Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

या थापाड्या सरकारला धडा शिकवा: मुंडे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी/निफाड

शिवसेना-भाजप युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी असून, शिवसेना ही पूर्वीची शिवसेना राहिली नसून, ती भिवसेना झाली आहे. जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून फसविणाऱ्या फसवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

दिंडोरी, निफाड व कळवण येथे शिवसेना-भाजप युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडे पुढे म्हणाले, की लोकसभेपूर्वी गुजरात मॉडेल व 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता मिळवली. पंधरा लाख बँक खात्यावर देण्याचे आश्वासन दिले. जनधन खाते उघडायला लावले पण बँक खात्यात दमडीही आली नाही. सातबारा उतारा कोरा, वीज वीजबिल माफ, शेतमालाला भाव आदी आश्वासने देत फडणवीस सरकार सत्तेत आले, पण त्यांनी सर्वांची फसवणूक केली. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे मुंडे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदींविरोधात देशातील जनता जात असल्याचे पाहता लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. हे 'थापाडे सरकार' असल्याचा घणाघात करीत या सरकारला खाली खेचण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

पाणी पळवू देणार नाही

मांजरपाडा वळण योजना प्रकल्प आम्ही सुरू केला, पण शिवसेना-भाजप युती सरकारने ते काम बंद पाडले. हे पाणी महाराष्ट्रातील जनतेला देण्याऐवजी गुजरातला देण्याचा घाट घातला आहे. पण, हे पाणी आम्ही गुजरातला कदापि जाऊ देणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना-भाजप युती सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. फक्त घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या या सरकारला खाली खेचा. सर्वसामान्यांना तुम्ही 'डिजिटल इंडिया'ची स्वप्न दाखवतात. तो जर उपाशी असेल तर तुमचा डिजिटल इंडिया काय कामाचा. न्याय मिळत नाही म्हणून लोकांना मंत्रालयात जाऊन आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तरी अशी सत्ता आम्हाला नको. मराठी शाळा बंद केल्या तर मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही.

- सुप्रिया सुळे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावजाच्या शोधात बिबट्या विहरीत पडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सावज शोधत असलेला बिबट्या शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान विहिरीत पडल्याची घटना तारुखेडले येथे घडली. शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाने क्रेनच्या साहाय्याने बिबट्याला बाहेर काढत पिंजऱ्यात जेरबंद केले.

तारुखेडले येथील संतोष शिंदे यांच्या गट नं. १६ मधील क्षेत्रात पहाटे पाच वाजेच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत कोसळला. विहिरीत पडल्यावर तो जोरजोरात डरकाळ्या फोडू लागला. शिंदे यांनी लागलीच वनविभागाला कळविल्यानंतर सहाय्यक वन संरक्षक राजेंद्र कापसे, वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी आदींनी विहिरीत क्रेन सोडून बिबट्याला बाहेर काढले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात टाकून निफाड येथील वनविभागाच्या नर्सरीत नेण्यात आले. येथे पशुवैधकीय आधिकारी चांदोरे यांनी बिबट्याची तपासणी केली आहे. नर जातीचा बिबट्या असून त्याचे वय साडेचार वर्ष असल्याचे भंडारी यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाडी नाला गटारगंगाच

$
0
0

वाघाडी नाला गटारगंगाच

काँक्रिटीकरणानंतरही 'जैसे थे' परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ परिसरापासून वाल्मिकनगरातून वाहत येणाऱ्या वाघाडी नाल्याच्या नशीबी अजूनही गटारीचेच स्वरुप आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गोदावरीला करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाबरोबरच वाघाडी नाल्याचेही काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र या नाल्यात गटारीचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नाल्याला गटारगंगेचे स्वरुप कायम असल्याचे दिसत आहे.

गोदावरी नदीला पंचवटी परिसरातून येऊन मिळणाऱ्या दोन नद्यांचा उल्लेख केला जातो. त्यातील एक अरुणा आणि दुसरी वरुणा नदी आहे. त्यातील अरुणा नदी आणि गोदावरीचा संगम रामकुंड येथे होतो. तर वरुणा नदी ही गोदावरीला म्हसोबा पटांगण येथे मिळते. असे असताना अरुणा नदीचे अस्तित्वच नष्ट झालेले आहेत. काँक्रिटीकरणात नदी दिसेनाशी झालेली आहे. पंचवटीतील सरदार चौक, काळाराम मंदिर, शनीचौक या भागातील ड्रेनेज लाइन सांडव्यावरच्या देवी मंदिरासमोरून म्हसोबा पटांगणाशेजारून वळविण्यात आलेली आहे. या गटारीचे पाणी थेट वाघाडी नाल्यात सोडण्यात आलेले आहे. अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त असलेल्या पाण्यामुळे वाघाडी नाला घाण झालेला दिसतो.

गटारीच्या पाण्यामुळे दलदल

काँक्रिटीकरण केलेल्या या वाघाडी नाल्यातून सध्या कमी पाणी वाहत असून, या पाण्यासाठी नाल्यात खोलगट आकार करण्यात आला आहे. त्यातूनही या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. या पाण्यात कचरा, घाण आणि वाल्मिकनगर परिसरातील पूलाच्या खालच्या भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांमुळे हे पाणी घाण झालेले आहे. त्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे ते पाणी महापालिकेने बांधलेल्या भाजीमार्केटच्या पश्चिमेच्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळच मोकळे करण्यात आल्याने या भागात गटारीच्या पाण्यामुळे दलदल तयार झाली आहे. गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याच्या वल्गना करीत असताना वाघाडी नाल्याच्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही ही बाबही लक्षात घ्यावी लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा पूल अखेर खुला

$
0
0

प्रवाशांच्या मागणीनंतर एक बाजू सुरू

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी गावाजवळ दारणा नदीच्या पात्रात नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी शुक्रवारी (दि. १६) सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. या पुलावरून वाहतुकीची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दुसरी बाजू मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेली नाही.

नाशिक-पुणे महामार्गाचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. चेहेडीगावाजवळ दारणा नदीच्या पात्रात नवीन चारपदरी पुलाचे कामही काही महिन्यांपासून पूर्ण झालेले आहे. मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. परिणामी, जुन्या पुलावर वारंवार होत असलेल्या वाहतुकीच्या विस्कळीतपणामुळे प्रवाशी त्रस्त झालेले होते. मात्र या पुलाच्या एका बाजूवरून नाशिकरोड ते सिन्नरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

'नाशिकरोड-चेहेडी'च्या कामाला खो

सिन्नर ते चेहेडीदरम्यान नाशिक-पुणे महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी नाशिकरोड-चेहेडीदरम्यान सुमारे अडीच किलोमिटर महामार्गाचे काम न्यायालयीन वादामुळे रखडले आहे. या दरम्यान महामार्ग रुंदीकरणात २३६ झाडे तोडावी लागणार असल्याने या कामास वृक्षप्रेमींनी न्यायालयात विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. झाडे तोडण्यास परवानगी मिळालेली नसल्याने दारणा पुलाजवळ चेहेडी गावाच्या बाजूकडील संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झालेले नाही. परिणामी, हा पूल वाहतुकीसाठी खुले करणे धोक्याचे होते.

निकालाची प्रतीक्षा; खर्चात वाढ

महामार्ग रुंदीकरणाच्या कामास अडथळा ठरणारी २३६ झाडे तोडण्यावरून उद्भवलेला वाद न्यायालयात निकालावर आहे. शुक्रवारीही या संदर्भात दाखल याचिकेवर अंतिम निकाल होऊ शकलेला नाही. याचिकेवरील सुनावणी पूर्ण आहे मात्र निकाल बाकी आहे. त्यामुळे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे. आतापर्यंत ३१२ कोटी रुपयांचा खर्च या महामार्गाच्या रुंदीकरणावर झाला आहे. उर्वरित काम रेंगाळल्याने आता या प्रकल्पाच्या मूळ खर्चात मोठी वाढ होणे अटळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत कर्जवसुलीसाठी सचिवही उतरणार मैदानात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा बँकेच्या थकीत कर्जवसुलीसाठी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिवही आता मैदानात उतरणार आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर आणि जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बँकेच्या कर्जवसुलीसाठी सचिवांना ग्रामीण भागात कामाला लागण्याचे आदेश नीलकंठ करे यांनी दिले आहेत. तसेच थकबाकीदारांवर आता कलम १३८ अन्वये दावा दाखल करण्याची तयारीही बँकेने केली असून, तशी मागणी जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या थकीत कर्जवसुलीसह विविध अडचणीबाबत अध्यक्ष आहेर यांनी जिल्हा उपनिंबधक करे यांची भेट घेतली. या भेटीत बँकेच्या कर्जवसुलीसाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा झाली. त्यात कर्जवसुलीसाठी विकास सोसायटीच्या सचिवाचाही सहभाग असावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच जुने व मोठे थकबाकीदारांची स्थावर मालमत्ता जप्त करून तीचा लिलाव करणे, मोठया प्रमाणात थकबाकी झालेले ट्रॅक्टर जप्त करून लिलाव करणे आदि बाबींवरही चर्चा झाली.

त्यावर करे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. करे यांनी सोयायटी सचिवांना आदेश काढून जिल्हा बॅक वसुली कारवाईत सहभागी होण्याचे आदेश दिले आहे. गावपातळीवर वसुलीचे नियोजन करून जास्तीत जास्त वसुली करण्याचे आदेश त्यांनी पत्रात दिले आहे. तसेच दीड लाखांवरील कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांशी संवाद साधून, या योजनेत त्यांना सहभागी करून घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे वसुलीला जोर येण्याची शक्यता आहे.

कलम १३८ लावू द्या

ज्या थकबाकीदारांनी कर्जवसुली पोटी धनादेश दिले आहेत, त्यांच्यावर कलम १३८ अन्वये दावा दाखल करणेबाबत कारवाई करण्याची मागणी आहेर यांनी करे यांच्याकडे केली आहे. जिल्हा बँकेला याबाबत कारवाईसाठी कायदेशीर अडचण येत असून, त्यासाठी जिल्हा उपनिंबधकाकडून अधिकार मिळाल्यास ही कारवाई करता येवू शकते. त्यासाठी असलेल्या कायदेशीर बाबी ही त्यांनी जाणून घेतल्या असून, त्यावरही निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी अध्यक्ष आहेर यांनी चर्चा केली. यात कर्जवसुलीसाठी सहकार्य करण्याचे साकडे त्यांनी साचिवांना घातले. त्यास सचिवांनी प्रतिसाद कर्जवसुलीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशवाडी भाजीमार्केट चकाचक

$
0
0

मनपा आयुक्तांच्या पाहणीच्या भीतीने स्वच्छता

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशवाडी रस्त्यालगत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजीमार्केट दुर्लक्षित झाल्यामुळे तेथे प्रचंड घाण साचली होती. भाजीविक्रेते आणि महापालिका यांच्या वादामुळे वापराविना पडून असलेले हे भाजीमार्केट बेघरांचे आणि भिकाऱ्यांचे निवासस्थान म्हणूनच नाही, त्यांचे स्वच्छतागृहदेखील बनले होते. मात्र नूतन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे पाहणी करतील या भीतीने हे मार्केट स्वच्छ करण्यात आलेले आहे.

महापालिकेत नुकतेच बदलून आलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भाजीबाजाराला पाहणी होण्याच्या अगोदरच त्याची स्वच्छता करण्याची दक्षता पंचवटी विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून या मार्केटमधील घाण दूर होऊन मार्केट चकाचक झालेले आहे.

नाशिक शहर हे हागणदारीमुक्त शहर असल्याचे जाहीर केले गेले असले तरी या मार्केटमध्ये पाहणी केल्यानंतर किती घाण आणि दुर्गंधी पसरली होती याची कल्पना आली असती. अशा भागात जर आयुक्त मुंढे यांनी पाहणी केली तर काय होईल या भीतीपोटी येथील स्वच्छतेच्या कामाला प्रचंड गती देण्यात आली. तसेच तातडीने हे अत्यंत घाण असलेले मार्केट स्वच्छ करण्यात आले.

अधिकाऱ्यांची दक्षता

काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदाघाटाची पाहणी केली होती. त्यावेळी म्हसोबा पटांगण येथे पाहणी करीत असताना त्यांना गणेशवाडीचे भाजीमार्केटही बघून घ्या, असा आग्रह धरला. मात्र, मुंढे यांनी आज गोदाघाट बघायचा आहे असे म्हणत भाजीमार्केटकडे जाण्याचे टाळले. त्यांची या भाजी मार्केटमध्ये कधीही व्हिजिट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पंचवटी विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून भाजीबाजाराच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.

भाजीबाजाराचा मोकळा श्वास

या स्वच्छतेदरम्यान या मार्केअमध्ये बस्तान बसविलेल्या लोकांना येथून हाकलण्यात आले. याठिकाणी भाजीबाजार भरत नसल्याने शौचालय आणि मुतारीसाठीच या भाजीमार्केटचा वापर केला जात होता. तो आता थांबणार असून, या भाजीबाजाराला मोकळा श्वास घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या भाजीमार्केटची अवस्था अत्यंत खराब झाली होती. येथून येता-जाताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. या इमारतीच्या पायऱ्या आणि मागची बाजूचा वापर शौचालयासाठी केला जात असल्यामुळे येथे घाण साचली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतींच्या जन्मोत्सवानिमित्त शहर शिवमय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोमवारी (दि. १९) साजऱ्या होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून शहर छत्रपतींच्या जयजयकारासाठी सज्ज झाले आहे. शहरात नजर जाईल तेथे शिवजन्मसोहळ्याच्या तयारीचे चित्र दिसून येत आहे. कार्यकर्ते तहान-भूक विसरून जयंती सोहळ्याच्या पूर्वतयारीला लागले आहेत.

शहरातील मध्यवर्ती परिसरासह विविध उपनगरांमध्ये शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी या सोहळ्यानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. जयंतीनिमित्त शहरात विविध परिसरांमध्ये मिरवणूक सोहळा रंगणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित उपक्रमात ४० फूट उंचीचे होर्डिंग आणि ६१ फुटी भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सोहळ्यास सुरुवात होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ वंदन, शिववंदन आणि शिवगर्जना होऊन या मैदानातून सकाळी १० वाजता पालखी सोहळा सुरू होईल.

शहरात विविध उपनगरांमध्येही शिवजन्मोत्सवाच्या तयारीचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. जागोजागी भगवे ध्वज, पताका, होर्डिंग उभारणी, चौक सुशोभीकरण, विविध सामाजिक कामांची पूर्वतयारी असे चित्र दिसून येत आहे. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्सवाच्या दोन दिवस आधीच शहर शिवमय झाले आहे.

