नांदूर नाका कोंडीवर शोधावा तोडगा लग्नसराईमुळे नांदूर नाका चौकात शनिवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सिग्नल असूनही असा प्रकार झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विवाह मुहूर्त असलेल्या दिवशी या भागात वारंवार अशी वाहतूक कोंडी होताना दिसते. या समस्येवर प्रशासनाने योग्य तोडगा काढावा. -आकाश घाडगे मुंबई नाका बसचालकांमुळे अडथळा मुंबई नाका येथील संदीप हॉटेलसमोरील खासगी बसस्थानकात ट्रान्स्पोर्टद्वारे येणारा माल अनेक वाहनचालक रस्त्यावरच टाकतात. त्याचा मालक किंवा ट्रान्स्पोर्टर येत नाही तोपर्यंत अशी पार्सल तेथेच पडून असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याप्रश्नी वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी. -अनिल लवटे शहर परिसर नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच? कोणत्याही वाहनाच्या नंबर प्लेटवर नंबरशिवाय इतर कोणताही उल्लेख असू नये असा नियम असताना तो मोडीत काढला जातो, तोही कायद्याच्या रक्षकांकडूनच! असे का? वाहतुकीचे नियम काय फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच तयार केलेले असतात का? अशा प्रकारांमुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जातो. -राजू धिंगण अमृतधाम चौफुलीवर वाहतूक कोंडी अमृतधाम चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिरावाडी आणि अमृतधाम परिसरातून येणारी वाहने महामार्गावर याच चौफुलीवरून जाताना प्रामुख्याने कोंडी होते. येथे काम करणे वाहतूक पोलिसांनाही जिकिरीचे ठरते. उड्डाणपुलाच्या कामामुळेही वाहनांची गर्दी वाढत असल्याने कोंडीत भर पडत आहे. -एम. रामनाथ शहर परिसर ...तरच थांबेल 'खडखडाट' स्टेट बँकेच्या एटीएममध्ये सुटीच्या दिवशी अनेकदा खडखडाट असतो. छोट्याशा बाबीसंदर्भातही दंड वसूल करण्यात कसूर न करणाऱ्या बँकेने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एटीएममध्ये पैसे टाकणाऱ्या कंपनीला ही बाब लक्षात आणून देऊन त्यांच्याकडूनच दंड आकारला पाहिजे, तरच खडखडाटाला आळा बसेल. -मनोहर पवार मेरी परिसर स्वच्छतेचा घ्यावा आदर्श मेरीरोड, पेठरोड, रिंगरोडवर साफसफाई करताना आध्यात्मिक संस्थेचे साधक, युवक वर्ग दिसून आला. कुठेलीही चमकोगिरी न करता शहर, देशाच्या विकासाला ते हातभार लावत आहेत, हा आदर्श आपणही घ्यावा. स्वच्छता, पाणी वाचविणे, झाडे लावणे हा मंत्र युवापिढीत रुजविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरणारे आहेत. -राजेंद्र राजधर (सिटिझन रिपोर्टर)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट