Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिलिंडरने मारले; सबसिडीने तारले!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्याने मध्यमवर्गीयांमध्ये संताप होत आहे. मात्र सिलिंडरसाठी त्यांना तब्बल ७३८ रुपये मोजावे लागत असले तरी त्यांच्या बँक खात्यात जमा होणाऱ्या सबसिडीच्या रक्कमेतही वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडर घेताना द्यावा लागणार वाढीव दर तुर्तास ग्राहकांना घाम फोडत आहे.

ऑगस्ट महिन्यापासून सरकारने सिलिंडरच्या दरात टप्याटप्याने दरवाढ करत आगामी मार्च महिन्यापासून त्यावरील सबसिडी रद्द करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. काही महिन्यात सबसिडी बंद झाल्यावर गॅस सिल‌िंडर किती महाग होणार या विचाराने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

गेल्या दोन महिन्यात या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. सिलिंडरच्या दरात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल दोनशे ते अडीचशे रुपये एवढी दरवाढ झाली आहे. सरकारने रेशन दुकानांवर मिळणारे रॉकेल यापूर्वीच बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीयांना गॅसशिवाय पर्याय उपलब्ध नाही. रॉकेल सहसा उपलब्ध होत नाही. काळ्या बाजारात मात्र त्याची विक्री चढ्या भावाने सर्रासपणे होत असून, या घटकांना परवडणारे नाही.

सबसिडीतही वाढ

या महिन्यात नाशिक जिल्ह्यात अनुदानित सिलिंडरसाठी ७३८ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. गत महिन्यात ६४५ रुपये एवढा दर होता. गत महिन्याच्या तुलनेने ९३ रु इतकी दरवाढ झाली आहे.

याऊलट गेल्या महिन्यात ६४५ रुपये गॅस सिल‌िंडरची किंमत असताना सबसिडी १४७ रुपये मिळत होती. या महिन्यात सिलिंडरची किंमत ७३८ रुपये झाली असली तरी स‌बसिडी मात्र २६३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे तुर्तास दारात सिलिंडर आल्यानंतर नागरिकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात सबसिडी जमा होत आहे.

मार्चनंतरच्या दराबाबत संभ्रम

सिलिंडवरील दरवाढत अशीच वाढत जाणार आहे. मात्र आता स‌बसिडी मिळत आहे. पण जेव्हा सबसिडी बंद होणार तेव्हा गॅस सिलिंडरचे दर किती असतील याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

व्यावसाय‌किांना फटका

घरगुती गॅस सिल‌िंडरावर सध्या सबसिडी मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांना या दरवढीचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर ११५८ रुपयांना मिळत होते. या महिन्यात ते १३०५ रुपयांना मिळत आहे.

सिलिंडरची किंमत जरी जास्त मोजावी लागली तरी ग्राहकाच्या नोंदणी करण्यात आलेल्या बँक खात्यात सिलिंडरवरील अनुदानित रक्कम जमा होत आहे. त्यामुळे फार काही फरक पडणार नाही.

- अरुण कासार, व्यवस्थापक, गॅस एजन्सी

सध्या स‌लििंडरची किंमत वाढलेली दिसत असली तरी ती दरवाढ नागरिकांना काही दिवसांपुरताच सहन करावी लागणार आहे. साधारणपणे तीन ते चार दिवसांत नागरिकांच्या बचत खात्यात सबसिडीची रक्कम जमा होते. सबसिडीतही आता वाढ झाली आहे.

- भास्कर पाटील, व्यवस्थापक, नाशिक गॅस

घर खर्चाला मिळणाऱ्या बजेटमध्ये दरमहा वाढ होत आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस आमच्यासारखे सर्वसामान्य पुन्हा चुलीकडे वळतील.

- ज्योती गाढवे, गृहिणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढलेल्या दरांवरून राष्ट्रवादी आक्रमक

$
0
0


म. टा. प्रत‌नििधी, नाशिक

गॅस सिल‌िंडरच्या दरात ९५ रुपयांहून अधिक वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आंदोलकांनी आणलेले गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले.

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गत महिन्यापासून गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला या अवाजवी दरवाढीची झळ सोसावी लागते आहे. ऑगस्ट महिन्यापासून कंपनीने सिलिंडर दरवाढीचे धोरण स्वीकारले. ऑगस्ट ते नोव्हेबर २०१७ या कालावधीत सिलिंडरमध्ये साधारणतः सव्वा दोनशे रुपयांची दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. दरवाढ लवकरात लवकर रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार, युवकाध्यक्ष अंबादास खैरे, शहर सरचिटणीस संजय खैरनार आदींनी केली आहे.
आंदोलनात सुरेश आव्हाड, संजय बोडके, चिन्मय गाढे, अनिता भामरे, सुषमा पगारे, समीना मेमन, अनिल जोंधळे, बाळासाहेब गीते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचं चांगभलं!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याची कारवाई केली. त्याचे सकारात्मक परिणाम यंदा दिसून आले आहेत. घरपट्टी व पाणीपट्टीत वसुलीत गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा तब्बल २२ कोटींची घसघशीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत घरपट्टीची ४५ कोटी वसुली झाली होती. यंदा मात्र त्यात १२ कोटी ५८ लाखाची भर पडून ती ५७ कोटी ७६ लाखांपर्यंत पोहचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेरपर्यंत पाणीपट्टीची १० कोटी ६७ लाखांची वसुली झाली होती. यंदा त्यात ९ कोटींची वाढ होवून पाणीपट्टी वसुली ही २० कोटींवर पोहचली आहे. तर सवलत व ऑनलाइन योजनेमुळे महापालिकेच्या तिजोरीत ३५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेचे यंदा वसुलीत चांगभल झाल आहे.

एलबीटी पाठोपाठ जीएसटी अनुदानाने महापालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने आता शंभर टक्के वसुलीवर भर दिला असून घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीवर अधिक लक्ष देत थेट वसुलीची धडक मोहीम यंदा राबविली आहे. घरपट्टीचे उत्पन्न सक्षम करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन करभरणा व देयके हाती पडण्यापूर्वी कर अदा करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सवलत योजना सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत चांगली वाढ झाली आहे. वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांना नोट‌िसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते ऑक्टोबर २०१६ या काळात महापालिकेची ४५ कोटी १८ लाखांची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा वसुलीत घसघशीत वाढ झाली आहे. यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या काळात ५७ कोटी ७६ लाखांची वसुली झाली. त्यात १२ कोटी ५८ लाख रुपये गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिकचा महसूल महापालिकेला अधिक मिळाला आहे.

पाणीपट्टीतही वाढ

घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीतही घसघशीत वाढ झाली आहे. महापालिकेने थकबाकीदार ६७ हजार बड्या थकबाकीदारांना नोट‌िसा बजावल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते ऑक्टोबर यादरम्यान पाणीपट्टी वसुली १० कोटी ६७ लाख रुपये इतकी झाली होती. यंदा मात्र त्यात चांगली वाढ झाली आहे. एप्र‌िल ते ऑक्टोबर दरम्यान १९ कोटी ९७ लाखांची वसुली झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ९ कोटी २९ लाख रुपयांची अधिक भर पडली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी मिळून महापालिकेच्या तिजोरीत २२ कोटी रुपये जादा मिळाले.

सवलत, ऑनलाइनचा फायदा

महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीधारकांसाठी ऑनलाइन कर भरण्यासाठी एक टक्का अतिरिक्त सवलत योजना सुरू केली. सोबतच एप्रिलमध्ये कर भरल्यास पाच टक्के, मेमध्ये कर भरल्यास तीन टक्के आणि जुलै महिन्यात कर भरल्यास दोन टक्के सवलत योजना जाहीर केली. या विविध सवलती व ऑनलाइनमुळे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३४ कोटी ७५ लाख रुपये वसूल झाले. यात ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या ४१ हजार ८२१ एवढी आहे. तर सवलत योजनेचा लाभ हा एक लाख २४ हजार ४८१ लोकांनी घेतला आहे.

तर गुन्हा दाखल होणार

महापालिकेने पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नोटिसा बजावल्या आहेत. त्यासाठी थकबाकीदारांना १५ दिवसांचा अल्टीमेटमही दिला असून काहीचे नळकनेक्शन कट करण्याची कारवाई सुरू आहे.मात्र बंद केलेले नळ कनेक्शन पुन्हा जोडणी केल्याचे आढळल्यास थेट नळधारकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

..

