Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आरटीओ समस्याग्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वच्छतागृह, पाणी, पार्किंग अशा मूलभूत सुविधांची वानवा दिसून येत आहे. या कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छतादेखील पसरलेली असून, या समस्यांकडे संबंधित यंत्रणेचा कानाडोळा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, हे प्रशासनाने हे कार्यालय समस्यामुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

आरटीओ कार्यालयात परवाना, वाहन फिटनेस, वाहनांच्या फायनान्सच्या बोजा कमी करणे, कागदपत्रे ट्रान्सफर करणे अादी विविध कामांसाठी दररोज हजारो सर्वसामान्य नागरिक येत असतात. याशिवाय आरटीओ कर्मचारी, एजंटदेखील मोठ्या संख्येने असतात. मात्र, असे असतानाही या कार्यालयाच्या आवारात असलेले शौचालय बाहेरून सुस्थितीत दिसत असले, तरी त्याला कायम कुलूप असते. त्याची चावी येथील कर्मचाऱ्यांकडे असते त्यामुळे शौचालय सार्वजनिक आहे की कर्मचाऱ्यांसाठी, असा प्रश्न सर्वसामन्यांना पडतो. शौचालय बंद असल्यामुळे कार्यालयात येणाऱ्या लोकांना शौचालयाचा शोध घ्यावा लागतो. येथील कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांशी बोलतच नाहीत, शिवाय माहितीदेखील देत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांना विचारणा करून दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. परिणामी महिला, अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात असलेले शौचालय खुले करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या कार्यालयात जाण्याच्या मार्गावर दोरखंड लावण्यात आलेला आहे. तो ओलांडून जाण्याची कसरत महिला, वयोवृद्ध, अपंगांसह सर्वांनाच करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा गेट बसवावे, अशी मागणी होत आहे.


पार्किंगच्या शिस्तीचे धडे!

सध्या या कार्यालयाच्या आवारात पार्किंगसाठी शिस्तीचे धडे देण्याचे काम सुरू आहे. आरटीओ कार्यालयात ट्रायलसह विविध कामांसाठी येणारा प्रत्येक माणूस वाहन घेऊनच येतो. मात्र, आता विशिष्ट ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी व सर्वसामन्यांच्या वाहनांसाठी जागा केली आहे. ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहन पार्क न केल्यास ५०० रुपये दंड आकारणी केली जाते. पण, सकाळीच ही पार्किंगची जागा भरल्याने अन्य नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नसते. परिणामी नागरिक रस्त्यातच वाहने उभी करतात. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

कार्यालयातील स्वच्छतागृहाला कायम कुलूप असते. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होते. नाईलाजाने दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. पण, अपंग, वयोवृद्ध आणि महिलांची पंचाईत होते.

-संजय निकम, नागरिक

कार्यालयात येणाऱ्या मार्गावर दोरखंड बांधलेला आहे, तो ओलांडून आता जावे लागते. शिवाय पार्किंग सकाळीच भरल्याने रस्त्यात वाहने लावल्यास दंड भरावा लागतो.

-मयूर देवरे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संकटांशी लढणाराच यशस्वी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडकाे

प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे गुण असून, त्यातील चांगल्या गुणांनी ती व्यक्‍ती मोठी होत असते. जीवनात प्रत्येक ठिकाणी अडीअडचणींचा सामना करावा लागत असतो. मात्र, या अडीअडचणी व संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य जो दाखवितो तोच जीवनात यशस्वी होतो, असे प्रतिपादन इस्कॉन इंटरनॅशनलचे कोच गौर गोपाल दास यांनी केले.

