Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उद्योजकता वाढीसाठी नवीन तीन योजना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील युवकांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती राजाराम महाराज अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे नवीन तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेच्या नियम व अटींनुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे राज्यातील राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँक व नागरी बँक ज्या सिबिल प्रणाली सदस्य आहेत, अशा बँकांनी आपल्या नियम आणि अटींना अनुसरून करावीत, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका सुचिता भिकाणे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत बँकेचे हप्ते वेळेवर अदा केल्यास लाभार्थ्यांना, गटांना व्याज परतावा त्यांच्या आधार लिंक खात्यावर महामंडळातर्फे दिला जाणार आहे. या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आहेत.

www.mahaswayam.in या संकेतस्थळावरून लाभार्थ्यांचे मंजुरी पत्र पाहून गरजू व्यक्तींना बँकेने आपल्या नियमानुसार कर्ज देऊन सहकार्य करावे, महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सहाय्यक संचालक (रोजगार व कौशल्य विकास) कार्यरत आहेत. तसेच महामंडळाने जिल्हा समन्वयकही नियुक्त केलेले असल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकीदारांचे धाबे दणाणले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हा बँकेला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी गुरुवारपासून तालुकानिहाय दौरे सुरू केले आहेत. सत्कार नको पण वसुलीसाठी प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेशच आहेर यांनी दिल्याने शुक्रवारी जिल्हा बँकेच्या पथकाने तालुक्यातील बड्या थकबाकीदारांकडे भेटी देत अंतिम नोटीस बजावली आहे. तसेच थकबाकी भरण्याचे आवाहन केले. तालुक्यात जिल्हा बँकेचे तिन्ही विभाग मिळून एकूण २५ शाखा असून, २०० कोटीहून अधिक थकबाकी वसूल होणे बाकी आहे.

तालुक्यातील मालेगाव, निमगाव, दाभाडी अशा तिन्ही विभागात वसुली पथकाने दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात जिल्हा बँक पथकाने धनदांडगे असलेल्या बड्या थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पथकाने थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. ही थकबाकी न भरल्यास संबंधित थकबाकीधारकांच्या मालमत्ता जप्ती व लिलावाचे देखील संकेत पथकाने दिले आहेत. थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

कर्जमाफी योजनेस प्राधान्य

जिल्हा बँकेकडून सुरू असलेल्या वसुली मोहिमेत प्राधान्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत १.५० लाखांवरील थकबाकीदार असलेल्या सभासदांना उर्वरित रक्कम भरून कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहून नये यासाठी गावनिहाय याद्या करण्याचे निर्देश अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहेत.

अशी आहे थकबाकी

मालेगाव विभाग

६५ कोटी १३ लाख

निमगाव विभाग

१०९ कोटी ३५ लाख

दाभाडी विभाग

८५ कोटी ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी दिनानिमित्त मोफत ग्रंथघर उपक्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सोशल मीडिया किंवा कॉम्प्युटरमुळे तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार वाचन करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज असल्याने आता माय मराठी मोफत ग्रंथघर उपक्रमाचा प्रारंभ मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिली.

कविवर्य कुसमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने मराठीचे वाचक वाढावेत आणि विविध विषयांची माहिती देणारी पुस्तके, ग्रंथ वाचकांना विनामूल्य उपलब्ध व्हावी, या हेतूने माय मराठी मोफत ग्रंथघर हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील जुने सिडकोतील बाळासाहेब ठाकरे उद्यानालगतच्या नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात हे ग्रंथघर सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांना शेकडो पुस्तके आणि ग्रंथसंपदा वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २६) सायंकाळी या ग्रंथघराचा शुभारंभ होणार आहे. मराठीची गोडी वाढावी, वाचक संख्या वाढावी आणि विविध विषयांचे ज्ञानभांडार सर्वांना विनामूल्य उपलब्ध व्हावे या हेतूने हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक तिदमे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण कारवाईविरोधात एकजूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात हॉकर्स झोनची बलपूर्वक अंमलबजावणी सुरू झाली असून, रस्त्यावरील टपरीधारक, फेरीवाले, हॉकर्सविरोधात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर रोजगार बचाव मोर्चा काढण्यात आला. फेरीवाल्यांना विश्वासात घेऊनच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहिम तातडीने थांबवावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली.