पालखी सोहळ्याचा मार्ग असा

शिवजन्मोत्सव सोहळा समितीतर्फे आयोजित पालखी सोहळ्यांतर्गत खडकाळी सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा यामार्गे रामकुंडापर्यंत पालखी अभिषेकासाठी प्रस्थान करेल. या पालखी सोहळ्यात ढोल पथक, लेझीम पथक आणि चित्ररथ सहभागी होणार आहेत. यावेळी केवळ पारंपरिक वाद्यांचाच उपयोग केला जाणार आहे. या सोहळ्यात शिवचरित्रातील विविध प्रसंगांवर आधारित चित्ररथ असणार आहेत. आदिवासी तालुक्यांमधून आलेली नृत्य पथके, शाळा, कॉलेजेस आणि सामाजिक व सांस्कृतिक संघटनाही यात सहभागी होणार आहेत. ईदगाह मैदानावर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छिंदमविरोधात संताप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अहमदनगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शिवसेना आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत तीव्र निषेध केला.

शहरातील द्वारका चौफुली येथे श्रीपाद छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत श्रीपाद छिंदम मुर्दाबाद, भाजप सरकार होश में आओ, छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय? अशा घोषणा देत छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील हा महत्त्वाचा चौक घोषणाबाजीने दणाणून गेला होता. काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांची मोठी कुमक असल्यामुळे अनर्थ टळला.

यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम सैनिक होते. शिवजयंतीच्या तोंडावर केलेले विधान हे घातक आहे. शिवरायांच्या नावाने मते मागणाऱ्या सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे म्हणाल्या, की श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याच्या पाठीमागे कोणीतरी सूत्रधार आहे. हा सूत्रधार शोधून काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. श्रीपाद छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दखल करावा, त्याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे इब्राहिम अत्तार, मुख्तार शेख, संभाजी ब्रिगेडचे, विलास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या करुणा धामणे, दीपाली पाटील, वैशाली डुमरे, भारती बोरसे, कविता पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले होते. पंचवटीतल्या युवासेनेच्या वतीने मेहेर सिग्नलवर छिंदमविरोधात आंदोलन करण्यात आले.



मनसेचे जोडे मारो आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून शिवरायांचा जाणीवपूर्वक अपमान करणारे अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर श्रीपाद छिंदम याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून प्रतिमादहन करण्यात आली. यावेळी छिंदम यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष अनिल मटाले, खंडू बोडके, सातपूर विभाग अध्यक्ष सोपान शहाणे, नवीन नाशिक विभाग अध्यक्ष रामदास दातीर, महिला शहराध्यक्षा रिना सोनार, भानुमती आहिरे, पद्मिनी वारे, अरुणा पाटील आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेठ, सुरगाण्यात डॉक्टरांची वानवा

$
0
0

नाशिक : पेठ आणि सुरगाणा या आदिवासीबहुल भागात काम करण्यास तज्ज्ञ डॉक्टरच मिळत नसल्याने आरोग्य विभागाने हात टेकले आहेत. जवळपास तीन लाख रुपयांचे मानधन देण्यास आरोग्य विभाग तयार असताना ही परिस्थिती असून, काम करण्यास तयार असलेल्या खासगी डॉक्टरांची शोधमोहीम पुन्हा हाती घेण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

आरोग्य विभागाचे जाळे ग्रामीण भागात पोहोचले असले तरी अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या सर्वत्रच दिसते. विशेषत: भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरच आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसतात. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने बाळंतपणादरम्यान काही समस्या उद्भवल्यास ग्रामीण भागातील महिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. प्रवासात वेळ गेल्यास बाळ गुदमरणे किंवा इतर समस्या निर्माण होऊन अर्भकासह मातेच्या जिवाला धोका निर्माण होतो. दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमध्ये सिझेरियनसाठी हजारो रुपये खर्च करणे सर्वसामान्य कुटुंबांना अवघड जाते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटी, अर्धवेळ किंवा ऑन कॉल या पद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. यासाठी अगदी लाख ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या मानधनाची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये खासगी, तसेच सरकारी डॉक्टर्स मिळून हा कोरम पूर्ण झाला आहे. मात्र, पेठ आणि सुरगाणा तालुक्याकडे खासगी डॉक्टरांनीसुद्धा पाठ फिरवली आहे. याबाबत बोलताना सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले, की या दोन तालुक्यांत काम करण्यासाठी तयार असलेल्या डॉक्टरांना दुप्पट म्हणजे तीन लाखांपर्यंत किंबहुना त्यापेक्षा अधिक मानधन देण्यात येऊ शकते. आम्ही मागील काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, त्यास यश मिळालेले नाही. आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करणार असून, नियुक्ती देण्यात येणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जायची. आता मात्र त्यांना मानधनाबरोबरच कामानुसार अतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खासगी डॉक्टर आपली सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये देऊ शकतात.

मोफत सिझेरियन!

सामान्य आणि गरिबांना खासगी हॉस्पिटलमध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया करणे आर्थिक दृष्टिकोनातून अवघड असते. वेगवेगळ्या कारणांमुळे सिझेरियनचे प्रमाण वाढते असून, याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत ही सुविधा आता तालुका स्तरावर मोफत पुरविली जात आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून, हळूहळू ग्रामीण भागातून सिव्हिलमध्ये पाठवण्यात येणाऱ्या महिला रुग्णांची संख्या घटेल, असा विश्वास डॉ. जगदाळे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसएमएस जॉबच्या नावाखाली फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बल्क एसएमएस पाठवून घरबसल्या दहा ते पंधरा हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवून वृद्धास गंडा घालणाऱ्या दोन परप्रांतीयांविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला असून, तक्रारदाराच्या पाठपुराव्यानंतर, तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक कुमार आणि रणजितसिंग अशी या गुन्ह्यातील संशयितांची नावे आहेत. नवीन रमाकांत गंगावणे (वय ६१, रा. जयप्रसाद रेसि. जुनी पंडित कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी याबाबत वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांतून जाहिरात केली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देत गंगावणे यांनी संशयितांशी संपर्क साधला. एप्रिल २०१६ मध्ये संशयितांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी गंगावणे यांना भूलथापा मारल्या. घरबसल्या १५ ते २० हजार रुपये कमावण्यासाठी आमच्याकडे बल्क एसएमएस कीटसाठी नाममात्र शुल्क भरून नोंदणी करा, असे संशयितांनी सांगितले. त्यानंतर तुम्हाला आम्ही ग्राहक क्रमांक देऊ, त्यानुसार तुम्ही एसएमएस पाठवण्यास सुरुवात करा. या कामासाठी दर महिन्याला तुम्हाला मानधनापोटी ठराविक रक्कम दिली जाईल, असे गंगावणे यांना सांगण्यात आले. घरातच थांबणाऱ्या गंगावणे यांनी भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून, २८ एप्रिल २०१६ रोजी नोंदणी शुल्काचे १२ हजार रुपये संशयितांचे एसबीआय बँक खात्यात (खाते क्रमांक ३५३३६११५११६) मध्ये भरली. पैसे भरल्यानंतर अनेक दिवस उलटूनही बल्क एसएमएस किट मिळत नसल्याने गंगावणे यांनी संशयितांशी संपर्क साधला, तर संशयितांनी टॅक्ससाठी पुन्हा साडेचार हजार रुपये भरण्याचा सल्ला दिला. या प्रकरणात काही तरी काळेबेरे असून, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच गंगावणे यांनी चौकशी केली. यात संशयितांच्या फसवणुकीचा भंडाफोड झाला. या दरम्यान संशयितांचा संपर्क तुटल्याने गंगावणे यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र, यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता तपास सुरू केला. संशयितांनी बिहारमधील बँक खात्यातून पैसे काढून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याने पोलिसांनीही हात वर केले. तपासच होत नव्हता. मात्र, गंगावणे यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर दोन वर्षांच्या कालावधीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण समजून घेत सकारात्मक भूमिकेने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

