Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ दिरंगाईबाबत चौकशीचे आदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव तालुक्यातील चौकटपाडे येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येची तीन महिन्यांनी दखल घेण्यात आल्याने विलंबास कारणीभूत असलेल्यांवर जबाबदारी निश्चित करून तत्काळ कारवाई करा, असे आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

दयावान सरोदे (वय ४५) या शेतकऱ्याने २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. या घटनेची नोंद २४ तासात होणे आवश्यक असताना जिल्हा प्रशासनाकडे तब्बल तीन महिन्यांनी ही माहिती देण्यात आली. सरकारी यंत्रणा शेतकरी आत्महत्यांबाबत किती गंभीर आहे याचा प्रत्यय या घटनेमुळे आला असून असंवेदनशीलतेचही दर्शन घडले आहे.

या घटनेचा पंचनामा करून अहवाल त्वरित सादर करणे आवश्यक होते. परंतु तलाठ्याने २० नोव्हेंबर २०१७ रोजी हा अहवाल टंचाई शाखेला सादर केला. विलंबाच्या कारणाबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे विचारणा केली आहे. या गलथानपणाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी असे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारचे मंत्रीच खरे ‘लाभार्थी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली म्हणून सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला, असे एकही उदाहरण राज्यात पहावयास मिळालेले नाही. एकेका आधारकार्डवर पाचशे ते हजार शेतकऱ्यांची नावे असल्याची प्रकरणे पुढे येत असून हा मोठा घोटाळाच आहे. सरकारमधील मंत्रीच खरे लाभार्थी असून ‌त्यांचे फोटो छापणे शिल्लक असल्याची जळजळीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरूवारी नाशिकमध्ये केली.

कृषिथॉनच्या उद्‍घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की सरकारने जी ऐतिहास‌िक कर्जमाफी दिली ती शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांचा किती अवमान करावा हे या योजनेतून आपण पहात आहोत. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का दिले हा देखील संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अवमान करेपर्यंत या सरकारची मजल गेली असून शेती व शेतकऱ्याला उद्‍ध्वस्त करण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका यावेळी विखे यांनी केली.

सरकारकडे ‌बँकांच्या याद्या आहेत. त्यावर आरटीजचेएस करून ताबडतोब शेतकऱ्यांच्या रकमा वर्ग करायला हव्यात असे सभागृहात आम्ही सरकारला सांगितले. परंतु, कर्जमाफीच्या पत्रावर स्वत:चे फोटो मुख्यमंत्र्यांना छापायचे होते अशी टीकाही यावेळी करण्यात आली. ऑनलाइन हा फार्स असून सरकारला ऑफलाइन करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कृषी विद्यापीठाच्या कारभारावरही विखे यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी कृषी विद्यापीठांकडून ठोस काही होताना दिसत नाही. कृषी उत्पादनांच्या विपणन व्यवस्थेसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठे काय करतात, हवामानाचे कृषी उत्पादनांवर काय परिणाम होतात आणि त्या माध्यमांतून उभ्या राहणाऱ्या आव्हानांना शेतकऱ्यांनी कसे सामोरे जायला हवे हे सांगण्यात विद्यापीठे कमी पडत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या पुढे शेतकरी प्राधान्य क्रमावर नाही त्यामुळे कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवादाचा विषयच रहात नाही, असे ते म्हणाले.

एक थेंब पाणीही गुजरातला देणार नाही
दमणगंगा, नारपार, पिंजाळ संदर्भात आमची भूम‌िका स्पष्ट आहे. राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही. राज्य सरकार केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करीत असेल तर सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी राज्यातच राहायला हवे. यासाठी कितीही मोठा लढा द्यावा लागला तरी सर्वांना सोबत घेऊन तो उभारण्यात येईल. राज्य सरकार गुजरात सरकारच्या दारात जाऊन पाणी भरत असेल किंवा प्रधानमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असेल तर शेतकरी ते कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. या प्रकल्पा संदर्भातील पहिले अहवाल आमच्याकडे आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकार अहवालच बदलायला लागले तर आम्ही ते होऊ देणार नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.

‘मातोश्री’ प्रॉडक्शनचे चला, सत्ता सोडू या!
महसूलमंत्री चंद्रकात पाटील गुरुवारी मातोश्रीवर गेले. त्या पार्श्वभूमीवर विखे म्हणाले, की सत्तेत राहणारी शिवसेना भाजपवर टीका करून लोकांना निव्वळ मुर्खात काढण्याचे काम करीत आहे. राज्यात सध्या दोन विनोदी कार्यक्रम सुरू आहेत. त्यामध्ये एका मराठी वाहिनीवरील ‘चला, हवा येऊ द्या’ आणि मातोश्री प्रॉडक्शनचे ‘चला, सत्ता सोडू या’ हे दोन कार्यक्रम असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. विखे यांच्या या कोटीनंतर उपस्थित खळखळून हसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातचे वऱ्हाड पोहचले मालेगाव आरटीओत!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एका लग्न समारंभासाठी सुरतहून आलेले वऱ्हाड लग्नमंडपात पोहचण्याआधी थेट आरटीओ कार्यालयात पोहोचले. विनापरवाना व चेक नाका चुकवून येणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनावर आरटीओने कारवाई केली. या कारवाईमुळे लग्नासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडींचे चेहरे पडले होते.

गुजरातमधील सुरत येथून एका खासगी बसने (जीजे ०५ एझेड ४५७७) हे वऱ्हाड मालेगावी येण्यास निघाले होते. तालुक्यातील दाभाडी गावाजवळ आरटीओच्या पथकाचे मोटार वाहन निरीक्षक साहेबराव मंडलिक यांनी या वाहनाला अडविले. परराज्यात प्रवाशी वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना व राज्यात प्रवेश करताना भरावयाची कर पावती देखील या वाहनचालकाकडे नसल्याने अधिकाऱ्यांनी दंड भरण्यास सांगितले. मात्र त्यासाठी वऱ्हाड असलेले वाहन थेट येथील आरटीओच्या आवारात आणले. त्यामुळे अनेकांना लग्नाचे वऱ्हाड आरटीओ ऑफिसमध्ये आल्याचे पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेला सलाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषी क्षेत्राला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या उद्यमशील युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत कृषीथॉन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी प्रदर्शनाचा नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात आला.

