Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अध्यादेशामुळे अडकला ‘राज्य नाट्य’चा निकाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्या केंद्रांवर १५ पेक्षा जास्त नाटके सादर होतील तेथून दोन नाटके अंतिमला जाणार असल्याची सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची घोषणा राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाच्या मूळावर आली आहे. स्पर्धा होऊन दोन दिवस उलटूनही अद्याप केवळ ‘तो’ अध्यादेश जारी न झाल्याने स्पर्धेच्या निकालाचा त्रिशंकू झाला आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी अंतिम फेरीत दोन नाटके जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे केंद्र्रांनी जल्लोषही केला; मात्र ही घोषणाच आता निकालामध्ये अडसर बनू पहात आहे. तावडे यांच्या घोषणेचा अध्यादेश अद्यापही निघालेला नाही. त्यामुळे केंद्रांवरील स्पर्धांचे निकाल अडवून ठेवण्यात आलेले आहे. राज्यात १९ केंद्रांवर हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली असून काही ठिकाणच्या स्पर्धा झाल्या आहेत. मात्र, काही केंद्रांवरील स्पर्धा संपण्यासाठी अद्याप काही दिवस बाकी असल्याने त्यांच्या निकालावर परिणाम होऊ नये म्हणून आधीच्यांचे निकाल थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात नाशिकचाही नंबर असून येथील केंद्रावर तब्बल २१ नाटके सादर झाली आहेत. त्यातही अत्यंत चुरस असून एकाहून एक सरस नाटके येथे झालेली असल्याने अंतिमला कोणती दोन नाटके जातात याबद्दल उत्सुकतेचे वातावरण आहे.

आज होणार घोषणा?
नाशिक केंद्रावरील स्पर्धा शनिवारी (दि. २५) संपल्या. मधे रविवार (दि. २६) आल्याने त्यादिवशी निकाल लागला नाही मात्र तिसऱ्या दिवशी, सोमवारी हा निकाल लागणे अपेक्षित असताना तावडे यांच्या घोषणेचा जीआर अद्याप आलेला नसल्याने निकाल रखडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. जीआर येत नाही तोपर्यंत तरी नाशिकच्या रंगकर्मींना वाटच पहावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २८) उशिरापर्यंत निकालाची घोषणा होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारचा खोटारडेपणा उघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भाजपने सत्ता मिळवली. मात्र तीन वर्षे झाले, तरी सरकार आश्वासने न पाळता फसव्या घोषणा देत आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन पुकारले. त्यामुळे जनता आता या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादीने प्रदेशाद्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. त्यावेळी तटकरे बोलत होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान दिंडोरी-कळवण रस्त्यावरून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाद्यक्ष तटकरे यांनी केले. मोर्चात कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जयंत जाधव, दीपिका चव्हाण, माजी आमदार दिलीप बनकर, संजय चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, कृऊबा सभापती दत्तात्रेय पाटील, महिला आघाडी अद्याक्ष प्रेरणा बलकवडे, भारती पवार, रंजन ठाकरे आदींसह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

मोर्चात काही शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात सरकार विरोधात घोषणा देत एका तासाने हल्लाबोल मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर धडकला. तेथे झालेल्या सभेतसर्वच नेत्यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला.

तटकरे यांनी राज्य व केंद्रातील शिवसेना भाजप युतीच्या कारभारावर जोरदार टीका केली. गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले युती सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देवून युती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यवसायिक, शिक्षक, डॉक्टरांसह सर्वच क्षेत्रांमध्ये युती सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, वाढती महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, शिष्यवृत्तीचा प्रश्न, शिक्षणाच्या सुविधा यासारख्या विविध समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी तीव्र आंदोलन करणार असा इशारा तटकरे यांनी दिला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना देण्यात दिले.

बारा डिसेंबरला विधानभवनावर हल्लाबोल

विविध मुद्द्यांवर सरकार अपयश ठरले आहे. अनेक समस्या जैसे थे आहेत. सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूर अधिवेशनात १२ डिसेंबरला हल्लाबोल मोर्चा नेण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलीचा दिंडोरीत खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

‌एका शाळकरी मुलीचा खून करून तिचे हातपाय बांधलेला मृतदेह गोणीत दगड भरून तलावात फेकल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. तिची ओळख पटली नसल्याने आणि शवविच्छेदन अहवालही मिळाला नसल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेचे पोलिसांनी धागेदोर मिळालेले नव्हते.

आंबेगण शिवारातील पाझर तलावात सोळा ते अठरा वयोगटातील अज्ञात शाळकरी मुलीचा मृतदेह एका प्लास्टिक गोणीत हातपाय बांधून तसेच, गोणीत दगड टाकलेल्या अवस्थेत आढळून आला. पाझर तलावालगत राखेचा कार्यक्रम आटोपलनंतर पोलिस पाटील संदीप गायकवाड, आदी हातपाय धुण्यासाठी गेले असता त्या पाझर तलावाच्या कडेला त्यांना एक गोणी आढळली. त्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी दिडोंरी पोलिस स्टेशनला कळवले.

असे आहे मुलीचे वर्णन

मुलीच्या अंगात काळी जीन्स पॅन्ट असून, त्यावर कंबरेला मविप्र संस्थेचा लोगो असलेला बेल्ट आहे. निळसर डिजाइन व त्यावर फुले असलेला अंगात गुलाबी कलरचा टॉप घातलेला आहे. डाव्या हाताला नेलपॉलिश लावलेली व डाव्या बोटात अंगठी तसेच डोक्याला व चेहऱ्याला मार लागलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिस्ट दाम्पत्याची महाराष्ट्र राइड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सायकलिंगचा प्रचार आणि प्रसार व त्या माध्यमातून होणारे पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य देवीदास आणि प्रतिभा आहेर हे दाम्पत्य महाराष्ट्र राइडसाठी एक डिसेंबर रोजी रवाना होणार आहे. या अनोख्या राइडदरम्यान हे दाम्पत्य महाराष्ट्रभर सायकलवर २,३०० किमीचा प्रवास करणार असून, विविध शिक्षण संस्थांना भेटी देणार आहे.

