Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आरक्षणाचा लाभ प्रत्येकाला

0
0

स्व:जागृती मेळाव्यात डॉ. जितेंद्र ठाकूर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

अनुसूचित ठाकूर जमातीस कायदेशीर व सनदशीर मार्गाने घटनेने दिलेले अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. आरक्षणाचे लाभ शेवटच्या ठाकूरंपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात मंडळ कार्यरत राहील, असे प्रतिपादन राज्याध्यक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी केले.

महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने विश्वास लॉन्स येथे आयोजित अनुसूचित ठाकूर जमात कर्मचारी स्व:जागृती प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभीस छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी जननायक बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर, अॅड. महेश देशमुख, अॅड. रामचंद्र मेंहदाळकर, आयुक्त विलास ठाकूर, बंडू पवार, रणजित शिंदे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

या वेळी ‘जीवनसाथी’ या वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र ठाकूर जमात मंडळ संघटनात्मक, प्रशासकीय, न्यायालयीन पातळीवर तपासणी समितींच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीच्या विरोधात सतत संघर्ष करीत असल्याचे रणजित शिंदे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. विश्वास ठाकूर यांनी सामाजिक हक्क अधिकारासाठी एकसंघ व्हा व कायदेशीर संघर्ष करण्याचे आवाहन केले. तर बंडू पवार यांनी आदिवासी विकास विभाग व तपासणी समित्यांकडून होणारी नियमबाह्य पिळवणूकीबाबत अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले.

शंकांचे समाधानकारक निवारण

अॅड. महेश देशमुख यांनी अनुसूचित ठाकुरांची घटनात्मक बाजू भक्कम असून, कायदेशीर मार्गाने न्याय मिळण्यास सर्वोतोपरी तत्पर राहू, असे सांगत प्रश्नांची उत्तरे दिली. तर मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. रामचंद्र मेहंदाळकर यांनी पडताळण्या समित्यांचे ठाकुरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे सर्व प्रयत्न कायद्याच्या कसोटीवर मोडून काढू, असे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णय व नियमानुसार प्रकरण पडताळणीस देणाऱ्या समाजबांधवांच्या सेवेला धोका नसला तरी ठाकूर आपण सावध राहिले पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले. ठाकूर कर्मचारी बांधवांचे सुमारे २५० प्रश्न लेखी स्वरूपात प्राप्त झाले होते. त्या सर्वांची समाधानकारक उत्तरे मान्यवर विधितज्ज्ञांनी दिली. मेळाव्यास धुळे जिल्हाध्यक्ष के. टी. ठाकूर, मालेगाव अध्यक्ष बापू वाघ, चंद्रकांत महाले, सतीष ठाकूर, मदन महाले, संजय नेमाडे उपस्थित होते. या वेळी गुणवंत कर्मचारी कैलास सूर्यवंशी, आदर्श शिक्षक नीलेश ठाकूर, कैलास वाघोदकर, संजय सूर्यवंशी, अलका चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास ठाकूर, संतोष ठाकूर, हेमंत साळुंखे, पंकज पवार, राजेंद्र ठाकूर, योगेश भामरे, कन्हैयालाल ठाकूर, प्रकाश चव्हाण, दीपक सूर्यवंशी, विजय अहिरे, ललित भामरे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेस्टेशनचे रूप पालटणार

0
0

स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट; रँकिंग सुधारण्यासाठी उपाययोजना

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकात स्वच्छता कर्मचारी संख्या दुप्पट करण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यापर्यंत ३४ स्वच्छता कर्मचारी होते. आता ही संख्या ६५ करण्यात आली आहे. यात महिलांचे प्रमाण लक्षणीय असून, विशेष म्हणजे स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने तीन वर्षांसाठी हा स्वच्छतेचा ठेका घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वेस्थानक स्वच्छता रँकिंग सुधारून लवकरच स्टेशनचे रूपडे पालटणार आहे.

स्थानक प्रमुख एम. बी. सक्सेना आणि वाणिज्य विभागप्रमुख आर. एस. गोसावी यांनीही याला दुजोरा दिला आहे. नाशिकरोड स्थानकाचा स्वच्छतेबाबत देशात सलग दोनवेळा पहिल्या दहामध्ये क्रमांक होता. गेल्या वर्षीपासून हा क्रमांक १६९ वर गेला. तो पुन्हा पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी प्रशासनाने मरगळ झटकली आहे. त्यासाठी अगोदरच्या ३४ स्वच्छता कर्मचारींपैकी कंत्राटी २६ आणि रेल्वेचे ८ कर्मचारी होते. रेल्वेच्या आठ कर्मचाऱ्यांना अन्य विभागात सामावून घेण्यात आले आहे. आता सर्व कंत्राटी स्वच्छता कर्मचारी असून, त्यांची संख्या ६५ झाली आहे. कंत्राट जाण्याची भीती असल्याने हे कर्मचारी मनापासून सेवा देतात. त्यांना केसरी रंगाची जाकेट देण्यात आली आहेत.

स्वच्छता परिसर वाढविला

स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ३ यांचीच जबाबदारी होती. तसेच विश्रामकक्ष, पार्सल विभाग, कार्यालये, स्थानका बाहेरचा परिसर, दोन पादचारी पूल, तीन रेल्वे ट्रॅकवरील कचरा गोळा करण्याचे कामही त्यांच्याकडे होते. आता कर्मचारी संख्या वाढवल्याने जबाबदारीही वाढली आहे. प्लॅट क्रमांक चार, सिन्नर फाटा परिसर, नवीन मोठा पादचारी पूल, मालधक्का, देवी चौक नाला परिसर, रेल्वे सुरक्षा दलामागील वाहनतळ, पार्सल ऑफिसमागील जागा, रेल्वे केबीन यांची नव्याने भर पडली आहे. अशाप्रकारे स्वच्छता परिसर वाढविण्यात आला आहे. या स्थानकातून दररोज १६ हजार प्रवासी प्रवास करतात. स्थानकाला दररोज १४ लाखांपर्यंत महसूल मिळतो. त्यांच्या तुलनेत स्वच्छता कर्मचारी संख्या वाढविणे आवश्यकच होते, असे मुकादम गोपाळ पथरोड यांनी सांगितले.

