Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मविप्र मॅरेथॉनमध्ये हरियाणाचा करणसिंग विजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉनमध्ये हरियाणाच्या करणसिंग याने ४२.१९५ किलोमीटर गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याला आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्या हस्ते एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय रोईंगपटू ऑलिम्पिक विजेता दत्तू भोकनळ याच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आले. त्यानंतर विविध गटांना क्रमवारीने मॅरेथॉनसाठी सोडण्यात आले. यावेळी ४ हजार ५२६ खेळाडू विविध गटांत सहभागी झाले होते. हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.
या स्पर्धेसाठी उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक तसेच राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, सांगली, कराड, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, रत्नागिरी, अमरावती, सिंधुदूर्ग, औरंगाबाद, धुळे व नाशिक जिल्ह्यातून विविध गटांतील खेळाडू सहभागी झाले.
रावसाहेब थोरात सभागृहात बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सरचिटणीस व मविप्र मॅरेथॉनच्या संयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती नीलिमाताई पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, संचालक डॉ. विश्राम निकम, नाना महाले, उत्तमबाबा भालेराव, भाऊसाहेब खातळे, दिलीप पाटील, सचिन पिंगळे, अशोक पवार, डॉ. जयंत पवार, दत्तात्रय पाटील, प्रल्हाद गडाख, डॉ प्रशांत देवरे, सेवक संचालक नानासाहेब दाते, गुलाब भामरे, महिंद्रा कंपनीचे अधिकारी कर्नल सी. एन. बॅनर्जी, शिक्षणाधिकारी, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

नाशिकमध्ये खेळाचे वातावरण चांगले
दत्तू भोकनळ याने यावेळी आपला जीवनप्रवास उलगडला. नाशिकमध्ये अत्यंत चांगले खेळाचे वातावरण तयार होत असून, त्यामध्ये मविप्र संस्थेचा मोठा हातभार आहे. कोणत्याही खेळात यशस्वी होण्यासाठी स्वतःला आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन मेहनत करण्याची तयारी ठेवावी, असेही तो यावेळी म्हणाला. खडतर परिस्थितीत स्वतःला खंबीर ठेऊन आपण निश्चित केलेल्या ध्येयाचा पाठलाग करा. त्यासाठी योग्य दिशा ठरवून नियमित सराव व आत्मविश्वासाने यश संपादन करा, असा सल्ला त्याने उपस्थितांना दिला.

ज्येष्ठांची एनर्जी
या मॅरेथॉनमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठांनीही भाग घेतला होता. तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने ज्येष्ठ धावत असताना नाशिककर त्यांना टाळ्या वाजवून चिअर अप करीत होते. काही ज्येष्ठ तर काठी हाती घेऊन सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन व्हावी
गेल्या दहा वर्षांपासून राज्यस्तरावर व गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेली मॅरेथॉन पुढील वर्षापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी, अशी मागणी क्रीडापटू करीत होते. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्यास नाशिककर खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडू पहाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

वाहतुकीचे नियोजन कोलमडले
स्पर्धा मार्गावर धावपटूंना पळण्यासाठी अनंत अडचणींना तोड द्यावे लागत होते. गंगापूररोडवर धावपटू पडून जखमी होताना दिसत होते. पोलिसांनी रहदारीची अडचण लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन केले नसल्याने वाहनधारक धावपटूंबरोबर गाड्या चालवत होते. रहदारीचा त्रासही खेळाडूंना सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी खेळाडू अपघात होता होता वाचले.


सात लाखांची पारितोषिके
यावेळी १७ वेगवेगळ्या गटांत विजेत्या खेळाडूंना एकूण ७ लाख २३ हजार रुपये इतक्या रकमेची रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजन समितीचे कौतुक करताना संस्थेचे क्रीडा संचालक, पंच, एन. सी. सी. स्वयंसेवक, एन. एस. एस. असे एकूण १५०० पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत असल्याची माहिती दिली. मॅरेथॉन स्पर्धा अधिक तांत्रिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने होत आहेत व नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे, ही संस्थेसाठी भूषणावह बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात मविप्र मॅरेथॉन ही राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होत असून, पुढे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ती पोहचेल असा विश्वास व्यक्त करताना दत्तू भोकनळ याच्यासारखी खडतर परिस्थितीतून यशाला गवसणी घाला, असे आवाहन केले. आभार उपसभापती राघो आहिरे यांनी मानले.


निकाल
४२ किलोमीटर - फुल मॅरेथॉन
प्रथम- करणसिंग, हरियाणा
द्वितीय- किशोर गव्हाणे, महाराष्ट्र
तृतीय- अभिमन्यू कुमार, महाराष्ट्र

२१ किलोमीटर - हाफ मॅरेथॉन
प्रथम- कांतिलाल कुंभार, नाशिक
द्वितीय- पिंटू यादव, नाशिक
तृतीय- सुरेश वाघ, नाशिक

महिला ओपन- १० किलोमीटर
प्रथम- आरती पाटील, नाशिक
द्वितीय- रिशुसिंग, नाशिक
तृतीय- अर्चना कोहकडे, संगमनेर

सीनिअर कॉलेज मुले-१२ किलोमीटर
प्रथम- दिनकर लिलके, नाशिक
द्वितीय- भागीनाथ गायकवाड, नाशिक
तृतीय- नितीन गावित, नाशिक

४५ वर्षांवरील पुरूष
प्रथम- लक्ष्मण शिंदे, परभणी
द्वितीय- भिकू खैरनार, मालेगाव
तृतीय- नंदू उगले, नाशिक

ज्युनिअर कॉलेज मुले - १० किलोमीटर
प्रथम- पवन तारपे, नाशिक
द्वितीय- नीरज यादव, नाशिक
तृतीय- खुरकुटे कृष्णा

मुले - ८वी ते १०वी
प्रथम - मनोहर बेंडकुळे, नाशिक
द्वितीय - रमेश पिंपळके, नाशिक
तृतीय - ओम जाधव, नाशिक

ज्युनिअर कॉलेज मुली - ५ किलोमीटर
प्रथम- आशा पारधी, नाशिक
द्वितीय- नंदा पालवी, नाशिक
तृतीय-दिशा बोरसे, नाशिक

५ वी ते ७ वी मुले - ४ किलोमीटर
प्रथम- अभिजीत सांडखोरे, नाशिक
द्वितीय- इंद्रभान ढोपारे, पाटोदा
तृतीय- पवन पालवे, नाशिक

५ वी ते ७ वी मुली - ३ किलोमीटर
प्रथम- पूनम डांबले, नाशिक
द्वितीय- स्वाती शिंदे, पाटोदा
तृतीय- रोशनी काकरवाल, जातेगाव

सीनिअर कॉलेज मुली- ६ किलोमीटर
प्रथम- शीतल भगत, नाशिक
द्वितीय- पुष्पा राडे, त्र्यंबकेश्वर
तृतीय- प्रियंका ठाकरे, नाशिक

पुरुष ६० वर्षांवरील- ४ किलोमीटर
प्रथम- दिनकर शेळके, औरंगाबाद
द्वितीय- सूर्यकांत भोसले, नाशिक
तृतीय- काशिनाथ पलांडे, नाशिक

३५ वर्षांवरील महिला- ५ किलोमीटर
प्रथम- अश्विनी देवरे, नाशिक
द्वितीय- सुमन हटकर, नाशिक
तृतीय- मीरा गायकवाड, औरंगाबाद

