Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बोगस अपंग शिक्षक रडारवर!

$
0
0

जिल्ह्यातील दहा जणांवर कारवाई; राज्यातही प्रमाणपत्रांची पडताळणी

नाशिक : बोगस अपंग प्रमाणपत्र दाखवून सरकारी योजनांचा फायदा लाटणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने रडारवर घेतले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा बोगस अपंग शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असून, निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील बोगस अपंग शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सरकारच्या योजनांचा लाभ, जसे; बदली प्रक्रियेच्या भानगडीतून मुक्तता, इन्कम टॅक्समध्ये सूट, शाळेत अर्धा तास उशिरा येण्याची व लवकर जाण्याची मुभा, शिवाय दर महिन्याला दोन हजार रुपयांचा अतिरिक्त अपंग भत्ता मिळत असल्याने राज्यभर बोगस अपंग शिक्षकांचे पेव फुटले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून माहितीच्या अधिकाराखाली संशयित शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचा पडताळा करणे सुरू असून, दहा शिक्षकांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे यातून समोर आले आहे. प्रमाणपत्रांची मुदत संपलेली असताना योजनांचा लाभ घेणे, अपंग प्रमाणपत्राच्या मूळ प्रती यांच्यात तफावत, फेरफार केल्याच्या गंभीर बाबींची शहानिशा करीत जिल्हा परिषदेचे सीईओ दीपककुमार मीना यांनी या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या शिक्षकांना आता कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

इतर जिल्ह्यांतून प्रमाणपत्र

अपंगांचे प्रमाणपत्र हे अधिवास असलेल्या जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांचेच घेणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील बोगस अपंग शिक्षकांनी इतर जिल्ह्यांचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचे या तपासणीत समोर आले आहे. राज्यभर असे प्रमाणपत्र देणाऱ्या आरोग्य विभागातील काही कर्मचारी व अधिकारी यांनी एक-एका प्रमाणपत्रासाठी तीस ते चाळीस हजार रुपये लाटल्याचे सांगितले जात आहे.

यांच्यावर कारवाई

बागलाण तालुक्यातील शिक्षक राजाराम केवबा खैरनार, देवीदास गोविंदराव भामरे, दिलीप दिनकर वाघ, जयंत ओंकार महाले, नाशिक तालुक्यातील शिक्षिका वैशाली सुधाकर सोनवणे यांच्या विरोधात संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांनी फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा व राहुल निंबा सोनवणे, लिला काळू रौंदळ, सतीश अहिरे, अनिल भामरे, दिलीप रोहिदास पवार या शिक्षकांवर फौजदारी गुन्ह्यांसह निलंबित करून विभागीय चौकशीसाठी परिशिष्ट १ ते ४ भरून पाठवावेत, असे आदेश दिले आहेत.

कार्यवाही झालेले शिक्षक हे प्रातिनिधिक स्वरुपात असून, शेकडो शिक्षकांनी बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र धारण करीत सरकारी फायदे लाटणे सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद येत्या काळात सर्व बोगस अपंग शिक्षकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- संजय पगार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद

अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन कार्यरत शिक्षकांचे आणि त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यवस्थेचे धिंडवडे काढले पाहिजे. अशा लोकांमुळे खऱ्या अपंगांना त्यांच्या लाभांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे बोगस अपंगांवर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.

- दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती संपर्कप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार यंत्रणा ढेपाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले जात असताना ते मिळविण्यासाठी किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांवर अक्षरश: दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटर यंत्रणाही बुधवारी ढेपाळल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. आधार मिळविण्यासाठी आटाप‌िटा करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणाऱ्या नागरिकांना निराधार झाल्यासारखे वाटू लागले आहे.

आधार कार्ड ही भारतीयत्वाची मुख्य ओळख बनू पाहात आहे. यापुढील काळात अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्र म्हणून आधारची प्रत्येक ठिकाणी गरज भासणार आहे. म्हणून ते अपडेट असावे असा आग्रह सरकारने आणि विविध सरकारी यंत्रणांनी धरला आहे. बहुतांश लोकांनी आधारकार्ड काढले असले, तरी ते अपडेट नाही. अशा आधार कार्डवर पूर्ण जन्म तारीख, मोबाइल क्रमांक, अचूक पत्ता नोंदविणे ही आता अत्यावश्यक बाब बनली आहे. केवळ अपडेटेड आधार कार्ड नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत असून, आधारकार्डमध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडू लागली आहे. ठिकठिकाणची आधार सेंटर्स बंद असल्यामुळे नागरिकांना हे काम मार्गी लावण्यासाठी दारोदार भटकावे लागते आहे. त्या प्रत्येक ठिकाणी निराशाच पदरी पडत असल्याने नागरिक अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटर्सवर गर्दी करू लागले आहेत. येथे आधारचे काम मार्गी लागेल असा ठाम विश्वास नागरिकांना असला तरी या विश्वासालाही बुधवारी तडा गेला. सकाळपासूनच आधार सेंटरवरील यंत्रणा कोलमडून पडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.


सर्व्हरने टाकली मान

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेंटरवर तीन क‌िटच्या माध्यमातून आधारशी संबंधित कामे केली जातात. गर्दीचे व्यवस्थापन करताना येथील सेंटरचालकांनी नागरिकांना तारखांनुसार अपॉइंटमेंट देऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे आजची अपॉइंटमेंट असलेले नागरिक सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. नेहमीप्रमाणे आधार सेंटरचालकही कामावर हजर झाले. परंतु, नेटवर्कच्या अडचणींमुळे किट सुरूच होत नव्हते. तर महा-ऑनलाइनचा सर्व्हर डाऊन झाल्याने ते किटही सुरूच होऊ शकले नाही. त्यामुळे दुपारी चारपर्यंत आधारबाबतचे एकही काम होऊ शकले नाही. तांत्रिक बिघाडामुळे आधार सेंटर बंद असल्याचा फलक लावण्यात आला. परंतु, त्यामुळे नागरिकांना गैरसोयीबरोबरच मनस्तापाचाही सामना करावा लागला.

प्रशासन हतबल

केंद्र व राज्य सरकारने सर्वच सरकारी योजनांच्या लाभाकरीता अद्यावत आधार कार्ड सक्तीचे केले आहे. जन्मापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत आधार कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. बँक अकाऊंट, इन्कम टॅक्स रिटर्न, पॅन क्रमांक, प्रॉव्हिडंट फंड, मोबाइल सीम कार्ड, पासपोर्ट, गॅस सबसिडी, पेन्शन, शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशापासून शिष्यवृत्तीपर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ६१ लाख ७ हजार १८७ लोकांची आधार नोंदणी झाली आहे. परंतु, त्यांनाही आधारमध्ये दुरुस्ती करवून घेणे गरजेचे असल्याने दिवसेंदिवस गर्दी वाढतेच आहे. खासगी आधार सेंटर्स बंद झाल्यामुळे ‘आधार’ यंत्रणेवरील ताण वाढला असून तांत्रिक बिघाडांपुढे प्रशासनही हतबल झाले आहे.


