Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिटिझन रिपोर्टर

$
0
0

नांदूर नाका

कोंडीवर शोधावा तोडगा

लग्नसराईमुळे नांदूर नाका चौकात शनिवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सिग्नल असूनही असा प्रकार झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विवाह मुहूर्त असलेल्या दिवशी या भागात वारंवार अशी वाहतूक कोंडी होताना दिसते. या समस्येवर प्रशासनाने योग्य तोडगा काढावा.

-आकाश घाडगे

मुंबई नाका

बसचालकांमुळे अडथळा

मुंबई नाका येथील संदीप हॉटेलसमोरील खासगी बसस्थानकात ट्रान्स्पोर्टद्वारे येणारा माल अनेक वाहनचालक रस्त्यावरच टाकतात. त्याचा मालक किंवा ट्रान्स्पोर्टर येत नाही तोपर्यंत अशी पार्सल तेथेच पडून असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याप्रश्नी वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी.

-अनिल लवटे

शहर परिसर

नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच?

कोणत्याही वाहनाच्या नंबर प्लेटवर नंबरशिवाय इतर कोणताही उल्लेख असू नये असा नियम असताना तो मोडीत काढला जातो, तोही कायद्याच्या रक्षकांकडूनच! असे का? वाहतुकीचे नियम काय फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच तयार केलेले असतात का? अशा प्रकारांमुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जातो.

-राजू धिंगण

अमृतधाम

चौफुलीवर वाहतूक कोंडी

अमृतधाम चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिरावाडी आणि अमृतधाम परिसरातून येणारी वाहने महामार्गावर याच चौफुलीवरून जाताना प्रामुख्याने कोंडी होते. येथे काम करणे वाहतूक पोलिसांनाही जिकिरीचे ठरते. उड्डाणपुलाच्या कामामुळेही वाहनांची गर्दी वाढत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

-एम. रामनाथ

शहर परिसर

...तरच थांबेल 'खडखडाट'

स्टेट बँकेच्या एटीएममध्ये सुटीच्या दिवशी अनेकदा खडखडाट असतो. छोट्याशा बाबीसंदर्भातही दंड वसूल करण्यात कसूर न करणाऱ्या बँकेने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एटीएममध्ये पैसे टाकणाऱ्या कंपनीला ही बाब लक्षात आणून देऊन त्यांच्याकडूनच दंड आकारला पाहिजे, तरच खडखडाटाला आळा बसेल.

-मनोहर पवार

मेरी परिसर

स्वच्छतेचा घ्यावा आदर्श

मेरीरोड, पेठरोड, रिंगरोडवर साफसफाई करताना आध्यात्मिक संस्थेचे साधक, युवक वर्ग दिसून आला. कुठेलीही चमकोगिरी न करता शहर, देशाच्या विकासाला ते हातभार लावत आहेत, हा आदर्श आपणही घ्यावा. स्वच्छता, पाणी वाचविणे, झाडे लावणे हा मंत्र युवापिढीत रुजविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरणारे आहेत.

-राजेंद्र राजधर

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावरकर जयंती समितीची बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

दरवर्षी प्रमाणे यंदाही भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी समितीच्या वतीने भगूर येथील प्रभू श्रीराम मंदिरात कार्याध्यक्ष वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. समितीच्या वतीने २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई येथील आहारतज्ज्ञ डॉ. किरण वाटारे यांचे आहार विषयावर व्याख्यान, तर सायंकाळी ७ वाजता चैताली म्युझिकल हार्मोनी, मुंबईचे गायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला ५० कलाकारांचा 'जल्लोष २०१८' हा कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. याप्रसंगी तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता नागेश मोरवेकर, अभिनेत्री धनश्री दळवी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष वसंत पाटील यांनी दिली. याप्रसंगी प्रास्ताविक अशोक मोजाड तर आभार प्रताप पवार यांनी मानले. बैठकीस रमेश पवार, राजेंद्र कापसे, शामराव शिंदे, शेखर बागडे, मुकुंद देशमुख, राजन गायकवाड, ज्ञानेश्वर गणोरे, अनिल पवार, उत्तमराव जाधव, राजेंद्र बागडे, अॅड. जगदीश बलकवडे, दीपक बलकवडे, प्रशांत कापसे आदींसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता गावातच होणार रक्ताच्या तपासण्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

केंद्र सरकारच्या सीएससी उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात प्रत्येक गावात रक्त तपासणी केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी नाशिक येथील आस्था पॅरामेडिकल संस्था दिंडोरी रोड येथे १० दिवसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

सीएससीद्वारे प्रत्येक गावात विविध प्रकारच्या तपासणीसाठी लागणारे रक्ताचे नमुने कसे घ्यायचे याविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील ५० गावातील प्रशिक्षणार्थींना ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये तीन दिवसीय कार्यशाळा आणि नंतर एक आठवड्याचे प्रात्यक्षिक ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हा उपक्रम केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या टेस्ट करण्यासाठी खासगी लॅबमधून जास्त प्रमाणात दर आकारले जातात. त्यावर आळा घालण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे. सीएससीमार्फत या सर्व तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध होणार असून, या सेवेद्वारे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

या प्रशिक्षणास ग्रामीण भागातील ५० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली असून, त्यांना हिंद लॅबतर्फे पॅथॉलॉजिस्ट डॉ. विजय गवळी, डॉ. अतुल पानट हे प्रशिक्षण देत आहेत.