१८ वर्षांखालील मुले- खुला गट - ६ किलोमीटर
प्रथम- महेश पाखने
द्वितीय- रवींद्र गवळी
तृतीय- पवन शिंदे

१८ वर्षांखालील मुली- खुला गट - ६ किलोमीटर
प्रथम- वर्षा चौधरी
द्वितीय- सुशिला चौधरी
तृतीय- वनीता भोबे

पुरुष ७५ वर्षांवरील- ३ किलोमीटर
प्रथम- गेणू गायधनी, नाशिक
द्वितीय- शांतिलाल गिरासे, नाशिक
तृतीय- हरिभाऊ ढोली, नाशिक

मुली ८ वी ते १० वी- ४ किलोमीटर
प्रथम- मोनिका जाधव
द्वितीय- पूजा पारधी
तृतीय- वृषाली निंबेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रॉमा केअर युनिट केवळ शोभेचे बाहुले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा येथील ट्रॉमा केअर युनिट बरोबरच ग्रामीण रुग्णालयात मंजूर असलेली रिक्तपदे त्वरित भरून अपघातग्रस्त रुग्णांचे जीव वाचवावेत, अशी मागणी सातत्याने होऊनदेखील आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर हॉस्पिटल केवळ शोभेचे बाहुले झाले आहेत.

दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रॉमा केअर युनिटचा शुभारंभ होऊन कित्येक महिने लोटले मात्र त्यांनी शुभारंभावेळी शब्द देऊनही अद्याप रिक्तपदे न भरल्याने ट्रॉमाचा ड्रामा सुरूच आहे. सटाणा शहर हे राष्ट्रीय महामार्गावरील शहर असून, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सरकारने याठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरला मान्यता दिली. गत आठ वर्षांपासून ट्रॉमा केअर सेंटरची सुसज्ज इमारत तयार झाली आहे. त्यासाठी लागणारे संपूर्ण वैद्यकीय उपकरणे असूनदेखील रिक्तपदे न भरल्यामुळे इमारत व वैद्यकीय उपकरणे धूळ खात पडलेली आहेत.

या ट्रॉमा केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन, अस्थिरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वाहन चालक, परिसेविका यांचे प्रत्येकी एक तसेच सफाई कामगारांची २, अधिपरिचारिका ३, कक्षसेवक ३ पदे मंजूर केलेली आहेत. तरीही ती अद्याप भरण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिनियुक्ती हवी तर परीक्षा द्या

$
0
0

नाशिक: नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीसह राज्यभरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना आता थेट प्रवेश मिळणार नाही. यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षणात रस असेल तर लेखी आणि तोंडी परीक्षांद्वारे ते सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे दिवस ढकलण्यासाठी प्रशिक्षण संस्थांमध्ये जाणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.
पोलिस उपनिरीक्षक तसेच सहायक पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमी कार्यरत आहे. याबरोबर पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण विद्यालय यांचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. महाराष्ट्र गुप्तचर अॅकॅडमी ही पुणे येथील संस्थाही राज्यभरातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या सर्व संस्थांमध्ये दरवर्षी प्रतिनियुक्तीवर पोलिस अधिकाऱ्यांची बदली होते. मात्र, अनेकदा मूळ गावाजवळ बदली मिळते किंवा इतर तत्सम कारणांमुळे अधिकारी प्रशिक्षण संस्थांमध्ये वर्णी लावून घेतात. यामुळे संस्थेतील प्रशिक्षणाच्या दर्जावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर प्रतिनियुक्तीवर बदली मागणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे अपर पोलिस महासंचालक (आस्थापना), मुंबई यांना घटक प्रमुखांच्या शिफारशीनुसार अर्ज करावा लागेल. यानंतर अर्जांची छाननी होऊन संबंधीत अधिकाऱ्याची लेखी व तोंडी परीक्षा पार पडेल. गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ ठरणाऱ्या अधिकाऱ्यांनाच प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येणार आहे.

टिच क्राफ्ट कोर्स
प्रशिक्षण देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ‘टिच क्राफ्ट’सारखा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. एका आठवड्याचा हा अभ्यासक्रम असून, ‘यूज ऑफ कम्प्युटर’ हा तीन दिवसांचा आणखी एक अभ्यासक्रमदेखील महत्त्वाचा ठरतो. पोलिस शिपाई या पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरुवातीलाच उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी हा प्रयत्न असून, त्याचे परिणाम दिसून येतील, असा दावा प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी केला.

प्रशिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशिक्षण देण्यात रसच नसेल तर अशा व्यक्तींना या संस्थापासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. राज्य सरकार अशा अधिकाऱ्यांना ३५ टक्के भत्ता देते. त्यामुळे या कामावर योग्य व्यक्तीची निवड होणे महत्त्वाचे ठरते.
- एस. जगन्नाथन, अपर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट व्हिलेज समितीकडून करंजगावची पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील गोदाकाठातील एक उपक्रमशील गाव असलेल्या करंजगावने सरकारच्या स्मार्ट व्हिलेज या स्पर्धेत तालुकास्तरावर सहभाग घेतला आहे. याबाबत नुकतीच या गावाची पाहणी व मूल्यमापन करण्यासाठी शासकीय समिती येऊन गेली.

या समितीने निफाड तालुक्यातील सहभागी असलेल्या करंजगाव, सुकेणे, विंचूर, हनुमाननगर या गावांची शनिवारी (दि. ६) पाहणी व मूल्यमापन केले. या पाहणीत येवल्याचे गटविकास अधिकारी शेख व ग्रामविस्तार अधिकारी अहिरे यांचा समावेश होता. पाहणीदरम्यान सरपंच मनीषा पाटील-राजोळे, उपसरपंच श्रावण गांगुर्डे यांनी समितीचे स्वागत केले. यावेळी विस्तार अधिकारी के. टी. गादड उपस्थित होते. स्मार्ट ग्राम समितीचे तपासणी अधिकारी शेख यांनी ग्रामपालिकेची दप्तर तपासणी करून समाधान व्यक्त केले. तसेच करंजगाव ग्रामपालिकेच्या सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली.

समिती सदस्यांना माजी सरपंच खंडू बोडके-पाटील व ग्रामविकास अधिकारी पी. पी. खैरनार यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. दौऱ्यावेळी पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, ग्रामपालिका सदस्य अनिता भगुरे, नंदू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू निर्भवने, सोमनाथ भगुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नेत्यांची मिसळ पार्टी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वडनेर येथे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांची मिसळ पार्टी झाली. हजार कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. तीन- साडेतीन तास पार्टी सुरू होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्टी आयोजित करून कार्यकर्त्यांची मनोबलबांधणी, तसेच वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला.

