Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लोकअदालतीचा तोडगा यशस्वी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

न्यायालयीन कामकाजात वेळ, पैसा व श्रम खर्च होत असल्याची जाणीव होत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालतीस प्रतिसाद वाढत आहे, ही चांगली बाब आहे. शनिवारी येथील न्यायालयात आयोजित लोकअदालतीस नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून, एकूण ९ हजार २८४ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून एकूण ३ कोटी ३६ लाख ३३ हजार ७८६ रुपये इतकी वसुली झाली असल्याची माहिती येथील जिल्हा मुख्य न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दिली.

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत दाखलपूर्व ४४ हजार ७७० प्रकरणे तर कोर्टात प्रलंबित ६१५ असे एकूण ४५ हजार ३८५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ९ पॅनल नियुक्त करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश महाजन यांच्यासह एस. एम. अली, एस. एम. बेलकर, एस. बी. लांडगे, एम. बी. कांबळे, ए. बी. मरलेचा, ए. आर. यादव, व्ही. एच. देशमुख व जे. जे. इनामदार या न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे कामकाज झाले. या लोकअदालतीसाठी संपूर्ण शहर व तालुक्यातून पक्षकार, थकबाकीदार यांची गर्दी होती. त्यामुळे न्यायालय आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महापालिकेची ६४१ प्रकरणे निकाली

एकूण ५ हजार ९७२ प्रकरणे

६४१ प्रकरणे निकाली

त्यातून १ कोटी ५ लाख २३ हजार ५११ रुपये वसुली

ग्रामपंचायतीतील प्रकरणे ३७८१२

त्यापैकी ८ हार ५१२ प्रकरणे निकाली

त्यातून ९९ लाख २८ हजार रुपये वसुली

कोर्टात दाखल ६१५ प्रकरणे

१२७ प्रकरणांत तडजोड

मोटारवाहन अपघात ३९ प्रकरणे

फौजदारी ४७ प्रकरणे

दिवाणी ११ प्रकरणे

वैवाहिक १० प्रकरणे

भूसंपादन ३

महावितरण ३

यातून १ कोटी २९ लाख ६७ हजार रुपये वसूल

दाखलपूर्व प्रकरणे - एकूण ४४ हजार ७७०

- निकाली ९ हजार १५७

- रक्कम २ कोटी ६ लाख ६६ हजार ४३८

कोर्टात दाखल प्रकरणे (प्रलंबित) एकूण ६१५

- निकाली - १२७

- रक्कम - १ कोटी २९ लाख ६७ हजार ३४७


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोमहर्षक सादरीकरणाने 'जिम्नॅस्टिक'ला सुरुवात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये प्रथमच घेण्यात आलेल्या नाशिक महापौर जिम्नास्टिक चषक राज्य अजिक्यपद स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी शिवाजी स्टेडियम येथे पार पडला. नाशिक महापालिका व नाशिक जिल्हा जिम्नास्टिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

पोलिस बँण्ड पथकाच्या 'सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा'च्या धूनने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर कथ्थकनृत्त, योगासह विविध कार्यक्रम झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. जिमनास्टिक समितीचे आयोजक शाहु खैरे यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांनी रोमहर्षक खेळ करीत प्रेक्षकांची दाद मिळवली.

सकाळी शोभायात्रा

स्पर्धेनिमित्त सकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रेचे सकाळी छत्रपती शिवाजी स्टेडिअम, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, शालीमार या ठिकाणाहून नेण्यात आली. या शोभायात्रेत राज्यभरातून आलेले जिम्नॅस्टिकचे संघ, नाशिकमधील जिम्नास्टिकचे खेळाडूंसहित विविध महापालिका शाळांसह अन्य शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

रोप, मल्लखांब व योगासने पथक

या शोभायात्रेत रोप, मल्लखांब, कराटे, योगासने यांची पथके असे सुमारे ८०० ते १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. ढोलपथकांचा गजर, लेझीम, मल्लखांब, कराटे व योगासने यांची प्रात्यक्षिके ही या शोभायात्रेची वैशिष्ट्ये ठरली. शोभायात्रेला महापौर रंजना भानसी, जिल्हा जिमनास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष शाहू खैरे, उपाध्यक्ष भालचंद्र भट, सचिव राकेश केदारे, सहसचिव कुमार शिरवाडकर, खजिनदार श्रीराज काळे, किरण कवीश्वर तसेच सदस्य शेखर सोनवणे, संदीप शिंदे, प्रबोधन डोणगावकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या सभेबाबत सचिवांकडून खुलासा

$
0
0

नाशिक कृऊबा सचिव अरुण काळेंचा खुलासा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात पोलिस स्टेशनमधील तक्रारीचा वाद पेटलेला असताना सचिव अरुण काळे यांनी वादग्रस्त बैठकीतील घटनेचा खुलासा दिला आहे. त्यात त्यांनी आपल्या नेमणुकीबाबतची सविस्तर माहिती देऊन आपल्यावर खोटे आरोप करण्यात असल्याचे नमूद केले आहे.

सचिव काळे यांनी सभेबाबत खुलासा करताना झालेल्या घडामोडी स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे, की सभा सुरू होण्यापूर्वी मागील सभेचे इतिवृत्त का दिले नाही यावर चर्चा सुरू असताना शंकरराव धनवटे यांनी सभापतींना अरुण काळे यांना सचिव पदावर रूजू का करून घेतले, तुम्ही काळेंकडून पैसे घेतल्याचा आरोप केला. सभापती व धनवटे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर सभापती बोलत असताना, धनवटे स्वत:हून बाहेर पडले. त्यांना इतर संचालकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रोसेडिंग बुकवरही सही केली नाही. त्यानंतर सर्वसाधारण सभेचे कामकाज दोन तास चालले. या सभेच्या एक दिवस अगोदरही उपसभापतींनी आढावा बैठक घेतली. त्यावेळेस धनवटे उपस्थित नव्हते. मी वेळोवेळी त्यांना प्रोसेडिंगच्या नकला दिलेल्या आहेत, असे म्हटले आहे.

