Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दुचाकीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शैक्षणिक सहलीवरून परतलेल्या विद्यार्थिनीचा घरी पोहोचण्यापूर्वीच दापूर-सिन्नर रस्त्यावर दुचाकीच्या धडकेने अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अश्विनी सोपान आव्हाड (वय १७, रा. दापूर) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.

येथील आदिती महाविद्यालयात विज्ञान शाखेत बारावीच्या वर्गात अश्विनी शिक्षण घेत होती. महाविद्यालयाची तीन दिवसांपूर्वी आळंदी आणि अन्य ठिकाणी शैक्षणिक सहल गेली होती. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास सहलीसाठी गेलेल्या बसेस गावात परतल्या. पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी गावात पोहोचले होते. अश्विनीचे वडील सोपान आव्हाड हेही दुचाकीवरुन तिला घेण्यासाठी गावात पोहोचले. दरम्यान वडिलांच्या दुचाकीवर बसण्यापूर्वीच रात्री दापूरकडून सिन्नरकडे भरधाव वेगात आलेल्या संदीप पालवे (वय २६) यांच्या दुचाकीने अश्विनीला जोराची धडक दिली. अश्विनीला उपचारासाठी तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना त‌िची प्राणज्योत मालविली. पालवे यांच्या विरोधात वावी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेठजवळ भूकंपाचे सौम्य धक्के

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरापासून ४० किलोमीटरवर भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सकाळी पावणेदहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जम‌िनीला हादरे बसल्याचे, तसेच भिंती, दरवाजे, खिडक्यांची तावदाने हलल्याचे सांगितले जात आहे.

सुरुवातीला साधारणत: तीन मिनिटांच्या कालावधीत जमीन हादरली. त्यानंतर पुन्हा दोन धक्के बसले. त्याची तीव्रता अनुक्रमे १.३ व १.६ रिश्टर स्केल इतकी होती. अलीकडेच कळवण तालुक्यातील दळवटसह काही गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. आता पेठजवळ धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाचे निश्‍चित केंद्र माहीत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास नको

भुकंपाचे धक्के जाणवले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. या धक्क्यांची तीव्रता अतिशय कमी होती. त्यामुळे जीवीत वा वित्तहानी झालेली नाही. या भुकपांचे केंद्र शोधण्याचे काम सुरू आहे. वारंवार असे धक्के जाणवल्यास नागरिकांनी मोकळ्या जागी स्थलांतरीत होऊन तात्काळ तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवकांना संपर्क करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या मुलीनंतर सावत्रभावाचीही आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील १४ वर्षीय अल्पवयीन गर्भवती मुलीच्या आत्महत्येनंतर सहाव्याच दिवशी सोमवारी तिच्या सावत्रभावानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदाम रामभाऊ निकम असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आत्महत्यामागचे कारण शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील २३ वर्षीय शेतमजूर तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी सावरगाव येथील स्मशानभूमीनजीकच्या लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुदाम रामभाऊ निकम असे या तरुणाचे नाव असून, त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदाम हा दुसऱ्याच्या शेतात मजुरी करीत असून, बहिणीच्या आत्महत्येनंतर त्यानेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सुदामची चौदा वर्षीय बहीण सावरगाव येथे आठवीत शिकत होती. तिने १३ डिसेंबर रोजी विष प्राशन केल्यानंतर तिला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तिने १६ डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर २० डिसेंबर रोजी या मुलीचाही दवाखान्यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली होती. दोन दिवसांनी मुलीच्या वडिलांनी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचे व तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, बहिणीच्या आत्महत्येनंतर सहाव्याच दिवशी सोमवारी तिच्या सावत्रभावानेही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलीवर बलात्कार कोणी केला?

सुदाम अविवाहित होता. त्याच्या आत्महत्येसह आठवीतील मुलगी, तिचे बाळ अशा तिघांचा १६ ते २५ डिसेंबर या दहा दिवसांच्या काळात मृत्यू झाला. आठवीतल्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचा तपास लावणे आणि मुलीच्या सावत्रभावाने आत्महत्या का केली, याचे कारण शोधणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉर्निअर विमानाची ऑफर

$
0
0

एअर डेक्कनला विमान देण्याचा एचएएलकडून प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने तयार केलेल्या १९ आसनी डॉर्निअर विमानासाठी एअर डेक्कन कंपनीला ऑफर दिली आहे. कंपनीने हे विमान भाड्याने घ्यावे आणि प्रवासी विमानसेवा द्यावी, असा प्रस्ताव एचएएलने एअर डेक्कनला दिला आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

एअर डेक्कन कंपनीने उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यांतर्गत विमानसेवा देण्यासाठी प्रस्ताव दिला. तो मंजूर झाला. त्यानुसार भारतातील ३६ हून अधिक ठिकाणांसाठी एअर डेक्कनच्यावतीने सेवा दिली जाणार आहे. यासाठीच कंपनीने १९ आसनी विमानाची खरेदी केली आहे. दक्षिण आफ्रिकेहून कंपनीने दोन विमाने आणून सेवा सुरू केल्याचे सांगितले जात आहे. जळगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचा शुभारंभ शनिवारी नाशिक व जळगावमध्ये झाला. याप्रसंगी एअर डेक्कनचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॅप्टन गोपीनाथ आणि एचएएलचे चेअरमन टी सुवर्ण राजू हे उपस्थित होते. याच सोहळ्याची दखल घेत एचएएलने डॉर्निअर हे विमान ओझर एचएएलच्या विमानतळावर आणले होते. या विमानाची निर्मिती कानपूर येथे झाली आहे. अशा प्रकारच्या डॉर्निअर विमान एचएएलने नौदल आणि हवाई दलाला दिले आहेत. आता हेच विमान प्रवासी वाहतूकीसाठी निर्माण करण्यात आले आहे. एचएएलकडे सध्या दोन डॉर्निअर विमाने आहेत. यातील एक विमान एअर डेक्कनने भाड्याने घ्यावे, असा प्रस्ताव एचएएलने एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांना दिली आहे. डॉर्निअर हे विमान गोपीनाथ यांना ओझर येथे दाखविण्यात आले आहे.