गेल्या दीड महिन्यापासून मी आधारकार्ड काढण्यासाठी भटकतो आहे. सिडको कार्यालय, कार्वी सेंटर, महापालिकेचे सिडको कार्यालय अशा सर्व ठिकाणी निराशा झाल्याने मी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरवर आलो होतो. परंतु, येथेही काम न झाल्यामुळे माझे बँकेशी संबंधित काम रखडले आहे. माझे वय ७४ वर्ष असून मला ही फरफट असह्य होत आहे.

- दुरू वाधवा, गोविंदनगर

मी २०१३ मध्ये आधार कार्ड काढले. त्यावेळी पूर्ण जन्मतारीख नोंदवूनही कार्डवर केवळ जन्मवर्षच नोंद झाले. पूर्ण जन्मतारीख नसल्यामुळे माझा पगार होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्ण तारीख नोंदविणे हे केवळ पाच दहा मिनिटांचे काम आहे. परंतु, त्यासाठी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

- प्रशांत वाघ

नेटवर्कमधील अडचणी आणि सर्व्हर डाऊन सारख्या तांत्रिक अडचणींमुळे आज दुपारी आधारशी संबंधित कामे होऊ शकली नाहीत. परंतु, सायंकाळपर्यंत ही कामे सुरळीत होतील. यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त संवादातून करा गैरसमज दूर!

$
0
0

सध्याच्या व्हर्च्युअल काळातील अपडेटेड लाइफ जगताना नात्यांमध्ये कळत नकळत होणारे गैरसमज आणि या गैसमजातून येणारा तणाव अनेकदा मानसिक खच्चीकरणापर्यंत तरुणांना घेऊन जातो. नात्यांमधील बळावत चाललेल्या गैरसमजांतून येणारे नैराश्य अनेकदा जीवनरेषा संपविण्याच्या विचारापर्यंत तरुणांना घेऊन जाते. तसेच नात्यांचा विस्फोट होत नात्यांमधील भावभावना विसरत त्यातून होणारे क्रूर कृत्यांचाही शिकार गैरसमजातून तरुण होऊ शकतात. या ताणतणावावर उपाय म्हणून मुक्त संवाद हेच औषध असल्याचे परखड मत मेंटल वेलनेसअंतर्गत आयोजित ‘मटा डिबेट’मध्ये तरुणाईने व्यक्त केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये पार पडलेल्या या उपक्रमास तरुणाईचा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र टाइम्सने ‘मेंटल वेलनेस’ या संकल्पनेनुसार ‘मना सज्जना’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत डिबेट स्पर्धांतून तरुणांच्या भावविश्वातील मानसिक समस्यांवर मुक्त चर्चा घडवून आणण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

- चर्चेतील लक्षवेधी मुद्दे

पालकांचा आणि पाल्यांचा रोज मुक्त संवाद व्हावा.

मोबाइलमधील व्हर्च्युअल जगाशी जोडले जाताना वास्तविक आयुष्यातील घटनांचा विचार तरुणांनी करायला हवा.

सोशल मीडियावर मोकळेपणाने व्यक्त होतात, त्याचप्रमाणे मित्र, मैत्रिण व पालकांशी मोकळीकतेने संवाद साधायला हवा.

मानसिक दडपण आल्यास किंवा मानसिक ताण वाढत असल्यास स्वतःहून घरी प्रॉब्लेम शेअर करायला हवा.

सध्याच्या मानसिक ताणांतून घडणाऱ्या घटना बघता, डिप्रेशन काळात मोकळीकतेने मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मानसोपचारतज्ञ ही मूळ संकल्पना तरुणांना समजावी, याकरीता उपक्रम राबविण्याची गरज आहे.

नात्यांमधील आत्मविश्वास तसेच समोरच्यावरील विश्वास ठोस असल्यास गैरसमज बळावत नाहीत.

तरुण समोरच्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात म्हणून गैरसमज बळावतो.

नात्यांच्या गैरसमजातून बाहेर येण्यासाठी मुक्त संवाद साधत उपाय योजने हाच एक मार्ग आहे.

गैरसमज झाल्यास त्याचा राग करण्यापेक्षा त्याचे मूळ कारण शोधायला हवे. येथेच अर्धा तणाव हलका होतो.


वैचारिक मतभेद हा गैरसमजांचा उगम असतो. प्रत्येक नात्यात वैचारिक मतभेद असतात. मात्र, त्यांचा लागलीच गैर अर्थ काढल्यास मानसिक ताण येतो. गैरसमजातून चुकीचे पाऊल उचलणे गैर आहे. मानसिक ताण आल्यास त्याला योग्य वैचारिक पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केल्यास नैराश्य हमखास कमी होते.

- आशिष कुलकर्णी, एम ए राज्यशास्त्र

सध्याच्या अपडेटेड लाइफमध्ये आई-वडिल हे नातेदेखील दुरावत चालले आहे. पाल्यांसमवेत मुक्त संवादास पालकांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पाल्यांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करता येत नाही. पालकांनी आपल्या पाल्याच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. वेळात वेळ काढून मुक्त संवाद साधायला हवा.

- अपूर्व इंगळे, एसवाय बीए, राज्यशास्त्र

समोरच्या व्यक्तिला गृहित धरल्याने गैरसमज अधिक बळावले जातात. जेव्हा नात्यांमध्ये गैरसमज होतात तेव्हा त्यावर शांतपणे चर्चा करायला हवी. प्रत्येकाची मानसिकता फॅमिलीतील घटकांशी जोडली असते. त्यामुळे नात्यामधील तणाव चर्चेतून निवळता येतो. मात्र, तरी देखील नात्यांमधील फूट कमी होत नसेल तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

- मृण्मयी मुळे, टीवाय बीए मानसशास्त्र

चौकोनी कुटुंब व्यवस्थेत प्रत्येकाची स्वतंत्र मते असतात. यावेळी कोणत्यातरी कारणांवरुन मतभेद होत गैरसमज बळावले जाऊ शकतात. तसेच पालकांच्या पाल्यांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर त्यातूनही नैराश्य वाढते. मात्र, अशा वेळी डिप्रेशनचे शिकार होण्यापेक्षा संगनमताने चर्चा करणे किंवा मानसोपचारांची मदत घेणे गरजेचे आहे.

- प्रतीक्षा एकबोटे, टीवाय बीए मानसशास्त्र

तरुणांच्या इच्छेविरुध्द एखादी घटना घडल्यास ते लागलीच नैराश्यात जातात. भविष्यातील निर्णय, नोकरी, शिक्षण तसेच आजूबाजूची परिस्थिती यातूनही नैराश्य वाढीस लागते. मात्र, अशा वेळी सर्व गोष्टींचा शांततेने विचार करत एकाग्र होऊन निर्णय घेणे गरजेचे असते.

- अमोल पाटील, लायब्ररी सायन्स

रिलेशनशिपमध्ये किंवा कोणत्याही नात्यात ‘इगो’ हा गैरसमजाला कारण ठरतो. प्रत्येकाला आपणच श्रेष्ठ आहोत असा भाव समोरच्याच्या मनावर बिंबवायचा असतो. यातून कलहास सुरुवात होते आणि अनेकदा गैरसमज बळावले जातात. याच गैरसमजातून पुढे हळूहळू नैराश्य ओढावले जाते. म्हणून कोणत्याही नात्यात सेल्फ इगो असू नये.

