Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पहिल्या सोमवारी भाविकांची तुरळक गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबेकश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा श्रावणात अधिक ओघ असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, पहिल्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या तुरळक असल्याचे पहावयास मिळाले.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. श्रावणात तर भाविकांची रिघ लागते. त्यांना त्र्यंबकेश्वरपर्यंत सहज पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सीबीएस येथील बसस्थानकातून सुमारे १०० बसेसची व्यवस्था केली होती. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पुरेशा बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले. रविवारी (दि. १२) सायंकाळनंतर फेरीसाठी जाणाऱ्यांचा ओेघ होता. परंतु, सोमवारी दिवसभर फारसा ओघ नसल्याचे पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाळीस कोटींची मदत

$
0
0

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ४० कोटी ५८ लाखांची मदत पाठवली आहे. ६९ हजार ४६७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.

नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील २६ हजार ८८३ शेतकऱ्यांसाठी २२ कोटी ३४ लाख ३२ हजार रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये साधारणत: ३३ हजार ३५३ हेक्टरवरील पिकांना या पावसाचा फटका बसला होता. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा आणि डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला, तर जळगावात केळी आणि अन्य काही पिकांचे नुकसान झाले. प्राप्त निधी जिल्हा स्तरावरून डीबीटी अंतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात सरकारने २०१६ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १८ लाख रुपयांचा निधी पाठविला होता.

..

जिल्हानिहाय मदत

जिल्हा शेतकरी क्षेत्र (हेक्टर) अनुदान

नाशिक २८८८३ १३८७६ २२३४.३२

जळगाव ३२३४५ १४११४ ११०५

नगर ९२५८ ४४८८ ६०६

नंदुरबार ८४२ ८०७ १०१

धुळे १३९ ६६ ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्रे पळवताहेत अर्धवट जळालेले मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील मोरवाडी येथील अमरधाममधील अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे अवयव परिसरातील कुत्रे थेट रस्त्यावर घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सिडकोतील मुख्य रस्त्यावर असलेल्या मोरवाडी येथील अमरधाममध्ये पालिकेने काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सिडकोतील सुविधा उपलब्ध असलेली ही एकच स्मशानभूमी असल्याने येथे वारंवार गर्दी होत असते. मागील दोन ते तीन दिवसांपासून याठिकाणी सायंकाळी काही कुत्रे स्मशानभूमीत अर्धवट जळालले मृतदेहांचे अवयव थेट रस्त्यावरच घेऊन येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सोमवारीही असाच प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली. या स्मशानभूमीबाबत अनेक तक्रारी येत असतानाही ठेकेदारावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी सिडकोतील सभापतींसह सर्वच नगरसेवकांनी या स्मशानभूमीच्या ठेकेदाराबाबत तक्रारी करून आंदोलन केले होते.

अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालतात

स्मशानभूमीच्या ठेकेदाराबद्दल यापूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन करूनही प्रशासनाला जाग येत नाही. अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे ठेकेदाराला पाठीशी न घालता ठोस कारवाई करून काळ्या यादीत टाकावे.

- रत्नमाला राणे, नगरसेविका

मृतदेहाची अवहेलना झाल्याचे लक्षात आल्यावर तातडीने कर्मचारी पाठविले होते. ठेकेदाराबाबत तक्रारी येत असल्या तरी नवीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही सुविधा एकदम बंद करता येणार नाही.

- डॉ. सचिन हिरे, आरोग्याधिकारी

अशा व्यक्‍तीचा ठेका रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल करावे. माणुसकीला काळिमा फासणार हा प्रकार आहे. अत्यंविधी होईपर्यंतची जबाबदारी पूर्णपणे येथील कर्मचाऱ्यांची असते.

- हर्षा बडगुजर, सभापती, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील घातपाताच्या घटनांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग समोर आला आहे. असे असूनही शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे आणि सनातन संस्थेला राजाश्रय मिळत असल्याचा गंभीर दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केला आहे. राज्यात सापडलेली स्फोटके ही फटाके आहेत का? असा सवाल करीत या प्रकरणात सनातन सोबत अनेक संघटना ही दडलेल्या असून, त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडून कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यासाठी 'मोदी हटाव-संविधान बचाव' हा नारा देत देशात महाआघाडी केली जाणार असून, यात शिवसेना नसणार असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकार सर्वाधिक भ्रष्ट आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा भाजपने केलेला दावा फोल ठरला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गाला प्राधान्य दिले जात आहे. कर्जमाफीत मोठा घोटाळा झाला आहे. राफेल प्रकरणात ३६ कोटींचा घोटाळा झाला आहे. मात्र त्यावर केंद्र सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षण हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. आघाडी सरकारने आरक्षण दिले होते मात्र भाजप सरकारला हे आरक्षण टिकविता आलेले नाही. आरक्षणाबाबत त्यांची भूमिका फसवाफसवीचे आहे. विरोधकांना विश्वासत घेतले जात नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस काहीही सांगितले जात नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारची भूमिक संदिग्ध असल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेस आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष शरद आहेर, संपतराव सकाळे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, राहुल दिवे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील आव्हाड, भारत टाकेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली

$
0
0

दुसरा सामना अनिर्णित; अय्यर, बावणे यांची अर्धशतके

वृत्तसंस्था, बेंगळुरू

भारत 'अ' संघाने दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या दोन अनऑफिशियल कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. भारत 'अ' संघाने पहिला सामना डाव आणि ३० धावांनी जिंकला होता. मालिकेतील दुसरा सामना सोमवारी अनिर्णित राहिला. भारत 'अ'संघाकडून दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर आणि अंकित बावणे यांनी अर्धशतके झळकावली.