सारे काही एचएएल करणार

डॉर्निअरसारख्या छोट्या विमानाची निर्मिती करून देशातील प्रवासी विमान वाहतुकीसाठी योग्य ती सुविधा निर्माण करण्याचा एचएएलचा प्रयत्न आहे. छोट्या विमानांद्वारे छोट्या शहरांना आणि वापराविना पडून असलेल्या विमानतळांना फायदा होणार आहे. त्याअनुषंगानेच एचएएलने डॉर्निअर विमानाचे मार्केटिंग सुरू केले आहे. भारतात निर्मिती झालेले हे अशा प्रकारचे पहिलेच प्रवासी विमान आहे. हे विमान भाड्याने दिले तरी त्याची देखभाल, दुरुस्ती एचएएलच करणार आहे.

डॉर्निअर विमान विक्री करण्यासह ते भाड्याने देण्याचाही आमचा विचार आहे. साधारण ५० कोटी रुपये किमतीचे हे विमान आहे. इच्छुकांनी आमच्याशी संपर्क करावा. जर कुणी ग्राहक मिळाला नाही तर एचएएल स्वतः प्रवासी विमानसेवा देईल. त्यासाठी योग्य त्या परवानग्या घेण्याचे कामही आम्ही करीत आहोत.

-टी सुवर्ण राजू, चेअरमन, एचएएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीमियम दरवाढीसाठी आमदारांना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संभाव्य प्रीमियम दरवाढीमुळे शेतकऱ्यांसह विकसकांनाही फायदा होणार असल्याने महापालिकेच्या या सूचनेचा लोकप्रतिनिधी या नात्याने सकारात्मक विचार करावा , असे साकडे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सोमवारी भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांना घातले.

मनपा प्रशासनाने सुचविलेली प्रीमियम दरवाढ लागू करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सानप यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. या संभाव्य प्रीमियम दरवाढीमुळे आरक्षित जमिनी असलेल्या शेतकऱ्यांचे, नाशिक मनपाचे ७० टक्के प्रीमियम दर करूनही पूर्वीच्या तुलनेत ३० टक्के दराने स्वस्त टीडीआर उपलब्ध होणार आहेत. रोखीने मोबदला दिल्यास महापालिकेला आरक्षित जागा ताब्यात घेताना मोठ्या प्रमाणात खर्च होतो, तर टीडीआमुळे महापालिकेच्या खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचतच होते. गेल्या सतरा वर्षांच्या कालावधीत २१ कोटी ८८ लाख ३१६ चौरस मीटर इतके क्षेत्र महापालिकेने काहीही रक्कम खर्च करता ताब्यात घेतले. त्याची किंमत सुमारे २१८८ कोट रूपये इतकी होती. परिणामी महापालिकेची प्रतिवर्षी १२९ कोटी रूपयांची बचत होऊ शकली असाही तपशील या निवेदनात मांडण्यात आला आहे. याउलट प्रीमियम एफएसआय ४० टक्कयांवरून ७० टक्के केल्यास टीडीआरला भाव मिळू शकेल आणि शेतकरी आरक्षित जागेचा टीडीआर घेतील. परिणामी महापालिकेस मोबदल्याची आर्थिक झळही सोसावी लागणार नाही व ३० टक्के अधिक निधी मनपाच्या तिजोरीत जमा होणे शक्य होईल. याचा उपयोग स्मार्ट सिटीच्या संकल्पनेसाठीही होऊ शकतो, असे म्हटले आहे. या निवेदनावर कुंदन मौले , बाबासाहेब विधाते, वैभव विधाते आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम संस्थेस भागीदाराकडून चुना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भागीदारी तत्त्वावर सुरू केलेल्या बांधकाम व्यवसाय संस्थेस भागीदारानेच चुना लावल्याचे समोर आले आहे. अधिकार नसताना सदनिका विकून पैशांचा अपहार करत संस्थेची व खरेदीदाराची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण जगन्नाथ शिलेदार असे या फसवणूक करणाऱ्या भागीदाराचे नाव आहे.

नीलेश जयंतीलाल चंदन (वय ३७, मुलुंड पश्चिम, मुंबई) या बांधकाम व्यावसायिकाने नाशिकरोड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. यानुसार नाशिकमधील किरण जगन्नाथ शिलेदार, तेजस शिवाजी खांदवे आणि ऋतुजा तेजस खांदवे या तिघा बांधकाम व्यावसायिकांसोबत भागीदारी तत्त्वावर डिसेंबर २०१२ मध्ये बांधकाम व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक करून मे. साई आकृती इस्टेट या बांधकाम संस्थेची सुरुवात केली होती. त्यानंतर या बांधकाम संस्थेने देवळालीगाव शिवारातील आनंदनगर येथे सर्व्हे नं. २९ मधील फ्लॉट नंबर एक विकत घेऊन त्यावर साई रेस‌िडेन्सी या इमारतीची उभारणी केली होती. या इमारतीतील सदनिकांची विक्री व हिशेबाचे अधिकार सर्वानुमते संस्थेतील भागीदार किरण शिलेदार यास दिलेले होते. या अधिकारांचा किरण शिलेदार याने गैरवापर करून सदनिका विक्री करताना रोख स्वरुपात पैसे स्वीकारले. या व्यवहारातील पैसे किरण शिलेदार याने संस्थेच्या बँक खात्यावर भरले नसल्याचे उघड झाल्याने मे २०१५ मध्ये किरण शिलेदारचे अधिकार संस्थेने काढून घेतल्याचे त्याला लेखी कळविले होते. असे असतानाही शिलेदार याने साई रेसिडेन्सी या इमारतीतील ७०२ क्रमांकाची सदनिका सप्टेंबर २०१५मध्ये प्रसाद मोरेश्वर अडमाने या ग्राहकास ५५ लाख रुपयांना परस्पर विक्री केली. शिवाय मे २०१७ मध्येही किरण शिलेदार याने सुधीर जगन्नाथ सिंग, रा. बख्तवली, ता. जि. सिवान (बिहार) या ग्राहकास साई रेसिडेन्सी या इमारतीतील फ्लॅट क्रं. ४०३ हा १९ लाख रुपयांना विक्री केला. या रकमेपैकी किरण शिलेदार याने पाच लाख रुपये चेकद्वारे, तर १४ लाख रुपये रोखीने स्वीकारत रकमेचा अपहार केला. याशिवाय भागिदारीत सुरु केलेल्या बांधकाम संस्थेच्या घटनेतील तरतुदींचेही उल्लंघन करून तेजस खांदवे, ऋतुजा खांदवे आणि सदनिका विक्री केलेल्या ग्राहकांची फसवणूक केली असल्याची फिर्याद नीलेश चंदन यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलिसांनी किरण शिलेदार या बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच पक्षाच्या नगरसेवकांचा कामांवर दावा

