Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात योजना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील गरजूंपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचायला हवी. न्यायालयांनी त्यासाठी योगदान देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली असून, त्याचा लाभ तळागाळातील घटकांना मिळेल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले.

विधी सेवा शिबिर आणि शासकीय योजनांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मंगळवारी ते बोलत होते. कार्यक्रमास महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर आदी उपस्थित होते.

सरकार राबवीत असलेल्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात, तसेच त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमामधून एकाच ठिकाणी तीसपेक्षा अधिक योजनांची माहिती मिळत असल्यामुळे त्याचा उपयोग नक्कीच होईल, असा विश्वास न्यायाधीश शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, ग्रामीण भागातील गरिबांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती कोठे मिळेल हे माहिती नसल्यामुळे प्रयत्न करूनदेखील ती मिळत नाही. माहितीच मिळत नसल्याने त्यांना योजनांपासून वंचित राहावे लागते. मेळाव्याच्या आयोजनाचा नक्कीच फायदा होईल, तसेच ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्न व्हावेत, असे मत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केले.

नागरिकांनी घेतली माहिती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने बी. डी. भालेकर मैदान, महाकवी कालिदास कलामंदिरजवळ येथे हा मेळावा झाला. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत दोन हजारांहून अधिक नागरिकांनी येथे भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली. शासकीय विभागांनी २९ स्टॉल्स उभारले होते. यामध्ये पोलिस आयुक्तालय, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, महापालिकेचे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास विभाग, जिल्हा अधीक्षक डाकघर (टपाल विभाग), जिल्हा पोलिस अधीक्षक, पशुसंवर्धन विभाग आदी विभागांचा समावेश होता.

यांना मिळाला लाभ

दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रिया संदीप अढांगळे यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, तसेच प्राधिकरणाचे सचिव बुक्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले कल्याण योजनेंतर्गत प्रिया अढांगळे यांना, तसेच त्यांच्या मुलींना चार हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत लता पगारे यांनाही योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. जलसंपदा विभागातर्फे पालखेड पाटबंधारे विभागातील लाभ क्षेत्राचा दाखला दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील विकास देशमुख यांना देण्यात आला. यावेळी एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर राघवेंद्र भाट उपस्थित होते. दिवसभरात हजारो नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन योजनाची माहिती जाणून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुग्णालयाच्या प्रतीक्षेत साधुग्राम आजारी

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात साधुग्रामसाठी सुसज्ज मध्यवर्ती कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वण्यांचा कालावधी संपल्यानंतर या इमारतीत रुग्णालय सुरू करण्याची तयारी महापालिकेने दाखविली. याविषयीच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर दोन वर्षे उलटूनही या कार्यालयात रुग्णालय सुविधा देण्याच्या हालचाली झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे ही इमारती रुग्णालयाच्या प्रतीक्षेत धूळखात उभी आहे.

औरंगाबादरोडलगत तपोवनाच्या मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वाराच्या पूर्वेला आणि जनार्दन स्वामी आश्रमाच्या पश्चिमेला असलेल्या जागेत १९९४-९५ ला इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतरच्या दहा वर्षांच्या कालावधीत ही इमारत अर्धवट बांधकामासह विनावापर पडून होती. या इमारतीचा उपयोग २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी आरोग्यसेवा देण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर ही इमारत ब्रह्मा व्हॅली या संस्थेला महापालिकेने भाडेतत्त्वावर २०१५-१६ च्या कुंभमेळ्याच्या अगोदर दिली होती. सिंहस्थ कालावधीत पुन्हा इमारत महापालिकेने आरोग्यसेवेसाठी ताब्यात घेतली.

क्षयरोग नियंत्रण कार्यालय

सिंहस्थानंतर या इमारतीत महापालिकेने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील क्षयरोगाविषयीची माहिती संकलित करून ती राज्य सरकारला पाठविण्याचे काम केले जाते. तसेच या इमारतीतील एका खोलीत पोलिओ लसीकरणाचे कामकाज चालते. याव्यतिरिक्त असलेला इमारतीचा भाग वापराविना पडून आहे. या इमारतीत ओपीडी सुरू करण्यात येणार असल्याची मागील वर्षी चर्चा होती. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी होणार असल्याने, त्यांना आरोग्यसुविधा मिळणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, अद्याप तशी सुविधा सुरू करण्यात आलेली नाही.

प्रवेशद्वार बांधले दोरीने

या इमारतीकडे जाण्यासाठी तपोवन रस्त्याकडून तसेच उत्तरेकडूनही मार्ग आहे. तपोवन रस्त्याला प्रवेशद्वार आहे. मात्र, या प्रवेशद्वाराला कडी-कोयंडा नसल्यामुळे ते चक्क दोरीने बांधण्याची वेळ आलेली आहे. उत्तरेच्या बाजूला सुलभ शौचालय असून या शौचालयाजवळून या इमारतीकडे येण्याचा मार्ग आहे. या मार्गाकडे प्रवेशद्वारच नसल्यामुळे कोणीही कधीही या इमारतीकडे येऊ शकतो. येथील क्षयरोग नियंत्रण कामकाज सायंकाळी आटोपल्यानंतर येथे एक बॅरिकेटस् लावण्याचा प्रयत्न होतो. येथून इमारतीकडे जाण्यासाठी असलेल्या जागेचा विचार करता हे बॅरिकेटस् अपुरे पडत असल्याचे दिसते. त्यामुळे या इमारतीच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर आहे. रात्रीच्या वेळी या इमारतीत कोणीही शिरू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे दिवस-रात्र येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याचे दिसते. काही ठिकाणी वाढलेले गवत काढण्यात आलेले नसल्यामुळे त्याचीही अडचण होत आहे.

रुग्णालय होणार कधी?

या इमारतीजवळच साधुग्राम मध्यवर्ती कार्यालय बांधण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात अत्यंत गजबजलेले हे कार्यालय २०१५-१६ च्या कुंभमेळ्याच्या पर्वण्या आटोपताच सुने पडले. या कार्यालयाची रचना लक्षात घेता त्याचा उपयोग रुग्णालयासाठी करता येईल, अशी चर्चा होती. येथे महापालिकेचे रुग्णालय सुरू करण्याच्या घोषणाही केल्या गेल्या. मात्र, त्याला दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी अजून रुग्णालय सुरू करण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या कार्यालयाची इमारती धूळखात पडून आहे. मोकळी जागा, पार्किंगची चांगली सुविधा, रस्त्यालगत असल्यामुळे त्वरित पोहचणे शक्य होणार असल्यामुळे या इमारतीत आरोग्यसेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी जोर धरीत आहे.