सचिव पदाबाबातही वारंवार मुद्दा उपस्थित केला जातो. याबाबतही सचिव काळे यांनी आपली बाजू मांडली आहे. आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी तयार केलेल्या सचिव पॅनलमधील उमेदवार आहोत. त्याला पणन महामंडळाची मान्यता आहे. माझ्यावर चुकीचे आरोप करून काम करून दिले जात नाही. तसेच नेमणुकीबाबत विभागीय निबंधकांचा निकाल, जिल्हा उपनिबंधकांचे आदेश याचे दाखले देत आपली नेमणूक कायदेशीर असल्याचे सांगितले. संस्थेच्या उत्पन्नात झालेल्या वाढीचे आकडेही त्यांनी या खुलाशात दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोरी उपचारांवर हवी ठोस भूमिका

$
0
0

मुक्ता दाभोलकर यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपचार पध्दतींमधील आधुनिकीकरणामुळे वैद्यकीय शास्त्र अत्यंत प्रगत टप्प्यावर पोहोचले आहे. तरीही अघोरी पध्दतीने उपचार करणाऱ्या भोंदूबाबांनी राज्यात बस्तान बसविले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या भोंदूबाबांविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यभर ठोस भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

आयएमए नाशिकच्या वतीने आयोजित रिफ्रेशकॉन या कार्यक्रमांतर्गत दाभोलकर यांची मुलाखत घेण्यात आली. शालिमार येथील आयएमए सभागृहात झालेल्या या मुलाखतीतून दाभोलकर यांनी श्रध्दा, अंधश्रध्दा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आपली मते व्यक्त केली. भूलतज्ज्ञ डॉ. शशांक कुलकर्णी यांनी ही मुलाखत अधिक खुलवली. दाभोलकर म्हणाल्या, की विद्यार्थीदशेपासूनच मी अंधश्रध्दा निर्मूलन समितीची कार्यकर्ता आहे. सन २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून करण्यात आला. माणूस मारून विचार संपत नसतो हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या निर्धाराने मी काम सुरू केले. श्रध्दा, अंधश्रध्दा, विश्वास यातील फरक स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, की आपण संस्कारांचे ओझे बाळगतो. परंतु, चिकित्सक नजरेने त्याकडे पहात नाही. अंधश्रध्दा हा श्रध्देच्या दुनियेतील काळाबाजार असून, तुमचा विवेक कृतिशील झाला असे दिसते, ती श्रध्दा असते असे मत त्यांनी व्यक्त केले. आयुष्यातील सर्व गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चष्म्यातून पहायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. आपण मंगळावर उपग्रह पाठवितो परंतु, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न जमवू शकत नाही. अंगठ्या घालून समस्या सुटत असतील तर एक लाख बेरोजगारांना अंगठ्या घालून रोजगार मिळेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळेच आम्ही अंनिसला डोकं चालवा चळवळ म्हणतो असेही त्यांनी सांगितले. माझ्या आयुष्याची दोरी कुणीतरी हलवित असते ही भीती मनातून काढून टाकावी आणि मन निर्भय करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यात्मिक बुवाबाजी ही विज्ञानाची भाषा वापरून चालवली जाणारी दुकानदारी असल्याची टीका दाभोलकर यांनी केली. डॉक्टरांचे कौशल्य आणि बुध्दीबद्दल समाजात प्रत्येकालाच आदर असतो. त्यामुळे डॉक्टरांनी प्रॅक्टिसबरोबरच संघटनेच्या माध्यमातून अघोरी उपचार पध्दतींबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी अशी अपेक्षा दाभोळकर यांनी व्यक्त केली. अंनिस हिंदूंच्याच अंधश्रध्दांना विरोध करते हा आरोप त्यांनी खोडून काढला. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांत हे सप्रमाण सिध्द होते. समाजाने धर्म आणि जातींमधील अंधश्रध्दांपेक्षा केवळ अंधश्रध्दांबद्दल बोलायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी खासदार हेमंत गोडसे, डॉ. रवींद्र टोणगावकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रिफ्रेशकॉनचे उद्घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - जिम्नास्टिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये प्रथमच घेण्यात आलेल्या नाशिक महापौर जिम्नास्टिक चषक राज्य अजिक्यपद स्पर्धेत नाशिकला ५ गोल्ड तर मुंबईला ४ गोल्ड मेडल मिळाले.

राज्यभरातून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत रविवारी रोमहर्षक खेळ केला. नाशिक महापालिका व नाशिक जिल्हा जिम्नास्टिक असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा सोमवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजता समारोप होणार आहे. स्पर्धेत खेळाडूंनी गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ पदक मिळवत आपला आनंद व्यक्त केला. शिवाजी स्टेडियम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत हा खेळ बघण्यासाठी मोठी गर्दी होती.