अभियंता दिनानिमित्त दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स, नाशिक लोकल सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभियंत्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक प्रवीणकुमार मेहता, लोकल सेंटरचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिंवसरा, विपुल मेहता, अजित पाटील, सतीश पारख, दीपक कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना दास यांनी सांगितले, की जीवन जगताना दुसऱ्याला मदतीचा हात देणारे निश्चितच यशस्वी होत असतात. वय वाढत जाते त्याप्रमाणे यशस्वी होण्याची संकल्पना बदलत असते. लहान मुलांना चांगले गुण मिळाले तर ते यशस्वी झाल्याचे समजतात, तर मोठेपणी आर्थिक भरभराट झाली, तर यशस्वी झाल्याचे समजण्यात येत असते. त्यामुळे यशस्वी होण्याची व्याख्या कायमच बदलत असते. चिकाटी, दृष्टिकोन, उद्देश, पाठिंबा, सहकार्य हे यशाचे मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

आजकाल माणसांमध्ये भिंती निर्माण होत आहेत. या भिंतींमुळे मनुष्यात एकमेकांमध्ये दुरावा येत असून, भिंतीपेक्षा पूल उभारला, तर मनुष्य एकमेकांच्या निश्चितच जवळ जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रवीणकुमार मेहता यांनीही मनोगत व्यक्‍त करून जीवनात येणाऱ्या अडीअडचणी व उद्योजक, अभियंत्यांच्या समस्यांवर कसे मार्गक्रमण केले पाहिजे, ते सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास महेंद्र कोठारी, विजय कोठारी, संजय लोंढे, नरेंद्र बिरार, संतोष मुथा, संजय देशपांडे, महावीर चोपडा, श्रीकांत बच्छाव, पंकज जगताप, समीर कोठारी यांच्यासह निमा, आयमा, निवेक, नाइस, क्रेडाई या संस्थांबरोबरच महापालिकेतील अभियंते व अन्य मान्यवर उपस्थित होते.


यांचा झाला सन्मान

यावेळी दलजितसिंग, युवराज भिरुड, विश्वास दराडे, उन्मेश गायधनी, संजय गंधे, गणेश पाटील, अंकुश जाजू, तरल कटियार, नीलेश पाटील, सिद्धार्थ रवींद्रन, सागर सोनवणे, श्वेता भवरे, कविता जोगळेकर, सुखदा राऊत या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिल‌िंद यांच्या जाण्याने म्हसरूळमध्ये हळहळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

जम्मू-काश्मीरमधील बंदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हवाई दलातील जवान मिलिंद किशोर खैरनार शहीद झाले. मिलींद खैरनार यांचे आई-वडील म्हसरुळच्या परिसरात राहतात. त्यामुळे या वीर जवानाच्या आठवणींनी शेजाऱ्यांनी उजाळा दिला.

सहा महिन्यापूर्वी मिलिंद नाशिकमध्ये आई-वडिलांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर यांच्या आग्रहामुळे आई-वडील चंडीगड येथे राहण्यासाठी गेले होते. पण दोन दिवसापूर्वीच ते नाशिकला परतले. त्यानंतर बुधवारी (दि.११) रात्री साडेआठच्या सुमारास मिल‌िंद यांनी फोनवरून आईवडीलांशी संवाद साधला होता. तेव्हा ते आपल्या आई-वडिलांशी अतिशय उत्साहाने बोलत होते. नाशिकचे हवामान कसे आहे इथपासून त्यांनी अन्य बाबींवर चर्चा केली. मात्र गुरुवारी सकाळी या वृद्ध आई-वड‌लिांना मिल‌िंद शत्रुशी लढतांना शहीद झाल्याची बातमी कळाली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे म्हसरूळ परिसरातही शोककळा पसरली आहे.

मिल‌िंद यांचे वडील किशोर खैरनार हे महावितरणच्या साक्रीतील कार्यालयातून वरिष्ठ यंत्रचालक म्हणून २०१३ मध्ये निवृत्त झाले आहेत. त्यानंतर ते म्हसरूळ येथील स्नेह नगरातील गणेश प्लाझामध्ये चार वर्षांपासून राहतात. त्यामुळे मिलींद यांचाही परिसरातील लोकांशी चांगला संपर्क होता. खैरनार कुटुंबियांचे शेजारी केतन आहिरे, मयूर लोखंडे, योगेश महाजन यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुवारी सायंकाळीच म्हसरूळ परिसरातील रहिवाशी बोराळे (नंदुरबार) येथे मिल‌िंद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेले आहेत.