२०१६ मधील वसुली - ५५ कोटी १८ लाख रुपये
२०१७ मधील वसुली - ७७ कोटी ७६ लाख रुपये (ऑक्टोबर अखेर)
अति‌रिक्त जमा - २२ कोटी रुपये
घरपट्टी वसुली - ५७ कोटी ७६ लाख रुपये
पाणीपट्टी वसुली - सुमारे २० कोटी रुपये
विविध सवलती, ऑनलाइन करभरणा - ३४ कोटी ७५ लाख रुपये
ऑनलाइन कर भरणारे - ४१ हजार ८२१
सवलत योजनेचे लाभार्थी - एक लाख २४ हजार ४८१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन विभक्त कुटुंबांचे ​ रोज मनोमिलन

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : कौटुंबिक कलहाने चार भिंतीची चौकट ओलंडली की नातेसंबंध गळून पडतात. प्रेमाची जागा सुडाग्नी आपसुकच घेतो. तेल ओतण्याचे काम जवळच्यांकडून होत असते. दुर्दैवाने कौटुंबिक वादाचे प्रमाण खून, दरोडा, चोऱ्या या गंभीर गुन्ह्यांपेक्षा अधिक आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अशा विभक्तीच्या मार्गावर निघालेल्या दररोजच्या तीन कुटुंबांचे मनोमिलन अगदी कायदेशीर मार्गाने केले जाते आहे.

समाजात वेगवेगळ्या कारणांमुळे पती-पत्नी कलहाचे प्रमाण वाढते आहे. अगदी फेसबुक वा व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियाच्या वापराने दाम्पत्य घटस्फोटाच्या निर्णयाप्रती पोहचतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत एकूण चार हजार ७९७ तक्रारी आल्यात. यातील एक हजार ८७० तक्रारींवर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. तर ६६६ तक्रारींमध्ये समेट घडवून आणण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यशस्वी ठरले. समझोता होऊ शकला नाही, अशा केसेसची संख्या एक हजार १२५च्या घरात आहे. याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्थर दिवाणी न्यायाधीश एस. एम. बुक्के यांनी सांगितले, की जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात ९८ टक्के तक्रारी या पती-पत्नीच्या वादाशी निगडीत असतात. कौटुंबिक कलह हा वादाचा तितकाच गुंतागुंतीचा विषय ठरतो. पती-पत्नी विभक्त होताना याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांवर तसेच सासरच्या आणि माहेरच्या व्यक्तींवर होतो. मात्र, वाद सुरू असताना डोळ्यांवर अहंकराची पट्टी ओढली जाते. अशावेळी आम्ही कधी कायद्याचा धाक दाखवून तर कधी वस्तुस्थितीची जाणीव करून अथवा कधी भावनिक आवाहन करून दोघांना बोलण्यास भाग पाडतो. अगदी आताच्या आता घटस्फोट हवा, अशी धारणा मनात घेऊन आलेले जोडपे एकत्र होऊन जातात. कौटुंबिक कलहाची कारणे प्रत्येक जोडप्यानुसार बदलतात. मात्र, यात संशयी वृत्ती, एकाने दुसऱ्यास कमी लेखणे, अशी कारणे महत्त्वाची ठरतात. समजा दोघे पैसे कमवणारे असतील तर इगो दुखवण्याचा प्रकार सहजतेने घडतो. पती-पत्नीची नक्की जबाबदारी काय? हे समजून घेण्यास कोणी सहज तयार होत नाही. त्यातून हा प्रश्न वाढत असल्याचे बुक्के यांनी स्पष्ट केले.

मुलांची फरफट

कौटुंबिक कलहाचा परिणाम मुलांच्या भावी आयुष्यावर होत असल्याचे महिला व बाल कल्यण समितीच्या सदस्या अश्विनी न्याहरकर यांनी स्पष्ट केले. अनेकदा मुलांना दोघासोबत राहयाचे असते. मात्र, त्यांच्या भावानांपेक्षा दोघेही इगो जपण्याचा प्रयत्न करतात. महिला व बाल कल्याण समितीसमोर अशीही अनेक मुले आले की त्यांना स्वीकारायला आई अथवा वडील तयार नसतात. मानसिक घुसमट सहन करणाऱ्या मुलांना योग्य साथ मिळाली नाही तर ते चुकीच्या मार्गावर जातात, असे न्याहरकर यांनी सांगितले.

घटस्फोटासारख्या नाजूक विषयावर तोडगा काढण्याचे काम येथे चालते. पती-पत्नीच्या वादासाठी गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षीत असा वर्ग करता येत नाही. समाजात हे प्रमाण मोठे असून, त्याचा थेट परिणाम भावी पिढीवर पडतो आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वाद जागेवरच मिटवण्याचा १०० टक्के प्रयत्न केला जातो.
- एस. एम. बुक्के, सचिव, तथा दिवाणी न्यायाधीश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाने रद्द करून सूडबुद्धीने अन्याय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक जिल्ह्यात ८५० गोठे आहेत. या गोठ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पेठरोडवरील चार गोठेधारकांवर सूडबुद्धीने व जागामालकांना जागा रिकामी करून देण्यासाठी त्यांचे परवाने रद्द करून अन्याय केल्याचा आरोप पेठरोड येथील गोठेधारकांनी केला आहे.

वीरशैव लिंगायत गवळी समाज गाई व म्हशी पालनपोषण करून पेठरोडच्या भागात सुमारे ७० वर्षांपासून दूध व्यवसाय करीत आहे. दूध व्यवसायाचे परवाने रद्द करून गोठेधारकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेठरोडवरील गोठेधारकांनी ७० वर्षांपूर्वी पांडे कुटुंबीयांकडून ही जागा भाडेतत्वावर घेतली होते. तेथे तत्कालीन नगरपालिकेच्या परवानगीने कच्च्या स्वरुपातील गोठे, खोल्यांचे बांधकाम केले, विहिरी खोदल्या. त्या आजही कायम आहेत. या बांधकामाची व भाडेकरी म्हणून नाशिक नगरपालिका व सध्या महापालिका यांच्या रेकॉर्डला नोंद आहे. सीटी सर्व्हेतही नोंद करण्यात आलेली आहे. या मिळकतीची घरपट्टी व वीजबील गोठेधारक नियमित भरीत आहेत. येथे दूध व्यवसायासाठी नाशिक जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाकडून २००४ ते २०१५ पर्यंत दूध व्यवसायाचे परवाने नियमित नुतनीकरण करण्यात आलेले आहेत. सध्या मालकी असलेल्या कल्पना पांडे यांच्या तक्रारीच्या आधारे या गोठेधारकांच्या परवान्याचे पुढील नुतनीकरण करण्यात आलेले नाही. गोठेधारकांनी प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केलेले होते. ते अपील फेटाळून त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या निर्णयास आव्हान देणारी याचिका गोठेधारकांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेची २१ ऑगस्ट रोजी स्वीकृती करून घेतली आहे. त्यावर अंतिम सुनावणी होणे बाकी असल्याची माहिती गोठेधारक अनिल कोठुळे यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांचे जागामालकाशी संगनमत

