Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिंडोरीत शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, वनारे (ता. दिंडोरी) येथेही एका त्रस्त शेतकऱ्याने विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. या घटनेची जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली असून, जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३४ झाली आहे.

तुकाराम अर्जुन गायकवाड (वय ४७) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या नावे ४ हेक्टर ८१ आर जमीन असून, मडकीजांब येथील तलाठ्याने जिल्हा प्रशासनाला त्याबाबतची प्राथमिक माहिती दिली. गायकवाड यांनी १२ मे रोजी विष प्राशन केले होते. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी ननाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती खालावल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु, मंगळवारी (दि. १५) सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. गायकवाड यांनी कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली याचा शोध घेण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हाडे असलेली बॅग सापडली

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या आनंदनगर येथील बाभळीच्या झाडांमध्ये हाडे असलेली बॅग आढळल्याने खळबळ उडाली. ही हाडे मानवी आहेत की प्राण्यांची, याची खात्री उपनगर पोलिस करीत आहेत. या बॅगवर उर्दू अक्षरे असून, नाव व क्रमांक आहे. तसेच हाडांना रंग आहे. एखाद्या हॉस्पिटलने निष्काळजीपणे ही बॅग टाकून दिल्याचा पोलिसांचा कयास आहे.

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विशाल पांडव या नागरिकाला ही बॅग दिसली. त्याने उपनगर पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक संदीप कांबळे, गणेश जाधव, सहाय्यक रासायनिक विश्लेषक प्रतिमा गोस्वामी हे दाखल झाले. पंचनामा करून बॅग ताब्यात घेण्यात आली. या हाडांची प्राथमिक तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. गरज वाटली तर न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हाडांची डीएनए चाचणी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे थकविणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात तक्रार

0
0

मालेगाव बाजार समिती संचालक मंडळाची कठोर पावले

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध संचालक व प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जय भोले ट्रेडर्सचे संचालक शिवाजी सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांचे २ कोटी ८६ लाख थकविले म्हणून येथील तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार आहे.

गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने मुंगसे येथील कांदा खरेदी विक्री केंद्रात जय भोले ट्रेडर्सचे संचालक शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला. मात्र त्यांनी दिलेले धनादेश परत आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले. संचालक मंडळ व प्रशासनाने यात मध्यस्थी करीत तीन कोटी ७६ लाख रुपयांपैकी सुमारे १ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले होते. मात्र दोन कोटी अद्याप थकीत आहेत. दरम्यानच्या काळात संचालक मंडळाचे पथक सूर्यवंशीच्या शोधात बंगलादेश येथे जावून आले. मात्र पथकाला खाली हात परतावे लागले होते.

शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी अखेर सहकार विभागाने संचालक मंडळाला बरखास्तीची नोटीस बजावली आहे. याबाबत संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोमवारी आपले म्हणणे मांडले. आता संबंधित व्यापाऱ्यावर थेट पोलिस कारवाई करण्याची आमची तयारी असल्याचे उपसभापती सुनील देवरे यांनी 'मटा'ला सांगितले. याबाबत मंगळवारी बाजार समिती संचालक मंडळ तसेच शेतकरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात निरीक्षक यांची भेट घेवून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वकाल साधण्यासाठी त्र्यंबकमध्ये गर्दी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अधिक मासाचा पर्वकाल साधण्यासाठी अमावस्येपासूनच भाविकांची गर्दी उसळली आहे. वर्षभर शनिवार, रविवार आणि शासकीय सुटी वगळता भाविकांचा ओघ तुरळक राहिला होता. उन्हाळी सुट्या असताना देखील लग्नसराई आणि वाढते तापमान यामुळे भाविकांची संख्या रोडावली होती. तथापि अधिकामासाच्या पूर्वसंधे पासूनच शहर गजबजले आहे. कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी होत आहे. अधिक महिना अर्थात धोंड्याच्या महिन्यात वाण देण्या-घेण्यासाठी भाविक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.

दुष्काळात तेरावा महिना

मे महिन्याच्या उत्तरार्धात अधिक महिना आला आहे. भाविकांची गर्दी उसळली असताना शहरात एक दिवसआड पाणी पुरवठा होत आहे. ग्रामस्थांना घरी पाहुणे, यात्रेकरू येत असताना त्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असल्याने दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

खासगी वाहतूक सुसाट

अधिक महिन्याचा पर्वकाल साधण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी उसळली आहे. बहुतांश भाविक बस प्रवासाला प्राधान्य देतात. यातूनच नाशिक-त्र्यंबक मार्गावर बस प्रवासी वाढले आहेत. तथापि याचे कोणतेही नियोजन बस महामंडळ प्रशासनाने केलेले नाही. नाशिक आणि त्र्यंबक दोन्ही स्थानकावर प्रवासी बसची वाट पाहत खोळंबलेले आढळतात. सायंकाळी तर बसची संख्या अत्यंत कमी आहे. नाशिक-त्र्यंबक मार्गावर २२ थांबे आहेत. यातील काही ठिकाणी बस थांबतच नाहीत. परिणामी प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहेत.