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी जोमाने सुरू करण्यात आली असून, प्रमुख रस्त्यांवरील टपरीधारक, फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढले जात आहे. त्यामुळे हॉकर्सधारकांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत. शुक्रवारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जुने नाशिक परिसरातील भद्रकाली मार्केट येथून सकाळी अकराच्या सुमारास हा रोजगार बचाव मोर्चा काढण्यात आला. अतिक्रमण कारवाईच्या निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला. यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, कारवाईचा निषेध करण्यात आला. शहर फेरीवाला समितीची मंजुरी नसताना १५ मार्च २०१६च्या महासभेत मान्यता देण्यात आलेल्या हॉकर्स झोनच्या ठरावाची अंमलबजावणी स्थगित करावी, महापालिकेने यापूर्वी केलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणात बोगस नावे घुसवली असून फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण केले जावे. हॉकर्स, नो हॉकर्स झोनविषयी संघटनेने सुचविलेल्या पर्यायांची तातडीने अंमलबजावणी केली जावी. हॉकर्स नोंदणी व दैनंदिन करवसुलीसाठी शुल्काबाबत शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन चर्चा करावी. तोपर्यंत महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हॉकर्स, टपरीधारक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचा जप्त केलेला माल त्वरित परत करावा अशीही मागणी करण्यात आली. या मोर्चात संघटनेचे सुनील संधानशिव, जावेद शेख, पुष्पा वानखेडे, नवनाथ लव्हाटे, चंद्रकला पारवे, जया पाटील आदींसह शेकडो टपरीधारक, हॉकर्स सहभागी झाले होते.

निवेदनावरून वाद

हॉकर्स व टपराधारक संघटनेच्या वतीने मोर्चानंतर आयुक्तांना निवेदन देण्याची मागणी केली. परंतु आयुक्तांनी हॉकर्सना भेटण्यास नकार देत, चार वाजेची वेळ दिली. अतिरिक्त आयुक्तांनीही भेट नाकारल्याने हॉकर्स संतप्त झाले. त्यांनी कार्यालयालयाबाहेरच ठिय्या मांडला. जोपर्यंत आयुक्त भेट देत नाहीत, तोपर्यंत जाणार नाही असा आग्रह धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठ उलगडणार वैद्यकशास्त्रातील चरित्रनायकांचा इतिहास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील १८ व १९व्या शतकात आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद आणि होमिओपॅथी विद्याशाखेत काम केलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा परिचय आता लवकरच सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण- शिल्पकार चरित्रकोष यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, येत्या तीन ते चार महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास येण्याची शक्यता विद्यापीठाने वर्तवली आहे. या चरित्रकोषामुळे वैद्यकशास्त्रातील माहिती मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे.

आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी याबरोबरच आयुष, युनानी चिकित्सा, सिद्ध चिकित्सा, निसर्गोपचार, योग, दंतचिकित्सा, नर्सिंग आदी विषयांबद्दल वैद्यकशास्त्राबरोबरच सर्वसामान्य चिकित्सक व्यक्तींनाही उत्सुकता असते. या शास्त्राचा इतिहास, विकास, त्याच्याशी जोडलेल्या व्यक्ती या विषयी माहिती जाणून घेण्यासाठीदेखील शोधाशोध केली जाते. हीच माहिती जर आपल्या मातृभाषेत मिळाली, तर ते समाधान मोठे असते. त्यामुळेच हा चरित्रकोष तयार करण्यात येत आहे. यामध्ये आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या तीन मुख्य विभागांमध्ये या तिन्ही क्षेत्रांमधील व्यक्तींचे चरित्रे त्या त्या चिकित्सांचा आढावा घेण्यात आला आहे. तज्ज्ञांनी लिहिलेल्या तिन्ही विभागांच्या प्रस्तावना आणि परिशिष्ट्ये म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या त्या त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, कॉलेज, नियतकालिके यांची सविस्तर माहिती अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारी आहे. याशिवाय 'इतर चिकित्सा' या चौथ्या विभागामध्ये आयुष, युनानी चिकित्सा, सिध्द चिकित्सा, निसर्गोपचार, योग, दंतचिकित्सा, नर्सिंग हे विषय मांडण्यात येणार आहेत.

या प्रकल्पात समावेश असलेल्या चरित्रनायकांविषयीची माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

नावे सुचविण्याचे आवाहन

या चरित्रात महाराष्ट्र राज्यात वैद्यक शास्त्रामध्ये काम केलेल्या व्यक्तींची नावे प्रकल्पाव्दारे समोर येणार आहेत. त्यासाठी नावे सुचविण्याचे जाहीर आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. तसेच, या प्रकल्पात आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या तिन्ही विभागात काम केलेल्या चरित्रनायकांची माहितीचे संकलन अंतिम टप्प्यात आले असून, याबाबत माहिती असल्यास विद्यापीठाच्या pr@muhs.ac.in या ई मेलवर येत्या ३ मार्चपर्यंत पाठविण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपिटीची शक्यता धूसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, वातावरणातील बदलांमुळे शनिवारी २४ फेब्रुवारीला पाऊस आणि गारपीट होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रब्बीची पिके हातातोंडाशी आली असताना नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २३ फेब्रुवारीपासून पुढील ४८ तासांत हवामान विभागाने गारपिटीची शक्यता वर्तवली होती. शेतांमध्ये कापून ठेवलेली पिके सुरक्षित स्थळी हलविण्यासह नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी केले होते. नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी, तर काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. नगदी पिकांना याचा सर्वाधिक धोका होता. द्राक्ष, कांदा यांची काढणी सध्या सुरू असून, रब्बी हंगामही नुकताच सुरू झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका या दोन पिकांना बसण्याची शक्यता अधिक होती. याशिवाय हरभरा, गहू ही पिकेही कापणीला आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

