Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अन् मायलेकरांची झाली पुनर्भेट…

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तिचे तान्हुले तीन लेकरं…उसाच्या शेतातून हरवतात…ती कासावीस होते…शोधशोध शोधते…रात्री पुन्हा त्या ठिकाणी येते… लेकरं दिसतात…तिच्या जीवात जीव येतो…पण त्यांना हृदयाशी घेता येत नसल्यामुळे ती विव्हळते…त्यांनाही आईला पाहून तिच्या कुशीत शिरावं असं वाटतं…मात्र भेट होत नाही…ती सलग तीन ते चार दिसस येते…मात्र लेकरांना पाहून निघून जाते…अखेर परवा रात्री तिच्या आणि तान्हुल्यातील अंतर कमी होते…ती तिघांना पाहते…ओंजाराते-गोंजारते आणि एकेकाला हृदयाशी घेत पलायन करते… कोणाच्याही मातृत्त्वाला हेलावून सोडणारा हा प्रसंग घडला आहे निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे शिवारात. बिबट्याची मादी आणि तिच्या तीन पिलांच्या पुनर्भेटीची ही कहाणी.

ब्राह्मणवाडे शिवारात बुधवारी (दि. ८) ऊसतोड मजुरांना संतोष गोसावी यांच्या शेतात ऊस तोड करताना बिबट्याचे तीन बछडे आढळले होते. गोसावी यांनी वनविभागाला कळवल्यानंतर त्यांनी हे बछडे ताब्यात घेतले. मात्र बछडे खूपच लहान असल्याने त्यांच्या पालनपोषण करणे अवघड झाले. त्यातच बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यामुळे बछडे सापडलेल्या ठिकाणी पिंजरा लावला व त्यात बछड्यांना ठेवण्यात आले.

बिबट्याची मादी पिंजऱ्याजवळ येऊन बछड्यांना पाहून निघून जायची. असे दोन दिवस झाल्यानंतर अखेर तीनही बछड्याना तिच्या आईच्या स्वाधीन करायचे असा निर्णय झाला. यासाठी जुन्नर येथील डॉ. अजय देशमुख यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांच्या टीमने ब्राह्मणवाडे शिवारातीत त्याच शेतात बछड्यांना एका कॅरेटमध्ये ठेवले. आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविला.

रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान बिबट्याची मादी त्या ठिकाणी आली. तिने पायाच्या एका पंजाने कॅरेट बाजूला केले. एकेक बछड्याला चाटून त्यांना गोंजारले. त्यानंतर तिने एक एक करून तीनही बछडे आपल्या तोंडात घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.

या बछड्यात दोन मादी व एक नर आहे. वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत मायलेकांची भेट चित्रीत झाली आहे. डॉ. देशमुख यांनी ही चित्रफित सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाड्यांची ओळखपरेड

$
0
0

सहाही विभागांत आज तपासणी; आरोग्य अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अस्वच्छता आणि अनियमित घंटागाड्यांमुळे महापौरांनी मंगळवारी थेट आरोग्य विभागापुढे हात टेकले. अस्वच्छता आणि घंटागाड्यांबाबत नगरसेवकांकडून वारंवार तक्रारी होवूनही त्यांचे निराकरण होत नाही. आरोग्य विभागाचे ठेकेदारांशी असलेल्या कथित अर्थपूर्ण संबंधांमुळे पालिकेतील सत्ताधारी आता हतबल झाले आहेत. त्यामुळे आता थेट घंटागाड्यांची परेडच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील सहा विभागांत असलेल्या सर्व घंटागाड्यांची बुधवारी नगरसेवक तसेच सहा प्रभाग समित्यांचे सभापती तपासणी करणार आहेत. घंटागाड्यांचे दिलेले आकडे आणि प्रत्यक्षात उपस्थित घंटागाड्यांमध्ये तफावत आढळल्यास थेट आरोग्य अधिकाऱ्यांनाच निलंबित करण्याचा इशारा महापौर रंजना भानसी यांनी दिला आहे. प्रभाग समित्यांचे सभापती, नगरसेवक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छतेसंदर्भात महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी शहरात सुरू असलेल्या अनियमित घंटागाड्यांवरून बैठकीत बरीच वादावादी झाली. प्रभागांमध्ये घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी यावेळी केल्या. प्रत्येक प्रभागात चार ते सात घंडागाड्या असतानाही केवळ एक दोनच घंटागाड्या येत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या. पंधरा दिवस घंटागाडी येत नसल्याचा आरोप विधीसमिती सभापती शीतल माळोदे यांनी केला. सर्वच नगरसेवकांनी एकमुखात घंटागाड्यांबाबत तक्रारी केल्याने महापौर संतप्त झाल्या. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना धारेवर धरत प्रभागनिहाय घंटागाड्यांचा आकडाच सादर करण्याचे फर्मान सोडले.

आरोग्याधिकारी डॉ. बुकाने यांनी प्रभागनिहाय घंटागाड्यांचे आकडेवारी सादर केल्यानंतर महापौरांनी नगरसेवकांना या घंटागाड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व प्रभाग समिती सभापतींनी बुधवारी आपल्या प्रभागात येणाऱ्या घंटागाड्यांची पडताळणी करावी आणि तसा अहवाल महापौराकडे सादर करावेत, अशा सूचना महापौरांनी दिल्या.त्यासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीत त्रुटी आढळल्या तर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी प्रभाग तसेच विभागीय कार्यालयांमध्ये घंटागाड्यांची ओळखपरेड केली जाणार आहे. त्यावरून शहरात प्रत्यक्ष धावणाऱ्या घंटागाड्यांची संख्या समजणार आहे.

तर जागेवरच निलंबन!

आरोग्य अधिकाऱ्याचे घंटागाडी ठेकेदारांशी लागेबांधे असल्याचा आरोप होत आहेत. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असून, ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप महापौर भानसी आणि स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी केला आहे. बुधवारी आरोग्य विभागाने सांगितलेल्या घंटागाड्याची संख्या आणि पडताळणीत सापडलेल्या घंटागाड्यांची संख्या मॅच झाली नाही तर, थेट आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांचे निलंबन करू असा इशाराच महापौरांनी दिला आहे.

बुकाने फक्त बुक्का लावतात!

घंटागाडी आणि स्वच्छतेसंदर्भात वारंवार तक्रार करूनही आरोग्याधिकारी डॉ. बुकाने हे लक्ष देत नाहीत असा आरोप भाजपच्या शांता हिरे यांनी केला. बुकाने केवळ बुक्का लावतात, काम काहीच करत नाहीत, अशी तक्रार करीत त्यांनी बुकानेंच्या गैरकारभाराचा पाढा वाचला. माझ्या प्रभागात एकदाच उदघाटनावेळी घंटागाडी दिसली. त्यानंतर प्रभागात घंटागाडीच दिसली नसल्याचा आरोप हिरे यांनी केला.