- क्षमा देशपांडे, एफवाय बीए

प्रत्येकाचा स्वभाव हा समोच्याला मिळता जुळता असायला हवा. एकमेकांसोबत जुळवून घेण्याची वृत्ती आत्मसात असेल तर फारसे गैरसमज होत नाही. जर नात्यांमध्ये गैरसमज झाले आणि त्यातून मानसिक ताण वाढत असेल तर एकमेकांशी खुली चर्चा करुन तो तेढ सोडवायला हवा.

- महिमा ठोंबरे, एफवाय बीए

नात्यांमध्ये वैचारिक पातळी एक नसेल तर हमखास गैरसमज वाढतात. यासाठी कोणत्याही नात्यात वैचारिक पातळी समान असावी. मित्र, मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये अनेकदा वैचारिक कलह होतात. यावेळी योग्य सकारात्मक भूमिका घेत शांततेने कलह सोडविणे फायदेशीर असते. नात्यांच्या गैरसमजातून टोकाची भूमिका घेणे गैर आहे. संवादरुपी औषध या कलहांवर ठोस उपाय आहे.

- आर्या शिंगणे.

बहुतांश कुटुंबातील आईवडिल दोघेही नोकरी करत असल्याने पाल्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. यामुळे पालक व पाल्य यांतील संवाद कमी कमी होत आहे. तसेच मित्रमैत्रिणींच्या ग्रुप्समध्येदेखील सेल्फ इगो बळावत असल्याने तिथेही कलह निर्माण होतो. मात्र, अशा गैरसमजुतींवर योग्य संवाद हाच उपाय आहे.

- प्राजक्ता गोडशे, एफवाय बीए

नातं म्हटल की त्यात राग, प्रेम, भांडण या गोष्टी आपसूक येतातच. आईवडिलदेखील आपल्या पाल्यांचे काही चुकत असेल तर रागावतातच. पण, हा राग क्षणिक असतो हे तरुणांनी विचारात घ्यायला हवं. पाल्यांनी पालकांनी व्यक्त केलेला राग सकारात्मकतेने करायला हवा, जेणेकरुन या नात्यांतील ताण वाढणार नाही.

- ऋतुजा अहिरे, अकरावी आर्टस

प्रत्येक नात्यात गर्व, अहंकार यांचा संबंध येतोच. म्हणून नात्यांमध्ये सहकार्याची, आपुलकीची भावना असणे गरजेचे असते. नात्यांतील काही गैरसमजांतून वाद निर्माण झालेच तर दोघांनीही स्वतःहून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.

- राधिका भार्गवे, बारावी कला

नातं हे कोणतही असले तरी त्यात अनेकदा गैरसमज हे होतातच. नात्यांतील माणसांकडून अपेक्षा वाढल्या आणि त्यांची पूर्तता न झाल्यास त्यातून गैरसमज निर्माण होतात. अपुरा संवाद आणि समजून न घेण्याची वृत्ती हीच मानसिक ताणासाठी कारणीभूत ठरते.

- अश्विनी भालेराव, बारावी कला

(संकलन – सौरभ बेंडाळे, यश कुलकर्णी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख शेतकऱ्यांना ४७४ कोटींची कर्जमाफी

$
0
0

जळगाव जिल्हा बँक निधी वाटपात राज्यात प्रथम

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना ४७४ कोटी रुपये रक्कमेच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ५७७ शेतकरी कुटुंबांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेले आहेत. या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या बाबतीतही जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याचा स्पष्ट उल्लेख करून जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे त्यावेळी कौतुकही केले होते.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या जळगाव जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी राज्य सरकारने पुरविलेल्या नमुन्याप्रमाणे ऑनलाइन माहिती भरून दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळगाव जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना ४७४ कोटी रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत मिळालेली आहे. याबाबत आजपर्यंत सुमारे ३ हजार शेतकऱ्यांना, या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर पाठवून कळविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या अंदाजे १ लाख लाभार्थ्यांना १०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार असल्याचेही जाधवर यांनी म्हटले आहे.

३१ मार्च २०१८ पर्यंत वाढीव मुदत

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेस प्राप्त झालेल्या निधीचे १०० टक्के वाटप करणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली बँक ठरली आहे. जिल्हा बँकेस प्राप्त असलेला निधी जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व दीड लाख रुपयांवरील लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम संबंधित जिल्हा बँकेच्या शाखेकडे ३१ मार्च, २०१८ च्या आत जमा करण्याबाबतही कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा व इतर बँकेकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, अशा शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारने दिलेल्या वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक ३१ मार्च २०१८ पर्यंत संबंधित बँकेत रकमेचा भरणा करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.


धुळे जिल्ह्यात २० हजार शेतकऱ्यांना लाभ

धुळे ः राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील धुळे जिल्ह्यातील पात्र २०,५५२ शेतकऱ्यांना १०० कोटी ६७ लक्ष रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे. २०१२ पासून सलग चार वर्षांत धुळे जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. जिल्ह्यातील काही भागात अवेळी गारपीट, पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. परिणामी हे शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे असे शेतकरी बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र होवू शकले नाहीत. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या धुळे जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती भरून दिली. त्यानुसार धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील १३,३६१ शेतकऱ्यांना ५० कोटी ४५ लक्ष ८४ हजार ९२३ रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, राष्ट्रीयीकृत बँकांच्या ७,१९१ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५० कोटी २२ लक्ष रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. नाशिक विभागात धुळे जिल्हा बँक ही प्राप्त झालेल्या निधीचे १०० टक्के वाटप करणारी पहिली जिल्हा बँक ठरली आहे. प्राप्त निधी धुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखाती जमा करण्यात आलेली आहे. अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सचिव, बँकेचे तपासणीस, व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर आदींचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

$
0
0

शिंदखेडा नगरपंचायतीसाठी ७२ टक्के मतदान

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीसाठी बुधवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी शहरातील २७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरपंचायतीच्या १७ प्रभागांत बुधवारी, सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. तर मतदानाच्या शेवटच्या घटकांपर्यंत अर्थात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जवळपास ७२ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या निवडणुकीत मॉडेल मतदान केंद्र म्हणून १७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १० हे मॉडेल मतदान केंद्र म्हणून प्रशासनाने विकसित केले. या मतदान केंद्रातील वातावरण आल्हाददायक व प्रसन्न ठेवण्यासाठी प्रथम येणाऱ्या दहा मतदारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मतदारांना रोप भेट देण्यात आले, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अजित निकम यांनी दिली. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, माजीमंत्री हेमंत देशमुख, काँग्रेसचे शामकांत सनेर आणि समाजवादीचे विजयसिंग राजपूत या दिग्गजांनी आपली राजकीय शक्ती वापरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्यादित गरजा आदिवासींचे बलस्थान

$
0
0


नाशिक ः अत्यंत मर्यादित गरजा आणि कुठल्याही सोयी सुविधांचा सोस नसल्याने जिल्ह्यातील एकच तालुका शेतकरी आत्महत्येच्या घटनांपासून दूर राहिला आहे, तो म्हणजे पेठ. या आदिवासीबहुल तालुक्यात गेल्या सात वर्षांत एकाही शेतकऱ्याने स्वत:ला संपविलेले नाही. अन्य आदिवासीबहुल तालुक्यांमध्येही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे.

नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत. त्यापैकी पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, बागलाण आणि नाशिक ही आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखली जातात. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. परंतु, पेठ या एकमेव तालुक्यात गेल्या सात वर्षांत एकाही शेतकरी आत्महत्येची घटना घडलेली नाही. त्यामुळे सरकार आणि जिल्हा प्रशासनालाही येथे आर्थिक मदत देण्याची आवश्यकता भासलेली नाही. आदिवासी भागातील रहिवाशांच्या गरजा खूपच मर्यादित आहेत. कोणत्याही विपरित परिस्थ‌ितीमध्ये जीवन जगण्याची कला या रहिवाशांना अवगत आहे. याशिवाय अत्यंत कमी संसाधनांमध्ये जीवन जगण्याची सवय येथील शेतकऱ्यांना असून, त्यापैकी बहुतांश जण पावसाळ्यानंतर मोल-मजुरीसाठी स्थलांत‌रित होतात. पारंपरिक पद्धतीनेच जमीन कसण्याची पूर्वापार परंपरा असल्याने येथील शेतकरी बँका, पतसंस्थांकडून शेती किंवा अन्य कारणांसाठी फारसे कर्ज घेत नाहीत. त्यामुळे कर्जबाजारीपणा हे आत्महत्यांचे सहसा कारण ठरत नाही.

सुरगाणा तालुक्यातही यापूर्वी शेतकरी आत्महत्येची घटना घडली नव्हती. परंतु, यंदा मे महिन्यात तालुक्यातील हनुमंत पाडा येथे भगवान नानू गावित (वय ४५) या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. गावित यांच्या नावावर शेती असून त्यांच्यासह कुटुंबातील काही सदस्यांच्या नावावर पंजाब नॅशनल बँक, एनडीसीसी बँक, विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती पुढे आली. परंतु, गेल्या अनेक वर्षांतील ही शेतकरी आत्महत्येची एकमेव घटना ठरली आहे. जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये गेल्या सात वर्षांत शेतकरी आत्महत्येच्या ५८ घडना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक १३ आत्महत्या बागलाण तालुक्यामध्ये झाल्या आहेत.

आदिवासी तालुके शेतकरी आत्महत्या

बागलाण १३

नाशिक १२

दिंडोरी १०

त्र्यंबकेश्वर ९

कळवण ७

इगतपुरी ६

सुरगाणा १

पेठ ०

एकूण ५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबार नगरपालिकेसाठी ७०.९३ टक्के मतदान

$
0
0

१८ डिसेंबरला मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व नवापूर नगरपालिकेसाठी बुधवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नंदुरबारला नगराध्यक्षपदासाठी सहा तर नवापूरला दहा उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी दोन्ही नगरपालिकेतून २०६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

नंदुरबार नगरपालिकेसाठी बुधवारी (दि. १३) ७०.९३ टक्के तर नवापूर नगरपालिकेसाठी ६६.३४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मतमोजणी दि. १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नंदुरबार पालिकेच्या निवडणुकीसाठी ५७ इमारतीत १२६ बूथ तयार करण्यात आले होते. शहरातील १९ प्रभागात ३९ जागांसाठी १११ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १ लाख २०० मतदारांपैकी ७१,११८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी गणेश गिरी आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. नंदुरबार आणि नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम यासह अपक्षांमध्ये लढत होत आहे. सर्वात जास्त चुरस भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ हिना गावित, आणि काँग्रेसचे विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात आहे. मतदार आता कोणाच्या हाती सत्ता देतील यासाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो स्टुडिओला चांदोरीमध्ये आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील चांदोरी येथील नाठे कॉम्लेक्समध्ये असलेल्या शरद जाधव यांच्या सनी फोटो स्टुडिओला बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीत फोटो स्टुडिओतील किमती साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे १४ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चांदोरीतील मुख्य रस्त्यावरील सनी फोटो स्टुडिओमधून पहाटे धूर येतांना वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना दिसला. त्यांनी याबाबत स्टुडिओमालक शरद जाधव यांना फोन करून घटनेची माहिती दिली. जाधव यांनी दुकानाच धाव घेतली. दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. त्यांनी दुकानाचे शटर उघडून बघितले असता इन्व्हर्टरजवळ स्पार्किंग होतांना दिसले. आतमध्ये पाऊल ठेवताच आगीचा भडका उडाला आणि काही क्षणातच स्टुडिओतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. आगीत व्हिडिओ शुटिंगचे दोन कॅमेरे, तीन फोटो कॅमेरे, झेरॉक्स मशिन, दोन कॉम्प्युटर, दोन प्रिंटर, लॅमिनेशन मशिन, फर्निचर व महत्त्वाची कागदपत्रे जळाली. नाठे इमारतीमध्ये इंडियन बँक, पतसंस्था तसेच कापड दुकान हॉटेल आहेत. ग्रामस्थांनी पुढाकार घेत वेळीच आग विझवल्याने संभाव्य अनर्थ टळला. चांदोरीचे तलाठी पंडित यांनी पंचनामा केला. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्युटी पार्लरमधून ५२ हजारांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्युटी पार्लरमधून महिलेच्या पर्समधील ५२ हजाराची रोकड चोरट्यांनी लांबविली. भाभानगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी वंदना नितीन गायकवाड (रा. भाभानगर) यांनी फ‌िर्याद दिली आहे. आकाशगंगा अपार्टमेंटमध्ये त्यांचे मनिनी नावाचे ब्युटी पार्लर आहे. त्या कामात व्यस्त असताना बुधवारी (दि. १३) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात महिलेने काउंटरवर ठेवलेल्या त्यांच्या पर्समधील ५२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

दोन लाखांची घरफोडी
सिडकोतील अश्विननगर भागात घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. अंबड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
मलेश मरीअप्पा गाळी (रा. जगदंबा निवास, अश्विननगर) यांनी फिर्याद दिली आहे. गाळी कुटुंबीय २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायती मालामाल

$
0
0


तुषार देसले, मालेगाव

नुकत्याच पार पडलेल्या महालोकअदालतीत तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींच्या तिजोरीत लाखो रुपयांचा भरणा झाला आहे. याऊलट महापालिका क्षेत्रातील वसुलीला मात्र पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने ‌तिजोरीत खडखडाट आहे.

तालुक्यातील १२४ ग्रामपंचायत व महापालिका क्षेत्रातील घरपट्टी, पाणीपट्टी तसेच व्यापारी गाळेमालकांनी वेळेत थकबाकी न भरल्याने पालिका व ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. अखेर पालिका व पंचायत समिती प्रशासनाकडून लोकअदालतीद्वारे ही थकबाकी वसूल करण्याचा पर्याय निवडण्यात आला. येथे शनिवारी पार पडलेल्या लोकअदालतीत तालुक्यातील १२४ ग्रा.प.चीकडे विविध थकीत करापोटी १ कोटी ९३ लाख ८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली. तर महापालिकेची एकूण ७३ लाख ९९ हजार ६३ रुपयांची वसुली झाली. वसुलीची आकडेवारी पाहता लोकअदालतीने ग्रामपंचायती मालामाल झाल्या असल्या तरी पालिकेच्या तिजोरीत खळखळाट आहे.