परंतु, शुक्रवारी सकाळी वर्तविण्यात आलेल्या हवामानाच्या अंदाजात वातावरणातील बदलांमुळे पाऊस तसेच, गारपिटीची शक्यता धूसर झाल्याचे कळविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान काहीसे ढगाळ राहणार असल्याचेही पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात सर्वपक्षीय मोट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या जबर करवाढीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असून, या निर्णयाविरोधात आता सर्वपक्षीय आंदोलनाची मोट बांधली जाणार आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने शहरातील सर्वपक्षीय नेते आणि मराठवाड्याच्या पाणीआंदोलनाच्या धर्तीवर भाजपविरोधात रान उठवणार असून करवाढीच्या कायदेशीर बाबी तपासण्यासह जनजागृती आंदोलन सुरू केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, माकपासह लहान पक्षांशीही चर्चा केली जाणार आहे. महापौरांनी करवाढीसंदर्भात सर्व पक्षांना एकत्र बोलावून चर्चा करावी, अन्यथा नाशिककरांना बरोबर घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा बोरस्ते यांनी दिला. काँग्रेसने शुक्रवारी धरणे आंदोलन केले, तर राष्ट्रवादीनेही विभागीय कार्यालयांवर हल्लाबोल मोर्चे सुरू केले आहेत. त्यानंतर शिवसेनेनेही यात उडी घेतली असून शिवसेना दोन वर्षांपूर्वी मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून करण्यात आलेल्या सर्वपक्षीय जनआंदोलनाच्या धर्तीवर एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली. जनआंदोलनासह कायदेशीर बाबींचीही पडताळणी केली जाणार आहे. जनतेत जाऊन या करवाढीविरोधात जनजागृती केली जाणार आहे. सध्या किती कर वाढणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे महापौरांनी तातडीने यााबाबत पुढाकार घेऊन करवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कायदेशीर लढाई

स्थायी समितीने महासभेवर केवळ १८ टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु प्रशासनाने परस्पर त्यात बदल करत, भरमसाठ करवाढ केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्थायीच्या ठरावात बदल करता येत नसतानाही, प्रशासनाने परस्पर फेरबदल केले आहेत. त्यामुळे याबाबतची कायदेशीर पडताळणी केली जात आहे. यावर प्रशासनालाही कायदेशीर बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे.

भाजपचा आवाज दबला

शिवसेनेने अन्य पक्षांसोबतच भाजपलाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचाही भेट घेणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. भाजपच्या नगरसेवकांनाही करवाढीविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महासभेत निवडक नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन केले असून मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक या करवाढीच्या विरोधात असल्याचा दावाही बोरस्ते यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांवर प्रशासनाचे दडपण असून भाजपचा आवाज गायब झाल्याची टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील अत्यंत गजबजलेला व अतिक्रमणाचा विळखा असलेल्या त्रिमूर्ती चौकाचा श्वास मोकळा करण्यासाठी महानगरपालिकेने दोन दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सुमारे तीस अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढले असून, यात झालेल्या नुकसानीची भरपाई मागणार असल्याचा दावा काही दुकानदारांनी केला. मोहिमेत भेदभाव झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मात्र, त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमणांबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या चौकातील वाहतुकीचा प्रश्न मिटणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

त्रिमूर्ती चौकात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, याच ठिकाणी असलेल्या दोन शाळा, बस थांबे, भाजी मार्केट यामुळे या रस्त्यावर कायमच रहदारी असते. शाळा सुटण्याच्या वेळी सायंकाळी येथे बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन अनेक वेळा अपघातही झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने यावर उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोन करून त्यांना पाटीलनगर मैदानाजवळ जागा दिली. त्यानंतर महानगरपालिकेने रस्त्याच्या लगत असलेल्या दुकानदारांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालवला. पहिल्या दिवशी सुमारे पन्नास दुकानांसमोरील अतिक्रमणे काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीस दुकानांसमोरील पत्र्यांचे शेड, ओटे यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. पालिकेने अवधी द्यावा अशी मागणी झाल्याने काही ठिकाणी दुकानदार व कर्मचारी यांच्यात तुरळक वाद झाले. एका दुकानासमोर असलेला फलक परवानगी घेऊन लावण्यात आला असतानाही प्रशासनाने तो काढून टाकल्याने संबंधित दुकानदाराने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

आज दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक व दत्त मंदिर परिसरातील रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढताना यात हातगाड्या, पानटपऱ्या, कुल्फीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्याचे सोडून प्रशासनाने सर्वसामान्य जनतेवर अन्याय केल्याची भावना काही दुकानदारांनी व्यक्त केली. त्यामुळे आता पालिकेने सर्वच अतिक्रमणे काढली पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मोहिमेने समाधान

सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रस्त्यांवरून रिक्षाही जाणे मुश्किल झाले आहे. यापूर्वी अनेकदा अतिक्रमण काढण्याच्या घोषणा झाल्या, परंतु प्रत्यक्षात कारवाईसाठी नवनियुक्त आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागल्याची चर्चा सुरू होती. सिडकोतील अतिक्रमण महानगरपालिकेने काढावे की सिडकोने यावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. मात्र, आता पालिकेने ही मोहीम हाती घेतल्याने सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार असल्याचे चित्र आहे. यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असंघटित बांधकाम मजुरांचे होणार कल्याण

$
0
0

कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी नोंदणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

असंघटित क्षेत्रातील बांधकाम मजुरांसाठी राज्य सरकारने कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. अशा २८ योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी बांधकाम मजुरांनी आवर्जून नोंदणी करवून घ्यावी, असे आवाहन महापौर रंजना भानसी आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी शुक्रवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बांधकाम मजूर नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाच्या दिशेने कामगार विभागाने कल्याणकारी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. यावेळी कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, सहायक आयुक्त किशोर दहीफळकर, रविराज इळवे आदी उपस्थित होते. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून २२ मार्चपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

इमारत, पदपथ, रस्ते, रेल्वे, सिंचन, विमान प्राधिकरण, टेलिफोन, विद्युत पारेषण, पूर नियंत्रण, बोगदे, पूल, तेल व वायूची जोडणी टाकणे, टेलिव्हीजन टॉवर्स, इत्यादींचे बांधकाम, फेरबदल, दुरुस्ती, बांधकाम पाडणे यांसारख्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये सहभागी होणाऱ्या मजुरांची नोंदणी या मोहिमेंतर्गत करून घेण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात काही मजुरांना प्रातिनिधीक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी मनरेगाच्या कामावर असणाऱ्या कामगारांची नोंदणी तत्काळ केली जाईल, अशी ग्वाही दिली. तत्पूर्वी मंडळाच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये कामगार नोंदणी मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातही व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे त्याचे प्रक्षेपण दाखविण्यात आले.

नोंदणीसाठी शासन कामगारांच्या दारी

जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात ५० हजारांहून अधिक कामगार आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यापैकी अवघ्या १६ हजार कामगारांची प्रत्यक्षात नोंदणी झाली आहे. सर्व कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी 'शासन कामगारांच्या दारी' हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांनी दिली. इमारत व इतर बांधकामांवर ठेकेदारामार्फत येणारे कामगार अनोंदीत आहेत. या कामगारांना नोंदणीचा लाभ मिळावा, यासाठी सरकारी व निमसरकारी कार्यालयांना नोंदणीचे अधिकार देण्यात आले आहेत. नोंदणीसाठी एखाद्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे कामगार बेरोजगार होतात. कामगाराने ९० दिवस काम केल्याचा पुरावा बांधकाम व्यवसायिकाकडून सादर करणे बंधनकारक आहे. सलग ९० दिवस काम मिळत नसल्याने राज्यात लाखो बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेपासून वंचित आहेत. बहुतांश कामगारांना आपल्यासाठी असे कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आहे, याची माहितीच नाही. त्यामुळे बांधकाम साईटसवर जाऊन नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात मालेगाव वगळता १० हजार २७७ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी सिडको, सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी, आणि जुने नाशिक या सहा विभागीय कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे. क्रेडाई या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांचेही मजूर नोंदणीसाठी सहकार्य घेतले जाईल.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने महासभेत भरमसाठ करवाढीला मंजुरी दिल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या करवाढीविरोधात राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपने केलेली करवाढ ही अन्याय्य असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली. ही करवाढ मागे न घेतल्यास काँग्रेसकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिला.

मंगळवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपने निवासी मालमत्ता करात ३३, अनिवासी मालमत्ता करात ६४ तर औद्योगिक मालमत्ता करात ८२ टक्के अशी भरमसाठ करवाढ केली आहे. या करवाढीच्या दिवशीच विरोधी पक्षांनी या करवाढीला विरोध करीत, आंदोलनांचा इशारा दिला होता. परंतु, तरीही सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्याने विरोधकांनी रस्त्यावर उतरून करवाढीचा निषेध सुरू केला आहे. माकपच्या आंदोलनानंतर शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेलमता पाटील, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, महिला काँग्रेस अध्यक्ष वत्सला खैरे, नगरसेवक राहुल दिवे, विमल पाटील, आशा तडवी, बबलू खैरे, वसंत ठाकूर, लक्ष्मण जायभावे, सुरेश मारू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करीत, करवाढीचा तीव्र निषेध केला. या करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी व उद्योजकांना मोठा फटका बसणार आहे. शहरात उद्योग येत नसताना, उद्योगांवर करवाढ लादल्याने ते बाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे ही करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ही करवाढ तातडीने मागे घेतली नाही तर लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही निवेदन देऊन करवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तायक्वांदो स्पर्धेत ब्रह्मा व्हॅलीचे यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशनतर्फे नूतन विद्यामंदिर भगूर, देवळाली कॅम्प येथे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ब्रह्मा व्हॅलीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामिगरी करीत प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत ब्रह्मा व्हॅलीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने शानदार कामिगरी करीत पदाकांची लयलूट केली. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक प्रेम गुरुंग यांचे मार्गदर्शन लाभले. पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, संचालक गुंजन सिंग, प्राचार्य चंद्रकांत शिरसाठ यांनी अभिनंदन केले. सुवर्णपदक विजते विद्यार्थी पुढीलप्रमाणे

