Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तोंडात अंडी उबविणारे मासे

$
0
0

काही मासे आपल्या अंड्यांचे, पिलांचे संगोपन तथा काळजी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घेतात. काही मासे तर चक्क आपल्या तोंडातच अंडी उबवतात. मादीने अंडी घातल्यानंतर नर या अंड्यांवर शुक्राणू टाकून फलित करतो. ही फलित अंडी नंतर मासे आपल्या तोंडात घेऊन त्यांना उबविण्याचे काम करतात. यामुळे शत्रूपासून अंड्यांचे रक्षण होते आणि त्यांना ऑक्सिजनयुक्त पाणी मुबलक प्रमाणात मिळते. अंड्यांतून बाहेर आलेली पिले घशात ठेवली जातात. पाच आठवड्यांपर्यंत मातापिता पिलांची काळजी घेतात. या काळात त्यांना उपवास घडतो. त्यांना अन्न घेता येत नाही. काही सूक्ष्मजीव, प्लवक, शेवाळवगैरे अन्न म्हणून घेतात. सिक्लिड जातीचे मासे, समुद्रातील मांजर मासे आपल्या तोंडात अंडी उबवितात. ही अंडी उबविण्याचे काम फक्त नरालाच करावे लागते. गुहेत राहणारे काही अंध मासेदेखील तोंडातच अंडी उबवितात. कल्ल्यांच्या आच्छादनाखाली मासे अंडी ठेवतात व उबवितात आणि आपला वंश पुढे चालू ठेवतात.

-डॉ. किशोर पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वर्गीय नर्तक

$
0
0

अतिशय सुरेख, सुंदर व परीसारखा दिसणारा स्वर्गीय नर्तक (पॅरेडाइस फ्लायकॅचर) हा पक्षी बुलबुलच्या आकाराचा, पण २५ ते ३० सेंटिमीटर लांबीची शेपटी असलेला असतो. प्रौढ नर रुपेरी पांढरा असतो. त्याची शेपटीची पिले लांब फितीसारखी असतात. डोके काळे चकचकीत असून, त्यावर चकचकीत काळ्या रंगाचा तुरा असतो. मादी व बालक नर वरून तपकिरी रंगाचे व खालून राखट पांढऱ्या रंगाचे असतात. त्यांच्या काळ्या डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो. मादीला लांब शेपटी नसते. परंतु, बालक नरास तपकिरी रंगाची लांब शेपटी असते. दाट राई, बागा, नाल्याभोवतालची झाडे, बांबूंच्या जंगलात तो राहतो. हा पक्षी शहरात घरांभोवतालच्या गर्द झाडीमध्येही आढळतो. हे पक्षी साधारणपणे जोडीने असतात. हा पक्षी कीटकभक्षी आहे. उडणाऱ्या कीटकांना पकडण्यासाठी नर उंचावर कोलांट्या घेताना दिसतो. माशा, डास, फुलपाखरे इत्यादी कीटक हे त्यांचे अन्न असते. हे पक्षी कोळीष्टकांनी गुंफलेली पातळ गवताची पाती व धागे यांचे सुबक वाटीच्या आकाराचे घरटे बांधतात.

-बाबासाहेब गायकवाड, निवृत्त वनाधिकारी

चला, ओळखूया पक्षी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्राची जागा

$
0
0

-प्रणव प्रशांत चंद्रात्रे, इयत्ता तिसरी, किलबिल हायस्कूल

0000

प्रश्न एकदा, उत्तर दोनदा

१) विस्तवावर भाजलेला २) पाण्यातील वाहन ३) डोळ्यात घालतात

उत्तर

१) भाजका २) जहाज ३) काजळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबापुराण

$
0
0

आमराईतून बाजारात

आंबे आले बाजारात

ठेल्यावरती, दुकानांत

पाटी अन् पेटीत

आंबे विकणारे

येऊन बसले ऐटीत

लालबाग, केशर, हापूस, पायरी

कोणतेही विकत घेऊन जा घरी

जेवायला बसली अंगतपंगत

ताटाल्या वाटीत आमरसाची रंगत

मँगो आइस्क्रीम, लस्सी नि कुल्फी

खाताना काढूया पाहुण्यांबरोबर सेल्फी

आम्रखंड, बर्फी, शेक नि शिरा

आंब्याच्या पदार्थांवर रोज ताव मारा

गोड आंब्याच्या फोडी केल्या मस्त

सोनू, शेरू, बंटीबरोबर झाल्या फस्त

आंब्याची पोळी घातली ताटात

सुकण्याआधीच गेली पोटात

आंबा पुरवतो जिभेचे लाड

लावूया आंब्याचे एक तरी झाड

संपला सीझन पळाला आंबा

परत हवाय? मग वर्षभर थांबा...

-संध्या दीक्षित, नाशिक

--

बालकविता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय बदल्यांसाठी पारदर्शी धोरणाची निकड

$
0
0

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी पदोन्नती घेत अवघ्या तीन महिन्यांत मूळ स्थानी बदली करून घेतल्याने त्यांना एकप्रकारे बदल्यांचे 'गिफ्ट'च मिळाले आहे. सरकारने बदल्यांच्या बाबतीत एक निश्चित धोरण आणले पाहिजे. बदल्यांमध्ये पारदर्शकता असायला हवी. गेल्या काही वर्षांत बदल्या हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले असल्याने याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. सरकारने यासंदर्भात निर्धारित केलेले सध्याचे धोरण कुचकामी ठरत असल्याचेच या प्रकारामुळे अधोरेखित झाले असल्याने त्याचा पुनर्विचार करून तज्ज्ञांच्या समितीमार्फत नवी धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

तात्काळ कारवाई व्हावी

सरकारी नोकरांसाठी बदल्या हा जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु, या बदल्यांबाबत नेहमीच घोळ होत असतात. सरकारच्या कोणत्याही विभागातील बदल्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण ठरत आहेत. कृषी खात्यातील बदल्यांचे ताजे प्रकरणदेखील त्याचाच एक भाग म्हणावे लागेल. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.

