Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘वसाका’च्या पाठीशी राहा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगामाच्या माध्यमातून मोठ्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. कामगारांसह कारखान्याचे भवितव्य पूर्णतः वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्याच हातात आहे. या ऐतिहासिक पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी वसाकाच्या पाठ‌ीशी उभे रहा, असे भावनिक आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

वसाकाच्या ३१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी माजी अध्यक्ष संतोष मोरे यांच्यासह ३१ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. आहेर बोलत होते. जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देण्यासाठी प्राध‌िकृत मंडळ कटिबद्ध असून कोणत्याही भूलथापांना, अमिषाला बळी न पडता ऊस उत्पादक बांधवांनी वसाकालाच ऊस द्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वसाकाचा ३१ वा गळीत हंगाम सुरू करण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. वसाका कार्यक्षेत्राबरोबरच कार्यक्षेत्राबाहेरून ऊस गाळपास आणून साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आसवनी प्रकल्पासह सहवीजनिर्मिती प्रकल्पदेखील १७ मेगावॉटने चालविण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाचे ६ कोटींचे अनुदान कारखान्याला मिळणार आहे, अशी माहिती आमदार आहेर यांनी दिली. कळवण येथील ऊस उत्पादक शेतकरी गंगाधर पगार यांनी अहिराणीतून भाषण करून कसमादे परिसरातील सहकारातील एकमेव वास्तू असलेल्या वसाकालाच ऊसपुरवठा करून उर्जितावस्था आणण्याचे भावनिक आवाहन केले. वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, प्राधिकृत अधिकारी केदा आहेर, धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, नितीन पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले.

अश्रू अनावर…

वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या स्व. दौलतराव आहेर यांचे स्वप्न आज पूर्णत्वास येत असले, तरी त्यांची उणीव आजच्या कार्यक्रमात जाणवत आहे. त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऊस उत्पादक बांधवानी वसाकालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करताना डॉ. राहुल आहेर यांना अश्रू अनावर झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सावाना’‌त वाघांची सरशी

$
0
0

फेरमतमोजणीत धनंजय बेळेंवर तीन मतांनी विजय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाच्या फेरमतमोजणीत ग्रंथमित्र पॅनलच्या बी. जी. वाघ यांचा तीन मतांनी विजय झाला. त्यांना ८९७ मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी जनस्थान पॅनलचे धनंजय बेळे यांचा पराभव झाला असून त्यांना ८९४ मते पडली. या निकालामुळे ग्रंथमित्र पॅनलला एकहाती सत्ता मिळाली असून, त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या १७ वरून १८ झाली आहे.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना फेरमतमोजणीचा अधिकार नसल्याने त्यांना फेरमतमोजणी घेण्यास मनाई करावी अशा आशयाचा धनंजय बेळे यांचा अर्ज दिवाणी न्यायलयाने फेटाळल्याने धनंजय बेळे आणि भालचंद्र वाघ यांच्यात फेरमतमोजणी करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार मंगळवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ही फेरमतमोजणी घेण्यात आली.

सकाळी ८ वाजता फेरमतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. सीलबंद मतपेट्या औरंगाबादकर सभागृहात आणण्यात आल्या. त्यानंतर पार पडलेल्या अनेक सोपस्कारानंतर ८.४५ वाजता फेरमतमोजणीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. प्रारंभीच धनंजय बेळे यांचे प्रतिनिधी सुरेश गायधनी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना ही फेरमतमोजणी बेकायदेशीर असून, ती मान्य नसल्याचे पत्र दिले. भणगे यांनी ते पत्र स्वीकारून त्यावर नंतर विचार करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर मतमोजणीच्या आठ फेऱ्या झाल्या. या आठ फेऱ्यांमध्ये कधी धनंजय बेळे पुढे तर कधी बी. जी. वाघ यांना मताधिक्य आढळून आले. शेवटी आठ फेऱ्यांनंतर १२.१५ वाजता वाघ तीन मतांनी पुढे असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शहानिशा झाल्यावर १.०५ वाजता भणगे यांनी निकाल जाहीर केला. त्यानुसार बी. जी. वाघ हे तीन मतांनी निवडून आले. निकाल जाहीर होताच ग्रंथमित्र पॅनलने एकच जल्लोष केला. उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते वाघ यांचा सत्कार करण्यात आला.

फेऱ्यांनिहाय मोजणी

धनंजय बेळे यांना पहिल्या फेरीत १२१ तर बी. जी. वाघ यांना पहिल्या फेरीत ११५ मते पडली. दुसऱ्या फेरीत बेळे यांना १०९, वाघ यांना १२४, तिसऱ्या फेरीत बेळे यांना १२०, वाघ यांना ११९, चौथ्या फेरीत बेळे ११४, वाघ १२६, पाचव्या फेरीत बेळे ११४, वाघ १२६, सहाव्या फेरीत बेळे १२१, वाघ ११६, सातव्या फेरीत बेळे यांना ११८ तर वाघ यांना १२० मते पडली तर आठव्या फेरीत बेळे यांना ६४ तर वाघ यांना ६९ मते पडली. निकालासाठी बेळेंना ८९४ तर वाघ यांना एकूण ८९७ मते पडली. एकूण मते १९९५ होती पैकी १११ मते बाद होती. १८८४ मते मोजायची होती.

