक्षक वगळता, फारसे परिचित नव्हते. सर्वसामान्यांना त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने वन विभागाला त्यावर एक माहितीपत्रक प्रसिद्ध करायचे होते. त्या माहितीपत्रकामध्ये लागणारी छायाचित्रे राहा यांच्याकडून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना भेटायला सांगितले. त्या निमित्ताने त्यांची झालेली ओळख केवळ माझी निसर्ग जागरूकता वाढण्यात झाली असे नाही, तर पुढे निसर्ग-पर्यावरणाची कारवी रिसोर्स लायब्ररी सुरू करण्याची प्रेरणाही काहीअंशी त्यातून आम्हाला मिळाली. पुढे संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी लागणाऱ्या छपाईच्या निमित्ताने नियमित भेट घडत गेली. त्या वेळी डिजिटल फोटोग्राफीचा उदय झाला नव्हता. छपाईच्या कामासाठी राहा सरांनी काढलेल्या फोटोंच्या ट्रान्स्परन्सी वापरून आम्ही काम करत असू. त्यांच्या फोटोंचा साठा एवढा प्रचंड होता, की आम्ही त्यांच्या कारखान्यात तासन् तास प्रोजेक्टरद्वारे त्यातून योग्य छायाचित्र निवडण्यासाठी घालवायचो. त्यातूनच पुढे त्यांनी घेतलेल्या छायाचित्रांचे विषयाप्रमाणे वर्गीकरण करून ठेवण्याचे काम हातात घेण्याचे आम्ही ठरविले व अवांतर वेळ मिळेल तेव्हा आम्ही ते सुरूही केले; पण त्याचा आवाका बघता एका मर्यादेपुढे ते काम पुढे सरकलेच नाही. त्या स्लाइड्सवरून आम्ही इतर अनेक गोष्टींबरोबरच पाणथळ व गवतीमाळ पक्ष्यांवर दोन कॅलेंडरही प्रसिद्ध केली. पुढे डिजिटल तंत्रज्ञान आल्यावर काम सोपे होत गेले. त्यातूनच पुढे नाशिकमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांवर समग्र पुस्तक करण्याची कल्पना पुढे आली व आठवड्यातले तीन दिवस असे सलग दोन-अडीच वर्षाच्या प्रयत्नातून नाशिक डिस्ट्रिक्ट हे पुस्तक तयार झाले.

कुठलेही सामाजिक कार्य पुढे जाते ते प्रबोधनात्मक, रचनात्मक व संघर्षात्मक या तीन अंगांनी. थोडीच लोक अशी असतात जी याचा सर्वसमावेशक उपयोग करतात. राहा सरांनी या तिन्ही अंगांचा उपयोग तर केलाच; पण त्याला संशोधनाची जोडही दिली. त्यांनी सहकाऱ्यांबरोबर केलेल्या प्रारंभिक कामाची दखल घेत 'बीएनएचएस'नी त्यांना नाशिकबरोबरच महाराष्ट्रातील प्रमुख पक्षीस्थळांच्या निश्चिती करण्यासाठी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम दिले. त्यानंतर वन खात्याबरोबरच अन्य संस्थांच्या सहकाऱ्याने मनुष्यवस्तीजवळ राहणाऱ्या लांडग्यांचा अभ्यास, माळढोक, तणमोर, पांढऱ्या चोचीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड, बर्ड रिंगिंग गवतीमाळ पक्ष्यांचे जीवनचक्र या व अशा अन्य प्रकल्पांवर त्यांनी सतत काम केले. सततच्या जंगल भटकंतीतून, तीक्ष्ण निरीक्षणातून त्यांनी नाशिक जिल्ह्यात कधीही नोंद न झालेल्या पिवळ्या गळ्याचा भारीट, रानपिंगळा, पुना स्किंक सापसुरळी अशा अनेक दुर्मिळ प्रजातींची नोंद पुराव्यानिशी दिली. त्यांच्या कार्याचा मेरूमणी म्हणता येईल, असे कार्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम संयुक्तरीत्या उभे राहिलेले ३५० हेक्टर क्षेत्रफळ असलेले बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्र स्थानिक प्रजातीची दीड लाखाहून अधिक झाडं केवळ लावली नाही तर जगवलीदेखील. सुरुवातीची काही वर्षे पाण्याची सोय नसताना उन्हाळ्यात त्यांच्या जीपमध्ये पाण्याचे ड्रम भरून स्वत: झाडांना पाणी द्यायला ते जायचे. बोरगडच्या पायथ्याशी असलेल्या तुंगलदरा गावाला आज ते जंगल विविध अंगाने उपयोगी पडत आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांचा अधिवास असलेल्या अंजनेरी क्षेत्राला राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