-प्रशांत अहिरे

धोरण निश्चित करावे

एखाद्या ठिकाणाहून बदली झाल्यानंतर पुन्हा तीन वर्षे बदली न करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा आदेश आहे. या आदेशाला मात्र सर्रास केराची टोपली दाखविली जाते. इच्छित स्थळी बदली व्हावी यासाठी सर्वच विभागांत भ्रष्टाचार सुरू आहे. बदली नको म्हणूनदेखील अनेकांना खिसा खाली करावा लागतो. बदल्यांबाबतीत पारदर्शक धोरण निश्चित करावे.

-संदीप दिघे

...तर पदोन्नतीच नाकारावी

केवळ पदोन्नतीचा लाभ पदरात पडून घेण्यासाठी बदली स्वीकारणे आणि त्यानंतर पुन्हा मूळस्थानी बदली होणे हे सगळेच संशयास्पद आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. मुळात बदल्यांच्या बाबत एक सुसूत्रता असायला हवी. मात्र, ती नसल्यामुळेचा असे प्रकार घडताना दिसून येतात. सरकारने अशा प्रकरणांत पदोन्नती नाकारणे जास्त योग्य राहील.

-हेमराज निकम

अनागोंदी अधोरेखित

बदल्यांचे भूत नेहमीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले असते. अनेक वेळा तर चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली केली जाते. कृषी विभागातील प्रकार मात्र उलट झाला आहे. केवळ पदोन्नती पदरी पाडून घेण्यासाठी बदली स्वीकारली जाते आणि अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा बदली करून घेतली गेली. यावरून अनागोंदी सुरू असल्याचे दिसते.

-अभिजित देसले

वरिष्ठ स्तरावर व्हावी चौकशी

कृषी खात्यात बदल्यांचा झालेला घोळ उघडकीस आला असून, या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. अवघ्या तीन महिन्यांत बदली होतेच कशी, हा खरा प्रश्न आहे. सामान्य प्रशासन विभागासदेखील यात अंधारात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यात वरिष्ठ स्तरावरून काही चुकीचे घडत आहे का, याचीदेखील वरिष्ट स्तरावरून चौकशी झाली पाहिजे.

-किशोर हिरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबरची करावी दुरुस्ती

$
0
0

नवीन सीबीएस

चेंबरची करावी दुरुस्ती

नवीन सीबीएस परिसरातील प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेले गटारीचे चेंबर फुटले आहे. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. संबंधित यंत्रणांनी येथे दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.

-संदीप कापरे

लोहोणेर

निवारा शेडअभावी गैरसोय

नाशिक-नंदुरबार हायवेवर लोहोणेर येथे एसटी महामंडळाच्या बसेस थांबतात. पण, येथे प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हातच थांबावे लागत आहे. या थांब्यावर कायमच मोठ्या संख्येने प्रवासी थांबत असल्याने येथे निवारा शेड उभारण्याची आवश्यकता आहे.

-विलास भालेराव

देवळाली कॅम्प

विजेच्या खांबाची दुरवस्था

देवळाली कॅम्प येथील नागझिरा नाल्यासमोरील पीरबाबा दर्ग्याजवळचे हे दृश्य आहे. येथील विजेचा खांब गंजलेला आहे. त्यामुळे येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना नम्र विनंती आहे, की त्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून दुरुस्तीकाम करावे.

-संदीप कटारे

महात्मानगर

सुशोभीकरण रखडले

महात्मानगर परिसरात रस्त्यावर सुशोभीकरण प्रकल्प असे लिहून ठेवलेले आहे. परंतु, तेथे मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याची स्थिती दिसून येत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नाशिकचे हसू होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व महापालिका यंत्रणेने यासंदर्भात तातडीने उपाय योजावेत.

-भारत भुरे

कसारा

रेल्वेने कारवाई करावी

कसारा येथून लोकलने मुंबईला जाण्याचा योग नुकताच आला. या प्रवासादरम्यान अनेक उणिवा दिसून आल्या. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करण्याऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. हे जीवघेणे ठरणारे आहे. त्यामुळे यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी.

-जय जोशी

पाटीलनगर

बालसंस्कार शिबिरांची निकड

पाटीलनगरमधील स्वामी समर्थ केंद्रात एकदिवसीय उन्हाळी बालसंस्कार शिबिर नुकतेच झाले. या शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांनीही यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अशी शिबिरे अधूनमधून घेतल्यास निश्चितच मुलांवर सुसंस्कार बिंबविले जाऊ शकतील, असे वाटते.