गोठेधारक महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या अनुषंगाने गाई व म्हशी पाळून पशुसंवर्धन करीत आहेत. मात्र, नाशिक जिल्हा दुध व्यवसाय विकास अधिकारी हे जागामालक यांच्याशी संगनमत करून हात मिळवणी करून त्यांच्या दुध व्यवसायावर घाला घालीत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आणत आहेत. कुटुंबातील ३३ लोकांचा उदरनिर्वाह करण्याचे साधन बंद होणार आहे. या संदर्भाचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिल्याचे अनिल कोठुळे यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याला एक लाख ८९ हजाराची कर्जमाफी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीचा मुहूर्त साधत राज्यभरातील शेतकऱ्यांना घाईगडबळीत कर्जमाफीची भेट देण्याचा घाट राज्य सरकारच्याच आता अंगलट आला आहे.घाईगडबडीत कर्जमाफीतील शेतकऱ्यांच्या यादीचा तीढा सुटण्याऐवजी अधिकच वाढला असून नाशिकमध्ये एका दाम्पंत्याला घाईगडबडीत दिड लाखांपेक्षा जास्तीची कर्जमाफी देण्याचा प्रताप सरकारी यंत्रणानी केला आहे.जिल्हा बँकेला पाठविलेल्या यादीत एका शेतकरी दाम्पत्याला दीड लाखाऐवजी चक्क एक लाख ८९ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.त्यामुळे राज्यसरकारने नाशिक जिल्हा बँकेला पाठविलेल्या कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ असल्याने बँकेने ८७९ शेतकऱ्यांची यादी पुन्हा दुरुस्तीसाठी सरकारकडे पाठवली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा घोळ दोन महीन्यांपासून सुरू आहे.त्यातच दिवाळीचा मुहूर्त साधत राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची निर्णय घेतला.नाशिकमध्ये सरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात कर्जमाफी देवून सरकारी सोपस्कार पार पडले गेले. उर्वरित शेतकर्यांना पाच सहा दिवसात कर्जमाफी मिळेल असा दावा यावेळी मंत्रीमहोदयांनी केला होता.मात्र आता दहा बारा दिवस उलटून गेलेत तरीही शेतकऱ्यांच्या हाती हातात अद्याप काहीच पोचले नाहीत.घाई गडबडीत सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेला ८७९ पात्र लाभार्थ्यांची यादी पाठविण्यात आली. मात्र त्या यादीत भरमसाठ चुका असल्याच जिल्हा बँकेच्या निदर्शनास आले. एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांना कर्जमाफी देवून त्या कर्जाची रक्कम १ लाख ८९ हजार रुपयापर्यंत जात असल्याने सरकरी नियमांची पायमल्ली होतेय. तरतूद दीड लाखांची असतांना दीड लाखापेक्षा जादा कर्जमाफी दिल्याचे निदर्शनास येत असल्याने जिल्हा बँकेन ८७९ शेतकर्यांची यादी पुन्हा दुरुस्तुसाठी शासनाकडे पाठवली आहे.

अवघे ८७९ शेतकरी

नाशिक जिल्ह्यातून १ लाख ७४ हजार ५२५ शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज सादर केलेत. त्यापैकी जिल्हा बँकेला पहिली ८७९ शेतकर्यांची पहिली यादी आणि ३ कोटी ७० लाख रुपयाचा निधी प्राप्त झालाय. मात्र यादीतील घोळ कायम असल्याने शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचीत आहेत. त्यामुळे सरकारचा तोंडदेखले पण उघडकीस आल्याचा आरोप होतोय.विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा उंचाविण्यासाठी सरकरने दिवाळीचा मुहूर्त निवडला खरा मात्र शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित असल्याने बळीराजाची दिवाळी अंधारातच आहे.

२१ कोटी रद्दीत

दरम्यान, एकीकडे कर्जमाफीसाठी शेतकरी जिल्हा बँकेत फेऱ्या मारत असतांनाच नोटबंदी दरम्यान जिल्हा बँकेने जमा केलेले २१ कोटी रद्दीत गेले आहेत.रिझर्व्ह बँकेने ३४१ पैकी ३२० कोटींच्याच नोटा स्विकारल्या असून उर्वरीत २१ कोटींचा ताळमेळ लागत नसल्याने त्या नोटा घेण्यास नकार दिला आहे.जिल्हा बँकेने या नोटांसाठी केलेले सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत.त्यामुळे या नोटा आता रद्दीत टाकण्याशिवाय दुसरा पर्याय बँकेसमोर उरलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक संघटनांचे नाशिकरोडला आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड वेतन श्रेणी, आरटीआय प्रमाणपत्र अशा विविध मागण्यांसाठी शहर मुख्याध्यापक संघ, लोकशाही शिक्षक आघाडी यांच्या वतीने येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना दिले.

जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील ज्येष्ठ शिक्षकांचे निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत. या प्रस्तावांवर लवकर निर्णय होत नसल्याने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याशिवाय आरटीआय प्रमाणपत्र मिळवितांनाही मुख्याध्यापकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांनी त्रस्त झाल्याने जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना लेखी निवेदन दिले.

याप्रसंगी मुख्याध्यापक संघासह, शिक्षक लोकशाही आघाडी व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनात रवींद्र मोरे, एस. बी. शिरसाठ, एस. बी. देशमुख, कैलास देवरे, सी. पी. कुशारे, संजय गिते, माणिक मढवई, संजय वाघ, इ. के. कांगणे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यांना अभय कुणाचे?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

कॅनडा कॉर्नर परिसरात एका बड्या व्यक्तीच्याच फ्लॅटमध्ये जुगाराचा अड्डा सुरू आहे, तर शिरीन मेडॉलला लागून असलेल्या चाळीत मटका सुरू असल्याने यावर पोलिस आयुक्तांनीच कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. उच्चभ्रू लोकवस्तीत जुगाराचे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकीकडे शहरातील जुगार अड्डे उद््ध्वस्त करण्याचे काम पोलिस आयुक्तांनी जोमाने हाती घेतले असताना गंगापूर रोडसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दिवाळीच्या सुटीत जुगार खेळणाऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पोलिस गेले. मात्र, तोपर्यंत जुगारी गायब झाल्याचे चित्र होते. जुगार अड्डे चालविणाऱ्यांना पोलिसांच्याच एखाद्या खबऱ्याकडून माहिती पुरविली जात असल्यानेच अड्ड्यावरून जुगाऱ्यांनी पळ काढला असल्याचे बोलले जात आहे. शहरात अवैध व्यवसायांवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चाप लावला आहे. परिमंडल २ चे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सर्वच अवैध व्यवसाय बंद करीत कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, परिमंडल १ मध्ये आजही जुगार व मटक्याचे अड्डे सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या गंगापूररोड भागात एका खासगी प्लॉटवर पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्यांची खास व्यवस्था साळुंखे नामक व्यक्तीने केली आहे. यात पोलिसांच्या सहमतीनेच जुगार अड्डा चालवत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच शिरीन मेडॉलला लागून असलेल्या चाळीत मटका सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी आनंदवली गावात पडून असलेल्या एका इमारतीत मटका खेळला जात होता. मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गावातील मटका बंद करण्यात आला होता. आता मटकाचालकाने चक्क शिरीन मेडॉलमध्ये उद्योजकांच्या बंगल्याच्याच अगदी बाजूला मटका सुरू केला आहे, तसेच कॅनडा कॉर्नरसारख्या गजबजलेल्या भागातही प्लॉटमध्ये जुगार खेळला जात असताना कारवाईची मागणी होत आहे.

जुगार अड्डा खेळला जात असलेल्या ठिकाणी अगदी बाजूलाच शिवसेनेच्या नगरसेविकेचे घर आहे. बंगल्याच्या अगदी बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडाला संरक्षक भिंतीत पत्र्याचे शेड उभारत जुगार अड्डा चालविला जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. जुगार खेळणाऱ्यांसाठी खास पार्किंगच्या शेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या विरोधात नेहमीच बोलणारे शिवसेनेचे नगरसेवक जुगार व मटक्याचे अड्डे हटविण्याबाबत का बोलत नाहीत, असाही सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गंगापूर, गोवर्धनमध्येही जुगार

गंगापूर रोडवरील गंगापूर व गोवर्धन गावातही मटक्याचे अड्डे सर्रासपणे सुरू आहेत. सोमेश्वर धबधब्याकडे जाताना एका रस्त्यावरील दुकानाच्या बाजूलाच जुगार खेळला जात होता. मात्र, काही नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर जुगार बंद करण्यात आला. आता गंगापूर व गोवर्धन गावात जुगार खेळला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फ्रीशिपसाठी तांत्रिक अडचण!

$
0
0

अर्जासाठी विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे अवघड

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ यासाठी फ्रीशिप तसेच स्कॉलरशीपसाठीचे अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फ्रीशिप आणि स्कॉलरशीपसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक व्हावी, याकरिता सरकारने यंदाच्या वर्षी नवी वेबसाइट सुरू केली. हे नवे पोर्टल सुरू होऊनही विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर कायम आहे. नव्या पोर्टलच्या लिंकला वारंवार अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे अवघड झाले आहे. शैक्षणिक वर्ष अर्धे सरले असूनही अद्याप फ्रीशिप, स्कॉलरशीपचे अर्ज दाखल होण्यास अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सिनिअर कॉलेजमध्ये इतर मागासवर्गीय तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप व स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागतो. हे अर्ज दाखल करण्यासाठी सरकारने यंदाच्या वर्षी mahadbt.gov.in या नव्या वेबसाइटची सुरुवात केली. मात्र, या वेबसाइटवर अर्ज दाखल करतेवेळी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अर्ज दाखल करताना आधार क्रमांक अनिवार्य आहे.

