Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बबन घोलप शिवसेना उपनेतेपदी कायम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत माजीमंत्री बबन घोलप यांना उपनेतेपदी कायम ठेवण्यात आले आहे. तसेच, नाशिकमध्ये पक्षाचे संपर्कनेते म्हणून काम केलेल्या जवळपास सर्वांनाच कार्यकारिणीत मानाचे स्थान देण्यात आले आहे. मात्र, घोलप वगळता नाशिकमधील एकाही नेत्याला कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने नाराजी पसरली आहे.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्या जबाबदारींचे वाटप करण्यात आले. त्यात नेते, उपनेतेपदासह संघटक, सचिव, संपर्कप्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत नाशिकला घोलप वगळता इतरांना स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या निवडणुकीत चार आमदार निवडून आले आहेत, तर पक्षाचा एक खासदारही आहे. जिल्हा परिषदेत सत्ता मिळाली आहे. महापालिकेत संख्याबळ वाढले आहे. असे असूनही नाशिकमधील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'प्रोजेक्ट गोदा'कडे लोकप्रतिनिधींची पाठ

0
0

मुठभर लोकांसमोरच ५१२ कोटींचा प्रकल्प सादर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीचे संवर्धन व घाट सौंदर्यीकरणासाठी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या ५१२ कोटींच्या 'प्रोजेक्ट गोदा' प्रकल्पाचे शुक्रवारी गावठाणातील लोकप्रतिनिधींसमोर सादरीकरण करण्यात आले. परंतु या सादरीकरणाकडे गावठाणातील बहुसंख्य लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरवली. तर केवळ महापौर, दोन आमदार, गोदाकाठच्या गावठाणातील चार नगरसेवक आणि निवडक पर्यावरणप्रेमीच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते गजानन शेलार यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना कंपनीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने गोदा प्रोजेक्ट गोदा आभासी असल्याचे मत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत तयार केलेल्या प्रोजेक्ट गोदाचे शुक्रवारी उंटवाडी रोडवरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि स्टेकहोल्डर्ससमोर सादरीकरण करण्यात आले. महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह निवडक नगरसेवक उपस्थित होते. रेट्रोफिटिंग व हरित क्षेत्र अर्थात ग्रीन फील्ड विकास अशा दोन टप्प्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. रेट्रोफिटिंगअंतर्गत १८ कामांचे दोन पॅकेजेस आहेत. पहिल्या पॅकेजमध्ये गोदाघाटाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यात गोदाघाटाला पौराणिक लूक देण्यासाठी दगडी पेव्हर ब्लॉक, दगडी बेंच बसविले जातील. त्यासोबत सायकल ट्रॅक, पदपथ, नामफलक, वृक्षारोपण, आकर्षक कारंजे निर्मिती, तर दुसऱ्या पॅकेज अंतर्गत नदी स्वच्छता, अहिल्यादेवी होळकर पुलाखालील बंधाऱ्यांच्या गेटवर स्वयंचलित यांत्रिकी दरवाजे, हनुमान घाट ते रामवाडी दरम्यान पूल, चिंचबन ते हनुमानवाडी पादचारी पूल तसेच अरुणा व वाघाडी नदीसाठी वळणघाट आदी १८ कामे केली जाणार आहेत. यासाठी २३० कोटींच्या कामांना नाशिक मुन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

प्रश्नांना भडीमार

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आराखड्यावर आमदार फरांदे व राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी प्रश्नांचा भडीमार केला. पार्किंग, हॉटेल, बांधकाम,सायक ट्रॅक संदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाना उत्तरे देतांना अधिकाऱ्यानाच अडचणी आल्या. गोदापार्क सारखी स्थिती प्रोजेक्ट गोदाची होणार नाही, काय असा सवाल यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. त्यावर आमदार फरांदे यांनी स्ट्रक्चरल काम उंचीवर घेण्याची सूचना केली. स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्याचे आवाहन केले. हेरिटेज वॉकसाठी पाथवे तयार केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित कॉलनीतील वन वे मार्गात बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंडित कॉलनीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'वन वे'त पुन्हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी पोलिस आयुक्तालयात झालेल्या पोलिस आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर सर्वानुमते एकच रस्ता 'वन वे' म्हणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावरच हा बदल करण्यात येणार आहे.