सुवर्णपदक : प्रीतम गुरुंग, मानसी देशमुख, पुनीत पाटील, सार्थक अवसरकर, दीपक अवसरकर, अन्मोल कदम, संतोष भोया, प्रीतम वसावे, विश्वजीत घोदा, जॉण्टीराज चौधरी, छत्रपालन भोया, दर्शन मलकरी, अनिता चौधरी, ईश्वरी काचोळी.

रौप्यपदक : तुषार गांगुर्डे, साहील वसावे, सागर मधे, दिग्विजय बागूल, नागेश हिरकुडे, लीना गवळी, माया फुपाणे, रोहिणी पवार, मानसी राऊत, प्रीती पारधी, प्रज्ञा गिते, उज्ज्वल सोनार.

कांस्यपदक : कांतिलाल वसावे, उत्कर्ष कडू, तेजस चौधरी, सागर महाजन, चेतन एकवदे, पूजा दळवी, अरुणा गोविंद, प्रतीक्षा भुसारे, पूजा कुथडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायग्नोस्टिक किट पेशंटच्या मुळावर

$
0
0


arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : आजारपण ओळखण्यात डॉक्टरांना सहाय्य करणाऱ्या वेगवेगळ्या डायग्नोस्टिक किटच्या वारेमाप वापरातून पेशंटचे खिसे हालके करण्याची चढाओढ सर्वत्र सुरू आहे. डॉक्टरांचे वाढलेले तपासणी शुल्क आणि डायग्नोस्टिक किटचा वापर असा दुहेरी 'इलाज' पेशंटवर होत आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढते तशी त्याची किंमत कमी व्हायला हवी. आरोग्य क्षेत्रात नेमके उलटे वारे वाहत असून, त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

कुटुंबाच्या प्राथमिक गरजांमध्ये आरोग्याचे स्थान सर्वात वरचे आहे. महागडी आरोग्य सुविधा सर्वसाधारण कुटुंबाच्या आवाक्याबाहेर चालली आहे. बुद्धिमत्ता आणि अनुभव या आधारावर एकाच विभागाचे डॉक्टर वेगवेगळे शुल्क आकारतात. किमान ५०० ते दीड हजारांपर्यंत शुल्क आकरले जाते. दुसरीकडे पेशंटकडून अतिरिक्त पैसे काढण्यासाठी डायग्नोस्टिक किटचा वापर खुबीने वापर होत आहे. यामध्ये एमआरआय, सिटीस्कॅन, एक्स-रे तसेच रक्त-लघवी तपासणीचा समावेश होतो. नव्याने आलेल्या महागड्या मशिनरींचे, हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या इतर सुविधांचे पैसे वसूल करण्यासाठी आवश्यकता असो की नसो, पेशंटला अशा चाचण्यांना समोरे जावेच लागते. एमआरआय, सिटी स्कॅन तसेच एक्स रे मशिन्सचा वापर केव्हा आणि कसा करायचा, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्या डॉक्टरचा असतो. याचाच फायदा घेऊन आलेल्या पेशंटला या चाचण्या करण्यास भाग पाडले जाते. कंबर दुखणे एखाद्या औषधाने सहज थांबू शकते, याची जाणीव असलेले डॉक्टर सुरुवातीलाच एक्स रे काढण्याचे फर्मान सोडतात. मुंग्या येणे या प्रकारात हाडांची झालेली झिज किंवा दबलेली नस हे महत्वाचे कारण माहिती असताना डॉक्टर सिटी स्कॅन किंवा एमआरआयचा आग्रह धरतात. रक्त तपासणीबाबत तर खूपच ओरड आहे. थायरॉईडसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आजमितीस पाच हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या केल्या जातात. या तपासण्याअंती तसेच डॉक्टरांच्या उपचारानंतर १०० टक्के फरक पडतोच असे नाही.