स्वच्छतेच्या कामाची आखणी...

तीन शिफ्टमध्ये हे ६५ कर्मचारी काम करतात

पहिल्या शिफ्टमध्ये......................१ सुपरवायर व ३१ कर्मचारी

दुसऱ्या शिफ्टला.........................१ सुपरवायझर व २५ कर्मचारी

रात्रपाळी....................................९ कर्मचारी

सफाई मशिन............................८

फरशी स्वच्छता, स्लीपर, स्कब्रर...........प्रत्येकी २

व्हॅक्यूम क्लिनर..................................१

पहिली शिफ्ट................................सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत

दुसरी शिफ्ट................................दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत

तिसरी शिफ्ट................................रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत

पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी मेहनत

काही महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते रेल्वेस्थानक स्वच्छतेचा थर्ड पार्टी ऑडीट रिपोर्ट प्रकाशित झाला. या अहवालात 'ए' वन गटात आंध्रचे विशाखापट्टणम देशातील सर्वात स्वच्छ स्थानक ठरले. तर 'अ' गटात पंजाबच्या बिआसला प्रथम आणि खम्मामला दुसरा क्रमांक मिळाला. गेल्यावेळी खम्माम २८५ व्या स्थानी होते. ओव्हरऑलमध्ये पहिल्या दहात महाराष्ट्रातील फक्त अहमदनगर स्थानकाचा (चौथा) समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून पहिल्या दहांमध्ये असणारे नाशिकरोड स्थानक ६६७ गुणांसह १६९ व्या स्थानी फेकले गेले. खम्मामप्रमाणे नाशिकरोड पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी मेहनत करूरीत असून, त्यासाठी कामाला लागले आहे.

स्वच्छता वादाचा मुद्दा

नाशिकरोड स्थानकातील स्वच्छतेची जबाबदारी रेल्वेची आहे. मात्र, रेल्वे व बसस्थानक परिसरातील जबाबदारी महापालिकेची आहे, असे रेल्वेचे म्हणणे आहे. स्वातंत्र्य दिन, स्वच्छता अभियान व अन्य महत्त्वाच्या प्रसंगीच रेल्वेस्थानकाबाहेरची समाजसेवी संघटनांच्या मदतीने स्वच्छता केली जाते. भिकारी, भटके, छोटे, मोठे व्यावसायिक, खासगी वाहनांचे चालक आदी पुन्हा घाण करतात. अस्वच्छता करण्यास मनाई आहे, कारवाई केली जाईल, असे लिहूनही घाण केली जाते. या कारणांमुळेच नाशिकरोड रेल्वे स्थानकाची स्वच्छतेबाबत घसरण झाली. स्थानकाबाहेरील हा प्रश्न रेल्वे आणि महापालिका यांनी सोडवावा व अन्य घटकांनीही त्यांना मदत करावी, अशी अपेक्षा आहे.

स्वच्छता कर्मचारी संख्या वाढविल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे रूप पालटणार आहे. पूर्वीच्या स्वच्छतेचा परिसर मर्यादित होता. आता मालधक्क्यापर्यंत व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सर्व कर्मचारी गरीब व मेहनती असून, ते नक्कीच यशस्वी होतील.

-गोपाळ पथरोड, मुकादम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक हिंसाचारात घट

0
0

गुन्हे नोंदणी ४३ टक्क्यांनी कमी; कुटुंब कल्याण समितीचे प्रयत्न

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार थेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांना ब्रेक लागला असून, २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये दाखल गुन्ह्यांची संख्या तब्बल ४३ टक्क्यांनी घटली आहे. कुटुंब कल्याण समितीच्या प्रयत्नांमुळे गत सप्टेंबरपासून १०० संसार पुन्हा रूळावर आले आहेत. दुसरीकडे यामुळे पोलिसांचा ताणही कमी झालेला दिसतो.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वर्षागणीक वाढत होते. शहरात वर्षभरात २०० ते अडीचशे गुन्हे फक्त शहरातच दाखल होत होते. पोलिसांच्या एका विशेष सेलमार्फत समुपदेशनाचा पर्याय वापरला जात होता. मात्र, यात पारदर्शकता नव्हती. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचे आदेश २७ जुलै २०१७ रोजी सर्वच जिल्हा कोर्टांना दिले. नाशिकमध्ये जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही समिती गठीत केली. सदर समितीचे कामकाज जिल्हा कोर्टातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीमध्येच चालते. कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. एन. पाठक, हेमा पटवर्धन, ललिता कमोद यांची नियुक्ती करण्यात आली.

कुटुंब कल्याण समिती अस्तित्वात येण्यापूर्वी विवाहितेच्या पती व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाबाबत कलम ४९८ अ नुसार पोलिसांकडे किंवा न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात तक्रार करण्यात येत होती. मात्र, आता दोन्ही बाजुंच्या पक्षकारांना कुटुंब कल्याण समितीसमोर हजर रहावे लागते. समिती सदस्य दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून आपला अहवाल सादर करतात. या तज्ज्ञ समितीसमोर प्रकरण आल्यानंतर समुपदेशन व समझोता याकडे लक्ष दिले जाते. अगदीच हाताबाहेरचे प्रकरण असेल तरच ही समिती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देते. याचा परिणाम २०१७ च्या शेवटच्या टप्प्यात लागलीच जाणवला. शहरात २०१६ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार २२७ गुन्हे दाखल झाले. २०१७ मध्ये हे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाले. २०१८ मध्ये आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत.