स्पर्धेचा निकाल :

- १४ वर्षांखालील मुले : १) चैतन्य देशमुख (मुंबई शहर), २) इशान अजय खर्रा (नाशिक), ३) युवराज लावंड (मुंबई शहर )

- एरोबिक्स (वय ८-११) : मुली : १) नेत्रा घारे (सांगली), २) प्रेक्षा साने (रत्नागिरी), ३) लीओ प्रीत (मुंबई उपनगर)

- एरोबिक्स (वय ८-११) : मुले : १) करण जगेरिया (मुंबई उपनगर), २) श्रेयस पाटील (ठाणे), ३) आयुष बैरागी (नाशिक)

- एरोबिक्स : मिश्र दुहेरी : १) हार्दिक परमार / वंदना संगीत (मुंबई उपनगर), २) श्रेयस पाटील / संतवन कुलकर्णी (ठाणे), ३) देवन आचले / वैष्ण्वी राहे (नाशिक)

- एरोबिक्स (वय १२-१४) : मुली : १) प्रीती नायर (मुंबई उपनगर), २) वसुंधरा (पुणे), ३) वृंदा घाडगे (रत्नागिरी)

- एरोबिक्स (वय १२-१४) : मुले : १) आदित्य सूर्यवंशी (नाशिक), २) प्राण यादव (मुंबई उपनगर), ३) आयुष ब्राह्मणकर (नाशिक)

- एरोबिक्स : मिश्र दुहेरी : १) उषा माध्य / प्राण यादव (मुंबई उपनगर), २) ऋजुता थत्ते / चैतन्य काजळे (नाशिक), ३) संजली मोहोळकर / अमित कांबळे (नाशिक)

- तिहेरी स्पर्धा : १० इशिता मेहता / रेवा जैन/ तीमोन मोरे (नाशिक), २) तन्वी सुर्वे / वेदश्री राजपूत / श्रावणी भिसे (ठाणे), ३) कोमल यादव /इशा जाधव/ प्राण यादव (मुंबई उपनगर)

- महिला एकेरी : १) आर्या कुलकर्णी (नाशिक), २) जाई मानकामे (ठाणे), ३) आर्या पालेकर (रायगड)

- ज्युनियर : पुरुष एकेरी : १) अभिषेक मोरे (नाशिक), २) रोशन खलग (मुंबई उपनगर), ३) सोहम जाधव (नाशिक)

- ज्युनियर : मिश्र दुहेरी : १) ओमकार मटाले / अनिशा देशपांडे (नाशिक), २) कलग / आकांक्षा (मुंबई उपनगर), ३) यशराज पिंगळे / तनिष्का साधकर (नाशिक)

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा विश्रामगृहाचे ‘पीपीपी’नुसार नूतनीकरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जलसंपदा विभागाने भंडारधरा, मुळा व करंजवण धरणावरील विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. या विश्रामगृहामुळे पर्यटकांना धरणाच्या ठिकाणी राहण्याची सुविधा मिळणार आहे.

अनेक वर्षांपासून पडझड झाल्याने या विश्रामगृहाचा वापर केला जात नव्हता. भंडारदरा व मुळा हे दोन्ही धरणे अहमदनगर तर करंजवण हे धरण नाशिक जिल्ह्यात आहे. मुळा प्रकल्पात १९६० मध्ये चुमेरी विश्रामगृह बांधण्यात आले होते. येथे ६ कक्ष व दोन सभागृह व भोजनकक्ष आहे. याचे बांधकामाचे क्षेत्र २४८ चौरस मीटर असून त्याच्यासमोरील उद्यानाचे क्षेत्र ३ हजार ४८९ चौरस मीटर आहे. भंडारदरा येथेही कृष्णावंती विश्रामगृह आहे. येथे २ व्हीआयपी कक्ष, सहा साधे कक्ष व एक डायनिंग हॉल आहे. येथेही मोठे उद्यान आहे. करंजवण धरणावरही विश्रामगृहे व वसाहती बऱ्याच काळापासून वापराविना पडून आहे. त्यामुळे त्याचा उपयोग पर्यटकांना व्हावा, यासाठी हे विश्रामगृह आता बांधण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांनाही संधी

मोठ्या धरणांवर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना धरणाच्या ठिकाणी रहायला आवडते. पण, त्याना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाही. त्या उपलब्ध करून देण्यासाठी विश्रामगृहे वापरात आणावी यासाठी जलसंपदा विभागाने काम हाती घेतले आहे. पूर्वी या विश्रामगृहाचा वापर फक्त अधिकारी व सरकारी कामांसाठी केला जात असे मात्र, आता ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचे धोरण जलसंपदाने स्वीकारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडच्या खेळाडूंनी गाजविली राष्ट्रीय स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया खेलो या राष्ट्रीय स्पर्धेवर मनमाड व नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी यशाची मोहोर उमटवली आहे. प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील खुशाली गांगुर्डे, पूजा परदेशी व धनश्री पवार यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट केली. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

खेलो इंडिया या पहिल्या स्कूल गेम्समध्ये मनमाडच्या मुलींनी यशाचा झेंडा राजधानी नवी दिल्लीत फडकावला आहे. त्यांनी एक रौप्य व दोन कास्य पदकाची लयलूट केली. छत्रे न्यू इंग्लिश स्कूल व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत आपली छाप पाडली. वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने ४४ किलो वजनी गटात ५७ किलो स्नॅच व ७० किलो क्लीन जर्क असे एकूण १२७ किलो वजन उचलून महाराष्ट्र संघास पाहिले पदक मिळवून दिले. धनश्री नितीन पवार हिने ५३ किलो वजनी गटात ६६ किलो स्नॅच व ८१ किलो क्लीन जर्क असे १४७ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकाविले. तर पूजा राजेश परदेशी हिने ५८ किलो वजनी गटात ६५ किलो स्नॅच व ८२ किलो क्लीन जर्क असे १४७ किलो वजन उचलून कांस्यपदक पदक मिळविले.

देशपातळीवर छाप

पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत मनमाडच्या मुलींनी पदकांची हॅट्रिक साधली आहे. याबद्दल यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. जयभवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालय पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक करून गौरव केला. मनमाडसारख्या छोट्या शहरात गुणवंत खेळाडू घडत असून ते राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप पाडत आहेत. या विद्यार्थिनींना प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थमंत्री मुनगंटीवार आज नाशिकमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी (दि. १२) नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ चा सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम केला जाणार आहे.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ही विभागाची बैठक होणार असून पाचही जिल्ह्यांमधील वार्षिक योजनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी मिळणार असून मागणी केल्याप्रमाणे अतिरिक्त ६० कोटींचा निधी जिल्ह्याला मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होणार आहे.

