Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अपघातांना आमंत्रण

$
0
0


तुषार देसले, मालेगाव

शहरातील बहुतांशी रस्ते हे वाहनचालकांसाठी धोकादायक बनले आहेत. कॉलेज स्टॉप ते रावळगाव नाका दरम्यान असलेल्या कॉलेज रोडवरून होणारी वाहतूक धोकादायक झाली आहे. प्रशस्त रस्ता असला तरी रस्त्यालगत फूटपाथ, भुयारी मार्ग नसणे यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवूनच शाळेची वाट धरावी लागत आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढती रहदारी, अतिक्रमण या समस्या शहरवासीयांना नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र कॉलेज रोडवरील वाहतूक समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक शैक्षणिक संस्था तसेच कॅम्प परिसरात जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. साक्री, नामपूरसह अनेक गावांतून होणारी प्रवासी वाहतूक याच रस्त्याने होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी खूप वाढली आहे. या रस्त्यालगत आर. बी. एच. कन्या विद्यालय, भारत विद्यालय, महिला कॉलेज, आदिनाथ स्कूल, एलव्हीएच स्कूल, केबीएच व मसगा महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक याच रस्त्याने प्रवास करतात.

बाईकरायडर्सला आवरा

बरेच दिवस खड्डेमय असलेला हा रस्ता अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केला असला तरी त्यावरील समस्या संपलेल्या नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ नाहीत. दुभाजक, पथदिवे नाहीत. रस्त्यावर कोठेही ‘पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा’ असे सूचना फलक नाहीत. शाळांजवळ गतिरोधक नावालाच आहेत. त्यात अनेक कॉलेजतरुण धूमस्टाइलने दुचाकी चालवित असल्यामुळे त्यांना पायबंद घालण्यासाठी या रस्त्यावर कोठेही पोल‌सि यंत्रणा तैनात नसते. या समस्याबाबत लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने उपयोजना कराव्यात अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून होत आहे.

भुयारी मार्ग होणे गरजेचे

शाळा व महाविद्यालयाच्या सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. अशा वेळी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. याचवेळी भरधाव वेगाने येणारे दुचाकी, रिक्षाचालक यांच्यामुळे अपघात होण्याची भीती कायम असते. अनेकदा अपघात झालेलेही आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांसमोर अंडरपास (भुयारी मार्ग) होणे भविष्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुभाजकाबाबत दुजाभाव?

$
0
0

त्र्यंबकेश्वर रोडवर अपघातांत वाढ; वाहनचालकांची गैरसोय

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेवर मनसेच्या सत्ताकाळात अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली होती. यामध्ये त्र्यंबकेश्वर रोडचेही डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, त्र्यंबकरोडला महापालिकेच्या हद्दीत दुभाजक टाकताना दुजाभाव करण्यात आला आहे. तरी याकडे लक्ष देत तातडीने पिंपळगाव बहुलाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुभाजक टाकून वाहनचालकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

महापालिकेवर मनसेची सत्ता असल्यावर झालेल्या रस्त्यांच्या कामामध्ये त्र्यंबकेश्वर रोडवरील रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी दुभाजक नसल्याने वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रोडवरील पिंपळगाव बहुला गावाकडे जाणाऱ्या रोडवरचे दुभाजक गेले कुठे, असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. अनेकदा झालेल्या अपघातात दुभाजक नसल्याने दुचाकीचालकांना प्राण गमविण्याची वेळ आली. परंतु, याकडे महापालिकेचा बांधकाम विभाग कधी लक्ष देणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुभाजक नसल्याने अपघातात वाढ झाली असल्याचे पिंपळगाव बहुला ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने तत्काळ त्र्यंबकेश्वर रोडवर दुभाजक टाकावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

दुभाजक टाकताना समृद्धनगर ते पिंपळगाव बहुला गावाचा भाग सोडला आहे. दुभाजक नसल्याने अनेकदा दुचाकीचालकांना अपघाताला बळी पडावे लागते. याकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

-मिलिंद नागरे,

रहिवाशी, पिंपळगाव बहुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार हजार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सहकार चळवळीचे जाळे मोठे असले तरी आता संस्था रद्द होण्याची संख्या वाढू लागली आहे. नाशिक सहकार विभागात असलेल्या पाच जिल्ह्यांत आतापर्यंत ४ हजार ५५१ विविध सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यात नाशिक जिल्हा आघाडीवर असून, या जिल्ह्यातील तब्बल १२४० संस्था सहकार खात्याने रद्द केल्या आहेत. त्याखालोखाल अहमदनगरचा नंबर असून, या जिल्ह्यात १११५ संस्था रद्द झाल्या आहेत. सहकारी संस्थांचे जाळे सर्वत्र पसरावे यासाठी प्रयत्न केले जात असताना ही गोष्ट सहकारी चळवळीला मारक आहे. नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये धुळ्याच्या ८९०, नंदुरबारच्या ४०७ व जळगावच्या ८९९ संस्थांचा समावेश आहे.

नाशिकला गडकरी चौकात सहकारी संस्था सहनिबंधकांचे विभागीय कार्यालय असून, या कार्यालयातून पाचही जिल्ह्यांतील कारवाईची एकत्रित माहिती देण्यात आली. या रद्द झालेल्या संस्थांबरोबरच अवसायनात काढण्यात आलेल्या संस्थांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत अंतिम आदेश काढलेल्या संस्थांची संख्या ९ हजार ४४ इतकी आहे. विशेष म्हणजे या संस्थांमध्ये पुनर्जीवित केलेल्या संस्थांची संख्या अवघी ३३० आहे. लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आलेल्या संस्थांची संख्या अवघी ७४ इतकी आहे.

या संस्थांमध्ये पतसंस्था, सहकारी बँका, गृहनिर्माण संस्थ यांसह सहकारातल्या विविध संस्थांचा समावेश आहे. अवसायनात काढून नंतर रद्द झालेल्या या संस्थांमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यातून सहकार चळवळीचे दारही बंद झाले आहे. राज्यात सहकार चळवळ सर्वाधिक रुळल्यानंतर त्यातील गैरप्रकारांमुळे अनेक संस्था डबघाईस आल्या व त्यातून हे रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. सहकार विभागाची रद्द झालेल्या संस्थांची व अवसायनात गेलेल्या संस्थांची आकडेवारी ऑक्टोबरअखेरची आहे. या कारवाईची सुरुवातीची नोंद मात्र वेगवेगळ्या सालातील असून, २०१५ पासून मागील कारवाईच्या आकडेवारीचा समावेश करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.


