Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘पुलकित संध्या’तून उलगडले ‘पुलं’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त द्वारका सांस्कृतिक केंद्र, इंदिरानगर यांच्यातर्फे 'एक पुलकित संध्या' या सांगितिक व वाचिक अभिनयाच्या कार्यक्रमाचे गुरुवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. पुलंचे संपूर्ण जीवन, त्यांचे कार्य, लेखन विनोदाच्या माध्यमातून उलगडण्यात आले. गोळे कॉलनीतील काका गद्रे कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

पु. ल. देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे आवडते व्यक्तिमत्व. त्यांचे लेखन, विनोदांची त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुन्हा आठवण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना अशोक घैसास यांची होती. यामध्ये प्रा. हेमंत चोपडे व अशोक घैसास यांनी प्रारंभी मुलाखत स्वरुपात पु. लं. उलगडले.

पुलंनी संगीतबद्ध केलेल्या नाच रे मोरा आंब्याच्या वनात, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, शब्दांवाचून कळले सारे, कौसल्येचा राम बाई, हसले मनी चांदणे या रचनाही यावेळी सादर करण्यात आल्या. चित्रा हुदलीकर, सतीश कोल्हटकर, रसिका कालगावकर यांनी या गितांचे सादरीकरण केले. सुधीर सराफ यांनी पुलंच्या जीवनाचा आलेख मांडला. हेमंत चोपडे यांनी अंतू बर्वा ही व्यक्तिरेखा साकारली. कार्यक्रमाचे निवेदन अरुणा सराफ यांनी केले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहस्र दीपांनी उजळले सोमेश्वर बालाजी मंदिर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात पणती पौर्णिमेनिमित्त सोमेश्वरनजीक गंगापूर गावात शंकराचार्य न्यास संचलित श्री बालाजी मंदिरात गुरुवारी हजारो पणत्या प्रज्ज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील बालाजीच्या मूर्तीभोवती आकर्षक पणत्यांची आरास करण्यात आली. मंदिरात बालाजीच्या दर्शनासह पणत्या प्रज्ज्वलित करण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली.

उद्योजक रतन लथ तसेच शर्वरी लथ यांच्या हस्ते प्रथम पणती उजळवण्यात आली. बालाजी मंदिराच्या स्थापनेपासून येथे अखंड समई तेवत आहे. या समईतून ज्योतीने ज्योत लावत पणत्या उजळवल्या जातात. लक्ष लक्ष पणत्यांनी हा परिसर उजळून निघतो. शिस्तबद्ध व्यवस्थेत प्रत्येकाने बालाजीचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारात शहरातील प्रत्येक नागरिकाने किमान दहा पणत्या या ठिकाणी लावाव्यात, असे आवाहन शंकराचार्य न्यासने केले होते. मंदिराबाहेरील गोशाळेपासून धबधब्याजवळील काही भागाभोवतीही पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.

रोषणाई आणि लाखो पणत्यांच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला. अकरा वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा होत असून, पहिल्या वर्षी फक्त ११०० पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, अकरा वर्षांनंतर ही संख्या आता हजारोंच्या वर गेली आहे. त्यामुळे बालगोपालांसह अबालवृद्धांनी या दीपोत्सवात सहभाग घेतला. गंगापूर रस्त्याकडून मंदिर रस्त्याकडे वळल्यानंतर डाव्या बाजूला मैदानात कार पार्किंग व्यवस्था करण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी यंदाही आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सेतू या संस्थेतर्फे पादत्राणे सेवा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग प्रकरणी तीन वर्षांचा कारवास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अश्लिल शेरेबाजी करीत विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपीस जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. विनयभंगाची घटना २०१५ मध्ये घडली होती.

अनिल महादेव राणशूर (ता. सेलू, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अल्पवयीन मुलगी ६ एप्रिल २०१५ रोजी त्र्यंबक रोडवरील वेद मंदिराजवळून जात असताना आरोपी अनिलने तिचा पाठलाग केला. वेद मंदिराजवळ तिला अडवून अश्लिल शेरेबाजी करीत तिचा विनयभंग केला. या गुन्ह्याचा तपास सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या तत्कालीन उपनिरीक्षक श्वेता बेल्हेकर यांनी करीत कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. जी. कडवे यांनी कामकाज पाहिले. फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिकाऱ्याने सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे कोर्टाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारवास आणि ५०० रुपये दंड ठोठावला. कोर्टात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार व्ही. एन. लांडे आणि हवालदार एस. बी. गोडसे यांनी काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी बोलताना अचानक झालेल्या बदलीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मला नाशिकमध्ये पुरेसा वेळ मिळाला असता, तर अधिक चांगले काम केले असते, असे सांगत नाशिककरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले.

महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम केल्याचे समाधान असून, महापालिकेचा स्पीलओव्हर कमी केल्याचा दावा मुंढेंनी केला. काही प्रकल्प पूर्ण केले, तर काही अपूर्ण राहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बदलीनंतर माध्यमांशी बोलताना मुंढेंनी सांगितले, की अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले. शहरात २४ तास पाण्याचे नियोजन केले. वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी सोडविता आल्या. महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावली असून, आपण गेल्यानंतरही ती शिस्त कायम राहणार आहे. कामात सुसूत्रता आणत महापालिकेचा स्पीलओव्हर पाचशे कोटींनी कमी केला. अनावश्यक कामांना कात्री लावली. सततच्या बदलीमुळे कुटुंबाला त्रास होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. परंतु, बदली कशामुळे झाली यावर भाष्य करण्यास मुंढेंनी मात्र यावेळी नकार दिला.