-सौरभ अमृतकर

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरवाड्याच्या माधवकडे नाण्यांचा ‘खजिना’

$
0
0

शिवराईपासून अनेक दुर्मिळ नाण्यांचा अनोखा संग्रह

म. टा. वृत्तसेवा निफाड

सध्या भारतीय चलनात मोठ्या चलनी नोटांचा बोलबाला आहे. त्यामुळे चलनी नाण्यांना फारसे कोणी संग्रही ठेवत नाही. आगपेटीत नाणी भरून अप्रुप जपणारे मुलेही आजकाल कुठे दिसत नाही. मात्र शिरवाडे येथील किराणा व्यावसायिक माधव मनोहर चिंचोळे यांनी शिवराईपासून दुर्मिळ नाणी गोळा करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे आजही शिवकालीन, ब्रिटीशकालीन अशी विविध प्रकारची दुर्मिळ नाणी आहेत. जिल्ह्यातील नातेवाईक, आप्तेष्टांकडून त्यांनी आतापर्यंत बरीच नाणी संकलीत केली आहेत.

लहान मुलांना या संग्रहातून ते इतिहासकालीन चलनाची माहिती देतात. शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दुर्मिळ चालनाविषयी माहिती घ्यावी, असा त्यांचा आग्रह असतो. माधव चिंचोळे यांचे वडील मनोहर चिंचोळे यांना देखील चलनातील नाणी व नोटा जमविण्याचा छंद होता. त्यांनी तो काही वर्षे जपला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत माधव चिंचोळे यांनी देखील ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

त्यांच्या संग्रहात शिवकालीन चलन शिवराई, आणे, सन १९६१चे २ पैसे, ५ पैसे, सन १९७१ चे कमळाचे चित्र असलेले १०, २० पैसे, सन १९६२ चा नया पैसा, सन १९६९ चे १० पैसे, पितळी २० पैसे, सन १९४४ चा २ आणा, स्वातंत्र्यानंतरचे पहिलेच १९४७ चे वाघाचे चित्र असलेले नाणे, सन १९६२चा १ नया पैसा, २५, ५० पैसे व १ रुपयाची अनेक प्रकारची नाणी, कारलोसचा फोटो असलेले पोर्तुगालचे नाणे, सन १८५८ चा विक्टोरिया राणीचा फोटो असलेला व इस्ट इंडिया कंपनीचा उल्लेख असलेला वन क्वार्टर आणा, सन १९४४ व १९४७ चा जॉर्ज वी किंग एम्बरॉरचा फोटो असलेले २ आणे व १ रुपया, सन १९२५, १९५६, १९५३चे नाणे, सन १९६३चे २ नये पैसे, अॅल्युमिनिअमचे ५, १०, २० पैसे, सन १९८६ चे मत्स्य उद्योगाचे नाव व दुसऱ्या बाजूला मासे पकडताना कोळी व होडीचे चित्र असलेले ५० पैशाचे नाणे, बैल व औतकरी असलेला नेपाळचा २ रुपया, सन १९८४ चा इंदिरा गांधींचा फोटो असलेला व आकाराने मोठ्ठा असलेला ५ रुपयाचा शिक्का, सालाचा उल्लेख नसलेली आकाराने मोठी असलेली १० रुपयाची नोट, सन १९७८ साली मनमोहनसिंग वित्तसचिव असतांना त्यांच्या सहीची १ रुपयांची नोट अशी बरीच नाणी व नोटा संग्रही आहेत.

लहान मुलांना जुन्या नाण्यांमधून आपला इतिहास व संस्कृती माहीत व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ही दुर्मिळ नाणी मी जपून ठेवली आहेत. शिवकाळातील नाण्यांमुळे विद्यार्थ्यांना शिवकाळ देखील माहिती होऊन इतिहासाची आवड निर्माण होईल. -माधव चिंचोले, संग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळेगाव बंधाऱ्यात पोहणाऱ्यांची मनसोक्त डुबकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

थंडीत राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यात उन्हाळ्यातही तापमानाने उच्चांक गाठला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. हिवाळ्यात ४ डिग्री तर आणि उन्हाळ्यात थेट ४० डिग्रीपर्यंत तापमान वाढत असल्यामुळे असह्य होणारा उकाडा कमी व्हावा यासाठी लासलगाव-पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील खाणगाव परिसरात खडक माळेगाव बंधारा येथे पोहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दोन पोहणाऱ्या हौशी व्यक्तींपासून सुरू झालेला स्विमिंग ग्रुप आता दीडशे लोकांचा समूह बनला आहे. सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत या बंधाऱ्यात मनसोक्त डुंबणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

उन्हाळ्यात नदी, तलावात मनसोक्त पोहायला अनेकांना आवडते. ग्रामीण भागात नद्या आणि बंधाऱ्यांमध्ये पूर्वी पाणी असल्याने उन्हाळ्यात पोहणाऱ्यांची मजा असायची. परंतु आता ठिकठिकाणी झालेले बंधारे, धरणे, तलावांमुळे खळखळ नद्या कोरड्या पडल्या आहेत. उन्हळ्यात तर तलावही कोरडे पडल्यामुळे पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील स्विमिंग पूलमध्ये गर्दी होत आहे. मात्र तेथे असलेले पाणी, होणारी गर्दी यामुळे सगळ्यांनाच संधी मिळते असे नाही. त्यातच लासलगाव शहरात पोहण्यासाठी स्विमिंग पूलच उपलब्ध नाही. त्यामुळे पोहण्याचा व्यायाम करण्यासाठी लासलगाव शहर व परिसरातील डॉक्टर इंजिनीअर, शिक्षक, पत्रकार, शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकत्र येत स्विमिंग ग्रुपची स्थापना केली आहे. शहरापासून १० किलोमीटरवर लासलगाव-पिंपळगाव बसवंत मार्गावर खाणगाव परिसरात खडक माळेगाव बंधारा येथे जात आहेत. येथे पोहोण्याचा मनसोक्त आनंद सध्या हा ग्रुप घेत आहे.