सीएससीच्या होमियोपॅथी, टेलिपॅथी, जनऔषधीसारख्या सेवा ग्रामीण भागात प्रचलित होताना दिसत आहेत. त्यात अजून एक नवीन सेवा आल्यामुळे सीएससी केंद्रचालकांचा उत्साह वाढण्यास मदत होत आहे, अशी माहिती सीएससी जिल्हाव्यवस्थापक महेश देशमुख आणि महेश कोलते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींच्या घटत्या जन्मदरप्रश्नी मानसिकता बदलण्याची गरज

$
0
0

नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर घटला हे नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. हजार मुलांमागे १२०० पर्यंत गेलेला मुलींचा जन्मदर यंदा ९२१ वर आला आहे, ही खूपच धक्कादायक आणि चिंता वाढविणारी बाब आहे. एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या थांबाव्यात म्हणून सरकार चांगली पावले उचलत असतानाही छुप्या पद्धतीने गर्भलिंगनिदान चाचण्या, तसेच गर्भपात होत आहेत. हे चित्र सुधारण्यासाठी आणि लोकांची मानसिकता बदलण्याकरिता जनजागृती करण्यासह प्रबोधनपर उपक्रम राबविण्याबरोबरच कायदा आणखी कठोर करावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मुलीदेखील मुलांच्या बरोबरीने प्रगती साधत असताना असे प्रकार करणाऱ्या नागरिकांनी आपली पारंपरिक भूमिका बदलण्याची आवश्यकता असल्याची भावनादेखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आकडेवारी चिंता वाढविणारी

नाशिकमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत मुलींच्या जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. त्याची आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी आहे. याचा अर्थ स्त्रीभ्रूणहत्या सुरूच आहे. छुप्या पद्धतीने सुरू असलेले असे प्रकार रोखले गेले पाहिजेत. मुलींच्या जन्माचे स्वागत गावागावांत नव्या उमेदीने व्हायला हवे. स्थानिक प्रशासनाने गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवत कारवाई केली पाहिजे.

-अॅड. शरद वाघ

सर्वच स्तरांवर व्हावे प्रबोधन

मुलींनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. अनेक क्षेत्रांत मुलींनी नेत्रदीपक यश मिळवून कुटुंब आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मात्र, तरीही मुलींच्या जन्माचे स्वागत का केले जात नाही? समाजाची मुलगाच हवा ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मानसिकता बदलल्याशिवाय मुलगी-मुलगा हा भेद दूर होणार नाही. त्यासाठी सर्वच स्तरांवर प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

-सोनाली जाधव

नकारात्मक मानसिकता कारणीभूत

कितीही उपाययोजना केल्या, तरी मुलींचा जन्मदर घटत असल्याचे चित्र दिसत आहे. हे वास्तव भयावह आहे. याला नकारात्मक मानसिकता हे एकच कारण आहे असे वाटते. सरकार, प्रशासन प्रयत्न करते. पण, मुलगाच हवा अशी अनेकांची मानसिकता प्रबोधनानंतरही बदलत नाही, हे दुर्दैव आहे. एकविसाव्या शतकात जगणाऱ्या अनेक मुला-मुलींचीही मुलगा व्हावा हीच अपेक्षा दिसते. त्यामुळे राजरोसपणे गर्भलिंगनिदान होत असल्याने हा मुलींचा जन्मदर घटत आहे. ग्रामीण भागात हवे तेवढे प्रबोधन होताना दिसत नाही.

-प्रिया कदम

कायदा करावा आणखी कठोर

१९८०-८५ च्या काळात पुरेशा सुविधा नव्हत्या. परिणामी मुलगा होईल की मुलगी याची काळजी नव्हती. मुलांबरोबरच मुलींचाही आनंदाने स्वीकार केला जात होता. मात्र, तंत्रज्ञानाने आणलेल्या यंत्रणेचा कसा दुरुपयोग होतो याचा अनुभव अशा प्रकारांमुळे येत आहे. अलीकडच्या काळात बदलत्या राहणीमानामुळे एक मुलगा, एक मुलगी अशी छोट्या कुटुंबाची संकल्पना पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर मुलाच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर गर्भलिंगनिदान चाचण्या आणि गर्भपात होताना दिसून येत आहेत. कायदा आणखी कठोर करून हे प्रकार रोखण्याची गरज आहे.

-जिजाबाई खेलुकर

...तर टळू शकेल स्त्रीभ्रूणहत्या

वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सध्या विविध पातळ्यांवरून केले जाणारे प्रबोधन अत्यंत तोकडे पडत असल्याचे दिसेत. कारण, असे प्रकार तांबण्याऐवजी वाढतच असल्याची बाबी यंदाच्या आकडेवारीमुळे अधोरेखित झाली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने गावागावांत मुलींच्या जन्मावर विशेष सवलत किंवा नोकरीत प्रथम आरक्षण असे काहीतरी निकष लागी करायला हवेत म्हणजे छुप्या पद्धतीने होणारी स्त्रीभ्रूणहत्या टळू शकेल.

-प्रतीक रायते

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामजपात मोठी शक्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याची इच्छा असल्यास प्रत्येकाने मनापासून 'रामकृष्ण हरी' हा जप करावा. नामजपात मोठी शक्ती असून, या मंत्रामुळे सकारात्मक भाव निर्माण होत असल्याचे प्रतिपादन बाबा महाराज सातारकर यांनी रविवारी केले.

सिडको येथे राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यात तल्लीन होणे आवश्यक असते. त्यामुळे निश्चितच यश मिळते. कोणत्याही कार्यात मनुष्याचे रमणे थांबले, की जीवन नीरस वाटू लागते. सेवा करण्यासाठी नामाचे महत्त्व सर्वाधिक आहे. नामजपात मोठी शक्ती असून, 'रामकृष्ण हरी' या जपात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अभंगही सादर केला. रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांनी राम आणि सीतेच्या वनसातील प्रवासाची माहिती चित्ररुपाने उपस्थितांसमोर मांडली.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आमदार डॉ. अपूर्व हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल महाराज साळुंके, समाधान चुंभळे आदी संयोजन करीत आहेत. अजून दोन दिवस सुरू राहणाऱ्या या कीर्तन महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी महाप्रसाद वाटप होणार आहे.

(स्वतंत्र चौकट)

'देव भक्तीचा भुकेला'

देव हा भक्तीचा भुकेला असून, मनापासून भक्ती केली, तर देवाकडून काहीही सहजगत्या मिळू शकत असते, असे प्रतिपादन हभप बाबासाहेब महाराज इंगळे यांनी शनिवारी राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात केले. रामायण, महाभारतातील विविध कथांची माहितीही त्यांनी रामायणाचार्य रामराव ढोक यांनी राम वनवासाला निघाल्यानंतर अयोध्येत काय परिस्थिती झाली, याचे चित्र उभे करून श्रीराम वनवसाची कथा सांगितली.

(लोगो : सोशल कनेक्ट)

२ फोटो आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा

$
0
0

दौऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवार शहरात दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांचा मुक्काम हॉटेल एमराल्ड पार्क येथे असेल. प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी अॅड. शिवाजी सहाणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. निवडक नेत्यांबरोबर त्यांनी रात्री सुद्धा चर्चा केली.