साधुग्रामच्या या कार्यालयाच्या इमारतीत रुग्णालय किंवा महिला होस्टेल असे दोन प्रस्ताव आहेत. त्यात रुग्णालयास प्राधान्य देण्यात येईल. येथे रुग्णालय सुरू केल्यास चोवीस तास डॉक्टरांची उपलब्धता करून द्यावी लागेल. सध्या महापालिकेत डॉक्टरांची संख्या लक्षात घेता, ते शक्य नाही. म्हणून जेव्हा मानधनावर डॉक्टरांची भरती केली जाईल, त्यावेळी या इमारतीत रुग्णालय सुरू करण्यात येईल.

- प्रियंका माने, सभापती, पंचवटी प्रभाग समिती

साधुग्राम कार्यालयाच्या इमारतीत रुग्णालय सुरू केल्यास तपोवन, नांदूर, मानूर, हिरावाडी, आडगाव येथील गरजू रुग्णांना सुविधा उपलब्ध होईल. रस्त्यालगतच ही इमारत असल्यामुळे सर्वांच्या दृष्टीने सोयीची आहे. येथे रुग्णालय सुरू केल्यास नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ घेता येईल.

- किशोर गरड, स्थानिक नागरिक

शासकीय इमारतींचे बांधकाम जनतेच्या पैशातून होत असते. या इमारतींचा वापर जनतेच्या हितासाठी करता आला पाहिजे. कोणतीही इमारत वापरात असते, तेव्हा तेथील स्वच्छता होत असते. जास्त काळ पडून असलेल्या इमारतींना अवकळा येते. तपोवनातील या इमारतीत आरोग्यसेवा सुरू केल्यास येथील स्लम भागातील गरिबांना त्याचा लाभ घेता येईल.

- तुषार जगताप, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिटको’ला प्रतीक्षा बायोमेडिकल इंजिनीअरची

$
0
0

यंत्रसामग्रीसाठीचे २० कोटी परत जाण्याचा धोका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील रिक्त २६१ पदांच्या आउटसोर्सिंगसह बायोमेडिकल इंजिनीअर नियुक्तीचा प्रस्ताव तीन महिन्यांपासून महासभेवर प्रलंबित आहे. त्यामुळे सिंहस्थात बिटको हॉस्पिटलला यंत्रखरेदीसाठी मिळालेले २० कोटी रुपये परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिटीस्कॅन व एमआरआय खरेदीसाठी लागणारे बायोमेडिकल इंजिनीअरची नियुक्तीचा प्रस्तावही यात प्रलंबित असल्याने 'बिटको'ची यंत्रखरेदी अनेक दिवसांपासून रखडली आहे.

महापालिकेकडून नाशिकरोड विभागात अद्ययावत नूतन बिटको हॉस्पिटलची उभारणी केली जात आहे. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असले तरी या हॉस्पिटलमधील महत्त्वाची यंत्रखरेदी अद्याप झालेली नाही. २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून 'बिटको'साठी २० कोटी रुपयांची सिटी स्कॅन व एमआरआय यंत्रखरेदी केली जाणार होती. मात्र, या यंत्रखरेदीला नेहमीच ग्रहण लागले आहे. या यंत्रखरेदीसाठीची निविदा प्रक्रिया बराच काळ चालल्यानंतर कशीबशी गेल्या वर्षी ती पूर्ण होऊ शकली. निविदा अंतिम झाल्यानंतर यंत्रांच्या प्रत्यक्ष खरेदीपूर्वी त्यांची सरकारच्या बायोमेडिकल इंजिनीअरमार्फत तपासणी केली जाणे बंधनकारक आहे. आता बायोमेडिकल इंजिनीअरची नियुक्ती रखडल्यामुळे यंत्रखरेदी अंतिम होऊ शकलेली नाही. सरकारच्या वैद्यकीय विभागाच्या परिपत्रकानुसार या यंत्रखरेदीसाठी बायोमेडिकल इंजिनीअरची गरज आहे. मात्र, महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर बायोमेडिकल इंजिनीअर्सचे पदच अस्तित्वात नाही. या पदासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे.

तीन महिन्यांपासून प्रस्ताव प्रलंबित

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या २६१ पदाच्या आउटसोर्सिंगसह महापालिकेत दोन बायोमेडिकल इंजिनीअरची भरतीचा प्रस्ताव महासभेवर प्रलंबित आहे. मात्र, तांत्रिक गोष्टींचा आधार घेत तीन महिन्यांपासून हा प्रस्ताव तहकूब ठेवला जात आहे. त्यामुळे इंजिनीअरच्या नियुक्तीसह यंत्रसामाग्रीची खरेदी रखडली आहे. मार्चच्या आत हा निधी खर्चासाठी वैद्यकीय विभागाची धडपड सुरू असताना निव्वळ महासभेकडून ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने हा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगने कोंडला रस्त्यांचा श्वास

$
0
0

सातपूरला मोकळ्या भूखंडांवर वाहनांचे अतिक्रमण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

वेगाने विकसित होणाऱ्या नाशिक शहरात वाहनांची संख्या वाढली असून, या वाढलेल्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी होताना दिसते. सातपूर भागातही हीच समस्या भेडसावत असून त्यामध्ये या वाहनांच्या पार्किंगने रस्त्याचा श्वास कोंडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सातपूर भागातील वस्तीत हळूहळू वाढ होत असून, नागरिकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही, त्यामुळे काहीठिकाणी तर महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर वाहनांचे अतिक्रमण झालेले आहे. यामुळे त्या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागाच मिळत नाही. याकडे महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक कधी लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात वाढलेल्या अतिक्रमणांकडे महापालिका आयुक्तांनीच लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

गल्लीतील रस्तेही फुल्ल

मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली पहायला मिळते. परिवहन खात्याच्या माहितीनुसार वर्षांत लाखो दुचाकी व चारचाकी वाहने ग्राहकांनी खरेदी केल्या असल्याचे सांगितले. वाढलेली लोकसंख्या व वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना रोजच चालकांना करावा लागतो. परंतु, वाढलेल्या वाहनांमुळे गल्लीबोळातील रस्तेच पार्किंगमध्ये अडकले असल्याचे पहायला मिळते. त्यातच मिळेल त्या जागेवर वाहने पार्क करण्याची पद्धतच सुरू झाली आहे.