बतावणीचा नाशिकरोडला आणखी एक प्रकार

वीज कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी एक लाख ७७ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना नाशिकरोड परिसरात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या दोन घटना दिंडोरी आणि पेठरोडवर घडल्या असून, या तिन्ही गुन्ह्यांतील आरोपी एकच असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

अलका नारायण धिवरे (वय ७५, रा. गुरुद्वारामागे, विद्याविहार कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धिवरे घरात एकट्या असताना हा प्रकार घडला. वीज कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून आरोपींनी धिवरे यांच्या घरात प्रवेश मिळवला. बिल भरलेले नाही, असे म्हणून आरोपींनी वृद्ध धिवरे यांच्याकडे बिल भरल्याची पावती मागितली. या वेळी आरोपींनी धिवरे यांना हातातील बांगड्या काढून ठेवण्याचा सल्ला देत धिवरे यांना बांगड्या काढून कपाटात ठेवण्यास भाग पाडले. यानंतर दोघांपैकी एकाने वृद्धेस गच्चीवरील लाइट पॉइंट बघायचा आहे, असे सांगत गच्चीवर नेले. दुसऱ्या आरोपीने कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या सहा तोळे वजनाच्या व सुमारे एक लाख ७७ हजार रुपये किमतीच्या चार बांगड्या काढून घेतल्या. उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. यापूर्वी, पेठ आणि दिंडोरीवरदेखील दोन भामट्यांनी जनगणना, तसेच वीज मीटरचे रीडिंग घ्यायचे असल्याचे सांगत दोन घरांतील दागिने काढून पोबारा केला असून, या सर्व घटनांमध्ये एकच गुन्हेगार असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.

नऊ जुगारींवर कारवाई

आर्टिलरी सेंटररोड आणि जेलरोड भागात सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पकडून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह रोकड हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणी उपनगर तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्टिलरी सेंटर रोडवरील चिंतामणी बंगल्यासमोर गुरुवारी रात्री काही जुगारी जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा मारला. यात रामदास वैरागर, तसेच त्याचे सहा साथीदार तीन पत्ती जुगार खेळताना सापडले. त्यांच्या ताब्यातून आठ हजार ३६० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक विलास गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार गोडसे तपास करीत आहेत. दरम्यान, दुसरी कारवाई जेलरोड भागातील चरणदास मार्केट भागात करण्यात आली. चरणदास मार्केट भागात शुक्रवारी सायंकाळी उघड्यावर मटका सुरू असताना नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी प्रभाकर टाक, तसेच त्याचा एक साथीदार कल्याण बाजार मटका जुगार खेळताना, तसेच खेळविताना सापडले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रकाश भालेराव याच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग निधीवरून प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पालिकेच्या वाडिया रुग्णालयातील बंदावस्थेत असलेल्या दोन रुग्णवाहिका, दिव्यांगांच्या निधीचे वाटप, मोकाट कुत्र्यांची समस्या आदी विषयांवरून शनिवारी झालेल्या महासभेत गदारोळ झाला. या सर्व विषयांवरून महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मोकाट कुत्र्यांवर प्रतिबंधात्मक शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामुग्रीच नसल्याची बाब उघडकीस आली.

येथील महापालिकेच्या सभागृहात शनिवारी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे व नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थित महासभा झाली. सभेच्या प्रारंभी शहरातील भूसंपादन दाव्यापोटी द्यावयाचा रक्कमेचा मुद्दा चर्चेस आला. याविषयी एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत न्यायालयात भूसंपादन प्रकरणी एकही निकाल पालिकेच्या बाजूने लागत नाही, असा आरोप केला. तसेच यासाठी पालिकेकडून स्थापन करण्यात आलेली सर्व प्रकारणे समोर का ठेवण्यात येत नाही? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान याविषयावर समितीने तयार केलेल्या अहवालास मंजुरी देण्यात आली.

अंदाजपत्रकात ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा विषय देखील गाजला. आर्थिक वर्ष संपत आले तरी देखील या निधीचा योग्य विनियोग का झाला नाही? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर सहायक उपायुक्त राजू खैरनार यांनी दिव्यांगांना साहित्य वाटप सुरू करण्यात येईल, असे सांगितले. शहरात मोकट कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील कुत्र्यांच्या लसीकरणावर अधिकाऱ्यांची उत्तरे आणि नगरसेवकांचे प्रश्नांचे गांभीर्य सोडून सभागृहात हास्य पिकले. पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया व लसीकरणासाठी रुग्णालय व आवश्यक सामग्री नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पालिकेच्या विकास आराखड्यात संगमेश्वर भूमापन क्रं. १२९१ हा भाग हरितपट्टा म्हणून दाखविला आहे. या भागात व्यायामशाळा उभारण्यासाठी आरक्षणात फेरबदल करण्याचा विषय उपमहापौर सखाराम घोडके यांच्या शिफारशीने चर्चेस आणण्यात आला होता. चर्चेअंती या जागेसाठीच्या आरक्षणात बदल करण्यास महासभेने मंजुरी दिली.

रुग्णवाहिका बंद का?

शहरातील वाडिया रुग्णालयातील दोन रुग्णवाहिका बंद असल्याच्या विषयावरून कॉंग्रेस नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुरुस्तीच्या नावाने या रुग्णवाहिका कित्तेक दिवस बंद आहेत. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. महापौर रशीद शेख यांनीही अधिकाऱ्यांना झापले. आरोग्य विभागाच्या कारभारवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी ७ आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.

'गठबंधन'चे तोंडावर बोट

महासभेत महागठबंधन आघाडीचे नगरसेवक अतिक अहमद कमाल यांनी परिधान केलेले काळे कपडे व तोंडावरील बोट चर्चेचा विषय ठरला. गेल्या महासभेत नगरसेवक कमाल हे नागरी समस्यांवरून बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांना महापौरांनी बोलू दिले नाही. एका दिवसासाठी निलंबित केले असल्याचे सांगत अतिक यांनी सभागृहात लोकशाही आहे की हुकुमशाही असा सवाल केला. तसेच काळे कपडे परिधान करून तोंडावर बोट ठेवून निषेधही व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध

$
0
0

जळगाव, धुळे, रावेरला पुतळादहन

टीम मटा

नगर महापालिका कर्मचाऱ्याशी फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज व शिवजयंतीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा शनिवारी (दि. १७) जळगाव, धुळे शहरासह रावेरला विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला.

