Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

५७ हजार मालमत्तांच्या करात ४० टक्के वाढ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मालमत्ता सर्वेक्षणात आढळलेल्या ५७ हजार नवीन मालमत्तांसह १ एप्र‌िल २०१७ पासून शहरात नव्याने बांधकाम होणाऱ्या मालमत्तांना वाढीव ४० टक्के मालमत्ता कर लागू करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महासभेने हिरवा कंद‌िल दर्शविला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी दहा ते बारा कोटींचा महसूल अपेक्षित आहे. तर या प्रस्तावातून पुनर्विकस‌ीत करण्यात येणाऱ्या जुन्या इमारतींना यातून वगळण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. शहरातील मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याच्या या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेत नकार दिला.

प्रधान महालेखाकारांचा आक्षेप आणि महापालिकेच्या आर्थिक नुकसानीचा संदर्भ देत नवीन मालमत्तांच्या घरपट्टीत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने महासभेत जादा विषयात ठेवण्यात आला होता. मालमत्ता सर्वेक्षणात आढळलेल्या ५७ हजार नवीन मालमत्तांसह एप्रिल २०१७ नंतर नोंदणीकृत होणाऱ्या मालमत्तांवर हा वाढीव कर आकारला जाणार आहे. महापालिकेच्या घरपट्टी दरात गेल्या १७ वर्षांपासून यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रस्तावावर महासभेत सविस्तर चर्चा होऊन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रस्तावाचे समर्थन करत, करबुडव्यांवर कारवाई होऊन पालिकेच्या महसुलात वाढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यातून पुनर्विकसित होणाऱ्या जुन्या इमारती व गावठाणांतील मालमत्तांना वगळण्याचा निर्णय व्हावा, अशी मागणी केली. गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पुर्वलक्षी प्रभावाने या इमारतींकडून कर वसूल करण्याची मागणी केली. गुरम‌ित बग्गा यांनीही करवाढीचे समर्थन करत, गटनेत्यांच्या बैठकीत एकत्र‌ित निर्णय घेण्याची मागणी केली. प्रशासनाने या प्रस्तावातून जुन्या मालमत्ता वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले असून, केवळ नवीनच मालमत्तांना हा प्रस्ताव लागू होईल, असा खुलासा केला. महापौरांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता या नवीन मालमत्तांसह सर्वेक्षणातील ५७ हजार मालमत्तांच्या दरात ४० टक्के वाढ होणार आहे.

आयुक्तांना अधिकार नाहीच

नवीन मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावातील मुद्द्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. कर ठरवण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत, तर महासभेत प्रस्ताव का आणला, असा सवाल गुरुम‌ित बग्गा यांनी केला. कराचे दर ठरविण्याचे अधिकार महासभेलाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संभाजी मोरुस्कर, दिनकर पाटील यांनीही आयुक्तांना करवाढीचे अधिकार आयुक्तांना देण्यास नकार दिला. सर्वच सदस्यांनी आयुक्तांना अधिकार देण्यास विरोध केल्यानंतर प्रस्तावातील दोन ओळी हटवण्याचा आदेश महापौरांनी दिला.

अशी होणार वाढ

सन १९९९ मध्ये महापालिका हद्दीतील मिळकती, जमिनींच्या रेडी रेकनरचे किमान दर ५,२२० रुपये होते. २०१७-१८ मध्ये हेच किमान दर २२,२०० रुपये आहेत. यात सुमारे ४२५.२८ टक्के वाढ झाली आहे. सद्यस्थितीत महापालिकेने मिळकतींच्या मूल्यांकनाचे वाजवी भाड्याचे आरसीसी, निवासी मालमत्तेचा कमाल दर प्रति चौरस फुटास ०.५० रुपये आहे. त्यात ४२५.२८ टक्के वाढ केल्यास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात हेच दर प्रति चौरस फुटास २.१२ रुपये इतके असावयास हवे होते. तसेच आरसीसी बिगरनिवासी मालमत्तेचे कमाल दर प्रति चौरस फुटास १.८० रुपये असून, त्यात ४२५.२८ टक्के वाढ केल्यास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात हे दर प्रति चौरस फुटास ७.६५ रुपये असणे अपेक्षित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोर्चा...तोडफोड...तणाव

0
0

खान्देशात बंदचे पडसाद, जळगावात शाळा, मार्केट बंद; भुसावळ, नंदुरबारला दगडफेक

टीम मटा, जळगाव

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचे राज्यभर पडसाद उमटत आहे. बुधवारी (दि. ३) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला खान्देशात प्रतिसाद दिसून आला. जळगावात मध्यवर्ती बाजारपेठेत कडकडीत तर उपनगरांमध्ये संमिश्र बंद पाळण्यात आला. गणेश कॉलनीत आंदोलनकर्त्यांनी दुकानाच्या व दातांच्या दवाखान्याच्या काचा फोडल्या. शहरातील काही भागात दुकाने बंद करण्यावरून गोंधळ होऊन तणाव निर्माण झाला होता. भुसावळ, रावेर, सावदा, यावल परिसरात एसटीवरील दगडफेकीत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. धुळे शहरासह शिरपूर, श‌िंदखेडा तालुक्यातही बंदचे पडसाद उमटले. नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथेही बस फोडण्यात आली तर शहादा तालुक्यातील राणीपूर गावाजवळ एक तर दुसरी बस मोहिदा गावाजवळ फोडण्यात आली. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील या बंदने बससेवा पूर्णत: बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. शाळाही बंदच होत्या.

जळगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर राज्यभरात बुधवारी (दि. ३) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यात दुपारपर्यंत उमटत होते. जळगावात बुधवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आंदोलनकर्ते रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमले. याठिकाणी डीवायएसपी सचिन सांगळे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून शांतता राखण्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून गांधी मार्केटपर्यंत तसेच शहरात फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.

गोलाणीमध्ये गोंधळ

गोलाणी व्यापारी संकुलातील काही दुकाने सकाळी सुरू होती. या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतिभा शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या गायत्री सोनवणे, वैशाली झाल्टे, पराग कोचूरे यांनी याठिकाणी येऊन दुकाने बंदचे आवाहन केले. यावेळी काही आंदोलनकर्त्यांकडून दुकानाच्या शटरची किरकोळ तोडफोड करण्यात आली. या प्रकाराची माहिती कळताच शहर पोलिसांनी गोलाणी मार्केट परिसरात धाव घेऊन दोन तरुणांना ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना शांतता राखण्याचे सांगितले. महिलांनी शांततेच्या मार्गानेच दुकान बंद करण्याचे आवाहन करीत असल्याचे सांगितले.

आंदोलकांची चर्चा

शहरात सर्वत्र दुकाने बंद केल्यानंतर आंदोलनकर्ते पद्मालय विश्रामगृहाच्या परिसरात एकत्र जमले होते. याठिकाणी दलित मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, धरणगाव पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्यासह काही वरिष्ठांनी आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. याठिकाणी आंदोलकांनी पोलिसांशी चर्चादेखील केली. शहरातील टॉवर चौक परिसरात मोटार सायकलवरून आरडाओरड करत जाणार्‍या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलिस स्टेशनला नेले. तसेच दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजार परिसरात दुकाने बंद करण्यासाठी गोंधळ घालणार्‍या एक आंदोलनकर्त्या तरुणाला मोटार सायकलसह वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले.

महाराष्ट्र बंद दरम्यान शहरातील शाळा बुधवारी (दि. ३) सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शाळा प्रशासनाकडून शाळांना सुटी देण्यात आली. यामधील अनेक शाळांना अगोदरच सुटी देण्यात आली होती. बंदमुळे काही अप्रिय घटना होऊ नये म्हणून, विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षा चालकांनी बुधवारी (दि. ३) सकाळी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवल्या होत्या. अनेक शाळांमध्ये दहावीच्या पूर्व परीक्षेचे पेपर सुरू आहेत. मात्र बुधवारी (दि. ३) होणारे पेपर रद्द करण्यात आले होते. ती परीक्षा आता शनिवारी (दि. ६) घेण्यात येणार आहे. शहरासह जळगाव तालुक्यातील अनेक गावांमधील शाळांना सुटी देण्यात आली होती. शहरातील आर. आर. विद्यालय, का. ऊ. कोल्हे, खुबचंद सागरमल यासह काही शाळा सुरू होत्या.