$
0
0

राजन जोशी, सिडको

सिडकोत सध्या विकासकामांच्या श्रेयावरून नगरसेवकांमध्ये चांगलेच राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्येही वादविवाद सुरू झाल्याने प्रत्येक पक्षात गटातटाचे राजकारण आजही सुरु असल्याचे वारंवार नागरिकांच्या लक्षात येत आहे.

सोशल मीड‌ियाच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाची जाहिरात करण्याबरोबर हे काम आपणच केल्याचा दावा नगरसेवक करू लागले आहेत. सध्या केवळ श्रेयवादावरून लढाई सुरू झाली असली, तरी भविष्यात एकाच कामाचे दोनदा उद्घाटन झाले तर नागरिकांना आश्‍चर्य वाटणार नाही.

सिडकोतील सर्वच प्रभागांमध्ये रस्त्यांची परिस्थितीही ही गंभीर झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यांच्या विकासावरूनही राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. येथील प्रभाग २४ मध्ये मागील काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर याच प्रभागातील अन्य एका नगरसेवकाने हे काम आपण मंजूर केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर या प्रभागात तीन नगरसेवक एकाच पक्षाचे असूनही त्यांच्यात समन्वय होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नक्की तक्रार कोणाकडे करावी यावरून नागरिकांचा संभ्रम होतो. या प्रभागात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाची दुरवस्था झालेली असून, येथे अनेकदा नागरिक किंवा काही स्वयंसेवी संस्था स्वच्छता मोहीम राबवितात. मात्र, या प्रभागाचे तीनही नगरसेवक या उद्यानाच्या देखभालीकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर याठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकाची गरज निर्माण झाली आहे. या उद्यानात अनेकदा मद्याच्या बाटल्यासुद्धा आढळून आल्या होत्या. विकासाची संधी असलेल्या या प्रभागात तीनही नगरसेवकांनी एकत्रित काम केल्यास प्रभागातील सर्वच समस्या दूर होतील. याच प्रभागातील भाजी मार्केटमध्ये होणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्‍न प्रलंबित असून, केवळ एकच नगरसेवक यासाठी आवाज उठवित आहे. याच मार्केटजवळ असलेल्या एका अर्धवट बांधकामाच्या इमारतीमुळे दुर्गंधीयुक्त पाणी या इमारतीत साचून राहते. त्यामुळे या इमारतीबाबात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे साथीचे रोगसुद्धा परिसरात वाढले आहेत.

नगरसेवकांमध्ये विसंवाद

नगरसेवकांनी या प्रभागात दोनदा आयुक्तांचा दौरा घडवून आणला होता. मात्र, त्यात तीनही नगरसेवक एकत्रित नसल्याने एकही मुद्दा अद्याप मार्गी लागला नसल्याचे दिसत आहे. सिडकोतील केंद्रबिंदू असलेल्या या प्रभागातच मागील महिन्यांत सर्वाधिक डेंग्यूंचे रुग्ण आढळून आले होते. यावेळीसुद्धा प्रत्येक नगरसेवकाने स्वतंत्र पाहणी केल्याने ठोस कारवाई होण्यास वेळ गेला. सुरुवातीला एका नगरसेविकेने याबाबत आवाज उठविला, तर दुसऱ्या वेळी आरोग्य सभापती आल्यानंतर दुसरेच नगरसेवक याठिकाणी उपस्थित राहिल्याने प्रभागातील नगरसेवकांची एकी दिसून आली नसल्याची चर्चा जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांमुळे बहरली धार्मिक पर्यटनस्थळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महिन्यातील चौथा शनिवार, रविवार आणि नाताळ अशा सलग तीन सुट्या आल्यामुळे नाशिक शहर परिसरातील धार्मिक पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. पंचवटीतील रामकुंड, कपालेश्वर महादेव मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि तपोवन येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रासह गुजरात, राज्यस्थान आदी राज्यातून आलेल्या पर्यटकांनी धार्मिक पर्यटनाचा आनंद घेतला.

विविध धार्मिक विधींसाठी रामकुंडावर रोजच गर्दी होत असते. या गर्दीत सुट्ट्यांमुळे वाढ झाली. रामकुंडावर स्नान आणि त्यानंतर परिसरातील मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी गंगाघाट परिसरात लगबग होती. कपालेश्वर मंदिरातील पायऱ्यांवर रांगा लागल्या होत्या. अशाच रांगा सीतागुंफा आणि काळाराम मंदिरातही लागलेल्या होत्या. भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.

बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची मोठी वाहने गंगाघाट परिसरातील पार्किंगमध्ये पार्क करून धार्मिक पर्यटन स्थळावर हे भाविक आणि पर्यटक रिक्षांने जाणे पसंत करीत होते. या गर्दीमुळे रिक्षावाल्यांची दिवाळीच असल्याचे जाणवत होते. पर्यटकांच्या गर्दीबरोबरच मंदिराच्या आवारात रिक्षांचीही गर्दी झालेली होती. सीतागुंफा आणि काळाराम मंदिरातील दर्शनानंतर तपोवनातील कपिला संगमावरील श्रीरामपर्णकुटी आणि शूर्पनखा मंदिरातील दर्शनासाठी भाविक जात होते. सध्या गोदावरीला पाणी सोडण्यात नसल्यामुळे कोरड्या पडलेल्या गोदावरीचे दर्शन घेण्याचे वेळ भाविकांना आणि पर्यटकांना आली. त्यामुळे काही भाविकांनी नाराजी व्यक्त केले.