शिवसेनेचे नगरसेवक केशव पोरजे यांच्या वडनेर येथील फार्म हाउसवर रविवारच्या सुटीनिमित्त ही पार्टी रंगली. माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महिला आघाडीच्या नेत्या सत्यभामा गाडेकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक श्यामकुमार साबळे, केशव पोरजे, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, राजेश फोकणे आदी उपस्थित होते. नेते आल्यावर कार्यकर्ते शिवसेनेच्या घोषणा देऊन वातावरणनिर्मिती करीत होते. माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले. नाशिकरोड, देवळालीगाव परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खासदार गोडसे व आमदार घोलप यांच्यासह प्रमुख नेते याच परिसरातील आहेत. तरीही गटबाजीमुळे महापालिका निवडणुकीत सेनेने मार खाल्ला. नाशिकरोडला भाजपने शिवसेनेपेक्षा जादा नगरसेवक निवडून आणून आव्हान उभे केले. विधानसभा व लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी करण्यासाठी ही पार्टी आयोजित केल्याचे संयोजक केशव पोरजे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात रंगला पतंग महोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

इनरव्हील क्लब ऑफ अ‍ॅपेक्स सटाणा वतीने शहरात प्रथमच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवाचा शुभारंभ नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

येथील पाठक मैदानावर इनरव्हील क्लब ऑफ अ‍ॅपेक्स ग्रुपच्यावतीने पतंग महोत्सवाचे आयोजन शहरातील महिला, मुली व बालकांसाठी करण्यात आले होते. रविवारी (दि. ७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सटाणा शहरात प्रथमच येवला शहराच्या धर्तीवर पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद बघता पुढीलवर्षी सटाणा नगरपालिका यात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात महोत्सवाला चालना देणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष मोरे यांनी बोलताना दिली.

क्लबच्या अध्यक्षा वर्षा शिरोडे यांनी क्लबच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून या पतंग महोत्सव व खानाखजानाचे आयोजन करित वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या महोत्सवासोबतच फूड स्टॉल्स उपलब्ध करण्यात आल्याने शहरवासीयांनी पतंग उडविण्यासोबतच खानाखजानाचा आस्वाद घेतला. महोत्सवात डॉ. मनोहर सोनवणे, सतीश शिरोडे, राजेंद्र येवला, सुनील भांगडीया, दत्तु बैताडे उपस्थित होते. या वेळी कल्पना येवला, किर्ती भांगडीया, अपर्णा येवलेकर, आशा येवला, वैशाली येवला, डॉ. विद्या सोनवणे, नंदा चोपडा आदींनी यशस्वीतेसाठी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोलिस व जनतेमध्ये हवा समन्वय’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पोलिस ‘रेझिंग डे’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कौमी एकता क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा राखण्यास मदत झाली आहे. शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे या स्पर्धेत सहभागी होत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आणि जनतेत असा समन्वय घडून येणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा पोलिसप्रमुख संजय दराडे यांनी व्यक्त केले.

येथील पोलिस दलाच्यावतीने पोलिस ‘रेझिंग डे’ निमित्ताने दि. २ ते ६ जानेवारीदरम्यान कौमी एकता टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि. ६) येथील मसगा महाविद्यालय प्रांगणात खेळवण्यात आला त्यावेळी दराडे बोलत होते. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे आदी उपस्थित होते. तालुका टायगर्स व किल्ला किंग्स या दोन्ही संघात रंगलेल्या अंतिम सामन्यात स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांनी समालोचन करीत संघांना प्रोत्साहित केले. किल्ला किंग्स

संघाने अंतिम सामना जिंकत जेतेपद पटकावले.

शहरात सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी या कौमी एकता क्रिकेट स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १२ संघ सहभागी झाले होते. यातील प्रत्येक संघात पोलिस अधिकारी, कर्मचारी व हिंदू-मुस्लिम खेळाडू सहभागी होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश सूर्यवंशी, प्रशांत पाटील यांनी तर समालोचक म्हणून नितीन पेंटर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित, पंढरीनाथ पाटील, राहुल शिरसाठ यांच्यासह विजेत्या व उपविजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले. शनिवारी, पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार इलेव्हन व पोलिस इलेव्हन यांच्यात क्रिकेट सामना आयोजित केला होता. नाणेफेक जिंकून पोलिस संघाने २ बाद ७८ धावा केल्या. रोमांचक स्थितीत पोहचलेला हा सामना ७८ धावांवर बरोबरीत सुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक राज्यात नीचांकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांसाठी रविवारचा दिवस हुडहुडी भरवणारा ठरला. राज्यातील सर्वात नीचांकी ७.० अंश सेल्स‌ियस तापमान निफाडमध्ये, तर ८.० अंश सेल्सियस तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी राज्यात सर्वाधिक थंडीची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात झाली. तेथे किमान तापमान ७ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. नाशिक विभाग थंडीच्या बाबतीत अव्वल ठरला असून, नाशिकमध्ये ८.० अंश सेल्स‌ियस, तर जळगावमध्ये ८.२ अंश सेल्स‌ियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. कमाल तापमान २७.७ अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले.

नाशिक आणि निफाडमध्ये तापमानाचा पारा चार अंशांपर्यंत खाली घसरत असल्याचा अनुभव नाशिककरांना यापूर्वी अनेकदा घेतला आहे. यावर्षी मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आता कुठे पारा सात अंश सेल्स‌ियसपर्यंत खाली उतरला आहे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीची अजूनही नाशिककरांना प्रतीक्षा आहे. मालेगावात तर तापमान ११ अंशांच्या वर आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यभर प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वरमध्ये देखील रविवारी ११.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वाधिक कमी ८.२ अंश सेल्सियस तापमान २ जानेवारी रोजी नोंदविण्यात आले होते. तर ५ आणि ६ जानेवारीला ८.८ अंश सेल्स‌ियस तापमानाची नोंद झाली होती. रविवारी मात्र तापमान त्याहूनही खाली घसरले.

द्राक्ष उत्पादक धास्तावले

निफाड तालुक्यात पुन्हा गारठा वाढला आहे. येथील गहू संशोधन केंद्रात सकाळी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अर्थात हे या हंगामातील नीचांकी तापमान नाही. शुक्रवार २९ डिसेंबर रोजी सकाळी ६.५ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. थंडी वाढल्यास पाणी उतरलेल्या द्राक्षमण्यांने तडे जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंडी बनविण्याचा मिळाला सोपा मंत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

रोपे लावण्यासाठी अनेकदा प्लास्टिकच्या कुंड्यांचा वापर केला जातो. मात्र, प्लास्टिक पर्यावरणास घातक आहे. त्यावर पर्याय म्हणून आकर्षक पर्यावरणस्नेही कुंड्याही सहजपणे बनवता येते, याचे मार्गदर्शन संदीप चव्हाण यांनी रविवारी प्रात्यक्षिकाद्वारे दिले. यामुळे गच्चीवर चांगल्या पद्धतीची बाग फुलवून पर्यावरणाचेही रक्षण करता येत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या वतीने इंदिरानगर येथील अजय मित्र मंडळाच्या हॉलमध्ये रविवारी चव्हाण यांनी कुंड्यांची प्रात्यक्षिके सादर केली. चव्हाण यांनी सुरुवातीला पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, की बहुतांश नागरिक बाजारातून प्लास्टिकच्या कुंड्या आणून त्यात रोपे लावतात. मात्र, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे घरातील पेपरचा लगदा व सिमेंट यांचे मिश्रण करून चांगल्या पद्धतीच्या कुंड्या घरात तयार करता येतात. सिमेंटमुळेही पर्यावरणावर परिणाम होत असला तरी प्लास्टिकएवढा होत नाही. त्यामुळे प्लास्टिकरहित कुंड्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी त्यांनी कुंड्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले, तसेच अनेकांकडून या कुंड्या बनवूनही घेतल्या. झाडांची निगा राखणे, झाडांना कोणते खत केव्हा द्यावे, याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. अनेकांनी गच्चीवर बाग साकारली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. शहरातील शेकडो नागरिक व महिला या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्यातक्षम द्राक्षांचा तुटवडा

$
0
0

उत्पादनात राज्यामध्ये घटीची शक्यता; स्थानिक बाजारावर भिस्त

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीत लक्षणीय घट आल्याचे चित्र आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीत घट आल्याने आता द्राक्ष उत्पादकांची भिस्त केवळ स्थानिक बाजारावर राहणार आहे.