कुटुंब कल्याण समिती स्थापन झाल्यापासून दावापूर्व ६२ तर प्रलंबीत दाव्यांमधील ३४ प्रकरणात समझोता घडवून आणण्यात यश मिळाले. जवळपास १०० कुटुंबातील वाद या केंद्राद्वारे मिटवण्यात आला. मागील पाच महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी असून, २०१८मध्ये हे चित्र अधिक स्पष्ट होईल.

- एस. एम. बुक्के, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

पूर्वीच्या तुलनेत आता अनावश्यक गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते आहे. यामुळे पोलिसांवरील ताणही हलका झाला. कुटुंब कल्याण समितीमार्फत मनोमिलन होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातात. समितीच्या आदेशानुसारच पोलिस या कायद्यानुसार गुन्हा दाखल करू शकतात.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसान सभेचा नाशिकहून लाँग मार्च

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी प्रवास करीत मंगळवारी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. लाँग मार्चची सुरुवात शालिमार चौकातून होणार असून, तो विधानसभेवर धडकणार आहे. मोर्चात राज्यभरातील एक लाख शेतकरी सहभागी होणार असून, ते विधानभवनाला घेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा घेराव राहणार आहे.

लाँग मार्चमध्ये नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून ६० हजार, तर उर्वरित राज्यांतून ४० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. सर्व शेतकरी आपल्या शिध्याची व्यवस्था स्वत:च करणार आहेत. शेती संकटामुळे शेतकरी वर्ग हलबल झाला आहे. सरकार मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फसव्या घोषणा करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे किसान सभेचा हा आरपार लढा असल्याचे किसान मोर्चच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोर्चात वनहक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शिधापत्रिका बदलून द्या, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती करा, विविध योजनांचा तत्काळ लाभ द्या, वीजबिल माफ करा, विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहे. किसान सभेचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, प्रदेशाध्यक्ष किसन गुजर, डॉ. अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, सुभाष चौधरी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

मोर्चाचे नियोजन असे

७ मार्च

दुपारचे भोजन खंबाळे (ता. इगतपुरी) जवळ

रात्री मुक्काम घाटणदेवी (ता. इगतपुरी)

८ मार्च

दुपारचे भोजन साईधाम, साई ढाब्याजवळ, कसारा (ता. शहापूर)

रात्री मुक्काम कळंबगाव (ता. शहापूर)

९ मार्च

दुपारचे जेवण आसनगाव (ता. शहापूर)

रात्री मुक्काम भातसा नदीवर

१० मार्च

दुपारचे भोजन भिनार (ता. भिवंडी)

रात्री मुक्काम मुंबई ढाबा (ता. ठाणे)

११ मार्च

दुपारचे भोजन विक्रोळी/घाटकोपर

रात्री मुक्काम सायन/दादरजवळ

१२ मार्च

सायन/दादरहून विधानभवनाकडे कूच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीवर अंध तरुणी

0
0

संदीप देशपांडे, मनमाड

गुणवत्तेवर जग पादाक्रांत करण्याची हिंमत बाळगणाऱ्या जिगरबाज दिव्यांगांना राजकारणातील हेव्यादाव्यांमुळे प्रतिनिधित्व मिळत नाही. मात्र, नांदगाव तालुक्यातील शास्त्रीनगर गावाने डोळस निर्णय घेत एका अंध तरुणीची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड केली. निवड झालेली ही तरुणी पूजा कचरू गुंजाळ असून, नांदगाव तालुक्यातील ती पहिली अंध ग्रामपंचायत सदस्य ठरली आहे. आज सर्व समाजात अंध, अपंग किंवा न्यूनत्व असलेल्यांची उपेक्षा होत असताना ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेवर अंध पूजाला बिनविरोध निवडून गावाने डोळस दृष्टिकोन सर्वांसमोर ठेवला आहे. "दोन्ही डोळे नसले म्हणून काय झाले? मी ऐकू शकते, अनुभवू शकते. याद्वारेच मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सक्षमपणे काम करू शकते," अशी विश्वास पूजाने व्यक्त केला आहे.

नांदगावच्या शास्त्रीनगर ग्रामपंचायतीची तीन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली तेव्हापासून वॉर्ड २ ची इतर मागासवर्गीय महिला राखीव ही जागा रिक्त होती. या जागेसाठी गावात जातीच्या दाखल्यांसह पात्रताधारक महिलाच न मिळाल्याने पद तीन महिने रिक्त राहिले. मात्र, २७ फेब्रुवारी रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक झाली व गावातील मंडळींनी पात्रताधारक पूजा मुंजाळ हिला या पदासाठी अर्ज भरण्याची गळ घातली. नाशिक येथे बिटको महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या पूजाला हा आपला मोठा सन्मान तर वाटलाच, पण आपण अंध असूनही सामाजिक कार्य करू शकतो हा तिचा ठाम विश्वास सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. या जागेवर पूजाची बिनविरोध निवड झाली असून, ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेली पूजा नांदगाव तालुक्यातील पहिली अंध व्यक्ती ठरली आहे. पूजा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी असून, तिचे काका साहेबराव मुंजाळ माजी सरपंच, तर काकू छाया साहेबराव मुंजाळ या थेट सरपंच निवडणुकीत विजयी होऊन सध्या विद्यमान सरपंच आहेत. पूजा अंध असूनही परिस्थितीशी झुंजणारी, लढणारी आणि अतिशय हुशार व कार्यक्षम असल्याने तिची निवड झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. "अंध असले तरी कमजोर वा दुर्बल नाही, अकार्यक्षम मुळीच ठरणार नाही. प्रत्येक ग्रामसभेला मासिक सभेला उपस्थित राहीन. सभेतील मुद्दे काळजीपूर्वक ऐकेन व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन," असे पूजा ठामपणे सांगते.