मी निवडणूक प्रक्रियेचा आदर करतो. सावानाशी माझे फार जुने ऋणानुबंध आहेत. यश-अपयश हा वेगळा भाग आहे. या विजयाकडे मी तटस्थपणे पाहतो. विजयामुळे हुरळून जाण्याचे काही कारण नाही. हा विजय पॅनलचा आहे, असे मी समजतो. मी अनेकदा या प्रक्रियेतून माघार घेण्याचा प्रयत्न केला परंतु निवडणूक प्रकिया सुरू झाल्यामुळे तसे करता येत नव्हते. मात्र माझे वाचनालयावर फार प्रेम आहे.

- बी. जी. वाघ, विजयी उमेदवार

अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. ही सर्व निकाल लावून घेण्याची धडपड होती. दोन दिवसांपूर्वी मतपेट्या फोडण्यात आल्या होत्या. कामकाज पाहणाऱ्यांचे संगनमत होते. सर्वांच्या संगनमताने हे घडले आहे. नाशिककरांना हा निकाल माहीतच होता. पुढील निर्णय वकिलांशी बोलून घेण्यात येईल. निवडून आलेल्या वाघ यांचे मी अभिनंदन करतो.

-धनंजय बेळे, पराभूत उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका वर्धापन‌दिनाचा फियास्को

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमांबाबत नाशिककरांसोबतच प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड निरुत्साह दिसून आला. पदाधिकाऱ्यांनी किरकोळ कार्यक्रमांना हजेरी लावून मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमांपासून लांब राहणेच पंसत केले. गायकवाड सभागृहातील मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमाला फक्त शंभर लोकांनी हजेरी लावल्याने संपूर्ण वर्धापन दिन कार्यक्रमाचा फियास्को झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यातील ५० जण हे अधिकारी व कर्मचारी होते. त्यामुळे वर्धापन दिनावर केलेला खर्चही वाया गेला आहे.

मंगळवारी पालिकेचा ३५ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी महापौरांच्या हस्ते सत्यनारायणाची विधिवत पूजा करण्यात आली. उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, मनसेचे गटनेते सलीम शेख, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांचेच रक्तदान करण्यात आले. सायंकाळी मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आरएम ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पालिकेचा मुख्य सोहळा असल्याने या ठिकाणी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावणे आवश्यक होते. निदान उद््घाटन तरी महापौर करतील अशी अपेक्षा होती. परंतु, महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अंतर राखले. त्यामुळे शहर सुधारणा समितीच्या सभापतींसह अतिरिक्त आयुक्तांकडून कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. या सोहळ्याला केवळ शंभरच्या आसपास लोकांनीच उपस्थिती लावली. त्यातील निम्मे लोक हे अधिकारी व कर्मचारीच होते. अवघे ५० च्या आसपास प्रेक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला गर्दी दिसावी म्हणून पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु, कार्यक्रम सुरू झाला तरी कर्मचारी उपस्थित नव्हते. कार्यक्रम संपत असताना फक्त ५० ते ६० कर्मचारी सभागृहात हजर होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार आहे. त्यामुळे निम्मे कर्मचारी उपस्थित राह‌िले असते तरी कार्यक्रम यशस्वी झाला असता. परंतु, पदाधिकाऱ्यांपाठोपाठ कर्मचाऱ्यांनीही प्रचंड अनास्था दाखवल्याने कार्यक्रमाचा फियास्को झाला.

फिरती प्रयोगशाळा अर्पण

अगस्त्य फाउंडेशन व एबीबी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिका शाळांसाठी तिसरी फिरती प्रयोगशाळा बस या वाहनाचा लोकार्पण सोहळा सकाळी अकरा वाजता महापौर रंजाना भानसी यांचे हस्ते राजीव गांधी भवन येथे झाला. या प्रयोगशाळेसाठी कर्मचारी वर्गही याच संस्था देणार असून प्रत्येक शाळेत जाऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. सोबतच कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सकाळी महापालिका मुख्यालयात सत्यनारायण पूजा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किचन बजेट कोलमडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नोटाबंदीनंतर सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसला. महिलांना किचनचे बजेट सावरणे कठीण झाले. दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले. मात्र, पंतप्रधानांच्या निर्णयातून उद्या नक्की काही तरी चांगले होईल, असा आशावाद बाळगल्याचे मत महिला वर्गाने व्यक्त केले.

उद्देश साध्य झाला का?

नोटाबंदीनंतर काही महिने आर्थिक नियोजन करताना प्रचंड त्रास झाला. घरातील बजेट कोलमडले. अनेक बाबतीत तडजोड करावी लागली. परंतु ज्या उद्देशाने सरकारने नोटाबंदी केली तो उद्देश देशहिताचा होता. म्हणून दोन तीन महिने झालेली गैरसोय सहन केली. मात्र, त्याचे परिणाम काय झाले हे सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे.
- अनिता वाघ

आर्थिक नुकसान झाले

नोटाबंदी जाहीर झाली त्यावेळी बँकेत खात्यावर पुरेसे पैसे होते. त्या पैशांची शेतीच्या रब्बी हंगामातील भांडवलासाठी मोठी गरज होती. मात्र, बँकेत खात्यावर पैसे असूनही काढता आले नाही. परिणामी शेतीसाठी भांडवल उपलब्ध झाले नाही. भांडवलाअभावी रब्बी हंगाम वाया गेला.
- हिराबाई मोरे

देशप्रेमापोटी सर्व सहन केले

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलन टंचाईमुळे सामान्य नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागला. स्वतःचेच पैसे वापरण्यावरही बंधने लादण्यात आली. देशहिताचा निर्णय असल्याचे त्रास सहन केला. नोटाबंदीनंतर कित्येक गरजा कमी केल्या. परंतु, आता सामान्य नागरिकांना या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा लोकहिताच्या कामांमधून दिला पाहिजे.
- सपना चव्हाण

देशाच्या तिजोरीत भर

नोटाबंदीच्या मास्टर स्ट्रोकद्वारे पंतप्रधानांनी काळे धन जमा करणाऱ्यांना मोठा दणका दिला. देशाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात काळ्या धनाचा पैसा जमा झाला. त्यामुळे सरकारला आता हा पैसा लोकोपयोगी कामांसाठी वापरता येईल. अर्थव्यवस्था पोखरणाऱ्या बोगस कंपन्यांनाही टाळे लागले. जमा महसुलाचा वापर गोरगरिबांच्या हितासाठी वापरण्याचे भान केंद्र सरकारने राखले पाहिजे.
- माधुरी पवार

संपत्ती विकेंद्रीकरणास हातभार

नोटाबंदीनंतर गेल्या वर्षभरात भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. गैरमार्गाने संपत्ती जमा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याने बेकायदेशीर जमा केलेली संपत्ती आता आपोआप उजेडात आली आहे. सामान्यांसाठी हा निर्णय काही महिन्यांसाठी गैरसोयीचा ठरला असला तरी संपत्तीचे विकेंद्रीकरणास हा निर्णय काही प्रमाणात तरी फायदेशीर ठरला आहे. त्याचा फायदा सामान्य नागरिकांनाच झाला आहे. याशिवाय पैशांचे मूल्यही अधोरेखांकित झाले.
- प्रांजल देशमन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला फुटबॉल संघात वीरगावची कश्मिरा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

१९ वर्ष वयोगटाखालील महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघात वीरगाव येथील कश्म‌िरा देवरे या विद्यार्थिनीची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. ओरिसा येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ती महाराष्ट्र राज्याच्या संघात गोलकीपर म्हणून प्रतिनिधीत्व करणार असून, या संघात नाशिक जिल्ह्यातून निवड होणारी ती एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे.

कश्म‌िरा ही राष्ट्रवादी प्रांतिकेच सदस्य एस. टी. देवरे यांची नात असून, कळवण येथील शरद पवार पब्लिक स्कूलमध्ये ११ वी विज्ञान शाखेत ती शिक्षण घेत आहे. विद्यालयाच्या शालेय महिला फुटबॉल संघाने गत तीन वर्षाच्या कालावधीत तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य पातळीपर्यंत दरवर्षी मजल मारून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघाच्या विजयात कश्म‌िराचे मोठे योगदान होते. वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर राज्याच्या संघात सलग तिसऱ्यांदा स्थान मिळविण्यात तिला यश आले आहे.

उस्मानाबाद येथे नुकत्याच राज्यस्तरीय अंडर नाइंटनि महिला फुटबॉल स्पर्धा पार पडल्यानंतर ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून १३ खेळाडू निवडण्यात आले. त्यात कश्मिराचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्सीखेचसाठी आज चाचणी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिक

महाराष्ट्र टग ऑफ वॉर (रस्सी खेच) असोसिएशनच्या मान्यतेने व जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा टग ऑफ वॉर मुले, मुली, पुरूष व महिला गटासाठी जिल्हा निवड चाचणी होणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे ही चाचणी होईल. निवडलेला संघ राज्य स्पर्धेसाठी खेळणार आहे.

वयोगट व वजनगट खालीलप्रमाणे

१३ वर्षाखालील मुली

वजन – ३४० किलो

१३ वर्षाखालील मुले

वजन- ३८० किलो

दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी २००५ नंतर

….

१५ वर्षाखालील मुली

वजन- ३६०किलो

१५ वर्षाखालील मुले

वजन – ४४० किलो

दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी २००३ नंतर

….

१७ वर्षाखालील मुली

वजन- ४०० किलो व ४२० किलो

१७ वर्षाखालील मुले

वजन – ४८० किलो व ५०० किलो

दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी २००१ नंतर



१९ वर्षाखालील मुली

वजन ४६० किलो व ४४० किलो

१९ वर्षाखालील मुले

वजन- ५४० किलो व ५०० किलो

दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी १९९९ नंतर

….

महिला गट

वजन ४८० किलो

वयाची अट नाही पण १० वी पास असणे आवश्यक

पुरूष गट

वजन – ६४० किलो

वयाची अट नाही पण १० वी पास असणे आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायलेकास बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माय लेकास तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड परिसरातील सानेगुरूजी नगरात घडली. या प्रकरणी संशयित तरुणाविरूध्द उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहीत मिल‌िंद साळवे (वय २७ जिजामाता नगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. जिजामातानगर येथील आरंभ कॉलेज भागात राहणारा अभिजीत तेजाळे (वय २१) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिजीत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास साने गुरुजी नगर येथील आशुतोष किराणा दुकानाजवळ उभा होता. यावेळी लाकडी दांडा हातात घेवून, आलेल्या संशयिताने कुठलेही कारण नसतांना त्यास मारहाण केली. यावेळी रोहितच्या मदतीला आई कविता तेजाळे या धावून आल्या.

वृद्ध महिलेचा मृत्यू

पलंगावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नंदा रघूनाथ कदम (वय ७२, रा. खोडदेनगर, नाशिकरोड) असे मृत वृध्देचे नाव आहे.