तालुक्यातील एकूण १२४ ग्रा.पं.च्या विविध करांची थकबाकी असलेल्या ५७ हजार थकबाकीधारकांना नोट‌िसा बजावण्यात आल्या होत्या. महालोकअदालतीत एकूण ५७ हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील तब्बल ३५ हजार प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. त्यापोटी ग्रापची एक कोटी ९३ लाख ८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली. यात ८२ लाख ४४ हजार ७३२ रुपयांची पाणीपट्टी तर १ कोटी १० लाख ६३ हजार ९५५ रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. तालुक्यातील ग्रा. पं. ची वसुलीची आकडेवारी पाहता तुलनेने महापालिकेची वसुली जेमतेम झाली असल्याचे म्हणता येईल. पालिकेकडून एकूण १ हजार ७६१ प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. यातील २९० प्रकरणे निकाली निघाली असून, केवळ ७३ लाख ९९ हजार ६३ रु ची वसुली झाली आहे. त्यातही प्रभागनिहाय विचार करता प्रभाग १ मधील सर्वाधिक १३३ प्रकरणे निकाली निघाली असून, ३८ लाख २९ हजार १७५ रु इतकी वसुली झाली आहे. त्यामुळे प्रभाग १ मधेच लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी १३ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश आहेत.

पालिकेची थकबाकी कोटीच्या घरात

येथील महापालिकेची महसुली उत्पन्न अत्यल्प असल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महापालिकेचे १ लाख ११ हजार मालमत्ताधारक असून सुमारे ५६ हजार नळधारक आहेत. मात्र पालिकेची चालू वर्षात १४ कोटीहून अधिक वसुली होणे बाकी आहे. एकूण ३७ कोटी २५ लाख रुपये इतकी वसुली होणे बाकी आहे. यावर्षात एक एप्रिलपासून आजपर्यंत केवळ तीन कोटी ४२ लाख रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे लोकअदालतीद्वारे पालिकेची वसुली वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र थकबाकीदारांनी लोक अदालतीस फार प्रतिसाद न दिल्याचेच स्पष्ट झाले आहे.

झोडगे वसुलीत आघाडीवर

शनिवारी झालेल्या लोकअदालातीत ग्रामीण भागातील थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ग्रामपंचायतींची मोठी थकबाकी वसूल झाली. तालुक्यातील १२४ ग्रा.पं.पैकी झोडगेत घरपट्टी व पाणीपट्टी सर्वाधिक वसूल झाली आहे. घरपट्टी सुमारे ८ लाख तर पाणी पट्टी सुमारे १९ लाख रुपये वसूल झाली आहे. त्या खालोखाल दाभाडी, सौंदाणे, रावळगाव, कळवाडी येथे वसुली झाली आहे.



ग्राप महापालिका

प्रकरणे - ५७ हजार १ हजार ७६१

निकाली - ३५ हजार २९०

वसूल रक्कम - १ कोटी ९३ लाख ७३ लाख ९९ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत सदस्य निवडीसाठी मालेगावी आज महासभा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी (दि. १४) सायंकाळी चार वाजता पालिका सभागृहात विशेष महासभा आयोजित करण्यात आल्याची माहिती नगरसचिव राजेश धसे यांनी दिली.

येथील महापालिकेची निवडणूक मे महिन्यात पार पडली होती. त्यानंतर पालिकेतील पक्षीय बलानुसार पाच स्वीकृत सदस्य नियुक्ती खोळंबली होती. अखेर १३ नोव्हेंबर रोजी पालिका आयुक्तांच्या दालनात उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या उपस्थित सर्व गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात १० डिसेंबरपर्यंत पक्षीय बलानुसार अर्ज दाखल करायचे, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुदतीत चार अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची छाननी ६ डिसेंबर रोजी गटनेते व उमेदवारांच्या उपस्थितीत पार पडली. चारही अर्ज वैध ठरले आहेत. या चार उमेदवारांची आयुक्तांकडे शिफारस करण्यात आली आहे. या सदस्य नियुक्तीसाठी गुरुवारी विशेष महासभा होणार आहे.

चार दाखल अर्ज

अब्दुल मलिक इसा (काँग्रेस), मोह. अमीन मो. फारुख, गिरीश बोरसे (महागठबंधन आघाडी), भिमा भडांगे (शिवसेना).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरम नदी तटावर उत्सवाला उधाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या १३० व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने आयोजित महापूजा व यात्रोत्सवास बुधवारी पहाटेच्या गुलाबी थंडीत मोठ्या उत्साहाने व धुमधडाक्यात प्रारंभ करण्यात आला. मंदिरासह परिसराची सजावट करण्यात आली आहे. तब्बल १५ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्री संत शिरोमणी देव यशवंतराव महाराज यात्रोत्सवाला बुधवारी पहाटे बागलाणचे तहसीलदार दीपक धिवरे व स्नेहा धिवरे, नगराध्यक्ष सुनील मोरे व योगिता मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड व अरूणा बागड, देवस्थानचे विश्वस्त धर्मा सोनवणे व कमलाताई सोनवणे यांच्या हस्ते महापूजानंतर सुरुवात झाली. पहाटेच्या आरतीला महिला व पुरूष भाविक भाविकांनी गर्दी केली होती. पुजेनंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनसाठी खुले करण्यात आले. मंदिरात महिला व पुरुष भाविकांना दर्शनासाठी वेगवेगळी बॅरिकेडसची सोय करण्यात आली आहे.

पहाटे काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनीही सपत्नीक पूजा केली. गांधी चौकातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मित्र मंडळाच्या वतीने महापुजेनंतर भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खामखेडा येथील अखिल विश्व वारकरी परिषद व ग्रामस्थांच्या वतीने खामखेडा ते सटाणा पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. यात्रेनिमित्त कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. आरम नदी काठावर यात्रोत्सवात ठिकठिकाणाहून करमणुकीचे साधने, पाळणे, व विविध स्टॉल्स, विक्रेते दाखल झाले आहेत.

