न्यायालयीन कामकाजात वेळ, पैसा व श्रम खर्च होत असल्याची जाणीव होत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालतीस प्रतिसाद वाढत आहे, ही चांगली बाब आहे. शनिवारी येथील न्यायालयात आयोजित लोकअदालतीस नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून, एकूण ९ हजार २८४ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून एकूण ३ कोटी ३६ लाख ३३ हजार ७८६ रुपये इतकी वसुली झाली असल्याची माहिती येथील जिल्हा मुख्य न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दिली.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत दाखलपूर्व ४४ हजार ७७० प्रकरणे तर कोर्टात प्रलंबित ६१५ असे एकूण ४५ हजार ३८५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ९ पॅनल नियुक्त करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश महाजन यांच्यासह एस. एम. अली, एस. एम. बेलकर, एस. बी. लांडगे, एम. बी. कांबळे, ए. बी. मरलेचा, ए. आर. यादव, व्ही. एच. देशमुख व जे. जे. इनामदार या न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे कामकाज झाले. या लोकअदालतीसाठी संपूर्ण शहर व तालुक्यातून पक्षकार, थकबाकीदार यांची गर्दी होती. त्यामुळे न्यायालय आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापालिकेची ६४१ प्रकरणे निकाली
एकूण ५ हजार ९७२ प्रकरणे
६४१ प्रकरणे निकाली
त्यातून १ कोटी ५ लाख २३ हजार ५११ रुपये वसुली
ग्रामपंचायतीतील प्रकरणे ३७८१२
त्यापैकी ८ हार ५१२ प्रकरणे निकाली
त्यातून ९९ लाख २८ हजार रुपये वसुली
कोर्टात दाखल ६१५ प्रकरणे
१२७ प्रकरणांत तडजोड
मोटारवाहन अपघात ३९ प्रकरणे
फौजदारी ४७ प्रकरणे
दिवाणी ११ प्रकरणे
वैवाहिक १० प्रकरणे
भूसंपादन ३
महावितरण ३
यातून १ कोटी २९ लाख ६७ हजार रुपये वसूल
दाखलपूर्व प्रकरणे - एकूण ४४ हजार ७७०
- निकाली ९ हजार १५७
- रक्कम २ कोटी ६ लाख ६६ हजार ४३८
कोर्टात दाखल प्रकरणे (प्रलंबित) एकूण ६१५
- निकाली - १२७
- रक्कम - १ कोटी २९ लाख ६७ हजार ३४७
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट