Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भिडे गुरुजींना जामीन

$
0
0

कोर्टापुढे लावली हजेरी; पुढील सुनावणींना हजर राहण्याची अट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माझ्या शेतातील आंबा खाल्याने मुलगाच होतो, असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्ट कारवाईस समोरे जावे लागणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे अखेर आज शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर झाले. यापुढील प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याच्या अटीवर कोर्टाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी. पांडे यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. साधारणत: तीन ते चार महिन्यांपासून या प्रकरणाची नियमीत सुनावणी सुरू असली तरी भिडे गुरुजी हजर झाले नव्हते. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहाटेच्या सुमारास भिडे गुरूजी आपल्या फौजफाट्यासह शहरात दाखल झाले. साधारणत: ११ वाजेच्या दरम्यान गुरुजी धारकऱ्यांसह कोर्टात पोहोचले. सरकारी पक्षातर्फे बाजू मांडताना अ‍ॅड. आर. वाय. जाधव यांनी भिडे गुरुजी यांनी मांडलेली भूमिका शासन व मुलींविरूध्द असल्याचे स्पष्ट केले. 'बेटी बचाव बेटी पढाव' या अभियानालाच विरोध वक्तव्य भिडे यांनी केले असून, त्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन यामुळे झाले असून, त्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याची भूमिका अॅड. जाधव यांनी मांडली. बचाव पक्षातर्फे अॅड. अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला. संभाजी भिडे यांचा सरकारच्या कोणत्याही अभियानास व धोरणास विरोध करण्याचा उद्देश नव्हता. प्रथमदर्शनी त्यांच्याकडून कोणताही गुन्हा झाल्याचे निदर्शनास येत नाही. या खटल्याशी संबंधित पुरावे यापूर्वीच कोर्टात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भिडे गुरूजी या पुराव्यांबाबत ढवळाढवळ करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या वयाचा विचार करताना त्यांना जामीन मंजूर करण्याची विनंती अॅड. भिडे यांनी कोर्टाकडे केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने भिडे यांना जामीन मंजूर केला. यापुढे होणाऱ्या सुनावणीदरम्यान कोर्ट देईल त्या आदेशावेळी हजर राहण्याचे फर्मान कोर्टाने दिले. दरम्यान, संभाजी भिडे यांना सुनावणीवेळी हजर राहण्याबाबत सूट मिळावी, अशी विनंती बचाव पक्षाने कोर्टाकडे केली असून, त्यावर १४ तारखेच्या सुनावणीवेळी निर्णय होऊ शकतो, असे अॅड. भिडे यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांना टाळले!

कोर्टातील सुनावणी पूर्ण होताच भिडे गुरुजी यांनी अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्या चेंबरमध्ये जाऊन चर्चा केली. यानंतर पोलिस संरक्षणात ते सांगलीकडे रवाना झाले. कोर्टातील धारकऱ्यांची गर्दी आणि भिडे गुरूजी यांना होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता पोलिसांनी कोर्टात चोख बंदोबस्त तैनात केला होता. कोरेगाव भीमा तसेच नाशिकमधील त्या वक्तव्या प्रकरणी भिडे यांचे मत जाणून घेण्याचा सर्वच माध्यमप्रतिनिधींनी प्रयत्न केला. मखमलाबाद नाक्यावरील राजपाल नगर येथे आणि कोर्टातही भिडे यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेल्या शेकडो धारकऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना विरोध केला. कोर्टात हा वाद वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत सर्व धारकऱ्यांना बाहेर काढले.

काय आहे प्रकरण?

पंचवटीत १० जून २०१८ रोजी झालेल्या एका सभेत मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी यांनी माझ्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच जन्माला येतात, असे विधान केले होते. याबाबत 'लेक लाडकी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या पुणे येथील अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, हे प्रकरण महापालिकेकडे आले. महापालिकेच्या एका समितीने केलेल्या चौकशीनुसार कोर्टात खटला दाखल करण्यात आला. या खटल्यास भिडे यांनी हरकत घेतली. मात्र, दोन दिवसांपूर्वी जिल्हा कोर्टाने ही हरकत फेटाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राऊत म्हणतात, युती नाहीच!

$
0
0

शिवसेना स्वबळावरच लढणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या अयोध्या वारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळकीमुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युती होईल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी युतीच्या चर्चा फेटाळून लावत शिवसेना स्वबळावर ठाम असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगतानाच, महाराष्ट्रात राजकीय बदल होवून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावाही राऊत यांनी केला आहे. बॉडीगार्ड घेवून केंद्रीय पथकाला दुष्काळाची पाहणी करावे लागणे दुर्दैवी असल्याचे सांगत दुष्काळाच्या गंभीर विषयाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युतीचे वृत्त फेटाळले. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलणारे भाजपचे नेते हे शिवसेनेचे प्रवक्ते नसून, त्यांची युती व्हावी अशी इच्छा आहे, तर सन २०१४ मध्ये त्यांची इच्छा कुठे होती, असा सवाल राऊत यांनी केला. सन २०१४ आणि २०१९ मध्ये असा काय बदल झाला आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात आम्ही सत्तेत असून, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले म्हणजे युती होईल असा त्याचा अर्थ नाही. शरद पवार यांच्यासोबतही उद्धव ठाकरे व्यासपीठावर असतात. त्यामुळे राजकीय लढाई आम्हीच लढतच असून, काही वेळा एकत्र ढोल वाजता वाजता फुटतोही, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे. उद्धव ठाकरे येत्या २८ डिसेंबरपासून राज्यात दौरे सुरू करणार आहेत. दुष्काळी पाहणी करण्यासोबतच उद्धव ठाकरेंची जानेवारी महिन्यात नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. सोबतच गोदावरी नदीवर शरयू नदीच्या धर्तीवर राम मंदिरासंदर्भात कार्यक्रम करण्याची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दैवी संचाराने दुष्काळाचे निवारण!

गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये दैवीसंचार असल्याचे केलेले वक्तव्य हे अधंश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने अंनिसने या वक्तव्याचा अभ्यास करावा. मुख्यमंत्र्यांच्या अंगात दैवी संचार असेल तर त्यांचा वापर दुष्काळ निवारणासाठी करावा, असा टोलाही राऊत यांनी लगावला. महाजन यांच्या गावातच पंधरा दिवसांनी पाणी येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाजपच्या पक्ष कार्यालयात बसवून राज्यातील सर्व प्रश्न दैवी संचाराने मिटवावेत, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानभरपाईसाठ आठ तास टॉवरवर

$
0
0

धर्मा पाटलांच्या मुलाचे पुन्हा आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने आणि याप्रकरणातील दोषींवर अद्यापर्यत कोणतीही कारवाई न झाल्याने धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र याने विखरण गावातील मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. रात्री आठ वाजता शिंदखेड्याचे तहसीलदार उल्हास देवरे यांनी लेखी आश्वसन दिल्यानंतर नरेंद खाली उतरले. नरेंद पाटील तब्बल आठ तास टॉवरवर होते.

धर्मा पाटील यांची जमीन विखरण गावाच्या शिवारात वीज प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने शासनानेकडे दाद मागण्यात आली. परंतु शासनाने याकडे दुलक्ष केल्याने धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने २२ जानेवारी २०१८ रोजी मंत्रालयात विषप्राशन केले होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असतांना २८ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. पाटील यांच्या मृत्यूनंतर मध्यस्थी करून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. मात्र ते फोल ठरले असून या तीनही मंत्र्यांवर कारवाई करून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते.

..तर मुख्यमंत्री जबाबदार

नरेंद्र पाटील यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी विखरण गावातील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत काढून देखील नरेंद्र आपल्या मागण्यावर ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आत्महत्या करणार आणि याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजींना जामीन

$
0
0

नाशिक : माझ्या शेतातील आंबा खाल्याने मुलगाच होतो, असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्ट कारवाईस समोरे जावे लागणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे अखेर आज शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर झाले. यापुढील प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याच्या अटीवर कोर्टाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

सविस्तर वृत्त...३

धारकऱ्यांचा वेढा...३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या करणाऱ्यांत प्रौढ शेतकरी सर्वाधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सर्वाधिक आत्महत्या प्रौढ शेतकऱ्यांनीच केल्या आहेत. ४० ते ४९ या वयोगटातील ३१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून आत्महत्या करणारे ३० शेतकरी ३० ते ३९ या वयोगटातील आहेत. २० ते ४९ या वयोगटातील तब्बल ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असून अशा घटनांमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखणे हे सरकारसह जिल्हा प्रशासनापुढे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. विशेष म्हणजे चालू वर्षात जिल्ह्यात १७ वर्षांच्या युवकासह ७५ वर्षांच्या आजोबांपर्यंत विविध वयोगटातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तिींनी आत्महत्या केली आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ शेतकरी ४० ते ४९ या वयोगटातील आहेत. ३० ते ३९ वयोगटातील ३० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्याखालोखाल २१ ते २९ वयोगटातील १६ तसेच ५० ते ५९ या वयोगटातील १५ आणि ६० ते ६९ या वयोगटातील सहा तर ७० हून अधिक वयोगटातील तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या करणारे दोघेजण २० पेक्षाही कमी वयाचे आहेत.

५४ शेतकरी मदतीस अपात्र

शेतकरी आत्महत्यांच्या १०३ पैकी सुमारे निम्म्या घटनांमध्ये शेतकरी कुटुंब मदतीस अपात्र ठरले आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी, बँकांचा तगादा आणि तत्सम कारणांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते. परंतु, ५४ शेतकरी कुटुंबांना ही मदत नाकारण्यात आली आहे. ३४ शेतकरी कुटुंब मदतीस पात्र ठरले असून १५ प्रकरणांवर अद्या निर्णय होऊ शकलेला नाही.

..

तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या

तालुका शेतकरी आत्महत्या

बागलाण १९

दिंडोरी १६

मालेगाव १६

निफाड १४

नांदगाव १०

सिन्नर ०८

नाशिक ०५

त्र्यंबकेश्वर ०४

चांदवड ०३

देवळा ०३

येवला ०३

इगतपुरी ०१

कळवण ०१

एकूण १०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतीनगर हत्या प्रकरणाचा उलगडा

$
0
0

मृतदेहाची ओळख पटविण्यात यश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड परिसरातील शांतीनगर झोपडपट्टी येथे झालेल्या निर्घुण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना यश मिळाले आहे. जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले असून, या हत्येप्रकरणात एकूण तीन आरोपी सहभागी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यापैकी एकास रात्री उशिरा अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

देवीदास कसबे (२३, रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शांतीनगर झोपडपट्टीतील बुद्धविहारसमोर मंगळवारी रात्री (दि. ४) देवीदासची डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली. तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो पेटवून देण्यात आला होता. मृतदेहाची कोणतीही ओळख मागे नसताना पोलिसांनी तपास सुरू केला.

याबाबत अंबड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विलास जाधव यांनी सांगितले, की या हत्येत एकूण तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. देवीदास कसबे बेपत्ता असल्याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली होती. तसेच हत्या झालेला तरुण देवीदास असल्याबाबत पोलिसांना समजले होते. त्यामुळे लागलीच देवीदासच्या भावास पाचारण करण्यात आले. हत्येच्या घटनास्थळी पोलिसांना एका चष्माची फ्रेम सापडली होती. या फ्रेमच्या आधारे देवीदासच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाची ओळख पटली असली तरी डीएनए टेस्टच्या आधारेच सर्व स्पष्ट होईल, असे पीआय जाधव यांनी स्पष्ट केले. देवीदास हा मोलमजुरीचे काम करायचा. घटनेच्या रात्री काय झाले याचे चित्र समोर आले असले तरी आरोपींच्या अटकेनंतरच ते अधिक स्पष्ट होईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. हत्या प्रकरणातील संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीत आज वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भद्रकालीतील साक्षी गणपती मंदिर परिसरात शनिवारी (दि. ८) विश्व हिंदू परिषदेचे संत संमेलन होणार आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून विहिंपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत भद्रकालीसह परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वच प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेची सभा गणपती पटांगणात होणार आहे. या सभेला गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

या मार्गावर प्रवेश बंद

पिंपळपार बाजूकडून सोमवार पेठमार्गे बुधा हलवाईकडे जाणारा रस्ता

मोदकेश्वर गणपती नवा दरवाजा बाजूकडून बुधा हलवाईकडे जाणारा रस्ता

दहीपूल बाजूकडून कानडे मारुती लेनकडे जाणारा रस्ता

दहीपूल बाजूकडून हुंडीवाला लेनकडे जाणारा रस्ता

टाकसाळ लेन बाजूकडून सभेच्या मुख्य मार्गावर जाणारा रस्ता

जुनी तांबट लेन बाजूकडून सभेच्या मुख्य मार्गावर जाणारा रस्ता

शिवाजी चौक, बडीदर्गा रोड बाजूकडून सभेच्या मुख्य मार्गावर जाणारा रस्ता

पर्यायी मार्ग

प्रवेश बंदी काळात नागरिकांनी ठाकरेरोड, बादशाही कॉर्नर, दूधबाजार किंवा मेनरोड दहीपूलामार्गे यशवंत महाराज पटांगण तसेच गोदाकाठावरून मोदेकेश्वर गणपती मंदिरामार्गे पाटील गल्ली अशा पर्यायी रस्त्यांचा वापर करायचा आहे.

दुपारी ३ ते रात्री १० प्रवेश बंद

वाहतूक पोलिसांनी सात रस्त्यांवर दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सर्वच वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. यातील बहुतांश भाग भर मध्यवस्तीत आणि बाजारपेठेचा असल्यामुळे नागरिकांसह ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांना पोलिस कसा दिलासा देणार, असा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपात औषधांचा खुला बाजार

$
0
0

चौघां संशयितांसह मेडिकल स्टोअर्स विरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना सरकारवाडा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून औषधांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (दि. ६) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यातील एक संशयित मेडिकलमध्ये काम करतो. या प्रकरणी आणखी एक आरोपी फरार असून, संशयित आरोपींमध्ये बोरगड येथील मेडिकल स्टोअर्सचाही समावेश आहे.

या प्रकरणी 'एफडीए'चे औषध निरीक्षक जीवन दत्तात्रय जाधव यांनी फिर्याद दिली आहे. एम. जी. रोडवरील एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणारा संशयित आरोपी मेडिकल मालकाच्या अपरोक्ष परस्पर गर्भपातासाठी वापरण्यात येणारी एमटीपी कीट विक्री करीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शेळके यांना समजली. त्यानुसार, दोन्ही विभागाच्या पथकाने पंचासमक्ष गुरुवारी सायंकाळी मेडिकलजवळ सापळा रचला. यावेळी मेडिकलमध्ये गेलेल्या बनावट ग्राहकाने संशयित आरोपी रमेश तुळशीराम पगारे (४८, रा. सावतानगर, सिडको) याच्याकडे औषधांची मागणी केली. त्यावर संशयिताने बनावट ग्राहकाकडून २४०० रुपयांची मागणी करून पैसे स्वत:च्या खिशात ठेवले. तसेच १५ ते २० मिनिटांनी मेडिकल बाहेर औषध घेण्यासाठी बोलविले. यावेळी पोलिसांचे पथक तिथेच थांबले होते. थोड्या वेळातच औषधे घेऊन आलेल्या पगारेस पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता यात मनोज (पूर्ण नाव नाही), स्वप्नील शिवाजी देशमुख, विकास दिनकर चौधरी आणि बोरगड येथील एका मेडिकल स्टोअर्सचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले. पगारेचे मित्र असलेले हे संशयित एकमेकांच्या मदतीने गर्भपात औषधांची अनाधिकृतपणे विक्री करीत होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत देशमुख, पगारे आणि चौधरी या तिघांना अटक केली. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याची जामीनावर मुक्तता केली.