रेल्वेला गर्दी
सलग तीन दिवस शासकीय सुट्या जोडून आल्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकात गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वेला चांगला महसूल मिळाला. रिक्षा, एसटी तसेच नाशिकरोड स्थानकासह परिसरातील व्यावसायिकांना अच्छे दिन आले.

चौथा शनिवार, रविवारची साप्ताहिक सुटी आणि सोमवारी नाताळ अशा तीन सुट्यांमुळे नाशिककरांनी मुंबई व अन्य पर्यटनस्थळी जाण्याला पसंती दिली. मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, गोदावरी आणि पंचवटी या गाड्यांना विशेष गर्दी झाली होती. अनेकांनी उभे राहून प्रवास केला. नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज शंभरावर रेल्वेगाड्यांची ये-जा असते. त्यामध्ये मध्यम बरोबरच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. दररोज सरासरी पंधरा हजार प्रवासी नाशिकरोड स्थानकातून प्रवास करतात असे सूत्रांनी सांगितले.

गेले तीन दिवस शासकीय सुटी असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळ झाली. रेल्वे हा देखील शासकीय उपक्रम आहे. मात्र, रेल्वे अत्यावश्यक सेवा प्रकारात मोडत असल्याने हे कर्मचारी ड्युटीवर हजर होते. तिकीट तपासणीस, बुकिंग, पार्सल, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आदी विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. सुट्यांमुळे गर्दी वाढल्याने त्यांच्यावरील ताण वाढला होता. गर्दीच्या काळात पाकीटमार, गुंड प्रवृत्तीचे लोक उचल खातात. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस दक्ष होते. दरम्यान, रेल्वेस्थानकातील रिक्षा व टॅक्सी चालकांना गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मीदर्शन होत नव्हते. सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे त्यांचीही आर्थिक चणचण दूर झाली. स्थानकातच चहा, खाद्यपदार्थ विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले यांचाही चांगला व्यवसाय झाला. स्थानकातील कुलींनाही चांगली कमाई झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुग्णांनी सुविधांचा लाभ घ्यावा

$
0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धुळ्यात आवाहन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील कॅन्सरचा गरिबातला गरीब रुग्ण आर्थिक परिस्थितीअभावी वंचित राहता कामा नये. त्यासाठी सरकारच्या विविध योजना अंमलात आहेत. कुठलाही आजार असेल त्यासाठी मोफत उपचारांच्या सुविधा सरकारने उपलब्ध केल्या असून, त्या सुविधांचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सोमवारी (दि. २५) धुळ्यात खासगी हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.

देशासह राज्यभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पण कॅन्सरग्रस्त रुग्ण योग्य उपचाराने बरा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आशीर्वाद ही खरी डॉक्टरांची संपत्ती असते, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुरत-नागपूर महामार्गालगत शहराजवळील चक्करबर्डी परिसरात खान्देश कॅन्सर सेंटरचा भूमिपूजन सोहळादेखील झाला. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. बीना भामरे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार उपस्थित होते.

'बडबड करणाऱ्यांचे नुकसान होते'

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना, कॅन्सरतज्ज्ञ हा आकाशाकडे न पाहता खाली मान घालून शस्त्रक्रिया करतो. यातून त्या डॉक्टरांची नम्रता सिद्ध होते. जे अशारितीने काम करतात त्यांना यश निश्चित मिळते. मात्र जे अनावश्यक बडबड करतात त्यांचे नेहमीच नुकसान होते, असा टोला त्यांनी लगावला.

श्रेयाचा मुद्दा पुन्हा गाजला

सिंचन प्रकल्पाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील सिंचन प्रकल्पांना केंद्राची मान्यता मिळावी म्हणून मी व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला होतो. त्यावेळी पंतप्रधानांच्या सचिवांनी स्वत: विचारले की, मंत्री डॉ. भामरे यांचीही सिंचन प्रकल्पांची मागणी आहे. त्यावर मी सुलवाडे-जामफळ प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ प्रकल्पाला मंजुरीची तयारी दर्शविली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशामुळे मंत्री डॉ. भामरे यांनीच 'सुलवाडे-जामफळ'साठी निधी आणला असल्याचे स्पष्ट झाले. तर मुख्यमंत्र्यांच्या या प्रकल्पाच्या माहितीवरून आमदार अनिल गोटे यांचा फज्जा झाला आहे. कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार गोटेंनी पत्रकार परिषदेत या सिंचन प्रकल्पाबाबत श्रेयाचा मुद्दा उपस्थित केला होता.