चारदिवसीय सामन्यात हनुमा विहारीचे शतक (१४८) आणि अंकित बावणेच्या (८०) अर्धशतकाच्या जोरावर भारत 'अ' संघाने पहिल्या डावात ३४५ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका 'अ' संघाने ३ बाद २१९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला पावसाचा फटका बसला. रविवारी केवळ ३२.४ षटकांचाच खेळ झाला. तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका संघाने ७ बाद २९४ धावा केल्या होत्या. अखेरच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघ किती धावांपर्यंत मजल मारणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र, सोमवारी दक्षिण आफ्रिका संघाला कालच्या धावसंख्येत केवळ २५ धावांची भर घालता आली. अर्थात, ३१९ धावांवर दक्षिण आफ्रिका 'अ' संघाचा डाव आटोपला आणि भारत 'अ' संघाला २६ धावांची आघाडी मिळाली. भारत 'अ' संघाकडून महंमद सिराजने ७२ धावांत ४, अंकित राजपूतने ५२ धावांत ३, तर युझवेंद्र चहलने ८४ धावांत २ बळी घेतले.

दुसऱ्या डावात भारत 'अ' संघाची ३ बाद ५४ अशी स्थिती झाली होती. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या विहारीला खाते उघडता आले नाही, तर पृथ्वी शहा ४ धावा आणि मयंक अगरवाल २८ धावाकरून परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंकित बावणे यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारत 'अ' संघाने ५१व्या षटकांत ४ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. अखेरीस ही लढत अनिर्णित राहिली. श्रेयसने १०३ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६५ धावांची, तर अंकित बावणेने १०० चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : भारत 'अ' : पहिला डाव - सर्वबाद ३४५ आणि दुसरा डाव - ५१ षटकांत ४ बाद १८१ (श्रेयस अय्यर ६५, अंकित बावणे नाबाद ६४, दुआन ऑलिव्हर १०-५-२४-२; सेनुरन मुथूस्वामी १२-२-४५-२) अनिर्णित वि. दक्षिण आफ्रिका 'अ' : पहिला डाव - ९८.२ षटकांत सर्वबाद ३१९ (झुबेर हमझा ९३, सारेल एरवी ५८, रूडी सेकंड ४७, सेनुरन मुथूस्वामी ३५, महंमद सिराज २१.२-४-७२-४; अंकित राजपूत २०-७-५२-३; युझवेंद्र चहल २२-१-८४-२).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांकडून निषेध अन् बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वीज नियामक आयोग ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आले नसून, महावितरणचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आले आहे. वीज नियामक आयोगाकडूनच ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा निषेध करीत ग्राहकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात निषेध नोंदवत सुनावणीवर बहिष्कार घातला.

आयोगाचे सचिव अभिजीत देशपांडे, सदस्य मुकेश फुल्लर, आय. एम. बोहरी यांच्यासमोर सकाळी १० वाजता सुनावणी सुरू झाली. महावितरणच्या वतीने ही दरवाढ कशी योग्य आहे, हे आयोगाला पटवून देण्यासाठी महावितरणच्या वित्त विभागाचे संचालक सतीश चव्हाण यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन दाखवले. आयोगानेही महावितरणचे म्हणणे ऐकून घेत ग्राहकांनी आपली बाजू मांडावी, असे सांगितले. यावेळी नाशिकचे सतीश शहा हे बाजू मांडण्यासाठी उभे राहिले असता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांनी आयोगाला विनंती केली. मात्र, आयोगाने ती मागणी फेटाळली. यावेळी शहा यांनी पुन्हा पुन्हा मागणी केली असता आयोगाने ती मान्य करण्यास नकार दिला. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व ग्राहकांनी शहा यांना बाजू मांडण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करू द्यावे, असा आग्रह धरला. मात्र, आयोगाने ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आयोग जर ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेणार नसेल तर या सुनावणीला काय अर्थ आहे, असा सवाल करीत उपस्थित असलेल्या ग्राहकांनी निषेधाच्या घोषणा देत सुनावणीवर बहिष्कार घातला. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते.

सुनावणीला अध्यक्षच अनुपस्थित

वीज दरवाढीसंदर्भातील सुनावणी वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत होणे गरजे असते. मात्र, नाशिकची सुनावणी ही एकतर्फी होत असून, महावितरणचे संचालक असलेले प्रतिनिधीच ही सुनावणी घेत असल्याने यातून काही निष्पन्न होणार नाही. ही ग्राहकांची दिशाभूल असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांनी व्यक्त केले.

'प्रेझेंटेशनसाठी मुंबईत या'

ग्राहक आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी बाहेर पडल्यानंतर येथे उपस्थित असलेल्या महावितरण व पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांना पीपीटी दाखवायचे असेल तर त्यांनी ते मुंबईला येऊन दाखवावे, असा निरोप आयोगाच्या वतीने देण्यात आला. यावेळी निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर म्हणाले की, आम्हाला जर पीपीटी दाखवण्यासाठी मुंबईला यायचे असेल, तर नाशिकमध्ये सुनावणी कशाला घेतली? सुनावणीदेखील मुंबईतच घ्यायला हवी होती. याअगोदर ज्यावेळी सुनावणी झाली, त्या त्या वेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. यावेळी ही आडकाठी का, असाही सवाल त्यांनी केला.

