Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आदिवासी महामंडळाचे अध्यक्षपद खुले

0
0


म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत राज्यमंत्रीमंडळाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या संरचनेत बदल करण्यात आला असून, आता या निर्णयामुळे महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आता आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासासाठी उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीचीही नियुक्ती करता येणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या इतिहासात प्रथमच आदिवासी मंत्री आणि राज्यमंत्री वगळता अन्य क्षेत्रातील व्यक्तींना या पदावर बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना १९७२ मध्ये सहकारी संस्था अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे. आदिवासी समुहातील शेतकरी, कारागीर, भूमीहीन मजूर आदींचा विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने हे महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद हे पदसिद्ध असून त्यावर अनुक्रमे आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विकास राज्यमंत्री यांची निवड करण्यात येते. दोन्ही मंत्री हे कामात व्यस्त असल्याने त्यांना महामंडळासाठी फारसा वेळ देता येत नाही. महामंडळाच्या बैठका या वर्षातून एकदाच होत असल्याने लाभार्थ्यांसाठी योजना राबविता येत नाहीत. त्यामुळे महामंडळाची सध्या दुरवस्था झाली आहे.महामंडळाचा कारभार सक्षमपणे चालवावा यासाठी महामंडळात मंत्र्यावगळता अन्य व्यक्तींकडे त्याचा कारभार देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. यापूर्वी आदिवासी मंत्री आणि राज्यमंत्र्यांनाच पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यपदाचा कारभार करता येत होते. या महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आदिवासी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचीही निवड व्हावी या उद्देशाने महामंडळाच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रथमच मंत्री वगळता अन्य व्यक्तींना अध्यक्षपद मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगराध्यक्षसाठी त्र्यंबकमध्ये १३ अर्ज

0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी १३ तर प्रभागातील १७ नगरसेवकांसाठी ९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले आहेत. तसेच प्रभागातील सतरा जागांसाइी एकमेव भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ११, ‌शिवसेना १० आणि राष्ट्रवादीने ६ जागांवर उमेदवार दिले आहेत.

भाजपा उमेदवारीचा ससपेन्स शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत कायम राहीला. आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह पक्षातील उच्चपदस्थ येथे ठाण मांडून आढावा घेत होते. प्रतिक्षेत असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेवटच्या अर्ध्यातासात जाहीर करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमशध्ये आलेल्या पृरूषोत्तम लोहगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या समवेत कैलास घुले यांचे नाव होते.

शिवसेनेचा घोळ सुरुच

शिवसेनेने दुपारी दोन वाजेपर्यंतच नगराध्यक्षपदासाठी धनंजय तुंगार यांची उमेदवारी निश्च‌ति केली. दरम्यान प्रभागातील उमेदवारी निश्च‌ति झाल्या. मात्र प्रभाग क्रमांक ७ अ ची उमेदवारीचा तीन वाजेपर्यंत घोळ सुरू होता. अनुराधा पाटील, रुपाली सोनवणे, योगिता उगले यांच्या समर्थकांनी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्याभोवती गराडा घातला होता. कधी सोनवणे तर कधी पाटील यांच्या नावावर चर्चा झाली. अखेर तीन वाजेला पाच मिनीटे कमी असतांना अनुराधा पाटील यांना एबी फार्म देण्यात आला. दरम्यान रुपाली सोनवणे यांच्या नावाचा देखील एबी फॉर्म असल्याची चर्चा होती. उगले यांचे समर्थक घोषणाबाजी करत होते. एकूणच प्रभाग सातमधील उमेदवारी अधिक चर्चेची ठरली.

काँग्रेसची संयमी उमेदवारी

काँगेस तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी एबी फॉर्मची यादी आणली आणि कार्यकर्त्यांसह ती कार्यालयात सादर केली. अत्यंत शांततेने आणि संयमी पध्दतीने सादर झालेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी जिल्हा युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आणि अरुण मेढे पाटील उपस्थित होते. यामध्ये कडलग यांनी स्वताचाच नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला. विश्वस्त दॉ सत्यप्रिय शुक्ल यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. मंदिराचे विश्वस्त तथा पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी उमेदवारी अर्जाची सर्व तयारी पूर्ण केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजकीय पक्षांकडे उमेदवारी माग‌तिली होती. मात्र उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबक नगराध्यक्षपदाचे उमेदवार

सुनील अडसरे (काँगेस), पुरुषोत्तम लोहगवकर (भाजपा), पुरूषोत्तम कडलग (राष्ट्रवादी), धनंजय तुंगार (शिवसेना), बाळासाहेब झोले, कैलास घुले, केशव काळे, सुचिता शिखरे, अनिल कुलकर्णी, अजय अडसरे, पराग दीक्षित, संजय कदम, नबीयून शेख.

१६ उमेदवार इगतपुरीत रिंगणात

घोटी : इगतपुरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जवळपास सर्वच उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नगरसेवक पदाच्या १९ जागांसाठी १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

भाजप व शिवसेनेने स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर काँग्रेस व शहर विकास आघाडीनेही स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षसाठी उमेदवार दिला नाही.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

फिरोज पठाण (भाजप), संजय इंदुलकर (शिवसेना), बद्रीनाथ शर्मा- (काँग्रेस), महेश शिरोळे (बविआ), बाळू पंडित (भारिप बहुजन महासंघ), महेश श्रीश्रीमाळ, ज्ञानेश शिरोळे, भास्कर बर्वे, मिलिंद हिरे, राजू कदम, नईम खान, मोहम्मद मेमन, ज्योत्स्ना पवार यांचे अर्ज दाखल झाले आहेत. नगरसेवकपदासाठी १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

JNPTकडून ड्रायपोर्टसाठी जागेची पाहणी

0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर केंद्राने मंजूर केलेल्या ड्रायपोर्टसाठी जागेची जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे चीफ इंजिनीअर एस. व्ही. मदाभावी, सहाय्यक प्रबंधक आर. बी. जोशी, सहाय्यक डायरेक्टर अॅण्ड वाय कनस्लटंट प्रशांत गुप्ता, समन्वयक सुजित गाडे यांनी निफाड कारखान्यावर भेट देऊन पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी निसाकाच्या अतिरिक्त ११० जम‌निींची पाहणी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. निफाडमध्ये होणाऱ्या या ड्रायपोर्टमुळे येथील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या जागेची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे पथक येथे आले होते.

