Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नगर परिषदांत महाभरती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या नगर परिषद संचालनालयाने महाराष्ट्र नगर परिषद सेवेमधील गट 'क' श्रेणीतील १८८९ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संचालनायाने पूर्वपरीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

राज्यातील २३२ नगर परिषदांत सरळसेवेने रिक्त असलेल्या जागांवर ही पदे भरली जाणार आहेत. 'अ, ब व क' श्रेणीतील नगर परिषदांत ही भरती होणार आहे. श्रेणी 'अ' नगरपालिकांत १५३ , 'ब' श्रेणीतील नगर परिषदांत ६०४, तर 'क' श्रेणीतील नगर परिषदांत ११३२ पदे आहेत.

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने नगर परिषदेची ही महाभरती प्रथमच होत असून, त्यामुळे नगर परिषदांनादेखील नवीन अधिकारी-कर्मचारी मिळणार आहेत. या भरतीअंतर्गत स्थापत्य अभियंत्यांची ३६७ पदे, विद्युत अभियंत्यांची ६३ पदे, संगणक अभियंत्यांची ८१, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंत्यांची ८४, लेखापाल व लेखापरीक्षकांची ५२८, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकाऱ्यांची ७६६ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी २५ टक्के पदे ही नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून भरली जाणार आहेत. राज्यात एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 'अ' श्रेणीतील २१ नगर पालिका आहेत. त्याचप्रमाणे ४० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या 'ब' श्रेणीतील ४७, तर २५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या 'क' श्रेणीतील १६४ नगर पालिका आहेत.

जिल्ह्यात नऊ आस्थापना

नाशिक जिल्ह्यात नऊ आस्थापना असून, त्यात मनमाड, येवला व सिन्नर या 'ब' श्रेणीतील नगर पालिका आहेत. त्यानंतर नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सटाणा, चांदवड, भगूर या 'क' श्रेणीतील नगर पालिका आहेत. या भरतीमुळे या आस्थापनांनासुद्धा नवीन अधिकारी मिळणार आहेत.

सर्व तपशील ऑनलाइन

या भरतीचा सर्व तपशील ऑनलाइन देण्यात आलेला आहे. त्यात पदांची वेतनश्रेणी, संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील व पदसंख्या, संबंधित पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता, तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून भरावयाच्या पदांचा तपशील आहे. या भरतीसंदर्भातील माहिती www.mahapariksha.gov.in व www.mahadma.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

---

लोगो- शुभ वार्ता

००००

कचरादहनविरोधात मानव उत्थानचे प्रबोधन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

कचरा पेटणाऱ्यांना महापालिका ५ ते २५ हजारांपर्यंत दंड आकारत आहे. मानव उत्थान मंचने 'मिशन ९७'अंतर्गत कचऱ्याचे ३० स्पॉट दाखवून महापालिकेला सहकार्य केले आहे. पालापाचोळा वा कचरा जाळण्याचे दुष्परिणाम व होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत मंच प्रबोधन करीत आहे.

महापालिकेच्या स्वच्छता विभागात वेळोवेळी निवेदन देऊन कचरा जाळण्याचे थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. सायकल रॅलीही काढली आहे. या मिशनमध्ये मंचचे जगबीर सिंग, मनीष बाविस्कर, भारती जाधव, सुनंदा जाधव, धनश्री कुलकर्णी, प्रियंका बांगर, गौरव क्षत्रिय, पंकज जोशी, हेमंत जाधव, योगेश कापसे, हेमल जदानी आदी सहभागी झाले आहेत. कोणी कचरा जाळत असल्यास महापालिकेच्या NMC e-Connect App वर तक्रार करावी किंवा ७०३०३००३०० या हेल्पलाइन नंबरवर फोन करावा. महापालिकेने घंटागाडीतच पालापाचोळा व वाळलेल्या फांद्या स्वीकाराव्यात किंवा घंटागाडीसोबत उद्यान विभागाची गाडी पालापाचोळा व वाळलेल्या फांद्या स्वीकारण्यासाठी द्यावी, अशी मागणी मंचने केली आहे. जगबीर सिंग यांन सांगितले की, पालापाचोळा जाळल्यास कार्बन मोनॉक्साइडसारखा विषारी वायू तयार होऊन श्वसनासंबंधी आजार तसेच कॅन्सरही होऊ शकतो. पालापाचोळा हे झाडांचे खाद्य आहे. पालापाचोळा कुजून उत्तम खत तयार होत असते. पालापाचोळा, पिकांच्या अवशेषांमुळे जमिनीस उपयुक्त अशा स्थिर कर्बाचे प्रमाण वाढवून अतिउष्णतेपासून जमिनीचे रक्षण होते. दवबिंदूच्या रूपातील पाणी पाचोळ्याचे आच्छादन आपल्यात सामावून जमिनीत ओलावा ठेवते. पिकांना द्याव्या लागणाऱ्या नव्वद टक्के पाण्याची बचत करते. पालापाचोळ्याचा उपयोग करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला आपण घेऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तब्बल पंधरा मिनिटांचे उपोषण!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसच्या उपवास आंदोलनाला उपवास आंदोलनानेच उत्तर देण्यासाठी निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच आत्मक्लेश करण्याची वेळ नाशिकमधील आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी आणली आहे. काँग्रेसच्या संसदेतील गोंधळाला उत्तर देण्यासाठी भाजपच्या खासदारांसह आमदारांनी एक दिवसाचा उपवास करून आत्मक्लेश करण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्यामुळे मोदी ते फडणवीस यांच्यासह राज्यात सर्वत्र उपवास दिवस पाळला जात असताना, नाशिकमध्ये भाजपच्या आमदारांनी कार्यालयातच पंधरा मिनिटांचे उपोषण करीत, मोदींच्या आत्मक्लेशाला बळ दिले. या अनोख्या उपवास आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली होती.

काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालत, कामकाजाला ब्रेक लावला होता. पाठोपाठ दलित अत्याचाराचा मुद्दा पुढे करीत, काँग्रेसने देशभर एक दिवसाचा उपवास पाळत आत्मक्लेश आंदोलन केले होते. परंतु, काँग्रेसच्या खासदारांसह आमदारांच्या प्रतापामुळे हे उपवास आंदोलन फसले होते. काँग्रेसच्या गोंधळाला आणि उपवासाला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुरुवारी एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले होते. नाशिकमध्ये उपवासाऐवजी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाची निवड केली. उपोषण हे आतापर्यंत सकाळी सुरू होण्याची प्रथा आहे. परंतु, भाजपच्या आमदारांनी मात्र ही प्रथा मोडीत काढत, सायंकाळची वेळ निवडली. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी वाजत-गाजत कार्यालय गाठले. शहरात भाजपचे तीन आमदार असताना, उपोषणाला के‌वळ फरांदे यांनीच हजेरी लावली. आमदार बाळासाहेब सानप यांनी उपोषण स्थळाला भेट दिल्याचा दावा कार्यालयातून करण्यात आला. तर आमदार सीमा हिरे यांनी या उपोषणापासून अंतर राखले. सहा वाजता मंत्री पंकजा मुंडे यांचा कार्यक्रम असल्याने फरांदे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी १५-२० मिनिटांत माध्यमांना फोटो दिल्यानंतर उपोषणाची सांगता केली. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांच्या या अनोख्या उपोषणाची शहरभर चर्चा पसरली होती.