देवळ्यात श्रद्धांजली

कळवण ः नंदुरबार जिल्ह्यातील शहीद जवान मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवास देवळा शहरातील पाचकंदील येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. ओझर विमानतळावरून वायुसेनेच्या वाहनातून नंदुरबारकडे रवाना झाले. पार्थिव जात असताना देवळा पाचकंदील येथे देवळा नगरपंचायत, देवळा पोल‌सि ठाणे तसेच ग्रामस्थांच्या वतीने पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संभाजी आहेर, लक्ष्मीकांत आहेर, नूतन आहेर, अतुल पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्क्रॅप जीन्स’चा संबंध नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्क्रॅप जीन्स आणि कॅन्सर याबाबत सोशल मीडियामध्ये एक मेसेज व्हायरल झाला आहे. पण, त्यात कुठलेही तथ्य नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार आणि ब्रँडेड जीन्स, तसेच अन्य कपडे घेण्यासाठी ग्राहक तिबेटियन मार्केटमध्ये येतात. आताही दिवाळीच्या सणासाठी ग्राहकांनी तिबेटियन मार्केटलाच खरेदीसाठी पसंती दिल्याचे मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

स्क्रॅप जीन्स आणि कॅन्सर याबाबत सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या मेसेजबाबत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच, त्यांना एक निवेदनही दिले आहे. तिबेटियन मार्केट गेल्या एक दशकापेक्षा अधिक काळापासून ग्राहकांना सेवा देत आहे. टी शर्ट, जीन्स, रेडिमेड शर्टस, रेनकोट, पावसाळी आणि हिवाळी कपडे यांसह विविध फॅशनेबल कपड्यांसाठी ग्राहक विश्वासाने या मार्केटमध्ये येतात. त्यांना आवश्यक ती सुविधा आम्ही देतो.

विविध रंगांपासून ते किमतीपर्यंतचे कपडे ग्राहकांना निवडीसाठी दाखविले जातात. त्यामुळेच आजवर कुठल्याही ग्राहकाने मार्केटमधील व्यापारी किंवा उत्पादनाबाबत तक्रार केलेली नाही. ही विश्वासाची परंपरा आजही कायम आहे. मात्र, काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये खात्री न करता एक बनावट मेसेज फिरत आहे. त्यात स्क्रॅप जीन्सचा उल्लेख करण्यात आलेला आहे. शहरातील नामांकित बाजारपेठेत ज्या दर्जाचे आणि ब्रँडचे कपडे उपलब्ध आहेत, तेच तिबेटियन मार्केटमध्येही आहेत. त्यामुळे ग्राहकांचा अजूनही उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे तिबेटियन मार्केट व्यापारी असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे.


व्यावसायिकांकडून निषेध

तिबेटियन मार्केटमधील व्यापार बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात असून, ग्राहकांनी यावर विश्वास ठेवू नये. येथील जीन्सचा आणि कॅन्सरचा काहीही संबंध नाही. ग्राहकांना घाबरवून सोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निषेध तिबेटियन मार्केटमधील व्यावसायिकांनी केला आहे.

‘त्यांच्या’वर कारवाई करा

सोशल मीडियामध्ये मेसेज व्हायरल झाल्याबाबत सखोल चौकशी करावी, संबंधितांना शोधून काढावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी सायबर क्राइम पोलिसांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडीचा मार्ग मोकळा!