पंडित कॉलनीतील दोन प्रमुख रस्त्यांवर कायमच वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच रस्त्यावर एखादे वाहन पार्क झाल्यास निर्माण झालेली कोंडी लवकर सुटत नाही. या पार्श्वभूमीवर पंडित कॉलनीतील दोन्ही प्रमुख रस्ते 'वन वे' करण्याचा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला होता. आमदार देवयानी फरांदे, शिवसेनेच महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह काही स्थानिकांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली. यावेळी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील तसेच सहायक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे उपस्थित होते. वन वेच्या निर्णयामुळे वाहतूककोंडीची समस्या कमी झाली असली तरी इतर अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच दोन प्रमुख मार्गांवर निर्बंध आल्याने स्थानिक नागरिकांनाही अडचणींना समोरे जावे लागत असल्याचे स्ष्ट करण्यात आले. बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर एकच रस्ता वन वे करून दुसऱ्या रस्त्यावर सम विषम पार्किंगचा नियम लागू करण्याबाबत दोन्ही बाजूंनी तोडगा काढण्यात आला. हा बदल दोन दिवसांत करण्यात येणार आहे.

हा नवीन बदल होणार लागू

गंगापूररोडवरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूने जुनी पंडित कॉलनीमार्गे राजीव गांधी भवनशेजारील टिळकवाडी सिग्नलकडे येणारा मार्ग पूर्वी एकेरी करण्यात आला होता. आता नवीन बदलानुसार सिग्नलच्या बाजुने वाहनांना जाता येणार आहे. तर गंगापूररोडवरील सिध्दी विनायक हॉस्पिटलच्या बाजुने वाहनांना प्रतिबंद करण्यात येणार आहे.

राणे डेअरी ते मॅरेथॉन चौकाचा मार्ग खुला

नवीन पंडित कॉलनीतील या रस्त्यावरदेखील बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होते. पण हा रस्ता वन वे करण्यात आल्यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वन वे नियम हटवण्यात आला असून, येथे सम विषम पार्कींग नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या परिरसरातील वाहतूक कोंडीचा निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून नवीन बदल करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करण्यात येणार असून, नागरिकांनी यास सहकार्य करणे अपेक्षित आहे.

- अजय देवरे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची खरडपट्टी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देत त्यांचे कान टोचले. तब्बल १० तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बैठकीत झगडे यांनी अधिकाऱ्यांना आपल्या कामात सोमवारपासून सकारात्मक बदल करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही दिला. मी या सभागृहात ३१ मार्चला पुन्हा बैठक घेईल; त्यावेळेस चर्चेत झालेले विषय मार्गी लागले पाहिजे, असेही त्यांनी बजावले.

मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वत्र नाराजी असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत झाडाझडती होण्याची शक्यता असल्याने सर्वच अधिकारी दबकून होते. अपेक्षेप्रमाणे या बैठीकीत झगडे यांनी कान टोचले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी साडेदहाला सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सहा वाजता संपली. बैठकीत उपायुक्त संजय बनकर यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या आर्थिक वर्षातील विविध योजनांसाठी आलेला २०० कोटी निधीतून केवळ २.५ टक्के निधी खर्च झाल्याबद्दल या बैठकीत चिंता व्यक्त केली. उर्वरित निधी मार्च अखेर खर्च झाला पाहिजे, अशा सूचना महेश झगडे यांनी दिल्या.

बैठकीत पॉवर पॉइंटद्वारे प्रेझन्टेशन करण्यात आले. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, तालुक वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता, बाल विकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात स्वच्छ भारत मिशन, विविध घरकुल योजना, पंडित दीनदयाल उपाध्यय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामपंचायत विषयक सुधारणा करणेबाबत उपाययोजना, आपले सरकार सेवा केंद्र, बेटी बजाओ कार्यक्रम, वनयुक्त शिवार योजना यासह ३३ योजनांना आढावा घेण्यात आला. त्यानंतर आस्थापना विषयक बाबींवर चर्चा झाली. त्यात प्रलंबित लोक आयुक्त प्रकरणे, आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली सह १४ विषयाची माहिती घेवून त्यावर झगडे यांनी सूचना केल्या.

एका दिवसात २०० फाईल क्लिअर

मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्याकडे असलेल्या फाईल पेडिंगचा विषय चर्चेत होता. त्यामुळे बैठकीच्या दोन दिवस अगोदरच किती फाईल पेडिंग आहे याचा आढावा घेण्यासाठी महसूल आयुक्तांचे अधिकारी जिल्हा परिषदेत दाखल होते. बैठकीच्या अगोदर एका दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी तब्बल २०० फाईली क्लिअर केल्याची माहिती समोर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदेत आजपासून कबड्डीचा थरार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय आमदार चषक पुरुष कबड्डी स्पर्धेचा थरार शुक्रवारपासून (दि. २६) शिंदे गावात (ता. नाशिक) रंगणार आहे. स्पर्धा सोमवारपर्यंत (दि. २९) चालणार आहे.