खासदार अमेरिकेत

आमदार फरांदे यांनी जाहीर उपोषण केले असले तरी, अन्य आमदारांनी मात्र मनातल्या मनात उपवास धरल्याचा दावा केला. जिल्ह्यातील भाजपचे एकमेव खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे बुधवारी रात्रीच अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यामुळे खासदारांचा उपवास होऊ शकला नाही. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे नाशिक दौऱ्यावर असतानाही, त्यांनी उपवास धरला की नाही याबाबत मात्र कळू शकले नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची घौडदौड सुरू असतानाच, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच्या या अफलातून उपवास आणि उपोषणाच्या स्टंटबाजीने भाजपची फसगत होऊन नागरिकांचीच करमणूक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीच्या पेचातून सुटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

$
0
0

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील शेतजमीन आणि मोकळ्या भूखंडांवरील करांची पुनर्रचना केल्याने शेतकरी व मिळकतधारकांवर अन्याय होत असल्याची ओरड काही नेत्यांनी सुरू केली आहे. त्यात खुद्द सत्ताधारी भाजपचे आमदार, नगरसेवकांचाही समावेश आहे. केलेली करवाढ मात्र नियमानुसारच असल्याचे महापालिका आयुक्तांचे म्हणणे आहे. करवाढ नियमानुसार असेल, तर आतापर्यंत हा नियम दुर्लक्षित का झाला? परिणामी महापालिकेचे किती आर्थिक नुकसान झाले? या नुकसानीस जबाबदार कोण? आताची करवाढ खरच नियमानुसार असेल, तर करवाढीला होणार विरोध केवळ राजकीय नौटंकी आहे का? असे अनेक प्रश्न सामान्यांना सतावत आहेत. एवढा मोठा निर्णय एखादा अधिकारी केवळ मनमानी म्हणून घेऊ शकणार नाही. त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. या पेचातून सामान्यांची सुटका कशी होईल यासाठी सत्ताधाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निर्णयाचा व्हावा फेरविचार

नव्याने केलेली करवाढ अवास्तव आहे. त्यामुळे सामान्य व शेतकरीवर्गाचे आर्थिक शोषण होईल. ज्यांना ठोस उत्पन्न असते अशा नोकरदारांप्रमाणे शेतकऱ्यांकडून करवसुली करणे अन्यायकारकच आहे. इतर मिळकतधारकांनाही ही करवाढ न झेपावणारी आहे. करवाढ नियमानुसार असली, तरी किती प्रमाणात करावी याविषयी आयुक्तांनी फेरविचार करावा.

-ॲड. शरद गायधनी

करवाढीचे राजकीय भांडवल

महापालिका आयुक्तांनी केलेली करवाढ नियमानुसार नसेल, तर त्यासाठी न्यायालयीन स्तरावर विरोध केला पाहिजे होता. मात्र, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाविरोधात सामान्य नागरिकांना भडकावून देत या प्रश्नाचे राजकीय भांडवलच होताना दिसते. सामान्य नागरिकांचे हित प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही समजतच असेल ना?

-बापू ताजनपुरे

शहरविकासासाठी करवाढ योग्य

शहराचा विकास करावयाचा असेल, तर महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत अधिक बळकट झाले पाहिजेत. सत्ताधाऱ्यांना विकासही पाहिजे असतो. मात्र, उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडून कधीही शोधले जात नाहीत. हा राजकारणाचा भाग असतो. शहराचा विकास व्हावा अशीच सर्वांची भावना असेल, तर करवाढ योग्यच आहे.

-अनिल गायखे

सामान्यांसाठी चुकीचा निर्णय

पाचपट करवाढ सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे. महागाईचा विचार करता सर्वांत जास्त खर्च मिळकतीच्या करांवर होणार आहे. त्यामुळे गोरगरिबांचा, कामगारांचा विचार करून करवाढीच्या निर्णयात आवश्यक ते फेरबदल केले पाहिजेत. नाही तर सामान्यांसाठी करवाढीचा निर्णय चुकीचा ठरेल.

-नितीन बोराडे

सुसंवादाचा अभाव उघड

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि आमदारांनीच महापालिका आयुक्तांच्या करवाढीच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत. या प्रकारातून सत्ताधारी आणि प्रशासनातील सुसंवादाचा अभाव उघड झाला आहे. करवाढीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी सत्ताधारी व आयुक्त यांच्यात करवाढीच्या मुद्यावर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते.

-किशोर कलंत्री

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांचा तुटवडा

$
0
0

सिडको

औषधांचा तुटवडा

महापालिकेच्या सिडको येथील स्वामी समर्थ रुग्णालयात अलीकडच्या काळात रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे दिसते. मात्र, त्या तुलनेत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांचे हाल होत आहेत. महापालिकेने यासंदर्भात त्वरित दखल घ्यावी व परिसरातील गरजूंना दिलासा द्यावा.

-संदीप देवांग

शहर परिसर

अवैध मालवाहतूक

शहरात अशाप्रकारे सर्रास अवैध मालवाहतूक होते. याची दखल घेऊन वाहतूक पोलिस कारवाई का करीत नाहीत? की त्यांना फक्त दुचाकीस्वारच दिसतात? यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच लोकप्रतिनिधींनीदेखील दखल घेऊन कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

-विजय पाटील

शहर परिसर

वाहने सावकाश चालवा

अत्यंत वर्दळीच्या भागातील आदित्य पेट्रोलपंपाजवळ नुकताच अपघात झाला. त्यात दुचाकी वाहन चालविणारी महिला गंभीर जखमी झाली. तिच्या मेंदूलाही मार लागला. त्यामुळे प्रत्येकाने वाहन सावकाश चालविणे, तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक बनले आहे.

-दीपक शिंदे

पंचवटी

पथ आहे, दिवे नाहीत!

के. के. वाघ ते तारवालानगर लिंकरोडलगतच्या रस्त्यावर महापालिकेने पथदीप बसविण्याच्या उद्देशाने सुमारे पंधरा खांब उभारले आहेत. पण, या खांबांवर दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. हे असे किती दिवस चालायचे? लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी नेमके काय करतात, असा प्रश्न यामुळे पडतो.

-दीपक चव्हाण

सातपूर

हा काय प्रकार आहे?

सातपूर गावाच्या ठिकाणी त्र्यंबकरोडवरच बिनदिक्कतपणे अशी दुचाकी लावण्यात आली. या रस्त्यासह परिसरातील अन्य वर्दळीच्या रस्त्यांवर असे प्रकार कायमच होताना दिसून येतात. एवढ्या वर्दळीच्या रस्त्यांवर होणाऱ्या अशा प्रकारांकडे पोलिस यंत्रणा कानाडोळा का करते?

