Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिन्नर रस्त्यावर लवकरच टोल

$
0
0

नाशिकरोड-सिन्नर रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड ते सिन्नर या महामार्गाचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाल्यामुळे महिनाभरात या महामार्गावरील टोल नाका सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, टोल नाक्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

नाशिकरोड ते सिन्नर या महामार्गावर या अगोदर ९.५ किलोमीटरचा सिन्नर बायपास तयार करण्यात आला आहे. हा बायपास वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते खेड हा १३७ किलोमीटरचा मार्ग या अगोदरच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रटाळवाणा वाटणारा नाशिक-पुणे रस्तेप्रवास सुखद होणार आहे. यामुळे या रस्त्यावर खर्च होणारा सहा तासांचा वेळ आता अर्ध्यावर येणार आहे.

नाशिकरोड-सिन्नर रस्त्यावरील दारणा पुलापासून नाशिकरोडच्या रेल्वे ओव्हरब्रीजपर्यंत असलेल्या २.३ कि.मी रस्त्याचे काम बाकी आहे. न्यायालयात या विरोधात दावा
असल्यामुळे हे काम रखडले आहे. त्याचा अंतिम निकाल १५ नोव्हेंबरला लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा रस्ता केला जाणार आहे. त्याचप्रमाणे शिंदे गावाजवळील उड्डाणपुलाचेही काम रखडले होते. पण गावकऱ्यांनी या पुलाविरोधात घेतलेली हरकत मागे घेतल्यामुळे या पुलाचे काम सुरू झाले असून, ते चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील दारणा नदीवरील बांधलेल्या नव्या पुलावरही एक मार्ग येत्या दोन तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी फुटणार

गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे आता त्यातून वाहनधाराकांना दिलासा मिळणार आहे. सिन्नर रस्त्यावर मात्र अजूनही चार ते पाच किमी रस्त्याचे काम बाकी असल्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय अ‌धीक्षकांना कोंडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन महिलांवर भूल उतरली असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्र‌िया करण्यात आल्याच्या प्रकरणाचे शहरात तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. सोमवारी दुपारी संतप्त सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढला. वैद्यकीय अधीक्षक जी. एम. नरवणे याना घेराव घालून कोंडून ठेवले. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त आंदोलकांनी मनमाड चौफुलीवर रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रास्ता रोको मागे घेऊन आंदोलकांनी पोल‌िस व रुग्णालय प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.

मनमाड येथील नाजमिन शेख व विद्या सानप या दोन महिला उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या असता त्यांना सकाळी भूल देण्यात आली. भूल उतरल्यानंतर दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे दोघींना प्रचंड वेदनेला सामोरे जावे लागले. या प्रकरणाच्या निषेधार्थ व दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे व पदाधिकारी गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं भवन येथून उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाल्याने मोर्चाला व्यापक स्वरूप आले. नगराध्यक्ष गणेश धात्रक, शिवसेनेचे अल्ताफ खान, मयूर बोरसे, रिपाइंचे योगेश निकाळ,े राष्ट्रवादीचे नगरसेवक छोटू पाटील, अमजद पठाण, सर्वपक्षीय नगरसेवक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. रुग्णालयात येऊन आंदोलकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवणे यांना जाब विचारत दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. आंदोलकांनी त्यांना त्यांच्या कक्षात कोंडले. वैद्यकीय अधीक्षकांनी या प्रकरणात डॉक्टरची चूक नसल्याचे सांगत त्यांचे समर्थन केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीपाठोपाठ पतीचेही नामपूरला निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

अल्प आजाराने त्यांच्या पत्नीचे निधन होते…सतत पाठ‌िशी राहणारी पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेल्याने ते पुरते कोसळले…कसेबसे सावरत पत्नी गेल्याची बातमी आप्तांना सांगताना त्यांच्या छातीत अचानक कळ येते…आणि काही कळायच्या आतच त्यांचेही निधन होते…अंगावर शहारे आणणारी ही करुण कहानी आहे नामपूर येथील बागूल दांपत्याची.

बागलाण तालुक्यातील नामपूर येथील दिलीप किसन बागुल (वय ४८) हे पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा येथे आरोग्य विभागात नोकरीस होते. घरातील बेताची परिस्थिती असल्याने ते तब्बल २५० किलोमीटरवर आपल्या कुटूंबियांच्या उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. आपल्या कुटूंबियांचे एकुलते एक सुपुत्र असतांना दिलीप बागुल केवळ परिवाराच्या सुखासाठी घरापासून दूर नोकरीस होते. त्यांचे वडील किसन बागुल यांचेही काही वर्षांपूर्वी निवृत्त‌िनाथ महाराज यांच्या वारीप्रसंगी अपघातील निधन झाले आहे.

दिलीप बागुल यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून, मुलगी नामपूर येथेच इयत्ता अकरावीत आहे.

बागुल यांची पत्नी मीनाक्षी (वय ४२) यांना दोन ते तीन महिन्यांपासून शारिरीक व्यांधीने ग्रासले होते. त्यांच्या उपचारासाठी देखील त्यांना जव्हार मोखाडा येथून नामपूर येथे उपचारासाठी आणले होते. घरात वृद्ध आई, पत्नी व्याधींनी त्रस्त व, मुलगा पुण्यात शिकत असल्याने त्यांना कोणत्याही गोष्टीची जाणीव होवू नये याची काळजी ते स्वतः घेत असत. यामुळेच त्यांनी कधीही आपले दुःख चेहऱ्यावर उमटू दिले नाही.

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शनिवारी (दि. ४) रोजी सायंकाळी मिनाक्षी यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. पत्नी, सहचरिणीने अनेक सुख-दुःखात आपली साथ दिली. मात्र हे सगळे अर्ध्यांवर सोडून तिने जगाचा निरोप घेतला हे दुःख दिलीप यांना सहन झाले नाही. त्यांच्या निधनानंतर आप्तस्वकीयांना मोबाइलवर निरोप देत असतांनाच बागूल यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. यामुळे या परिवारावर मोठा आघात झाला आहे.