भुसावळात मोर्चा काढत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळला कोरेगाव भीमा दगडफेक प्रकरणातील निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्यासाठी भुसावळातून लिम्पस क्लब येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात वकील संघाचीही उपस्थिती होती. मोर्चा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयावर नेऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यानंतर काही वेळाने पांडुरंग टॉकीजजवळ बसची तोडफोड करण्यात आली. अष्टभुजा मंदिराजवळ चार ते पाच दुकानांची तोडफोड करून बस उलटविण्यात आली. या आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाजार पेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार व एटीसचे मनोहर शिंदे यांच्यावरही दगडफेक झाली. याप्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, या घटनांमुळे भुसावळात बंद दरम्यान दिवसभर तणावाचे वातावरण होते. शहराची मुख्य बाजारपेठ असलेला दाणा बाजार, फुले मार्केट, गांधी मार्केट, गोलाणी मार्केट, गोदडीवाला मार्केट पूर्णपणे बंद असल्याने याठिकाणी शुकशुकाट होता.तर सकाळी काही वेळ सराफ बाजार सुरु होता. दुपारनंतर सर्व सराफ बाजार देखील बंद झाला होता. शहरात फक्त दवाखाने, मेडिकल, बँका सुरू होत्या. घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असताना कुठलाही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरीपासून खेडी गावापर्यंत टप्प्याटप्प्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंजिठा चौफुली, इच्छादेवी चौफुली यासह चौकाचौकात पोलिस सकाळपासून पहारा देत होते. शहराची मुख्य बाजारपेठ असलेला दाणा बाजार, फुले मार्केट, गांधी मार्केट, गोलाणी मार्केट, गोदडीवाला मार्केट पूर्णपणे बंद असल्याने याठिकाणी शुकशुकाट होता.तर सकाळी काही वेळ सराफ बाजार सुरु होता. दुपारनंतर सर्व सराफ बाजार देखील बंद झाला होता. शहरात फक्त दवाखाने, मेडिकल, बँका सुरू होत्या. घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असताना कुठलाही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरीपासून खेडी गावापर्यंत टप्प्याटप्प्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंजिठा चौफुली, इच्छादेवी चौफुली यासह चौकाचौकात पोलिस सकाळपासून पहारा देत होते.

जळगावात फोडल्या दुकानाच्या काचा

जळगाव जिल्ह्यातील ११ डेपोंमधील ११५२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात मंगळवारी (दि. २) २० तर बुधवारी (दि. ३) ५ अशा सुमारे २५ एसटींवर दगडफेक केल्याने नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत एसटीचे जवळपास २८ लाखांचे नुकसान झाले तर फेऱ्या रद्द केल्यानेही एसटीला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिटिशकालीन साक्षीदार कॅन्टोन्मेंट बोर्ड

0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी सह्याद्रीच्या कुशीत डोंगररांगा फिरून आपल्या सैन्यदलाच्या प्रशिक्षणासाठी दूरदृष्टीचा वापर करीत देवळाली छावणीची स्थापना केली. लष्कराच्या दृष्टीने सोयीची, समुद्रसपाटीपासून ५५६ मीटर उंचीवर असलेल्या या जागेचे महत्त्व ओळखून आपल्या वसाहती स्थापन केल्या. लष्कराची विविध प्रशिक्षण केंद्रे या ठिकाणी स्थापन करीत असताना तत्कालीन ब्रिट‌िश सरकारने लष्कराच्या व परिसरातील रहिवाशांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने १८६९ मध्ये देवळाली कॅन्टोन्मेन्ट बोर्डाची स्थापना केली.

कॅन्टोन्मेंट कार्यालय

सध्याच्या ज्या ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय आहे, ते पूर्वी लष्करी विभागासाठी कॅन्टीन भवन म्हणून वापरात होते. ऑक्टोबर १९३५ मध्ये केवळ पाच हजार रुपयांमध्ये ते लष्कराकडून खरेदी करण्यात आले आहे. तेव्हापासून आजतागायत या कार्यालयातून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार चालतो. दोन फूट रुंदीच्या भिंतीमध्ये दगडी बांधकाम असलेली ८५५ चौरस मीटरची ही कॅन्टोन्मेंट बोर्डाची वास्तू आजही तितक्याच दिमाखाने उभी आहे. या कार्यालयाची एकूण १० मोठ्या खोल्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये बैठक खोली, अध्यक्ष कार्यालय, कार्यालयीन अधीक्षक खोली, रेकॉर्ड विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, लेखा विभाग, पाणी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, इंजिनीअर विभाग असे विविध विभाग या खोल्यांमध्ये आहेत. या सर्व वास्तूंमधून कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार चालतो. आजही ही इमारत सुस्थितीत आहे. दोन वेळा या कार्यालयाच्या छताचे काम करण्यात आले. पूर्वीची कौले काढून त्यामध्ये आतल्या बाजूने लोखंडी पत्रे टाकून पुन्हा ती इमारत तशीच दिसावी म्हणून त्यावर नवीन कौले लावण्यात आली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड वाचनालय

देवळालीकडून वडनेरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला अत्याधुनिक असे वाचनालय आपल्या दृष्टीस पडते. या ठिकाणी पूर्वी जुने कौलारू पद्धतीचे एक वाचनालय होते. त्याची दुरवस्था झाल्याने नगरसेवक सचिन ठाकरे यांच्या माध्यमातून गत पंचवार्षिक निवडणुकीपूर्वीच याबाबत पत्र देण्यात येऊन नवे वाचनालय उभारणेकामी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार सुमारे ६५ लाख रुपये निधी खर्च करून ही १ ग्रंथालय, १ बाल वाचनालय, २ अभ्यासिका अशा प्रकारची आधुनिक स्वरुपाचे वाचनालय साकारण्यात आले आहे. नवीन असल्यामुळे नाममात्र मासिक फी आकारत सर्व सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. येथे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शेजारी जेवणास बसण्यासाठी सोयही उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज या अभ्यासिकेत शेकडो विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससीसारख्या परीक्षांचा अभ्यास करत असतात.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल

१९२२ ते १९३५ साला दरम्यान सुमारे ४५ हजार रु.खर्च करीत या ठिकाणी कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाश्यांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने बोर्डात ठराव मंजूर करून हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. यामध्ये नर्स व वॉर्डबॉय राहण्यासाठी स्वतंत्र स्वरुपाची निवासव्यवस्था करण्यात आली आहे. आज कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलची चार इमारती वेगवेगळ्या असून, यापैकी दुसरी १९८४ पासून ज्या वास्तूत आऊटडोअर पेशंट विभाग (ओपीडी) आहे, ही वास्तू १९८० साली येथील उद्योगपती स्व. विक्योमल श्रॉफ यांनी आपले वडील शामदास श्रॉफ यांच्या स्मरणार्थ बांधून दिली आहे. याशिवाय आपल्या बहीण रोंचाबाई मनवानी यांच्या स्मरणार्थ तिसरी वास्तू बांधून देत या ठिकाणी अत्याधुनिक अशी रक्तपेढी उभारून दिली आहे. या ठिकाणी बाहेरील डॉक्टरांच्या तपासणीसह तीन स्वतंत्र ऑपरेशन थिएटर, एक आरएमओ तपासणी विभाग एक एक्सरे विभाग व एक सोनोग्राफी सेंटर आदी सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्यक असणारा सर्व स्टाफही पूर्ण करून देण्यात आला आहे.

सहाय्यता कक्षासह कॅन्टिन आवश्यक

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना माहित आहे. मात्र, बऱ्याचदा नागरिकांना या ठिकाणी पेशंट संबंधी विचारणा करायची झाल्यास ती नेमकी कुठे करावी, याबाबत व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने हॉस्पिटलच्या आवारात एक सहाय्यता केंद्र उभारणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना जेवणाची व खाण्याच्या साहित्याची एक चांगली सोय असावी, या उद्देशाने एखादी कॅन्टिन कायमस्वरुपी चालू करणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना चांगले जेवण उपलब्ध होईल. तसेच हॉस्पिटलच्या आवारात कोणता कक्ष नेमका कुठे आहे, हे समजण्यास अडथळा निर्माण होतो. त्यासाठी प्रांगणात हॉस्पिटलमधील विविध कक्ष दर्शविणारा एखादा फलक अथवा नकाशा या ठिकाणी असणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने बोर्डाने प्रयत्न केल्यास नागरिकांना सोयीचे होईल.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हास्यकूल

गुरुद्वारा रोडवर सन १९३६ साली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोया व्हावी या उद्देशाने सूर करण्यात आलेली शाळा त्यावेळी केवळ १३०० रुपये खर्चून उभारण्यास आली असून शाळेमध्ये एकूण २० वर्गांसह एक प्रयोगशाळा, उपमुख्याध्यापक कार्यालयात दोन शिक्षक खोल्या, एक कार्यालय व एक मुख्याध्यापक खोली उभारण्यात आलेली आहे. आजपर्यंत या शाळेमधून अनेक नामवंतांनी शिक्षण घेतले असून, आज त्याच शाळेत शिकलेले विद्यार्थी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांच्या कार्यकाळात शाळेत अनेक सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. यामध्ये संगणकीय शिक्षणासह विविध सोयीचा समावेश करण्यात आला आहे.

