Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांचे अर्थमंत्र्याना साकडे

$
0
0

१७ महिन्यांपूर्वी सहा कर्मचारी केले होते कमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रिटिंग शाखेतील पदवी नसल्याने भारत प्रतिभूती मुद्रणालयामध्ये दहा महिने काम करून सहा कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर आता एका कामागाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे घातले आहे. त्यासाठी त्याने आपली कैफियत मांडणारे पत्रही त्यांना पाठविल्याने या कामगारांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

कैलास खेलूकर यांनी पाठवलेल्या या पत्रात त्यांनी आपली कैफियत मांडतांना सांगितले की, भारतीय प्रतिभूती मुद्राणालयाने २०१५ साली पर्यवक्षक व कार्यालयीन सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली. त्यात छपाई पर्यवक्षकाच्या २० जागा होत्या. सदर पदासाठी पात्रता प्रिटिंग शाखेतील पदविका होती. तर डिसिरायबल पात्रता प्रिटिंग, पेपर, मेकॅनिकल, मटॅलर्जी, इलेक्ट्रिक, संगणक, आयटीआय या शाखातील पदवी अशी होती. त्यामुळे या सगळयाच शाखातील पदवीधारक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. सदर पदासाठी ऑनलाइन परीक्षा आयबीपीएसद्वारे २०१६ च्या फेब्रुवारीत घेण्यात आली. त्यात पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत मार्चमध्ये झाली. मुलाखत घेणाऱ्या कमिटीमध्ये महाप्रबंधक, उपमहाप्रबंधक, प्रबंधक मानवसंसाधन, यांचा समावेश होता. मुलाखतीत यशस्वी उमेदवारांना एप्रिलमध्ये कामावर रुजू करण्यात आले. त्यानंतर त्यांनी १० महिने काम केल्यानंतर १ मार्च २०१७ मध्ये सहा कर्मचाऱ्यांना अचानक सेवेतून कमी करण्यात आले. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्याचे कारणही त्यांना दिले नाही.

चार कर्मचाऱ्यांची कोर्टात धाव

सेवेत कमी केल्यानंतर सहा पैकी चार कर्मचाऱ्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मुद्रणालयातर्फे सदर उमेदवारांकडे प्रिटिंग शाखेतील पदवी नसल्याने सेवेतून कमी केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने या कर्मचाऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी कारवाई केल्याचे सांगत हा दावा निकाली काढला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या म्हणणे ऐकून घेतले. त्यांना चुकून पर्यवक्षकांच्या जाहिरातीत पात्र ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे कैलास यांनी सांगितले.

धक्कादायक बाब

कैलास यांनी या पत्रात अजून एक धक्कादायक बाब मांडली आहे. या प्रकरणात सतकर्ता विभागाने केलेल्या चौकशीत असे आढळून आले की संबंधित पदासाठी प्रिटिंग व्यतिरिक्त इतर शाखातील उमेदवारांना पात्र ठरविण्याची परवानगी 'एसपीएमसीआयएल'च्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने मुद्रणालयाच्या प्रबंधकांना दिली होती. त्यानंतर संबंधित पदासाठी ऑनलाइन परीक्षा व मुलाखत घेण्यात आली.

एकीकडे भारत सरकार साफ नियत, सही विकासचा दावा करत असतांना दुसरीकडे मात्र केंद्राच्या या कंपन्यामध्ये प्रशांसनाची नियत साफ नाही. आम्हाला कमी करून मर्जीतील उमेदवारांना घेण्याची चर्चा आहे.

- कैलास खेडूलकर, निलंबित कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून अकरावीची विशेष फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आजपासून (दि. १८) विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. अद्याप कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात 'अलॉट' न झालेले विद्यार्थी व प्रथम पसंती क्रमांकाव्यतिरिक्त इतर पसंती क्रमांकाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट होऊनही अद्याप कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी घेण्यात येणार आहे. २१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना याअंतर्गत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

विशेष फेरीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये चौथ्या फेरीअखेर रिक्त असणाऱ्या जागा, अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयांनी समर्पित केलेल्या अल्पसंख्यांक इनहाऊस व व्यवस्थापन कोट्यातील जागा, प्रवेश रद्द केल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागा आदींमध्ये प्रवेश घेता येणार आहे. यापूर्वी झालेल्या चार नियमित फेऱ्यांमध्ये कोणत्याही फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झालेले विद्यार्थी व घेतलेला प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी मात्र या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. या विद्यार्थ्यांना विशेष फेरीनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीत सहभाग घेता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी आज सकाळी ११ वाजता प्रवेश प्रक्रियेच्या nashik.11thadmission.net या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.

\Bफेरीसाठी एकूण जागा

\Bशाखा-रिक्त जागा

कला-३५०

वाणिज्य-१०५९

विज्ञान-१६७१

एचएसव्हीसी -१२३

एकूण-३२०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता

$
0
0

कलावती छाजेड

नाशिक : येथील कलावती छाजेड (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अभयकुमार छाजेड यांच्या त्या पत्नी होत. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या त्या नातेवाईक होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आज श्रद्धांजली सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. १८) भाजपतर्फे श्रद्धांजली सभा होणार आहे. वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. आदर्श आणि मुत्सद्दी राजकारणी कसा असावा, याचा आदर्शपाठ घालून देत वाजपेयी यांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठा जोपासली. नाशिकनगरीशीही त्यांचे आपुलकीचे नाते होते. अनेक नेत्यांशी त्यांचा वैयक्तिक परिचय होता. त्याच्या निधानाचे वृत्त कळल्यानंतर नाशिककरांनाही मोठा धक्का बसला. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी दुपारी चार वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात शोकसभा होणार आहे. नाशिक महानगर भाजपच्या संयोजकांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेबाबत नगरसेवकांची अनास्था

$
0
0

एकाही महासभेला पूर्ण नगरसेवकांची उपस्थिती नाही

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये महासभेबाबत अनास्था दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या २५ महासभांमध्ये एकदाही १२७ नगरसेवकांनी पूर्णवेळ हजेरी लावली नसल्याचे समोर आले आहे. करवाढ रद्द करण्यासंदर्भात बोलावलेल्या महासभेलाच सर्वाधिक १२२ नगरसेवकांनी हजेरी लावल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक नगरसेवक महासभांना हजेरीपटावर सह्या करतात परंतु, महासभेत उपस्थित राहणे टाळत असल्याचे दिसून आले आहे.