पूजा हुशार व परिस्थितीशी दोन हात करणारी आहे. लहानपणी गोवर झाल्याने तिचे दोन्ही डोळे गेले; पण ती डगमगली नाही. ती जिद्दीने शिक्षण घेत आहे. नाशिकमध्ये ती ब्रेल लिपी शिकली. आता बारावीनंतर पुढची दोन वर्षे ती बिटको कॉलेजमध्ये रेकॉर्डिंग ऐकत अभ्यास करतेय, असे तिचे काका साहेबराव मुंजाळ यांनी सांगितले..

''दृष्टी नसली तरी दृष्टिकोन आहे. शिक्षण सांभाळून मी ग्रामपंचायत सदस्यपदाला न्याय देईन. अंध, अपंग असलेल्यांनी रडत न बसता परिस्थितीशी दोन हात करावे. जिद्द ठेवावी. मला गावाने मोठी संधी दिली. त्याला मी योग्य न्याय देईन.'' - पूजा मुंजाळ, ग्राम पंचायत सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरीराचे दोन तुकडे झाले तरी तो होता जिवंत...

0
0

धुळे :

नंदुरबार रेल्वेस्थानकावर मालगाडीखाली येऊन एका इसमाने आत्महत्या केली. त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. पण त्यानंतरही काही सेकंद तो जिवंत होता. पोलिसांनी त्याच्याजवळ धाव घेतली, त्याचे पालथे शरीर उचलले. त्याने स्वत:चे नाव, पत्ता सांगितला आणि नंतर प्राण सोडला.

सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नंदुरबार रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ च्या मध्ये ही घटना घडली. संजय मराठे (३९) असे या इसमाचे नाव असून तो रिक्षाचालक होता. मालगाडीचा वेग कमी होता. मालगाडी येताच संजयने स्वत:ला गाडीसमोर झोकून दिले. कमरेपासून त्याचे धड वेगळे झाले. मालगाडी जाताच रेल्वे स्थानकावर असलेले एस. एस. आय. गोविंद काळे व पोलिस कॉन्स्टेबल पुरूषोत्तम खिरटकर या पोलिसांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांच्या एका मदतनीसाने त्याला उचलले. त्यानंतर त्याने स्वत:चे नाव संजय नामदेव मराठे आहे, असे सांगितले आणि प्राण सोडला. ओळख पटल्याने त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.
शवविच्छेदन करून तात्काळ नातेवाईकांच्या ताब्यात शव देण्यात आले.

त्याने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. लहान माळीवाडयात तो राहात होता. त्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर रिक्षाचालकांत हळहळ व्यक्त होत असून लहान माळीवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च सुरू

0
0

हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

नाशिक:

शेतकऱ्याचा ऐतिहासिक लाँग मार्च नाशिक येथून मंगळवारी दुपारी सुरू झाला. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लाँग मार्चमध्ये राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. नाशिक येथील सीबीएस चौकातून निघालेला हा लाँग मार्च सहा दिवस पायी चालून १२ मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईत पोहोचल्यावर मागण्यांसाठी शेतकरी विधान भवनाला बेमुदत महाघेराव घालणार असल्याची घोषणा किसान सभेने केली आहे.

कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया, शेतीमालाला दीडपट भावाची हमी दया, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी दया, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई दया, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून ऊसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
0

नाशिक: त्र्यंबकेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर हे प्रकरण जात पंचायतीच्या माध्यमातून दाबण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

राजेवाडी भोकरपाडा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून या मुलीला धमकावण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी जात पंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. तसेच पीडित मुलीच्या वडिलांना जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामटवाडेत अतिक्रमण जमीनदोस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेत आयुक्त मुंढे यांचे पर्व सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अतिक्रमण निर्मूलन विभागाला चांगलाच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. सिडको विभागात सलग अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविल्यानंतर बुधवारी (दि. ७) सिडकोतील कामटवाडे शिवारात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या वेळी घरांसमोरील ओट्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.

नाशिक महापालिकेने सध्या अतिक्रमणावर चांगलेच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या सर्वच विभागांमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई होत असल्याचे दिसत आहे. बुधवारी, सिडको परिसरातील कामटवाडे येथे अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. येथील विठ्ठल पार्क रो-हाऊस परिसरातील रस्त्यालगत असलेले घर व दुकांनाचे ओटे काढण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या रो-हाऊस मिळकतधारकांनी ओटे वाढविल्याने या परिसरातील रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे येथून वाहतुकीचा मार्गच बंद होत असल्याचे दिसत होते. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. ७) अतिक्रमण निर्मूलन विभागाने या रस्त्यावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या रो-हाऊसचे अतिक्रमण काढले. त्याचबरोबर या पुढे अशाप्रकारे अतिक्रमण न करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या असून, ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे ते स्वयंस्फूर्तीने काढून घेण्याचे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगयुद्धाच्या महापर्वणीत येवलेकर चिंब