वडाळागावात जुगारी ताब्यात

वडाळागावातील संजेरी मार्गावर जुगार खेळणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. हमिद रशिद खान व त्याचे तीन साथीदार जुगार खेळतांना मिळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छ सर्वेक्षण’साठी मालेगाव पालिका सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी पालिकेकडून ४ जानेवारी २०१८ पासून प्रत्यक्षाम सर्वेक्षण होणार आहे. गेल्यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतगर्त देशातील पाचशे शहरात मालेगाव महापालिकेला २४९ वा क्रमाक मिळाला होता. त्यात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार असून, शहर स्वच्छतेबाबत नागरिकांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अंमलबजावणी संबंधी पालिका सभागृहात मंगळवारी सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता ठेकेदार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपायुक्त अंबादास गरकल, डॉ. प्रदीप पठारे, राजू खैरनार, पंकज सोनवणे, परितोष हिरे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलतांना त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामकाजासबंधी माहिती दिली. शहर हागणदारीमुक्त केल्यानंतर आता पालिका प्रशासन स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या तयारीला लागले आहेत. यासाठी कंत्राटीपद्धतीने चारही प्रभाग समित्यांचा स्वच्छतेचा ठेका देण्यात येणार असून, संबंधित ठेकेदारावर त्या प्रभागातील सर्व कचरा संकलनाची जबाबदारी असणार आहे. याबाबतचा ठराव लवकरच महासभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच स्वच्छता निरीक्षक देखील बदलण्यात येणार आहेत. प्रभागातील स्वच्छता कर्मचारी वेळेवर हजर राहतात की नाही यासाठी हजेरी सेंटरवर बायोमेट्रिक कार्यन्वित केले जाणार आहेत. घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून मेपिंगचे काम सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असून, नागरिकांनी ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करावे, कचराकुंडीचा वापर करावा व स्वच्छतेबाबतच्या तक्रारी कळवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छतेबाबत करा तक्रार

या अभियानअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेबाबतच्या तक्रारी कळवता येणार आहेत. पालिकेतर्फे १८०८३३१५०० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन यूजर्स मोबाइलद्वारे स्वच्छता हे अॅप डाऊनलोड करून त्यावर स्वच्छतेबाबत फोटो टाकून तक्रार करू शकतात. यावर करण्यात आलेल्या तक्रारीचे निरसन पालिका प्रशासनाकडून झाले की नाही याचा फिडबॅक देखील देता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालेय कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची फरपट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी लासलगाव येथील मंडल अधिकारी हे विद्यार्थ्यांची अडवणूक करत असल्याची अनेक विद्यार्थ्यांची तक्रार आहे. आपले शिक्षण पूर्ण करायचे की कागदपत्रांसाठी चकरा मारायच्या, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

लासलगाव येथे मंडळ अधिकारी म्हणून चंद्रशेखर नगरकर हे कार्यरत आहेत. २३ गावांचा संपूर्ण कारभार नगरकर बघतात. लासलगाव शहरात चार महाविद्यालये व सहा शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थेत अनेक विद्यार्थी लासलगाव क्षेत्राच्या बाहेरून शिक्षणासाठी लासलगावमध्ये येतात.

मात्र हद्दीच्या कारणावरून ‘तुमचे गाव माझ्या अधिकारात येत नाही, त्यामुळे मला प्रतिज्ञापत्र करता येत नाही’, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच ‘तुम्ही निफाडला जा तुमचे काम होईल’, असा फुकटचा सल्लाही मंडलाधिकारी देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लासलगावच्या लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा या मंडल अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची अडवणूक न करण्याबाबत सांगितले होते. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहून अनेक विद्यार्थ्यांना खेटा घालायला भाग पाडतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

लासलगावचे मंडळ अधिकारी नगरकर यांच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांची त्यांनी अडवणूक केली तर मंडलाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकले जाईल.
- जयदत्त होळकर, उपसरपंच, लासलगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरपाई न मिळाल्याने बागेवर जेसीबी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून नैताळे येथील शेतकरी भागवत बोरगुडे यांनी भगवा जातीचे डाळिंबाचे रोप खरेदी केले होते. मात्र हे रोप बोगस निघाल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यांनी नाशिक येथील ग्राहक तक्रार मंचात तक्रार दाखल केली. त्यांच्या बाजूने निकाल लागूनही त्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, अखेर त्यांनी आपली बाग जेसीबी मशिनने काढून टाकली आहे.

कृषी विभागाच्या पिंपळगाव बसवंत येथील रोपवाटीकेतून सन २०१२ मध्ये डाळिंब लागवडीसाठी जवळपास १४० शेतकऱ्यांनी रोपे खरेदी केली होती. खरेदी केलेल्या वानामध्ये भगवा ऐवजी इतर जंगली जातीचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. नैताळे येथील भागवत बोरगुडे यांनी शासनावर संताप व्यक्त करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.

याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाई व्हावी व बोगस रोपामुळे उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा झाल्याने भरपाई मिळावी, यामागणीसाठी त्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे धाव घेतली. न्याय मंचाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. दोषी अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतकऱ्यांला तीन लाख रुपये भरपाई द्यावी, तसेच १० डिसेंबर २०१४ पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के प्रमाणे व्याज अदा करावे, तसेच तक्रारदाराच्या मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये तर अर्ज व इतर खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावे असा निकाल दिला होता.