महासभेच्या कामकाजाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओस्तवाल यांनी माहिती अधिकारातून नगरसचिवांकडून माहिती मागवली होती. ओस्तवाल यांना मिळालेल्या माहितीतून नगरसेवकांमध्ये महासभेबद्दल असलेली अनास्था दिसून आली आहे. गेल्या दीड वर्षातील भाजपच्या सत्तेत आतापर्यंत एकूण २५ महासभा झाल्या असून, त्यात पाच महासभा विविध कारणांनी तहकूब झाल्याचे म्हटले आहे. या २५ पैकी ३१ मार्च २०१८ रोजी झालेल्या महासभेत सर्वाधिक १६११ विषय, प्रस्ताव होते तर सर्वात कमी प्रस्ताव ३ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या महासभेत फक्त तीनच प्रस्ताव होते. करवाढ रद्द करण्यासंदर्भात १९ जुलै रोजी झालेल्या महासभेत १२७ पैकी १२२ नगरसेवकांनी हजेरी लावली होती. ही महासभा तब्बल बारा तास चालली होती. सर्वात कमी म्हणजे ४२ नगरसेवकांची उपस्थिती १९ मे रोजी झालेल्या महासभेत होती. एकूण २५ महासभांना गैरहजर नगरसेवकांची संख्या ४३३ इतकी असून, विद्यमान नगरसेवकांच्या संख्येच्या ३११ टक्के अनुपस्थितीचे प्रमाण आहे. ४११ नगरसेवकांपैकी ६ नगरसेवकांचे २५ महासभेत अनुपस्थित राहण्याकामी रजेचे अर्ज नगरसचिव विभागाला प्राप्त झाले आहेत.

-

शंभर रुपये भत्ता

नगरसेवकांना एका महासभेसाठी १०० रुपये भत्ता दिला जातो. जेवढ्या महासभांना नगरसेवक उपस्थितीत राहतात त्याच महासभेचा भत्ता मिळतो. सलग तीन महासभांना अनुपस्थित राहणारा नगरसेवक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चा कलम ११(क) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरतो, अशी माहिती अधिकारात ओस्तवाल यांना दिली. परंतु, महापालिकेत सलग तीनवेळा एकही नगरसेवक अनुपस्थित राहिला नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक केवळ सह्या करून महासभेला उपस्थित राहणे टाळत असल्याचे चित्र आहे.

-

नगरसेवक सभागृहात नाशिककरांचा आवाज बुलंद करण्याच्या नावाखाली मते मागतात. परंतु, निवडणूक जिंकल्यानंतर सभागृहात उपस्थित न राहणे ही चिंताजनक आहे.

- सुनील ओस्तवाल, माहिती अधिकार कार्यकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक फेरीसाठी तरुणी झाल्या सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'श्रावणक्वीन' स्पर्धेचा मानाचा झळाझळता मुकुट पटकवण्यासाठी प्राथमिक फेरीपासूनच स्पर्धकांनी कंबर कसली आहे. प्राथमिक फेरीत परीक्षकांवर छाप पाडण्यासाठी स्पर्धकांची तयारी अंतिम टप्यात आली आहे. रविवारी होणाऱ्या प्राथमिक फेरीत सौंदर्यासोबतच बुद्धिचातुर्य आणि कलागुणांचा प्रभाव पाडत 'सिटी फिनाले'त प्रवेश मिळविण्यासाठी तरुणी सज्ज झाल्या आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'वामन हरी पेठे ज्वेलर्स' प्रस्तुत, पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि रेजेन्सी ग्रुप, चॅनेल पार्टनर झी युवा 'श्रावणक्वीन' स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी (१९ ऑगस्ट) रोजी रंगणार आहे. यामध्ये रॅम्पवॉक, सेल्फ इन्ट्रोडक्शन, परफॉर्मन्स आणि टॅलेंट राउंड होणार आहे. या सर्व राउंडमध्ये अग्रेसर ठरणाऱ्या लावण्यवती स्पर्धकांना सिटी फिनालेत एंट्री मिळणार आहे. यात निवडलेल्या स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन होणार आहे. या ग्रुमिंगमध्ये स्पर्धकांचे इन्ट्रोडक्शन, कम्युनिकेशन स्किल्स, शोरूम व्हिजिट, फॅशन डिझायनिंग, फिटनेस हेल्थ केअर, फोटोशूट होणार आहे. सिटी फिनाले नाशिकमध्येच होणार आहे. यातून निवडण्यात आलेल्या अंतिम तीन विजेत्या श्रावणक्वीन्सना मुंबईत होणाऱ्या ग्रँड फिनालेत सहभागी होता येणार आहे. ग्रँड फिनालेसाठीचे ग्रुमिंग मुंबईत होणार आहे. ग्रँड फिनालेत नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील विजेत्या श्रावणक्वीन्समध्ये 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' स्पर्धा रंगेल. यात विजयी होणाऱ्या स्पर्धकाला श्रावणक्वीनचा झळझळता मुकुट मिळणार आहे. या रंगतदार कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी युवा वाहिनीवर होणार आहे.