वाहनांमुळे वादांचे प्रसंग

सातपूर भागातील काही परिसरात घरांचे बांधकाम करताना दुचाकी अथवा चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी जागाच ठेवण्यात आली नसल्याने रस्त्यावरच अनेकजण वाहने उभी करतात. यामुळे अनेकदा रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाद होतात. विशेष म्हणजे, महापालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडांवरच चारचाकी वाहनांनी ताबा घेतला असल्याने मुलांनी खेळण्यासाठी जायचे कुठे, असा सवाल सुज्ञ पालकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने वाढत चाललेल्या अतिक्रमणांवर तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जत्रा हॉटेलशेजारील रस्त्याची दुरुस्ती

$
0
0

जत्रा हॉटेलशेजारील रस्त्याची अखेर दुरुस्ती

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जत्रा हॉटेलशेजारील सर्व्हिस रोडवरील उखडलेला रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या समस्येबाबत काही दिवसांपूर्वी 'मटा'ने वृत्त दिले होते. त्यानंतर प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेत या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात केली आहे.

जत्रा हॉटेल येथील दोन्ही सर्व्हिस रोडचा वापर वाढला असून, येथील मुख्य रस्त्यावर दुचाकीसारख्या वाहनाचालकांना अपघाताचा धोका आहे. त्यामुळे ते सर्व्हिसरोडचा वापर करतात. आडगावपासून हा रस्ता सुरू होऊन पंचवटीपर्यंत जातो. मात्र हा रस्ता पावसाळ्याच्या आधीपासूनच नादुरुस्त असून, त्याची दोन वर्षांपासून दुरुस्ती न केल्याने खड्डे वाढतच आहेत. परिणामी, या रस्त्याचा वापर करणे वाहनचालकांना अवघड झाले होते. रात्री येथे पथदीपही बंद असतात त्यामुळे अपघात वाढले होते. पावसाळ्यात तर हा खड्डा मायाजालच झाल्याने दुचाकी वाहनचालक घसरून पडत होते. हा खड्डा दुरुस्त करावा यासाठी नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतापात भरच पडली होती. या सर्व्हिस रोडचा वापर बंद झाल्याने या ठिकाणी हाटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने उभी केली जात होती. नागरिकांनी मुख्य मार्गाचा अवलंब करावा लागत होता. आता रस्ता काम झाल्याने रस्त्याचा वापर पुन्हा सुरू झाला असून, सर्व्हिस रोडवरील अन्य ठिकाणीच खड्ड्यांची दुरुस्ती करून डांबरीकरणाची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्तेसाठी ‘शाळा बंद’चा निर्णय

$
0
0

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील कमी पटसंख्येच्या तेराशे शाळा बंद केल्याच्या निर्णयाबाबत चुकीचे चित्र निर्माण करण्यात आले असून, वास्तविक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आहे. कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतर चांगल्या पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी यातून मिळाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक किमी अंतरावरील शाळेतच समायोजित करण्यात आले असून, ज्या विद्यार्थ्यांना दूरच्या शाळांमध्ये जाण्याची अडचण निर्माण झाली आहे, त्यांच्यासाठीही आम्ही मार्ग शोधत आहोत. या निर्णयामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

नाशिकमध्ये संदीप फाउंडेशन येथे महाराष्ट्र विद्या प्राधिकरण व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय शिक्षणाची वारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वारीच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी शिक्षणमंत्री तावडे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षकांनी टाळ्या वाजवून स्वागत केल्यानंतर 'शिक्षणमंत्र्यांना शिक्षकांकडून टाळ्या मनापासून मिळण्याचे दिवस राहिले का?' असा टोमणा लगावत तावडे यांनी भाषणाला सुरुवात केली. पुढे ते म्हणाले, की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केल्यापासून राज्यात शिक्षणात गुणवत्ता स्पष्ट दिसून येत आहे. सन २०१४ साली शिक्षणात राज्याचा सोळाव्या स्थानावर असलेला क्रमांक आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. राज्यातील १ लाख ३५ हजार शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत, तर २५ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये दाखल झाले आहेत, हे या कार्यक्रमाचे यश आहे.

महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी आभार मानले. यावेळी संदिप फाउंडेशनचे संदीप झा, आमदार सीमा हिरे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, महिरावणीच्या सरपंच आरती बुऱ्हाडे, उपसंरपंच रमेश खांडबहाले, नरेंद्र पाठक आदी उपस्थित होते.

त्यावर नंतर बोलू

तावडे यांनी शिक्षकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले खरे पण शिक्षक मान्यता, अनुदान, सातवा वेतन यांसारख्या विषयांवर आता या कार्यक्रमात चर्चा नको, असे स्पष्ट केले. यामुळे शिक्षकांवर मर्यादा आल्या. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम, येणाऱ्या अडचणींविषयी प्रश्न विचारले. यावेळी प्रश्नांना अनुसरून उत्तर देताना किशोरवयीनांसाठी 'किशोरवयीन आरोग्य शिक्षण' या विषयातून हे शिक्षण दिले जाणार असल्याचे सांगत शिक्षकांनीही यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडाभरात कांदादरात १२०० रुपयांची घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये कांदा दरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात चार हजाराची पातळी गाठणाऱ्या कांद्याला सद्यस्थितीत कमाल दोन हजाराचा दर मिळत आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी कांदा दरात आणखी घसरण झाली तर शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. यामुळे दरवाढीसाठी निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यात कांद्याची वाढलेली आवक आणि निर्यातमूल्य डॉलरमध्ये असलेली वाढ यामुळे सोमवारच्या तुलनेत कांदा दरात ३०० रुपयांची, तर मागील आठवड्याच्या तुलनेत १२०० रुपयांची घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे. पुणे व गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून कांद्याची मोठी आवक येत आहे. त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे. गेल्या महिन्यात सरकारने दीडशे डॉलरने निर्यातामूल्य कमी करून ७०० डॉलरवर आणले असले तरी त्याचा निर्यातीला फारसा लाभ झालेला नाही. यामुळे निर्यातमूल्यात आणखी घट करण्याची मागणी होऊ लागली आहे.

लाल कांदा दर (प्रति क्विंटल)

कमाल : १९०५ रुपये

किमान : ९०१ रुपये

सरासरी : १६०१ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेत्यांचे मुंबईमध्ये अधिवेशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि मुंबई वृत्तपत्र संघटना यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय अधिवेशन मुंबईच्या परळ येथील डॉ. शिरोडकर विद्यालयात नुकतेच झाले. यावेळी राज्य वृत्तपत्र संघटनेशी सलग्न असलेल्या बागलाण तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सदस्यांनीही यात सहभाग घेतला.

अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की वृत्तपत्र कुटुंबीय नाते जपण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचा मी कायम ऋणी राहील. वृत्तपत्रांची क्रांती घरोघरी पोहचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले. न्याय व्यवस्थेलाही वृत्तपत्र व्यवस्थेकडे यावे लागले, इतका महत्त्वाचा हा स्तंभ आहे. वृत्तपत्र विक्रेता कोण आणि फेरीवाला कोण हे राजकारण्यांना कळायला हवे. नेहमी विचार करून मी भूमिका घेतो. कारण माझी भूमिका मराठी माणसांसाठी असते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बागलाण तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य सागर जाधव, बापू बागुल, प्रवीण पवार, भगवान पवार, सुनील सातव, गुरुप्रसाद कुलकर्णी, संजय अहिरे, संजय शिंदे यांनी अधिवेशनात सहभाग घेतला. मालेगाव येथील संघटनेचे सचिव रवींद्र कुलकर्णी यांच्या माध्यमातून अध्यक्ष हरीश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांची भेट घेत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन् पौर्णिमेला दिसली चंद्रकोर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षातील पहिल्या खग्रास चंद्रग्रहणाच्यावेळी ग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा तिहेरी योग जुळून आल्याने नागरिकांना अभूतपूर्व योग पहायला मिळाला.या आधी ३१ मार्च १८६६ रोजी म्हणजे १५२ वर्षांपूर्वी असा तिहेरी योग होऊन गेला तर या पुढचा असा योग १९ वर्षांनी ३१ जानेवारी २०३७ रोजी येणार आहे.

बुधवारी सायंकाळी ४ वाजून २२ मिनीटानी चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीत म्हणजे उपछायेत येऊन चंद्रग्रहणास प्रारंभ झाला. यानंतर चंद्रबिंबाची तेजस्विता हळूहळू कमी होत ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्राने पृथ्वीच्या गडद सावलीत -प्रच्छायेत प्रवेश केला. ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या प्रच्छायेत येऊन खग्रास चंद्रग्रहण सुरू झाले. परंतु, नाशिकमध्ये तोपर्यंत चंद्रोदय न झाल्याने ग्रहणाचा आरंभ नाशिककरांना बघता आला नाही. नाशिकमध्ये थेट ग्रस्तोदित चंद्रबिंब पूर्व क्षितिजावर उगवताना दिसले. यावेळी साध्या डोळ्यांनी सुपर-ब्ल्यू,-ब्लडमूनचे विलोभनीय दर्शन घेता आले. ही खग्रास स्थिती ७:३८ पर्यंत दिसली. यानंतर चंद्र प्रच्छायेतून बाहेर पडून पुन्हा उपछायेत आला आणि रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर आल्याने ग्रहण सुटले.

नागरिकांचे प्रबोधन

खगोल मंडळ, नाशिकतर्फे आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक, गंगापूर रोड येथे खग्रास चंद्रग्रहण बघण्याची खास सोय करण्यात आली होती. यावेळी खगोल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रहणाविषयी माहिती सांगितली. ग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची देखील सोय असल्याने लालसर चंद्रबिंब, त्यावरील विवरे यांचे अगदी जवळून दर्शन झाले. ग्रहणकाळात अन्न -पाणी दूषित होत असल्याने काही खाऊ नये, अशी अंधश्रद्धा असते. खगोल मंडळातर्फे या अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करण्यात आले. उपस्थितांना चॉकलेट वाटून ग्रहण काळात खायला लावले. यावेळी मोठ्या संख्येने नाशिककरांनी हजेरी लावत ग्रहणाची शास्त्रीय माहिती समजून घेत सुपर-ब्ल्यू-ब्लडमून बघण्याचा आनंद लुटला.

चंद्र लाल का होतो?

आपली पृथ्वी चंद्राला घेऊन सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. या परिभ्रमणात कधी कधी अशी परिस्थिती येते कि सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आणि प्रतलात आल्याने पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. याला चंद्रग्रहण म्हटले जाते. पण चंद्रग्रहणात सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्र अदृश्य होत नाही तर लालसर दिसतो. याचे कारण म्हणजे पृथ्वीभोवतीच्या वातावरणातून जाणाऱ्या सूर्यकिरणांचे वक्रीभवन होऊन फक्त लाल रंगाचे किरण चंद्रपृष्ठावर पोचतात आणि तेच परावर्तित होऊन पृथ्वीवर येतात.या लालसर तांबूस चंद्राला ब्ल्यू मून असे म्हटले जाते.

ब्लड मून, ब्लू मून, सुपरमून

'चंद्र ज्या कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरतो ती वर्तुळाकार नसून, लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र कधी पृथ्वीपासून सरासरी अंतरपेक्षा दूर जातो तर कधी जवळ येतो. चंद्र पृथ्वीपासून सगळ्यात जवळ असताना जर पृथ्वीवरून चंद्राची पौर्णिमा तिथी दिसत असेल, तर अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. या चंद्राला सुपरमून म्हणतात. जेव्हा एखाद्या इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला 'ब्ल्यूमून' म्हणतात. हा फक्त शब्दप्रयोग आहे. त्यामुळे चंद्र काही निळ्या रंगाचा दिसत नाही. बुधवारी १५२ वर्षांनंतर ब्लड मून - सुपर मून -ब्लू मून असा तिहेरी योग जुळून आला होता, असे खगोल अभ्यासक विनय जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल ट्रॅकसाठी साडेतीन कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

सायकलप्रेमींना प्रोत्साहन मिळावे यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी साडेतीन कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे लवकरच या २९ किलोमीटरच्या ट्रॅकच्या कामास सुरुवात होऊ शकणार आहे.

त्र्यंबकरोडवरील अनंत कान्हेरे मैदान ते सातपूर यादरम्यान दुतर्फा पाच किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्याचा प्रस्ताव नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने महापालिकेला दिला होता. त्र्यंबकरोड तसेच महापालिकेच्या रिंगरोडवरही सायकल ट्रॅक उभारण्याची मागणी सातत्याने होत आली आहे. हा ट्रॅक महापालिकेने उभारावा, अशी सूचना असोसिएशनने केली, तर असोसिएशननेच आधी १०० मीटरचा नमुना ट्रॅक तयार करून द्यावा असा सल्ला महापालिकेने दिला होता. हा प्रस्ताव असोसिएशनने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे मांडला. त्यामध्ये सुधारणा करत नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दुतर्फा ट्रॅक करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनदेखील दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा पुन्हा ३०० रुपयांनी घसरला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

राज्यासह इतर राज्यात कांद्याची वाढलेली आवक आणि निर्यात मूल्य डॉलरमध्ये असलेली वाढ यामुळे सोमवारच्या तुलनेत कांदा दरात ३०० रुपयांची तर मागील आठवड्याच्या तुलनेत १२०० रुपयांची घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशीच घसरण सुरू राहिली तर येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकरी अधिक संकटात सापडेल अशी भीती व्यक्त होत आहे.