याचबरोबर अर्जामध्ये उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला तसेच आवश्यक इतर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. यावेळी त्यांची साइज १३५ केबीच्या दरम्यान असावी अशी अट आहे. या साइजमध्ये कागदपत्रे कॉम्प्रेस करणे विद्यार्थ्यांना अवघड जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवे पोर्टलदेखील अडचणींचे ठरत आहे. प्रथम सत्र संपत आले असल्याने फ्रीशिप, स्कॉलरशीपचा फॉर्म केव्हा दाखल होणार, असा सवाल आता विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
दोन दिवसांनी प्रयत्न करा!

फ्रीशिप तसेच स्कॉलरशिपसाठी अडचण असल्यास १८००१०२५३११ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सरकारने विद्यार्थ्यांना केले आहे. विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधला असता, 'ओटीपी सर्व्हरला प्रॉब्लेम होता. इकडून सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत होत्या. आता तो प्रश्न मार्गी लागला असून, ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अद्यापही तांत्रिक अडसर येत आहेत त्यांच्याही समस्या लवकरच दूर करण्यात येईल. वेबसाइट अपडेटेशनचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचे प्रयत्न सुरू ठेवावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या वतीने कॉलेजला करण्यात आले आहे.

मी गेले दोन आठवडे फ्रीशिपसाठी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, माझ्या मोबाइलवर ओटीपी येत नव्हता. कॉलेजमधून फॉर्म भरण्यासाठी वारंवार नोटीस दिली जात आहे. पोर्टललाच तांत्रिक अडचण असल्याने फॉर्म भरणे कठीण झाले आहे.
- शाम
राऊत, विद्यार्थी

फ्रीशिप, स्कॉलरशिपसाठी अर्ज भरतेवेळी स्कॅन डॉक्युमेंट अपलोड होण्यास तसेच त्याची साईज कॉम्प्रेस करण्यास अडचणी येत आहेत. फॉर्म सेव्ह होतानादेखील अडचण येत आहे. अनेकवेळा फॉर्ममध्ये वर्ग, जात, शहर यांचे पर्याय येण्यास बराच अवधी लागत आहे. आता विद्यापीठाच्या परीक्षा असल्याने या अडचणी लवकर दूर होणे गरजेचे आहे.

- समीर परदेशी, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसळधार पाऊस होऊनही निम्मे तालुके कोरडेच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सरासरीच्या १२७ टक्के इतका पाऊस होऊनही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील जवळपास निम्म म्हणजे ५४ पैकी तब्बल २५ तालुक्यांतील भूजल पातळीत घट आल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालातून उघड झाले आहे.

विभागातील जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील भूजल पातळी पाच वर्षांच्या भूजल पातळीच्या सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटली असून त्याखालोल नाशिक जिल्ह्याचा क्रमांक आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सहा तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही विभागातील बहुतांश तालुक्यांतील गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक विभागात यंदा सरासरीच्या १२७ टक्के इतका पाऊस झाला. परतीचा पावसानेही मोठा मुक्काम ठोकला. त्यामुळे विभागातील मोठे व लघु प्रकल्प काठोकाठ भरण्यास मदत झाली. धरणांत मुबलक पाणीसाठा असला तरी विभागातील नगर वगळता उर्वरित नाशिक, जळगाव, नंदुरबार व धुळे या चारही जिल्ह्यांतील भूजल पातळीत घट झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

जळगावचा घसा सुकलेलाच

जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठ्या भूभागावर भूजल पातळीत घट नोंदवली गेली आहे. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील भूजल पातळी घटली आहे. अमळनेर, पारोळा या दोन्ही तालुक्यांतील भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त तर एरंडोल, मुक्ताईनगर आणि जळगाव या तिन्ही तालुक्यांत दीड मीटरपेक्षा जास्त प्रमाणात भूजल पातळी घटली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात या जिल्ह्याचा घसा कोरडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव व येवला या सहा उत्तर पूर्वेकडील तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे.

‘जलयुक्त शिवार’ फोल

जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणात सिंचनक्षमता वाढल्याचा दावा भूजल पातळीत घट आल्याने फोल ठरला आहे. खुद्द चांदवड तालुक्यात जलयुक्तची प्रभावी अंमलबजावणीसाठी या तालुक्याला राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, याच तालुक्यातील भूजल पातळी ०.९५ मीटरने घटली आहे.

येथे वाढले भूजल

नगर जिल्ह्यातील सर्व तालुके, नाशिकमधील दिंडोरी, सुरगाणा, पेठ, निफाड, त्र्यंबक, नाशिक, इगतपुरी, सिन्नर व कळवण, नंदुरबारमधील अक्राणी, नवापूर, नंदुरबार व शहादा तर धुळेतील साक्री व शिरपूर अशा २९ तालुक्यांतील भूजल पातळीत मात्र वाढ झालेली आहे.

विभागातील भूजल पातळी (मीटरमध्ये)

जिल्हा......पाच वर्षांची सरासरी .....वाढ /घट
- नगर ५.८१ २.१९
- धुळे ५.०९ -०.५१
- नंदुरबार ४.५१ -०.०८
- जळगाव ७.१३ -०.८७
- नाशिक ३.७० -०.०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात थंडीचा कडाका वाढला!

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

शहर व तालुक्यात दिवाळीचा माहोल हळूहळू ओसरू लागला असताना थंडीचा कडाका मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. नोव्हेंबरची सुरुवात होताच गेल्या दोन दिवसात थंडी जाणवू लागली आहे. दोन दिवसात पारा १५ अंश से. पर्यंत खाली आला आहे. गुरुवारी देखील कमाल तापमान ३१ अंश से. तर किमान तापमान १५ अंश से. इतके खाली आल्याने थंडीचा जोर येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

यंदाच्या मोसमात पावसाने दमदार हजेरी लावली तर ऑक्टोबरच्या अखेरीस परतीच्या पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे कडाक्याची थंडी यंदा देखील पडणार अशी आशंका व्यक्त होत होती. या कडाक्याच्या थंडीची चाहूल शहरात गेल्या दोन दिवसात जाणवू लागली आहे. सकाळी तापमानाचा पारा अधिकच खाली येत असल्याने पहाटे थंडीचे प्रमाण अधिक राहते आहे. सायंकाळी देखील सूर्यास्तानंतर हळूहळू थंडी वाढत असून, हलका वारा देखील जाणवत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मालेगावकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. थंडीची चाहूल लागल्याने सकाळच्या वेळी जॉगिंग ट्रॅक, जिम, मैदाने यावर व्यायामासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर ग्रामीण भागात देखील रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवायला सुरुवात झाली आहे. थंडीची चाहूल लागल्याने बाजारात स्वेटर, मफलर, टोपी व गरम कपडे विक्रीसाठी दाखल होत आहेत. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पीक पाणी चांगले आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता थंडीसोबतच रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

पारा ३ अंशाने खाली येणार ...

नोव्हेंबरच्या प्रारंभीच शहराचे तपामाने १५ अंश से. पर्यंत आले असून, येत्या आठवडाभरात तापमानाचा पारा अधिकच खाली येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पारा तीन अंशाने खाली येवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात काडाक्याच्या थंडीचा सामना मालेगावकरांना करावा लागणार आहे.

बुलेट---

ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या

रब्बीचा हंगाम जोरात

किदवाई रोड, संगमेश्वर रोडवर स्वेटर विक्रेत्याची गर्दी

जॉगिंग टॅक, जिम बहरले

ड्राय फ्रुट, मेथी, गुळाच्या मागणीत वाढ

चौकट—

गिरणा डॅमवर गर्दी वाढणार

मालेगावपासून जवळ असलेल्या गिरणा डॅमवर यंदा पर्यटकांनी गर्दी वाढली आहे. हिवाळा सुरू झाली की पर्यटकांसह खवय्यांचे ग्रुप डॅमकडे वळतात. येथे मिळणारे मासे खाण्यासाठी थंडीच्या दिवसात अनेक खवय्ये येतात. शहरातील बहुसंख्य पर्यटकांना गिरणा डॅम हे वन डे रिटर्न डेस्टिनेशन असल्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात येथे गर्दी वाढणार आहे.