--

नियोजन विभागात सहसचिव

सरकारकडून मुंढेंची बदली मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदावर करण्यात आली आहे. सरकारच्या सेवा विभागाचे सचिव डॉ, सीताराम कुंटेंच्या सहीचा दोन ओळींचा आदेश महापालिकेत गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता प्राप्त झाला. त्यात सरकारने आपली बदली केली असून, नियोजन विभागात सहसचिवपदावर आपली नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले होते. सध्याचा आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यां सुपूर्द करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे बदलीचे आदेश प्राप्त होताच मुंढेंनी तात्काळ महापालिका मुख्यालय सोडले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार

तुकाराम मुंढेंची बदली बुधवारी झाली असली, तरी गुरूवारी मुंढेंच्या बदलीचे अधिकृत आदेश प्राप्त होऊन त्यांचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे आदेश सरकारकडून आले. त्यामुळे मुंढेंनी आदेश मिळताच तडकाफडकी महापालिकेचा पदभार सोडत हा पदभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपविला. राधाकृष्णन यांनी दुपारी महापालिकेत येऊन आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे गमे नाशिकमध्ये येईपर्यंत महापालिकेचे कामकाज आता राधाकृष्णनच पाहणार आहेत.

--

गमे सोमवारी येणार

राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली असली, तरी मंत्रालयातून त्यांच्या बदलीचे अधिकृत आदेश काढण्यात आलेले नाहीत. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन काळात त्यांना उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार सोडता येणे शक्य नाही. निवडणुकांशी संबंधित काही जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अशा काळात त्यांची बदली करताना निवडणूक आयोगाचीही परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात गमेंच्या नियुक्तीचे आदेश निघण्याची शक्यता असून, गमे येत्या सोमवारी पदभार घेणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ, स्वस्त इंधन मिळणार

0
0

डॉ. सुभाष भामरे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या दृष्टीने स्वच्छ इंधनाची उपलब्धता हा महत्त्वाचा टप्पा आहे. सिटी गॅस प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल, देशातील ७० टक्के लोकांपर्यंत स्वच्छ आणि स्वस्त इंधन पोहचविता येईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. तसेच कोईम्बतूरनंतर देशातील दुसऱ्या डिफेन्स इनोव्हेटिव्ह हबच्या कामाचा नाशिकमध्ये लवकरच शुभारंभ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनच्या पायाभरणी आणि दहाव्या सिजीडी बिडींग राऊंडच्या शुभारंभाप्रसंगी डॉ. भामरे बोलत होते. या कार्यक्रमास पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, व्यस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर, कार्यकारी संचालक राजीव माथूर उपस्थित होते. यावेळी डॉ. भामरे म्हणाले, की सिटी गॅस प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित इंधनाचा पर्याय नागरीकांना उपलब्ध होईल, जगासमोर प्रदूषणामुळे हवामान बदल आणि तापमानवाढीचे संकट उभे आहे. अशावेळी प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन हा उत्तम पर्याय आहे. स्वच्छ इंधनाच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईडचे उर्त्सजन ५० टक्क्याने कमी करता येईल. तसेच औद्योगिक व घरगुती वापरासाठी स्वस्त इंधन उपलब्ध होईल.

१२५ स्वच्छ इंधन केंद्र

आल्हाददायक पर्यावरण ही नाशिकची मूळ ओळख आहे. ती टिकविण्यासाठी स्वच्छ उर्जेचा नवा पर्याय उपयुक्त ठरेल. स्वच्छ इंधनाने प्रदूषण ५० टक्क्यांनी कमी होईल. येत्या काळात १२५ स्वच्छ इंधन वितरण केंद्र सुरू होणार असल्याने वाहने सीएनजीवर चालविता येतील. पुढील २० वर्षे पुरवठा करता येईल, एवढ्या स्वच्छ इंधनाची व्यवस्था उपलब्ध असल्याचे रावल यांनी सांगितले.

नाशिकमध्ये १६०० कोटीची गुंतवणूक

प्रास्ताविकात एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे म्हणाले, की महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. नाशिकमध्ये १६०० कोटीची तर राज्यात पाच हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे त्यामुळे १० हजार ५०० रोजगार उपलब्ध होतील. या प्रकल्पामुळे राज्याच्या ५१ टक्के जनतेपर्यंत स्वच्छ इंधन पोहचविण्यात मदत होईल.

पंतप्रधानाच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण

कार्यक्रमाच्या वेळी दिल्लीतील विज्ञान भवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. नवव्या सीजीडी बिडींग अंतर्गत १२९ जिल्ह्यातील ६५ क्षेत्र तर दहाव्या बिडीग अंतर्गत १२४ जिल्ह्यातील ५० क्षेत्रांचा समावेश आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळातही भेदभाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सरकार झोपी गेल्याचे सोंग करीत आहे. राज्यात गंभीर दुष्काळ असताना सरकारने लागलीच उपाययोजनांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच दुष्काळ जाहीर करण्यात भाजप सरकारने भेदभाव केला आहे,' असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केला. विरोधकांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही त्या तालुक्यांना दुष्काळातून वगळलेले असून, यातही 'राजकीय दुष्काळ' दाखविला असल्याचे खोचक टीकाही चव्हाण यांनी केली.

नाशिक शहर काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे आदी उपस्थित होते.

अन्य राज्यांत कोळसा पाठवला

राज्यातील वीजटंचाईवर बोलताना चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. सध्या पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार, राज्यातील कोळसा पळवत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केला. राज्यात वीज केंद्रांना कोळसा नसल्याने वीज निर्मिती होत नाही. सरकारकडून राज्यातील कोळसा मध्यप्रदेश, राजस्थान या निवडणुका असलेल्या राज्यात पाठवत असल्याचे सांगत, सरकारच्या कोळसा चोरीमुळेच राज्यात वीज संकट असल्याचेही आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

राणेंनी भाजपा सोडली तर चर्चा...