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे. पुणे व गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून कांद्याची मोठी आवक येत आहे. त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे. तर निर्यातामुल्य ७०० डॉलर असल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये सोमवारच्या तुलनेत ३०० रुपयांची तर मागील आठवड्याच्या तुलनेत १२०० रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची २१४०० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला जास्तीत जास्त १९०५ रुपये, सरासरी १६०१रुपये तर कमीतकमी ९०१ प्रति क्विंटलला भाव मिळाला.

वाढलेले निर्यातमूल्य आणि देशांतर्गत येणारी कांद्याची मोठी आवक यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी कमी झाली. बाजारभावात घसरण होत आहे. ही घसरण रोखण्यासाठी निर्यातमूल्य १०० ते १५० डॉलरपर्यंत आणायला हवे. -मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव

गेल्या दोन वर्षांमध्ये कांदा ५०० ते ६०० रुपये तोट्यात विकला होता. मात्र आता कुठे तरी चांगले भाव मिळत असताना केंद्र सरकारने अप्रत्यक्ष केलेली निर्यातबंदी ही डोकेदुखी ठरणार आहे.

-दत्तू सोनवणे, शेतकरी, वाकद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची परवड

$
0
0

'समाजकल्याण'कडेच नाही अर्थसहाय्य

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेतून अडीच लाख रुपये देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी या योजनेबाबत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभाग अनभिज्ञ आहे. या विभागाला या योजनेबद्दलचा कोणतेही शासकीय परिपत्रक आलेले नाही.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी चौकशीस आल्यास इच्छुकांना ऑनलाइन फॉर्म भरण्याचे सांगितले जाते. त्यानंतर हा फॉर्म पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात पाठवले जातो. त्याचे पुढे काय होते याची माहितीच या विभागाला नसते. आतापर्यंत या विभागाकडे असे १७ फॉर्म आले आहेत.

अडीच लाखांच्या या योजनेबद्दलची माहिती समाज कल्याण विभागाला नसली तरी केंद्र व राज्य सरकाच्या ५० हजाराच्या प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेची माहिती आहे. आतापर्यंत तीन वर्षात तब्बल ३६८ आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना या विभागाकडून अर्थसहाय्य करण्यात आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या योजनेतून अर्थसहाय्य मिळावे यासाठी आतापर्यंत १२४ जणांचे अर्ज आले आहे. त्यात ७८ जणांना ३८ लाख ५० हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१० पर्यंत आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहितांना १५ हजार तर त्यानंतर विवाह करणाऱ्यांना ५० हजार रुपये अर्थसहाय्य केले जाते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात १२५ आंतरजातीय विवाहितांना ६० लाख १० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

अर्जासोबत याची गरज

५० हजार रुपयांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहितांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयालयात अर्ज भरुन दिल्यास समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या स्तरावरच त्याला मान्यता दिली जाते. अर्जासोबत विवाह नोंदणी दाखला, वधू-वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि वधू-वरांच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स याची आवश्यक त्यासाठी आहे.

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा

आंतरजातीय विवाह करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेच असून आंतरजातीय विवाहाची नोंदणी त्यासाठी आवश्यक आहे. वधूचे वय १८ वर्षे आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

वर्ष आणि लाभार्थी

२०१५-१६ - १६५
२०१६-१७ - १२५
२०१७-१८ - १२४ (जानेवारी अखेर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रहण...चंद्राचे अन् मनांचेही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंड परिसरात साधू, पुजारी, भाविक यांची झालेली गर्दी, काही पाण्यात उभे राहून तर काही काठावर बसून, हातात माळ घेऊन सुरू मंत्रजप करीत होते. महिला भाविकांचीही संख्या मोठी होती. प्रत्येकाची जप करण्याची पद्धत वेगवेगळी होती. मनातल्या मनात सुरू असलेल्या मंत्रजपामुळे गर्दी असूनही रामकुंडावर शांतता होती.

बुधवारी (दि. ३१) खग्रास चंद्रग्रहण आल्याने ग्रहण काळात मोक्ष प्राप्त करण्यासाठी अनेक भाविकांनी रामकुंडात स्नान केले. ग्रहणकाळात नदीत स्नान शुभ मानले जात असल्याने साधू, पुजारी, भाविक यांनी स्नान केले. खग्रास चंद्रग्रहण काळात भोजन करू नये, ग्रहण स्पर्श ते मोक्ष काळात मल- मूत्र विसर्जन, भोजन, अभ्यंगस्नान, झोप, कामविषयक सेवन शक्यतो टाळावे, असे सांगितले असल्याने या काळात नागरिकांनी काही सेवन करणे वर्ज्य केले होते. नदीत स्नान शुभ मानले जात असल्यामुळे थंडीतही स्नान करीत भाविक रामकुंडात उभे होते. काही साधू पद्मासनात बसून, काही तोंडावर पांघरून घेऊन, काही पाण्यात हात हलवीत तर काही केवळ स्तब्ध राहून मनातल्या मनात मंत्र जप करीत होते. जो तो आपापल्या मंत्र जपात मग्न झालेला दिसत होता. स्नान, दान, होम, तर्पण, श्राद्ध, मंत्र ग्रहण काळात केले जात होते. काही ग्रहण लागण्याच्या सुरुवातीलाच दर्भ व तुळशीपत्र अर्पण करीत होते.

खग्रास चंद्रग्रहण गोदावरी नदीत डुबकी लावून पुण्यकर्म करण्यासाठी रामकुंडावर संध्याकाळी ग्रहण काळात एकच गर्दी झाली होती. ग्रहणात अनेक भाविकांनी गोदावरी नदीत स्नान करुन पूजापाठ करीत मंत्रजप केले. यामध्ये महिला, पुरुष आणि तृतीयपंथियांचादेखील समावेश होता.

चंद्रग्रहण सुरू होताच पंचवटीसह शहरातील बहुतांशी सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. काही मंदिरांचे गाभारे बंद ठेवण्यात आले होते.

पुन्हा हा योग कधी?

आता यानंतर २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. ३१ डिसेंबर २०२८ रोजी ब्ल्यूमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहिवाशी भागात नाले गायब

$
0
0

रहिवाशी भागात नाले गायब

सिमेंटचे पाइप टाकून नाले बुजविण्याचा घाट

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरात लोकवस्ती व घरकुलांची संख्या हजारोंनी वाढली आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, वाढत्या लोकवस्तीत वीज, पाणी, आरोग्य व रस्त्यांची समस्या नवीन वसाहतीत रहिवाशांना सतावत असते. मात्र काही ठिकाणी शहरातील अनेक नालेच गायब होत असल्याचे चित्र पहायला मिळते.