... सविस्तर वृत्त- २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी नदीवरील पुलासाठी ग्रीन सिग्नल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकेश्वररोडवरील कुबेर स्वामी पेट्रोलपंपामागील नंदिनी नदीवरील पुलासाठी महापालिकेने दीड कोटीहून अधिक रकमेचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच या पुलाचे काम हाती घेण्यात येईल, असे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.

मळे परिसरात जाणारा नंदिनी नदीवरील हा पूल पूर्णपणे ढासाळला होता. मागील वर्षी पूल वाहून गेल्याने तत्कालीन प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देत पुलाची मागणी केली होती. नगरसेविका हर्षदा गायकर यांनीदेखील नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी केली होती. 'मटा'नेदेखील वेळोवेळी या पुलाच्या दुरवस्थेचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने अखेर या पुलासाठी निधी मंजूर केला आहे.

कुबेर स्वामी पेट्रोलपंपामागील पुलाचा सातपूर, पिंपळगाव व चुंचाळे शिवारात असलेल्या मळे परिसरात जाण्यासाठी वापर केला जातो. परंतु, अनेक वर्षांपासून या पुलाची दुरवस्था झालेली असल्याने येथे नवीन पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून केली जात होती. गेल्या वर्षी या पुलाचा भराव वाहून गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करीत तो वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, यावर्षी पुन्हा झालेल्या जोरदार पावसात पुलाला मोठे भगदाड पडले आहे. पर्यायाने तीन गावांतील रहिवाशांना मळे परिसरात जाण्यासाठी अंबड लिंकरोडवरील जाधव टाऊनशिपच्या रस्त्याने फेरा मारून जावे लागत आहे.

मागील वर्षी नंदिनी नदीवरील पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. महापालिकेकडे संबंधित पुलालासाठी प्रस्तावही सादर केला. आता महापालिकेने निधी मंजूर केल्याने नवीन पूल झाल्यावर त्याचा फायदा परिसरातील रहिवाशांना मिळणार आहे.

-माधुरी बोलकर, नगरसेविका

(लोगो : शुभ वार्ता)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल आयुक्तालयासमोर कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दिल्लीत भारतीय संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच अन्य मागण्यांप्रश्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे येथील विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वासमोर निदर्शने करण्यात आली. पक्षातर्फे महसूल उपायुक्त डॉ. दिलीप स्वामी यांना याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले.

दिल्लीत भारतीय संविधान जाळल्याची घटना नुकतीच घडली. संविधान जाळणाऱ्यांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाला लेखी निवेदन दिले. राज्यघटनेबाबत देशभरातील शाळा-महाविद्यालयांत जनजागृती करण्यासाठी आणि राज्यघटनेतील मूल्ये रुजविण्यासाठी खास उपक्रम सरकारतर्फे राबविण्यात यावा, अशी मागणीही यावेळी या निदर्शकांनी केली. याशिवाय मराठा समाजाच्या आंदोलनात आंदोलकांवर कलम ३५३ नुसार गुन्हे दाखल करून या कलमाचा दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले गेले आहे. या कलमाखालील गुन्हे मागे घेण्यात यावेत, नालासोपारा येथे सापडलेल्या बॉम्ब बनविण्याच्या साहित्याच्या गुन्ह्यांतील संशयित संबंधित असलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही यावेळी या निदर्शकांनी केली. या आंदोलनात पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य राजू देसले, शहर सचिव महादेव खुडे, प्रताप भालके, विमल पोरजे, राजपालसिंग शिंदे, जिल्हा सहसचिव दत्तू तुपे, व्ही. डी. धनवटे, ज्योती नटराजन, शिवनाथ जाधव, सुभाष गवारे, नामदेव बोराडे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभाग १० ‘ड’च्या रिक्त जागेसाठी होणार पोटनिवडणूक

$
0
0

राज्य निवडणूक आयोगाला मनपा पाठविणार अहवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर विभागातील भाजप नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० 'ड' या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी प्रभाग क्र. १३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्र. १० 'ड' मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेक सुदाम नागरे यांचे २९ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. नागरे यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्या संदर्भातील अहवाल महापालिकेच्या निवडणूक शाखेच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी स्थानिक नेत्यांसह भाजपची इच्छा आहे. परंतु, नुकत्याच प्रभाग क्र. १३ 'क' मधील मनसे नगरसेविका सुरेखा भोसलेंच्या निधनानंतर तेथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले होते. ही निवडणूक बिनविरोध झाली नसल्याने प्रभाग क्र. १० चीही पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरुणराजा पुरे‘पूर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरणासह हरणबारी आणि केळझर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरीसह मोसम आणि आरम नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यात काश्यपी, आळंदी, हरणबारी, केळझर, भावली, वाघाड, वालदेवी ही धरणे १०० टक्के भरली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने नाशिककरांची चिंता वाढली होती. परंतु, गुरुवारपासून पुन्हा पावसाने जोरदार कमबॅक केल्यामुळे धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होऊ लागली आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सकाळी १० वाजता १०१२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत २०२४ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. काश्यपी धरणातील पाणीसाठाही १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने तेथूनही दुपारी एक पासून ४०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गंगापूर, काश्यपीसह दारणा धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी पात्रातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून सकाळी सहा वाजेपासूनच ४ हजार १७२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. तर भावली धरणातूनही २०८ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. नांदूर मध्यमेश्वर येथून ६ हजार ३८३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

२४ तासांत ८१४ मिमी पाऊस

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ८१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वाधिक १०१ मिलीमीटर पाऊस पेठ तालुक्यात पडला. सुरगाण्यात ८६, इगतपुरीत ६५, मालेगावात ६४, नांदगावात ६०, येवल्यात ५९, कळवण आणि बागलाणमध्ये प्रत्येकी ५७, चांदवड आणि निफाडमध्ये प्रत्येकी ५४ तर त्र्यंबकेश्वरला ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. देवळ्यात ४३.४ मिलीमीटर पाऊस झाला असून नाशिक तालुक्यात २७.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिन्नर आणि दिंडोरीत मात्र पावसाच्या तुरळक सरी पडल्या असून, अनुक्रमे २६.४ आणि १४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शहरात ३९.१ मिमी पाऊस