निसाकापासून जवळच असलेल्या मुंबई-भुसावळ मार्गावरील रेल्वेचा विस्तृत प्लॅटफॉर्म व रोड कनेक्टिव्हिटी, पाण्याची सुविधा, नवीन रस्त्याची निर्मिती अशा सर्व बाजुंनी निसाकाच्या जागेची पाहणी केली. या तीन्ही बाबी ड्रायपोर्टला पुरक असल्याने जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी जम‌निीस हिरवा कंदिल दाखविला. कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन या पथकाने दिले. पिंपळसचे सरपंच तानाजी पुरकर, उपसरपंच विलास मत्सागर, डॉ. प्रशांत पाटील, निफाड कारखान्याचे कार्यकारी संचालक भागवत भंडारे, भाजप तालुकाध्यक्ष संजय वाबळे, उपाध्यक्ष संजय गाजरे, राजेंद्र मोगल, प्रमोद गांगुर्डे, जयश्री बँकेचे चेअरमन सचिव वाघ, सागर रायते, काका जेऊघाले, बाळासाहेब सुरवाडे, शिवाजी मत्सागर, आबा मत्सागर, सरचिटणीस संपतराव कडलग व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.

हस्तांतरण प्रक्रियेकडे लक्ष

ड्रायपोर्ट प्रकल्पाची केंद्राने घोषणा केल्यानंतर अवघ्या आठ दिवसात जेएनपीटीची कमिटी प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी आली. हा वेग पाहता प्रस्तावित ड्रायपोर्टची मुहूर्तमेढ लवकर केली जाऊ शकते. आता मुख्य बाब आहे ती निसाका जमीन हस्तांतरण प्रक्रियेची. न‌सिाकाची जमीन नाशिक जिल्हा बँकेने थकीत व्याज व कर्जापोटी जप्त केली आहे. सुमारे ३०० कोटी रुपये कारखान्याला देणे आहे. ड्रायपोर्ट निर्मिती ही सरकारची असल्याने यावरही लवकर तोडगा निघून जेएनपीटीला जमीन हस्तांतरण केली, तर हा प्रकल्प अपेक्षेपेक्षा लवकर आकाराला येईल.
0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षित जागेप्रश्नी रहिवाशांचा ठिय्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिकेने मैदानासाठी आरक्षित केलेली जागा खासगी विकसकाला देऊ केली आहे. त्यामुळे रहिवासी भागात मैदानच राहणार नसल्याने गंगापूररोडवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेची आरक्षित जागा खासगी विकसकाला देण्यास विरोध करीत स्थानिक रहिवाशांनी आकाशवाणी केंद्राच्या बाजूला ठिय्या आंदोलन केले.

खासगी विकसकाने सुरू केलेले काम तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी केली आहे. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेविका आडके यांनी आंदोलन करणाऱ्या रहिवाशांची भेट घेतली. याबाबत महापालिका आयुक्त व नगररचना विभागाला निवेदन दिले असल्याचे किशोर शिरसाठ यांनी सांगितले.

नाशिक शहरात गेल्या काही वर्षांत जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु, महापालिकेच्या ताब्यातील अनेक आरक्षित भूखंडांचा गैरवापर होताना दिसतो. त्यातच गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राच्या बाजूला मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर दुसरेच बांधकाम सुरू झाल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त करीत ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर स्थानिक रहिवाशांसाठी मैदानाचीच उभारणी करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. खासगी विकसकाला संबंधित मैदानाची जागा गाळे उभारण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. परंतु, स्थानिक रहिवाशांनी तरुणांना खेळण्यासाठी मैदानाचीच उभारणी करावी, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. याबाबत आयुक्त व नगररचना विभागाकडे पत्रव्यवहारदेखील केला असल्याचे स्थानिक रहिवासी शिरसाठ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जोडप्यावर सामाजिक बहिष्कार

0
0

सहा महिन्यांनंतर तक्रार; १२ जणांवर गुन्हे दाखल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या सहा महिन्यांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील करजकुपे गावात एकाच समाजातील तरुण-तरुणीने प्रेमविवाह केला होता. या विवाहाला त्यांच्या समाजबांधवांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यावर सामाजिक बहिष्कार टाकून त्रास दिला. याबाबत या जोडप्याने बुधवारी (दि. २२) रात्री पोलिसात तक्रार दाखल केली होती यानंतर १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

करजकुपे गावात तरुण-तरुणीचे गेली ५ वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांनी समाजाचा आणि गावाचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. त्यानंतर गावातील लोकांनी दोघांचे गोत्र एकच असल्याचे सांगत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. त्यांना कोणत्याच प्रकारचा सामाजिक धार्मिक आणि इतर कार्यात सहभागी करून घेण्यात आले नाही. त्यामुळे विवाह केलेला तरुण मानसिक दडपणात होता. काही दिवसांत परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा धरून त्यांनी त्रासाबद्दल तक्रार केली नाही. मात्र अखेर त्रास वाढल्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली. समितीच्या पुढाकाराने बुधवारी, उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुण-तरुणीने काही दिवसांपूर्वी उपनगर पोलिसात अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र परिस्थिती सुधारत नसल्याने बुधवारी (दि. २२) रात्री त्यांनी पुन्हा नंदुरबार उपनगर पोलिसात तक्रार दिली. यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा आणि इतर कायद्याअंतर्गत बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उपनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्र हाच प्रत्येकाचा धर्म

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सैन्यदलाच्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तोफखाना विभागात आपण सहभागी होत आहात याचा मला गर्व आहे. येथे येण्याअगोदर प्रत्येकाची भाषा वेगळी होती, प्रत्येकाचा धर्म वेगळा होता. परंतु, सैन्यात दाखल झाल्यानंतर प्रत्येकाचा धर्म भारत हा एकमेव असेल. देशाच्या रक्षणासाठी आपण मागे-पुढे पाहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे, असे प्रतिपादन मेजर जनरल पी. पी. प्रकाश सिंग यांनी केले.