समान वितरण नाहीच

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रभागात समान वाटप करण्याचे आदेश आयुक्तांनी देवून महिना लोटला नाही तरी त्याबाबत कार्यवाही केली नसल्याचा आरोप सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केला. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही बुकानेंनी दखल घेतली नाही. बैठकीत बुकाने यांना याबाबत जाब विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना बुकाने यांची फजिती झाली. तातडीने सर्व प्रभागांत कर्मचाऱ्यांचे समान वाटप केले जाईल, असे आश्वासन त्यांनी सदस्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चोरट्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय चोरीची दुचाकी खरेदी करणाऱ्या कळवण येथील खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली. वाहन चोरट्यांच्या अटकेमुळे चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सलमान शौकत शेख, अजय जीवन बिराडे आणि खरेदीदार अन्वर सलीम शेख (रा. कळवण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पुणे रोडवरील सिद्धार्थनगर येथील राहुल अशोक दांडगे यांची मोटारसायकल (एमएच १५/डीएच ५३३४) जाकीर हुसेन हॉस्पिटलजवळून चोरीस गेली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास करीत असताना पोलिस नाईक राजेंद्र मोजाड यांना माहिती मिळाली. त्यानुसार संशयित सलमान शौकत शेख याला पोलिसांनी एमएच १५/बीएन २९२० या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याने व त्याचा साथीदार अजय बिराडे यांनी मिळून तब्बल आठ वाहने चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एक दुचाकी कळवण येथील अन्वर शेख यांना विक्री करण्यात आली होती, तर शेखची सिन्नर येथील मावशी हमिदा युसूफ खान यांच्याकडे एक दुचाकी ठेवण्यात आली होती. ही दुचाकीदेखील पोलिसांनी जप्त केली. यामुळे भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील एक, मुंबईनाका हद्दीतील तीन आणि म्हसरूळ हद्दीतील एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक कमलाकर जाधव, हवालदार धनराज पाटील, राजेंद्र मोजाड, मिलिंदसिंग परदेशी, गणेश निंबाळकर, संतोष पवार आदींच्या पथकाने केली.

मालेगाव कॅम्पमध्ये घरफोडी

मालेगाव ः शहरातील कॅम्प भागातील गायत्रीनगर येथील मेहता रेसिडेन्सी या इमारतीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास घरफोडी झाली असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यासह २० हजार रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढल्या असून, शहर पोलिसांना त्या रोखण्यात अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी घरमालक अनिल धामणे यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मेहता रेसिडेन्सी येथे दुसऱ्या मजल्यावर राहत असलेले अनिल धामणे आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धामणे यांच्या घराचे कुलूप तोडून आत घुसले. घरातील दोन कपाटांचे लॉक हत्याराने तोडून त्यात असलेल्या सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह अंदाजे वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान धामणे यांचे शेजारी असलेल्यांना सकाळी या घटनेची चाहूल लागताच त्यांनी नाशिक येथे नोकरीनिमित राहत असलेले धामणे यांचा मुलगा गौरव याला दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लर्न अँड डान्स’ वर्कशॉप रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कुठलीही गोष्ट शिकायला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजूला पाहत असतो. एखादा लहानगा अशा प्रकारे शास्त्रीय संगीतातले बारकावे म्हणून दाखवतो की आपण ऐकून थक्क होतो. ८० वर्षांचे आजोबा आपले शिक्षण पूर्ण करत पदवी संपादन करतात, तेव्हा आपल्याला कौतुक वाटते. अशा प्रकारे कुठलेही वयाचे बंधन न ठेवता नवीन गोष्ट शिकण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
येत्या रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी कल्चर क्लबतर्फे ‘लर्न अँड डान्स’ वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये लोकगीतांवर आधारीत लोकनृत्य प्रकार शिकविण्यात येणार आहेत. यात डान्सच्या सर्व स्टेप्स शिकवल्या जाणार आहेत. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचे बंधन नाही अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांचे आजी-आजोबाही सहभागी होऊ शकतात.
फोक फिटनेस या डान्स प्रकारातून आपला फिटनेस कसा ठेवायचा, याबद्दल प्रज्ञा तोरस्कर मार्गदर्शनही करणार आहेत. रविवारी दुपारी ३ वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये हे वर्कशॉप होणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सभासदासाठी १०० तर इतरांसाठी ४०० रुपये फी आहे. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क - ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉक्टरांना’ मिळणार पदव्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत सोहळा आज (दि. १५) विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे होणार आहे. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्यास विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिश महाजन अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक प्रा. डॉ. रंदीप गुलेरिया व मुख्य अतिथी म्हणून टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर आदी उपस्थित राहणार आहेत.

विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ७४ सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. याच बरोबर संशोधन पूर्ण केलेल्या २२ विद्यार्थ्यांना पीएच. डी. प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी २०१६ -२०१७ मध्ये घेतलेल्या पदव‌िका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व इंटर्नश‌िप पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ८ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.

विद्वज्जन मिरवणूकीने सोहळ्यास सुरूवात होईल. या मिरवणूकीत प्रमुख अतिथी अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य सहभागी होतील. दीक्षान्त समांरभात आरोग्य विज्ञान पदवी आणि पदव्युत्तरच्या विविध विद्याशाखांतील अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, विविध विषयांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्यांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत. वैद्यकीय विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांस मेरीट स्कॉलरशिप अॅवॉर्ड रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

शाखानिहाय पदव्या

विविध विद्याशाखा आणि त्यात पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे : आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवी : ६०५, दंत विद्याशाखा पदवी : १६६०, आयुर्वेद विद्याशाखा : ५५९, युनानी विद्याशाखा : ३३, होमिओपॅथी विद्याशाखा : ९५३, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे ३४८, बेसिक बी. एस्सी. नर्सिंग विद्याशाखा : १२०७, बी.पी.टी.एच. विद्याशाखा : १२२, बी. ओ. टी. एच. विद्याशाखा : १४, बी. ए. एस. एल. पी. विद्याशाखा ३५, बी. पी. ओ. विद्याशाखा : ३, डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक सायन्स विद्याशाखा : ३८, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे : ३२, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखा : ८६९, एम.एस.मेडिकल विद्याशाखा : ४४७, डी. एम. मेडिकल विद्याशाखा : ४६, एम. सी. एच. मेडिकल विद्याशाखा : ५६ , पी. जी. डिप्लोमा विद्याशाखा : ३०३, पॅरामेडिकल डिप्लोमा विद्याशाखा : ७६, पी. जी. डी. एम. एल. टी. विद्याशाखा : ७३, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसिन विद्याशाखेचे १३ , एम. एस्सी. मेडिकल बायोकेमिस्ट्री विद्याशाखा : २, एम. बी. ए. विद्याशाखा : १८, एम. पी. एच. एन. विद्याशाखा : ११, एम. डी. एस. विद्याशाखा : ३६१, एम. डी. आयुर्वेद विद्याशाखा : ४८१, एम. एस. आयुर्वेद विद्याशाखेचे १७२, एम. डी. युनानी विद्याशाखेचे १०, एम .एस. युनानी विद्याशाखा : ३, पी. जी. डिप्लोमा आयुर्वेद विद्याशाखेचे १२, एम. डी. होमिओपॅथी विद्याशाखेचे ३८, एम. ए. एस. एल. पी. विद्याशाखा : १७, एम. एस्सी. नर्सिंग विद्याशाखा १५०, एम.पी.टी.एच. विद्याशाखा : १०४, एम. ओ. टी. एच. विद्याशाखा : १२, एम. पी. ओ. विद्याशाखा : ३, ए. डी. एच. एम. विद्याशाखा : २ आणि यातील ७४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकेंद्राच्या सक्षमतेसाठी कुलगुरूंशी चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेचे केंद्र नाशिकमध्ये आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचे प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. नाशिकचे विद्यापीठ उपकेंद्र सक्षम व्हावे, ही मागणी घेऊन त्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेत नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या.