अशी असू शकते तापमान .... (अंश से.)

दिनांक किमान कमाल

३ नोव्हे १५ ३२

४ नोव्हे १५ ३२

५ नोव्हे १४ ३१

६ नोव्हे १४ ३१

७ नोव्हे १४ ३१

८ नोव्हे १३ ३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोका मार्गावर चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या मायलेकींपैकी आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून पोबारा केला. ही घटना अशोका मार्ग परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

प्रीती सागर उत्तरवार (रा. टागोरनगर, रविशंकर मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रीती, तसेच त्यांची आई छाया व्यवहारे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पायी निघाल्या होत्या. अशोका मार्गावरील चैत्रपालवी इमारतीसमोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी व्यवहारे यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. सहाय्यक निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

लाखाचा ऐवज लंपास

शहरात तीन घरफोड्या झाल्याचे समोर आले असून, त्यात भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे. सिडकोतील खुटवडनगर भागात राहणाऱ्या निशा विक्रम दळवी (रा. रमा अपार्टमेंट) कुटुंबीयांसह दिवाळीनंतर बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत, त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उचकटून हॉलमधील एलसीडी व कपाटात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक देवरे तपास करीत आहेत. घरफोडीची दुसरी घटना दिंडोरी रोड भागात घडली. प्रसाद शंकर शिरसाठ यांच्या जामखेडे मळ्यातील गणेश मंदिरासमोरील बंद बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शेगडी, गॅस सिलिंडर, मिक्सर ग्राइंडर, दोन टेबल फॅन, नळ, पितळी समया असा सुमारे १७,५०० रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू लंपास केल्या. घरफोडीची घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार साळवे तपास करीत आहेत. दरम्यान, पाथर्डी फाटा भागातील स्वप्निल कमलाकर सुलक्षणे (रा. रसोदे संकुल, वासननगर) यांचे घरदेखील चोरट्यांनी फोडले. सुलक्षणे कुटुंबीय मंगळवारी परगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील एलसीडी टीव्ही व कपाटातील रोकड असा सुमारे ४४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

तडीपारास अटक

तडीपार करूनही शहरात वास्तव्य करणाऱ्या संतोष माने या सराईतास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने केली.
तडीपार संतोष बबन माने (रा. माऊली चौक, दत्तनगर) याच्यावर वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मानेला शहर पोलिसांनी एका वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले. मात्र, मानेने शहरातच मुक्काम ठोकला. मानेच्या वास्तव्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी माने अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉइंट परिसरात येताच, त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

चार झाडांची कत्तल

वडनेरसह वडनेर गेट परिसरातील भररस्त्यावर असलेली पिंपळ व भेंडीची चार झाडे चोरट्यांनी कापून नेली. या प्रकरणी लाकूड तस्करांविरुद्ध उपनगर पोलिसांनी भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बबन तुळशीराम कटारे (रा. श्रीपादकृपा अपार्टमेंट, कलानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ ते १२ ऑगस्टदरम्यान ही झाडे तोडण्यात आली. आरोपींनी रस्त्यावरील एक पिंपळाचे आणि तीन भेंडीची झाडे तोडून लाकूड घेऊन गेले. हवालदार काकड तपास करीत आहेत.

अधिकाऱ्यास धक्काबुक्की

मुलीचे लर्निंग लायसन्स तत्काळ मिळावे, या मागणीसाठी आरटीओ कार्यालयात गोंधळ घालत सहाय्यक प्रादेशिक अधिकाऱ्यास एकाने धक्काबुक्की केली. हा प्रकार बुधवारी घडला असून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुरेय वल्लभ अग्रवाल (रा. गजानन पार्क) याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी अग्रवाल आपल्या मुलीला सोबत घेऊन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. या वेळी त्यांनी लायसन्सची मागणी केली. मात्र, गर्दी असल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. यानंतर अग्रवाल यांनी वरिष्ठांना गाठले. मात्र, तेथेही गोंधळ झाला. सहाय्यक प्रादेशिक अधिकारी राहुल कदम यांनी अग्रवाल यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कदम यांना धक्काबुक्की केली. उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

पल्सरस्वारांनी मोबाइल पळविला

रस्त्याने मोबाइलवर बोलत चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल पल्सरवरील चोरट्यांनी खेचून नेला. नगरकर कॅन्सर हॉस्पिटल भागात ही घटना घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. रूपेश शिवाजी शिरसाठ (वय १६, रा. श्रीजी पॅलेस, द्वारका) या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. रूपेश सरोज ट्रॅव्हल्स कार्यालयाकडून रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोबाइलवर बोलत सिटीकेअर हॉस्पिटलच्या दिशेने पायी जात होता. समोरून आलेल्या पल्सरस्वारांनी त्याच्या हातातील सुमारे १८ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी दीपोत्सव व तुळशीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रिपूर पौर्णिमेनिमित्त शिव मंदिरात त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून, यादिवशी शंकराने तीन असुरांचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी शिव मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. शहरातील विविध मंदिरांत व दुकानांमध्ये त्रिपूर वाती विक्रीस उपलब्ध असून, त्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येत आहेत.

कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र येऊन बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.

बालाजी मंदिरातही दीपोत्सव

या पौर्णिमेनिमित्त मुरलीधर गल्लीत सिद्धेश्वर महादेव मंदिरात शंकराला अर्धनारी नटेश्वराचा मुखवटा लावण्यात येणार असून, विविध फळांची फुलांची आरास करण्यात येणार आहे. यावेळी धार्मिक विधी व दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पणत्यांची रोषणाईदेखील करण्यात येणार आहे. तीळभांडेश्वर मंदिरातदेखील विविध प्रकारचे धार्मिक उत्सव होणार असून, यावेळी नाशिकमधील कलाकार आपली संगीत कला सादर करणार आहेत. गंगापूरच्या

बालाजी मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. बालाजी मंदिरातील दीपोत्सवाचे दृश्य पहाण्यासाठी अनेक भक्त रात्री हजेरी लावत असतात. नाशिक शहरातील सर्व मंदिरांवर रोषणाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखण्या सिटी गार्डनचे विद्रुपीकरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

मुबलक पाणी उपलब्ध असतानाही इंदिरानगरच्या सिटी गार्डनमधील हिरवळ पाण्याअभावी कोमेजली असून, खेळण्यांचे भंगार साहित्य गार्डनमध्येच ठेवल्याने गार्डनचे विद्रुपीकरण झाले आहे. या उदयानातील खेळणी चांगली असली, तरी अन्य बाबींची दुरवस्था झाल्याने याप्रश्नी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

इंदिरानगर येथे शहराच्या धर्तीवर सिटी गार्डन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी खेळणींबरोबरच जॉगिंग ट्रॅक, छोटेखानी स्टेडियम व कारंजा उभारण्यात आला आहे. पूर्वी या ठिकाणची खेळणी तुटलेल्या अवस्थेत होती. मात्र, नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ती बदलण्यात आली असली, तरी त्यास पुरेशी जागा अजूनही उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी नव्याने विजेवर चालणारी काही खेळणी बसविण्यात आली असून, त्यात रेल्वेचाही समावेश आहे. मात्र, या खेळणी बसविताना त्यासाठी आणलेले लोखंडी व लाकडी साहित्य तेथेच पडून असल्याने त्यापासून मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी असलेले हे निरुपयोगी साहित्य तातडीने उचलण्याची सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने ते उचले नसल्याचे बोलले जात आहे.