शहरातील गजानन कॉलनीत २१ डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीची पोलिसांत नोंद होऊन पोलिसांनी निरपराधांवर भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केवळ दगडफेकीची असून, यासंदर्भात कलम ३०७ अन्यायकारक असल्याने ते वगळण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सही-शिक्क्याचा गैरवापर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभाग अपर आयुक्तांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून खोटी नोटीस पाठविल्याचा प्रकार नाशिक विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातील ग्रामपंचायत अपिल शाखेत उघडकीस आला आहे. विभागस्तरावरील अत्यंत संवेदनशिल अशा या कार्यालयाच्या सही शिक्क्यांचा बनावट नोट‌ीससाठी वापर करुन चक्क पोस्टाद्वारे नोटीस पाठविण्यात आल्याचा प्रकार अपर आयुक्तांच्या प्रसंगावधानाने उघडकीस आला. परंतु यामुळे बनावट नोट‌िसा पाठविणारे रॅकेट नाशिक विभागात कार्यरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकरोड येथे विभागीय अपर आयुक्त कार्यालय आहे. या कार्यालयात नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील महसूल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग या अपिलीय शाखांशिवाय इतर काही महत्त्वाच्या कायद्यांशी संबंधित अपील दाखल होतात. विशेष म्हणजे सध्याचे अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेली शेकडो अप‌िल अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत निकाली काढून शासनाच्या इ-डीसनिक प्रणालीवर नोंदविण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे अप‌िल निकाली काढण्यात नाशिक विभाग राज्यात अव्वल स्थानी पोहचण्यास मदत झाली. मात्र याच कार्यालयाचा बनावट शिक्का वापरुन चक्क अपर आयुक्तांच्या सहीचा वापर करुन बनावट नोटीस पाठविल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. या प्रकारामुळे अपर आयुक्त कार्यालय दक्ष झाले असून सरकारतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास आस्थापना शाखेतील कक्ष अधिकारी शरद शिवदास पवार यांनी अशा प्रकारची बनावट नोटीस तयार करणाऱ्या अज्ञाताविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अशी असते खरी नोटीस

नाशिक विभागीय अपर आयुक्त कार्यालयात दाखल नाशिक महसूल विभागातील अपिलांसंदर्भात पक्षकारांना विकास आस्थापना शाखेतील सहाय्यक गटविकास अधिकारी (प्रशासन) आपल्या सहीनिशी नोट‌िसा काढतात. नोट‌िसांवर विभागीय अपर आयुक्तांची नावानिशी सही नसते. मात्र जळगाव जिल्ह्यातील सावखेडेसीम येथील प्रकरणातील बनावट नोट‌िसीवर अपर आयुक्तांची सही व शिक्का असल्याने हा प्रकार उघड झाला.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या प्रकरणात बनावट नोटीस प्राप्त झाली आहे. कुणीतरी परस्पर अशा प्रकारची नोटीस पाठविली आहे. अशा प्रकारचे गैरकाम करणारी शक्ती भविष्यात बळावू नये यासाठी या बनावट नोटीस प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
- ज्योतिबा पाटील
(विभागीय अप्पर आयुक्त, नाशिक विभाग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ बनलाय अबोलांचे शब्द

$
0
0

नाशिक : मानवाच्या विकासात आधुनिक संसाधनांची कितीही रेलचेल असली तरीही त्याचा खरा विकास हा भाषेशिवाय शक्य नाही. मात्र, काहींच्या तोंडी निसर्गत:च भाषा प्रकटत नाही. दुर्दैवाचा कळस म्हणजे त्यांची श्रवणेंद्रियेही शब्दांना साद देण्यास समर्थ नसतात. अशाच अभागी माणसांच्या दुनियेत २७ वर्षांचा एक तरुण वावरतो, तो केवळ मूकबधिरांच्या दुनियेतील शब्द बनून. सचिन पाटील असे या तरुणाचे नाव. मूकबधिरांच्या जीवनात दुभाषीच्या भूमिकेत वावरत आशावाद फुलविण्याचा प्रयत्न सचिन करतो आहे. प्रथमदर्शनी कोणालाही ही व्यक्ती बोलते असे वाटणार नाही, इतका सहजपणा मूकबधिरांच्या खाणाखुणांच्या भाषेत त्याने अवगत केला आहे. त्यामुळेच दिव्यांग मेळाव्यांमध्ये तो प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय तो ठरतो आहे.

साधारण दहा वर्षांपूर्वी सचिनमधील सामाजिक भावना जागी करण्यास त्याच्या घराशेजारील एक मूकबधिर मुलगा कारणीभूत ठरला. कोणाशीही बोलताना या मुलाला कागद पेनचेच साह्य घ्यावे लागत होते. या अडचणीमुळे अनेकदा त्याने आपल्या भावना व्यक्त करणेही कमी केले. सचिनला या मुलाची परिस्थिती पाहवली नाही आणि त्याने त्याच्या खाणाखुणांची भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. अवघ्या चार महिन्यांत ही भाषा अवगत करून जेथे जेथे मूकबधिरांना गरज पडेल, तेथे धाव घेत त्याने मदत करणे सुरू केले. या संवेदनेच्या जोरावर मूकबधिरांच्या दुनियेतील विवाहेच्छू उमेदवारांच्या गाठीही या शब्दकळांच्या जोरावर बांधून अनोखे पुण्यही पदरात पाडले आहे. राज्यभरात दिव्यांगांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या वधू-वर परिचय मेळाव्यात मूकबधिर वर-वधूंच्या भावना पोहोचवण्यासाठी तो कोणत्याही अपेक्षेविना दाखल होतो. नाशिकमध्ये सोमवारी झालेल्या दिव्यांग मेळाव्यातही त्याने अशीच अचानक हजेरी लावली अन् मूकबधिर व्यक्तींच्या भावनांना शब्द दिले.

‘त्यांच्या’ रोजगारासाठीही काम

मूकबधिर व्यक्तींपुढे रोजगार मिळत नसल्याची समस्या जाणून घेत सचिन यांनी स्वतःच्या कपड्यांच्या दुकानात तीन मूकबधिर तरुणांना नोकरी दिली आहे. याशिवाय विविध ठिकाणी कपड्यांचे स्टॉल्स लावून त्याचे कामही अशाच व्यक्तींकडे त्याने दिले आहे. एकूण २५ मूकबधिर व्यक्तींना यातून त्यानी रोजगाराची संधी दिली आहे. मूकबधिरांसाठी सुरू असलेल्या या समाजकार्यामुळेच राज्यातील सुमारे दोन हजार मूकबधिरांशी सचिन पाटील जोडले गेले आहेत.

मूकबधिर मुलांच्या भावना जाणून घेत मी हे काम करतो आहे. यासाठी मी कधीही कोणाची आर्थिक, भावनिक मदत मागितलेली नाही. या मुलांसाठी काम करून मिळत असलेला आनंद कोणत्याही इतर गोष्टींपेक्षा मोठी आहे.