खुटवडनगर येथील श्रीसिद्धी बॅक्वेट हॉल येथे सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व मतदारांसोबत बैठक होणार आहे. त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणला. पण, यंदा मतदारांचे संख्याबळ कमी असल्याने राष्ट्रवादीसमोर आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दुपारी एक वाजता पवार हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

कार्यकर्त्यांसोबत सेल्फी

शहरात येताच अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले. दरम्यान, सोमवारी (दि. १४) सकाळी साडेनऊ वाजता जुने नाशिक येथे संभाजी महाराज पुतळा अभिवादन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता बैठक, त्यानंतर दुपारी १ वाजता पत्रकारांशी संवाद साधतील. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायंकाळी सहाला जेलरोड येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी होणार आहे. जेलरोडच्या ज्ञानेश्‍वरनगर मैदानावर अजित पवारांच्या हस्ते शंभू राजे गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानंतर सत्यपाल महाराजांचे खंजिरीवादन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक मतदारासंघ; मतदान आठ जूनला

$
0
0

१२ जूनला मतमोजणी

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही द्विवार्षिक निवडणूक आठ जूनला तर मतमोजणी १२ जूनला होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

राजाराम माने हे निवडणूक निर्णय अधिकारी असून विभागातील पाचही जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील. निवडणुकीसाठी प्रत्येक तहसीलस्तरावर मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. मतदार संघात ९४ मतदान केंद्रे असतील. आयुक्त माने म्हणाले, की विभागातील नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तालय, नाशिक विभाग व जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आचारसंहिता काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने वापरण्यास निर्बंध आहेत. केंद्र व राज्याचे मंत्री, खासदार, आमदार व इतर पदाधिकारी यांना शिक्षक मतदारांवर प्रभाव पडेल अशी घोषणा करता येणार नाही की, शिक्षण व तत्सम संस्थांचे उद्धाटन करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेवर फलक लावणे, निवडणूक चिन्ह लावणे आदी कारणाने मालमत्ता विद्रुपीकरण करण्यास बंदी आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही माने यांनी दिला आहे.

निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नेमला जाणार आहे. मतदानासाठी जम्बो मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली असून मतपत्रिकांचा वापर केला जाईल. मतदारांनी पसंतीक्रमानुसार मतदान करावे. गेल्या १९ जानेवारी अखेर निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या ५२ हजार २०१ असून त्यामध्ये पुरूष ३९ हजार ६२४ तर स्त्री मतदार १२ हजार ५७७ आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जारी : १५ मे

उमेदवारी अर्जाचा अंतिम दिनांक : २२ मे

उमेदवारी अर्ज छाननी : २३ मे

उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम मुदत : २५ मे

मतदान : आठ जून (सकाळी ८ ते सायंकाळी ४)

मतमोजणी : १२ जून

निवडणूक प्रक्रिया समाप्ती : १५ जून

एकूण मतदार : ५२,२०१

पुरूष : ३९,६२४

स्त्री : १२,५७७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासभाडे स्पर्धेत शिवशाही मागेच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खासगी बस वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून नागपूर व कोल्हापूर या दोन शहरांसाठी शिवशाही स्लीपर कोच सुरू केली असली, तरी त्याचे भाडे मात्र खासगी बसपेक्षाही २०० ते ३०० रुपये जास्त आहे. खासगी बसचे दर शिवशाहीपेक्षा कमी असल्यामुळे या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, यावरच एसटीच्या या स्लीपर कोचचे भविष्य ठरणार आहे.

एसटीने आठ महिन्यांभरापूर्वी राज्यभर शिवशाही बस सुरू केल्या असून, त्यात ६० बसेस या नाशिकला आल्या आहेत. या सर्व वातानुकूलित असलेल्या बस 'चेअर कार'सारख्या आहेत. पण, एसटीने लांब पल्ल्याच्या मार्गासाठी दहा दिवसांपूर्वी नाशिक-नागपूर ही शिवशाही स्लीपर कोच सुरू केली. या बसचे भाडे १६०३ रुपये व १० रुपये आरक्षण चार्ज असे १६१३ रुपये ठेवले. पण, खासगी बसचे भाडे या मार्गावर १२०० ते १४०० च्या आसपास आहे. त्यामुळे दोन्ही बसच्या भाड्यातील अंतर हे २०० ते ३०० रुपयाच्या आसपास आहे. नागपूर सेवा सुरू केल्यानंतर रविवारपासून कोल्हापूर येथेही ही स्लीपर कोच बस सुरू केली. त्यासाठी भाडे १०१३ व आरक्षणासाठी १० रुपये अतिरिक्त ठेवले. त्यामुळे एकूण भाडे १०२३ रुपये झाले. या मार्गावर खासगी बसच्या स्लीपर कोचचे भाडे सरासरी ७०० ते ९०० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील खासगी बसही २०० ते ३०० रुपयांहून अधिक स्वस्त असल्यामुळे त्याचा फटका शिवशाहीला बसण्याची शक्यता आहे.

भाडे कमी केल्यास फायदा

एसटीने खासगी बसला स्पर्धा करण्यासाठी या बस सुरू केल्या असल्या तरी भाड्याशी स्पर्धा न केल्यामुळे प्रवाशांचा कल खासगी बसकडे वळला तर त्याचा परिणाम या नव्या मार्गावर होणार आहे. एसटी बसमध्ये सुरक्षितता, वेळ व इतर गोष्टींच्या सुविधा असल्या तरी भाडे हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे एसटीने भाडे खासगी बसच्या बरोबरीने केल्यास या बसेसला अधिक फायदा होणार आहे. खासगी बसचे सरासरी स्लीपर कोचचे भाडे हे कमी असले तरी काही खासगी बसचे भाडे मात्र एसटीपेक्षा जास्त आहे. त्यात व्हॉल्व्हो व इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बसच्या तुलनेत एसटीचे दर कमी असले तरी बसमध्ये फरक आहे.

एसटीचे स्लिपर कोचचे आरक्षणासह भाडे

नाशिक - नागपूर - १६१३ रु.

नाशिक - कोल्हापूर - १०२३ रु.