तंत्रज्ञान जुने, पैसे मात्र वाढलेले

कोणतेही तंत्रज्ञान बाजारात आले की दिवसेंदिवस त्याची किंमत कमी होत असते. आरोग्य क्षेत्रात मात्र हे वारे उलटेच वाहते. सुरुवातीस आलेल्या मशिनरींनुसार किमती वाढवल्या जातात. त्यानंतर हजारो पेशंटच्या तपासणीनंतरदेखील तपासणी फी कमी होत नाही. किंबहुना त्यात वर्षागणिक वाढ केली जाते. महागड्या मशिनरी असलेल्या ठिकाणी आवश्यकता असो किंवा नसो, थेट तपासणी ठरलेलीच असते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ प्रकरणी एकच गुन्हा दाखल

$
0
0

अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून चौकशी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी. एल. थूल सदस्य (विधी) यांनी शुक्रवारी चौकशी करून माहिती घेतली.

मुंबई येथून नाशिकला आल्यानंतर सकाळी ११ वाजता त्यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस व नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांबाबत चर्चा करून माहिती घेतली. 'महाराष्ट्र बंद'दरम्यान पोलिसांनी मागासवर्गीयांवर अन्याय करून मारहाण केली, काही ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केले, अशा अनेक तक्रारी शासनाकडे आल्या. त्यानंतर याबाबत चौकशी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश सरकारने दिले. त्यानंतर आयोगातर्फे पुणे, कल्याण, ठाणे, कोरेगाव भिमा, अहमदनगर, नागपूर, औरंगाबादसह विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यात महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांकडून दाखल झालेले गुन्हे, अटक करण्यात आलेले आरोपी, त्यामध्ये महिला, मुले, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आदींचा समावेश आहे का, याबाबत सविस्तर माहिती घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात एकच गुन्हा दाखल असून त्यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात काचा फोडणे व दगडफेक करणे अशा स्वरुपाचा गुन्हा आहे.

'महाराष्ट्र बंद'दरम्यान दाखल झालेले गुन्हे हे गुन्हेगारी स्वरुपाचे नाहीत. हा बंद सामाजिक व राजकीय आंदोलन होता. त्यात भावनेचा उद्रेक झाला. त्यामुळे या बंदमध्ये दाखल गुन्ह्यांबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. या चौकशीच्या वेळी अनुसूचित जाती-जमाती आयोगतील अधिकाऱ्यासह पोलिस अधीक्षक नरसिंग शेखाणे व आयोगाचे सहसंचालक रमेश शिंदे हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टोनमध्ये फसवणूक, सराफाला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीन कॅरेटचा एमराल्ड या किमती खड्याच्या (स्टोन)व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने भंडारी ज्वेलर्स गॅलक्सी प्रा. लि. ला स्टोन बदलून देण्याचे निर्देश दिले आहे. ते बदलता येत नसले तर ४० हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करण्याचे आदेशात म्हटले आहे.

शिर्डी येथील कुणाल सर्जेराव शेळके यांनी केलेल्या तक्रारीवरुन न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. शेळके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, तीन कॅरेट वजनाचा एमेराल्ड स्टोन ४० हजार रुपये किंमतीस खरेदी केला. स्टोन व सोन्याची अंगठी यापोटी ५४ हजार १३१ रुपये भंडारी ज्वेलर्सला दिले. अंगठी वापरण्यास सुरुवात केल्यानंतर दोन तीन दिवसात स्टोनच्या मध्यभागी आतील बाजूस तडा केल्याचे लक्षात आले. त्यासाठी ज्वेलर्समध्ये संपर्क साधला असता बदलून देण्याचे सांगण्यात आले. पण, नंतर स्टोन बदलून दिला नाही व रक्कमही दिली नाही. स्टोन तकलादू व कच्चा खडा देवून फसवणूक केल्यामुळे मला स्टोन द्यावे किंवा रक्कम परत मिळावी असे त्यांनी तक्रारीत सांगितले.