सिटी सेंटर मॉल आणि एबीबी सर्कल लगतच्या ठक्कर ठोम येथे कृषीथॉन प्रदर्शनाचा उद्‍घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. ह्युमन सर्व्ह‌िस फाउंडेशन व मीडिया एक्झ‌िबिटर्स यांच्यातर्फे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्‍घाटनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, ‘नाडा’चे विजूनाना पाटील, कृषी सहसचिव दिलीप झेंडे, कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर आदी मान्यवर उपस्थ‌ित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले, की यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला म्हणून किटकनाशकांची दुकानेच बंद करणे योग्य नाही. या किटकनाशकांमध्ये मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या ज्या घटकांचे प्रमाण अधिक आहेत ते नियंत्रणात आणायला हवे. कंपन्यांवर निर्बंध आणावेत व त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत, अशी आमची मागणी आहे. सरकारने या गोष्टींमध्ये बारकाईने जायला हवे.

कपाशीला अधिक तर द्राक्षासारख्या पिकांना कमी प्रमाणात औषधे लागतात. दोन्ही प्रकारचे औषधे एकत्रितरित्या विकू नये असे म्हटले तर दोन लायसन देणे सरकारला शक्य आहे का असे चुकीच्या पद्धतीने सरकार निर्णय घेत असेल तर ते योग्य होणार नाही. दुकानदारांवर बंदी आणण्यापेक्षा कंपन्यांवर कारवाई करा. दरम्यान, यवतमाळमध्येही असे कृषीथॉन घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवनवीन तंत्रज्ञान, बदलती शेती पद्धती याविषयी या प्रदर्शनात माहिती मिळेल. सरकारने हवामानाधारीत प्रदेशावर कृषी धोरणाची रचना करायला हवी, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली. राजकारण्यांनी सर्व व्यवस्था बिघडवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचेही राजकारण झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे गणित शेतकऱ्यांनी ठरवायला हवे. अनुदानासाठी सरकारकडे भीक कशाला मागायला हवी, असा सवाल त्यांनी उपस्थ‌ित केला. पद्मावती चित्रपट हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थ‌ित केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या रोखण्यासाठी काम करा, असा सल्ला त्यांनी दिला. अन्य मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शन सोमवारपर्यंत (दि. २७) सुरू राहणार आहे. संजय न्याहारकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक केले.

युवा शेतकरी, संशोधकांचा सन्मान
कृषी क्षेत्रामध्ये प्रयोगशील कार्य करणारे राज्यातील युवा शेतकरी, महिला शेतकरी, युवा संशोधक, युवा कृषी उद्योजक अशा ३४ जणांचा या प्रदर्शनामध्ये सत्कार करण्यात आला. यामध्ये रुपाली पाटील, कल्पना दामोदर, रेखा वहाटूळ, विभावरी जाधव, ज्योत्सना सुरवाडे, राहुल सुपारे, राहुल रौंदळ, विष्णू मुसळे, योगेश पवार, आप्पा करमरकर, ब्रह्मानंद पांगुळे, उद्धव नेरकर, अभिजीत वाडेकर, रोहन उरसळ, समृद्धी परांजपे, सरोजिनी फडतरे, डॉ. दीपक क्षीरसागर, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. अंकुश चोरमुले, आकाश चौरसिया (मध्य प्रदेश), डॉ. अमित शर्मा (हरियाणा), अनिरुद्ध उमरकर, भागवत बलक, रोकडेश्वर फार्मस कंपनी यांचा सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या ‘इन्फ्रा’ला सरकारकडून मुदतवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा-२ (इन्फ्रा) योजना राबविण्यात येत आहे. मार्च २०१७ मध्ये संपलेल्या या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पायाभूत आरखडा (इन्फ्रा-१) ही योजना २००८-०९ मध्ये पाच वर्षांसाठी तयार केली होती. त्यानंतर इन्फ्रा-२ ही योजना २०१३-१४ पासून राबविण्यात येत आहे. मार्च २०१७ पर्यंत ही योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. त्यासाठी वर्षनिहाय नियतव्यय व अर्थसंकल्पित तरतुदीसही मान्यता दिली. काही ठिकाणी वीज उपकेंद्रासाठी जागा वेळेत न मिळाल्याने इन्फ्रा-२ ची कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. सध्या या योजनेची ८७ टक्के कामे झाली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यास मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब सरकार दरबारी विचाराधीन होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या योजनेला मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली.

इन्फ्रा-२ योजनेचा एकूण खर्च ८३०४.३२ कोटी असून महावितरणने ८० टक्के भांडवल म्हणजे ६६४३.४६ कोटी उभारून २० टक्के भांडवल १६६०.८६ कोटी रुपये सरकारने समभाग स्वरूपात देऊन हा प्रकल्प राबविला जात आहे. सद्यस्थितीत वीजप्रणाली सक्षम करणे, भविष्यात येणाऱ्या भार मागणीची उपलब्धतता करणे, सुयोग्य दाबाचा व खात्रीशीर वीजपुरवठा करणे, वितरण रोहित्रांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करणे, तांत्रिक व वाणिज्यिक हानी कमी करणे ही कामे करण्यात येतात. इन्फ्रा-२ या योजनेची गुणवत्ता तपासणीसाठी महावितरणने तीन श्रेणी गुणवत्ता यंत्रणा स्वीकारली. महावितरण आणि कंत्राटदार यांनी संयुक्तपणे माइलस्टोन चार्ट तयार करून ही कामे करण्यात येत आहेत.

इन्फ्रा-२ या योजनेअंतर्गत ५०३ विद्युत उपकेंद्रांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३५८ उपकेंद्रे पूर्ण झाली आहेत. १२२ कामे प्रगतीपथावर आहेत. रोहित्र क्षमतावाढ करण्याची २१० कामांचे उद्दिष्ट असताना २०२ कामे पूर्ण झाली आहेत. अतिरिक्त विद्युत उपकेंद्र रोहित्र ३२६ करावयाची होती. यापैकी २८१ पूर्ण झाली आहेत. वितरण रोहित्रे ३८४१४ करावयाची होती. यापैकी ३३५८५ पूर्ण झाली आहेत.