-

नाशिक - नागपूर खासगी बस भाडे

राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स -१२२२

सैनी ट्रॅव्हल्स - ११६५

खुराणा ट्रॅव्हल्स - १२२५

प्रसन्ना पर्पल ग्रॅण्ड - १४७२

-

नाशिक - कोल्हापूर खासगी बस भाडे

पारिख ट्रॅव्हल्स -७०० रु.

लवबाइक ट्रॅव्हल्स - ७५० रु.

चौधरी व वैभव - ७६४ रु.

कोंडुस्कर (व्हॉल्वो) - ९२१ रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा प्रवास की शिक्षा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या शहरातील काही रिक्षाचालकांची मुजोरी वाढू लागली आहे. याचा अनुभव घेणाऱ्या एका महिलेने थेट फेसबुकसारख्या सोशल मीडियावरच याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली असून, वाहतूक पोलिसांच्या शेळपट कारभाराचेही वाभाडे काढले आहेत. मुजोर रिक्षाचालकांसह कामचुकार वाहतूक पोलिसांवर अधिकारी कारवाई करणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

रिक्षाचालकांची मुजोरी ही नाशिककरांसाठी नवीन नाही. नियम पाळण्यासाठी नसतातच जणू, अशा अविर्भावात रिक्षाचालक शहरात प्रवासी वाहतूक करताना दिसतात. याबाबत कोणी टोकण्याचा प्रयत्न केला तर त्याला अरेरावीची भाषा वापरली जाते. एका महिलेला दोन दिवसांपूर्वी असाच अनुभव आला. 'प्रवासी देवो भव' असे ब्रीद लिहिलेल्या 'एमएच- १५, इएच-१४६२' या क्रमांकाच्या रिक्षामध्ये कॉलेजरोड परिसरातून ही महिला बसली. चालकाने रिक्षामधील गाण्यांचा आवाज वाढविला. जोरजोरात हॉर्न वाजवित तो रिक्षा चालवत होता. महिलेने त्याला गाण्यांचा आवाज कमी करण्यास तसेच वारंवार हॉर्न न वाजविण्यास सांगितले. परंतु, महिलेशी उद्धटपणे बोलत तो जाणीवपूवर्क हॉर्न वाजवू लागला. त्यामुळे महिलेने रिक्षा थांबविण्यास सांगितले. ती रिक्षातून उतरून जाऊ लागली. त्यानंतरही तो तिला कट मारून पुढे थांब्यावर जाऊन थांबला. संतप्त महिलेने त्याच्या रिक्षाचा फोटो काढला. त्यावेळी तो खाली उतरला. 'रिक्षाचाच का? माझाही फोटो काढ' असे म्हणून अधिकच उर्मटपणे बोलू लागला. त्यामुळे ती महिला चालत पुढे गेली. सीबीएसजवळ राजपूत नावाचा वाहतूक पोलिस तिला करवंदे खरेदी करताना दिसला. तिने त्याला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. संबंधित रिक्षाचालकावर कारवाई करा, अथवा त्याला समज तरी द्या, अशी विनंती त्यांना केली. परंतु, मी काही करू शकत नाही. तुम्ही सरकारवाडा पोलिस स्टेशनला तक्रार द्या, असा सल्ला देत तो तेथून निघून गेला. पोलिसच नागरिकांना मदत करणार नसतील, तर रिक्षा चालकांचे फावणारच. अशी भावना या घटनेमुळे बळावली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील मुजोर रिक्षाचालक आणि कामचुकार पोलिसावर काय कारवाई, करतात याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप उद्दिष्टात वाढ

$
0
0

खरीप हंगाम आराखड्यातील आकडेवारीला कॉपीपेस्टची किड

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

नाशिक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने खरीप हंगामाचा आराखडा शासनाला सादर केला असून, सन २०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी पेरणीयोग्य क्षेत्रात गतवर्षापेक्षा ५७० हेक्टर क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी पेरणीचे लक्ष्य २२ हजार ९२ हेक्टर इतके होते. यंदाच्या खरीप हंगामासाठी २२ हजार ६६० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. या आढावा बैठकीत राज्यातील सर्वच विभागांनी खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. विभागातील तब्बल २५ तालुक्यांतील भूजलपातळीत घट आलेली असताना कृषी विभागाने मात्र सर्वसाधारण पेरणीयोग्य क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी करण्याचा घाट घातला आहे. या सर्व आकडेवारीला निव्वळ जुळवाजुळवीचा वास येत आहे. बहुतांश आकडेवारी कॉपी पेस्ट केलेली आहे.

नाशिक विभागातील नाशिकसह, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांत सर्वसाधारण पेरणीयोग्य क्षेत्र २२ हजार ५५९ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात भात, बाजरी, कापूस, ऊस, तूर, उडीद, मूग, खुरासणी, तीळ, मका, खरीप ज्वारी, नागली, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सन २०१७-१८ च्या खरीप हंगामाच्या पेरणीक्षेत्रापेक्षा यंदाच्या खरीप हंगामाच्या पेरणी क्षेत्रात वाढ करण्यात आल्याने यंदा विभागात काही पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी २२ हजार ९२ हेक्टर क्षेत्रापैकी प्रत्यक्षात २१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे लक्ष्य साध्य झाले होते. विभागातील जळगाव जिल्ह्यातील भूजलपातळी सर्वांत जास्त घटलेली असतानाही या जिल्ह्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याचे मनसुबे कृषी विभागाने रचले आहेत. विशेष म्हणजे या आढावा बैठकीत विभागाच्या खरीप हंगाम आराखड्यावर कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओरखडा न ओढता त्यास मंजुरी दिली आहे.

या पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार

कापूस पिकाखालील क्षेत्रात नाशिकसह, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत मोठी वाढ होणार आहे. उसाच्या पिकाचे क्षेत्रही नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाढणार आहे. भात पिकाचे क्षेत्र नंदुरबार व नाशिकध्ये स्थिर तर धुळ्यात घटविण्यात आले आहे. बाजरीचे क्षेत्र नाशिकमध्ये स्थिर, तर जळगावमध्ये वाढविण्यात आले आहे. मकाचे क्षेत्र जळगावमध्ये वाढणार आहे. नंदुरबार व धुळ्यात तुरीची लागवड कमी तर जळगावमध्ये काही प्रमाणात वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारीत कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिली.