--

पाण्यासह विविध समस्या

उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर हिरवळ लावण्यात आली असली, तरी पाण्याअभावी ती कोमेजून गवतात रुपांतरित झाली आहे. येथे पुरेसा पाणीपुरवठाच होत नसल्याने झाडांना व हिरवळीवर पाणी मारणे अवघड होत असल्याचे सांगण्यात येत. या ठिकाणी सुमारे पंचवीस ते तीस शोचे दिवे बसविण्यात आले असून, त्यातील निम्म्याहून अधिक दिवे गायब झाले आहेत. त्यांच्या वीजताराही उघड्याच असल्याने शॉक बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या उदयानात आकर्षक कारंजा तयार करण्यात आला असला, तरी तो बंदच आहे. झाडांना व हिरवळीला पाणी नसताना या कारंजाची सुरुवात कशी करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

--

अस्वच्छतमुळे दुर्गंधीचा सामना

उद्यानाच्या बाहेरची जागा कधीही साफ केली जात नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा पडल्याचे दिसत असून, व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या उद्यानाच्या परिसराचीही स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी काही प्रेमीयुगुले बसत असल्याने हे उद्यान दिवसभर बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, सायंकाळी त्यांचा वावर वाढला असून, हटकले असता यांच्याकडून स्थानिक नगरसेवकांची नावेसुद्धा सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. येथे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

---

सिटी गार्डन या सहा एकर जागेतील गार्डनमध्ये सध्या गवताचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी पाणी नसल्याचे सांगून उद्यानातील हिरवळच गायब झाली आहे. प्रशासनाने या उद्यानाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

-हर्षद गोखले, शिवसेना ग्राहक कक्ष

--

येथील कारंजा बऱ्याच दिवसांपासून बंदच आहे. या उद्यानाच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा साचलेला असल्याने येथे जॉगिंगला जाणेही अवघड झाले आहे. या ठिकाणची लहान मुलांची खेळणीच केवळ सुस्थितीत अाहेत.

-सतीश जाधव, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’साठी शेतकऱ्यांवर दबाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनासाठी जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकारी महेश पाटील पेसा कायद्यांतर्गत दबाव टाकत असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी संबधित अधिकारीही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले आहेत. जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून हा प्रस्तावित महामार्ग जातो. या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, काही गावांतील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध कायम आहे. परिणामी, भूसंपादन अधिकारी महेश पाटील या गावांतील शेतकऱ्यांवर पेसा कायद्यांतर्गत दबाव टाकत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, कचरू पाटील, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, रावसाहेब हारक, शांताराम ढोकणे, किसन वाघचौरे आदींनी केला आहे. भूसंपादन अधिकारी प्रांत महेश पाटील यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त झगडे यांनी संघर्ष समितीला दिले.

संघर्ष समितीच्या मागण्या

समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी महेश पाटील पेसा कायद्यांतर्गत शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. इगतपुरी तालुक्यातील तब्बल १७ ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. या महामार्गाच्या भूसंपादनप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयातही ३३ केसेस दाखल झालेल्या आहेत. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत, त्या टाळाव्यात. भूसंपादन कायदा २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी. एक प्रकल्प एक दर जाहीर करावा, सिन्नर तालुक्यातील गोंदे या गावातील भूसंपादनाचा दर का जाहीर केला जात नाही, याचा खुलासा करावा आदी मागण्या शेतकरी संघर्ष समितीने विभागीय आयुक्तांकडे केल्या आहेत. याशिवाय भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भूसंपादन अधिकारी महेश पाटील खोटे आमिष दाखविण्याबरोबरच त्यांना नुकसानीची भीतीही घालत असल्याचे समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीने विभागीय महसूल आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

अन्यथा बेमुदत उपोषण

पेसाअंतर्गत ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव करून समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे, तरीही भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यांवर दबाव टाकून भूसंपादनाचा प्रयत्न करीत आहेत. भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करुन कारवाई न झाल्यास शेतकरी संघर्ष समिती बेमुदत उपोषण करेल.
- राजू देसले, समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधीअभावी रखडले कलाग्राम केंद्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या आग्रहापायी सरकारी जागेवर हैद्राबादच्या धर्तीवरील हाट बाजारप्रमाणे कलाग्राम केंद्रांची उभारणी गंगापूर, गोवर्धन गावालगत करण्यात आली. परंतु,कोट्यवधी रुपये खर्चून उभारले जात असलेले केंद्र निधीअभावी रखडल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारची योजनाच बंद झाल्याने कलाग्राम केंद्राचे काम रखडले असल्याचेही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, तब्बल दहा कोटींहून अधिक रक्कम खर्च होऊनही हे केंद्र चार वर्षांहून अधिक काळापासून धूळ खात पडून असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अगोदरच महापालिकेच्या १७ एकर जागेवरील वसंत कानेटकर उद्यानात कुणी फिरकायलाही तयार नाही. त्याच ठिकाणी पुन्हा कलाग्राम केंद्र उभारण्याचा हट्ट कशाला केला गेला, असा सवालही उपस्थित केला जात आहे. कलाग्राम केंद्राची उभारणी करताना केंद्रात व राज्यात आघाडी सरकारची सत्ता होती. परंतु, आता युती सरकार असल्याने कलाग्राम केंद्राला उभारी मिळणार का, हाच खरा सवाल आहे.

दरम्यान, चार वर्षांहून अधिक काळापासून कोट्यवधींचे कलाग्राम केंद्र बंद का, याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून कलाग्राम केंद्राची योजनाच बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यात निधीची गरज असताना निधी उपलब्ध झाला नसल्या कारणामुळे काम बंद असल्याचे सांगण्यात आले. कलाग्राम केंद्रात प्रशासकीय इमारतीसह ९२ गाळे महिला बचत गटांसाठी उभारण्यात येणार होते. परंतु, योजनाच बंद झाल्याने कलाग्राम केंद्राचे काय होणार, असा सवाल नागरिकाकडून उपस्थित होत आहे.

--

चार वर्षांपासून जैसे थे

केंद्र सरकारचा सहाय्यता निधी व प्रादेशिक पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर, गोवर्धन गावातील शिवारात साडेपाच एकर जागेवर महिला बचत गटांसाठी कलाग्राम केंद्रास मंजुरी मिळाली होती. तत्कालीन खासदार समीर भुजबळ व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दहा कोटींहून अधिक रक्कम कलाग्रामसाठी मंजूर करीत प्रत्यक्ष २०१४ ला कामाला सुररुवातही केली. कलाग्राम केंद्राला उभारणीसाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता चार वर्षांहून अधिक काळ उलटूनदेखील कलाग्राम केंद्रच उभे राहिले नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदीप पॉलिटेक्निकला ‘स्टुडंट्स चॅप्टर’पुरस्कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संदीप फाउंडेशन संचलित संदीप पॉलिटेक्निकला इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स इंडियातर्फे देशपातळीवरील डॉ. अमिताभ भट्टाचार्य मेमोरियल ‘उत्कृष्ट स्टुडंट्स चॅप्टर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार संदीप पॉलिटेक्निकला दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे.

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स इंडियाचे २५ वे अधिवेशन नुकतेच गोवा येथे झाले. त्याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे उपस्थितीत व आयआयटी गोव्याचे संचालक डॉ. प्रवीण मिश्रा यांचे हस्ते संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत पाटील यांना रोख रक्कम पंधरा हजार रुपये, गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

संदीप पॉलिटेक्निकमध्ये या स्टुडंट्स चॅप्टरअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये विविध तांत्रिक स्पर्धा पार पडल्या. त्यात पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, क्वीज कॉम्पिटिशन, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान तसेच नाशिकमधील उत्कृष्ट कंपन्यांमध्ये इंडस्ट्रीयल व्हिजिटचे आयोजन करण्यात आले. संदीप पॉलिटेक्निकच्या या यशाबद्दल चेअरमन डॉ. संदीप झा यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे पाच विद्यार्थी ‘एनडीए’मध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने नॅशनल डिफेन्स अकादमीसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यंदा नाशिक शहरातील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

१० सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात देशभरातून साडेतीन लाख विद्यार्थी प्रविष्ट होते. या परीक्षेत सुदर्शन अकादमीचे आकाश काकड, वेदांत घंगाळे, गौरव गायकवाड, प्रणव जोपळे आणि प्रणव जाधव हे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत मुलाखतीसाठी बोलाविले जाणार आहे.