योग्य साहित्याचा वापर

बंधाऱ्यामध्ये पोहणे हे धोक्याचे असते. मात्र या स्विमिंग ग्रुपच्या वतीने येथे येणाऱ्या प्रत्येक सदस्याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. योग्य त्या साहित्यांचा वापर या ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे. उन्हाळ्यात वाढती गर्दी लक्षात घेता पोहण्यासाठी येणाऱ्यांना प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शनही केले जात आहे. पोहायला येणाऱ्यांसाठी या ग्रुपने पोशाखही सक्तीचा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘​​एसव्हीकेटी’मध्ये उद्या माजी विद्यार्थी मेळावा

$
0
0

देवळाली कॅम्प : येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी (दि. १०) सकाळी १० वाजता कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे. प्राचार्य डॉ. विजय मेधने यांनी ही माहिती दिली. महाविद्यालयात अधिकृत माजी विद्यार्थी महासंघाची स्थापना करण्यात आली असून, महाविद्यालयाप्रति असलेली जबाबदारी स्वीकारून अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे. यावेळी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देण्याची संधी लाभणार आहे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

अक्षय हिरेंची निवड (फोटो)

नाशिक : त्रिमूर्ती चौकातील रहिवासी अक्षर हिरे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या (नागपूर) नाशिक शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष चेतन कासव यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. त्यांच्या नियुक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निशिकांत काशीकर आदींनी स्वागत केले आहे.

बीज संकलनाचा संकल्प

देवळाली कॅम्प :   येथील आनंदरोड परिसरातील दर्शन अॅकॅडमी  शाळेच्या  सर्वच विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या  उन्हाळ्यात  बीज संकलनाचा संकल्प केला आहे. संकलित केलेले बीज परिसरात टाकून वृक्षवाढीसाठी हातभार लावण्यात येणार  आहे. वड, पिंपळ, जांभूळ, सीताफळ, चिंच, बोर, आंबा यांसारख्या वृक्षबीजांचा प्राधान्य देण्यात येणार असून, शाळेतर्फे गड, किल्ले, रस्त्यांच्या कडेने, ओसाड माळरानावर असे बीज असलेले गोळे  टाकण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यात त्यातील बी रुजून झाडे उगवतील. या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संगीत यंत्रणेची गरज

जेलरोड : महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ मागील जॉगिंग ट्रॅकवरील आल्हाददायक वातावरणामुळे सकाळी व सायंकाळी येथे जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ट्रॅकवर पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि संगीत यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. येथे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करावे, ट्रॅकच्या उत्तरेकडील भागात बसणारी प्रेमीयुगुले, तसेच आडबाजूला मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नसराईनंतर कांदा गडगडणार?

$
0
0

सध्याच्या दराबाबतही शेतकऱ्यांमध्ये नाराजी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ६०० ते ६५० असे सरासरी भाव टिकून आहेत. सध्या उन्हाळ कांद्याची मार्केटमध्ये आवक असून, अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र लग्नसराई संपल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढेल, अशी शक्यता बाजार समित्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आवक वाढल्याने भावही घसरण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा लाल कांदा संपला असून आता फक्त उन्हाळ कांद्याचीच आवक जिल्ह्यातील लासलगावसह सर्वच बाजार समितीत होत आहे. लग्नसराई सुरू असल्याने काही प्रमाणात आवक मंदावली असली, तरीही भाव मात्र गेल्या १५ ते २० दिवसापासून स्थिर आहेत. जिल्ह्यात लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समितीत कांद्याची आवक मात्र टिकून आहे. रोज २५ ते ३० हजार क्विंटलची आवक या ठिकाणी होत आहे.

मंगळवारची आवक (क्विंटलमध्ये)

पिंपळगाव २४ हजार ९७५

लासलगाव १४ हजार ६६०

उमराणे २० हजार

चांदवड १५ हजार ७००

सायखेडा ४६००

विंचुर ७ हजार

दिंडोरी २५००

निफाड २६९१

साठवणुकीकडे लक्ष

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला मंगळवारी कमीत कमी ३००, जास्तीत जास्त ९६१ (पिंपळगाव बाजार समिती) व सरासरी ६२५ ते ६७५ रुपये असा भाव होता. लासलगाव येथे नाफेडने ३२५ क्विंटल कांदा खरेदी केला ८०० रुपये किमान, जास्तीत जास्त ८७५ रुपये तर सरासरी ८२० रुपये प्रति क्विंटलला भाव नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला होते. उन्हाळ कांदा हा टिकायला चांगला असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल आहे. कांदा चाळींमधे कांदा साठवण्याचे काम काही शेतकरी करीत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. १५ मेपर्यंत लग्नसराई असल्याने कांदा आवक कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोओळ

$
0
0

बसस्थानकात जाहिरातीचे पीक?

त्र्यंबकेश्वर बसस्थानात दिवसातून ३०० बस ये-जा करतात. हजारो प्रवासी, पर्यटक, भाविक येथे येतात. मात्र बस स्थानकाच्या नावाची पाटी लावता येईल अशा ठिकाणी राज्य सरकारच्या वृक्षलागवडीच्या योजनांच्या पाट्या लावून 'जनजागृती' करण्यात आली आहे. या जाहिरातींच्या फलकांमुळे बसस्थानकाचे महत्त्वच झाकोळले गेल्याची भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूल होईना खुला...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

 नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी गावाजवळ दारणा नदीपात्रात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या पुलावरील वाहतुकीला वृक्षतोडीबाबत न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे लागलेला 'ब्रेक' गेल्या वर्षभरापासून कायम आहे. परिणामी हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही.