शहरात असलेले उपकेंद्र सक्षम नसल्याने महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अडचणी येतात. महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांना कामांसाठी विद्यापीठाच्या पुणे कार्यालयातच जावे लागते. विद्यापीठाचा भार हलका व्हावा, यासाठी सात वर्षांपूर्वी नाशिकमध्ये उपकेंद्र सुरू केले. जिल्ह्यातील सुमारे सव्वाशे महाविद्यालये आणि लाखभर विद्यार्थ्यांची विद्यापीठाशी निगडित असलेली कामे सहजपणे व्हावीत, यासाठी हे उपकेंद्र सुरू केले गेले. मात्र अल्प जागा, अपुरे मनुष्यबळ, मर्यादित अधिकार आणि साधनसामग्रीची कमतरता यामुळे उपकेंद्राची अवस्था बिकट आहे.

उपकेंद्र प्रशस्त इमारतीत असावे, पुरेसे कर्मचारी असावेत, उपकेंद्रात विभागवार कक्षनिर्मिती करावी, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, तसेच हॉल तिकिटात बदल करण्याचे अधिकार उपकेंद्राला असावेत, पेपर सेटिंग करण्याचे काम उपकेंद्रातच करावे, परीक्षेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार उपकेंद्रातच स्वीकारावे, पी. जी. आणि पीएच. डी.साठी शिक्षकांना मान्यतेसाठी द्यावी लागणारी हार्ड कॉपी उपकेंद्रात जमा करण्याची सुविधा असावी, महाविद्यालयाच्या प्रोफाइलमध्ये बदल करून देण्याची सोय उपकेंद्रात असावी, अशा सूचना या वेळी गोडसे यांनी कुलगुरूंना केल्या. आपल्या मागण्या योग्य असून, त्यावर लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही करमळकर यांनी दिली. सुसज्य कार्यालयासाठी वीस हजार स्क्वेअर फूट जागेची गरज असून, जागेच्या पाहणीसाठी आपण पुढील आठवड्यात नाशिकला येणार आहोत, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले. या इमारतीतच पैठणी, फळबागा, दाक्ष- कांदा आणि निर्यात या विषयांवर आधारित नव्याने चार अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे करमळकर यांनी सांगितले. के. के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक सेवलीकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३१ थकबाकीदारांचे पालिकेने तोडले पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता मनपाने महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, थकबाकी वसुलीसाठी आता थेट पाणीपुरवठा खंड‌ित करण्याची कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता थकबाकीदारावर कारवाई केल्यानंतर पाणीपट्टी थकवणाऱ्यांकडे कारवाईचा मोर्चा पालिकेने वळवला आहे. सूचनापत्र व अंतिम नोट‌िसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या १३१ जणांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ही कारवाई आता सुरूच राहणार असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याने या योजनेच्या कामांसह शहरातील विविध विकासकामे, मनपाचा प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. राज्य सरकारकडून मिळणारा निधी आणि मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतूनच महापालिकेला मोठा निधी मिळत आहे. यामुळे आता प्रशासनाने पाणीपट्टी व मालमत्ताकरावरच्या वसुलीवर भर देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेने मालमत्ता कर वसुली पाठोपाठ पाणीपट्टीपोटी थकबाकीदार असलेल्या ६५ हजार मालमत्ताधारकांचे नळकनेक्शन तोडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या थकबाकीदारांकडे जवळपास १४ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीदारांना नोटीस दिल्यानंतर त्यातील २५ हजार थकबाकीदारांकडून साडेसात कोटींची वसुली मनपाने केली आहे. गेल्या महिन्यापासून यासंदर्भातील कारवाई केली जात आहे. त्यात आतापर्यंत २५ हजार नळकनेक्शनधारकांनी मनपाच्या कारवाईच्या भीतीपोटी थकबाकी भरली असून, ही रक्कम सात ८० लाखांच्या वर गेली आहे. तीन दिवसांपासून या थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांत शहरातील १३१ पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्यात आले आहे. पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांचे प्रगतिपुस्तक- दिंडोरी-पेठ

$
0
0

आमदारांचे प्रगतिपुस्तक


मतदारसंघ ः दिंडोरी-पेठ


वीजप्रश्न सोडविला, पण आदिवासींचा वनवास कायम


दिंडोरी-पेठ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असून, केंद्रामध्ये मोदींची लाट असतानाही दिंडोरी तालुक्याने शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. कादवा साखर कारखान्याभोवतीच मतदारसंघाचे राजकारण फिरत असल्याने मतदारसंघातील रस्ते, पिण्याचे पाणी, औद्योगीकरण, शिक्षणाचा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. औद्योगीकरणाला अनुकूल वातावरण असतानाही त्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांनी तीन वर्षांत मतदारसंघातील विजेचा प्रश्न सोडविण्यात यश मिळविले असले, तरी रस्ते, पाणी, शिक्षण, बेरोजगारी व आरोग्य यांसारख्या सुविधांचा वनवास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे श्रीराम शेटे यांचे या तालुक्यावर राजकीय वर्चस्व आहे.

या ठिकाणी २००४ च्या निवडणुकीत नरहरी झिरवाळ आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु, २००९ च्या निवडणुकीत जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे चिरंजीव धनराज महाले यांनी शिवसेनेच्या तिक‌टिावर निवडणूक लढवून विजय आपल्याकडे खेचून आणला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत धनराज महाले यांना ही जागा टिकवता आली नाही. नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करीत पुनरागमन केले. त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघातील कामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

वीज प्रश्नाला प्राधान्य

या भागातील पेठ तालुक्यात व‌जिेचा प्रश्न गंभीर होता. बऱ्याचदा दिवसभर वीज उपलब्ध होत नसे. ही महत्त्वाची बाब हेरून नरहरी झिरवाळ यांनी हा तालुका प्रकाशमय करण्याचा विडा उचलला. पेठ तालुक्याचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पेठव्यतिरिक्त करंजाळी येथे स्वतंत्र सब स्टेशन (विद्युत उपकेंद्र) कार्यान्वित करण्यात आले. त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागाचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दिंडोरीव्यतिरिक्त कोऱ्हाटे या ठिकाणी विद्युत उपकेंद्र मंजूर करून कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील विजेचा प्रश्न काही प्रमाणावर मार्गी लागल्याचे चित्र दिसून येत आहे.