या कुटूंबियांची सर्व जबाबदारी आता दिलीप यांचा मुलगा सचिन (वय २२) यांच्यावर आली असून, एक लहान बहीण व आजीचा सांभाळ करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या घटनेमुळे नामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांच्या मार्गात दगडधोंडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

सरकारी कार्यालयातील ‘रॅम्प’ म्हणजे दिव्यांगांसाठी एक मोठा आधार. मात्र येथील पंचायत समितीतील रॅम्पवर अक्षरशः दगडधोंडे टाकून दिव्यांगांची कुचेष्ठा करण्यात आली आहे. पंचायत समिती प्रशासनाने दगड तसेच लांब लोखंडी पाइप आडवा टाकून रॅम्पवर अडथळा निर्माण केला आहे. पंचायत समितीती या रॅम्पवरुन कुणीही दुचाकी थेट वर आणू नये यासाठी पंचायत समितीने ही अनोखी युक्ती शोधून काढली असली, तरी दिव्यांगासह वृद्धांना मात्र हाल सहन करावे लागत आहेत.

पंचायत समितीत येणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध अन् दिव्यांगांचे प्रमाण अधिक असते. या सर्वांना पंचायत समितीची पायरी विनाकष्ट सहज चढता यावी यासाठी येवला पंचायत समितीच्या देखण्या व टुमदार अशा वास्तूमध्ये रॅम्पची निर्मिती इमारत साकारतानाच करण्यात आली आहे. समितीच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला उभारलेल्या रॅम्पच्या तोंडाशीच गेल्या काही महिन्यांपासून पंचायत समिती प्रशासनाने मोठे दगड तसेच लोखंडी पाईप टाकून अडथळा उभारला आहे. दिव्यांगांना हा अडथळा पार करणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे दर घसरण्याची शक्यता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

येथील कृषी उत्पन्न बाजार सम‌ितीत नवीन लाल कांदा दाखल झाला असून, देशातंर्गत बाजारपेठेतून या कांद्याला चांगली मागणी आहे. जुना गावठी कांद्याचा मोठा साठा शिल्लक असल्याने भाव अजून काही दिवस तेजीत राहतील. मात्र व्यापाऱ्यांकडे असलेला गावठी कांद्याचा साठा संपल्यानंतर लाल कांद्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता आहे.

सोमवारी येथील बाजार समीतीत जुन्या गावठी कांद्याची अंदाजे अकरा हजार क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान १७०० रुपये कमाल ३८०० रुपये होते. नवीन लाल कांद्याची अंदाजे चार हजार क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमाल ३५०० रुपये किमान १३०० रुपये तर सरासरी २६०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

पिंपळगाव, लासलगाव परिसरातील अनेक व्यापाऱ्यांकडे अजूनही गावठी कांद्याचा काही प्रमाणात साठा आहे. हा साठा संपेपर्यत कृत्र‌िम टंचार्इचे राहील. मात्र व्यापाऱ्यांचा गावठी साठा संपताच कांद्याचे भाव घसरतील, असा अंदाज आहे.

मार्च-एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून कांदा बाजारात आला तेव्हा कांद्याला ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल भाव होता. मात्र काही चाळीधारक मोठे शेतकरी वगळता शेतकऱ्यांचा कांदा विक्री झाल्यानंतर तोच कांदा व्यापाऱ्यांच्या चाळीत स्थिरावला. कृत्रिम टंचार्इ निर्माण करून तेजी मंदीचा खेळ सुरू झाला.

आगामी पंधरा दिवसात व्यापाऱ्यांकडे असलेला गावठी कांदा संपलेला असेल. तर पंधरा दिवसात शेतकऱ्यांचा लाल कांदा बाजारात आल्यानंतर मागणी असली तरी प्रचंड उत्पादनाच्या नावाखाली लाल कांद्याचे भाव पाडण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणच्या मेनरोडला धुळीचे ग्रहण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या मेनरोडला खड्ड्यांनी ग्रासलेले असतांना आता उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायतीला कसलेही सोयरसुतक दिसत नाही. या धुळीमुळे वाहनधारकांना सर्दी, खोकला, दमा या आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यालगतच्या व्यावसाय‌िकांच्या व्यवसायावरही या धु‌ळीचा परिणाम होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मेनरोडला धुळीने ग्रासले असून, दिवसभर या परिसरात तोंडाला रुमाल बांधूनच प्रवास करावा लागत आहे. धुलीकणांमुळे फुफुसांचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. थंडीच्या दिवसात निर्माण झालेल्या या स्मस्येमुळे नागरिकांना त्वचेचे आजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

कुठून आली धूळ?

कळवणच्या मेनरोडवर सर्वाधिक वाहनांची वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम खात्याला अनेकदा निवेदने देऊनही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. या खात्याच्या अधिकाऱ्यांसह शासनकर्त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी तसेच लाजवण्यासाठी कळवण शहरातील काही सेवाभावी तरुणांनी व्यापारी बांधवांच्या मदतीने रस्त्यावरील खड्ड्यांना बुजवण्यासाठी पुढाकार घेतला. मुरूम टाकत खड्डे बुजव‌िण्यात आले. कळवणकरांनी या तरुणांना शाबासकीची थाप दिली. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याला व शासनाच्या प्रतिनिधींना जाग यायला तयार नाही. मात्र आता मेनरोडवर धूळ वाढली आहे.

करायला गेले गणपती..

मेनरोडवर खड्ड्यात मुरूम टाकत काही तरुणांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला लाजवण्यासाठी गांधीगिरीचे दर्शन दाखवले. मात्र शासकीय यंत्रणेला घाम फुटला नाही. मेनरोडवर आता त्या मुरुममुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तरुण कार्यकर्त्यांचा हेतू शुद्ध होता, मात्र शासकीय यंत्रणेला जाग आणण्यात त्यांनाही अपयश आले. मेनरोडवर सध्या सर्व वाहनधारकांना व नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ९६ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गतवर्षीपेक्षाही यंदा आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली होती. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच जिल्ह्यात ९६ आत्महत्यांची नोंद झाली आहे.