शिवसेना उपनेते आमदार अनिल परब यांच्या हस्ते आणि माजी मंत्री बबन घोलप यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सहा वाजता कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि रेणुका फाउंडेशनतर्फे होणाऱ्या या स्पर्धेत नाशिकसह, मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, पुणे, बालेवाडी, रायगड, लातूर, नगर, औरंगाबाद या ठिकाणांहून १८ कबड्डीचे संघ सहभागी झालेले आहेत.

कबड्डी स्पर्धेसाठी लोकनेते बबनराव घोलप क्रीडानगरी उभारण्यात आली असून या ठिकाणी प्रेक्षकांसाठी चार हजार क्षमतेची बाल्कनी उभारण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ गायधनी, अनिल कदम, जयंत जाधव, सीमा हिरे, योगेश घोलप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मोहन गायकवाड, प्रशांत भाबड, प्रकाश बोराडे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक बाजीराव जाधव, संजय तुंगार, बाळासाहेब जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षणाच्या वारी’ला नाशिक मुकले

0
0

एकाही प्रकल्पाचा समावेश नाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत राज्य सरकारतर्फे शिक्षणाची वारी उपक्रमाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील विविध विषयांवरील प्रकल्पांचा यात समावेश होणार असला तरी जिल्ह्यातील शिक्षक, शाळाच या वारीत समाविष्ट व्हायला मुकले आहेत. या वारीत एकूण ५५ प्रकल्पांचा समावेश असून त्यात एकही प्रकल्प नाशिकमधील नसल्याचे समोर आले आहे.

गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीसाठी राज्य शिक्षणाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गतच २९ जानेवारीपासून १ फेब्रुवारीपर्यंत संदीप फाऊंडेशन येथे शिक्षणाची वारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मूल्यवर्धन कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता, आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन, कृतियुक्त विज्ञान, दिव्यांग मुले आणि मुलींचे शिक्षण, तंत्रज्ञानाचा अध्यापनातील वापर, गणित, भाषावाचन विकास, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका या विषयावरील माहिती या वारीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरून गुणवत्तापूर्ण व नाविन्य असलेले प्रकल्पांची या वारीसाठी निवड केली आहे. या वारीत नाशिकमधील एकही प्रकल्प नसल्याने येथून एकही प्रकल्प गुणवत्ता व नाविन्यपूर्ण नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गुणवत्ता घटली का?

शिक्षणाची वारी उपक्रमामध्ये नाशिक विभागातील धुळे आणि नंदुरबार या नाशिकच्या तुलनेत शैक्षणिक आणि मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांमधील प्रकल्पांचा समावेश झालेला आहे. या जिल्ह्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली की नाशिक जिल्ह्याची गुणवत्ता घसरली, असा प्रश्न शिक्षणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

प्रकल्पांची निवड राज्य स्तरावरून करण्यात आली. गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण प्रकल्प असावे, असा याचा निकष आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रकल्प नसला तरी विभागातील धुळे, नंदुरबार येथील प्रकल्पांचा समावेश आहे.

- दिलीप गोविंद, शिक्षण सहाय्यक संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिल्क एटीएम’चा आज श्रीगणेशा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळतो व ग्राहकांना जास्त दराने दूध विकत घ्यावे लागते. यावर उपाय म्हणून सिन्नर तालुका दूध उत्पादक संघाने शेतकरी ते ग्राहक अशी थेट सेवा सुरू केली असून, ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध मिळावे याकरिता राज्यात प्रथमच एनी टाइम मिल्क सेंटर (एटीएम) सुरू केले आहे. आजपासून ते सुरू होणार आहे.

या एटीएमचा प्रारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी होणार आहे.हा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच नाशिक येथे सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देणे व ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध उपलब्ध करून देणे हा एकमेव उद्देश या सेंटरचा आहे. या सेंटरमधून घेतलेले दूध त्याच ठिकाणी तपासून घेण्याचीदेखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, यासाठी हा संघ प्रयत्नशील राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट

0
0

नाशिकः उत्तर महाराष्ट्रात थंडीने पुन्हा जोर पकडला असून राज्यातील सर्वता कमी तापमानाची नोंद गुरुवारी नाशिक शहरात झाली. नाशिक शहरात कमाल तापमान २९.४ तर किमान तापमान ७.२ इतके नोंदवले गेले.उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली असून संपूर्ण दिवसभर गारवा जाणवू लागला आहे. बहुतांश शहरात किमान तापमान १२ ते ९ अंश सेल्सिअस आहे.

