Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पालिका मालमत्तेवर जप्तीची टांगती तलवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील भूसंपादन प्रकरणातील दाव्यांचा वेळीच निपटारा न केल्याने येथील महापालिकेवर वारंवार जप्तीची नामुष्की ओढवत आहे. शहरातील एका भूसंपादन दाव्यापोटी जमीनमालकास फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यायालयीन आदेश होवूनही रक्कम अदा न केल्याने पालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. लांडगे यांनी दिले आहेत . १८ डिसेंबरपर्यंत सुमारे ९५ लाख रु जमीनमालकास अदा न केल्यास आयुक्तांचे वाहन जप्त करण्यात येणार आहे.

पालिकेने नवीन बसस्थानक परिसरातील सर्वे नंबर ४१ हा भूखंड बेघरांसाठी संपादन केला होता. या भूसंपादनासाठी ८७ लाख रुपये मिळण्यासाठी जमीनमालक अमिना अब्दुल हाफिज यांच्यामार्फत अब्दुल रशीद अब्दुल हाफिज यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणी २४ फेब्रुवारी २०१४ रोजी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत पालिकेला रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर अब्दूल रशीद यांनी न्यायालयात धाव घेत थकीत रक्कम व जप्तीची परवानगी मागितली होती. न्यायालयाने याबाबत १८ डिसेंबर पर्यंत थकीत रक्कम व व्याजासह एकूण ९३ ते १५ लाख रु अदा करायचे आहेत अन्यथा आयुक्तांचे वाहन जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

यापूर्वी टाळली जप्तीची नामुष्की

शहरातील भूसंपादन दाव्यापोटी रक्कम अदा करण्याचे अनेक प्रकरणे प्रलंबित असून यापूर्वी देखील शहरातील क्रीडांगणासाठी संपादित जमिनीची वाढीव नुकसान भरपाई देण्याप्रकरणी जप्तीची नामुष्की ओढवली होती मात्र ७५ लाखाचा धनादेश तातडीने देत ही नामुष्की टाळली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लावणी अन् अभंगाची सिन्नरमध्ये जुगलबंदी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

‘लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा’ या आणि अशा लावणी-अभंगाच्या जुगलबंदीने सिन्नरकर मंत्रमुग्ध झाले.

येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात ४५ वा ग्रंथालय सप्ताह संपन्न झाला. चारुदत्त दीक्षित निर्मित संकल्पना, निवेदन व लेखन असलेल्या ‘लावणी भुलली अभंगाला’ या विषयावर शेवटचे पुष्प गुंफताना मधुरा गोरे यांनी लावणी अन् अभंग यातील नाते विषद केले.

व्यासपिठावर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, कार्यवाह हेमंतनाना वाजे, संचालिका निर्मल खिवंसरा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. ज्याकाळी मोबाइल, टीव्ही ही साधने नव्हती, काही बंधनकारक चाली-रिती रुढी-परंपरा होत्या. त्यावेळी माणसांच्या समूहाने व संतानी अभंग, कीर्तन, भजनातून जनप्रबोधन केले, असे चारुदत्त दीक्षित व मथुरा गोरे यांनी सांगितले. पारंपरिक लावण्या लोकगीतांचे प्रकार हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहे. काही कविता कुणी केल्या हे माहित नसले तरी अभंग व लावणी इतक्या वर्षांपासून आजही जीवंत आहे, असे सांगत ‘बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला’ अशा बहारदार लावणी सादर करून श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.

अनेक संतांचे महंतांचे देव-देवतांचे अभंग म्हणताना अभंगांमधील सार त्यांनी सांगितला, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ यासारखे अभंग आणि लावणी यांची जुगलबंदी साधत त्यांनी श्रोत्यांना पंढरीच्या विठू माऊलीच्या व संतांच्या सहवासात नेले. ग्रंथालय सप्ताहाचे पहिले पुष्प वेदश्री थिगळे यांनी ‘उमलूया जगण्याच्या

खूणा’, दुसरे पुष्प भारत दौंडकर व अरुण पवार यांनी ‘मायमातीच्या कविता’, तिसरे पुष्प कल्याण पेरे यांनी ‘महिला सबलीकरण’, चौथे पुष्प प्रकाश पाठक यांनी ‘आई’, पाचवे पुष्प डॉ. भरत केळकर यांनी ‘डॉक्टर विदाऊट बॉर्डर’, सहावे पुष्प विवेक घळसासी यांनी ‘नवे तंत्रज्ञान-पालक आणि मुलांपुढे आव्हान’ तर सातवे पुष्प स्मितल मोरे यांनी ‘मानसिक ताणतणावातून सुटका’ या विषयावर गुंफले. या कार्यक्रमाला शहरातील रसीक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब! ११०० ग्रॅमचे सीताफळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुम्ही किती प्रकारची सीताफळे पाहिली असतील. एक किंवा दोन. फारतर चार प्रकारची. परंतु, कृषीथॉन प्रदर्शनामध्ये तब्बल २३ जातींची सीताफळे पहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे ११०० ग्रॅम वजनाचे एनएमके १ (गोल्डन) जातीचे सिताफळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे.

