Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जात पडताळणीची कालमर्यादा पाळा

0
0

'समाज कल्याण'ला जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यांची व जात पडताळणी प्रमाणपत्राची विद्यार्थ्यांना आवश्यकता भासते आहे. परंतु, हे दाखले देण्यास यंत्रणेकडून विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे वाढू लागल्या आहेत. पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबतची कालमर्यादा पाळावी अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी समाजकल्याण तसेच सामाजिक न्याय विभागाला दिली आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध शैक्षणिक दाखल्यांसह जात वैधता प्रमाणपत्राची मागणी महाविद्यालयांकडून होते. हे प्रमाणपत्र व दाखले सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत नाही. दाखले वेळेत मिळाले नाही तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. विशेषत: जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांना एक महिना प्रतिक्षा करूनही जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना पुणे-नाशिक महामार्गावरील समाजकल्याण विभागातील जात वैधता प्रमाणपत्र शाखेत हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी प्रमाणपत्र वितरीत होत नसल्याचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ऐकावे लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार आहे त्यांना ते ओळखपत्र दाखवूनही दिले जात नाही. ते पोस्टाने पाठविण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. जातपडताळणी कार्यालयाकडे सादर केलेली अनेक प्रकरणे केवळ कागदोपत्री दाखल करून त्यांच्या रीतसर नोंदी न ठेवल्याने काही प्रकरणे गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. प्रमाणपत्र वितरण विलंबास शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे कारण कर्मचारी देत आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळालेले नाहीत त्यांना प्रकरण जमा केलेल्या पावतीच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश द्यावा व जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करण्यास ८१ दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र वितरणासाठी जी कालमर्यादा ठरली आहे, त्या कालावधीत ही प्रमाणपत्रे वितरित करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोत पती-पत्नीची आत्महत्या

0
0

सावकारी जाचातून केले कृत्य

म. टा. वृत्तसेवा, सिडको

व्यवसायासाठी लागणारे कर्ज सावकारांकडून घेतल्यानंतर ते परत करूनही पैशासाठी वारंवार होणार तगादा व मारण्याच्या धमकीमुळे त्रस्त झालेल्या सिडकोतील पती-पत्नींनी शुक्रवारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी पाचही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगिता वासुदेव जाधव (३४) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी समाधान प्रभाकर पवार यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अष्टविनायक नगरमधील कमल रेसिडेन्सीत जाधव पती-पत्नी राहत हेाते. वासुदेव हा लेबर कॉन्ट्रक्‍टर होता. त्याने काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे वेळोवेळी परत केल्यानंतरही सावकारांकडून पैशासाठी तगादा सुरू होता. एका सावकाराने वासुदेव याच्या मालकीची दुचाकी सुद्धा हिसकावून घेतली. पैसे परत करण्यासाठी वासुदेवने अजून काही ठिकाणाहून पैसे घेतले. या सर्व प्रकारामुळे जाधव कुटुंबीय तणावात होते. काही दिवसांपूर्वी अपघात होऊन वासुदेव हे गंभीर जखमी झाले होते. अपघाताच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा या सावकारांकडून पैशाची मागणी झाली. या जाचाला कंटाळून पती-पत्नीने शुक्रवारी दुपारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येच्या कारणाची चिठ्ठी आढळून आली आहे. यात अशोक केदू होळकर, सुनील पुरकर, राहुल जाधव, प्रवीण भाऊ (वेदमंदिर) व अमोल सोनवणे या सावकारांकडून पैसे घेतले असून ते वेळोवेळी परत केले. परंतु, तरीही त्यांनी खोट्या केसेस करण्यासह मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पवार पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भाजपचे शिक्षक मतदार संघाचे आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह संपूर्ण हिरे कुटूंबीय १ ऑगस्ट रेाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे सिडकोसह शहरातील भाजपमधील अनेकजण राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा सुरू झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत आमदार डॉ. अपूर्व हिरे म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजपमधून राष्ट्रवादीत जाण्याबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. १ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर येत असून, यावेळी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. आमदार डॉ. हिरे यांनी सिडकोसह नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून मोठी फळी उभी केली होती. सिडकोत अनेक नगरसेवकही त्यांनी निवडून आणले आहेत. भाजपमध्ये सक्रिय असताना मागील काही महिन्यांपासून त्यांनी अचानक कार्यालयावरील भाजपचे फलक काढून टाकले होते. त्याचवेळी पक्षांतर होणार याबाबत चर्चा होती. मात्र, आमदार हिरे यांच्याकडून त्यास कोणतीही पुष्टी मिळत नव्हती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांसह लोकसभा मतदार संघासह नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात गाठीभेटी सुरू केल्या होत्या. भाजपाकडून लोकसभा किंवा विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सुटका होण्यासाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याचबरोबर अद्वय हिरे यांनी आमदार भुजबळ यांची कारागृहात भेटही घेतली होती. त्यामुळे हिरे कुटूंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले.

दोन्ही हिरे आमदारांत लढत

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यात सुरुवातीपासून मतभेद व गटातटाचे राजकारण होत असल्याचे वारंवार समोर आले होते. त्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील दोन्ही हिरेंचा वाद हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. आता आमदार डॉ. हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा केल्याने आगामी काळात दोन्ही हिरेंमध्येच लढत होणार असल्याची चर्चा धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांवर नेम!