ओखी वादळामुळे निर्यातक्षम द्राक्ष शेतीला फटका बसला असून, द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे, असे दिसते. याशिवाय नाशिक जिल्ह्यात यंदा कधी नव्हे इतकी निर्यातक्षम द्राक्षांची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. दरवर्षी कृषि विभागाकडे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी केली जाते. यंदाच्या वर्षीही नाशिक जिल्ह्याला कृषि विभागाला ६० हजार दाक्ष बागांचे लक्षांक प्राप्त झालेले होते. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यासाठी ३० डिसेंबर २०१७ ही अखेरची मुदत देण्यात आलेली होती. मात्र अंतिम मुदतीपर्यंत नाशिक जिल्ह्यातून अवघ्या १६,३८० इतक्याच निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी झालेली आहे. कृषी आयुक्तालयाने नाशिक जिल्ह्याला निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीचे दिलेल्या लक्षांकापैकी अवघे २७.३० टक्के इतके लक्षांक साध्य झालेले आहे. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती जाणकारांकडून वर्तविण्यात आली आहे.

नाशिकसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतील द्राक्ष शेतीचे अवकाळी पावसामुळे सुमारे चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाची खात्री बारगळली होती.त्याचा परिणाम निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीवर झाला आहे.आता संपूर्ण भिस्त लोकल मार्केटवर अवलंबून राहणार आहे.

-जगन खापरे, अध्यक्ष, ग्रेप्स एक्स्पोर्ट असोसिएशन

शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद नाही

नाशिकसह राज्यातील इतर द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांतही अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतीचे नुकसान झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या संख्येत मोठी घट आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात निर्यातक्षम द्राक्षांची राज्यभरात टंचाई जाणवणार आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीसाठी कृषी आयुक्तालयाने दोनदा मुदतवाढही दिली. परंतु, या मुदत वाढीनंतरही शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यंदा निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणी घट आली आहे. परिणामी, राज्यातून द्राक्ष निर्यातीवरही अनिष्ट परिणाम होणे अटळ आहे. राज्यातील औरंगाबाद, बुलढाणा, जालना या जिल्ह्यातून एकाही निर्यातक्षम द्राक्ष बागेची नोंद झालेली नाहे. गेल्यावर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यातून ३४,११० द्राक्ष बागांची नोंदणी झाली होती. तर ८५९६ कंटेनर्समधून १ लाख ३१ हजार ९८० मेट्रिक टन द्राक्षे निर्यात झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांना नाही तोटा!

$
0
0

मटा मालिका
सरकारी इमारतींना ‘घरघर’
नाशिकरोड

--

समस्यांना नाही तोटा!

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत सुसज्ज असली, तरी या कार्यालयाच्या आवारातील इतर कार्यालयांच्या इमारतींची अवस्था मात्र जर्जर झालेली आहे. या इमारतींनी आता साठी पार केलेली असल्याने यातील बहुतेक इमारती धोकादायकदेखील बनलेल्या असल्याची स्थिती दिसून येत आहे.
नाशिक महसूल विभागातील नाशिकसह जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांचे मुख्य प्रशासकीय कार्यालय नाशिकरोड येथे आहे. महसूल आयुक्तालयाची वास्तू भव्य आणि देखणी असली, तरी या मुख्य प्रशासकीय आयुक्तालयाच्या आवारातील इतर बॅरेक्सची अवस्था मात्र पांढरा हत्ती पोसण्यासारखी झालेली आहे. या ठिकाणच्या सर्व बॅरेक्सनी साठी पार केलेली असल्याने या बॅरेक्सची अवस्था अत्यंत जर्जर झालेली आहे. आयुक्तालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह या सर्व बॅरेक्सची डागडुजी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (दक्षिण) आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी दुरुस्तीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. यातील काही बॅरेक्स वापराविना पडून असल्याने अडगळ वाढली आहे. पावसाळ्यात यातील बहुतेक बॅरेक्सचे छत गळते. त्यामुळे या बॅरेक्समधील सरकारी रेकॉर्ड सांभाळणेही अवघड जात आहे.
--
आवारातील विविध कार्यालये

विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय कृषी सहसंचालक, सामाजिक वनीकरण, एनएमआरडीए, उपसंचालक विभागीय भूजल सर्वेक्षण व विकास, विभागीय उपसंचालक वैधमापन शास्त्र, प्रादेशिक उपायुक्त मत्सव्यवसाय, भाडे नियंत्रण, विभागीय सहसंचालक ग्रंथालय विभाग, छात्रपूर्व प्रशिक्षण संस्था, कौटुंबिक न्यायालय, मोटार वाहन न्यायालय, सहाय्यक पोलिस उपायुक्त विभाग-४, महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, विभागीय व्यवसाय निवड व प्रशिक्षण संस्था, विभागीय माहिती उपसंचालक आदी.
--

स्वच्छतागृहांची दुर्दशा
आयुक्तालयातील विविध कार्यालयांत विभागातील नागरिकांची सर्व पाचही जिल्ह्यांतून दररोजच रीघ लागलेली असते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आवश्यक त्या संख्येत स्वच्छतागृहे असली, तरी त्यांची स्वच्छता सुमार दर्जाची होत असल्याने आयुक्तालयातील स्वच्छतागृहांतील दुर्गंधीने नागरिकांना नाक दाबून ये-जा करण्याची वेळ येते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीशिवाय आवारातील जुन्या बॅरेक्समध्ये असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची स्वच्छतागृहांअभावी मोठी गैरसोय होते. या सर्व बॅरेक्समधील बहुतांश स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. येथेही पुरेशा पाण्याअभावी आणि स्वच्छतेअभावी दुर्गंधीचा सामना सर्व कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि नागरिकांना करावा लागतो.
--
नागरिकांची गैरसोय
आयुक्तालयाच्या आवारातील जुन्या बॅरेक्समधील कार्यालयांत कामानिमित्त दूरवरून येणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी मोठी गैरसोय होते. या बॅरेक्समधील शौचालये लवकर दिसून येत नाहीत. काही स्वच्छतागृहांना गेल्या अनेक वर्षांपासून टाळेच लावलेले आहे, तर काही स्वच्छतागृहे केवळ अधिकाऱ्यांना वापरासाठी राखून ठेवण्यात आलेली आहेत. अशाच स्वच्छतागृहांची स्वच्छता होते. बाकी कोणत्याही स्वच्छतागृहांची स्वच्छता होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. खासकरून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
--
डासांचा वाढता प्रादुर्भाव
विभागीय आयुक्तालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या काही भागासह आवारातील सर्व बॅरेक्समध्ये डासांचा मोठा प्रादुर्भाव कायमच असतो. स्वच्छतेचा अभाव, झाडे-झुडपांची मोठी संख्या असल्याने या कार्यालयांच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या डासांमुळे सर्व बॅरेक्समधील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या मुश्किलीने आपल्या कार्यालयात बसतात. सायंकाळच्या सुमारास डासांचे प्रमाण प्रचंड वाढते. त्यामुळे या कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही बॅरेक्स वर्षानुवर्षे पडून असल्याने बकालपणाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

रस्त्यांची लागलीय वाट
आयुक्तालय आवारातील जुन्या बॅरेक्समधील सर्व कार्यालयांपुढील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. येथील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच करण्यात आलेली नसल्याने काही कार्यालयांपुढील रस्ते गायब झालेले आहेत. काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथील कर्मचारीवर्गासह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही गैरसोय सहन करावी लागत आहे.