मागील महिन्यात थंडीने चांगला जोर धरला होता. आठ दिवस शहर गारठून गेले होते. राज्यातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद नाशिक शहरात झाली होती. त्यानंतर थंडी अचानक गायब झाली मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला असून पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून किमान तापमान १५ अंशांच्या खाली उतरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाळे, ओटेधारकांना दिलासा

0
0

मार्च १७ पर्यंत जुन्या दरानेच भाडेआकारणी; महापौरांकडून उपसमितीची स्थापना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने पूर्वलक्षी प्रभावाने गाळेधारकांवर लादलेल्या भाडेवाढीसंदर्भात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापाठोपाठ महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या समितीनेही गाळेधारकांना दिलासा दिला आहे.

मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत जुन्याच दराने भाडे वसूल करण्याचे आदेश समितीच्या बैठकीनंतर महापौर रंजना भानसी यांनी दिले. तसेच दराबाबत प्रत्यक्ष स्थितीचा अभ्यास करून त्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी चार विभागांची उपसमिती स्थापन करण्याची घोषणाही महापौरांनी केली. जप्तीची कारवाई महिनाभरासाठी थांबविण्यात आली आहे. महापालिकेच्या व्यापारी संकुलांमध्ये पायाभूत सुविधा करण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे समितीने गाळेधारकांना मोठा दिलासा दिला आहे.

महापालिकेकडून स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सहा विभागांत व्यापारी संकुलाची बांधणी करण्यात आली. करार पद्धतीने एक हजार ९७३ गाळे व ६७८ ओटे बेरोजगारांना वाटप करण्यात आले. आतापर्यंत कराराची मुदत संपल्यानंतर गाळेधारकांना १०, २०, ३० टक्के अशी टप्प्याने दरवाढ केली जात होती. परंतु, २०१४ पासून महापालिकेने रेडिरेकनरनुसार दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ज्या गाळ्यांचे भाडे तब्बल १० ते २० पटीने वाढले होते. स्थायी समितीमध्ये भाडेवाढीसंदर्भात समिती नियुक्त करण्यात आली असताना प्रशासनाने भाडे वसुलीसाठी तगादा लावत जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गाळेधारकांच्या आग्रहानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली. तसेच गाळेधारकांनी आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यावर पाटील यांनी पूर्वलक्षी प्रभावाने भाढेवाढ लागू न करण्याच्या सूचना देत महापालिकेने याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीची गुरूवारी स्थायी समितीत बैठक झाली. यात उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते. या बैठकीत गाळेधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला. मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून पूर्वलक्षीने भाडेवाढ वसूल न करता जुन्याच दराने ३१ मार्च २०१७ पर्यंत भाडे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाळेभाडेवाढीचा अभ्यास करण्यासाठी उपसमितीची स्थापना केली असून तिचा अहवाल महिनाभरात सादर केला जाणार आहे. तसेच गाळेधारकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विविध कर विभागावर टाकण्यात आली आहे. महिनाभरासाठी जप्तीची कारवाई थांबवण्यात आली आहे. त्यामुळे गाळेधारकांनी जुन्याच दराने मार्च २०१७ पर्यंत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

उपसमितीच्या अहवालाकडे लक्ष

सध्याच्या रेडिरेकनरदरानुसार भाडे आकारणीबाबत निर्णय घेण्यासाठी महापौरांनी एक उपसमिती स्थापन केली आहे. त्यात बांधकाम, नगररचना, मिळकत, विविध कर विभागाचे अधिकारी समाविष्ट असून ही समिती प्रत्यक्ष जागेवर जावून रेडिरेकनर दराचा आढावा घेणार आहे. रेडिरेकनरच्या दराचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर अभ्यास करून ही समिती महापालिकेला महिनाभरात अहवाल सादर करणार आहे. या अहवालावर समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

गाळेधारकांवर झालेल्या अन्यायासंदर्भात समितीच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यांना दिलासा दिला जाणार आहे. तसेच गाळेधारकांना मूलभूत सुविधा देण्यासह दराबाबत सर्वेक्षण करण्यासाठी उपसमिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतर गाळेधारकांना दिला जाईल.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आठवडाभर विमानसेवा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, भोपाळ आणि हिंदण (गाझियाबाद) या सात शहरांसाठी नाशिककरांना आठवड्यातील सातही दिवस सेवा मिळणार आहे. विशेष म्हणजे एकवीसशे ते साडेतीन हजार रुपयांच्या भाड्यातच सेवा लाभणार असून दक्षिणेतील शहरांशी कनेक्ट वाढल्याने नाशिकला आयटी उद्योग बहरण्याची चिन्हे आहेत. पुढील महिन्यापासून यातील काही सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