३६५ कोटींची गरज
वीज वितरण रोहित्र क्षमतावाढ १४६३० चे उद्दिष्ट असताना १४०१९ कामे पूर्ण झाली आहेत. उच्चदाब वाहिनीचे २८१५९ किलोमीटरचे उद्दिष्ट असताना १९९०० किलोमीटर वाहिनी पूर्ण केली आहे. लघुदाब वाहिनीची २४१९८ किलोमीटरच्या कामाचे उद्दिष्ट असताना १८४५९ किलोमीटरची कामे पूर्ण झाली आहेत. मूळ योजनेनुसार इन्फ्रा-२ या योजनेस २० टक्के प्रमाणे शासनाकडून शिल्लक भागभांडवल देण्यासाठी २०१७-१८ साठी ५६० कोटी एवढी तरतूद केली आहे. २०१८-१९ साठी ३६५.५५ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हसून-हसून मुरकुंड्या वळवणारं ‘गाढवाचं लग्न’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजा असो वा रंक, नियतीचे जे लिखित आहे ते कुणालाच टळत नाही. एकदा सटवी टाक टाकून गेली की त्यानुसारच होणार हे निश्चित असते. देवदिकसुद्धा त्यातून सुटलेले नाहीत, हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘गाढवाचं लग्न’. सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत हरिभाऊ वडगावकर लिखित ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक गुरुवारी सादर करण्यात आले.

सावळा कुंभार नावाच्या एका अतिशय हुशार कुंभाराची ही कथा आहे. त्याची बायको गंगी आणि तो सुखात संसार करीत आहेत. परंतु, रानात गाढवे चरायला नेल्यावर एक गाढव आपणहून त्यांच्यात येते. सावळा कुंभारही ते गाढव ठेऊन घेतो. परंतु मध्यरात्री गोठ्यातून माणसासारखा आवाज येऊ लागतो. सावळा कुंभार भीतभीत तेथे जातो; तर गाढवच मनुष्यवाणीने बोलत असते. त्याला यात भुताटकी वगैरे वाटते. परंतु, तो त्याच्यावर फारसा विश्वास ठेवत नाही. ते गाढव सावळा कुंभाराला सांगते की राजाने त्याच्या कन्येच्या विवाहासाठी जो पैंजेचा विडा ठेवलाय तो उचलून घेऊन ये. सावळा त्याच्यावर विश्वास ठेऊन पैजेचा विडा उचलायला जातो तेथे प्रधान व राजा त्याची बरीच खेचतात. मात्र, सावळा कुंभार हुशार असतो तो राजाकडून एक कागद लिहून आणतो आणि पैजेचा विडा उचलून घेऊन येतो. एका रात्रीत सात तळाची तांब्या पितळाची माडी जो कुणी बांधेल त्याच्याशीच राजकन्या लग्न करेल इतरी सर्व पुरूष तिला वडिलांसमान आहेत अशी ही पैज असते. सावळा गाढवाला ही गोष्ट सांगतो. त्याप्रमाणे गाढव गावाबाहेर माडी उभी करून देते. आता विवाहाचा प्रसंग येतो. राजाला गाढव जावई मान्य नसतो मात्र सावळाने कागद लिहून घेतलेला असतो त्यामुळे त्याला लग्न लावून देणे भाग पडते. राजकन्येने विवाहाची माळ गळ्यात टाकताच गाढवाचे रूपांतर एका सुंदर राजकुमारात होते. ते गाढव म्हणजे पूर्वी सुरोचन नावाचा गंधर्व असते, इंद्राच्या दरबारात काही उपमर्द केल्याने त्याला गाढवाचा जन्म व उशा:प मिळालेला असतो. त्यानुसार त्याचे राजकुमारात रुपांतर होते व दोघे सुखी राहतात. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे लेखन हरिभाऊ वडगावकर यांनी केले होते. दिग्दर्शन सुरेखा लहामगे-शर्मा यांचे होते. निर्मिती सूत्रधार शुभम शर्मा होते. नेपथ्य राजेश भालेराव यांचे तर प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा यांची होती. पार्श्वसंगीत दिनकर दांडेकर यांचे रंगभुषा माणिक कानडे यांची होती. ढोलकी शुभम लांडगे यांची होती. नाटकात मयूर चोपडे, जयप्र्रकाश पुरोहित, कीर्ती नागरे, श्रीम काटवे, खुशी पवार, भूषण बागूल, अतुल देशमुख, योगेश थोरात, डॉ. शैलेंद्र गायकवाड, कविता आहेर, विशाल पांडव यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : एक्झिट
वेळ : सकाळी ११.३० वाजता
आजचे नाटक : मून विदाऊट स्काय
वेळ : सायंकाळी ७ वाजता
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७२ अर्ज अवैध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील नगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरल्यानंतर गुरुवारी छाननी प्रक्रीया पूर्ण झाली. नगराध्यक्ष आणि प्रभागातील १७ जागांसाठी एकूण २११ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ७२ अर्ज अवैध आणि १३२ अर्ज वैध ठरले. एका पेक्षा अधिक अर्ज दाखल करणे, एकाच उमेदवाराने दोन किंवा अधिक पक्षांचे चिन्ह लिहून सूचक केवळ एकच देत एबी फार्म व्यतीरिक्त असलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामुळे निवडणूक रंगात येण्याआधीच अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे आणि सहायक अधिकारी तथा मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. माध्यमांच्या प्रतिनिधींसह सर्वांना कार्यालयात प्रवेश दिला नाही. उमेदवार आणि त्यांच्या सूचकांनाच प्रवेश होता. प्रभागाप्रमाणे नाव पुकारत अर्जदारांना आत प्रवेश देण्यात आला.

नगराध्यक्ष पदासाठी अजय अडसरे आणि दिलीप पवार यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. अजय अडसरे यांचे वडील नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी करीत आहेत तर दिलीप पवार हे प्रभाग पाच मधून उमेदवारी करीत आहेत. पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी करायची होती. मात्र त्यांची ही संधी हिरावली गेल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान सन २०१२ च्या निवडणुकीतही त्यांचे नाव मतदार यादीत आले नव्हते. त्यामुळे तेव्हाही त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले होते. तर यावेळी छाननी दरम्यान उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला.