तोफखाना केंद्राच्या उमराव परेड ग्राउंडवर गुरुवारी झालेल्या कसम परेडवेळी ४२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ४१७ जवानांना संबोधित करताना ते ते बोलत होते. या कार्यक्रमाला देशाच्या विविध भागातून आलेले पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेजर जनरल सिंग म्हणाले, की इतिहासाची साक्ष असलेल्या या विभागाने देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पेलत आजवर मोठे योगदान दिले आहे. युद्धाच्या निर्णायक क्षणांमध्ये सदैव आघाडीवर असलेल्या विभागात देशाच्या रक्षणासाठी बलिदान द्यावे लागले तरीही एका पायावर तयार राहावे. भारतीय सैन्याने शिक्षणाला सदैव महत्त्व दिले आहे. त्याकरिता प्रत्येक जवानाने ज्ञानात सतत भर घालत राहावे, असेही ते म्हणाले.

--

तोफा, हेलिकॉप्टरद्वारे मानवंदना

कसम परेडचा प्रारंभ नऊ टन वजन असलेल्या रशियन बनावटीच्या १३० एमएम रॉकेट लाँचरच्या आगमनाने झाला. या लाँचरवर असलेल्या नऊ जवानांनी तोफांचे प्रात्यक्षिक दाखवीत सर्वांना थक्क केले. या तोफांनी १९६५ च्या युद्धासह १९९९ मध्येदेखील महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. परेड कमांडर बी. मंजुनाथ यांनी कसम परेड सुरू करण्याची परवानगी घेतल्यानंतर मेजर जनरल सिंग यांनी परेडची पाहणी केली. त्यानंतर बॅगपाइपर बँडवर ‘कदम कदम बढाये जा’ची धून वाजवत शानदार संचलनाला सुरुवात झाली. यावेळी सहा प्लॅटून्स तयार करण्यात आले होते. संचलनाची सांगता होत असतानाच आर्मी एव्हिएशनच्या चेतक हेलिकॉप्टरने मानवंदना दिली. शेवटच्या सत्रात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन धर्मगुरूंनी आपापले ग्रंथ समोर ठेवत देशाप्रति एकसंघ राहू, संविधानाचे पालन करू, अशी शपथ या जवानांना दिली.


हरजीत सिंग बेस्ट कॅडेट

प्रशिक्षणादरम्यान विविध विभागांत नैपुण्य दाखविलेल्या जवानांना मेजर जनरल सिंग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बेस्ट कॅडेटचा पुरस्कार हरजीत सिंग यांना प्रदान करण्यात आला. अन्य पुरस्कारार्थी जवान असे ः शारीरिक प्रशिक्षण- विकास कुमार, ड्रिल- बवंशी मंजुनाथ, शस्त्र प्रशिक्षण- विजय मेवादा, टेक्निकल असिस्टंट- हरजीत सिंग, ऑपरेटर- देवेंद्रकुमार शर्मा, ड्रायव्हर- अभिषेक मेथिया, बेस्ट ट्रेड विद्यार्थी- मुकेश कुमार, सुरेंद्र कुमार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा दरवाढीवर निर्यातमूल्याची मात्रा

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केंद्र सरकारने गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटन ० डॉलरवरून ८५० डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा निर्यातीवर एक प्रकारे अघोषित निर्यातबंदीच केली असल्याने कांद्याचे दर ३०० ते ४०० रुपयांनी कोसळण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने सामान्य खूश होणार असले तरी शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडणार आहे. गुजरातची निवडणूक जवळ आल्याने केंद्राने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

यंदा परतीच्या पावसाने उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले, तर लाल कांदाही बाजारात उशिरा येऊ लागला आहे. मात्र, वाढती मागणी व अपुरा पुरवठा यामुळे कांदा बाजारभावात दिवाळी, नंतर हळूहळू वाढ होऊन तो ४,००० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला. मात्र, कांद्याची ही भाववाढ केंद्र सरकारची डोकेदुखी ठरली आहे. शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्याबरोबरच गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कांद्याचे वाढते भाव अडचणीत आणू शकतात हे हेरून केंद्राने गुरुवारी कांदा निर्यातमूल्य शून्य डॉलरवरून थेट ८५० डॉलर केल्याने कांदा निर्यातीला लगाम बसणार आहे. त्यामुळे कांदा स्थानिक बाजारपेठेत विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येणार आहे. पर्यायाने कांदा भाववाढीला लगाम बसून, ग्राहकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.

सरकारचा हा निर्णय मात्र शेतकऱ्यांना तापदायक आहे. शेतकऱ्यांच्या मते, यंदा नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी यामुळे कांदा पिकावर मोठा खर्च होऊनही त्या तुलनेत उत्पादन निघाले नाही. त्यामुळे आजच्या बाजारभावाने शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली असताना सरकारने निर्यातमूल्य वाढवून एक प्रकारे अघोषित कांदा निर्यात बंद केल्याचे दिसून येत आहे.

सध्या उन्हाळ कांदा संपला असून, उपलब्ध आणि बाजारात येणारा लाल कांदा हा टिकावू नसल्याने तो लागलीच विकावा लागत आहे. त्यामुळे तो निर्यात होतही नाही. त्यामुळे निर्यातमूल्य वाढवल्याचा फारसा परिणाम बाजारभावावर होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीत गुरुवारी १००० वाहनांतून आलेल्या कांद्याला जास्तीत जास्त ३९०१ रुपये, सरासरी ३५०१, तर अवघ्या १८ वाहनांत आलेल्या उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त ४१८० रुपये व सरासरी ४०६० रुपये असा दर होता.

तीन-चार महिन्यांपूर्वी ३०० ते ४०० रुपये दराने शेतकऱ्यांनी कांदा विकून तोटा सहन केला, तेव्हा शेतकऱ्यांसाठी सरकार धावले नाही आणि आता मात्र गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कांद्याचे दर कमी करण्यासाठी निर्यातमूल्य वाढवून सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला आहे.

- जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकांना दुय्यम वागणूक; महिला हक्क समितीसमोर तक्रारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जात असून, पुरुष नगरसेवकांची कामे तातडीने केली जातात. महिला नगरसेवकांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. महिला नगरसेवक म्हणून निवडून आलो; परंतु, अधिकारी जुमानत नाहीत. पुरूष नगरसेवकांचेच ते ऐकतात. महिलांसाठी विश्रांती कक्ष नाही, अशा प्रकारच्या तक्रारींचा पाऊसच विधी मंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर पडला.