पाणी योजनांचा पाठपुरावा

दिंडोरी-पेठ मतदारसंघातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध नव्हती, तसेच पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यासाठी शैक्षणिक साहित्याने सुसज्ज असे दिंडोरी येथे १ कोटी रुपये खर्च करून, तसेच करंजाळी येथे ८० लाख रुपये खर्चाचे वाचनालय बांधण्यात आले. वणी शहरात पाणीपुरवठा योजना मंजूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. मांजरपाडा प्रकल्पासाठी झिरवाळ यांनी विविध स्तरांवर प्रयत्न करून योजनेस मंजुरी मिळविली. त्यामुळे पेठ व दिंडोरी तालुक्यांना याचा फायदा होणार आहे. दिंडोरी शहरात अद्ययावत सांस्कृतिक भवन नव्हते. त्याची उण‌ीव आमदार झिरवाळ यांनी भरून काढली. दिंडोरी शहरात १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून आदिवासी सांस्कृतिक भवनाची भव्य इमारत साकारली आहे.

राजकारणाला मर्यादा

पेठ तालुक्यावर काही वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. दिंडोरीत राष्ट्रवादीचे प्राबल्य असले, तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत मात्र शिवसेनेचा दबदबा वाढला आहे. दिंडोरीत असलेला कादवा कारखाना हा राजकारणाचा केंद्रबिंदू समजला जातो. या ठिकाणी श्रीराम शेटेंचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होत असतो. दिंडोरी आणि पेठ हे दोन्ही तालुके अदिवासीबहुल असल्यामुळे येथे बहुजन समाजाच्या राजकारणाला मर्यादा आहेत. दिंडोरी तालुका शेतीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. येथील द्राक्ष, ऊस, फुलशेती प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे येथे नव्याने झालेल्या वायनरींनीही बस्तान बसविले आहे. कृषिसंपन्न असलेला तालुका ऑनलाइन खरेदीतही अग्रेसर आहे. या ठिकाणी भाजप व कॉँग्रेस पक्षाचे फारसे काम नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच प्राबल्य आहे.

प्रस्तावित कामे

दिंडोरीत जनता विद्यालय व कॉलेजसमोर पादचारी उड्डाणपूल उभारणे, पेठ तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे, वणी शहरात अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे, दिंडोरी शहरात जलतरण तलाव उभारणे, पेठचे मॉडेल बसस्थानक बनविणे, दुर्गम भागात दिवाबत्तीची सोय करणे आदी विकासकामे या मतदारसंघात प्रस्तावित आहेत.


मार्गी लावलेली कामे


-डोंगरी विकास निधीअंतर्गत १५ कोटींचे रस्ते

-दिंडोरीत १ कोटी रुपये खर्चून वाचनालय

-दिंडोरीत १ कोटी ३० लाख रुपये खर्चून आदिवासी सांस्कृतिक भवन

-करंजाळी येथे ८० लाख रुपये खर्चून वाचनालय

-मांजरपाडा प्रकल्प मंजुरीत यश

-वणी शहरात ट्रॉमा केअर इमारत पूर्ण

-वणी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला

-करंजाळी येथे स्वतंत्र सब स्टेशन

-कोऱ्हाटे येथे विद्युत उपकेंद्र

-दिवाबत्ती, मोऱ्या, शाळांना संगणक, क्रीडा साहित्य, श्रवणयंत्रे आदी

-आदिवासी भागांत आरोग्य केंद्रांचे बांधकाम

--


या प्रश्नांकडे दुर्लक्ष

दिंडोरी आणि पेठ तालुक्यांत उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नाशिकला यावे लागते. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अभ्यासक्रमांची विविध कॉलेजेस आली, तर येथील विकास होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या भागात टॅलेंट सर्च कॅम्प घेतल्यास अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सापडू शकतील. वणी येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांना त्या प्रमाणात सुविधा मिळत नाही, तसेच ग्रामीण भागात आजही १२ तास वीज नसते. या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा व्हावा, अशीही या भागातील नागरिकांची मागणी आहे. मतदारसंघात रस्त्यांचे जाळे फारसे नाही. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट आहे. मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे.

--


विध‌िमंडळात सहभाग

आमदार नरहरी झिरवाळ यांनी वेळोवेळी दिंडोरी आणि पेठ तालुक्यांचे प्रश्न विध‌मिंडळात मांडले आहेत. पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या ठिकाणी पाणी साठविण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे जास्त पाऊस झाल्यास या ठिकाणी दळणवळण यंत्रणा ठप्प होते. अनेक भागात पुलांची आवश्यकता आहे. त्यासाठीही विधिमंडळात आवाज उठविला. दिंडोरी मतदारसंघ आदिवासीबहुल असल्याने निधीची कमतरता भासू नये यासाठी पाठपुरावा केला. वणी येथे अद्ययावत रुग्णालय व्हावे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांची सोय होईल, त्यासाठीही मागणी केली. तालुक्यात पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी केली आहे.

--

आमदार म्हणतात...

सरकारचा असहकार

असहकाराच्या धोरणामुळे अनेक कामे झालेली नाहीत. पेठ आणि दिंडोरी या तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. येथील खड्डे बुजविण्याचे कामदेखील हाती घेण्यात आलेले नाही. पेठ तालुक्यात अनेक भागांत पावसाळ्यात दळणवळण ठप्प होते. या ठिकाणी पूल व्हावेत यासाठी पाठपुरावा केला. परंतु, त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. शेतीसाठीही पाणी नाही. साठवण तलावांचे प्रस्ताव पाठविले आहेत. परंतु, त्यांना मान्यता मिळालेली नाही. दिंडोरी मतदारसंघात एमआयडीसी, वणी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागात रुग्णालय झाले, तर वणी येथे येणाऱ्या भाविकांचीही सोय होणार आहे. या ठिकाणी मेड‌किल कॉलेज व्हावे यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत.

- नरहरी झिरवाळ, आमदार, दिंडोरी-पेठ

--


विरोधक म्हणतात...

ठोस कामे करण्यात अपयश

आमदार नरहरी झिरवाळ हे ठोस कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. दिंडोरी-पेठ हा मतदारसंघ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. ग्रामीण भाग शहराशी जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणू, असे सरकारने जाहीर केले. परंतु, या मतदारसंघातील खड्डे बुजवायलादेखील सरकारने निधी दिलेला नाही. तेव्हा नवीन रस्ते कसे होतील, हा मोठा प्रश्न आहे. या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या काही वर्षांत यासाठी ठोस उपाययोजना मतदारसंघाच्या वाट्याला आलेल्या नाहीत. अनेक गावे आजही तहानलेली आहेत. आमदारसाहेब म्हणतात, आमचे सरकार नसल्याने योजना मार्गी लागत नाहीत. हे म्हणणे चुकीचे आहे. आपण किती पाठपुरावा करतो यावर कामे अवलंबून असतात. कामांचा पाठपुरावा करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

-धनराज महाले, माजी आमदार

--

शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यू आवाक्याबाहेर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाने उसंत देऊन थंडी सुरू झाली असली तरी, शहरातील डेंग्यूचा प्रकोप मात्र कायम आहे. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूने रेकॉर्ड केले होते. नोव्हेंबरमध्ये तो आवाक्याबाहेर गेला आहे. पहिल्या बारा दिवसांत शहरात डेंग्यू संशयितांची संख्या २७१ वर पोहचली आहे. बारा दिवसांत डेंग्यूचे १२६ रुग्ण पॉझ‌िट‌िव्ह आढळून आल्याने शहरातील डेंग्यूने राज्यात तिसरा नंबर मिळवला आहे. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य आता रामभरोसे झाले असून, सत्ताधाऱ्यांचा आरोग्य विभागावर अंकुश नसल्याचे चित्र आहे.

