Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मालेगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

खंडणीसाठी पैसे न दिल्याने तरुणास मारहाण करून त्याच्यासोबत असलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना खड्डाजीन येथील नवीन बसस्थानकाजवळील बोरीचा मळा येथे घडली आहे. याप्रकरणी ४ आरोपींविरुद्ध मालेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

माजीद कुरेशी इकबाल कुरेशी (वय २२) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सोहेल, सलमान, असिफ या उर्वरित संशियतांचा शोध घेतला जात आहे. शहरातील गोल्डननगर भागातील १९ वर्षीय विवाहिता तिच्या बहिणीच्या पतीसोबत दुचाकीवर बसून मंगळवारी (दि. ६) दुपारी उपचारासाठी रुग्णालयात जात होती. याचवेळी खड्डाजीन भागात चार तरुणांनी दुचाकी अडवून दुचाकीस्वार तरुणाकडे २० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्याने नकार दिल्याने चौघांनीही तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच विवाहितेला रमझानपुरा भागातील बोरचा मळा येथे जबरदस्तीने नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर संशयितांनी तरुणाची दुचाकी व मोबाइल फोन हिसकावून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपोवनात ड्रेनेजसमस्या

$
0
0

भाविक, पर्यटकांना दुर्गंधीची डोकेदुखी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तपोवनातील कपिला संगमाजवळून जाणारी ड्रेनेज पाइपलाइन फुटली असून, त्यातील घाण पाणी पाझरू लागले आहे. हे पाणी कपिला संगमावर तुंबले आहे. त्याची दुर्गंधी येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना डोकेदुखी ठरत आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील भरावा वाहून गेल्यामुळे ही ड्रेनेज लाइन आणि मोठ-मोठे चेंबर उघडे पडले आहेत.

कपिलासंगमावरील खडक पोखरून त्यातूनही ही ड्रेनेज लाइन टाकण्यात आलेली आहे. त्यावर २० ते २५ फूट उंचीचे चेंबर बांधण्यात आलेले आहेत. खडक पोखरून टाकण्यात आलेल्या या पाइपांवर दगड गोटे-माती टाकून ही ड्रेनेज लाइन बुजविण्यात आली होती. मात्र पुराच्या पाण्यात येथील माती आणि दगड वाहून गेले आहेत. हे दगड पुढे गोदावरीच्या किनाऱ्याला साचून राहिले आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा तुंब थेट रामटेकडीपर्यंत पोहचून या परिसरात असलेल्या वस्तीत पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत.

लिंकेज बंद करावे

या भागात देशातून भाविक आणि पर्यटक येत असतात. हा परिसर गेल्या काही दिवसांपासून सेल्फी पॉईंट म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. मात्र याठिकाणी जर अशाप्रकारे ड्रेनेजच्या पाण्याने दुर्गंधी पसरली असेल तर येथे येणाऱ्यांचा ओघ कमी होईल. यासोबतच येथील राहणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही उघडी पडलेली ड्रेनेज लाइन बुजवावी आणि तातडीने हे लिंकेज बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर

गोदावरीच्या किनाऱ्याने नेण्यात आलेली ही ड्रेनेज लाइनला खडकाळ भागात पूर्णपणे उघडी पडली आहे. पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे २० फुटापर्यंतचे दगड वाहून गेले आहेत. हा खोदलेला भागात मोठी खळी तयार झाली आहे. त्यात ड्रेनेज लाइन स्पष्टपणे दिसत आहे. त्यातील काही पाइप फुटून त्यातून घाण पाणी पाझरण्यास सुरुवात झाली आहे. त्याची दुर्गंधी असह्य होऊ लागली आहे. कालांतराने हे फुटण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे येथील पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझायनिंग क्षेत्रात ‘तिने’ भरले रंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बालपणी असलेला चित्रकलेचा छंद, त्याला भविष्यात मिळालेली शिक्षणाची जोड आणि मनात काही वेगळे करून दाखवण्याची जिद्द! याच्या जोरावर शहरातील अर्पिता जितेंद्र लाड यांनी डिझायनिंगच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. बालपणीच्या छंदाला मेहनत आणि प्रशिक्षणाची जोड देत त्यांनी एक यशस्वी उद्योजिका म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

बारामती येथील माहेर असलेल्या अर्पिता लाड यांना चित्रकलेची आवड असल्याने ठरवून कमर्शियल आर्ट सारखे क्षेत्र करियर म्हणून निवडले. माहेरच्यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिल्याने पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयातून याच क्षेत्रात पदवी संपादन केली. पुण्यात एका जाहिरात एजन्सीची सुरुवात केली. दरम्यान शहरातील व्यावसायिक असलेले जितेंद्र लाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या मालेगावकर झाल्या. सासरी आल्यावर देखील त्यांच्या कुटुंबाने त्यांना करियर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

मालेगाव हे यंत्रमागधारकांचे शहर असल्याने येथील कापड उद्योगात डिझाईनिंगला नक्कीच वाव आहे, ही बाब लक्षात घेवून त्यांनी साडीवर डिझाईन करण्याचे ठरवले आणि सुरू झाला एका उद्योजिकेचा प्रवास! यासाठी त्यांनी विविध साड्यांवर पेंटिंग करायला सुरुवात केली. सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SMOI) द्वारा टेक्सटाईल मिनिस्टरी यांच्याकडे त्यांनी नोंदणी केली. यासह त्यांनी ग्रीक, आफ्रिकन, इजिप्तिशयन चित्रशैलींचा अभ्यास सुरू केला. या सर्व चित्रशैलीचा समावेश त्यांनी साडी पेंटिंग करताना केला. त्यातून आपल्या व्यवसायाचे वेगळेपण सिद्ध केले.

आज अर्पिता लाड पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, सोलापूर, नगर, जळगाव, गोवा, सातारा, बारामती यांसारख्या मोठ्या शहरात 'अर्पिता लाड एक्सप्रेसिंग आर्ट' या नावाने आर्ट गॅलरीमध्ये वैयक्तिक व ग्रुप शोजमध्ये प्रदर्शन भरवित आहेत. भारतीय सिल्क व त्यावरील चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने डिसेंबर २०१० मध्ये बंगळुरू येथे आयोजित केलेल्या फॅशन शोसाठी त्यांची निवड केली होती. आपल्या कलेच्या बळावर डिझाईन क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली असून या क्षेत्रात मालेगावचा स्वतःचा 'अर्पिता लाड एक्सप्रेसिंग आर्ट' हा ब्रेंड निर्माण केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणास मुहूर्त कधी?