सुटींचा कालावधी सुरू असल्याने ही निवडणूक पुढील कालावधीत घेण्याची विनंती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयेागाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला असून, सुधारीत कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल, असे आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्यांची मुदत ७ जुलैला पूर्ण होत असल्याने त्यापूर्वी ८ जून रोजी निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र सुट्यांमुळे निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने शेवटी ही निवडणूक पुढे ढकलली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नमामि गोदातर्फे त्र्यंबकमध्ये श्रमदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या पाणलोट क्षेत्रातील श्रमदान मोहिमेत अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. चिन्मय उदगीरकर आणि राजेश पंडित यांनी स्वत: टिकाव फावडे घेऊन वृक्ष लागवडीसाठी जमीन तयार केली. दोन दिवस आगोदर वृक्षप्रेमी न्या. अंबादास जोशी यांनी नुकतीच येथे भेट दिली. त्यांनी चारा बियाणे टाकण्याचा सल्ला दिला आहे. नगर पालिका प्रशासनाने पाणी फाउंडेशनपासून प्रेरणा घेम श्रमदान सुरू केले आहे. नगरपालिका कक्ष अधिकारी अरुण गरुड, संजय मिसर, अभियंता कांगणे, मधुकर माळी, सागर गायकवाड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्व शिक्षा’साठी पुस्तकांचे वितरण सुरू

$
0
0

३१ मेपर्यंत ९५ लाख प्रती वितरणाचे बालभारतीपुढे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारात नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी पुस्तक वितरणास प्रारंभ झाला. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेंतर्गतच्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ३८ कोटी ५० लाख १२ हजार ५७३ रुपयांच्या एकूण ९५ लाख ४२ हजार ८५ पुस्तक प्रती ३१ मेपर्यंत वितरित करण्यात येणार आहेत.

२०१८-१९ हे नवे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके मिळावी यासाठी बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून सोमवारपासून वितरण सुरू झाले.

शाळेच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. नवीन अभ्यास, नवीन पुस्तके नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रोत्साहन देणारी ठरतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. ही पुस्तके विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मिळण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ आणि सरकारी वाहतूक ठेकेदार यांच्याकडून नियोजन आखण्यात आले असल्याचे बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तालुकास्तरापर्यंतचा पुस्तक पुरवठा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे विभागीय भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांनी यावेळी सांगितले. वितरणाप्रसंगी वाहतूक ठेकेदार नितीन गायकर, जिल्हा परिषद नाशिकचे सुनील दराडे, किशोर थोरात, आत्माराम पाटील, आदिनाथ घुले, प्रकाश माळी उपस्थित होते.

नव्या अभ्यासक्रमतील पुस्तकांची प्रतीक्षा

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. सर्व शिक्षा अभियानात पहिली व आठवीचाही समावेश असला तरी या वितरणात अद्याप या इयत्तांच्या पुस्तकांचा समावेश नाही. तर दहावीची पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बालभारतीकडून सद्यस्थितीत दुसरी ते सातवीची पुस्तके वितरित केली जात आहेत.

सरकारी, महापालिका व अनुदानित शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांना सरकारच्या सर्व शिक्षण योजनेअंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे कुणीही पाठ्यपुस्तके खरेदी करू नयेत.

- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक

-

जिल्हा परिषद क्षेत्रातील मागणी

जिल्हा......प्रतींनुसार मागणी

- नाशिक : २८ लाख ६५ हजार ४२२

- धुळे : १२ लाख १८ हजार ६९५

- जळगाव : २५ लाख ३९ हजार ४७३

- नंदुरबार : १२ लाख १९ हजार ६६१

- एकूण प्रती : ७८ लाख ४३ हजार २५१

-

मनपा क्षेत्रातील मागणी

- नाशिक : ६ लाख ३७ हजार ८

- धुळे : ३ लाख १ हजार ३१५

- जळगाव : २ लाख ५१ हजार ७०१

- मालेगाव : ५ लाख ८ हजार ८१०

- एकूण प्रती : १६ लाख ९८ हजार ८३४

-

- जिप व मनपा क्षेत्रातील एकूण प्रतींची संख्या : ९५ लाख ४२ हजार ८५

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांना बालनाट्यांची मेजवानी

$
0
0

किड्स कार्निवलमध्ये धम्माल मजा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या सुट्टीत घराबाहेर पडून आजारी पडण्यापेक्षा घरीच बसून नाटक बसवू, असे ठरवत नाटकाच्या निमित्ताने घातलेला धिंगाणा सोमवारी चिमुकल्यांनी 'धांगडधिंगा' या नाटकातून प्रत्यक्ष अनुभवला. निमित्त होते बच्चेकंपनीसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित बालनाट्यांचे.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे ११ मेपासून किड्स कार्निवल सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी 'निंबोणीच्या झाडामागे', 'काबुलीवाला' आणि 'धांगडधिंगा' या तीन संस्कारक्षम नाटकांची मेजवानी बच्चे कंपनीला यानिमित्ताने मिळाली. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि दामोदर प्रॉडक्शन यांच्यातर्फे या नाटकांचे आयोजन करण्यात आले. प. सा. नाट्यगृह येथे ही तिनही नाटके पार पडली.

'निंबोणीच्या झाडामागे' या नाटकात जाहिरात आणि जाहिरातीतील मम्मी मुलांना आवडते, या आशयावर प्रकाश टाकण्यात आला. जेव्हा एक मुलगा जाहिरातीचे शुटींग करतो, त्यातील मम्मी कशी आहे, ती पैशांसाठी आपल्या मुलांचे लाड करते, त्यांना जवळ घेते आणि इतरवेळी ती त्यांना जवळ येऊ देत नाही, असा अनुभव त्याला येतो. त्या अनुभवानंतर त्याला आपलीच आई कशी प्रेमळ असते याची जाणीव होते व चूक समजते, असा विषय मांडण्यात आला आहे. 'काबुलीवाला' या रवींद्रनाथ टागोरलिखित नाटकात एख लहान मुलगी आणि कंधार येऊन आलेला सुकामेवा विकणारा 'काबुलीवाला' यांच्यातील एक अतिशय प्रेमळ नात्याचा उलगडा करण्यात आला. तो तिच्या लग्नाला स्वत:च्या मुलीचे लग्न सोडून येतो. मात्र, ती त्याला ओळखतही नाही. हा धक्का तो सहन करू शकत नाही व स्वत:चे प्राण सोडतो. अतिशय संवेदनशील विषय मांडलेले हे नाटक उपस्थितांना विशेष आवडले. तर तिनही नाटकांचे सादरीकरण, अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