नाशिक शहरात १७६ कोटींचा घंटागाडी ठेका आणि १९ कोटींचा पेस्ट कंट्रोलचा ठेका देऊनही नाशिककरांच्या आरोग्याचा खेळ मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूने शहरात थैमान घातले असताना पालिकेच्या उपाययोजना कागदारवर मात्र जोरात आहेत. एकीकडे आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना डेंग्यूचा प्रकोप कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या चार मह‌िन्यांच्या आकडेवारीनुसार डेंग्यू कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९७ रुग्ण सापडले होते. सप्टेंबर महिन्यात हा आकडा आणखी वाढून १०५ वर पोहोचला होता. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू संशय‌ितांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नाशिकसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर आणि थंडीची चाहूल लागल्याने डेंग्यूची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा होती.

नोव्हेंबरमध्ये पहिल्या बारा दिवसांतच शहरात डेंग्यूचे १२६ रुग्ण पॉझ‌िटिव्ह आढळून आले आहेत. संशय‌ितांचा आकडा २७१ पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. चालू मह‌िन्यात अजून १८ दिवस शिल्लक असून, डेंग्यू संशय‌ितांचा आकडा पाचशेच्या पार जाणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वतीने डेंग्यूबाबत जनजागृती केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी, तो वाढलेल्या आकडेवारीवरून फोल ठरला आहे. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य आता रामभरोसे झाल्याचे चित्र आहे.

..म्हणे ३० टक्के घट!

शहराच डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा मलेरिया विभाग मात्र आकड्यांच्या खेळात अडकला आहे. गेल्या वर्षापेक्षा डेंग्यूचे प्रमाण तीस ते पस्तीस टक्के कमी असल्याचा दावा डॉ. राहुल गायकवाड यांनी केला आहे. तसेच प्रबोधन व जनजागृती केली जात असून, आता डेंग्यू नागरिकांच्या घरातच शिल्लक राह‌िल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे डेंग्यूच्या रुग्णांबाबत नाशिक हे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असतानाही अधिकारी नाशिककरांची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत.

मह‌िना डेंग्यू रुग्ण

जुलै १९

ऑगस्ट ९७

सप्टेंबर १०५

ऑक्टोबर २४८

नोव्हेंबर (दि. १२पर्यंत) १२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ पासून वाजणार सनई-चौघडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानवी जीवनातील १६ संस्कारांपैकी महत्त्वाच्या असणाऱ्या विवाह सोहळ्यास यंदा २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना मध्यावर आला असतानाच तुळशीचे लग्नही उरकले असून, आता सनई-चौघड्यांचे स्वर पुन्हा एकदा गुंजणार आहेत. पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ६० विवाह मुहूर्त आहेत.

दि. २१ नोव्हेंबरपासून मुहूर्त सुरू होत असल्याने त्या दृष्टीने लगीनघरी आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. मंगल कार्यालये, लॉन्स, बॅण्ड, टेंट हाऊस, केटरिंग, फुलमाळा आदींच्या बुकिंगसाठी संबंधितांची धांदल उडाली आहे. सराफ बाजारात मंगळसूत्र, अंगठी व अन्य दागिन्यांची मागणी वाढली आहे. वधू-वरांच्या पसंतीने कपडे खरेदी होत आहे. पालकही आपल्या उपवर मुलामुलींचे विवाह याच काळात जमावेत म्हणून धावपळ करताना दिसत आहेत.

--

दीड महिन्यात दहा मुहूर्त

गतवर्षीच्या तुलनेत यंदा काहीसे कमी विवाह मुहूर्त आहेत. यंदा नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये एकूण १० मुहूर्त आहेत. जानेवारी महिन्यात लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे वधु-वरपित्यांना फेब्रुवारी उजाडू द्यावा लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ६, मार्च महिन्यात ७, तर एप्रिल महिन्यात ८ मुहूर्त आहेत. मात्र, सध्या मुहूर्तापेक्षाही सर्वांना सवड ज्या वारी आहे तो लग्नवार, असा प्रघात पडत चालला आहे.

--

डिसेंबर २०१८ पर्यंतचे विवाह मुहूर्त

--

नोव्हेंबर- २१, २३, २५, २८, २९

डिसेंबर- ३, ४, १०, ११, १२

जानेवारी- एकही विवाह मुहूर्त नाही.

फेब्रुवारी- ५, ९, ११, १८, १९, २०

मार्च- ३, ४, ५, ६, १२, १३, १४

एप्रिल- १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०

मे- १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२

जून- १८, २३, २८, २९

जुलै- २, ५, ६, ७, १०, १५

डिसेंबर- २, १३, १७, १८, २२, २६, २८, २९, ३०, ३१

--

यंदा विवाहाचे ६० मुहूर्त आहेत. गेल्या वर्षी ही संख्या अधिक होती. मुहूर्त अधिक होते. जानेवारी महिन्यात तर एकही मुहूर्त नाही. तुळशी विवाहानंतर मुहूर्तांना प्रारंभ झाला आहे. परंतु, २१ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

-अमोलशास्त्री किरपेकर, पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेच्या बैठकीत ठेकेदारावर चर्वितचर्वण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील फैलावत जाणाऱ्या डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या आरोग्य यंत्रणेला कामाला लावण्याऐवजी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मंगळवारी ठेकेदारांच्या प्रश्नांबाबतच आदळआपट केल्याने स्वच्छतेबाबतची बैठकच भरटकली.

डेंग्यू तसेच अस्वच्छतेवर उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येकानेच ठेकेदाराच्या चुकांवर बोट ठेवण्यास प्राधान्य दिल्याने स्वच्छतेची बैठक थेट आरोग्य अधिकाऱ्याचा पदभार काढण्यापर्यंत गेली. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार करत, आपल्याच पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याची बाब उघड केली. नगरसेवकांच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या महापौर रंजना भानसी यांनी थेट आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांचा कार्यभार काढून घेण्याचे पत्र आयुक्तांना देणार असल्याचे स्पष्ट केले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृनेते दिनकर पाटील, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, शहर सुधार समितीचे भगवान दोंदे, विधी समितीच्या शीतल माळोदे, आरोग्य समितीचे सतीश कुलकर्णी यांच्यासह सहा प्रभाग समिती सभापती व नगरसेवक उपस्थित होते. आरोग्य व स्वच्छतेसंदर्भातील बैठकीत प्रामुख्याने डेंग्यू नियंत्रण व स्वच्छतेच्या उपाययोजनांवर चर्चा होईल, असे अपेक्षित होते. परंतु, प्रभाग समिती, स्थायी समिती, आरोग्य समितीच्या बैठकीत पेस्ट कंट्रोल ठेकेदार काम करत नाही, घंटागाडी येत नाही, ठेका रद्द करा या विषयांवरच चर्वितचर्वण झाले. दोन तासांच्या बैठकीत ठोस चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांवर कारवाई करा, यापलिकडे बैठक सरकलीच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही बैठक गांभीर्याने न घेता, काढता पाय घेतला.