माघारीनंतर चित्र स्पष्ट

अर्ज छाननी प्रक्रिया आज गुरुवारी पूर्ण झाली. तथापि लढतीचे चित्र २८ नोव्हेंबरच्या माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या प्रकियेस पूर्ण होण्यास दुपारचे तीन वाजले होते. उमेदवार आणि त्यांचे समर्थक तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पालिका कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

ऑनलाइन केंद्रांची कमाई

पालिकेला केवळ ना हरकत दाखल्यांची फिसाठी दोन लाखांपेक्षा अधिक मिळाली असावी, असा अंदाज आहे. तसेच एका उमेदवाराने पक्षाचे आणि अपक्ष असे एका पेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. असे एकूण २०१ अर्ज

आले होते. संगणक केंद्रावर सरासरी एक हजार रुपये खर्च धरल्यास दोन लाख रुपयांची कमाई ऑनलाइन सेवा पुरविणाऱ्यांनी केली आहे. दाखले जमा करणे आणि अर्ज दाखल करणे यामधे वेळ गेल्याने शेवटच्या दिवशी गर्दी झाली. अनेकांनी अर्ज दाखल करण्याचा विचार अर्धवट सोडला.

सुविधा अपूर्ण

उमेदवार आणि त्यांचे समर्थक पालिका कार्यालयासमोर उपस्थित होते. निवडणुकीसाठी अर्जदारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालिकेबाहेर काही महिला उमेदवार लहान मुलांसह उभ्या होत्या. पालिका प्रशासनाने सावलीसाठी मंडप तसेच पिण्यासाठी पाणी सुविधा न केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

नागरिक जाणार कोर्टात

३१ मार्च हे आर्थिक वर्ष विचारात घेता घरपट्टी आणि पाणीपट्टी आगाऊ घेतली जाते. नागरिक बहुदा ३१ मार्चपूर्वी आपल्याला देय असलेले कर जमा करतात. निवडणूक असल्याने थकबाकी नको म्हणून १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ चे करबील उमेदवारी करणारे आणि त्यांचे सूचक यांना भरावे लागले आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीबाबत आधीच पैसे मोजावे लागत असल्याने काही नागरिकांनी यावर आक्षेप घेत न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

दोघांनी नाकारली शिवसेनेची उमेदवारी

शिवसेनने प्रभाग २ ब मधून रोह‌िणी गुंड यांना आणि प्रभाग ७ अ मधून अनुराधा मिल‌िंद पाटील यांना एबी फार्म दिले होते. छाननी दरम्यान या दोन्ही उमेदवारांनी आपणास पक्षाची उमेदवारी नको असल्याचे लेखी अर्ज दिले. त्यानंतर प्रभाग २ ब मधून मंजुषा नार्वेकर यांना आणि प्रभाग ७ अ मधून रूपाली सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

मार्गदर्शनाअभावी हुकली संधी

ऑनलाइन अर्ज आणि सुचकांसह थकबाकीदार नसल्याची सक्ती तशात अपुरे मार्गदर्शनामुळे अनेकांची उमेदवारीची संधी हुकली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान रविवारची सुटी वगळता अत्यंत कमी कालावधी उपलब्ध होता. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही अद्यावत सुविधा न दिल्याने उमेदवारांचे हाल झाले. मागर्दशक सूचना प्रवेशद्वाराचे बाहेर असलेल्या पोल‌िस बॅरेकेडिंगवर लावण्यात आल्या होत्या. त्या सहजासहजी नजरेस पडत नव्हत्या. त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ झाला.

१७ अर्ज इगतपुरीत ठरले अवैध

इगतपुरी : इगतपुरी नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी व ९ प्रभागातील १८ नगरसेवकपदासाठी दाखल झालेल्या अर्जाची गुरुवारी छाननी झाली. यात नगराध्यक्षपदाचे दोन व नगरसेवक पदाचे १५ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे व मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी दिली. नगरसेवक पदासाठी ९३ तर नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार रिंगणात असून, यापैकी कोण निवडणूक लढवणार हे २८ नोव्हेंबरला माघारी नंतर स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्याजवळ पकडले वाळूचे ४० डम्पर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गुजरात राज्याकडून नंदुरबारमार्गे नाशिक-मुंबईकडे जाणाऱ्या ३५ ते ४० वाळूची वाहतूक करणाऱ्या डम्परांना जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे. यामुळे सदरची वाळू वाहतूक वैध की अवैध या बाबत सत्यता पडताळून बघण्यासाठी बागलाणचे प्रातांधिकारी प्रवीण महाजन, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विनोदकुमार चव्हाण व जायखेडा पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड तळ ठोकून आहेत. रात्री उशिरापर्यंत या बाबत कारवाई सुरू होती.

विंचुर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्गा वरील शाहू ढाब्याजवळ सायंकाळी सुमारे ३५ ते ४० वाळू वाहतूक करणारे डम्पर आल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. यानुसार महसूलचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विनोदकुमार चव्हाण व कर्मचाऱ्यांच्या पथकाने या ठिकाणी धाव घेतली. हे पथक पाहताच बहुतेक डम्पर चालकांनी पळ काढला. ही वाळू गुजरातमधील असून नंदुरबारमार्गे नाशिक-मुंबईकडे रवाना केली जात होती. त्यांच्याकडील वाळूच्या रॉयलटीच्या पावत्या तपासण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. वाळू वाहतूक करणारी वाहने एका राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे असल्याचे समजते. यामुळे दबाबतंत्र सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर, परिसरात डेंग्यूचा उद्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत विविध प्रकारची जागृती, उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरच्या १ तारखेपासून महापालिका हद्दीत डेंग्यूसदृश रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली असून, पॉझ‌िट‌िव्ह रुग्णांचा आकडा १८१ वर गेला आहे. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तावलेलीच दिसत आहे.

शहरी व ग्रामीण परिसरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मोठ्या प्रमाणात संशयित रुग्णांची नोंद झाली होती. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा आता शंभरच्या पार गेला आहे. मागील महिन्याच्या अहवालात एकूण ९७ रुग्ण डेंग्यूचे आढळले होते. अद्याप महापालिकेकडून सरकारी, तसेच खासगी दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशय‌ित रुग्णांचा आकडा शंभरच्या वर गेल्याने डेंग्यू मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी घटलेली स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या नोव्हेंबरमध्ये पुन्हा काहीशी वाढल्याची स्थिती आहे. महापालिकेच्या सर्वच प्रमुख रुग्णालयांत स्वाइन फ्लू कक्ष उभारण्यात आलेला आहे. याशिवाय या रुग्णांच्या सर्वेक्षणाबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आलेल्या असल्या, तरी वातावरणातील बदल, पाऊस यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत.