संयुक्त प्राथमिक शाळा

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने परिसरातील मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सन १९३० साली आनंद रोडवर तर १९३३ साली हौसन रोडवर या प्राथमिक शिक्षण देण्याऱ्या शाळांची उभारणी आली होती. आता बोर्डाने दोन्ही प्राथमिक दर्जाच्या शाळा एकत्र करून गुरुद्वारा रोडवरील कॅन्टोन्मेंट हायस्कूल शेजारी भव्य आधुनिक सुविधांनी युक्त अशी संयुक्त प्राथमिक शाळा बांधली आहे. आज या वास्तूत मराठी व इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू झाली आहे. २०१५ साली ३६ हजार चौरस फुटांमध्ये पाच कोटी रुपये खर्च करून या एकत्रित शैक्षणिक संकुल उभारत दोन वर्षांतच २० खोल्यांचे अद्ययावत शैक्षणिक संकुल उभे राहिले असून, यामध्ये वाचनालय, प्रयोगशाळा, सभागृह, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुले व्यासपीठ, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, दृक् श्राव्य वर्ग, प्रशासकीय कार्यालय, प्रशस्त शिक्षक खोली आदींचा यात समावेश आहे. या शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना पोहचता यावे याकरिता मोफत स्वतंत्र बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सर्व इमारतींच्या देखभाल करणेकामी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व लोकप्रतिनिधी आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावत असतात. कॅन्टोन्मेंट कार्यालय ही इमारत जरी जुनी असली तरी आले वैभव जपून आहे. शहरातील अन्य सर्व इमारती नव्याने उभारण्यात आल्याने प्राथमिक सुविधांसह अन्य आवश्यक सुविधांनी परिपूर्ण आहे.

- विलास पाटील, अभियंता, कॅन्टोन्मेंट बोर्ड

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरुपी नेमणूक झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागणार नाही.

- सुभाष यादव, नागरिक


महिलांसाठी असलेले सोनोग्राफी सेंटर हे केवळ आठवड्यातून एक दिवस असते. त्यासाठी ते किमान आठवड्यातून दोन दिवस केल्यास परिसरातील नागरिकांची सोय होईल.

- दीपाली कांडेकर, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिसांची घरे नव्हे खुराडीच!

0
0

डॉ. बाळकृष्‍ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील पोलिसांना रेल्वेकडून दुजाभावाची वागणूक मिळत आहे. पोलिस ठाण्यापासून निवासस्थानापर्यंत, तसेच ड्युटीपासून सुविधांपर्यंत अनंत समस्या आहेत. अनेक वर्षांपासून हे पोलिस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. रेल्वे पोलिस निवासस्थाने अक्षरशः खुराडीच आहेत. ती कोसळून दुर्घटना होण्याआधीच नवीन निवासस्थाने बांधण्याची गरज आहे.

नाशिकरोड रेल्वेस्टेशनची मदार रेल्वे सुरक्षा बलाबरोबरच रेल्वे पोलिसांकडे आहे. रेल्वे सुरक्षा बल रेल्वेच्या, तर रेल्वे पोलिस महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रणाखाली काम करतात. स्टेशनमध्ये दोघांचे कार्यालय शेजारीच आहे. परंतु, सुविधांमध्ये मोठे अंतर आहे. रेल्वे सुरक्षा बलाला समाधानकारक पगार, चांगले निवासस्थान, कामाचे मर्यादित तास तसेच सोयी सुविधा आहेत. रेल्वे पोलिसांची सर्वच बाबतीत वाणवा आहे.

नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यात सुमारे पन्नास कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी मालधक्क्याजवळ एक क्वार्टर आहे. त्यामध्ये आठ घरे आहेत. किमान तीस वर्षे जुनी ही घरे आहेत. दुरवस्थेमुळे या घरांमध्ये राहण्याचे पोलिस टाळतात. आठपैकी पाच घरे रिकामी आहेत. महिला पोलिसांना नाईलाजाने येथे रहावे लागते. बाकीचे पोलिस स्टेशनपासून दूरवरील खासगी जागेत राहायला गेले आहेत. मनमाड, इगतपुरीसारख्या तालुक्यांतील पोलिस येथे राहतात.

भाजीत पडतात पोपडे

रेल्वे पोलिसांची निवासस्थाने पाडून नवीन बांधण्याची गरज आहे. सध्याची निवासस्थाने कधीही कोसळू शकतात. त्यांचे स्लॅब गळत असून, पावसाळ्यात तर घरात गुडघाभर पाणी साचून धान्य, फर्निचर यांचे नुकसान होते. आताही थंडीत पाण्याची टाकी ओसंडून वाहत असल्याने घरात ओलावा तयार होतो. स्वयंपाकघरात तळे साचत आहे. पावसाळ्यात पाणी उपसून फेकावे लागते. छतही गळत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने छतावर डांबर व सिमेंट भरून गळती थांबवली आहे. पावसाळ्यात तर प्लास्टिकचा कपडा टाकावा लागतो. भिंतींना ओल आल्याने भाजीत पोपडे पडत आहेत. भिंतींना शेवाळ, बुरशी आली आहे. वायरिंग खराब झाले असून, स्वीचबोर्ड निघाले आहेत. ओलाव्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका आहे.

पाण्याचा अपव्यय

रेल्वे पोलिसांची निवासस्थाने आधीच पडायला आली असताना येथील छतावरील पाण्याची टाकी रोज ओसंडून वाहते. त्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पोलिसांनी रेल्वेकडे तक्रार करुनही काहीच उपाययोजना केली जात नाही. हेच पाणी घरात शिरते. भिंती कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचे कुटुंबीय टाकी ओव्हरफ्लो झाल्यावर बाथरूमचे नळ चालू करतात.

सर्वांचेच दुर्लक्ष

रेल्वे पोलिसांचे मुख्यालय नागपूर येथे आहे. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पोलिसांनी पत्रे लिहून प्रश्न मांडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. त्यांनी नवी निवासस्थाने बांधण्यास सहमती दर्शवली. मात्र, हा प्रश्न रेल्वेशी निगडित असल्याने ते रेल्वेशी संपर्क साधण्यापलिकडे काहीच करू शकले नाहीत. रेल्वेने शेजारीच असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने दुरूस्त व रंगरंगोटी केली. मात्र, पोलिसांकडे दुर्लक्ष केले. या निवासस्थानांमध्ये उंदरांचा व ढेकणांचा जाच आहे. आम्हाला आदेश नसल्याने या खोल्यांची दुरुस्ती करू शकत नाही, असे रेल्वे प्रशासन सांगते. तर रेल्वेच्या खोल्या असल्याने आम्ही दुरुस्ती करू शकत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

पोलिस ठाणेही छोटे

नाशिकरोड रेल्वेस्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असताना चिकाटीने तपास करून गुन्हेगारांना धडा शिकवणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेकडून सापत्न वागणूक मिळते. त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. पोलिसांनी यशस्वीपणे तपास कसा करायचा, असा प्रश्न आहे. नाशिकरोड रेल्वे (लोहमार्ग) पोलिस ठाणे म्हणजे इगतपुरी पोलिस चौकी होती. १९९८ साली त‌िचे रुपांतर पोलिस ठाण्यात झाले. तेव्हापासून हे पोलिस या खुराड्यातच काम करत आहेत. येथे पोलिसांनाच नव्हे, तर तक्रारदारांनाही बसण्यास जागा नाही. रेल्वे पोलिस ठाण्यात महिला पोलिसही आहेत. त्यांना ड्यूटीवर आल्यावर चेंजिंग रूम नाही. स्वच्छतागृहही नाही. पुरुषांच्याच टेबलावर त्या काम करतात. कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रवाशांसाठी असलेल्या नळावरच ते पाणी पितात. गुन्हेगारांसाठी मोठी कोठडी नाही. हे पोलिस शेजारील न्यायालयाच्या खोलीवर अवलंबून असतात.

कामाचा ताण वाढला

रेल्वे स्थानक व परिसरात गुंडगिरी वाढली आहे. पुण्याच्या दोन अल्पवयीन मुलींवर दोन वर्षापूर्वी बलात्कार झाला होता. नाशिकरोडला मध्यरात्री आलेल्या बीडच्या महिला पोलिस उपनिरीक्षकाचा गुंडाने जमावादेखत विनयभंग केला होता. दागिने व बॅगा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळ तोकडे असतानाही ते तपास करत आहेत. त्यांच्यावरील कामांचा ताण वाढल्याने रेल्वेस्थानक सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. स्थानकात बॉम्ब सापडल्याची अफवा आली, तर त्यांना नाशिकरोड पोलिसांची मदत घ्यावी लागते. रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे कुलरची मागणी केली होती. मात्र, कुलर शिल्लक नसल्याचे त्यांना कळविण्यात आले.

नवी जागा कधी?