अवसायानातील संस्था

नाशिक - ३८१३

धुळे - १५३६

नंदुरबार - ५३३

जळगांव - १३३४

अहमदनगर - १८२८

रद्द झालेल्या संस्था

नाशिक - १२४०

धुळे - ८९०

नंदुरबार - ४०७

जळगाव - ८०९

अहमदनगर - १११५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांनो, मराठीत पाट्या लावा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
मराठी राज्य भाषेचा सन्मान करण्यासाठी सर्व बँकांचे फलक मराठीत असले पाहिजे. तसेच पासबुक, खिडक्यांवरील सूचना व फलक, कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी संवाद मराठी भाषेतच असले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र राज्य भाषा सन्मान आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात बुधवारी (दि. २२) पंचवटीतील बँकांमध्ये जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्था, बँका, दुकाने आणि अस्थापनांमध्ये मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. सर्व संस्था, दुकाने व अस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकाने आणि संस्था अधिनियम १९४८ अन्वये बंधनकारक आहे. महाराष्ट्रात मराठी राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधानमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ रोजी महाराष्ट्र राजपत्रातून जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजभाषेचा सन्मान व्हायला पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.
सर्व राष्ट्रीयीकृत ‌बँकांमध्ये कामकाज व्यवहारासाठी वापरली जाणारी चलने मराठीत असावीत. त्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्याचे निवेदन पंचवटीतील बँकांना माजी महापौर अशोक मुर्तडक, अॅड. राहुल ढिकले, अनंत सूर्यवंशी, संदीप भवर आदींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटातर्फे २७पासून‘विंटर फिटनेस फेस्टिव्हल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि नवीन डान्स अकॅडमी घेऊन आलाय खास कल्चर क्लब सदस्यांसाठी विंटर फिटनेस फेस्टिवल’. २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर असा १० दिवस हा फिटनेस फेस्टिवल चालणार आहे. या फेस्टिवलमध्ये झुम्बा, बोकवा, स्टेप एरोबिक्स, बुट कॅम्प या डान्स प्रकारांचे कॉम्बिनेशन शिकवले जाणार आहे. शिवाय डाएटसंदर्भातील टीप्स आणि योगाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क मोजावे लागणार नाही. मात्र, रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही.

हिवाळा आला की, अनेकजण सकाळी जॉगिंगला जाण्याचा संकल्प करतात. पण थंडीमुळे हा संकल्प काही प्रत्यक्षात उतरत नाही आणि फिटनेस फक्त विचारापुरताच मर्यादित राहतो. पण यंदा हा फिटनेस प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहे.

कॉलेजरोडवरील फिटनेस लाउंज या ठिकाणी विंटर फिटनेस फेस्टिवल होणार आहे. सकाळी ८ ते ९, दुपारी ११ ते १२, संध्याकाळी ५ ते ६ आणि रात्री ८ ते ९ या वेळेत तुम्ही यात सहभागी होऊ शकता. पूर्ण १० दिवस या फिटनेस संदर्भातील बॅचेस असतील. त्यामुळे याचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क मोजावे लागणार नाही. इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. त्यासाठी आधीच रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क - ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याभरात बुजविले १४५० किमीवरील खड्डे

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाभर सुरू केलेल्या खड्डे बुजविण्याच्या मोहिमेतून जिल्ह्यातील राज्य महामार्गाचे १६८५ कि. मी. पैकी ८१८ कि. मी. वरील खड्डे बुजविले आहे. याची टक्केवारी ४८ टक्के असून ५२ टक्के काम अद्यापपर्यंत बाकी आहे. त्याचप्रमाणे प्रमुख जिल्हा मार्गाचे २५०४ कि. मी. पैकी ६३२ कि.मी. चे खड्डे बुजविण्यात आले असून, याची टक्केवारी २५ टक्के आहे. आतापर्यंत या दोन्ही रस्त्याचे १ हजार ४५० कि. मी. वरील खड्डे बुजविण्यात आले असून २ हजार ७३९ कि. मी. रस्त्याचे काम बाकी आहे. हे सर्व कामे सार्वजिक बांधकाम विभागाने १५ डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. याची सरकारने ३१ डिसेंबर ही डेडलाइन दिली आहे.

दिवाळीनंतर या खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील राज्य महामार्गाचे १० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे बुजविण्याचे लक्ष्य ठेवले. पण, २२ नोव्हेंबरपर्यंत ५२ टक्के काम बाकी आहे. प्रमुख जिल्हा मार्गाचे १५ डिसेंबर हेच लक्ष्य होते. त्यात आतापर्यंत ते २५ टक्के पूर्ण झाले आहे. सुरुवातीला बांधाकाम कंत्राटदारांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे या कामाला उश‌रिा सुरुवात झाली. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमुळे हे काम लांबणीवर पडले. सुट्टी संपल्यानंतर हे काम सुरू झाले असले तरी त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावाही रोज घेतला जात आहे. काम झाले की त्याची माहिती फोटो काढून अपलोड केली जात आहे. त्यामुळे राज्यात किती काम झाले याचा डेटाही तयार होत आहे. या खड्डे बुजविण्याच्या कामात काही ठिकाणी माती टाकल्याच्या तक्रारीही होत्या. त्यामुळे हे काम दर्जेदार असावे ही अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्व खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, ते १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यातील राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्याचा रोज आढावा घेतला जात आहे.

- रणजित हांडे,

अधीक्षक अभियंता, सा. बां. विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंपाषष्ठीसाठी खंडोबा मंदिरांत जय्यत तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पुरातन काळापासून खंडेराय हे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. राज्यातील अठरापगड जातींमध्ये खंडेरायाला विशेष मानाचे स्थान आहे. त्यामुळे घरा-घरातील देव्हाऱ्यात खंडेरायाच्या टाकाची स्थापना केलेली दिसते. चंपाषष्ठीला खंडेरायाची मोठ्या भक्त‌िभावाने आणि श्रद्धेने पूजा केली जाते. ‘भंडाऱ्याचा भडका आणि खोबऱ्याचा कडका’ करीत तळी भरण्याची प्रथा आजही घरोघरी आहे. भरीत-भाकरी आणि पुरणाचा नैवद्य दाखविण्यात येतो. शुक्रवारी (दि. २४) होणाऱ्या चंपाषष्ठीला खंडेरायाच्या आराधनेसाठी नाशिकनगरी सजली आहे.