--

विशेष स्वच्छता मोहीम

महापालिकेतर्फे शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेत महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह, संघटनांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शहरातील रस्ते, गोदाघाट, कॉलनी, महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालये, महत्त्वाचे चौक, सार्वजनिक ठिकाणे आदी सर्वच ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या संस्था व नागरिकांना महापालिकेकडून झाडू व मास्क पुरविण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त शालेय, तसेच कॉलेजचे विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी शैक्षणिक संस्थांना अावाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विंटर फिटनेस फेस्टिवलची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि नवीन डान्स अॅकॅडमीतर्फे खास कल्चर क्लब सदस्यांसाठी विंटर फिटनेस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. २७ नोव्हेंबर) ते ६ डिसेंबर असे दहा दिवस हा फिटनेस फेस्टिवल रंगणार आहे.

हिवाळा ऋतू आला, की अनेक जण सकाळी जॉगिंगला जाण्याचा संकल्प करतात. पण, थंडीमुळे हा संकल्प काही प्रत्यक्षात उतरत नाही आणि फिटनेस फक्त विचारांपुरताच मर्यदित राहतो. पण, यंदा फिटनेस विचारांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहे. कॉलेजरोडवरील फिटनेस लाऊंज या ठिकाणी हा विंटर फिटनेस फेस्टिवल होणार आहे. सकाळी ८ ते ९, ११ ते १२, सायंकाळी ५ ते ६ आणि रात्री ८ ते ९ या वेळेत तुम्हाला त्यात सहभागी येईल. पूर्ण दहा दिवस या फिटनेससंदर्भातल्या बॅचेस असतील, त्यामुळे त्याचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

या विंटर फिटनेस फेस्टिवलमध्ये झुम्बा, बोकवा, स्टेप एरोबिक्स, बूट कॅम्प या डान्स प्रकारांचे कॉम्बिनेशन शिकविले जाणार आहेत. डाएटसंदर्भातील टिप्स आणि योगासंदर्भातही प्रशिक्षण दिले जाईल. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क नसून, इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७ आणि ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखणी ती बाला, ऐवज लंपास झाला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन पंचविशीतली देखणी तरुणी. व्यवसायाने ब्युटिशियन. कॉस्मेटिक उत्पादनेही ग्राहकाच्या गळी उतरवण्याचे कौशल्य. मात्र, तिच्या दिसण्यातलं सौंदर्य तिच्या विचारात एक टक्काही उतरलेलं नाही. तिने चक्क चोरीचा उद्योग सुरू केला. तब्बल चार ते पाच ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन तिने हातोहात लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने महिनाभर पाळत ठेवून या ब्युटीशियनचा पर्दाफाश करीत तिला गजाआड केले. या संशयित तरुणीचे नाव आहे धनश्री प्रकाश विसपुते (रा. म्हाडा कॉलनी, सामनगावरोड).

धनश्री विवाहित असून, तिच्या पतीकडे कार आहे. ती तो भाड्याने देतो. धनश्रीचेही ब्युटीपार्लर असून, अनेक मोठ्या कामांची जबाबदारी तिने पार पाडली आहे. वर वर पाहता धनश्रीसह तिच्या पतीला आर्थिक चणचण असल्याचे दिसत नाही. मात्र, सहज मिळणाऱ्या पैशांमुळे धनश्रीने चोरीचा मार्ग स्वीकारला. सतत वर्दळ असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये धनश्री कॉस्मेटिक उत्पादनांची विक्री करण्यासाठी जात होती. ब्युटीपार्लरमध्ये आलेल्या महिलांच्या पर्स ज्या ठिकाणी ठेवलेल्या असायच्या, त्याच ठिकाणी ती आपले सामान ठेवायची. उत्पादनांची माहिती देताना बोलण्यात गुंग करणारी धनश्री हातोहात महिलांच्या पर्समधील लाखो रुपयांचे दागिने चोरी करीत होती. अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यात काही महिन्यांपूर्वी धनश्रीला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली होती. तीन दिवस पोलिस कोठडीत, तर चार दिवस सेंट्रलमध्ये मुक्कामी राहून ती जामिनावर सुटली. हा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच धनश्रीने गोविंदनगरमधील एका ब्युटीपार्लरमध्ये, तसेच पंचवटी, भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीत चोरी केली होती. कॉलेजरोड परिसरातील विद्या येवले ७ जुलै २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास गोविंदनगरमधील सौंदर्या ब्युटीपार्लरमध्ये गेल्या होत्या. ब्लिच फेशियल करण्यासाठी त्यांनी काढून ठेवलेले गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरी झाले होते. या गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रँचच्या युनिट एककडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली पद्धत लक्षात घेत धनश्रीकडे लक्ष केंद्रित केले. काही दिवस तिच्यावर पाळत ठेवून तिच्या आर्थिक उत्पन्नाची माहिती मिळवली. संशयास्पद माहिती समोर आल्याने पोलिसांनी तिला अटक केली. धनश्रीने लागलीच गुन्ह्यांची कबुली दिली.

सोने गहाण ठेवून घेतले पैसे

चोरी केलेल्या सोन्याच्या बांगड्या एका फायनान्स कंपनीकडे, तर सोन्याची पोत एका खासगी व्यक्तीकडे गहाण ठेवून धनश्रीने पैसे घेतले होते. पोलिसांनी ४१ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि ३५ ग्रॅम वजनाची लगड असा दोन लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धनश्रीला २१ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तिला आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पंचवटी, भद्रकालीसह मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तिला पोलिस कोठडीत घेण्यात येऊ शकते, असे युनिट एकचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता वृक्षजन्य तेलबिया अभियान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक उपविभागात २०१७-१८ मध्ये पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात वृक्षजन्य तेलबिया अभियान कृषी विभागातर्फे राबवण्यिात येत असून, त्याअंतर्गत करंज, कोकम, महुआ या वृक्षजन्य तेलबिया पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वृद्धीचा अंतर्भाव आहे. करंज पिकासाठी प्रतिहेक्टर ५०० रोपे आणि २० हजार रुपये लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी चार वर्षे असून, प्रतिवर्ष देखभाल अनुदानमर्यादा दोन हजार रुपये आहे.