नाटकात अमिषा डावरे, ओंकार क्षेमकल्याणी, राज सहाणे, नितीश फुलंब्रिकर, गार्गी ब्राह्मणकर, विराज दांडेकर, साक्षी जाधव, पूर्वा पानगव्हाणे, अग्रणी गिते, रजत जोशी, अर्णव खरे, प्रज्ञुम्न हिरे, सर्वज्ञ मते, कृतिका कडवे, श्रावणी कदम, शर्वरी कदम, शर्वरी महाजन, नाझिया यांनी भूमिका केल्या. तर नाटकाचे दिग्दर्शन डॉ. प्रशांत वाघ यांनी केले.

फोटो : पंकज चांडोले

कल्चर क्लब, किड्स कार्निव्हल लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यू आर कोड वापरावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदांत, हरिष ठरले टॉपर

$
0
0

आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीचे निकाल जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयसीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालात नाशिकमधील शाळांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार विस्डम हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी वेदांत देव याने ९८.४० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला. तर अशोका युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी हरिष उथयाकुमार याने ९५.५ टक्के गुण मिळवून बारावीत प्रथम क्रमांक पटकाविला. शहरातील आयसीएसई बोर्डाच्या सर्वच शाळांचा उत्तुंग यश संपादन केले. सोमवारी दुपारी ३ वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाकडे पालक अन् विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आयसीएसई बोर्डाचा शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

विस्डम हायस्कूल

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयसीएसई दहावीच्या निकालात वेदांत देव याने ९८.४० टक्के गुण मिळवित शाळेतून पहिला क्रमांक पटकाविला. रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार वेदांतचे गुण शहरातील इतर शाळांमधूनही सर्वात जास्त होते. शाळेत द्वितीय क्रमांकावर विभागून श्रुती पाठक (९७.८० टक्के) आणि सम्यक जैन (९७.८० टक्के) यांनी यश मिळविले. एकूण १५८ पैकी ८५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळविले, ३२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्क्यांदरम्यान, ३५ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८५ टक्क्यांदरम्यान गुण मिळविले. सहा जणांना ७० टक्के गुण मिळाले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला.

विस्डम ज्युनिअर

विस्डम हाय इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या कॉमर्स शाखेतून काव्या गोखले हिने ९५.५० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला. बारावीसाठी एकूण २६ विद्यार्थी होते. पैकी सात जणांनी ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळविले. ६ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांवर तर १३ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. कॉलेजचा बारावीचाही निकाल १०० टक्के लागला.

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमधून वैष्णवी गायधनी हिने ८९.१७ टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकावर धीरज चौधरी याने ८९.०० टक्के मिळविले तर प्राजक्ता आचार्य हिने ८६.९३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. वर्गामध्ये प्रतिविद्यार्थी मिळविलेल्या गुणांची सरासरी सुमारे ७६ टक्के आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ यांनी केले आहे.

फ्रावशी अॅकॅडमी

फ्रावशी अॅकॅडमीनेही दशकभराची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. मानसी कुलकर्णी हिने ९६.५० टक्क्यांसह शाळेत पहिला क्रमांक पटकाविला. कुणाल जोशी याने ९५.६५ टक्क्यांवर दुसरा क्रमांक पटकाविला. तर तिसऱ्या क्रमांकावर विभागून साक्षी जोशी आणि वैदेही खर्डे यांनी ९५.५० टक्के गुण मिळविले. शाळेत १५० विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ३९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. ६५ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त, ३३ विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. उर्वरित १३ विद्यार्थी हे पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून अथर्व दुर्गाप्रसाद जाजू याने ९७.२ टक्के मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकाविला. क्रमांकावर प्रथमेश मंगेश गांधी याने ९६.५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. शाळेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एकूण ८२ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. २५ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के गुण मिळविले. २७ विद्यार्थ्यांनी ७० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळविले. प्रतिविद्यार्थी सरासरी ७९ टक्के गुण विद्यार्थ्यांनी मिळविले. प्राचार्य रमेशचंद्र पंडा, उपप्राचार्य भूषण उपासनी, महाव्यवस्थापक समीर वागळे आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

होरायझन अॅकॅडमी

मराठा विद्या प्रसारक संचलित होरायझन अॅकॅडमीत दहावीतून पूर्वा जाधव हिने ९६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. सिद्धेश गायकवाड याने ९४.३३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर ईशान गुंद्रे ९४.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेची ही पाचवी तुकडी आहे. विद्यालयातील ८५ पैकी २८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर, ४६ विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

अशोका युनिव्हर्सल स्कूल

अशोका युनिव्हर्सल स्कूल व ज्युनिअर कॉलेजनेही या निकालात १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. संस्थेच्या वडाळा शाखेतील दहावीची विद्यार्थीनी रिया पाटील हिने ९८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, राज सुराणा याने ९७.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय, तसेच कल्याणी कासार हिने ९६.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

अशोका युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेज

संस्थेच्या वडाळा शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतून हरिष उथयाकुमार याने ९५. ८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. शहरातील आयसीएसई बोडार्त विज्ञान शाखेत त्याला सर्वाधिक गुण आहेत. सिद्धी कांकरिया हिने ९४. ८ टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच अथर्व जांगडा याने ९३.८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कॉमर्स शाखेत नंदिनी अरोरा हिने ९०.६ टक्के गुण मिळवून प्रथम, इल्सा भगड व अनमोल शर्मा यांनी ८७.६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तसेच मुस्कान क्रिपलानी हिने ८७.२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष अशोक कटारिया, सहसचिव श्रीकांत शुक्ला आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीचोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सक्रिय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ निफाड

पालखेड डाव्या कालव्यातून येवला, मनमाडसह ३५ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी येत्या दोन ते तीन दिवसात आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी डाव्या कालव्याची पाहणी केली. पाणीचोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात १२०० डोंगळे काढले. दोन दिवस ही कारवाई अशीच सुरू राहणार असून त्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. यावेळी कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पालखेड धरणातून कालव्याद्वारे हे पाणी सोडल्यानंतर मनमाडच्या साठवणूक तलावात जाण्यासाठी ७४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तर येवला येथे जाण्यासाठी या पाण्याला पुढचा ५ ते ६ किलोमीटर अधिक लागते. पण, या दरम्यान या कालव्यातून मोठ्या प्रमाणात डोंगळे लावून शेतीसाठी पाण्याची चोरी केली जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी अगोदरच काळजी घेतली आहे.