डॉ. भारती लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी महापालिकेस भेट दिली. यावेळी स्थायी समितीच्या दालनात झालेल्या बैठकीस केवळ महिला नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. यावेळी महिला नगरसेवकांनी येणाऱ्या अनुभवांचे कथन केल्याचे समजते. नाशिक शहरात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत, ती कधीही स्वच्छ केली जात नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांत महिलांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी खर्च करण्यात आलेला नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. ही बाबदेखील महिला नगरसेवकांनी विधी मंडळाच्या समितीच्या निदर्शनास आणून दिली. हा खर्च का करण्यात आला नाही, याबद्दल अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही.

पुरूष नगरसेवक आणि महिला यांचा दर्जा समान असताना प्रत्यक्षात मात्र पुरुषांना अधिक महत्त्व दिले जाते. त्याची कामे वेगाने केली जातात, तर महिलांची कामे रखडवून ठेवली जातात. प्रशासनातील अधिकारी महिला नगरसेवकांना अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक देतात. पुरुष मंडळी अर्वाच्च भाषा वापरून कामे करून घेतात. अशी भाषा महिलांना वापरता येत नसल्याने त्यांची कामे रखडतात. महासभेच्या दिवशी बहुतांश सर्वच महिला उपस्थित असतात. परंतु, त्यांच्यासाठी वेगळा विश्रांती कक्ष नाही. त्यामुळे कुठेही एकत्र‌ित बसता येत नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या. शहरात आणि महापालिकेत असलेली महिलांची स्वच्छता गृहे, तसेच अन्य समस्या मांडतानाच बचतगटांना कामे देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा आरोपदेखील समितीसमोर करण्यात आला.

‘विशाखा’ बाबत प्रश्नचिन्ह

सरकारने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत, आस्थापनांमध्ये विशाखा समिती स्थापन करावी, असे आदेश दिले असताना नाशिक महापालिकेने मात्र त्याबाबत उदासीनता दाखवल्याने समितीने नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

तीन महिन्यांनंतर आढावा

गुरुवारी झालेल्या बैठकीत ज्या त्रुटी आढळल्या आहेत, त्याबाबत महापालिकेने तीन महिन्यांत कार्यवाही करावी. त्याचा आढावा घेण्यासाठी विधी मंडळाची सम‌िती पुन्हा दौरा करणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारवाडा पोलिसांचे पथक पुन्हा जौनपूरला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठाणे येथील भोंदू बाबा उद्यराज रामआश्रम पांडे यास घेऊन सरकारवाडा पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे रवाना झाले. सात दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या पांडेने जौनपूर येथील दोन सराफांना सोने विकले असून, तेथील एका नातेवाईकाच्या बँक खात्यामध्ये पैसेही वर्ग केले होते. यापूर्वीच्या तपासादरम्यान पोलिसांनी २९ तोळे सोन्यासह एक स्कॉर्प‌िओ आणि बुलेटही जप्त केली आहे.

शहरातील एका १८ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर ठाणे येथील भोंदू बाबास सरकारवाडा पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. एका पूजेत विघ्न आल्याची भीती घालून या पांडेने फिर्यादी तरुणीकडून लाखो रुपये उकळले होते. एवढेच नव्हे तर त्या मुलीला दुसऱ्याच्या घरात चोरी करण्यास भाग पाडले होते. भोंदूबाबा पांडेने याच पद्धतीने अनेक जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. कोर्टाने सुरुवातीला पांडेला सात दिवसांची कोठडी सुनावली होती. गत मंगळवारी त्याच्या कोठडीत पुन्हा सात दिवसांची वाढ केली. पांडेचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे असून, त्याने तेथे ५० ते ६० लाखांचा आलिशान बंगला उभा केला आहे. ठाण्यासह नाशिकमधून उकळलेले पैसे, दागिने तो जौनपूर येथेच पोहच करीत होता. या पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह पथकाने जौनपूर येथे पोहचून एका सराफाकडील २९ तोळे हस्तगत केले. मात्र, परतीच्या प्रवासात पांडेने जौनपूर येथील आणखी दोन सराफांकडे दागिने दिले असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्याला कोर्टात हजर करणे आवश्यक असल्याने पोलिस त्याला घेऊन नाशिकला पोहचले. आता हे पथक तपासासाठी पुन्हा रवाना झाले असून, ऑनलाइन बँकिंगमार्फत ट्रान्सफर झालेल्या पैशांचा शोधदेखील घेतला जाणार आहे. संशयित आरोपी पांडेच्या मोबाइलमध्ये काही अश्लिल फोटो देखील पोलिसांना सापडले होते. हे फोटो त्याने महिला व युवतींना ब्लॅकमेल करून घेतले आहे की इंटरनेटवरून डाउनलोड केले आहेत, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. हे फोटो तसेच व्हिडीओ तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त समस्या निवारण

0
0

मटा इम्पॅक्ट


म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पेठरोडवरील आरटीओ कार्यालयातील पार्किंगची असुविधा, स्वच्छतागृह, प्रवेशद्वारे बंद असणे आदी समस्यांचे आता निवारण झाले आहे. येथे येणाऱ्यांना या व अन्य समस्या भेडसावत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

आरटीओ कार्यालयात परवाना, वाहन फिटनेस, वाहनांच्या फायनान्सचा बोजा कमी करणे, कागदपत्रे ट्रान्स्फर करणे अशा विविध कामांसाठी हजारो सर्वसामान्य नागरिक कार्यालयात येत असतात. याशिवाय आरटीओ कर्मचारी, एजंटदेखील मोठ्या संख्येने असतात. मात्र, त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. कार्यालयात येणाऱ्यांना पार्किंगसाठी शिस्तीचे धडे देण्याचे काम केले जाते. पण, विविध कामांसाठी येथे येणाऱ्यांना योग्य वाहनतळच नसल्याची स्थिती होती. विशिष्ट ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी व सर्वसामन्यांच्या वाहनांसाठी जागा करण्यात आलेली आहे. ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहन पार्क न केल्यास दंड आकारणीदेखील केली जात असे. पण, सकाळीच पार्किंगची जागा भरल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने नागरिक रस्त्यात वाहने उभी करीत, त्यामुळे काही वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जात असे. ‘मटा’तील वृत्तानंतर या कार्यालय आवारातील पार्किंगसाठी असलेल्या जागेवर सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कार्यालयात येणारी तीनही प्रवेशद्वारे खुली करण्यात आली असून, पासधारकांना, मोटरसायकल व चारचाकी वाहनांची स्वतंत्र सुविधा केली आहे. शिवाय त्या ठिकाणी फलक लावले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय टळणार आहे.