मुंबई कनेक्शन

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री करताना पक्के बिल करावे लागते. तसेच डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय ही औषधे मेडिकल स्टोअर्सचालकांना विक्री करता येत नाही. अनैतिक संबंधांमुळे गर्भधारणा झाल्यानंतर या व्यक्ती अशा ठिकाणांहून अवैध पद्धतीने गर्भपाताची औषधे मिळवितात. यात युवा वर्गाचा मोठा भरणा असून, 'एमआरपी'पेक्षा जास्त किंमतीत या औषधांची विक्री होते. दरम्यान, संशयित आरोपींनी या औषधांचा साठा मुंबई येथून घेतल्याचे समोर आले असून, पोलिस सर्वच बाजुने या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

गर्भपात औषधांची अवैध पद्धतीने विक्री करण्याचे हे रॅकेट असून, यात तिघांना अटक करण्यात आली. ही संख्या आणखी वाढू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांची विक्री करणे बेकायदेशीर आहे.

- अशोक भगत,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळीराजाचा उद्वेग!

$
0
0

बागलाणमध्ये दोन तर नाशिकसह देवळा, त्र्यंबकमध्ये प्रत्येकी एक आत्महत्येची नोंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात विविध समस्यांनी ग्रस्त शेतकरी मृत्यूला कवटाळत असून एकाच दिवसात चार शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या आत्महत्यांमुळे जिल्हा प्रशासनही हादरले असून शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शंभरी ओलांडली. बागलाण तालुक्यात दोन तर नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि देवळा तालुक्यात एका आत्महत्येची नोंद झाली आहे.

नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथे बबन विठोबा सांगळे (वय ३९) यांनी १ डिसेंबर रोजी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. बबन यांच्या नावे शेती नसली तरी त्यांच्या वडिलांच्या नावे शेतजमीन आहे. दुसरी घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३ डिसेंबर रोजी घडली. सावरपाडा येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र काळू चौधरी (वय ७५) यांनी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे २ हेक्टर ४४ आर एवढी जमीन आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर येथील सागर अशोक पवार (वय २५) या तरुणाने ४ डिसेंबर रोजी घरात गळफास घेतला. सागर यांच्या नावे गट क्र. ६०३/२/१ चे काही क्षेत्र असून त्यांच्या नावे नामपूर विविध कार्यकारी सोसायटीचे १५ हजार रुपयांचे कर्ज आहे. याच तालुक्यातील भडाने येथे तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय ४४) यांनी घराजवळील कांदा चाळीत गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली. त्यांच्या नावे गट क्र. २२/२ येथे २.१० हेक्टर क्षेत्र आहे. त्यांनी देवळा येथे एचडीएफसी बँकेत कर्जसाठी अर्ज दाखल केला होता अशी माहिती प्राथमिक अहवालातून पुढे आली आहे. याखेरीज देवळा तालुक्यातील कापशी येथे गंगाराम भिला भदाणे (वय ५५) यांनी शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या पाचही घटनांची जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद झाली असून सातत्याने घडणाऱ्या अशा घटना रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.

वर्षभरात १०४ घटना

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक मालेगाव तालुक्यात गुरुवारी (दि. ६) येऊन गेले. त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समस्यांचे दुष्टचक्र भेदून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागला आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, शेतमालाला न मिळणारा भाव, बँकांचा तगादा यासारख्या कारणांसह व्यक्तिगत कारणांमधूनही शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढू लागल्या आहेत. जानेवारी ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ९९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. परंतु, ७ डिसेंबरला आणखी पाच शेतकरी आत्महत्या नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून १०४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

टँकर्सची तात्पुरती मलमपट्टी!

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी यंदा दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत आहेत. पाण्याचे प्रवाह आटत चालल्याने जिल्हावासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीटंचाईच्या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून अशा टॅंकर्सच्या संख्येने देखील शंभरी ओलांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतरंगातील उभारी देणारी मर्मबंधातली ठेव म्हणजे नाटक

$
0
0

नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटक म्हणजे कलाकाराचा आत्मा असते. महाराष्ट्र व बंगालमध्ये जितकी नाट्यभूमी सशक्त आहे, तितकी कोठेच नाही; परंतु प्रसारमाध्यमांच्या स्फोटात तिची गती मंद झाली आहे, असे वाटते खरे तर नाटक म्हणजे अंतरंगातील उभारी देणारी मर्मबंधातली ठेव असते, असे प्रतिपादन मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी केले.

प. सा. नाट्यगृह येथे शुक्रवारपासून कामगार कल्याण नाट्य स्पर्धांना प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन करताना शिलेदार बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की नवे रंगकर्मी रंगमंचावर वावरण्यास उत्सुक असतात. परंतु जितके कलाकार आहेत त्याच्या शंभर पट रसिक निर्माण व्हावेत. कारण रसिकांशिवाय हा डोलारा उभा राहणार नाही. मंचावर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सार्वजनिक वाचनालय नाशिकचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.