निसर्गाचा लहरीपणा, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतात. शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावाने बळीराजा चिंतेत आहे. एक ना अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१७ या ११ महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१६ या काळात जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली होती. यंदा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये निम्मे शेतकरी तरुण आहेत. मालेगावात यंदा सर्वाधिक १४ आत्महत्या झाल्या असून बागलाण तालुक्यात अशा १३ घटनांची नोंद झाली आहे. निफाडसारख्या बागायतदारांच्या तालुक्यातही १२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. गत आठ दिवसात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. सरकार आणि प्रशासनाला या आत्महत्या रोखण्यात अपयश येऊ लागले आहे.

कर्जमाफी अंमलबजावणीची प्रतीक्षा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्त योजना लागू केली. त्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडूनही बहुतांश शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळू शकलेली नाही. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मनोबल खच्ची होत आहे.

आत्महत्यांचा आलेख चढताच

वर्ष शेतकरी आत्महत्या
२०१४ ४२
२०१५ ८५
२०१६ ८७
२०१७ ९६

तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या (जानेवारी ते नोव्हेंबर २०१७)

तालुका शेतकरी आत्महत्या
मालेगाव १४
बागलाण १३
निफाड १२
नांदगाव ११
दिंडोरी १०
चांदवड ०९
कळवण ०७
सिन्नर ०६
येवला ०६
नाशिक ०३
त्र्यंबकेश्वर ०३
देवळा ०१
सुरगाणा ०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ धार्मिक स्‍थळांवर आज हातोडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या निर्णयाविरोधात शहरातील धार्मिक संघटनांनी बुधवारी नाशिक बंदची हाक दिली असली तरी, प्रशासन धार्मिक स्थळांवरील कारवाईवर ठाम आहे. प्रशासनाने ठरलेल्या कृती आराखड्यानुसार बुधवारपासून (दि. ८) १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईला सुरुवात होणार आहे. सिडको सातपूरमधून सकाळी ही कारवाई सुरू होईल. पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील धार्मिक स्थळे हटवली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांसह अतिक्रमण विभागाचे ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या पथकात राहणार असून, दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईचे व्हिड‌िओ चित्रीकरण केले जाणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ६५९ अधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली होती. त्यात २००९ पूर्वीची आणि नंतरची अशी वर्गवारी करण्यात आली आहे. हायकोर्टाने सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भातील डेडलाइन नोव्हेंबर २०१७ दिली आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पालिकेने तयारी केली असून, आजपासून रस्त्यांवरील १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला जाणार आहे. यापूर्वी पालिकेने १०५ धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. पहिल्या टप्प्यात २००९ पूर्वीच्या ६५९ धार्मिक स्थळांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. पालिकेने जवळपास १०५ धार्मिक स्थळांवर कारवाईदेखील केली होती. परंतु, शिवसेनेसह काही संस्था-संघटनांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, आता कोर्टाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्याने महापालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला

महापालिका हद्दीतील १४२ आणि सिडकोच्या हद्दीतील ८ अशा एकूण १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर आजपासून कारवाई केली जाणार आहे. तसेच २००९ नंतरच्या खुल्या जागांवरील ५७ आणि सिडकोतील १४ अशा ७१ अनधिकृत धार्मिक स्थळांचाही कारवाईत समावेश आहे.

धार्मिक संघटना आक्रमक

या कारवाईविरोधात शहरातील धार्मिक संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी कारवाईलाच विरोध केला आहे. सोमवारी महापौर व आमदारांच्या उपस्थितीत बैठक होऊन फेरसर्वेक्षणाची मागणी करण्यात आली होती. परंतु, प्रशासनाने हायकोर्टाचे आदेश असल्याचे सांगत, कारवाई होणारच असा दावा केला होता. त्यानुसार बुधवारपासून या कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. बुधवारी सिडकोतील सहा तर सातपूरमधील १० धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार असून, त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.

प्रशासनाकडून तयारी

अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. यात अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्त, सहा विभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात दोन जेसीबी, नगररचना व बांधकाम विभागाचे अभियंतेही असणार आहेत. या पथकाला पोलिसांचे संरक्षण राहणार असून, दंगा नियंत्रण पथकासह पोल‌िसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

व्हिड‌िओ चित्रीकरण होणार

अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईला धार्मिक संघटनांचा तीव्र विरोध आहे. सर्व्हेक्षण चुकीचे झाल्याचा आरोप करत नागरिकांनी या कारवाई विरोधात उद्या बंदची हाक दिली आहे.त्यामुळे या कारवाईवरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेच्या वतीने कारवाईचे व्हिड‌िओ चित्रीकरण केले जाणार आहे. कारवाईला अडथळा करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवता यावे, तसेच वाद झाल्यास हायकोर्टात जमा करता यावा यासाठी पालिकेने तजवीज केली आहे.

तगडा बंदोबस्त

सिडको आणि सातपूर परिसरातील धार्मिक स्थळ हटवण्याची मोहीम आज बुधवारी (दि. ८) पहाटेपासून सुरू होणार आहे. यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, नाशिक बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने महापालिका प्रशासनाने काही धार्मिक स्थळे हटविण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेविरोधात हिंदुत्ववादी संघटना, तसेच सर्वपक्षीय नेते एकटवले असून, नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार बुधवारी पहाटेपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू होणार आहे. यासाठी चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक, १० एपीआय तसेच पीएसआय, ५० कॉन्स्टेबल, २० महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, बंदच्या पार्श्वभूमीवर फिक्स पॉइंट नेमण्यात येणार आहेत. याशिवाय दंगा नियंत्रक पथक, शीघ्र कृती दले मुख्यालयात तैनात असतील.

हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली असून, त्यास पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करीत सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त


जिल्हा कोर्टात सात अर्ज

मनपाच्या धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात सात अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी असलेल्या महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस आणि मनपाचा पूर्व विभागीय कार्यालयांच्या प्रमुखांचा जबाब नोंदविण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. तोपर्यंत पूर्व विभागातील धार्मिक स्थळांच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. डब्ल्यू. गायकवाड यांच्या कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान, धार्मिक स्थळे हटवण्याबाबत हायकोर्टाने आदेश दिले असून, ज्या सर्व्हेक्षणाच्या आधारे हा निर्णय झाला, तो सर्व्हेच चुकीचा असल्याचा दावा करीत शहरातील १५ नागरिकांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. यात धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह, संस्था संघटनांचा समावेश आहे. अल उस्मानिया वेल्फेअर, इम्रान युसूफ शेख, सय्यद इकरार नासिर, अजहर मुस्ताक शेख, हजरत सय्यद जलालशहा हुसेनी, सय्यद मिरमुखतार अशरफी आणि क्रांती फ्रेंड सर्कल आदींचा समावेश आहे. कोर्टाने या अंतरिम अर्जावर प्रतिवादांना म्हणणे मांडण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली असून, संबधीतांच्या जबाबानंतरच पूर्व विभागातील धार्मिक स्थळांचा प्रश्न निकाली लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाने मागवल्या नागरिकांकडून सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जागतिक विद्यापीठ योजनेत स्थान मिळावे, असे वाटत असेल तर तुम्ही थेट विद्यापीठ प्रशासनास आणखी सुधारणेसाठी सूचना करू शकतात, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नागरिकांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकी दहा सरकारी आणि खासगी अशी एकूण २० विद्यापीठे जागतिक दर्जाची करण्यासाठी ‘इन्स्टिट्यूशन्स ऑफ एमिनन्स’ योजना जाहीर केली आहे. या योजनेत विद्यापीठाचा समावेश व्हावा, यासाठी पुणे विद्यापीठाच्या वतीने डॉ. करमळकर आग्रही आहे. ही योजना जाहीर होताच विद्यापीठाने तज्ज्ञांची समिती स्थापन करत हालचाली सुरू केल्या आहेत. या समितीच्या सदस्यांवर योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी आहे.
१५ नोव्हेंबरपूर्वी
साधा संपर्क
या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आणि नागरिक यांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविण्यासाठी सूचना पाठवाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी नाग‌रिकांनी १५ नोव्हेंबरच्या अगोदर आपली मते आणि सूचना sppuforeminence@gmail.com या इ मेल आयडीवर मेल कराव्यात असे आवाहन केले आहे. आपली मते आणि सूचना मांडताना काही प्रश्नांवर कुलगुरूंनी लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रश्नांमध्ये विद्यापीठाची बलस्थाने काय आहेत, उच्च शिक्षणाच्या दृष्टीने विद्यापीठ कसे असावे, विद्यापीठाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, नवीन अभ्यासक्रम काय असावेत, विद्यापीठाचा समाजाशी संवाद कसा आसावा, संशोधन, अध्यापन, लोकांशी संवाद या गोष्टी सुधारण्यासाठी आणखी काय व्हायला हवे या प्रश्नांवर प्रामुख्याने नागरिकांनी विचार लिहावेत, अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे.
सबकॅम्पसचा मुद्दा
पुणे विद्यापीठातील मोठी विद्यार्थीसंख्या आणि कॉलेजेस संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार पुण्यात केंद्रीत असल्याने निकालापासून तर अनेक तांत्रिक कामकाजातील तक्रारी व दुरुस्त्यांसाठी सातत्याने नाशिककरांना पुणे विद्यापीठ गाठावे लागते. विद्यापीठाच्या विकेंद्रीकरणास काही वर्षांपूर्वी झालेली सुरूवात सद्यःस्थितीत लालफितीच्या कारभारात अडकली आहे. जागा ताब्यात असूनही केवळ निधीच्या उपलब्धतेअभावी विद्यापीठ उपकेंद्राच्या भाडोत्री जागेचा तिढा सुटेना. दिंडोरीत सबकॅम्पसच्या कामाचा मुहूर्तही साधला जाईना. या विकेंद्रीकरणाअभावी नाशिककर विद्यार्थ्यांना लहान-सहान कामांसाठी विद्यापीठाकडे धाव घ्यावी लागते. यादृष्टीने नाशिककरांनी या संधीचा उपयोग करून सबकॅम्पसचा मुद्दा उचलून धरावा, असे आवाहनही विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज नाशिक बंदची हाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून नाशिकमधील मंदिरांचे चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेने २००९ नंतरचे जी काही मंदिरे बांधण्यात आली त्यांना अनधिकृत ठरविले आहे. अशी धार्मिक स्थळे हटविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्यामुळे आज (दि. ८) नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन मठ मंदिर बचाव संघर्ष समितीने केले आहे.

धार्मिक स्थळे अतिक्रमण असल्याचे ठरवून ते पाडण्याचा प्रयत्न होणार असल्यामुळे सर्व धर्मियांनी महापालिकेच्या विरोधात नाशिक बंद पुकारला आहे. यानिमित्ताने सर्वधर्मियांतर्फे पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती देण्यात आली. महंत भक्त‌िचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत शिवमदास महाराज, सतीश शुक्ल, सुनील बागूल, गजानन शेलार, रामसिंग बावरी आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

भक्त‌िचरणदास महाराज यांनी हा सर्व्हे चुकीचा झाला असून, तो पुन्हा करण्यात यावा अशी मागणी केली. रामकिशोरदास शास्त्री यांनी मोगलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही धार्मिक स्थळे तोडण्यात आली नाही, कोणाची तक्रार नसतानाही कारवाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

सतीश शुक्ल यांनी नाशिक तीर्थक्षेत्रात मंदिर हा आस्थेचा विषय आहे. महापालिकेची परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बळी मंदिरालाही नोटीस काढण्यात आल्याची खंत व्यक्त केली. इजाज रझा यांनी महापालिकेने धार्मिक भावनांना ठेच पोहचू देऊ नये, असे आवाहन केले.