महुआ पिकासाठी प्रतिहेक्टर २०० रोपे आणि १५ हजार रुपये लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी आठ वर्षे असून, प्रतिवर्ष देखभाल अनुदानमर्यादा दोन हजार रुपये आहे. कोकम पिकासाठी प्रतिहेक्टर २५० रोपे आणि १५ हजार रुपये लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी सहा वर्षे असूनस प्रतिवर्ष देखभाल अनुदानमर्यादा दोन हजार रुपये आहे.

रोपांची उपलब्धता कृषी विद्यापीठ किंवा सामाजिक वनीकरणाकडून निर्धारित दराने खरेदी करून शेतकऱ्यांनी लागवड करावयाची आहे. शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे सातबारा व ८ अ असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांची निवड पंचायतराज संस्थेच्या सहभागाने करावी. विहित केलेल्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती-जमाती, तसेच महिला लाभार्थ्यांचा समावेश असणार असून, कार्यक्रमांतर्गत किमान ३० टक्के महिला व ३ टक्के अपंग लाभार्थींची निवड केली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन, उपविभागीय कृषी विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! लुटारू महिलांची टोळी नाशिकमध्ये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून सात महिलांच्या एका टोळीने सिन्नर फाटा येथील एका खते व बी-बियाण्यांच्या दुकानातून तब्बल दीड लाख रुपये हातोहात लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. विशेष म्हणजे या महिलांच्या टोळीतील काही महिलांकडे लहान मुलेही आहेत.

सिन्नर फाटा येथील तेजस अॅग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे मालक बंडू जाधव यांचा मुलगा तेजस बंडू जाधव याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात नमूद करण्यात आले आहे, की गुरुवारी दुपारी तेजसचे वडील बंडू जाधव कामानिमित्त नाशिकला गेल्याने तेजस दुकानाचे कामकाज सांभाळत होता. दुपारी तीनच्या सुमारास सात महिला या दुकानात आल्या व पिण्यासाठी पाणी मागितले. या महिलांच्या टोळीने थेट काउंटरपर्यंत येऊन पाण्यासाठी आग्रह केला. मात्र, तेजस जाधव व दुकानातील कामगारांनी या महिलांना दुकानाबाहेर जाण्यास सांगितले. सुरुवातीला या महिलांनी दाद दिली नाही. त्यामुळे या महिलांना दरडावून बाहेर जाण्यास सांगावे लागले. त्यामुळे ही महिलांची टोळी दुकानाबाहेर गेली. या प्रकारानंतर तेजसचे वडील नाशिकहून परत दुकानात आले. त्यांनी दुकानातील ड्रॉवर पाहिले असता पैसे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. त्यांनी पैशांची मोजदाद केली असता पैसे कमी असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेजसला त्याबद्दल विचारणा केली. तेजसने काही वेळापूर्वी आलेल्या महिलांच्या टोळीबद्दल सांगितले. या महिलांनीच पैसे लंपास केल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता या टोळीतील एक महिला खाली बसून पैशांच्या ड्रॉवरकडे सरकत ड्रॉवरमधील पैसे लंपास करीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर तेजसने नाशिकरोड पोलिस ठाण्यात या अनोळखी महिलांच्या टोळीबाबत दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद दाखल केली.

लहान मुलांचा गैरवापर

टोळीतील महिला अंदाजे २० ते ३० वर्षांच्या असून त्यांच्याकडे लहान मुलेही आहेत. या महिला कडेवरील लहान मुलांचा वापर सहानुभूती मिळविण्यासाठी करीत असल्याचे सिन्नर फाटा येथील चोरीच्या प्रकरावरून उघड झाले आहे. त्यामुळे या महिलांकडून आणखी काही व्यावसायिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चोरीच्या प्रकरणातील महिलांच्या टोळीचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक दप्तर तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दफ्तर तपासणी ही सरकारी यंत्रणेची जबाबदारी असून, विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणेला दफ्तर तपासणीचे आदेश दिले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करीत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील विविध शाखांची अचानक पाहणी करून तेथील दप्तरे तपासली.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत जम‌िनींच्या अधिग्रहणाची जबाबदारी महसूल यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. त्यावरच स्थावर मालमत्तेसंबंधीच्या बाबी अवलंबून असतात. गावपातळीवरील तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या यंत्रणेला याबाबतच्या जबाबदाऱ्या ठरवून देण्यात आल्या आहेत. या दफ्तरातील त्रुटींमुळे भविष्यात न्यायालयीन वाद उद्भवतात. हे वाढते प्रकार लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना दफ्तर तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त महेश झगडे स्वत: येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक कार्यालयातील विव‌िध विभागांची पाहणी केली. ज कार्यालयांमधील टेबलांवर ठेवलेल्या फाइल्स यावेळी चाळण्यात आल्या. संबंधितांना त्याबाबत विचारणा करण्यात आली. सोमवारी (दि.२७ ) रोजी विभागीय आयुक्तांकडून पाहणी केली जाणार आहे. दफ्तर तपासणीमध्ये त्रुटी आढळल्या आणि त्या दूर करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याकडे पाठविल्या गेल्या नसतील, तर संबंधितांची चौकशी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नारपारच्या श्रेयासाठी भुसे यांची धडपड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी नारपारला आरपार खोटी दिशाभूल करणारी योजना म्हणून हिणवणारे विद्यमान ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आता प्रकल्प मंजुरीनंतर या पाण्याचे महत्त्व व उपयुक्तता पटवून देण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. नारपार-दमणगंगाचे कुठलेच श्रेय मिळत नाही, म्हणूनच हा सर्व हास्यास्पद प्रकार ते करीत असल्याची टीका आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी केली आहे.