महाराष्ट्र राइडमध्ये आहेर दाम्पत्य अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे, साडेतीन गणपती शक्तिपीठे, जेजुरी, पंढरपूर, नांदेडचा गुरुद्वारा यासह महाराष्ट्रातील वीसहून अधिक देवस्थानांना भेट देणार आहे. महाराष्ट्रातील एकूण १९ जिल्ह्यांतून जाणाऱ्या या राइडदरम्यान हे दाम्पत्य विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणार आहे. पर्यावरणाची, तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांविषयी आपुलकीचे नाते असलेल्या नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांना ही राइड समर्पित असल्याची भावना देवीदास आहेर यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक सायकलिस्ट सायकलिंगचा प्रचार करताना नाशिक पेलेटॉन, पंढरपूर सायकलवारी, अष्टविनायक सायकल यात्रा, एनआरएमसारख्या उपक्रमांतून आहेर दाम्पत्य सहभागी होत असतात. महाराष्ट्रात असा प्रयोग प्रथमच होत असल्याचे नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी सांगितले. ४६ वर्षीय देवीदास आहेर आणि ३६ वर्षीय प्रतिभा आहेर २०१० पासून सायकलिंग करीत असून, त्यांनी आतापर्यंत २८ हजार किलोमीटर सायकल प्रवास केला आहे. देवीदास आहेर बांधकाम व्यावसायिक असून, प्रतिभा आहेर त्यांना व्यवसायात मदत करीत असतात. अष्टविनायक यात्रा, पंढरपूर सायकलवारी, नाशिक पेलेटॉन त्यांनी सोबत पूर्ण केल्या आहेत. नाशिकच्या त्र्यंबक रस्त्यावर हे दाम्पत्य सायकलिंगचा नियमित सराव करीत असतात.

अशी असेल महाराष्ट्र राइड

नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, रायगड, ठाणे या वीस जिल्ह्यांतून ही मोहीम आखण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवघेण्या वाहतुकीकडे होतेय सर्रास दुर्लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथे पिंपळगाव रस्त्यावर सोमवारी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे अतिवजनामुळे चाक निखळल्याने ट्रॉली पलटून उसाच्या ढिगाऱ्याखाली दोन जण दाबले गेले होते. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. हा प्रसंग ताजा असूनही या रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. यामुळे प्रशासन आणखी एखाद्या अपघाताची वाट पाहतेय का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांचे मात्र फावले आहे.

निफाड परिसरातील रानवड व निफाड साखर कारखाने बंद असल्याने येथील ऊस शेतकऱ्यांनी संगमनेर, कोळपेवाडी, कादवा आदी कारखान्यांना दिला आहे. या कारखान्यांसाठी ऊस वाहणाऱ्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या जात असून, सुमारे २० टनापेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात आहे. हा प्रकार अनधिकृत आहे. ट्रॅक्टरची २० टन वाहतूक क्षमता नसतानाही केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात आहे. यामुळे मात्र अपघातांना आमंत्रण मिळत असून, इतर वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ट्रॅक्टर टॉलींना नंबरच नसतो. यामुळे अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात.दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची आणि इतरही वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. मात्र सर्रासपणे ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही. अशा वाहतुकीला अभय देऊन एकप्रकारे ग्रामीण भागातील रस्त्यावरील सुरक्षा वाऱ्यावर सोडत आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो.

रस्त्यावरील ही अवैध वाहतूक रोखण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी आरटीओ विभागाची आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस जास्त भरलेला असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होता.

- रणजित डेरे, पोलिस निरीक्षक, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडेंचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व शिवसेना नेते नरेंद्र दराडे यांनी मंगळवारी शेतकरी कर्जमाफीचे कारण देत पावणेतीन वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून जोरदार दबावतंत्र सुरू होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता जिल्हा बँकेवर भाजपचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वाचविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, प्रत्यक्षात मंगळवारी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांच्याकडे तो सादर केला. हा राजीनामा बकाल यांनी मंजुरीसाठी विभागीय सहनिबंधकांकडे पाठविला आहे. ३ जून २०१५ रोजी नरेंद्र दराडे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीप्रसंगी एक-एक वर्षाचा कालावधी ठरला होता. मात्र दीड वर्षे उलटूनही दराडे यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यावेळी संचालकांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात अविश्वास दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, संचालक मंडळातील काही संचालकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. नोटाबंदी अन् बँकेची रखडलेली वसुली यामुळे जिल्हा बँक वर्षभरापासून अडचणीत सापडली होती. सेनेच्या ताब्यात बँक असल्याने मदत मिळत नसल्याची चर्चा रंगली होती. त्यात अध्यक्ष दराडे यांनी अनेकदा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.

बँक भाजपच्या ताब्यात?

दराडे यांनी शेतकरी कर्जमाफीचा घोळ असल्याचे सांगत राजीनामा दिला असला तरी प्रत्यक्षात राजीनाम्यासाठी भाजपकडूनच त्यांच्यावर दबाव होता. दराडे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर भाजपकडून अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. माणिकराव कोकाटे, केदा आहेर, सीमा हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची नावे चर्चेत असून, कोकाटे यांचे नाव आघाडीवर आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या घोळामुळे बँक चालवणे अवघड झाले आहे. सव्वा लाख शेतकऱ्यांपैकी नऊ हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे.

- नरेंद्र दराडे, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्री पळवण्यासाठी सिडकोत‘लाल बाटल्या’

$
0
0

कुत्री पळवण्यासाठी सिडकोत‘लाल बाटल्या’

म. टा. वृत्तसेवा सिडको

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगूनही काहीही होत नसल्याने नागरिकांनीच अनोखी शक्कल लढवित या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोतील नागरिकांनी घरासमोर लाल रंगाचे पाणी बाटलीत ठेवून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही अंशी यश आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी ग्रामीण भागातून असे प्रयोग करण्यात आलेले आहेत. मात्र, याला अद्याप कुठलाही शास्‍त्रीय आधार नसल्याने याबाबत चर्चाही सुरू आहेत.