-चंद्रकांत महाले

सीबीएस परिसर

शिधापत्रिकेसाठी कर्मचारीच नाही

ठिकाण : शिधापत्रिका विभाग, वेळ : दुपारी १२.५८. खिडकी क्रमांक ३... शहरातील अर्ज तपासणी व शिधापत्रिका वितरणसाठी येथे एकही कर्मचारी उपस्थित नाही! असे चित्र या कार्यालयात कायमच दिसून येते. मात्र, कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घ्यावी.

-बबलू शेख

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉलमार्ट घेणार फ्लिपकार्टचा हिस्सा?

$
0
0

ईटी वृत्त, मुंबई

ई कॉमर्समधील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी फ्लिपकार्टमधील ५१ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा वॉलमार्ट ही अमेरिकी कंपनी विकत घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतात सर्वाधिक ई व्यवसाय करणारी अॅमेझॉन ही कंपनीही फ्लिपकार्टमधील हा हिस्सा विकत घेण्यास उत्सुक आहे. मात्र फ्लिपकार्टने वॉलमार्टला झुकते माप दिल्याची माहिती या घडामोडींवर लक्ष असलेल्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

या व्यवहारासाठी वॉलमार्टने फ्लिपकार्टला १० ते १२ अब्ज अमेरिकी डॉलरची ऑफर दिल्याचे समजते. फ्लिपकार्टचा ५१ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक हिस्सा या रकमेत वॉलमार्टला मिळेल. जूनपर्यंत हा व्यवहार होण्याची शक्यता आहे. यासाठी फ्लिपकार्टचे नवे व जुने समभाग विकत घेण्याची तयारी वॉलमार्टने दर्शवली आहे.

फ्लिपकार्टमध्ये जपानच्या सॉफ्टबँक ग्रुपचा साधारण २० टक्के भांडवली हिस्सा आहे. मात्र वॉलमार्टकडून अपेक्षेहून कमी ऑफर आल्याने त्यांनी आपले भांडवल न विकण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पर्धा वाढणार

सद्यस्थितीत भारतातील ई कॉमर्समध्ये अॅमेझॉनचा वाटा ४० टक्के आहे. त्या पाठोपाठ फ्लिपकार्ट असून या स्पर्धेत ते अद्याप अॅमेझॉनला मागे टाकू शकले नाहीत. मात्र वॉलमार्टने त्यांचा मोठा भांडवली हिस्सा विकत घेतल्यास उभय कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र होईल. वॉलमार्टमुळे फ्लिपकार्टला केवळ आर्थिक बळ मिळणार नसून किरकोळ विक्री, दळणवळण, पुरवठा यातील वॉलमार्टचा अनुभव फ्लिपकार्टच्या उपयोगी पडेल.

वाढता बाजार

भारतात ई कॉमर्सला वाढती मागणी असून येत्या १० वर्षात ही बाजारपेठ तब्बल २०० अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज मॉर्गन स्टॅनलेने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टचा मोठा हिस्सा विकत घेण्यासाठी वॉलमार्ट व अॅमेझॉनमध्ये चढाओढ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुरंग परिवारातर्फे उद्या ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’

$
0
0

ऋतुरंग परिवारातर्फे उद्या 'डॉक्टर तुमच्या भेटीला'

जेलरोड : नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवारातर्फे ऋतुरंग परिवारातर्फे 'डॉक्टर तुमच्या भेटीला' हा उपक्रम राबविला जातो. त्याअंतर्गतचे दुसरे पुष्प शनिवारी (दि. १४) सायंकाळी साडेसहाला प्रसिद्ध

डायबेटॉलॉजिस्ट व कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनीष बोथरा घुफतील. ते आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आहे. दत्त मंदिर चौकातील ऋतुरंग भवनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. बोथरा प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही देतील. हा कार्यक्रम विनामूल्य असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिवाराने केले आहे.

--

फुलेनगरला स्वच्छता अभियान

पंचवटी : समाजकल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहात गुरुवारी पंचवटीतील फुलेनगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तीन पुतळे येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, विशेष अधिकारी देवीदास नांदगावकर, नगरसेविका शांता हिरे, बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.

--

क्रिकेट सराव शिबिर (फोटो)

सिडको : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण क्रीडा स्पर्धा ॲडव्हेंचर स्पोर्टस व आरोग्य समितीतर्फे आयोजित उन्हाळी क्रिकेट सराव शिबिराचा प्रारंभ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते झाला. संस्थेच्या वतीने दर वर्षी संस्थापातळीवर हे शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र निकम, दिलीप आहिरे, चंद्रशेखर मोंढे आदी उपस्थित होते. क्रीडा समिती निमंत्रक राजेंद्र कापसे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा म्हणून संस्थेतर्फे राबविण्यात येणारा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. मुख्याध्यापिका रत्नप्रभा सूर्यवंशी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका राजश्री खोडके, प्रियंका निकम आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रवींद्र नाकील यांनी सूत्रसंचालन केले. विलास पाटील यांनी आभार मानले.

--

उद्या द्राक्षविषयक चर्चासत्र

पंचवटी : द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे शनिवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता 'द्राक्षपीक एप्रिल छाटणी व्यवस्थापन' या विषयावर चर्चासत्र होणार आहे. मानूर येथील शेवंता लॉन्स येथे होणाऱ्या चर्चासत्रात ग्रेप मास्टरचे संचालक सुनील शिंदे, मंगेश भास्कर, एन. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. ग्रेप मास्टर आयोजित सेल्फी विथ ग्रेप्स या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

००००००

टॅक्स प्रॅक्टिशनरच्या अध्यक्षपदी चव्हाण (फोटो)

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी रंजन चव्हाण, तर उपाध्यक्षपदी प्रदीप क्षत्रिय यांची नुकतीच निवड झाली. असोसिएशनची सर्वसाधारण सभा त्र्यंबकरोडवरील नाइस हॉलमध्ये झाली. त्यात नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयप्रकास गिरासे अध्यक्षस्थानी होते. कार्यकारिणी सदस्य सतीश बूब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी राजेंद्र बकरे यांची एकमताने निवड झाली. २०१८-१९ या वर्षासाठीची नवी कार्यकारिणी अशी, सचिव- प्रकाश सोनवणे, खजिनदार- सुनील देशमुख, सहसचिव- एन बी मोरे, संयोजक- राहुल भुतडा, सदस्य- जयप्रकाश गिरासे, अनिल चव्हाण, सुरेश बोथरा, उत्तमराव पाटील, राजेंद्र बकरे. या निवडीचे संस्थापक अध्यक्ष पी. सी. सुराणा यांनी स्वागत केले आहे. प्रदीप क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश सोनवणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिझनेस बँकेतर्फे प्रशिक्षण कार्यशाळा

$
0
0

बिझनेस बँकेतर्फे प्रशिक्षण कार्यशाळा (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड येथील बिझनेस बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा झाली. बँकिंगतज्ज्ञ राजन लोंढे यांचे टेक्निकल बँकिंगवर, तर डॉ. शेखर जोशी यांचे मोटिव्हेशन, टीमवर्क, इमेज बिल्डिंग यावर मार्गदर्शन झाले. बँकेचे अध्यक्ष विजय चोरडिया, ज्येष्ठ संचालक वसंतराव नगरकर, विजय संकलेचा, डॉ. उमेश नगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर आंबेडे, शाखाधिकारी शिवाजी बोराडे, वंदना संगतानी, विशाल दाणी, लक्ष्मी बोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. संकलेचा यांनी हाउसकीपिंग, सकारात्मक दृष्टिकोन, भविष्यातील बँकिंग, मुलांचे बँकिंग आदींबाबत मार्गदर्शन केले. राजन लोंढे, शेखर जोशी यांनीही मार्गदर्शन केले. शिवाजी बोराडे यांनी आभार मानले.