उडान योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ओझरहून सात शहरांसाठी सेवा मिळणार असल्याची घोषणा झाली आहे. इंडिगो कंपनीच्या वतीने बेंगळुरू हिंदण (गाझियाबाद) आणि भोपाळ, जेट एअरवेजच्या वतीने हैदराबाद आणि नवी दिल्ली, अलायन्स एअरच्या वतीने अहमदाबाद आणि हैदराबाद, स्पाइस जेटच्या वतीने हैदराबाद आणि गोवा तर ट्रुजेट अहमदाबाद शहरासाठी सेवा देणार आहे. ७० ते १८९ आसनी विमानाद्वारे ही सेवा मिळणार आहे. उडाण योजनेअंतर्गत ३५ ते ४० जागांचे दर हे २०६० ते ३४६० रुपयांपर्यंत राहणार आहेत. दिल्लीसाठी जेट एअरवेजची सेवा आठवड्यातून तीन दिवस मिळणार आहे. उर्वरित सर्व सेवा सातही देण्याचे या कंपन्यांनी निश्चित केले आहे. मुख्य शहरांसाठी विमानसेवा मिळणार असल्याने शहरातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

हॉपिंग फ्लाईट

देशातील महत्त्वाच्या शहरांसाठी नाशिककरांना हॉपिंग फ्लाईटच्या माध्यमातून सेवा मिळण्याचा मार्ग उडान योजनेमुळे खुला झाला आहे. दक्षिणेतून उत्तरेकडे जाणाऱ्या कंपन्यांची सेवा यामुळे नाशिककरांना मिळणार आहे तसेच, उडान योजनेत नसलेल्या शहरांना नाशिक कनेक्ट होणार आहे.

आयटीला बूस्ट

दक्षिण भारतातील हैदराबाद आणि बंगळुरू या दोन शहरांशी नाशिकचा कनेक्ट वाढल्याने त्याचा थेट फायदा आयटी उद्योगाला होणार आहे. दोन्ही शहरे आयटी उद्योगाचे माहेरघर आहेत. त्या शहरांशी संपर्क वाढण्याने नाशकात आयटी क्षेत्रातील मनुष्यबळ, आयटी उद्योजक उपलब्ध होतील. तसेच, टायर टू शहरांमध्ये आयटी उद्योग सुरू करु पाहणाऱ्यांना नाशिकचा पर्याय यामुळे निर्माण होईल. यानिमित्ताने नाशकात गुंतवणूक येतानाच रोजगाराचीही निर्मिती होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी पद्मावत शांततेत प्रदर्शित ; पोलीस बंदोबस्त तैनात

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेले कित्तेक दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुचर्चित 'पद्मावत' हा सिनेमा अखेर गुरुवारी शहरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. शहरातील संदेश मल्टिप्लेक्स , मोहन व सुभाष चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच करणी सेनेकडून पोलिस तसेच प्रशासनास सिनेमा प्रदर्शित करू नये अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिनेमाच्या प्रदर्शनास बंदी घालता येणार नसल्याने नागरिकांनी कायदा हातात घेवू नये, असे आवाहन केले होते. तसेच प्रदर्शनादरम्यान अनुचित प्रकार झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे गुरुवारी शहरात सिनेमा शांततेत प्रदर्शित झाला. शहरातील एकमेव संदेश मल्टिप्लेक्स बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सिनेमागृहात तीनही स्क्रीनवर दिवसभरात दहाहून अधिक शो दाखविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर विंचूर दळवीत बलात्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील विंचूर दळवी येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवून निर्जन ठिकाणी घेऊन जात बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी चेतन ऊर्फ सख्या नामदेव शेळके (२२, रा. विंचूर दळवी) या तरुणाला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसींची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विंचूर दळवी येथील खंडेराव टेकडी परिसरात रविवारी (दि. २१) पीडित अल्पवयीन मुलगी इतर दोन मुलींसोबत शेळ्या चारण्यासाठी गेली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास चेतन शेळके तेथे आला. त्याने पीडितेला एकटे गाठून तिला चॉकलेटचे अमिष दाखवत तलावाजवळ बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आरडा-ओरडा करून प्रतिकार केल्यानंतर याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत शेळकेने तेथून पळ काढला. घटनेबाबत पीडितेने घरी आल्यावर आपल्या आईला सांगितले. पीडितेच्या आईने सिन्नर पोलिस ठाण्यात शेळके विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरुन नराधम शेळके याच्याविरोधात बलात्कारचा प्रयत्न, पोस्कोअंतर्गत तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन शेळकेला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची मतदार नोंदणीत आघाडी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदार नोंदणीची जबाबदारी जिल्ह्यातील बीएलओ आणि अधिकारी यांनी चांगल्याप्रकारे पार पाडल्याने मतदार नोंदणी अभियानात नाशिक अग्रेसर ठरले आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात आयुक्तांच्या हस्ते सहस्त्रक मतदार प्रमाणपत्र व दिव्यांगांना मतदार प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., अप्पर उपजिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, सोपान कासार, निवडणूक विभागाचे तहसीलदार गणेश राठोड, तहसीलदार राजश्री अहिरराव, आंतरराष्ट्रीय खेळाडू मोनिका आथरे, संजीवनी जाधव आणि प्रशिक्षक विजयेंद्र सिंग आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, की देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकशाही बळकट होण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. भारतीय संविधानात कुठलाही भेदभाव न करता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळतो. लोकशाहीतील हा सर्वांत मोठा हक्क आहे. या कार्यक्रमात चित्रफितीद्वारे केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा संदेश दाखविण्यात आला. विभागीय आयुक्त झगडे यांनी मतदार प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली, तसेच मतदार नोंदणीत चांगले काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळी जनजागृती रॅली