सिडकोत सर्वच भागात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रस्त्याने ये जा करतांना हे कुत्रे सरळ नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या अंगावर धावून जात असतात. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरसेवक व सिडकोतील महानगर पालिकेत तक्रारीसुद्धा केल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सिडकोच्या जवळच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र असल्याने निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांना सिडको परिसरातच सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा यासाठी महानगरपालिकासुद्धा हतबल झालेली आहे. नागरिकांनीच या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. यासाठी घरासमोर लाल रंगाचे पाणी असलेल्या बाटल्या ठेवून कुत्र्यांना अटकाव करण्याची शक्‍कल लढविली असल्याचे दिसत आहे. लाल कुंकू किंवा लाल रंगाचा वापर करून हे पाणी तयार करण्यात येत आहे. हे पाणी एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ते घराच्या दाराजवळ ठेवल्यास कुत्रे याठिकाणी येत नाहीत, असा तर्क नागरिकांनी काढला असून त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली आहे. परिसरातील एका नागरिकाने हे केल्यावर आता सिडकोतील बऱ्याच ठिकाणी या बाटल्या बघावयास मिळत आहेत. या बाटल्या पाहून कुत्रे पळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. एखादी नवीन वस्तू दिसल्यानंतर माणूसही त्या वस्तूला पाहून घाबरतो. त्याचप्रमाणे कुत्रेही त्या बाटल्यांचा पाहून घाबरत असावेत, असा काहींचा कयास आहे.

पालिकेला जाग येणार का?

सिडको परिसर हा कामगार वस्तीचा भाग असल्याने याठिकाणी रात्री अपरात्रीसुद्धा नागरिक कंपनीतून येत असतात. त्यावेळी रात्री या मोकाट कुत्र्यांचे टोळके अक्षरशः नागरिकांवर धावू जात असतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने होण्याची मागणी होत असते. मात्र, महानगरपालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. सिडकोतील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता तरी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

रायगड चौक परिसरातील प्रत्येक घरासमोर लाल बाटली असल्याचे लक्षात आल्यावर याची सखोल माहिती घेतली. महानगर पालिकेा नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिक अशी शक्‍कल लढवित आहेत. मात्र हे किती दिवस चालणार हा एक प्रश्नच आहे.

- योगेश गांगुर्डे, एकनिष्ठ सामाजिक संस्था

लाल पाणी पाहून कुत्रे घाबरतात हे चुकीचे आहे. लाल पाण्याची बाटली ही अनैसर्गिक गोष्ट असून ही पाहून कुत्रे घाबरत असले तरी एक दिवस हेच कुत्रे या लाल पाण्याच्या बाटलीजवळ खेळतांना दिसून आले तर आश्चर्य वाटू नये. हा एक गैरसमज आहे.

- गौरव क्षत्रिय, प्राणिमित्र संघटना

मागील दोन तीन दिवसांपासून घरासमोर लाल कुंकूंचे पाणी भरून ठेवल्याने एकही कुत्रे आलेले नाही. कुत्र्यांचा बंदोबस्त महानगर पालिकेकडून होत नसल्याने ही शक्‍कल शोधून काढली आहे.

- भागाबाई सूर्यवंशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फीसाठी विद्यार्थिनींना कोंडले

$
0
0

चेकऐवजी रोखीने रकमेची मागणी; जेलरोडवरील शाळेतील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

रोखीने शालेय फी भरली नाही म्हणून दोन चिमुकल्या विद्यार्थिनींना एका स्वतंत्र वर्गात दिवसभर कोंडून ठेवण्याची शिक्षा करण्याचा प्रकार जेलरोडवरील होली फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे. या प्रकाराबद्दल वैभव एकनाथ ताकटे (रा.जगतापमळा, नाशिकरोड) या पालकाने उपनगर पोलिस ठाण्यात शाळेविरोधात तक्रारही केली आहे. शाळेच्या अमानवी वागणुकीमुळे संबंधित पालकाच्या मुलींनी आता शाळेत जाण्यासही नकार दिला आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना फीच्या वसुलीसाठी शारीरिक शिक्षा करण्यासोबतच मानसिक त्रास देण्याचे प्रकार यापूर्वीही शहरात घडले आहेत. त्याचाच कित्ता जेलरोडच्या होली फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेकडूनही गिरवला आहे. पालकाने पोलिसांत तक्रार करून या प्रकाराला वाचा फोडली आहे. इतरही काही विद्यार्थ्यांच्या

बाबतीत हा प्रकार घडला असून, पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने कोणीही पालक या शाळेच्या विरोधात तक्रार करण्यास धजावत नसल्याचीही माहिती पुढे आली आहे. वैभव ताकटे यांनी शाळेची फी चेकद्वारे स्वीकारण्याची विनंती मुख्याध्यापिका सुप्रिया देव यांना केली होती. मात्र, त्यांनी या पालकाला रोख स्वरुपातच फी भरण्यास सांगितले. पालकाने शाळेची ही मागणी मान्य न केल्याने या पालकाच्या दुसरी व चौथीच्या वर्गात शिकणा-या दोन्ही मुलींना रेग्युलर वर्गात बसण्यास मनाई करून त्यांना एका स्वतंत्र वर्गात बसविण्यात आले. या वर्गात मुली पूर्णवेळ एकट्याच्या राहिल्याने त्या घाबरल्या असून, शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे पालकाचे म्हणणे आहे. मुलींना शाळेत न पाठविण्याचा निरोप या शाळेने वाहनचालकामार्फत पालकांना दिला.

या प्रकाराची अधिकारी व केंद्र प्रमुखांमार्फत तात्काळ चौकशी केली जाईल. संबंधित विद्यार्थी शाळेतील त्यांच्याच वर्गात बसतील. चेकने फी स्वीकारणे कायदेशीरच आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयालाही पाठविला जाईल.

-नितीन उपासणी, शिक्षणाधिकारी, मनपा, नाशिक

रोख फी न भरल्याच्या कारणास्तव ज्या वर्गात शिक्षक नसतात तेथे माझ्या दोन्ही पाल्यांना वेगळ्या रुममध्ये बसवले जात आहे. न्याय मिळण्यासाठी या शाळेच्या गेटवर मी कुटूंबासह धरणे आंदोलन करणार आहे.