दारणा नदीपात्रात ब्रिटिशकालीन आर्च ब्रिज प्रकारातील दगडी पूल आहे. या पुलाचे आयुर्मान संपलेले असल्याने नाशिक-पुणे महामार्गाच्या नुकत्याच झालेल्या रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामात येथे नव्याने चौपदरी पूल उभारण्यात आलेला आहे. या नव्या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्चही झालेला आहे. मात्र, अद्यापही या पुलाची एक बाजू सार्वजनिक वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने येणारी सर्व वाहतूक जुन्या दगडी पुलावरूनच सुरू आहे. वास्तविक हा पूल पूर्ण होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

२३६ झाडांचा प्रश्न

 नाशिक-पुणे महामार्गाच्या सिन्नर फाटा ते चेहेडी गाव यादरम्यानच्या अंतरातील २३६ विविध प्रकारची झाडे तोडावी लागणार आहेत. या वृक्षतोडीस वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात हरकत घेतली असून, ही याचिका गेल्या काही वर्षांपासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत या याचिकेवर अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत येथील पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार नाही. या याचिकेच्या संदर्भाने येथील झाडे तोडण्यासंदर्भात अहवाल देण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने नुकतीच नागपूरच्या 'निरी' या संस्थेवर टाकली आहे.

'निरी'च्या अहवालानंतर निर्णय

आता 'निरी'मार्फत या ठिकाणच्या २३६ झाडांचे जैवविविधतेचे महत्त्व, कार्बन डायऑक्साइड कमी करण्यात त्यांचा वाटा, नवीन  पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला न झाल्याने येथील जुन्या व अरुंद पुलावरून सुरू असणारी वाहतूक व त्याद्वारे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण याचा अभ्यास 'निरी' करणार आहे. हा अहवाल उच्च न्यायालयात सादर झाल्यावर त्यावर अंतिम निकाल येणार आहे .त्यानंतर वृक्षतोडीस मान्यता मिळाल्यानंतर वृक्ष तोडले जाणार असून, त्यानंतरच दारणा पुलाची दुसरी बाजू सुरू करण्याचा अडथळा दूर होऊन हा पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता सी. आर. सोनवणे यांनी दिली.

लोगो : वर्षभरानंतर...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या जागेने गैरसोयीत भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील कामगार वस्तीचा विचार करून येथील मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा मिळावी या हेतूने सावतानगर येथे उभारण्यात आलेल्या मुला-मुलींच्या स्वतंत्र अभ्यासिकांत विद्यार्थी संख्या वाढत आहे. परिणामी सध्याची जागा अपुरी पडत असून, मुलांना मुलींच्या अभ्यासिकेतील एका भागात बसावे लागत असल्याने या दोन्ही अभ्यासिकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

सावतानगर येथे असलेल्या या दोन्ही अभ्यासिकांचा कारभार परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून चालविला जात असून, या अभ्यासिकेतून यंदा वीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. सिडकोतील सावतानगर येथे बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या नावाने मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. या अभ्यासिकांच्या इमारतीही स्वतंत्र असून, अभ्यासिकांत पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. सावतानगरसह परिसरातील असंख्य विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाला येत असले, तरी आता ही अभ्यासिका अपुरी पडत असल्याने काही विद्यार्थ्यांना मुलींच्या अभ्यासिकेतील एका भागात बसावे लागत आहे. त्यामुळे या दोन्हीही स्वतंत्र अभ्यासिकांची जागा वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या अभ्यासिकेचा कारभार परिसरातील श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बघितला जातो. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना आवश्यक ती पुस्तके उपलब्ध असून, या अभ्यासिकेचे काही नियम बनविण्यात आले आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होत असली, तरी ती पूर्णपणे होते की नाही, त्यासाठी या ठिकाणी पूर्णवेळ व्यवस्थापकांची नेमणूक होण्याची गरज व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाण्याचा अभाव

या अभ्यासिकेत ९२ विद्यार्थी एकाच वेळेस अभ्यास करू शकतात, तर ७६ विद्यार्थिनीही अभ्यास करू शकता. ही संख्या परिसरातील लोकसंख्येच्या मानाने अगदी कमीच असून, वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करून या अभ्यासिकेसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. अभ्यासिकेच्या लगतच जलकुंभ असला, तरी अभ्यासिकेत मात्र पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे.

गुणवंतांचे मिळावे मार्गदर्शन

सिडकोतील इतर अभ्यासिकांच्या तुलनेत या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत. येथे दर वर्षी विविध तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, या अभ्यासिकेतून चांगल्या पदांवर गेलेल्या विद्यार्थ्यांचेही मार्गदर्शन या ठिकाणी मिळावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असून, दरमहिन्याला किमान एका व्याख्यात्याचे मार्गदर्शन या ठिकाणी मिळणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आहे.

वर्षभरापासून या ठिकाणी अभ्यासाला येत आहे. या ठिकाणी बऱ्याच सुविधा असल्या, तरी अजूनही काही सुविधा असणे अपेक्षित आहे. अभ्यासिकेची देखरेख योग्य प्रकार ठेवण्यात येत असून, वाहनतळासाठीही जागा उपलब्ध आहे. येथील वातावरणही प्रसन्न असते.