सोलापूर तालुक्यातील बार्शी तालुक्यामध्ये या सीताफळांचे उत्पादन घेण्यात आले असून अॅनोना, चॉंदसिली, आर्कासहान, लाल सीताफळ १, लाल सीताफल २, अॅनोना ७, अॅटमोया, बाळानगर, पिंक मेमॉथ, अॅनोना म्युरिकाटा, अॅनोना ग्लॅब्रा, हैद्राबाद सिलेक्शन, फिंगर प्र‌िंट, चेरीमोया, वॉशिंग्टन जेम आणि अॅनोनाल मॉन्टेना या जातींची सीताफळे पहावयास मिळत आहेत. याखेरीज लाल रंगाचे तसेच बी विरहित (सीडलेस) सीताफळे पहाण्यासाठी नागरिकांची येथे गर्दी वाढू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसिद्ध वाईन कंपनीवर आयकर विभागाची धाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाईन टुरिझम वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नाशिकच्या एका प्रसिद्ध वाईन कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकल्याने वाईनरी कंपनीमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे ही धाड मुंबईच्या आयकर विभागाने टाकल्याचे समजते. तब्बल १० ते १५ गाड्यांचा ताफा वाईन कंपनीच्या विविध प्रतिष्ठाण व निवासावर गेला आणि त्यांनी तेथे झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. आयकर विभागाने दिवसभर या वाईन कंपनीच्या हिशोबाची तपासणी करून माहिती संकलित केली. या कंपनीचे कार्पोरेट कार्यालय मुंबईत असून आयकरचे रिटर्नही हे मुंबईत भरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या आयकर विभागाला हिशोबात संशय आल्याने ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. याबाबत आयकर विभागाने गोपनीयता पाळत त्याबद्दलची माहिती देणेही टाळले. काही दिवसात नाशिकच्या आयकर विभागाने कांदा व सोने व्यापाऱ्यांवर धाड टाकली. पण, मुंबईच्या आयकर विभागाने वायनरीला लक्ष्य केले आहे. त्याची माहिती अधिकृतरित्या अद्याप पुढे आलेली नसली तरी आयकर विभागाला घबाड मिळाल्याची चर्चा आहे. या आयकर धाडी बद्दल वायनरी कंपीनीच्या विविध प्रमुखांशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचे फोनही दिवसभर बंद होते. त्यामुळे नेमके काय झाले, हेदेखील अद्याप गुलदस्त्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समकालीन वास्तवाचे उमटले अर्क

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटकाने इतिहासाला भिडताना त्यातील समकालीन अर्क काढायाचा असतो. समकालाचा आवाका म्हणजे मूळाशी जाऊन भिडलेले संदर्भ. जगातील कोणत्याही इतिहासाचे सजगतेने भान ठेवले तर त्यातूनच लेखक-दिग्दर्शकाला समकालीन वास्तवाचा अर्क काढणारी कलाकृती देता येते. याचे प्रत्यंतर देणारे नाटक म्हणजे प्राजक्त देशमुख लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित ‘मून विदाउट स्काय’.

‘मून विदाउट स्काय’ हे नाटक शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अश्वमेध थिएटर्स संस्थेतर्फे ‘मून विदाउट स्काय’ हे नाटक सादर झाले. पडदा उघडल्यांनतरच्या तुकड्यामध्ये काळजाचे ठोके चुकवणारे काही प्रसंग श्वास रोखून धरायला लावतात. देशाच्या सीमांचे बंधन झुगारून एकूणच मानवतेला खाली मान घालणारी महत्त्वाची घटना दुसऱ्या महायुद्धात जगाने पाहिली. हॉलोकॉस्ट अर्थात छळछावणी. त्याच काळ्या इतिहासाच्या छळछावण्यांचा चटका देणारा अनुभव या नाटकाने दिला. नशिबाच्या फेऱ्यात अडकलेल्या काही प्रवाशांची रवानगी छळछावणीत होत असते. रेल्वे वॅगनमध्ये कोंबले जाणे, ते छावणीपर्यंतचा प्रवास म्हणजे हे नाटक. नाटक तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर ,वर्तमान आणि भूतकाळांमध्ये झोके घेत पुढे सरकते. अनेकांना या कत्तलींची फक्त इतिहासाच्या नोंदीपुरतीच माहिती आहे पण नाटकात हा पूर्ण पट अक्षरश: एखाद्या डॉक्युमेंटरीसारखा उलगडत जातो आणि अनेक प्रसंगात काळीज पिळवटून टाकतो. हेलन, लिओ आणि जुलिअन या पात्रांभोवती फिरत हा प्रवास सुरू असतो आणि इतर प्रवाशांच्या भूतकाळातले ठिपके एकत्र होत शेवटच्या अत्युच्च धक्कादायक क्षणावर येऊन नाटक थांबते आणि पुन्हा दोन पावलं मागे जाऊन उंचावरून देहार्पण करावे तसे स्वत:ला झोकून देते. हा पूर्ण पट गुंतागुंतीने परंतु सोप्या पद्धतीने लेखकाने उलगडला आहे.