जळगावात निषेध

जळगाव : शहरातही शनिवारी (दि. १७) शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनेकडून निषेध रॅली काढून नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा निषेध करण्यात आला. शिवसेनेकडून महापालिकेच्या इमारतीसमोरील चौकात छिंदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. दुपारी महापौर ललीत कोल्हे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, विनोद देशमुख यांच्या उपस्थितीत श्रीपाद छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

धुळ्यातही शिवप्रेमींकडून निषेध

धुळे : शहरात सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. १७) नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा निषेध करीत प्रतिकात्मक पुतळ्यास शेण लावून दहन करण्यात आले. शहरातील भगवा चौकातही संतप्त शिवसैनिकांनी छिंदमच्या नावाने ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देत त्यांचा पुतळा जाळला. ऐन शिवजयंतीच्या दोन दिवस अगोदर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवप्रेमींच्या भावना भडकल्या आहेत. सकाळी शहरातील मनोहर टॉकीजसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्च्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत श्रीपाद छिंदमच्या निषेधाच्या घोषणा देत त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या वेळी संयोजक मनोज मोरे, भोला वाघ, राजकुमार बोरसे, अर्जुन अण्णा पाटील, गौरव पवार, प्रदीप जाधव, संजय वाल्हे, रजनीश निंबाळकर आदींसह तरुण उपस्थित होते. शिवसेनेकडून भगव्या चौकात आंदोलन करण्यात आले. संतप्त शिवसैनिकांनी छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारीत निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनात रामदास कानकाटे, कैलास मराठे, भाऊसाहेब चौधरी, योगेश मराठे, हेमंत गायकवाड, कुणाल कानकाटे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


‘राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा’

रावेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रावेर मराठा सेवा संघाने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचाबद्दल अतिशय खालच्या पातळीचे शब्द वापरून उपमहापौर छिंदम यांनी अपमान केला आहे. याबाबत रावेरला मराठा सेवा संघाने त्याचा जाहीर निषेध केला आहे. या प्रकरणामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, सरकारने गुन्हे नोंदविण्यात दिरंगाई करू नये, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असून, राष्ट्रपुरुषांची बदनामी हा राष्ट्रद्रोह आहे. म्हणून या छिंदम यांच्यावर राष्ट्रपुरुषाचा अवमान, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक जातीय तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक लोकभावना दुखावून समाजात अशांतता निर्माण करणे व कलम १२४ अ नुसार देशद्रोह असे गुन्हे राज्य सरकारने तत्काळ दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार विजयकुमार ढगे व पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांना देण्यात आले. निवेदनावर प्रशांत पाटील, घनःशाम पाटील, अरुण पाटील, सोपान पाटील, किशोर पाटील, रमेश पाटील, नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी, योगराज पाटील, यादवराव पाटील, ललित बागूल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् नागाला मिळाले जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नागाची जोडी दिसणे की औत्सुक्याची गोष्ट असते. मात्र हे जुळण सुरू असताना एका नागाला जखम झाली. त्या नागावर सर्पमित्रांनी यशस्वी शस्रक्रिया करून त्याला जीवदान दिले.

पिंपळगाव बसवंतपासून जवळच असलेल्या उंबरखेड येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीजवळ नागाचे जुळण होते. यावेळी एक नाग लोखंडी पाइपात अडकल्याने त्याच्या पोटाजवळ फाटले होते. याबाबत सर्पमित्र भैय्या महाले यांना काही शेतकऱ्यांनी माहिती देताच त्यांना घटनास्थळी जावून त्या नागाला एका बरणीत टाकले. दुसऱ्याही नागाला वेगळ्या बरणीत टाकले. पोट फाटलेल्या नागवर उपचार करण्यासाठी सर्पमित्र पिंपळगावात पाहोचले. मात्र अशी शस्रक्रिया करण्याची सुविधा पिंपळगावात नसल्यामुळे त्यांनी आपल्या इतर मित्रांना याबाबत कळविले.

सामाजिक बांधिलकीतून मेडिकल व्यावसायिक रोहित कापुरे यांनी पराग हॉस्पिटलच्या डॉ. कविता सोनवणे यांना विनंती केली. त्यांनी शास्त्रक्रियाचे सर्व साहित्य दिले. मात्र पेशंट घाबरतील म्हणून हॉस्पिटलमध्ये शस्रक्रिया करू नका, अशी विनंती केली. सर्पमित्र व शास्त्रक्रियाचा अनुभव असलेले पिंटू पवार, योगेश डिंगोरे व भैय्या महाले यांनी दत्त मंदिराच्या ओट्यावर जखमी नागावर शस्रक्रिया केली. पवार यांनी जखमी नागाच्या पोटाला टाके घातले. टाके घालत असताना पडून असलेला नाग त्यानंतर काही वेळातच फणा काढू लागला. नाग दिसला की त्याला मारायला लाठ्या काठ्या घेऊन काही लोक तयार असतात. पिंपळगाव येथील या सर्पमित्रांनी एका विषारी नागाला मानवतेच्या दृष्टीने जीवदान दिले आहे.

आतापर्यंत ३ ते ४ जखमी नागांची यशस्वी शस्रक्रिया केली आहे. साप आणि नाग याबद्दल सर्वसामान्य नागरिकांत गैरसमज आहेत. ज्या ठिकाणी साप, नाग दिसतो अशा ठिकाणी जाऊन त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडत असतो.

-पिंटू पवार, सर्पमित्र पिंपळगाव ब.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी मॅरेथॉनद्वारे स्वच्छतेचा संदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील निमा व सिन्नर अॅथलेटीक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी आयेजित 'निमा मिनी मॅरेथॉन २०१८' स्पर्धेत जिल्हाभरातील दोन हजारावर स्पर्धक सहभागी झाले. सिन्नर औद्योगिक क्षेत्रात उद्योजक व कामगारांना स्वच्छता व व्यायामाचे महत्त्व पोहचविणारी मॅरेथॉन सर्वांचे आकर्षण ठरली.

येथील माळेगाव एमआयडीत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर, एस. के. नायर, संदीप भदाणे, अरूण चव्हाणके, सिन्नर अॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, चिटणीस बाळासाहेब लोंढे, अविनाश पगारे आदी उपस्थित होते.

सिन्नर मिनी मॅरोथॉनचे सलग १३ वर्षांपासून यशस्वीपणे आयोजन करण्यात येते. ही १४ वी मिनी मॅरेथॉनचे यशस्वी पार पडली. सिन्नर रनमुळे तालुक्यातील धावपटूंना प्रोत्साहन मिळाले असून अनेक धावपटूंनी राज्यपातळीवर नाव नोंदविले असल्याचे आमदार वाजे यांनी अधोरेखित केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेते

स्पर्धेत १२ वर्षाआतील मुलींच्या गटात सानिका चौधरी, मुलांच्या गटात अनिल चौधरी, १४ वर्षांआतील मुलींच्या गटात रविना चौधरी तर मुलांमध्ये विशाल मेंडके, १८ वर्षाआतील मुलींच्या गटात वनिता भोंबे तसेच मुलांमध्ये रवींद्र गावाडी, महिला खुला गटात काजल दळवी, तर पुरूष खुला गटामध्ये दिनकर लिलके यांनी प्रथम क्रमांक पटकावून विशेष प्राविण्य मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आजवर अनेक महापुरुषांनी योगदान दिले आहे. स्त्री शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळायला हवा, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी केले.

इंडिपेंडंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी टीचर्स युनियन महाराष्ट्र राज्य (इश्तू) या संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षकगौरव पुरस्कार वितरण व मेळाव्याप्रसंगी कुलगुरू वायुनंदन बोलत होते. सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी गझलकार अशरद मीनानगरी, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, प्रा. गंगाधर अहिरे, श्यामराव बँकेचे संचालक रवी पगारे आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. या वेळी मीनानगरी, प्रा. अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. रोहित गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. किशोर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र मोहिते यांनी आभार मानले. या वेळी अध्यक्ष रोहित गांगुर्डे, कार्याध्यक्ष सूर्यभान जगताप, सरचिटणीस किशोर शिंदे, उपाध्यक्ष दिनेश अहिरे, वैशाली बर्वे, किशोर शार्दूल, रवींद्र बगाव, काशिनाथ जोपळे, राजरत्न पानपाटील, सुशीलकुमार इंदवे, कृष्णा लोखंडे, बाबासाहेब खरोटे, चंद्रकांत रूपवते, मंदाकिनी देवकर उपस्थित होते.