--

बंद शौचालय झाले खुले

आरटीओ कार्यालयाच्या आवारात असलेले शौचालय बाहेरून सुस्थितीत दिसत असले, तरी त्याला कायम कुलूप असायचे. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्यांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागत असल्याने महिला, अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असे. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात असलेले शौचालय खुले करण्याची मागणी होत होती. आता है शौचालय खुले करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोलर स्केटिंगची प्रेक्षकांना भुरळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसह हॉकीच्या सामन्यांमधील कसरतींचा थरार गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षक अनुभवत आहेत. रोलर स्केटिंग, रोलर हॉकी स्पर्धेने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या स्पर्धेचे उद््घाटन क्रीडा युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गावित होते. तसेच नाशिक विभागाचे क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, घनश्याम राठोड, राज्य स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष पी. के. सिंग, सचिव ज्ञानेश्वर बुलंगे, बळवंत निकुम आदी उपस्थित होते.

शालेय रोलर स्केटिंग रोलर हॉकी स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, लातूर, अमरावती, औरंगाबाद नाशिक या आठ विभागांमधून ४८० स्पर्धकांसह त्यांचे पालक, मार्गदर्शक दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० पंच नियुक्त केले असून, यावेळी क्रीडा उपसंचालक दुबळे यांनी स्पर्धकांना प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन केले. तर जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक् षराजेंद्रकुमार गावित म्हणाले, शालेय विदयार्थी खेळातील कौशल्यांनी समृद्ध असूनही बहुतांश खेळांमध्ये मागे राहतात. याला केवळ क्रीडांगणाचा अभाव कारणीभूत ठरतो. पथराईत स्केटिंग ट्रॅक साकारण्यात आला असून, या ट्रॅक निर्मितीसाठी राज्य असोसिएशनने सहकार्य करीत प्रेरणा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील गर्दीचे चौक आता पोलिसांना दत्तक

0
0

शुभवार्ता

--



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणारे वाहतूक पोलिस पायाभूत सुविधा निर्माण करू शकत नाहीत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी एखाद्या ठिकाणी काही बदल करण्याबाबत वाहतूक पोलिस आग्रही असताना हतबल बनतात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सतत त्रासदायक ठरणारे काही चौक पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांसह काही निरीक्षकांना दत्तक दिले आहेत. लोकप्रतिनिधी, खासगी कंपन्यांच्या माध्यमातून चौकात सुधारणा करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणार आहेत.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि गुन्हे शाखेचे उपआयुक्त विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. शहरात अनेक चौकांत सतत वाहतूक कोंडीसह अपघातांच्या घटना घडतात. अशा चौकांत वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काही बदल होणे अपेक्षित आहे. मात्र, पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असते. त्यामुळे पोलिसांना प्रस्ताव पाठविणे एवढेच काम करावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात एका बैठकीदरम्यान महत्त्वाचे चौक दत्तक घेण्याबाबत चर्चा झाली. यात पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांकडे काही प्रमुख चौकांचे पालकत्व देण्याबाबत निर्णय झाला आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही खासगी कंपन्यांच्या सीएसआरचा विचार होणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

--

सर्वेक्षणानुसार उपाययोजना

यासंदर्भात सहायक आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकांचे सर्वेक्षण होऊन तांत्रिकदृष्ट्या येथे काय बदल होणे अपेक्षित आहे, हे प्रथम ठरविले जाईल. त्यानंतर तेथे ब्यूटिफिकेशन करावे की सिग्नल बसवावा याबाबत निर्णय होईल. अगदी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यापासून बॉटल नेक कमी करण्यासाठी यात पाठपुरावा केला जाणार आहे. वाहतूक पोलिस रस्त्यावर उभे राहून कारवाई करतात. रस्त्यावरील समस्यांची जाणीव पोलिसांनाच असून, या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने वेधले अस्वच्छतेकडे लक्ष

0
0

वाट स्वच्छ आरोग्याची

--


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागातील बसस्थानकांतील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशिन बसविणे व सुलभ शौचालयांतील अस्वच्छता दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांना याबाबतचे निवेदन देऊन कार्यवाही न झाल्यास कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.

शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत जुने सीबीएस, नवीन सीबीएस, महामार्ग, मेळा, निमाणी, नाशिकरोड अादी बस स्थानके शहर परिसरात आहेत. प्रत्येक बस स्थानकांतून हजारो महिला प्रवास करीत असतात. त्यामुळे तेथे महिलांसाठी चेंजिंग रूम, तसेच स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशिनची सुविधा आवश्यक आहे. मोफत स्वच्छतागृहाची किमान नागरी सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवासी महिलांसाठी या सुविधा देण्यात एसटी महामंडळ सपशेल अपयशी ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संगीता गांगुर्डे, पुष्पा राठोड, संगीता अहिरे, पूनम शाह, कामिनी वाघ, मीना गायकवाड, पंचशीला वाघ, कुसुम वाघ उपस्थित होत्या.

सुलभ शौचालयांच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, तसेच उघड्यावर साचलेले पाणी, दुर्गंधी, ओलसर भिंती, तसेच जळमटे असे घाणेरडे वातावरण असते. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यातच लघुशंका विनामूल्य असताना व शौचालयास पाच रुपये दर असताना ठेकेदार अधिक प्रमाणात दर आकारणी करतात. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय महिलांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे प्रत्येक सुलभ शौचालयात मोठ्या अक्षरात दरसूची लावण्यात यावी, असे आवाहन करून एक महिन्याच्या आत याबाबत कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली.

--

‘मशिनबाबत पत्रव्यवहार’

शिष्टमंडळास उत्तर देताना दि. १ डिसेंबरपासून खासगी कंपनीमार्फत सर्व बसस्थानकांमध्ये स्वच्छता केली जाईल, तसेच महिलांना आवश्यक असलेले सॅनिटरी वेंडिंग मशिन बसविण्यासंदर्भात सरकारशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावून सोडविला जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिले. ----


-----


बिटको, आरंभ कॉलेजला इशारा


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरातील बिटको, तसेच आरंभ कॉलेजातील प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. प्रसाधनगृहांची संख्या न वाढविल्यास आणि ते नियमित स्वच्छ न ठेवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

शहर सरचिटणीस सौरभ पवार, योगीराज ओबेराय, रुपेश थोरात, रुपेश कोरडे, निखिल आहेर, नकुल कश्मिरे, पवन गट्टे, रामेश्वर राठोड, शिवम भागवत, संकेत लभडे आदी उपस्थित होते. बिटकोचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, तर आरंभचे प्रभारी प्राचार्य डॉ. समीर लिंबारे यांनी निवेदन स्वीकारले.