ग्रामीण भागात गलोलने पक्षी मारणे ही सर्वसाधारण बाब, पण त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेता त्याला पायबंद घालणे गरजेचे होते. ग्रामस्थांशी व मुलांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधून त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण आणण्यात संस्थेला यश आले आहे. जनप्रबोधनासाठी ते निसर्ग चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा, सायकल रॅली, परिसंवाद, नेचर कॅम्प, स्थळभेटी यांसारखे अनेक उपक्रम सातत्याने राबवत होते. शहरी शाळांच्या नेचर क्लबच्या वर्गणीतून ग्रामीण भागातील मुलांसाठी संपूर्णत: मोफत स्थळभेटीचे आयोजन, विविध उद्योगांच्या आर्थिक व कृतिशील सहभागातून ग्रामीण भागात जनजागृतीसाठी उपक्रम राबवणे नित्यनेमाने चालू असायचे. ते गेल्यानंतर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांच्या आलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या होत्या. पक्ष्यांचं पर्यावरणातलं महत्त्व लोकांना समजावं व त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा, यासाठी कायमस्वरूपी केंद्र उभारण्याची कल्पना त्यांना सुचली. गंगापूर धरण परिसरातील त्यांच्या खासगी जागेत केवळ दोन महिन्यात विहंग पक्षी परिचय केंद्र योजनेचे स्वरूप ठरविण्याआधीच त्यांनी वन्यजीव सप्ताह व गांधी जयंतीचा २ ऑक्टोबर हा मुहूर्त उद्घाटनासाठी लगोलग घोषित केल्यामुळे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी एका बाजूला त्यांनी व मी त्याच्या मांडणीसाठी व दुसरीकडे वास्तुरचनाकार व त्यांच्या चमूने दिवस-रात्र एक केले. त्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकला मिळालेल्या नाशिककरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मिळालेली दाद हुरूप देणारी ठरली. यामुळे विहंग नाशिककरांपर्यंत पोहोचले.

केवळ विरोधासाठी विरोध असा त्यांचा विकासकामांना आक्षेप कधीच नव्हता; पण तो एकांगी होऊ नये याबाबत ते दक्ष असायचे. स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या गंगापूर धरण परिसरातील बोट क्लबला त्यांनी त्यासाठीच विरोध केला होता. कैकवेळा नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यापेक्षा गंगापूर धरणावर फ्लेमिंगो पक्षी अधिक संख्येने असत. त्याबरोबरच तुलनेने संख्या कमी असली तरी पक्ष्यांच्या प्रजातींचे वैविध्य धरण परिसरातील गवतीमाळ प्रदेशामुळेही समृद्ध होते. त्याचा बचाव व्हावा ही त्यांची त्यामागे तळमळ होती; पण पुढे तो प्रकल्प होणार हे निश्चित झाल्यावर स्पीड बोटऐवजी पॅडल बोट असाव्यात, यासाठी ते आग्रही होते. त्याच्या उद्घाटनाच्या ाकार्यक्रमाला जरी ते उपस्थित होते तरी मंचावर उपस्थित राहण्याची विनंती होऊनही निषेध म्हणून ते व्यासपीठावर गेले नाहीत.

जंगलातील अवैध वृक्षतोड असो, गाळ काढण्याच्या नावाखाली धरण परिसरातील बेकायदा मुरूम उत्खनन असो, अवैधरीत्या बाळगलेले पक्षी-प्राणी असो वा इतरही अनेक गोष्टी, आपली व वन्यजीव संरक्षकपदाची जबाबदारी दिवसाच्या कुठलाही प्रहर असो, त्यांनी असोशीने पाळली. रात्री-बेरात्री लागणाऱ्या वणव्यांबरोबरच पर्यावरणाच्या अनेक प्रश्नांवर स्थानिक गावकरी, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वयकाची भूमिका ते समर्थपणे निभावत. ज्या दिवशी त्यांना पक्षाघाताचा झटका आला, त्याच दिवशी दोन तास अगोदर ते जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटले होते. अंजनेरी राखीव क्षेत्रात होऊ घातलेल्या हेलिकॉप्टर राइडच्या व्यवसायिक उपक्रमाचा लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांच्या अधिवासावर होऊ शकणाऱ्या आघाताचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी ती भेट होती.