द्राक्षविषयक चर्चासत्र

पंचवटी : द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे शनिवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता 'द्राक्षपीक एप्रिल छाटणी व्यवस्थापन' या विषयावर चर्चासत्र होणार आहे. मानूर येथील शेवंता लॉन्स येथे होणाऱ्या चर्चासत्रात ग्रेप मास्टरचे संचालक सुनील शिंदे, मंगेश भास्कर, एन. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. ग्रेप मास्टर आयोजित सेल्फी विथ ग्रेप्स या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

गतिरोधकाने संताप

जेलरोड : नेहरूनगरमधील उपनगर पोलिस ठाण्याजवळील केंद्रीय शाळेसमोर एकऐवजी तीन ठिकाणी गतिरोधक टाकल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. पूर्वी येथे खड्डे होते, तेव्हाही जाच होत होता. अनेक वर्षांनी रस्ता झाला, तर तीन ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत. नाशिक-पुणे मार्गाने नेहरूनगरमधून जेलरोडला जाता येते. या मार्गावर केंद्रीय विद्यालय आहे. या रस्त्यावर एकही गतिरोधक नव्हता. आता शाळेजवळ तीन, आयलँडच्या पुढे तीन आणि बेला डिसूझा कॉलनीत एक असे सात ठिकाणी गतिरोधक झाले आहेत.

---

रिपब्लिकन सेनेचे आज आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्र व राज्य सरकारने देशभरातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे आज, शुक्रवारी (दि. १३) विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष प्रकाश बागुल यांनी ही माहिती दिली. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकराने पात्रता आणि कौशल्यानुसार सरकारी नोकरी दिली पाहिजे, या मागणीसाठी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यात आंदोलन सुरू करण्यात येणार असून, त्याची सुरुवात शुक्रवारी येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष गंगावार यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार चार लाख १२ हजार ७५२ सरकारी पदे रिक्त आहेत. अाहेत. खासगीकरण व कंत्राटीकरणात मागासवर्गीयांतील एससीच्या एक लाख ५० हजार ३४८, तर एसटीच्या ८४ हजार ५७१ आणि ओबीसींच्या २ लाख ३४ हजार ९१९ नोकरदारांनी नोकऱ्या गमावल्या असल्याचा दावा रिपब्लिकन सेनेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलनी रस्त्याची ‘वाट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर येथील प्रभाग ३० मध्ये सत्ताधारी पक्षाचेच चारही नगरसेवक असतानादेखील या प्रभागातील एकता कॉलनी परिसर समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेसह अनेक समस्यांना येथील नागरिक तोंड देत आहेत. वारंवार तक्रारी करूनदेखील कोणीही या भागाकडे लक्ष देत नसल्याने आता या परिसरातील नागरिकांनी थेट आयुक्‍तांनाच भेटून समस्यांचा पाढा वाचण्याचा निर्णय घेतला आहे.

इंदिरानगर परिसरातील या प्रभागाचे सर्वच नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे असल्याने या प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल, असे नागरिकांना वाटले होते. मात्र, अद्याप एका वर्षात काहीही कामे झाली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रभागातील एकता कॉलनी परिसरात दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. त्यानंतर केबल टाकली गेली आणि रस्तेदेखील बुजविले गेले. मात्र, अद्यापही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे अनेक अपघात होत असून, रस्ताही अपुरा पडू लागला आहे. रस्त्याच्या कडेला चालताना अक्षरशः खड्ड्यातून जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांची वानवा

सध्या शहरात सर्वत्र सफाई कर्मचारी फिरत असल्याचे दिसून येत असले, तरी एकता कॉलनी परिसरात कित्येक दिवसांत स्वच्छता कर्मचारीच आले नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे दिसून येत आहे. या कॉलनीत असलेल्या खुल्या जागेवर नागरिकांनी स्वखर्चाने वृक्षारोपण केले असून, त्या वृक्षांचे पालकत्वसुद्धा स्वीकारले आहे. त्यामुळे या वृक्षांची देखभाल चांगली होत असल्याने या खुल्या जागेला संरक्षक भिंत बांधून या ठिकाणी ग्रीन जिम उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडे एकाही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

आयुक्तांनाच घालणार साकडे

या प्रभागात पाण्याची समस्या नित्याचीच झाली असून, परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नाशिक स्मार्ट सिटीकडे जात असतानाच सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात समस्याच समस्या असल्याने आता याबाबत थेट आयुक्‍त तुकाराम मुंढे यांचीच भेट घेण्याचा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला आहे. आयुक्‍तांनीच आता या कॉलनीकडे लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात, असे साकडे घालण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.

(सेकंड लीड, २ फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुलांचे कठडे ‘पाण्यात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील नंदिनी नदीवरील दोन्ही पुलांच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर हे कठडे थेट नदीपात्रातच कोसळलेले आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गांवर अपघातांची भीती वाढली आहे. संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या जिवाशीच खेळ सुरू असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.

या पुलाच्या परिसरात योग्य ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत, जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, पुलांचे कठडे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे. नाशिकरोडला नाशिकशी जोडण्याकरिता नंदिनी नदीवर अनेक वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. त्यावरून शिर्डी, सिन्नर, पुणे, नगर आदी शहरांकडे वाहतूक होते. कालांतराने लोकसंख्या वाढली, वाहतूकही वाढली. त्यामुळे जुना पूल अपुरा ठरू लागला. नाशिकला जाणारी आणि नाशिकरोडहूला येणारी वाहने या छोट्या पुलावरून जाणे अवघड झाले. त्यामुळे साधारण वीसएक वर्षांपूर्वी समाजकल्याण कार्यालयाच्या बाजूला दुसरा समांतर पूल बांधण्यात आला. एकेरी वाहतूक होऊ लागल्याने अपघातही टळू लागले. मध्यभागी सुंदर वाहतूक बेट बांधल्याने पुलाला शोभा आली. मात्र, आता या पुलांच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे.