प्रवाशांची फसवणूक

नाशिक-त्र्यंबक मार्गावर खासगी वाहतूक सुसाट धावत आहे. त्र्यंबक येथून नाशिकला जातांना ही वाहने कोणत्या स्थानकात जाणार याचा पत्ता नसतो. भाविक, प्रवाशांना नाशिक येथून पुणे, मुंबई, धुळे, रेल्वेप्रवासासाठी नाशिक रोड स्टेशन आणि नाशिकमध्येच असेल तर रामकुंड, पंचवटी आदी ठिकाणी जायचे असते. नाशिक येथे याकरिता वेगवेगळे बसस्थानक आहेत. परप्रांतीय भाविकांचा मात्र खासगी वाहनधारकांमुळे गोंधळ होतो. काही खासगी वाहनधारक तर परप्रांतीय प्रवाशांची फसवणूकही करतात. त्यामुळे बस प्रशासनाने योग्य तो निणर्य घेण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता, पाण्यासाठी महिला आक्रमक

0
0

मालेगाव पालिकेवर आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील प्रभाग क्र ३ मधील द्याने, रमजानपुरा परिसरात दररोज साफसफाई व्हावी, कचरा नियमितपणे उचलला जावा, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा आदी प्रमुख मागण्यांसाठी या भागातील महिला व नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सोमवारी मोर्चा काढला.

सामाजिक कार्यकर्ते शेख शमीम शेख शकील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी कर उपायुक्त राजू खैरनार यांच्यापुढे समस्याचा पाढा वाचला. द्याने रमजानपुरा भागात नियमित साफसफाई होत नाही. कचरा उचलला जात नाही. सफाई कामगार एक एक महिना येत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अनेकवेळा रस्त्याने अपघात होवून अनेकांना दुखापत झाली आहे. तसेच सर्वे नं. १७५, २१३ व २२० येथे जलवाहिनी टाकण्यात आली असली तरी अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे परिसरातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, अशा विविध समस्या उपायुक्त खैरनार यांच्यापुढे मांडल्या.

दरम्यान उपायुक्त खैरनार यांनी मोर्चेकरी महिलांशी चर्चा करून जलवाहिनीचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना शहर अभियंता सचिन माळवळ यांना दिल्या. तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी सोनवणे यांना स्वच्छता करण्याचा सूचना देत रस्त्यावरील पथदिवे त्वरित सुरू करण्याची ग्वाही दिली. खैरनार यांच्याशी चर्चेनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मोर्चात रफिक किराणावाला, अमीन अकबर, शेख अंजुम, एकीलाबानो यांच्यासह या परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा

0
0

लोगो- चर्चा तर होणारच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अशोकामार्ग परिसरात कुत्रा चावल्याने मालकास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. हे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले असून, श्वानमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांची संख्या मोठी आहे. अशा श्वानप्रेमींसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

इंदिरानगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका वृद्धेवर चार ते पाच गाईंनी जबरदस्त हल्ला चढवला होता. महिलेला थेट आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना आता पाळीव श्वानाने ११ वर्षांच्या बालिकेला चावा घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी अविनाश चंद्रमोहन बोडके (४४, रा. फ्लॅट क्रमांक १, प्रतीक पार्क, लिंगायत कॉलनी, गणेश बाबानगर, अशोकामार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. २४ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास बोडके आपल्या ११ वर्षांच्या मुलीला घेऊन बागेत निघाले होते. श्रेया आणि अविनाश मोपेडवरून जात असताना नितीन आंधोळकर यांनी पाळलेला श्वान त्यांच्या दुचाकीच्या दिशेने झेपावला. श्वानाने श्रेयाचा चावा घेऊन जखमी केले. घटनेनंतर संबंधीत श्वानमालकास बोडके यांनी जाब विचारला. मात्र, श्वानमालकाने हात वर केले. याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा म्हणून बोडके यांनी पाठपुरावा सुरू केला. अखेर मुंबईनाका पोलिसांनी कलम २८९ प्रमाणे श्वान मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास हवालदार एस. पी. क्षीरसागर करीत आहेत. कलम २८९ हे पाळीव जनावरांबाबत असून, प्राणी पाळणाऱ्या व्यक्तीने दुर्लक्ष केल्यामुळे तसेच प्राण्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास मालकाला सहा महिन्यांपर्यंत शिक्षा अथवा दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. महापालिकेकडे अवघ्या दोन हजार पाळीव श्वानांची नोंद असून, श्वान मालक नोंदणीसह इतर सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध धडक कारवाईची गरज

0
0

काही ना काही  कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या शहरातील बहुसंख्य महिलांना रिक्षाने प्रवास करणे अपिरहार्य ठरते. मात्र, काही टवाळखोर रिक्षाचालकांच्या गैरवर्तणुकीमुळे अनेक महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. पण, अशा घटनांची तक्रार करण्याकडे त्या दुर्लक्ष करतात. मात्र, आता महिला सतर्क होताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला असून, एका महिलेने रिक्षाचालकाच्या मुजोरीबाबत थेट सोशल मीडियात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित बेशिस्त रिक्षाचालकावर कारवाईला चालना मिळू शकली. पोलिसांनी केवळ एका कारवाईवर न थांबता बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध धडक मोहीम राबविणे गरजेचे झाले. वेळोवेळी अशी कारवाई झाली, तरच नाशिकच्या रस्त्यांवरील बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लागण्यासह महिलांनादेखील निर्धोकपणे प्रवास करणे शक्य होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

रिक्षाचा प्रवास बनला 'रिस्की'

आज प्रत्येकाकडे दुचाकी अथवा चारचाकी वाहन असले, तरी कधी ना कधी रिक्षात बसण्याची वेळ प्रत्येकावर येते. नाशिकमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा नमुना आपण रस्त्यावर नेहमी पाहत असतो. काही टवाळखोर रिक्षाचालकांमुळे महिलांसाठी रिक्षाचा प्रवास 'रिस्की' बनत चालला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे .

-धनंजय गोडसे

नियम मोडण्यात आघाडी

शहराच्या  विविध भागात अनेक रिक्षाचालक व्यवसाय करतात. वाहतूक पोलिस अनेकदा पोटावर पाय नको या उद्देशाने  त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. त्याचाच गैरफायदा घेत काही मुजोर रिक्षाचालक मनमानी करताना दिसतात.  रिक्षा चालविताना या चालकांकडून नेहमीच वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे इतर वाहतुकीवरही ताण येतो.

-दत्तात्रय गायकवाड 

'प्रवासी देवो  भव:'ला हरताळ 

नाशिकमधील सिग्नलवर काही  रिक्षाचालक सिग्नल हिरवा नसतानादेखील सर्रासपणे तो तोडून निघून जातात. महत्त्वाची सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अशी धोकादायक पद्धतीने वाहतूक  होत आहे. परिणामी 'प्रवासी देवो भव:' या ब्रीदालाच जणू हरताळ फासला जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

-संदेश गांगुर्डे

कारवाईऐवजी सल्ले दुर्दैवी

पोलिस काय आणि वाहतूक पोलिस काय, या दोघांवरही कायद्याची अंमलबजावणी करीत  असताना कोणाकडून काही चूक झाली असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. मात्र, बेशिस्त रिक्षाचालकांकडून एखाद्या महिलेची छेड काढली जात असताना पोलिसांनी कारवाई न करता चुकीचे सल्ले  दिले जातात हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

-मधुकर गोडसे 

सर्वांनीच बाळगावी सतर्कता

अनेक रिक्षाचालक तीस-चाळीस वर्षे प्रामाणिकपणे रिक्षा चालवीत उपजीविका करीत आहेत. मात्र, काही जण  केवळ पैसे कमावण्यासाठी हा व्यवसाय करतात. त्यांच्यात सेवाभाव नसतो. त्यामुळे अनेक गैरप्रकार घडताना दिसतात. त्याचा महिलांना जास्त त्रास होतो. त्यामुळे महिलांसह सर्वांनीच रिक्षाने प्रवास करताना पुरेशी सतर्कता बाळगायला हवी.

- प्रदीप पाटील

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनैश्वर महाराजांचा जयघोष…...

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहर परिसरातील शनी मंदिरांत शनैश्वर यागासह सुरू असलेले विविध धार्मिक विधी… दर्शनासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा अन् शनी महाराजांचा सुरू असलेला जयघोष अशा भक्तिमय वातावरणात मंगळवारी शनैश्वर महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला.

रंगरंगोटी करून सजविलेले शनी मंदिरे, त्यांच्यासमोर आकर्षक मंडपांची केलेली उभारणी, शनी महाराजांच्या स्तोत्राचे सुरू असलेले पठण, शनैश्वर यागाचे आयोजन, रुईच्या माळा शनी मूर्तीला अर्पण करून तेलाचा अभिषेक करणारे भाविक असे चित्र शहरातील ठिकठिकाणच्या शनी मंदिरांत दिसून आले.

पंचवटीत शनैश्वर याग

पंचवटीतील शनी चौकातील श्री शनी मंदिर ट्रस्टतर्फे लघुरुद्राभिषेक करण्यात आला. सायंकाळी शनैश्वर महाराजांचा सवाद्य पालखी सोहळा झाला. पंचवटी परिसरात ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार जानोरकर, उपाध्यक्ष सुनील महंकाळे, सचिव सुनील कोठुळे, विश्वस्त रघुनंदन मुठे, भास्करराव करकळे आदींनी ग्रहराज शनैश्वर पीडा परिहारार्थ व जनकल्याणार्थ सनवग्रहमख शनैश्वर यागाचे आयोजन केले.

पेठरोडला शोभायात्रा, बोहडा

पेठरोड येथील रामनगर येथे श्री शनैश्वर महाराज उत्सव समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी मकरंद गर्गे यांच्या पौरोहित्याखाली शनी महापूजा व तेलाचा महाभिषेक करण्यात आला. गणपती पूजन, पुण्याहवाचन, माकापूजन, मुख्य देवता, नवग्रह स्थापन पूजन करून दुपारी सांगता करण्यात आली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री दशावतारी सोंगे (बोहडा) कार्यक्रम झाला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा श्री शनैश्वर महाराज उत्सव समितीचे लक्ष्मण धोत्रे, नंदूभाऊ पवार, अनिल कोठुळे, अनिल कुसाळकर, पोपटराव इंगळे, सोमनाथ लोणे यांनी सत्कार केला.

...या मंदिरांतही पूजन

रामकुंड, काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा, तपोवन, शर्वायेश्वर महादेव मंदिर, नांदूर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद आदी ठिकाणच्या शनी मंदिरांतदेखील भाविकांनी पूजा आणि दर्शनासाठी गर्दी केली होती. आज, बुधवारी (दि. १६) रोजी सायंकाळी शनी चौक, पेठरोड आदी शनी मंदिरांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रामकुंडावर स्नानासाठी गर्दी

शनी जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची रामकुंडावर स्नानासाठी गर्दी झाली होती. रामकुंडावर स्नान केल्यानंतर भाविक शनी मंदिरांत दर्शनासाठी जात होते. मंदिरांच्या भोवताली पूजा आणि प्रसादाची दुकाने थाटण्यात आली होती. शनी महाराजांना अर्पण करण्यात येणारे वस्त्र, श्रीफळ, तेल, अगरबत्ती, कापूर, रुईच्या माळी आदी विक्रीसाठी उपलब्ध होते. मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या भोवतालचे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले होते.