$
0
0

बेंडकुळे मळा ते गुप्ता गार्डन रस्ता दुभाजकाविनाच

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेत सर्वाधिक पसंतीचा रोड म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका व स्थानिक नगरसेवक रस्ता रुंदीकरणासाठी झटत होते. यानंतर रस्ता रुंदीकरण करण्यात आले. मात्र त्यात काही ठिकाणी हे काम न झाल्याने तो रस्ता आजही रुंदीकरणाविनाच आहे. त्यामुळे या रुंदीकरणाला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न या परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

गंगापूररोड परिसरातील बेंडकुळे मळा ते गुप्ता गार्डनपर्यंतचा रस्त्याचे आजही रुंदीकरण झालेले आहे. त्याबरोबर हा रस्ता दुभाजक विनाच आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने नुकतीच या रस्त्यादरम्यानच पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी आरक्षित जागेत खोदकाम करत टाकली. यामुळे पाण्याच्या पाइपलाइनीसाठी जागा आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाला कधी, असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. रोजच शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या गंगापूररोडच्या उर्वरित रुंदीकरणाकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

महापालिकेने गंगापूररोड भागासाठी नव्याने मोठी पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. रुंदीकरणासाठी अनेक खासगी मालकांनी आजही गंगापूररोडच्या रुंदीकरणाला जागा दिलेली नाही. परंतु, नुकतेच पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी मात्र खासगी मालकांनी जागा दिल्याचे पहायला मिळाले. यामुळे पाण्याच्या लाइनीला जागा, रस्त्याच्या रुंदीकरणाला काहीच नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी उर्वरित गंगापूररोडचे रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वेगाने वाढलेल्या गंगापूररोड भागात घरकुले घेण्यासाठी अनेकांची पसंती असते. गंगापूररोड भागात २० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंत फ्लॅट बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध केलेली आहेत. अनेक मोठी शैक्षणिक संकुलेदेखील या भागात उभी राहिल्याने या भागास नवीन ओळख मिळाली आहे. मात्र अशा परिस्थितीत गंगापूररोडवरील रस्त्याचे रुंदीकरण व्हावे याकरीता स्थानिक नगरसेवक तसेच महापालिकेला मोठा संघर्ष करावा लागत आहे. अथक प्रयत्नानंतर रस्त्यात अडथळे ठरणारी वृक्ष महापालिकेने न्यायालयाकडे मागणी करत हटविली होती. परंतु, आजही काही ठिकाणी जागा खासगी मालकांनी दिल्या नसल्याने रस्ता रुंदीकरणापासून वंचित राहिला आहे.

कमानीचेही अतिक्रमणच?

गंगापूररोडवर नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या कमानीचेही रस्त्यात अतिक्रमण का, असा सवाल वाहनचालक उपस्थित करतात. रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर तत्काळ रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, असे मत गंगापूररोडवासियांनी केले आहे. बेंडकुळे मळा ते गुप्ता गार्डनपर्यंत रस्ता रुंदीकरण झाला नसल्याने सायंकाळी वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तसेच नेहमीच किरकोळ अपघात होत असल्याने हाणामारीचे प्रकारदेखील होत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. गुळवेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेतृत्व करणारे जिल्हा बँक संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. संदीप गुळवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. चार महिन्यापूर्वी त्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

पक्षप्रवेशाच्या वृत्ताला गुळवे यांनी दुजोरा दिला आहे. मुबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा संपर्क नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी गुळवे व समर्थक नेत्यांनी भेट घेतली. या भेटीप्रसंगी आमदार जयंत जाधव, आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्याशीही चर्चा झाली. नाशिक येथे शनिवार (दि. १०) होणाऱ्या कार्यक्रमात गुळवे व त्यांच्या समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'महिला-बालकल्याण'चा असहकार

$
0
0

मुंढेंच्या उपस्थितीची मागणी; निर्णय अंमलबजावणीसाठी आग्रही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त समितीच्या बैठकांना हजर राहत नाहीत, तोपर्यंत सभा न घेण्याचा निर्णय महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीने जाहीर केला आहे.

महिला व बालकल्याण समितीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचा तसेच प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप महिला व बालकल्याण विभाग समितीच्या संतप्त झालेल्या सदस्यांनी केला. तसेच प्रशासनालाच असहकार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेत महिला सदस्य विरुद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला आहे. ठरावाची अंमलबजावणी करा; अन्यथा समिती बरखास्त करा, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याची माहिती सभापती सरोज अहिरे यांनी दिली आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभेत महिला सदस्यांच्या ठरावावरून वादळी चर्चा झाली. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या कार्यकाळ पूर्ण होत आला असतानाही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. समितीने केलेले ठराव प्रशासनाने बासनात गुंडाळले आहेत. तपोवनात महिलांसाठी होस्टेल बांधण्याचा ठराव, सहा विभागीय कार्यात सॅनिटरी नॅपकिनचे व्हेडिंग मशीन बसवण्याचा,चार कोटींचे प्रशिक्षण शिबिर घेण्याच्या ठरावाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने समिती सदस्यांनी सभा थेट तहकूब केली. यापुढे आयुक्त मुंढेंनाच समितीला हजर राहण्याची विनंती केली जाणार आहे. परंतु त्यानंतरही आयुक्तांकडून प्रतिसाद न मिळाल्यास यापुढे सभाच न घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सभेला समिना मेमन, नयना गांगुर्डे, सत्यभामा गाडेकर, शीतल माळोदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा टाहो

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. या भागातील गावोगावच्या विहिरींनी कातळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी तहानलेल्या जनतेचा पाण्यासाठी आक्रोश सुरू झाला आहे. याच उत्तर पट्ट्यातील गोरखनगर (आंबेवाडी) येथील महिलांनी रिकाम्या हंड्यानिशी गावानजीकच्या जलकुंभाकडे आपला मोर्चा वळवून तासभर ठिय्या दिला.

तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील सोमठाणे, विसापूर, कुसूर आदी गावांना पाणीपुरवठा केला जाणारा जलकुंभ याच गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळस टेकडीवर आहे. मात्र गोरखनगरचा योजनेत समावेश नसल्याने योजनेतील पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. गोरखनगरवासियांना ग्रामपंचायतीच्या गावातील एका सार्वजनिक विहिरीतून आपली तहान भागवावी लागते. या योजनेतीतून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करत गावच्या महिलांनी बुधवारी आंदोलनात्मक पवित्रा घेतला.