वळण बनलेय धोकादायक

नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या पुलावरील सिमेंटचे कठडे जीर्ण होऊन तुटले आहेत. पिकअप वाहनाची धडक बसून मध्यभागी कठडे कोलमडले आहेत. पुलाची सुरुवात होते तेथील वळणावरील कठडे तर थेट नदीपात्रातच कोसळलेले आहेत. त्यामुळे हे वळण धोकादायक बनून अपघात वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिकरोडला जाणारी एक दुचाकी व कार पुलावरून थेट नदीपात्रात पडली होती. सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. तशीच परिस्थिती द्वारकाकडे जाणाऱ्या नवीन पुलाची आहे. या पुलाला लोखंडी कठडे आहेत. चार वर्षांपूर्वी या पुलाला कार धडकून समाजकल्याण कार्यालयाशेजारी असलेल्या नदीतील खडकावर पडली होती. तेव्हापासून पुलाचे लोखंडी कठडे तुटलेले, वाकलेले आहेत. त्यांच्या शेजारील कठ़ड्यांना धडक बसून तेदेखील वाकलेले आहेत. एका ठिकाणी कठड्याचे पाइपच चोरीस गेलेले आहेत.

स्ट्रक्चरला ऑडिटची गरज

जुन्या पुलावर पुरेसे पथदीपदेखील नाहीत. दोन्ही पुलांवरून एसटी बस, ट्रक, कार, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने धावतात. त्यामुळे गंभीर अपघात होऊन जीवित हानी होण्याआधीच प्रशासनाने दोन्ही पुलांच्या कठड्यांची तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. जुन्या पुलावरील सिमेंटचे कठडे तोडून लोखंडी कठडे उभारावेत, पुलाचे स्ट्रक्चरला ऑडिट करावे, तर नव्या पुलावरील कठडे बदलावेत अशी मागणी परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

--

(लीड, ३ फोटो आहेत. निष्पक्षचा लोगो घेणे.)

--

पेज फोटोची ओळ...

बसद्वारे धूरफवारणी!

घरघर लागलेल्या शहर बससेवेतील बहुसंख्य बस अशा धूर ओकताना दिसतात. त्यामुळे अन्य वाहनचालकांना त्रास होण्यासह प्रदूषणातदेखील मोठी भर पडते. मात्र, तरीही महामंडळ याकडे कानाडोळा करीत आहे. बसमधून निघणाऱ्या धुरामुळे इतरांना किती त्रास होतो, त्याचे हे बोलके छायाचित्र.

सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेजस्विनीचे रूपेरी यश

$
0
0

महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्यपदक

नेमबाजी

वृत्तसंस्था, ब्रिस्बेन

महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुलमधील नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तिने अंतिम फेरीत ६१८.९ गुणांचा वेध घेतला. हे तिचे राष्ट्रकुलमधील सहावे पदक ठरले. अंजुम मौदगिल मात्र ६०२.२ गुणांसह सोळाव्या स्थानी राहिली.

अंतिम फेरीत तेजस्विनीला सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे व्हेलोसोकडून चांगली लढत मिळाली. तेजस्विनीने पहिल्या तीन सीरिजमध्ये अनुक्रमे १०२.१, १०२.४, १०३,३ गुण मिळवले. चौथ्या सीरिजमध्ये मात्र तिला १०२.८ गुणच घेता आले. याचा तिला फटका बसला. पाचव्या सीरिजमध्ये तिने १०३.७ आणि सहाव्या सीरिजमध्ये १०४.६ गुण मिळवले. मार्टिनाने ६२१.० गुण मिळवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. स्कॉटलंडच्या सेऑद मॅकइन्टोशने ६१८.१ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. 'या पदकाचा आनंद आहे. आता ऑलिंपिकची तयारी करावी लागणार आहे. तत्पूर्वी एशियन गेम्समध्ये पदकाचे लक्ष्य बाळगले आहे. त्यानंतर दक्षिण कोरियातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे,' असे तेजस्विनी म्हणाली. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलच्या पात्रतेच्या पहिल्या टप्प्यात नीरजकुमार २९१ गुणांसह अव्वल स्थानी राहिला, तर अनिश २८६ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला.

तेजस्विनीची कामगिरी...

- २००६च्या मेलबर्न राष्ट्रकुलमध्ये १० मी. एअर रायफल आणि पेअरमध्ये सुवर्ण.

- २०१०च्या दिल्ली राष्ट्रकुलमध्ये ५० मी. रायफल ३ पोझिशन पेअरमध्ये रौप्य.

- २०१०च्या राष्ट्रकुलमध्ये ५० मी. रायफल प्रोनमध्ये रौप्य.

- २०१०च्या राष्ट्रकुलमध्ये ५० मी. रायफल प्रोन पेअरमध्ये ब्राँझ.

- २००९च्या वर्ल्ड कपमध्ये ब्राँझपदक.

- २०१०च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक.

0000

...

पान नं १ फ्लॅप

पदकतक्ता

ऑस्ट्रेलिया ६३ ४६ ४७ १५६

इंग्लंड २८ ३२ २७ ८७

भारत १४ ७ १० ३१

कॅनडा १२ २९ १९ ६०

आफ्रिका ११ ९ १२ ३२

0000

अॅथलेटिक्स

सीमाला रौप्य, नवजीतला ब्राँझ

अॅथलेटिक्स

वृत्तसंस्था, गोल्ड कोस्ट

भारताच्या थाळीफेकपटू सीमा पुनिया आणि नवजीत धिल्लाँ यांनी एकविसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गुरुवारी अनुक्रमे, रौप्य आणि ब्राँझपदकाची कमाई केली. सीमाने ६०.४१ मीटर इतकी थाळीफेक केली. नवजीत ५७.४३ मीटर इतकी फेक करून तिसऱ्या स्थानावर राहिली. ऑस्ट्रेलियाच्या डॅनी स्टिव्हेन्सने ६८.२६ मीटर इतकी फेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

सीमाने पाच प्रयत्नांपैकी पहिल्याच फेकीत ६०.४१ मीटरची कामगिरी नोंदवली होती. तिने दुसऱ्या व चौथ्या फेकीत अनुक्रमे ५९.५७ मी. आणि ५८.५४ मी. अशी कामगिरी नोंदवली. तिने तिसऱ्या प्रयत्नावेळी फाउल केला, तर तिची पाचवी फेक अपात्र ठरवण्यात आली. सीमाने सलग चौथ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला, यापूर्वी, २००६ आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते, तर २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताच्या नवजीतने पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अनुक्रमे ५५.६१ मी., ५६.२२ मी आणि ५४.०९ मी. अशी फेक केल्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत नव्हती. मात्र, अखेरच्या प्रयत्नात ५७.४३ मी. अशी फेक करून तिने न्यूझीलंडच्या सोसिटिना हाकेई (५७.१६ मी.) हिला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले.

अर्पिंदर, बाबू अंतिम फेरीत

भारताचे अॅथलिट अर्पिंदर आणि ए. व्ही. राकेश बाबू यांनी पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्पिंदरने तिहेरी उडीत 'ग्रुप बी'मध्ये १६.३९ मीटर इतके अंतर कापून आघाडी घेतली. बाबू 'ग्रुप ए'मध्ये १५.९८ मीटर इतके अंतर कापून पाचव्या स्थानावर राहिला. या प्रकारात आघाडीच्या बारा खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळाले. दरम्यान, महिलांच्या लांब उडी अंतिम फेरीत भारताच्या नेलिकल व्ही. नीना आणि नयना जेम्स यांना अनुक्रमे दहाव्या आणि बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. नीलाने ६.१९ मीटर, तर नयनाने ६.१४ मीटर इतकी उडी मारली.