ऐकायचे नसेल तर परत जा

आयोग जर ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेणार नसेल, तर आयोगाने सुनावणी न घेता परत जावे, अशी मागणी यावेळी ग्राहकांनी केली. हा आयोग अत्यंत 'बायस' असून, ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे. आयोगाला माहिती देण्यासाठी लोकांनी एक महिन्यापासून प्रयत्न केले. ते प्रयत्न वाया जाणार आहेत. सुनावणीदरम्यान आम्ही पीपीटी पाहणार नाही, असे आयोगाने आधी सांगायला हवे होते, असेही म्हणणे काही ग्राहकांनी मांडले.

लोकप्रतिनिधींची पाठ

एरवी महावितरणच्या नावाने खडी फोडणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवली. माजी आमदार किंवा विद्यमान नगरसेवकांनी या ठिकाणी येणे अपेक्षित होते. मात्र, हेमंत गोडसे वगळता याठिकाणी कुणीही फिरकले नाही. दरवेळी पत्रकबाजी करणारे नेते गायब असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लालपरी’साठी स्थळशोधणी

$
0
0

मेळा स्थानकावरील बांधकामामुळे त्र्यंबक भाविकांची कोंडी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वरला जातात. भाविकांसाठी दरवर्षी मेळा बस स्थानकातून शेकडो बसेस त्र्यंबकला दिवस-रात्र फेऱ्या मारतात. यंदा मात्र मेळा बस स्थानकावर बांधकाम सुरू असून, एसटी प्रशासनाला नवीन जागेचा पर्याय शोधावा लागला आहे. एसटी प्रशासन याबाबत महापालिकेकडे गोल्फ क्लब मैदानाजवळील जागेची मागणी करणार आहे.

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी लाखो भाविक नाशिकमधून त्र्यंबकला रवाना होतात. याच दिवशी ब्रह्मगिरीला पायी प्रदिक्षणा घातली जाते. भाविक रविवारी रात्री फेरीला सुरुवात करून सोमवारी पहाटेनंतर नाशिकला परततात. त्यात एसटी महामंडळाचा सहभाग मोठा असतो. दरवर्षी किमान दोनशे ते अडीचशे बसेस मेळा बस स्थानकावरून ये-जा करतात. या पार्श्वभूमीवर सीबीएस ते टिळकवाडी सिग्नलवरील वाहतूक बंद ठेवली आहे. यासह मेळाबसस्थानक ते हॉटेल राजदूत हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात येतो. भाविकांची संख्या मोठी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे उपाय राबविले जातात. यंदा मात्र मेळा बस स्थानकाचे काम सुरू असून, तिथे नियोजनासाठी जागा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे महामंडळाने नियोजनासाठी दुसऱ्या जागेचा शोध सुरू केला आहे. मेळा बस स्थानकापासून जवळ असलेल्या गोल्फ क्लब मैदानाजवळील इदगाह मैदान यासाठी सोयीचे ठरू शकते. त्यानुसार, एसटी महामंडळ महापालिकेशी पत्रव्यवहार करीत असून, महापालिका प्रशासनाचा हिरवा कंदिला मिळाल्यानंतर एसटी प्रशासनासह पोलिसही वाहतूक आणि बंदोबस्ताचे नियोजन हाती घेणार आहे.

तिसऱ्या श्रावणी सोमवारी यंदा किमान २५० बस फेऱ्यांचे नियोजन आहे. मेळा बस स्थानकाऐवजी यंदा दुसऱ्या जागेचा पर्याय शोधला जातो आहे. याबाबत लवकरच महापालिका प्रशासनाशी चर्चा होणार आहे.

- अरुण सिया,

विभागीय वाहतूक नियंत्रक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: बिबट्याचा बछडा मुलांसह बिछान्यात

$
0
0

विजय बारगजे । घोटी (नाशिक)

इगतपुरी तालुक्यातील धामनगाव येथे बिबट्याच्या बछड्याने आज पहाटे एका झोपडीवजा घरात शिरकाव करीत लहान मुलांच्या बिछान्याचा आसरा घेतला. पहाटेच्या सुमारास या बछड्यानं गारठलेल्या अवस्थेत प्रवेश केला. घरात मच्छरदाणीत झोपलेल्या मुलांसमवेत बछडयाने दीड तास निवांत झोप घेतली. ही बाब लक्षात येताच वनविभागाने तात्काळ धाव घेत भाजीपाला केरेटच्या सहाय्याने बछड्याला ताब्यात घेतलं.

इगतपुरी तालुक्यातील धामनगावात गावात आज पहाटे हा प्रकार घडला. येथील मनीषा बर्डे यांचे आदिवासी कुटुंब पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत राहते. पहाटे चारच्या सुमारास प्रात:विधीसाठी दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असलेले बिबट्याचे ३ महिन्यांचे पिल्लू घरात घुसले. हे त्यांना समजलेच नाही. घरात बर्डे यांची २ मुलं मच्छरदाणी पांघरून झोपलेली होती. बिबट्याच्या पिल्लानं त्या मुलांच्या बिछान्यात अलगद प्रवेश केला. पहाटे पाचच्या सुमारास ही बाब मनीषा बर्डे यांच्या लक्षात आली. मुलांच्या बिछान्यात बिबट्याला बघताच त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. इगतपुरीचे वन परिक्षेत्राधिकारी आर. पी. ढोमसे यांचे मार्गदर्शन घेऊन वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्यासह धाव घेऊन जाळ्यांच्या साहाय्याने बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. बिबट्याचे हे पिल्लू ३ वर्षांचे असले तरी त्याच्याकडून लहान बालकांना इजा होण्याची शक्यता होती. सुदैवानं तसं काही झालं नाही.
<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fmaharashtratimesonline%2Fvideos%2F481723718978695%2F&show_text=0&width=560" width="560" height="308" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>
गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

इगतपुरी तालुक्यात मानवी वस्तीत बिबट्या दिसण्याच्या घटना हल्ली वाढल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी याच परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछडयाला बाहेर काढण्यात आलं होतं. तर, तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव मोर शिवारात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीतून आजारी बिबट्याला बाहेर काढण्यात आलं. मात्र, आजारानं त्याचं निधन झालं. त्यानंतर आज तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. त्यामुळं वन खात्यानं आवश्यक ते सुरक्षेचे उपाय करावेत अशी मागणी केली जात आहे.