या तक्रारीवर भंडारी ज्वेलर्स गॅलक्सीकडून आपली बाजू मांडण्यासाठी कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे न्यायमंचाने हा एकतर्फी निकाल दिला. या निकालात न्यायमंचाने म्हटले की, भंडारी ज्वेलर्सने निकृष्ठ, तकलादू व कच्चा एमेराल्ड स्टोन विक्री केला आहे. सदर बाब अनिष्ठ व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी व ग्राहकाच्या सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत स्टोन बदलून द्यावा. स्टोन बदलून देणे शक्य नसल्यास तक्रारदाराला ४० हजार रुपये व्याजासह द्यावे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करावे असा निकाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी चिमुकल्यासह क्रूझर चालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ट्रक आणि बसच्या अपघातात जखमी झालेल्या भाविकांपैकी दोघा जणांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एका पाच महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. अपघाताची घटना त्र्यंबक-जव्हार मार्गावरील वाघेरे फाटा येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाली होती. अपघातात एकूण १२ व्यक्ती जखमी झाल्या होत्या. श्रेयस उर्फ पिंट्या जनार्दन बुधर (वय ५ महिने) व जीपचालक लक्ष्मण सोनू गिरे (३३) अशी उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. वटकपाडा आणि मुरंबी या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांमधील भाविक देवी दर्शनासाठी क्रुझर जीपने निघाले होते. गिरणारे येथील देवी दर्शन आटोपून घराकडे परतणाऱ्या जीपला भरधाव वेगातील मालट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात जीपमधील १२ लहान मोठ्या व्यक्ती जखमी झाल्यात. त्यांना लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इन्शुरन्स’च्या नावाखाली आठ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुमच्या पॉलिसीला प्रॉब्लेम झाल्याचे सांगत चोरट्याने एकाला तब्बल आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड ब्लॉक झाले, अपटेड करून देतो किंवा कार्ड्सवर ऑफर सुरू असल्याचे सांगत आणि बँकेचे अधिकारी असल्याचे भासवणारे चोरटे नागरिकांच्या बँक खात्यावर सहजतेने डल्ला मारतात. आता चोरट्यांनी वेगवेगळे पॉलिसीधारक लक्ष्य केले असून, चेतनानगर परिसरातील श्रीकृष्ण मंदिराजवळ राहणाऱ्या दत्तात्रय बाबुराव पानसरे यांची याच माध्यमातून आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पानसरे यांच्या तक्रारीनुसार, दि. १६ ऑगस्ट २०१७ ते २७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत हा प्रकार घडला. अनोळखी संशयिताने फोन करून आपण मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. पानसरे यांच्याकडे याच कंपनीची पॉलिसी असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले. तुमच्या पॉलिसीला प्रॉब्लेम झाला असून, तुम्ही नवीन पॉलिसी काढा, जास्त रिटर्न्स मिळतील, असे आमिष दाखवून त्या संशयिताने पानसरे यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. पानसरे यांनी 'आरटीजीएस'द्वारे वरील कालावधीत सात लाख ९८ हजार ५९३ रुपयांची रक्कम संशयिताच्या बँक खात्यात वर्ग केली. मात्र, पैसे दिल्यानंतरही रिटर्न्स मिळत नसल्याने पानसरे यांनी संशयित आरोपीच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, तो मोबाइल बंद असल्याने पानसरे यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पानसरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक खडके तपास करीत आहेत.

फोनवर माहिती देऊच नये

बँक, कार्ड्स अथवा इन्शुरन्स पॉलिसीबाबत कोणतीही माहिती फोनवर देऊ नये, तसेच त्यासाठी व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फसवणुकीचा हा प्रकार नवीन राहिला नसून, नागरिकांनी काळजी घेतली, तर चोरट्यांना संधीच मिळणार नाही, असेदेखील पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ व्यापाऱ्यांकडून फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीन कॅरेटचा एमेराल्ड स्टोनमध्ये फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने भंडारी ज्वेलर्स गॅलक्सी प्रा. लि. ला स्टोन बदलून देण्याचे निर्देश दिले आहे. ते बदलता येत नसले तर ४० हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करण्याचे आदेशात म्हटले आहे.

शिर्डी येथील कुणाल सर्जेराव शेळके यांनी केलेल्या तक्रारीवरुन न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. शेळके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, तीन कॅरेट वजनाचा एमेराल्ड स्टोन ४० हजार रुपये किंमतीस खरेदी केला. स्टोन व सोन्याची अंगठी यापोटी ५४ हजार १३१ रुपये भंडारी ज्वेलर्सला दिले. अंगठी वापरण्यास सुरुवात केल्यानंतर दोन तीन दिवसात स्टोनच्या मध्यभागी आतील बाजूस तडा केल्याचे लक्षात आले. त्यासाठी ज्वेलर्समध्ये संपर्क साधला असता बदलून देण्याचे सांगण्यात आले. पण, नंतर स्टोन बदलून दिला नाही व रक्कमही दिली नाही. स्टोन तकलादू व कच्चा खडा देवून फसवणूक केल्यामुळे मला स्टोन द्यावे किंवा रक्कम परत मिळावी असे त्यांनी तक्रारीत सांगितले.

या तक्रारीवर भंडारी ज्वेलर्स गॅलक्सीकडून आपली बाजू मांडण्यासाठी कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे न्यायमंचाने हा एकतर्फी निकाल दिला. या निकालात न्यायमंचाने म्हटले की, भंडारी ज्वेलर्सने निकृष्ठ, तकलादू व कच्चा एमेराल्ड स्टोन विक्री केला आहे. सदर बाब अनिष्ठ व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी व ग्राहकाच्या सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत स्टोन बदलून द्यावा. स्टोन बदलून देणे शक्य नसल्यास तक्रारदाराला ४० हजार रुपये व्याजासह द्यावे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करावे असा निकाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोतनीस हाजीर हो!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने गांवकरी प्रकाशनाचे अरविंद पोतनीस व वंदनराव पोतनीस यांना ५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पोतनीसांविरुध्द अनेक ठेवीदारांनी न्यायमंचात ठेवी परत मिळाव्या, यासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यात काही प्रकरणात निकालही लागले. त्यात न्यायमंचाने ठेवी देण्याचे आदेश दिले. पण, हे आदेश दिल्यानंतरही ठेवी न दिल्यामुळे पोतनीसांना हजर राहण्याचे आदेश न्यायमंचाने दिले आहेत.