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीने सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मागणी माजी मंत्री नारायण राणे यांच्यासाठी केली असल्याचे विचारले असता, असा प्रस्ताव नसल्याचा त्यांनी इन्कार केला. तर, राणे भाजपचे खासदार असून, त्यांना मतदारसंघाची काय गरज? असा प्रश्न करत राणे यांनी भाजप सोडली तर, त्याबाबत काही चर्चा होऊ शकते, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

महाजन पैशांची मॅनेजमेंट करतात

चव्हाण यांनी नाशिकमध्ये निवडक पत्रकारांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपच्या पैशांची मॅनेजमेंट करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपकडून निवडणुकांत प्रंचड पैसा ओतला जातो. राज्यात गिरीश महाजन यांच्याकडे पैशांच्या मॅनेजमेंटचे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून उमेदवारांना थेट पैसा पुरवला जातो. कोणाही या पैसे घ्या अन् निवडणुका जिंका हा फंडा भाजपकडून अवलंबला जात असल्याचे सांगत, भाजपकडून गुंडानाही पावन करून घेतले जात असल्याचा हल्लाबोल चव्हाण यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येकाचे नशीब वेगळे सांगणारे ‘प्रारब्ध’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणूस आपल्या पाल्याच्या बाबतीत खूप हळवा असतो, त्यातही ती मुलगी असेल तर जास्तच. बाप तर आपल्या मुलीच्या सुखासाठी काहीही करायला तयार असतो. एक मुलगी पत्नी झाल्यावर कितीतरी नाते बदलतात. सासरा, नवरा, सासू, नणंद सारेच वेगळे होते; मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते हे सांगणारे नाटक 'प्रारब्ध' गुरुवारी सादर झाले.

राज्य नाट्य स्पर्धेत ल्युमिनस फाउंडेशनच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे. नाटकाचे दिग्दर्शन अनघा धोडपकर यांनी केले तर लेखन विवेकानंद भट यांचे होते. आपल्या होणाऱ्या सुनेसाठी जिवाची पर्वा न करता धडपडणारा जीव काढणारा सासरा, मुलीने गडगंज श्रीमंत माणसाशी लग्न करावे म्हणजे ती सुखी होईल अशी आईची भाबडी कल्पना, मला सासू म्हणू नको मी तुझी आईच आहे, माझ्या मुलीला जीव लाव, असे ठणकावून सांगणारी आई, माझे तुझ्यावर निस्सिम प्रेम आहे हे सांगणारा भावी नवरा असे सारेच नाते या नाटकात गुंफण्यात आले होते. ही सगळी हाडामासाची माणसे, पण तरीही वेगळे वागणारी, विचार करणारी, तो ही एकमेकांच्या विरोधातला विचार. एकमेकांवर प्रेम असूनही त्यांना एका विचित्र प्रारब्धाला तोंड द्यावे लागते. त्याची कहाणी म्हणजे प्रारब्ध हे नाटक होय.

नेपथ्य हिमांशु धोडपकर यांचे, संगीत प्रणिल तिवडे यांचे, प्रकाशयोजना वैशाली खाटीकमारे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा श्यामल हलकर्णी यांची होती. नाटकात विवेकानंद भट, अनघा धोडपकर, दीप्ती जोशी, गोपाल लोखंडे, विनायक नवसुपे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

देहासक्त

नम्रता कलाविष्कार बहुउद्देशीय संघटना

स्थळ : पसा नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम मुंढे नियोजन सहसचिव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या सेवा विभागाचे सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीचा दोन ओळींचा आदेश गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता मुंढे यांना मिळाला. हे आदेशपत्र हाती येताच मुंढे यांनी तत्काळ महापालिका मुख्यालय सोडले. आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याच्या सरकारच्या आदेशानुसार मुंढे यांनी आपला पदभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेच्या कृतीचा वनाधिकाऱ्यांकडून निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबरनाथ येथीस रोपवाटिकेत काही कारणास्तव लागलेल्या आगीत काही झाडे जळून खाक झाल्याने त्यास वन विभागाला दोषी ठरवत शिवसेनेच्या वतीने ठाणे वन संरक्षक अधिकाऱ्यांवर शाई व राख फेकण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नाशिकमधील वनाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून गुरुवारी (दि.२२) दिवसभर कामकाज केले.

अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथील रोपवनात काही कारणास्तव सोमवारी (दि. १९) आग लागली. यात काही झाडे जळून खाक झाली. वनसंपत्तीच्या या ऱ्हासास वनविभाग जबाबदार असल्याचा ठपका अंबरनाथ येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवला. रोपवनाला आग लागल्यास वनधिकारी जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी आंदोलन केले. यात ठाणे परिक्षेत्राच्या मुख्य वनसंरक्षकांच्या अंगावर शाई व जळीत झाडांची राख आंदोलनकर्त्यांनी फेकली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नाशिक परिक्षेत्रातील सर्व वनधिकाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. तसेच या घटनेचा निषेध नोंदवत वनधिकाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्याची मागणी करत हा हल्ला वनविभागावर झाल्याचे मत वनधिकाऱ्यांनी मांडले. या संदर्भातील जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आणि नाशिक परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोंगे, ठाकरे, सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून आपसात रणकंदन नको

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अगोदर दोन राज्यांमध्ये पाण्यावरून वाद पेटत. आता महाराष्ट्रातच दोन जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वाद होऊ लागले आहेत. हे चित्र महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जायकवाडीच्या पाण्याचे वितरण ठरलेल्या धोरणांनुसारच व्हायला हवे. या पाण्याचा लाभ नाशिक आणि मराठवाडा या दोन्ही भागात शेती व पिण्यासाठी व्हायला हवा,' अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडली.