अश्वमेध थिएटर्सतर्फे प्रस्तुत या नाटकाचे लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले होते. दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा राहुल, उर्वराज यांची होती. नेपथ्य लक्ष्मण कोकणे यांचे होते. संगीत रोहित सरोदे यांचे होते. प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित व राजेश भुसारे यांची होती. रंगमंच व तांत्रिक सहाय्य गिरिश गर्गे, हृतिक तिडके, राम नवले यांचे होते. निर्मिती प्रमुख श्रीपाद देशपांडे होते. सूत्रधार दत्ता पाटील व सदानंद जोशी होते. नाटकात नुपूर सावजी, धनंजय गोसावी, शुभांगी पाठक, राहुल गायकवाड, प्रशांत साठे, उर्वराज गायकवाड, श्रद्धा पाटील, कार्तिकेय कत्रोजवार, अक्षदा लाखे, चेतन बर्वे, सनी मिश्रा, प्रथमेश देशपांडे, आतिश डोंगरे, पार्थ बागूल, प्रतिक कुलकर्णी आणि प्रणव प्रभाकर यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : उत्तरदायित्व
वेळ : सकाळी ११.३० वाजता
आजचे नाटक : चाहूल
वेळ : सायंकाळी ७ वाजता
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घिरट्या घालणाऱ्या असुरक्षितपणाचे ‘एक्झिट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रथितयश झाले की त्यापाठोपाठ भावनां व अपेक्षांचे ओझे येते. एखादी प्रथितयश अभिनेत्री काम नसल्याने नैराश्याच्या गर्तेत ओढावली जाते तेव्हा रसिकांना ते मान्य होत नाही त्यांना तिच्यातील अभिनेत्रीचा कायम वावर आसपास हवा असतो. त्यासाठीची धडपड म्हणजे ‘एक्झिट’ हे नाटक शुक्रवारी सकाळच्या सत्रात सादर करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत बाबाज थिएटर संस्थेतर्फे एक्झिट हे नाटक सादर झाले. देविका प्रधान ही प्रथितयश अभिनेत्री आहे. चित्रपटातील दुनियेच्या ती आधीन गेलेली आहे. तिला तेथील माहोल भावतो, नेहमीच प्रसिद्धीच्या शिखरावर राहणे तिला आवडते. ४० वर्षे तिने जी प्रसिद्धी अनुभवली आहे त्याला कुठेतरी तडा जातोय हे तिला कळल्यावर दु:ख होते. तिला काम मिळत नाही, याचे तिला फार वैषम्य असते. त्यामुळे ती आपण फार बिझी आहोत हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करीत असते. ती निराशेच्या गर्तेत प्रचंड खोल गेली आहे, हे मानसोपचारतज्ज्ञ कारखानीस यांना समजते. तिचा एकेकाळचा मित्र निरंजन देसाई याच्या मदतीने ते तिला पुन्हा एकदा या सर्व वातावरणात घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी निरंजन तिची मुलाखत आयोजित करतो. या मुलाखतीत ती अंधारगर्भ या नाटकाच्या बाबत काही दडवलेल्या गोष्टी बोलून जाते, त्याचा गिरीश साळवणकरला, नाटकाच्या दिग्दर्शकाला राग येतो, तो तिला धमकावतो; मात्र ती त्याला भीक घालत नाही. मुलाखत घेणारा निरंजन तिला या नाटकातील काही स्वगत म्हणायला लावतो; मात्र ती स्वगत विसरून जाते. काही दिवसांनी देविकाचा वाढदिवस असतो तेव्हा मुलाखत घेणारा निरंजन तिला भेटायला येतो. ती त्याला वेळ देण्याचे टाळते. परंतु, तो काही योजना करून घरात प्रवेश मिळवतो आणि तिला त्याच्या नवीन नाटकासाठी नायिका म्हणून काम करण्याची ऑफर देतो. मात्र, हे सर्व त्याच्याकडून मानसोपचार तज्ज्ञ करून घेत असतात. हे तो फोनवर कबूल करताना देविका ऐकते. परंतु निरंजन त्याच्या कामात यशस्वी होतो. त्या नाटकाच्या माध्यमातून तिला तो पुन्हा त्या जगात घेऊन येतो. त्यामुळे ही एक्झिट न ठरता एन्ट्री ठरते. अशा आशयाची ही कथा होती.

बाबाज थिएटर्सतर्फे प्रस्तुत नाटकाचे लेखन अरविंद लिमये यांनी केले होते. दिग्दर्शन आरती प्रभू हिरे यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा किशोरी शेळके यांची होती. नेपथ्य वैशाली खाटीकमारे, एकता आढाव यांचे होते. संगीत प्रणिल तिवडे यांचे होते. प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती. रंगमंच सहाय्य नितीन आहेर यांचे होते. नाटकात विनोद राठोड, अमोल थोरात, अर्चना काळे आणि लक्ष्मी गाडेकर-पिंपळे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशवाडीत कचऱ्याचा मुक्काम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाकाठी दर बुधवारी सकाळपासून भरणारा हा बाजार रात्री ९ वाजेपर्यंत आटोपतो. मात्र, या बाजाराचा सडलेल्या भाजीपाल्यासह कचरा तसाच टाकण्यात येतो. तो उचलला जात नाही. विशेषतः गणेशवाडी रस्त्यावरील कचरा पडून राहतो. बुधवारी (दि. २२) भरलेल्या बाजाराचा कचरा शुक्रवारपर्यंत (दि. २४) पडून होता.

बुधवारी भरणाऱ्या नाशिकच्या आठवडे बाजारात विविध वस्तूंच्या विक्री करणारे तसेच भाजीपाला विक्रेते येतात. त्यांची दुकाने म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण आणि रोकडोबा पटांगण यांच्यासह गोदाकाठाच्या विविध भागात मांडण्यात येतात. आठवडे बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढत गेल्याने बाजाराची जागा कमी पडू लागली आहे. हा बाजार थेट गणेशवाडीच्या रस्त्यावर भरू लागला आहे. रस्त्यात भरणाऱ्या या बाजारामुळे रहदारीला अडथळ्यापासून अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. बाजारासाठी येथे पर्यायी व्यवस्था म्हणून येथे बांधण्यात आलेल्या भाजीमार्केट आहे. मात्र, त्याचा वापर केला जात नाही. गंगाघाटावरील भाजी विक्रेते आणि महापालिका यांच्या वादात अडकलेल्या या भाजी मार्केटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा बाजार रस्त्यावर भरत आहे. तो उठविण्याचा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनेकदा प्रयत्न केला, तो प्रयत्न विक्रेत्यांनी हाणून पाडला.