००००००

नाशिकरोडला पालखी मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडला शनी जयंती उत्साहात साजरी झाली. देवळालीगाव, विहितगाव परिसरातील अण्णा नवग्रह मंदिर, दसक, लोखंडे मळा, उपनगर आदी ठिकाणच्या शनी मंदिरांत दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. बिटको चौकापासून देवळालीगावापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात सामाजिक, राजकीय मंडळींसह तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तैलाभिषेक, मांडव-डहाळे

देवळालीगावातील शनी मंदिरात शनैश्वर मित्रमंडळ व जयंती उत्सव समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे तैलाभिषेक, सकाळी मांडव-डहाळे, महाआरती झाली. त्र्यंबकबाबा भगत, अण्णा गुरुजी महाराज, विजय भोई, आमदार योगेश घोलप, अॅड. शांतारामबापू कदम, त्र्यंबकराव गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, बिझनेस बॅंकेचे अध्यक्ष विजय चोरडिया, सुधाकर जाधव, जगन आगळे, अरुण जाधव, डॉ. प्रशांत भुतडा, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, बाळनाथ सरोदे, संतोष सहाणे, श्याम गोहाड आदी उपस्थित होते. बिटको चौकापासून देवळालीगावापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंगेश लांडगे, संतोष माळवे, अजय कडभाने, नीलेश खुळगे, अमर सुखय्या, विलास ताजनपुरे, उन्मेश गायकवाड, अतुल जावरे, नीलेश लांडगे, सागर कडभाने, बबलू नाडे, शुभम टाकळकर आदींनी संयोजन केले

ब्रह्म मुहूर्तावर पूजन

विहितगाव परिसरातील अण्णा गणपती नवग्रह मंदिरात पहाटे साडेतीनला ब्रह्म मुहूर्तावर अण्णा गुरुजींच्या हस्ते तैलाभिषेक, मंत्रपठण, शनी याग व नंतर महाआरती झाली. खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, पोलिस निरीक्षक रवींद्र माने, शुभांगी रत्नपारखी, सुधीर अंबावणे, शेखर अण्णा नायडू आदींची प्रमुख उपस्थिती होती. यजमान मिलिंद दांबले, दीपकभाई लुणावत, प्रवीण लुणावत आदींच्या हस्ते पूजा झाली. दिगंबर त्रिपाठी यांनी पौरोहित्य केले. नितीन भोजणे, पंकज कवळी, दीपेश पटेल, कांतिलाल पटेल, नरेश शहा, परेश अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वारकरी विश्व जीवनगौरव’ने भाऊराव महाराजांचा सन्मान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैकुंठवासी भाऊराव महाराज यांनी वारकरी ज्ञान संपादित करून आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी वाहिले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्याच्या वतीने नाशिकमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात त्यांचा मरणोत्तर वारकरी ‌विश्व जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रभूषण वारकरीरत्न हभप बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते प्रमिला भाऊराव रावळगावर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी वासुदेव महाराज रावळगावकर, सोपान महाराज रावळगावकर उपस्थित होते. भाऊराव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, गुजरात आदी भागात व्यसनमुक्ती, हुंडाबळी, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, तसेच सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी आपल्या कीर्तन-प्रवचनांच्या माध्यामातून समाजप्रबोधन करून ज्ञानदान केले. त्यांच्या तिसऱ्या पिढीकडूनदेखील आजही त्यांचे कार्य सुरू आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाने त्यांच्या कुटुंबीयांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

(फोटो) (सोशल कनेक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीमंती सोहळ्यांमध्ये राबताहेत चिमुकले हात

0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

डोळे दिपून टाकणाऱ्या श्रीमंती लग्नसोहळ्यांच्या आनंदामागे अनेक चिमुकले हात राबत असल्याचे दुर्दैवी चित्र शहरात आहे. अनेक लॉन्समध्ये सर्रासपणे बालकामगार काम करीत असल्याचे दिसून आले. कायद्याने चौदा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास मनाई आहे. चौदा वर्षांवरील मुले (अठरापर्यंत) चार तासांपेक्षा अधिक काम करणार नाहीत, असेही बंधन आहे. प्रत्यक्षात हे केवळ कागदावर असल्याचे नाशिकमध्ये दिसून येते आहे.

नाशिकच्या विविध भागांत असलेल्या लॉन्समध्ये साजऱ्या होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालकामगार काम करताना दिसतात. जेवणाच्या थाळ्या उचलणे, खरकटी काढणे, झाडू मारणे अशा अनेक कामांमध्ये काही प्रतिष्ठित लॉन्समधून बालकामगारांकडून काम केले जात आहे. याशिवाय मुलांचा वापर करून रस्त्यावरील सिग्नलवर भीक मागणे, गजरे विकणे, खेळणी विकणे हे चित्रही रोजचेच आहे. अशा या घटकांकडे अनेक सामाजिक संस्था व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

सन २०१३ मध्ये 'आंतरराष्ट्रीय मजूर संघटने'च्या आकडेवारीनुसार सध्या जगात ५.२ कोटी बालकामगार आहेत. १.७ कोटी भारतात आहेत, म्हणजे भारतातील एकूण कामगारांपैकी बालकामगारांची संख्या सहा टक्के आहे. उपरोक्त कायद्यामुळे संघटित क्षेत्रातील बालकामगारांची संख्या कमी झाली असली, तरी असंघटित क्षेत्राची कायद्यातून सुटका होत असल्याने तेथे बालकामगारांची संख्या वाढून त्यांची परिस्थिती अधिक हलाखीची होत आहे. केवळ कायद्याने बालकामगार प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नाही, त्यासाठी मूलभूत आर्थिक-सामाजिक परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे. बालकामगार निर्माण होण्यास आई-वडिलांचा अशिक्षितपणा, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य आदी घटक कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागत असल्याचे दिसून येते. २०१५-१६मध्ये राज्यात ७,२७,४३२ बालकामगार होते.