शहरात गुरुवारपासून पावसाने मुक्काम ठोकला असून, गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये शहरात ३३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ५.६ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरूच होता. बागलाण आणि मालेगावातही पावसाचा जोर अधिक असल्याने आरम आणि मोसम नदीला पुर आल्याचे पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा कर्मचारी रस्त्यावर उतरतील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक न्याय विभागाची मूळ आस्थापना हस्तांतरित करण्याच्या शासनपातळीवर हालचाली चालू आहेत. समाज कल्याण विभागाची मूळ आस्थापना हस्तांतरित झाल्यास कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे मूळ आस्थापना समाज कल्याण विभागाकडून हस्तांतरित करण्यात येऊ नये] अन्यथा समाजकल्याण कर्मचारी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन पुकारतील असा इशारा समाज कल्याण कर्मचारी संघटनचे प्रदेशाध्यक्ष शांताराम शिंदे यांनी दिला. सामाजिक न्याय विभागाची मूळ आस्थापना विजाभज, इमाव, विमाप्र या विभागाला जोडण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. पूर्वीचा समाज कल्याण विभाग, गेल्या काही वर्षांपासून सामाजिक न्याय विभागाच्या नावाने ओळखला जात आहे. या विभागामार्फत पूर्वीपासूनच मागासवर्गीय कल्याणाच्या अनेक योजना राबविल्या जातात. वरचेवर आवश्यकतेनुसार योजनांमध्ये वाढ होत गेली. त्यामुळे योजना राबविण्यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी या विभागाचे अनेकवेळा विभाजन केले आहे. त्यामुळे आता पुन्हा विभाजन केल्यास त्याला विरोध केला जाणार आहे.

शासनाने जर सामाजिक न्याय विभागाची मूळ आस्थापना हस्तांतरित केल्यास त्यास समाज कल्याण कर्मचारी संघटना कडाडून विरोध करणार आहे. संघटना महाराष्ट्र राज्यात या शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी व मूळ आस्थापना सामाजिक न्याय विभागाकडेच ठेवण्याकरिता तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

शंभर कर्मचाऱ्यांची 'ब्रह्मगिरी' प्रदक्षिणा

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाचे १०० पुरुष व महिला अधिकारी, कर्मचारी रविवारी १९ ऑगस्ट रोजी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणार आहेत. सन २०१२ पासून सातत्याने समाज कल्याण विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल हे समाज कल्याण विभागात उत्साह वाढावा व चैतन्य निर्माण व्हावे यासाठी गेल्या सात वर्षांपासून विविध उपक्रमाचे आयोजन करतात. समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी २०१२ पासून 'ब्रह्मगिरी' ची प्रदक्षिणा करत आहेत. पहिल्या प्रदक्षिणेच्या वेळेस अवघे २० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर यात सातत्याने वाढ होऊन १०० अधिकारी, कर्मचारी या वर्षीच्या प्रदक्षिणेत सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ गोडसे यांचे (वय ५९) मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यापासून गोडसे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवार सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शनिवार (दि. १८) सकाळी ११ वाजता संसरी येथील दारणा नदीकाठी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. उत्कृष्ट मल्ल म्हणून लहानपणापासून गोडसे यांची कारकीर्द बहरात गेली. चुलते अंबादास गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने शिवसेनेचे त्यांना बाळकडू मिळाले. संसरी गावचे शाखाप्रमुख ते खासदार असा त्यांच्या जीवनप्रवास झाला. तरुणपणीच त्यांचे उमदे व भारदस्त नेतृत्व बघून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची (१९८४-१९९६) जबाबदारी सोपविली होती. नाशिक पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. याच दरम्यान शिवसेना संपर्कप्रमुख छगन भुजबळ यांचे नेतृत्त्वाखाली त्यांची जिल्ह्यात खेडोपाडी शिवसेनेच्या अनेक शाखा उघडल्या. शिवसेना प्रत्येक घरात घरात पोचविण्याचे काम त्यांनी केले. आपल्या बुलंद आवाज व भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे जिल्ह्यातील राजकारणात राजाभाऊंनी वेगळाच ठसा उमटविला होता.

अन् मिळाले खासदारकीचे तिकीट

नाशिकला १९९४ मध्ये शिवसेनेचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन राजाभाऊंच्या कारकिर्दीत झाले. या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांनी आई जगदंबेला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'बाई दार उघड' अशी हाक दिली होती. १९९४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी १९९६ मध्ये खासदारकीचे तिकीट दिले. डॉ. वसंत पवार यांचा पराभव करून ते खासदार झाले. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते.

गावाशी नाळ जुळलेली

ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला जिल्हाप्रमुख म्हणून राजाभाऊंची महाराष्ट्रासह देशात ओळख होती. त्यांच्या कारकीर्दीत सहकार क्षेत्रातही मुसंडी मारली अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, बाजार समिच्या, ग्रामपंचायत, सहकारी बँकांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे काम त्यांनी केले. अल्पावधीत ते बाळासाहेबांचे लाडके झाले. मीनाताई ठाकरे तर त्यांना मानसपुत्र मानत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय पध्दतीने डांगी गायींचे संवर्धन

$
0
0

राज्यभर संवर्धन चळवळ उभारण्याचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी गुजरातमधील गीर गायीचा वापर वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील डांगी गायींकडे दुर्लक्ष होत आहे. डांगी गायींचे योग्य संगोपन झाले नाही तर काही डांगी गायींची संख्या कमी होऊ शकते. असे होऊ नये, म्हणून राज्यातील तीनशे गायींचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन केले जाईल. तसेच डांगी गायींच्या संवर्धनासाठी राज्यभरात चळवळ उभारली जाईल, असा निर्णय राज्यव्यापी महासंमेलनात घेण्यात आला.