''बिछान्यात बिबट्याचे पिल्लू असल्याचे समजताच १५ मिनिटांत दखल घेऊन त्याला ताब्यात घेतले. बिबट्या मानवी जीवनासाठी घातक नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.'' - गोरक्षनाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाच इमारतीतील दोन घर फोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी शिवारात भरदिवसा एकाच इमारतीतील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक साहेबराव गाडेकर (रा. ग्लोरियस अ‍ॅव्हेन्यू, ग्रीनव्हील समोर) यांनी तक्रार दिली आहे. गाडेकर कुटुंबिय आणि त्यांचे शेजारी अनुष्का शेवाळे या सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गाडेकर यांच्या घरातून ८९ रुपये किमतीचे तर शेवाळे यांच्या घरातून ४१ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले.

--

शिवशाहीची काच फोडली

बसला हात देवून थांबण्याचा इशारा करीत काच फोडल्याची घटना वडाळानाका भागात घडली. या प्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून तेजाळे वाड्यात राहणाऱ्या तरुणाविरुद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश तेजाळे (२७ रा. तेजाळे चौक, वडाळानाका) असे त्या संशयिताचे नाव आहे. पुणे बस डेपोचे चालक राजाराम धांईंजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी ते विनावाहक शिवशाही (एमएच ०६ बी डब्ल्यू ०५१६) बस दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने पनेत असताना वडाळानाका भागात संशयिताने बसला हात देवून थांबविले. प्रवासी असल्याचे समजून धोईंजे यांनी बस थांबविली. मात्र, संशयिताने लाकडी दांड्याने बसच्या काचेवर घाव घातला.

--

मधूबन कॉलनीतील आत्महत्या

मधूबन कॉलनीत राहणाऱ्या ४४ वर्षाच्या व्यक्तीने मद्याच्या नशेत विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय मोतीराम चौधरी (४४ रा. आव्हाड निवास, मधुबन कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी रात्री संजय चौधरी यांनी अज्ञात कारणातून मद्याच्या नशेत विषारी औषध सेवन केले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

--

आनंदनगरला घरफोडी

गंगापूररोड परिसरातील आनंदनगरात चोरट्यांनी घरफोडी करून ३७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी जयकुमार शंकरराव जाधव (रा. आकाशवाणी टावरजवळ, आनंदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुरुवारी हे कुटुंब बाहेरगावी गेलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून लॅपटॉप व कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

--

मालट्रकसह दुचाकीची चोरी

ट्रक टर्मिनस भागात पार्क केलेल्या मालट्रकसह मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील ट्रकचालक कलीमोद्दीन चिरागोद्दीन शेख यांनी तक्रार दिली आहे. कलीमोद्दीन शेख २७ जुलै रोजी आपल्या ताब्यातील बारा टायर मालट्रक (एमएच १८ एए ७७३६) घेवून शहरात दाखल झाले. ऐनवेळी घराकडे परतावे लागल्याने त्यांनी आपला मालट्रक टर्मिनस जवळील रस्त्याच्या कडेला पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी तो पळवून नेला. ही घटना गेल्या रविवारी उघडकीस आली. सर्वत्र शोध घेवूनही मालट्रक मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत. अयुब कासम सय्यद (रा.प्रभात अपा.भगवा चौक,पंपीग स्टेशन जवळ चेहडी) यांची दुचाकी (एमएच १५ बीवाय १९१४) २४ जुलै रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीसाठी सज्ज

$
0
0

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सूतोवाच

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या 'वन नेशन वन इलेक्शन' या भूमिकेवर शिवसेना संपर्कप्रमुख व खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. देशात 'वन नेशन वन इलेक्शन' सोबतच एकच संविधान का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपला सध्या डोळ्यासमोर फक्त निवडणुकाच दिसत आहेत. भाजपने ठरवले तर लोकसभेसोबत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचीही निवडणूक ते घेऊ शकतात, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी झाली तरी दोन्ही आव्हाने स्वीकारायला शिवसेना तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपच्या 'वन नेशन वन इलेक्शन' धोरणाची खिल्ली उडवली. देशात सर्वत्र बेबंदशाहीचा सुरू आहे. त्यामुळे देशभर भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे. सन २०१४ च्या निवडणुकातील चित्र आणि २०१९ मधील निवडणुकांमधील चित्र पूर्णत: वेगळ राहणार आहे. मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटली आहे. भाजप फार काळ जनतेला मुर्ख बनवू शकत नसल्याचे सांगत भाजपने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकांपासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना दूर ठेवायला हवे. यासाठी तसा कायदाही केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेची ताकद वाढत असून, आम्ही भाजपशी दोन हात करायला कधीही तयार आहोत. आमची कोणाशीही आघाडी नाही. पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू असून, स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा नारा कायम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

..