मंदिरे अनाधिकृत ठरवित नाशिक महापालिकेने आतापर्यंत १५० मंदिरांवर हातोडा चालविला आहे. त्यानंतर सन १९६० नंतरच्या मंदिरांवर निशाणा साधत धार्मिक स्थळे अनाधिकृत ठरविण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सन १९६० किंवा सन २००९ असा कुठल्याही तारखांचा उल्लेख केलेला नाही. अथवा कुठल्याही प्रकारची अंतिम मुदत दिलेली नाही. कोणाची काही तक्रार नाही अशा मंदिरांना धक्का लावू नये. असे असताना चुकीच्या पद्धतीने धार्मिक स्थळे हटविण्याचा निषेध म्हणून सर्वधर्मिय शांततेत हा बंद पाळणार आहेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांनी फुलली गणेश मंदिरे...

$
0
0

सोशल कनेक्ट

--

भाविकांनी फुलली गणेश मंदिरे...


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी अंगारकी म्हणून संबोधली जाते. हा योग वर्षातून मोजक्याच चतुर्थींना येतो. असाच योग मंगळवारी आल्यामुळे भाविकांची शहर परिसरातील गणेश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी झाली होती. गणेशाला आवडणाऱ्या दुर्वा, लाल रंगाचे फूल, जास्वंदीची फुले वाहण्यात येत होती.

शहरातील सिद्धिविनायक मंदिर, ढोल्या गणेश मंदिर, साक्षी गणेश, नवश्या गणपती आदी गणेश मंदिरांत सकाळपासूनच गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरांच्या बाहेर पूजेसाठी लागणारी फुले, हार, दुर्वा, नारळ, प्रसाद यांची दुकाने सजली होती. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक गणेश मंदिरांत येत होते. संकष्ट चतुर्थी हा वर्षातील दुर्मिळ अंगारकी योग मानला जात असल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या श्रद्धेने, तसेच अडकलेले महत्त्वाची इप्सित कामे मार्गी लागण्यासाठी या दिवशी उपवास करून भाविकांकडून गणेशाची आराधना केली जाते. शहरातील असंख्य भाविकांकडून दिवसभर उपवास धरून रात्री चंद्रदर्शन घेत गणेशाचे श्लोक म्हणत उपवास सोडण्यात आले.

---

‘नवश्या’ परिसरात विविध उपक्रम

गंगापूररोड ः नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या नवश्या गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी झाली होती. नवश्या गणपती मंदिर ट्रस्टतर्फे सकाळी पालखीचे आयोजन करण्यात आले होते. आनंदवली गावातून पालखी मंदिरात पोहोचल्यावर नगरसेवक तथा शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका नयना गांगुर्डे, नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी साबुदाणा फराळचे वाटप ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची नवश्या गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

---

नाशिकरोडला भाविकांचा उत्साह

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अंगारकी चतुर्थीनिमित्त नाशिकरोडच्या गणेश मंदिरांमध्ये भक्तांनी पहाटेपासून गर्दी केली होती. उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिरात सकाळी अभिषेक, महापूजा झाली. आकर्षक मूर्ती व प्रशस्त परिसर असल्यामुळे येथे चतुर्थीला भाविक लांबून येतात. अंगारकीमुळे मंगळवारी उपनगर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

पूजेच्या साहित्याबरोबरच खेळणी व गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स लागले होते. विहितगाव परिसरातील अण्णा गणपती नवग्रह मंदिराकडे नदीकाठचा शांत व भव्य परिसर, स्वच्छता, सुंदर बगीचा यामुळे भाविकांचा ओढा वाढला आहे. येथे अण्णा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक झाला. येथे दिवसभर भाविकांची गर्दी होती. सायंकाळनंतर येथील दीपोत्सव पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविक येत होते. देवळालीगावातील गणेश मंदिरातही भाविकांनी रांगा लावल्या होत्या. जेलरोड येथील मॉडेल कॉलनी व चंद्रेश्वरनगर, चेहेडीतील गणेश मंदिर, डीजीपनगर क्रमांक दोन येथील गणेश मंदिर, दत्त मंदिररोडवरील गणेश मंदिरातही गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबरीकरणाची यादी अखेर संकेतस्थळावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या महासभेत महापौरांनी मागच्या दाराने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. विरोधी पक्षांच्या आक्षेपानंतर अखेर सत्तारूढ भाजपने २५७ कोटींच्या रस्ते विकासाची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. याअंतर्गत महापालिका क्षेत्रातील ३१ प्रभागांमधील तसेच सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे ६०० कि.मी. लांबींच्या रस्त्यांचे दोन वर्षांत नूतनीकरण केले जाणार आहे.

सत्तारूढ भाजपने गत महिन्यात झालेल्या महासभेत विनाचर्चा मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या योजनेवरून विरोधकांनी रान उठविले होते. या योजनेंतर्गत कोणत्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे, त्यासंदर्भातील यादी सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी २६ ऑक्टोबर रोजी बैठक घेत रस्त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

सहाशे किमी रस्त्यांचे नूतनीकरण

सहाशे किलोमीटरचे रस्ते नूतनीकरण केले जाणार असून, त्यात ५४० कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरण, ४० कि.मी. रस्त्यांचे खडीकरण तर २० कि.मी. रस्त्यांचे कॉँ‌क्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे विरोधकांचा धुरळा शांत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूचा प्रकोप कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाने उसंत देऊन थंडीची चाहूल लागली, तरी शहरात डेंग्यूचा प्रकोप कमी होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या वर्षभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचली असतानाच, नोव्हेंबरमध्येही डेंग्यू नवे रेकॉर्ड नोंदवण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या अवघ्या सहा दिवसांतच शहरात डेंग्यूचे ११४ संशय‌ित, तर ५४ रुग्ण पॉझ‌िट‌िव्ह आढळून आले आहेत. ऑक्टोबरमध्ये ४७७ संशय‌ित तर २४८ रुग्ण पॉझ‌िट‌िव्ह आढळून आले आहेत. डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपामुळे पालिकेच्या उपाययोजना कूचकामी ठरत असून, नाशिककरांच्या आरोग्याला धोका वाढला आहे.