या शिक्षकांचा झाला गौरव

प्राचार्य राम कुलकर्णी, संजय भामरे, के. एन. अहिरे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशांत नरवाडे, जयराम घारे, सचिन खरे, भाऊसाहेब खरे, भाऊराव राऊत, धनंजय सोनवणे, भीमराव उबाळे, शिवाजी भालेराव, गणपत बेंडकोळी, नीलेश ठाकूर, विजयकुमार बावा, प्रकाश कोळी, दिनकर पवार, तरन्नुम काझी, आशा डावरे, सुलभा बच्छाव, प्रमिला पवार, कमल आढाव, वाजेदा देशमुख यांना शिक्षकगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाऊसाहेब बोराडे यांना शिक्षकेतर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संघटनेने मांडले ठराव

सोहळ्यादरम्यान शिक्षकांना वेळोवेळी जाणवणाऱ्या विविध प्रश्नी संघटनेच्या वतीने ठराव करण्यात आले. हे ठराव पुढीलप्रमाणे : सरकारने शिक्षक-शिक्षकेतर भरतीप्रक्रिया त्वरित राबवावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामापासून मुक्त करावे, टीईटी अर्थात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे, कंपनीच्या शाळा धोरणास स्थगिती द्यावी व सर्व शाळा सरकारने चालवाव्यात, ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेने 'शाळा बंद करावी' असा ठराव केलेल्या शाळा सरकारने बंद कराव्यात, शिक्षण खात्याचे स्वतंत्र बजेट विधानसभेत मांडून मंजूर करावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेतनेतर अनुदान असा शब्दप्रयोग न करता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे असा शब्दप्रयोग करावा, असे ठराव या वेळी सर्वानुमते मांडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी पार्किंगवरून सुरक्षा रक्षकास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. जाकिर हुसेन हॉस्पिटल आवारात दुचाकी पार्क करण्यास विरोध केल्याने दुचाकीवरील दोन संशयितांनी हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकास शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी सुरक्षा रक्षक साजीद चांद शेख (वय ४०, रा. कथडा, जुने नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, मोसीन हुसेन अत्तार (२८, रा. नागसेन वाडी) आणि त्याच्या भावाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.१७) दुपारी घडली.

सुरक्षा रक्षक शेख कर्तव्य बजावत असताना संशयित मोसीन अत्तार आणि त्याचा भाऊ दुचाकी घेऊन हॉस्पिटलच्या आवारात आले. ते अॅम्ब्युलन्सच्या जागेवर दुचाकी उभी करीत असताना सुरक्षा रक्षकाने त्यांना अटकाव केला. मात्र, याच जागी दुचाकी लावण्याचा अट्टहास दोघांनी धरला. सुरक्षा रक्षक शेख यांनी त्याला विरोध केला असता, दोघांनी शेख यांना मारहाण केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोसीन याला अटक केली.

गंगापूर रोडला चेन स्नॅचिंग

घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून तीन चोरट्यांनी सोन्याची पोत ओरबाडल्याची घटना गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कलजवळ शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी कांता कैलास निमसे (रा. श्रीरंगनगर) यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री नऊच्या सुमारास निमसे दुकानातून घराकडे पायी निघाल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांनी निमसे यांच्या समोरून येत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची व ८० हजार रुपयांची पोत लंपास केली. पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. बैरागी तपास करीत आहेत.

खोटी माहिती देऊन विवाह

होणारा पती कॉमर्स शाखेचा पदवीधर असल्याचे सांगून विवाह घडवून आणणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात फसवणुकीची फिर्याद पत्नीने दिली आहे. विवाहानंतर हा प्रकार उघडकीस आला. आयुष्याचा होणारा जोडीदार पदवीधर असल्याचे सासरच्यांनी सांगितले होते. मात्र, विवाहानंतर मुलाचे शिक्षण सांगितले तितके नसल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. तिने पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली आहे. सिडकोतील राणेनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेच्या फिर्यादीनुसार, मे २०१७ मध्ये तिचा विवाह म्हसरूळ, बोरगड येथील एकतानगर परिसरात राहणाऱ्या विशाल ठाकूर याच्यासोबत झाला होता. सासऱ्यांनी विशालचे शिक्षण पदवीधरपर्यंत असल्याचे विवाह जमण्यापूर्वीच सांगितले होते. त्याचप्रमाणे तो एका नामांकित कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करीत असल्याचे मुलीला सांगण्यात आले. त्यामुळे लग्नास होकार दिला. विवाहानंतर विशालचे शिक्षण पदवीपर्यंतचे नसल्याचे विवाहितेच्या लक्षात आले, तसेच त्याला चांगल्या पगाराची नोकरीही नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवाहितेने पती विशाल याच्यासह सासू ज्योती आणि सासरे सुरेश ठाकूर यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली.

ओटीपी क्रमांकाच्या आधारे गंडा

मी एसबीआय बँकेतून बोलत असून, तुमच्या मोबाइलवर ओटीपी आला आहे. तो क्रमांक आधार कार्डासोबत लिंक करायचा असल्याची बतावणी करीत चोरट्याने एकाच्या बँक खात्यातील ४५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी तेजस रवींद्र अष्टपुत्रे (वय ४०, रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इंदिरानगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अष्टपुत्रे यांना चोरट्याचा फोन आला होता. समोरील व्यक्तीने एसबीआय बँकेमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी क्रमांक आला असून, तो सांगा असे सांगितले. हा क्रमांक आधार कार्डाशी लिंक करायचा असल्याचे चोरट्याने स्पष्ट करताच अष्टपुत्रे यांनी ओटीपी क्रमांक सांगितला. त्यानंतर संशयिताने तेजस यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ४४,९९६ रुपये काढून घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे तपास करीत आहेत.

मद्याचे दुकान पेटवण्याचा प्रयत्न

पैसे न देता बीअरच्या दोन बाटल्या बळजबरीने नेत मद्य दुकान पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयिताविरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष रोडवरील जयसिंघानी ब्रँडी हाऊस येथे शनिवारी हा प्रकार घडला. इलियास गुलाब शेख (रा. सुंदरनगर, देवळाली गाव) असे संशयिताचे नाव आहे. मनोहर टेकचंद जयसिंघानी (वय ६१, रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास दुकानात असताना तिथे संशयित इलियास आला. त्याने पैसे न देताच दोन बीअरच्या बाटल्या नेल्या. या वेळी त्याने शिवीगाळ करीत दुकानाच्या काउंटरवर पेट्रोल टाकून दुकान जाळण्याचा प्रयत्न केला.

आत्महत्येप्रकरणी गुन्हा

विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. पूजा अमोल चौधरी (वय २४, रा. गायत्रीनगर, चेहेडीशिव) या विवाहितेने १७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात आत्महत्या केली होती. या प्रकरणी विलास माधवराव अपसुंदे (५५, ता. दिंडोरी) यांनी पूजाचे पती अमोल अनंत चौधरी, सासू शोभा अनंत चौधरी आणि सासरे अनंत चौधरी (सर्व रा. गायत्रीनगर) यांच्या विरोधात फिर्याद दिली. सासरच्यांनी १ मार्च २०१७ पासून पूजाला त्रास दिला. कौटुंबिक वादाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप अपसुंदे यांनी तक्रारीत केला आहे.