-वैभव ताकटे, पालक, होली फ्लॉवर स्कूल,

सध्या अठरा महिन्याची फी बाकी आहे. चेक बाऊन्सच्या कारणास्तव त्यांच्याकडून आता चेकद्वारे फी घेण्यास नकार दिला आहे. मात्र, फीच्या कारणास्तव त्यांच्या पाल्याला कोणत्याही स्वरुपाचा त्रास शाळेकडून दिलेला नाही.

- सुदीप देव, संस्थापक, होली फ्लॉवर स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार कोटींचा निधी खड्ड्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी मिळालेला सुमारे चार कोटी रुपयांचा निधी खड्ड्यात गेल्याचे मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती सभेत उघड झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रस्ते दुरुस्तीसाठी मिळणारा कोट्यवधींच्या निधीतही घोळ झाला असण्याची शक्यता आहे. या निधीचा विनियोग कशा प्रकारे झाला, याचा खुद्द पालिका अधिकाऱ्यांनाच थांगपत्ता नसल्याची धक्कादायक बाब सभेत उघड झाली. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी सभागृहात रस्ते दुरुस्ती निधीचा मुद्दा उपस्थित केला होता. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून घरचा आहेर दिला.

येथील पालिका विभागीय कार्यालयात काल नाशिकरोड प्रभाग समितीची सभा सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या सभेत फुटपाथवरील अतिक्रमण, पाणीपुरवठा, बाजार कर वसुली, बेकायदेशीर पार्किंग, जॉगिंग ट्रॅक, कचरा, ड्रेनेज, उद्याने दुर्दशा या प्रश्नांवर नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. आर्टिलरी सेंटरमधून येणारे ड्रेनेजचे पाणी वालदेवी नदीत मिसळत असल्याचा मुद्दा सरोज आहिरे यांनी, तर देवळाली गावातील बाजार पटांगणावर शेतकऱ्यांकडून स्थानिक गुंड हप्ता वसुली करीत असल्याचा मुद्दा सत्यभामा गाडेकर यांनी उपस्थित केला. प्रभागात स्वच्छता होत नसल्याचा व स्वच्छता कर्मचारी केवळ सहीपुरते हजेरी लावत असल्याचा आरोप नगरसेवक शरद मोरे व ज्योती खोले यांनी केला.

‘मटा’च्या वृत्ताचे पडसाद

चेहेडी पंपिंग स्टेशन येथील पालिकेच्या साठवण बंधाऱ्यात वालदेवी नदीपात्रातील दूषित पाणी मिसळत असल्याने नाशिकरोड जलकुंभाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात ‘मटा’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताचे पडसाद प्रभाग समिती सभागृहात उमटले. नगरसेविका जयश्री खर्जुल यांनी या प्रश्नावर काय उपाययोजना केली, असा सवाल सभागृहाला विचारत ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खर्चाचा हिशेब द्या

विभागात रस्ते दुरुस्तीकामी आलेल्या ३ कोटी ८६ लाख रुपये निधी कोणत्या प्रभागात किती खर्च झाला याचा हिशेब संगीता गायकवाड यांनी मागितला. परंतु, पालिका अधिकाऱ्यांकडे या निधी खर्चाबाबत काही माहिती उपलब्ध नव्हती. अतिक्रमण का काढले जात नाही, फुटपाथवरील बेकायदेशीर टपऱ्या का काढल्या जात नाहीत, या प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. विभागीय अधिकाऱ्यांचा प्रशासनावर अंकुशच राहिला नसल्याचा आरोपही नगरसेविका गायकवाड यांनी यावेळी केला.

विकासनिधीच्या नावाखाली फसवणूक

गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांकडून नळ कनेक्शनसाठी विकासनिधीच्या नावाखाली सहा हजार रुपये पालिकेकडून उकळले जात असल्याचा आरोप नगरसेवक संतोष साळवे यांनी केला. अशा प्रकारचा विकास निधी पालिकेच्या उर्वरित विभागांत घेतला जात नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. डिपॉझिटच्या रकमेतही इतर विभाग व नाशिकरोड विभागात फरक का, असा सवाल करुन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणीही केली.

दिनकर आढावांचा आक्षेप

प्रभाग समितीची सभा सुरू झाल्यावर सहाय्यक नगर विकास सचिव आव्हाळे यांनी विषयपत्रिकेवरील विषय एकामागोमाग एक याप्रमाणे वाचण्यास सुरुवात केली. या विषयांवर चर्चेला वेळ न देताच मंजूर झाल्याचे सांगताच ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी यावर आक्षेप नोंदवला. ‘सभागृहाचे कामकाज कसे चालते’ असा सवालच त्यांनी सभापतींना विचारल्याने काही वेळ सभागृहात शांता पसरली.

मौनी नगरसेवक

विशाल संगमनेरे, संभाजी मोरुस्कर, कोमल मेहरोलिया, केशव पोरजे, पंडित आवारे, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुनीता कोठुळे, अंबादास पगारे, मीरा हांडगे आदी नगरसेवकांनी कालच्या प्रभाग समितीच्या सभेतील चर्चेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात एकही समस्या नाही का, असा प्रश्न त्यांच्या मौनी भूमिकेमुळे निर्माण झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब’चे रविवारी गेट टुगेदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सभासदांसाठी डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. गेट टुगेदर, म्युझिकल प्रोग्रामसमवेत स्नॅक्सचा आनंद असा हा महिना एन्जॉयमेंटचा राहणार आहे. या एन्जॉयमेंटमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कल्चर क्लबचे सभासद होण्याची संधी चालून आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी गेट टुगेदर होणार आहे. रविवारी, ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची सुरुवात म्युझिकल प्रोग्रामने होईल. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटांतील गाणी, तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी सभासदांना मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सभासदत्व मिळवले तर तुम्हीही या वेगवगेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकणार आहात. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी आधीच रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केवळ कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी असल्याने आजच कल्चर क्लबचे सभासद व्हा. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क ः ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com वर लॉगइन करा.

कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक ः
https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक ः https://twitter.com/MTCultureClub
टीप ः कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, जाणून घेऊया गोदेचे वैभव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी पात्रातील काँक्रिटीकरणावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पूर्वी गोदापात्र कुंडांच्या वैभवाने बहरलेला होता. प्रत्येक कुंड वेगवेगळ्या कारणांसाठी वापरात होते. ही व्यवस्था निर्माण करण्यामागेही कारणे होती. मात्र दरम्यानच्या काळात ही कुंडे तोडून पात्राचे काँक्रिटीकरण झाले. ही कुंडे नेमकी कुठे आणि कशी होती. त्यांचा इतिहास काय हे समजून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे गोदाघाटावर रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक हे धार्मिक शहर आहे. याच्या नोंदी अगदी पुराणांपासून ते दोन हजार वर्षांच्या शिलालेखांमधूनही हे स्पष्ट होते. या शहरात दररोज हजारो पर्यटक गोदापात्रातील रामकुंडाच्या दर्शनासाठी देशभरातून येतात. गोदापात्रातील विविध कुंडांचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण आहे. रामकुंड, गोपिकाबाईंचा तास, लक्ष्मण कुंड, धनुष कुंड, सीता कुंड, अहिल्याबाई कुंड, सारंगपाणी कुंड, दुतोंड्या मारूती कुंड, सूर्य कुंड (पाच देऊळ कुंड), अनामिक कुंड, दशाश्वमेध कुंड, रामगया कुंड, पेशवा कुंड अथवा शिंतोडे महादेव कुंड, खंडोबा कुंड, ओक कुंड, वैशंपायन कुंड, मुक्तेश्वर कुंड अशा अनेक कुंडांनी गोदावरी पात्र मंत्रमुग्ध झाले होते. प्रत्येक कुंडाचा वापर आणि महत्त्व ठरलेले होते. दरम्यानच्या काळात ही कुंडे तोडण्यात आली. मात्र ही कुंड पुन्हा निर्माण झाल्यास पाण्याचे स्त्रोत जिवंत होतील व गोदावरी पुन्हा खळखळू लागेल, असा अनेकांचा विश्वास आहे. यावर कोर्टात कायदेशीर लढादेखील सुरू आहे. त्यामुळे या कुंडांचे महत्त्व आणि गरज जाणून घेण्यासाठी ‘मटा’तर्फे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. कुंडांविषयी सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, इतिहास अभ्यासक प्रा. रामनाथ रावळ माहिती करून देणार आहेत.


गोदापात्रातील ही कुंडे म्हणजे पाण्याचे जीवंत स्त्रोत होते. ते बुजविले गेल्याने गोदेची ही अवस्था आहे. त्यामुळे हेरिटेज वॉकच्या निमित्ताने या कुंडांबाबत माहिती नाशिककरांपर्यंत गेली तर जनजागृती व्हायला मदत होईल.

- देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते

नावनोंदणी आवश्यक

‘मटा’ हेरिटेज वॉक ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. यासाठी यशवंतराव महाराज मंदिरासमोर एकत्र‌ित जमायचे आहे. वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावरील व्हॉटसअॅपवर आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या मॅसेज करायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगपूरला होणार उपबाजाराची निर्मिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायखेडा उपबाजार आवाराला उर्जितावस्था देत गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार औरंगपूर येथे उपबाजार आवार पूर्णवेळ सुरू करणार असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी केले.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने राजाभाऊ सांगळे यांनी औरंगपूर येथे रविवार व गुरुवारसह आठवडाभर उपबाजार आवार सुरू ठेवण्याची मागणी केली. तसेच, कार्यक्षेत्रातील सर्व गावांत सौरऊर्जेचे दिवे लावण्याची मागणी केली. व्यापारीवर्गाच्या वतीने सोहनलाल भंडारी यांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढीवर भर देऊन दूध डेअरी, कोल्ड स्टोअर, पेट्रोल पंप आदी योजना राबविण्याची मागणी केली.

सायखेडा उपबाजार आवार कायम ठेवून तेथील सुटीच्या दोन दिवस औरंगपूर येथे उपबाजार आवार शेतकरी बांधवाच्या मागणीनुसार सुरू केला आहे. आता संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार असून, सायखेडा मार्केटवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. याबाबतीत गोदाकाठ परिसरात सायखेडा मार्केट स्‍थलांतरित केले जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. केवळ शेतकऱ्यांच्या सोयीसाठी औरंगपूर येथे रविवार व गुरुवार असे दोन दिवस मार्केट भरवणार असून, या बाबतीत अफवा पसरू नये, असे सभापती बनकर म्हणाले. संचालक सुरेश खोडे यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन सचिव संजय पाटील यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती धनवटे, विजय कारे, नारायण पोटे, संजय मोरे, सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, सुरेश खोडे, गुरुदेव कांदे, गोकुळ गिते, साहेबराव खालकर, चिंतामण सोनवणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी हिताच्या निर्णयांना प्राधान्य

बाजार समितीचे उत्पन्नाचे स्रोत वाढवताना शेतकरी हितावह निर्णय घेऊन बिसलरी पाण्याचा बीओटी तत्त्वावर सौर विद्युत प्रकल्प, दूध डेअरी, पेट्रोल पंप आणखी अनेक उपक्रम असल्याचे सभापती बनकर यांनी सांगितले. पिंपळगाव ते दिंडोरी २६ कोटींच्या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत असून, तोपर्यंत शासनाकडून रस्त्याची डागडुजी न झाल्यास बाजार समिती ती करेल. प्रवेशद्वारावर छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतल्याचे सांगून अडचणीच्या काळातही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोख पैसे अदा करण्याची परंपरा व्यापारी, आडतदारांनी ठेवल्याबद्दल आभार मानतो, असे बनकर यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यात गेलं नाशिकरोड!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने मोहीम राबवल्याचा दावा केला असला तरी अनेक प्रमुख ठिकाणी रस्त्यांवर जीवघेणे खड्डे कायम आहेत. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. यंदा पावसाळा जास्तच लांबला. जोरदार पावसामुळे नाशिकरोड, जेलरोड, उपनगर आदी भागांत रस्त्यांवर खड्डे पडले होते. आंबेडकर सिग्नलपुढील पोलिस उपायुक्त कार्यालयापुढे पाच फुटांचा खड्डा पडला होता. द्वारका ते बिटकोदरम्यान अनेक ठिकाणी खड्डे झाले होते. त्यातील बहुतांश बुजवून डांबरीकरण झाले असले तरी काही प्रमुख ठिकाणी खड्डे तसेच आहेत.