मात्र हा निकाल कृषी विभागाने झुगारून दिला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अपील केले आहे. दरम्यान या सर्व शासकीय गोंधळनाने संतापलेल्या बोरगुडे यांनी जेसीबी मश‌िनने डाळिंब बाग काढून टाकली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या रोपवाटिकेतून

फसवणूक झाली आहे. तक्रार निवारण मंचाने माझ्या बाजूने निकाल देवूनही मला न्याय मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुनही दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाई होत नाही.

- भागवत बोरगुडे, नैताळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अच्छे दिन’ला निफाडमध्ये श्रद्धांजली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या नोटबंदीला आज एक वर्ष, तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तीन पूर्ण होत आहे. सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. तसेच ‘अच्छे दिनाचे तृतीय पुण्यस्मरण’ असे फलक राष्ट्रवादीकडून निफाड येथील चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. बुधवारी निफाड तहसीलसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

वाढती महागाई, नोटबंदी, शेतकरी कर्जमाफीतील घोळ आणि जीएसटीामुळे शेतकरी व सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून युवकांची फसवणूक केली आशा प्रकारचा आशय या फलकावर आहे. फलकावर शोकाकुल म्हणून राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनिल कुंदे व विक्रम रंधवे यांची नावे टाकली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राची सौराष्ट्रावर मात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआयच्या वतीने औरंगाबाद येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या माया सोनावणेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सौराष्ट्र संघावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. माया सोनावणेने ७ शतकात ५ निर्धाव षटक टाकून फक्त २ धावा देत ४ गडी बाद केले. तिच्या भेदक गोलंदाजी केल्यामुळे सौराष्ट्र संघ ३१ षटकात ५० धावांमध्ये गारद झाला. उत्तरात नाशिकचीच प्रियांका घोडके व माया सोनावणे यांनी ८ षटकात नाबाद ५२ धावा करत विजय संपादन केला. मायाने २८ चेंडूत २० धावा केल्या, प्रियांकाने २० चेंडूत ३० धावा केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटप्रेसला ४५० कोटींची मशिनरी

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नोटबंदीच्या काळात सलग दहा महिने रात्रंदिवस काम करून देशवासीयांना दिलासा देणाऱ्या नाशिक नोटप्रेस कामगारांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. प्रेससाठी ४५० कोटींची एक मशिन लाइन मंजूर केली आहे. तिचे टेंडर प्रोसेस झाल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुद्रे यांनी ‘मटा’ला दिली. ही मशिन लाइन सुरू झाल्यानंतर नोटांचे उत्पादन वर्षाला दीड हजार दशलक्षाने वाढणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून ऑर्डर आल्यानंतर नाशिक नोट प्रेसमध्ये नोट छपाई होते. बँकेच्या देशभरातील अठरा केंद्रात या नोटा पाठवल्या जातात. दहा रुपयांपासून पाचशेपर्यंतच्या नोटा नाशिकमध्ये छापल्या जातात. नोटबंदीत प्रचंड डिमांड असलेल्या पाचशेच्या नोटांची छपाई नाशिक प्रेसमध्ये स्थगित असून शंभर, दोनशे व पन्नासच्या नव्या नोटा छापण्याचे काम सुरू आहे. देशात नोटांची छपाई नाशिकखेरीज देवास, म्हैसूर व सालबोनी (बंगाल) येथे होते. नाशिकला चार, देवासला तीन तर म्हैसूर व सालबोनी येथे प्रत्येकी सात मशिन्स आहेत. नोटबंदीत या चौदा मशिन्सवरच देशाचा डोलारा अवलंबून होता. नाशिक प्रेसमध्ये दिवसाला १५ ते १८ दशलक्ष नोटा छपाई होते. नाशिक प्रेसने जुन्या मशिन्स असतानाही नोटबंदी काळात दिवसाला २१ दशलक्ष नोटांची विक्रमी छपाई केली.

नोटांचे बंडलच बाहेर

नाशिकचे हवामान उत्तम आहे. त्यामुळे नोटांची शाई फुटत नाही. हे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी १९२५ मध्ये नाशिकची प्रेस सुरू केली. या प्रेसचे १९६२ मध्ये विभाजन होऊन नोटांसाठी स्वतंत्र प्रेस सुरू झाली. देशी शाई व जुन्या मशिन असताना रिझर्व्ह बँकेच्या आधुनिक प्रेसशी स्पर्धा करत आहेत. नाशिक प्रेसमध्ये मशिनच्या चार लाइन आहेत. एका लाइनमध्ये ऑफसेट, इंटेग्लो, नंबरिंग व कट टॅक या चार मशिन्स असतात. परदेशी बनावटीच्या इंटेग्लो मशिनमध्ये कागद टाकल्यावर नोटांचे बंडलच बाहेर येते. रिझर्व्ह बँकेकडे अशा चौदा मशिन्स आहेत. नाशिकला साडेचारशे कोटींचे एक इंटेग्लो मशिन लाइन मंजूर झाली आहे. प्रेसमध्ये ती उभारण्याची तयारी झाली आहे. २०१९ मध्ये ही मशिन कार्यान्वित झाल्यावर वर्षाला नोटांचे उत्पादन वाढणार आहे.