अध्यात्माचा परिसस्पर्श असलेले 'आनंद ओवरी'

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत शुक्रवारी सुरभी थिएटर्सचे 'आनंद ओवरी' हे नाटक सादर करण्यात आले. 'तुका वैकुंठासी गेला' म्हणजे नक्की काय झाले याचा शोध घेणारे हे नाटक होते. प. सा. नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहेत. तुकाराम महाराजांचा भाऊ कान्होबा हा त्यांच्यासोबत सावलीसारखा रहात होता. तुकाराम भंडारा डोंगरावर गेले म्हणजे त्यांना शोधून आणणारा, तुकाराम चार आठ दिवस कोठे गायब झाले तर त्यांचा ठाव घेऊन त्यांना पुन्हा घरी घेऊन येणाऱ्या या कान्होबाची कैफियत सादर करणारे नाटक सादर झाले. संत तुकाराम महाराज हे संत म्हणून सर्वांना परिचित होते; परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे कुणीही तितक्या बारीकपणाने कुणी पाहिले नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती, समस्या, तुकाराम महाराजांच्या विरक्त स्वभावामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट यावर आनंद ओवरी हे नाटक गोष्ट करते. तुकोबारायांचे बंधू कान्होबा यांच्या दृष्टीकोनातून तुकोबारांयांचे जीवन चरित्र उलगडत जाते. तुकोबा एका अर्थाने बंडखोर कवी होते. वेदांत तुकोबारायांच्या अभंगवाणीतून सामान्य जणांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला, की तो फक्त तुकोबारायांचा इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली होती. तुकाराम हे देखील हाडामांसाचा माणूस होते. त्यांनी भयंकर दुष्काळ पाहिला, घरातल्यांचे मृत्यु डोळ्यादेखत पाहिले. अशा अनुभवांवर त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले होते. ही विरक्तीपेक्षा जीवनानुभूती होती. त्यामुळे तुकारामांकडे त्याच दृष्टीकोनातून बघितले गेले पाहिजे असे या नाटकातून दाखविले आहे. आनंद ओवरीचे लेखक दि. बा. मोकाशी असून त्याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन सुरेखा लहामगे यांनी केले. नेपथ्य शैलेन्द्र गौतम, प्रकाशयोजना रवी रहाणे, संगीत शुभम शर्मा, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा सुलभा लहामग यांची होती. या नाटकात संदीक कोते, राजेश शर्मा यांनी भूमिका केल्या.

लोगो : कामगार कल्याण नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धारकऱ्यांचा वेढा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी कोर्टात हजर होण्यासाठी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी धारकऱ्यांनी एकच गर्दी केली. त्यांची धारकऱ्यांशी झालेली चर्चा गुलदस्त्यात असली तरी या घटनेची चर्चा शहरात दिवसभर रंगली.

खटल्याच्या सुनावणीसाठी शुक्रवारी भिडे गुरुजी कोर्टात हजर झाले. तत्पूर्वी ते शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मखमलाबाद नाका परिसरातील राजपालनगर येथील अश्विनी पार्क येथे एका धारकऱ्याच्या घरी पोहोचले. भिडे गुरुजी या ठिकाणी असल्याची माहिती शहरातील धारकऱ्यांना समजल्यावर त्यांच्या भेटीसाठी एकच गर्दी केली. या वेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी पोलिस करीत होते. पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त परिसरात तैनात केला. साध्या वेशातील पोलिसांच्या तुकडीसह महिला पोलिस आणि वाहतूक पोलिस परिसरात आल्याने या परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसले. सकाळी ८ ते ११ या वेळेत भिडे गुरुजींनी धारकऱ्यांशी चर्चा केली. धारकऱ्यांच्या वेढ्यातच ते ११ वाजता जिल्हा न्यायालयात हजर होण्यासाठी रवाना झाले. भिडे गुरुजी यांच्या वाहनासह पोलिसांच्या वाहनांचा मोठा ताफा निघाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी इमारतीजवळ गर्दी केली. वाहनांचा ताफा मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅँड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार चौक, सीबीएस या परिसरातून जाताना भिडे गुरुजींना पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी पालिकेत बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील ५७५ धार्मिक स्थळांवरील पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्याबरोबरच या धार्मिक स्थळांबाबत फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

महापालिकेने शहरातील २००९ पूर्वीच्या ५०४ आणि सन २००९ नंतरच्या ७१ अशा ५७५ धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. परंतु, कारवाईपूर्वी पालिकेने धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी न दिल्यामुळे, तसेच कारवाई करण्यापूर्वी योग्य ती प्रसिद्धी न दिल्यामुळे उच्च न्यायालयाने पालिकेच्या कारवाईला स्थगिती देत फेरसर्वेक्षण करून योग्य ती प्रसिद्धी देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबाजवणी सुरू केली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासनाबाबत राज्य सरकारने ५ मे २०११ रोजी एक आदेश काढला असून, त्यानुसार मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार या ५७५ धार्मिक स्थळांवरील कारवाईचा विषय आता या समितीसमोर सादर केला जाणार आहे. ११ रोजी या समितीची बैठक बोलाविण्यात आली असून, त्यात पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, म्हाडा, सिडको आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची माहिती सादर केली जाणार असून, पुढील प्रक्रियेची दिशा ठरवली जाणार आहे. शिवाय, प्रत्येक धार्मिक स्थळाची छाननीही या समितीकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे या समितीवरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुका देवी चौफुलीजवळ गतिरोधकावर वेग कमी केलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चालकाचा मुत्यू झाल्याची घटना घडली. अपघात शुक्रवारी (दि. ७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाला.