त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम मैदानावर आयोजित कृषिथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

चव्हाण म्हणाले, 'राज्यामध्ये सद्यस्थितीत दुष्काळाचे वातावरण सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शेती व्यवसाय बेभरवशाचा बनल्याने शेतीपूरक जोडधंद्याच्या उभारणीसाठी सरकारने प्राधान्याने प्रयत्न करायला हवेत. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देण्याची गरज आहे. शेतीसाठी तंत्रज्ञानही तितकेच गरजेचे आहे. नवीन पिढी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत अमूलाग्र बदल घडवू शकते. या तंत्रज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम कृषिप्रदर्शनासारख्या उपक्रमांमधून होते. पण तंत्रज्ञान कितीही उपयुक्त असले तरीही पाण्याशिवाय शेती नाहीच. यामुळे पाण्याचा प्रश्न हा समन्वयाने सुटायला हवा.'

यावेळी शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवरही चव्हाण यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, 'आमच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांवर गारपीटीचे संकट ओढावले. तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत केली. पण विद्यमान सरकारने वर्षभर घोषणांचा पाऊस पाडत उशिराने शेतकऱ्यांना जे दिलं ते त्यांच्या उपयोगी कसं येईल.' विरोधी पक्षात असलो तरीही जेथे महाराष्ट्र आणि शेतकरी हिताचा मुद्दा येतो. त्यासाठी शासनाला मदत करायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, नाडाचे अध्यक्ष विजूनाना पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, साहील न्याहारकर, संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, शाहू खैरे, राजाराम पानगव्हाने, जयंत जायभावे, शरद आहेर आदी उपस्थित होते.

\Bमुंढे आले अन् गेले सीएममुळेच

\Bप्रदर्शन उद्घाटनानंतर पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना नाशिक मनपा आयुक्त मुंढेंच्या बदलीसंदर्भात प्रतिक्रिया विचारल्यानंतर यावर फारसे भाष्य न करता त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे निर्देश केला. या बदलीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा होता. त्यांनीच मुंढेंना नाशिकमध्ये आणले अन् त्यांनीच पुढची बदली घडवून आणली, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

\B \B

\Bअयोध्येपेक्षा शेतकरी महत्त्वाचा

\Bशिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे अयोध्येस जाऊन राजकीय भांडवल करणार आहेत. पण त्यांनी अयोध्येला जाण्याऐवजी राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची स्थिती समजावून घ्यायला हवी. त्यासाठी राज्यात लक्ष घालायला हवे, असा टोलाही चव्हाण यांनी ठाकरेंना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसैनिकांचे अयोध्येकडे कूच!

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

केंद्र सरकारने राममंदिर उभारणीस त्वरित प्रारंभ करावा, या मागणीसाठी राज्यभरातून हजारो शिवसेना कार्यकर्ते गुरुवारी, २२ नोव्हेंबर रोजी अयोध्येला रवाना झाले. नाशिकरोड, मुंबई आणि ठाणे अशा तीन ठिकाणांहून स्पेशल ट्रेनने कार्यकर्ते रवाना झाले. ज्या कार्यकर्त्यांना या ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही ते दुसऱ्या रेल्वेगाड्यांनी रवाना झाले आहेत.

नाशिकरोडहून गुरुवारी रात्री एक वाजता १२५४ कार्यकर्ते जय श्रीराम एक्सप्रेसने रवाना झाले. एक्सप्रेसला १८ बोगी आहेत. परतीसह हा प्रवास एकूण पाच दिवसांचा आहे. पासधारकांनाच या गाडीत प्रवेश देण्यात आला. ठाण्याहून २४ बोगी असलेली ट्रेन गुरुवारी दुपारीच रवाना झाली होती. त्यामध्ये साधारण दीड हजार कार्यकर्ते होते. नाशिकच्या रेल्वेगाडीचे संयोजन राजेश फोकणे यांनी केले. ही गाडी २४ नोव्हेंबरला पहाटे पाचला अयोध्या स्थानकात पोहोचेल. खासदार गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील आदी नेते कार्यकर्त्यांसमवेत आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आरती केल्यानंतर जय श्रीराम एक्सप्रेस अयोध्येहून नाशिकला रवाना होईल. २६ नोव्हेंबरला रात्री बाराला ती नाशिकरोड स्थानकात पोहोचेल. गाडीला अठरा बोगी असून, इंजिनानंतरची पहिली बोगी एसआरएल आहे. या बोगीची क्षमता ४० प्रवाशांची आहे. त्यानंतर एसी बोगी असून, तिची क्षमता ६४ प्रवाशांची आहे. त्यापाठोपाठ स्लीपर क्लासच्या सात बोगी असून, प्रत्येक बोगीची ७२ प्रवासी क्षमता आहे. स्लीपर कोचनंतर पॅन्ट्री बोगी असेल. त्यामागे ४० प्रवासी क्षमतेची एसआरएल बोगी राहील. पाच दिवसांचा हा प्रवास तीन हजार किलोमीटरचा आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने १२५४ पासधारकांनाच जागा देण्यात आली आहे.