मुख्यमंत्र्यांनी नावे जाहीर करावीत

मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये बाहेरच्या लोकांनी हिंसा केल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हिसांचार करणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे. औरंगाबादमध्ये हिंसक घटनांमुळे किमान २५ हजार बेरोजगार झाले. अनेक ठिकाणी खासगी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे राज्याला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला संपूर्ण राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध अपघातात चार जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात महिलेसह दोन दुचाकीस्वारांचा समावेश असून, या प्रकरणी अंबड, उपनगर आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

ललित श्यामसिंग चव्हाण (३१, रा. कुमावतनगर, मखमलाबाद रोड) हे बुधवारी (दि. ८) पाथर्डी फाटा येथून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर (एमएच १५ जीएच १०६०) प्रवास करीत असतांना स्टेट बँक चौकातील सर्व्हिस रोडवर अपघात झाला. दुचाकी घसरल्याने चव्हाण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलिस नाईक चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.

दुसरा अपघातात देवळाली गाव परिसरात झाला. आनंदनगरमधील ज्ञानेश्वर तुकाराम गायकवाड (५७ रा. मनपा शाळा क्र. १२५ मागे, आनंदनगर) यांचा सोमवारी (दि. १३) सायंकाळी दत्तमंदिर रोडने देवळाली गावाकडे जात असतांना त्यांचा आपल्या स्विफ्ट कारवरील (एमएच १५ जीएफ ९०१९) ताबा सुटला. यात त्यांची कार फोनच्या डीपीवर धडकली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुशील गायकवाड यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार विंचू करीत आहेत.

अपघाताची तिसरी घटना पुणे रोडवर घडली. या घटनेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुनील सतीश सेहगल (४६ रा. तुळजा भवानी मंदिराजवळ, जाचकनगर) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. सेहगल हे रविवारी (दि. १२) रात्री आपल्या अ‍ॅटोरिक्षा (एमएच १५ ईएच ३४३३) मध्ये दोन महिला प्रवासी घेऊन नाशिकरोडच्या दिशेने जात असताना त्यांना अचानक शारिरीक त्रास सुरू झाला. यामुळे ही रिक्षा बिटको कॉलेजसमोरील सुयोजित कॉम्प्लेक्स कंपाउंडला लावलेल्या पत्र्यांवर जाऊन आदळली. जखमी झालेल्या सुनील यांना बेशुद्ध अवस्थेत बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रिक्षातील प्रवासी मंगल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

मोपडवरून पडल्याने महिला मृत्यूमुखी

म्हसरूळ येथील निर्मला पुरुषोत्तम कानिरे (रा. बालाजी सोसा. म्हसरूळ) या सोमवारी (दि. १३) सायंकाळी प्रवास करीत असताना आपल्या मोपेडवरून घसरल्या. गंभीर जखमी झालेल्या कानिरे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एएसआय भवर यांना राष्ट्रपती पदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. यात शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक बाळू भवर यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पोलिस पदक, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह पोलिस आयुक्तालयातील तिघांना आणि राज्य गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्यास प्रशंसनीय कामगिरीबद्दलचे पोलिसपदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस दलासाठी सर्वोच्च सन्मान समजला जाणाऱ्या राष्ट्रपती पदकाची यादी मंगळवारी (दि.१४) जाहीर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रपती पदकांच्या उल्लेखनीय गटामध्ये शहर पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांचा समावेश आहे. प्रशंसनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे पोलिसपदक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव वसंतराव उगले, अंबड पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक अरुण संपत आहिरे, नाशिकरोड पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष नाना जाधव, परिमंडळ दोनचे चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक आरिफ खान दौडखान पठाण आणि राज्य गुप्तचर विभागाच्या नाशिक कार्यालयातील नानाकुमार सुरेशप्रसाद मिसर यांना जाहीर झाले आहेत. पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन करण्यात आले.

..

राष्ट्रपती पदक : बाळू भवर

पोलिसपदक : पंजाबराव उगले, अरुण आहिरे, सुभाष जाधव, आरिफ खान दौडखान पठाण, नानाकुमार मिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिदास’चे आज लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पेारेशन लिमिटेड व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १५) सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालन लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी, नाट्य संमेलन अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर रंजना भानसी भूषविणार आहेत.

यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, आमदार, खासदार तसेच नगरसेवक यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, नगरसेविका वत्सला खैरे, अॅड. वैशाली भोसले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामे थांबविण्याचा डाव

$
0
0

महाआघाडीच्या नेत्यांना महापौर शेख यांचे उत्तर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात आजवर झालेली विकासकामे काँग्रेसच्याच काळात झाली आहेत. मात्र महागठबंधन आघाडीचे नेते माजी आमदार मौलाना मुफ्ती, बुलंद इक्बाल यांच्यासह विरोधकांकडून निराधार तक्रारी करून विकासकामे थांबण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र विकासकामांबाबत तक्रारी असल्यास कोणत्याही चौकशीला आम्ही तयार आहोत. ज्यांनी कधी ही विकासाची कामे केली नाहीत ते 'विकास की तलाश' पदयात्रा काढताहेत, हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात महापौर शेख रशीद यांनी पालिकेतील विरोधकांना उत्तर दिले आहे.

महापौर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवारी महागठबंधनचे नेते बुलंद व मुफ्ती इस्माईल यांनी महापौर शेख यांच्या कार्यकाळात विकासकामांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप करीत त्या विरोधात १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान शहरातील विविध प्रभागातून 'विकास की तलाश' पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर शेख यास काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौरांनी विविध विकासकामांची माहिती देत विरोधकांना उत्तर दिले.

शेख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल पक्षातच तिकीट वाटपावरून मोठा भ्रष्टाचार चालतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. विरोधक स्वतः तोडीबाज आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरवासियांची दिशाभूल केली जात आहे. विकासकामांबाबत त्यांनी तक्रार करावी. प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी असल्याचे महापौर यांनी स्पष्ट केले.