पालखेडहून ७५० दशलक्ष घनफुटाचे हे रोटेशन असणार असून त्यासाठी दहा दिवस पाणी सोडले जाणार आहे. येवला, मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, लासलगाव, निफाडमधील काही प्रासंगिक गावांना पालखेड कालव्यात पाणी आरक्षित असते. त्यातून हे पाणी सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे खास पिण्यासाठीच हे आवर्तन असले तरी शेतीसाठी पाणी चोरी जाऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदास कलामंदिराची नूतनीकरणानंतर भाडेवाढ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या नूतनीकरणात मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने महापालिकेने आता कालिदास कलामंदिराचे भाडे वाढविण्याचा विचार सुरू केला आहे. महापालिकेने सध्याच्या भाडेदराचा अभ्यास सुरू केला असून, सध्याच्या भाड्यात जवळपास २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

शहरातील करवाढीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच महापालिका आता कलाप्रेमींनाही झटका देण्याच्या तयारीत आहे. महापालिकेने शहरात लागू केलेल्या नव्या करवाढीवरून रामायण सुरू असतानाच आता कलाप्रेमींनाही अंगावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. भरमसाठ करवाढीवरून शहरात वाद निर्माण झाला असतानाच महापालिकेने नूतनीकरण केले जात असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे दर वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत दहा कोटी रुपये खर्चून महापालिकेने कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण सुरू केले आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून, गेल्याच आठवड्यात आयुक्तांनी या कलामंदिराच्या कामाचा आढावा घेतला आहे. कलामंदिराचे रुपडे पूर्णत: पालटले असून, नाट्य, तसेच कलाप्रेमींसाठी अनेक सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने भाडेवाढीचाही विचार सुरू केला आहे.

बुकिंगही करणार ऑनलाइन

सध्याच्या भाडेदरात मोठे बदल केले जाणार असून, 'कालिदास'चे बुकिंगही आता ऑनलाइन केले जाणार आहे. त्यामुळे बल्क बुकिंग करून पैसे कमावणाऱ्यांनाही चाप बसणार आहे. सध्याच्या भाड्याच्या दराचा आणि सुविधाचा अभ्यास केला जात असून, त्यात साधारण २५ ते ५० टक्के भाडेवाढ करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. सध्या महापालिकेकडून तीन सत्रांत वेगवेगळे दर आकारले जातात. त्यात शनिवार आणि रविवारच्या दिवशी अधिक वाढ केली जाते. परंतु, आता त्यात सरसकट वाढ करण्याचा विचार सुरू असून, त्यासंदर्भात निर्णय झाल्यास कलाप्रेमींकडून त्याला विरोध होण्याची शक्यता आहे.

---

(अँकरशेजारी २ कॉलम) महापालिका इमारत वापरता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दिल्लीसाठी ‘उडान’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांसाठी बहुप्रतीक्षित असलेली राजधानी नवी दिल्लीसाठीची विमानसेवा येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहे. जेट एअरवेज या आघाडीच्या विमान कंपनीकडून त्यासाठीचे बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही हॉपिंग सेवा नसून थेट सेवा असल्याने आता अवघ्या दोन तासांत दिल्ली गाठणे किंवा दिल्लीहून नाशिकला येणे शक्य होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची मागणी असलेली नाशिक ते दिल्ली ही विमानसेवा केंद्र सरकारच्या उडान या योजनेंतर्गत सुरू होणार आहे. उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकहून नवी दिल्लीकरिता विमानसेवा देण्यासाठी जेट एअरवेज कंपनीने इच्छा प्रदर्शित केली होती. त्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने मार्च महिन्यात मंजुरी दिली. त्यानुसार सहा महिन्यांत सेवा सुरू करणे कंपनीला बंधनकारक होते. गेल्या काही दिवसांपासून कंपनीने त्यासंदर्भात जोरदार हालचाली केल्या. ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या अधिकाऱ्यांशीही कंपनीने गाठीभेटी घेतल्या. त्याच्याच आधारे येत्या जूनमध्ये कंपनीची सेवा सुरू होईल, असे वृत्त 'मटा'ने दिले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. कंपनीने सोमवार (दि. १४ मे)पासूनच दिल्ली विमानसेवेसाठीचे बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही बाब सुखद ठरली आहे. या सेवेसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला, तसेच दिल्लीत आंदोलनही केले. 'उडान'च्या दुसऱ्या टप्प्यातून वगळण्यात आले असल्याची बाबही खासदार गोडसे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती.

थेट सेवेचा लाभ

नाशिककरांना हॉपिंग फ्लाइटद्वारे सेवा मिळेल असे सांगितले जात होते. त्यामुळे विमानसेवेचा वेळ अधिक राहिला असता. पण, आघाडीच्या विमानसेवा कंपनीने थेट नाशिक व दिल्ली अशीच सेवा सुरू करण्याचे जाहीर केल्याने हा एकप्रकारे नाशिककरांवर दाखविलेला विश्वासच आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासांत नाशिककरांना दिल्ली गाठता येणार आहे, ही बाब खूपच महत्त्वाची ठरणार आहे. जेट एअरवेजने विविध पाहण्या केल्या, तसेच अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्या जोरावर कंपनीने हा निर्णय घेतल्याने अन्य विमान कंपन्यांच्या नियोजनातही आता नाशिक राहणार आहे.

...अशी असेल सेवा

दिल्लीहून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी विमान निघेल आणि ते ओझरला दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. नाशिकहून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी विमान निघेल आणि दिल्लीला दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा मिळेल. कंपनीने उडान योजनेत आठवड्यातून तीन दिवसच सेवा मिळेल, असे जाहीर केले होते, त्यानुसार ही सेवा सुरू होणार आहे.