नाशिकरोड रेल्वे पोलिसांना बसण्यासाठी नवीन खोली मिळण्याचा प्रस्ताव भुसावळ कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांना प्रशस्त जागेची आवश्यकता असल्याचे वृत्त ‘म. टा.’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. रेल्वे पोलिसांना एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील दोन नंबर पुलाखालील जागा देण्याची तयारी रेल्वेने दर्शवली. रेल्वेचे भुसावळ विभागाचे प्रमुख अधिकारी (डीआरएम) नाशिकरोडला आल्यानंतर त्यांनी सध्याच्या रेल्वे पोलिस स्टेशनची पाहणी केली. त्यांची समस्या जाणून घेतली. इन्स्पेक्शन नोट घेण्याचे आदेश डीसीएमला दिले. त्यानुसार रेल्वेच्या आयओडब्ल्यू विभागाने भुसावळला जागेचा प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, अद्याप कार्यवाही झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरच्या घरी साकारा कुंड्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्लॅट संस्कृतीमध्ये बगीचा फुलवायचा असेल, तर कुंड्यांशिवाय पर्याय नसतो. बगीचा फुलविण्यासाठी कुंड्यांची मोठी मदत होते. बाजारात अनेक प्रकारच्या कुंड्या उपलब्ध असतात; परंतु या कुंड्या आपल्याला घरच्या घरी तयार करता आल्या तर! ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लबतर्फे आता अशी संधी उपलब्ध झाली आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे कुंड्या कशा बनवायच्या याविषयी डेमो वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ७) सकाळी १० वाजता अजय मित्रमंडळ हॉल, इंदिरानगर या ठिकाणी हे वर्कशॉप होणार आहे.

या वर्कशॉपमध्ये निसर्गसंवर्धक संदीप चव्हाण हे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या कशा बनवायच्या याचे मार्गदर्शन करणार आहेत. कागद आणि सिमेंटपासून कुंडी कशी बनवायची, फक्त सिमेंटपासून, सिमेंट आणि गोणपाटापासून कुंडी कशी बनवायची हे या वर्कशॉपमध्ये ते सांगणार आहेत. या डेमो वर्कशॉपसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३- ६६३७९८७, तसेच ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डस्टबिन घोटाळ्याचा मागितला अहवाल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौपट दराने खरेदी केलेल्या डस्टब‌िनचा घोटाळा महासभेत चांगलाच गाजला. अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केलेल्या डस्टबिन प्रकरणी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी लावून धरली. महापौरांनीही या घोटाळ्याची गंभीर दखल घेत, येत्या महासभेत डस्टबिन खरेदीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. शिवाय, गेल्या पाच वर्षांत प्रशासकीय मान्यता नसतानाही झालेल्या कामांचा चौकशी अहवाल महासभेवर ठेवण्याचेही प्रशासनास बजावले.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत शिवसेनेच्या सदस्यांनी डस्टब‌िन खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिवसेना आक्रमक झाली होती. शिवसेनेच्या सदस्यांनी ‘डस्टब‌िन घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा लिहिलेले फ्लेक्स अंगावर चढवत घोटाळ्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डस्टबिन खरेदी घोटाळ्यातील संशयास्पद खरेदीचा मुद्दा उपस्थित करीत, महासभेची प्रशासकीय मान्यता नसताना धोरणात्मक विषय हाताळत प्रशासनाने सभागृहाच्या अधिकाराचे हनन केल्याचा आरोपही केला. कचरामुक्त शहराची संकल्पना राबविण्याऐवजी डस्टबिनच्या माध्यमातून कचराकुंड्या पुन्हा नव्याने उभ्या करून धोरणात्मक निर्णयांना आव्हान दिले जात असल्याचे बोरस्ते म्हणाले. खरेदीतील १५ टक्के ओव्हर हेडिंग चार्जेस कुणासाठी, असा सवाल करत बोरस्ते यांनी या सगळ्या खरेदीची सखोल चौकशीची मागणी केली. डॉ. हेमलता पाटील यांनी संकट हीच संधी मानून प्रशासनाने खरेदीत दाखविलेल्या तत्परतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दीडशे गुणांसाठी २१ लाख रुपये खर्च करून दोन गुणही मिळणार नसल्याचा आरसा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दाखवला. गुरुमित बग्गा यांनी महासभेची मान्यतेबाबत प्रशासनाला कोंडीत पकडत गोदावरी नदीवरील पुलांवर ग्रीननेटही मान्यतेशिवाय लावण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत, बनवेगिरी उघड केली.

प्रशासनाला घेरले

कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी या डस्टब‌िन खरेदीच्या चौकशीची मागणी करीत स्मार्ट सिटी कंपनीकडून परस्पर होणाऱ्या कामांवर आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी सदस्यांच्या अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोप केला. सुधाकर बडगुजर यांनी खरेदीच्या चौकशीची मागणी करीत, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांसह अन्य झालेल्या कामांनाही प्रशासकीय मान्यता नसल्याचा आरोप केला. संभाजी मोरुस्कर यांनीही डस्टबिन खरेदी महासभेची मंजुरी न घेताच झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. सभागृहनेता दिनकर पाटील यांनी तर गेल्या पाच वर्षांत प्रशासकीय मान्यता नसताना झालेल्या कामांची स्वतंत्र सनदी लेखापालामार्फत चौकशीची सूचना केली आणि डस्टबिन खरेदीप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली. महापौर रंजना भानसी यांनी डस्टबिन खरेदीबाबतचा सविस्तर अहवाल पुढील महासभेत ठेवण्याचे आदेशित करतानाच मागील पाच वर्षांत प्रशासकीय मान्यता नसताना झालेल्या कामांचाही चौकशी अहवाल महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, प्रशासकीय मान्यता नसतानाही होणाऱ्या कामांबाबतही सभागृहाने आक्षेप घेत कायद्यातील कलम दाखवत आपल्या अधिकार व हक्काची जाणीव प्रशासनाला करून दिली.

..म्हणे वादळाने पाडले

गुरुम‌ित बग्गा यांनी गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीवरील पुलांवर लावण्यात आलेल्या ग्रीन जाळ्यांचा मुद्दा उपस्थित केला. हायकोर्टाचे नाव पुढे करीत, पर्यावरण विभागाने परस्पर जाळ्यांची खरेदी केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे या जाळ्या पडल्यानंतर ठेकेदाराला बिल देण्यात आले. त्यासंदर्भात एस. आर. वंजारी यांनी स्पष्ट‌िकरण देत, वादळामुळे या जाळ्या कोसळल्याचा दावा केला. तसेच नियमानुसार खरेदीचेही स्पष्टीकरण दिले. त्यावर महापौरांनी वादळ कधी आले होते, याची माहिती द्या असे सांगत त्यातील हवा काढून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड कोटी कागदपत्रे स्कॅन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभागाकडील महत्त्वपूर्ण दस्ताऐवजाला जिल्हा प्रशासनाने सुरक्षितता प्रदान केली आहे. तब्बल एक कोटी ४७ लाख कागदपत्रे स्कॅन करण्यात आली असून, शंभर टक्के स्कॅनिंग पूर्ण झाल्याचा दावा जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांन‌ी बुधवारी केला.

२०१७ मध्ये पूर्ण झालेल्या कामांची माहिती आणि २०१८ मधील संकल्पांची माहिती देण्यासाठी राधाकृष्णन् बी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी, जिल्हा कृषी अध‌िक्षक तुकाराम जगताप, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, तहसीलदार चंद्रकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थ‌ित होते.

ई-पत्रके, जुने सातबारा उतारे, जुन्या फेरफार नोंदी, जन्म मृत्यूच्या नोंदी यांसारखे सहा प्रकारची कागदपत्रे महत्वपूर्ण दस्तावेज म्हणून ओळखले जातात. महसूल विभागाला वर्षानुवर्ष हा दस्तावेज सांभाळावा लागत असून तो जीर्ण झाला आहे. तो फाटण्याची, गहाळ होण्याची शक्यता अधिक असते. महसूल विभागाकडे शहरांसह गावागावांचे ऐतिहासिक जीर्ण दस्तावेज आहेत. जुने आणि निजामकालीन रेकॉर्ड महसूल विभागाकडे असून, त्याची योग्य रीतीने जपणूक होत नसल्याने ते तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. संगणकीकृत डाटा तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याने स्कॅनिंग करून रेकॉर्ड जपवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महसूलमध्ये कागदपत्रे लवकर उपलब्ध होत नाहीत. वाळवी लागून ते खराबही होतात. आगीसारख्या दुर्घटनेत ती नष्ट होऊ शकतात. त्यांचे जतन करण्यासाठी स्कॅनिंगचा पर्याय पुढे आला. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख आदी कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंगचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०१६ पर्यंत एक कोटी ११ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले होते. सर्व्हरच्या माध्यमातून सर्व तहसील कार्यालयांना हा डेटा उपलब्ध करून देण्यात आला. त्यावर डिज‌िटल स्वाक्षरीदेखील झाली असून, नागरिकांना मागणीप्रमाणे वितरणास सुरुवात झाली आहे. गतवर्षात ३६ लाख दस्तावेजांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण एक कोटी ४७ लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आल्याची माहिती बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. स्कॅन केलेल्या दस्तावेजांची १५ दिवसांमध्ये तपासणी पूर्ण करून हा डेटा स्टेट डेटा सेंटर येथे अपलोड करण्यात येणार आहे. त्यानंतर हे दस्ताऐवज देखील आपले सरकार आणि ई- रेकॉर्ड वेब पोर्टलवर निर्धारित शुल्क भरून हे दस्तावेज नागरिकांना घरबसल्या मिळविता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात कडकडीत बंद; प्रवाशांना फटका