मुनगंटीवार यांचे सकाळी साडेदहा वाजता नाशिक विमानतळावर आगमन होईल. तेथून ते वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी दीड वाजता त्यांचे नाशिक येथील सरकारी विश्रामगृहावर आगमन होईल. दुपारी दोन वाजता त्यांच्या मुख्य उपस्थितीत नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात २०१८-१९ च्या विभागीय जिल्हानिहाय वार्षिक योजना (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात होईल. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या नात्याने या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या बैठकीसाठी पाऊण तास राखून ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्याची बैठक होईल. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता धुळे, साडेतीनला जळगाव, सव्वाचार वाजता नंदुरबार आणि सर्वात शेवटी सायंकाळी पाच वाजता नाशिक जिल्ह्याची बैठक होईल. बैठकीला नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, धुळे, व जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुनगंटीवार सायंकाळी सात वाजता सरकारी विमानाने मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत.

नाशिकला हवेत जादा ६० कोटी

बैठकीत नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी दिली जाणार आहे. तसेच अतिरिक्त ६० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २०१७-१८ या आर्थिक वर्षातील वार्षिक आराखड्यातून १८० कोटी वितरीत झाले असून, त्यात ७६ टक्के निधी खर्च झाला आहे. ३२१ कोटींच्या या आराखड्यात सरकारने ३३ टक्के कपात केली होती. परंतु, नंतर हा निधी परत दिला. त्यामुळे २४४ कोटींच्या आराखड्यात आता ७६ कोटी रुपये अधिक खर्च केले जाणार असून याचा आढावाही बैठकीत घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानवधर्मप्रेमींद्वारे स्वच्छता अभियान

$
0
0

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी राबविणार उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्गुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या श्री हंस कल्याण धाम आश्रमाच्या वतीने रविवारी नाशिक-पुणे रोडवरील शिवाजीनगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात मानवधर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शहरातील वेगवेगळ्या परिसरात असे अभियान राबवून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्याचा निर्णय समितीने घेतल्याची माहिती संस्थेच्या नाशिक शाखेच्या प्रबंधक साध्वी हिराजी यांनी दिली.

श्री हंस कल्याण धाम आश्रमात प्रत्येक रविवारी दुपारी दोन वाजता प्रवचन असते. रविवारी दुपारी साडेचारला या प्रवचनाचा समारोप झाला. साध्वी हिराजी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवधर्मप्रेमींनी लगेचच स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. आश्रमापासून नाशिक-पुणे महामार्गापर्यंतचा परिसर अभियानात स्वच्छ करण्यात आला. पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन कार्यालयासमोर देखील ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये विशिष्ठ गणवेशात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवावर्गाने सर्वांचेच लक्ष वेधले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शहरातील वेगवेगळ्या परिसरात असे अभियान राबविण्याचे निर्णय समितीने घेतला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी साध्वी पंकजाजी, साध्वी मुक्तिकाजी, साध्वी सावित्रीजी, महात्मा कुलदीपानंदजी आदींसह मानवधर्मप्रेमींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थमंत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी (दि. १२) नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ चा सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम केला जाणार आहे.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ही विभागाची बैठक होणार असून पाचही जिल्ह्यांमधील वार्षिक योजनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी मिळणार असून मागणी केल्याप्रमाणे अतिरिक्त ६० कोटींचा निधी जिल्ह्याला मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होणार आहे.

मुनगंटीवार यांचे सकाळी साडेदहा वाजता नाशिक विमानतळावर आगमन होईल. तेथून ते वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी दीड वाजता त्यांचे नाशिक येथील सरकारी विश्रामगृहावर आगमन होईल. दुपारी दोन वाजता त्यांच्या मुख्य उपस्थितीत नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात २०१८-१९ च्या विभागीय जिल्हानिहाय वार्षिक योजना (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात होईल. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या नात्याने या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या बैठकीसाठी पाऊण तास राखून ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्याची बैठक होईल. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता धुळे, साडेतीनला जळगाव, सव्वाचार वाजता नंदुरबार आणि सर्वात शेवटी सायंकाळी पाच वाजता नाशिक जिल्ह्याची बैठक होईल. बैठकीला नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, धुळे, व जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुनगंटीवार सायंकाळी सात वाजता सरकारी विमानाने मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत.