ओझर (मिग) समतानगर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी राजू उर्फ विश्वराज काशिनाथ खरे

आपल्या दुचाकीवरून (एमएच १५ डीएक्स ११२८) चांदवडकडून मालेगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी रेणुका देवी चौफुलीवरील गतिरोधकावर गाडीचा वेग कमी केलेला असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिली. यात विश्वराज यांना जबर मार लागला. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गांगुर्डे यांनी तपासणी करून विश्वराज यांचा मुत्यू झाल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरावे सादर करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भाविकांची श्रद्धा असलेली धार्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने घेतला होता. यानंतर महापालिकेचे सभागृहनेता दिनकर पाटील यांनी न्यायालयात धाव घेत ५७५ धार्मिक स्थळे हटिवण्यावर स्थगिती आणली होती. परंतु, पुन्हा न्यायालयाकडून कारवाई केली गेल्यास काय उपाययोजना करावी, यावर चर्चा करण्यासाठी पाटील यांनी त्र्यंबकरोडवरील सौभाग्य लॉन्स येथे बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी विश्वस्तांनी किंवा संबंधितांनी धार्मिक स्थळांचे पुरावे सादर करावेत, असा ठराव करण्यात आला. याप्रसंगी शहरातील धार्मिक स्थळांचे अध्यक्ष, प्रतिनिधी व भाविक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

न्यायालयाने शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यावर स्थगिती दिली असली तरी सबळ पुरावे जमा करणे गरजेचे आहे. यावेळी पाटील म्हणाले की, न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी भविष्यात महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. महापालिकेने धार्मिक स्थळे का हटवू नयेत, अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिल्यास त्यासाठी सबळ पुरावे असणे गरजेचे असल्याचे सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करताना चुकीची माहिती प्रशासनाकडे सादर केली गेली असल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे ऐतिहासिक, धार्मिक स्थळ असलेल्या देशभरातील भाविकांचे देवस्थान काळाराम मंदिरालाही नोटीस बजावण्यात आल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली होती. भविष्यात पुन्हा न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्यास सबळ पुरावे असणे गरजेचे आहे. धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ हे पुरावे जमा करावेत, जेणेकरून महापालिकेकडे ते सादर केले जातील, असेही पाटील म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार निशिगंधा मोगल, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, रवींद्र धिवरे, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, भगवान दोंदे, विश्व हिंदू परिषदेचे गणेश सपकाळ यांसह साधू, संत व धार्मिक स्थळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

नागपूर प्रकरणाचा दाखला

सभागृहनेते पाटील यांनी धार्मिक स्थळांचे पुरावे कसे सादर करावेत याबाबतचे पत्र उपस्थितांना दिले. यात धार्मिक स्थळांच्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयाने निकाल देताना सार्वजनिक जागेतील स्थळांच्या १० टक्क्यांपर्यंतचे बांधकाम नियमित होऊ शकते व एफएसआय धरून १५ टक्क्यांपर्यंत बांधकाम नियमित करता येते, असे नमूद केले आहे. वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर संबंधित धार्मिक स्थळांची नावे आहेत, तेथील भाविकांनी त्यावर हरकत नोंदवावी, लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांची माहिती द्यावी, परिसरातील भाविकांच्या सह्यांचे पत्र सादर करावे, धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी कुठलीही तेढ निर्माण होणार नाही याची माहिती सादर करावी, ज्या जागेवर धार्मिक स्थळे आहेत त्या जागेचा प्रॉपर्टी सर्व्हे करावा तसेच धार्मिक स्थळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेही गरजेचे असल्याचे पाटील यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

नाशिक महापालिकेचा विस्तार होत असतांना वाढलेल्या लोकवस्तीत रहिवाशांच्या सुविधांसाठी मोकळे भूखंड देण्यात आले होते. या भूखंडांवर संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी भाविकांनी धार्मिक स्थळे स्वखर्चातून उभारली आहेत. याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत.

- सर्वनाथ घुमरे, अध्यक्ष, गणपती मंदिर ट्रस्ट, जाधव संकुल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी वडिलांच्या आत्महत्येने लेक झाली पोरकी

$
0
0

सारदे (ता. बागलाण) येथील घटना

...