कायदा काय म्हणतो ?

१४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र, स्वत:च्या कुटुंबियांच्या मालकीच्या उद्योगांमध्ये, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लॉन्समधून बालकामगार कामावर ठेवणे हा दखलपात्र गुन्हा ठरवला असून, त्याचा भंग केल्यास तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येते. बालकामगार सुधारणा विधेयकात देशात सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा विचार केला आहे. शेती, कलाकुसर या क्षेत्रात देशातील अनेक कुटुंबांमध्ये मुले आपल्या आई-वडिलांना मदत करतात. नवीन विधेयकातील तरतुदीनुसार, स्वत: कुटुंबीयांच्या मालकीच्या उद्योगांमध्ये, चित्रपट, मालिका, जाहिराती आणि क्रीडा क्षेत्रात १४ वर्षांखालील मुलांना काम करता येऊ शकेल. मात्र, शाळा सुटल्यानंतर त्यांना हे काम करावे लागेल.

अल्पवयीन मुलांना कायद्याने बंदी असताना लॉन्समधून त्यांच्याकडून अशा प्रकारे काम करून घेणे चुकीचे आहे. समाजाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळली, तरच बालकामगारांची मुक्तता होईल.

- अॅड. अशोक आडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागर संपर्क यात्रेत सहभागी व्हा

0
0

जागर संपर्क यात्रेत सहभागी व्हा

राजाराम पानगव्हाणे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेस जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी व युवकांनी सहभागी होऊन काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले. काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. लासलगाव-पाटोदा मार्गावरील चांदर पाटील मंगल कार्यालयात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित यांनी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील महिला व युवतींचीही साथ आवश्यक असून, त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून पंचायत राज या संकल्पनेचाही प्रसार जिल्हाभरात करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅùड. आकाश छाजेड म्हणाले, 'जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना एकत्र आणून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी एकदिलाने काम करण्यासाठी जिल्ह्यातील युवा कायकर्ते तयार आहेत. या युवाशक्तीला प्रोत्साहन देऊन सरकारविरोधात जोरदार लढाई लढायची वेळ आली असून, या संपर्क यात्रेच्या माध्यमातून त्यादृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे.'

लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल दिवे म्हणाले,'नवीन नेते, युवा नेतृत्व तयार करायचे असेल तर काँग्रेसने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भविष्यात ताकद देणे गरजेचे आहे.' या कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर कडाडून हल्लाबोल चढविण्यात येणार असून, या संघर्षाचे प्रतीक म्हणून एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस नितीन काकड, जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष राहुल कदम, उपाध्यक्ष कुशल लुथरा यांच्यातर्फे संपर्क यात्रा समितीस आसूड भेट देण्यात आला. जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गुणवंत होळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. येवला विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विकास चांदर पाटील यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, अश्विनी आहेर, जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील आव्हाड, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गुणवंतराव होळकर, जिल्हा युवक काँग्रेस माजी अध्यक्षा साधना जाधव, प्रदेश एनएसयुआय सरचिटणीस नितीन काकड, प्रदेश युवक काँग्रेस सचिव स्वप्नील पाटील, नाशिक जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष राहुल कदम, उपाध्यक्ष कुशल लुथरा, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष सचिन कोठावदे, जिल्हा इंटक अध्यक्ष भास्कर गुंजाळ, प्रकाश अडसरे आदी उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णा पतसंस्थेस सव्वा कोटी नफा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी २० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती चेअरमन सुभाष येवला यांनी दिली. या पतसंस्थेच्या नाशिकमध्ये रविवार पेठ, पवननगरसह त्र्यंबकेश्वर, विंचूर आणि मालेगाव अशा पाच ठिकाणी शाखा आहेत.

या पतसंस्थेची मार्च २०१८ अखेर सभासदसंख्या २१७९ इतकी असून, वसूल भागभांडवल १ कोटी ४२ लाख रुपये आहे. पतसंस्थेकडे ३१ कोटी ८५ लाखांच्या ठेवी असून, २२ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटप केलेले आहे. पतसंस्थेची गुंतवणूक १८ कोटी १५ लाख रुपये असून, ४६ कोटी खेळते भांडवल आहे. पतसंस्थेकडे ७ कोटींचा स्वनिधी आहे. या पतसंस्थेच्या प्रगतीत संस्थापक चेअरमन भास्कर कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाइस चेअरमन अविनाश कोठावदे, मानद कार्यकारी संचालक ओमप्रकाश जाजू, जनसंपर्क संचालक केशव वाणी, ज्येष्ठ संचालक सुभाष बिरारी आदींचे योगदान लाभलेले आहे.

मृत्युंजयी निधी

पतसंस्थेचे दोन वर्षांपूर्वी सभासदत्व स्वीकारलेल्या सभासदांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मृत्युंजयी निधी देण्यास वार्षिक सभेत मंजुरी देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून योजनेस प्रारंभ झाला असून, निधन पावलेल्या क्रियाशिल सभासदास २१ हजार, सर्वसाधारण सभासदास ११ हजार रुपयांचा मृत्यूंजयी निधी दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे ५६ टन कचरा संकलित

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलिबाग जिल्ह्यातील रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सुमारे ५६ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. जिल्हाभरातील शासकीय कार्यालये आणि प्रमुख रस्त्यांवर या अभियान राबविण्यात आले.

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, लासलगाव, इगतपुरी, सिन्नर, सटाणा, येवला व नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले आदी ठिकाणी रविवारी सकाळी अभियान राबविण्यात आले. २ लक्ष ७७ हजार ९१८ चौरस मीटर क्षेत्रफळ व १११ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करून ५६ टन कचऱ्याचे संकलन झाले. या अभियानात २६१४ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. संबंधित नगरपालिकांनी या कचऱ्याच्या संकलनासाठी वाहनांचीही उपलब्धता करून दिली.