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. रॅलीच्या माध्यमातून मतदार नोंदणीचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, एम. जी.रोड, शालिमार चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सुरू झाले दुधाचे पहिले एटीएम

0
0

नाशिक: यापुढील काळात पैशांच्या एटीएमशेजारी दुधाचे एटीएम आले तर आश्चर्य वाटायला नको. ही केवळ कल्पना असून दुधाचे एटीएम ही संकल्पना प्रत्यक्षात आलेली आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राज्यातील पहिल्या दुधाच्या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. हे एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन नसून, एटीएम अर्थात 'एनी टाइम मिल्क' आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते आज या एटीएम मशीन लोकार्पण करण्यात आले.

सिन्नर दूध उत्पादन संघाच्या वतीने कॉलेज रोडवर असलेल्या बॉइज टाउन शाळेसमोर हे एटीएम सुरू करण्यात आले आहे. हे देशातील पहिलेच वातानुकूलित दुधाचे मशीन आहे. ग्राहकांना उच्च प्रतीचे निर्भेळ दूध आणि तेही २४ तास मिळावे हा यामागे उद्देश आहे. याबरोबरच यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा व्हावा असाही या मागचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांना होणार थेट फायदा

नव्या एटीएम अर्थात 'एनी टाइम मिल्क' मशीनमुळे शेतकरी आणि ग्राहकांमधील दलाल दूर होणार आहे. यामुळे या मशीनचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. एनी टाइम मिल्क मशीनमधून गाय, म्हैस आणि साहिवाल या दुर्मिळ असलेल्या गायीचे दूध नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीसंशोधन काळाची गरज: डॉ. सुभाष निकम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजच्या आधुनिक काळाबरोबर जगातील सर्वच क्षेत्रांत संशोधन होत आहे; परंतु शेती व्यवसायावर संशोधन अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसायातील उत्पन्न घटत आहे. शेती विकासातील संस्कृतीचा उगम व इतिहास पाहिल्यास शेती ही वाहत्या पाण्यावरील खडक, नद्या, धरणे, किनारे या ठिकाणी दिसून येत होती. पण सद्य:स्थितीत शेती लोप पावत आहे. देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास १३.७ टक्के उत्पन शेतीतून मिळत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी केले.

मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्ता सुधार योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत एक दिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजय कडलग, राहुरी विद्यापीठातील डॉ. प्रशांत बोडके, उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी, समन्वयक प्रा. यू. एन. सांगळे उपस्थित होते. महाराष्ट्रातील शेती विषयक समस्या व भवितव्य या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून असून, जगातील १२० देशांत भारतीय शेतीच्या माध्यमातून विविध भाजीपाला, फळे, अन्नधान्याची निर्यात केली जाते. बदलत्या जागतिक तापमानवाढीचा शेती क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असून, शेतीवर मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. शेतीविषयक विविध समस्यांचा त्यांनी आढावा आपल्या बीजभाषणातून स्पष्ट केला. चर्चासत्राचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख व समन्वयक प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले. चर्चासत्रासाठी राज्यातील जळगाव, पुणे, अहमदनगर अशा विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. चर्चासत्रास महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी, डॉ. एन. यू. पाटील,डॉ. डी. डी. वाळके, कार्यालयीन अधीक्षक के. के. मते, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आर. एम. आंबेकर यांनी केले, तर आभार प्रा. एम. एस. पाटील यांनी मानले.