रेल्वेला कोटींचा महसूल

शिवसेनेच्या अयोध्यावारीतून रेल्वेला सुमारे एक कोटीचा महसूल मिळाला आहे. अयोध्येला जाण्यासाठी स्पेशल ट्रेन करण्यात आल्या आहेत. यासाठी नेहमीच्या तिकिटापेक्षा दीडपट दर जास्त द्यावा लागतो. नाशिकच्या गाडीसाठी रोख ३९ लाख रुपये मोजण्यात आले होते. तर ठाणेकरांनी त्यापेक्षा जास्त रक्कम मोजली. मुंबईहून देखील गाडी रवाना झाल्याचे समजते. या गाड्यांसाठीच पक्षाने सुमारे एक कोटी मोजले आहेत.

मिळणार मराठी जेवण!

रेल्वेने फक्त विशेष गाडी दिली आहे. पाच दिवसांच्या जेवण व नाश्त्याची सोय नेते मंडळीनींच केली आहे. नाशिकच्या जय श्रीराम ट्रेनमध्ये विशेष आचारी आणि दोन टेम्पो भरुन भाजीपाला व धान्य नेण्यात आले आहे. भाजी-पोळी, वरण-भात असा मेन्यू आहे. नाशिकरोडहून गाडीत पाणी भरुन घेण्यात आले. अयोध्येत ठाकरेंच्या सभेला कायदा सुव्यवस्थेमुळे परवानगी नाकारल्याचे वृत्त आल्याने रेल्वेगाड्या मुंबईतच थांबविण्यात आल्याने कोटींच्या खर्चावर पाणी फेरणार का या विचाराने नेते अस्वस्थ झाले. ग्रीन सिग्नल आल्यानंतर त्यांनी सुस्कारा सोडला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांना टी शर्ट, टोपी आणि विशेष बॅच देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशीपचा रविवारी थरार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या काळजाचा थरकाप उडविणाऱ्या नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिपचा थरार रविवारी सकाळी १० वाजेपासून बाइक प्रेमींना पहायला मिळणार असून ही चॅम्पीयनशीप इंदिरानगर येथील पेठे नगर येथे होणार आहे.

या चॅम्पियनशिपचा हा पाचवा राऊंड असून या अगोदर कोचिन, गोवा, कोइम्बतूर, जयपूर या ठिकाणी ही स्पर्धा झाली आहे. पाचवा राऊंड नाशिकमध्ये तर सहावा राऊंड वडोदरा येथे होणार आहे. देशातली सर्वात मोठी ऑफरोड कॉम्पिटीशन समजली जाते. गॉडस्पीड रेसिंगच्यावतीने या चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पेठे नगर भागात आर्टिफिशयल ट्रॅक तयार करण्यात आला असून अवघड वळण, उंच सखल भाग, तयार करण्यात आले आहे. यासाठी पुण्याहून टीम आली आहे. या स्पर्धेत ८ कॉटेगिरीमध्ये १२० स्पर्धेक सहभागी होत असून आतापर्यंत झालेल्या चार राऊंडमध्ये केरळच्या खेळाडूंनी आघाडी घेतली आहे. या चॅम्पियनशीपमध्ये चालकाचा अत्यंत कस लागत असून शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक अवस्थांचे देखील मूल्यमापन होत असते. येथे बनविण्यात आलेला ट्रॅक ७५० मीटर लांबीचा असून यात १२ डबल जम्प, कट टेबलटॉप असे विविध प्रकारांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा बोकील स्मृती चषक ७ डिसेंबरपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसत्य क्रीडा मंडळ व नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक कै. बाबा बोकील यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ७ ते ९ डिसेंबर, दरम्यान ११व्या नाशिक जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बाबा बोकील स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन गेल्या दहा वर्षांपासून केले जात असून हे या स्पर्धेचे ११वे वर्षे आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या स्पर्धेचे उद्घाटन गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविलेल्या खेळाडूच्या हस्ते करण्यात येते. यावर्षी हा मान किलबिल शाळेची राष्ट्रीय खेळाडू सायली वाणी आणि विस्डम इंटरनॅशनल शाळेची राष्ट्रीय खेळाडू तनिषा कोटेचा या दोन युवा खेळाडूंना देण्यात आला आहे. तनिषा कोटेचा हिने गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे, तर सायली वाणीनेही याच स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळतांना चांगले प्रदर्शन केले होते.

या स्पर्धेत कॅडेट मुले-मुली, सब ज्युनियर मुले- मुली आणि वरीष्ट गट पुरुष आणि महिला अशा सहा गटात या स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचा आंतरराष्ट्रीय जलतरण खेळाडू तथा महाराष्ट्र शासनाचा एकलव्य क्रीडा पुरस्कारप्राप्त हंसराज पाटील उपस्थित राहणार आहे. जिल्हातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवहान शिवसत्य मंडळाचे उपाध्यक्ष अनिल (बंडू) सोनावणे, आमदार डॉ. राहुल आहेर, स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आडके, नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी तसेच स्पर्धा आयोजक तथा टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरावती, भंडारा संघाने वाजिवला ‘बँड’

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बँड स्पर्धेत पुरुषगटात अमरावतीच्या भानमाता विद्यालयाने तर मुलींमध्ये भंडारा येथील सनफ्लॅग हायस्कूल संघाने बाजी मारली.

नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे दुसऱ्या राज्यस्तरीय बँड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलीच्या विविध संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी भूषविले. या स्पर्धेत सहभागी संघानी बँडमधील कौशल्य सादर केले. काही संघानी सूत्रबद्ध बँडच्या कसरती करून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत मुलींमध्ये नागपूर विभागात भंडाऱ्याच्या सनफ्लॅग हायस्कूलने सुंदर सादरिकरण करीत स्पर्धेवर आपली छाप सोडत प्रथम क्रमांक पटकावला. तर अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलने त्याखालोखाल सुंदर प्रदर्शन करून दुसरा क्रमांक मिळविला तर नाशिक विभागामध्ये दोंडाईचाच्या हस्ती पब्लिक स्कुलने तिसरा क्रमांक मिळविला. मुलांमध्ये अमरावतीच्या ज्ञानमाता हायस्कूलने चांगले प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकावला तर दोंडाईचाच्याच हस्ती पब्लिक स्कूलने दुसरा क्रमांक मिळविला.