नाशिकला हवेत जादा ६० कोटी

बैठकीत नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी दिली जाणार आहे. तसेच अतिरिक्त ६० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २०१७-१८ या आर्थिक वर्षातील वार्षिक आराखड्यातून १८० कोटी वितरीत झाले असून, त्यात ७६ टक्के निधी खर्च झाला आहे. ३२१ कोटींच्या या आराखड्यात सरकारने ३३ टक्के कपात केली होती. परंतु, नंतर हा निधी परत दिला. त्यामुळे २४४ कोटींच्या आराखड्यात आता ७६ कोटी रुपये अधिक खर्च केले जाणार असून याचा आढावाही बैठकीत घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळणरस्त्याने बसचा ‘घात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नव्याने रुंदीकरण करण्यात आलेल्या नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर येथे असलेला वळणरस्ता वाहनांसाठी घातक ठरत असल्याचे या ठिकाणी रविवारी विनावाहक शिवशाही बसला झालेल्या अपघातानंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे. या अपघातात शिवशाही बसशी धडक झालेल्या कंटेनरच्या चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर थेट दुभाजकावर चढविल्यानेच शिवशाही बसमधील प्रवासी बचावले. त्यामुळे या वळणरस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारात पुणे येथे जाणारी शिवशाही बस (एमएच ०६, बीडब्ल्यू ०५३५) नाशिकरोड बसस्थानकातून निघाली होती. चेहेडी गावाजवळील दारणा नदीच्या पुलाजवळील फुलेनगर येथे या बसला सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या मागील बाजूची धडक बसली. या धडकेत शिवशाही बसच्या दोन खिडक्यांच्या काचांचा चुराडा झाला. या काचा आतील प्रवाशांच्या अंगावर पडल्याने बसमधील प्रवाशांत घबराट निर्माण झाली. या बसशेजारून जात असलेल्या कंटेनरला (एमएच १५, एफव्ही ९६५१) वळणरस्ता असल्याने पुरेशी जागा न मिळाल्याने या कंटेनरच्या मागील भागाची धडक शिवशाही बसला बसली. यावेळी कंटेनरचे मागील चाक थेट दुभाजकावर चढले. मात्र, कंटेनरचालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्याने कंटेनर पलटी होत होता वाचला. या अपघातात बसमधील प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचा जीव वाचला. या अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी कंटेनरचालक लिंबाजी खिल्लारे याला मारहाण केली. या अपघातप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात कंटेनरचालक लिंबाजी खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून शिवशाही बसचालक बी. आर. आव्हाड यांच्याविरोधात मोटार अपघात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघाताची माहिती मिळताच नाशिक आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी. पी. हिरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक के. पी. सांगळे, नियंत्रण अभियंता चालन एस. बी. सोनवणे आदी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरज बिजली, जगदीश शेलकर आदींनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.

दुभाजकही ठरताहेत धोकादायक

नाशिक-पुणे महामार्गाचे चेहेडी गावाजवळील दारणा नदीपर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दारण नदीवरील पुलाचेही काम पूर्ण झालेले आहे. मात्र, नवीन पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला केलेला नसल्याने या ठिकाणी वळणरस्त्याचा वापर होतो. हा वळणरस्ता वाहतुकीसाठी पुरेसा नाही. याशिवाय नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गावरील दुभाजकही या ठिकाणी धोकादायक ठरत आहेत. नव्या पुलाच्या एका बाजूवरून नाशिकरोडकडून सिन्नरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू केल्यास वळणरस्त्यावरील रहदारीची वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, हा पूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने येथील वळणरस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार शेखविरोधात आंदोलन करणार

$
0
0

आचार्य जितेंद्र महाराज यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगावचे आमदार अासिफ शेख यांनी शिर्के व माझ्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल केले असून, आम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली नाही. तसेच याबाबत त्यांच्याद्वारे होत असलेल्या देशविरोधी कृत्यांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्टीकरण मुंबई येथील हिंदू आश्रमचे आचार्य जितेंद्र महाराज यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

आमदार शेख यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ११) दुपारी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडण करीत मच्छिंद्र शिर्के व आचार्य जितेंद्र महाराज यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच आचार्य यांच्याकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी आमदार शेख यांनी रोहिंग्या मुस्लिमांना मालेगावात आश्रय देण्यासाठी मोर्चा काढला होता. याचा आम्ही तीव्र विरोध करीत असून, देशातील मुस्लिम तरुणांनी आमदार शेख यांच्यासारख्या कट्टरपंथी मुस्लिम नेत्यांच्या प्रभावात येऊन आपले भविष्य धोक्यात टाकू नये, असेही पत्रकात म्हटले आहे. तसेच हा मुद्दा आता देशभरात घेऊन जाणार असून, आमदार शेख यांच्याविरोधात देशभर आंदोलन करून एफआयआर दाखल करणार असल्याचे पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेव घाट शिवमंदिरात उत्सव

$
0
0

महाअभिषेक, महाप्रसाद व भजन कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील प्राचीन व ऐतिहासिक गणेश कुंडाजवळ महादेव घाट शिवमंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्रीच्या दिवशी धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंदिर परिसरात साफसफाई करण्यात येऊन विद्युत रोषणाई, पताके लावण्यात येत असून, शिवरात्री उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

शिवरात्री निमित्ताने मंदिर भाविकांसाठी सकाळी ५ वाजेपासून खुले असणार आहे. तसेच दिवसभरात सकाळी ६ वाजता, ८ वाजता व सायंकाळी ७ तसेच रात्री १२ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येईल. तसेच महाअभिषेकही करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. महादेव घाट सेवा समितीच्या वतीने यादिवशी दुपारी ४ वाजता नारायणी महिला भजनी मंडळ व भावसार भजनी महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री १० वाजता राजस्थान भजनी मंडळ भजन कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे उत्सवप्रमुख विवेक वारुळे, उपप्रमुख कैलास सोनवणे, पंकज मुंदडा, रमेश मंडाळे, महादू मंडाळे, प्रवीण बच्छाव, राजेश वाजपेयी आदींसह समिती सदस्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीएससी’संदर्भात १५ तारखेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मागासवर्गीय उमेदवारास गुणवत्तेच्या आधारावर खुल्या गटातील जागेवर अर्ज करण्याचा अधिकार डावलण्यात येत असल्याचा आक्षेप नुकताच घेण्यात आला होता. त्याबाबत एक याचिका कोर्टात दाखल असून, या याचिकेवर आता गुरुवारी (दि. १५ फेब्रुवारी) अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यानच्या कालावधीत 'एमपीएससी'च्या प्रवेशप्रक्रियांना देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष आता १५ तारखेकडे लागले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही मागासवर्गीय उमेदवारांनी गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागांसाठी अर्ज केले होते. या मुलाखतींमध्ये या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले होते. याविरोधात उमेदवारांनी कोर्टात दाद मागितली होती. संबंधित ऑनलाइन अर्जांमध्ये 'एमपीएससी'ने मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या वर्गातील जागांसाठी अर्ज करता येणार नसल्याचे म्हटले होते. पण, आयोगाच्या या निर्णयामुळे शासन आणि कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत अॅड. अजय मुंडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात आता गुरुवारी नेमका कोणता निर्णय होतो, याकडे एमपीएससी उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत. या सुनावणीनंतर यासंदर्भातील प्रवेशप्रक्रियांना देण्यात आलेल्या स्थगितीसंदर्भातदेखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