बिटको कॉलेजमध्ये परिसरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकतात. विद्यार्थी, विद्यार्थिनींना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. कॉलेजातील प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील स्वच्छतागृहांची संख्याही अपुरी पडत आहे. स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहांत पाण्याची कमतरता भासत आहे. मुलींच्या आरोग्याचे हित बघता प्रसाधनगृहांत सॅनिटरी वेंडिंग मशिन बसवावे. स्वच्छतागृहांची संख्या वाढवून ते स्वच्छ ठेवावी अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी करणार मतदानप्रक्रियेचा जागर

0
0

नाशिक : लोकशाही व्यवस्थेला अधिक सशक्त बनविणारी निवडणूकप्रक्रिया नेमकी काय आहे हे शालेय वयात समजावे यासाठी शाळा व ज्युनिअर कॉलेजांमधून मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. आठवी ते बारावीपर्यंतच्या किशोरवयीन विद्यार्थ्यांना निवडणूकप्रक्रियेबाबत सज्ञान करण्यात येणार असून, जिल्ह्यात पुढील आठवड्यात या उपक्रमास सुरुवात होणार आहे.

किशोरवयीन अवस्था हा तारुण्याचा उंबरठा समजला जातो. या वयामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी समज आलेली असते. हाच वर्ग उद्याचा भावी मतदार असल्याने त्यांना निवडणूकप्रक्रियेबाबत साक्षर करणे काळाची गरज बनली आहे. भारताला महासत्ता बनविण्याची भिस्त अशा नवीन पिढीवर असून, त्यासाठी लोकशाहीव्यवस्था बळकट असणेही आवश्यक आहे. म्हणूनच या वयोगटावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूकप्रक्रिया हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असून, त्याची माहिती किशोरवयीन मुले आणि मुलींपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाने सुरू केले आहेत. त्यासाठी माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांमधून मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने या उपक्रमाच्या यशस्वितेची जबाबदारी त्या त्या तालुक्यांच्या तहसीलदारांवर सोपविली आहे.

शहरात आणि ग्रामीण भागातही शाळा-कॉलेजांमध्ये प्रामुख्याने हे मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. या क्लबच्या माध्यमातून निवडणूकप्रक्रियेच्या जनजागृतीबाबतचे विविध उपक्रम राबविणे निवडणूक विभागाला अपेक्षित आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयीची जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्यांनी अशा उपक्रमांमध्ये समरस होऊन इतरांचीही जनजागृती करावी हा उपक्रम राबविण्यामागील उद्देश आहे.

सुरुवातीला मोठ्या शाळा-ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्राधान्याने हा क्लब स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा, कॉलेजांमध्ये क्लब स्थापन करावा, अशी सक्ती नसली तरी अधिकाधिक ठिकाणी तो स्थापन करावा, असा जिल्हा प्रशासनातील निवडणूक शाखा आणि तहसीलदारांचा आग्रह आहे.

प्रशासन-मतदारांमधील दुवा

निवडणूकप्रक्रियेशी संबंधित जनजागृतीचे सर्वाधिकार या क्लबला असणार आहेत. क्लब सदस्यांनी केवळ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे अपेक्षित नाही. ते आसपासच्या खेड्यापाड्यांतही जनजागृतीचे उपक्रम घेऊ शकतात. वादविवाद, तसेच वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर, ड्रॉइंग स्पर्धा, स्लोगन, तसेच निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करता येणार आहे. याशिवाय स्नेहसंमेलने, कॅम्पसमध्ये पथनाट्यांद्वारेही या क्लबकडून जनजागृती केली जाणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांचे या उपक्रमांसाठी क्लबमधील सदस्यांना मार्गदर्शन मिळणार असून, प्रशासनाकडून काही मदत हवी असेल तर ती तहसीलदारांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणून काम करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरई, नागलीला अच्छे दिन?

0
0


नाशिक : सुदृढ आहारासाठी उपयोगी असलेल्या तृणधान्याचा प्रसार व प्रचार जगभर व्हावा यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र संघाला (युनो) २०१८ हे वर्षे इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतेच युनोला पत्र पाठवले आहे. युनोने जर हे वर्षे घोषित केले तर त्याचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यात पिकवल्या जाणार वरई व नागलीला होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पिक नाशिकच्या आदिवासी भागात घेतले जाते.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जर घोषित झाले तर आदिवासी बरोबरच वरई पासून बनवल्या जाणाऱ्या भगर म‌लिलाही यामुळे बुस्ट मिळणार आहे. नाशिकमध्ये वरई पासून बनवण्यात येणाऱ्या भगरच्या जिल्ह्यात ३५ हून अधिक म‌लि आहे. त्यामुळे भगर हब म्हणूनही नाशिक आळेखले जाते. त्याचप्रमाणे नागली पण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, तिचा दर्जा चांगला आहे. आरोग्याच्या वाढत्या तक्रारीमुळे याअगोदरही केंद्र सरकारने मिशन तृणधान्य (मिलेट) हाती घेतले होते. बाजरी, ज्वारी, नागली, भगर बरोबरच नव्याने आलले टेफ व व्युईनो हे तृणधान्य जगभर आहे. यातील टेफ व व्युईनो हे पिक परदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. देशात आता टेफची लागवड होत असून, अद्याप त्याचे प्रमाण मात्र कमी आहे.

मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब, हृदयविकार यासाठी तृणधान्य उपयोगी असून, त्यात फायबरचे प्रमाणही मोठे आहे. त्याचप्रणाणे प्रोटीनची मात्राही त्यात जास्त असते. जगभर गहू व तांदूळ याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण तृणधान्याचा वापराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तृणधान्याचा प्रचार व प्रचार व्हावा यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पुढाकार घेतला असून, यावर आता युनो काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे. राज्यात या तृणधान्यात ज्वारी व बाजरी ही मोठ्या प्रमाणात विविध भागात पिकवली जाते. त्यामुळे या निर्णयाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही फायदा होणाऱ आहे. विशेष म्हणजे या तृणधान्याची किंमतही जास्त असून, याला पिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा वापर केला जातो. अवघ्या ९० दिवसात येणाऱ्या या पिकाला पाण्याशिवाय दुसरे काहीच लागत नाही, ही सुद्धा जमेची बाजू आहे.
जगभर तृणधान्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांनी घेतलेले हे मोठे पाऊल आहे. युनोने त्यास मान्यता दिली तर राज्यासह नाशिक जिल्ह्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात वरई व नागली मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. त्याचप्रमाणे ३५ भगर मिलही नाशिकमध्येच आहेत. सुदृढ आरोग्यासाठी तृणधान्य हे महत्त्वाचे आहे.

- महेंद्र छोरिया, अध्यक्ष,
भगर मिल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

अवजड वाहतुकीस मनाई असलेल्या जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात गुरुवारी दुपारी एका अवजड ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. माणिकराव विश्वनाथ धानोरकर (वय ५५ वर्षे, रा. नारायणबापू सोसायटी, जेलरोड) असे मयताचे नाव आहे. गुरुवारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

माणिकराव धानोरकर दुचाकीने (एमएच १५ बीटी १५५०) दसककडून जेलरोडच्या दिशेने येत असताना सैलानीबाबा दर्ग्याजवळ पाठीमागून आलेल्या ट्र्कने (एमएच १५ एफक्यू ७७३९) त्यांना धडक दिली. या धडकेने धानोरकर यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर ट्रकचालक जलील रज्जाक कुरेशी (वय ४२, रा. चांदवड) यास स्थानिकांनी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काही तासांचा अपवाद वगळता जेलरोडवरुन अवजड वाहतुकीस मनाई आहे. तसा फलकही बिटको चौकात लावण्यात आलेला आहे. मात्र या नियमाचे सर्रास उल्लंघन करुन दिवसभर या मार्गावरुन अवजड वाहतुक सुरू असते. बिटको चौकात दिवसभर वाहतूक पोलिस असतात, मात्र या अवजड वाहतुकीकडे कानाडोळा केला जातो.

मोबाइलसाठी

युवकावर हल्ला

नाशिक : मोबाइल न दिल्याने युवकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सिडकोतील डीजीपीनगर रोडवर घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये विनोद मगर आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकरोडवरील उत्कर्षनगर भागात राहणाऱ्या जीतू शिवाजी जाधव या युवकाच्या तक्रारीनुसार, शनिवारी जाधव आणि त्याचा मित्र विशाल मरीमाता मंदिराजवळ उभे राहून गप्पा मारत होते. संशयित विनोद मगर व त्याच्या समवेत आलेल्या अज्ञात युवकांच्या टोळक्यातील एकाने जाधवकडे मोबाइल मागितला. मोबाइल देण्यास त्याने विरोध दर्शविताच संशयित आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच संशयित मगर यांने धारदार चाकूने जाधवच्या डाव्या हातावर वार केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.

घरमालकाविरुद्ध गुन्हा

नाशिक : भाडेकरूंबाबत पोलिसांना माहिती देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणखी एका घरमालकावर आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारावर अंकुश असावा यासाठी भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहन पोलिसांनी वारंवार केले आहे. प्रकाश निंबा महाजन (रा. कसगाव, जि. जळगाव) असे या घरमालकाचे नाव आहे. महाजन यांची हॉटेल जत्रा परिसरातील जयश्री ड्रीम पार्क येथे घर असून, त्यात त्यांनी भाडेकरू ठेवला आहे. मात्र, या भाडेकरूंची माहितीच त्यांनी पोलिसांना दिलेली नाही. घटनेचा अधिक तपास हवालदार माळी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् उचलला कचरा

0
0


तुषार देसले, मालेगाव

येथील पालिका प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशभरातील ५०० शहरांच्या स्पर्धेत मालेगाव शहराला जास्तीत जास्त वरचा क्रमांक मिळण्यासाठी नागरिकांचा देखील सहभाग यात असावा यासाठी स्वच्छता मोबाइल अॅपबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. एरवी येथील पालिका प्रशासनाचा कामकाज अनुभव इतर सरकारी कार्यालयांसारखा दफ्तर दिरंगाईचा असला, तरी स्वच्छता अॅप वरील कचऱ्याच्या तक्रारींचा जलद निपटारा होत असल्याचा सुखद अनुभव मालेगावकरांना येत आहे.

पालिकेकडून स्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी कळवाव्यात यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘स्वच्छता’ हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीड‌ियावरून त्याची लिंक व्हायरल झाल्याने अनेकांनी उत्सुकता म्हणून ते अॅप डाऊनलोड केले आहे. अशाच प्रकारे तरुआई परिवाराचे सदस्य असलेल्या विशाल पाटील यांनी देखील हे अॅप डाऊनलोड केले. शहरातील मसगा महाविद्यालयाच्या भिंतीलगत वृक्षारोपण करून जागवण्यात आलेल्या झाडांना कचऱ्याचा विळखा पडला आहे. तो हटवण्यात यावा यासाठी स्वच्छता अॅपद्वारे तक्रार करण्यात आली. या आधीच्या अनेक समस्या आणि अडचणीबाबत पाटील यांचा पालिका प्रशासनाबाबतचा अनुभव फारसा चांगला नसल्याने या कचऱ्याच्या समस्येचा निपटारा होईल अशी कल्पना त्यांनी केली नव्हती.

मालेगाव आघाडीवर ...

स्वच्छता अॅप डाउनलोड करण्यात नाशिक, धुळे महापालिकेच्या तुलनेत मालेगाव आघाडीवर असून, गेल्या १५ दिवसात ६०० वरून हा आकडा १७०० वर गेला आहे. तसेच या अॅपवरील तक्रारी २४ तासाच्या आत निपटारा करणे बंधनकारक असल्याने दिवसाला ६० ते ७० टक्के तक्रारींचे निवारण केल्या जात आहेत.