विक्रेत्यांकडून खर्च वसुली करावी
गणेशवाडीच्या रस्त्यावर भरलेल्या भाजीबाजारानंतर त्या भाज्यांच्या उर्वरित अंश तसेच खराब भाजीपाला येथेच टाकून देण्यात येतो. तो उचलला जात नसल्याने त्याचा कचरा पडून राहतो. दोन-दोन दिवस अशीच स्थिती प्रत्येक बुधवारनंतर दिसते. हा कचरा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी किंवा निदान हा कचरा उचलण्याचा खर्च तरी येथे बसणाऱ्या विक्रेत्यांकडून वसूल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भाविकांसमोर ‘शोभा’
चंपाषष्ठीनिमित्त गोदाकाठावरील खंडेरायाच्या मंदिरातील यात्रोत्सवासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली. नाशिकच्या या रस्त्यावरील अशा प्रकारे पडलेल्या कचऱ्याचे दर्शन घेण्याची वेळ आली असल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको बसस्टॉप धोकादायक स्थितीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बिटको कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरील बसस्टॉपचे शेड कधीही कोसळण्याच्या बेतात आहे. शेजारीच असलेल्या नव्या बसस्टॉपचे स्टीलचे पाइप व बैठक व्यवस्था चोरीस गेलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही बसस्टॉपचा उपयोग होत नाही. एखादी दुर्घटना होण्याआधी जुना बसस्टॉप हलविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी केली आहे.

बिटको कॉलेजच्या प्रवेशद्वारावर बससाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते. विद्यार्थ्यांसाठी काही वर्षांपूर्वी पत्र्याचा बसस्टॉप उभारण्यात आला होता. तो कालांतराने खराब झाला आहे. त्याचे पत्र सडले असून चार-पाच ठिकाणी ते फाटले आहेत. पावसाळ्यात त्यातून पाणी गळते. पत्र्यांवर कचरा साचला आहे. बसस्टापमध्ये भटक्या लोकांच्या गोधड्या आहेत. पत्र्याला टेकू दिलेले पिलर वाकलेले आहेत. हा बसस्टॉप कधीही कोसळू शकतो. विद्यार्थी बसस्टॉपमध्ये उभे असतात. बसस्टॉपचा शेड कोसळल्यास दुर्घटना घडू शकते.

नव्याची दुरवस्था
जुन्या बसस्टॉप शेजारीच नवीन बसस्टॉप शेड उभारण्यात आला आहे. हा बसस्टॉप आधुनिक आहे. त्याला स्टीलचे पाइप व बैठक व्यवस्था होती. मात्र, बसस्टॉप तयार होऊन वर्ष होत नाही तोच त्याचे स्टीलचे पाइप, बैठक व्यवस्था चोरांनी गायब केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन्ही बसस्टॉपचा वापर होत नाही. असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

विद्यार्थी रस्त्यावर
जुना व नवा बसस्टॉप निरुपयोगी झाल्याने विद्यार्थी तेथे थांबत नाहीत. ते नाशिक-पुणे मार्गावर येऊन बसची वाट पाहतात. या रस्त्यावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. वाहने वेगात धावत असतात. ते एकमेकांना ओव्हरटेक करतात. त्या प्रयत्नात रस्त्यावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडक बसून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे दोन्ही बसस्टॉपची दुरवस्था दूर केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका राहणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

मनसेचा इशारा
नवीन बसस्टॉपची दुरवस्था दूर करावी तसेच जुना बसस्टॉप हटवावा किंवा त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी मनविसेचे शाम गोहाड, नितीन धानापुणे, सागर दाणी प्रवीण पवार, उमेश भोई, धनश्री ढोले, सचिन शिसोदिया, बाजीराव मते, तुषार वाडिले, साजिद शेख, विलास कदम, अशोक ठाकरे, भाऊसाहेब ठाकरे स्वप्निल शिंदे, महेश म्हस्के, बंटी ठाकरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपोवनात पुन्हा अतिक्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तपोवनातील साधुग्रामसाठी असलेल्या महापालिकेच्या खुल्या जागेवर पुन्हा झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. या जागेवरील झोपड्या एक महिन्यापूर्वीच काढण्यात आल्या होत्या. पुन्हा त्याच जागेवर झोपड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. येथे वारंवार होणाऱ्या अतिक्रमणावर कायम स्वरुपीची उपाय योजना का केली जात नाही असा प्रश्न पडत आहे.

तपोवनातील महापालिकेची जागा सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर मोकळीच पडून असते. या मोकळ्या जागेवर जडीबुटी विक्री करणारे, विविध ठिकाणी मजुरी करणारे तसेच म्हैशी, उंट असे प्राणी पाळणारे लोक येथे पाल टाकण्यास सुरुवात करतात. या पालांची संख्या वाढत जाऊन येथील सर्वच परिसर व्यापून टाकतात. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला कधी तरी जाग येते आणि ते येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवतात. येथील पाल काढले जातात. मात्र, थोड्याच दिवसात पुन्हा ते उभेही राहतात. भुछत्रांसारखी त्यांची संख्या वाढत जाते.

तपोवनात वाढलेल्या झोपड्यांमुळे त्यांना लागणारे पाणी, स्वच्छता आदींच्या समस्या निर्माण होतात. एकीकडे शहर पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्याच्या घोषणा केल्या जातात. तर अशा अनधिकृतपणे झोपड्यांमधील नागरिकांच्या उघड्यावरील शौचास बसल्याने होणाऱ्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाण्यासाठी हे लोक जनार्दन स्वामी आश्रमाच्या पश्चिमेला असलेल्या सार्वजनिक नळाकडे जातात. त्यासाठी त्यांना रस्ता ओलांडून ये-जा करावी लागते. तपोवनाच्या मुख्य मार्गाने वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे. या झोपड्यांमधील महिला, लहान मुले हा रस्ता सतत ओलांडतात. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे.