--

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
नाशिकरोड येथील महसूल आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीसह या इमारतीच्या आवारातील इतर सर्व कार्यालयांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (दक्षिण) आहे. मात्र, आयुक्तालयासह येथील जुन्या बॅरेक्सबाबत माहितीची विचारणा केली असता सार्वजनिक बांधकामच्या दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवत माहिती देण्यास टोलवाटोलवी केली. या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीबाबत माहिती देण्याची जबाबदारी असणारे अधिकारी कायम दुसऱ्या साहेबांकडे मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.

--

विभागीय महसूल आयुक्तालय व आयुक्तालयाच्या आवारातील सर्व बॅरेक्सच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकामच्या दक्षिण विभागाची आहे. मात्र, आपण नाशिकला नुकतेच बदलून आलेलो असल्याने त्याबाबतची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही.

-दिलीप भामरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दक्षिण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्या जिवांच्या वेदनांवर फुंकर

$
0
0

नाशिक : माणसाला वेदना व्यक्त करण्याचे वरदान असले तरी अनेकदा त्याच्या आजाराचा थांग वैद्यकीय तज्ज्ञांनाही लागत नाही. अपघातग्रस्त किंवा आजारी मुक्या जिवांची तर कथाच वेगळी. मात्र, भूतदयेची जाणीव ठेवणाऱ्या ‘शरण फॉर अॅनिमल’ने भटक्या-जायबंदी श्वानांवर उपचारांसाठी नाशिकमध्ये राज्यातील पहिलाच अत्याधुन‌िक हायड्रोथेरपी स्विमिंग पूल साकारला आहे. लवकरच तो उपचारांसाठी सज्ज होणार आहे.

हल्ली रंजल्या-गांजलेल्यांना माणूस म्हणून वागणूक मिळत नाही, तेथे मुक्या जिवांची काय कथा? त्यांच्या ना व्यथा समजतात, ना दु:ख. वाहनांच्या धडकेत किंवा तत्सम अपघातांत अनेकदा हे भटके जीव दगावतात, जायबंदी होतात. कुणीतरी त्यांना बेदम मारहाण करून पिटाळून लावते, तर एखादा बेदरकार वाहनचालक त्यांच्यावर गाडी घालून पसार होतो. अशा अपघातांत या मुक्या जीवांना गंभीर दुखापत होते. मणक्याला आणि हाडांना मार लागल्याने अपंगत्वही येते. ते विव्हळतात, कुढतात असहाय्यपणे पडून राहतात. अशा मुक्या जीवांच्या सेवा सुश्रुषेचे कार्य नाशिक-मुंबई महामार्गावरील गौळाणे फाटा येथे ‘शरण’ ही संस्था अव्याहतपणे करीत आहे. त्यास आता महापालिकेचेही सौजन्य लाभत आहे. अशा अगतिक, असहाय्य जीवांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले जाते. जिल्ह्यात अन्य काही संस्थाही याकामी सक्रिय आहेत. अपंगत्व आलेल्या, पक्षाघात झालेल्या श्वानांना अद्ययावत उपचारांद्वारे पुन्हा सुदृढ करण्याचा निर्णय ‘शरण’च्या शरण्या शेट्टी यांनी घेतला आहे. परदेशात आणि बेंगळुरूसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात मिळणारी हायड्रोथेरपीसारखी उपचारसुविधा नाशिकमध्ये दिली जाणार आहे. या विव्हळणाऱ्या जीवांच्या वेदनांचे निवारण करून त्यांना दिलासा देता यावा यासाठी ४ बाय ६ फूट आकाराचा विशेष स्विमिंग पूल बनविण्यात येत आहे. मणक्याला दुखापत होणाऱ्या श्वानांसाठी ही थेरपी अत्यंत परिणामकारक ठरेल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. एकावेळी एक श्वान त्यामध्ये उपचार घेऊ शकेल. स्विमिंग पूलमध्ये उतरल्यानंतर श्वान विशेष उपचार यंत्रणेभोवती फिरू शकेल. पुलाचे काम पूर्णत्वास आले असून, उपचार यंत्रणा उभाण्यासाठी फॅब्रिकेशनच्या कामासही लवकरच सुरुवात होणार आहे. प्रजासत्ताक दिनापर्यंत प्रत्यक्ष उपचार मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

खासगी मालकीच्या श्वानांना शुल्क

नाशिकमध्ये श्वानप्रेमी वाढले असून, अनेकजण श्वान पाळतात. महागडे श्वान पाळणे हा स्टेटस सिंबॉल बनला आहे. भटक्या जायबंदी श्वानांना या संस्थेच्या आवारात आणून मोफत हायड्रोथेरपी दिली जाईल. खासगी मालकीच्या श्वानांवरदेखील हे उपचार केले जाणार आहेत; परंतु त्यासाठी त्यांच्याकडून माफक शुल्क आकाण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गो. तु. पाटील यांची ‘अनुष्टुभ’वर जीवननिष्ठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

अनुष्टुभ प्रतिष्ठानसाठी प्रा. गो. तु. पाटील यांनी तन, मन आणि धनाने जीवननिष्ठा अर्पण केली. त्यांच्या योगदानानेच अनुष्टुभ नामक व्रताचा प्रवास अधिकाधिक समृद्ध होत गेला, असे गौरवोद््गार ज्येष्ठ साहित्यिक व कवी वसंत आबाजी डहाके यांनी काढले.

अनुष्टुभ प्रतिष्ठानतर्फे प्रा. पाटील यांच्या अमृत वर्षपूर्तीप्रीत्यर्थ व त्यांच्या ‘ओल अंतरीची’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी डहाके बोलत होते. महात्मा फुले नाट्यगृहात रविवारी हा सोहळा झाला. डहाके म्हणाले, की प्रा. पाटील यांनी अनुष्टुभच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास बाळगला आणि तो सिद्धीला नेला. प्रतिष्ठानच्या जडणघडणीत त्यांनी कोशाध्यक्ष व व्यवस्थापक म्हणून जे कार्य केले, ते संस्मरणीय आहे. त्यांच्या चोख कारभारामुळे अनुष्टुभ प्रतिष्ठानला कायमस्वरूपी आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. ही जबाबदारी सांभाळत असताना एक व्यासंगी व तज्ज्ञ प्राध्यापक, कुटुंबवत्सल व शिस्तप्रिय पालक म्हणून त्यांनी आपले कुटुंबही आदर्श ठेवले.

‘ओल अंतरीची’ या आत्मचरित्रातील पुरुष प्रतिमांविषयी ‘कवितारती’चे संपादक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी, स्त्री प्रतिमांविषयी ‘आशयघन’ या नियतकालिकाच्या संपादक डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी समीक्षणात्मक मत मांडले.

डहाके यांच्यासह अनुष्टुभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण बांदेकर, तडेगावकर, आशुतोष पाटील यांच्या हस्ते ‘ओल अंतरीची’चे प्रकाशन झाले. या वेळी शांताताई पाटीलही उपस्थित होत्या.