पुलाखाली खड्डा

नाशिकरोड उड्डाणपुलाखाली बिटको चौकातील वाहतूक बेटाभोवतीचे खड्डे बुजविलेले नाहीत. येथे वाहनचालक घसरून पडू शकतो. सिन्नर फाट्याकडे जाताना जो छोटा पूल सुरू होता. तेथेच मोठा खड्डा आहे. त्यामध्ये दुचाकीच नव्हे, तर चारचाकी आदळून अपघाताची भीती असल्याने नागरिकांनी त्यात फांद्या रोऊन धोक्याचा इशारा दिला आहे. बिटको कॉलेजशेजारील के. जे. मेहता शाळेकडे जाणाऱ्या भा. वि. जोशी मार्गाच्या कोपऱ्यावरच रस्ता खोदून अनेक दिवस झाले. मात्र, दुरुस्ती झालेली नाही. ओढ्याहून नांदूरनाक्यावर आल्यावर जेलरोडकडे वळताना असलेला खड्डा कायम आहे. उपनगरांमधील खड्डेही कायम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेटवर नाशिकचे तिघे

$
0
0

डॉ. वाघ, पाडवी, सोनवणे यांची निवड; व्यवस्थापनातून पीछेहाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पार पडलेल्या सिनेट निवडणुकीत नाशिकची व्यवस्थापन गटातून पीछेहाट झाली असली तरीही पदवीधर गटासाठी पार पडलेल्या सिनेट निवडणुकीत मात्र तीन नाशिककरांना यश मिळाले आहे. यामुळे आगामी काळात विद्यापीठात नाशिकच्या परिघातील शैक्षणिक प्रश्न विद्यापीठात पोहचविण्यासाठी नेतृत्व मिळाले आहे. विद्यापीठात व्यवस्थापन गटात विद्यापीठ प्रगती पॅनलने ५ पैकी ३ जागा मिळवत वर्चस्व राखले. तर सिनेट गटातून एकूण १० पैकी ८ जागांवर यश मिळवत विद्यापीठ एकता पॅनलने वर्चस्व राखले.

या निवडणुकीत पदवीधर सदस्यपदासाठी एकता पॅनलतर्फे उभे असलेले मविप्रचे डॉ. तानाजी वाघ, राखीव गटातून मविप्रच्या तीसगाव शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ पाडवी आणि व्ही. एन. नाईक संस्थेचे विजय सोनवणे यांची निवड सिनेट सदस्य पदासाठी झाली आहे. तर प्रगती पॅनलतर्फे निवडणूक लढविणारे हेमंत दिघोळे, जयकर ग्रुप प्रणीत विद्यापीठ विकास मंडळातर्फे बाकेराव बस्ते आणि व्यवस्थापन गटातून अशोक सावंत हे पराभूत झाले आहेत.

काळ्या शाईचा फटका

पदवीधर गटासाठी २३ हजार २५८ मतदान होते. पैकी तब्बल ४०२ मते बाद ठरली. हे प्रमाण सुमारे १० टक्क्यांच्या घरात आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदार नोंदणी ते प्रत्यक्षात मतदान करण्याची प्रक्रिया याबाबत मतदात्यांचे प्रबोधन न करण्यात आल्याचा फटका बाद मतदानाच्या रूपाने बसल्याची चर्चा आहे. अनेक मते बाद होण्यास काळी शाई कारण ठरली. या काळ्या शाईने केलेले मतदानही नियमात बसत नसल्याने ते बाद ठरवले गेले. अनेकांचा चुकलेला पसंतीक्रम, मतपत्रिकेवर करण्यात आलेल्या सह्या आणि काळ्या स्केच पेनचा वापर या प्रमुख कारणांमुळे ही मते बाद ठरली आहे.


कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांच्या समस्या मांडणार

विद्यापीठात नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी आणि कॉलेजेसची संख्या मोठी आहे. वर्षभरात परीक्षांचे लागणारे निकाल, निकालांमधील त्रुटी, ऑनलाइन सेवांमधील अडसर, विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांसंदर्भातील कामे, परीक्षांचे नियोजन असे अनेक विषयांशी निगडित प्रश्न विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत. याशिवाय जिल्ह्यात आदिवासीबहुल तालुक्यांमध्येही विद्यापीठाचे कॉलेजेस मोठ्या संख्येने आहेत. या कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांच्याही अनेक समस्या आहे. या समस्या विद्यापीठाच्या सिनेट पर्यंत पोहचविण्यासाठी नाशिककरांना प्रतिनिधित्व अपेक्षित होते. ते आता डॉ. वाघ, पाडवी आणि सोनवणे यांच्यारुपाने मिळाल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूर परिसरात गुंडाची दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भगूर परिसरात रात्री-अपरात्री महिलांवर अत्याचार करून दहशत निर्माण करणाऱ्या योगेश पोटाळे उर्फ टिपऱ्या या सराईत संशयितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. पोटाळेने एका व्यक्तीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याचा प्रकारही या निमित्ताने समोर आला आहे.

नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल पिंगळ यांचा मुलगा विलास पिंगळ (वय ५०) यांना १५ नोव्हेंबर रोजी मागील कुरापत काढून पोटाळेने गंभीररीत्या जखमी केले होते. पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने जखमी पिंगळ यांच्या पत्नी रेश्मा पिंगळ यांच्यासह परिसरातील नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, भगूर परिसरातील लक्ष्मीनारायण रोडवर राहत असलेला योगेश उर्फ टिपऱ्या रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. १५ नोव्हेंबर रोजी दारू पिऊन तो विलास पिंगळ यांच्या घरात घुसू पाहत होता. पिंगळ यांनी त्याला जाब विचारला असता, त्याने लोखंडी रॉडने पिंगळ यांच्या डोक्यावर वार केले. त्याने रेश्मा पिंगळ यांनाही मारहाण केली. आराडाओरड ऐकून काही नागरिक मदतीला धावले. मात्र, तो त्यांनाही जुमानत नव्हता. जखमी पिंगळ यांना कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ठार मारण्याचा प्रयत्न झालेला असताना टिपऱ्याविरोधात कारवाई होत नसल्याची तक्रार रेश्मा पिंगळ यांच्यासह अॅड. विशाल बलकवडे, सुनील जाधव, बाळासाहेब हेंबाडे, कविता शेजवळ, सचिन शेजवळ, चंद्रकला देशमुख, ममता खैरनार आदींनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय अधीक्षकांची चौकशी

$
0
0

रजेसाठी नियमबाह्य वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची तक्रार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील रावळगाव येथील ग्रामसेवकास जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाची परवानगी न घेता रजा मंजुरीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारीवरून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. देवराज गरुड यांनी यासंबंधी आरोग्य उपसंचालक तसेच जे. जे. रुग्णालय वैद्यकीय मंडळाकडे तक्रार केली होती.

रावळगाव येथील ग्रामसेवकास गंभीर आजारामुळे चार महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली आहे. मात्र यासाठी देण्यात आलेले वैद्यकीय प्रमाणपत्र नियमबाह्य असल्याची तक्रार गरुड यांनी केली होती. शासकीय कर्मचाऱ्यास गंभीर आजाराबाबत दोन महिन्यांची रजा गटविकास अधिकारी देऊ शकतात. मात्र त्याहून अधिकची रजा आवश्यक असल्यास त्यासाठी संबंधितास मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील वैद्यक मंडळाकडून तपासणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. यानंतरच वाढीव राजा मंजूर होते. असे असताना संबंधित ग्रामसेवकास डॉ. डांगे यांनी रजेसाठी नियमबाह्य वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची तक्रार गरुड यांनी केल्यानंतर याबाबत त्यांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एल. आर. घोडके यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आल्याची माहिती गरुड यांनी दिली. पदाचा गैरवापर करून डॉ. डांगे यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तक्रारदार देवराज गरुड यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफवाय बीएच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आई-वडील घरात नसताना एका २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कॉलेजरोडवरील बीवायके कॉलेजजवळील परिषद भवन येथे मंगळवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी गंगापूररोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.

अद्वैत मनीष सांगळे (२०, रा. परिषद भवन, कॉलेजरोड) असे या युवकाचे नाव आहे. व्ही. एन. नाईक कॉलेजमध्ये एफवाय बीए या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अद्वैतची सध्या परीक्षा सुरू होती. अद्वैतचे वडील जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी असून, सध्या नंदूरबार येथे कार्यरत आहेत, तर आई गृह‌िणी आहे. सोमवारी एका कार्यक्रमासाठी अद्वैतची आई पाथर्डी फाटा भागात गेली होती. वडील मनीष सांगळे हे प्रकृती अस्वास्‍थ्यामुळे घरी आले नाहीत. अद्वैत घरी एकटाच होता. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी पहाटेच्या सुमारास अद्वैतने बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. दरम्यान, अद्वैतच्या मोबाइलवर त्याच्या आई किंवा वड‌िलांचा संपर्क होत नव्हता. मंगळवारी सकाळी मनीष सांगळे घरी पोहचले. अनेकवेळा दार ठोठावूनही त्यांना आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ताकद लावून दरवाजा तोडला. यावेळी सर्वात शेवटच्या खोलीत गळफास घेतलेला अद्वैत त्यांच्या नजरेस पडला. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट किंवा इतर पुरावे मिळाले नाहीत. शिक्षण घेत असलेल्या अद्वैतचे फार मित्र नव्हते. व्यायामाचा लळा असलेला अद्वैत शक्यतो मोबाइलवर पिक्चर वगैरे बघायचा. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी त्याच्या आई-वड‌िलांकडे प्राथमिक चौकशी केली. मात्र, या घटनेमुळे त्यांनाही धक्का बसला असून, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. गंगापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने उघडले खाते

$
0
0

प्रभाग क्रमांक ३ ‘ब’मधून त्रिवेणी तुंगार यांची बिनविरोध निवड

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी माघारीच्या अंतिम दिवशी नगराध्यक्षपदाच्या पाच उमेदवारांनी आणि २७ प्रभागांतील उमेदवारांनी माघार घेतली. अपक्षांसह अधिकृत पक्षचिन्ह असलेल्या उमेदवारांनीदेखील माघार घेतल्याने नव्या समीकरणांना चालना मिळाली आहे. नगराध्यक्ष आणि ८ प्रभागांतील १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, भाजपने एक जागा बिनविरोध करीत खाते उघडले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रभाग क्रमांक ३ ‘ब’मधून भाजपच्या त्रिवेणी सोमनाथ तुंगार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या माघारीत अनिल कुलकर्णी, नबीयून शेख, संजय कदम, पुरुषोत्तम कडलग यांचा समावेश आहे. तसेच, सोमवारी कैलास घुले यांनी माघार घेतली होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी माघार घेताना आपण काँग्रेससोबत आघाडी असल्याने माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा बँकेचे माजी चेअरमन परवेज कोकणी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून येथे ठाण मांडून आहेत. माघारीप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष संपत सकाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, अरुण मेढे, तालुका युवक अध्यक्ष कैलास मोरे, भाजपचे निरीक्षक सुनील बच्छाव, शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक ३ ब मधून त्रिवेणी सोमनाथ तुंगार या भाजपच्या अधिकृत उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. त्रिवेणी तुंगार यांचे पती रवींद्र सोनवणे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. माघारीच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षनेत्यांनी आपण हा प्रभाग मित्रपक्षाला सोडला होता. त्यामुळे आम्ही भाजपसाठी माघार घेतलेली नाही असे स्पष्ट केले.