रथ मिरवणुकीने

भारावले भाविक

उत्सवानिमित्ताने शहरातून निघालेल्या रथमिरवणुकीचा शुभारंभ नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविलेला देवमामलेदार यशवंतराव महाराज रथाची महापूजा पोलिस अधीक्षक संयज दराडे यांच्या हस्ते झाली. यावेळी पोलिस उपअधीक्षक शशीकांत शिंदे, पोल‌सि निरीक्षक हिरालाल पाटील, प्रांतधिकारी प्रवीण महाजन यांनीही पूजा केली. यांनतर रथ मिरवणूकीस प्रारंभ झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर ताशेरे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडिया हे माणसाला फसवणारे साधन म्हणून आता पुढे येत आहे. याद्वारे अनेक लबाडी होत असून त्याचा परिणाम काय होतो, हे दाखविण्याचा प्रयत्न ‘ये मामला गडबड है’ या नाटकातून करण्यात आला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्य महोत्सव प. सा. नाट्यगृह येथे सुरू असून नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘ये मामला गडबड है’ हे नाटक बुधवारी सादर झाले. विनय एक नाट्य कलाकार असतो. त्याची पत्नी लता नोकरी करत असते. विनयला मिळणाऱ्या ‘नाइट’वर व लताच्या पगारात ते दोघे सुखी असतात. त्यांच्या शेजारी वकील लांडगे फुकट पेपर वाचायला येतो आणि त्यांना उलटसुलट सल्ले देत असतो. विनयचा मित्र बबन दारूच्या नादात जुगारात सर्व पैसे हरतो आणि विनयच्या घरी आसऱ्यासाठी येतो. त्यातच लताला फेसबुकवर तिची एक मैत्रीण चिंगी भेटते व ती थेट तिच्या घरीच येते. चिंगीच्या सांगण्यानुसार तिची आजी मरताना दहा कोटीची इस्टेट तिच्या नावावर सोडून गेलेली असते. पण एक अट असते की तिचे लग्न झालेले पाहिजे. महिला वकिलासमोर विनयाला ती पती म्हणून सादर करते. परंतु, तितक्यात विनयचे वडील आबा तेथे येतात. आबांसमोर विनय हा चिंगी ही बबनची पत्नी असल्याचे सांगतो. या गोंधळात चिंगी लताचे दागिने घेऊन पळते आणि इन्सपेक्टर चिंगी, महिला वकिल व त्याचा असिस्टंट यांना अटक करतात. त्यांचा डाव उघडकीस आणतात. अशा आशयाचे हे कथानक होते.

कामगार कल्याण केंद्र ओझर मिग (टाऊनशीप) संस्थेच्या वतीने सादर झालेल्या या नाटकाचे लेखन संदेश सावंत यांनी केलेले असून सहनिर्मिती लक्ष्मीकांत खैरनार यांची होती. दिग्दर्शक मिल‌िंद मेधने, सूत्रधार योगेश बागूल, नेपथ्य विजय घोरण, संगीत अमोल काबरा, प्रकाशयोजना जयदीप पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा लिला सोनार यांची होती.

आजचे नाटक : सिंगल
स्थळ : प. सा. नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसमधून पडल्याने तरुणी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव शहर बसमधून पडल्याने एक तरुणी गभीर जखमी झाली. त्र्यंबकरोडवर हा अपघात झाला. जखमी युवतीवर सिव्हिल हॉस्प‌िटमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

काजल काळे (रा. सातपूर) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. सातपूरहून सीबीएसकडे शहर बसने ती बुधवारी (दि. १३) सकाळी प्रवास करीत होती. गर्दीमुळे दरवाजाजवळ उभी असताना त्र्यंबकरोडवरील कुबेर हॉटेललगत ती पडली. भरधाव बसमधून गंभीर जखमी झाल्याने बसचालक महेश नागरे यांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव इनोव्हा कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. औरंगाबाद रोडवर हा अपघात झाला. भाभानगर येथील दुचाकीस्वार तरूण विवाह सोहळा आटोपून रात्री घराकडे परतत होता. त्यावेळी हा अपघात झाला. आडगाव पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
सचिन हिरवे (२९ रा. भाभानगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आडगाव नाक्याकडे जात असताना हा अपघात झाला. सचिन गंभीर जखमी झाल्याने त्याला भाऊ संदीप यांनी सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये तात्काळ दाखल केले. परंतु, सचिनचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूविक्री विरोधात महिलांचा हल्लाबोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील मोहाडी येथील महिलांनी तीन दिवसांपूर्वी दिंडोरीचे पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना मोहाडी येथे सुरु असलेल्या अवैध दारूबंदी विरोधात निवेदन दिले होते. तरीही पोलिसांनी कुठलीही कार्यवाही न केल्याने बुधवारी येथील संतप्त महिलांनी मोहाडी येथील पोलिस चौकीवर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हल्लाबोल मोचा काढला.

मोहाडी येथे १२ ते १५ ठिकाणी अवैध दारूविक्री सुरू आहे. त्या विरोधात गावातील १०० महिलांनी ग्रामपालिका सदस्या सविता पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिंडोरी पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना दारूबंदीबाबत निवेदन देत व्यथा मांडल्या होत्या. यावेळी शिरसाठ यांनी गावात १०० टक्के दारूबंदी करू, असे आश्वासन दिले. मात्र, तीन दिवसांपासून सर्रासपणे अवैध दारूविक्रीचे दुकाने सुरू होते. येथील अवैध दारूविक्रेत्यांनी निवेदन देणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली. तसेच आमचे कोणी काही करू शकत नाही, असे मुजोरी भाषेत उत्तर दिले. यानंतर संतप्त महिलांनी पोलीस हवालदार एस. के. जाधव यांना घेराव घालत जाब विचारला. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने येथील महिलांनी गावातून हल्लाबोल मोर्चा काढत पोलिसचौकीवर सुमारे तीन तास ठिय्या दिला.

यावेळी सुमारे दीडशे महिला व पुरुष सहभागी झाले. पोलिस निरीक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिंडोरी पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ घटनास्थळी आले. त्यांनी महिलांची समजूत काढत अवैध दारूविक्री विरोधात कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. दोन दिवसात येथील अवैध धंदे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबई कनेक्ट सोयीचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसाठी विमानसेवेची घोषणा झाल्यानंतर एअर डेक्कन कंपनीने बुधवारी वेळापत्रक प्रसिद्ध केले. यात मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ पहाटे ६.२० वाजेची तसेच येण्याची वेळ सायंकाळी ५.१० ची ची निश्चित करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांचा मुंबई कनेक्ट अधिक सुलभ होणार आहे.

वेळापत्रकात सोमवार वगळता मुंबई व पुणेसाठी मंगळवार ते रविवार अशी रोज विमानसेवा उपलब्ध असणार आहे. पुणे येथे जाण्यासाठी व येण्यासाठी रात्रीच विमानसेवा असणार आहे. सोमवारी हा कामाचा दिवस असतांना या दिवशी नेमकी सेवा का बंद ठेवण्यात आली. यामागील कारण मात्र पुढे आले नाही. या वेळापत्रकाप्रमाणे मुंबईला जाण्यासाठी ५० मिनिटे तर पुणे येथे जाण्यासाठी ४० मिनिटांचा वेळ लागणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आता ८४ दिवसानंतर ती सुरू होणार असली तरी तिचे वेळापत्रका हा कळीचा मुद्दा होता. त्यात मुंबईचे वेळापत्रक कामाच्या सोयीसाठी चांगले आहे. त्यामुळे या सेवेला प्रतिसाद मिळेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. गेल्या वेळी वेळापत्रक सोयीचे नसल्याने हा आनंद फार काळ टिकला नाही. नाशिक येथून सायंकाळी ६.२० ला विमान उडाण घेतल्यानंतर पुणे येथे ते ७ वाजता पोहचणार आहे. त्यानंतर ७.२० ते पुन्हा नाशिककडे ८ वाजता येणार आहे.