आधुनिक मशिनरीबद्दल सरकारचे मनःपूर्वक आभार. प्रेसमधून गेल्या २५ वर्षात अनेक कामगार निवृत्त झाले, काहींचा अकाली मृत्यू झाला. अजूनही भरती झालेली नाही. दोन्ही प्रेसमध्ये तातडीने भरती केल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळेल.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

हे तर ‘टीमवर्क’चे यश

नवीन मशिनरी मंजूर झाल्याबद्दल प्रेस कामगारांचे प्रेस नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, माधवराव लहांगे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, नंदू पाळदे, उत्तम रकिबे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, रमेश खुळे, इरफान शेख, उल्हास भालेराव, दिनकर खर्जुल, कार्तिक डांगे, अरुण गिते, संदीप बिश्वास, मनोज सोनवणे आदींनी कामगारांच्या टीमवर्कचे यश असल्याचे नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी बनले ‘बिबट्या दूत’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न जिल्ह्यात वाढल्याने वनविभागाने आता बिबट्यांविषयी जनजागृतीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘जाणता वाघोबा’ नावाच्या या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना बिबट्या दूत बनविले जात आहे. या विद्यार्थ्यांद्वारे बिबट्यांविषयी जनप्रबोधन केले जात आहे.

बिबट्यांचे वास्तव्य असलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना बिबट्यापासून संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया आणि डुडल फॅक्ट्री यांच्या मार्फत संयुक्तरित्या ‘जाणता वाघोबा’ ही जागरुकता मोहीम सुरू करण्यात आली आहे. बिबट्यापासून स्वत:च्या आणि पाळीव पशुंच्या संरक्षणासाठी लोकांना बिबट्याविषयी शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे. त्याच्या सवयी, मानववस्तीमध्ये त्याच्या वास्तव्याची कारणे याची माहिती असावी ‘जाणता वाघोबा’ या प्रकल्पात शाळा व कॉलेजातील विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देवून प्रशिक्षित केले जाते. त्याची जीवशास्त्रीय, संशोधन आणि मानवी सुरक्षितेच्या दृष्टीने घ्यावयाची पूर्व काळजी याची माहिती दिली जाते.
कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या बिबट्यांच्या क्षमतेमुळे पाळीव पशु, कुत्रे, डुकरे आदी भटक्या प्राण्याची शिकार करून आपली गुजराण करतात. यामुळे उपक्रमाची अंमलबजावणी नाशिक पूर्व वनविभागासह वाईल्ड लाईफ सोसायटीच्या जागृकता आणि प्रसार समन्वयक मृणाल गोसाळकर, वन्यजीव शास्त्रज्ञ, डॉ. विद्या आत्रेय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

गोदाकाठ परिसरावर भर
गोदावरीकाठच्या सुपिक भागामध्ये शेती आणि पशुपालन हे प्रमुख व्यवसाय असून ऊस हे मुख्य पीक आहे. त्यामुळे बिबट्यास लपण्यास पुरेशी जागा आणि भरपूर आडोशामुळे पिल्ले वाढविण्यास अनुकूल ठिकाण‍ मिळते. या मोहिमेचा भर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या सुपिक खोऱ्यात आहे. निफाड तालुक्यातील कोठूरे, कुरुडगाव, जळगाव, सुंदरपूर, कातरगांव, म्हाळसाकोरे, नांदूर मध्यमेश्वर, भुसे, करंजगाव, शिवरे, दिंडोरी तास, तळवडे आणि मांजरगांव येथील शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

नगर, पुणेमध्ये यशस्वी
जाणता वाघोबा ही मोहीम यापूर्वी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर याठिकाणी राबविण्यात आली आहे. तेथे लोकांमध्ये चांगली जनजागृती घडविण्यात आली आहे. यामुळे मानव व बिबट्याच्या संघर्षाची अवघड समस्या कमी होण्यास मदत होत आहे. मोहिमेत विद्यार्थी रुची दाखवत असून समाजापर्यंत नेण्याची तयारी दर्शवितात त्यांना ‘बिबट्याचे दूत’ म्हणून निवड केली जाते. हे विद्यार्थी त्यांच्या घरात, गावात आणि वस्तीत छोटे छोटे कार्यक्रम घेऊन लोकांना जागरुक करतात.

स्वच्छतेचाही प्रचार
अस्वच्छतेवर किंवा कचरा कुंडीवर भटके कुत्रे जगतात. जंगलातून भटकलेला बिबट्या या भटक्या कुत्र्यांचीच शिकार करतो. त्यातूनच तो मानवी वस्तीकडे येतो. त्यामुळे ग्रामीण भागात स्वच्छता राहणेही आवश्यक आहे, असा प्रचार या निमित्ताने केला जातो आहे.

बिबट्याविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही जाणता वाघोबा ही मोहीम सुरू केली आहे. त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. ग्रामीण भागात बिबट्या मानवी वस्तीत येण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे जनप्रबोधन होणे गरजेचे आहे.
- आर. एम. रामानुजन, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनहक्काचे १९ हजार दावे प्रलंबित

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी वनहक्कांची जिल्ह्यात तब्बल १९ हजार ८१० प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षभरापासून एकही बैठक झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वनहक्काची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांनी दर शुक्रवारी घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. पण, सहा महिन्यांपासून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची जागा रिक्त आहे. तर त्याअगोदच्या सहा महिन्यातही एकही बैठक न झाल्यामुळे प्रलंबित प्रकरणात वाढ झाली आहे.