विशेष म्हणजे, औद्योगिक वसाहतीत दिसणारे नैसर्गिक नाले रहिवाशी भागात गायब झालेच कसे, असा सवाल उपस्थित होतो. महापालिकेच्या संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने वाहते असलेले नालेच गायब झाले आहेत, अशीही चर्चा आहे. सातपूर एमआयडीसीतून रहिवाशी भागात प्रवेश करणाऱ्या नाल्यांमध्ये सिमेंटचे पाइप टाकत बुजविण्याचा अनेक ठिकाणी घाट घातला गेला आहे. याबाबत रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील केवळ नोटीस देण्यातच महापालिका अधिकाऱ्यांनी आपली धन्यता मानली आहे. जोरदार पावसाने बुजलेल्या नाल्यांवरून पाणी रहिवाशांच्या घरात शिरत असते. यासाठी महापालिकेने बुजविण्यात आलेल्या नाल्यांची चौकशी करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

शहरी भागात अगोदरच असलेले नैसर्गिक नाले दिसेनासे झाले आहेत. यात एमआयडीसीत दिसणारे नाले रहिवाशी भागात कसे गायब झाले याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. येथील महिंद्रा कंपनीच्या शेजारून जाणारा नैसर्गिक नाला रहिवाशी भागातून नाल्यावरच घर उभारलेचे पहायला मिळते. यानंतर पुढे गेल्यावर पुन्हा नाला गायब होत मोकळ्या भूखंडांच्या बाजूला पुन्हा अवतरतो. यानंतर महिंद्रा हरियालीला लागून मोठा नैसर्गिक नाला गेला आहे. मात्र महिंद्रा हरियाली सोडल्यावर रहिवाशी भागात सिमेंटचे पाइप टाकत तो बुजविण्यात आला आहे. तर गंगापूर धरणाचा उजवा कालवा ओलांडल्यावर नाला अरूंद होत जाताना दिसतो. अशाप्रकारे एमआयडीसीत डोळ्यांनी दिसणारे नाले रहिवाशी भागात येत असताना गायब झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

महापालिकेची यंत्रणा कुठे गेली?

दरम्यान, नैसर्गिक नाले बुजवत सिमेंटच्या लाइनी टाकल्या जात असताना महापालिकेची यंत्रणा कुठे गेली होती. पावसाळ्यात जोरदार पडणाऱ्या पावसाचे पाणी कुठलाही अडथळा न येता वाहून जावे याकरीताच नैसर्गिक नाले सरकारने ठेवले होते. परंतु, भविष्यात उर्वरित असलेले नालेही अशाच पद्धतीने हळूहळू गायब होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याला सिमेंटच्या पाइपांनी बुजवित हे नाले नामशेष केले जात असून, त्याकडे प्रशासन केव्हा लक्ष देणार, हाही प्रश्न सातपूर परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

बाराही महिने नाले वाहतेच

गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी नेहमीच सामाजिक संघटना व सरकारकडून घोषणा केली जाते. परंतु, गोदावरी नदीत मिसळणारे नाले बाराही महिने सांडपाण्याने वाहतेच असल्याचे पहायला मिळते. सातपूर एमआयडीसीतून गोदावरी नदीकडे जाणाऱ्या सर्वच नाले सांडपाण्याने वाहत असताना याकडे मात्र महापालिका व एमआयडीसीचे अधिकारी यांना काहीच घेणे देणे नाही का, असाही प्रश्न अनेकांना पडतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी भाजप - शिवसेना युती सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ढकलगाडीवर मोटारसायकल ठेवून भाववाढीचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोरदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या विषयावर आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेलची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडण्याची भीतीदेखील या मोर्चात व्यक्त करण्यात आली. यावेळी चारचाकी गाडीला दोरखंड बांधून पदाधिकाऱ्यांनी ती ओढत प्रतीकात्मक निषेध केला. नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष सोमनाथ खातळे, जिल्हा परिषदेच्या सभापती अपर्णा खोसकर, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, बाळासाहेब म्हस्के, दीपक वाघ, राजाराम धनवटे, आसाराम शिंदे, रामदास पिंगळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकीवरून पालिका व महसूल प्रशासनात जुंपली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सर्वे. नं. ५४४ व ५४८ या शासकीय मिळकतीची भाडेपट्टी थकविल्याप्रकरणी मंगळवारी महसूल विभागाने पालिकेवर धडक कारवाई करीत दोन वाहने जप्त करण्यात केली होती. या कारवाईला चोवीस तास उलटत नाही तोच पालिका प्रशासनाकडून देखील बुधवारी महसूल विभागाकडे थकीत असलेल्या पाणीपट्टी व घरपट्टी करापोटी महसूल विभागाची कार्यालये सील करण्यात आली. शासकीय कार्यालयांकडूनच एकमेकांवर थकबाकीपोटी होत असलेल्या धडक कारवाईने मात्र प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी येथील महापालिकेचे लेखापरीक्षक कमरुद्दीन शेख, सहायक आयुक्त राजू खैरनार, गृहकर निरीक्षक एकलाख अहमद, उपलेखाधिकारी, प्रभाग अधिकारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी करापोटी येथील नवीन उपविभागीय कार्यालयाकडे व्याजासह एकूण ७६ हजार रुपये, जुन्या तहसीलकडे व्याजासह एकूण १ लाख ५० हजार रुपये तर जुने उपविभागीय कार्यालयांकडे व्याजसह एकूण २ लाख १४ हार ५६४ रुपये थकबाकी आहे. महसूलकडे असलेलेली ही थकबाकी भरलेली नसल्याकारणाने महसूल विभागाचे कार्यालय सील करण्याची कारवाई करण्यात आल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी १० वाजता पालिकेच्या पथकाने प्रथम येथील नवीन तहसील कार्यालय आवारातील उभाविभागीय कार्यालय सील करून दरवाजावर नोटीस लावली. पालिकेकडून अचानक झालेल्या या कारवाईने तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती. यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी जुने प्रांत व तहसील कार्यालयकडे आपला मोर्चा वळविला. येथे देखील थकबाकीचे विवरण असलेली नोटीस लावून रेकोर्ड रूम सील करण्यात आले. पालिका व महसूल प्रशासनाकडून आपापसात करण्यात येत असलेल्या कार्यावाहीने शासकीय कार्यालयाचे थकबाकीदार असताना नागरिकांकडून थकबाकी वसुलीची सक्ती का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना कळवले

या कारवाईनंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, थकबाकी संदर्भात पालिकेकडून २० जुलै २०१७ मिळालेल्या नोटीसीनुसार १ लाख ३४ हजार रुपये भरण्यात आले होते. मात्र त्यानंतर पालिकेकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. तसेच थकीत करापोटी व्याजाची रक्कम देण्यासंदर्भात तरतूद नाही. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आली असून, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे देवरे यांनी स्पष्ट केले.