त्रिवेणी तुंगार यांची प्रभाग ३ ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवर उमेदवारी होती. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या पल्लवी पुरुषोत्तम कडलग आणि काँग्रेसच्या मोनाली कपिल माळी या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

आता नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात सुनील अडसरे (काँग्रेस), पुरुषोत्तम लोहगावकर (भाजप), धनंजय तुंगार (शिवसेना), अॅड. पराग दीक्षित, बाळकृष्ण झोले, केशव काळे, उल्हास तुंगार (सर्व अपक्ष) हे उमेदवार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकात संशोधनवृत्ती हवी

$
0
0

डॉ. रवींद्र जायभावे यांचे प्रतिपादन

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘प्राध्यापक दशेत असतांना संशोधन कार्याची आवड असणे गौरवास्पद आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेला अनुसरून प्रत्येक प्राध्यापकात संशोधनवृत्ती असणे गरजेचे आहे. प्राध्यापकांच्या संशोधनातून नव्या क्लुप्त्या बाहेर येत असतात. तसेच संशोधनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासोबतच शिक्षणव्यवस्थेतील अनुदान वाढते. याच संशोधन प्रणालीतून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गोष्टी नव्याने शिकायला मिळतात. यामुळे शिक्षण क्षेत्रातील नव्या अविष्कारांसाठी संशोधन हा एक गाभा झाला आहे’, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च सेलचे समन्वयक डॉ. रवींद्र जायभावे यांनी केले. एचपीटी आरवायके कॉलेजमध्ये आयोजित अविष्कार-२०१७ संशोधन स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१७-१८च्या अविष्कार संशोधन स्पर्धेची झोनल लेवलची फेरी मंगळवार (२८ नोव्हेंबर) रोजी पार पडली. प्राध्यापक गटाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान यंदा एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स कॉलेजला मिळाला होता. अविष्कार स्पर्धेच्या उद््घाटन समारंभप्रसंगी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाच्या रिसर्च सेलचे डॉ.रवींद्र जायभावे, गोखले सोसायटीचे सचिव डॉ.मो.स.गोसावी, प्राचार्य व्ही.एन.सूर्यवंशी होते.

यावेळी बोलताना डॉ. जायभावे म्हणाले, ‘अविष्कार फेस्टची सुरुवात माजी राज्यपाल एस. कृष्णा यांच्या संकल्पनेतून झाली आहे. देशाला तरुण शास्त्रज्ञ मिळावा आणि तरुणांमध्ये संशोधनाची आस निर्माण व्हावी यासाठी अविष्कार सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी अविष्कारमधून अनेक नवे संशोधन समोर येतात. यातून समोर येणारे शास्त्रज्ञ अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपले संशोधन सादर करत असतात. अविष्कार फेस्टमध्ये असाच उत्साह कायम वाढत रहावा आणि विद्यार्थ्यांना आपली कल्पना मांडण्याचे योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी विद्यापीठ कायम तत्पर असते.’

डॉ. गोसावी यांनी प्राध्यापकांना स्वतः आपली ओळख निर्माण करण्यासाठी संशोधनातून पुढे या, असे मोलाचे मार्गदर्शन केले. अविष्कार फेस्टमध्ये एचपीटी आरवायकेचे योगदान मोठे असून, कायमच अविष्कारमधून एचपीटी आरवायकेच्या प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले आहे, असे सांगत अविष्कारसाठी आलेल्या सर्व प्राध्यापक स्पर्धकांना प्राचार्य सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. एचपीटी आरवायकेत रंगलेल्या अविष्कार २०१७च्या प्राध्यापक गटाच्या विभागीय फेरीत 'ह्युमॅनिटी, भाषा, फाइन आर्टस, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, सायन्स, अँग्रीकल्चर, अॅनिमल हसबंडरी, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिसिन आणि फार्मसी' या विभागातले रिसर्च पेपर सादर करण्यात आले. यावेळी पुणे विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजेसमधील एम. फिल तसेच पीएचडी झालेले सुमारे ११० प्राध्यापकांनी आपले रिसर्च पेपर सादर केले. डॉ. संजय औटी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजयकुमार वावळे तसेच इतर प्राध्यापकांनी स्पर्धेचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेच्या मुद्द्यावर पोलिस-लष्करात चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय लष्कर आणि शहर पोलिस यांच्यात परस्परसहकार्य वाढावे आणि त्यातून सुरक्षाव्यवस्था मजबूत व्हावी, यासाठी मंगळवारी स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. बैठकीस पोलिस अधिकारी, तसेच लष्करातील वरिष्ठ अधिकारी हजर होते.

स्थानिक पोलिस आणि लष्करात काही कारणांमुळे मतभेद निर्माण होतात. विशेषतः पोलिसांनी लष्करी अधिकारी अथवा जवानांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले की हे वाद उफाळून येतात. अशाच एका घटनेनंतर काही वर्षांपूर्वी ४० ते ५० लष्करी अधिकाऱ्यांनी उपनगर पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला होता. हा वाद त्या वेळी बराच गाजला. यानंतर लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस आयुक्त यांच्यात ठराविक अंतराने बैठकींचे आयोजन करण्यात येते. आजची बैठक मात्र वेगळीच ठरली. शहर पोलिसांनी स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये सुरुवातीला क्राइम मीटिंग घेतली. त्याला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त हजर होते. यानंतर याच ठिकाणी लष्करातील वरिष्ठ अधिकारी हजर झाले. लष्कर आणि स्थानिक पोलिसांमध्ये परस्परसहकार्य वाढीस लागावे, या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी लष्कराकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या, तर लष्कराच्या अधिकाऱ्यांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या. लष्करी हद्दीत अतिक्रमणाचा प्रश्न असून, पोलिसांनी यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचा मुकबला करण्यासाठी पोलिस आणि लष्कराने एकत्र सराव करावा, लष्कराचे काही तंत्र पोलिसांना शिकवावे, अशा अनेक मुद्द्यांवर या वेळी खल करण्यात आला.

नवीन इमारती रडारवर

मागील काही वर्षांत लष्करी हद्द परिसरात नवीन इमारती उभ्या राहिल्या. पूर्णत्वाचा दाखला नसताना बिल्डरने सदनिकांची विक्री केली. येथे सध्या कोण व्यक्ती वास्तव्यास आहे, हे समोर येत नसल्याची गंभीर बाब लष्कराने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनीदेखील हा मुद्दा हाती घेणार असल्याचे स्पष्ट करीत मूळ मालकासह भाडेकरूंची नोंदणी करून घेणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images