महापालिकेच्या वतीने डेंग्यू संदर्भातील उपाययोजना कागदावरच असल्याचे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदा स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली. या डासांची उत्पत्तीस्थाने वाढतच गेली. परिणामी, डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आजाराची साथ शहरात मोठ्या प्रमाणावर फैलावली असून, त‌िचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महिन्यात या आजाराची लागण ऑगस्टमध्ये ९७ डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू संशय‌ितांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नाशिकसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

‘स्वाइन फ्लू’ ओसरला

डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूनेही नाशिक शहरासह जिल्ह्यात कहर केला होता. राज्यात स्वाइन फ्लूने सर्वाधिक मृत्यू हे नाशिकमध्ये नोंदले गेले आहेत. परंतु, नोव्हेंबरमध्ये स्वाइन फ्लूचा कहर कमी झाल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर मह‌िन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वाइन फ्लूचा एकच रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीत नाशिक प्रेस ठरली तारणहार

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नोटाबंदीच्या काळात संपूर्ण देश बँकांसमोर रांगेत उभा असताना नाशिकची करन्सी प्रेस ही सर्वांच्या मदतीला धावून आली. ऐतिहासिक नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीत सरकारला नोटांचे रेशनिंग करावे लागले. नोटाबंदीच्या झळा असह्य होण्याच्या आधीपासून नाशिकरोडचे प्रेस कामगार रात्रीचा दिवस करीत होते. गेल्या नोव्हेंबरपासून दहा महिने हे कामगार साप्ताहिक सुटी, रजा न घेता नॉनस्टाप काम करीत अब्जावधींच्या नोटांची छपाई केली.

विमानांद्वारे नोटा रवाना

नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. रोज दोन- तीन वॅगन नोटा रवाना होतात. नोटाबंदीत पाचशेची नवी नोट आली. नोटाबंदीत नोटांची टंचाई दूर करण्यासाठी नाशिक प्रेसच्या नोटा देशभरात पोहोचवण्यासाठी सरकारने ओझर विमानतळावर विमानांचा वापर केला. देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. सलग पाच महिने विमानाने नोटा जम्मू, भुवनेश्वर, त्रिवेंद्रम, मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी ठिकाणी रवाना होत होत्या.

मोदींकडून कौतुक

नोटाबंदी काळात प्रेस कामगारांनी दिवस-रात्र काम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटलींनीही कामगारांचे कौतुक केले. मोदींनी कामगार नेत्यांना दिल्लीत बोलावून शाबासकी दिली. फोटोसेशन केले. महामंडळाचे तत्कालीन सीएमडी प्रवीण गर्ग, विद्यमान सीएमडी अनुराग अग्रवाल यांनीही प्रशस्तिपत्र दिले. याचीच पावती म्हणून सरकारने महामंडळ असतानाही प्रेस कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला. आता नोट पेपर मिलचा कारखाना नाशिकला द्यावा, एवढीच प्रेस नेत्यांची अपेक्षा आहे.

रुपयाच्या नोटेचीही छपाई

नाशिक प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या नोटांची छपाई होते. नोटाबंदीच्या काळात एक रुपयाच्या नोटेची मोठी ऑर्डर प्रेसने पूर्ण केली. देशात २५ वर्षांनंतर एकच्या नोटेची छपाई झाली. नोटाबंदीत सर्वांत जास्त छपाई पाचशेच्या नोटेची झाली. गेल्या तीन महिन्यांपासून पाचशेच्या नोटेची छपाई बंद आहे. त्याऐवजी दोनशे व पन्नासच्या नवीन नोटांची छपाई सुरू आहे. एक नोट फायनल होण्यासाठी आठ दिवस लागतात. त्या पार्श्वभूमीवर नोटाबंदीत दिवसाला २१ दशलक्ष नोटा छापून प्रेस कामगारांनी सर्वांना चकित केले.

चारच छपाई केंद्रे

नोटांची छपाई देशात प्रेस महामंडळाच्या नाशिक व देवास (मध्य प्रदेश) येथे होते. अलीकडे रिझर्व्ह बँकेने म्हैसूर व सालबोनी (बंगाल) येथे स्वतःच्या दोन प्रेस सुरू केल्या. नोटाछपाईच्या नाशिकला चार, देवासला तीन, तर रिझर्व्ह बँकेच्या चौदा मशीन आहेत. नोटाबंदीत या चौदा मशिन्सवर अब्जावधींच्या नोटांची छपाई करण्यात आली. नाशिक प्रेसमध्ये दिवसाला १५ ते १८ दशलक्ष नोटांची छपाई होते. नोटाबंदीच्या दहा महिन्यांत रविवारीही काम केल्यामुळे दररोज २१ दशलक्ष नोटांची विक्रमी छपाई झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर उद्यानाची ‘वाट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

उद्यानाच्या आजूबाजूच्या परिसरासह आवारात वाढलेले गवत, तुटलेल्या खेळणी, जुन्या कंपाऊंडचे भंगार, कचऱ्याचे ढीग, उघड्या डीपी व वायर, बाकड्यांची झालेली दुरवस्था अशी अवस्था आहे म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक एकमधील सावरकरनगर कॉलनी परिसरातील वीर सावरकर उद्यानाची.