0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

सामुदायिक रंगपंचमीचे सामने खेळताना

रंगवर्षावात न्हावुन निघाले येवलेकर सारे

सप्तरंगांच्या वर्षावात उमटले इंद्रधनुचे नजारे

रंगभरलेल्या पिंपासह ट्रॅक्टर्स सरसावती पुढे

एकमेकांवर मारा करिता रंगांचा

हर्षोल्हात रंगे रंगयुद्ध न्यारे...! असं मनोहारी दृष्य ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या येवला शहरात मंगळवारी (दि. ६) दिसून आले. निमित्त होते रंगपंचमी निमित्त परंपरेनुसार चालत आलेल्या सामुदायिक रंगांच्या सामन्यांचे. ऐतिहासिक मैदानात ट्रॅक्टर्स अन् ट्रॅक्टर्सच्या ट्रॉलीमधील रंगाने भरलेल्या पिंपांमधून बादलीने एकमेकांवर रंगवर्षाव करण्यात आला. सामुदायिक रंगवर्षावात हवेत उमटलेला 'इंद्रधनु'चा मनोहारी नजारा यंदाही लक्षवेधी ठरला.

या 'रंग'लेल्या युद्धाचा हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष सहभागी झालेल्या शहरवासीयांनी आनंद लुटला.

रंगयुद्धाचा पहिला मोठा सामना खेळला गेला तो शहरातील ऐतिहासिक अशा टिळक मैदानात. 'उपमहाराष्ट्र केसरी' पैलवान राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते मैदानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, तर माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याचा श्रीगणेशा करण्यात आला. सायंकाळच्या पाचच्या सुमारास येथील रंगांच्या सामन्यास सुरुवात होताना पुढे याठिकाणी पाऊनतास रंगयुद्ध रंगले. सामुदायिक सामन्यातील ही रंगांची महापर्वणी साधताना मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने तरुणाईच नव्हे तर ज्येष्ठांनी देखील रंगात ठेका धरला होता. दुसरा सामना शहरातील डीजे रोडवर खेळला गेला. याठिकाणी देखील अनेक मंडळे सहभागी झाली होती. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, किशोर सोनवणे, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, दयानंद जावळे आदींसह हजारोंच्या संख्येने येवलेकर या सामुदायिक रंगांच्या सामन्यात सहभागी झाले होते.


जलदुर्ग किल्ल्यावर रंगपंचमी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ट्रेकिंगवीर यांनी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या जलदुर्ग खांदेरी, उंदेरी या किल्ल्यावर रंगपंचमी साजरी केली. इतिहासाचा शोध व बोध घेत या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुबंईचे पोर्तुगीज व जंजिराचा सिद्धी यांच्यावर वचक ठेवण्याकरिता व समुद्राच्या किनारपट्टीवर स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी खांदेरी, उंदेरी या जलदुर्ग किल्ल्यांची निर्मिती केली होती. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात आहे. रंगपंचमीचे निमित्त साधून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यांवर साफसफाई करून निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या रंगपंचमी साजरी केली. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, रामदास चौधरी, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, दीपक बेलेकर, गोकूळ चव्हाण, शुभम बेलेकर, संतोष म्हसने, बालाजी तुंबारे, संदीप खैरनार, भगवान तोकडे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्यांच्या' आयुष्यात उमेदीचे रंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांवर विविध रंगांची, फुलांची उधळण करीत एचआयव्हीबाधित बच्चेमंडळींनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. महिंद्रा आणि महिंद्रा आणि यश फाउंडेशन यांच्यातर्फे सातपूर एमआयडीसीतील महिंद्रा हरियाली येथे रंगपंचमीचे आयोजन झाले. या चिमुकल्यांच्या जीवनात आरोग्य, प्रेम, नवीन उम्मेद, आनंद आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा रंग भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एचआयव्हीग्रस्त बच्चेमंडळींना इतरांप्रमाणेच सकारात्मक दृष्टीकोनातून जीवन जगता यावे या उद्देशाने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महिंद्रा आणि महिंद्राचे मधुकर टर्ले, प्रदीप भट, कमलाकर घोंगडे, आशितोष अग्निहोत्री आणि यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना रंगाचा टिळा लावून तसेच एकमेकांवर विविध रंगी फुलांची उधळण करून रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील २५० एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या नागरिकांनी व बालकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालकांनी रंगपंचमीचे औचित्य साधून कृष्ण भगवानांचा वेश परिधान करून उपस्थित मान्यवरांना रंगाचा टिळा लावला. उपस्थित मान्यवरांनी बालगोपाळांवर कोरड्या रंगांची व फुलांची उधळण करून रंगपंचमी साजरी केली. यावेळी टर्ले, कमलाकर घोंगडे यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात आज महामूकमोर्चा

0
0

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे बालिका अत्याचारप्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सर्व समावेशक महामूक मोर्चा आज (दि. ८) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. याबाबतची माहिती माजी महापौर भगवान करणकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मूकमोर्चाला शहरातील ३८ समाजांनी, ५० सामाजिक संघटना तसेच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी यांसह अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे, असेही करणकाळ यांनी माहिती देताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कानिफनाथांच्याचरणी लाखो नाथभ​​क्त लीन

0
0

संजीवन समाधी यात्रेस मढी येथे प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

डफाच्या तालावर नृत्य करत कानिफनाथांचा ध्वज उंचावत जयघोष करीत कलश भेटीचा सोहळा उत्साहत पार पडला. रेवड्यांचा प्रसाद वाटप व जागोजागी महाप्रसादाचा नाथभक्तांनी लाभ घेतला.