पूर्णिमा सातव्या स्थानी

भारताची हेप्टाथलिट पूर्णिमा हेम्बरम महिलांच्या हेप्टाथेलॉनमधील गोळाफेक प्रकारात सातव्या स्थानावर राहिली. तिने ११.७५ मीटर इतकी फेक केली. यातील २०० मीटर धावण्याची शर्यत २५.१२ सेकंदांमध्ये पूर्ण करून ती तिसऱ्या स्थानी राहिली. पूर्णिमाने १०० मी. धावण्याची शर्यत १३.५६ सेकंदांत पूर्ण करून दुसरे स्थान पटकावले. पूर्णिमाच्या खात्यात आता एकूण ६४५ गुण आहेत.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापडी पिशव्यांचे विभागामध्ये वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पर्यावरण असंतुलनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्या वापराचे धोके व कापडी पिशव्या वापरण्याचे फायदे याविषयी नागरिक व विद्यार्थी वर्गाचे प्रबोधन करून नवी दिल्लीच्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्या नाशिक शाखेने विभागात तब्बल १७ हजाार कापडी पिशव्यांचे वाटप केले. नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह बार कौन्सिलच्या सदस्यांना या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.

या समितीच्यावतीने देशातील महाराष्ट्रासह इतर आठ राज्यांत पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले जात आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रवक्ते अनिकेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समितीतर्फे राज्यातील नाशिक विभागासह पनवेल, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणीय समस्यांना कारणीभूत ठरू लागल्याने या समितीतर्फे कापडी पिशव्या वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना हजारो कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती या समितीचे गिरीश पाटील, संजय मोकळ, किरण देसले, विनोद पाटील आणि आनंद पाटील आदींनी दिली.

शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये या समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या दोनशे शिक्षकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कापडी पिशव्या समितीने राज्यातील विविध ठिकाणच्या बचत गटांकडून तयार करवून घेतलेल्या असल्याने नकळतपणे बचत गटाच्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारही प्राप्त झाला आहे. यापुढेही कापडी पिशव्यांचे वाटपाचा उपक्रम राबविला जाणार असल्याचे समितीचे अनिकेत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकारी संगीता नांदुरकर (शहाणे) आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अर्वाच्य भाषेत पालिका कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत, भारतीय मजदूर संघाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत स्वच्छता, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.

कामबंद आंदोलनात शासकीय 'केडर'मध्ये समावेश असलेल्या पालिकेतील विविध टेबलांवरील अधिकाऱ्यांचा काहीसा अपवाद वगळता सर्वच कर्मचारी सहभागी झाले. मुख्याधिकाऱ्यांनी वापरलेल्या शब्दांच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने जमा झालेल्या संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करीत बराच वेळ ठिय्या दिला. पालिकेतील सर्वच विभागाची दालने बंद करून घेत पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारालाही टाळे ठोकले.

भारतीय मजदूर संघाचे पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी (दि. ११) झालेल्या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी नांदुरकर यांनी केलेले वक्तव्य वादास कारणीभूत ठरले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित अदा करावे यासाठी प्रथमतः संघटनेने उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे व डीपीओ खोडके यांची भेट घेतली होती. त्यांनी हे वेतन त्वरित अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना चर्चेस बुधवारी बोलावले. यावषली बैठकीत मुख्याधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत मुख्य विषय बाजुला ठेवला आणि 'तुम्ही ब्लकमेलिंगचे धंदे बंद करा', या शब्दात अपमानित केल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लक्ष्य करत गुरुवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पालिकेतील स्वच्छता, पाणीपुरवठा विभागातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीकडे आपला मोर्चा वळवत आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडच्या गावाला नाशिकची मदत

$
0
0

हसनापूरवासीयांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गाव' प्रत्येक चाकरमान्याच्या मनातील हळवा कोपरा. धडपड करीत गावातून शहरात आलेल्या अन शहरी झालेल्या व्यक्तीला गावाची ओढ सहाजिकच असते. पण, दररोजच्या जगण्याच्या लढाईत, कामाच्या ताणात 'गाव' कुठेतरी मागे पडते. गावासाठी काहीतरी करावे, अशी मनातील अपेक्षा मनातच राहते. यास अपवाद म्हणून क्राइम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते सध्या काम करीत आहेत.

बीड जिल्ह्यातील हसनापूर गाव. २०० ते ३०० घरांच्या या गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. पिण्याच्या पाण्यासाठी जेमतेम सोय. उन्हाचा कडाका वाढला की हंडाभर पाण्यासाठी पायपीट ठरलेली. या विपरीत परिस्थितीत नखाते यांनी शिक्षण घेऊन डीवायएसपीची परीक्षा उत्तीर्ण केली. गावात जाण-येणे असले तरी गावासाठी काय करणार, असा एक प्रश्न त्यांच्या मनात होताच. काही दिवसांपूर्वी गावातील तरुण मुलांनी एका स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती त्यांना कळवली. पाणी अडवणे हा स्पर्धेचा उद्देश असला तरी लोकसहभाग महत्त्वाचा होता. गावातील तरुण, युवक, वृद्धांनी काम करण्याची तयारी दर्शवली. मात्र, निधीची कमी होती. गावातील सहा-सात जण रोजगारानिमित्त बाहेरगावी आहेत. यातील नखाते वगळता कोठून फारशी मदत मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा नखाते यांच्याकडे लागल्या होत्या.

अशी केली निधीची जुळवाजुळव

लग्न वगळता कधीही एकजूट न दाखवणारा गाव एकत्र येत असल्याने काहीही झाले तरी निधी संकलित करायचा, अशी खुणगाठ नखाते यांनी बांधली. यासाठी त्यांनी आपल्या बॅचच्या इतर अधिकाऱ्यांना मदतीविषयी विचारणा केली. पोलिस अधिकाऱ्यांनी आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला. वरिष्ठांपाठोपाठ इतर अधिकारीही सरसावले. मात्र, बंधारे बांधणे तसेच जेसीपीच्या इंधनासाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज होती. शहरातील बांधकाम व्यावसायिक विलास बिरारी यांनी चार बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे गावासाठी निधीची जुळवाजुळव झाली. मालेगावच्या महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी साताऱ्या्ील त्यांच्या गावातील जलसंधारणासाठी धाव घेतल्यानंतर आता नखाते यांनीही त्याच पद्धतीने काम केले आहे.

गावाचा आणि माझा फार संबंध कधी आला नाही. पण जितका वेळ गावात घालावला तो आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. कर्तव्य संभाळून गावासाठी काहीतरी करण्याची संधी समोर आली. यानिमित्ताने ओढ लावणाऱ्या गावाच्या मातीसाठी काहीतरी केल्याचे समाधान आयुष्यभर पुरेल.