0
0

'नगररचना'च्या अधिकाऱ्यांनी दडवले स्थगितीचे पत्र; कारवाई अटळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'ग्रीनफिल्ड' लॉन्स प्रकरणात उच्च न्यायालयातील माफीनामा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जिव्हारी लागला आहे. 'ग्रीनफिल्ड' प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा स्थगिती आदेश २१ मे रोजी २ वाजून ५२ मिनिटांनी आलेला असतानाही, 'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी तो पद्धतशीरपणे दडवून ठेवल्याचे दोन दिवसांच्या तपासणीतून पुढे आले आहे. अतिक्रमण थांबवण्याऐवजी आयुक्तांना चक्रव्युहात अडकवण्यासह लॉन्सचालकाचाही गेम करण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याचे मानले जात आहे. बनाव उघडकीस येताच विभागातील अधिकाऱ्यांनी या पत्रावरून एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू केले असून नगररचना सहाय्यक संचालकांसह दोन ते तीन अभियंत्यावर आता कारवाईची होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी आर्थिक व्यवहाराचे केंद्र व सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या नगररचना विभागावर लक्ष दिले. या विभागातील अधिकाऱ्यांसह अभियंत्यानाही कामाला लावत, ऑटो डीसीआरची ऑफलाइन पद्धत बंद केली. अभियंत्यांना प्रत्यक्ष फिल्डवर पाठविले. या विभागातील दलालांची साखळी मोडीत काढत, मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे सत्र राबवले. यामुळे या विभागातील दुखावलेल्या अधिकाऱ्यांनी 'ग्रीनफिल्ड'च्या निमित्ताने थेट मुंढे यांनाच हायकोर्टाच्या चक्रव्युहात अडकविल्याचे आता स्पष्ट होत आहे. 'नगररचना'तील दप्तरदिरंगाईचे नावाने तपासणी करण्यात आली. यातून 'ग्रीनफिल्ड' प्रकरणात 'नगररचना'च्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याचा आल्या. तपासणीनंतर ग्रीनफिल्ड प्रकरण 'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी घडवून आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.

महापालिकेने कारवाई सुरू करताच 'ग्रीनफिल्ड'चे संचालक विक्रांत मते यांनी हायकोर्टात २१ मे रोजी धाव घेतली होती. त्याच दिवशी कोर्टाने स्थगिती दिली. त्यासंदर्भातील वकिलाचे पत्र दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांनी स्वीकारले होते. 'ग्रीनफिल्ड'चे अतिक्रण सायंकाळी साडेचार वाजता काढण्यात आले होते. त्यामुळे पत्र देऊनही अतिक्रमण काढल्याने मते यांनी हायकोर्टात धाव घेतली. कोर्टात २.५२ चे पत्र सादर झाले असताना 'नगररचना' सहसंचालकांच्या अहवालात मात्र दुपारी ३.४५ मिनिटांनी पत्र मिळाल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे रिसिव्ह पत्रावर चुकीची वेळ टाकून आयुक्तांनाच अडवण्याचा डाव होता की अजून दुसरे काही, याबाबत आता तपास सुरू झाला आहे.

म्हणूनच पाटील तणावात

'ग्रीनफिल्ड'प्रकरणात अधिकाऱ्यांचे आर्थिक हितंसंबध असल्याचे उघड होत आहेत. स्थगितीचे पत्र दडवून ठेवत संबंधित लॉन्सचालकाला धडा शिकवण्याचा काही अधिकाऱ्यांचा डाव होता. परंतु, हा डाव त्यांच्याच अंगलट आला आहे. या प्रकरणात माफीनाट्यानंतर आपल्याला लक्ष्य केले जाईल, अशी रवींद्र पाटील यांना भीती होती. त्यामुळेच ते तणावात होते. त्यात नगररचनाच्या एका अधिकाऱ्यांने त्यांना धोक्यात असल्याचा संदेश पाठवला. तणाव अधिक वाढल्याने ते बेपत्ता झाले होते.

खोटा अहवाल बनवला?

'ग्रीनफिल्ड'चे अतिक्रमण २१ मे रोजी काढले जाणार, असे महापालिकेने अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे लॉन्सचालकांने कारवाईपूर्वी स्थगिती आणली. तरीही महापालिकेने कारवाई केली. लॉन्सचालक हायकोर्टात गेल्याने आयुक्तांवरच हे प्रकरण शेकले. झालेला प्रकार अंगलट येऊ नये म्हणून यातून आपली मान सोडवून घेण्यासाठी सहाय्यक संचालक आकाश बागूल यांनी संबधित पत्र दुपारी ३.४५ वाजता मिळाल्याचे सांगून हा अहवाल आयुक्तांना सादर केला. परंतु, हायकोर्टात २.५२ लाच पत्र मिळाल्याचे सांगत, नगरचनाचा सारा बनाव उघडा केला आहे.

तर फौजदारी कारवाई

'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी ग्रीनफिल्ड प्रकरणातील दोन्ही पत्रे अगोदर दडवून ठेवली. त्यातील एक पत्र गुरुवारी सापडले होते. परंतु २.५२ मिनिटांनी स्वीकारलेले पत्र मात्र गायब झाले. यावरून आयुक्तांनी प्रशासनासह नगररचना विभागाला धारेवर धरत २.५२ मिनिटांनी प्राप्त झालेले पत्र एका तासात आले नाही तर थेट फौजदारी कारवाई करू, असा इशारा दिला. आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मात्र तासाभरातच संबंधित पत्र 'नगररचना'कडून प्रशासन उपायुक्तांकडे पोहचले. त्यामुळे 'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी हा प्रकार मुद्दाम होऊ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तोरस्ती कचराफेक...

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई धोरण अवलंबिलेले आहे. आरोग्य व घंडागाडी कर्मचाऱ्यांकडून उघड्यावर कचरा टाकू नये याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणेही सुरू आहे. मात्र, कारवाईचा बडगा उगारून आणि प्रबोधन करूनदेखील सातपूर परिसरात रस्तोरस्ती, मोकळ्या भूखंडांवर उघड्यावर कचराफेक सुरूच असल्याचे चित्र आहे.