क्लासेसदेखील कचाट्यात

दरम्यान, खासगी शिकवणी चालकांबाबत नवीन कायद्याच्या मसुद्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. या कायद्याचा कच्चा मसुदा मांडल्यानंतर त्यात स्पर्धा परीक्षा क्लासेसचालकांचा समावेश नव्हता, असा आक्षेप इतर क्लासेसचालकांनी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचाही समावेश या कायद्यात करण्यास संबंधित समितीने अनुकूलता दाखविली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्लासेसवरही आता या नव्या कायद्याचे नियंत्रण राहणार आहे. परिणामी शहरांमधून मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या क्लासेसवरही सरकारचे नियंत्रण येणार आहे. त्यामुळे नियमावली डावलून आता स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचालकांना मनमानी करता येणार नाही. त्यामुळे हे क्लासेसही नियमांच्या कचाट्यात सापडणार असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाशिवरात्रीसाठी रताळी बाजारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उपवासाच्या पदार्थांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे रताळी हे कंदमुळ बाजारात दाखल झाले आहे. खास महाशिवरात्रीसाठी रताळांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रताळीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रताळीची लागवड अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकच्या बाजारात रताळी दाखल झाली आहेत.

चवीला काहीसे गोड असलेल्या रताळीला उपवासाच्या पदार्थांमध्ये स्थान असल्यामुळे उपवासांच्या काळात त्याची मागणी वाढते. ही मागणी लक्षात घेऊन रताळीची लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यात रताळीची लागवड फारच कमी प्रमाणात होत असल्याने येथील मागणी लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातून ट्रकमधून नाशिकच्या बाजारात सध्या रताळी दाखल होत आहेत.

नाशिक बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर हे रताळीची पोते भरलेल्या ट्रक येऊ लागले आहेत. घाऊक बाजारात रताळीला दर्जानुसार १५ ते २५ रुपये किलो असा दर मिळत आहे. किरकोळ विक्रीत हा दर दुप्पटीने वाढत असल्याने ग्राहकांना ३० ते ५० रुपयांपर्यंत रताळीची खरेदी करावी लागत आहे.

द्राक्ष झाले स्वस्त

फेब्रुवारी महिना उजाडला की द्राक्षांची रेलचेल वाढण्यास सुरुवात होते. गेल्या महिन्यात ७० ते ८० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या द्राक्षांची आवक वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत आता ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. आणखी दहा ते पंधरा दिवसांत आवक वाढून दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. इतर उन्हाळी फळांचीही आवक वाढली असून, दरही थोडे कमी झाले आहेत.

जानेवारी महिन्यापासून बाजारपेठेत द्राक्षांची आवक सुरू झाली. फेब्रुवारीत आवक वाढल्याने दरात १० ते २० रुपयांची घसरण झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत द्राक्षाला दर्जानुसार दर मिळत आहे. बाजारात ५० ते ७० रुपये किलो दरानुसार द्राक्षांची विक्री होत आहे. निर्यातक्षम द्राक्षांचे बाजारभावही कमी झाल्याने त्याचा स्थानिक बाजारभावावर परिणाम झाला आहे.

उन्हाळी फळांची आवक वाढू लागली आहे. टरबूज, खरबूज, संत्री या फळांची आवक वाढली आहे. संत्र्याला ५० रुपये किलो दर मिळत आहे. आणखी पंधरा दिवसांत आवक वाढून दर कमी होतील. सफरचंद, पपई व चिक्कूचे दर स्थिर आहेत. टरबूज १५ ते २० रुपये किलो, तर खरबूज ३० रुपये किलोने दराने मिळत आहे. कडाका व उमराणा या बोरांची आवक घटली असली तरी अॅपल बोरची आवक मात्र वाढली आहे. अॅपलबोर ३० रुपये किलोने विक्री होत आहे. डाळिंबाला सध्या चांगले दर मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून दरात वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाच्या डाळिंबाच्या वीस किलोच्या क्रेटला १२०० पासून १८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

महाशिवरात्रीमुळे मागणी वाढणार

येत्या मंगळवारी महाशिवरात्री असल्याने फळांची मागणी वाढणार आहे. यामुळे दरात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीनिमित्त विक्रेत्यांनी फळांचा स्टॉक वाढवला असून, चौकाचौकात दुकाने थाटण्यात आली आहेत.

किलोचे दर

पपई - ३०, द्राक्ष - ५० ते ५०, अॅपल बोर - ३०, टरबूज - १५, खरबूज - २०, संत्री - ५०, चिक्कू - ५०, सफरचंद - ८० ते १२०, केळी ३० रुपये डझन, किवी - ४० रुपये नग, डाळिंब ५० ते ७०, पेरू - ४० ते ६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनेगाव अपघातात एक ठार, पाच जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर मनेगाव फाट्याजवळ देवनदी पुलावर बोलेरो जिप व इंडिका कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघतात एक ठार, तर पाच जण जखमी झाले. शनिवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. नितीन रावसाहेब रोडे (वय ४२, रा. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.

मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील ओम कंटेनर कारखान्यात कामाला असलेल्या नितीन रावसाहेब रोडे हे वैजापूर येथील मित्रांसोबत इंडिका व्हीस्टा कारने (एमएच १७, एई ४८६) संगमनेरहून खासगी काम आटोपून सिन्नरकडे येत होते. यावेळी रात्री ८.३०च्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर मनेगाव फाट्याजवळ देवनदी पुलावर समोरून येणारी बोलेरो जिप (एमएच १७, एझेड ९१६४) व इंडिका कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नितीन रावसाहेब रोडे हे ठार झाले, तर कुंडलीक गायकवाड (वय ३६), प्रवीण दिलवाले (वय ३५), संजय सोनवणे (वय ३७) रा. वैजापूर, जि. औरंगाबाद यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने जखमींना उपचारार्थ नाशिक येथील सुविचार हॉस्पिटलमध्ये हलविले. या प्रकरणी सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी करावे गोदावरीशी नाते घट्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मानवाच्या जडणघडणीत योगशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. नदी आणि योगशास्त्र यांचे नाते अतूट आहे. आपण जसे आपले जगणे विसरत नाही तसे आपण आपल्या नदीला विसरू नये. नाशिककरांनी गोदावरीशी आपले नाते घट्ट करावे, असे प्रतिपादन डॉ. निवेदिता खोत-दंडगव्हाळ यांनी केले.

गोदावरी नदीबाबत जनजागृती वाढावी यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी रामकुंड ते तपोवन, तसेच तपोवन ते रामकुंड अशी गोदा परिक्रमा करण्यात येते. रविवारी (दि. ११) झालेल्या या परिक्रमेप्रसंगी त्या योगशास्त्र आणि नदी या विषयावर बोलत होत्या.

गोदावरी परिक्रमेतून गोदावरीचा शहरातील भाग नेमका कसा आहे, कसा असायला हवा, गोदाघाटावरील वारसा, कुंड, नाशिकचा इतिहास या अनुषंगाने होणारी ही परिक्रमा हा परिसर अधिक सुंदर करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. गोदावरीचे प्रदूषण नेमके कशामुळे आणि कोणकोणत्या कारणांमुळे होते, याबाबतची माहिती शिल्पा डहाके यांनी या परिक्रमेत दिली. रविवारी सकाळी ७ वाजता दुतोंड्या मारुती येथून परिक्रमेस सुरुवात झाली. ११ वाजता रामकुंडावर या परिक्रमेचा समारोप झाला. पुढील परिक्रमा दि. ११ मार्च रोजी होणार असल्याची माहिती डहाके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यानुष्ठान पदन्यासाने श्रोते मुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कीर्ती कलामंदिराच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आयोजित नृत्यानुष्ठान कार्यक्रम परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडला. पंडित नंदिकशोर कपोते यांच्या शिष्या नीलिमा हिरवे यांनी गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात केली. नाशिकच्या ख्यातनाम स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

दर महिन्याला नवनवीन संकल्पनांनी सजलेल्या या नृत्यानुष्ठानातील रविवारचे सहावे पुष्प होते. कीर्ती कलामंदिराच्या वतीने १९९४ ला सुरू झालेल्या नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे रजत महोत्सवी वर्ष असल्याने २०१७ ते २०१८ या पूर्ण वर्षभर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हे सत्र सादर होते. एकल कथक नृत्याचा हा रंगमंचीय सौंदर्यानुभव सादर करण्यात आला. सहाव्या पुष्पाचा विषय '१३ मात्रा' असा होता. नीलिमा यांनी १३ मात्रांचा रास, ताल, थाट, आमद, परण, प्रिमलू, ततकार या पारंपरिक रचनांनी हा कार्यक्रम सजला. अभिनयात सूरदासांच्या तीन दोह्यांनी कृष्णाच्या मुरलीबद्दल असूया असणाऱ्या गोपिकांची व्यथा मांडली. बासरी लवपून ठेवली तर कृष्ण काय करीत असेल, असा विचार करून गोपिका बासरी लपवतात, पण बासरीविना त्यांचेच जगणे निरस होऊन जाते. नीलिमा यांना तबलासंगत पराग हिरवे, संवादिनीवर स्वानंद कुलकर्णी, गायनासाठी श्रीपाद लिंबेकर आणि पढंतवर ऋतुजा जोशी होत्या.

उत्तरार्धात पंडित विजय शंकर यांच्या शागीर्द शीला मेहता यांनी प्रस्तुती केली. त्यांनी १३ मात्रांचा रासताल लखनौ घराण्याच्या पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेतून सादर केला. लखनौच्या खास लखनवी मिजाज, ऐट आणी नजाकतीचे सुरेख दर्शन यावेळी मेहता यांनी घडवले. रामचरितमानस मधील तुलसीदासांची राग अलोट, ताल रूपकमधील रचना प्रस्तूत केली. कौसल्या छोट्या रामाला सकाळच्या प्रहरी उठवते. तिच्या अनेक तऱ्हा आणि सकाळच्या सौंदर्याचे वर्णन यात आले. पियू आरोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेहता यांना विवेक मिश्रा, मनाोज देसाई, अपर्णा देवधर यांनी साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसाआड एक बळी!