चंपाषष्ठीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरातील खंडेराय महाराजांच्या मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कपुरथळा मैदानाजवळील गंगाघाटावर असलेल्या खंडेरायाच्या मंदिरात रविवारी (दि. १९) देव घटी बसविण्यात आले आहेत. सहा दिवसांच्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. चंपाषष्ठीच्या दिवशी पहाटे ५ वाजता काकडा आरती होईल. दुपारी अभिषेक पूजा करण्यात येईल. सोमनाथ बेळे यांच्या हस्ते खंडेराय महाराजांना नैवेद्य अर्पण करण्यात येईल. भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जाणे सोयीचे व्हावे यासाठी बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. चंपाषष्ठीनिमित्ताने भरणाऱ्या यात्रोत्सवाची येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हिरावाडी येथील शिव मल्हार मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. २३) जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि. २४) सकाळी गंगाघाटावरील खंडेराय कुंड ते शक्त‌िनगर, हिरावाडीपर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी महाप्रसाद व भंडारा होणार असून, उदय गांगुर्डे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. मिरवणूक आणि रहाडी जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.

देवळालीच्या खंडेराव टेकडीवर यात्रा

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

चंपाषष्ठीनिमित देवळाली कॅम्पच्या प्रसिद्ध खंडेराव टेकडी येथे यात्रोत्सव साजरा होणार आहे. यात्रोत्सवासाठी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, पिवळ्या पताकांनी मंदिराचा परिसर झळाळून निघाला आहे. देवळालीसह पंचक्रोशीतील भक्तांची उद्या बेल-भंडार उधळीत देवाची तळी भरण्यासाठी येथे सकाळपासून गर्दी होणार आहे.

खंडेराव टेकडीवर सकाळी साप्तमिक पूजाविधी आमले परिवाराच्या वतीने होणार असल्याचे मंदिराचे पूजारी प्रकाश आमले व कमलाकर आमले यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी १० वाजता मंदिराचे विश्वस्त आमले परिवाराच्या भगूर येथील निवासस्थानापासून पालखी मिरवणूक काढण्यात येऊन ती देवळाली शहरमार्गे खंडेराव टेकडी येथे आणण्यात येईल. दुपारी १२ वाजता महाआरती व नैवेद्य दाखविल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तदनंतर पुन्हा देवळाली कॅम्प शहरातून वाजत-गाजत पालखी काढण्यात येईल. पालखी सोहळा संपल्यानंतर सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान खंडेराव भक्त उत्तम मांडे हे १२ बैलगाड्या ओढणार आहेत. यात्रोत्सवास पंचक्रोशीतील नागरिकांची प्रचंड गर्दी उसळत असते.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि. २५ रोजी सायंकाळी ५ वाजता कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी यात्रा कमिटी प्रयत्नशील राहणार असून, देवळाली कॅम्प पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

भरीत-भाकरी प्रसाद वाटप

अण्णाज् टेम्पल हिल ग्रुपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता पूजा, आरती होणार आहे. त्यानंतर धीरज मांडे यांच्या वतीने वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवैद्य दाखविण्यात येऊन अन्नदान करण्यात येणार असल्याचे नागेश देवाडिगा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल्यांसाठी शिक्षकांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
२७ फेब्रुवारी २०१७चा शासननिर्णयानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश त्वरीत देऊन कार्यमुक्त करावे या मागणीसाठी समस्त बदली हवी प्राथमिक शिक्षक वर्ग यांच्याकडून जिल्हा परिषदेसमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
२७ फेब्रुवारी २०१७च्या शासननिर्णयानुसार बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे. हा निर्णय सर्व घटकांना समान न्याय देणारा असल्याचे शिक्षकांचे मत आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयानेदेखील बदल्या करण्याचा सकारात्मक निर्णय दिला मात्र याबाबत अधिकृत कार्यवाही झाली नसल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बदलीसंदर्भात त्यांच्याकडून विशेष संवर्ग १ यांना बदली कार्यवाही करून विनाअट कार्यमुक्त करावे, विशेष संवर्ग २ यांना पती-पत्नीचे एकत्रीकरण करून कार्यमुक्त करावे, बदली अधिकारी प्राप्त शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली देऊन कार्यमुक्त करावे, विनंती बदली हवी असणाऱ्यांना बदली करुन कार्यमुक्त करावे या मागण्या यावेळी मांडल्या.
सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील एक सत्र संपले असून, दुसरे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे तत्काळ बदल्यांची कार्यवाही केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच आमची आता बदली केली नाही तर राज्यभर आमरण उपोषण, जेलभरो, मुंडण, रास्ता रोको अशा प्रकारचे तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संजय तांबे, शंकर देवरे, संतोष थोरात, शैलेश गुंजाळ, केशव देवरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचारी पळवापळवीवरून खडाजंगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागाची प्रभाग बैठक सभापती माधुरी बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पळवा-पळवीवरून चांगलीच खडाजंगी झाली. विशेष म्हणजे सभापती बोलकर यांच्यासह सर्वच सदस्यांनी नेमणूक केलेल्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी काम का करत नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात आला. परंतु, आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारीच उपस्थित नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर सभापती बोलकर यांनी ज्या विभागांतील खातेप्रमुख बैठकीस गैरहजर होते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनीदेखील आरोग्य विभागाचे अधिकारी मुजोरी करत असल्याचा आरोप उपायुक्त बर्डे यांच्याकडे केला होता. आरोग्य, घंटागाडी, उद्यान, विद्युत व ड्रेनेज आदी विषयांवर सातपूरच्या प्रभाग बैठकीत नगरसेवकांनी समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने आरोग्य विभागाचे नेमलेले अनेक कर्मचारी दिलेल्या प्रभागात कामच करत नसल्याच्या तक्रारी सर्वच नगरसेवकांनी सभापतींसमोर मांडल्या. विशेष म्हणजे प्रभाग सभापती बोलकर यांच्याच प्रभागातील अनेक आरोग्य कर्मचारी दुसऱ्याच प्रभागात काम करत असल्याचे पाहणी दौऱ्यात समोर आले होते. यात आरोग्य विभागाचे अधिकारीच मनमानी काम करत असल्याचा आरोप नगरसेविका पल्लवी पाटील यांनी केला.
घंटागाडी अनियमित असताना त्यावर केवळ आर्थिक देवाण-घेवाणीमुळेच यावर आरोग्य विभाग कारवाई करत नसल्याचा आरोपही सदस्यांनी केला. नगरसेवक भागवत आरोटे यांनीदेखील आरोग्य विभागाचे कर्मचारी नेमके कोणाच्या सांगण्यावरून दुसरीकडे काम करतात, असा सवाल उपस्थित केला. प्रभाग ८ चे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केला असता, त्यांना कर्मचाऱ्यांकडे मोबाइलच नसल्याचे उत्तर प्रभारी आरोग्य अधिकारी गोविंद कोष्टी यांनी दिले. यामुळे आरोग्य विभागाचेच आरोग्य तपासणीची वेळ आली असल्याचे नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले.
प्रभाग बैठकीला विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगरसेविका राधा बेंडकोळी, डॉ. वर्षा भालेराव, नगरसेवक योगेश शेवरे, बांधकाम उपअभियंता संजय पाटील, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता ए. व्ही. जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ-पालिकेत नोटीसयुद्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी (दि. २१) कचरा जाळण्यात आल होता. यावर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत महापालिकेने आरटीओला नोटीस बजावली होती. या नोटीशीमुळे दंडात्मक कारवाई होण्याची नामुष्की आरटीओवर आली असतानाच आरटीओनेही पलटवार करत महापालिकेच्या वाहनांना काळ्या काचा असल्याबाबत बुधवारी (दि. २२) पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सरकारी कार्यालय, स्‍थानिक स्वराज्य संस्थांनी एकमेकांवर अशी कुरघोडी करण्याच्या प्रकाराने नागरिकांचेही मनोरंजन होत आहे.

पेठरोड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी कचरा जाळण्यात आला होता. आग वाढल्यामुळे ती विझविण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्याची वेळ आली. शहरात प्रदूषण होऊ नये यासाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणातर्फे कचरा जाळण्यावर कडक निर्बंध लादले गेले आहेत. कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आलेले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रादेशिक परिवहन कार्यालयास पाच हजार रुपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. या प्रकरणानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी (दि. २२) दुपारी दीडच्या सुमारास गंगापूर रोड येथे तसेच पंचवटीतील मखमलाबाद नाका येथील महापालिकेच्या जुन्या कार्यालयांजवळ महापालिकेची वाहने अडवून त्यांची तपासणी केली. यावेळी वाहनांच्या काचांवर काळ्या रंगाच्या फिल्म लावण्यात आलेल्या आहेत, ब्रेक लाइट इंडिकेटर काम करीत नाहीत अशी कारणे देत आरटीओनेही महापालिकेला नोटीस बजावली. या काळ्या फिल्म काढून ही वाहने आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी घेऊन यावीत, असेही नोटिशीत बजावण्यात आले आहे. पालिकेच्या तीन वाहनांना अशा प्रकारे नोट‌िसा देण्यात आल्या आहेत.

नोटिशीमागचा उद्देश काय?

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी या वाहनांना अडवून त्यांना नोट‌िसा दिल्या, त्याच जागेवर पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी वाहनांच्या काचांवरही काळ्या फिल्म लावण्यात आलेल्या होत्या. मग फक्त महापालिकेच्याच वाहनांच्या तपासणीसाठी नोट‌िसा देण्यामागचा उद्देश काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कचरा जाळल्यामुळे दिलेल्या नोटिशीचा वचपा काढण्यासाठीच आरटीओकडून महापालिकेला कोंडीत पकडण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा सुरू होती.

कुरघोडीचे राजकारण

महापालिकेने नोटीस दिल्यानंतरच आरटीओला महापालिकेच्या वाहनांच्या काळ्या काचा कशा दिसल्या, याबाबत चर्चांना उधाण आले होते. अशा दोन मोठ्या संस्थांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणे, हे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल वापरास ‘त्या’ पोलिसांना मर्यादा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्लू) पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वापरावर बंधने घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः साक्षीदार, पंच, फिर्यादीशी, संशयित आरोपी यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क करू नये. तसेच गरज पडल्यास या सर्वांना कार्यालयात बोलावून ऑन रेकॉर्ड नोंद घ्यावी, असा आदेश देण्यात आला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेत पीएसआय म्हणून कार्यरत असलेल्या निवांत जाधव यास १७ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. एका केसमधील साक्षीदारालाच आरोपी म्हणून सादर न करण्यासाठी जाधव लाचेची रक्कम मागत होता. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवांत जाधव ऑक्टोबरपासून पैशांसाठी तक्रारदाराकडे लाचेची रक्कम मागत होता. निवांत जाधवने या संबंधित तक्रारदारासह आणखी दोघांशी दोन दोन तास मोबाइलद्वारे संभाषण केले. हे सर्व कॉल रेकार्डसही समोर आले आहेत. विशेष म्हणजे पुरवणी चार्जशीट कोर्टात सादर करण्याचा बाऊ जाधवने केला होता. वास्तविक मुख्य चार्जशीट दाखल झाल्यानंतर असे बदल सहजतेने होत नाही. यामुळे मुळ चार्जशीट कोर्टात तग धरत नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपी जाधवने मुलीचा वाढदिवस असल्याचे कारण पुढे करीत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतली आहे. इओडब्लूचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाइल संभाषणावर मर्यादा आणण्यात आली असून, तपासाच्या प्रत्येक कामाची यापुढे नोंद केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक बाहेरील व्यक्तीची नोंदही ठेवली जाणार आहे. निवांत जाधवने परस्पर केलेल्या उद्योगामुळे संबंध आर्थिक गुन्हे शाखा बदनाम झाली असून, या पार्श्वभूमीवर आणखी काही कडक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एपीआयसह हवालदाराचाही गुन्ह्यात समावेश
लाचखोरीच्या गुन्ह्यात एका सहायक पोलिस निरीक्षकासह हवालदाराचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर येते आहे. एपीआय आर्थिक गुन्हे शाखेशी संबंधीत नाही. या तिघांनी मिळून तक्रारदारासोबत अनेक बैठका घेतल्या. लाचखोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेले हे दोघे नेमकी कोण आहेत, त्यांना अटक केव्हा होणार याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जाधवविरोधात एसीबीकडे तक्रार
पीएसआय जाधव विरोधात एका महिला संशयित आरोपीने एसीबीकडे लेखी तक्रार केली आहे. महिलेच्या पतीसह महिलेविरोधात गुन्हा दाखल असून, त्याचा तपास आर्थिक गुन्हेचे जाधव करीत होते. या काळात जाधव यांनी आपल्याला पैशांसाठी मानसिक व शारिरीक त्रास दिल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. या अर्जाची चौकशी एसीबीने सुरू केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या कारभारात सुधारणा करण्याबाबत पोलिस उपायुक्तांना आदेश देण्यात आले असून, त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलिस खात्यात नुकत्याच रुजू झालेल्या पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना दिल्या आहेत.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरच्या धडकेने नामपूरच्या तिघांचा बळी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सटाणा

वैद्यकीय उपचारासाठी सेंधवा (मध्य प्रदेश) येथे गेलेल्या नामपूर (‌ता. सटाणा) येथील अहिरे कुटुंबाच्या गाडीला कंटेनरने ‌धडक दिल्याने अपघात झाला यात आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की अहिरे कुटुंबातील तिघांचे रिक्षात अडकलेले मृतदेह क्रेनने ओढून बाहेर काढावे लागले. दरम्यान कंटेनरचालक फरार आहे.