परिसरातील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा परिसराचे बकालपण वाढवीत असून, तो उचलताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत आहे. त्यामुळे अशी कचराफेक का होते, याची कारणे शोधून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून रोजच ठिकठिकाणी घाण, कचरा उघड्यावर टाकू नये याबाबत प्रबोधन केले जाते. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून मगच तो घंटागाडी टाकावा, असेही सांगण्यात येते. मात्र, असे असतानादेखील परिसरातील शासकीय व खासगी मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने तो उचलण्याचे काम घंटागाडी कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. महापालिकेकडून उघड्यावर कचराफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. परंतु, ती पुरेशी ठरत नसल्याने अनेक ठिकाणी रोजच उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता अशी कचराफेक करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यापक मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

घंटागाडी कर्मचारी हैराण

सातपूर परिसरात खुलेआम होणाऱ्या कचराफेकीमुळे अनेक रस्त्यांच्या कडेला, तसेच मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे दिसून येत आहेत. शासकीय, खासगी भूखंडांवर अशा प्रकारे टाकला जात असलेला कचरा संकलित करण्याचे काम घंटागाडी कर्मचाऱ्यांनाच करावे लागत असल्याने अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याचे हे कर्मचारी सांगतात. मोकळ्या जागेवर घाण, कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई केल्यास नक्कीच आळा बसेल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

भूखंडांवर पार्किंगची अडगळ

सातपूर भागात काही खासगी भूखंडधारकांनी चारचाकी अवजड वाहने पार्क करण्यासाठी जागा दिली आहे. परंतु, संबंधित जागेवर मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा साचत असल्याने रहिवाशांना दुर्गंधीचा वास सहन करण्याची वेळ येते. रहिवासी भागाला लागून असलेल्या भूखंडांवर बंद पडलेली अनेक वाहने गेल्या अनेक वर्षांपासून उभी आहेत. संबंधित वाहनांमुळे अनुचित प्रकार घडण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोकळ्या भूखंडांवर अशा प्रकारे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे.

शासकीय अथवा खासगी भूखंडांवर कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. रहिवासी भागालगत सर्रासपणे खासगी मालकीच्या जागेवर अवजड वाहनांचे पार्किंग केले जाते. या ठिकाणी पडून असलेल्या चारचाकी वाहनांच्या बाजूलाही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने याप्रश्नी कारवाई करावी.

-दीपक पटेल, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिका निवडणुकीत काँग्रेसच किंगमेकर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आगामी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष किंगमेकर ठरेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अब्दूल सत्तार यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व संघटनांची आढावा बैठक काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनतंर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सत्तार यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ जूनला प्रदेशअध्यक्ष खासदार अशोक चव्हाण जळगाव येथे येणार आहेत. लेवा भवन येथे काँग्रेसचा मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्हा नेत्यांना प्रत्येकी एका प्रभागाची देण्यात येणार आहे. नेत्यांनी त्यांच्या घरातील एक उमेदवार निवडणुकीस उभा करावयाचा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची वरच्या पातळीवर आघाडी झाली आणि तसे निर्णय स्थानिक पातळीवर सोडल्यास येथे निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. ज्यांना गटबाजी हवी त्यांनी पक्षात येवू नये. मी चार नगरसेवकांची जबाबदारी घेतली असून त्यांना निवडून आणणार आहे.

राजू वाघमारे यांनी राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा. भाजपचे मंत्रीमंडळ हे भ्रष्टमंत्री मंडळ आहे, असा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी फक्त माजी मंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी पूर्ण होण्याअगोदर मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. समतानगर मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होवून तिची हत्या झाली आहे. आम्ही त्यापरिवाराचे सांत्वन करण्यास जाणार असल्याचे त्यांनी सांगिलते. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, उदयसिंग पाटील, जिल्हा प्रभारी विनायक राव, सहप्रभारी हेमलता पाटील, शिरिष चौधरी, डॉ. राधेशाम चौधरी, प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.

दानवेंना लाख मतांनी पराभूत करणार

काँग्रेसच्या आढावा बैठकित सत्तार यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाखाच्या मताधिक्याने पराभूत करण्याचा संकल्प सोडला आहे. जो पर्यंत संकल्प पूर्ण होणार नाही तोपर्यंत डोक्यावरील केस वाढविणार नसल्याने टक्कल ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीपेक्षा एसटी प्रवास महाग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी महामंडळाने तिकिटदरात १८ टक्के दरवाढ लागू केल्यामुळे बसच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. इंधन दरवाढ व कामगारांच्या वेतनात वाढ केल्यामुळे हे दर वाढवण्यात आले असून, शनिवारपासून हे दर लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे खासगी बसपेक्षा एसटीचा प्रवास महागडा होणार आहे. या बस दरवाढीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची भिती आता व्यक्त केली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने वाढवलेल्या या दरवाढीचा सर्वाधिक फटका नव्याने सुरू झालेल्या शिवशाहीला बसणार आहे. ऑक्टोबरमध्ये खासगी बसशी स्पर्धा करण्यासाठी या बसेस सुरू करण्यात आल्यानंतर त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. पण, या भाडेवाढीमुळे त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिकहून आतापर्यंत ६४ शिवशाही बस पुणे, औरंगाबाद, धुळे, व बोरीवली येथे धावतात. तर दोन स्लिपर कोच या नागपूर व कोल्हापूर येथे सुरू करण्यात आल्या. पण, या भाडेवाडीमुळे या मार्गांवरील दरही वाढले असून, पुण्याच्या ३४६ रुपयाचे भाडे आता ४११ रुपये झाले आहे. तब्बल ६४ रुपयाची ही वाढ आहे.

नाशिकहून धावणाऱ्या बसचे दर

सर्वसाधारण बस

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - १९४ -२३०

पुणे- २२५- २६०

औरंगाबाद - २१३- २५५

बोरिवली - १९५- २३०

धुळे - १६९ -२१०

निमआराम बस

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - २६७ -३१५

पुणे- ३०८- ३५५

औरंगाबाद - २९१ - ३४५

बोरिवली - २६७- ३१५

धुळे - २३१ -२७५

रातराणी

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - २३१ -२७५

पुणे- २६६ - ३१०

औरंगाबाद - २५२ - ३००

बोरिवली - २३१- २७५

धुळे - २०० - २४०

शिवशाही

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - ३०१ -३४५

पुणे- ३४६ - ४११

औरंगाबाद - ३२९ - ३७५

बोरिवली - ३०१- ३४५

धुळे - २६६ - ३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसापुरात तृतीयपंथीयांना चोप

0
0

मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

तालुक्यातील विसापूर येथे पैसे मागण्यासाठी आलेले सहा तृतीयपंथीय मुले पळविणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी त्यांना चांगलाच चोप दिला. तृतीयपंथीयांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. आमदार उन्मेष पाटील व मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.