रिकाम्या हंडयानिशी कोळस टेकडीवरील जलकुंभाकडे चाल करत याठिकाणी तब्बल एक तास ठिय्या दिला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, डॉ. सुधीर जाधव, अशोक बोराडे, निवृत्ती घुमरे, संजय वैद्य आदी उपस्थित होते. ग्रामसेवक मनीष भाबड यांनी येत्या आठ दिवसात १४ व्या वित्त आयोगातून गावानजीक असलेला ३८ गावे योजनेचा जलकुंभ ते गाव अशी एक किलोमीटरची जलवाहिनी टाकून गावाला पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकर्णींसाठी रविवारी ‘रायडिंग’ची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

काही वर्षांपासून महिला वर्गासाठी पर्वणी ठरणारी 'मटा' बाइक रॅली यंदा महिला दिनानिमित्त रविवारी (दि. ११ मार्च) होणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून यंदा या रॅलीस सुरुवात होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यास महिलांचा वाढता प्रतिसाद आहे. सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांना थेट किंवा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधत हा उपक्रम आयोजित केला जातो. नाशिकसह ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमध्येही हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या रॅलीसाठी 'ऑल वुमन्स पॉवर रॅली' असे घोषवाक्य आहे. दरवर्षी या रॅलीस महिला वर्गाचा प्रतिसाद वाढताच आहे. यंदाच्या बाइक रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रुपसह नावनोंदणीला विशेष प्रतिसाद मिळत आहे. मोपेडसह मोटारसायकल आणि बुलेट या वाहनांवर महिला या रॅलीत सहभागी होणार आहेत. कॉलेज विद्यार्थिनींसह विविध सोसायटींमधील ग्रुप, महिला मंडळे, महिलांची भिशी मंडळे, नोकरदार, गृहिणी, अधिकारी, उच्चशिक्षित आदी वर्गांतील महिला नावनोंदणीस प्रतिसाद देत आहेत.

विविध थिमसह ड्रेसअप

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विविध महिलांच्या ग्रुपने विविध थिम्ससह ड्रेसअप करण्यावर भर दिला आहे. गतवर्षी विविध सामाजिक संदेशांसह महिलांचे ग्रुप विविध संकल्पनांवर आधारीत ड्रेसअपसह रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये नऊवारी, फेटा, वेस्टर्न आऊटफिट आदी संकल्पनांनुसार ड्रेसअप केले होते.

ऑनलाइन नोंदवा नाव

या रॅलीत सहभाग नोंदविण्यासाठी www.allwomenpowerrally.com या वेबसाइटला भेट द्या. तेथे रजिस्ट्रेशन सेक्शनवर क्लिक करून नावनोंदणी करा. एसएमएसद्वारेही आपण नावनोंदणी करू शकता. यासाठी powerrallyNSK हा मेसेज टाइप करून तो ५८८८८ या क्रमांकावर पाठवा. अधिक माहितीसाठी (०२५३) ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधा.

एंट्री होणार टशनमध्ये

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाइक रॅलीमध्ये तुमची एंट्री टशनमध्येच असायला हवी. जेणेकरून आमच्या फोटोग्राफर्सचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल आणि ते तुम्हाला कॅमेराबद्ध करतील. तुमच्या पेहरावासाठी कुठलेही बंधन नाही. तुम्ही पारंपरिक वेशात किंवा मॉडर्न किंवा एखाद्या रफ-टफ लूकमध्ये या. पण तुमचा पेहराव इतरांपेक्षा हटके असायला हवा. यंदा सहभागी महिला व ग्रुपसाठी यावर्षीही खास स्पर्धा होणार आहेत. यात बेस्ट ड्रेस, बेस्ट हेल्मेट, बेस्ट बाइक सजावट, बेस्ट सामाजिक संदेश आणि ग्रुपसाठी बेस्ट ड्रेसकोड स्पर्धा होणार आहेत. विजेत्या महिला व ग्रुपसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सचिवासह साथीदाराला लाच घेताना अटक

$
0
0

लाच प्रकरणातील चौकशी अधिकारीच ठरला लाचखोर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता यांच्या तक्रारीवरून मंत्रालयातील सहाय्यक सचिव तथा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी प्रभाकर बाबूराव पवार व साथीदार प्रशांत गवळी याला २५ हजारांची लाच घेताना धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पाच वर्षांपूर्वी एका लाच प्रकरणात कारवाई झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्याचा खातेनिहाय चौकशी अहवाल तक्रारदारांच्या बाजूने सरकारकडे पाठविण्यासाठी पवारने ४० हजारांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती २५ हजारांची लाच स्वीकारताना ही कारवाई झाली, अशी माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गुरुवारी (दि. ८) सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या वेळी उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी ही माहिती दिली. यानुसार पाच वर्षांपूर्वी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत विनोद वाघ यांना लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, या प्रकरणात वाघ यांची प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, विभागीय आयुक्त नाशिक कार्यालय यांच्यामार्फत चौकशी सुरू होती. याठिकाणी मंत्रालयातील सहसचिव दर्जाचे अधिकारी प्रभाकर बाबूराव पवार यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. तेही चौकशी करीत होते. खातेनिहाय चौकशीचा अहवाल तक्रारदार वाघ यांच्या बाजूने पाठविण्यासाठी पवार यांनी अभियंता वाघ यांच्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये पवार यांचा साथीदार प्रशांत माळीला देण्याचे ठरले. त्याआधीच बुधवारी (दि. ७) अभियंता वाघ यांनी पवार यांची धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. पवार हे सहसचिव दर्जाचे अधिकारी असल्याने धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आवश्यक त्या परवानगीच्या सर्व पुर्तता करुन सापळा रचला. अखेर पवार यांच्या सांगण्यावरुन साथीदार प्रशांत माळीने २५ हजारांची लाच स्वीकारताच त्याला पकडले.

त्याचवेळी दुसरे एक पथक पवार यांच्या मागावर होते. त्या पथकाला आदेश मिळताच त्यांनी पवारला नाशिक येथून नंदुरबारला ठाणेपाडा येथे घरी जाताना पकडले. या दोघांना धुळे एसीबी कायालर्यात आणण्यात आले. याप्रकरणी पवारसह माळीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, निरीक्षक पवन देसले, हवालदार नरेंद्र कुळकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, कुष्ण्कांत वाडीले, सतीश जावरे, शरद काटके, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशवेकालीन श्रीरामरथाला बसविले नवीन चाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

चैत्र शुद्ध एकादशीला रामरथाची मिरवणूक काढण्यात येते. सुमारे २५० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू आहे. या मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या पेशव्यांच्या काळातील रामरथाचे एक चाक जीर्ण झाले होते. ते बदलून त्याच्या जागेवर आता दुसरे चाक बसविण्यात आले आहे. हे चाक सांगली येथील कारागिराकडून बनविण्यात आले आहे. ५०० किलो वजन असलेले हे चाक बनविण्यासाठी ७० हजार रुपये खर्च आला आहे.