केंद्र सरकारनेही या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी स्पेस टेक्नालॉजीचा वापर करावे, असे आदेश दिले आहे. पण, जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रकरणे फारशी गांभीर्याने न घेतल्याने यात वाढ होत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी याबाबत काही प्रकरणे निकाली काढली असली तरी त्याचे प्रमाण खूप कमी आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ही प्रलंबित प्रकरणे असून त्यात फेरचौकशीसाठी उपविभागीय समितीकडे प्रलंबित अपिल दावे, सात बारा नोंदणी घेणेवर प्रलंबित दावे, मोजणी बाकी असलेले दावे, फेरचौकशीतील प्रलंबित वैयक्तिक दावे ही संख्या मोठी आहे. त्यात मोजणी बाकी असलेले दावे जास्त आहे.
उपविभागीय समितीने अमान्य केलेले दाव्यांपैकी जिल्हास्तरीय समितीकडे अपिल न झालेले एकूण दावे ११ हजार ८९८ आहे. त्यापैकी २ हजार २६३ दावे जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहे. उर्वरीत ९ हजार ६३५ दावे उपविभागीय समितीकडे प्रलंबित आहे. जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित असलेल्या ३ हजार ३८३ पैकी उपवनसंरक्षक पूर्व यांच्याकडे ७७८ दावे उपवनसंरक्षक पश्चिम यांच्याकडे ७६८ दावे सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्याचाही निपटारा अद्याप करण्यात आलेला नाही. जिल्हास्तरीय समितीने अंतिमत पात्र केलेल्या ७६५ टायटल जिल्हास्तरीय समिती सदस्यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आले आहे.

असे आहेत प्रलंबित दावे

मोजणी बाकी असलेले दावे - ६ हजार ७३७
फेरचौकशीसाठी उपविभागीय समितीकडे प्रलंबित अपिल दावे - ४ हजार ६६५
सात बारा नोंदणी घेणेवर प्रलंबित दावे - ४ हजार ७०१
फेरचौकशीतील प्रलंबित वैयक्तिक दावे - ३ हजार ३८३
प्रलंबित सामूहिक दावे - २६९
सामूहिक मूळ प्रलंबित दावे - ५२
सामूहिक अपिल प्रलंबित दावे - ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलाठ्यांचे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सरकारी वाहन आणि संरक्षण दिल्याशिवाय अवैध गौन खनिज वाहतुकीवर कारवाई न करण्याचा निर्णय घेत तलाठी संघटनेने लेखणीबंद आंदोलन मागे घेतले आहे. तलाठ्याला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाईचे आश्वासन महसूल आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करीत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या वडनेर दुमाला येथील यादव विठ्ठल बच्छाव (३५) या तलाठ्याला भाभानगर परिसरात तीन दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी तलाठी संघटनेने सोमवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले होते. मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधित संशयितांवर महिनाभरापूर्वीच्या एका घटनेत अंबड पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोल‌िस अधिकाऱ्यांनी तलाठी संघटनेला दिले आहे. त्यामुळे लेखणीबंद आंदोलन मागे घेतल्याची माहिती संघटनेतील ज्येष्ठ सहकाऱ्यांनी दिली आहे. परंतु, यापुढे सरकारी वाहन आणि पोलिस संरक्षण पुरविल्याशिवाय जिल्ह्यातील एकही तलाठी अवैध गौन खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरणार नाही, असा निर्णयही संघटनेने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांभीर्य मांडणारे ‘रातम तरा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सस्पेन्स, कॉमेडी, थ्रीलर यामधून एक घटना दाखवून तिच्याभोवतीचे अनेक कंगोरे एक एक करीत उलगडत नेणारे नाटक गुरूवारी सादर झाले. एखादी थट्टा किंवा प्रसंग कसा जीवाशी बेततो हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘रातम तरा’. सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत भगवान हिरे लिखित ‘रातम तारा’ हे नाटक सादर करण्यात आले.

गावामध्ये अॅग्रीकल्चरशी संबंधित प्रोडक्ट विकण्यासाठी एक सेल्समन आलेला आहे. त्याची शहराकडे जाणारी गाडी चुकते आणि तो गाडीची वाट पहात थांबलेला असतो. त्याने केळी खाऊन साल रस्त्यावर फेकलेले काही वेळाने तेथे आलेल्या मनुष्याला खपत नाही व तो त्याला बरेच खरे-खोटे सुनावतो. त्यावरून त्यांची बाचाबाची होते. सेल्समनला तो खूपच त्रास द्यायला लागतो. त्यामुळे तो चिडून जाऊन त्याच्या डोक्यात ब्रीफकेस टाकतो. त्या फटक्याने तिरीमिरीत येऊन तो मनुष्य पडतो. त्याला काय झाले असावे असा विचार करीत सेल्समन गर्दी जमवायला पाहतो; परंतु एकच जण त्याच्या मदतीला येतो, तोदेखील वेडाच असतो. त्यानंतर तेथे चौथा माणूस येतो मग तिघांचे वाद सुरू होतात. अशा अशयाची कथा असलेले हे नाटक होते.

श्री शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ नाशिक या संस्थेच्यावतीने हे नाटक सादर करण्यात आले. दिग्दर्शन, नेपथ्य व प्रकाशयोजना विकम्र गवांदे यांची होती. रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा संस्थेच्या ग्रुपची होती. नाटकात मंगेश काकड, सचिन जाधव, संदीप महाजन व चंद‍्रवदन दीक्षित यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : श्यामची आई
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे टोलप्रश्नी आज आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गावातील टोलनाका शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. स्थानिकांना रोजगारासाठी येथे प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली.