सह्याद्री डांगी गो संवर्धन संस्थेतर्फे डांगी गायींच्या संवर्धनासाठी शुक्रवारी कालिका मंदिर हॉलमध्ये राज्यव्यापी महासंमेलन झाले. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पशुसंवर्धन सहआयुक्त धनंजय परकाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे आणि निवृत्त पशुसंवर्धन अधिकारी संभाजी आव्हाड उपस्थित होते. यावेळी सहआयुक्त परकाळे यांनी उपस्थितांना डांगी गायींची माहिती सांगितली. राज्यातील डांगी गायींची संख्या वाढविण्यासाठी चळवळ उभी रहावी. यामध्ये शेतकरी तसेच दूध उत्पादकांचा लक्षणीय सहभाग असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील डांगी गायींचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन झाल्यास या गायी दिवसाला १० ते १२ लिटर दूध देऊ शकतात. सध्या महाराष्ट्रातील डांगी गायींचे संगोपन होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गुजरातमधील गीर गायींचा वापर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डांगी गायींची संख्या कमी होऊ शकते, अशी भीती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. नाशिक, अहमदनगर, ठाणे या भागातील शेतकरी, दूध उत्पादक या महासंमेलनास उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी योगेश सामृत, जगमोहन परदेशी, संदीप सोनवणे, सत्यजित शहा, हेमंत काकडे यांनी महासंमेलनाचे संयोजन केले होते.

पशुवैद्यांची मदत घेणार

सह्याद्री डांगी गो संवर्धन संस्थेतर्फे पहिल्या फेजमध्ये ३०० पैकी ५० डांगी गायी दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांना संगोपनासाठी देण्यात येणार आहेत. या गायींचे डाएट प्लॅन आखले जाणार आहे. त्यासाठी पशु डाएटिशिअन नेमला जाणार आहे. तसेच डांगी गायींच्या तब्येतीची तपासणी व काळजी घेण्यासाठी पशुवैद्यांची मदत घेतली जाणार आहे. संस्थेच्या कार्यालयात प्रत्येक गायीची संपूर्ण माहिती संकलित केली जाईल. त्यातून गायींची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने योजना आखल्या जातील, असे संस्थेतर्फे संमेलनात सांगण्यात आले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने गरोदर महिला ठार

$
0
0

इंदिरानगर : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने वडाळा गावातील रिंगरोडवरून रस्ता ओलांडणाऱ्या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात महिलेच्या पोटातील नऊ महिन्याचे अर्भकही बाहेर पडले. त्याचाही मृत्यू झाला.

वडाळा गावातील पांढरी आई देवी चौकात गुरुवारी (दि. १६) रात्री अपघात झाला. इरोम इरफान शेख (१९) असे यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वडाळा गावमार्गे नाशिकरोडकडे जाणाऱ्या ट्रकने (एम. एच. १८ बी. ए. ००४८) तिला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून महिला ती काही फुटापर्यंत चिरडली गेली. या घटनेने वडाळा गाव हादरून गेला. अपघाताची माहिती पोलिस व रुग्णवाहिकेला देण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहचल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी प्रसाद शेषराव बुधवंत (३८) ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच त्याचा शोध घेत अटकही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा देणार स्वच्छतेचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साकारण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छ भारत पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १ ते १५ सप्टेंबर या काळात विविध माध्यमांतून हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या असून स्वच्छता शपथ, स्वच्छ भारत गीतांचे प्रसारण, वादविवाद स्पर्धा आदी उपक्रम होणार आहेत. केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून याविषयीचे निर्देश देण्यात आले आहेत.

'स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे', असा संदेश देत ही सवय पुढील पिढीमध्ये रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ सप्टेंबर रोजी शाळा व शिक्षण संस्थांनी स्वच्छता शपथ घ्यायची आहे. पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, पालक, शिक्षक यांच्या बैठका घेण्यात येणार असून, स्वच्छता व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत 'विद्यार्थी राजदूत'ची नेमणूक करण्यात येणार आहे. शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांवर त्यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. या पंधरवड्याअंतर्गत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर, शौचालय स्पर्धाही घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जळगाव-जिल्ह्यातील १० तालुक्यात अतिवृष्टी

$
0
0

जिल्ह्यातील १० तालुक्यात अतिवृष्टी

हतनूरचे ३६ दरवाजे उघडले; पिकांना जीवदान मिळणार

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनातर्फे करण्यात आली. पावासामुळे हतनुर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात पाचोरा तालुक्यात सर्वाधिक ९८.४ मिमी, रावेर ९४.१ मिमी, जामनेर ९३.४ मिमी, चाळीसगाव ९० मिमी, जळगाव ८६.७ मिमी, बोदवड ८६.३ मिमी, एरंडोल ८१ मिमी, भुसावळ ७६.८ मिमी, पारोळा ७३.६ मिमी, यावल ६६.४ मिमी अशा १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. ज्याठिकाणी ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्याठिकाणी अतिवृष्टीची नोंद केली जाते.

जिल्ह्यात ५१.२ टक्के पाऊस

जिल्ह्यात दि.१ जून ते १७ ऑगस्ट कालावधीत ५१.२ टक्के पर्जन्यमान झाले. त्यात जळगाव ५०.६, जामनेर ४४.१, एरंडोल ६७.३, धरणगाव ६६.१, भुसावळ ४१.३, यावल ४१.९, रावेर ४९.७, मुक्ताईनगर ४३.७, बोदवड ५७.०, पाचोरा ४८.८, चाळीसगाव ५१.४, भडगाव ४६.९, अमळनेर ४६.९, पारोळा ६६.५, चोपडा ४९.४ असा एकुण ५१.२ टक्के पाऊस झाला आहे.