जागेचा करा सदुपयोग
मोकळ्या जागेचा उपयोग महापालिकेने चांगले उपक्रम राबविण्यासाठी केला पाहिजे. जेणेकरून त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल. एक ते दीड वर्ष या जागेचा वापर आणि त्यानंतर सिंहस्थ येईपर्यंत ही जागा नुसती पडून असते. त्यामुळे तेथे अशा प्रकारचे अतिक्रमण होतच राहणार आणि ते काढण्यासाठी पुन्हा महापालिकेची यंत्रणेचे वेळ वाया जाणार अशीच स्थिती बघायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महा-ई-सेवा केंद्रचालकांचा संप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

आधारकार्ड सर्वत्र लिंक करण्याची सक्‍ती केल्याने ऑनलाइन कामांचे महत्त्व वाढले आहे. त्यासाठी सरकारकडून सुरू केलेल्या महा-ई-सेवा केंद्रचालकांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या संग्राम योजनेविरोधात आंदोलन करून कामबंद ठेवले. पहिल्या टप्प्यात हा बंद पाळण्यात आला असला तरी भविष्यात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महा-ई-सेवा केंद्रचालकांनी विविध मागण्यासाठी काळ्या फिती लावून शुक्रवारी काम न करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या लोकहितकारी योजनांची तसेच महसूल विभागांतर्गत सेवांची माहिती व सेवा जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम २००८ पासून महा-ई-सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली. हे केंद्र सुरू करतांना मोठ्या प्रमाणावर अनामत रक्‍कम जमा केलेली असते. तसेच केंद्र उभारणीसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, आता राज्य सरकारने आपल्याच धोरणात बदल करून महा-ई-सेवा केंद्र बंद पाडण्याचे शडयंत्र सुरू केल्याचा आरोप केंद्रचालकांनी केला आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे साडेपाचशे अधिक केंद्रचालक असून सेवा संग्राम आणि सीएससीद्वारे या व्यवस्था सुरू केल्यास या केंद्रचालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारच्या २०१७ च्या परिपत्रकानुसार यात सुधारणा व्हावी, अशीही मागणी या केंद्रचालकांनी केली आहे.

अशा आहेत मागण्या
महा-ई-सेवा केंद्रांकडे कामकाज कायमस्वरूपी चालू ठेवावे, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व शहरातील नगरपालिका व महापालिकेतील अंतर्गत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा महा-ई-सेवा केंद्रांमार्फत कार्यान्वित कराव्यात. महाऑनलाइन लिंक सीएससी व संग्राम केंद्रांना देऊ नये. महा-ई-सेवा केंद्रे संचालकांना संगणक परिचालकाप्रमाणे मानधन व इतर पायाभूत सुविधा द्याव्यात, अशा विविध मागण्या केंद्रचालकांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरच्या पोस्टमनला सायकलचे ‘गिफ्ट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर, अशोकनगर परिसरात घरोघरी टपाल वाटणाऱ्या पोस्टमन काशिनाथ गायकवाड यांना चक्क सायकल गिफ्ट म्हणून देण्यात आली. परिसरातील बांधकाम व्यावसायिक संदीप पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत हा अनोखा उपक्रम राबविला.

पवार यांनी सायकल दिल्याने पायपीट दूर झाल्याचे मत पोस्टमन गायकवाड यांनी व्यक्त केले. वाढदिवसाचा खर्च मौजमजेवर वाया घालविण्यापेक्षा समाजातील उपेक्षित व गरजू घटनांना मदत करणे आनंददायी असल्याचे पवार यांनी सांगितले. अशोकनगरच्या राज्य कर्मचारी वसाहतीमधील पोस्ट ऑफिसमध्ये काशिनाथ गायकवाड अनेक वर्षांपासून पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. टपाल पोच करण्यासाठी सायकलच नसल्याने त्यांना अशोकनगर भागात पायपीट करावी लागत होती. राज्य कर्मचारी वसाहत, वास्तूनगर, विश्वासनगर, पवार संकुल, राधाकृष्णनगर व श्रमिकनगर या आपल्या कार्यक्षेत्रात ते पारी फिरून घरोघरी टपालांचे वाटप करीत होते. पवार यांच्या घरीही ते नेहमी टपाल देण्यासाठी जात. वडील तानाजी पवार यांनी पोस्टमन गायकवाड यांच्याकडे वाहन नसल्याची संदीप पवार यांनी माहिती दिली. पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने नवीन सायकल खरेदी करून पोस्टमन गायकवाड यांना गिफ्ट दिली. आता गायकवाड मोठ्या उत्साहाने परिसरात टपालचे वाटप करीत आहेत. सामाजिक दृष्टीकोन ठेवत पवार कुंटुंबीयांनी सायकल दिल्याने पोस्टमन गायकवाड यांनी आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून मुंबईसाठी शिवशाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुणे मार्गावर धावणाऱ्या नाशिक-पुणे शिवशाही बसेसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मुंबई मार्गावरही एसटीने या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून चार शिवशाही बसेस मुंबई मार्गावरून बोरीवलीपर्यंत धावणार आहे.

मुंबई मार्गावरील शिवशाही बसचे वेळापत्रक एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. एक बस मंगळवारी (दि. २८) मंत्रालायापर्यंत सोडण्याचे एसटीचे नियोजन असून त्याचे वेळापत्रक मात्र अद्याप आले नाही. नाशिक येथून सकाळी साडेपाच वाजेपासून या बस तासाभराच्या अंतराने सुटणार आहे. त्यानंतर दुपारी पुन्हा बोरीवली येथून या बसेस येतील त्यानंतर त्या पुन्हा नाशिकहून सोडण्यात येणार आहे. नाशिकहून सकाळी साडेसहा त्यानंतर साडेसात आणि साडेआठ असे बसचे बोरीवली येथे जाणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी अडीच, साडेतीन व सायंकाळी साडेचार या वेळेतही या बस धावणार आहे. बोरीवलीहून या बस सकाळी ९.५०, १०.५० ११.५० या वेळेत आहे. तसेच दुपारी १२.५० सायंकाळी सात आणि रात्री आठ वाजताही या बसेस असणार आहेत. यातील एक बस ठाणेसाठी ठेवण्यात आली आहे.