सोमनाथ वेडू अहिरे, त्यांची पत्नी ताराबाई आणि मुलगा नरेंद्र उर्फ ओम असे अपघातात ठार झालेल्या तिघांचे नाव आहे. तालुक्यात सुबक टेलर्स म्हणून परिचित असणारे सोमनाथ वेडु अहिरे काही महिन्यांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे ते पत्नी ताराबाई आणि मुलगा नरेंद्र यांच्यासोबत मध्य प्रदेशातील सेंधवा येथे गेले होते. तेथे कंटेनरने रिक्षाला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. सेंधवा जवळील खडकीया येथील एका आयुर्वेदिक दवाखान्यात उपचारासाठी आल्याची माहिती सेंधवा येथील बिसानन पोलिस ठाण्याचे प्रभारी आर. के. लौवंशी यांनी दिली.

खडकीया येथील आयुर्वेदीक रुग्णालयात रिक्षाने जात असताना ए. बी. रोडवर मुंबईहून इंदूरकडे जाणाऱ्या कंटेनरने (आर. जे. १४ जी. जी. ४६१८) रिक्षाला (एम. पी. ४५- २३७) धडक दिली. यावेळी रिक्षा कंटेनरखाली दाबली गेली. यात अहिरे परिवारातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक आरिफ युसूफ हा गंभीर जखमी आहे. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटविण्यात येऊन रिक्षात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने नामपूर गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वास्तववादी सिनेमा नाकारणे हे दुर्दैवी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतासह जगात इतरत्रही वास्तवतावादी माहितीपट आणि सिनेमाला नेहमीच दडपले गेले. जगात किमान असा सिनेमा प्रदर्शीत केला तरी जातो; मात्र आपल्याकडे तो थेट नाकारलाच जातो. हे चित्र अत्यंत दुर्देवी आहे, अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केली.

गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट यांच्यातर्फे आयोजित सहाव्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या फेस्टिव्हलचे उद्‍घाटन कासारवल्ली यांच्या हस्ते झाले. यावेळी फेस्टिव्हलचा लोगो आणि स्मृतीचिन्ह यांचे अनावरण करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील शेनवड गावाचा पाणी प्रश्नावर तयार करण्यात आलेला कम्युनिटी व्हिडिओ दाखवून फेस्टिव्हलचा प्रारंभ करण्यात आला. संजय सावळे यांनी प्रस्ताविक केले. रघुनाथ फडणवीस यांनी ‘अंकुर’ची वाटचाल मांडली.

फेस्टिव्हलमध्ये आज

फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी (दि. २३) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वागत हॉल येथे फिल्म अप्रिसीएशन या विषयावर कार्यशाळा होणार आहे. यामध्ये हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक ऋषीकेश इंगळे मार्गदर्शन करतील. तसेच जयेश आपटे हे नाशिकमधील कलाकारांवरील वेब सिरीजचे सादरीकरण करणार आहे. दीपा बक्षी यांच्या कथ्थकचे सादरीकरण आणि सायंकाळी ८ ते ९ या वेळेत कुसुमाग्रज स्मारकमधील विशाखा हॉल येथे उपस्थितांशी संवाद होईल.

सादर होणारे चित्रपट

इन सर्च ऑफ फॅडिंग कॅनवास, आमु आखा एक से, अंडर द ओपन स्काय, जाणीव, तुझ बरय बाबा, युनिटी इज स्ट्रेन्थ, महिला कानुनी जाणकार, बायोडायव्हसिटी, नोव्हेंबर ८, फॉर देम ओन्ली, शोधिनी गाथा सोनाली तोंगरे, शोधिनी गाथा मनीषा गांगोडे, अॅक्सिडेन्ट, उन्नी, हेअरलूम्स, इएमआय, धाव, इप्रित, पोस्टमोर्टम, मा.पो., तिपारू, चोरी, द क्लिनर, सोसायटी, तश्बीर हे चित्रपट स्वागत हॉल येथे सायंकाळी ८ ते ९ या वेळेत सादर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ बॅच बदनामच

$
0
0

नाशिक : नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतून (एमपीए) २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षकांची १०८ वी बॅच पास आउट झाली. एमपीएच्या इतिहासात यावर्षी प्रथमच एक हजार ५४४ प्रशिक्षणार्थी पीएसआय बाहेर पडले. ही विक्रमी कामगिरी ठरली. दीक्षांत सभारंभावेळी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोस्टिंगसाठी सेटीग्ज लावणाऱ्या या नवीन अधिकाऱ्यांबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. या बॅचमधील जवळपास दीडशेपेक्षा अधिक पीएसआय लाचखोरीच्या आरोपाखाली अटक झाले आहेत.

त्र्यंबक रोडवरील ‘एमपीए’मध्ये राज्यासाठी पोलिस अधिकारी तयार करण्याचे काम केले जाते. पीएसआय आणि पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी एमपीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सेवेत रुजू केले जाते. काही वर्षांपर्यंत पीएसआय किंवा पोलिस निरीक्षक कोणत्या बॅचचा यास महत्त्व होते. अगदी कोणाच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले, यावरून या अधिकाऱ्यांची गुणवत्ता ठरवली जाई. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या नादात प्रमाणापेक्षा अधिक जागांचा भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यात गुणवत्ता दूर सरली. २०१३ च्या बॅचमध्ये एक हजार ५४४ पीएसआय होते. एमपीएमध्ये या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याइतपत यंत्रणाच अस्तित्वात नसताना प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यात आला. दीक्षांत सभारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवगंत आर. आर. पाटील हजर होते. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी बऱ्याच अधिकाऱ्यांनी पोस्टिंगसाठी आपल्याकडे सेटिंग्ज लावल्याचे सांगितले होते. पोलिस म्हणून तुमची सुरुवात या पद्धतीने होणार नाही, असे स्पष्ट करीत कायद्यानुसारच नियुक्तीपत्र देण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते. आबांचा इशारा थेट होता. मात्र, १०८ व्या बॅचमधील प्रशिक्षण घेतलेल्या काही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. या बॅचमधील आजवर दीडशेपेक्षा अधिक पीएसआय लाचखोरी किंवा इतर गंभीर प्रकरणात अटक झाले आहेत.

जाधवांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

प्रशिक्षण घेतलेल्या १०८ व्या बॅचमध्ये काही तरी गंभीर समस्या असल्याची जाणीव सरकारलाही असून, याचमुळे यातील अधिकाऱ्यांना रिफ्रेशमेंट प्रशिक्षण देण्याचे काम गृह विभागाकडून सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआय निवांत जाधव हे देखील याच बॅचमधील असून, त्यांना नुकतेच अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) लाचखोरीच्या गुन्ह्यात जेरबंद केले आहे. सध्या सेंट्रल जेलमध्ये असलेल्या जाधवांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. २८) सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघा संशयितांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील जवळपास सहा कोटीचा रेशन धान्य घोटाळा २०१५ मध्ये उघडकीस आला होता. या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व अनेक दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणातील तीन संशयितांना मंगळवारी (दि. २१) अटक झाली. त्यांना दिंडोरी कोर्टाने २ डिसेंबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
उगम पगारिया, मोरारजी भिकुलाल मंत्री व संजय रामकृष्ण गडाख अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. तपास अधिकारी तथा कळवणचे पोलिस उपअधीक्षक देविदास पाटील यांनी मंगळवारी (दि. २१) अटक केली. सुरगाणा तालुक्यातील रेशनचा गहू, तांदूळ व साखर हा माल नाशिक येथील शासकीय गोडावूनमधून ने-आण करण्याची जबाबदारी या घोटाळ्यातील आरोपी गडाख व मंत्री या दोघांची होती. त्यानुसार सरकारने त्यांच्याशी करारही केलेला होता. त्यानुसार सुरगाणा शासकीय गोडावूनपर्यंत माल पोचवण्याची जबाबदारी या दोघांची होती; मात्र त्यांनी काही माल पोहोचवला तर काही पोहोचवला नाही. हा रेशनिंग घोटाळा संगनमताने झाल्याचा संशय असल्याने वरिष्ठ अधिकारी वर्गापासून अनेकांवर याबाबत सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार वरील तिघांना ताब्यात घेण्यात आले. दिंडोरी कोर्टात हजर केले असता त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबत निःपक्षपातीपणे तपास होऊन आणखी जबाबदार घोटाळेबाज अधिकारी, व्यापारी यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास उपअधीक्षक देविदास पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनाथ बालक संख्येची प्रधान सचिवांकडून दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात आढळून येणाऱ्या हजारो अनाथ बालकांच्या संख्येबाबत महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल यांनीही आश्चर्य व्यक्त करीत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

अनाथ मुलांच्या नावाखाली बालगृह संस्थाचालक उखळ पांढरे करीत असून, अहमदनगरसह नाशिकमध्ये हे पीक जोमात फोफावत असल्याची धक्कादायक बाब ‘मटा’ने समोर आणली. यात नाशिकच्या बालकल्याण समितीसह विभागाचा कारभार संशयस्पद असल्याचे स्पष्ट असून, यामुळे महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान परस्पर लाटण्यात येत आहे. ‘मटा’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नाशिकसह अहमदनगरमध्ये खळबळ उडाली असून, दोन्ही जिल्ह्यांचे महिला व बाल कल्याण विभाग हात वर करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलांची संख्या कागदोपत्री दाखवली की सरकार अनुदान देते. वास्तविक बालकल्याण समितीच्या सदस्यांसमोर हजर केल्यानंतर एक गृह चौकशी होऊनच मुलांना बालगृहात दाखल केले जाते. कायद्यानुसार या सुविधेचा लाभ फक्त अनाथ मुले, अशी मुले की ज्यांचे पालक जेलमध्ये आहेत किंवा ज्या पालकांना असाध्य आजार आहेत, त्यांनाच बालगृहात ठेवले जाते. खासगी बालगृहे सामाजिक दृष्टीकोनातून सुरू झालेली असतात. मात्र, तरीही सरकारकडून या संस्थांना प्रत्येक मुलामागे जवळपास बाराशे रुपये प्रतिमहिना निधी दिला जातो. अहमदनगरमध्ये जवळपास ४२ बालगृहे असून, त्यात या वर्षी अडीच हजार बालकांना प्रवेश देण्यात आला आहे. यापूर्वी हाच आकडा चार हजारांपर्यंत होता. यामुळे अहमनगर राज्यातील सर्वाधिक अनाथ बालके असलेला जिल्हा ठरला असून, याची अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नकारत्मक नोंद घेतली जाते आहे. मुलांच्या संख्येआड मोठे अर्थकारण दडले असून, याची सविस्तर माहिती ‘मटा’ने बुधवार, २२ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केली. याबाबत महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुलांची संख्या वाढवून दाखवण्यात आली असेल, महिला व बाल कल्याण समितीसमोर मुलेच आली नसतील किंवा पालक सक्षम असताना मुले बालगृहात दाखल दाखवण्यात आली असतील तर हे गंभीर असून, याची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.

अनाथ मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करावेच लागते. तसा कायदा असून, त्याचे उल्लंघन झालेले असल्यास ही गंभीर बाब ठरते. या प्रकरणाची चौकशी करून त्यातील तथ्य शोधले जातील.
- विनीता सिंगल, प्रधान सचिव, महिला व बाल कल्याण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्माकोलच्या होडीतून ‘त्यांची’ जलसफारी

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

दोन वेळी पोट भरण्याची भ्रांत असल्याने गोदाकाठ परिसरात मिळणाऱ्या अन्नदानातून उदरनिर्वाह करणारी अनेक मुले नजरेस पडतात. दिवसभर गोदापात्रातील पाण्यात डुबकी घेऊन काही हाताला लागते का याची शोध घेतात, त्यातील काही मुलांनी थर्माकोल आणि गादीच्या खोळीचा वापर करून होड्या तयार केल्या. वजनाने हलक्या असलेल्या या होड्या पाण्यावर तरंगत ठेवतात. त्यावर बसून थर्माकोलच्या तुकड्याने आपली अनोखी होडी वल्हवित जलसफारीचा आनंद घेत असल्याचे दृष्य गोदावरीच्या पात्रात दिसते.