दुपारच्या सत्रात अनुष्टुभ प्रतिष्ठान आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागातर्फे ‘मराठी वाङ्मयीन नियतकलिके व सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. रणधीर शिंदे व गणेश विसपुते उपस्थित होते. परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ समीक्षक सतीष काळसेकर म्हणाले, की समकालीन नियतकालीकातून वंचित आणि विस्थापितांचे आवाज मोठ्या प्रमाणात येत आहेत. १९६० नंतरच्या पिढीने विद्रोहात्मक कविता, वाड्मयीन नियतकालिकांना दिली. अनुष्टुभला समुद्र वाङ्मयाची परंपरा लाभलेली आहे. हेच सातत्य यापुढील काळातही निर्माण होऊ पाहत आहे. ही माझी राजकीय भूमिका मी वाङ्मयातून मांडत आलेलो आहे. समकालीन दहशतीच्या पार्श्‍वभूमीवरती नवे आवाज नियतकालिकातून उमटतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी नवअनुष्ठुभच्या वाङ्मयीन नियतकालिकाचे प्रकाशन डहाके यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील, संपादक बाबा भांड, प्राचार्य दिलीप धोंडगे, माजी मारोतराव पवार, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रा. एकनाथ पगार, प्रा. विजय काचरे, प्रा. तानाजी पाटील, प्रा. तुषार चांदवडकर, कवी प्रकाश होळकर, मंगेश काळे, देविदास चौधरी, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, राजू देसले, कवयित्री नीरजा, जयप्रकाश लब्बे, अविनाश पाटील, कवी लहू कानडे, चित्रकार श्रीधर अंभोरे, धनंजय गोवर्धने, संपादक नितीन रिंढे, सारंग पाटील, सुशील गुजराथी, अर्जुन कोकाटे, कवी लक्ष्मण बारहाते आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिलमध्ये रोज हजार रुग्णांवर उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दिवसाला सरासरी एक हजार रुग्णांवर उपचार केले जातात. सुट्यांचे दिवस वगळता २०१७ या वर्षात तब्बल तीन लाख २९ हजार ३१ रुग्णांवर उपचार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा २० हजारांनी वाढला आहे.

लोकसंख्यावाढीचा दर, आर्थिक परिस्थिती आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सुविधा यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वर्षागणिक वाढ होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात २०१६ मध्ये तीन लाख १० हजार ४६६ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. दरम्यान, २०१७ मध्ये ६२ हजार ८४ व्यक्तींना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. याच वर्षात बाळंतपणाची संख्यादेखील काहीशी वाढली. २०१६ मध्ये ७,०४७ महिलांची प्रसूती करण्यात आली. २०१७ मध्ये हे प्रमाण ७,२९५ इतके राहिले. याबाबत बोलताना सिव्हिल हॉस्पिटलशी संबंधित डॉक्टरांनी सांगितले, की हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. यामुळे आर्थिक परिस्थितीचा विचार करून महिला येथे येण्यास प्राधान्य देतात. येथे प्रसूती झाल्यानंतर नवजात अर्भकांवरदेखील आवश्यकतेनुसार येथेच उपचार केले जातात. शक्यतो, आई आणि बाळाला वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ठेवण्यात येत नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबासाठी ही महत्त्वाची बाब ठरते. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपघातातील जखमी, काही मोठ्या, तसेच छोट्या शस्त्रक्रिया, कुत्र्याचा चावा, सर्पदंश, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियादेखील केल्या जातात. काही वर्षांचा विचार करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. हॉस्पिटलमध्ये नव्याने काही कक्ष सुरू झाले असून, त्याचाही हा परिणाम असू शकतो, असे संबंधित डॉक्टरने स्पष्ट केले.

सिव्हिलमधील २०१६ मधील रुग्णसंख्या (कंसात २०१७ ची रुग्णसंख्या)

बाह्यरुग्ण कक्ष ३१०४६६ (३२९०३१), दाखल ५१०९५ (६२०८४), मोठ्या शस्त्रक्रिया ७२७३ (७२७७), छोट्या शस्त्रक्रिया ४५५० (५०८१), अपघात १८३३ (१६६५), प्रसूती ७०४७ (७२९५), नवजात अर्भक २८३९ (३२०५), कुत्र्याचा चावा ७०६७ (५७२७), सर्पदंश ९९२ (११७०), ऑर्थो सर्जरी २४६६ (१८७६), कुटुंबनियोजन ११०० (१३२०).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट्स’चे गारुड...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुसंवादी काकाकुवा, मकाऊ, ग्रे पॅरेंट्स, चॉऊ चॉऊ, न्यू फाउंडलँड, ग्रे हाऊंड, तिबेटियन मॅस्टिफ अशा एकापेक्षा एक अद्भुत पाळीव पशुपक्ष्यांचे (पेट्स) गारुड नाशिककरांवर रविवारी पडल्याचे दिसून आले. निमित्त होते नाशिक कॅनाइन क्लबतर्फे आयोजित ‘पेट टूगेदर सीझन-५’चे.
ठक्कर डोम येथे रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पेट टूगेदरचा प्रारंभ झाला. त्यात देशभरासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील हजारावर पाळीव प्राणी पाहण्याची संधी नाशिककरांनी साधली. यंदाच्या सीझन-५ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण शो झाले. डोमेस्टिक डॉग शोमध्ये शंभरावर श्वानप्रेमींनी सहभाग नोंदवला. यातील कॉकेशियन शेफर्ड, रफ कॉली, चॉऊ चॉऊ, न्यू फाउंडलँड, ग्रे हाऊंड, तिबेटियन मॅस्टिफ आदी १८० श्वानांनी नाशिककरांचे लक्ष वेधले.


पहिल्यावहिल्या‘कॅट शो’मुळे रंगत

पेट टूगेदरमध्ये यंदा कॅट फॅन्सियर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे देशातील पहिला आंतरराष्ट्रीय कॅट शो आयोजित करण्यात आला होता. त्यातील सुमारे १५० मांजरी आकर्षणाचा विषय ठरल्या. बेंगॉल कॅट, मेन कुन्स, हिमालयन कॅट, एक्झॉटिक शॉर्ट हेअर कॅट, स्कॉटिश फोल्ड कॅट, पर्शियन कॅट्स आदी प्रजातींच्या मांजरी पाहण्यात नाशिककर हरखून गेले होते. देशातील या पहिल्या इंटरनॅशनल कॅट शोचे जजिंग करायला वर्ल्ड कॅट फ्रॅटर्निटीतले सेलिब्रिटी जज अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया) व डग्लस (अमेरिका) उपस्थित होते

बर्डस, अनिमल्स डिस्प्ले

एक्झॉटिक बर्डस व अनिमल्सचा डिस्प्ले लक्षवेधी ठरला. त्यातील विविधरंगी मकाऊ, सुसंवादी काकाकुवा व ग्रे पॅरेंट्स, सन कनुर्स, फिझंट्स, कोकाटिल, रोझेला इत्यादी रंगीबेरंगी पक्षी पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. यापूर्वी बालगोपाळांचे आकर्षण ठरलेल्या इग्वाना, शुगर ग्लायडर्स, गिनिपिग यांची उपस्थिती नेहमीप्रमाणे गर्दी खेचणारी होती. या ठिकाणी रुबाबदार घोड्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मारवाड, पंजाब, सिंध या भारतीय जातींचे घोडे या प्रदर्शन सहभागी झाले होते. २५ घोडे, ३ हेले, खिल्लारी बैल, गीर, लाल सिंधी गायी अशा विविध पशुधनाचा यात सहभाग होता.