धानवड, उमाळा, दापोर्‍यात घरांची अंशत: पडझड

जळगाव तालुक्यातील धानवड आणि उमाळा येथे प्रत्येकी ३ कच्चा घरांची अंशत: पडझड झाली आहे. तर दापोरा येथील दोन घरांची पडझड झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. गुरूवारी झालेल्या दमदार पावसाने वाघूर व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हतनूर धरणात पाणी येणे सुरू झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. शुक्रवारी धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले.जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या घरातूनसोनसाखळीची चोरी

$
0
0

जळगाव : मेहरूण परिसरातील इंद्रप्रस्थनगरातील आसमाबी खलील देशमुख यांनी घरातील पलंगावर ठेवलेली १७ हजार ५४५ रुपये किंमतीची सोनसाखळी चोरून नेल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी सकाळी ८ वाजता आसमाबी यांचे पती खलील देशमुख कामावर गेले. त्यानंतर सकाळी ९ वाजता आसमाबी यांनी गळ्यातील सोनसाखळी काढून ती घरातील पलंगावर ठेवून त्या बाथरुममध्ये गेल्या. काही वेळानंतर घरात आल्यावर त्यांना पलंगावर ठेवलेली सोन्याची पोत नव्हती.

रिक्षाची धडक; ४ जखमी

जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाली़ या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन भीमराव खरात (वय २१), नर्मदा भीमराव खरात, नगाबाई नामदेव खरात (वय ६५, सर्व रा़ चिंचखेडा तवा, ता़ जामनेर) व सुमन दीपक दांडगे (वय २७, रा़ गोद्री) अशी चौघा जखमींची नावे आहेत.

गणेश कॉलनीत दुकानात आग

गणेश कॉलनी येथील मुख्य रस्त्यावरील युनीक थ्री सिस्कटी फाईव्ह बेकर्स हे राजेश गोविंद भोजवानी यांचे केकचे दुकान आहे. गुरुवारी रात्री नेहमीच्या वेळेवर दुकान बंद करून ते घरी गेले. रात्री अडीच्या दरम्यान विद्युत दाब वाढल्याने दुकानातील दोन स्टॅपिलायझर जळाले. आगीत संपूर्ण दुकान खाक झाले. दुकानाच्या शटरमधून धुरीचे लोळ उठत असल्याचे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी भोजवानी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. शटर उघडून त्यांनी पाणी टाकून आग विझवली. आगीत सुमारे तीस हजाराचे नुकसान झाल्याची माहिती भोजवाणी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल चोरीप्रकरणी दोन मुले ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी परिसरातील विविध ठिकाणांहून महागड्या सायकली चोरणाऱ्या दोन विधिसंघर्षित मुलांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़. त्यांच्याकडून ३३ हजार रुपये किमतीच्या सात सायकली जप्त करण्यात आल्या आहेत़

पंचवटी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सायकली क्लासेस, तसेच घराजवळून चोरीस जात होत्या. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने पंचवटी पोलिस संबंधित गुन्हेगारांच्या मागावर होते. दोन दिवसांपूर्वी काही विधिसंघर्षित मुले फुलेनगर येथे सायकल विक्रीसाठी आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर, हवालदार विलास बस्ते, सतीश वसावे, सचिन म्हसदे, भूषण रायते, दशरथ निंबाळकर, जितू जाधव आदींनी तेथे सापळा रचून दोन संशयित विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता परिसरातील विविध ठिकाणांहून सायकली चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या ३३ हजार रुपये किमतीच्या सात सायकल जप्त केल्या आहेत़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतस्मृतीने जपल्या ‘अटलजींच्या आठवणी’

$
0
0

सर्वसमावेशक अजातशत्रू लोकनेत्यास गमावल्याच्या मान्यवरांच्या भावना

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना जळगाव जिल्हावासीयांकडून मिळालेला गौरवनिधी जळगाव जिल्हा भाजपला पक्ष निधी म्हणून दिला होता. त्यांनी दिलेल्या या निधीतून जळगावातील ‘वसंतस्मृती’ हे भाजप कार्यालय साकारण्यात मदत झाली होती. त्यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ झाल्याने ‘वसंतस्मृती’ हे जळगाव जिल्हा भाजप कार्यालय ‘अटलजींची आठवण’ देत राहील, अशा भावना भाजपाचे पदाधिकारी व कार्यर्त्यांनी ‘मटा’शी बोलतांना व्यक्त केल्या. देशाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या रुपाने एक सर्वसमावेशक अजातशत्रू लोकनेत्यास गमावल्याच्या भावना मान्यवरांनी बोलून दाखविल्या.

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी गुरुवारी सायंकाळी येताच जळगाव जिल्हा भाजप कार्यालयात आमदार सुरेश भोळे, पदाधिकारी तसेच जुने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते. सर्वप्रथम आमदार भोळे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयातील ‘वसंतस्मृती’मधील पक्षाचा ध्वज उतरविण्यात आला. त्यानंतर भारतरत्न वाजपेयी यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त कळताच जुने पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील कार्यालयात येत होते. येणारा प्रत्येक कार्यकर्ता अटलजी यांच्या प्रतीमेला पूष्प अर्पण करून श्रध्दांजली देत होते. श्रद्धांजलीच्या सामूहिक कार्यक्रमानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.