होळी सणापासून कानिफनाथांच्या यात्रौत्सवास प्रारंभ होऊन गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव चालतो. रंगपंचमी अर्थात फाल्गुन वद्य पंचमी हा नाथांचा संजीवन समाधी स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. राज्यभरातून नाथभक्त व आखाडे मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत असतात. सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथील ९० वर्षांची परंपरा असणाऱ्या शंकरबाबा कांडेकर यांच्या आखाड्याचे उत्तराधिकारी पुंजाजी बाबा कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नाथभक्तांनी सहभाग घेत पूजाविधी केली.

नाशिक, निफाड, सिन्नर, राहता आणि उत्तर महराष्ट्रातील नाथभक्तांनी चतुर्थीला मढीतील टेकडीच्या पायथ्याशी कांडेकर बाबा आखाड्याच्या जागेची स्वच्छता करून तंबूची उभारणी सुशोभीकरण व विद्युत रोषणाई केली. या वेळी नाथांच्या गादी स्थापन करून देवीदेवतांचे आवाहन करून पुजाविधी व आरती करण्यात येते. पंचमीला पहाटे स्नानादी कार्यक्रम आटोपून निशाण काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी हजारो भाविकांनी महाप्रसाद वाटपाचा लाभ घेतला. सायंकाळी आरती व पूजाविधी तसेच दीक्षादान समारंभ पार पडला. या वेळी आखाड्याचे प्रमुख पुंजाजीबाबा कांडेकर, दौलतबाबा बोराडे, भिमाजी माळोदे, तुकाराम हांडोरे, कमळाबाई सातभाई, मनीषा जाधव, वंदना शिंदे, राजू अस्वले, भाऊसाहेब शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नाथभक्त सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडींवर काळाचा घाला

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

गोंदेफाटा येथील लग्नसोहळा आटोपून निफाडकडे जाणारा वऱ्हाडाच्या पिकअपला सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात तीन वऱ्हाडी ठार झाले. तर २१ जण जखमी झाले आहेत.

निवृत्ती उगले यांच्या शेताजवळ हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मंगळवारी (दि.६) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संजय सखाराम माळी (वय ४०), बापू दगू कराटे (वय २१) व दग२ भास्कर कराटे (वय ५०, सर्व रा. उगावरोड, मेगट वस्ती, निफाड) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये दगू कराटे व बापू कराटे या बापलेकाचा समावेश आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेगटवस्ती, उगावरोड, निफाड येथील वऱ्हाडी गोंदेफाटा (ता. सिन्नर) येथील माऊली लॉन्समध्ये विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते पिकअपने (एमएच १४, बीएम ८१५८) निफाड कडे जात असताना सिन्नर-बारागाव पिंप्री रस्त्यावर बारागावपिंप्री शिवारात निवृत्ती तुकाराम उगले यांच्या शेतजमीनीजवळ चालकाचा पिकअपवरील ताबा सुटल्याने पिकअप पलटली. या अपघातात २४ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनी लागलीच मदत कार्य सुरू केले. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवत असताना संजय सखाराम माळी (वय ४०), बापू दगु कराटे (वय २१) यांचा मृत्यू झाला. दगू कराटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव व निफाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून किरकोळ जखमींना उपचार करून सोडून देण्यात आल्याचे समजते.

याबाबत सुनील रतन पवार (वय २१, रा. उगावरोड, निफाड) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी पिकअप चालक पोपट रावसाहेब खेडकर याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक हरीभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जी. पी. लावणे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी आज मतदार नोंदणी मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला वर्गात मतदानाबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रशासनाने महिला दिनाचे औचित्य साधून गुरूवारी (दि. ८) विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्य अधिकारी निवडणूक अधिकारी गिरीश मोहोड यांनी दिले आहेत. जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण बरेच कमी आहे. त्यामुळे महिला मतदारांची नोंदणी वाढणे आवश्यक असून त्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी तहसीलदार, नायब तहसीलदारांना दिल्या आहेत. महिला दिनानिमित्त मतदान जागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महिला वसतिगृह, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, परिचारिका, महिला बचत गटाच्या सदस्या, शिक्षिका यांना या मोहिमांमध्ये सामावून घेऊन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी व असरकारी संस्था, महामंडळ आदींच्या मदतीने महिला मतदारांची नोंदणी वाढविणे, तालुक्यातील प्रतिष्ठित महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे, यासाठी विविध कार्यक्रम घेणे, नवविवाहित महिलांची पूर्वीची मतदार नोंदणी रद्द करून नवीन मतदार म्हणून नोंदणी करणे, मागील वर्षभरात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी नोंदणी केलेल्या महिलांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राप्त करून घेणे व या महिलांचे मतदारयादीत नाव नसल्यास त्यांची नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सैन्य दलातील महिला, युवती, सैन्य दलातील मतदार तसेच लोकशाही प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आदिवासी, तृतीयपंथी, स्थलांतरित कामगार यांचीही नोंदणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिमेंट, खडीतून आयुष्याला सोनेरी मुलामा

0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com
tweet- SanchetigMT

महिला आणि संघर्ष या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू... त्यातही जर कपाळाचे कुंकूच पुसले गेले तर मग शब्दांतही मांडता येणार नाही अशा दिव्यातून स्त्रीला जावे लागते... पतीच्या निधनानंतर आपसूकच येणारे संकट आणि सोबतच पडणाऱ्या जबाबदाऱ्या मोठ्या असतात... मालेगावच्या नीलिमा जयप्रकाश पाटील यांनी मात्र अशा परिस्थितीशी दोन हात करीत या संकटावर यशस्वी मात केली. पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांचा गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय पुढे नेत त्यांनी जम बसवला. पुरुषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्राबद्दल त्रोटक माहिती असताना केवळ चिकाटी व जिद्दीच्या जोरावर त्यांनी पूल, रस्त्यासारखी कामे करून अनेकांना रोजगारही दिला. त्यांची संघर्षगाथा प्रेरणादायी अशीच आहे.