वयाने लहान असले तरी गोदाकाठावरच दिसणारी, झोपडपट्टीत राहणारी ही मुले दिवसभर या भागात फिरत असतात. येथील कचऱ्यात काही वस्तू हाती लागते त्याचा शोध घेणे, पाण्यात डुबकी मारून चिखलात किंवा वाळूत काही सापडते का याचा शोध घेणे असे त्यांचे अनेक उद्योग सुरू असतात. कचऱ्यातून वस्तू गोळा करता करता त्यांच्या हाती लागलेल्या थर्माकोल गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली. हे थर्माकोल कचऱ्यातच सापडलेल्या जुन्या गादींच्या खोळीत भरून त्या खोळीची मोकळी बाजू सुई-दोऱ्याच्या साह्याने शिवून घेतली. अशा प्रकारे त्यांची होडी तयार झाली. वजनाने हलकी असलेली ही होडी ते सहज कुठेही उचलून नेऊ शकतात. ही होडी पाण्यात सोडून त्यावर बसून ते थर्माकोलच्याच तुकड्याने वल्हवित त्या होडीला पाहिजे त्या दिशेला वळवित पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. या मुलांनी अशा दोन होड्या तयार केल्या आहेत. म्हसोबा पटांगण ते कपुरथळा मैदानाच्या मधल्या भागात असलेल्या गोदावरीच्या पात्रात या होड्या टाकून त्यांची जलसफारी सुरू असते. उघडी बोडकी मुले या होडीवर बसून मनसोक्त आनंद घेत असल्याचे बघून अनेकांना आश्चर्य वाटते. या मुलांना ओळखणाऱ्यांना त्यांच्या विषयी विचारले असता ही मुले गोदेलाच अर्पण केलेली असल्याचे ते सांगतात. दिवसभर याच परिसरात ती फिरत असतात. कोणत्याही ऋतूत त्यांच्या अंगावर पुरेशे कपडे दिसत नाहीत. त्याचीही त्यांना खंत नसते.

होडीवरच वामकुक्षी
होडी बनविण्याची शक्कल चिमुकल्यांना रामकुंड परिसरातील जीवरक्षक दलाच्या मुलांमुळे लढविता आली. या जीवरक्षकाच्या लहान मुलांनी गोदावरीला पूर आला होता, त्यावेळी अशा प्रकारची होडी तयार केली होती. अशा प्रकारच्या होडीवर बसून ही मुले लक्ष्मण कुंडापासून ते थेट तपोवनापर्यंत सफर करीत होते. त्यांचाच कित्ता गिरवित या मुलांनी अशा प्रकारची होडी तयार केली असून ते दिवसभर पाण्यात टाकून त्यावर दुपारी वामकुक्षीही घेतांना दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्यराणी’ पळविण्याचा डाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेचा ट्रॅक बदलून राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याच्या प्रस्तावास नाशिककरांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ही गाडी नांदेडपर्यंत धावू लागल्यास ती नाशिककरांची राहणार नाही. तिकडूनच ती भरून येईल. नाशिककरांच्या अन्य गाड्या पळवून नेल्या आता राणीला पळवून नेण्यास नाशिककरांनी विरोध केला आहे.

मुंबईला जाण्या-येण्यासाठी राज्यराणी ही नाशिककरांसाठी उपयुक्त रेल्वेगाडी आहे. सकाळी मुंबईला जाण्यासाठी पंचवटी, गोदावरीबरोबरच राज्यराणी एक्स्प्रेसचा मोठा आधार नाशककरांना लाभतो. मात्र, या गाड्यांना कायम गर्दी असते. त्यातच राज्यराणी नांदेडपर्यंत नेल्यास या गाडीतून सुखाने प्रवास करणे नाशिककरांना दुरापस्त होणार आहे. त्यामुळेच त्यांचा तीव्र विरोध आहे.

विरोध योग्यच
सकाळी मुंबईकरांचा प्राइम टाइम असतो. यावेळी लोकलने मुंबईला जाण्यासाठी मुंबईकरांची जशी गर्दी होते, तशीच आता सकाळी मनमाड, नाशिकरोड, निफाड, इगतपुरी आदी स्टेशनवर पंचवटी गाडीसाठी होते. तसाच अनुभव सकाळी गोदावरी व राज्यराणी गाडीबाबत येतो. या दोन गाड्या असल्याने पंचवटीवरील ताण बऱ्यापैकी कमी झाला आहे. मनमाड-मुंबई दरम्यान धावणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत नेण्यात आले. तसाच प्रकार नाशिक-पुणे गाडीबाबत घडला. ही गाडी भुसावळपर्यंत नेण्यात येत आहे. आता राज्यराणी नांदेडपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. यामुळे नाशिककरांची मुंबईला जाताना मोठी गैरसोय होणार आहे. त्यांना गाडीत जागा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे ही गाडी नांदेडपर्यंत नेण्यास नाशिककरांचा विरोध योग्यच आहे.

‘मध्य’चाही नकार
राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याचा प्रस्ताव हा मध्य-दक्षिण रेल्वेचा आहे. त्याला मध्य रेल्वेचा (म्हणजेच नाशिक, जळगाव मार्ग) विरोध आहे. राज्यराणी मनमाडला १२ तासापेक्षा अधिक वेळ थांबलेली असते. हा स्लॅक पिरेड लक्षात घेऊन ही गाडी नांदेडपर्यंत न्यावी. तसे केल्यास या गाडीचा तोटा कमी होऊन ही गाडी नफ्यात येईल, असा मध्य-दक्षिण रेल्वेचा युक्तीवाद आहे.

विरोधाचे पत्र
नाशिककरांचे रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे सल्लागर समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्यास पूर्वीपासून विरोध दर्शविला आहे. दिल्लीच्या रेल्वे बोर्डाला त्यांनी पत्र पाठवून याला आक्षेप नोंदवला आहे. राज्यराणीला सध्या तोटा होत आहे. या गाडीला दादर स्टेशनपर्यंत थांबा दिल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभून महसूलही वाढेल, अशी सूचना या दोघांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे. तथापी, रेल्वे प्रशासनाने अद्यापतरी त्याला हिरवा कंदील दाखवलेला नाही.

नाशिककरांची गैरसोय होणार असल्याने राज्यराणीला कदापीही मध्य दक्षिण रेल्वेच्या मार्गावरून धावू दिले जाणार नाही. ती मध्य रेल्वेमार्गावरच धावेल. या गाडीचा तोटा कमी करण्यासाठी तिला महत्त्वाच्या ठिकाणी थांबे वाढवून दिले तर ते योग्य ठरेल.
- हेमंत गोडसे, खासदार

राज्यराणीबाबत मध्य-दक्षिण रेल्वे चुकीच्या माहितीच्या आधारे रेल्वे बोर्डाची दिशाभूल करत आहे. अशा पद्धतीने खोटी माहिती देऊन राज्यराणी नांदेडपर्यंत नेण्याचा त्यांचा डाव हाणून पाडला जाईल. नाशिककरांची गैरसोय आम्ही होऊ देणार नाही.
- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाचा लढा ठरला अपयशी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

वेगवेगळ्या कारणाने केलेल्या भूसंपादन दाव्यापोटी महापालिकेकडून अनेकांना न्याय मिळू शकलेला नाही. अशाच एका प्रकरणात २६ वर्ष न्यायालयीन लढा देवूनसुद्धा वयोवृद्ध प्रल्हाद भावसार यांना भूसंपादन दाव्यापोटी अतिरिक्त मोबदला मिळाला नाही. अखेर त्यांचे मालेगावी निधन झाले. आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी ढिम्म पालिका प्रशासनास जाग येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

येथील प्रल्हाद भावसार (वय ९०) व शशिकला भावसार यांची आयेशानगर भागातील गट न ६१ व ६२ मधील जमीन पालिकेकडून १९९२ ला स्मशानभूमी व बगीचासाठी संपादित करण्यात आली होती. याप्रकरणी भूसंपादनची रक्कम वेळेत न मिळाल्याने भावसार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फेब्रुवारी २०१४ ला मोबदला देण्यासह जप्ती आदेश बजावला. त्यानंतर पालिकेकडून २०१५ साली भावसार यांना ५० लाख देण्यात आले. मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याबाबत पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भावसार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून आपली फिर्याद मांडली होती.