येथील मध्यवस्तीतील भव्य व मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या उद्यानाची दुरवस्था होऊनदेखील परिसरातील लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या उद्यान विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी संबंधित घटकांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक एका हा विद्यमान महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. मात्र, या प्रभागातील म्हसरूळमधील सावरकरनगर कॉलनीतील वीर सावरकर उद्यानात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच मोटर बसविण्यात आलेली असून, येथील डीपी आणि केबल उघडी असल्याने उद्यानात येणाऱ्या लहान मुलांचा धक्का लागून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. येथे गवतही अस्ताव्यस्त वाढलेले आहे. शिवाय कचऱ्याचेदेखील साम्राज्य पसरलेले आहे. येथील खेळण्यांची तर मोडतोड होऊन दयनीय अवस्था झालेली आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारीच नसल्यामुळे येथे साफसफाई, देखभाल होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

--

जुन्या कंपाउंडचे भंगार

या उद्यानात खेळण्यांच्या बाजूला जुन्या कंपाउंडचे भंगार पडलेले आहे. उद्यानात अनेक लहान मुले खेळत असतात नकळतपणे खेळताना या लोखंडी जाळ्यांमुळे दुखापत होण्याचीदेखील भीती निर्माण होते. शिवाय उद्यान मोकळे असणे अपेक्षित असताना जुने भंगार साचवलेले असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

--

तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष

या उद्यानातील बाकडी व अन्य वस्तूंसह खेळण्यांचीदेखील मोडतोड झालेली आहे. त्यामुळे या उद्यानाची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. मात्र, असे असूनदेखील या उद्यानाच्या दुरवस्थेसंदर्भात अनेक वेळा तक्रारी व पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी अाहेत. दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तक्रारींची अद्यापही दखल घेतली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरासाठी हे एक मध्यवर्ती उद्यान असल्याने त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपाचा वैद्यकीय अभ्यासक्रम दृष्टीपथात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे महापालिकेचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे. या अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी कॉलेज ऑफ फिजिशियन्स अॅण्‍ड सर्जनचे एक पथक पंधरा दिवसांत मनपा रुग्णालयांच्या पाहणीसाठी येणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू होण्याच्या आशा बळावल्या आहेत. दुसरीकडे या अभ्यासक्रमासाठी खासगी क्षेत्रातील ६६ वैद्यकीय व्यावसायिकांची प्राध्यापकपदी मानधनावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र भंडारी यांनी दिली.

महापालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून केले जात आहेत. महापालिका आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार होते. परंतु, करारनाम्यावरून हा सर्व विषय फिस्कटला. त्यामुळे महापालिकेचा हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेने पळविला. संदर्भसेवेचा प्रयत्नही अयशस्वी झाला. त्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीत स्वतंत्र ११ विभाग तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी महासभेने दीड कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यतादेखील दिली असून, त्याअंतर्गत सीपीएससी बोर्डाचे परवाना शुल्क, कॉलेज शुल्क, लेक्चर हॉल, डेमो रूम आदींची उभारणी केली जाणार आहे. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मनपाला पाच ते सहा लाखांचे शैक्षणिक शुल्कदेखील उपलब्ध होणार आहे. या शुल्कातून मनपाला अभ्यासक्रमाचा खर्च भागविता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरमतमोजणी घेतली कशी?

$
0
0

सुरेश गायधनी यांचा सवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी एका पत्राचे उत्तर देताना ‘आपण निवडणूक निर्णय अधिकारी नसल्याने पुन्हा पत्रव्यवहार करू नये’ अशा आशयाचे पत्र दिलेले असताना त्यांना फेरमतमोजणी घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल जनस्थान पॅनलचे तत्कालीन उमेदवार सुरेश गायधनी यांनी विचारला आहे.

सुरेश गायधनी यांनी ८ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना पत्र दिले होते. त्यात नमूद केले होते की, चुकीच्या घटनेचा आधार घेऊन ही निवडणूक घेण्यात आली आहे. नियमानुसार एक वर्ष सभासद नसताना, वेळेवर सभासद फी भरलेली नसताना सभासद यादीत समावेश केला आहे. याबाबत ते पत्र असून नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात असे नमूद केलेले होते. यावर उत्तर म्हणून संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली असून या संदर्भातील फेरफार अर्ज ३० जून रोजी संस्थेने धर्मादाय उपायुक्त यांच्याखडे दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंदर्भातील कोणतीही बाब आता माझ्या अखत्यारित राहिलेली नाही. फेरमतमोजणीसंदर्भात धनंजय बेळे यांनी धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला असून, त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे. न्यायप्रविष्ठ बाबीबद्दल कोणीही काहीही प्रतिक्रिया व्यक्त करणे न्यायोचित होणार नाही. त्यामुळे मी आपल्या निवडणुकीसंदर्भातील कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाही. यासंदर्भात आपण यापुढे माझ्याशी पत्रव्यवहार करू नये अशी विनंती भणगे यांनी केली होती. याचा सरळसरळ अर्थ ‘आपण निवडणूक निर्णय अधिकारी नसल्याने पुन्हा पत्रव्यवहार करू नये’ असा होत असल्याने त्यांना फेरमतमोजणी घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल गायधनी यांनी केला आहे.

तीन मतांचा घोळ नेमका कुठे?

३ एप्रिल रोजी झालेल्या मतमोजणीत वाघ यांना ८९४ तर बेळे यांना ८९५ मते पडली होती. आताच्या फेरमतमोजणीत बेळे यांना ८९४ तर वाघ यांना ८९७ मते पडली आहेत. मग ही तीन मते आली कुठून अशी चर्चा काही काळ रंगली होती. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना याबाबत विचारले असता, ‘मतमोजणी अधिकारी शेवटी माणसेच आहेत. त्यांच्याकडून चुका होणारच. एखादी टीकमार्क खाली वर झाली असेल’ असे उत्तर त्यांनी दिले. तर मते मोजण्यास बसलेल्या बी. जी. वाघ यांच्या एका प्रतिनिधीने, वाघ यांच्या दोन मतांची टीकमार्क हंसराज वडघुले यांच्यापुढे झाली असल्याचे सांगितले.

दोघांपैकी कोणीही निवडून आले असते तरी आमच्यासाठी सारखेच असते. फेरमतमोजणीचे कोणी राजकीय भांडवल करू नये, त्यामुळे वाचनालयाची बदनामी होते. मात्र आता सत्याचा विजय झाला आहे.

- प्रा. विलास औरंगाबादकर, अध्यक्ष सावाना

सावानाला उद्योजकांपेक्षा साहित्यिकांची जास्त गरज आहे. बी. जी. वाघ साहित्यातील माणूस आहे. खरे तर आमच्या एका डोळ्यात हसू आहे तर एका डोळ्यात आसू आहे.