दमणगंगा-नारपार नद्यांधील बहुमूल्य जलसंपत्ती वर्षानुवर्षे वाया जात असल्याने हे पाणी पूर्वेकडे वळवावे आणि पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचे निवारण करावे, अशी मागणी डॉ. प्रशांत हिरे यांनी सातत्याने उचलून धरली आहे. हा प्रकल्प दुष्काळी शेतकरी तुषार्त जनता, उद्योग, कारखानदारीसाठी दुरगामी हिताचा ठरणार आहे. ‘तुला न मला’ या रडक्या नीतीचा व पोटदुखीचा खेळ मांडून भुसेंनी जनतेची दिशाभूल करू नये, अशी टीका हिरे यांनी केली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून, विकासपर्वाला चालना मिळेल, असा विश्वास हिरे यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुढीपाडव्यापासून प्लास्टिकबंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी कडक कायदा बनवला जाणार आहे. मात्र, हा कायदा सर्वांना आपला वाटावा म्हणून राज्यातील प्रदेश विभागातील अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जात आहे. आतापर्यंत विधिमंडळात कायदा बनवला जात होता व अधिकारी त्याची अंमलबजावणी करीत होते. मात्र, आता अधिकाऱ्यांचे मत अगोदर जाणून घेतले जाईल, नंतर कायदा बनवला जाणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या मताबरोबरच देशातील प्लास्टिकबंदी घातलेल्या १७ राज्यांतील कायदा व तेथील अंमलबजावणी कशी झाली, याची माहिती घेण्यात येत असून, त्यासाठी चार टीम बनवल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्लास्टिकबंदी धोरण राबविण्यासाठी नाशिकरोड येथील महाराष्ट्र इन्व्हायर्न्मेंटल इंजिनीअरिंग सेंटरच्या मित्रा सभागृहात बैठक झाली. या वेळी प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. उपस्थित होते. या वेळी रामदास कदम मार्गदर्शन करताना म्हणाले, की सर्वांना विश्वासात घेऊन कायदा बनवला जात आहे. प्लास्टिक कचरा हा विषय गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व आदित्य ठाकरे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले. त्यानंतर मच्छिमारांनी जाळ्यात ४० टक्के मासे येत असल्याचे सांगितले. समुद्रात तर प्लास्टिकचे बेट होत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे हा विषय गंभीर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईला अतिवृष्टी झाल्यानंतर प्लास्टिक कचऱ्याचा विषय पुढे आला. राज्यात सर्वत्र प्लास्टिक कचरा ही गंभीर समस्या झाली असून, त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

नाशिकला तिसरी बैठक

आतापर्यंत प्लास्टिकबंदीसाठी सूचना व चर्चा करण्यासाठी मुंबई, औरंगाबादनंतर नाशिक विभागाची बैठक घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री कदम यांनी दिली. बैठकीत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी अधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी दुष्काळ पडतो. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो. निसर्गाचा तोल ढासळत चालला असून, त्यामुळे पर्यावरण या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कार्यालयात बंदी

मंत्रालयापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पाण्याच्या प्लास्टिक बाटलीला बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिली सुरुवात आपल्यापासून होणार आहे. पाणी बॉटल तयार करणाऱ्या कंपन्यांना रिकाम्या बाटल्या रिसायकलिंग कारखाना सुरू करावा लागेल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तमध्ये विभाग अपयशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे २०१६-१७ या वर्षीचे भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यात नाशिक विभाग अपयशी ठरला आहे. या वर्षासाठीचे केवळ ५६ टक्केच आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. या वर्षासाठी ८५८ कोटी ६४ लाख रुपयांचा आर्थिक आराखडा होता. त्यापैकी अवघे ४८२ कोटी १९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात केवळ ७३ टक्के निधीतच शंभर टक्के भौतिक आराखड्यातील लक्ष्य साध्य झाल्याने उर्वरित निधीचे नियोजन कशासाठी करण्यात आले होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या योजनेच्या आर्थिक आराखड्यात नक्कीच मोठे गौडबंगाल असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या आकडेवारीत ताळमेळ नसल्याचेही उघड झाले आहे.

दरवर्षी पाच हजार टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने डिसेंबर २०१४ पासून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली. या योजनेमुळे टंचाईमुक्तीबरोबरच पाणीसाठवण क्षमतेत वाढ करणे व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यावरही भर दिला जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. विभागातील प्रशासनाच्या थंड कामकाजामुळे २०१६-१७ या वर्षीच्या आर्थिक आराखड्यानुसार निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट साध्य होऊ शकलेले नाही. केवळ ५६ टक्के निधीचा विनियोग करण्यात आलेला असून, ४४ टक्के निधी खर्च करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. याचा परिणाम विभागातील टंचाईमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यावर झाला असण्याची शक्यता आहे.

नाशिक अव्वल, तर धुळे तळाला

जलयुक्त शिवार योजनेच्या २०१६-१७ या वर्षीच्या अंमलबजावणीकामी विभागातील नाशिक जिल्ह्याने ७३ टक्के उद्दिष्ट साध्य करून विभागात अव्वल स्थान पटकावले आहे, तर धुळे जिल्ह्याने ४२ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. उर्वरित नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यांनी अनुक्रमे ५९, ५१ आणि ५३ टक्के इतकेच आर्थिक उद्दिष्ट साध्य केले आहे.

कामे होऊनही निधी शिल्लक!

जिल्ह्यात गेल्या वर्षी ६०६९ कामांचे भौतिक आराखडा लक्ष्य होते. त्यासाठी प्रशासनाने १९४ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक उद्दिष्टाचा आराखडा तयार केलेला होता. गेल्या वर्षी जिल्ह्यात भौतिक आराखड्यातील उद्दिष्टापेक्षा जास्त कामे झाली. जिल्ह्यात तब्बल ६१०६ कामे झाली. त्यासाठी अवघा १४३ कोटी २५ लाख रुपये इतकाच खर्च आला. शंभर टक्के भौतिक उद्दिष्ट अवघ्या ७३ टक्के निधीतच साध्य झाले, तर उर्वरित २७ टक्के अतिरिक्त निधीचे आर्थिक आराखड्यात नियोजन कुणासाठी करण्यात आले होते, असा सवाल आता केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगच शिकवणार प्रात्यक्षिके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औषधनिर्माण क्षेत्रात वापरली जाणारी महागडी उपकरणे दरवेळी कॉलेजांच्या लॅबोरॅटरीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे शक्य होतेच असे नाही. या समस्येवर तोडगा काढत सपकाळ फार्मसी कॉलेजने दिंडोरीतील न्युट्रालायटिका रिसर्चवर कंपनीसोबतच नुकताच एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार लॅबोरॅटरीमधील प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण या कंपनीद्वारे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना दिले जाणार आहे.

‘रिसर्च हायपिनेटेड अॅनॅलॉटिकल इन्स्ट्रुमेंट ट्रेनिंग’ अशा मथळ्याखाली हा करार करण्यात आला आहे. करार करण्यात आलेली कंपनी नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरॅटरीज (एनएबीएल) मान्यताप्राप्त आहे. या करारानुसार कंपनीत प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी एक दिवसापासून चार आठवड्यांपर्यंत विविध प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येतात.