विकासकामांना वेग येणार

शहरात आगामी वर्षभरात होवू घातलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली. आचारसंहितेमुळे खोळंबलेली विकासकामे आता वेगाने सुरू होणार आहेत. यात प्रभाग १३ मध्ये ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे राहणार असून, त्यासाठी ५ कोटींची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. शहरातील रस्ते व गटारीसाठी बजेटमध्ये ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळा संपताच कामे सुरू होतील. त्यासोबतच १० कोटींची मागणी सरकारकडे केली आहे. भूयारी गटार या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. यासह चारही प्रभागांसाठी वैकुंठ रथ, शवविच्छेदन पेटी मागविण्यात आली आहे.

पदयात्रेचे करणार स्वागत

बुधवारपासून महागठबंधन आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचे काँग्रेस कार्यकर्ते स्वागत करतील. ज्यांना 'विकास की तलाश' आहे त्यांना विकासकामे दाखवतील. विरोधकांनी सत्तेत असताना कोणती विकासकामे केलीत? याचे देखील उत्तर त्यांना द्यावे लागेल. या पदयात्रेमुळे उलट आम्ही केलेली विकासकामे जनतेपुढे येतील, असे महापौर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांची साथ गरजेची

$
0
0

शहर परिसर

सर्वांची साथ गरजेची

शहरात वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असतानाही विविध शाळांमध्ये जाऊन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करून ते एक वेगळा आदर्श निर्माण करीत आहेत. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नांना सर्वांनीच साथ द्यावी.

-महेंद्र पवार

नांदगाव

अखेर रेशन कार्ड मिळाले

ही गर्दी आहे रेशन कार्ड घेण्यासाठीची. नांदगाव तालुक्यातील पाथर्डी येथील हा फोटो आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात रेशन कार्डचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे परिसरातील गोरगरिबांची गैरसोय होत होती. मात्र, आता रेशन कार्ड उपलब्ध झाल्याने नागरिकांची अशी रांग लागत आहे.

-रवी आहेर

शहर परिसर

प्लास्टिकचा तिरंगा नकोच

प्लास्टिकच्या तिरंगी ध्वजांची अजूनही काही ठिकाणी विक्री होत आहे. हा प्रकार बंदच केला पाहिजे. जेणेकरून राष्ट्रध्वजाचा आणि पर्यायाने देशाचा अवमान होणार नाही. प्रशासनाने प्लास्टिकचे तिरंगी ध्वज विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, तरच असे प्रकार थांबू शकतील.

-आकाश घाडगे

आडगाव नाका

एटीएम, पैसे भरणा बंदने गैरसोय

बँक ऑॅफ इंडियाच्या आडगाव नाका येथील एटीएम, पैसे भरणा आणि प्रिंट मशिन अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे बँकेच्या परिसरातील ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी येथील मशिन लवकरात लवकर सुरू करून दिलासा द्यावा.

-प्रमोद क्षीरसागर

वडाळा नाका

अस्वच्छतेचे साम्राज्य

वडाळा नाक्यावरील रेणुकानगर परिसरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वडाळा गाव परिसरात विविध विकारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने येथे त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी.

-हेमंत साळी

त्र्यंबकरोड

झाडांची करावी छाटणी

ईदगाह मैदानासमोर त्र्यंबकरोडवरील दुभाजकात असलेली झाडे अशी अस्ताव्यस्त वाढली आहेत. त्यांची नियमित आणि प्रमाणबद्ध तोड न झाल्याने वाहतुकीस आता या झाडांच्या फांद्यांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्ता ओलांडणाऱ्यांच्या जिवालाही त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

-संजय अहिरे

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इतिहास संकलन’तर्फे शुक्रवारपासून अभ्यासवर्ग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीने १७ व १८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग होणार आहे. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात सकाळी ९ वाजता या वर्गाला प्रारंभ होणार आहे. या अभ्यासवर्गासाठी भारतीय इतिहास संकलन योजनेचे संघटन सचिव डॉ. बालमुकुंद पाण्डेय, उपाध्यक्ष डॉ. गिरीष ठाकर, हरिभाऊ वझे, अनुराधा राजहंस हे मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी ९ वाजता उद्घाटन, १० वाजता समितीचे उद्देश व कार्य डॉ. गो. ब. देगलूरकर सांगणार आहेत. समितीच्या कार्यकर्त्यांपुढील आव्हाने या विषयावर सकाळी ११ वाजता डॉ. अ. शं. पाठक बोलणार आहेत. त्यानंतर २ वाजता कार्यकर्त्यांचा परिचय व मुक्त चिंतन डॉ. बालमुकुंद पाण्डेय करून देणार आहेत. पारस्पारिक संबंध व जिवंत संपर्क याविषयावर दुपारी ३ वाजता हरिभाऊ वझे बोलणार आहेत. समितीच्या कार्यात महिलांचा सहभाग या विषयावर दुपारी ४ वाजता अनुराधा राजहंस व कार्यालयीन कामकाज या विषयावर हेमा तन्ना बोलणार आहेत. प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास या विषयावर सायंकाळी ५ वाजता विजयकुमार उपाध्याय बोलतील. सायंकाळी ५.३० वाजता सिन्नर यथार्थ दर्शन या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

१८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता समिती अतित, वर्तमान व भविष्य या विषयावर डॉ. बालमुकुंद पाण्डेय हे बोलणार आहेत. इतिहास संशोधन पध्दती या विषयावर डॉ. दिलीप बलसेकर यांचे व्याख्यान होणार आहे. समारोप सत्रात डॉ. पाण्डेय, हरिभाऊ वझे, गिरीशभाई ठकार यांचे मार्गदर्शन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उपमुखम्’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या हरहुन्नरी कलाकारांचा आविष्कार असलेल्या 'उपमुखम्' या शॉर्टफिल्मला ग्वाल्हेर येथे आयोजित 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये सर्वोत्तम शॉर्टफिल्म स्क्रीन प्ले पुरस्कार जाहीर झाला. मनुष्य स्वभावाचे अंतर्गत कंगोरे मुखवटे आणि व्यवस्था या अंगाने मांडणाऱ्या या शॉर्टफिल्मची संकल्पना, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे आहे.