सटाण्याच्या नीलिमा पाटील यांचा विवाह १९९६ साली मालेगाव येथील जयप्रकाश पाटील यांच्याशी झाला. पाटील यांनी लग्नानंतर व्यवसायात चांगला जम बसवला. संसाररुपी वेलीवर दोन गोंडस मुलेही जन्माला आली. संसाराचा गाडा व्यवस्थित चालू असताना २०११ साली पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला. साहजिकच नीलिमा पाटील यांच्यावर स्वत:सह कुटुंब तसेच पतीच्या व्यवसायाची जबाबदारी येवून पडली. मुलांचे शिक्षण हा प्रश्नही त्यांच्यापुढे होता. पण त्या अजिबात खचल्या नाहीत. दु:खातून सावरत पतीच्या व्यवसायाची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली. सासू व भावाने पाठिंबा दिल्याने त्यांचे मनोबल वाढले. सुरुवातीच्या काळात या व्यवसायात त्यांना महिला असल्याने ठेकेदारांनी टोमणे मारले. ‘बाई काय काम करणार’ असे उपरोधिक शब्दही त्यांच्या कानावर पडू लागले. पण, त्या मागे हटल्या नाहीत.

सुरुवातीला गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करतानाही अधिकाऱ्यांनी नकारात्मक मत व्यक्त केले. त्यातून त्या निराशही झाल्या. पण, बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील व रमेश शिरसाठ यांच्या सहकार्यातून त्यांचे रजिस्ट्रेशन झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. बांधकाम क्षेत्रात महिलांचा टक्का बोटावर मोजण्याइतकाच आहे. त्यात गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरची संख्या तर अत्यल्पच. एकूणच नीलिमा पाटील यांची व्यवसायगाथा निश्चितच सर्वांना बळ देणारी आहे. वाळू, खडी, सिमेंट, डांबराचा दर्जा तपासण्यापासून त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी समजून घेतानाच त्यांनी रोड रोलर, ट्रॅक्टर, पाण्याचे व डांबरचे टँकरचे गणितही समजून घेतले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उभे राहून त्यातले बारकावे टिपले. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल दोन कोटींच्या पुढे आहे. रस्ता, पुलांसह विविध कामे त्यांनी केली आहेत. आता त्या मालेगाव महानगरपालिकेची कामेही करीत आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नीलीमा पाटील यांनी व्यवसायात जम बसवतानाच मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले. त्यांचा मोठा मुलगा सिव्हिल इंजिनीअरींगचा डिप्लोमा करीत आहे, तर धाकटा कॉमर्स शाखेत अकरावीला शिक्षण घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तो' ठराव निलंबित

0
0

सरकारकडून सत्ताधाऱ्यांना झटका; एसपीव्हीवर दोन सदस्यांचीच नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शासकीय नियमांची मोडतोड करून महापालिकेत अनियमितपणे ठराव करणाऱ्या सत्ताधारी भाजपला राज्य सरकारने आणखी एक दणका दिला आहे. स्मार्ट सिटीतल्या एसपीव्हीच्या संचालक मंडळावर खासदार, आमदार व गटनेत्यांना घेण्याचा महासभेचा ठराव राज्य सरकारने निलंबित केला आहे.

सदरील ठराव शासन निर्णयाच्या विसंगत असून, एसपीव्ही पक्षाच्या उतरत्या क्रमांकानुसार दोनच सदस्यांची नियुक्ती करता येणार असल्याचा खुलासा सरकारने केला आहे. त्यामुळे एसीपीव्हीवर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुचवलेला प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांना निवडावा लागणार आहे.

शिक्षण मंडळ गठित करण्याऐवजी शिक्षण समिती तयार करण्याचा सरकारचा ठराव असतांनाही, सत्ताधारी भाजपने शिक्षण मंडळ तयार करण्याचा ठराव करून तो सरकारकडे पाठविला होता. सरकारने हा ठराव विखंडित करत, प्रशासनाचीही कानउघाडणी केली होती. तरीही सत्ताधारी भाजपकडून बेकायदेशीर ठराव करण्याचा सिलसिला सुरूच राहिला.

स्मार्ट सिटीची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) स्थापन करण्यात आले आहे. या एसपीव्हीवर १५ संचालक असून, त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेत्यासोबतच उतरत्या क्रमांकाच्या पक्षाचे दोन प्रतिनिधी असावेत, असा नियम आहे. त्यामुळे या एसपीव्हीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य जाणे अपेक्षित होते. परंतु, भाजपने याला छेद देत, २० जुलै २०१७ रोजीच्या महासभेवर नवीन ठराव केला. त्यामुळे या एसपीव्हीत खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, मनसे गटनेते सलिम शेख यांचा संचालक मंडळावर घेण्याची शिफारस केली होती.