शासकीय कार्यालयात असमन्वय

मंगळवारी थकीत भाडेपट्टीप्रकरणी प्रांत अजय मोरे व तहसीलदार ज्योती देवरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांची भेट घेवून रक्कम भरण्याबाबत चर्चा केली. मात्र पालिकेकडून याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. अखेर महसूल विभागाने भाडेपट्टी थकल्याविप्रकरणी पालिकेची दोन वाहने जप्त केली होती. तर बुधवारी महापालिकेकडून देखील घरपट्टी व पाणीपट्टी थाकविल्याप्रकरणी महसूल विभागाची कार्यालये सील करण्यात आली. एकूणच थकबाकी वसुली प्रकरणात येथील शासकीय कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा पालिका व महसूलच्या वर्तुळात रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारपासून पुन्हा ‘हॅप्पी स्ट्रीट’ची ट्रीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्सुकता आणि मनोरंजनाची सफर घडवणाऱ्या 'हॅप्पी स्ट्रीट'ची धमाल यंदाही नाशिककरांना अनुभवता येणार आहे. येत्या रविवारपासून (दि. ४ फेब्रुवारी) 'हॅप्पी स्ट्रीट'च्या मालिकेला सुरुवात होणार आहे. कॉलेजरोडवर मॉडेल कॉलनीत सकाळी ७ ते ९.३० या वेळेत नाशिककरांची सकाळ 'हॅप्पी' होणार आहे.

एरव्ही वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यांवर सुटीच्या दिवशी निर्धास्तपणे मौजमजा करण्याचा अनुभव सुखावणारा असतो. हा अनुभव महाराष्ट्र टाइम्सच्या 'हॅप्पी स्ट्रीट'द्वारे मिळत असल्याने या उपक्रमाची मोठी उत्सुकता नाशिकबरोबरच इतरत्रही दिसून येते. विविध संस्था, संघटनांबरोबर किंवा अगदी स्वतंत्रपणे या 'हॅप्पी स्ट्रीट'ची मजा लुटली जाते. शिवाय, या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून शहरवासियांच्या कलागुणांना मुक्त व्यासपीठही देण्यात येते. यंदाही नाशिककरांसाठी महाराष्ट्र टाइम्स 'हॅप्पी स्ट्रीट' घेऊन येत असून, मनोरंजनाच्या या दुनियेत नाशिककर न्हाऊन निघणार आहेत. 'हॅप्पी स्ट्रीट'चा पहिला रविवार कॉलेजरोडवरील मॉडेल कॉलनीत पार पडल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी गोविंदनगर येथील माता जिजाऊ मार्गावर तर १७ फेब्रुवारी (शनिवारी) रोजी नाशिकरोड येथील बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळेदरम्यान हा उपक्रम होणार आहे. म्युझिक, डान्स, झुम्बा, पारंपरिक खेळ, योगासने, सायकल राइड, स्केच, टॅटू, मेहंदी, वारली पेंटिंग, पेपर आर्ट, रांगोळी, बासरीवादन, स्टँडअप कॉमेडी असे मनोरंजनाचे अनेक प्रकार एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तसेच पझल, सापशिडी या खेळांचाही 'हॅप्पी स्ट्रीट'मध्ये समावेश असणार आहे.

अभिनेता अंशुमन विचारे येणार

तीनही हॅप्पी स्ट्रीटची धमाल नाशिककरांसोबत लुटण्यासाठी प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारेही सज्ज असून, त्याला भेटण्याचीही संधीही यावेळी मिळणार आहे. ही नाशिककरांसाठी ट्रीट ठरणार आहे.

जिंका सरप्राइज गिफ्ट

यावेळी महाराष्ट्र टाइम्स हॅप्पी स्ट्रीटमध्ये तुम्हाला सरप्राइझ गिफ्ट लकी ड्रॉद्वारे जिंकण्याची संधीदेखील मिळणार आहे. त्यासाठी 'स्वच्छ सोसायटी- स्वच्छ नाशिक' या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. आपली सोसायटी, अपार्टमेंट स्वच्छ करतानाचा फोटो आणि स्वच्छ झाल्यानंतरचा फोटो तुम्हाला 'सिटिझन रिपोर्टर अॅप'वर पाठवायचा आहे. फोटो पाठवताना सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता, आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. 'हॅप्पी स्ट्रीट'मध्ये भाग्यवंतांना प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे यांच्या हस्ते सरप्राइज गिफ्टही मिळणार आहे. 'हॅप्पी स्ट्रीट'मध्ये कला सादर करण्याची इच्छा असलेल्यांनी आजच ०२५३ - ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सोसायट्यांसाठी स्पर्धा

हॅप्पी स्ट्रीट ज्या रस्त्यावर होत आहे त्या परिसरातील सोसायट्यांसाठी अनोखी स्पर्धा यावेळी घेण्यात येणार आहे. सोसायटीची स्वच्छता करतानाचे फोटो मटा सिटिझन रिपोर्टर या अॅपवर पाठवायचे आहेत. 'हॅप्पी स्ट्रीट-स्वच्छ सोसायटी'या मथळ्याखाली फोटो, सोसायटीचे नाव, पदाधिकाऱ्यांचे नाव हे पाठवायचे आहे. हॅप्पी स्ट्रीटमध्ये या सोसायट्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना विविध प्रकारचे बक्षीस दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलीस निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

$
0
0

धुळे: जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी (वय ५८) यांनी बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

परदेशी हे येत्या मे महिन्यात निवृत्त होणार होते. बुधवारी सकाळी ते नाशिकला गेले होते. कर्ज काढून विवाहित मुलगा अमोलसह नाशिक येथील गंगापूर रोडवर थ्री स्टार हॉटेल व्यवसायास सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठीचे बांधकामही सुरू होते. मात्र, अचानक ही घटना घडल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रात्री पाऊणनंतर परदेशी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला. परदेशी १९९२ला देवपूर ठाण्यात उपनिरीक्षक होते. मोहाडी, आझादनगर व जालनासह ठिकठिकाणी त्यांनी सेवा बजावली होती. धुळ्यातील कायदा-सुव्यवस्थेचे अनेक कठीण प्रसंग त्यांनी उत्तमरित्या हाताळले होते. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप पुढे येऊ शकलेले नाही. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, अधिकारी मुलगी व अधिकारी जावई असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगाव बाजार समितीला मिळणार एक कोटीचा निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम योजना (एमएसीपी) या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. या बाजार समितीला एक कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळणार आहे.