या स्पर्धेसाठी राज्य परीक्षक म्हणून शहादू धाकमोरे, प्रकाश सोनावणे, वाल्मिक गरुड, संजय खैराते, विजय निकम आदिंनी काम बघितले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, दिलीप दिघे, प्रकाश पवार, हेमंत कानडे आदिंनी अथक परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यवंशी ट्रॉफी जिंकण्यात मालेगावची हॅटट्रिक

0
0

आघारकर संघाने पटकावली भालेकर ट्रॉफी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी अंतर तालुका क्रिकेट स्पर्धेत मालेगाव संघाने नाशिक ग्रामीण संघाचा पराभव करीत सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला. तर सुधाकर भालेकर मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत भाई वडके संघाचा पराभव करीत अविनाश आघारकर संघाने विजय संपादन केला.

पारितोषिक वितरण समारंभ माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भालचंद्र गोसावी, राजेंद्र सूर्यवंशी, चित्रा सुधाकर भालेकर, प्रशांत भालेकर, विनोद शहा, समीर रकटे, योगेश हिरे, तरुण गुप्ता, चंद्रशेखर दंदणे उपस्थित होते.

पारितोषिक विजेते संघ व खेळाडू

किशोर सूर्यवंशी क्रिकेट स्पर्धा

विजेता संघ-मालेगाव

उपविजेता संघ-नाशिक ग्रामीण

मालिकावीर - दीपक शिरसाठ

अंतिम सामन्यात सामनावीर - रोहन परदेशी

उत्कृष्ट फलंदाज - लखन बोरसे

उत्कृष्ट गोलंदाज - हेमंत सदांशीव

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - हेमंत सदांशीव

सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी

विजेता संघ - अविनाश आघारकर संघ

उपविजेता संघ - भाई वडके संघ

मालिकावीर - निळकंठ तनपुरे

अंतिम सामन्यात सामनावीर - कुणाल कोठावदे

उत्कृष्ट फलंदाज - शाहरुख पटेल

उत्कृष्ट गोलंदाज - प्रतीक भालेराव

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - कुणाल कोठावदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालाजी मंदिर फोटो कॅप्शन

0
0

मनमंदिरा... तेजाने उजळून घेई साधका!

गंगापूर रोड येथील श्री शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हजारो दिव्यांच्या प्रकाशात ही पौर्णिमा गुरुवारी उजळून निघाली. मग या वेळी 'मनमंदिरा... तेजाने उजळून घेई साधका!' ही ओळ ओठी न आली तर नवलच.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम मंदिरप्रश्नी सेनेचे सोयीचे राजकारण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्यवारीवर, तसेच मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेल्या दुष्काळ आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जोरदार टीकास्र सोडले. उद्धव ठाकरेंनी अयोध्येच्या रामाचे दर्शन घेण्याऐवजी नाशिकच्या काळारामाचेही दर्शन घेतले असते तरी चालले असते, अशी खोचक टीका त्यांनी केली. गंभीर आणि मध्यम दुष्काळ अशी महसुलात व्याख्या नसतानाही, मुख्यमंत्र्यांकडून शब्दच्छल केला जात असल्याचे सांगत, मराठा आरक्षणाचा अहवाल सभेच्या पटलावर ठेवला नसतानाही, जल्लोष कशाचा करायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहर काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार चव्हाण म्हणाले, की ज्या समृद्धी महामार्गाला शिवसेनेने विरोध दर्शविला, त्याच महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यातूनच शिवसेनेची दुटप्पी भूमिका लक्षात येते. सरकारमध्ये राहून विरोधात काम करायचे ढोंग शिवसेना करीत आहे. अयोध्येतील राम मंदिर मुद्दा न्यायालयात प्रविष्ट आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम शिवसेना व भाजपकडून केले जात आहे. अयोध्येत जाऊन भाजपवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यातून फक्त शिळया कढीला ऊत आणला जात असल्याचा आरोप केला.

जल्लोष पोकळ घोषणेचा करायचा का?

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल विधानसभेत ठेवलेला नाही. अहवाल ठेवला नसताना चंद्रकात पाटील वेगळे सांगत आहेत, तर मुख्यमंत्री वेगळेच सांगत आहेत. अहवाल स्वीकारला नसताना आरक्षण कोणत्या आधारावर देणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत नाहीत. आरक्षण मिळालेले नसताना दुसरीकडे जल्लोष करायला लावत आहे. हा जल्लोष मुख्यमंत्र्यांच्या पोकळ घोषणेचा करायचा का, असा उपरोधिक सवाल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंचे निर्णय बदलणार!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकप्रतिनिधींच्या द्वेषापोटी नाशिककरांच्या हिताविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेले सर्व अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात येतील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली.

मुंढे यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर महापौरांसह उपमहापौर, सभागृह नेत्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधत मुंढेंच्या कार्यशैलीवर कठोर टीका करीत मुंढेंची बदली योग्य ठरवून बदलीचे स्वागत केले. मुंढे यांची बदली म्हणजे हुकूशाही कारभारामुळे वैतागलेल्या नाशिककरांसह सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याची भावनादेखील महापौरांनी व्यक्त केली. हेकेखोरीला सरकारने लगाम घातल्याचा दावा आमदार बाळासाहेब सानप यांनी केला.