काळानुसार बदल व्हावा

अध्यक्षीय भाषणात विजय कडलग यांनी महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रात आधुनिक युगाबरोबर बदल होणे तसेच पीकरचनेत बदल घडणे आवश्यक असून, त्यासाठी संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी लक्ष घालण्याचे आवाहन केले. राहुरी कृषी विद्यापीठातील डॉ. प्रशांत बोडके यांनी सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेती विकास साधण्याचे तंत्रविषयक मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारमधून बेकायदा मद्यसाठा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असल्याची संधी साधून शहरात विक्रीसाठी आणलेला मद्यसाठा क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केला. महामार्गावरील उड्डाणपुलाखाली झालेल्या या कारवाईत पोलिसांनी आडगाव चौफुलीवरील संशियतास अटक करून त्यांच्याकडून देशी दारूच्या मद्यसाठ्यासह कार असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

संजय रावसाहेब शेजवळ (४२ रा. आडगाव मेडिकल कॉलेज फाटा, आडगाव) असे कारमधून मद्यविक्री करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. २६ जानेवारी निमित्त शुक्रवारी ड्रायडे असून, या पार्श्वभूमीवर कारमधून मद्यविक्री होणार असल्याची माहिती युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे व सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त अशोक नखाते आणि युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ याच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा विक्रेत्यांचा शोध सुरू असताना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून औरंगाबादरोड ते आडगाव मार्गावर ठिकठिकाणी सापळे लावण्यात आले. औरंगाबादरोडवरील उड्डाणपुलाखाली संशयास्पद उभ्या असलेल्या कारची (एमएच १५ इएक्स १२०९) पोलिसांनी तपासणी केली असता पोलिसांना मद्यसाठा सापडला. या कारमध्ये देशी-विदेशी आणि विविध कंपन्याचा सुमारे ११ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी लागलीच संशयित शेजवळला अटक केली. मद्यसाठ्यासह कार असा सुमारे ४ लाख ११ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक नागेश मोहिते, दीपक गिरमे, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, संजय पाठक, पोपट कारवाळ, हवालदार अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, रवींद्र बागूल, संजय मुळक, वसंत पांडव, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, मोहन देशमुख, शिपाई रावजी मगर, नीलेश भोईर, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, गणेश वडजे, राहूल वालखेडे, प्रतिभा पोखरकर, सूर्यवंशी आदींच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादनांना मिळणार नवी ओळख

0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

शहरात तयार होणाऱ्या १५० हून अधिक उत्पादनांचा परिचय 'मेड इन मालेगाव फेस्टिव्हल'च्या माध्यमातून नागरिकांना तसेच अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यापाऱ्यांना होईल. यामुळे शहरातील उत्पादकांना नवीन ओळख मिळण्यासह प्रोत्साहनही मिळेल. शहराच्या विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून शहरविकासासाठी नेहमीच सोबत येवून काम करण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

येथील रिलायबल मैदानावर २६ ते ३० जानेवारी दरम्यान 'मेड इन मालेगाव फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. त्यावेळी भुसे बोलत होते. दादा भुसे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. महापौर रशीद शेख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यासह उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती सलीम अन्वर व्यासपीठावर उपस्थित होते. अशिफ शेख यांनी 'मेड इन मालेगाव फेस्टिव्हल'च्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. शहराची ओळख बदलावी शहरातील उत्पादकांना संधी मिळावी या उद्देशाने हा फेस्टिव्हल आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. महापौर शेख रशीद यांनी देखील शहरात पहिल्यांदाच असा उपक्रम आयोजित केला जात असून, एकाच व्यासपीठावर शहरातील उद्योजक, उत्पादकांना संधी मिळणार आहे.

भुसे म्हणाले की, या फेस्टिव्हलच्या माध्यमातून शहरातील युवकांसह अबाल वृद्धाना प्रेरणा मिळेल. आपल्याच शहरात असेलल्या उद्योजकांचा परिचय होईल. शेख यांनी आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असिफ शेख यांच्या संकेतस्थळाचे अनावर करण्यात आले. फेस्टिव्हल निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध स्टोलला भेटी देवून तेथील उत्पादनाची माहिती घेतली व खाद्य पदार्थांची चव चाखली.

सांस्कृतिक कार्यक्रम
पुढील तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळ १० पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. शहरवासीयांनी यास फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेख यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस चोरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला बेड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती गॅस सिलिंडर वितरणाची जबाबदारी असलेल्या डिलिव्हरी बॉयला बेकायदा गॅसची चोरी केल्याप्रकरणी क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. हा संशयित अगदी सराईतपणे भरलेल्या सिलिंडरचे सील तोडून ट्रान्स्फर निप्पलद्वारे रिकाम्या टाकीत गॅस भरताना पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी संबंधित संशयिताकडून ११ सिलिंडर, ताण काटा, तसेच गॅस ट्रान्स्फर निप्पल असा सुमारे ८० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन सुनील गवळी (वय २१, रा. घास बाजार झोपडपट्टी, गंजमाळ) असे या संशयिताचे नाव आहे. घरगुती गॅस सिलिंडरमधून सातत्याने गॅसची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी सिलिंडर वितरणाकडे लक्ष वळविले. युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे यांना प्रजासत्ताकदिनी मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी हिरावाडी येथील दामोधर गार्डन भागात छापा टाकून गॅसची चोरी करणाऱ्या गवळीला अटक केली. पंचवटीतील भारत गॅस गोडावूनमधून घरोघरी गॅस पोहोचविणाऱ्या टेम्पोवरील (एमएच १५, एजी ९९८०) संशयित चालक दामोधर गार्डन परिसरातील सागर कॉलनीनजीक उघड्यावर भरलेल्या सिलिंडरमधील गॅस ट्रान्सफर निप्पलद्वारे रिकाम्या टाकीत भरताना पोलिसांना सापडला. त्याच्या ताब्यातील भरलेले व रिकामे असे ११ सिलिंडर, ताण काटा, निप्पल आणि अॅपेरिक्षा असा सुमारे ८० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी हवालदार रावजी मगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित गवळीविरोधात भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. सहाय्यक निरीक्षक सरोदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८२ टक्के शेतकऱ्यांकडील बियाणे बनावट?