‘वसंत स्मृती’त ‘अटलजींच्या स्मृती’
जळगाव जिल्ह्यात अटल बिहारी बाजपेयील हे १९५३ मध्ये त्यानंतर अनेकवेळा प्रदेश अधिवेशन, जाहीर सभा अशा वेगवेगळ्या निमित्ताने जळगावात आले होते. जळगावातील भाजप कार्यालयाचा १९९६ मध्ये अटलजींच्या हस्तेच शुभारंभ झाल्याच्या जुन्या आठवणी भाजपचे ज्येष्ठ नेते उदय भालेराव, गजानन जोशी यांच्यासह सुभाष शौचे, राजू मराठे, दीपक सूर्यवंशी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितल्या. विशेष म्हणजे, अटलजी जळगावात आले असताना त्यांच्यासाठी जिल्ह्यातून गौरवनिधी त्यांना जाहीर सभेत देण्यात आला होता. मात्र, तो निधीही त्यांनी त्याच सभेत जळगाव जिल्हा भाजप पक्षासाठी दिला होता. या निधीतून जळगावातील भाजप कार्यालय उभारण्यासाठी मदत झाल्याचे सुभाष शौचे, विशाल त्रिपाठी, राजू मराठे यांनी सांगितले. त्यामुळेच भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यालयात कायम अटलजींच्या स्मृतींचा सुगंध दरवळत राहील, अशा भावना देखिल या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

नेता कसा असावा याचे आदर्श उदाहरण

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी व स्फूर्तिदायक आहे. राजकीय जीवनात काम करीत असताना त्यांना कोणीही शत्रू नव्हता. अगदी विरोधकांनाही हवेहवेसे वाटणारे हे व्यक्तिमत्व होते. लहानपणापासून त्यांचा सहवास व मार्गदर्शन मिळाल्याचे भाग्य मला लाभले. कविमनाचे व हळवे असले तरी अटलजी हे तितकेच कठोर होते. पोखरण अणूचाचणीच्यावेळी त्यांनी हे सिद्ध केले. भारताला त्यांनी स्वसरक्षित करताना त्यांनी जागतिक स्तरातून होणाऱ्या विरोधाला जुमानले नाही. नेता कसा असावा याचे उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे अटलजी होते.
- एकनाथ खडसे, आमदार

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व हे सर्वांसाठीच आदर्श होते. राजकारणातील तरुण पिढीसाठी अटलजी हे प्रेरणास्थान होते. अटलजींचा जळगाव येथे दौरा झाल्यानंतर त्यावेळेला मी, एक सर्व सामान्य कार्यकर्ता होतो. सर्वसामान्य कार्यकर्त्याशीदेखील त्यांची असलेली आस्था मी अनुभवलेली आहे. त्यांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने देशाचेच नव्हे तर पक्षाचे आणि माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे पक्षातच नव्हे तर सर्वांनाच हवेहवेसे वाटायचे. मात्र, सत्तेत विरोधक म्हणून भूमिका बजावताना त्यांना भारतातर्फे बोलणी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पाकिस्तानात पाठवले होते. जळगाव जिल्ह्यात भाजपच्या प्रचारासाठी ते अनेकवेळा आले होते. पंतप्रधान असताना त्यांनी केलेली पोखरण अणूचाचणी व कारगिलच्या लढार्इतील विजय कायम स्मरणात राहील.
- सुरेश भोळे, आमदार, जळगाव

राजकारणात मार्गदर्शकांची फार कमतरता आहे. अशा परिस्थितीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले मार्गदर्शक आज हरपले आहे. अटलजी केवळ राजकरणी नव्हते तर ते एक उत्तम कवीदेखील होते. त्यांच्या कविता आजही अनेकांसाठी दिशादर्शक म्हणून काम करतात. कवितांच्या माध्यमातून अटलजी अजरामर राहतील.
- ए. टी. पाटील, खासदार, जळगाव

माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या काळापासून ते आजपर्यंत एक परिपूर्ण, समाधानी जीवन अटलजी जगले. अत्यंत संयमी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. सन १९९६ मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीने त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले तेव्हा त्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मी लोकसभेत सभापतींसमोर शपथ घ्यायला गेलो तेव्हा मी अटलजींना नमस्कार करून शपथ घेतली होती. त्यावेळी अटलजी म्हणाले ‘आप एक डॉक्टर हो...हमारे डॉक्टर को पराजित करके आए हो....आपका स्वागत है’ असे म्हटल्यानंतर त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून आला.
-डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार, काँग्रेस

सर्वसामान्य जनतेच्या मनात सर्वाधिक लोकप्रियतेचे स्थान असलेले अटलजी हे विसाव्या शतकातील एकमेव नेते होते. संवेदनशील राजकारणी, कविमनाचे सहृदयी व्यक्तिमत्व आणि प्रचंड व्यासंग असलेले अटलजी यांचे कार्यकर्तृत्व एकमेवद्वितीय आहे. अटलजींची अमोघ भाषणशैली अनुभवण्याची संधी मला दोन वेळा जळगाव येथेच मिळाली. दोन्हीपैकी एक सभा जुन्या कॉटन मार्केट परिसरात आणि दुसरी जी. एस. ग्राऊंडवर झाल्या होत्या. अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण पाहतो. कवितेतून त्यांनी आपले विचार खुलेपणाने मांडले आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.