नाशिकमध्ये राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, रत्नमाला राणे, रुची कुंभारकर, अर्चना थोरात, पुष्पा आव्हाड, सुवर्णा मटाले, रंजना बोराडे, सुरेश खेताडे आदींचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषणमुक्तीसाठी शेवगा पिकवा

0
0

जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. नरेश गिते यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेवग्याचे झाड आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून कुपोषण निर्मुलनासाठी सदरचे झाड वरदान आहे. शेवग्याच्या झाडाचे फुल, शेंगा, पाला यापासून आवश्यक पोषकतत्व प्राप्त होत असल्याने दैनंदिन आहारात याचा वापर कारणे गरजेचे आहे. प्रत्येक अंगणवाडी, आरोग्यकेंद्र व कुपोषित बालकांच्या घर-परिसरात शेवगा पिकविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. नरेश गिते यांनी केले. येवला पंचायत समितीची आढावा बैठक डॉ. गिते यांच्या उपस्थितीत येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

शेवग्याच्या झाडांच्या बिया आणून सर्व खातेप्रमुखांच्या हस्ते ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका आदींना त्याचे वाटप करण्यात आले. डॉ. गिते म्हणाले, की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेवगा लावून त्याचे संगोपन करावे. गरोदर माता, कुपोषित बालक यांच्यासाठी त्याचा वापर करावा. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेवगा लावून जिल्हा शेवगामय करण्याचे आवाहन डॉ. गिते यांनी केले.

यावेळी डॉ. गिते यांनी कुपोषणाबाबत सर्व यंत्रणेला मार्गदर्शन केले. कुपोषण निर्मूलन झाल्यास सुदृढ व बौद्धिक पिढी तयार होणार असून त्यांचा शारीरिक व मानसिक विकास झाल्यास निश्चितच आपल्या सर्वांनाही कामाचे समाधान मिळणार आहे. कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून जिल्हा कुपोषणमुक्त करणारच, असा निर्धारही डॉ. गिते यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीच्या सुरुवातीलाच ग्रामबाल विकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहार संहिता याबाबत डॉ. गिते यांनी आढावा घेतला. जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच ग्रामसेवकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मे महिन्यात अंगणवाडी सेविकांना सुट्या घ्यावयाच्या असतील तर त्यांना मुभा असून ज्या अंगणवाडी सेविकांना ग्राम बाल विकास केंद्राचे काम करावयाचे असेल त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम करावे असेही डॉ. गिते म्हणाले.

विविध विभाागांचा आढावा

महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहार संहितेबाबत माहिती देताना ग्रामसेवकांनी ग्रामविकास आराखड्यातील १० टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. आयुष्यमान भारत योजनेचा प्राथमिक केंद्रानुसार आढावा घेण्यात आला. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दूषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी, नादुरुस्त शौचालयांचा आढावा घेतला. सामान्य पप्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी ग्रामस्वराज्य साप्ताह, अफरातफर प्रकरण, प्रलंबित प्रकरण, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, वृक्ष लागवड, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, आपले सरकार पोर्टल याबाबत सविस्तर आढावा घेतला. तर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. सर्व घरकुलांची आधारशी जोडणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सिंचन विहिर, विहीर पूनर्भरण, पाणी पुरवठा योजना, ग्राम पंचायतीमधील जनसुविधेचे कामे, घरकुल आदी योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी डॉ. गिते यांनी सर्व संबंधितांना दिले. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गिते यांची गुपचूप एन्ट्री

तालुका आढावा बैठक सुरू असताना डॉ. गिते हे मागील दाराने गुपचूप येऊन कर्मचाऱ्यांमध्ये बसले. यावेळी आहार व आरोग्य संहितेचा आढावा घेण्यात येत होता. डॉ. गिते आल्याची कुणालाच गंधवार्ता नव्हती अर्धा ते पाऊन तास डॉ. गिते मागील खुर्चीवर बसून सर्व ऐकत होते. यावेळी नगरसूल येथील आरोग्यसेविका मोबाइलवर व्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर आरोग्यसेविकेस बैठकीतून काढून देत त्यांची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. डॉ. गिते यांच्या गुपचूप एन्ट्रीने अधिकाऱ्यांसह कर्मचारी अवाक् झाले.

कुपोषण निर्मूलनाचा नारा

डॉ. गिते यांनी कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यावेळी कुपोषण निमूर्लन झालेच पाहिजे, हे घोषवाक्य डॉ. गिते यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वदवून घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडूनही सदरचे घोषवाक्य सर्वांसमोर म्हणून घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन सोनोग्राफी केंद्रे सील