मुंढेंची बदली बुधवारी झाली असली, तरी त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले नसल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी चुप्पी साधली होती. परंतु, गुरुवारी मुंढेंच्या बदलीचे आदेश धडकताच महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुंढे यांच्या बदलीचा सरकारने घेतला निर्णय स्वागतार्ह असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया महापौरांनी व्यक्त केली. नऊ महिन्यांपासून मुंढे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारभाराला संपूर्ण शहर त्रासले होते. लोकप्रतिनिधींचा अवमान जणू मुंढे यांना हक्काचा वाटत होता. शहरविकासासाठी करवाढ व्हावी, ही भावना वाईट नाही. परंतु, नाशिककरांवर अवाजवी करवाढ लादणे अन्यायकारक होते. त्याविरोधात भाजप नगरसेवकांनी आवाज उठविल्यानंतर मुंढेंनी नगरसेवकांना जणू शत्रूसमान वागणूक देण्यास सुरुवात केली. २५७ कोटींच्या रस्तेविकासासह सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव रद्द करून नाशिकच्या विकासाला खीळ घातली. नगरसेवकांच्या प्रस्तावांना मुंढेंनी 'ब्रेक' लावत मनमानी कारभार चालविला होता. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करण्याची विनंती त्यांना अनेक वेळा केली गेली. परंतु, त्यांनी हेकेखोरपणा कायम ठेवत नकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच त्यांना लोकप्रतिनिधींच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आता यापुढील काळात नाशिककरांना दिलासादायक निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक करवाढ रद्द करण्याबाबत विचार केला जाईल. मुंढेंनी घेतलेल्या निर्णयांबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून ते निर्णय बदलण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करून, नवीन आयुक्तांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करण्याची विनंती केली जाईल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र येऊन शहर विकास साधला जाईल, असा मनोदय महापौर भानसी यांनी व्यक्त केला.

------

'मुंढेंची बदली योग्यच'

विकासासाठीच नाशिककरांनी महापालिकेची सत्ता भाजपच्य हाती सोपविली होती. परंतु, नाशिककरांच्या विकासाच्या स्वप्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. गेल्या ११ वर्षांत १२ वेळा बदली झालेला अधिकारी चांगला कसा असू शकतो? त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांची संख्या जेतमेत हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. प्रत्येक नगरसेवकाला ४५ ते ५० हजारांच्या प्रभागाने निवडून दिले आहे. लोकप्रतिनिधींचा अवमान करून हुकूमशाही कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नाशिकमधून बदली होणेच योग्य आहे. यापुढच्या काळात सर्वांना सोबत घेऊन नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील.

---

केवळ आमदारकीच नव्हे, तर आपण नगरसेवक, उपमहापौर आणि महापौरपदीही काम केले आहे. परंतु, मुंढे यांच्यासारखा हेकेखोर स्वभावाचा अधिकारी कधी पाहिला नाही. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून नाशिकचे लोकप्रतिनिधी मुंढेंकडून वारंवार होणार अवमान सहन करीत होते. सरकारनेच त्यांच्या हेकेखोर कारभाराला लगाम घातला आहे.

-बाळासाहेब सानप, आमदार

--

मुंढेंनी शहरवासीयांची अपेक्षापूर्ती करण्याऐवजी वादच अधिक निर्माण केले. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नेहमीच दडपणाखाली ठेवले. ७० टक्के शहर त्यांनी परस्पर अनधिकृत ठरवले. प्रसिद्धीसाठी अनेक निर्णय घेऊन लोकप्रतिनिधींचा अवमान केला. शिवसेनेने त्यांच्या चुकीच्या कामांवर नेहमीच बोट ठेवले होते. त्यामुळे त्यांची बदली योग्यच आहे.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, शिवसेना

--

मुंढेंना काँग्रेसने कधीही विरोध केला नाही. परंतु, मुंढेंचे कामकाज हूकूमशाही पद्धतीचे होते. आयुक्तांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना नेमके उलटे काम करण्याची त्यांची पद्धत होती. लोकशाहीला अभिप्रेत काम त्यांच्याकडून होत नव्हते. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांनी महापालिकेत कामच केले नाही.

-शाहू खैरे, गटनेते, काँग्रेस

--

दत्तक नाशिकच्या विकासासाठी आणलेल्या मुंढेंनी नाशिक शहर भकास करण्यास सुरुवात केली होती. शेतकऱ्यांवर करवाढ, अंगणवाड्या बंद करणे, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले. लोकप्रतिनिधींचा अवमान करणे हाच त्यांचा उपक्रम होता. त्यामुळे त्यांच्या बदलीने फार मोठे आभाळ कोसळले नसून, हा बदलीचा निर्णय योग्यच आहे.

-सलिम शेख, गटनेते, मनसे

--

देशात प्रथमच शेतकऱ्यांवर कर लावण्याचा अविवेकी आणि बेकायदेशीर निर्णय मुंढेंनी घेऊन गरीबविरोधी असल्याचे दाखवून दिले होते. करवाढीबाबतचा त्यांचा निर्णय नियमाच्या बाहेर जाऊन होता. त्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायच झाला होता. त्यांच्या बदलीचा निर्णय योग्य असून, त्यांनी आता तरी दिल्या घरी सुखी राहावे.