मुक्ताईनगर येथील भीमराव गोपाळराव सांळुखे (वय ४०), मंगल लक्ष्मण शिंदे (वय ४४), गणेश शिवाजी सांळुखे (वय २४), सुरेश तानाजी सांळुखे (वय २२), भवानी भगवान सांळुखे (वय २१), आकाश तानाजी सावंत (वय २१) हे तृतीयपंथीय विसापूर येथे आपल्याने (एमएच १४ बीए ३८३३) पैसे मागण्यासाठी आले होते. कार एका ठिकाणी उभी करून गावात पैसे मागत असतांना ग्रामस्थांना ही मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर उपसरपंच विजय राठोड यांनी मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली. मेहुणबारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ अतिशय संतापलेले असल्याने पोलियांनी तृतीयपंथीयांना ताब्यात घेत ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठा जमाव जमा झाला होता. संतापलेल्या ग्रामस्थांनी तृतीयपंथीयांच्या कारची तोडफोड करून त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. आमदार पाटील यांनी तेथे पोहचत ग्रामस्थांना शांत केले. ग्रामस्थ शांत झाल्यानंतर तृतीयपंथीयांना पोलिसांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली असता तृतीयपंथीयांनी आपण मुक्ताईनगर येथील असल्याचे सांगितले. येथे पैसे मागण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे काही साथीदार आजूबाजूच्या खेड्यांमध्ये फिरत होते. त्यांनाही पोलिसांनी बोलावून घेतले. त्यांनी आपले ओळखपत्र, आधार कार्ड दाखविल्यानंतर पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत न्यायालयात हजर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जवसुलीसाठी आता धडक मोहीम

0
0

जिल्हा बँकेचे अधिकारी-कर्मचारी जाणार घरोघरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

३१ मार्चपर्यंत अवघी १९ टक्केच वसुली झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अजूनही नाजूकच आहे. त्यामुळे वसुली मोहीम पुन्हा जोमाने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मैदानात उतरवण्यात आले असून ते तालुका-तालुक्यात दौरे करत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी बँकेचे कर्ज वसुलीचे उर्वरित उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहे.

जिल्हा बँक अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून केदा आहेर यांनी कर्ज वसुलीसाठी धडक मोहीम उघडली. फेब्रुवारीत त्यासाठी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कर्ज वसुलीचे प्रयत्न केले होते. त्यात जंगम जप्तीव्दारे थकबाकी झालेले वाहने म्हणजे ट्रॅक्टर, जीप, मोटरसायकल यांची जप्ती करून सुमारे १२५ वाहनांची जप्तीद्वारे दोन कोटी रकमेची वसुली केली. अखेर वसुलीस पात्र दोन हजार ७६९ कोटी रुपये असतानाच केवळ ६७४ कोटींची वसुली असून ही थकबाकी पोटी अवघी १९ टक्के आहे. तर थकबाकी पोटी आतापर्यंत २६८ कोटी ६० लाखांचे व्याज जमा झाले आहे. जून २०१८ अखेर अधिकाधिक कर्ज वसुलीसाठी २१ जूनपासून परत कर्जवसुली मोहीम राबविली जाणार आहे. जुने तसेच ऐपतदार थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना प्राप्त १५६ अधिकारान्वये सहकार कायदा १९६० चे कलम १०७ नुसार जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पुढील लिलाव प्रक्रियापर्यंतच्या कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आलेले आहेत. उर्वरित तालुक्यातील ही ऐपतदार थकबाकीदारांवर जप्ती आदेश लवकरच प्रसिद्ध करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच मैदानात उतरवले असल्याची माहिती अध्यक्ष आहेर यांनी दिली आहे.

कर्जमाफीचा लाभ घ्या

सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अतंर्गत मुद्दल व व्याजसह दीड लाखावरील थकीत कर्ज आहे आणि ग्रीन लिस्टमध्ये नावे आलेली आहेत, अशा शेतकऱ्यांनी दीड लाखावरील त्याच्या हिश्याच्या रकमेचा भरणा करून कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. या योजने अंतर्गत भरणा केल्यानतर सरकारकडून एक वेळ समझोता योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २१ हजार ७०० पैकी केवळ ११ हजार खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. योजनेची अंतिम मुदत ३० जून २०१८ अखेरपर्यंतच असल्याने उर्वरित अधिकाधिक खातेदारांनी लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करावे असे आदेश अध्यक्ष आहेर यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन विकास शंभर कोटींचा

0
0

प्रधान सचिवांच्या उपस्थितीत तत्वत: मंजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या रामायण सर्किट योजनेत नाशिकचा समावेश झाल्यानंतर नाशिकच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनी सरसावली आहे. राज्य सरकारचा पर्यटन विभाग आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील ११ पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शंभर कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्मार्ट पर्यटन आराखड्यास पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्या उपस्थितत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यात पर्यंटन स्थळांच्या विकासासह पर्यंटन माहिती केंद्राचीही उभारणी केली जाणार आहे.

महापालिकेनेही शहरातील पर्यटन स्थळाचे ब्रॅण्डींग करण्यासह पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पावले उचलली आहेत. महापालिका मुख्यालय यासंदर्भात पर्यटन सचिव गौतम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पर्यटन विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राठोड, आयुक्त तुकाराम मुंढे, स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, पर्यटन विभागाचे अधिकारी नितीन मुंडावरे, 'केपीएमजी'चे प्रतिनिधी व पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देशभरात धार्मिक व पौराणिक शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. परंतु, त्या तुलनेत नाशिकचे ब्रॅण्डींग झाले नसल्याने पर्यटक पाठ फिरवतात. त्यामुळे नाशिकच्या पर्यटन विकासासाठी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्मार्ट पर्यटन विकास योजना राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेने पुढाकार घेतला असून स्मार्ट सिटी कंपनी आणि पर्यटन विभागाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. नाशिकच्या पर्यटन विकासासाठी काय करता येणे शक्य आहे. अस्तित्वातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