अटलजी प्रचारसभेसाठी जळगावात येणार होते. त्यांना औरंगाबाद येथून जळगावात आणण्याची जबाबदारी माझी होती. त्यांना कारमधून मी जळगावात आणले. मी कार चालविताना अटलजी पुढच्या सीटवर बसले होते. या वेळी त्यांनी मला जळगावबद्दल विचारणा केली. भर दुपारी ३ वाजत सभा असल्याने लोक येतील का, असे त्यांनी विचारले होते. त्यावर मी तुम्हाला ऐकण्यासाठी लोक येणारच असे सांगितले होते. हा प्रवास माझ्यासाठी कायम संस्मरणीय राहील.
-गजानन पन्नालाल जोशी, माजी शहराध्यक्ष, भाजप

जळगावात १९९६ साली भाजपचे प्रदेश अधिवेशन झाले होते. तेव्हा अटलजी दोन दिवस जळगावात होते. तेव्हा मला त्यांना सहवास लाभला. केशव स्मृती प्रतिष्ठानाने अटलजींच्या ‘उनकी याद करे’चे हक्क घेतल्यानंतर त्याच्या चित्रिकरणावेळी काही तास त्यांच्या निवासस्थानी थांबण्याचा योग आला होता. एकदा जळगाव रेल्वेस्थानकावर त्यांना आणण्यासाठी गेलो असतांना त्यांना माळ घालून फोटो काढत होते. तेव्हा ‘एक तो हार पैहनीये या फोटो निकालीए’ असे म्हणत त्यांनी रागावले. मात्र, नतंर पाठीवर थोपटत कल निकालेंगे फोटो, असे म्हणत समजावले!
-उदय भालेराव, माजी नगरसेवक

अटलजी यांच्यासमवेत आयुष्यातील काही दिवस व्यतीत करण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले. हिंदी भाषेवर त्यांचे मोठे प्रभूत्व असणाऱ्या अटलजी यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर खूप दु:ख झाले. अंत्यत दुदैवी घटना घडली असून, मन मानायला तयार नाही. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या अटलजींना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या सहवासाची सुवर्ण क्षणांचे विस्मरण अशक्यच.
- अनिल गोटे, आमदार धुळे

अटलजी यांच्या जाण्याने या देशाने सुपूत्र गमावला आहे. अटलजींच्या काळामध्ये या देशाने मोठ्या प्रगतीचा टप्पा गाठला. यामुळे देश विकासाच्या वाटचालील अग्रेसर झाला. त्यांचे योगदान हा देश कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या कार्याला मनपूर्वक नमन आहे. त्यांनी भारतीय राजकारणात अनेक संकेत आणि आदर्श घालून दिले आहेत. त्यांच्यारुपाने देशाने एक सक्षम नेत्याला गमावलेले आहे.
- कुणाल पाटील, आमदार, धुळे ग्रामीण

भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला आधुनिकतेकडे नेले. ते एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अमृतसर-लाहोर बससेवा सुरू करीत भारत आणि पाकिस्तानमध्ये एक नव्या अध्यायाचा प्रारंभ केला. नदीजोड प्रकल्पाची संकल्पना त्यांनी मांडली होती. जगात भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी पोखरणला अणूचाचणी करण्याचे धारिष्ट्य दाखविले. ‘गोल्डन कॉरिडोर’ची तसेच ग्रामीण भागाचा विकास कसा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अटलजींच्या जाण्याने देश पोरका झाला.
- अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष, भाजप, धुळे

माजी पंतप्रधान वाजपेयी देशातील चारित्र्यसंपन्न नेत्यांपैकी एक होते. अत्यंत संवेदशील मनाचे नेतृत्व असणाऱ्या अटलजी यांच्यावर एकही डाग नव्हता. देशाच्या राजकारणात सतत सक्रीय राहून दिशा देणारे नेतृत्वात अटलजी होते. कुणाबद्दलही द्वेष त्यांच्या मनात कधीही नव्हता, विरोधकांबद्दलदेखील ते सन्मान आणि आदर करीत असत.
- प्रा. शरद पाटील, माजी आमदार, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यातून उलगडली कवितेची पाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कवयित्री इंदिरा संत यांची अखंड ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या सूर्यनारायणाची उपासणा करणारी 'या हो सूर्यनारायणा', भा. रा. तांबे यांची 'पिवळे तांबूस ऊन कोवळे', चिमुकल्यांच्या बालविश्वातील निसर्गाचे वर्णन करणाऱ्या शिरीष देशपांडे यांच्या 'कलिका कशा गं बाई फुलल्या' अशा सुरेख कवितांवर नृत्याचे सादरीकरण करून कवितेची पाने व चिमुकल्यांचे भावविश्व उलगडण्यात आले. निमित्त होते, किर्ती भवाळकर आणि सायली मोहाडकर यांच्या नृत्यांगण कथकनृत्य संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवाचे. परशुराम साइखेडकर नाट्यगृहात शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात किर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी 'कवितेचे पान' हा निसर्ग कवितांवर आधारित कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी', या मराठी अभिमान गीताने झाली. मराठी माणसामधील अभिमान जागवणाऱ्या या गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. किलबिल किलबिल पक्षी बोलती, शंकर रामाणी लिखित हे पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्या आवाजातील 'माझिया दारात चिमण्या आल्या', इंदिरा संत यांची 'उंच उंच माझा झोका', 'संथ वाहते कृष्णामाई', 'सुंदर साजिरा श्रावण आला', श्रावणमासी हर्ष मानसी', 'सरीवर सरी आल्या गं', या कवितांवर नृत्यसादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता संत तुकारामांच्या 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' या भैरवीने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सायली मोहाडकर दिग्दर्शित 'नर्तन गणेश' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. बुद्धीची आणि कलेची देवता असलेल्या श्रीगणेशाची विविध रुपे नृत्यातून सादर करण्यात आली. 'गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू' आणि 'वक्रतुंड महाकाय', या श्लोकाने करण्यात आली. त्यानंतर राधा मंगेशकर यांच्या आवाजातील 'आला रे गणपती', शंकर महादेवन यांच्या आवाजातील 'प्रणम्य शिरसा देवम्', 'हे गजवदन वक्रतुंड महाकाय' या गाण्यावर आधारलेल्या नृत्यातून गणपतीची विविध रुपं दर्शविण्यात आली. त्यानंतर 'तुझ्या कांतीसम', 'हे गजवदना गौरी नंदना, 'जय गणेश नर्तन करी', गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. शंकर वंदना आणि त्रितालाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रचिती भावे, विशाखा अस्वले, क्षमा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images