- सचिन पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात सायकलिस्ट्सची ‘सायकलिंग ब्रेव्हे’ पूर्ण

$
0
0

एक हजार किमीचे अंतर केले पार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली एक हजार किमी सायक्लिंग ब्रेव्हे सात सायकलिस्टसने निश्चित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्टसने या ब्रेव्हेसाठी नोंदणी करून सुरुवात केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी ६२ तासांत नाशिक - रतलाम (मध्य प्रदेश) - नाशिक हे एक हजार किमीचे अंतर पूर्ण केले. तर अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अॅड. दत्तात्रेय चकोर, पुण्याचे अमोल कानवडे यांनी ७४ तासांत, तर मुंबईचे सचिन भोसले यांनी ७४.५ तासांत ब्रेव्हे पूर्ण केली. शुक्रवारी (दि. २२) ही एक हजार किमीची ब्रेव्हे मुंबई नाका, नाशिक येथून सकाळी ६ वाजता सुरू करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरून सरळ मध्य प्रदेशातील मानपूर- रतलाम आणि पुढे नामली या नाशिकपासून ५०३ किमी अंतरावर असलेल्या गावातून यू टर्न घेत त्याच मार्गाने सायकलिस्टस नाशिककडे परतले. एकूण १००६ किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी ७५ तासांची वेळ दिलेली होती. यात झोप, पोषण आणि नैसर्गिक विधींना लागणाऱ्या वेळेचा समावेश आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ब्रेव्हेच्या मार्गावर एक वाहन उपलब्ध होते. यात निखिल भावसार आणि संदीप परब यांनी पूर्ण ७५ तास सायकलिस्टसची देखरेख पाहिली.

रिटर्न लूप

नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने डॉ. महेंद्र महाजन गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून सायकलिंग ब्रेव्हे सुरू केली आहे. हे ब्रेव्हे ऑडेक्स इंडिया रँडेनॉर आणि ऑडेक्स क्लब पॅरिसन, फ्रान्स यांच्याश संलग्न असून पहिली २०० किमीची ब्रेव्हे एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आली होती. यानंतर डॉ. महाजन यांनी नाशिक परिसरातील विविध मार्गांवर २००, ३००, ४०० आणि ६०० किमी ब्रेव्हे यशस्वीरित्या आयोजित केल्या आहेत. या सर्व ब्रेव्हेचे मार्ग नाशिक शहरातून सुरू होत शहरातच समाप्त होणारे (रिटर्न लूप) आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकांच्या आरक्षणावर पाल्यांचा डल्ला

$
0
0

नाशिक : सरकारी नोकरीत जातीनिहाय, तसेच प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक पाल्य, आर्थिकदृष्ट्या मागास आदी घटकांसाठी आरक्षणाचा कोटा ठरवून दिलेला असतो. त्याचा गैरफायदा नोकरीसाठी झालेल्या तीव्र स्पर्धेच्या वातावरणात घेतला जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

विशेषतः प्रकल्पग्रस्त आणि माजी सैनिकांच्या आरक्षणासंदर्भात नियमांची मोडतोड केली जात असल्याचे उघड होत असून, गेल्या काही दिवसांत आरोग्य खात्यात झालेल्या भरतीप्रक्रियांमध्ये आरक्षणाची संशयास्पद कागदपत्रे सादर झाली आहेत. मात्र, त्याची चौकशी करण्याची तसदी घेतली जात नाही. कामगार विमा योजनेंतर्गत ईएसआयएसी हॉस्पिटलमध्ये परिचारक पदासाठी दोन महिन्यांपूर्वी भरतीप्रक्रिया पार पडली. लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या परीक्षार्थींच्या यादीत जवळपास ३९ जणांना माजी सैनिकांसाठी असलेल्या आरक्षणाचा फायदा झाला.

माजी सैनिकांच्या आरक्षणाची व्याख्या

या प्रकरणी तक्रार करणाऱ्या संदीप मोरे यांनी सांगितले, की माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाची व्याख्या स्पष्ट आहे. माजी सैनिकांसाठी असलेल्या आरक्षणाचा वापर फक्त संबंधित सैनिकांसाठीच करणे आवश्यक असते. जर एखादा सैनिक शहीद झाला किंवा अपंग झाल्यास त्याची पत्नी किंवा त्यावर अवलंबून असलेली एक व्यक्ती या आरक्षणास पात्र ठरते. कायद्यानेच ही व्याख्या ठरवून दिली आहे. मात्र, सध्या या आरक्षणाचा फायदा कोणत्याही युद्धात जखमी न झालेल्या माजी सैनिकांचे पाल्य घेत आहेत. माजी सैनिकांच्या पाल्यांचा आरक्षणाशी संबंध येत नाही. मात्र, या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष होते. यामुळे इतर उमेदवारांवर अन्याय होतो. या आरक्षण पद्धतीचा फायदा घेऊन नोकरी पदरात पाडून घेण्याचा प्रकार गंभीर असून, या विरोधात आपण थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. ​ (क्रमशः)

सरकारच्या ३० एप्रिल २०१३ आणि २ सप्टेंबर १९८३ नुसार माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या १५ टक्के आरक्षणाचा फायदा घेऊन ईएसआयएसी हॉस्पिटलमध्ये माजी सैनिकांच्या पाल्यांनीच नोकऱ्या मिळवल्या. वास्तविक, त्यांचे पालक शहीद अथवा अपंग नाही. कोणत्याही कागदपत्रांची चौकशी न करता ही भरतीप्रक्रिया झाल्याचे दिसते. याची चौकशी व्हावी.

- संदीप मोरे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी भाषेची घुसखोरी रोखणे गरजेचे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

प्रचलित असलेल्या मराठी भाषेत इंग्रजीचे होत असलेली घुसखोरी हा मराठी मनाच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. ही घुसखोरी थांबविण्यासाठी आपण सर्वांनीच आपल्या मराठी भाषेचा वापर सर्व क्षेत्रात करण्याची नितांत गरज आहे. असे केले गेले तरच मराठी भाषा टिकेल, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत नंदन रहाणे यांनी केले.