स्पेशल फोर्सेस, नौदलला प्राधान्य

आकाश काकड हा मखमलाबादचा रहिवाशी असून, सध्या केटीएचएम कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील विलास काकड हे मखमलाबाद येथेच शेती करतात. आकाशला आर्मीमध्ये जाऊन पुढे स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल होण्याचे स्वप्न आहे. तर वेदांत हा गोविंदनगरचा रहिवाशी असून, तो केटीएचएम कॉलेजला बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील प्रशांत घंगाळे हे मायको कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्याला तोफखाना विभागात अधिकारी व्हायची इच्छा आहे. गौरव गायकवाड हाही केटीएचएमचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील चांगदेव गायकवाड हे नाशिक येथे जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. गौरवला नौदलात जाऊन पाणबुडी तज्ज्ञ व्हायची इच्छा आहे.

यातील तिघांनी दहावीनंतर एसपीआय, औरंगाबाद या संस्थेत परीक्षा दिली होती. मात्र यात आलेल्या अपयशाने न खचता त्यांनी हे यश मिळविलेे. नाशिकमधील विद्यार्थ्यांनी

स्वत:ची गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.

- सुदर्शन ‌अहेरराव,

मार्गदर्शक व प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट नाशिक’ला डिजिटल टच

$
0
0

मटा फोकस

--

संकलन ः विनोद पाटील

---

‘स्मार्ट नाशिक’ला डिजिटल टच

--

नाशिकची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाल्यानंतर शहराने आता डिजिटल कारभाराकडे वाटचाल सुरू केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा यांनी शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ करण्यासाठी अधिकाधिक सुविधा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. २२ नागरी सुविधा केंद्रे हे याच प्रयत्नातील महत्त्वाचे पाऊल आहे. सोबतच महापालिकेचे नाशिक स्मार्ट अॅपही नागरिकांच्या मदतीला असून, या २२ नागरी सेवा केंद्रांसह नाशिक स्मार्ट अॅपचा जवळपास पावणेतीन लाख नागरिकांनी वापर केला आहे.यातून जवळपास ८० टक्के नागरिकांचे प्रश्न वेळेत मार्गी लागल्याने नागरी सुविधा केंद्र आणि नाशिक स्मार्ट अॅप हे नाशिककरांसाठी वरदान ठरले आहे...

---

ऑनलाइन दाखले अन् निपटारा

शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व परवानग्या देण्यात येतात. त्याकरिता नागरिकांना विविध विभागांत जाऊन सदर परवानग्या व दाखले प्राप्त करून घ्यावे लागतात. यामध्ये बराच वेळ जातो. नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचावा यासाठी सर्व परवानग्या व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिकेमार्फत नागरी सुविधा केंद्र विकसित करण्यात आले आहे. नागरिकांना ठराविक मुदतीत विविध विभागांचे दाखले मिळावेत म्हणून राज्य शासनाने सेवा हमी कायदा लागू केला असून, त्यानुसार १६ सेवांसाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ठोस पावले उचलत या १६ सेवांसोबतच तब्बल ४५ सेवा-सुविधांचे ऑनलाइन दाखले देण्यासह अर्जांचा निपटारा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी २२ ठिकाणी नागरी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे नागरिकांना त्यांच्याच भागात, तसेच घरपोच सुविधा दिल्या जात आहेत.

--

हजारो नाशिककरांनी घेतला लाभ

नागरिकांना नागरी सुविधा केंद्रामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले व परवानग्या उपलब्ध होणार आहे. त्यात काही दाखले ऑनलाइनही घरपोच घेता येत आहेत. या योजनेनुसार जन्म, मृत्यू, मालमत्ता कर, विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण दाखला, विभागीय दाखला, जोता, बांधकाम वापर परवाना, नळजोडणी, मलवाहिनी जोडणी, मालमत्ता कर भरणा, विविध कर वसुली, डॉग लायसन्स, भोगवटा प्रमाणपत्र, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण आदी दाखले महापालिकेकडून आता नागरिकांना घरबसल्या दिले जात आहेत. दि. ५ एप्रिलपासून नाशिक महापालिकेने सुरू केलेल्या या नागरी सेवांमुळे आतापर्यंत ४३ हजार ३८८ नागरिकांनी या सेवांसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी जवळपास ३१ हजार ३०३ नागरिकांना या सेवेचा लाभ मिळाला आहे, तर घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी दोन लाख ८ हजार ९७४ नागरिकांनी सेवा केंद्रांचा फायदा घेतला आहे. स्मार्ट नाशिक अॅपचा वापर करीत ३० हजार ६९२ जणांनी तक्रारी केल्या असून, त्यापैकी २९ हजार ६७७ नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.

--

कॅशलेस ट्रॅन्झॅक्शनला प्रोत्साहन

महापालिकेमार्फत या नागरी सुविधा केंद्रांत जवळपास ४५ सेवा पुरविण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेला येस बँकेचे सहकार्य मिळत आहे. बँकेने सदर नागरी सुविधा केंद्र चालविण्याकामी विनामूल्य मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. सदर नागरी सुविधा केंद्रामध्ये येस बँकेमार्फत कॅशलेस ट्रॅन्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता बँकेमार्फत डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे नागरिकांना कर भरणा करण्याकामी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक पीओएस मशिन उपलब्ध करून दिले आहे. या नागरी सुविधा केंद्रांत प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांवर विहित कालावधीमध्ये कार्यवाही करून नागरिकांना वेळेत दाखले व परवानग्या देण्यात येतात. ही नागरी सुविधा केंद्रे हे त्या-त्या विभागातील विभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करीत आहेत.

--

भ्रष्टाचाराला ऑनलाइनने चाप

महापालिकेने या नागरी सुविधा केंद्रांबरोबर या सेवा नागरिकांना ऑनलाइनही उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिक ऑनलाइनदेखील अर्ज भरू शकतात. त्याप्रमाणे विविध दाखले व परवानग्यांकरिता आवश्यक शुल्काचा भरणा ऑनलाइन करता येत आहेत. नगररचना, वैद्यकीय, आरोग्य विभागातील प्रमाणपत्रांसाठी पैशांची देवाणघेवाण होते. आता थेट संवादच होणार नसल्याने भ्रष्टाचारालाही चाप बसणार आहे. सद्य:स्थितीत नागरी सुविधा केंद्रे ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, ही नागरी सुविधा केंद्रे व्यवस्थितरीत्या कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात त्यांचा विस्तार करण्यात येईल.

---

कालमर्यादा निश्चिती

नागरिकांना सुविधा व दाखल्यांसाठी कमीत कमी तीन, तर जास्तीत जास्त ६० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन सुविधा प्राप्त करण्याकामी www.cfc.nmcutilities.in या वेबसाइटवर जाऊन नागरिक थेट ऑनलाइन अर्ज करून दाखले घरपोच मिळवू शकत आहेत. या परवानग्यांसाठी महापालिकेचे उंबरठे झिजविण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. नागरिकांना दाखला मिळविण्यासाठी व अर्ज करण्यासाठी या केंद्रामध्ये प्रथम यावे लागत होते. परंतु, कालांतराने आता अर्ज करण्यासह पैसे भरण्याचीही सुविधा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे जलद सेवा मिळणार आहे.

---

या ४५ नागरी सुविधा ऑनलाइन उपलब्ध

--

जन्म दाखला

मृत्यू दाखला

मालमत्ता कर भरणा

विवाह प्रमाणपत्र

मालमत्ता हस्तांतरण दाखला

विभागीय दाखला

जोता दाखला

बांधकाम वापर परवाना

नळजोडणी

मलवाहिनी जोडणी

विविध कर वसुली

डॉग लायसन्स, जन्म-मृत्यूचे दाखले

रुग्णालय नोंदणी

रुग्णालय नूतनीकरण

सोनोग्राफी सेंटर

प्री-फायर एनओसी

फायनल फायर एनओसी

फायर एक्सटिंग्युशर्स दाखला

डॉग लायसन्स नूतनीकरण

लॉजिंग लायसन्स अँड रिनिव्हल

सेफ्टिक टँक (निवासी)

सेफ्टिक टँक ( वाणिज्यिक)