जळगावला वेगवेगळ्या वेळा
जळगाव येथे वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्याने व्यापारी पेठ असलेल्या या शहराला त्या फारशा सोयीच्या नसणार आहे. जळगावहून मुंबईला जाण्यासाठी मंगळावार, बुधवार व रविवारी सकाळी ७.४० वाजता विमानसेवा असणार आहे. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार व शनिवारी हीच सेवा दुपारी ३.१० वाजता राहणार आहे. पण, मुंबईहून जळगावकडे येणारी विमानसेवा मंगळवार ते रविवारपर्यंत सकाळी ७.४० असणार आहे. त्यामुळे जळगावकरांना मुंबईत मुक्काम करावा लागणार आहे.

आंदोलनला यश
नाशिकला अनेकदा घोषणा झाल्या पण उडाण झाले नाही. त्यामुळे या सेवेसाठी सत्तेत असतांनाही शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट दिल्लीत आंदोलन करावे लागले. त्याची दखलही घेण्यात आली. त्यामुळे नाशिक बरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला. नाशिकबरोबरच आता जळगावमधूनही ही सेवा मुंबईसाठी सुरू होणार आहे.

इतर शहरात हवी विमानसेवा
उद्योजक संघटना, पर्यटन संस्था, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी संघटना यांनी तर विमानसेवा सुरू करण्यासाठी विविध पातळीवर मोहीम उघडली. पण, ही सेवा परवडत नाही असे एकमेव कारण पुढे करत ती सतत नाकारण्यात आली. केंद्राने उडाण योजना जाहीर केल्याने त्यातून नाशिकला त्याचा फायदा झाला. पण, ही सेवा मुंबई, पुणे या शहरापर्यंत न राहता तिची भरारी मोठ्या शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी व्हावी हा आग्रह सर्वांचा आहे. त्यामुळे भविष्यात त्यातून शहराच्या उद्योग व व्यापाराला फायदा होणार आहे.

एक रुपया तिकीट
विमानसेवेचा शुभारंभ करण्यासाठी कंपनीने ‘लकी-ड्रॉ’ची घोषणा केली आहे. त्यामुळे बुकिंग करणाऱ्या काही भाग्यवंतांना अवघ्या एक रुपयात तिकीट मिळणार आहे. तसेच १४०० रुपयांपासून तिकीट दर राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. उडान योजनेत तिकिटांचा दर २५०० रुपये घोषित करण्यात आला आहे.

अनेकांना फायदा
नाशिकमधून नातळ सुट्यांसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे या सर्वांना मुंबई आणि तिथून पुढे जाण्यासाठी ही विमानसेवा सोयीची ठरणार आहे. म्हणून पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तिकीट दर
सध्या नाशिककर मुंबई विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सी, कॅब तसेच कार बुक करतात. त्यास प्रतिसीट ११०० ते १५०० रुपये लागतात. त्याच दरात विमानाच्या तिकिटाचे दर राहणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांसाठी नाशिककरांना २३ डिसेंबरपासून विमानसेवा मिळणार आहे. दिल्लीतील आंदोलनाची सरकारने दखल घेतली. ही सेवा अखंड सुरू रहावी यासाठी पुढील काळातही प्रयत्न केले जाणार आहे. मुंबई, पुणेसह नवी दिल्ली, हैद्राबाद, बेंगळुरूसह विविध मोठ्या शहरासाठी ही सेवा मिळावी ही अपेक्षा आहे.
- हेमंत गोडसे, खासदार

बहुचर्चित विमानसेवेचे बुकिंग सुरू झाल्याचा आनंद आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्याचा उद्योगाला निश्चित फायदा होणार आहे. अनेक उद्योजकांना कमी वेळात प्रवास करता येणार आहे. तसेच नाशिकमध्ये गुंतवणूकवाढीस मदत होणार आहे.
- मंगेश पाटणकर, अध्यक्ष निमा

विमानसेवेचे वेळापत्रक (नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव)
विमान नंबर - उडाणाचे ठिकाण - येण्याचे ठिकाण - उडाणाची वेळ - पोहचण्याची वेळ - उड्डाणाचे वार
डीएन १९१ - नाशिक - मुंबई - ६.२०- ७.१० - मंगळवार ते रविवार
डीएन १८१- मुंबई - जळगाव - ७.४० -९.१०- मंगळवार ते रविवार
डीएन १८२ - जळगाव - मुंबई - ११.१५ - १२.४५ - मंगळ,बुध, रविवार
डीएन १९२ - मुंबई - नाशिक - १७.१० -१८.०० - मंगळवार ते रविवार
डीएन १९३ - नाशिक - पुणे - १८.२० - १९.०० - मंगळवार ते रविवार
डीएन- १९४ - पुणे - नाशिक - १९.२० - २०.०० - मंगळवार ते रविवार
डीएन - १८२ - जळगाव -मुंबई - १५.१० - १६.४० - गुरुवार, शुक्रवार, शनिवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस चौकीवर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसे हरविल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने पोलिस चौकीवर दगडफेक करून चौकीचे नुकसान केले. जुन्या नाशकातील दुधबाजार परिसरात मंगळवारी हा प्रकार घडला. या घटनेत चौकीचे दार व खिडकीच्या काचा फुटून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. चौकीमध्ये पोलिस कर्मचारी उपस्थ‌ित नसल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता भद्रकाली पोलिसांनी व्यक्त केली आहे.

समाधान साहेबराव कुमावत (३८, रा. पगारे मळा, उपनगर) असे दगडफेक करणाऱ्या संशय‌िताचे नाव आहे. त्याला अटक झाली असून एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावत हे मंगळवारी (दि. १२) दुपारी खरेदीसाठी दुधबाजारात आले होते. त्यावेळी त्यांचे पाकिट चोरीस गेले. तक्रार देण्यासाठी ते पोलिस चौकीत आले. मात्र पोलिस कर्मचारी जेवणासाठी गेला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या कुमावत यांनी तेथून बाहेर पडत दगड उचलून आणला. कुणाला काही कळण्यापूर्वीच त्याने तो दरवाजावर टाकला. त्यानंतर दगडफेक करीत खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. या घटनेत चौकीचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबादमधील हुक्का पार्लरवर कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद शिवारात सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी मंगळवारी (दि. १२) रात्री छापा टाकला. या कारवाईत ताब्यात घेतलेल्यांमध्ये हॉटेलचालक, हुक्का पार्लर ग्राहक तसेच तरुण-तरुणींचा समावेश आहे. जागामालक फरार असून, यावेळी दोन बालकामगारांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मखमलाबाद शिवारातील सुयोजित गार्डनरोडवरील हॉटेल हबीबी येथे अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. १२) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी हॉटेलचालक जितेंद्र बिहारीलाल उपाध्याय याच्यासह हुक्का पार्लर ग्राहक सौरभ ज्ञानेश्वर गायकवाड, रितेश गोविंद देव, समीर श्रीकांत बाल, दीपांश प्रवीण गर्ग, अपूर्व राजेश तेंडूलकर, प्रसाद रवींद्र राजपूत, अभिजित मिलिंद पाटील, सौरभ जगन्नाथ डांगे, शेख जुनेद अल्ताफ यांच्यासह दोन २१ वर्षांच्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले. यावेळी कामावर असलेल्या दोघा बालकामगारांची सुटका करण्यात आली. कारवाईत सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, म्हसरूळ ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्यासह महिला पोलिस सहभागी झाले.