डॉग स्क्वॉडचे आकर्षण

यंदाच्या शोमध्ये कमांडो कॅनल्स हैद्राबाद यांचे डॉग ट्रेनिंग, ऑजिलिटी व डॉग प्रोटेक्शनची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. नाशिककरांना अभिमान असणारा महाराष्ट्र पोलिस दलाचा डॉग स्क्वॉडदेखील यात सहभागी झाला होता. भटक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या ‘आवास’ संस्थेतर्फे तेथे अॅडॉप्शन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात कुत्री अॅडॉप्ट केली. सर्वसामान्य नाशिककरांसह शहरातील सुमारे २२ शाळा या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिव, नाशिकचे पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच पोलिस आयुक्तालय व इतर शासकीय कार्यालयांतील अधिकारीवर्गासह अनेकांनी या पेट शोचा सहकुटुंब आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटीतील कामांची श्वेतपत्रिका काढावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन न देऊ शकणारे एसटी महामंडळ दुसऱ्या बाजूला आर्थिकदृष्ट्या डबघाईत असतानादेखील अवास्तव खर्च करते. या कामाचे ऑडिट करण्यासाठी महामंडळाने गेल्या तीन वर्षांत घेतलेले निर्णय आणि त्यापोटी केलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह इतर मागण्यांसाठी १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, आर्थिक उत्पन्नाचे कारण पुढे करीत अल्प पगारवाढीचा प्रस्ताव महामंडळाने ठेवला होता, असे संघटनेचे म्हणणे आहे.

महामंडळाने बस आणि बसस्थानक सफाईसाठी १२९३ स्वच्छक कर्मचारी आणि ५१४ सफाई कामगार कार्यरत असताना खासगी कंत्राटदारास ४४७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. नव्याने शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आलेल्या निविदाप्रक्रियेनुसार १५०० खासगी बस कुणाच्या मालकीच्या आहेत, त्यावर किती रुपयांचा भार सोसावा लागणार आहे, असे प्रश्न छाजेड यांनी उपस्थित केले आहेत. गणवेश खरेदी, ईटीआयएम तिकीट मशिनच्या ट्रायमॅक्स कंपनीस मुदतवाढ देणे, करार संपल्यानंतर मशिन आणि यंत्रसामग्री महामंडळास वर्ग करणे आवश्यक असताना पुन्हा ट्रायमॅक्स कंपनीस ठेका देणे, ट्रायमॅक्स कंपनीच्या नव्या करारानुसार आलेल्या मशिनमध्ये जीपीएस यंत्रणा असतानाही ट्रायमॅक्स कंपनीलाच व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमचे काम देणे, चेसीज खरेदी निविदेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या नमूद सूत्राप्रमाणे धंदा वाटप न करणे, केपीएमजी या बाह्य सल्लागार संस्थेस अनावश्यक नेमणे, बाह्य निविदा प्रकरण, बसस्थानक नूतनीकरण, स्मार्ट कार्ड योजना, वाय फाय, टायर खरेदी, भरतीप्रक्रिया, बाहेरून बस बांधून घेणे, तुर्भे येथील बस आगाराकरिता सिडकोकडून घेण्यात आलेल्या जागेवर ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग कॉलेज आणि स्वयंचलन इंजिनीअरिंग कॉलेज बांधण्याचा निर्णय, पुणे स्वारगेट येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा निर्णय, अवास्तव जाहिरातींसाठी खर्च, मराठी भाषादिन, वर्धापनदिन, गणवेशवाटप आदी कामांसाठी करण्यात आलेला खर्च यासह गेल्या तीन वर्षांपासून घेतलेल्या निर्णयांची, कामांची व खर्चाची श्वेतपत्रिका एसटी महामंडळाने काढावी, अशा मागण्या छाजेड यांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेच्या टाकाऊ वस्तूंमधून ग्रीन जिम

$
0
0

नांदगाव स्टेशनला लोको फोरमनच्या कल्पनेतून उभारणी

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वेचे रनिंग रूम म्हणजे रेल्वे चालवून दमलेल्या रेल्वे चालकांचे व सोबतच्या गार्डसचे विश्रांती स्थानच. मात्र नांदगावमध्ये केवळ रेल्वे चालकांना आराम करण्यासाठीची जागा एवढेच त्याचे स्वरूप न ठेवता चालकांची तब्येत ठणठणीत व एकदम सुदृढ राहण्यासाठी अत्याधुनिक जिम तयार करण्यात आली आहे. रेल्वेच्या निकामी झालेल्या टाकाऊ भंगार वस्तूंमधून ही ग्रीन जिम निर्माण केल्याने दहा ते बारा हजारांचा खर्च आला आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आलेला हा प्रयोग जरा हटके असून, त्याला शनिवारी (दि. ६) नांदगावला पाहणीसाठी आलेल्या रेल्वे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांच्याकडून २५ हजारांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. येथील लोको फोरमन ए. जी. गोरे यांच्या कल्पकतेतून जिमला मूर्तरूप मिळाले. रेल्वे चालकांसाठी जिमयुक्त रनिंग रूम कौतुकाचा विषय ठरला असून, सर्वांसाठी आदर्शवत ठरण्याची शक्यता आहे.

नांदगाव येथील रेल्वेच्या चालक, गार्ड वर्गासाठी असलेल्या विश्रांती गृहात आता अत्याधुनिक जिम साकारण्यात आली आहे. नांदगावच्या लोको फोरमन्सकडून चालक व गार्ड यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार करून या रनिंग रूमला वेगळे रूप बहाल केले आहे. ज्यामुळे रेल्वे चालक आणि गार्ड यांना विश्रांती करणे सोपे होणार आहे. या विश्रांतीगृहासाठी रेल्वे प्रशासनाकडून दरमहा मिळणाऱ्या ठराविक खर्चाच्या रकमेतही बचत करीत ही ग्रीन जिम साकार करण्यात आली आहे.