नाशिक-पुणे या मार्गावर एसटीने याअगोदर १७ बसेस सुरू केल्या. त्यानंतर या चार बसेसची भर पडणार आहे. या बसेस बरोबरच एसटीला लांब पल्याच्या मार्गावर स्लिपर कोच बसेसची प्रतीक्षा आहे. नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी नाशिकरोडहून अनेक रेल्वे गाड्या आहे. पण, यात गर्दी असल्याने बरेच जण वाहनाने जाणे पसंत करतात. त्यात या वातानुकूलित बसची सुविधा झाल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी वादातून जावयाचा खून

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

प्रॉपर्टीवरून जावई व सासुरवाडीच्या मंडळींमध्ये सुरू असलेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन अखेरीस जावयाला यात जीवच गमवावा लागला. या प्रकरणी संशयित मेव्हणा व सासू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत बाळू खुर्दळ (रा. दिंडोरी) हे दुपारी पाथर्डी फाटा येथील सासुरवाडी आले होते. यावेळी सासू सुनंदा आनंदा मगर व मेव्हणा सुनील आनंदा मगर यांच्यात सुरू असलेल्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की शशिकांत याने सुनंदा हिच्यावर हात उगारला. या घटनेचा राग आल्यावर सुनीलने थेट शशिकांत यांच्या डोक्‍यात फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेला शशिकांत हे जागीच ठार झाले. हा घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोघाही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची अतिरिक्त कामे कमी करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशैक्षणिक कामे बंद करावीत, यासाठी अनेक वर्षांपासून शिक्षक संघटना लढत आहेत. त्यामुळे या कामांचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिली.

अगोदरच शाळाबाह्य कामांनी पिचलेल्या शिक्षकांच्या डोक्यावर ऑनलाइन कामांचा भार पडत असल्याची कबुली तावडे यांनी दिली. या विरोधात शिक्षक संघटना एकवटत असल्या तरीही ती कामे फडणवीस किंवा तावडे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली नाही. ती पूर्वीपासून आहेत. मग तेव्हा चुप्पी का साधली, असा सवाल करतानाच, शिक्षकांची ऑनलाइन कामे आटोक्यात आणण्यासाठी शिक्षण खात्याकडून याबाबतचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यांची अतिरिक्त कामेही नियंत्रणात आणू, असे तावडे यांनी सांगितले.

राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यादृष्टीने नियोजन सुरू आहे. जागतिक स्तरावरील दर्जाची मानांकने पूर्ण करण्याची क्षमता आपल्याकडील पारंपरिक शाळांकडे नक्कीच आहे. पण त्या शाळा त्या मानांकनांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा १०० शाळांना बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार येथे शासनाची पहिली आंतरराष्ट्रीय शाळा पुढील महिन्यात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणसंस्थांचे स्वायत्त बोर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचविण्यासाठी राज्यातील जुन्या आणि बड्या शिक्षणसंस्थांना स्वायत्त बोर्डाचा दर्जा देण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शिक्षण महामंडळाचे विकेंद्रीकरण करण्याचे हे संकेत समजले जात आहेत.

शतकपूर्ती करणाऱ्या राज्यातील शिक्षण संस्थांच्या संवाद संमेलनाच्या उद्घाटनासाठी तावडे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तावडे म्हणाले, ‘राज्यात अलीकडेच ११ नव्या खासगी विद्यापीठांना सरकारने मान्यता दिली आहे. या धर्तीवर राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे मोठे योगदान देणाऱ्या संस्थांची यादी मोठी आहे. जागतिक स्पर्धेत विद्यार्थी उतरविताना स्पर्धा जितकी वाढेल, तितकाच दर्जा उंचावला जाईल, या न्यायाने जुन्या आणि बड्या शिक्षणसंस्थांना स्वायत्त बोर्डाचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. हा दर्जा संबंधित संस्थांना मिळताना त्यांच्या सध्या मिळणाऱ्या अनुदानावर कुठल्याही प्रकारचे संकट ओढवणार नाही, याची काळजी सरकार घेईल’, असे आश्वासनही त्यांनी दिले. कुठल्या संस्थेला बोर्डाचा दर्जा मिळावा, यासाठीचे निकष काय असावेत, त्या शिक्षणसंस्थांचे नेमके वय आणि व्याप्ती किती असावी, याबाबतचे निकष तज्ज्ञांशी बोलून ठरविण्यात येतील. अशा प्रकारच्या शक्यतेवर जनतेनेही त्यांची मते सुचवावी’, असेही ते आवर्जून म्हणाले.

‘बालभारती’त पेन्शनवाढ

‘बालभारती’च्या कर्मचाऱ्यांना खूष करण्यासाठी दहा हजार रुपयांची पेन्शनवाढ करण्याची घोषणा तावडे यांनी केली. पण एक हजाराऐवजी दहा हजार बोलल्याची चूक त्यांच्या लागलीच लक्षात आली. नंतर त्यांनी पेन्शनवाढ एक हजार रुपयांचीच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

शिक्षकेतर पदांची भरती

अर्थ विभागाने हिरवा कंदील दाखविताच शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा होणे येत्या महिनाभरातच अपेक्षित असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. हा अडसर दिवाळीपूर्वीच दूर होणे अपेक्षित असतानाही याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आश्वासनच दिले आहे. तर शिक्षक भरती ही केंद्रीय प्रक्रियेद्वारेच भविष्यात होईल. यामध्ये संस्थाचालकांच्या अधिकारांवर गदा येणार नाही. केवळ शासनाने सुचविलेल्या एकूण उमेदवारांपैकी संस्थेस योग्य वाटणाऱ्या निवडीचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कावळ्याने केली तीन तास बत्ती गुल!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

परिसरात विजेच्या तारांचे घर्षण होऊ स्फोट होतो.. अफवांचे पेव फुटते.. महावितरणतर्फे सातपूर भागातील वीजपुरवठा सरसकट खंडित केला जातो... नंतर नेमक्या कारणाचा अधिकारी व कर्मचारी शोध घेतात, तेव्हा कावळ्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास येते...