-श्‍वेता अहिरे, विद्यार्थिनी

तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येथे येत आहे. अभ्यासला पूरक असे वातावरण येथे असून, पूर्णपणे शांतता असते. तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. मात्र, येथे पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने केली पाहिजे.

-समाधान लहामगे, विद्यार्थी

२०१६ पासून या अभ्यासिकेचा कारभार पाहत असून, येथे विविध प्रकारची पुस्तके, स्थानिक वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मागणीनुसारही पुस्तके दिली जातात. जास्तीत जास्त मार्गदर्शक आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.

-नाना निकम, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ

--

मटा मालिका

'परीक्षा' अभ्यासिकांची

ठाकरे अभ्यासिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माल वाहतूक करताना ई-वे बिल असणे गरजेचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्योजक, व्यापाऱ्यांनी आपल्या उत्पादनाची, मालाची वाहतूक करताना आपल्या जवळ ई-वे बिल ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ई-वे बिल बनविताना पुरेशी काळजी घेणेही आवश्यक आहे. एकदा बिल बनले, तर त्यात बदल करणे अशक्य असल्याची माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त संजय पोखरकर यांनी सोमवारी आयमा रिक्रिएशन सेंटर येथे दिली.

सरकारचा उद्देश नुसता टॅक्स जमा करणे नसून, सर्वांना या सिस्टिममध्ये आणण्याचा आहे. सरकारचे याद्वारे उत्पन्न वाढले तर कराचे प्रमाण कमी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)ने उद्योजक व आस्थापनांतील कर्मचारी यांच्यासाठी ई-वे बिल कार्यप्रणालीवर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी वस्तू व सेवा कर विभागाचे संजय पोखरकर, आयमाचे सीए चेतन बंब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचा आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या चर्चासत्राच्या आयोजनाबाबत बोलताना आयमाचे अध्यक्ष अहिरे यांनी आयमा उद्योजकांसाठी विविध प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन करीत असते. ई-वे बिलविषयी उद्योजकांना सखोल ज्ञान मिळावे, यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

स्लाइड शोद्वारे माहिती

चर्चासत्रात सीए चेतन बंब यांनी स्लाइड शोद्वारे ई-वे बिल कशाप्रकारे बनवायचे, वाहतूकदारांची माहिती कशाप्रकारे ठेवायची, बदल कसा करावयाचा, ४० किलोमीटर अंतरापर्यत ई-वे बिल पार्ट बीची आवश्यकता नाही याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रश्नोत्तरांद्वारे उपस्थितांचे शंकानिरसनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आर्किटेक्ट-इंजिनीअर’ची निवडणूक बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशनच्या नाशिक शाखेची वार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पाडली. त्यात अध्यक्षपदी इंजिनीअर योगेश कासार-पाटील यांची निवड करण्यात आली.

संस्थेची दोन वर्षांसाठी निवडलेली अन्य कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष- आर्किटेक्ट चारुदत्त नेरकर, सचिव- इंजिनीअर नरेंद्र भुसे, खजिनदार- इंजिनीअर राजेंद्र बिर्ला, आर्किटेक्ट शैलेश रकिबे, कार्यकारी सदस्य- आर्किटेक्ट किरण राजवाडे, इंजिनीअर अमित अलई, आर्किटेक्ट ऋषिकेश पवार, इंजिनीअर हर्षद भामरे, आर्किटेक्ट अंकित मोहनबन्सी, इंजिनीअर अमित सानप. स्वीकृत कार्यकारी सदस्य- इंजिनीअर कांचन गडकरी, आर्किटेक्ट नेहा जाधव, इंजिनीअर स्मृती ठाकूर, आर्किटेक्ट रितू शर्मा, आर्किटेक्ट मनोज गुप्ता, इंजिनीअर राजेंद्र पवार, आर्किटेक्ट अजय देवरे, इंजिनीअर सचिन मोरे, आर्किटेक्ट सुधीर धुमाळ, इंजिनीअर अनिल कठपाल, आर्किटेक्ट नंदकिशोर निफाडे, इंजिनीअर मनीष नवपरिया, आर्किटेक्ट नकुल भावसार, इंजिनीअर ललित भन्साळी.

नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ वार्षिक सर्वसाधारण सभेत येत्या शनिवारी (दि. १२ मे) वैराज कलादालन, कुलकर्णी गार्डन येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष आर्किटेक्ट सचिन गुळवे व नूतन कार्यकारिणीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नसराईमुळे घटली भाजीपाल्याची आवक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लग्नसराईमुळे मजुरांची उपलब्धता होत नसल्याने सध्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. भाजीपाला असूनही त्याची काढणी करून तो माल शेतातून काढून बाजारापर्यंत पोहोचविणे शक्य होत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कमी प्रमाणात भाजीपाला लिलावासाठी येत असल्याने दरात काहीशी वाढ झाली आहे. लग्नसराई संपल्यानंतर पुन्हा आवक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 यंदा पाऊस चांगला झालेला असल्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असून, उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन आलेले आहे. त्यात शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस यांच्यामुळे भाजीपाला पिके घेणे सोयीचे झाले आहे. वाढलेल्या उत्पादनाला मात्र चांगले दर मिळत नसल्याने अनेकदा उत्पादन खर्च भरून काढणे अवघड होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दाट लग्नतिथी असल्यामुळे शेतात मजूर येणे कमी झाले आहे. परिणामी मजुरांअभावी भाजीपाल्याची काढणी करणे शक्य होत नसल्याने भाजीपाला काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमुळे सध्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. ही घटलेली आवक दरात वाढ करण्यात कारणीभूत ठरत आहे. बाजार समितीतील घाऊक बाजारात दर थोड्या प्रमाणात वाढले असले, तरी किरकोळ बाजारातील दरांत मोठी वाढ झाली आहे. लग्नसराईची दाट तिथी कमी होताच पुन्हा दर घसरण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.    