- श्रीकांत बेणी, प्रमुख सचिव, सावाना

फेरमतमोजणी आणि तेथे लागलेला निकाल याविषयी जनस्थान पॅनल एकत्र जमून चर्चा करणार आहे. हा अन्यायही सहन करणार नाही. दिशा ठरवावी लागणार आहे.

- अभय ओझरकर, जनस्थान पॅनल प्रणेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद आधार सेंटर्सचे किट जप्त

$
0
0

म. टा. प्रत‌नििधी, नाशिक

आधारकार्ड एनरोलमेंट आणि अपडेशनबाबत नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात १७ केंद्रे सुरू केली. परंतु, यापैकी काही सेंटर्सकडे सेंटरचालक फिरकतच नसल्याने तेथील किट जप्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

आधारकार्ड काढणे किंवा ते अपडेट करणे या कामांसाठी नागरिकांना आधार सेंटर्सचा शोध घ्यावा लागत आहे. आधार केंद्रांबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. शहरातील महापालिकेच्या शाळा, सरकारी कार्यालयांमध्ये एकूण १७ सेंटर्स सुरू करण्यात आली. परंतु, त्यापैकी काही सेंटर्स सुरूच नसल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आधार केंद्रे सुरू राहत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी चिन्मय गाडे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतरही आधार केंद्र सुरू राहत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पंचवटीतील काही केंद्रांना भेट दिली. त्यावेळी ही केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले. या केंद्रांवर तत्काळ कारवाई करा, असे आदेश उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिले आहेत. सरकारी कार्यालय परिसरात केंद्र सुरू न करणाऱ्या केंद्राचे आधार किट जमा करण्यात येणार असल्याची माहिती मंगरूळे यांनी दिली.

सरकारी कार्यालयांच्या परिसरात जागा उपलब्ध करून देऊनही आधार केंद्र सुरू करण्यात आलेले नाहीत. अशा केंद्रांचे आधार किट जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अनेक ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यात आली असली तरी ते बंद राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा केंद्रांवरही कारवाई केली जाणार आहे.

- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी, त्र्यंबकमध्ये १० डिसेंबरला मतदान

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषद निवडणुकीचा बिगूल वाजला असून, १० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपरिषदांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

राज्यातील विविध १७ नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी जाहीर केला. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी १६ ते २२ नोव्हेंबर असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २८ नोव्हेंबर, तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात ‘कॅशलेस’चा फज्जा!

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेचा नाशिकमध्ये पुरता फज्जा उडाला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि बँकांमधील समन्वयाच्या अभावामुळे कॅशलेस गावांच्या उपक्रमाला खीळ बसली आहे. परिणामी ‘कॅशलेस’साठी निवडलेल्या गावांतही रोखीनेच व्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे.

नोटाबंदीनंतर सर्वत्र ‘कॅशलेस’चा डंका पिटण्यात आला. रोखीचे व्यवहार कमी करून कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून केले जात होते. जिल्ह्यात कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. प्रायोगिक तत्त्वावर १०० गावे कॅशलेस करण्याचा निर्णय झाला होता. याखेरीज बँकांनाही प्रत्येकी दोन गावे कॅशलेससाठी दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या सर्वच यंत्रणांची अत्यंत संथ गतीने कॅशलेसकडे वाटचाल सुरू आहे. निवड करण्यात आलेल्या बहुतांश गावांमध्ये मार्च २०१७ पर्यंतच कॅशलेस करण्याचे उद्द‌िेष्ट होते. मात्र, हे उद्द‌िष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही.

सिन्नर तालुक्यात चापडगाव कॅशलेस करण्यात आले, तसेच सय्यद प्रिंपी, दरी-मातोरी, भोयेगाव, अवनखेड, अंबोली, अंदरसूल यांसारखी गावेही कॅशलेसच्या प्राधान्य यादीमध्ये घेण्यात आली. सय्यद पिंप्रीमध्ये १० ते १५ व्यावसायिकांनी स्वाइप मशीन खरेदी केली. ही मशीन मिळविण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा काळ गेला. १५ हजार रुपयांचे हे मशिन पेट्रोलपंप, रासायनिक खतांची दुकाने किंवा तत्सम व्यावसायिकांनी खरेदी केले. मात्र, स्वाइपद्वारे अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा अनुभव पेट्रोलपंप व तत्सम ठिकाणी ग्रामस्थांना आल्याची माहिती शंकर ढिकले यांनी दिली. स्वाइपद्वारे एक हजार रुपयांचे डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना ३० रुपये अधिक मोजावे लागत होते. त्यामुळे कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या गावाचाही कॅशलेसच्या यादीमध्ये समावेश होता. मात्र, या गावातील एकाही दुकानात अद्याप स्वाइप मशीन नाही. त्यामुळे हे गाव अद्याप कॅशलेस झाले नसल्याची माहिती नरेंद्र जाधव यांनी दिली.

कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण कमीच

कॅशलेस ही चांगली संकल्पना असली तरी त्याबाबतची विश्वासार्हता नागरिकांच्या मनात अद्याप निर्माण झाली नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्याने दिली. ग्रामीण भागात अद्याप अनेक लोकांचे बँकांमध्ये खाते नाही. गाव कॅशलेस करण्यासाठी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांची बँक खाती उघडून ती आधार लिंक करणे अनिवार्य आहे. हीच प्रक्रिया अधिक वेळखाऊ आहे. ‘कॅशलेस’बाबतची अविश्वासार्हता आणि सुप्त भीतीही ग्रामस्थांना अशा व्यवहारांपासून रोखते. ‘कॅशलेस’साठी स्वाइप मशीन आवश्यक असून, पदरमोड करून ते का खरेदी करावे, असा गावातील व्यावसायिकांचा प्रश्न असतो. त्यांना ते मशीन मोफत हवे आहे. अशा सर्व कारणांमुळे कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण खूप कमी आहेत. तरीही गावोगावी कॅशलेस व्यवहार वाढावेत, यासाठी आम्ही तेथील तरुण पिढीला प्रशिक्षित करीत आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images