१६८ आसनक्षमता

ओझर विमानतळावरून पहिल्यांदाच बोइंग विमानाद्वारे सेवा मिळणार आहे. जेट एअरवेजच्या बोइंग ७३७ या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे. या विमानाची आसनक्षमता १६८ आहे. यातील ४० आसने ही उडान योजनेंतर्गत राखीव राहतील. त्यामुळे या ४० आसनांचे तिकीट अल्प दरात उपलब्ध राहील. २८०० ते ३१०० रुपयांपर्यंतचे तिकीट दर बुकिंगदरम्यान दिसून आले आहेत. त्यामुळे माफक दरात नाशिककरांना दिल्लीसाठीची विमानसेवा मिळणार आहे.

नाशिक अखेर ट्रॅव्हल पोर्टलवर

आतापर्यंत नाशिक विमानतळ हे विविध ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलवर नव्हते. एअर डेक्कन कंपनी केवळ त्यांच्या पोर्टलवरच तिकीट बुकिंग घेत आहे. आता जेट एअरवेजने बुकिंग सुरू केल्याने ते सर्व ट्रॅव्हल पोर्टलवरही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे यानिमित्ताने नाशिक हे सर्व ट्रॅव्हल पोर्टलवर आले आहे. दरम्यान, जेट एअरवेजने तिकीट बुकिंगची घोषणा करताच नाशिकच्या उद्योग, वैद्यकीय आणि सर्वच वर्तुळात समाधानाचे वातावरण आहे. या सेवेमुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळेल आणि अल्पावधीतच राजधानी दिल्ली गाठता येईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

या सेवाही लवकरच

'उडान'च्या दुसऱ्या टप्प्यात अलायन्स एअरकडून अहमदाबाद आणि हैदराबाद, ट्रू जेटकडून अहमदाबाद, इंडिगोच्या वतीने बेंगळुरू, भोपाळ, हिंडण (गाझियाबाद), स्पाइस जेटकडून गोवा आणि हैदराबाद, तर जेट एअरवेजकडून हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. दिल्लीसाठी सेवा सुरू होत असल्याने या अन्य सेवाही नजीकच्या काळातच सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

--

मटा भूमिका

विमानसेवा अन् नाशिक हे समीकरण काही जमत नाही, याचा अनुभवही आता जुना झाला असतानाच नव्याने जेट एअरवेज या आणखी एका आघाडीच्या विमान कंपनीने नाशिकला स्वप्न दाखविले आहे. जूनपासून जेट ही कंपनी दिल्लीसाठी सेवा सुरू करीत असल्याने नाशिककरही लागलीच हुरळून गेले आहेत. वारंवार धक्के बसूनही नाशिककरांची उड्डाणाची आस काही जाता जात नाही. अर्थात, हा आशावादच एक दिवस या सेवेला नियमित होण्यास कारणीभूत ठरू शकतो. किमान ही सेवा तरी सुरळीत होऊ दे, अशी प्रार्थना करण्यापलीकडे लोकांच्याच हातात तरी दुसरे काय आहे?

--

लोगो : शुभवार्ता

स्नॅपशॉट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ उपोषणकर्ते पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील उपोषणकर्त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत सोमवारी पोलिसांनी कारवाई केली. पूर्वनियोजनानुसार सोमवारी पोलिस आयुक्त, कामगारी उपायुक्त, विद्यापीठ प्रशासन आणि उपोषकर्ते कर्मचारी यांच्यात बैठक होऊन तोडगा निघण्याच्या आशेवर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. कामगार संघटनेचे कर्मचारी काही कामानिमित्त मुंबईत असल्याने या बैठकीला सोमवारी मुहूर्त लागला नाही.

आंदोलनाचा सोमवारी चौदावा दिवस होता. सोमवारी दुपारच्या सुमाराला या साखळी उपोषणात एकूण पाच कर्मचारी सहभागी होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळी या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील चौघांना पोलिसांच्या उपस्थितीत तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. एक कर्मचारी मात्र सायंकाळी उशिरापर्यंत उपोषणस्थळी होता. त्याला साथ देण्यासाठी इतर कर्मचारी सायंकाळनंतर दाखल होऊ लागले. त्यानंतर सरकारवाडा पोलिस आणि जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने उपस्थिती लावत या कर्मचाऱ्यालाही दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत कारवाई सुरू केली. त्याला इतर कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस ठाण्यात हजर केले. उपोषणवस्थळीचा मंडप आणि इतर साहित्यही यंत्रणेने ताब्यात घेतले. या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा सरकारवाडा पोलिस ठाण्यात गर्दी झाली होती. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांची आमदार बाळासाहेब सानप यांनी भेट घेतली. मात्र, सोमवारी अपेक्षेप्रमाणे तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

--

(पेज फोटोखाली घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचे विचार जगण्याची गरज

$
0
0

शिवरायांचे विचार

जगण्याची गरज

प्रा. सोपान वाटपाडे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जातीपातीवरील राजकारण आणि दंगे यावर मूळ शोधण्यासाठी समाजाला शिवछत्रपतींचे चरित्र समजून घ्यावे लागणार आहे. त्यांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्याची नव्हे तर शिवरायांचे विचार डोक्यात घालून तसे वागण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते प्रा. सोपान वाटपाडे यांनी केले.

गोदाघाटावर आयोजित वसंत व्याख्यानमालेतील १४ वे पुष्प सोमवारी त्यांनी गुंफले. 'शिवचरित्र : आधुनिक समस्यांवर शिवचरित्रात उपाय' या विषयावर ते बोलत होते. वाटपाडे म्हणाले, की आजच्या संगणकीय व आधुनिकतेच्या युगात छत्रपती शिवरायांचे महत्त्व तीळमात्रही कमी झालेले नाही. त्यांचे स्वराज्य कोणत्याही जाती, धर्म व पंथाच्या विरोधात कधीही नव्हते हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शिवचरित्रामधून छत्रपतींचे उत्कृष्ट कुशल प्रशासन, व्यवस्थापन, कृषीधोरण, जलनीती, न्यायदान अशा विविध बाबी शिकता येतात.

आजचे व्याख्यान

वक्ते : अॅड. असीम सरोदे

विषय : माध्यमाचे स्वातंत्र्य व लोकशाहीचा जिवंतपणा

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images