केंद्र शासनाच्या 'रामायण सर्किट' अंतर्गत नाशिकची अगोदरच निवड झाली असून पर्यटन विभागाच्या पथकाने शहरातील पर्यटन स्थळांची पाहणीही केली आहे. याअंतर्गत रामायण सर्किटशी निगडीत असलेले ११ पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहेत. त्यात काळाराम मंदिर, सितागुंफा, सिताहरण व लक्ष्मणरेषा मंदिर, रामकुंड, तपोवन, रामसृष्टी, रामगयातीर्थ, पंचरत्नेश्वर, सिता सरोवर, रामशेज किल्ला, अंजनेरी, सर्वतीर्थ टाकेद, किष्किंदानगरी शुक्लतीर्थ, कावनई कपिलधारा, शूर्पणखातीर्थ या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. रामायण सर्कीट योजनेला चालना देण्याच्या दृष्टीने या पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढील आठवड्यात स्मार्ट सिटी व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात यासंदर्भातील सविस्तर आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर स्मार्ट सिटीची पुन्हा बैठक होणार असून त्यात सविस्तर प्रकल्प आराखड्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

तपोवनात माहिती केंद्

पर्यटक त्र्यंबकहून थेट शिर्डीला जातो. त्याला शहरातील पर्यटन स्थळांकडे वळवल्यास नाशिकच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. येणाऱ्या भाविक, तसेच पर्यटकांना नाशिकमधील धार्मिक स्थळे तसेच पर्यटन स्थळांविषयी माहिती व्हावी तसेच नाशिकच्या पर्यटन विकासासाठी देशभरात मार्केटिंग करता यावे यासाठी पर्यटन माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. पंचवटीतील तपोवनात हे केंद्र उभारले जाणार आहे. महापालिका तसेच सरकारच्या वेबसाइटवर नाशिकमधील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपलब्ध सुविधा आदींविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आराखड्याचे वैशिष्ट्ये

- देशभर नाशिकचे मार्केटिंग होणार

- टूर ऑपरेटर्स व गाईड यांच्यासाठी प्रशिक्षण सुविधा

- पर्यटनस्थळांविषयक दिशादर्शक फलक लावणार

- भोवतालच्या पर्यटनस्थळांचा विकास

- सरकारच्या वेबसाइटवर पर्यटन स्थळांची माहिती

- पर्यटकांसाठी निवास व न्याहरी योजनेला प्रोत्साहन देणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईदसाठी मालेगावी कडेकोट बंदोबस्त

0
0

२६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; ५००हून अधिक कर्मचारी तैनात

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सांगता शनिवारी रमजान ईद निमित्ताने होत आहे. शहरात एकूण १८ ठिकाणी सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे. ईद सण शांततेत साजरा व्हावा यासाठी मालेगाव पोलिस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रमजान ईद पार्श्वभूमीवर शहरात अपर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलिस उप अधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ३६ पोलिस उप निरीक्षक, ५५० पोलिस कर्मचारी, ३००होमगार्डस तैनात असतील. यासह दंगा नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रत्येकी दोन तुकड्या, विशेष शाखेचे १५ कर्मचारी, वज्र, वरून, बॉम्ब शोधक पथक देखील तैनात असणार आहे. शहरात एकूण २६ सीसीटीव्ही कॅमेरे तर १६ व्हिडियो कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ५६४ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कामगारांचे सोमवारपासून उपोषण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माथाडी कामगारांच्या सरकारदरबारी असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी मुंबई येथे मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर माथाडी कामगारी युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते १८ जूनपासून बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा चिटणीस सुनील यादव यांनी दिली. या उपोषणात नाशिकचे माथाडी कामगारहीसामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रलंबित मागण्यांसाठी याअगोदर सरकारबरोबर बैठका झाल्या, लाक्षणिक संप, मोर्चे आंदोलनेही झाली. पण, हे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे मुंबईला माथाडी भवन येथे बैठक झाली व त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत माथाडी कामगार युनियनचे नेते व सरचिटणीस आमदार नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, आमदार शशिकांत शिंदे व अध्यक्ष एकनाथ जाधव हे उपस्थित होते. माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करून अनुभवी कामगार नेत्यांच्या सदस्य म्हणून नेमणुका करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करून त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्यात, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामागारांच्या मुलांना प्राधान्य प्राधान्य द्यावे, माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका कराव्यात, राज्यातील ३६ माथाडी मंडळांचे एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न शासनाने थांबवावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपारास ‘माफी’ नाही

0
0

मटा विशेष

--

तडीपारास 'माफी' नाही

--

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

--

नाशिक : तडीपारीची कारवाई झाल्यानंतर पोलिसांना चकवा देत शहरात वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगारांवर लागलीच पुन्हा तितक्याच कालावधीसाठी तडीपारी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयानंतर उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघा सराईतांवर नुकतीच कारवाई झाली. यामुळे शहरात वास्तव्यास असलेल्या तडीपार गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

शहर पोलिसांनी २०१७ मध्ये २३ तर २०१८ मध्ये आतापर्यंत ५७ अशा ८० जणांना शहरासह जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आणखी नऊ सराईतांवर तडीपारी चौकशी प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या विरोधात लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेचे तीन ते चार किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले की प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तडीपारी करण्यात येते. पोलिस स्टेशनकडून येणाऱ्या प्रस्तावावर पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी निर्णय घेतात. या सुनावणी दरम्यान संशयित गुन्हेगार स्वत: किंवा व वकिलामार्फत आपले म्हणणे मांडू शकतो. तडीपारीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले की, पोलिसच संबंधित व्यक्तीला नजीकच्या म्हणजे ठाणे, अहमदनगर किंवा औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर सोडतात. अनेकदा तडीपार व्यक्ती जिल्ह्याच्या सीमेवरील गावात म्हणजे मोखाडा, संगमनेर वा वैजापूर अशा ठिकाणी राहतात. येथून नाशिकमध्ये येण्यासाठी फारसा वेळ जात नाही तसेच दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध असतात. तडीपार केलेल्या व्यक्तीस काही कामानिमित्त शहरात यायचे असल्यास पोलिस उपायुक्त किंवा कोर्टाची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी ठोस पुरावे सादर करावे लागतात. मात्र, तसे होत नाही. तडीपार व्यक्ती सहजतेने शहरात येऊन वास्तव्य करतात. कागदावर तडीपार असलेले संशयित शहरात गुन्हे करतात. यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासावर देखील परिणाम होतो.