प्रशिक्षणामध्ये प्रयोगशाळेतील उपकरणे उपयोगात आणण्याचे शिक्षण दिले जाणार आहे. या उपकरणांमध्ये एलसीएमएस, एचपीएलसी, जीसीएमएस, आयसीपी एमएस, यूव्ही, जीसी, एफटीआयआर आणि एएएस आदी उपकरणांचा समावेश आहे. ही उपकरणे महागड्या किमतीची असल्याने त्यांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे ज्ञानसंवर्धन, प्रयोगशाळा, प्रात्यक्षिके आणि संशोधन क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबींची देवाण-घेवाण करण्यास मदत होणार आहे. दिंडोरीतील न्युट्रालायटिका रिसर्चचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक पवन मोहटा, राहुल गेडाम आणि सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जी. सपकाळ, उपाध्यक्षा कल्याणी सपकाळ, संचालक डॉ. बी. बी. रायते, प्राचार्य डॉ. आर. बी. सौदागर, प्रा. दीप्ती फडतरे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे दर स्थिरच!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांद्याच्या निर्यातमूल्य शून्य डॉलरवरून ८५० डॉलरवर केले असले त्याचे फारसे परिणाम शुक्रवारी दिसले नाही. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचे दर २५० रुपयांची घसरले, असले तरी कांद्याने चार हजार रुपयांचा टप्पा गाठला होता.

चालू वर्षी चांगला पाऊस आणि पोषक हवामान यामुळे रब्बी (उन्हाळ) कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. अतिवृष्टीमुळे गुजरात, कर्नाटक, राजस्थान इ. राज्यातील कांदा पिकाचे नुकसान झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे राज्यातील कांदा दरात वाढ होऊन कांद्याने चार हजार रुपयांचा टप्पा गाठला होता.

कांदा दरात होत असलेल्या दरवाढीमुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर आणखी वाढू नये म्हणून केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर ८५० डॉलर प्रत‌ि टन निर्यातमूल्य लावण्याचा निर्णय घेतला असून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल, अशी आशा जरी शासनाला वाटत असली तरी शासनाचा हा निर्णय शेतकरी विरोधी असून, केवळ शहरी ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व गुजरातमधील निवडणुकीत मतदारांकडून कोणताही धोका पोहोचू नये म्हणून केंद्राची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक आता रब्बी (उन्हाळ) कांदा संपत आला असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये खरीप (लाल) कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सदर कांद्याचे आयुष्य कमी असल्याने शेतकऱ्यांना हा कांदा काढलेनंतर लगेचच विक्री केल्याशिवाय पर्याय नसतो. अशा परीस्थितीत अत्यंत काबाडकष्ट व खर्च करून हाती आलेल्या कांदा विक्रीतून दोन पैसे मिळण्याची संधी येथील उत्पादकांना असतांना केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंधने आणणेच्या दृष्टीने कांद्यावर किमान निर्यातमूल्य लागू केल्याने कांदा दर कमी होण्याची शक्यता आहे. सदर निर्णयामुळे शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सर्वसाधारण दरात अडीचशे प्रत‌ि क्विंटलने घसरण झाली आहे.

चांदवडला कांद्याचा ‘चौकार’

मनमाड ः शुक्रवारी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला आजवरचा सर्वात विक्रमी म्हणजे ४४४४ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत खुशीची लहर उसळली. कांद्याच्या भावाने चांदवड बाजार समितीत मारलेला हा आगळा चौकार चर्चेचा विषय ठरला. चांदवड बाजार समितीतील हा भाव मोसमातील उच्चांक आहे उन्हाळी कांद्या बरोबरच लाल कांद्यानेही चांदवड मध्ये ३९०० पर्यंत मजल मारली. चांदवड मध्ये शुक्रवारी कांद्याचे १२०० ट्रॅक्टर दाखल झाले. तर तब्बल २१ ते २२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.
नांदगावात ३८५० भाव

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला चांगला भाव मिळाला. उन्हाळ कांदा ३८५३ भावाने तर लाल कांदा ३८५२ भावाने विकला गेला. शेतकरी वर्गात समाधान पसरले नांदगाव मनमाड बाजार समितीत कांद्याची चांगली आवक झाली. गेल्या आठ दिवसात उन्हाळ कांद्याने तीन हजारांपासून चार हजारांपर्यंत टप्पा गाठला आहे. नांदगाव बाजार समितीती शुक्रवारी मोठ्या प्रमाणात कांदा आला होता. दिवसभर बाजार समिती आवारात वाहनांची गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाकी वर्दीने दिला मुलींना मायेचा हात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पालक रागावल्याने नाराज होऊन घर सोडून मध्य प्रदेशातून थेट मनमाड रेल्वे स्थानकात आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना खाकी वर्दीतील माणुसकीने सुखरुप पालकांपर्यंत पोहचवले. मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांच्या या माणूसपणाने मुलींच्या चेहऱ्यावर हसू तर फुललेच शिवय त्यांच्या पालकांना मुली सापडल्याचा अवर्णनीय आनंद झाला. पोलिसांकडून मुलींना ताब्यात घेताना पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. विविध कारणांनी प्रसिद्ध असलेल्या मनमाड जंक्शनमधील पोलिसांच्या या चांगल्या कामाने मनमाडची प्रतिमा मात्र उंचावली आहे.

मनमाड रेल्वे सुरक्षाबलाचे राकेशकुमार व एस. ए. वाणी हे दोघे मनमाड स्थानकात फलाट ५ व ६ वर गुरुवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना आशू काळे (वय १०), खुशी आनंद मिलिंद (वय ९), पूजा प्रताप ठाकूर (वय १४) या तिघी अल्पवयीन मुली घाबरलेल्या अवस्थेत दिसून आल्या. या तिघींनी त्यांनी मायेने विचारपूस केली. त्यावर मुलींनी मध्य प्रदेशातील सुंदरनगर येथून आल्याने सांगितले.

राकेश कुमार व श्री. वाणी यांनी केलेले माणुसकीचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांची चांगली प्रतिमा दूरच्या राज्यात गेली आहे.

- के. डी. मोरे, पोल‌सि निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images