न्यायमंचातर्फे हजर राहण्यासाठी जाहीर नोटीसही प्रसिध्द करण्यात आली असून, त्यात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २७ खाली शिक्षा पात्र अपराध केल्याची फिर्याद दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यावरून अटक वॉरंट काढले आहे. पण, वॉरंटची बजावणी चुकविण्यासाठी पोतनीस हे गुप्तपणे वावरत आहेत किंवा फरार झाले असल्याचे फिर्यादीने पटवून दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे न्यायमंचाने समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ठेवीदारांच्या तक्रारीवरून अनेक प्रकरणात निकाल दिलेला असताना त्याची दखल न घेतल्यामुळे न्यायमंचाने आपल्या अधिकाराचा वापर करून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. हे आदेश न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्या प्रेरणा साळुंखे यांच्या सहीने काढण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानांद्वारे स्वच्छतेचा जागर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका पावले उचलत असतानाच शाळांशाळांमधून हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला, तर त्याचा परिणाम अधिक योग्य प्रकारे होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन, महापालिका, विविध पर्यावरणप्रेमी संस्था व सोर्स म्युझिक अॅकॅडमीतर्फे संयुक्त विद्यमाने गाडगे महाराज जयंतीनिमित्त एक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. झाडांखाली पडलेली पाने वेचून त्यावर विद्यार्थ्याने स्वच्छतेचा संदेश लिहायचा, तो आपल्या पालकांना दाखवायचा आणि ती पाने घंटागाडीत जमा करायची, असा हा उपक्रम आहे.

इंदिरानगर येथील केंब्रिज शाळेमध्ये प्रभाग ३० मधील लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमी संस्था व गायक, संगीतकार संजय गिते यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. झाडाचा पालापाचोळा व इतर कचरा ही संपत्ती असून, ती जाळून नष्ट करण्यापेक्षा तिचे योग्य वर्गीकरण करून कचरा रस्त्यावर न फेकता महापालिकेच्या घंटागाडीतच दिला, तर त्यापासून खत, कचऱ्याचा पुनर्वापर व वीजनिर्मिती करणेही शक्य आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता स्वच्छतेचे तीन संदेश केंब्रिज शाळेचे विद्यार्थी झाडाच्या वाळलेल्या पानांवर लिहून आणतील, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी दिली. स्वच्छ हवेसाठी नागरिकांनी झाडाचा पालापाचोळा वा कुठल्याही प्रकारचा कचरा जाळू नये, असे आवाहन पर्यावरणप्रेमी संस्थांनी केले आहे.

घरोघरी पोहोचवणार संदेश

लहानपणापासूनच मुलांना कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावे व झाडाचा पालापाचोळा जाळून प्रदूषण न करता स्वच्छतेचा संदेश मुलांमार्फत घरोघरी पोहोचावा या उद्देशाने झाडाच्या वाळलेल्या पानांवर स्वच्छतेचे तीन संदेश लिहून जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सोमवारपासून नाशिकमधील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. 'मटा' या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज वितरण कंपनीने नियमानुसार सेवा द्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मीटर रीडिंग न घेताच अंदाजे वीजबिले दिली जात आहेत. अशी वीजबिले रद्द करावीत व दुरुस्त बिले द्यावीत, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. वीज वितरण कंपनीने नियमानुसार सेवा द्याव्यात, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

नाशिक जिल्हा ग्राहक परिषदेची बैठक नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये ग्राहक पंचायतींच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी अनेक तक्रारी मांडल्या. दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथे काही शेतकऱ्यांना मीटर रीडिंग न घेताच अवास्तव बिले दिली जात असल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली. अशा शेतकऱ्यांना रीडिंगद्वारे अचूक बिले द्यावीत तसेच त्यांना एस.ओ.पी भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शहरात वाटप होणाऱ्या दुधात भेसळ होत असल्याची तक्रारही करण्यात आली. भेसळयुक्त दूध उत्पादकांवर कारवाई करावी, तसेच या दुधाची तपासणी केली जावी, अशी मागणी करण्यात आली. सिन्नर येथे विद्युत पोल पडल्याने एका शेतकऱ्याची कृषिपंपसेवा एक वर्ष बंद होती. त्यामुळे या शेतकऱ्याच्या शेतीचेही नुकसान झाले. या शेतकऱ्याला प्रतिदिन १,२०० रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. वीज मीटरचे रीडिंग घेणाऱ्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याने गणवेशावर स्वत:चे नाव लावणे आवश्यक आहे. संबंधितांनी ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक असून, तसे न केल्यास प्रत्येक ग्राहकास ५० रुपये भरपाई द्यावी, अशी मागणीही या बैठकीत नोंदविण्यात आली.

... तर सिनेमागृहांवर कारवाई करू

सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो. अशा सिनेमागृहांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर सिनेमागृहांबाबत लेखी तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपस्थितांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images