--

दोघांवर कारवाई

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नवीन पद्धत सुरू केली आहे. याबाबत बोलताना परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, नियम तोडून शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपारास अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात मुंबई पोलिस अॅक्टममधील कलम १४२ नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र संशयितास जामीन मिळतो. तर खटल्याच्या सुनावणीसाठी मोठा कालावधी लागू शकतो. लागलीच सुटका झाल्याने संशयितांना तडीपारीचे गांभीर्य वाटत नाही. या पार्श्वभूमीवर नवीन कारवाई सुरू केली आहे. आता तडीपारास अटक झाली की त्याच्या गुन्ह्यांचा अभिलेख विचारात घेता पुन्हा तडीपारीचा प्रस्ताव तयार केला जातो. त्यावर सुनावणी होऊन जेवढ्या कालावधीनंतर तो शहरात सापडला तेवढ्याच कालावधीसाठी त्यास तडीपार करण्यात येते. यामुळे अशा गुन्हेगारांमध्ये कायद्याचा वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा कोकाटे यांनी व्यक्त केली. या धर्तीवर १५ दिवसांपूर्वी दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या जेरबंद

0
0

सिन्नर : पांढुर्ली या गावात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली होती. मागील आठवड्यात विंचूरदळवी येथे एक वासरू बिबट्याने फस्त केल्याने शेतकरी वर्गात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने गुरुवारी सकाळी निवृत्ती वाजे (रा . पांढुर्ली) यांच्या गटात पिंजरा लावला असता, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षेच्या बडग्याप्रमाणेच कामकाजही व्हावे गतिमान

0
0

सरकारी कर्मचाऱ्यांना कामकाजादरम्यान मारहाण केल्यास पाच वर्षांचा कारावास होणार असल्याचा कायदा झाला, याचे सर्वसामान्य स्वागत करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिक सरकारी कार्यालयात जाताना अगोदरच धास्तावलेला असतो. आपले काम होईल की नाही, अशी त्याची त्यालाच शाश्वती नसते, तर तो हाणामारी करेल कशाला? दलाली करणारे अथवा गुंडगिरीचा धाक दाखवत नियमबाह्य काम करून घेणारे सर्वत्र आढळतात. अशा अपप्रवृत्तींना यामुळे काही प्रमाणात आळा बसू शकेल. या कायद्याचा उपयोग अशा अपप्रवृत्तींना प्रतिबंध करण्यासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. केवळ कायदे निर्माण करून आणि कठोर शिक्षेची तरतूद केल्याने सुशासनाचा प्रश्न सुटणार नाही, तर गतिमान कामकाजालाही प्राधान्य द्यावे, असे मतदेखील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

--

सुसंवाद टिकविण्याची गरज

सरकारने केलेल्या कायद्याचे स्वागतच करायला पाहिजे. नोकरी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यास संरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र, हाणामारीपर्यंत वेळ येईल अशी वर्तणूक सरकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित नाही. जनतेची कामे वेळेवर झाली, तर संघर्षाचे प्रसंगच निर्माण होणार नाहीत. नागरिक आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद टिकविण्यासाठी कामांचा निपटारा वेळेवर होणे आवश्यक आहे.

-सागर उजे

वेळेवर व्हावीत नागरिकांची कामे

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांचा येणारा अनुभव चांगला नसतो. वेळेत काम न होणे, वारंवार पाठपुरावा करूनदेखील पदरी निराशा येणे यामुळे नागरिकांचा संताप अनावर होऊन संघर्ष होण्याची शक्यता असते. अर्थात, नागरिकांनी कायदा हाती हाती घेऊन हाणामाऱ्या करणे योग्य नाही, तसेच नागरिकांची कामे झाली पाहिजेत याचादेखील विचार सरकारने करायला हवा.

-योगेश महाले

पडताळणीसाठी हवी सक्षम यंत्रणा

सरकारी कर्मचाऱ्यांबाबत झालेला कायदा चांगला आहे. परंतु, जशी नाण्याला दुसरी बाजू असते तशी ती या कायद्याबाबतदेखील असायला पाहिजे. कर्मचारी अथवा अधिकारी यांच्या बाबत झालेल्या प्रकाराची सत्यता पडताळून पाहण्यासाठी यंत्रणा सक्षम असायला हवी. अन्यथा हा सर्वसामान्य नागरिकांबाबत अन्याय ठरेल आणि नागरिकांची सहज होणारी कामे होणार नाहीत, अशी शक्यता वाटते.

-देवीदास नारळे

गैरवापर रोखण्याचे आव्हान

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना निर्धोक वातावरणात काम करण्यासाठी त्यांच्या संरक्षणाचे कायदे पूर्वीपासून आहेत, त्यात गैर काही नाही. मात्र, आता नव्या कायद्याने शाळा प्रवेश, दवाखान्यांतील उपचार अशा काही गरजेच्या कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंध येतो, त्यांची या कायद्याचा आधार घेऊन पिळवणूक होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

-दीपक लढ्ढा

बाजू मांडण्याची मिळावी संधी

नागरिकांना आपली कामे करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. अनेकदा कर्मचारी व नागरिकांत शाब्दिक खटके उडतात. काही वेळेस संताप आनावर झाल्यास हाणामारीही होत असेल. मात्र, त्याकरिता विनाजामीन अटक आणि पाच वर्षे तुरुंगवास ही शिक्षा जास्तच आहे. या शिक्षेची तरतूद कमी करून नागरिकांना बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे.