नाशिकमधील श्रीराम जन्मोत्सवात रथोत्सव हा ग्रामोत्सव म्हणून ओळखला जातो. काळाराम मंदिरापासून श्रीराम आणि गरुड रथ काढण्यात येतो. नाड्यांच्या साह्याने हे रथ ओढण्याचा मान ठरलेला आहे. पेशव्यांच्या काळात श्रीमंत गोपीकाबाई पेशवे यांनी नवस पुर्ततेसाठी हा रामरथ तयार करून घेतला आणि तो श्रीरामचरणी अर्पण केला. त्याची व्यवस्था त्याकाळी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे सोपविली होती. त्यांच्या रास्ते आखाडा तालिम संघाला हा रथ ओढण्याचा आणि देखभाल करण्याचा मान दिला, तो आजतागायत सुरू आहे.

रामरथ बनविण्यासाठी सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. त्याची रचना आणि कलाकुसर अत्यंत सुंदर करण्यात आली आहे. शेकडो वर्षांपासून असलेली या चाकांपैकी रथाच्या डाव्या बाजूचे जीर्ण झालेले चाक बदलण्यात आले. या वर्षी उजव्या बाजूचे चाक बदलण्यात आले. सांगली येथील रफीकभाई मिस्तरी यांनी बाभळीच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग करून हे चाक बनविले आहे. त्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. डाव्या बाजूच्या चाकाची धाव उतरली होती, ती देखील नव्याने चढून घेण्यात आली आहे. चाकाला आलेला फुगीरपणा काढून दोन्ही चाके सारख्या आकाराची दिसतील अशा प्रकारे करण्यात आली आहे. तयार झालेले चाक नाशिकला आणल्यानंतर मिस्तरी यांनी बसविले. अविनाश दीक्षित यांच्या मंत्रघोषात रथोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे चाक बसविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाईन फेस्टिव्हलमध्ये यशोगाथांचे सादरीकरण

$
0
0

नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिकच्या वाईन फेस्टिव्हलमध्ये दि. ९ ते ११ मार्चदरम्यान त्र्यंबकरोडवरील ग्रेप काऊंन्टी रिसोर्ट येथे फार्मर्स मार्केट भरणार आहे. हा शेतकऱ्यांचा बाजारातच शेती संबंधित विषयावर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनावर तसेच त्यांच्या यशोगाथ्यावर निर्मित निवडक चित्रफित सायंकाळी ४ ते ६.३० दरम्यान दाखवण्यात येणार आहेत. या चित्रफितींचा विषय शेतकऱ्यांच्या दूरदृष्टी व मेहनतीने आलेल्या फळाबाबत असून, वाईन मेकिंग, शेळ्या व मेंढ्यापालन, कुक्कुटपालन,ऑरगॅनिक तंत्रज्ञान यावर आधारित या चित्रफिती असणार आहेत.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकरिता ग्रेप काऊंन्टी रिसोर्टतर्फे अशा प्रकारच्या फार्मर्स मार्केटचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे ग्राहकांना ताजा माल योग्य किमतीत मिळू शकतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त ऑरगॅनिक उत्पादक, आदिवासी गावातील उत्पादने, महिला बचत गटाची उत्पादने, दूध उत्पादकांचे दुग्धजन्य पदार्थ व नाशिकचे वाईन उत्पादक यात सहभागी होणार आहे. नाशिकच्या जवळील सुरगाणा, पेठ, हरसूल, वाडोळी, अंबोली या गावातील शेतकरी व आदिवासी यात सहभागी होणार आहेत. शेतीमालासोबतच फळे, नैसर्गिक उत्पादने, आदिवासी हस्तकला येथे उपलब्ध राहतील. दरम्यान, लोकसंगीताचे अनेक कार्यक्रमाचाही आनंद नाशिककरांना घेता येईल. सदर कार्यक्रमाला प्रवेश पूर्णत: मोफत असून, नाशिककरांनी यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकलांगांना अर्थार्जनाची 'विद्या'!

$
0
0


Ashwini.patil@timesgroup.com

tweet- @ashwinipatilMT

नाशिक : मानसिक विकलांग मुलगी म्हणजे पालकांवर ओझं अशी आपल्या समाजाची मानसिकता. या मानसिकतेचं ओझं गेली कित्येक वर्ष पालकांनी वाहिलं आहे. मात्र, मानसिक विकलांग मुलीही स्वत:ला सांभाळू शकतात, अर्थार्जन करू शकतात हे 'घरकुल परिवार' संस्थेच्या कामातून सिद्ध झालं. विद्या फडके यांच्या पुढाकारातून मानसिक विकलांग मुलींसाठी सुरू झालेली संस्था आज पालक आणि महिलांच्या जगण्याचा आधार बनली आहे. संस्थेने या महिलांना सक्षम करण्याचं काम केलं आहे.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या विद्या फडके लग्नानंतर नाशिकमध्ये आल्या. मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तींशी त्यांचा खरंतर कधी संपर्क आला नाही. मात्र, एका कार्यक्रमासाठी रजनी लिमये यांच्या प्रबोधिनी ट्रस्टमध्ये जाण्याचा योग आला. संस्थेचे काम, मानसिक विकलांग मुलांचे कलाकौशल्य पाहून त्यांना कुतुहल वाटले आणि तेव्हापासून प्रबोधिनी ट्रस्टमध्ये कार्यकर्ती म्हणून काम सुरू केले. गेली चाळीस वर्षे हे काम अखंड सुरू आहे.

१९७८ ते २०११ पर्यंत विद्याताईंनी प्रबोधिनी ट्रस्टच्या मुलांसाठी काम केले. रजनी लिमये यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. या शाळेत येणाऱ्या मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्याचे काम विद्याताईंनी केले. या मुलांना अर्थार्जनाचा मार्ग मिळावा यासाठीही प्रयत्न केले. अगदी फाइल्स बनविण्यापासून ते मुलांना नोकरी मिळवून देण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास विविध अनुभवांनी घडला आहे. प्रबोधिनी ट्रस्टमध्ये मुले यायची, शिक्षण घ्यायची, कलाकौशल्य विकसित करून घराला थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न करायची. पण या सगळ्यात मुलींचे आयुष्य स्थिरस्थावर व्हायला अधिक वेळ जात होता. किंबहुना पालकांना मुलींच्या भविष्याची चिंता अधिक सतावत होती. आपण नसलो तर या मुलींचं काय होणार, ही चिंता कायम पालकांच्या चेहऱ्यावर दिसून येत असे आणि या जाणीवेतूनच २००६ पासून 'घरकुल परिवार'ची सुरुवात झाली. मानसिक विकलांग मुलींसाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय विद्याताईंनी घेतला आणि त्याला कुटुंबातूनही पाठिंबा मिळाला. या मुलींच्या पालकांसाठी हा मोठा दिलासा होता. कारण त्यांच्या पश्चात मुलींना दुसरे घर मिळणार होते. या घरात त्यांच्या मुली सुरक्षित राहणार होत्या.