औषध फवारणी, धूर फवारणी, घंटागाडी आदी कामांच्या ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवरच दोन तास चर्चा करण्यात आली. प्रभागात औषध आणि धूर फवारणी वेळच्या वेळी होत नसल्याच्या तक्रारी उपस्थित नगरसेवकांनी केल्या. यावेळी महापौरांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना फैलावर घेत औषध फवारणी आणि धूर फवारणीच्या ठेक्यावर किती खर्च होतो, असा प्रश्न केला. हा ठेका १९ कोटींपर्यंत असल्याचे स्पष्ट करीत ठेकेदाराकडील २३८ कर्मचारी या कामासाठी कार्यरत असल्याचे स्पष्टीकरण डॉ. बुकाने यांनी दिले. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी डॉ. बुकाने यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली. सिडकोतील एकाच गल्लीत डेंग्यूचे ५५ रुग्ण आढळल्याचे सांगत मलेरिया ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी केली. संबंधित ठेकेदाराला दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे डॉ. राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केले. या नोट‌िसांच्या उत्तराची वाट न बघता विहीत कालावधीत समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधितांचा ठेका तातडीने रद्द करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

६० टक्के फवारणीत पाणी

धूर फवारणीमुळे डास मरतच नसल्याचे डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले. औषधांमध्ये ६० टक्के पाणी मिसळून फवारणी केली जात असल्याने ती परिणामकारक ठरत नसल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेकडून ठेकेदाराला औषध दिले जाते. परंतु, ठेकेदार पुढे औषधांचे काय करतो, असा प्रश्न उपस्थित करत सर्व गोलमाल असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आस्थापना परिशिष्टावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांची ७२ पदे तातडीने भरावीत, अशीही मागणी त्यांनी केली.


पेस्ट कंट्रोल ठेका रद्द करा

धूर फवारणी व औषध फवारणीसाठी महापालिकेने तीन वर्षांसाठी १९ कोटींचा पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला आहे. परंतु, ठेकेदार महापालिकेला जुमानत नसल्याने संबंधिताचा ठेका रद्द करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. संबंधित ठेकेदार किमान वेतन देत नाही, प्रत्येक प्रभागात फॉगिंग मश‌िन पुरवत नाही. त्यामुळे कराराचा भंग झाला असून, त्याचा ठेका रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. त्यावर ठेकेदाराला दोन वेळा नोटीस दिली असून, त्यानंतर आता ठेका रद्द करण्याचीच प्रक्रिया सुरू करा, असे आदेश महापौरांनी दिलेत.


चहापाणी करतो, तरी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बैठकीत भाजपच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांनीच भाजपच्या कारभाराची पोलखोल केली. आरोग्य विभागाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत त्या म्हणाल्या की, स्वच्छता अधिकाऱ्यांना आपण चहापाणी करुनही ते समस्यांकडे दुर्लक्ष करतात. आम्ही सहकार्य करतो, पण ते सहकार्य कधीही करीत नाहीत. तक्रार करूनही घंटागाडी मिळत नाही. नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. यापुढे हा कचरा उचलून डॉ. बुकानेंच्या कक्षात टाकला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील धार्डेदिगर शिवारापासून सुरुवात करण्यात आली. या वेळी नाल्यात उतरून वनराई बंधारा श्रमदानासाठी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, नितीन पवार, उपसभापती विजय शिरसाठ व पंचायत समिती कळवणचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांसह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांनी योगदान दिले.

कळवण तालुक्यातील वनराई बंधारे उपक्रमाला धार्डेदिगर ग्रामपंचायतमधील बरड पाडा ताकबारी धरणातील नाल्यावर ४० फूट रुंद मातीनाला वनराई बंधारा बांधण्यात आला. सुमारे विभागीय आयुक्त यांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने गाव परिसरात किमान ५ वनराई बंधाऱ्याची बांधणी श्रमदानातून करायची आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गट, स्वयंसेवी संस्था अशा विविध सामाजिक घटकांचा व लोकसहभाग महत्त्वाचा समावेश करून गाव परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल यासाठी प्रयत्न करावयाचे असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले आहे.

उपक्रमाला जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, नितीन पवार, उपसभापती विजय शिरसाठ, गटविकास अधिकारी बहिरम यांच्या समवेत सरपंच ललिता जाधव, कनिष्ठ अभियंता के. आर. चव्हाण, उपसरपंच काशिनाथ बहिरम, ग्रामसेवक एस. वाय. महाले, सचिन मुठे, सुनीता देशमुख, दीपक देशमुख, पोपट बहिरम, त्रंबक ठाकरे, सीताराम देशमुख, शिवराम चौधरी, शांताराम बहिरम, वाळू बर्डे, विश्वनाथ बर्डे, उत्तम बहिरम, रत्नाकर भोये, राजेंद्र पवार, सुरेश बहिरम, भाऊसाहेब भोये, पंडित चव्हाण, साहेबराव चव्हाण, राम बहिरम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांचा मैला थेट नदीपात्रात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वालदेवी नदीत देवळालीगाव, विहितगाव, वडनेर, चेहेडी येथे गटारींचे पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मैलादेखील नदीत सोडला जात असल्याने या नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे देवळालीगावातून वाहणारी वालदेवी नदी प्रदूषणमुक्त करून घाट बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या नदीवर वालदेवी धरण असून, त्यातून नियमित पाणी सोडले जाते. मात्र, त्याचा उपयोग काठावरील नागरिकांना होत नसल्याची स्थिती आहे. परिसरातील नदीपात्रात डुकरे डुंबत असतात. त्यामुळे रोगराई फैलावण्याचा धोका वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास व माश्यांचा उपद्रव वाढल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. या नदीच्या दुरवस्थेबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित करून नाशिक ग्रीन अॅण्ड क्लीन क्लबतर्फे उदय थोरात यांनी निवेदन दिलेले आहे.

विविध घटकांचा पुढाकार

वालदेवी स्वच्छता मोहिमेसाठी प्रभाग सभापती सुमन सातभाई, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सरोज आहिरे, सुनीता कोठुळे, केशव पोरजे आदींनी पाठिंबा दिला आहे. नाशिक ग्रीन अॅण्ड क्लीन क्लबतर्फे जनता दरबारात वालदेवी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे.