-योगेश घागरे

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जपणार चिमुकल्या पायांचे ठसे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शुक्रवारी शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रमदेखील जिल्ह्यात राबविण्यात आला. हे ठसे जपले जाणार असून, शाळा सोडताना विद्यार्थ्याला ते दिले जाणार आहेत. विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी, लेझीम पथक, बैलगाडीतून मिरवणूक यामुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते.

या सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण दराडे, जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. राज्यात नाशिक जिल्ह्यातच अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

प्रवेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात ११ जूनपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सर्व गावांमध्ये मशालफेरीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीदेखील नाशिक तालुक्यातील शिंदे गावात मशाल फेरीत सहभाग घेतला. ग्रामस्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, मोफत पाठ्यपुस्तके वितरण नियोजन, शाळाबाह्य मुलांच्या भेटी, गाव दवंडी, मशाल फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करून वातावरणनिर्मिती करण्यात आली. या सोहळ्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरून संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांनी शाळांना भेटी देऊन या उपक्रमात सहभाग घेतला.

शेवग्याच्या झाडांची लागवड

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उप्रकमांबरोबरच शेवग्याच्या झाडांच्या लागवडीचा उपक्रम घेण्यात आला. डॉ. गिते यांनी कुपोषण निर्मूलनासाठी शेवगा लागवड करण्याचे आवाहन करून जिल्हा शेवगामय करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार शुक्रवारी शाळा व अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यात आली.

मुलांमध्ये रमले अधिकारी

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. नव्यानेच शाळा व अंगणवाडीत प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या शैक्षणिक पर्वातील पहिल्या पावलाचे साक्षीदार होण्यासाठी व या मुलांना प्रोत्साहन व आशीर्वाद देण्यासाठी हे अधिकारी मुलांमध्ये रमल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील रामरावनगर शाळेत भेट देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी निफाड तालुक्यातील ओझर शाळेला भेट देऊन आपला सहभाग नोंदविला. जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे येथील मुलांसोबत शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. पोलिस अधीक्षक प्रवीण दराडे यांनी नाशिक तालुक्यातील पिंप्री सैय्यद येथील शाळेमध्ये उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’ शाळांचा दर्जा वाढवणार

0
0

सीईओ डॉ. नरेश गिते यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत असून या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक शिक्षकाने शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व सुसंस्कृत पिढी तयार करणेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.

घोटी (ता. इगतपुरी) येथील रामरावनगर भागातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोस्तव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकार, गट विकास अधिकारी किरण जाधव, सरपंच कांदाबाई बोटे, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार, गटशिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गिते यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. डॉ. गिते यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्याने स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. रामरावनगर येथील अंगणवाडी केंद्रास डॉ. गिते यांनी भेट देऊन तेथे सुरू असलेल्या बालग्रामविकास केंद्राची माहिती घेतली. या केंद्रात २ तीव्र कुपोषित बालक उपचार घेत असून त्यांच्या वजनात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणाऱ्यांकडून वाहनचोरी

0
0

तिघा जणांच्या टोळीकडून १८ दुचाकी जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरफोडीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका संशयिताच्या अटकेने वाहनचोरीचाही भांडाफोड करण्यात अंबड पोलिसांना यश मिळाले आहे. तिघा सराईतांच्या टोळीने शहरातील तब्बल १८ दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांकडून घरफोडीतील मुद्येमालासह आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित दुचाकींचा शोध सुरू असून, पुरावा मिटवण्यासाठी संशयितांनी चार दुचाकी विहिरीत फेकल्या आहेत.

विजय केशव गुप्ता (२१), प्रशिक उर्फ भुऱ्या बाळू भरीत (१९, दोघे रा. वरचे चुंचाळे) व नवनाथ उर्फ डॉलर रामदास साळवे (१९, रा. आंबेडकरनगर, चुंचाळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की अंबड एमआयडीसीतील क्लॅरिऑन इंजिनीअर्स अ‍ॅण्ड टेक एलएलपी कंपनीत शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. ही घटना शनिवारी (दि. ९) रात्री घडली होती. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित विजय गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दुचाकीचोरीचा भांडाफोड झाला. त्यानुसार तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. संशयितांनी विविध भागातून १८ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यातील आठ दुचाकी चुंचाळे येथील पांजरपोळच्या शेतातून जप्त करण्यात आल्या. तसेच सहा दुचाकी इतरांना वापरण्यासाठी देण्यात आल्या असून, त्या लवकरच जप्त केल्या जाणार आहेत.

इतर ठिकाणचे गुन्हे उघडकीस

संशयितांच्या अटकेने अंबडचे दोन, तसेच इंदिरानगर, मुंबईनाका आणि सातपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे, सहायक आयुक्त सचिन गोरे, अशोक नखाते, निरीक्षक सोमनाथ तांबे आदी उपस्थित होते. उपनिरीक्षक तुषार चव्हाण, विजय पवार, हवालदार मल्ले, पोलिस नाईक दत्तात्रेय गवारे, दुष्यांत जोपळे, विजय वरंदळ, अविनाश देवरे, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, शिपाई हेमंत आहेर, दिपक वाणी, विपूल गायकवाड, मनोहर कोळी, प्रशांत नागरे आदींच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधुभावातून वाढेल धर्माची शान

0
0

ईद-उल-फित्रनिमित्त नमाज अदा; सर्व धर्मियांकडून शुभेच्छांचा वर्षाव

टीम मटा

देशाची सुरक्षा, धर्मावर येणारे संकट, अतिवृष्टी यापासून आपले संरक्षण व्हावे तसेच आपसाआपसात बंधुभाव वाढीस लागून धर्माची शान जोपासण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहिले पाहिजे. रमजान हा पवित्र महिना असल्याने कोणाकडून काही चुकी झाली असल्यास त्याला माफी द्यावी, अशी मुस्लिम बांधवांनी शनिवारी अल्लाहकडे प्रार्थना केली.