नागरिकांना सुखद अनुभव

अॅपवरील तक्रारीनंतर अवघ्या काही तासात येथील कचरा उचलण्यात येवून कचऱ्याच्या विळख्यात अडकलेली झाडे मोकळी करण्यात आली. स्वच्छता अॅपद्वारे तक्रार निवारण झाल्याचा फोटो अपलोड करण्यात आल्यानंतर त्यांना हा सुखद अनुभव लक्षात आला. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करून शहरातील कचऱ्याचे फोटो अपलोड करणाऱ्यांची संख्या वाढली असून, पालिकेकडून त्याचा वेळीच निपटारा झाल्यास प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयाने स्वच्छ मालेगावच्या दिशेने सकारात्मक पाउल ठरेल.

अशी करा तक्रार

शहरातील कचऱ्या संबंध‌िच्या तक्रारी नागरिक या अॅपद्वारे करू शकतात. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Swachhata-MoHUA या नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यावर आपल्या परिसरातील कचऱ्याचा फोटो अपलोड करायचा. आपली तक्रार निवारण झाली की नाही तसेच त्याबद्दल आपले मत देखील येथे नोंदवता येते. या सोबतच पालिकेचा १८०८३३१५०० हा टोल फ्री क्रमांक असून, त्यावरही तक्रार करता येते.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये मालेगावचा भारतातील पहिल्या ५० शहरांमध्ये क्रमांक यावा यासाठी नागरिकांची सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छता अॅप डाउनलोड केल्याने व त्यावर तक्रारी दाखल केल्यास स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहराचे गुण वाढतील. क्रमांकात सुधारणा होईल.
- संगीता धायगुडे,
आयुक्त, मालेगाव मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ गावांना सापत्न वागणूक!

0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

येवला विधानसभा मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ तुरुंगात असल्याने मतदार संघातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका लासलगाव विंचुरसह ४२ गावांना बसला आहे. त्यामुळे या सर्व गावातील सरपंचांनी एकत्र येत जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी योगेश चौधरी यांना निवेदनाद्वारे जिल्हा नियोजन कार्यालयात उपोषण करणार, असा इशारा दिला आहे.

येवला विधानसभा मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ तुरुंगात असल्याने मतदार संघातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका लासलगाव विंचुरसह ४२ गावांना बसला आहे. ही ४२ गावे प्रशासकीयदृष्ट्या निफाड तालुक्यात आणि मतदार संघीयदृष्ट्या येवला मतदार संघात असल्याने ना घरका ना घाटका अशी अवस्था या गावांची झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, दिंडोरी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनातून सरपंचांनी जिल्हा नियोजन समितीचे या ४२ गावांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

या ४२ गावांनी जिल्हा नियोजन समितीकडे अनेकदा विविध विकासकामाबाबत आणि निधी वाटपाबाबत पाठपुरावा करूनही निधी वाटप करताना अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. ४२ गावांपैकी काही गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, दशक्रियाविधी शेड व इतर अन्य सुविधा नाहीत. याबाबत पाठपुरावा करुनही जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळत नाही अशी तक्रार या निवेदनात केली आहे.

मंजूर झालेल्या यादिच्या पुरवणी यादीत या गावांचा समावेश न झाल्यास ४२ गावातील सरपंच व सदस्य जिल्हा नियोजन कार्यालया समोर उपोषण करतील असा लेखी इशारा दिला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, पाचोऱ्याचे गणेश डोमाडे, वेळापूरचे विशाल पालवे, शोभा भंडांगे, शांताराम कांगणे, मंगेश गवळी, तेजल रायते, रामकृष्ण मवाळ, भिवा शोधक, ललीता गांगुर्डे, उत्तम वाघ यांच्या सह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखर्चित निधीवरून अधिकाऱ्यांना कानपिचक्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत महिलांसाठी असलेला दहा टक्के राखीव निधी वेळोवेळी खर्च केला जात नसल्याने विधी मंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बैठकीत तीन अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. यात एका निवृत्त अधिकाऱ्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्याबद्दलही समितीने नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपयाचा निधी असून तो अखर्चित पडत असल्याने त्यांनी याबद्दल विचारणा केली. जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत आरक्षण, पदोन्नती, अनुशेष भरती, महिलांसाठी कल्याणकारी योजना यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी या समितीने महिलांसाठी स्वतंत्र कक्ष (चेजिंग रुम) तत्काळ उभारण्यात यावा, अशा सूचनाही केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तुम्ही महिला सदस्यांचे फोन उचलत नाही, त्यांना चांगली वागणूक देत नसल्याचे सांगितले. तसेच तुमचा नंबर सर्वांना द्या अशा सूचनाही केल्या. ही समिती महापलिकेत गुरुवारी जाणार आहे. जिल्हा रुग्णालय व त्र्यंबकेश्वर येथील शाळेत या समितीने भेट दिली. या समितीच्या प्रमुख आमदार भारती लव्हेकर, आमदार सीमा हिरे, प्रा. मेधा कुलकर्णी, अमिता चव्हाण, विद्या चव्हाण, अॅड. हुस्नबानू खलिपे या आढावा बैठकीत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक न्यायालयाचा मर्चंट बँकेला दणका

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेने ३० लाखाचे कर्ज मंजूर केल्यानंतर कमिटमेंट चार्जेसच्या नावाखाली १ लाख ४ हजार ३६१ रुपये बेकायदेशीररित्या वसूल केल्याच्या तक्रारीवरुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने ही रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च ५ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

नाशिक येथील सुनीलकुमार मुंदडा यांनी नाशिक मर्चंट बँकेचे प्रशासक व लासलगावचे व्यवस्थापक यांच्या विरुध्द तक्रार दाखल केल्यानंतर हा निकाल देण्यात आला. मुंदडा यांनी २०१२ मध्ये अर्ज केला. त्यांचे ३० लाखांचे कर्ज मंजूर झाले. त्यानंतर २०१५ च्या सुरुवातीला बँकने कमिटमेंट चार्जेसच्या नावाखाली २०१४ पासून १ लाख ४ हजार ३६१ रुपये बेकायदेशीररित्या वसूल केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र याबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही. बँकेतर्फे सांगण्यात आले की, १ ऑक्टोंबर २०१४ पासून जे कर्जदार कर्ज रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम वापरत नसतील त्यांना दर तिमाहीस उचल न केलेल्या रक्कमेच्या ३ टक्के कमिटमेंट चार्जेस आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार घेण्यात आला. तसे परिपत्रक बँकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले व कर्जदारांना देखील पाठविण्यात आले. न्यायमंचाने निकालात बँकेला ही रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images