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शेंदरी बोंडअळीच्या पादुर्भावामुळे नाशिक विभागातील ३ लाख २७ हजार १९२ शेतकऱ्यांच्या तब्बल ३ लाख २४ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक पोखरले गेले आहे. बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५००, तर जिरायती क्षेत्रासाठी ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर दराने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी अवघ्या १८ टक्के शेतकऱ्यांकडूनच कपाशीचे बियाणे खरेदी केल्याची पावती कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे उर्वरित कपाशीचे बियाणे बनावट कंपनीचे असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक विभागासह राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांतील बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा प्रश्न विधानसभेतही गाजला होता. बोंडअळीच्या समस्येने नाशिक विभागातील नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या सर्वच जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विभागात सर्वात जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जळगाव जिल्ह्यात असून, त्याखालोखाल धुळे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. नाशिक विभागात तब्बल ३ लाख २४ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक बोंडअळीने पोखरून फस्त केल्याचा अंतिम नुकसानभरपाई बाबतचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी संचालकांकडे पाठवला आहे. नाशिक जिल्ह्यातही ११ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या ८ हजार ११९ हेक्टरवरील कपाशीचे पीक बोंडअळीने पोखरले आहे. जिल्हा तक्रार निवारण समितीने विभागातील २ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त कापूस पिकाची पाहणी केली आहे.

८२ टक्के शेतकऱ्यांकडील बियाणे बनावट?

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी विभागातील ३ लाख २७ हजार १९२ शेतकऱ्यांपैकी अवघ्या ५० हजार ९५८ शेतकऱ्यांनीच आपल्या प्रस्तावासोबत कपाशीचे बियाणे खरेदी केल्याची मूळ पावती कृषी विभागाकडे सादर केली आहे. हे प्रमाण अवघे १८ टक्के इतकेच आहे. त्यामुळे उर्वरित तब्बल ८२ टक्के शेतकऱ्यांकडील बियाणे अनधिकृत कंपन्यांचे असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी गुणवत्तेचे कपाशी बियाणे बाजारात सर्रास विक्री झाले असण्याची शक्यता आहे. अधिकृत बियाणे खरेदी केल्याची पावतीधारक शेतकऱ्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात अवघी १९, धुळ्यात २२, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १५ टक्के इतकीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ समर्थक करणार 'अन्याय पे चर्चा'

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच ग्रामीण भागात गल्ली गल्ली 'अन्याय पे चर्चा' करून भुजबळ समर्थक जोडो अभियान यशस्वी करण्याचा निर्धार शनिवारी समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला.

नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात भुजबळ समर्थक जोडो अभियानातील नाशिक शहर व जिल्ह्यातील समन्वयकांची बैठक पार पडली. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, अंबादास बनकर, आण्णासाहेब पाटील, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राधाकिसन सोनवणे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रकाश वडजे, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, मधुकर जेजुरकर, उदय जाधव, नितीन पवार, यतीन पगार, प्रकाश वाघ, ढवळू फसाळे, कल्पना पांडे, कविता कर्डक, ज्ञानेश्वर गायकवाड, योगेश कमोद, संजय खैरनार, मुख्तार शेख, निवृत्ती अरिंगळे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित होते.

बैठकीत भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत 'अन्याय पे चर्चा' याबबत सविस्तर माहिती व सूचना समन्वयकांना दिली. नाशिक शहरातील सर्व प्रभागांतील समन्वयक तसेच जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यात समन्वयकांच्या नेमणुका करण्यात आल्या. यावेळी नाशिक शहराची नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य आणि पश्चिम अशा सहा विभागांत विभागणी करून विभागात प्रत्येकी १० कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आली. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रत्येकी २० बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images