देवळाली कॅम्प : वडनेर रोडवरील इदगाह मैदानावर मौलाना सादिक अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली तर भगूर येथे हाफिज इकबाल दाऊद यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता व समृद्धीसाठी नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांना खैरात वाटप केली. एकमेकांची गळाभेट घेत सर्व धर्मियांनी शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानाच्या प्रवेशद्वारावर शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, तहसीलदार राजश्री अहिरराव, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, विलास धुर्जड, चंद्रकांत गोडसे, हनुमंता देवकर, रवींद्र भदाणे, संजय गोडसे, नितीन गायकवाड,छावा संघटनेचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशीद सैय्यद आदी उपस्थित होते.

शिर्खुमाची मेजवानी

सातपूर : रमजान ईदनिमित्त सातपूरकरांना शनिवारी शिर्खुमाची मेजवानी मिळाली. नगरसेवक तथा मनसे गटनेता सलिम शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांनी आप्तेष्टांना बोलवत शिर्खुमाचा पाहुणचार दिला. सातपूरला रजविया मशिद व अंबडलिंकरोवर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, भाजपा युवा मोर्चाचे नितीन निगळ, अरुण काळे, भिवानंद काळे, राजेश दराडे यांच्यासह सातपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र कुटे उपस्थित होते.

नाशिकरोडला उत्साह

जेलरोड : देवळालीगाव, विहितगाव येथील मुख्य ईदगाह मैदान, उपनगर मदरसा, अंजुमन फैजाने हजफिया नुरी ट्रस्ट मदरसा मंगलमूर्तीनगर, कौनेस मदरसा डी. डी. पी नगर, अशफिया गुलशने चित्तीया कॅनालरोड, विहितगाव मशिद, देवळालीगाव मशिद, सोमाणी गार्डन मशिद, रोकडोबावाडी मशिद, जामा मशिद मरकज, मसजिद-ए-नूरिया व मदरसा गोसावी वाडी, सुन्नी मसजिद-ए-नुरिया जियाउद्यीन डेपो, नूर-ए-महम्मदिया मशिद शिंदे, अश्रफिया मशिद व मदरसा अरिंगळे मळा, चाँदतारा मशिद चेहेडी, महम्मदिया सुन्नी मसजिद जाखोरी, इमाम अहमद रजा मशिद सिन्नरफाटा, अक्रम-ए-मदरसा मगर चाळ येथे सामूहिक नमाज पठाण झाले.

नेतेमंडळींची गर्दी

आमदार योगेश घोलप, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते, पंढरीनाथ ढोकणे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, केशव पोरजे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, माजी महापौर नयना घोलप, मनोहर कोरडे, रामदास सदाफुले, प्रकाश करोडे, कैलास आल्हाट, भैय्या मणियार, ऱफीक शेख आदींनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

कारागृहात ईद

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी रमझान ईद उत्साहात साजरी केली. यानिमित्त मौलवींच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण झाले. मौलवींनी बंद्यांना मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर, कारागृह कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, तात्या निंबाळकर, डॉ. ससाणे, संतोष कोकणे, निमजे आदी उपस्थित होते. यावेळी नमाजींना शिर्खुमा वाटप झाले. राजकुमार साळी यांनी बंदीजनांना शुभेच्छा दिल्या.

पूर्वजांचे स्मरण

नाशिकरोड : रमजान ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आल्यानंतर शेजारील कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांना पुष्प अर्पण करुन मुस्लिम बांधवांनी आदरांजली वाहिली. दरम्यान, शहर पोलिस दलाच्या वतीने पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, प्रभाकर रायते यांच्यासह नगरसेवक सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोहर कोरडे, व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, मनसेचे प्रकाश कोरडे, शाम गोहाड आदींनी गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

नवनाथ पंथीयांच्या शुभेच्छा

पंचवटी : नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवाना पुष्प वाटून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बर्वे, उपाध्यक्ष जालिंदर कानडे, रजनीकांत पवार, सचिव चेतन कानडे, जालिंदर जाधव, रोहित कानडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेववाडी झोपडपट्टीला दिलासा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरची महादेववाडी झोपडपट्टी अनधिकृत ठरवून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने झोपडपट्टी हटविण्याची कारवाई सुरू केल्याने येथील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, राज्य सरकारने पावसाळ्यात निवासी भागातील अतिक्रमण काढू नये, असा आदेश काढला आहे. त्यामुळे तूर्त तरी किमान चार महिने येथील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सातपूरच्या महादेववाडीतील झोपडपट्टीमधून पंधरा मीटर डीपी रस्ता जात असून, रस्त्यावरील झोपडपट्टीत ६७ झोपड्या, तर एक बुद्धविहार आहे. न्यायालयाने ही झोपडपट्टी हटवून रस्ता तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने झोपडपट्टी हटविण्यासाठी रेखांकन केले. त्यापूर्वी ऑक्‍टोबर २०१३ मध्ये अतिक्रमणात येणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बाधितांची यादी तयार केली. त्याचाही लाभ यांना देण्याचे प्रयत्न झाले. त्यातील काहींकडे पुरावे असल्याने घरकुल योजनेत लाभ मिळाला, तर काहींकडे पुरावेच नसल्याने ते अद्याप या झोपडपट्टीत राहत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने मार्च २०१८ मध्ये रस्त्यात येणाऱ्या झोपड्या काढण्याचे आदेश देत लाल फुल्या मारल्या. एप्रिल २०१८ मध्ये महापालिकेने पुनर्वसन करण्याची मागणी झोपडपट्टीतील नागरिकांनी केल्यानंतर महापालिकेने रहिवाशांशी पत्रव्यवहार करीत घरकुल योजनेत सहभागी होण्यासाठी रहिवासी पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, झोपडपट्टीतील अवघ्या चार कुटुंबांना रहिवासी पुरावे सादर करता आल्याने महादेववाडीतील झोपडपट्टीधारकांना महापालिकेने जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, संबंधित रहिवाशांनी नोटिसा स्वीकारल्या नसल्याने महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. सध्या बंदोबस्त मिळाला नसल्याने ही कारवाई करता आली नाही, तर दुसरीकडे चार महिने अतिक्रमण काढता येत नसल्याने त्यांच्यावरील कारवाई तूर्तास चार महिने थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images