आज घरकुल परिवारच्या होस्टेलमध्ये ४८ महिला गुण्यागोविंदाने राहतात. १६ ते ६२ वयोगटांतील या महिला नाशिक, पुणे, चंद्रपूर, लातूर अशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून येथे आलेल्या आहेत. विद्याताई आणि त्यांचा स्टाफ या सगळ्यांची काळजी घेण्याचे काम करतो. विशेष म्हणजे या स्टाफमध्येही शिक्षिका, डॉक्टर, स्वयंपाकी ते होस्टेलची देखरेख करणाऱ्या सगळ्या महिलाच आहेत. मानसिक विकलांग असलेल्या व्यक्तींचा सांभाळ करणे ही संयमाची कसोटीच असते. पण, विद्याताई आणि त्यांचा स्टाफ ही कसोटी पूर्ण करतात. वयात येणाऱ्या मुलींच्या वागण्यात होणारा बदल, त्यांची चीडचीड या सगळ्यात त्यांना समजून घेण्याचे काम विद्याताई करतात. घरकुल परिवाराने या महिलांना फक्त आश्रय दिला असे नाही तर त्यांना सक्षम होण्याची संधी दिली आहे. कारण घरकुल परिवारातील या मुली पापड, वाळवणाचं साहित्य तयार करण्यापासून पेन तयार करणं, राख्या, आकाशकंदील, गुढी, बुकेदेखील तयार करण्याचं काम करतात. त्यांनी तयार केलेल्या या वस्तू शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचतात. वारली पेंटिंगमध्येही या मुली पारंगत झाल्या आहेत. त्यांच्यातील हे कलाकौशल्य विकसित झाल्याने त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपली मुलगी कष्ट करून स्वत:साठी जगते आहे हे पाहून पालकांनाही समाधान मिळत असल्याची भावना विद्याताई व्यक्त करतात.

संस्थेतील मुलींना कामात व्यग्र ठेवणे, सण, वाढदिवस साजरे करणे, बाहेर फिरायला नेणे, त्यांना म्युझिक थेरपी, योगा थेरपी देणे हे सगळे उपक्रम दर महिन्याला होतात. येथील सर्व महिला, मुली संस्थेत आलेल्या व्यक्तीशी आपुलकीने बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आपल्यालाही त्यांच्याच सामावून घेतो.

त्यांना समाजात सामावून घ्या

आपले अपत्य मानसिक विकलांग आहे, हे सत्य स्वीकारताना पालकांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, आपले अपत्य इतर मुलांसारखे बोलू शकत नाही, समाजात वावरू शकत नाही अशी भावना पालकांनी ठेवू नये, असे विद्याताई सांगतात. एक व्यक्ती म्हणून या मुलींकडे बघा, त्यांना विकसित होण्याची संधी द्या. ही संधीच त्यांना सक्षम बनवेल असेही त्या सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारीशक्तीचा गौरव

$
0
0

टीम मटा

जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलांसाठी आरोग्य शिबिर, उल्लेखनीय कार्य महिलांचा गौरव, प्रबोधनात्मक कार्यक्रम असे विवध उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आला.

रविवारी रन फॉर युनिटी

मालेगाव : नाशिक ग्रामीण पोलिस व येथील शांतता समितीच्या वतीने रविवारी 'रन फॉर युनिटी' या मालेगाव मॅरेथॉन २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गुरुवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता महिला सुरक्षितता व आरोग्य विषयावर जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी

मार्गदर्शन केले. शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आदी क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांचा संजय दराडे यांच्या हस्ते विशेष गौरव केला. यावेळी शहराच्या एकात्मतेवर आधारित लघूपट दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, डॉ. शशिकांत वाव्हळ उपस्थित होते. यावेळी मालेगाव मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

कायद्याविषयी मार्गदर्शन

मालेगाव : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्यातर्फे विधीतज्ञ कल्पना जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार, उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, पी. ए. अहिरे, रघुनाथ शेलार उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी हुंडाबंदी, गर्भपात, गर्भलिंग चाचणी, तलाक अशा महिलांविषयीच्या विविध कायद्याविषयी समग्र माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. महापालिकेतर्फे महिला स्वच्छता कर्मचारी, बचत गट महिला तसेच शहरातील गरीब महिलांसाठी येथील वाडिया रुग्णालयात सकाळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शाह विद्यालयात मुलींना सुरक्षितता, आरोग्याची काळजी, करियर या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. उज्ज्वल शाळेत पथनाट्य सादर करण्यात आले.

पिंपळगावमध्ये स्त्री शक्तीचा सन्मान

निफाड : आयुष्य खूप सुंदर आहे. महिलांसारखे सुंदर शरीर कुणाकडेही नाही. त्यामुळे शरीराच्या काळजीसह महिलांनी स्वतःवर प्रेम करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता गौरी सावंत यांनी केले. पिंपळगाव बसवंत येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील शगून मंगल कार्यालयात महिला आधार संस्था व नॅशनल अॅग्रो फार्मर्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने 'सन्मान स्त्री शक्तीचा' या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., चंदूलाल शहा, निफाडचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठी, सरपंच अलका बनकर आदी उपस्थित होते.

गौरी सावंत यांनी विद्यार्थ्यांना लैंगीक शिक्षणासह तृतीय पंथी म्हणजे काय हे देखील माहिती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

गौरी सावंत, पत्रकार दीप्ती राऊत, ऑलिम्पिकपटू अश्विनी देवरे, कुस्तीपटू वैष्णवी पावले, गंगुबाई शेवरे, कल्पना शंकपाळ, वंदना लाड, अनुराधा साळुंके, तेजस्विनी म्हस्के, इंदूबाई डावखर, नंदा परदेशी, अलका गांगुर्डे, मधुबाला संसारे, हाजी शेख दिलशादबी शमशोद्दीन, चंद्रकला कावळे, माधुरी फसाळे, सीमा जाधव, सुमन शेला आदींचा सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ महिलांचा सत्कार

कळवण : देवळा येथे लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा माधुरी मेतकर, आशापुरी पतसंस्थेच्या अध्यक्षा कोमल कोठावदे, नंदा शेवाळकर, रजनी दशपुते, नेहा मेतकर, सुवर्णा नेरकर, मीना मेतकर, चेतना मेतकर, सुनंदा मेतकर, कल्पना येवला, सुमन कोठावदे, सुवर्णा कोठावदे, रोहिणी शेवाळकर, स्नेहा शेवाळकर, सुनंदा येवला उपस्थित होते.