शिंदे टोलनाका सुरू होण्यापूर्वी या नाक्यावर स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. मात्र, ते पाळलेले नाही. स्थानिकांना रोजगार मिळावा, ज्यांची जमीन टोलनाक्यासाठी गेली आहे, त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत घोलप यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्याला निवेदन दिले. या वेळी योगेश देशमुख, बालम बोराडे, बाजीराव जाधव, ज्ञानेश्वर मते, ज्ञानेश्वर जाधव, संजय तुंगार, नीलेश जाधव, योगेश म्हस्के, गणपत जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानातच कचरादहन

$
0
0

उद्यानांचे तीनतेरा भाग १५

--

उद्यानातच कचरादहन



म. टा. वृत्तसेवा, आडगाव

उद्यानाच्या आवारात सर्रासपणे पेटविला जाणारा कचरा, तुटलेली खेळणी, सौरऊर्जेवरील पथदीपांची दुरवस्था व चोरी गेलेल्या बटरी, उद्यानात फिरण्यासाठी बनविलेल्या ट्रॅकची झालेली दुरवस्था अशी स्थिती आहे म्हसरूळ परिसरातील प्रभाग क्रमांक एकमधील गोरक्षनगर उद्यानाची.

येथील मध्यवस्तीत काही वर्षांपूर्वी भव्य व मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या उद्यानाची दुरवस्था होऊनदेखील परिसरातील लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या उद्यान विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी संबंधित घटकांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

विद्यमान महापौरांचा प्रभाग म्हणून विशेष ओळख असलेल्या म्हसरूळमधील बहुतांश उद्यानांची मात्र दुरवस्था झालेली दिसते. गोरक्षनगर येथील उद्यानाच्या प्रवेशद्वाराशेजारी सर्रासपणे कचरा पेटविला जातो. या उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच महावितरणची डीपी आहे येथील डीपी आणि केबल उघडी असल्याने उद्यानात जाताना-येताना किंवा खेळताना दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

--

खेळणी, पाणी, कर्मचाऱ्यांचा अभाव

उद्यानातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचीही दुरवस्था झालेली असून, तिला पाण्यासाठी नळदेखील बसवलेले नाहीत. उद्यानात गवतही अस्ताव्यस्त फोफावलेले आहे. येथील खेळण्यांचीदेखील मोडतोड होऊन दयनीय अवस्था झालेली आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारीच नसल्यामुळे येथे साफसफाई, देखभाल होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

--

देखभाल-दुरुस्ती कागदोपत्रीच

या उद्यानाचा ठेका २०१६ ते २०१९ या काळासाठी एका कंपनीला देण्यात आला असूनदेखील प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती-देखभाल केली जात नाही. उलट गवत काढून साफसफाई करण्याएेवजी सरळ वाळलेले गवत पेटवून दिले असल्याचे नागरिक सांगतात. शिवाय कधीही दुरुस्ती केली जात नाही, केवळ कागदोपत्री दुरुस्ती होत असून, या उद्यानाच्या दुरुस्तीची मलई कोणाच्या खिशात जाते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करीत यासंदर्भात आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

--

सोलर पथदीपांच्या बॅटरी गायब

या उद्यानांत सोलर पथदीप बसविलेले आहेत. पण, या पथदीपांची दुरवस्था झालेली आहे. शिवाय त्यातील बॅटरीदेखील चोरीस गेल्याने उद्यानात सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे येथे टवाळखोरांचा वावर वाढत असल्याचे आढळून येत आहे.

--

गोरक्षनगर उद्यानाची दुरवस्था झालेली असून, येथे स्वच्छता, तसेच दुरुस्तीदेखील केली जात नाही. मुलांना खेळण्यासाठी उद्यान हा एकमेव पर्याय असतो. पण, अशा दुरवस्थेमुळे त्यांची गैरसोय होते. त्यामुळे या उद्यानाची तत्काळ दुरुस्ती केली जावी.

-सचिन पगारे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तासांत लावला दागिने चोरीचा छडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक पोलिसांनी अवघ्या १२ तासात दागिने चोरीचा छडा लावण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळेच चोरी गेलेले तब्बल ३५ तोळे सोने आणि १५ किलो चांदी तक्रारदाराला परत मिळणार आहे. अतिशय नाट्यमयरित्या हा सारा तपास करण्यात आला. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की, मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हद्दीत रहाणाऱ्या प्रतिभा चांडक यांनी गुरुवारी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यात जाधव यांनी म्हटले होते की, माझ्या विश्वासाचा फायदा घेऊन कारचालकाने नोव्हेंबर २०१६मध्ये घरात ठेवलेले ३५ तोळे सोने आणि आणि १५ किलो चांदी असा एकूण १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत प्रतिभा चांडक यांनी गुरुवारी फिर्याद दाखल केली होती. या घटनेची व्याप्ती पाहता तातडीने चौकशी करावी, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या गुन्हे पथकाने तपास करुन आरोपी नितीन यादव वालझाडे याला ठेंगोडे येथे जाऊन अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नाशिककरांनी कुठलीही भीती न बाळगता आमच्याकडे तक्रार करावी. पोलिस नक्कीच गुन्हेगाराला शोधण्याचा प्रयत्न करतील. चांडक यांनी तक्रार केली नसती तर त्यांना त्यांचे दागिने परत मिळाले नसते. गुन्हेगारीला आळा बसावा यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

- रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images