एकास बेदम मारहाण

पोलिसांकडे खोट्या तक्रारी करतो, अशी कुरापत काढून दोघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. ही घटना भगूर येथील राममंदिर परिसरात घडली असून, या प्रकरणी विलास विठ्ठल पिंगळ (वय ५३, रा. भगूर) यांनी देवळाली कॅम्प पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पिंगळ यांच्या तक्रारीनुसार, योगेश गणपत पाटोळे उर्फ टिपऱ्या आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी गुरुवारी (दि. १५) सायंकाळच्या सुमारास कुरापत काढून लोखंडी रॉडने पिंगळ यांना बेदम मारहाण केली होती.

उत्तमनगरला घरफोडी

सिडकोतील उत्तमनगर परिसरातील पाचवी स्कीम येथे राहणाऱ्या ज्योती सुनील सूर्यवंशी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान घडली. चोरट्याने घरफोडी करून सोन्याची पोत, चांदीचे जोडवे आणि रोकड असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॅपटॉप लंपास

धात्रक फाटा येथील घरातून चोरट्याने लॅपटॉप लंपास केला. चोरीची घटना २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान घडली. राहुल रामदास देवरे (वय २२) या तरुणाने आडगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. लग्नकार्यानिमित्त राहुल बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅपद्वारे शिव-शंभूंचा जागर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, शंभू चरित्र, तसेच शिवकालीन इतिहास ऑडिओ-व्हिडीओच्या सहाय्याने अॅनिमेशन स्वरूपात मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. हे अॅप्लिकेशन आज, सोमवारी (दि. १९) शिवजंयतीनिमित्त प्ले स्टोअर्सवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. प्रजेच्या हितासाठी राज्य कारभार करून स्वतंत्र राज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांचा इतिहास जगभारात शिकविला जातो. शिवजयंती वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर अरेट टेक्नॉलॉजी या कंपनीने नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित करून शिवरायांना मानाचा मजुरा देण्याचे ठरविले होते. त्याअंतर्गत पहिल्या अॅनिमेशनच्या कामास सुरुवात झाली. शिवचरित्र, शिवकालीन इतिहास, तसेच शंभू चरित्राचा अॅनिमेशनमध्ये किंवा चलचित्रामध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. सहा महिन्यांच्या प्रयत्नांतून हे अॅनिमेशन तयार झाल्याचे कंपनीचे संचालक आनंद शिरसाठ यांनी सांगितले. आजच्या नकारात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवाजी महाराजांचे संस्कार, कार्य-कर्तृत्व सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यातूनच सतत सर्वांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा शिरसाठ यांनी व्यक्त केली.

हे अॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर 'क्लिक फोर अॅडमिशन' या अॅपमध्ये मिळेल किंवा ७८८८१५९१११ यावर मिस्ड-कॉल करून किंवा व्हॉट्सअॅप करून मिळवता येऊ शकते. हे अॅनिमेशन विकसित करण्यासाठी आनंद शिरसाठ यांच्यासह योगेश शिरसाठ, रवी तुपे, कृष्णा यादव, गौरव परदेशी, गौरव नेरे, दिनेश प्रजापती, पूजा उफडे, देवकी दशपुत्रे, प्रतीक्षा कोठावदे, रुपाली गव्हाणे, वृषाली बागूल आदींनी प्रयत्न केले.

या प्रसंगांचा समावेश

या अॅप्लिकेशनमध्ये तीन तासांचे अॅनिमेशन ऑडिओ-व्हिडीओद्वारे सादर करण्यात आले आहे. शिवचरित्रात जिजाऊ साहेबांचे संस्कार, शहाजीराजांची शिकवण, संघटन कौशल्य, मावळे घडविणे, स्वराज्याची स्थापना, औरंगजेब-अफजल खान, गडकिल्ले, संयमी वृत्ती, नेतृत्वगुण यावर आधारित प्रसंग समाविष्ट केले आहेत. शंभू चरित्र एक तासाचे आहे. त्यात शंभू महाराजांचा पराक्रम, संस्कार, धाडस आणि कर्तृत्व अभ्यासायला मिळते. रामशेजच्या किल्ल्याचा इतिहास, औरंगजेबाला आव्हान, सिद्धी जोहरशी लडाई, मृत्यूशी झुंज यांसारखे प्रसंग यात समाविष्ट आहेत. या कामासाठी १८ जणांची टीम सहा महिन्यांपासून काम करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला त्यांची जागा दाखवा

$
0
0

विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांचे आवाहन; सटाण्यात हल्लाबोल यात्रा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

अच्छे दिनाचे स्वप्न रंगविणाऱ्या केंद्र आणि सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून, जनतेने सरकारला मुंहतोड जबाब द्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. केंद्रासह राज्यातील सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. हे सरकार शेतकरी, शेतमाल, महागाई, बेरोजगारीसह सर्व क्षेत्रात अपयशी ठरले असून, त्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर हे आंदोलन उभारले आहे, असेही ते म्हणाले.

भाजप-सेनेच्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी (दि. १८) सटाणा येथील टिळक रोडवरील बाजारपेठेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, आमदार दीपिका चव्हाण, रंजन ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती यतीन पगार, श्रीराम शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशातील सव्वाशे कोटी जनता फसली आहे. भाजप सरकारने 'अच्छे दिन'चे केवळ स्वप्न दाखविल्याचा आरोप आमदार मुंडे यांनी यावेळी केला. पंतप्रधानांनी सर्वसामान्यांचा स्वप्नभंग केला असून, प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख येणार, विदेशातील काळा पैसा आणणार, बेरोजगारी दूर करणार अशा आश्वासनांचा पाऊस पाडला. मात्र सामान्यांचे हात रिकामेच राहिल्याचे ते म्हणाले. एकीकडे महागाईचा भस्मासूर वाढत आहे. नोटाबंदीने शेतकरी तर जीएसटीने व्यावसायिक उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे अशा फसव्या फसवणीस सरकारची राजवट संपविण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल त्यांनी सभेत केला.

अनेक प्रकल्प बंद पाडले

भाजपला मत देऊन आमच्याकडून चूक झाली असा संदेश असलेले फलक देशात प्रथमतः बागलाण तालुक्यात लागले होते. त्यामुळे हा तालुका जे बोलला ते आता महाराष्ट्र आणि देश बोलू लागला आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. उत्तर महाराष्ट्र नंदनवन करणारा महत्त्वपूर्ण मांजरपाडा वळणयोजना प्रकल्प आघाडी सरकारने सुरू केला मात्र या सरकारने ते काम बंद पाडले, असा आरोप प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. आपल्या जलसंपदा मंत्री पदाच्या कालावधीत बागलाण तालुक्यासाठी अनेक योजना मंजूर केल्या. आगामी काळात राष्ट्रवादीचे सरकार आल्यास बागलाण तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी आगामी योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही तटकरे म्हणाले.