अशोकनगर भागात शुक्रवारी हा प्रकार घडला. कावळ्यामुळे विजेच्या तारा एकमेकांना स्पर्शून छोटासा स्फोट झाल्याने महावितरणला वीजपुरवठा खंडित करावा लागल्याचे निदर्शनास आले. केवळ कावळ्यामुळे तीन तास वीज खंडित करण्याची नामुष्की महावितरणवर ओढावली अन् नागरिकांना सहन गैरसोय सहन करावी लागली. या स्फोटाची पूर्ण शहानिशा न करताच संपूर्ण सातपूर विभागाचाच वीजपुरवठा बंद करण्याच्या प्रकारबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशोकनगर भागात महिंद्रा कंपनीला लागून असलेल्या विजेच्या खांबावर स्फोट झाल्याने महावितरण कंपनीकडून तात्काळ सातपूरचा वीजपुरवठा खंडित केला गेला. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यामागील कारणाचा शोध घेतानाच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जोमाने कामाला लागले होते. मात्र, विजेच्या खांबावरून एकमेकांवरून गेलेल्या वीजतारांवर कावळा बसल्याने वरील तारा खालील वीजतारांना चिकटल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, त्यामुळे सातपूरकरांना तब्बल तीन तास खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. महावितरण कंपनीने अगोदर शहानिशा करूनच संपूर्ण वीजपुरवठा खंडित करावा, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

भूमिगत तारा ऐरणीवर

महावितरण कंपनी अनेक नवीन योजना अंमलात आणत असताना ओव्हरहेड तारांचा प्रश्न मात्र आजही सुटत नसल्याने त्याचा त्रास नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यांमुळे वीजतारांना अडथळा होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीकडून वीजतारांच्या वर असलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्याचे काम केले जाते.

शहरातील रहिवासी भागात अनेक ठिकाणी वीजतारांना वृक्षांच्या फांद्यांचा अडथळा होताना दिसतो. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच धावपळ करावी लागते. त्यामुळे परिसरातील वीजतारा भूमिगत करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशोकनगरला कायमच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वेळेवर वीजबिल भरूनदेखील अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्यावरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे.
-सुनील पाटील, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखाच्या बुलेटची ३० हजारांत विक्री!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात चोरी केलेल्या महागड्या बुलेट जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अवघ्या ३० हजारांत विक्री करणाऱ्या संशयित चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताने चोरी केलेल्या पाच बुलेटसह आणखी तीन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित खरेदीदारांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेमंत राजेंद्र भदाणे (वय २३, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हेमंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. शहरातून चोरी जाणाऱ्या बुलेट जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील, उपनिरीक्षक एस. एस. वाघ, हवालदार माणिक गायकर, विष्णू उगले, नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, सचिन सुपले आदींनी जळगाव गाठून तपास केला. त्यात अशा वाहनांचे कनेक्शन पाचोरा येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी पाचोरा येथे पोहोचून भदाणेने त्याच्या दोन साथीदारांसह विक्री केलेल्या पाच बुलेट आणि तीन दुचाकी हस्तगत केल्या. यात एमएच ४१ एजे ०८७१, एमएच १४ एफव्ही ५७५९, एमएच १५ एफडी ४००५, एमएच १५ एफ आर ३१३३, एमएच १५ एफएक्स ९३२१ या बुलेटसह एमएच १५ एफ झेड ५५८०, एमएच १५ एफएल ८२६१ आणि एका स्प्लेंडरचा समावेश आहे. सुमारे आठ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरट्यांनी अगदी स्वस्तात विक्री केल्या होत्या.

दोन मिनिटांत बुलेट स्टार्ट

संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, एक अॅलनकी आणि स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने तो बुलेटचे लॉक तोडीत असे. अॅलनकीच्या मदतीने नटबोल्ट काढल्यानंतर तो स्क्रू ड्रायव्हार लॉकमध्ये ढकलतो. लॉक तुटले, की स्वीचमधील दोन वायर तोडून त्या तो जोडतो. दुचाकी डायरेक्ट केली, की सुरू करून तो थेट पाचोऱ्याचा रस्ता पकडायचा. असे प्रकार टाळण्यासाठी वाहनचालकांनी अतिरिक्त लॉकिंग सिस्टिम वापरणे आवश्यक असल्याचे सहायक आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले.

खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा

संशयित आरोपी हेमंतकडून एकाच व्यक्तीने ३० हजार रुपयांत तीन बुलेट खरेदी केल्या होत्या. या व्यक्तीवर चोरीचा मुद्देमाल खरेदी केला म्हणून कलम ४११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित खरेदीदारांवरदेखील कारवाई होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. संशयित आरोपीकडे सध्या चौकशी सुरू असून, चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी प्रसंगी आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप-शिवसेना युती सरकारमुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली आहे. सध्या सर्वाधिक दुःखी घटक

असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी व अन्य

मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार नाशिक

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन

येथे झाली. भाजप-शिवसेना युती सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी पक्षाची

पूर्णपणे बांधीलकी आहे. राष्ट्रवादीतर्फे जिल्ह्यात विविध आंदोलने करून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य

जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष पक्षाने वेधले आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या

आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले असतानाही सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना

सरसकट कर्जमाफी देऊन सात-बारा कोरा करणे गरजेचे आहे. शेतीमालाचे पडलेले भाव, सततचा अवकाळी पाऊस

व गारपिटीमुळे होणारे नुकसान भरून काढणेसुद्धा अशक्य झाले आहे. सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

---

यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, ज्येष्ठ नेते अॅड. भगीरथ शिंदे,

आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, शांताराम आहेर, गजानन शेलार,

अर्जुन टिळे, जिल्हा परिषदेच्या सभापती अपर्णा खोसकर, विष्णुपंत म्हैसधुणे, डॉ. भारती पवार, माणिकराव शिंदे,

राजेंद्र भोसले, डॉ. भाऊसाहेब मोरे, हिरामण खोसकर, बाळासाहेब कर्डक, उषाताई बच्छाव, प्रेरणा बलकवडे,

पुरुषोत्तम कडलग, नंदन भास्करे, योगेश गोसावी, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाठ, रामा पाटील आदी उपस्थित

होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात थांबणार कधी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या काही वर्षांत नाशिक महापालिकेचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. वाढलेल्या लोकवस्तीत वाहनांची संख्या अधिक झाल्याने रस्ते कमी पडू लागले आहेत. त्यातच आरक्षित असलेले अनेक डीपीरोड महापालिकेने तयार केले नसल्याने जुन्या रोडवर रोजच वाहतूक कोंडी व अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाढलेल्या अपघातांमुळे रोजच दुचाकी अथवा पादचाऱ्यांना आपले प्राण गमविण्याची वेळ येत आहे.

शनिवारी (दि. २५) सातपूर भागातील अशोकनगर रस्त्यावर दुचाकी चालकाने चारचाकीला जोरदार धडक दिल्याने चारचाकीच्या वाहनाची ऑइल टँक फुटल्याची घटना घडली. विशेष म्हणजे दुचाकीचालकाने जोरदार धडक देऊनही सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. त्यातच अशोकनगर पोलिस चौकीच्यासमोर नेहमी अपघात होत असल्याने यावर वाहतूक पोलिसांनी उपाय शोधावा अशीही मागणी होत आहे.

डीपी रोडची मागणी

शहरातील वाढलेल्या वाहनांच्या संख्येत रस्ते मात्र जुनेच असल्याने रोजच अपघात होत असल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे बोलले जाते. परंतु, यावर महापालिका व पोलिसांकडून योग्य उपाययोजना केली जात नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळते.

नुकतीच त्र्यंबकेश्वर रोड व जेलरोडच्या सैलानी बाबाच्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाल्याची घटना झाली. असे असतानादेखील अपघात थांबण्याचे नाव घेत नसल्याचे रोजच झालेल्या अपघातातून दिसून येते. विशेष म्हणजे महापालिकेची स्थापना झाल्यापासून आरक्षित केलेले अनेक डीपीरोड आजही झाले नसल्याने जुन्याच रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत असते. सातपूरच्या अशोकनगर भागात वास्तूनगर, विश्वासनगर, पवार संकूल, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर व ध्रुवनगर भागाकडे जाणाऱ्या वाहनांची रोजच वर्दळ असते.

वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे अशोकनगर रोडवर नेहमीच अपघात होत असल्याने अशोकनगरच्या रस्त्याला पर्यायी असलेल्या डीपी रोडची उभारणी करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेक पोस्टचा फंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने आधार लिंक करण्याची घोषणा केल्यानंतर आता काही खासगी कंपन्यांनी नवा फेक फंडा वापरत

डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. देशात सर्वाधिक पाॅलिसी असलेल्या

एलआयसीच्या नावाने काही खासगी कंपन्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे

प्रकारही समोर आले आहेत.

शहर परिसरातील एलआयसी पॉलिसीधारकांना काही इन्शुरन्स कंपन्यांकडून आधार कार्ड व पॅन कार्डची माहिती व

पाॅलिसी नंबर ५६१६१ या नंबरवर पाठविण्याचे आवाहन एलआयसीच्या नावाने केले जात आहे. त्याचप्रमाणे

अनेकांना फोन करूनही ही माहिती गोळा केली जात आहे. या माहितीच्या आधारे फसवणूक करण्याचा प्रकार

गंभीर असून, एलआयसीने त्याची दखल घेतली आहे. अशा पोस्ट फेक असल्याच्या पोस्टही एलआयसीच्या काही

कर्मचाऱ्यांनी व्हायरल केल्या आहेत. त्याचप्रमाणे पोर्टलवरही याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर

एलआयसी यासंदर्भात जाहिरातही प्रसिद्ध करणार आहे.

केंद्राने आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम उघडल्यानंतर एलआयसीने त्यासाठी आपल्या पोर्टलवर आॅनलाइन

जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी

एलआयसीच्या कार्यालयात जाऊन फाॅर्म भरण्याची सुविधा दिली आहे. पण, असे असताना काही खासगी

इन्शुरन्स कंपन्यांचा फेक फंडा सुरूच आहे.

--

माहिती न देण्याचे आवाहन

देशभर लाइफ इन्शुरन्समध्ये एलआयसीने खासगी कंपन्यांशी स्पर्धा करूनही आपला टक्का कायम ठेवला आहे.

त्याचप्रमाणे नाशिक विभागात एलआयसीचे अनेक पाॅलिसीधारक आहेत. त्यामुळे त्यांच्या माहितीचा दुरुपयोग

होऊ नये यासाठी कोणीही फोनवर आपली पाॅलिसीबद्दलची माहिती व आधार, पॅन कार्डची माहिती देऊ नये, असे

आवाहन एलआयसीने केले आहे.

--

सोशल मीडियाचा वापर करून काही खासगी इन्शुरन्स कंपन्या एलआयसीच्या नावाखाली फेक पोस्ट करीत

आहेत. त्याचप्रमाणे फोनही करीत आहेत. पाॅलिसीधारकांनी अशी माहिती देऊ नये. एलआयसीचे अधिकृत पोर्टल

असून, कार्यालयातही फाॅर्म भरून माहिती देता येणार आहे.

-शेखर मोघे, पदाधिकारी, एलआयसी फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images