भावसार यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर प्रकरणास गती मिळाली. यात भावसार व पालिका प्रशासन यांच्यात वाटाघाटी करून एक निश्चित रक्कम ठरव‌ण्यिात आली. मात्र तत्कालीन आयुक्तांनी स्थायी समितीच्या मजुरीनंतर ही करारनाम्यातील रक्कम बदलली. याबाबत भावसार यांनी १९ मे २०१७ रोजी हरकतीचे पत्र दिले. मात्र पालिकेच्या ढिम्म प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने हतबल झालेल्या वयोवृद्ध भावसार यांनी याच महिन्यात नगरविकास विभागाचे सचिव व उपसचिव यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या या लढ्याला यश येण्याआधीच बुधवारी त्यांचे निधन झाले. वयाच्या नव्वदी गाठलेल्या भावसार यांनी निष्क्रिय प्रशासनापुढे हार मानली नसली तरी नियतीपुढे मात्र ते हरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी देण्यास विरोध

$
0
0


म. टा. प्र्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देताना आपल्या भागातील लोकांवर अन्याय होत असल्याची भावना सहकार राज्य मंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदारांनी बुधवारी स्पष्टपणे व्यक्त केली. गुजरात निवडणुकीनंतर कोणत्याही क्षणी हे पाणी तिकडे नेले जाण्याची शक्यता असून, तत्पूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या पाण्याच्या बदल्यात जिल्ह्याला नेमके काय आणि केव्हा मिळणार हे स्पष्ट करवून घेण्याचा निर्णय सरकारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नार-पार गिरणा नदीजोड योजना आणि त्या अनुषंगिक विषयांचा आढावा घेण्यासाठी भुसे यांनी विश्रामगृहावर बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, दीप‌किा चव्हाण, जीवा गावित, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व‌श्विास देवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता दिलीप मुसळे आदी उपस्थ‌ति होते.

गिरणा हे तुटीचे खोरे असून नार-पार या विपुल खोऱ्यातील

पाणी तुटीच्या खोऱ्यात आणण्यासाठीच्या उपाययोजनांच्या चर्चेद्वारे या बैठकीला सुरुवात झाली. पार-तापी-नर्मदा व नार-पार-गिरणा नदी जोड योजना आणि दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी नदी योजनांची प्रोजेक्टरद्वारे माहिती देतांना अधिकाऱ्यांचा गोंधळ झाला.

नऊ लाख लोकांवर होणार परिणाम

पाण्याअभावी सिंचनक्षेत्रही कमी होणार असल्याकडेही डॉ. आहेर यांनी लक्ष वेधले. या सर्व विषयावर प्रशासनाची भूमिकाच स्पष्ट नसल्याचा आक्षेप खासदार चव्हाण यांनी नोंदविला. गिरणा खोऱ्यासाठी पाणी कोणत्या मार्गाने जाणार, असा सवाल भुसे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. पाण्याचा मार्ग बदलला जाणार असून, त्यामुळे चांदवड ते नांदगावपर्यंतचे तब्बल नऊ लाख लोक वंचित राहतील याकडे या भागातील प्रतिनिधींनी लक्ष वेधले. यापूर्वीचे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी आपण वापरले नसून, कागदावर द‌सिते त्यापेक्षा अधिक पाणी गुजरातला जाणार असल्याचा संशय गावित यांनी व्यक्त केला. कैफियत मांडण्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.

गावितांचा भुसेंना शाब्द‌कि टोला

चणकापूरमधून मालेगावसाठी जे पाणी मिळायचे ते मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही केवळ तुमच्याच विभागाचा विचार करू नका. आमच्या सुरगाण्याचाही विचार करणार की नाही, असा सवाल गावित यांनी भुसे यांच्याकडे उपस्थ‌ति केला. मी पूर्ण जिल्ह्याचा विचार करतोय म्हणूनच बैठक आयोजित केली असे भुसे म्हणाले. बाऱ्हे पट्ट्यातील पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे जमा केले तर मांजरपाडा दोनमध्ये ग्रॅव्हीटीद्वारे आणता येईल, याकडे गावित यांनी लक्ष वेधले. ग्रामपंचायत, तहसीलदार यांना विश्वासात न घेताच पाटबंधारे निर्णय घेणार असेल, तर या पेसा क्षेत्रामध्ये प्रकल्प लोक होऊ देणार नाही, असा इशारा देत पाणी उचलताना कुणाच्या परवानगीची आवश्यकता भासायला नको अशी, मागणीही गावित यांनी केली.

नदीजोड प्रस्तावच बदलला?

पार-तापी-नर्मदा ही गुजरातची योजना असून, त्यांचा प्रकल्प अहवाल तयार झाला असताना नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प अजूनही पूर्व संभावित अहवालाच्याच पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे नार-पार नदीजोड प्रस्तावच बदलल्याची धक्कादायक बाबही या बैठकीत उघडकीस आली. गुजरातला अधिक पाणी मिळावे यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आक्षेपही यावेळी नोंदविण्यात आला.

दिलेले पाणी पुन्हा मिळणार नाही

नार-पार औरंगा आणि अंबिका प्रकल्पामध्ये १०४५ दशलक्ष घनमीटर पाणी असून त्यापैकी ८८८ दशलक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्राच्या हद्दीतले आहे. त्यापैकी ३०४.२० दशलक्ष घनमीटर पाणी गिरणा खोऱ्यात तर ९७.३२ दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी खोऱ्यात येते. ८८८ दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी ४३४ दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातला हवे आहे. हे पाणी गुजरातसाठी दिल्यास ते आपल्याला पुन्हा कधीच उचलता येणार नाही. अप्रत्यक्षपणे आपल्या खोऱ्यावरही अन्यायच होणार असल्याचे यावेळी डॉ. आहेर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images