आजारपणाच्या काळात तब्येतीत चढ-उतार होत असताना पक्षाघाताची तीव्रता जाणून घेण्याची चाचणी म्हणून डॉक्टरांनी त्यांना पक्ष्यांची शास्त्रीय नावे विचारली तेव्हा त्यांच्या अचूक उत्तराने डॉक्टरही अचंबित झाले होते. 'पक्ष्यांनी आज त्यांचा सच्चा मित्र गमावला' ही गिरीश टकले यांची राहा सरांबद्दलची प्रतिक्रिया अधिक बोलकी ठरते. हिमालयाच्या शिखररांगेतील एक असलेल्या पुमोरी शिखराच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले होते. शेरपा भाषेत त्याचा अर्थ होतो 'डोंगरकन्या'. अशा या डोंगराएवढ्या विशाल मनाच्या माणसाची स्मृती वटवृक्षाच्या रोपट्याच्या रूपाने बोरगडच्या पायथ्याशी जरी सांकेतिक रूपाने जपली असली तरी त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी परिस्थितीचा अहवाल लवकरच सादर करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून दुष्काळ निवारणासाठी लवकरात लवकर केंद्राकडे अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पथकाने गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये दिली.

राज्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये आले होते. मालेगाव येथील जळगाव (निं.) आणि मेहुणे या गावातील दुष्काळ परस्थितीची पाहणी करून आलेल्या पथकासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री ओझर विमानतळावर चर्चा केली. यावेळी केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, सहसचिव छावी झा, संचालक ए. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या घरफोड्यांत ‘एमपी’तील गँगचा हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवसभर टेहळणी करून रात्री सिन्नर शहरात घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेश राज्यातील टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. संशयितांनी सिन्नर शहरात बांधकाम साईटवर काम करीत असताना सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली.

ठाकूर उर्फ कालू हारू मण्डलोई (२३, रा. सिंगाचोरी, जि. धार) आणि करमसिंग कालू भुरिया (३२, रा. गुरडीया, जि. धार) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथिदार मुन्ना हरी सिंग, अजयसिंग व करणसिंग (रा. सर्व सिंगाचोरी, जि. धार) हे फरार आहेत. सिन्नर शहरात मागील काही दिवसात सातत्याने घरफोडी सुरू होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या चोरांची चोरीची पद्धत लक्षात घेतली. त्यानुसार चोरटे परप्रांतातील असल्याचा निष्कर्ष काढला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून तपास करणारे पोलिस पथक मध्य प्रदेश येथे रवाना झाले. या पथकाने सिंगाचोरी गावात मजुरांच्या वेशात तीन दिवस तळ ठोकून दोघा संशयितांना पकडले. या दोघांनी फरार संशयितांच्या मदतीने सिन्नर शहरातील सरदवाडीरोड, शिवाजीनगर, पांडवनगरी, गाडे मळा व उद्योगभवन आदी भागात सहा घरफोड्या केल्या होत्या. सिन्नर येथे नव्याने सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामावर काम मिळवून ही टोळी दिवसभर बंद घराची टेहळणी करायची आणि रात्री घरफोड्या करून पसार होत असे.

घरफोडीनंतर संशयिताची टोळी हायवेवर पोहचायची. तेथे मध्य प्रदेशात रजिस्टर असलेल्या वाहनास थांबवून शिर्डीमार्गे पसार व्हायचे. संशयितांच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. ही कारवाई निरीक्षक करपे यांच्या मार्गदर्शनाखीली सहाय्यक निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार दिलीप घुले, हेमंत गिलबिले, संदिप लगड, प्रदिप बहिरम आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तात्या टोपेंच्या स्मारकासाठी निविदा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तालुक्यातील बाभूळभाव (बु) येथे होणारे स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत हे स्मारक साकारले जाणार आहे. ९ कोटी ४३ लाख ८४ हजार ४७ रुपये खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी येवला नगर परिषदेने जाहीर निविदा प्रसिद्ध केली आहे. ४ जानेवारीला ही निविदा उघडल्यानंतर या स्मारकाचे काम कंत्राटदाराला दिले जाणार आहे. केंद्राने या स्मारकासाठी १९ जुलै २०१६ रोजी निधी दिला होता. पण, दीड वर्षांत हे काम सुरू झाले नाही. आता राज्य शासनाचे पंधार टक्के व नगर पालिकेच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. बाभूळगाव शिवारातील सर्व्हे नंबर ४९,५० मध्ये हे स्मारक ३ .५० हेक्टरमध्ये बांधले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील ठाणगावपासून अवघे पाच किलोमीटर अंतरावरील घुटेवाडी येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने शेळीचा फडशा पाडला.

शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.

गोटेवाडी येथे गट नंबर २७४ मध्ये लक्ष्मण बहीरू मंडोळे कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घराशेजारीच जनावरांसाठी गोठा बांधलेला आहे. पहाटे चारच्या सुमारास गोठ्यातील जनावरांचा हंबरण्याचा आवाज आल्याने सर्व कुटुंब बाहेर आले. ते गोठ्याकडे जाताच गोठ्यातून बिबट्याने धूम ठोकली. मात्र तोपर्यंत बिबट्याने हल्ल्यात शेळीचा फडशा पाडला होता. मंडोळे कुटुंबासह नागरिकांनी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे. वनविभागाने प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हातगड किल्लेदारांचे वंशज आज सादर करणार शोध निबंध

$
0
0

हातगड किल्लेदारांचे वंशज

सादर करणार शोध निबंध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इतिहास संशोधन मंडळातर्फे रविवारी, ९ डिसेंबरला सकाळी १०.१५ वाजता आनंद क्लासेस, किंगफिशर सभागृह, निलमय हाइट, जुनी पंडित कॉलनी गंगापूर रोड नाशिक येथे इतिहास, पुरातत्त्व व त्या अनुषंगाने येणारे विषयांवर शोध निबंध वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हातगडचे किल्लेदार गंगाजी गोबाजी मोरे-देशमुख यांचे तेरावे वंशज मनोहर मोरे-देशमुख हातगड, मोरे घराणे व त्यांच्याकडील ताम्रपटांविषयी माहिती देणार आहेत. वाचन कार्यक्रमात मोरेंसह चारजण शोध निबंध वाचन करणार आहेत. यात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. जी. बी. शहा हे 'माधवराव पेशवे व सिंहस्थ कुंभमेळा', हस्तलिखित तज्ज्ञ अनिता जोशी या 'नाशिकमधील आतुर संन्याय' तर रमेश पडवळ 'शोध निफाडचा' या विषयावर शोध निबंध सादर करणार आहेत. यावेळी नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गिरीष टकले व ज्येष्ठ सल्लागार इतिहास अभ्यासक डॉ. व्ही. पी. बिरार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रॉस वोटिंग’ची भीती

$
0
0

नवखे उमेदवार चिंतेत

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चन्ट बँकेच्या २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रंगत वाढली असून, दुसरीकडे सभासदांचा गोंधळ वाढला आहे. या निवडणुकीत तीन पॅनल असल्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणत्याही एकाच पॅनलला एकतर्फी मते मिळतील, असे चित्र तूर्त नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या क्रॉस वोटिंगचा फटका नवख्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

सुमारे एक लाख ७६ हजार मतदान असलेल्या या निवडणुकीत सर्वाधिक मते ही नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या उमेदवारांमध्येही बहुतांश परिचीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जात, पक्ष, स्थानिक उमेदवार यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सभासदांची मते विभागली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोहनलाल भंडारी, वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल रिंगणात आहे. या पॅनलमध्ये ७५ टक्के उमेदवार हे माजी संचालक आहेत. या पॅनलच्या विरोधात भास्करराव कोठावदे, गजानन शेलार, अजय ब्रह्मेचा, ललित मोदी यांनी सहकार पॅनल उभे केले आहे. यातील उमेदवार सहकार क्षेत्रात काम करणारे आहे. अजित बागमार यांचे नम्रता पॅनल या रणधुमाळीत आहे. पण, यातील बरेच उमेदवार नामको निवडणुकीसाठी नवखे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत प्रगती व सहकार या दोन पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नम्रता पॅनलचे काही उमेदवारही या दोन्ही पॅनलमध्ये आपले बळ राखून आहे.

...

सभासदांचे पॅनल

निवडणुकीला वेळ असला तरी सर्वच उमेदवार परिचीत असल्यामुळे सभासदांनी आपले पॅनल तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. या क्रॉस वोटिंगमध्ये दोन पॅनललला अर्धे, अर्धे तर एका पॅनलचा एक असा फॉर्म्युलाही काही सभासदांनी तयार केला आहे. काही सभासदांनी पॅनलपेक्षा आपल्या जवळचे उमेदवार निवडले आहेत.

...

सहकाराच्या जाणकारांना स्थान

एकीकडे जात, पक्ष व स्थानिक उमेदवारांना बघून मतदान होणार असले तरी काही सभासदांनी मात्र बँकेत कोण चांगले काम करू शकतो, बँकेविषयी किती ज्ञान आहे, किती अनुभव आहे, हे निकष तयार करून त्याच उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

...