मनमाडला महिलांचा गौरव

मनमाड : येथील केंद्रीय रेल्वे इंजीनिअरिंग कारखान्यात सेंट्रल रेलवे मजदूर संघ, ऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्प्लो असोशियशन, ऑल इंडिया ओबीसी असोशिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने महिलांचा गौरव करण्यात आला. मनमाड रेल्वे चिकित्सा विभागाच्या डॉ. श्रावणी, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, जि. प. सदस्य अश्विनी आहेर, माजी आमदार जगनाथ धात्रक, पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील, प्रबंधक बी. के. साहू उपस्थित होते. महिला कामगारांना संघटनांच्या वतीने महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा प्रबोधिनी की केशकर्तनालय?

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या एकलव्य आदिवासी क्रीडा प्रबोधिनीवर कोट्यवधी रुपये उधळले जात असताना, प्रत्यक्षात आदिवासी मुलांना कोणत्याही सोयीसुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताची मान उंचावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंच्या हाती आदिवासी विभागाने पदकापूर्वीच कैची आणि कंगवा सोपवल्याने नवोदित खेळाडूंचे भविष्य टांगणीला लागले आहे. प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंचे केस कापण्यासाठीची सुविधाच मिळत नसल्याने येथील खेळाडूंवर स्वत:चे केस कापण्याची वेळ आली आहे. क्रीडा प्रबोधिनीतील मुले चक्क एकमेकांचे केस कापून आपल्या शरीराची स्वच्छता करीत असल्याचे दुर्दैवी अन् धक्कादायक चित्र या प्रबोधिनीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे विभागाकडूनच सुरू असलेली 'एकलव्यां'ची परवड भयावह असून, कोट्यवधी रुपये जातात कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्याच्या आदिवासी विकास विभागातर्फे नाशिकमध्ये शिक्षण विभागाच्या जागेवर व क्रीडांगणावरच आदिवासी क्रीडा प्रबोधिनी २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे. इगतपुरी येथे ही प्रबोधिनी मंजूर असली तरी तिचा वाद सुरू असल्याने तूर्तास नाशिकमध्ये भाडेतत्त्वावरील जागेवर ही प्रबोधिनी सुरू आहे. येथे राज्यभरातील आश्रमशाळांमधील खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण आणि शिक्षण सोबत दिले जात आहे; परंतु या प्रबोधिनीत आलेल्या खेळाडूंना सुविधाच मिळत नसल्याचे चित्र आहे. खेळाडूंना आवश्यक क्रीडा साहित्य, ट्रॅकसूट, बुटांचीही वानवा आहे.

भारताचे नाव उंचावण्यासाठी येथे खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या खेळाडूंवर मात्र विभागाने पश्चात्तापाची वेळ आणली आहे. क्रीडा साहित्य तर दूरच, या खेळाडूंवर एकदुसऱ्याचे केस कापण्याची वेळ आदिवासी विभागाने आणली आहे. आदिवासी विभागातर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी प्रतिखेळाडू देण्यात आलेले १० हजारांचे अनुदानही दिले नसल्याने खेळांडूच्या हाती पदकापूर्वीच कंगवा आणि कैची आली आहे. विभागाकडून खेळाडूंच्या दैनंदिन गरजाही पूर्ण केल्या जात नसल्याने आमची विभागाने फसवणूक केल्याची भावना खेळाडू व्यक्त करीत आहेत. त्यामुळे क्रीडा प्रबोधिनी की केशकर्तनालय, अशा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खेलो इंडिया की 'भोगो इंडिया'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात भारताची कामगिरी उंचावी, यासाठी 'खेलो इंडिया'चा नारा दिला आहे; परंतु आदिवासी विभागाकडूनच या 'खेलो इंडिया'च्या घोषणेला हरताळ फासले जात आहे. विशेष म्हणजे आदिवासी विभागांकडून ठेकेदारांना सुविधा देण्यासाठी कोट्यवधीची उधळण केली जाते; परंतु हा पैसा खेळाडूंपर्यंत पोहोचतच नसल्याने त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ आली असून, 'खेलो इंडिया' नव्हे, 'भोगो इंडिया' अशी अवस्था आमच्यावर विभागाने आणल्याची टीका हे खेळाडू करीत आहेत.

आवश्यक सुविधा मिळत नसल्याने आमच्यावर आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. आमच्या डोक्यावरचे केससुद्धा आम्हालाच एकमेकांकडून कापून घ्यावे लागत आहे, अशी विदारक परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे.

- एक विद्यार्थी

सुविधा मिळत नसल्याबद्दल खेळाडूंनी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, शुक्रवारी आदिवासी क्रीडा समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात सुविधांसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.

- रामचंद्र कुलकर्णी, आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीचे पंच मोकाटच!

$
0
0

बलात्कारप्रकरणी संशयित ताब्यात; प्रशासकीय यंत्रणा गंभीर नाही

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील भोकरपाडा (राजेवाडी) येथील अल्पवयीन बलात्कार प्रकरणी संशयित दिनकर शिवा येले यास पोलिसांनी ताब्यात घेत गुरुवारी नाशिक येथील न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात आले. जातपंचायतीचा आधार घेत पाच एकर जमिनीच्या बदल्यात अल्पवयीन मुलीच्या आयुष्याचा सौदा करणारे हे प्रकरण संबंधित यंत्रणेने अजूनही अपेक्षित अशा गांभिर्याने घेतलेले दिसून येत नाही.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो, त्यानंतर तिच्या आईवडिलांना जात पंचायतीत बोलावून करारनामा केला जातो. पाच एकर जमीन साठेखताने दिली जाते, नंतर वाद निर्माण करून पीडितेच्या कुटुंबास जातीतून वाळीत टाकले जाते. हा सर्व घटनाक्रम अत्यंत गंभीर आहे मात्र त्याचे गांभिर्य अद्याप शासन यंत्रणा अथवा लाकप्रतिनिधींना आलेले नाही. या प्रकरणी त्र्यंबक पोलिस ठाण्यात केवळ बलात्काराची कलमे लावून संशयित आरोपीस अटक झाली. परंतु, या प्रकरणाचे साक्षीदार खुलेआम तडजोडी करीत फिरत आहेत. संशयिताचे वडील हे माजी उपसरपंच आहेत. आरोपीने आपण बळजबरी केली असे स्टॅम्पपेपरवर नोटरी करून लिहून दिले आहे. सोबत दोन्ही कुटुंबांचा आप समजूत करारनामा आणि पाच एकर जमिनीचे साठेखत असे तीन नोटरी केलेले स्वतंत्र स्टँम्पपेपर असून त्यावर पंचांनी सह्या केलेल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतेक स्वाक्षऱ्या इंग्रजीत आहेत.