भाजपसाठी मोठा झटका

परंतु, या ठरावावर काँग्रेसच्या गटनेते शाहू खैरे यांनी सरकारकडे दाद मागितली होती. त्याची दखल घेत, नगरविकास विभागाने हा ठराव निलंबित करून, बेकायदेशीर ठरवला आहे. महासभेचा ठराव हा स्मार्ट सिटी संदर्भात १८ जून २०१६ च्या ठरावाशी विसंगत असल्याचे नगरविकास विभागाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे एसपीव्हीवर खासदार व आमदारांची वर्णी लावण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत. आता त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नामनिर्देशित होणाऱ्या सदस्यांचीच वर्णी लागणार आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

बग्गांचा मार्ग मोकळा

एसपीव्हीवर काँग्रेसकडून शाहू खैरे आणि राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे सहयोगी नगरसेवक गुरूमित बग्गा यांच्या नावाची शिफारस महासभेला करण्यात आली होती. परंतु, गुरूमित बग्गा सारखा अभ्यासू नगरसेवक आल्यास आपली अडचण होईल म्हणून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना गटनेते विलास शिंदेच्या सुचनेनुसार खासदार व आमदारांचा ठराव करून बग्गांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, खैरे व बग्गा यांनी सरकारकडे यासंदर्भात तक्रार केली. त्याची दखल घेत, सरकारनेच हा ठराव निलंबित केल्याने आता एसपीव्हीवर जाण्याचा खैरे व बग्गा यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाकडून सासूला १५ लाखांचा गंडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अमृतधाम परिसरात राहणाऱ्या सासूला तिच्या जावयासह नातेवाइकांनी वेगवेगळी कारणे सांगून तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी निफाड तालुक्यातील नैताळे येथील चौघांविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

चेतना विजय जाधव (वय २०, रा. धर्मशक्ती रेसिडन्सी, उद्याननंगर, अमृतधाम, पंचवटी) यांनी त्यांच्या पतीसह इतर तीन जणांनी आपल्या आईची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. चेतना यांचा विवाह नैताळे येथील सागर साहेबराव बारे यांच्याशी झाला. जावई सागर बारे, सासरा साहेबराव लखू बारे, प्रवीण साहेबराव बारे, सासू हौशाबाई साहेबराव बारे यांनी दुग्ध व्यवसायासाठी पैसे लागत असल्याचे सांगून चेतना यांच्या आईकडून १५ लाख ५० हजार रुपये घेतले. जावयावर विश्वास ठेवून त्यांनी पैसे दिले. तसेच सासूच्या नावावरील फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला. फ्लॅटवर कर्ज घेतले. मात्र, ते न फेडल्याने फायनान्स कंपनीने हा फ्लॅट सील केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात य़ेताच चेतना यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक योगिता जाधव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा लाँग मार्च

0
0

सीबीएसवर सहा तास ठिय्या; विधानभवनाला मंगळवारी घेराव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेल्या एक लाख शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने मंगळवारी सीबीएसवर तब्बल ६ तास ठिय्या मांडल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११ वाजेपासून विविध वाहनांतून मोर्चेकरी गोल्फ क्लबच्या मैदानाजवळ उतरले. त्यानंतर त्यांनी कूच करत सीबीएस चौकाचा ताबा घेतला. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली.

वेगवेगळ्या गावातून आलेल्या आंदोलकांच्या हातात लाल झेंडा व डोक्यात लाल टोप्या घातल्या होत्या. विविध घोषणा व मागण्याचे हातात पकडलेले फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चकऱ्यांची गर्दी जमल्यानंतर सीबीएस चौकात प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने महामार्गावरून निघाला. शिस्तबद्ध निघालेल्या मोर्चामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मोर्चाने रात्रीचा मुक्काम वालदेवी नदीच्या काठावरील रायगडनगरजवळ केला. त्यानंतर बुधवारी हा मोर्चा इगतपुरीकडे रवाना झाला.

सहा दिवस पायी चालून मंगळवारी (दि. १२) हा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाला बेमुदत महाघेराव घातला जाणार आहे. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी अध्यक्ष आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला आहे. यात नाशिकमधील कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, भाकप नेते राजू देसले यांच्यासह विविध संघटनेचे नेतही सामील झाले.

घोषणांनी दणाणला कसारा घाट

घोटी : आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुबंईकडे निघालेल्या माकप, किसान सभा यांचा लाँगमार्चने बुधवारी दुपारी घोटीच्या पुढे प्रस्थान केले. रणरणत्या उन्हात आपल्या मागण्यांबाबत घोषणा देत शेतकऱ्यांनी कसारा घाट दणाणून सोडला. दरम्यान, इगतपुरी तालुका मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला समर्थन दिले आहे.

मोर्चात सहभागी हजारो कार्यकर्त्यांनी घोटीजवळील खंबाळे शिवारात दुपारचे भोजन केले. यानंतर संघटीतपणे ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मोर्चामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. माकप नेते देविदास आडोळे, कांतिलाल गरुड, दत्ता राक्षे, चंद्रकात लाखे, अप्पा भोळे आदींनी घोटी टोलनाका येथे मोर्चाचे स्वागत केले. शेतकरी प्रतिनिधी अरुण जुंदरे, रोहिदास उगले, किरण जाधव, अशोक धांडे, राजाराम धांडे, रोहित उगले, राजाराम जाधव, राजेंद्र काळे यांनी आपापल्या तालुक्यातील विविध समस्यांचे निवेदन अजित नवले यांना दिले.


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा
शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या
दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा
कसणाऱ्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा
वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्या
बोंडआळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई द्या
विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे कारस्थान बंद करा
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होताना ऊसाला जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही

0
0

अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑक्सिजनअभावी नाशिक जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यास बापट यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन या अत्यावश्यक सेवेसाठी दरवर्षी तपासणी केली जाते. नाशिक शहराला रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होतो. स्थानिकस्तरावर ऑक्सिजनची निर्मितीसाठी रुग्णालयांबरोबर बैठक घेऊ, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेतील साधने आणि उपकरणांच्या तपासणी कामी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यास त्यांचे निलंबन केले जाणार असल्याचे सांगितले. या विषयावर झालेल्या चर्चेत आमदार दीपिका चव्हाण, जयदत्त क्षीरसागर यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images