राज्यातील कृषी बाजारांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालास अधिक दर मिळावा आणि शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे त्वरीत मिळावेत या उद्देशाने राज्य सरकारने जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम योजना (एमएसीपी) कार्यान्वित केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील लासलगावसह चांदवड आणि दिंडोरी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या संपूर्ण शेतमालाची विक्री ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इतर कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांना ई-ऑक्शनमध्ये सहभाग घेता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या वाढून शेतमाल खरेदीतील स्पर्धेतून शेतमालास अधिक भाव मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीला 'ई-नाम'

केंद्र सरकारने देशभरासाठी 'ई-नाम'(ई-राष्ट्रीय कृषी बाजार) योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत समवेश असलेल्या देशातील ५८५ कृषी बाजार समित्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक, येवला, पिंपळगाव आणि मालेगाव या चार समित्यांचा समावेश आहे. या योजनेमुळे देशभरातील व्यापारीवर्गाला कोणत्याही कृषी बाजार समितीतील शेतमालाची खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांची मक्तेदारी इतिहासजमा होणार आहे.

देशातील कृषी बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या खरेदी-विक्रीतील स्पर्धा वाढीस लागून शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमाल भाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून शेतमालाच्या वजनात धरली जाणारी घट रोखणे, शेतकऱ्यांची आर्थिक व्यवहारातील फसवणुकीतून सुटका करणे आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीनंतर तात्काळ पैसे मिळणे या उद्देशाने केंद्र सरकारने देशभर ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरू केली आहे. त्यासाठी देशभरातून ५८५ कृषी बाजार समित्यांची निवड केली गेली असून यात राज्यातील ३०६ पैकी ६० बाजार समित्यांचाही समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, येवला, पिंपळगाव आणि मालेगाव या चार कृषी बाजार समित्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. योजना अंमलबजावणीसाठी या कृषी बाजार समित्यांना प्रत्येकी ३० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

ई-नाम कार्यप्रणाली

एमएसीपी योजनेतील सर्व कृषी बाजार समित्या इंटरनेटद्वारे जोडल्या जाणार आहेत. या योजनेतील प्रत्येक बाजार समितीत कृषी मालाचा दर्जा तपासणारी संगणकीय लॅब उभारली जाईल. तपासणीनंतर त्याचे ऑनलाइन ई-सर्टीफिकेट मिळेल. ते बघून देशातील ई-नाम योजनेतील कोणत्याही कृषी बाजार समितीतील व्यापारी शेतमाल खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बोली लावू शकतील. कमाल बोली लावणाऱ्या व्यापाऱ्याला शेतमाल देण्यास शेतकऱ्यांना मुभा असेल. या योजनेत शेतमालाच्या वजनात घट धरणे, पैसे वेळेवर न मिळणे या समस्यांतून शेतकऱ्यांची सुटका होणार असून शेतमालाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने तात्काळ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहेत. सध्या खरेदी विक्रीचा परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच बाजार समित्यांतील शेतमाल खरेदी करण्यासाठी बोली लावता येत होती. मात्र, ई-नाममुळे स्थानिक व्यापाऱ्यांची मक्तेदारीही मोडीत निघणार आहे.

ई-नाम योजनेत जिल्ह्यातील नाशिकसह येवला आणि मालेगाव तर एमएसीपी योजनेत लासलगाव, दिंडोरी, चांडवड या कृषी बाजार समित्यांचा समावेश आहे. जागतिक बँकेकडून लासलगाव बाजार समितीसाठी एक कोटी रुपये निधी मिळणार आहे. या योजनेमुळे शेतमालाच्या ऑनलाइन खरेदी विक्रीत वाढ होणार आहे. राज्यातील दौंड कृषी बाजार समितीने या योजनेत आघाडी घेतली आहे.

- दिग्विजय आहेर, विभागीय सरव्यवस्थापक, पणन मंडळ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलिव्हरी बॉयकडून गॅस ग्राहकांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती गॅस सिलिंडर घरपोच देताना डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. निर्धारित किमतीपेक्षा केवळ पोच देण्याचे प्रतिसिलेंडर ३० ते ४० रुपये घेतले जात असल्याने ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुरवठाविभाग मात्र निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गॅस ग्राहकांकडून होत आहे.

शहरात अनेक गॅस वितरक आहेत. त्यांनी गॅस वितरणासाठी डिलिव्हरी बॉय नेमले आहेत. हे लोक पावतीच्या रकमेपेक्षा जास्त पैसे ग्राहकांकडून वसूल करीत आहेत. सिडको, नाशिकरोडमध्ये हा प्रकार सर्रास सुरू असून, याबाबत वितरकांकडे तक्रार केली असता 'ठिक आहे, बघून घेतो' अशी उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवण केली जात आहे. सिडको येथील रहिवासी मयूर खैरनार यांनी वितरकांकडे तक्रार करतो, असे डिलिव्हरी बॉयला सांगितले. यावर 'आमचे कोणी काही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा' असे डिलिव्हरी बॉयकडून उत्तर देण्यात आले. यावर खैरनार यांनी 'आम्ही जास्त पैसे घेऊन डिलिव्हरी करतो' असे लिहून दे असे डिलिव्हरी करणाऱ्याला सांगितले असता त्याने असे लिहूनही दिले आहे.

सिलिंडर परत नेण्याची धमकी

पावतीपेक्षा जास्त पैसे न दिल्यास सिलिंडर परत नेण्याची धमकी दिली जात आहे. परिसरातील काही ग्राहकांनी पैसे दिले नाही, तर त्यांचे सिलिंडर परस्पर विकल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक ग्राहक डिलिव्हरी बॉयच्या वर्तणुकीला कंटाळले असून, कंपनीचे अधिकारी व पुरवठा अधिकारी मात्र या प्रकरणावर हेतूपुरस्सर कानाडोळा करित असल्याचे दिसते आहे.

मी पावतीवर जेवढी रक्कम आहे, तेवढी देण्यास तयार होतो. परंतु मला तेवढ्या रकमेवर सिलेंडर देण्यास डिलिव्हरी बॉयकडून नकार देण्यात आला. पावतीच्या तीस रुपये जास्त रक्कम देत असाल तरच सिलिंडर दिले जाईल, असे सांगण्यात आले. असाच प्रकार आमच्या संपूर्ण विभागात सुरू आहे.

- मयूर खैरनार, विनयनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images