भोकरपाडा (राजेवाडी) येथे बहिष्कृत केलेल्या घरास भेट दिली असता कौलारू झोपडीवजा घराबाहेर एक वृद्ध बसलेले होते. पीडित मुलगी आणि तिचे आई-वडील पोलिस ठाण्यातून घरी परतल्याने शेतात लपून बसलेली भेदरलेली त्यांची मुले-मुली परतली. आजूबाजूच्या घराच्या ओसरीवर महिला पुरूष होते; मात्र कोणीही त्यांच्याशी बोलले नाही. 'अशा प्रकारे कोणाला वाळीत टाकतात का?' असा प्रश्न परिसरातील एका व्यक्तीला केला असता त्याने होय असे उत्तर दिले. त्यात त्याला काहीही वावगे वाटले नाही.

बहिष्कृत कुटुंबाला न्याय मिळेल का?

आपल्याला वाळीत टाकणाऱ्यांना शिक्षा होणार नाही का? असा प्रश्न या कुटुंबाने उपस्थित केला आहे. पीडितेने सातवीत असताना शिक्षण सोडले आहे. तिला एक-दोन वर्षांनी मोठी बहीण आणि दोन लहान बहिणी व एक भाऊ आहे. घडलेल्या घटनेचा पीडितेसह तिच्या कुटुंबावर परिणाम झाला आहे. पीडितेचे वडील २७ व्यक्तींच्या नावांची यादी घेऊन फिरत आहे; मात्र त्यांना दाद मिळालेली नाही.

जातीच्या पंचांनाही सहआरोपी करावे

पीडितेच्या कुटुंबास बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या पंचांनाही सहआरोपी करावे, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. त्यांनी त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे यांची भेट घेतली. जातपंचायतीस मुठमाती देण्याची गरज असताना झालेले गैरकृत्य झाकण्यासाठी अशा प्रकारे पीडितेच्या कुटुंबास वाळीत टाकण्याची घटना निंदनीय असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.

न्यायासाठी उपाशीपोटी खेटा

जागतिक महिला दिन गुरूवारी सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना एक महिला, तिच्या लेकीच्या आणि कुटुंबावर झालेल्या अन्यायासाठी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालय आणि पोलिस ठाण्याच्या आवारात उपाशीपोटी बसलेली होती. मात्र, त्यांच्याकडे बघायलाही कोणाकडे वेळ नसल्याचे विदारक दृश्य दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुविधा भरपूर, वापरणाऱ्यांची कमतरता!

$
0
0


arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : नाशिक शहर पोलिसांनी जवळपास २३ वेगवेगळ्या सुविधा www.mhpolice.maharashtra.gov.in या सिटिझन पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात अशा सुविधा पुरविणारी फक्त सहा कार्यालये असून, त्यात नाशिक ग्रामीण तसेच शहर पोलिसांचा समावेश होतो. अपेक्षापेक्षा जास्त सुविधा ऑनलाइन असल्या तरी त्यांचा वापर करणाऱ्यांची संख्या अत्यल्पच आहे. वापरकर्त्यांची संख्या वाढल्यानंतरच खऱ्या अर्थाने या सुविधा उपयोगी पडू शकतात.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात www.mhpolice.maharashtra.gov.in या सिटिझन पोर्टलचा शुभारंभ झाला. यात दाखल गुन्ह्यांची माहिती (एफआयआर), अटक झालेल्या व्यक्ती, हरवलेले लोक, अनोळखी मृतदेहांची माहिती, फरार आरोपींची माहिती, विविध अॅप्लिकेशन फॉर्म, गुन्ह्यांची आकडेवारी, मोबाइल चोरी, नोंदणी केलेल्या व्यक्तींना ई-तक्रार देण्याची सुविधा, ई-तक्रारीची सद्य:स्थिती, भाडेकरूची माहिती देणे, चरित्र प्रमाणपत्राचे आवेदन अशा सुविधा यात पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो. एखादी तक्रार नोंदविण्यासाठी थेट पोलिस स्टेशनला चकरा मारणाऱ्यांची संख्या यामुळे कमी होऊ शकते. मात्र, याबाबत जनजागृती खूपच कमी असून, आजही नागरिक प्रत्यक्ष पोलिस स्टेशन अथवा संबंधीत विभागात जाण्यास प्राधान्य देतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षी जवळपास ४०० नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने लाउडस्पीकरची मंजुरी घेतली. ७०० नागरिकांनी चरित्र पडताळणीचे काम याद्वारे केले. मागील वर्षातच शहर पोलिसांनी एम-पासपोर्ट हे अॅप्लिकेशनदेखील सुरू केले. याद्वारे अर्जदारास पोलिस स्टेशन अथवा संबंधीत विभागात चकरा माराव्या लागत नाहीत. यासाठी संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यांना टॅब्लेट्स पुरवण्यात आले आहेत. ई-तक्रारीची सेवा सुरू झाल्यापासून पोलिसांकडे १६७ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ई-तक्रारी आल्यानंतर पोलिस सर्वप्रथम तक्रारींची चौकशी करतात. यात तथ्य आढळून आल्यास पुढे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येऊ शकते. १६७ पैकी जवळपास ५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ५७ तक्रारींची चौकशी सुरू आहे. यातील दोन तक्रारींमध्ये आढळून आलेल्या तथ्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पाच तक्रारी इतर ठिकाणच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, वेबपोर्टलवरील सुविधा खरोखर नागरिकांचा त्रास वाचवू शकतात. पण अनेकदा समोरासमोर काम केल्याचे समाधान नागरिक शोधत असतात. किंवा तांत्रिक अडचणींमुळेही नागरिक अशा सुविधांकडे पाठ फिरवतात.

जनजागृतीचा अभाव

पोलिसांनी उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाइन सेवांबाबत जनजागृती नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यास प्रतिसाद नाही. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जनजागृतीची मोठी मोहीम ऑनलाइन आणि सोशल मीडियात राबविण्याची गरज आहे. पोलिस स्टेशनमध्येही यासंबंधीची जाहिरात करणे आवश्यक आहे. पोलिस स्टेशन स्तरावर जनजागृती कार्यशाळा घेतल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी ऑनलाइन सेवांचा प्रचार-प्रसार करण्याची गरज नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्त चौकातील ५० शेड जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत गुरुवारी दत्त चौकातील मटण मार्केट परिसरात असलेल्या दुकानांलगत असलेल्या ५० शेडचे अतिक्रमण काढण्यात आले. सध्या महानगरपालिकेकडून ऑनलाइन येणाऱ्या तक्रारींबरोबरच इतरही अतिक्रमणे काढण्याची तयारी सुरू आहे.

सिडको परिसरात मागील आठवड्यापासून अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर या परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर सिडकोतील कामटवाडे शिवारातीलही पक्के ओटे काढण्यात आले. दत्तचौकातील भाजी मार्केट व मटण मार्केटचे अतिक्रमण काढण्यास पथकाने सुरुवात केली. या ठिकाणी विक्रेत्यांनी दुकानांबरोबरच दुकानांच्या समोरही पत्र्याचे शेड किंवा टपऱ्या उभ्या करून व्यवसाय सुरू केले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या अतिक्रमणावर पालिकेने हातोडा घातला. दत्तचौक हा भाग अत्यंत गजबजलेला असून याठिकाणी असलेल्या मटण दुकानांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. गुरुवारी सुमारे पन्नास दुकानांसमोरील शेड पालिकेने तोडले. येथे काही प्रमाणात विरोध झाला, मात्र त्याला न जुमानता संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आल्याने दत्तचौक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.