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद गेल्या तीन दिवसांपासून राज्यासह खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये उमटत आहेत. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि. ३) धुळे शहरासह जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि साक्रीमध्ये कडकडीत बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तर धुळे विभागातून एकही बस मंगळवारी (दि. २) रात्रीपासून मार्गस्थ झाली नसल्याने राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

शहरात बुधवारी (दि. ३) सकाळी मोर्चा काढून सरकारविरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. कोरेगाव भीमा घटनेत सणसवाडी येथील राहूल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला. या मृताच्या वारसाला ५० लाख रुपये व जखमींना ५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. शिवाय मृताच्या वारसाला सरकारी नोकरीत सामावून घेण्यात यावे. तसेच कोरेगाव भीमा येथील २६२ एकर जमीन संपादित करीत त्याठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्याचे निवेदन दिले. या वेळी एम. जी. ढिवरे, वाल्मिक दामोदर, संजय पगारे, किरण जोंधळे, गौतम पगारे, बाबूराव नेरकर, भिवसन अहिरे, महेंद्र शिरसाठ, योगेश जगताप सहभागी होते.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे धुळे विभागातील ८०० बसेसपैकी एकही बस मंगळवारी (दि. २) रात्रीपासून धावलेली नाही. यामुळे धुळे विभागाचे मंगळवारी २५ लाखांचे नुकसान झाले तर विभागातील नऊ आगारांचे बुधवारी (दि. ३) सर्व बसेस आगारात पडून असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात जिल्ह्यातील साधारण २५ बसेसच्या नुकसानीचा फटकादेखील महामंडळाला बसला आहे, असे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी माहिती देताना सांगितले.

नंदुरबारला दोन बस फोडल्या

धुळे : नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे अमळनेर नवापूर बस फोडण्यात आली. यात बसची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली असून, पहिल्या घटनेत शहादा तालुक्यातील राणीपूर गावाजवळ एक बस तर दुसरी बस मोहिदा गावाजवळ फोडण्यात आली. बुधवारी (दि. ३) सकाळपासून जिल्ह्यात तीन बस गाड्यांचे नुकसान करण्यात आले. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यात गुजरात राज्य जाणाऱ्या प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले. नंदुरबारसह तळोदा, शहादा, नवापूर, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्राकडून मालेगाव हागणदारीमुक्त घोषित

0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाकडून गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात शहर हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले होते. यानंतर केंद्र शासनाच्या क्यूसीआय कमिटीद्वारे शहराची पाहणी करण्यात आली असून, केंद्रशासनाकडून देखील मालेगाव शहर हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

येथील महापालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पालिकेचे उपायुक्त कमरुद्दीन शेख, सहायक आयुक्त राजू खैरनार उपस्थित होते. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत येथील महापालिका प्रशासनाकडून हागणदारीमुक्त शहर मोहीम हाती घेण्यात आली होती. आयुक्त संगीता धायगुडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या मोहिमेस वेग आला होता. ऑगस्ट २०१७ मध्ये राज्यस्तरीय समितीच्या पाहणी दौऱ्यानंतर राज्य शासनाकडून मालेगाव शहर हागणदारीमुक्त घोषित झाले होते. मात्र यानंतर केंद्राच्या समितीकडून देखील शहर हागणदारीमुक्त घोषित व्हावे, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील होते.

याविषयी माहिती देताना आयुक्त धायगुडे म्हणाल्या, केंद्राने मालेगाव हागणदारीमुक्त घोषित करणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मालेगाव शहर हागणदारीमुक्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. मात्र नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाने घेतलेली मेहनत यामुळेच शहर हागणदारीमुक्त करण्यात यश आले. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, सर्व नगरसवेक, नागरिक, पालिका-पोल‌सि प्रशासन, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय यांचेही त्यांनी आभार मानले. शहर हागणदारीमुक्त व्हावे यासाठी पालिका प्रशासनाकडून वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. जनजागृती करण्यासाठी ११८ ठिकाणी पथनाट्य देखील घेण्यात आले. नागरिकांनी खुल्यावर शौचास बसू नये असे आवाहन करण्यात आले होते. यांनतर देखील उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर ८१ गुन्हे दाखल केले असून दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. यंत्रमागधारक कारखानदरांना शौचालय बांधण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. अशा विविध स्तरावरील उपाय योजनामुळेच शहर हागणदारीमुक्त घोषित झाले आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्राकडून देखील शहर हागणदारीमुक्त घोषित झाल्याने शहर विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच हागणदारीमुक्त शहर कायमच हागणदारीमुक्त राहावे यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत.

‘त्या’ ठिकाणी वृक्षारोपण

हागणदारीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हागणदारीमुक्त राहावेत यासाठी त्या ठिकाणी वृक्षारोपण, क्रीडांगण, उद्याने तयार करणे अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत. दरसहा महिन्यांनी त्याचा सर्व्हे करण्यात येणार आहे. प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आयुक्त धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.


आता स्वच्छ प्रभाग स्पर्धा

केंद्र शासनाकडून देखील शहर हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्याने आयुक्त संगीता धायगुडे व पालिका प्रशासनाने आता शहरातील प्रभाग स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे. यासाठी शहरातील सर्व प्रभागात येत्या महिन्याभरात ‘संपूर्ण स्वच्छ प्रभाग’ अशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. संपूर्ण स्वच्छ असलेल्या प्रभागास आयुक्त निधीतून ५ लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांनी ही माहिती दिली. अंदाजपत्रकातील आयुक्त निधीतून हे बक्षीस देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकाचौक वेठीस

0
0


म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव भिमा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी द्वारकेसारख्या वर्दळीच्या चौकात आंदोलकांनी तब्बल तीन तास ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे या चौकातील वाहतुकीचा फज्जा उडाला. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता पोलिसांनी अन्य मार्गांनी वाहतूक वळविली. दुपारी चारनंतर मात्र येथील परिस्थ‌तिी पूर्वपदावर आली.

कोरेगाव भिमा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलक शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्रित जमले. तेथून त्यांनी आपला मोर्चा द्वारका चौकाकडे वळविला. दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत मोठ्या संख्येने आंदोलक द्वारका चौकाकडे मार्गस्थ झाले. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच मोठी कुमक द्वारका चौकात पाठविण्यात आली. चौकाच्या चारही बाजूंना मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला. पुणे, मुंबई, मालेगाव आणि सारडा सर्कलकडून येणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली. आंदोलकांनी द्वारका चौकात पोहोचताच तेथील व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आयुक्तांसह दोन पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त तेथे दाखल झाले. जमावाला मज्जाव न करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यामुळे तब्बल तीन तास येथील वाहतूक ठप्प झाली. द्वारका चौकात वाहने उतरविण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्यांनी द्वारका चौकातील पुलावर धाव घेतली. परंतु तेथेही त्यांना वाहने मिळू शकली नाहीत. दुपारी पावणेतीनच्या सुमारास आंदोलकांनी निदर्शने थांबविण्याचा निर्णय घेतला. कुठलाही अनुचित प्रकार न घडविता हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी त्यांना सहकार्याचे आवाहन केले.

पर्यायी मार्गाचा वापर

द्वारका सर्कल ठप्प झाल्यामुळे दुचाकी वाहनचालकांनी ट्रॅक्टर गॅरेजकडून शहरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी मुंबई नाक्याकडून गल्लीतून नाशिककरोडकडे प्रवास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद मागे घेतल्यामुळे शहरात चहलपहल

0
0


म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर बुधवारी दलित संघटनेने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प झाले. पण, सायंकाळी हा संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील तणावही निवळला. त्यानंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात दुकान, हॉटेल सुरु झाले. रिक्षाही रस्त्यावर धावू लागल्या. खासगी बसनेही आपली सेवा रात्री सुरू केल्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला.

सकाळी या बंदमुळे काही ठिकाणी व्यवहार सुरू होते. बसही व रिक्षाही धावत होत्या. पण, दुपारी १२ नंतर आंदोलनकांनी मोटारसायकलरॅली, रास्ता रोको, निदर्शने करून आंदोलन तीव्र केल्यानंतर सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर रिक्षा, बस बंद झाल्या. या काळात वैद्यकीय सेवा सकाळपासून सुरू होत्या. त्यामुळे रुग्णांना बंदची झळ बसली नाही.

प्रवाशांना दिलासा

सकाळपासून बस स्टॅण्ड व रेल्वे स्थानकावर ताटकळत बसलेल्या प्रवाशांना संप मागे घेतल्यामुळे दिलासा मिळाला. बाहेरगावहून रेल्वेने आलेल्या प्रवाशांना शहरात येण्यासाठी कोणतेच वाहन उपलब्ध नव्हते. पण, सायंकाळी रिक्षा सुरू झाल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला. बस स्टँण्डवर अडकलेले प्रवाशी रिक्षा सुरु झाल्यामुळे सुखावले. संप मागे घेतल्यानंतरही आदेश न आल्यामुळे एसटी सेवा सुरू नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये शुकशुकाट

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव भिमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी नाशिकमध्येही दिसून आले. शहरातील अनेक शाळांनी अधिकृतरित्या सुटी जाहीर केली नसली तरी, शहरातील वातावरण आणि अफवांमुळे पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे टाळले. यामुळे बहुतेक शाळांमध्ये बुधवारी शुकशुकाट होता.