प्रभाव तात्पुरता

सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, पर्यावरणवादी व महापालिका यांच्याकडून वालदेवी स्वच्छतेसाठी अनेकदा मोहिमा घेण्यात आल्या. मात्र, तेवढ्यापुरतीच नदी स्वच्छता होते. कारण, मलजल वाहिन्या थेट नदीपात्रात सोडल्याने या मोहिमेचा परिणाम हा तात्पुरताच राहतो. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रत‌िन‌िधी , नाशिक

मेहनत आणि कल्पकतेव्दारे कृषी संशोधन व कृषी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी युवक आणि महिलांचा गौरव करण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘कृषीथॉन युवा सन्मान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रयोगशील युवा शेतकरी (पुरुष व महिला), प्रयोगशील युवा कृषी संशोधक, प्रयोगशील युवा कृषी उद्योजक या तीन गटात या पुरस्कारांचे वितरण होणार, अशी माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

या पुरस्कारासाठी विविध जिल्ह्यातून प्रस्ताव प्राप्त झाले होते. पुरस्कार निवड समितीत राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी सहसंचालक डॉ. सतीश भोंडे व ज्येष्ठ कृषीशास्रज्ञ डॉ. जयराम पुरकर निर्णयानुसार या पुरस्कारांची निवड करण्यात आली.

पुरस्कार पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (पुरुष गट ) : योगेश पवार (नाशिक विभाग), अप्पा कारमकर (पुणे विभाग), विष्णू मुसळे (औरंगाबाद विभाग ), राहुल रौंदळ (अमरावती विभाग ), राहुल सुपारे (नागपूर विभाग)

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (महिला गट ) : ज्योत्स्ना सुरवाडे (नाशिक विभाग ), विभावरी जाधव (पुणे विभाग), रेखा वहाटूळे (औरंगाबाद विभाग ), श्रद्धा पोतदार ( कोकण विभाग ), कल्पना दामोदर (अमरावती विभाग ), रुपाली पाटील (नागपूर विभाग )

प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार : डॉ. अंकुश चोरमुले (नाशिक विभाग), डॉ. मिलिंद जोशी (पुणे विभाग), डॉ. अर्चना कवडे (औरंगाबाद विभाग ), दीपक क्षीरसागर (कोकण विभाग ), डॉ. दिप्ती वानखेडे (अमरावती विभाग), डॉ. स्मित रमेश लेंडे (नागपूर विभाग )

प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार : सरोजिनी फडतरे (नाशिक विभाग ), रोहन उरसळ (पुणे विभाग ),

अभिजित वाडेकर (औरंगाबाद विभाग ), समृद्धी परांजपे (कोकण विभाग), उद्धव नेरकर (अमरावती विभाग ), ब्रम्हानंद पांगुळ (नागपूर विभाग)

विशेष गौरव पुरस्कार : डॉ. अमित शर्मा (युवा कृषी संशोधक–करणाल, हरयाणा),

आकाश चौरसिया (युवा शेतकरी–सागर, मध्य प्रदेश), रोकडेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनी, निमगाव ता. सिन्नर (आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी), भागवत बलक(उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी-वडगाव ता. सिन्नर )

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन आराखडा ९०० कोटींचा

$
0
0

पुढील महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१८-२०१९ चा आराखडा बनविण्याचे काम नियोजन विभागाने सुरू केले आहे. पुढील वर्षासाठी साधारणपणे ९०० कोटींचा संभाव्य आराखडा असून, विविध विभागांकडून नियोजन विभागाने प्रस्ताव मागविले आहेत. या आराखड्यात सरकारकडून ५० कोटींची वाढ अपेक्षित आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत हा आराखडा सादर केला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून सर्वसाधारण योजनांसाठी सुमारे ३२१ कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी ४८१ कोटी, तर अनुसूचित जाती उपयोजनांवर ९७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्वसाधारण योजनेत मुख्यमंत्री ग्राम सडक, ग्रामपंयातींना सहायक अनुदाने, सुक्ष्म सिंचन योजना, ग्रामीण रूग्णालयांचे विस्तारीकरण, नाविन्यपूर्ण योजनांसाठी हा न‌धिी प्रस्तावित आहे. आदिवासी योजनेत ठक्कर बाप्पा योजना, ग्रामीण स्वच्छता अभियान, लघु पाटबंधारे योजना तर अनुसुचित जाती योजनेत दलित वस्ती सुधार योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा फी, ग्राम स्वच्छता अभियान आदि योजनांसाठी निधी प्रस्तावित केला जातो. गतवर्षी ८७३.२७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातव्या दिवशीही चालला हातोडा

$
0
0

१६ धार्मिक स्थळे हटविली; बागवान पुरात तणाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधातील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची सातव्या दिवशी सुरूच राहिली. मंगळवारी १६ अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जुने नाशिक परिसरातील बागवान पुरात कारवाईदरम्यान मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. पालिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करीत भाविकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. परंतु, पोलिस बळावर महापालिकेने विरोध मोडीत काढत कारवाई पूर्ण केली. आतापर्यंत १५० पैकी १३० अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईत पालिकेला यश आले आहे.

हायकोर्टाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कारवाईच्या सातव्या दिवशी जुने नाशिक भागातील संवेदनशील समजल्या भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांकडे महापालिकेने मोर्चा वळविला. नानावली येथून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. येथील कोळीवाडा परिसरातील धार्मिक स्थळ हटविण्यात आल्यानंतर शिवनेरी चौक भागातील दोन अनधिकृत धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. बागवान पुरात असलेल्या धार्मिक स्थळाबाबत परिसरातील नागरिकांनी पालिकेने कारवाई न करता स्वत:हून हटविण्याचा आग्रह धरला. यासाठी महापालिकेने वेळ द्यावा, अशी मागणी संबंधितांकडून

करण्यात आली. परंतु, महापालिकेने १५ दिवसांपूर्वीच नोटिसा दिलेल्या असल्याने आता अधिक वेळ देता येणार नाही, असे सुनावत अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केल्याने याठिकाणी स्थानिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. सदर धार्मिक स्थळ पुरातन असून यासंदर्भातील वाद न्यायप्रविष्ठ असल्याने पालिकेने कारवाई करू नये, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. परंतु, न्यायालयाचे कुठलेही स्थगिती आदेश नसल्याने कारवाई क्रमप्राप्त असल्याची भूमिका पथकातील अधिकाऱ्यांनी घेतल्याने याठिकाणी गोंधळाला सुरूवात झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत विरोधकांना शांत करत पोलिस बळावर ही कारवाई पूर्ण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालये ग्राहकांसाठीच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील सहा ही पेट्रोलपंपावरील शौचालय सार्वजनिक वापरासाठी १३ पासून खुले करण्यात आले असल्याची अधिसूचना मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी प्रसिद्धीस दिली असतांना सटाणा पेट्रोलपंप चालकांनी सदरच्या अधिसुचनेस विरोध केला आहे. पेट्रोल पंपावरील शौचालये ही केवळ आमच्या ग्राहकांसाठीच असतील असा ठाम निर्धार केल्याने संबंधित वादाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

सटाणा नगरपरिषदेने अधिसुचनेनुसार १३ नोव्हेंबरपासून सटाणा शहरातील पेट्रोलपंप सार्वजनिक जनतेसाठी खुले केल्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील पेट्रोल चालकांनी यांस विरोध दर्शविला आहे.

स्वच्छ भारत अभियानामध्ये सटाणा शहराच्या सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या तरतुदी अनुसार शहरातील सहाही पेट्रोल पंपावरील शौचालय सामान्य लोकांच्या वापरांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती सटाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी दिली एका अधिसुचनेद्वारे दिली आहे.