पक्के बांधकाम काढण्याची चर्चा

पालिकेकडून लवकरच सिडकोतील पक्के अतिक्रमणसुद्धा पाडण्यात येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सिडको कार्यालयात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पूर्वी नागरिकांना हव्या तशा बांधकाम परवानग्या दिल्याने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. सध्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढले जात असले तरी लवकरच गल्लीबोळांमधील पक्की बांधकामेसुद्धा पाडण्यात येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील वटार येथील दोन बालकांचा पाझर तलावात बुडून करुण अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. वटार येथील कविता सुरेश सोनवणे(वय १४) व दत्तू छोटू पवार (१२) ही मुले सकाळी विंचुरे शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. विंचुरे पाझर तलावात दुपारी अडीचच्या सुमारास ते शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले असता दत्तूचा पाय घसल्याने तो पाझर तलावात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कविता दत्तूसह बुडाली. दोन्ही मुलांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार अधिकाऱ्यांवर दोषारोप सिद्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून प्रशासकीय शिस्तीबरोबरच भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ११ फायली मुंढे यांनी बाहेर काढल्या असून, पहिल्या टप्प्यात चार बड्या अधिकाऱ्यांची विकेट पाडण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन, निलंबित उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील, निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार आणि मायको हॉस्पिटलचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यावर ठेवलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत तथ्य आढळून आले असून, त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे या चारही अधिकाऱ्यांना शेवटची संधी म्हणून खुलासा करण्यासाठी दहा दिवसांची अंतिम नोटीस पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध चौकशांच्या फाइल्सना गती दिली असून, ही चौकशी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे अहवाल आता हळूहळू बाहेर येत आहेत. निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत या चौकशा केल्या गेल्या असल्या, तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे मुंढे यांनी प्रशासकीय फेरबदल करीत, या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. प्रशासनातील अनागोंदीला शिस्तीचे वळण लावण्यासाठी त्यांनी बड्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनाच रडारवर घेतले आहे. चौकशी सुरू असलेल्या ११ पैकी ४ प्रकरणाच्या फायली आयुक्तांनी क्लिअर केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांच्यावर रुग्णालय व हॉटेलांसंदर्भातील ना-हरकत दाखल्याचे शासकीय परिपत्रक दडवून ठेवत, नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप होता. त्यासंदर्भात त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. महापालिकेने केलेल्या चौकशीत महाजन हे दोषी आढळून आले आहेत. तर निलंबित उद्यान निरीक्षक जी. बी. पाटील यांच्यावर उद्यान विभागात कोटेशन घोटाळा केल्याचा आरोप आहे. पाटील यांनी या घोटाळ्याशी संबंधित उद्यान विभागातील ४५६ संचिका गायब केल्याचा आरोप आहे. चौकशीत पाटील यांच्यावरील पाचपैकी तीन आरोप सिद्ध झाले आहेत. तर यांत्रिकी विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्यावर खतप्रकल्पात ६७ कोटींच्या यंत्रखरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या चौकशीत पवार दोषी आढळून आले आहेत. तर निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी हे मायको दवाखान्यात कार्यरत असताना एका महिलेची रिक्षातच प्रसूती झालेली होती. त्यावेळी डॉ. कोकणी हे विनापरवानगी चार दिवस गैरहजर असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यासंदर्भात झालेल्या चौकशीत डॉ. कोकणीही दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह या चार अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आले असून, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी दहा दिवसांच्या अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दहा दिवसांत या अधिकाऱ्यांनी योग्य खुलासा केला नाही, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्यासह वेतन रोखण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात या कारवाईने खळबळ उडाली आहे.

अधिकारी निरुत्तर

आपल्या भ्रष्टाचार प्रकरणाची फाइल बाहेर निघाल्याची कुणकुण लागताच, यातील काही अधिकाऱ्यांनी मुंढे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. जनता दरबारात जाऊन यातील काहींनी आयुक्तांची भेट घेऊन असे काही घडलेच नाही, अशी भूमिका घेतली. परंतु, मुंढे यांनी त्यांची बाजू ऐकून न घेता, काय खुलासा करायचा तो नोटिशीत करा, असे सांगून त्यांना जाण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर आता कारवाई अटळ मानली जात आहे.

पालिकेतल्या चार अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या आरोपांवरील चौकशीत त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नियमानुसार दहा दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

- तुकाराम मुंढे, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार सुविधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर परिसरात बससेवांची कमतरता असल्याने ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा पायपीट करीत जावे लागते. उन्हाळ्याच्या तोंडावर गैरसोय टाळण्यासाठी ज्येष्ठांना माफक दरात नॅनो कारची सुविधा शिवसेनेच्या युवा सेनेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक २३ व ३० मध्ये भगव्या रंगाच्या १० नॅनो कार उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे युवा सेनेच्या ऋषिकेश वर्मा यांनी सांगितले.

इंदिरानगर परिसरात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना इंदिरानगर परिसरात कोणत्याही कामासाठी पायीच प्रवास करावा लागतो. यात अनेकदा चोरट्यांकडून या ज्येष्ठांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे या ज्येष्ठांच्या सेवेसाठी शिवसेनेतर्फे नॅनो कार उपक्रम हाती घेतला आहे. पक्षाचे संपर्क प्रमुख अजय चौधरी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी केली जात असून येत्या १५ दिवसांत ही सेवा सुरू केली जाणार आहे. या भागाची लोकसंख्या सुमारे लाखभर आहे. त्यामुळे या उपक्रमांचा अनेकांना लाभ होईल, असा विश्वास वर्मा यांनी व्यक्त केला आहे.

असा घेता येणार लाभ

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रभाग २३ व ३० मधील ज्येष्ठांना मासिक दीडशे रुपये भरून या उपक्रमाचे सभासद होता येणार आहे. नोंदणीकृत सभासदांना या दोन्ही प्रभागात कारमधून फिरण्याची संधी मिळणार आहे. सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कार उपलब्ध होतील. गाडीत सीसीटिव्ही कॅमेरेही असतील. प्रत्येक गाडीच्या चालकासाठी त्याचा विभाग निश्चित करून देण्यात येणार आहे. त्या त्या विभागातील चालकांशी थेट संपर्क साधून गाडी उपलब्ध होऊ शकेल. तसेच रुग्णावाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images