ग्वाल्हेर येथे या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे तिसरे वर्ष होते. यात यंदा स्पेन, ब्रिटन, अमेरिका, रशिया, इराण आणि बांगलादेशामधून विविध श्रेणींमधून फिल्म्स आल्या होत्या. इराणला यावेळेस विशेष स्थान देऊन पूर्ण पॅनोरमा इराणचा ठेवण्यात आला होता. देशातून विविध भाषांमधून इंडियन पॅनोरमासाठी फिल्म्स आल्या होत्या. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी हिमानी शिवपुरी, अखिलेंद्र मिश्र, अर्फी लांबा, जपानी कलाकार जुनीची काजीओका, ऑस्ट्रेलियन कलाकार चार्ल्स थॉम्प्सन याशिवाय ऋषी भुटानी आणि नकुल वैद आदिंनी सक्रिय सहभाग नोंदवला. नाशिकच्या उपमुखम या शॉर्टफिल्मला या श्रेणीतील ३४ फिल्ममध्ये उत्तम म्हणून निवडण्यात आले. त्यात केरळ आणि बंगालमधील फिल्म्सचा समावेश होता. याच श्रेणीतील 'मुरख - दि इडियट' या फिल्मने महोत्सवाचा प्रारंभ झाला होता. याशिवाय रंगसूत्र, विसर्जन, अंतःकरण, भुरा, पंख अशा विविध विषयांवरील शॉर्टफिल्म्समधून नाशिकच्या 'उपमुखम' ची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील बोहाडे आणि त्यातील मुखवटे ही कलाकारांच्या प्रांतातील अप्रूप असलेली गोष्ट या शॉर्टफिल्मद्वारे सार्थपणे मांडलेली आहे. याचे गीतकार गोविंद नाईक, पार्श्वसंगीत अमित पाध्ये, ध्वनी सदानंद जोशी, कलासंयोजन नीलेश गायधनी आणि पूजा गायधनी, प्रकाशचित्रण श्रुती आणि प्रणव कवी, कलादिग्दर्शन सार्थक कुर्डुकर, निर्मिती मृणाल आपटे, निर्मिती प्रमुख आदित्य राहाणे, ध्वनीसंयोजन शुभम जोशी, ध्वनिमुद्रण विपुल पाठक आणि सुमंत वैद्य यांनी केले आहे. फिल्ममध्ये कलाकार तेजस राहाणे यांनी प्रकाशचित्रकाराची भूमिका केली आहे. या शॉर्टफिल्मसाठी अभिव्यक्ती, राजा पाटेकर, विजय धारणे आणि विनय काशीकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या फिल्मचा चमू हा नाशिकमधील 'अक्षरबाग वाचन कट्टा', 'आयाम' सारख्या सांस्कृतिक चळवळींशी संलग्न आहे. नाशिककरांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे हा टप्पा गाठता आला असे जयेश आपटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेत नाशिकरोडचे मानांकन सुधारले

$
0
0

रेल्वे स्टेशनचा देशात ४१ वा; महाराष्ट्रातील ३६ स्टेशनचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी देशातील स्वच्छ रेल्वे स्टेशनचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. महाराष्ट्रातील ३६ रेल्वे स्टेशनचा यात समावेश आहे. श्रेणी 'अ १' मध्ये वांद्रे रेल्वे स्थानकाने सातवा क्रमांक पटकावत देशात पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. अ श्रेणीत नाशिकरोड ४१ व्या स्थानी आले आहे. गेल्यावेळी नाशिकरोडचा क्रमांक १६९ वा होता. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड या तीन रेल्वे स्टेशनचाही ३६ स्टेशनमध्ये समावेश आहे.

नाशिकरोडचे स्टेशन मास्तर आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, मुख्य तिकीट तपासणीस जे. एस. जैन, वरिष्ठ अभियंता (कार्य) एस. जी. सैय्यद, मुख्य आरोग्य निरीक्षक के. जी. गुप्ता, मुख्य मंडल आरोग्याधिकारी बावीस्कर यांनी स्वच्छता कामगार प्रमुख गोपाल फथरोड आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

कामगिरीत सुधारणा

स्वच्छतेबाबत नाशिकरोडरोड स्टेशनला २०१५ ला सहावा आणि २०१६ ला सातवा क्रमांक मिळाला होता. मात्र, नंतर कामगिरीत आश्चर्यकारक घसरण झाली. २०१७ ला रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे स्टेशन स्वच्छतेचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट प्रकाशित केल्यावर नाशिकरोडची १६९ व्या स्थानी घसरण झाली. प्रशासन खडबडून जागे झाले आणि नाशिकरोड स्टेशन स्वच्छतेसाठी सहा महिन्यांपूर्वी साडेपाच कोटींचे कंत्राट देण्यात आले. आता सकाळी सात ते दुपारी तीन, तीन ते रात्री अकरा, अकरा ते सात असे २४ तास तीन शिफ्टमध्ये सफाई कर्मचारी काम करतात. दुप्पट केलेली कर्मचारी संख्या, १४ आधुनिक मशिन्स आणि महिला कर्मचाऱ्यांची वाढवलेली संख्या यामुळे यंदा नाशिकरोडला ४१ वा क्रमांक गाठता आला आहे.