तर दुसरीकडे शहरातील सर्वच पेट्रोलपंप चालकांनी या अधिसूचनेला विरोध करतांना शहरात असलेल्या पेट्रोल पंपावरील शौचालये ही केवळ आमच्या ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे ही शौचालये सार्वजनिक पातळीवर खुली करण्यास आमचा विरोध असणार आहे. बुधवारी पेट्रोलपंप चालकांच्या वतीने देण्यात येणार आहे. यामुळे पालिका व पेट्रोलपंप चालकांमध्ये संघर्षनिर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. सटाणा पालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेला पेट्रोल पंप चालकांचा विरोध कायम आहे.
पेट्रोलपंपावरील शौचालये ही केवळ आमच्या ग्राहकांसाठीच खुली असतील सार्वजनिक जनतेसाठी आमचा विरोध असणार आहे.

- प्रल्हाद पाटील, अध्यक्ष, पेट्रोल डिलर असोशिएशन, सटाणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळे बांधण्यास स्थगिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नसताना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन ६२ गाळे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मंगळवारी दुपारी बाजार समितीत येऊन पाहणी केली आणि येथे गाळे तयार करण्यास स्थगिती दिली.
बाजार समितीमधील जुन्या दोन सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून त्याच‌े पॅकिंग व्यापारी करतात. या सेलहॉलचा १२ व्यापारी वापर करतात. व्यापाऱ्यांचे लायसन्सचे नुतनीकरण झाले आहे, त्यांची वर्षभराची मुदत संपलेली नाही. तरीही तेथे ६२ गाळे बांधण्याचा घाट बाजार समितीने घातला. त्यास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आले. त्यांचे गाळे सील करण्यात आले. या निर्णयास विरोध करीत व्यापाऱ्यांनी लिलावही बंद पाडले होते.
व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी १२ बाय २५ फूट आकाराचे गाळे बनविणे सुरू केले होते. या कामासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक होती. मात्र, त्यांना तसा प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. असे असताना या सेल हॉलचे जुने शेटर तोडण्यात आले. नवीन शेटर बसून १२ बाय २५ फूट या आकाराचे गाळे तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले. बाजार समितीला अंतर्गत कामकाजासाठी ५० हजार रुपयांपर्यंत काम करण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त रकमेच्या कामकाजासाठी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही हे काम सुरू करण्यात आले.

जिल्हा उपनिबंधकांनी पाहणी केली. शेतकरी या ठिकाणी शेतमाल आणतात, म्हणून व्यापारी, अडते व्यवसाय करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कामकाज करावे, अशा शब्दात जिल्हा उपनिबंधक करे यांनी बाजार समिती प्रशासनाला फटकारले. यावेळी सभापती शिवाजी चुंभळे, सचिव महेंद्र निकाळे, कनिष्ठ अभियंता आर. जी. रहाडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टॉर्क २०१७’ नोंदणीस आज अखेरची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि स्पेक्ट्रम यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टॅलेंट रिवॉर्ड एक्झाम २०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात नोंदणीसाठी बुधवार (दि. १५) अखेरची मुदत देण्यात आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांमधील प्रतिभा आणि बौद्धिक गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा ही परीक्षा १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील विज्ञान, गणित आणि मानसिक क्षमता या विषयांचा समावेश राहणार आहे. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येईल. यामध्ये ७५ प्रश्नांचा समावेश असेल. इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा होणार आहे. बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न यात राहतील. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगही लागू राहणार आहे.
तीन वर्षांपासून या परीक्षेचे आयोजन केले जात आहे. नाशिकमधूनही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रम रोख १० हजार रुपये, रोख ७ हजार रुपये आणि रोख ५ हजार रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पहिल्या शंभर क्रमांकात असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही देण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भात माहिती देताना स्पेक्ट्रमचे कपिल जैन यांनी सांगितले की, ‘टॅलेंट रिवार्ड एक्झाम’ चा उद्देश दहावीनंतर होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे यासाठी तयारी करवून घेणे हा आहे.

स्पर्धा सहभागासाठी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १०० रुपये परीक्षा शुल्क आहे. विद्यार्थ्यांनी दोन रंगीत फोटो, शाळेच्या ओळखपत्राची झेरॉक्स या अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अर्ज स्पेक्ट्रमच्या गंगापूर रोड आणि नाशिकरोड शाखेत उपलब्ध आहे. रविवारच्या दिवशीही विद्यार्थी या उपक्रमासाठी नाव नोंदणी करू शकतात. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ३ डिसेंबर रोजी रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजच्या जवळ, गंगापूर रोड येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादूचे प्रयोग अनुभवची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
असाध्य गोष्टी साध्य होताना पहायचे तर जादूच्या प्रयोगांमध्येच. जादूचे प्रयोग आपल्याला आश्चर्यचकीत करतात; परंतु त्याचबरोबर कुतुहलही निर्माण करतात. अशाच जगप्रसिद्ध जादुच्या प्रयोगांची सफर महाराष्ट्र टाइम्स घडविणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. १७) खास ‘मॅजिक शो’चे आयोजन करण्यात आले आहे. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी सात वाजता हा अत्यंत रंजकदार शो होणार असून कल्चर क्लब सदस्यांना सवलतीच्या दरात या शोचा आनंद लुटता येणार आहे.

जादुच्या क्षेत्रात गेल्या नऊ पिढ्यांपासून हुकुमत गाजविणारे सरकार कुटुंब एक दंतकथाच बनले आहे. ‘बंगाल का जादू’ या विशेषणाने सुरू झालेला प्रवास जगभरात मॅजिक ऑफ इंडिया या नावाने प्रसिद्ध आहे. पी. सी. सरकार (सिनिअर) यांनी खऱ्या अर्थाने या जादूच्या प्रयोगांना तीन तासाच्या खेळात गुंफले. त्याचे प्रयोग जगभरात पोहोचले. सरकार यांची युवा पिढी जादूगार पौरुष यांच्या माध्यमातून पुढे आली असून आजच्या डिजिटल एंटरटेनमेंटच्या जमान्यात भावी पिढीला पी. सी. सरकार पौरुष आपल्या ‘स्टेज शो’द्वारे अहोरात्र प्रयत्न करून पुन्हा जादू या वैभवशाली कलेची ओळख करून देत आहेत. सरकार यांचे जादूचे प्रयोग नाशिककरांना पहावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे तिकीट दर ७००, ५०० आणि ३०० रुपये आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांना कुठल्याही एका तिकिटावर ५० टक्के सूट मिळणार आहे. कल्चर क्लब सदस्यांना कालिदास कलामंदिरातील बुकिंग ऑफिसमधून सकाळी ९ ते १२ तसेच सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत तिकिटे उपलब्ध होतील. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबचे कार्ड दाखवणे आवश्यक आहे.

नव्या सदस्यांना फ्री पासेस

महाराष्ट्र टाइम्सच्या कॉलेजरोड येथील कार्यालयात कल्चर क्लबचे नव्याने सदस्य होणाऱ्या नागरिकांना मॅजिक शो चे २ पासेस फ्री दिले जाणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images