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील रुग्णालये व प्रसुतीगृहांची तपासणी सुरू केली असून, दोन बड्या रुग्णालयांतील सोनोग्राफी सेंटरमध्ये अनियमितता आढळून आल्याने ती सील करण्यात आली आहेत. या रुग्णालयांतील टुडी इको यंत्रणेत त्रुटी आढळून आल्याने वैद्यकीय विभागाने ही कारवाई केली आहे. त्यामध्ये राजेबहाद्दर आणि सुविचार या दोन हॉस्पिटल्सचा समावेश आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने सध्या शहरातील सर्व रुग्णालये आणि प्रसुतीगृहांची पीसीपीएमटी कायद्याअंतर्गत तपासणी केली जात आहे. विविध पथकांद्वारे ही तपासणी केली जात असून, रुग्णालयांमधील सोनोग्राफी केंद्रांवर विशेष नजर ठेवली जात आहे. रुग्णालयांमध्ये असलेल्या सोनोग्राफी सेंटर्सची कसून तपासणी केली जात आहे. त्याअंतर्गत शहरातील राजेबहाद्दर हॉस्पिटल आणि नाशिकरोड येथील सुविचार हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये असलेल्या टुडी इको यंत्रणेत त्रुटी आढळून आल्या. टुडी इकोसाठी गर्भलिंग निदान चाचणीप्रमाणेच नियमावली आहे. परंतु, या दोन रुग्णालयांतील टुडी इकोमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे नियमांची पूर्तता नसल्याने वैद्यकीय विभागाने या दोन्ही रुग्णालयांमध्ये असलेले सोनोग्राफी सेंटर्स सील केले आहेत. या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, खुलाशासाठी वेळ देण्यात आली आहे. नियमांची पूर्तता केल्यानंतरच ही सेंटर्स सुरू होणार आहेत.

२७१ रुग्णालयांची नोंदणी बाकी

महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालये व प्रसुतीगृहांना नोंदणी व नूतनीकरण बंधनकारक केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ५८४ रुग्णालये व प्रसुतीगृहांपैकी ३१३ रुग्णालयांनी नियमानुसार नोंदणी केली आहे. २७१ रुग्णालयांची नोंदणी बाकी आहे. २७१ पैकी जवळपास १०० रुग्णालयांचे नोंदणीचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, महापालिकेने लागू केलेल्या नियमांची शहरातील दीडशेपेक्षा जास्त रुग्णालये पूर्तता करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवेबाबत संघटनांची बैठक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विमानसेवेसंदर्भात नाशिकमधील सर्व संस्था-संघटनांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यासाठी 'निमा'ने पुढाकार घेतला असून, या बैठकीत विमानसेवा यशस्वी करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकहून मुंबईसाठी सेवा सुरू झाली, तर पुणे सेवा बंद पडली. आता दुसऱ्या टप्प्यात नवी दिल्ली शहरासाठी सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संघटनांशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात निमा हाउसमध्ये बैठक होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात सर्व संघटनांची बैठक होईल. विमानसेवा यशस्वी करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेतले जातील, अशी माहिती 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी दिली. पावसाळी पर्यटनासाठी ही सेवा उत्तम असून ती यशस्वी होईल, असा विश्वास 'तान'चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला. जेट एअरवेज या आघाडीच्या विमान कंपनीने बोइंग विमानाद्वारे थेट दिल्ली ते नाशिक ही सेवा आठवड्यातून तीन दिवस देण्याचे जाहीर केले आहे, हा एकप्रकारे नाशिककरांवर दाखविलेला विश्वास आहे. तो सार्थ ठरणे आवश्यक आहे. या सेवेला प्रतिसाद लाभण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दिल्ली बरोबरच अन्य शहरांसाठीही येत्या काळात सेवा सुरू होणार आहेत. या सर्व सेवांना प्रतिसाद कसा लाभेल, विनानसेवेची माहिती सर्वांपर्यंत कशी जाईल, नाशिकहून ओझरला विमानतळावर जाण्यासाठीची सुविधा, विमानतळ टर्मिनल येथील विविध सुविधा याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. जेट एअरवेजने नाशिक ते दिल्ली ही सेवा येत्या १५ जूनपासून देण्याची घोषणा केली आणि त्याचे बुकिंग १४ मेपासून सुरू केले आहे. एका दिवसातच कंपनीला बुकिंगसाठी मोठा प्रतिसाद लाभल्याचे सूत्रांनी सांगितले.

(सिटिझनशेजारी डीप सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा बैठक- वापरली

0
0

विमानसेवेसाठी संघटनांची बैठक

--

निमाचा पुढाकार

--

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

--

विमानसेवेसंदर्भात नाशकातील सर्व संस्था-संघटनांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. यासाठी उद्योग संघटना असलेल्या निमाने पुढाकार घेतला असून त्यात विमानसेवा यशस्वी करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकहून मुंबईसाठी सेवा सुरू झाली. तर, पुणे सेवा बंद पडली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नवी दिल्ली शहरासाठी सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संघटनांशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक निमा हाऊसमध्ये होणार आहे. निमाने या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. जेट एअरवेज या आघाडीचे विमान कंपनीने बोींग विमानाद्वारे थेट दिल्ली ते नाशिक ही सेवा आठवड्यातून तीन दिवस देण्याचे जाहिर केले आहे. हा एकप्रकारे नाशिककरांवर दाखविलेला विश्वास आहे. तो सार्थ ठरणे आवश्यक आहे. या सेवेला प्रतिसाद लाभण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दिल्ली बरोबरच अन्य शहरांसाठीही येत्या काळात सेवा सुरू होणार आहेत. या सर्व सेवांना प्रतिसाद कसा लाभेल, विनानसेवेची माहिती सर्वांपर्यंत कशी जाईल, नाशिकहून ओझरला विमानतळावर जाण्यासाठीची सुविधा, विमानतळ टर्मिनल येथील विविध सुविधा याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे.

--

दिल्लीसाठी बुकींग जोरात

जेट एअरवेज कंपनीने नाशिक ते दिल्ली ही सेवा येत्या १५ जूनपासून देण्याची घोषणा केली आणि त्याचे बुकींग १४ मे पासून सुरू केले आहे. एका दिवसातच कंपनीला बुकींगसाठी मोठा प्रतिसाद लाभल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर, ट्रॅव्हल एजंटने त्यांच्याकडील ग्राहकांसाठी या सेवेचे बुकींग सुरू केले आहे. पावसाळी पर्यटनासाठी ही सेवा उत्तम असून ही सेवा यशस्वी होईल, असा विश्वास तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला आहे.