-उन्मेश गायधनी, सल्लागार, कृती समिती नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ कोटींचा टीडीआरच देणार

0
0

घंटागाडी, टीडीआर घोटाळा चौकशीसाठी समिती, रेडिरेकनर दर आकारणी प्रस्ताव महासभेवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी आणि टीडीआर घोटाळ्याची चौकशीचे आदेश सभापतींनी दिले असताना सभेच्या कार्यवृत्तात त्याचा उल्लेख नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत नगरसचिवांना धारेवर धरले. चर्चेअंती संबंधित कार्यवृत्त तहकूब करीत येत्या आठवडाभरात या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती जाहीर करण्याचा निर्णय सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिला. तसेच गंगापूर रोडवरील सर्व्हे क्रमांक ७०५ मधील आरक्षित भूखंडाचा सुमारे २१ कोटी रुपये रोख मोबदला देण्याऐवजी सदस्यांच्या मागणीनुसार टीडीआरद्वारे मोबदला देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

स्थायी समितीची बैठक गुरुवारी सभापतींच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीच्या २ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सभेत घंटागाड्यांच्या अनियमितेवर वादळी चर्चा होऊन ठेका रद्द करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले. तसेच, टीडीआर घोटाळ्याविषयीही जोरदार चर्चा होऊन चौकशी अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले होते. परंतु, या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तर नाहीच; मात्र या सभेच्या कार्यवृत्तात याविषयी शब्दभरही उल्लेख न आल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत नगरसचिवांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. सभेत तीन-चार तास चर्चा होऊनही प्रशासन त्याची दखल घेत नसेल तर सभा घेण्यात अर्थ नाही, असे नमूद करीत या सभेचे कार्यवृत्त तहकूब करून त्यात दुरुस्ती करण्याची सूचना दिनकर पाटील, संतोष साळवे, मुशीर सय्यद, प्रवीण तिदमे, भागवत आरोटे आदींनी केली.

घंटागाडीच्या चौकशीचे आदेश स्थायी समितीने दिले असताना घाईघाईत घंटागाडी ठेकेदारांची कोट्यवधींची देयके प्रशासनाने कशी अदा केली, असा सवालही सदस्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. घंटागाडी आणि टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी तात्काळ समिती गठीत करण्यात यावी, अन्यथा सभागृहातच ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सदस्यांनी दिला. चर्चेअंती सभापतींनी दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी दिला.

संस्थांना मिळणार दिलासा

महापालिकेच्या मालकीचे समाजमंदिर, वाचनालय, व्यायामशाळा, अभ्यासिका, आदी मिळकती रेडीरेकनर दराने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा स्थायी समितीचा अधिकार कायमस्वरूपी आयुक्तांना देण्याच्या प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी सदस्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या मिळकती सेवाभावी संस्थांच्या ताब्यात असल्यानेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीची तोशीस महापालिकेला लागत नसल्याचा दावा करीत यासंदर्भातील महासभा, स्थायी समितीचे अधिकार प्रशासनाकडे गहाण ठेवण्याची गरज नसल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केल्याने संबंधित प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला. त्यामुळे मिळकतींबाबत आता अंतिम निर्णय हा महासभाच घेणार असल्याने या मिळकत वापरत असलेल्या संस्थांना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांचे गुन्हेगारांशी संबंध!

0
0

आमदार अनिल गोटे यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील गुंडाशी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे महापालिकेची निवडणूक मुक्त वातावरणात होऊच शकत नाही, असा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या मंत्र्यांसह त्यांचे स्वीय सहायक, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यांना जिल्हाबंदी करा, अशी मागणीही आमदार अनिल गोटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जर आयोगाने दखल घेतली नाही तर पोलिस अधिकाऱ्यांमधील संवेदनशील संभाषण मुंबईत माध्यमासमोर जाहीर करू, असा इशाराही त्यांनी गुरुवारी (दि. २२) पत्रकार परिषदेतून दिला आहे.

आमदार पत्नी हेमा गोटे यांचा अवमान करणारी पोस्ट सोशल मीडियावर शहरातील विनोद थोरात याने टाकली होती. त्याला अटक होऊन जामीनदेखील मिळाला. मात्र, या थोरात प्रकरणात मातृत्वाचा अवमान करणाऱ्याला या तीनही मंत्र्यांनी संरक्षण दिल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला. मंत्री आणि त्यांच्या दलालांचे संभाषणात उल्लेख असतानादेखील तपास यंत्रणेने साधा जवाबही नोंदवून घेतलेला नाही. यामुळे शासकीय अधिकारीदेखील मोठ्या दडपणाखाली काम करीत असल्याचेही गोटे म्हणाले. यांसारख्या अनेक घटनांचा उल्लेख निवडणूक आयोग दिल्ली व मुंबई यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे, अशी माहितीही आमदार गोटे यांनी यावेळी दिली. या सर्व प्रकरणाची ऑडिओ संभाषणाची सीडीदेखील सोबत दिली असून, निवडणूक आयोगाने आपण केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही तर सोमवारी (दि. २६) संबंधित संभाषणाची सीडी मुंबईत प्रसार माध्यमासमोर खुली करणार, असेही ते म्हणाले.

अन्सारी फातमा बिनविरोध

धुळे महापालिकेची निवडणूक दि. ९ डिसेंबर रोजी होणार असून, यासाठी शहरातील १९ प्रभागांतील ७४ जागांसाठी ७३२ उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले आहेत. या अर्जांची छाननी गुरुवारी करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक १२ अ मधून समाजवादी पक्षाकडून उमेवारी दाखल करणाऱ्या अन्सारी फातमा नुरल अमीन यांचा एकमेव अर्ज छाननीवेळी मंजूर झाला तर इतर तीन जणांचे अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध ठरल्याचे निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी घोषित केले. त्यामुळे आता ७३ जागांसाठी निवडणूक होणार असून, समाजवादी पक्षाच्या अन्सारी फातमा नुरल अमीन या बिनविरोध नगरसेविका ठरल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images