प्रचाराची रणधुमाळी

गेल्या काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी वाढली असून, प्रत्येक पॅनल आपल्या परीने सभासदांपर्यंत पोहचण्याचे काम करीत आहे. काहींनी गटागटाने, तर काहींनी वैयक्तिक संपर्कावर भर दिला आहे. कार्यालयाचे उद्घाटन, रॅली, बैठका यावर जोर दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवशाही’ पुन्हा घसरली

$
0
0

चांदोरीजवळ पिकअपला धडक; तीन जखमी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

औरंगाबाद डेपोची शिवशाही बसने पिकअप व्हॅनला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात व्हॅनमधील तीन प्रवासी जखमी झाले. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींवर चांदोरी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी हा अपघात झाला.

औरंगाबाद-नाशिक ही शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ०५१७) निफाड येथील थांबा घेऊन नाशिकच्या दिशेने निघाली. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास चांदोरीजवळ निफाडहून नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकअप (एमएच १६ क्यू ४२८०)ला शिवशाहीने पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे पिकअप रस्त्याच्या बाजूला उलटली. या व्हॅनमध्ये श्रीराम सिटी फायनान्सच्या दुचाकी होत्या. त्यामुळे या दुचाकींचेही नुकसान झाले. तर शिवशाही दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात घसरली. पिकअपमध्ये बसलेले रावसाहेब टर्ले, किरण मोगल, किरण चव्हाण (रा. कोठुरे) हे जखमी झाले असून, त्यांना चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सागर गडाख व मित्रपरिवाराने चांदोरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही.

वाहक-चालक पोलिसात, प्रवासी वाऱ्यावर

या अपघातात पिकअप व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. शिवशाही बसचाही पत्रा कापला गेला. अपघात झाल्यानंतर बसचे चालक व वाहक यांनी सायखेडा पोलिस स्टेशन गाठून तिथे अपघात झाल्याचा प्रकार सांगितला. बसमधील प्रवासी आपापल्या सोयीने दुसऱ्या वाहनाने नाशिककडे रवाना झाले.

अधिक तपास सायखेडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक अंबादास मोरे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिपालीनगरला चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र पल्सरस्वारांनी ओरबाडून नेले. ही घटना दिपालीनगर भागात घडली असून, या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आशा दत्तात्रेय शिंदे (५८, रा. हरिओम बंगला, दिपालीनगर) यांनी या घटनेबाबत तक्रार दिली. गुरुवारी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शिंदे यांच्या बंगल्यासमोरच पल्सरवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

चार मोलकरणींवर गुन्हा

घरकाम करणाऱ्या चार मोलकरणींनी घर मालकीनीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पाइपलाइनरोड भागात घडली असून, चोरीत रोकड व दागिने असा सुमारे साडे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाला आहे. माया विष्णू निगोचकर, राणीबाई भगवान वाकळे (रा. दोघी प्रबुद्धनगर, सातपूर), सविता गणेश खरात (रा. संत कबीरनगर) व तृप्ती महेंद्र वानखेडे (रा. आनंदवल्ली शिवार, गंगापूररोड) अशी संशयित महिलांची नावे आहेत. पाइपलाइनरोडवरील मेनलो पार्कमध्ये राहणाऱ्या लिना पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पाटील यांच्याकडे घरकाम करण्यासाठी येणाऱ्या या महिलांपैकी एकीने १६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर ही चोरी केली. अज्ञात महिलेने पाटील यांच्या व त्यांच्या आईच्या बेडरूममधून ६५ हजाराची रोकड आणि सुमारे चार लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने असा पाच लाख ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कंडारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवलेंच्या धक्काबुकीच्यानिषेधार्थ रेलरोक आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

कल्याणजवळील अंबरनाथ येथे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना समाजकंटकाने धक्काबुकी केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना शनिवारी रात्री अंबरनाथ येथे एका व्यक्तीने धक्काबुकी केली. या घटनेचे पडसाद नाशिकसह राज्याच्या विविध भागात उमटले. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रविवारी नाशिकरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणाबाजी करीत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यानंतर सर्व कार्यकर्ते नाशिकरोड रेल्वे स्थानकात गेले. भुसावळ-मुंबई पॅसेजरसमोर उभे राहून घोषणाबाजी करीत रेलरोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, जिल्हा संपर्कप्रमुख सुनील वाघ, नगरसेविका दीक्षा लोंढे, समीर शेख, भारत निकम, अमोल पगारे, पवन क्षीरसागर आदी उपस्थित होते. रेल्वे व बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिकरोड पोलिस, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images