येवला शहरात सुरु असलेल्या तीन दिवसीय ‘सेनापती तात्या टोपे’ व्याख्यानमालेतील रविवारच्या दुसऱ्या दिवसाचे ‘मराठी भाषा व आपण’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना नंदन रहाणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अभियंता तथा येवला बाजार समितीचे तज्ञ संचालक साहेबराव सैद हे होते. यावेळी बोलतांना नंदन रहाणे यांनी मराठी भाषेचा जन्म व त्यानंतर काळानुरूप मराठी भाषेचा झालेला विकास आणि बदल यावर अत्यंत सखोल माहिती दिली. येवला व्यापारी बँकेचे चेअरमन पंकज पारख, नगरसेविका शितल शिंदे, कृषी उद्योजक अनिरुद्ध पटेल यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माजी आमदार मारोतराव पवार, नगरसेवक प्रविण बनकर, रश्मी पालवे, भास्कर पालवे, तात्या लहरे, उत्तमराव शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केले.

देशात महापुरुष जन्माला आल्यामुळेच जगाच्या पाठीवर आज आपला देश अग्रेसर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर अनेक आक्रमणे झाली. अनेक विद्रोही आणि विघातक कारवाया इतिहासात झाल्या. आजच्या वर्तमानात देखील त्या होत आहेत. तरी देखील आजही या देशातील संस्कृती टिकून आहे. याचे कारण म्हणजे या देशाला आजवर लाभलेले महान संत.देशाच्या संस्कृती रक्षणात वारकरी संप्रदायाचे महत्वपूर्ण योगदान, असे प्रतिपादन नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे कार्याध्यक्ष डॉ. प्रकाश पाठक यांनी केले. सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचा शनिवारी श्रीगणेशा झाला. व्याख्यानमालेतील पहिल्या दिवसाचे ‘वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान’ या विषयावरील पुष्प गुंफताना डॉ. पाठक बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपासना, कॅरल्सने ख्रिसमस साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाउपासना, प्रवचन, वॉच नाईट सर्व्हिस, केकवाटप, कॅरल्सचे गायन असा सर्वसमावेशक ख्रिसमस सोमवारी शहरातील सर्व चर्चमध्ये आनंदात साजरा करण्यात आला. बेल्स, चांदण्या, फुले, ख्रिसमस ट्री, रोषणाईने सजलेले चर्च, प्रत्येक चर्चमध्ये उभारलेला बाळ येशूचा जन्मदेखावा शहरवासियांसाठी आकर्षण ठरले.

ख्रिश्चन धर्म‌ियांसाठी ख्रिसमस हा सण पवित्र व आनंदाचा असतो. नाशिकमध्येही ख्रिश्चन ध‌र्मियांची संख्या मोठी असल्याने चर्चमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यांमध्ये ख्रिसमसच्या आदल्या दिवशी रात्री वॉच नाईट सर्व्हिस, सहभागिता चर्चतर्फे केक वाटप करण्यात आले. तर ख्रिसमसच्या दिवशी सकाळी ६.३० वाजता सकाळची भक्ती, सहभागिता, महाभक्ती, केकवाटप करण्यात आले. शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्चमचे प्रीस्ट इन चार्ज रेव्ह. अनंत आपटे यांनी ख्रिसमस साजरा करण्यामागील उद्देश, ख्रिसमस कसा साजरा करावा हे सांगितले. ख्रिसमस म्हणजे केवळ सान्ता क्लॉज नसून तो केवळ त्यातील एक भाग असल्याचे त्यांनी संदेश देताना सांगितले. तसेच बायबलमधील संदेशही सांगितले. त्र्यंबकनाका येथील होली क्रॉस चर्च, संत आंद्रिया चर्चबरोबरच शहरातील इतर चर्चमध्येही प्रार्थनेसाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी धार्मिक गीतांचे, कॅरल्सच्या गायनाचा आनंद ख्रिश्चन बांधवांनी घेतला.

आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल

आज (२६ डिसेंबर) संडे स्कूलच्या मुलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर २७ डिसेंबर रोजी संडे स्कूलच्या मुलांना चर्चतर्फे बक्षीसवाटप, विभागवार कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी बेथलेहेम रॅली, २९ डिसेंबर रोजी साधू सुंदर सिंह यांच्या जीवनावरील चित्रपट व मुख्य कलाकरांची साक्ष कार्यक्रम होणार आहे. तर ३० डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ३१ डिसेंबर रोजी वॉटनाइट सर्व्हिस, १ जानेवारी रोजी भक्ती करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकः मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

$
0
0

नाशिक

त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर येथे समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले. नाशिक मेट्रो शेल्टर २०१७ चे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना ‘दलाल’ संबोधले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.
ओझर विमानतळावरुन मोटारीने त्यांचा ताफा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नाशिकमार्गे निघाला असता महामार्गावर कोणार्कनगर परिसरात चौफुलीवर शेतक-यांनी काळे झेंडे फडकावून निषेध व्यक्त केला.

शेतकरी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांना आडगाव पोलीस ठाण्यात नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-मुंबई भरारी विस्कळीतच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कनच्या वतीने सुरू झालेली नाशिक-पुणे विमानसेवा झोकात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारीही या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, मुंबई- नाशिक विमान सेवा अद्यापही विस्कळीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ या योजनेअंतर्गत एअर डेक्कन कंपनीने १९ आसनी विमानाद्वारे नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा सुरू केली आहे. रविवारी पहाटेची नाशिक-मुंबई सेवा तांत्रिक कारणास्तव रद्द झाली. मात्र, रविवारी सायंकाळी पुणे सेवा देण्यात आली. दोन्ही बाजूने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी मुंबईसाठी सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मंगळवारी पहाटे ही सेवा देण्यात आली नाही. पण, सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी विमान नाशिकहून मुंबईकडे झेपावले. तर संध्याकाळी सहा वाजता ते नाशिकला परतले.