कोरेगाव भिमाच्या घटनेचा निषेध बुधवारी महाराष्ट्र बंदच्या माध्यमातून करण्यात आला. या बंदला प्रतिसाद देत शहरातील दुकानदार, व्यावसायिक, विक्रेत्यांनी सकाळपासूनच बंद पाळला. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट, सज्ज असलेली पोलिस यंत्रणा असे चित्र दिसून येत होते. या वातावरणामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवणे पसंत केले. तर काही पालकांनी शाळा संपण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी

घरी नेले. याचा परिणाम, शाळेतील संख्येवर झाल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशीच शाळांमध्ये विद्यार्थी नसल्याची परिस्थिती ओढावल्याने सोशल मीडियावर घटनेचा निषेध करण्यात आला. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. पुढील महिन्यापासून

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुट्या मिळतील. त्यामुळे या महिन्यातच अनेक शाळांना दहावीच्या पूर्वपरीक्षा घेण्याचे नियोजन आखले आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम हायस्कूलमध्येही बुधवारपासून या परीक्षा होणार होत्या. परंतु, विद्यार्थ्यांची तुरळक संख्या पाहता परीक्षा एक दिवस पुढे ढकलण्यात आली.

रिक्षाचालकांचाही सहभाग

बंदमध्ये व्हॅन, रिक्षाचालकांनीही सहभाग घेतला होता. त्यांच्याकडून आदल्या दिवशीच पालकांना बुधवारी शाळा बंद असल्याचे सांगण्यात आले. वाहतुकीचे साधन नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या या दिवशी रोडावल्याचे शाळा प्रशासकांकडून सांगण्यात आले.

शाळांना सुटी

शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांनी विद्यार्थीसुरक्षेच्या दृष्टीने सुटी जाहीर केली होती. या शाळांचा पालकांशी अॅप, एसएमएसद्वारे संपर्क असल्याने त्यांनी या माध्यमातून शाळा बंदच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या शाळा पूर्ण बंदच होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसेवा सुरळीत

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव भिमा प्रकरणी आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद होत्या. बंदमध्ये वैद्यकीय सुविधा वगळल्याने नागरिकांचे हाल झाले नाहीत. शहरातील सर्व सरकारी व खासगी दवाखाने सुरळीत सुरू होते.

यावेळी काही युवकांनी रस्त्यावर येत नागरिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र दवाखाने व मेड‌किल्स उघडी ठेवण्यास हरकत घेतली नाही. बुधवारी अनेक हॉस्प‌टिल्समध्ये पूर्वनियोजीत ऑपरेशन्स होती. त्यांना लागणाऱ्या सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील सर्व पॅथॉलॉजीकल लॅब सुरू होत्या. जी मेड‌किल्स हॉस्पिटल्सशी संलग्न आहेत असे मेड‌किल २४ तास सुरू ठेवण्यात आले होते. शहराच्या काही भागात मोठ्या प्रमाणात तणाव असल्याने तेथील मेड‌किल्स काही काळापुरती बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांना औषधे मिळण्यास फारसा त्रास झाला नाही. शहरातील संदर्भ रुग्णालय व सिव्ह‌लि हॉस्प‌टिसचे काम नेहमीप्रमाणे सुरळीत होते. मात्र या ठिकाणी येणाऱ्या स्टाफला वाहने उपलब्ध न झाल्याने कामावर येण्यास थोडा उशीर झाला. नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात नेहमी प्रमाणे कामकाज सुरू होते. नाशिक रोड भागात परिसरातील खेड्यापाड्यातून लोक उपचाराला येत असतात. पेशंटला रिक्षाने आणण्यात आले मात्र ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना घरी ये-जा करण्यास त्रास झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकाळी ‘बंद’; दुपारनंतर पूर्वपदावर

0
0


टीम मटा

नाशिक ः भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. या बंदमुळे प्रवाशांचे हाल झाले. जिल्ह्यात लासलगाव येथे काही समाजकंटकांनी बस जाळण्याचा प्रयत्न केला.मात्र वाहक-चालकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

मालेगावी प्रवाशांचे हाल

मालेगाव ः शहरात बुधवारी बंद शांततेत पार पडला. कुठलाही अनुचित प्रकार शहरात घडला नाही. शहरातील मध्यवर्ती भाग वगळता इतरत्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत असली तरी बसेस बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद मंगळवारी शहरात देखील उमटल्याचे पाहायला मिळाले होते. दलित बांधवांनी एकात्मकता चौक ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. बुधवारी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याने याचा परिणाम शहरात पहायला मिळाला. शहरातील मोतीबाग नाका, मोसमपूल, जुना आग्रा रोड, कॅम्प रोड आदी परिसरात सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. शहरातील मध्यवर्ती भागात बंदचा प्रभाव पाहायला मिळाला. अन्य भागात जनजीवन सुरळीत होते. शहरातील रस्त्यावरील रिक्षा तसेच खासगी वाहतूक सुरळीत सुरू होती. बंदचा सर्वाधिक फटका बससेवेला बसला. महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याने अनेक शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी दिली होती.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोल‌सि बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोल‌सि उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे आदींसह सर्व पोल‌सि ठाण्याचे पोल‌सि निरीक्षक यांच्यासह राज्य राखीव पोल‌सि दल, दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.

बस डेपोतच

महाराष्ट्र बंदमुळे शहर बसस्थानकातील बससेवा खंडित झाली. बुधवारी सकाळच्या काही फेऱ्या वगळता एकही बस आगारातून सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सकाळी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होती. पोल‌सि बंदोबस्तात मुक्कामाच्या बस रवाना करण्यात आल्या. त्यानंतर मात्र बससेवा बंद ठेवण्यात आली. काही प्रवाशांनी खासगी वाहतुकीने प्रवास केला.

देवळ्यात सर्वपक्षीय मोर्चा

कळवण ः देवळा येथे बुधवारी सकाळी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. कोरेगाव भीमा मधील दंगलप्रकरणी आरोपींना कडक शासन करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार कैलास पवार यांना देण्यात आले. कळवण तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता निषेध मोर्चा काढला. यावेळी कळवणचे उपविभागीय पोल‌सि अधिकारी देवीदास पाटील, तहसीलदार कैलास पवार, पोल‌सि निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.

लासलगावजवळ बस जाळण्याचा प्रयत्न

निफाड ः लासलगाव आगारांची बस मनमाडकडून लासलगावकडे येत असताना अज्ञात समाजकंटकांनी लासलगाव रेल्वे गेटजवळ या बसला प्रवाशांसह जाळण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र बंद दरम्यान झाला. या बसमध्ये महाविद्यालयीन मुले होती. केवळ चालक व वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे गंभीर घटना वाचली.

कोरेगाव भीमा मधील पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना अज्ञात समाजकंटकानी लासलगाव बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. लासलगाव आगाराची मनमाड-लासलगाव बस (एमएच ४० एन ८६१६) सकाळी लासलगावकडे येत असताना लासलगाव रेल्वे गेटवर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या. बसमध्ये पेट्रोल टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. चालक व वाहकांने सतर्कता दाखवत समाजकंटकांना विरोध केला. तसेच बसमधील विद्यार्थी व प्रवाशांना गाडीखाली उतरवून आठही प्रवासाचे प्राण वाचविले. गाडीच्या खाली आल्यानंतर प्रवासी व विध्यार्थी प्रचंड भेदरलेले होते.

या घटनेची माहिती लासलगाव पोल‌सि स्टेशनला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याची चाहूल मिळताच समाजकंटकांनी तेथून पळ काढला. चालक एस. आर. आघाव व वाहक ई. के. सताळे या दोघांनी बसमधील तीन प्रवासी व पाच विद्यार्थी असे आठही प्रवसांचे प्राण वाचविल्याने सर्वांनी या चालकाचा व वाचकाचे कौतुक केले. या प्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे करीत आहे.

सटाणा दुपारनंतर पूर्वपदावर

सटाणा ः शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आगारातून दिवसभरात एकही बस पडली नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारी दोननंतर शहरातील व्यावसायिकांनी दुकाने उघडली. बससेवा सुरू होईल या आशेवर सकाळी दहा वाजेपर्यंत सटाणा बसस्थानकात प्रवाशी थांबून होते. सटाणा आगाराचे सुमारे साडे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगारव्यवस्थपाकांनी दिली. ९० बसेस आगारात दिवसभर उभ्या होत्या. दुपारनंतर बाजारपेठेत गर्दी दिसू लागली होती.

दिंडोरीत रास्ता रोको

दिंडोरी : महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत दिंडोरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून मोर्चा काढत दिंडोरी चौफुलीवर काही काळ रास्ता रोको करण्यात आला. येथे आंदोलकांनी तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोल‌सि निरीक्षक राजेश शिरसाठ यांना निवेदन दिले.