जागामालकावरही गुन्हा
कारवाईत हुक्का पार्लर साहित्य व मद्याच्या बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जागामालक युवराज माळी (रा. मखमलाबाद) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अशा गुन्ह्यात जागामालकावर कारवाई झाल्याची पहिलीच घटना आहे.

मखमलाबादमधील कारवाईतून जागामालकांना योग्य संदेश गेला आहे. हॉटेल चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागास पाठविण्यात येणार आहे. तसेच बालकामगार उपायुक्तांनाही प्रस्ताव देण्यात येणार आहे.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात जणांवर ‘पीटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेश्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी मदत तर नाही पण आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप एका तरूणीने केल्यानंतर ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी रातोरात धाडसत्र राबवून तिघांना अटक केली. या घटनेत सात आरोपींविरोधात मानवी तस्करी कायद्यानुसार (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील कुंटणखाना चालविणारी महिला नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणे, तिचा मुलगा विशाल गंगावणे आणि दलाल सोनू देशमुख अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. उर्वरित चौघा जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. यात पीडीत मुलीच्या मावशीचाही समावेश आहे. भारतात फिरायला जायचे असे सांगत पीडितेची मावशी मजदा शेख हिने संबंधित तरूणीला मुसळगाव येथे आणून तिची विक्री केली. साधारणतः वर्षभरापूर्वी मुलीने स्वत:ची सुटका करून पोलिसांची मदत मागितली. मात्र, सिन्नरच्या तत्कालीन पोलिसांनी तिला बांगलादेशला पाठवल्याचा खोटा अहवाल सादर करून कुंटणखाना मालकांकडेच सोपवले होते. मुंबई येथून कोलकाता येथे पोहचलेल्या मुलीने पुन्हा एकदा सुटका करून नाशिक गाठले. येथे तिने बुधवारी (दि. १३) सर्व प्रकार प्रसारमाध्यमांसमोर कथन केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने बुधवारी सिन्नरमध्ये ठिक-ठिकाणी छापे मारले. विशेष म्हणजे सिन्नरसह एमआयडीसी पोलिसांना या कारवाईची माहितीच देण्यात आली नाही. गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. सदर पीडित तरूणीला बालसुधारगृहात ठेवून तिला संरक्षण देण्यात आले आहे. तिच्या इच्छेनुसार तिला तिच्या पालकांकडे सोपवण्याची कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे उपस्थित होते.

कारवाईनंतर अड्डे पुन्हा सुरू

नानीवर यापूर्वीच पिटाचे दोन गुन्हे दाखल असून प्रत्येक वेळी तिला पोलिसांच्या कृपेने जामीन मिळाल्याचे समजते. यापूर्वी तर सिन्नर पोलिसांना टाळून निफाड पोलिसांनी कारवाई केली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी यानंतर सिन्नरच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती. मुसळगाव येथे वेश्या व्यवसाय नेहमीच चर्चेत असतो. मात्र, तो पूर्णतः बंद व्हावा यासाठी ठोस प्रयत्न होत नाही.

तस्करीचे धागेदोरे शोधणार

संबंधित तरूणीबाबत घडलेला प्रकार हा वर्षभरापूर्वीचा आहे. अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मुसळगावसह जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात आले. मुसळगाव येथील कुंटणखाना बंद करून तो सील करण्यात आला. या तरूणीच्या तक्रारीबाबत बुधवारी माहिती मिळाली. त्यानुसार पीडितेला लागलीच संरक्षण पुरवण्यात आले. तिच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच तिघांना अटकही केली आहे. या सर्व प्रकरणाची आम्ही पाळेमुळे शोधत असून यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती दराडे यांनी दिली. बांगलादेशातून होणारी मुलींची तस्करी, बनावट कागदपत्र आणि वेश्या व्यवसायातील साखळी शोधत आहे. याचा योग्य तपास करून सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले.

पोलिसांचे दणाणले धाबे
पोलिसांकडून मदत न मिळाल्याची गंभीर तक्रार पीडितेने केली असून, या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिले आहेत. चौकशीची जबाबदारी अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे त्यावेळी सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलिस अधिकारी व संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

मानवी तस्करीवर विधानसभेत चर्चा

बांगलादेशी तरुणीच्या मानवी तस्करीबाबत पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाची चौकशी व्हावी तसेच कुंटणखाना चालवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत जाधव यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात विशेष उल्लेखाच्या सूचनेद्वारे केली.

मानवी तस्करीच्या माध्यमातून बांगलादेशामधून फसवून आणलेल्या तरूणीची सिन्नरजवळील मुसळगाव येथे विक्री झाली. मात्र, सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या तरूणीला पोलिसांनी मदत केली नाही. तिने आपबिती कथन केल्यानंतर पोलिस यंत्रणेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी संबंधित तरूणीला सुखरूप बांगलादेशात सोडविल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता. पण प्रत्यक्षात त्या मुलीची आणखी होरपळ होऊन तिला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांनी सदर मुलीला दहशतवादी ठरवण्याची धमकी दिली होती. हा सर्व प्रकार धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार जाधव यांनी सभागृहात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डस्टबिन खरेदीबाबत महापौर, आयुक्तांकडून दखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या २१ लाख रुपयांच्या डस्टबिन खरेदी घोटाळ्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापौरांसह आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला आहे. डस्टब‌िन खरेदी घोटाळ्याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी केली आहे. त्यामुळे डस्टबिनची खरेदी आरोग्य विभागाच्या अंगलट येणार आहे.

शहरात केंद्र सरकारच्या पथकामार्फत ४ जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार असून, पालिकेने आपले गुणांकन सुधारण्यासाठी पैशांची उधळपट्टी सुरू केली आहे. शहरातील बाजारपेठ परिसरात ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन बसविल्या आहेत. या खरेदीमुळे उलट पालिकेचीच कचराकुंडी मुक्त शहराची घोषणा मोडीत निघाली आहे. या डस्टबिनची खरेदी अव्वाच्या-सव्वा दरात करण्यात आल्याने यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि प्रशासनावर निशाणा साधत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकाराची महापौर तसेच आयुक्तांनीही गंभीर दखल घेतली आहे. महापौर रंजना भानसी यांनी खरेदीबाबत शंका उपस्थित केल्या असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या. खरेदीचा निर्णय धोरणात्मक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला. डस्टबिन खरेदीसंदर्भात झालेल्या आरोपप्रकरणी आरोग्य विभागाकडून अहवाल मागविण्यात येत असून, बाजारपेठेतील दर आणि प्रत्यक्ष निविदेतील दर याची पडताळणी केली जाणार असल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांग‌ितले. त्यामुळे आरोग्य विभागाची स्वच्छतेतील परस्पर धुलाई चांगलीच अंगलट येणार आहे. ‌शिवाय, येत्या महासभेत विरोधकांकडून या विषयाचे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारीही सावध झाले असून, त्यांनी आरोग्य विभागावरच सर्व प्रकरण ढकलले आहे. त्यामुळे यातील अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images