सायंकाळची नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा मात्र झोकात सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सायंकाळी दोन्ही बाजूने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे सेवा सुरळीत; मुंबई मात्र विस्कळीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कनच्यावतीने सुरू झालेली पुणे विमानसेवा झोकात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारीही या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, पहाटेची मुंबई सेवा अद्यापही विस्कळीत असल्याचे निदर्शनास येत आहे. एअर डेक्कन कंपनीची रविवारी पहाटेची मुंबई सेवा तांत्रिक कारणास्तव रद्द झाली. मात्र, रविवारी सायंकाळी पुणे सेवा देण्यात आली. दोन्ही बाजूने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे कंपनीने सांगितले आहे.

सोमवारी कंपनीच्यावतीने कुठलीही सेवा दिली जात नाही. वेळापत्रकानुसार पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी मुंबईसाठी सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मंगळवारी पहाटे ही सेवा देण्यात आली नाही. पण, सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी विमान नाशिकहून मुंबईकडे झेपावले. तर संध्याकाळी सहा वाजता ते नाशिकला परतले. मुंबई सेवा अद्याप डळमळीत असताना सायंकाळची नाशिक-पुणे-नाशिक सेवा मात्र झोकात सुरू आहे. रविवारी सायंकाळी दोन्ही बाजूने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. मंगळवारी सायंकाळच्या फेरीसाठीही प्रवाशांचे बुकिंग होते. सहा वाजून वीस मिनिटांनी पुण्याकडे विमान झेपावले होते. तसेच, पुण्याहूनही प्रवाशांचा प्रतिसाद चांगला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकविरोध मोहीम महापालिकेकडून तीव्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकची तपासणीसाठी ५० यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. या यंत्रामुळे जप्त केलेले प्लास्टिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे आहे की नाही हे ओळखणे सोपे जाणार आहे. त्यामुळे या यंत्राच्या मदतीने विभागनिहाय कारवाई सुरू केली जाणार असून दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे दाखल करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.

शहरात बंदी असतानाही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिक पिशव्यांची सर्रासपणे होत आहे. महापालिकेने कारवाई केली तरी प्लास्टिक पिशव्यांची जाडी तपासण्याची यंत्रणाच पालिकेकडे नाही. त्यामुळे महापालिकेची प्लास्टिक विरोधी मोहीम महापालिकेवरच उलटत असल्याचे चित्र आहे. तसेच पावसाळ्यात शहरातील रस्ते जलमय होण्याचे खापर महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्लॉस्टिकवरच फोडले होते. भूयारी गटारींवरील ढापे, चेंबर्स यामध्ये प्लॉस्टिक अडकून रस्त्यांवर पाणी साचल्याचे प्रकार नाशिककरांनी या पावसाळ्यात वारंवार अनुभवले. त्यामुळे महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाईची मोहीम आखली आहे.


५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक मापनासाठी महापालिकेकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे पालिकेला कारवाई करतांना अडचणी येत होत्या. तर दुसरीकडे प्लास्टिक पिशव्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश सरकारने महापालिकेला दिले होते. त्यानुसार आता महापालिकाही सतर्क झाली असून मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॉस्टिक मापनासाठी ५० यंत्रे खरेदी केली आहेत. एका यंत्राची किंमत ही दोन हजार रुपये असून त्यातून ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे जागेवरच निदान करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला ८ यंत्रे दिली जाणार असून त्यामुळे कारवाईला गती प्राप्त होणार असल्याचा दावा आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी केला आहे.

तर पाच हजाराचा दंड
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकची विक्री करताना आढळून आल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपये दंड वसूल केला जातो. पुन्हा विक्री करताना आढळल्यास १० हजार रुपये दंड केला जातो. मात्र, त्यानंतरही विक्री करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाचा पुन्हा घाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण मंडळ स्थापनेच्या कायद्याची आठवण करून देवून राज्य सरकारने महापालिकेची याबाबत कानउघाडणी केल्यानंतरही पालिकेतील सत्तारूढ भाजपचे पदाधिकारी शिक्षण मंडळासाठी आग्रही आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी भाजप आमदार बाळासाहेब सानप व मनपातील गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शिक्षण समितीऐवजी मंडळ स्थापनेची मागणी केली आहे. त्यामुळे शिक्षण समितीच्या स्थापनेला पुन्हा ब्रेक लागणार असून, आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

राज्य शासनाने शिक्षण मंडळ बरखास्त करून महापालिकेच्या अखत्यारीत शिक्षण समित्या अस्तित्वात आणण्याचा निर्णय २०१२ मध्ये घेतला होता. यासाठी शासनाने कायद्यात देखील बदल केला होता. महापालिकेत शिक्षण समिती स्थापन करण्यासाठी तत्कालीन सभापती संजय चव्हाण यांनी थेट कायदेशीर लढाई लढत हायकोर्टातून समितीवर शिक्कामोर्तब करून घेतले होते. त्यावेळी शिक्षण समितीला भाजपने जोरदार विरोध केला होता. हा विरोध आजतागायत कायम आहे. भाजपने कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण समिती ऐवजी शिक्षण मंडळ स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मे २०१७ मध्ये झालेल्या महासभेत शिक्षण मंडळ स्थापण्याचा ठरावदेखील संमत करण्यात आला होता.

प्रशासनाने हा ठराव सरकारकडे मार्गदर्शनासाठी पाठवला होता. परंतु, सरकारच्या नगरविकास विभागाने पालिका प्रशासनाचीच कानउघाडणी केली. याउलट कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधत शिक्षण मंडळ स्थापनेचा महासभेचा ठराव विखंडनासाठी का पाठविला नाही,याबाबत प्रशासनावर ताशेरे ओढले होते.त्यामुळे शिक्षण मंडळ स्थापन्याचे सत्ताधाऱ्यांचे स्वप्न भंगले होते. पआमदार बाळासाहेब सानप व गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंडळ स्थापन्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>