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्यावर्षी शेततळ्यात अपघाती मृत्यू झाल्याने आई आणि भावाच्या मायेला पोरक्या झालेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्रही हरपले आहे. शेतकरी असलेल्या वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याने ती एकटीच पडली आहे. या कमी वयात तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून, शेतकरी आत्महत्यांनी शंभरी ओलांडली आहे. बागलाण तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. या तालुक्यात आतापर्यंत २० शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शुक्रवारी (दि. ७) सारदे येथील युवा शेतकरी मनोज रामराव धोंडगे (वय ३५) यांनी विषारी औषध सेवन केले होते. घरातील मंडळींचा लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी मनोज यांना तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शनिवारी (दि. ८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मनोज धोंडगे यांच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र बँकेचे सुमारे २१ लाख रुपयांचे कर्ज आहे.

मनोज धोंडगे यांच्या नावावर साडेचार एकर शेती आहे. शेतीसाठी मनोज यांनी महाराष्ट्र बँकेकडून सुमारे २१ लाख रुपये कर्ज घेतल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद आहे. वडिलोपार्जित सुमारे १४ एकर शेती असलेल्या मनोज यास दोन बंधू असून, मोठ्या बंधूचे नामपूर येथे ऑप्टीकल दुकान आहे. लहान भाऊ बीएस्सी डीएड असून, तोदेखील शेती करतो.

...

साहूवर कोसळला दु:खाचा डोंगर

मनोज धोंडगे यांच्या पश्चात सहा वर्षांची साऊ ही मुलगी आहे. मनोज यांच्या पत्नी व मुलाचा गतवर्षीच शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. अवघ्या सहा वर्षांची साहू आई व भावाच्या मायेला दुरावल्यानंतर आता वडिलांच्या निधनाने पोरकी झाली आहे. कमी वयात साहूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साहूचा सांभाळ आजोळकडे होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारित्र्यावरील आरोपातून हत्या झाल्याचे उघड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड परिसरातील शांतीनगर झोपडपट्टी येथे झालेली निर्घुण हत्येचे कारण अनैतिक संबंधांबाबत झालेले आरोप असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून, त्याने निर्घुण हत्येची कबुली दिली.

प्रमोद साळवी (४२, रा. शांतीनगर, मूळ रा. रायगड) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. कोर्टाने संशयिताला १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यातील ऋषीकेश राजगिरे आणि अनिल सुरकणे हे दोन संशयित आरोपी फरार आहेत. संशयित अनिल हा लहानपणापासून गोट्याभाऊ नावाच्या व्यक्तीकडे राहत होता. याचे निधन झाल्यानंतर तो याच ठिकाणी वास्तव्यास होता. मयत देवीदास कसबे आणि इतर आरोपींमध्ये परिचय असल्याने त्यांचे एकमेकांकडे जाणे होते. देवीदासच्या हत्येपूर्वी शांतीनगर येथे आलेल्या देवीदासने अनिल आणि गोट्यभाऊची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. यावरून बराच वाद झाला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचून मिटले. यानंतर मंगळवारी रात्री (दि.४) मद्य आणि गांजेच्या नशेत तर्रर असलेल्या देवीदास आणि इतर आरोपींमध्ये वाद झाला. 'तु इकडे येण्याचे कारणच नाही,' असे म्हणत या तिघांनी देवीदासच्या डोक्यात दगड घातला. यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केले. याच ठिकाणी पडलेल्या प्लॉस्टिक गोण्यांचे तीन गाठोडे देवीदासच्या मृतदेहावर टाकून पेटवून दिले.

फरार दोन आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांना अटक होईल, अशी माहिती तपासाधिकारी आणि अंबड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. यातील अटक संशयित यापूर्वी १० वर्षांची शिक्षा भोगून आला असून, हे सर्वच सतत अंमली पदार्थांच्या आहारी राहतात, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईभक्तांवर काळाचा घाला

$
0
0

लक्झरी बसच्या अपघातात चार ठार, ३५ प्रवाशी जखमी

...

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नाशिक-मुंबई महामार्गावर पाडळी (ता. इगतपुरी) शिवारात शिर्डीहून मुंबईकडे जाणारी खासगी लक्झरी बस दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात ४ ठार, तर ३० ते ३५ प्रवाशी जखमी झाले. जखमी आणि मृतांमध्ये दिल्ली, मुंबई येथील प्रवाशी असल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. दरम्यान, मृत व्यक्ती व जखमी हे बाहेरील राज्यातील असल्याने उशिरापर्यंत त्यांची ओळख पटली नव्हती.

शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन करून ५० प्रवाशी क्षमतेची लक्झरी बस (एमएच ०१, सीव्ही ९६७५) नाशिकडून मुंबईकडे जात होती. मुंबई आग्रा महामार्गावर शनिवारी संध्याकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख शिवारात वेगावर नियंत्रण मिळण्यास बसचालकाला अपयश आल्याने ही बस दुभाजकावर जाऊन धडकली. यानंतर सुमारे २०० फूट बस फरफटत गेली. या भीषण अपघातात बसमधील ४ प्रवाशी जागीच ठार झाले, तर जवळपास ३५ जण जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच नरेंद्र महाराज संस्थानचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड, टोलनाका रुग्णवाहिका सेवेने जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले.

...

नवसाचा मुलगाही हिरावला

अपघातातील एका प्रवासी महिलेला सहा अपत्यांनंतर साईबाबा यांच्या नवसाने मुलगा झाला. त्या मुलाला नवस पूर्ण करण्यासाठी ही महिला बसने प्रवास करीत होती. मात्र या अपघातात नवसाने झालेल्या आठ वर्षीय मुलाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. यामुळे मातेने एकच आक्रोश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगटांना सक्षम करूनसंघटन वाढविण्याची गरज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक दौऱ्यावर आलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बचतगटाच्या महिलांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. बचतगटातून महिलांना सक्षम करून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.