बायोमेडिकल वेस्ट नोंदणी

अॅसेसमेंट रजिस्टर

नवीन मालमत्ता नोंदणी

अतिरिक्त बांधकामांना मंजुरी

पाणीपट्टी कर भरणा

वॉटर मीटर चोरी, खराब

इंजिनीअर लायसन्स

भोगवटा प्रमाणपत्र

रिवाइज बांधकाम दाखला

झोन सर्टिफिकेट

टीडीआर सर्टिफिकेट

टीडीआर युटिलायझेशन

शहर विकास आराखडा नकाशा

जाहिरात परवाना

तात्पुरता जाहिरात परवाना

जाहिरात परवाना नूतनीकरण

मनपा सभागृह, मोकळ्या जागा भाडेसंदर्भात

मनपा गाळे भाडेसंदर्भात

रोड डॅमेज चार्जेस

प्लंबिंग लायसन्स

नळजोडणी हस्तांतरण

वृक्षतोड परवानगी

झाडांच्या फांद्या तोडणे

--

नागरी सेवा केंद्रांमधील अर्ज व निपटारा स्थिती

--

विभाग अर्ज निपटारा शिल्लक

घरपट्टी भरणा १४२४८० १४२४८० ०

पाणीपट्टी भरणा ६६४९४ ६६४९४ ०

जन्म प्रमाणपत्र १९१६५ १७८३१ १३३४

फायर अंतिम दाखला ११८ ११३ ५

फायर एनओसी ५६१ २१५ ३४६

नळजोडणी ५१५ ३०८ २०७

जोते प्रमाणपत्र ९१ ५ ८६

झोन दाखला ४११ १४८ २६३

दूषित टाकी स्वच्छता ७९२ ७०९ ८३

नवीन नळजोडणी ३१७२ २३३८ ८३४

पाणी जोडणी हस्तांतरण ७५३ ४५ ७०८

बांधकाम परवाना ८१८ १०४ ७१४

भोगवटा प्रमाणपत्र २५४६ २५६ २२९०

मालमत्ता कर उतारा १४१६ ७५७ ६५९

मालमत्ता हस्तांतरण ३३०२ २९२५ ३७७

मृत्यू प्रमाणपत्र ६९४६ ६३८२ ५६४

रुग्णालयाची नोंदणी ९५ ८ ८७

रुग्णालय नूतनीकरण २३९ २१ २१८

विवाह नोंदणी प्रमाणपत्र ५६२ ४०९ १५३

-----------------

स्मार्ट नाशिक अॅपला वाढता प्रतिसाद

--

३० हजार ६९२ -एकूण प्राप्त तक्रारी

२९ हजार २७७ -निपटारा झालेल्या तक्रारी

१४१५- प्रलंबित तक्रारींची संख्या

--

अॅपवरील विभागनिहाय तक्रारींची स्थिती

--

विभाग एकूण तक्रारी निपटारा प्रलंबित

पाणीपुरवठा विभाग ३५५४ ३३२४ ३०

आरोग्य व मलनिस्सारण ६२८३ ६२१९ ६४

सार्वजनिक बांधकाम ३१८० २८०१ ३७९

उद्यान विभाग १०९९ १०५७ ४२

एमटीएस विभाग ७० ६७ ३

नगररचना विभाग ६०९ ५६० ४९

प्रॉपर्टी टॅक्स २२३ २२० ३

वैद्यकीय विभाग २४ २१ ३

विद्युत विभाग १०२४८ ९६०० ६४८

ड्रेनेज विभाग ३४२५ ३३७० ५५

वॉटर टॅक्स १९६ १९६ ००

भूमिगत गटार ८९ ७१ १८

उद्यान (बांधकाम) ८० ७५ ५

उद्यान ( हॉर्टिकल्चर) ८२३ ७८० ४३

पर्यावरण विभाग १२ ११ १

--

शहरातील २२ नागरी सुविधा केंद्रे

--

विभागीय कार्यालये अन् उपकार्यालये ः

-मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, मनपा मुख्यालय, शरणपूररोड

-नवीन नाशिक विभागीय कार्यालय, नवीन नाशिक, अंबड पोलिस स्टेशनसमोर

-कामटवाडे उपकार्यालय, मधुरा लॉन्ससमोर, कामटवाडेरोड

-वडनेर-पिंपळगाव उपकार्यालय, मारुती मंदिराजवळ, वडनेर पिंपळगाव

-पाथर्डी गाव उपकार्यालय, पाथर्डी गाव

-अंबड गाव उपकार्यालय, अंबड गाव पाण्याच्या टाकीजवळ, अंबड

-नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, विभागीय कार्यालय, मेनरोड, शालिमाररोड

-इंदिरानगर उपकार्यालय, कलानगर, इंदिरानगर

-गांधीनगर उपकार्यालय, मारुती मंदिराजवळ, नाशिक-पुणे महामार्ग, गांधीनगर

-पंचवटी विभागीय कार्यालय, पंचवटी, मखमलाबाद नाक्याजवळ

-म्हसरूळ उपकार्यालय, महापालिका शाळा क्रमांक ८९, भाजी मार्केटशेजारी, म्हसरूळ

-मखमलाबाद उपकार्यालय, मारुती मंदिराजवळ, मखमलाबाद

-आडगाव उपकार्यालय, आडगाव बस स्टॉप, मेनरोड, आडगाव

-नांदूर-मानूर उपकार्यालय, महापालिका शाळेसमोर, नांदूर-जेलरोड मार्ग, नांदूर गाव

-नाशिकरोड विभागीय कार्यालय, मुक्तिधामरोड, नाशिकरोड

-चेहेडी गाव उपकार्यालय, चेहेडी जकात नका, नाशिक-पुणेरोड, नाशिकरोड

-दसक गाव उपकार्यालय, शिवाजीनगर, म्हसोबा मंदिरासमोर, जेलरोड, नाशिकरोड

-पंचक गाव उपकार्यालय, पंचक सरकारी दवाखाना, जेलरोड, नाशिकरोड

-नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी, शरणपूररोड

-महात्मानगर, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, महात्मानगर, नाशिक

-सावरकरनगर, आकाशवाणी केंद्राजवळ, सावरकरनगर

-सातपूर मनपा विभागीय कार्यालय, त्र्यंबकरोड, सातपूर

--

महापालिकेचा कारभार अधिकाधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन सर्व सुविधा देण्याचा मानस आहे. यापुढच्या काळात दाखले आणि सुविधांसाठी नागरिकांना वारंवार महापालिकेत चकरा मारण्याची गरज राहणार नाही. नागरिकांना या सुविधा व दाखले वेळेत मिळतील यासाठीचीही खबरदारी घेण्यात येत आहे. ४५ सेवा-सुविधा ऑनलाइन करणे हा त्याचाच भाग आहे.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, नाशिक महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांवर खंडित विजेचा ‘शॉक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

अनियमित भारनियमन, जादा वीजबिलाची आकारणी, डीपीचा वीजपुरवठाच खंडित करणे, दिवसा भारनियमन व रात्री वीजपुरवठा अशा गैरसोयीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांवर वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी महावितरणने वीज खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली थेट महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना जाब विचारला. खासदार गोडसे यांनी या वेळी महावितरणचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याशी चर्चा केली.

नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री, एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे, सामनगाव या भागातील शेतकरी सुमार दर्जाच्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठ्याची सेवा सुमार दर्जाची असतानाही महावितरणने कारवाई करताना डीपीचाच वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचीही हकनाक फरपट होत असल्याचा आरोप या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकरी बांधवांवर जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. बहुतांश डीपी नादुरुस्त असल्यानेही शेतकऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पावसाळ्यात कृषीपंपांचा वापर अगदीच कमी असूनही वीजबिले मात्र भरमसाट देण्यात आल्याचा आरोपही या वेळी या शेतकऱ्यांनी केला. याशिवाय एकलहरे, हिंगणवेढे, कोटमगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कमी दराने वीजपुरवठा देण्याची मागणीही या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने खासदार गोडसे यांनी मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याकडे केली. पंचायत समीतीचे माजी सभापती अनिल ढिकले, सामनगावचे सरपंच सचिन जगताप, नगरसेवक रमेश धोंगडे, शशिकांत ढिकले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

तक्रार निवारण शिबिर घेणार

तालुक्यातील ज्या गावांत वीजपुरवठ्यासंदर्भात समस्या आहेत, अशा सर्व गावांत शेतकऱ्यांच्या वीजपुरवठाविषयक समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण शिबिर घेण्याचे आश्वासन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी खासदार गोडसे यांना दिले. या तक्रार निवारण शिबिरांतून स्थानिक शेतकऱ्यांच्या वीजपुरवठाविषयक समस्या गावपातळीवरच सोडविल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images