उसाखालील क्षेत्रात घट

नाशिक परिसरातील साखर कारखाने बंद असल्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असून, त्या क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. या वाढलेल्या लागवडीमुळे वर्षभर मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होत आहे. वाढलेले उत्पादन आणि मागणी कमी यामुळे वर्षभरात भाजीपाल्याच्या दरात फारशी वाढ होत नसल्याचे दिसते.

--

मंगळवारी झालेली आवक आणि दर

भाजीपाला............आवक क्विंटलमध्ये...................दर रुपये प्रतिकिलो

टोमॅटो ..............४००...................................३ ते ६

वांगी................... २७५.................................१० ते २२

फ्लॉवर ................१३२.................................३ ते ८

कोबी.................... ३२८................................३ ते ५

ढोबळी मिरची......... २४४..............................११ ते १५

पिकॅडोर ................ ६७.................................१० ते २५

भोपळा ................... ४५८.............................४ ते १०

कारले...................... ३५८.............................१६ ते २९

दोडका.................... १९८...............................१६ ते ३७

काकडी...................६१०....................................१२ ते २५

गिलके....................८२.....................................१२ ते २०

.................

पालेभाज्या .................आवक जुडीमध्ये....................दर रुपये प्रतिजुडी

कोथिंबीर..................१६७००................................१६ ते ३५

मेथी.........................३६००..................................१० ते २४

पालक.......................८००......................................८ ते २५

कांदापात....................५२००..................................१० ते २९

मुळा.........................२७००...................................६ ते १७

(अँकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंदिलाची साफसफाई

$
0
0

विजेचे जाणे-येणे म्हणजे वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. नेमकी सायंकाळी कामाच्या, स्वयंपाकाच्या वेळीच वीज गायब! काय करावं बाई? लताबाईंना प्रश्न पडला.

विचाराअंती त्यांनी कुमुदला, आपल्या लेकीला हाक मारली.

'काय गं आई?' कुमुद पुढ्यात येऊन बसली.

'हे बघ, एक काम कर. मागच्या घरात एक कंदील आहे फळीवर, तो काढ ,पाडूबिड़ू नको.. साफ कर... आजकाल लाइटचा काही भरवसा दिसत नाही.' लताबाईंनी मुलीला, कुमुदला सांगितलं.

कुमुद मागच्या घरात गेली नि कंदील घेऊन बाहेर आली. कापडाने कंदिलाची साफसफाई करू लागली. कंदील साफ करता करता तिला प्रश्न पडला, की कंदिलाच्या काच लावण्याच्या खालच्या भागाला छिद्रे आहेत ते का आणि कशासाठी?

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर कुमुदने गुरुजी वर्गात आल्यावर त्यांना हा तिच्या मनातला प्रश्न विचारला.

गुरुजी उत्तर देताना म्हणाले, 'कुमुदने कालच्या घरकामातून एक प्रश्न उपस्थित केला आहे. खरं तर असा प्रश्न शोधणं हाच एक शोध आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. कुमुदचा प्रश्न असा, की कंदिलाच्या काच लावण्याच्या खालच्या भागाला छिद्रे का असतात? त्याचं उत्तर सर्वांनी ऐका नि लक्षात ठेवा. कंदिलाच्या ज्योतीमुळे त्या ज्योतीच्या लगतची हवा गरम होते. ही गरम हवा हलकी होऊन वर जाते. गरम हवेची जागा घेण्यासाठी कंदिलाबाहेरची तुलनेने थंड असलेली हवा खालच्या भागातून येणे आवश्यक असते. कारण, ज्योतीच्या ज्वलनासाठी हवेची आवश्यकता असते. कंदिलाबाहेरची थंड हवा आत येण्यासाठी काच लावण्याच्या खालच्या भागाला छिद्रे केलेली असतात.'

गुरुजी थांबले तसे वर्गातल्या सर्वांनी कुमुदकडे कौतुकाने पाहिले. कुमुदच्या चेहेऱ्यावर आनंद मावत नव्हता...

-कमलाकर पाटील, नाशिक

\Bविज्ञानकथा\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या जागेने गैरसोयीत भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील कामगार वस्तीचा विचार करून येथील मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा मिळावी या हेतूने सावतानगर येथे उभारण्यात आलेल्या मुला-मुलींच्या स्वतंत्र अभ्यासिकांत विद्यार्थी संख्या वाढत आहे. परिणामी सध्याची जागा अपुरी पडत असून, मुलांना मुलींच्या अभ्यासिकेतील एका भागात बसावे लागत असल्याने या दोन्ही अभ्यासिकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

सावतानगर येथे असलेल्या या दोन्ही अभ्यासिकांचा कारभार परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून चालविला जात असून, या अभ्यासिकेतून यंदा वीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. सिडकोतील सावतानगर येथे बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या नावाने मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. या अभ्यासिकांच्या इमारतीही स्वतंत्र असून, अभ्यासिकांत पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. सावतानगरसह परिसरातील असंख्य विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाला येत असले, तरी आता ही अभ्यासिका अपुरी पडत असल्याने काही विद्यार्थ्यांना मुलींच्या अभ्यासिकेतील एका भागात बसावे लागत आहे. त्यामुळे या दोन्हीही स्वतंत्र अभ्यासिकांची जागा वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या अभ्यासिकेचा कारभार परिसरातील श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बघितला जातो. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना आवश्यक ती पुस्तके उपलब्ध असून, या अभ्यासिकेचे काही नियम बनविण्यात आले आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होत असली, तरी ती पूर्णपणे होते की नाही, त्यासाठी या ठिकाणी पूर्णवेळ व्यवस्थापकांची नेमणूक होण्याची गरज व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाण्याचा अभाव

या अभ्यासिकेत ९२ विद्यार्थी एकाच वेळेस अभ्यास करू शकतात, तर ७६ विद्यार्थिनीही अभ्यास करू शकता. ही संख्या परिसरातील लोकसंख्येच्या मानाने अगदी कमीच असून, वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करून या अभ्यासिकेसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. अभ्यासिकेच्या लगतच जलकुंभ असला, तरी अभ्यासिकेत मात्र पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे.

गुणवंतांचे मिळावे मार्गदर्शन

सिडकोतील इतर अभ्यासिकांच्या तुलनेत या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत. येथे दर वर्षी विविध तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, या अभ्यासिकेतून चांगल्या पदांवर गेलेल्या विद्यार्थ्यांचेही मार्गदर्शन या ठिकाणी मिळावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असून, दरमहिन्याला किमान एका व्याख्यात्याचे मार्गदर्शन या ठिकाणी मिळणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आहे.

वर्षभरापासून या ठिकाणी अभ्यासाला येत आहे. या ठिकाणी बऱ्याच सुविधा असल्या, तरी अजूनही काही सुविधा असणे अपेक्षित आहे. अभ्यासिकेची देखरेख योग्य प्रकार ठेवण्यात येत असून, वाहनतळासाठीही जागा उपलब्ध आहे. येथील वातावरणही प्रसन्न असते.

-श्‍वेता अहिरे, विद्यार्थिनी

तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येथे येत आहे. अभ्यासला पूरक असे वातावरण येथे असून, पूर्णपणे शांतता असते. तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. मात्र, येथे पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने केली पाहिजे.

-समाधान लहामगे, विद्यार्थी

२०१६ पासून या अभ्यासिकेचा कारभार पाहत असून, येथे विविध प्रकारची पुस्तके, स्थानिक वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मागणीनुसारही पुस्तके दिली जातात. जास्तीत जास्त मार्गदर्शक आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.

-नाना निकम, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ

--

मटा मालिका

'परीक्षा' अभ्यासिकांची

ठाकरे अभ्यासिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा, नामपूरसाठी २९ ला मतदान

$
0
0

म. टा.वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणुकींमुळे सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २७ ऐवजी २९ मे रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या दोन्ही बाजार समित्यांची मतमोजणी ३१ मे रोजी होणार आहे. तर भाक्षी, मुळाणे, केळझर व केरसाणे ग्रामपंचायतीची निवडणूक २७ मे रोजी होणार असून २८ ला मतमोजणी आहे. त्यामुळे मतदरांमधील गोंधळ कमी झाला आहे.

सटाणा, नामपूर बाजार समिती निवडणूक आणि बागलाण तालुक्यातील भाक्षी, मुळाणे, केळझर व केरसाणे या चार गावातील निवडणुका एकाच दिवशी (२७ मे) येत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच या चार गावातील मतदारांनी बाजार समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रशासनही पेचात पडले होते. २७ मे रोजी चार गावांसह सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक होत असल्याने मतदारांना थेट सरपंचसह सदस्यपदासाठी प्रत्येकी एक एक मत देवून बाजार समिती सदस्यांसाठी देखील एक मत द्यावे लागणार होते. मात्र मतदानानंतर बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असता. या अनुषंगाने चारही ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली हेाती. या अनुषंगाने सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मंगळवार, २९ मे रोजी होणार असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन व सिद्धार्थ भंडारे यांनी सांगितले.

0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएचआर गुंतवणूकदारांचा जळगावात आक्रोश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीत १९ कोटी रुपयांच्या ठेवी असून, गेल्या चार वर्षांपासून मुदती संपल्यानंतरही त्या मिळाल्या नाहीत. जळगाव शाखेत प्रशासक नेमला असून, वारंवार खेटा घालूनही पैसे मिळत नसल्याने संभ्रमात सापडलेल्या ठेवीदारांनी थेट जळगाव येथे ३१ मे रोजी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सटाणासह जिल्हाभरात उपोषण, थेट मोर्चासह अनेक आंदोलने झाली. तरीही वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नाही. यामुळे ठेवीदारांनी जळगाव येथे गुरुवारी ३१ मे रोजी आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. जळगाव बसस्थानक शेजारी, महात्मा गांधी उद्यान येथे गुंतवणूकदारांना जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह कशा पद्धतीने मिळविता येतील. याबाबत आता पुन्हा विचारमंथन सुरू झाले आहे. त्यामुळे या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश भांगडीया, योगेश मोगरे, राजू सोनी, किरण अमृतकर, किरण दीक्षित, निवृत्ती ओझा, अरुण पगार, मधुकर माळी, विकास सोनवणे, प्रभाकर मढे, दुर्गा पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images