महाप्रबंधकांकडून २५ हजारांचे बक्षीस

विशेष म्हणजे या जिमला लागणारे रेल्वेचे लाखो रुपये कल्पकतेने वाचवून त्यांनी रेल्वेच्या टाकाऊ व भंगारात जाणाऱ्या वस्तू मोठ्या कौशल्याने जिमसाठी वापरल्या आहेत. या टाकाऊ वस्तूंपासून जिममधील व्यायामाची साधने तयार करून घेतली आहेत. यात प्रामुख्याने चालकांसाठी व गार्डसाठी स्काय वॉकर, लेग प्रेस, एअर वॉकर, चेस्ट प्रेस, सर्फ बोर्ड, सीट अप बोर्ड, सीटिंग अँड स्टँडिंग ट्विस्टर अशा विविध साधनांची उपलब्धता करण्यात आली आहे. नांदगाव रेल्वे स्थानकाच्या दौऱ्यावर आलेले रेल्वे महाप्रबंधक शर्मादेखील ही जिम पाहून प्रभावित झाले. त्यांनी या कल्पकतेला दाद दिली तसेच भरभरून कौतुक करीत त्यांना रोख बक्षीसही दिले. रेल्वे चालकांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्य व सुदृढतेसाठी योगा, इतर प्रकारचे व्यायाम चालक वर्गासाठी नांदगाव रनिंग रूम एक वरदान ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित औषधांनी इपिलेप्सी नियंत्रणात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इपिलेप्सी (फिट्स) आजार नियमित औषधोपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो. यासाठी नवनवीन थेरपींचा वापर शक्य असून, कुटुंबाने या पेशंटकडे लक्ष पुरवावे, असा सल्ला अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गजानन होले यांनी दिला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इपिलेप्सी फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे जिल्हा रुग्णालयात रविवारी झालेल्या शिबिर प्रसंगी ते बोलत होते. शि‌बिराचा शुभारंभ आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास इपिलेप्सी फांउडेशनचे डॉ. निर्मल सूर्या तसेच इंडियन अॅकॅडमी ऑफ न्युरोलॉजीचे सेक्रेटरी डॉ. गगनदीपसिंग (पंजाब) हे उपस्थित विशेषज्ञ म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. मनोज गुल्हाने, डॉ. आनंद दिवाण, डॉ. राहुल बाविस्कर आदी सात न्युरोफिजीशियन्सनी मदत केली. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच सदर शिबिराची माहिती देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने ग्रामीण भागासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्याद्वारे माहिती दिली. शिबिरामध्ये जिल्हा तसेच परिसरातील २०० वेगवेगळ्या वयोगटातील पेशंट्सची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. पेशंट्सचा मोफत इ‍इजी व सीटी स्कॅन करण्यात आला. शिबिरात आलेल्या पेशंट्सना फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या सुविधांची माहिती देऊन त्या प्रत्यक्षात पुरवण्यात आल्या. ग्रामीण भागातून आलेल्या पेशंट्सला तीन महिन्यांचे मोफत औषध पुरवण्यात आले. दूरवरून येणाऱ्या पेशंट्स तसेच नातेवाइकांसाठी विशेष मोफत वाहनांची तसेच दिवसभरात जेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली.

इपिलेप्सी आजाराबाबत तसेच शिबिराबाबत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती तसेच शिबिराची माहिती देण्याचे काम आशा कार्यकर्त्या तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. उपस्थित सर्व विशेषज्ञांनी इपिलेप्सी हा आजार नियमित व योग्य वेळेत उपचार केल्यास पूर्ण बरा होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. या आजाराचे जवळपास ५०० पेशंट्सवर दर महिन्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले जातात. या आजाराची सर्व औषधे जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध असून, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू घाट लिलावावर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाळू घाटांच्या परिसरात पर्यावरण संवर्धनाचे निकष पाळले जात नसल्याची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. पुढील आदेश येईपर्यंत घाटांचे लिलाव करू नका असे आदेश हायकोर्टाने दिल्याने राज्यभरातील घाटांचे लिलाव ठप्प होणार आहेत. नाशिकमध्ये सोमवारी (दि. ८) लिलाव होणार होता. परंतु, हायकोर्टाच्या आदेशाने तो पुढे ढकलावा लागणार आहे.

राज्यात वाळू घाटांच्या लिलावातून राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. या घाटांच्या ठिकाणी उत्खनन केले जात असले तरी पर्यावरण संवर्धनाचे निकष पाळण्याचे बंधन प्रशासनासह ठेकेदारांवरही आहे. परंतु, हे निकष पाळले जात नसल्याबद्दलची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. हायकोर्टाने घाटांच्या लिलावावेळी पर्यावरण संवर्धन तसेच पर्यावरणीय आघात करणाऱ्या बाबींचा आराखडा तयार करण्यास सांगितले. या आराखड्यांना पर्यावरण विभागाची मंजुरी घेतानाच ते जिल्हास्तरीय पर्यावरण समितीपुढे सादर करण्याचे निर्देश दिले. याबरोबरच पुढील निर्णय येईपर्यंत राज्यातील एकाही घाटाचा लिलाव करू नये, अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक वाळू घाटांच्या लिलावावर बंधने आली आहेत.

ठेकेदारांनी फिरवली पाठ
नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाळू घाटांच्या लिलावासाठी इ-ऑक्शन प्रक्रिया राबविली जात होती. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ३० घाटांचे लिलाव सोमवारी करण्यात येणार होते. या लिलावात सहभागी झालेल्या निविदा शनिवारी (दि. ६) उघडण्यात आल्या. त्यामध्ये चार घाटांसाठी बोली लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये केवळ कळवण व देवळा तालुक्यातील घाटांचा समावेश होता. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

प्रशासनाची द्विधा मनस्थिती
निविदा उघडण्याची वेळ उद्यावर आली असताना कोर्टाचे आदेश आल्याने घाटांचे लिलाव करायचे की नाही अशी जिल्हा प्रशासनातील गौन खनिज विभागाच्या यंत्रणेची द्विधा मनस्थ‌िती झाली आहे. वाळू चोरी करणाऱ्या माफियांवर दरोड्याची कलम लावण्याचे धोरण राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात अवलंबले आहे.

आराखड्यात हे अपेक्षित
कोर्टाच्या आदेशानुसार, प्रत्येक घाटाचे सर्वेक्षण करावयाचे आहे. त्यामध्ये नदी कोणत्या दिशेने वाहते, नदीतून किती गाळ वाहून नेण्याची क्षमता आहे, नदीपात्रात किती ब्रास वाळू उत्खनन शक्य आहे अशा विविध गोष्टींची माहिती घेऊन आराखडा तयार करावा लागणार आहे. अशा एका घाटासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. हा खर्च जिल्हा प्रशासनाच्या माथी पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे आरोग्य सुदृढ, तर कुटुंबास स्वास्थ्य!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस रेझिंग सप्ताहनिमित्त रविवारी, सायंकाळी शहर पोलिसांनी महिला बाईक रॅलीचे आयोजन केले. यात पोलिस दलातील तसेच इतर महिलांनी सहभाग घेतला. रॅली दरम्यान वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
बाईक रॅली त्र्यंबकरोडवरील स्वांतत्र्यवीर सावरकर जलतरण तलावापासून सुरू झाली. त्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, डॉ. श्वेता भिडे, सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त उपस्थित होते. कार्यक्रमास संबोधित करताना डॉ. भिडे यांनी सांगितले, की महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. वाहतुकीसारख्या प्रश्नात आपणच पुढाकार घेऊन पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. भिडे यांनी सांगितले. महिलांचे आरोग्य हा महत्त्वाचा विषय ठरतो. घरातील महिलेच आरोग्य सदृढ असल्यास त्या कुटुंबास स्वास्थ लाभते. त्यामुळेच कुटुंबाची प्रगती शक्य होते. महिलांनी व्यायामाकडे लक्ष पुरवणे आवश्यक असून, शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन सदृढ आरोग्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचावा, असे डॉ. भिडे यांनी स्पष्ट केले.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष नको
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी संबोधित करताना सांगितले, की वाहतूक हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याकडे दुर्लक्ष होते. याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले. दरम्यान महिलांच्या बाईक रॅलीला जलतरण तलावापासून सुरुवात झाली. पुढे त्र्यंबक नाका, सीबीएस, अशोकस्तंभ तेथून गंगापूररोड, राजीवगांधी भवन आणि पुन्हा जलतरण तलाव अशी ही रॅली पार पडली. सहभागी झालेल्या महिलांनी वाहतूक नियम पाळण्याबाबत घोषणा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images