घोषणा केवळ जाहिरातीपुरता मर्यादित

स्त्री-पुरुष संख्या गुणोत्तरात महाराष्ट्राचा क्रमांक घसरला आहे. स्त्री-भ्रूणहत्या वाढल्या आहेत. गुजरात मॉडेलचा गवगवा करणाèऱ्या गुजरातचा क्रमांक महाराष्ट्राच्याही खाली आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या सरकारची 'बेटी पढाओ, बेटी बढाओ' ही घोषणा केवळ जाहिरातीपुरतीच मर्यादित राहिली असून, देश डिजिटल इंडिया झाला पाहिजे पण त्यासोबत लोकांच्या पोटाला अन्न मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या. शेतकरी जगला तर अन्न पिकू शकतो. त्याला जगण्यासाठी मदत झालीच पाहिजे, असे त्यांनी शेवटी सांगितले. बागलाणच्या आमदार दिपीका चव्हाण म्हणाल्या की, आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक कामांना प्राधान्य देऊन एकजुटीने कोणत्याही आमदारांची कामे व्हायची. मात्र भाजप सरकार विरोधी पक्षातील आमदारांना सापत्न भावाची वागणूक देत आहे. बागलाणमधील विकासकांमाना राज्य शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला. शहराचा प्रलंबित बायपास प्रश्न, शेतीसिंचनाचे प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅपच्या माध्यमातून तरुणाईला रोजगार

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे डिजिटल युग आहे. तंत्रज्ञानामुळे माणसाचे जगणे सहज सोपे आणि समृद्ध होत चालले आहे. देश एका बाजूला डिजिटायजेशनकडे वेगाने मार्गक्रमण करीत असतानाच दुसऱ्या बाजुला तरुणाई बेरोजगारीचा सामना करताना दिसत आहे. सफाई कामगारांच्या जागेसाठी उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये झळकल्या आणि अशाच परिस्थितीत नांदगावसारख्या (जि. नाशिक) लहान शहरातून भरत पारख नावाच्या तरुणाने डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्याची परिपूर्ण व्यावसायिक माहिती देणारे मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. विशेष म्हणजे या अॅप्लिकेशनमुळे त्याने तरुणाईला रोजगाराचा हात दिला आहे.

'स्टार्टअप'च्या माध्यमातून आपल्या मनातील भन्नाट कल्पना सत्यात उतरवण्यासाठी धडपड करीत असणाऱ्या तरुणांसाठी भरतने आदर्श निर्माण केला आहे. या अॅपच्या माध्यमातून या तरुणाने स्वतःला सिद्ध करण्याबरोबरच इतरांनादेखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जगभरातील सुमारे ८० टक्के नागरिक स्मार्ट फोन वापरतात. अगदी शेतकरीसुद्धा पिकांना पाणी भरत असताना यू-ट्यूबवर जगभरातील घडामोडी पाहत असतो. एकंदरीत सगळ्याच गोष्टी डिजिटल स्वरुपात मोबाइलच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. हीच गोष्ट लक्षात घेता या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. 'मो-बँक' असे या नव्या अॅपचे नाव असून, ते सहज-सोप्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक माहिती मायबोली मराठी भाषेत उपलब्ध करून देत आहे.

आजच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याला दैनंदिन जीवनातील उपयोगी वस्तू कोठे मिळेल याची माहिती नसते आणि आपला नाहक वेळ जातो. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन असंख्य व्यावसायिकांची माहिती या अॅपमध्ये जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय रोजगार, सिटी डिरेक्टरी यांसारख्या आकर्षक कॅटेगरीद्वारे अॅप सजविण्यात आले आहे. 'मोबँक'च्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणींना रोजगार व एक नवी संकल्पना यशस्वी करण्याचा अॅपनिर्मितीचा उद्देश आहे. 'मोबँक' अॅपमध्ये शहरातील मोठ्या व्यावसायिकांपासून अगदी तळागाळातील लहान व्यावसायिकांचीदेखील माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. अगदी पानटपरी, गवंडी, सलून, चहावाला, लाँड्री, पंक्चर दुकान यांसह ३०० पेक्षा जास्त कॅटेगरींचा समावेश अॅपमध्ये करण्यात आला आहे. सोबतच जिल्हाभरातील प्रत्येक गावाची, व्यक्तीची फोटोसह माहितीदेखील असणार आहे.

आजपासून अॅप खुले

हे अॅप्लिकेशन आज, १९ फेब्रुवारीपासून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होत आहे. ते मोफत डाउनलोड करता येणार आहे. सुरुवातीला आपले नाव, गाव व मोबाइल नंबर टाकून अॅपमध्ये प्रवेश करता येईल व त्यानंतर अॅप वापरता येईल.

येत्या काही दिवसांत 'मोबँक'मध्ये नाशिक जिल्ह्यातील पूर्ण माहिती उपलब्ध असेल. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला व्यावसायिक माहिती मायबोलीद्वारे मिळावी हीच अपेक्षा मनात ठेवून या अॅपची निर्मिती केली आहे.

-भरत पारख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजन्मोत्सवासाठी शहर सजले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात् शिवजन्मोत्सव सोहळा आज मोठ्या दिमाखात शहरात साजरा होणार आहे. त्यानिमित्त परिसरातील विविध राजकीय पक्षांसह सार्वजनिक मंडळांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक, नाशिकरोड, सातपूर, सिडको परिसरात तयारी पूर्ण झाली आहे.

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यासह गाव न गाव भगवामय झाले आहे. तिथीप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे अनेक संघटनांनी एकत्र येत आजच शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा सोहळा होणार असून, राज्यात तो पथदर्शी ठरेल असे जाणकारांचे मत आहे. या सोहळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचा सोहळा होणार असून, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी आज (दि. १९) अनंत कान्हेरे मैदान येथे सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. येथे सुरुवातीला जिजाऊ वंदन, शिव वंदन होऊन शिवगर्जना होणार आहे. त्यानंतर १० वाजता गोल्फ क्लब येथून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

असा असेल मार्ग

ही पालखी खडकाळी सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅँड, पंचवटी कारंजामार्गे रामकुंडाकडे अभिषेक करण्यासाठी जाणार आहे. या सोहळ्यात ढोल पथक, लेझिम पथके, चित्ररथ सहभागी होणार आहेत. मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असेल. जिल्ह्यातून लाखो शिवप्रेमी यात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आकर्षक चित्ररथ

या पालखी सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ सहभागी केले जाणार आहेत. ही मिरवणूक डीजेमुक्त राहणार आहे. यात पारंपरिक वाद्यांचा वापर केला जाणार आहे. ज्याप्रमाणे जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरावर देखील कार्यक्रम होणार आहेत. सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे.

६१ फूट उंचीचा भगवा ध्वज

अनंत कान्हेरे मैदानावर १०० फूट लांब व ४० फूट उंच आकाराचे होर्डिंग लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ६१ फूट उंचीचा भगवा ध्वज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या मिरवणुकीत घोडदळ व पायदळ सहभागी असेल. आदिवासी भागातून आलेली नृत्यपथकेदेखील यात सहभागी होणार आहेत. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, सर्व राजकीय पक्षांचाही यात सहभाग असेल. इदगाह मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

उपनगरांमध्ये जय्यत तयारी

नाशिक शहरासह नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी पुतळा चौक, सिन्नर फाटा येथील चौफुली, बिटको चौक, देवळाली गाव, जेलरोड आदी भागात उत्सवाची जय्यत तयारी झाली असून, अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग व भगवे ध्वज लावून वातावरणनिर्मिती केली आहे. नाशिक-पुणे रोडवर दुभाजकांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वीजेच्या खांबांवर भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. उत्सव समितीच्या वतीने ठिकठिकाणी कमानी उभारण्या आल्या आहेत. यावर्षीसुद्धा मिरवणुकीच्या दिवशी छत्रपती शिवाजी चौकात भव्य व्यासपीठ उभारून शिवजयंतीत सामील झालेल्या मंडळांचे व चित्ररथांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी पुतळा चौकात आतषबाजी करण्यात येईल. विविध पक्षांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रिक्षा संघटनांच्या वतीनेही शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रिक्षाचालकांनी रिक्षांवर भगवे ध्वज लावले आहेत. सिडकोच्या लेखानगर भागात जय्यत तयारी सुरू आहे. स्टेट बॅँक, पवननगर, गणेशचौक अशा विविध भागात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सातपूर येथेही चित्ररथ काढण्यात येणार असून, त्यादृष्टीने मंडळांनी वाहनांची व बॅँजोची बुकिंग केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images