असे मिळाले गुण

रेल्वे मंत्रालयातर्फे २०१६ पासून 'स्वच्छ रेल, स्वच्छ भारत' योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्टेशनचे विविध मानकांवर नामांकित संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीही देशातील रेल्वे स्टेशनचे दोन श्रेणींमध्ये सर्वेक्षण झाले. वर्षाकाठी ५० कोटींपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात त्या स्थानकांना 'अ १' तर ६ ते ५० कोटी प्रवाशी प्रवास करणाऱ्या रेल्वे स्थानकांना 'अ' श्रेणीमध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्टेशनशेजारील खुल्या परिसरात स्वच्छतागृह, मुख्य प्रवेशद्वाराशेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता. तसेच रेल्वे स्टेशनवर खुल्या ठिकाणी आसन व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतीक्षालय, रेल्वे रूळ आणि पादचारी आदी बाबींचे सर्वेक्षण होऊन स्टेशनचे मानांकन ठरले. या सर्वांसाठी हजार गुण ठरविण्यात आले होते.

महाराष्ट्राची आघाडी

२०१८ च्या अहवालात देशातील एकूण ७५ रेल्वे स्थानकांची अ-१ श्रेणी मध्ये निवड करण्यात आली. यात पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्टेशनने सातवा क्रमांक मिळविला. मुंबई सीएसटी, पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, दादर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्टेशनचा यात समावेश आहे. देशातील एकूण ३३२ रेल्वे स्टेशनची निवड 'अ' श्रेणीमध्ये करण्यात आली असून महाराष्ट्रातील २६ रेल्वे स्टेशनचा यात समावेश आहे. या श्रेणीत राज्यातील अकोला, नाशिकरोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, गोंदिया, मिरज-सांगली, लातूर, शिर्डी,चंद्रूपूर, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगाव, औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.

..

कर्मचारी संख्या वाढविली

नाशिकरोड स्टेशनवर सहा महिन्यापूर्वी कंत्राटी स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीने २६ आणि रेल्वेचे आठ कर्मचारी होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना अन्य विभागात सामावून घेण्यात आले. कंत्राटी सफाई कर्मचारी संख्या ६५ झाली. तीन शिफ्टमध्ये हे ६५ कर्मचारी काम करतात. स्टेशनवरील प्लॅटफार्म एकपासून चारपर्यंत तसेच स्टेशनची प्रवेशद्वारे, आवार आदींची स्वच्छता हे कर्मचारी करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाणे कंपनीविरोधात बोंडअळीप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

भक्ती बीजी २ या कपाशीच्या वाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्याच्या कपाशीचे नुकसान झाल्याप्रकरणी नुजीविडू सीड्स या कंपनीविरोधात जालना जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदनापूर तालुक्यातील चिखली गावचे शेतकरी कृष्णा भोंडे यांनी नुजीविडू सिड्स कंपनीच्या भक्ती बीजी २ या कपाशी वाणाची दोन एकरावर लागवड केली होती. मात्र, या वाणाच्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याची तक्रार त्यांनी कृषी विभागाकडे केली. कृषी विभागही या तक्रारीची दखल घेत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर संबंधित शेतकऱ्यांसह कपाशी उपटून आणत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कपाशीचा पंचनामा केल्यानंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचं निष्पन्न झाले. त्यांनी तसा अहवालही सादर केला. भोंडे यांनी नुजीविडू सीड्स कंपनीविरोधात बदनापूर पोलिसांत तक्रार देऊन झालेल्या नुकसानीची मागणी केली. अखेर या तक्रारींची दखल घेत बदनापूर पोलिसांनी हैदराबाद येथील नुजीविडू सीड्स कंपनीविरोधात कापूस बियाणे पुरवठा आणि विक्री अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलासरावांच्या स्मृतिदिनी विविध उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाभळगावातील त्यांची समाधी असलेल्या विलासबागेत सार्वजनिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होत. या वेळी देशमुख परिवारातील श्रीमती वैशाली देशमुख, दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, गौरवी अतुल भोसले, सुवर्णाताई देशमुख यांच्यासह अनेक सदस्यांनी आदरांजली वाहिली. प्रार्थना सभेनंतर अनेकांनी समाधीस्थळावर फुले वाहून आदरांजली व्यक्त केली. राम बोरगावकर यांच्या सहकाऱ्यांनी भजन म्हटले. या वेळी जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते.

महापालिकेत आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, महापौर सुरेश पवार यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. 'जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज'मध्ये दिलीपराव देशमुख, गौरवी भोसले देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, संचालक दिलीप माने, सुर्यकांत कर्वा, संभाजी रेड्डी, कार्यकारी संचालक सुनिल देशमुख यांची उपस्थिती होती. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चेअरमन अॅड. श्रीपती काकडे, व्हाइस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट, कार्यकारी संचालक एच. डी. जाधव, ज्येष्ठ संचालक एस. आर. देशमुख उपस्थित होते.

लातूर शहरातील विविध रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अशोक पोतदार यांच्या हॉस्पिटलमध्ये डीवायएसपी हिमंत जाधव यांनी उद्‌घाटन केले. गुगळे हॉस्पिटलमध्ये आमदार अमित देशमुख यांनी शिबिराचे उद्‌घाटन केल. अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images