$
0
0

वर्षाच्या सुरुवातीलाच १६ जणांचा अपघातात मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात जानेवारी महिन्यात १६ जीवघेण्या अपघातांमध्ये १६ जणांचा बळी गेला. रस्ते अपघातात दोन दिवसाआड एका जणाचा मृत्यू होत असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून जीवघेण्या अपघातांची संख्या घटत आहे. मात्र, २०१८ मध्ये पोलिसांसह नाशिककरांना अपघातांना आणखी आळा घालण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

शहरात २०१२ ते २०१७ या सहा वर्षांच्या कालावधीत एकूण तीन हजार ५११ अपघात झाले. यातील एक हजार ४५ जीवघेण्या अपघातांमध्ये तब्बल १०९७ व्यक्तींचा जीव गेला. तर, दोन हजार ७१४ व्यक्ती गंभीर जायबंदी झाल्या. मागील दोन वर्षांच्या कालावधीत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीय पध्दतीने घटते आहे. सन २०१६ मध्ये शहरात २०३ जीवघेण्या अपघातांमध्ये २१३ नागरिकांचा जीव गेला होता. तर, एकूण अपघातांची संख्या ६२८ इतकी होती. सन २०१७ मध्ये जीवघेण्या अपघातांच्या संख्येत ४५ इतकी घट झाली. या वर्षात १५८ जीवघेण्या अपघातांची नोंद झाली. त्यात १७१ नागरिकांचा बळी गेला. एकूण अपघातांची संख्या ५०३ इतकी राहिली. सन २०१६ च्या तुलनेत पाहता एकूण अपघातांच्या संख्येत १२५ एवढी मोठी घट झालेली दिसते. जानेवारी २०१८ मध्ये १६ जीवघेणे अपघात झाले. यात १६ जणांचा मृत्यू झाला. गंभीर अपघातांची संख्या २६ इतकी राहिली. या अपघातांमध्ये ३६ व्यक्ती जायबंदी झाल्या. याशिवाय किरकोळ दुखापतीप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मागील तीन वर्षांपासून जीवघेण्या अपघातांमध्ये घट होत असून, यंदाही हे प्रमाण कायम ठेवण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाला लक्ष घालावे लागणार आहे.

अपघात-जीवघेणा-दुखापत-एकूण-मृत्यू-जखमी

हिट अॅण्ड रन-४-११-१५-४-१३

डोक्यास दुखापत-४-१-५-४-१

पाठीमागून धडक-१-५-६-१-६

बाजूने धडक-०-४-५-०-७

रस्त्यावरील स्थिर वस्तूला धडक-१-०-१-१-०

पादचारी धडक-४-९-१३-४-१०

वळणावर अपघात-१-३-४-१-५

इतर-१-१-२-१-१

एकूण-१६-३४-५०-१६-४३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष्णू, महिषासूर मर्दिनीच्या मूर्तींचे होणार संशोधन

$
0
0

धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादामधील प्रकाशा गावात घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना दि. २४ जानेवारी रोजी काळ्या पाषाणातील विष्णू व महिषासूर मर्दिनी अवतारातील दोन मूर्ती आढळल्या होत्या. त्या दोन्ही मूर्ती धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळात दाखल झाल्या असून, ऐतिहासिक मूर्तींचे संकलन, जतन, संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी आता राजवाडे संशोधन मंडळ करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांनी दिली.

धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाकडून शुक्रवारी (दि. ९) याबाबत पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष संजय मुंदडा, मुख्य सचिव डॉ. सर्जेराव भामरे, ग्रंथसचिव नंदलाल अग्रवाल, श्रीपाद नांदेडकर आदी उपस्थित होते. या वेळी सविस्तर माहिती देताना सचिव भामरे म्हणाले की, प्रकाशा येथे दि. २४ जानेवारी रोजी भोईगल्ली परिसरात घराच्या बांधकामाचे खोदकाम सुरू होते. त्यावेळी १५ फूट खोदकाम झाल्यानंतर जमिनीत काळ्या रंगाच्या दोन मूर्ती आढळून आल्या. दरम्यान, ग्रामस्थांनी या मूर्तींचे विसर्जन करण्याचे ठरविले होते. मात्र काही नागरिकांनी विरोध करून राजवाडे संशोधन मंडळाशी संपर्क केला. त्यांनी माहिती घेऊन ग्रामपंचायतीकडून ठराव करीत राजवाडे मंडळात संशोधकांना अभ्यासासाठी ठेवण्यात आल्या, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

अशी आहे मूर्तींची माहिती...

भगवान विष्णूची उभी खंडीत झालेली मूर्ती आहे. तिची उंची ३३ इंच आहे. तर दुसरी मूर्ती ही चांमुडादेवीची असून, ही मूर्ती क्रोधमुद्रेत आहे. तिची उंची २० इंच आहे. तसेच दोन्ही मूर्ती या कर्नाटक शैलीतील आहेत. प्रकाशा गावाला गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक व सांस्कृतिक वसा आहे. खान्देशातील तापी खोऱ्यांमध्ये संशोधन केल्यास अशा अनेक मूर्ती सापडण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे.

दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज

खान्देशातील तापीखोऱ्यातील गावांमध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. तर प्रकाशा गावातील प्राचीन काळातील ३० एकर जमिनीत वसाहत झाल्याने त्याठिकाणी खोदकाम झाल्यास अशा प्राचीन काळातील मूर्ती आढळतात, असे यावेळी सांगण्यात आले. प्राचीन काळात मध्यप्रदेश व गुजरात सीमारेषेलगत असलेल्या प्रकाशा गावात व्यापाऱ्यांचा खरेदी-विक्री व्यवहार होत असे, त्यामुळेच या मूर्ती खोदकामादरम्यान आढळून आल्या असाव्या, असा अंदाज आहे. या दोन्ही मूर्ती १ हजार वर्षांपूर्वीच्या म्हणजेच नवव्या ते दहाव्या शतकातील असल्याचा अंदाजही राजवाडे मंडळाकडून माहिती देताना वर्तविण्यात आला. सध्या या मूर्ती अभ्यासकांसाठी राजवाडे मंडळात ठेवण्यात आल्या असून, पुणे येथील मूर्तीशास्त्राचे तज्ज्ञ अभ्यासासाठी बोलविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images