- अशोक नखाते,

सहायक पोलिस आयुक्त, क्राइम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागड्यांचे दर्शन दुर्लभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून तो घंटागाडीत टाकण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे कचरा वेगळा न करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करीत आहे. मात्र, कचरा गोळा करण्यासाठी तब्बल चार-पाच दिवसांनी फिरणाऱ्या घंटागाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. एवढ्या विलंबाने घंटागाड्या येत असल्यामुळे मखमलाबादरोडवरील नागरिक त्रस्त झाले असून, काही जण अंधारात थेट रस्त्यावरच कचरा फेकू लागल्याने कचराच कचरा चोहीकडे अशी स्थिती या भागात दिसून येत आहे.

वाढत्या लोकवस्तींचा विचार करून घंटागाड्यांची संख्या आणि आहे त्या घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे असताना तशी उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. घरांमधील कचरा ठेवणे ही मोठी समस्या झाली आहे. ओल्या कचऱ्याची सुटणारी दुर्गंधी येथील रहिवाशांना त्रासदायक ठरू लागली आहे. त्यामुळे ही समस्या बिकट झाल्याने मखमलाबादरोडवरील घाडगे मळा येथील नागरिकांनी घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांना निदान दिवसाआड तरी घंटागाडी आणण्याची विनंती केली असता त्यांच्याकडे असलेल्या परिसराचा विचार करताना दिवसाआडदेखील घंटागाडी पोहोचणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

ओल्या कचऱ्याने दुर्गंधी

घरोघरी आता ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यात येत आहेत. सुका कचरा काही दिवस पडून राहिला, तरी त्याचा काही त्रास होत नाही. मात्र, ओला कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरायला लागते. असा कचरा जास्त दिवस घरात ठेवणे शक्य नसते. त्याची दुर्गंधी असह्य होत असल्यामुळे तो कचरा त्वरित उचलणे गरजेचे आहे. हा कचरा उचलण्यासाठी येणारी घंटागाडी चार-पाच दिवसांनंतर येत असल्यामुळे ही समस्या वाढत आहे. कित्येक रहिवासी घरात दुर्गंधी नको म्हणून कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः रात्रीच्या वेळी असा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यामुळे रस्त्याच्याकडेला कचरा साचल्याचा आणि त्याच्या दुर्गंधीचा त्रास अशा रस्त्याने जाणाऱ्यांना सहन करावा लागतो.

घंटागाडी चार-पाच दिवसांनी येत असल्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या वाढली आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असता ते ठेकेदाराशी बोला, असे सांगत आहेत. घंटागाड्यांची संख्या कमी, त्यांच्याकडे असलेला परिसर मोठा त्यामुळे घंटागाडी वेळेवर येऊ शकत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र, त्यात रहिवाशांना कचरा घरात साचवून ठेवावा लागत आहे.

-राम पवार, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींना अटक; पोलिस फिर्यादीच्या प्रतीक्षेत

$
0
0

आरोपींना अटक; पोलिस फिर्यादीच्या प्रतीक्षेत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

--

विदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळणाऱ्या तिघा आरोपींना खार पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपींनी नाशिकमधील काहींना गंडा घातला असून, त्यांच्या बँक खात्यात तशा नोंदी आहेत. मात्र, याबाबत फिर्यादीच समोर आलेला नसल्याने पोलिसांची पंचाईत झाली आहे. विवाह, विदेशात नोकरी, परदेशात व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणांनी अनोळखी व्यक्तींना पैसे दिले असल्यास नागरिकांनी सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खार पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शोहेब कुरेशी (२४, रा. ठी. नालासेपारा) पास्कल झूमबे (२१, रा.ठी. नालासोपारा) आणि सॅनडे मेझे (२२, रा.ठी. नालासोपारा) यांचा समावेश आहे. यातील दोघे नायझेरियन व्यक्ती असून, फसवणुकीच्या गुन्ह्यात यांचा सक्रिय सहभाग असतो. या तिघांनी मिळून आपोलोनिया अर्नान्डिस या महिलेस तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा घातला होता. विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपोलोनिया यांच्याकडून संशयितांनी पैसे उकळले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच खार पोलिसांनी संशयितांना १० एप्रिल रोजी अटक केली.

पोलिसांनी संशयितांकडून ७ एटीएम कार्ड, ११ सीमकार्ड, एक लॅपटॉप आणि रौटर, चार मोबाइल, तसेच तीन हजारांची रोकड जप्त केली होती. या आधारे तपास करणाऱ्या खार पोलिसांनी संशयितांचे नाशिक कनेक्शन शोधून काढले. संशयितांनी नाशिकमधील काही व्यक्तींना फसवल्याचे समोर आले असून, नाशिकमधून त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे दिसते. याबाबत बोलताना सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले की, संशयित आरोपींच्या बँक खात्यावर नाशिकमधून पैसे जमा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, फसवणूक झाल्याप्रकरणी अद्याप तशी तक्रारच समोर आलेले नाही. फेसबुक अथवा इतर सोशल मीडियाच्या आधारे नोकरी, विवाह, व्यवसाय यासंदर्भात कोणी अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केलेला असल्यास त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बोरसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवकाळीने अवकळा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहराच्या काही भागाला गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. याचवेळी वीजेचा पुरवठा खंडित झाला, तर अचानक आलेल्या या पावसाने नाशिककरांची चांगलीच धावपळ उडाली.

हवामानातील बदलांमुळे अवकाळी पाऊस येणार असा अंदाज हवामान विभागाकडून दिला जात होता. मात्र, उन्हाचा तडाखा तीव्र असल्याने पावसाच्या सरी कोसळतील असे नाशिककरांना वाटत नव्हते. गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हवामानात बदल झाला. त्यामुळे कडक उन्हातच शहराच्या काही भागात गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरी आणि वादळी वारा यामुळे शहरवासियांची त्रेधा उडाली. जुने नाशिक, गंगापूर गाव, सिडको या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यावरही त्यामुळे पाणी साचले. काही ठिकाणी होर्डिंग्ज फाटले तर पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. शहराच्या मुख्य भागात जोरदार वारा होता. फावडे लेनमधील भिकुसा वाडा कोसळला. यात जीवितहानी झाली नाही. जुने नाशिक आणि सातपूर व सिडको परिसरात मात्र नागरिकांची मोठीच धांदल उडाली. शहराच्या अनेक भागात वीजेचा पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, तासाभरानंतर वीजपुरवठा सुरळीत होतानाच वादळी वारा आणि पावसाचे वातावरणही दूर झाले.