कळवणमध्ये मोर्चा

कळवण ः कळवण शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोल‌सि निरीक्षक सुजय घाटगे यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. मोर्चाप्रसंगी व्यापारी वर्गाला दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. कळवणला बुधवारी आठवडे बाजार असतो. मात्र बंदमुळे या बाजारावर परिणाम झाला.

मनमाड दुसऱ्या दिवशीही बंद

मनमाड ः कोरेगाव भीमा येथील घटनेचे सलग दुसऱ्या दिवशी मनमाड शहरात तीव्र प्रतिसाद उमटले. मंगळवारी बंद आंदोलन झाल्यानंतर बुधवारीही मनमाड बंदला शहरात प्रतिसाद मिळाला. रिक्षा, टॅक्सी तसेच व्हॅन वाहतूकदारही बंदमध्ये सहभागी झाल्याने बंदचा प्रभाव वाढला. बुधवारी सकाळी शहरात व्यापारी वर्गाने दुकाने उघडली. महाराष्ट्र बंदमुळे संभ्रमाचे वातावरण होते. मात्र शहरात विविध घोषणा मोर्चे निघाल्यामुळे मनमाड बंदचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे शहर काही मिनिटांत बंद झाले. आंदोलकांपैकी काहींनी दुकाने बंद करण्याबाबत अपशब्द व दमदाटी केल्याचा आरोप करीत व्यापारी महासंघ पदाधिकारी व सदस्यांनी पोल‌सि ठाण्यावर मोर्चा काढला. बंदबाबत योग्य निर्णय व तोडगा काढण्याची तसेच बंद काळात दुकानांना संरक्षण देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. यानंतर मनमाड पोल‌सि ठाण्यात रिपाइंसह विविध राजकीय पक्ष संघटना नेते व व्यापारी वर्ग प्रतिनिधी यांची बैठक झाली. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी अखेर हा तोडगा स्वीकारला.

येवल्यात बंद शांततेत

येवला ः बंदच्या हाकेला येवल्यातील व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. येवला शहरात सकाळपासून दुकाने बंद ठेवण्यात आली. शहरातील विंचूर चौफुलीवरील
डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक जमलेल्या भीमसैनिकांनी घोषणाबाजी केली. सकाळी शहरातून फेरी काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदमुळे एटीएममध्ये खडखडाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद शहरातही उमटल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर झाला. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील एटीएममध्ये खडखडाट झाला असून, पैसे मिळवण्यासाठी नागरिकांना ठिकठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत.

एटीएममधून होणारा रोकड पुरवठा अद्याप सुरळीत सुरू झालेला नाही. बुधवारीही अनेक एटीएममधून रोकड मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. बँकांकडे मुबलक पैसा आहे; परंतु दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे एटीएममध्ये पैसे टाकणे शक्य झाले नाही. बंदच्या काळात रोख रक्कम बाहेर घेऊन जाणे धोक्याचे होते. अशा वेळी जाण्यास सुरक्षा अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे नोटा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. गुरुवारपासून व्यवहार सुरळीत झाले असून, सकाळपासून एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम सुरू झाले होते. संपूर्ण दिवसात सर्वच एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर नागरिकांना उपलब्ध होईल. बंदच्या पार्श्वभूमीवर ज्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक आहेत, तेथील व्यवहार सुरळीत चालू होते; परंतु ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत, अशा ठिकाणी एटीएम बंद करण्यात आले.

अनेकांचे १ तारखेला पगार झाले आहेत. अशा वेळी हाताशी रोकड असावी म्हणून, खर्चण्यासाठी आयत्या वेळेस पैसे काढता येतील या भरवशावर एटीएमवर अवलंबून राहणे लोकांना महागात पडत आहे. लोकांना महिन्याची खरेदी करायची असल्याने रोखीची गरज वाढली आहे. अशा काळात बव्हंशी एटीएम कोरडीठाक असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दिवसभर बंदचे वातावरण असल्याने बॅँकाना एटीएममध्ये पैसे टाकणे शक्य झाले नाही; परंतु ज्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, त्याच दिवशी जर एटीएममध्ये पैसे टाकले असते तर नागरिकांना मनस्ताप झाला नसता.

गंगापूर रोडवर असलेले एटीएम बंद होते. जी एटीएम सुरू होती तेथे रक्कम उपलब्ध नव्हती. त्यामुळे मोठी पंचाईत झाली. खात्यात पैसे असूनही लोकांकडे मागण्याची वेळ आली.

- सुषमा देसाई, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅप्रेंटिसशिप करणाऱ्यांना संधी द्यावी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस झालेल्या तरुणांना संधी मिळावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी नवी दिल्लीत केली आहे. खासदार रक्षा खडसे यांनी नवी दिल्लीत रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विन लोहानी यांची भेट घेतली. या वेळी खासदार प्रल्हाद जोशी, खासदार आगंडी, शिवकुमार उदासी तसेच रेल्वे बोर्डाचे सदस्य उपस्थित होते.

रेल्वेमंत्र्यांना २६ ऑक्टोबर २०१७ ला लिहिलेल्या पत्रात खासदार रक्षा खडसे यांनी ही मागणी केली होती. त्यात त्यांनी रेल्वे अॅप्रेंटिस पूर्ण झालेल्या तरुणांवर रेल्वेचा मोठ्या प्रमाणात पैसे व वेळ खर्च झालेला आहे.

या तरुणांना रेल्वेत संधी मिळाली पाहिजे, असे म्हटले होते. रेल्वेच्या सेवा अडथळ्याविना व सुरळीत चालाव्यात यासाठी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे ठरविले आहे. अॅप्रेंटिस झालेल्या तरुणांची घरची परिस्थिती गरीब असून, त्यांचे वय वाढत जात आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्मचाऱ्यांऐवजी माणुसकीच्या भूमिकेतून या तरुणांना संधी मिळावी, अशी मागणीही खासदार रक्षा खडसे यांनी केली.

दीड लाख मनुष्यबळाची कमतरता

प्राप्त माहितीनुसार रेल्वेतील सर्व विभागातील अॅप्रेंटिस पूर्ण झालेल्या तरुणांची संख्या सुमारे २१ हजाराच्या आसपास आहे. वेगवेगळ्या विभागात ग्रुप डी सुरक्षा विभागात सुमारे दीड लाख मनुष्यबळाची कमतरता आहे. खासदार खडसे यांनी रेल्वे मंत्र्यांच्याकडे अॅप्रेंटिसशिप झालेल्या तरुणांना २० टक्के आरक्षणाच्या अटीतून एकदा सवलत मिळावी व त्यांना रेल्वेच्या सेवेत घ्यावे, अशीही मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपिकाबाईंचे दहनस्थळ कधी होणार संरक्षित?

0
0

वर्षभरानंतर

---

गोपिकाबाईंचे दहनस्थळ कधी होणार संरक्षित?



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्राचीन काळाच्या अनेक खुणा अद्याप अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या गोदाघाटावरील पेशवा गोपिकाबाई यांचे दहनस्थळ मात्र संरक्षित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. गोपिकाबाईंची देवडी आणि दहनस्थळ हा अनमोल ठेवा पुरातत्त्व खात्याने संरक्षित करावा, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.

गोदाघाटावर महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे सुबक मंदिर आहे. या मंदिराशेजारीच गोपिकाबाईंची देवडी आहे. या देवडीत मारुती कोरलेला असून, तेथे रोजच पूजाअर्चा होते. या देवडीवर एक प्राचीन शिवलिंग असून, त्याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. या शिवलिंगाचीही रोजच पूजा होते. गोपिकाबाई या नानासाहेब पेशव्यांच्या धर्मपत्नी. मुलगा नारायणराव यांच्या मृत्यूनंतर अंतःस्थ कलहाला विटून त्यांनी नाशिकला कायमचे राहणे पक्के केले. त्यांच्याकडे असलेला सरंजामाप्रमाणे फौजफाटा माधवरावांनी जप्त केल्याने गोपिकाबाई अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी गंगापूरला येऊन बस्तान ठेवले. गोदावरी तीरावर गंगागोदावरी मंदिर बांधण्यात आले. त्यांच्या नित्य-नैमित्तिक पूजेसाठी होळकर पुलाखाली ही देवडी बांधण्यात आली होती. मात्र, आता तेथे केवळ एक भिंत उरली आहे. या देवडीशेजारीच पेशवा गोपिकाबाईंचे दहनस्थळ आहे. अहिल्याबाई होळकर पुलाखाली असलेले हे दहनस्थळ म्हणजे चौसोपी तुळशी वृंदावन असून, ते संपूर्णपणे दगडात कोरलेले आहे. तुळस लावण्यासाठी छोटेखानी जागादेखील या वृंदावनात आहे. महापालिकेला या प्राचीन काळाच्या खुणा जपण्याचे भान नाहीच, परंतु त्याचा बट्ट्याबोळ होण्यासाठी मात्र ती कारणीभूत ठरणार आहे. सध्या हे दहनस्थळ पाण्याखाली असून, त्याला कोणतेच संरक्षण नाही. त्यामुळे इतिहासाच्या प्राचीनत्वालाच धक्का बसत आहे. हे ठिकाणी पुरातत्त्व खात्याने संरक्षित करावे, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.