या बैठकीला बचतगटांसंदर्भात शासनाच्या असलेल्या योजना व उद्योगासाठी कर्जपुरवठा याबाबत सविस्तर माहिती ठाकरे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील महिला नगरसेविका, महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आपल्या भागातील महिला बचतगटातील सदस्यांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीला शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सत्यभामा गाडेकर, जिल्ह्य समन्वयक श्यामला दीक्षित, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख स्नेहल भांडे, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर, श्रध्दा जोशी यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा संघटनांसाठीच सीएम चषक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवापिढीने खेळाकडे वळावे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश आहे. सीएम चषक स्पर्धेत आतापर्यंत ३० लाख युवकांनी सहभाग नोंदविला आहे. या महिना अखेरपर्यंत ५० लाख लोक या स्पर्धांशी जोडले जातील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

गंगापूर रोड लगतच्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन टिळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, मराठा विद्या प्रसारक समाजच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., आयर्नमॅन स्पर्धा विजेती रविजा सिंगल उपस्थित होते.

राज्यभरातील २८८ मतदार संघांमध्ये या स्पर्धा भरविण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये नाशिकमधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून राज्य स्तरावरील बक्षिस मिळवावे, असे आवाहन टिळेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., रविजा सिंगल यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. २३ हजार ७०० खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली.

अडीच तासांनी आमदार महोदयांचे आगमन

सीएम चषकाच्या संकल्पना मांडणीपासून त्यामध्ये सक्रीय सहभागी असलेले आमदार योगेश टिळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मात्र ते तब्बल अडीच ते पावणे तीन तास उशिराने कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्वय हिरेंचे ‘वेट अॅण्ड वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी ज्येष्ठ चिरंजीव माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला; पण त्यांचे दुसरे चिरंजीव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांची अनुपस्थिती व मालेगावमधील कार्यकर्त्यांनी राखलेले अंतर यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अद्वय हिरे धुळे लोकसभेसाठी इच्छुक असून, हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 'तूर्तास वेट अॅण्ड वॉच'चे धोरण स्वीकारल्याचे सांगितले जाते.

हिरे कुटुंबीय भाजपला रामराम ठोकून स्वगृही परतणार हे खरे तर सहा महिन्यांपूर्वीच जाहीर झाले होते. शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याप्रसंगी हा सोहळा होणार असेही ठरले होते, तथापि, छगन भुजबळ यांच्या काही आक्षेपांमुळे हा प्रवेश लांबला होता. त्यावरून पुन्हा एकदा हिरे व भुजबळ यांच्यात मतभेदाची दरी रुंदावली होती. परिणामी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही हिरेंची भेट घेत चाचपणी केली होती. परंतु, गेल्या महिन्यात दस्तुरखुद्द भुजबळांनी मालेगावमध्ये हिरेंच्या घरी भोजन घेत या संदर्भातील सगळ्या शंका कुशंकाना विराम दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मध्यस्थाची भूमिका निभावली, असे सांगितले जाते. भुजबळ यांचे चिरंजीव पंकज हे नांदगावचे आमदार असून, या मतदारसंघात हिरेंच्या प्रभावक्षेत्रातील मोठा भाग येत असल्याने त्यांना दुखावल्यास पंकज यांना त्रास होऊ शकतो. तसेच, अपूर्व यांना भुजबळांच्या मदतीविना नाशिक पश्चिममध्ये पुढे जाता येणार नाही, याची जाणीव उभयतांना झाल्याने आपापले ग्रह बाजूला ठेऊन ते एकत्र आले. अपूर्व हिरे यांना नाशिक पश्चिम, तर अद्वय यांना धुळे लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द हवा होता. त्यामुळेच हा प्रवेश थांबला होता. पण, आता तो झाल्याने अपूर्व यांची उमेदवारी निश्चित मानली जाऊ लागली आहे.

धुळे मतदारसंघ हा जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे तूर्तास थांबा व वाट पहा, असा सल्ला दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच दिल्याचे अद्वय यांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ धुळे काँग्रेसकडेच राहिले, तर अद्वय हे तिकडे जाणार आणि कुटुंबाचीही दोन पक्षांत विभागणी होणार असे दिसते. काँग्रेसच्या सलग दोन पराभवांमुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला असून, जागा वाटप ठरल्यानंतर अद्वय हे प्रवेश करतील, असेही सांगितले जाते.

..

अनुपस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नाही

राष्ट्रवादीत अद्वय हिरे यांना उमेदवारीची स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र अमरिशभाई पटेल, रोहिदास दाजी पाटील या माजी मंत्र्यांसह नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे अशा दिग्गजांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. पण त्यासाठीही शरद पवार यांनी मदत करण्याचा शब्द दिल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच त्या अनुपस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नाही, असे अद्वय हिरे यांनी सांगितले. अद्वय यांचा स्वभाव पाहाता ते यापेक्षा वेगळाही निर्णय घेऊ शकतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images