--

खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात सर्व संघटनांची बैठक होईल. विमानसेवा यशस्वी करण्यासाठी या बैठकीत विविधनिर्णय घेतले जातील.

- मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी सापडली तब्बल सहा वर्षांनंतर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहन क्रमाकांचा संशय आल्याने पोलिसांनी थांबवलेल्या तरुणाची दुचाकीच चोरीची असल्याची बाब समोर आली आहे. ही दुचाकी तब्बल सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेली होती. पोलिसांनी संशयित तरुणास ताब्यात घेतले.मात्र, त्यास चोरीची दुचाकी विकणारा चोरटा फरार आहे.

क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकातील पोलिस नाईक नितीन भालेराव आणि शिपाई जयंत शिंदे यांना पाथर्डी फाटा परिसरात पेट्रोलिंग करताना मनीष भारत रणबावळे (२१, रा. मेट्रोझोन समोर, पाथर्डीगाव ते इंदिरानगररोड) याची दुचाकी त्यांच्या नजरेस पडली. दुचाकीची नंबर प्लेट संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास हटकले. आपण ही दुचाकी पेठ येथील मित्र मनोज घुमल याच्याकडून विकत घेतल्याचे मनीषने पोलिसांना सांगितले. दरम्यान, आरटीओकडे चौकशी केली असता दुचाकीचा मूळ मालक सापडला. ती दुचाकी २०१२ मध्ये चोरीस गेली असून, त्याबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती मालकाने दिली. पोलिसांनी मनीषसह दुचाकी ताब्यात घेतली. दुचाकीची विक्री करणाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाखांचा गुटखा भद्रकालीमध्ये जप्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भद्रकालीतील फुले मार्केट येथील नॅशनल सुपारी या दुकानात छापा मारून पोलिसांनी तीन लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा आणि सिगारेट असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.

शेख सलीम शब्बीर असे संशयित व्यावसायिकाचे नाव आहे. भद्रकाली परिसरात गुटखा आणि बंदी असलेल्या सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती क्राइम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांना मिळाली. त्यानुसार नखाते यांनी ही माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल तसेच उपायुक्त विजयकुमार मगर यांना कळवून सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. दुकानात तसेच खडकाळी सिग्नलजवळील गोडावूनमधून अवैध गुटखा आणि सिगारेटची विक्री व साठा असल्याचे आढळून आले. त्यानुसार, नखाते यांनी भद्रकाली स्टेशनचे एका पथकास आणि अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी, किशोर बावीस्कर यांना पाचारण केले. या अधिकाऱ्यांनी संपूर्ण मालाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी माल ताब्यात घेतला.

सदर कारवाई दरम्यान विमल, हिरा, रॉयल, वाह, राजनिवास, आरएमडी, सिमला, मिराज या विविध कंपन्यांचा तीन लाख १४,१९० रुपयांचा गुटखा पानमसाल, आणि १८ हजार रुपयांचे सिगारेट आढळून आले. मुद्देमाल जप्त करीत संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये कोटपा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे संदीप पवार, अनिल भालेराव, बोडखे, वाल्मिक पाटील यांच्यासह भद्रकाली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केली.

पोलिस आयुक्तांचे राज्यमंत्र्यांकडून अभिनंदन

तंबाखू मुक्त समाजासाठी 'जॉईन द चेंज- टोबॅको फ्री सोसायटी' हा उपक्रम हाती घेणाऱ्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी ट्विटरद्वारे अभिनंदन केले. समाजासाठी नेहमीच सत्कार्य करण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. सिंगल यांचे अभिनंदन, अशा शब्दात गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या भावना ट्विटद्वारे व्यक्त केल्यात. यापूर्वी पोलिस आयुक्तांनी राबवलेली 'नो हॉकिंग डे' ही योजना रणजीत पाटील यांनी राज्यभरात राबवण्याचा निर्णय घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारू’

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लामकानी गावात सतरा वर्षांपूर्वीच पाणलोट व कुरण विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी तरुणांनी श्रमदानासाठी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला तर निश्चित दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आपण साकारू, असे मत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले.

पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेय जयते वॉटर कॅप स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यात राज्यातील ७५ तालुक्यांनी सहभागी घेतला असून, त्यात धुळे व शिंदखेडा तालुक्याचा समावेश आहे. त्यापैकी लामकानी गावात या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. या कामाच्या पाहणीसाठी आमिर खान, त्यांची पत्नी किरण राव यांनी लामकानी गावाला भेट दिली. गावाने विकसित केलेल्या गोवर्धन पर्वतावरील कुरण विकास, विविध उपक्रमाची त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्ह्यातर्फे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसिलदार अमोल मोरे, डॉ. धनंजय नेवाडकर, सरपंच धनंजय कुवर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आती क्या लामकानी…’
गावकऱ्यांच्या विविध प्रश्नांना आमिर खान यांनी उत्तरे दिली. त्यामध्ये गावाबद्दल सांगताना, लामकानीत यानंतरही येत राहणार. शुटिंगसाठी नाहीतर माझ्या आनंदासाठी मी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. …पाण्यात राजकारण आले नाही पाहिजे. पाण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तरच आपण गावाला पाणीदार करण्यात यशस्वी होऊ, असेही खान म्हणाले. याप्रसंगी अमीर खान यांनी ‘आती क्या खंडाळा’ या गीताच्या तालावर ‘आती क्या लामकानी’ हे गीत म्हटले. त्याला त्यांच्या पत्नी किरण राव यांनीही त्यांना प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images