---

गोपिकाबाईंचे दहनस्थळ हे पेशव्यांचे मोठे स्मारक आहे. ते नष्ट होत असेल, तर संस्कृतीचा मोठा ठेवा नष्ट होईल. पुरातत्त्व खात्याने याकडे लक्ष द्यावे, असे वाटते.

- देवेन्द्रनाथ पंड्या, इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांना अंघोळीला मिळणार गरम पाणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पाच वर्षांपासून बंद पडलेली नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सोलर सिस्टिम सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा सुरू केल्याने कैद्यांना अंघोळीला गरम पाणी मिळणे सुरू झाले आहे. महिला कैदी, त्यांची लहान मुले, वृद्ध कैदी यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिकरोड कारागृहात तीन हजारांवर कच्चे व पक्के कैदी आहेत. त्यामध्ये महिलांचे प्रमाण शंभरावर आहे. त्यांची लहान मुले त्यांच्यासमेवत असतात. आजारी व वृद्ध कैद्यांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्वांना अंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यांच्यासाठी चार ठिकाणी सोलर सिस्ट‌िम बसविण्यात आली आहे. महिला कैद्यांसाठी एक, रुग्णालयात व स्वयंपाक घरात प्रत्येकी एक सोलर आहे. प्रत्येकाची क्षमता दोनशे ल‌िटर आहे. किरकोळ तांत्रिक दोषामुळे सोलर सिस्टीम २०१२ पासून बंद होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवूनही दुरूस्त होत नव्हती. सध्या नाशिकचे तापमान आठच्या जवळपास आहे. सकाळी व सायंकाळी कडाक्याची थंडी असते. थंडीत अंघोळ करणे दिव्यच होते. कैद्यांना पाच वर्षे थंड पाण्याने अंघोळ करावी लागत होती. पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ती सुरू केली. सोलरचे पाइपही बदलण्यात आले आहेत.

ब्रिट‌िशकालीन गटारी

कारागृतील भूम‌िगत गटारी ब्रिट‌िशांच्या काळात तयार करण्यात आल्या आहेत. नव्वद वर्षांपासून त्याच गटारी वापरात आहेत. नव्या गटारींसाठी ८६ लाखांचा निधी हवा आहे. पैकी २३.६१ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. या निधीतून ५६३ मीटरची ४५० मिमीची भूम‌िगत गटार केली जाणार आहे. उर्वरित निधीतून ३१५५ मीटर लांबीची गटार बांधली जाणार आहे. जेलच्या आत आणि बाहेर हे काम केले जाणार आहे. गेल्या महिन्यात आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते भूम‌िपूजन करण्यात आले. परंतु, निधी मिळालेला नाही. महिला कारागृहासाठी भिंत उभारणे, कारागृहाच्या आतील व बाहेरील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, गेटजवळ गट्टू टाकणे गरजेचे आहे. त्याचे प्रस्ताव मंजूर झाले असले तरी निधी अभावी ही कामे रखडलेली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.च्या बारा शाळांना सौरपॅनल

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यात आल्यानंतर या शाळा ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हाव्या म्हणून आता लोकसहभागातून सौरऊर्जा वापराचा प्रयत्न केला जात आहे. त्याची सुरुवात साक्री तालुक्यातील निजामपूर येथून करण्यात आली. सौरशाळेसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून जिल्हा परिषदेच्या १२ शाळांना सौरपॅनल किटचे वितरण नुकतेच करण्यात आले. या सौरशाळेसाठी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानसह क्वॉलिटी सोशल ग्रुपने आर्थिक मदत दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील शाळांची वाटचाल सौरशाळांच्या दिशेने सुरू झाली आहे.

साक्री तालुक्यातील निजामपूर येथे डिजिटल झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी लोक सहभागाचे आवाहन केल्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानने २ लाख ५३ हजार रुपयांचे योगदान दिले. तर क्वॉलिटी सोशल ग्रुपने कै. राहुल रामचंद्र राणे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त १ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. या मदतीने निजामपूर येथील मुला-मुलींची उर्दू शाळा, जैताणे येथील मुला-मुलींची उर्दू शाळा, वाघापूर, रोजगाव, खुडाणे, रांजणीपाडा, भामेर, आखाडे येथील एकूण १२ जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळा आता सौरशाळा होणार आहेत. शाळांना सौर पॅनेल वितरण कार्यक्रमावेळी आदर्श संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र शहा, धनाई-पुनाई संस्थेचे अध्यक्ष बाळूशेठ विसपुते, जि. प. सदस्या उषाबाई ठाकरे, इंदुबाई खैरनार, नगरसेवक सुमीत नागरे, पं. स. सदस्या सुनीता बच्छाव, निजामपूर सरपंच साधना राणे, जैताणे सरपंच संजय खैरनार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज चोकअपने हाल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या सातपूर कॉलनीसह परिसरातील कामगारनगरी काही महिन्यांपासून ड्रेनेज चोकअपच्या समस्यने त्रस्त झाली आहे. या भागात वारंवार ड्रेनेज चोकअप होऊन सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहत असल्याने वाहनचालकांसह पायी चालणाऱ्यांना त्याचा, तसेच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील ड्रेनेजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सातपूर कॉलनीत ८० लाखांचा निधी खर्च करून, तसेच म्हाडा वसाहतीतही नव्याने सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु, अत्यंत जुन्या असलेल्या मोठ्या ड्रेनेज लाइन सतत चोकअप होत असल्याने त्यादेखील बदल्याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. चोकअप काढण्यासाठी जेट मशिनचा वापर करताना सिमेंटचे पाइप फुटण्याचीदेखील शक्यता असते. ही बाब ध्यानात घेऊन महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कर्मचारी ड्रेनेज चोकअप काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही रहिवासी नको त्या वस्तू ड्रेनेजमध्ये टाकत असल्याने मोठ्या सांडपाण्याचे ड्रेनेेज चोकअप होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

सातपूर एमआयडीसीत कारखान्यांचे मोठे जाळे पसरलेले असून, येथे राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून कामगार दाखल झालेले आहेत. एमआयडीसीला लागून सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात कामगारांसाठी सातपूर कॉलनीत म्हाडाने मोठी वसाहत उभारली. अगदी आठ हजाराच्यांच्या स्कीमपासून ९६ हजारांच्या स्कीमपर्यंत म्हाडाने कामगारांना घरे उपलब्ध करून दिली. कालांतराने कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत असताना कामगारनगरी असलेल्या सातपूर कॉलनीतील रहिवाशांनी त्यांना पाहिजे त्या प्रमाणात घरांचा विस्तार केला होता. घरांची बांधकामे करताना ड्रेनेजवरच अनेकांनी पक्की बांधकामे केल्याने ड्रेनेज चोकअप झाल्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरतही करावी लागत आहे.

जुन्या झालेल्या ड्रेनेज लाइन बदलण्यासाठी माजी नगरसेविका उषा शेळके व मनसे गटनेते सलिम शेख यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे ८० लाखांहून अधिक निधी नवीन ड्रेनेज टाकण्यासाठी उपलब्ध होऊन कामही करण्यात आले होत्या. परंतु, अनेक चौकांत ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने त्या ठिकाणी आजही जुन्याच लाइनमधून सांडपाणी वाहत असते. परंतु, यात मुख्य ड्रेनेज लाइन नेहमीच चोकअप होत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. सांडपाणी उघड्यावरून वाहत असल्याने वाहनचालक व पायी चालणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. छोट्याशा असलेल्या म्हाडा वसाहतीतील घरकुलांचे रुपांतर इमारती व बंगल्यांमध्ये झाले आहे. त्यामुळे साहजिकच मुख्य जुन्या असलेल्या ड्रेनेज लाइनवर सांडपाण्याचा अतिरिक्त भार येतो. त्यातच ड्रेनेज लाइनमध्ये नको त्या वस्तू टाकल्या जात असल्याने सतत ड्रेनेज चोकअप होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये केवळ सांडपाणीच टाकावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे.

---

यामुळे उद््भवतेय समस्या

सातपूरमध्ये उभारलेल्या वसाहतींत सांडपाण्याची व्यवस्था म्हाडाने केली असली, तरी रस्ते, पाणी व वीज महापालिकेने उपलब्ध करून दिली होती. कालांतराने सांडपाण्यासाठी म्हाडाने उभारलेल्या टाक्या कमकुवत झाल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने ड्रेनेजची पाइपलाइन टाकून रहिवाशांच्या ड्रेनेजचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांना त्याचा मोठा फायदाही झाला. मात्र, नंतर अतिक्रमणे अाणि सांडपाण्याचे प्रमाण वाढल्याने वारंवार ड्रेनेज चोकअपची समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images