फलकाने विद्युत तारांचे नुकसान

सातपूर : वेध शाळेच्या अंदाजानुसार सातपूरला गारपिटच्या पावसाने हजेरी लावत दाणादाण उडविली. या परिसरात लावलेल्या फलकांमुळे महावितरणच्या

विद्युत तारांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची त्रेधा उडाली. गारांसह झालेल्या पावसाने उन्हापासून दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. पाऊस गेल्यावर वीजपुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात सिंगल

$
0
0

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली असून, यासाठी ३ कोटी ९३ लाख ७६ हजार रूपये मंजूर केले असल्याची माहिती सटाणा नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत उच्चाधिकार समितीच्या मुंबई येथील बैठकीत प्रकल्पाची सविस्तर चर्चा झाली. शहरातील चौगांव बर्डी येथील वीस ते पंचवीस हजार टन कचरा यात रिक्लीन होणार आहे. यानंतर भविष्यात जमा होणारा ओला व सुका कचरा वेगळा करून खत व वीज तयार करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या जागे बरोबरच सदर प्रकल्पाच्या जागेला संरक्षण भिंत, खत, वीज निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, शेड कामगारांसाठी घरे विद्युत, अंतर्गत रस्ते यांचा यात समावेश आहे.

00000

घोटीत बैठक

घोटी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीउत्सवाच्या पार्श्वभूमीवर घोटी येथे तहसीलदार अनिल पूरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक झाली. जयंती उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी दक्ष राहून कायदा सुव्यवस्था व नियमांचे पालन करा असे आवाहन घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले. सदस्य संतोष दगडे, मदन रूपवते, माजी सरपंच संजय जाधव, अण्णासाहेब डोंगरे, बाळासाहेब वालझाडे आदी उपस्थित होते.

000

पुण्यतिथी सप्ताह

निफाड : श्री स्वामी समर्थ महारांजांची शुक्रवारी पुण्यतिथी असल्याने त्यानिमित्ताने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यतिथी सप्ताह सुरू आहे. सर्व सेवा केंद्रांवर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता स्वामींची महानैवेद्य आरती होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व केंद्रावर जयारी करण्यात आली आहे. निफाड येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रावर पुण्यतिथी सप्ताहानिमित्त विद्युत रोषणाई केली आहे.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात रंगणार ‘भीमसंध्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात शनिवारी, १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. जयंती उत्सव निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशनल सोशल व कल्चरल ऑर्ग. मालेगाव यांच्या वतीने भीमसंध्या या भीमगीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राजेश गंगावणे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवार सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रवीण डोणे व शिरिष पवार यांच्यासह भीमस्पंदन इंटरनॅशनल ग्रुपचे कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत अशी माहिती गंगावणे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश तरुण वर्ग व समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा भीमगीतांचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मिरवणूक मार्गाची पाहणी

शनिवारी साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध भागातून मिरवणूक निघणार असून, या मिरवणूक मार्गाची अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे आदींनी पाहणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिस ठाण्यात तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच , उपसरपंच, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाणून घेऊया मटासंगे!

$
0
0

लोगो - जाणून घेऊया मटासंगे!

कचऱ्यापासून वीजनिर्मिती पाहण्याची संधी

महापालिकेने विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून विजेची निर्मिती सुरू केली आहे. हा प्रकल्प कसा चालतो, कशी तयार होते वीज, हे पाहण्याची संधी मटाच्या वाचकांना मिळणार आहे. त्यासाठी ८०८७९६८०५३ या क्रमांकावर मेसेज करुन आपल्या सहभागासाठी नोंदणी करा. आपले नाव, पत्ता आणि फोन नंबर असा मेसेज करावा. निवडक वाचकांना येत्या रविवारी सकाळी १० वाजता विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या ठिकाणी हा प्रकल्प पाहता येईल. तेव्हा त्वरा करा. आताच नोंदणी करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी महिला’चा भगूरला कँडल मार्च

$
0
0

'राष्ट्रवादी महिला'चा भगूरला कँडल मार्च (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देशभरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथील आठवर्षीय चिमुरडीच्या बलात्कारप्रकरणी भगूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली कँडल मार्च काढण्यात आला.

देशासह राज्यभरात या प्रकरणी संतापाची भावना उसळत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व भगूर येथील सर्व समाजाच्या महिला, मुलींनी एकत्र येत कँडल मार्च काढला. यावेळी वुई वाँट जस्टिस व बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली. या बलात्कार आणि हत्या प्रकरणाविषयी संपूर्ण देशातून संतापाची भावना व्यक्त होत असताना आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या सात संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयाने कडक कारवाई करीत मुख्य आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी यावेळी जिल्हाध्यक्षा बलकवडे यांनी केली. या मार्चमध्ये देवळाली कॅम्प शहराध्यक्षा सायरा शेख, बीना हांडा, भारती बलकवडे, पूनम बर्वे, सुलताना शेख, मंगल भालेराव, कमळा कदम, नूरजहाँ मन्सुरी, रझीया शेख, परवीन सय्यद आदी सहभागी झाल्या होत्या.

---

कॅम्पमधील\R रस्ते\R डांबरीकरणाची\R मागणी\R

म\R. टा\R. वृत्तसेवा\R, देवळाली\R कॅम्प\R

गेल्या\R दोन\R वर्षांपासून\R देवळाली कॅम्पमध्ये\R सुरू\R असलेल्या\R भूमिगत\R गटारींच्या\R कामामुळे\R शहरातील\R अंतर्गत\R रस्त्यांची\R दुरवस्था\R झाली\R आहे. पुढील\R महिन्यापासून\R सुरू\R होणारा\R रमजान\R महिना\R लक्षात\R घेता\R कॅन्टोन्मेंट\R प्रशासनाने\R त्वरित\R डांबरीकरण\R करण्याची\R मागणी\R छावा\R संघटनेचे\R जिल्हाध्यक्ष\R राशीद\R सय्यद\R यांनी\R केली\R आहे\R.

देवळालीच्या\R आठही\R वॉर्डांत\R सुरू\R असलेल्या\R भूमिगत\R गटारींच्या\R कामामुळे\R रस्ते\R गेल्या\R वर्षीपासून\R खोदून\R ठेवण्यात\R आले\R आहेत\R. त्यावर\R फक्त\R मुरूम\R टाकून\R रस्ते\R सुरळीत\R करण्याचे\R काम\R केले\R जात\R आहे\R. मात्र,\R पुढे\R सुरू\R होणारा\R पावसाळा\R व\R रमजान\R पर्व\R लक्षात\R घेत\R मशीद\R परिसरासह\R आठही\R वॉर्डांमधील\R रस्ते\R त्वरित\R डांबरीकरण\R न\R केल्यास\R निषेध\R मोर्चा\R काढण्यात\R येईल\R. या प्रकरणी\R छावा\R संघटना\R पदाधिकारी\R व\R नागरिक\R बोर्डाचे\R अध्यक्ष\R ब्रिगेडिअर\R प्रदीप\R कौल\R व\R मुख्य\R कार्यकारी\R अधिकारी\R यांना\R भेटून\R निवेदन\R सादर\R करणार\R आहेत\R.१५\R दिवसात\R डांबरीकरणाबाबत\R लेखी\R आश्वासन\R दिल्याशिवाय\R हे\R आपण\R मागे\R हटणार\R नसल्याचे\R रशीद\R सय्यद\R यांनी\R सांगितले\R.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images