$
0
0

महापालिकेच्या विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोनशे कोटींचे एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिका परवानगी देत नसल्याचा आरोप करीत ठेकेदाराने महापालिकेविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे एलईडी प्रकरणात पालिकेला दिलासा मिळाला आहे. संबंधित ठेकेदारास काम नाकारत अन्य ठेकेदारांमार्फत एलईडी दिवे बसविण्याच्या महापालिकेच्या निर्णयास स्थगिती देणारी एमआयसी ठेकेदाराची ही याचिका होती. आता सुमारे ३० कोटींच्या एलईडी खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

एलईडी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत, उपमहापौर गुरमित बग्गा आणि नगरसेवक संजय चव्हाण यांनी या विषयाला थेट हायकोर्टापर्यंत नेले होते; मात्र, अधिकारी आणि महापालिकेतील काही पदाधिकारी हे योजनेच्या पाठीशी उभे राहिल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईने शहरात ६९ हजार ४४५ एलईडी दिवे बसविण्याचे काम हैदराबादच्या एमआयसी कंपनीला देण्यात आले होते. मात्र ठेकेदार मुदतीत काम पूर्ण करू शकला नाही. मुदतीत काम पूर्ण न करणे आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवल्याने कंपनी विरोधात जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. बँक गॅरंटी मिळाल्यानंतर ठेकेदाराने दिव्यांची खरेदी करीत एलईडी दिवे बसविण्याची परवानगी मागितली होती; मात्र महापालिकेने ती देण्यास नकार दिल्याने ठेकेदाराने कोर्टात धाव घेतली होती.

गुरूवारी न्या. वासंती नाईक व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणी महापालिकेने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली असून, जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याचे मनपाचे अॅड. वैभव पाटणकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे खंडपीठाने ठेकेदाराची याचिका फेटाळत एलईडी दिव्यांच्या खरेदीसाठी मनपामार्फत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यासही नकार दिला.


अशी होती योजना...

महापालिकेने २०१३ मध्ये शहरात ६९ हजार एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला होता. एलईडी दिवे बसविण्यासाठी ठेकेदाराला ऑगस्ट २०१४ ची मुदत दिली होती. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी बसविण्याचा विषय असताना, महापालिकेतील काही बहाद्दर नगरसेवकांनी ४८ कोटींची ही योजना तब्बल २०२ कोटींपर्यंत नेऊन ठेवली. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. महापालिकेने ठेकेदाराला परवानगी नाकारल्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरूच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुरुवारीही नाशिककर पावसाच्या तडाख्यात सापडले. सकाळच्या सुमारास कडक ऊन असताना दुपारी मुसळधार पावसाने शहराला धुतले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १२.५ मिमी पावसाची नोंद झाली. शहराच्या बाहेरील उपनगरांमध्ये मात्र पाऊस नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस शहरात जणू धुमाकूळ घालत आहेत. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपल्याने सर्वत्र मोठी लगबग आहे. मात्र, पावसाच्या आगमनाने या साऱ्या तयारीवर पाणी फेरले जात आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार धारा कोसळत आहेत. अवघ्या काही मिनिटांच्या पावसातच रस्ते जलमय होत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास शहरात कडक ऊन पडले. दुपारी दोन वाजेपर्यंत असेच वातावरण होते. त्यानंतर अचानक काळे ढग जमा झाले आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली.

स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण

जानेवारी ते ११ ऑक्टोबर या कालावधीत स्वाइन फ्लूमुळे नाशिक जिल्ह्यात ८६ नागरिकांचा बळी गेला असून, सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूसाठी पोषक ठरत आहे. यंदा परतीचा पाऊस मुसळधार बरसतो आहे. थंड वातावरणात स्वाइन फ्लूचा फैलाव आणखी जोरदार होतो. राज्यभरात यंदा स्वाइन फ्लू या आजाराने थैमान घातले असून, यात ६०० पेक्षा जास्त व्यक्तींचा बळी घेतला आहे. नाशिकमध्ये २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन झाले होते. या कालावधीत लाखो भाविक शहरात दाखल झाले होते. त्यावेळी स्वाइन फ्लूमुळे वर्षभरात ८७ बळी गेले होते. यंदा मात्र पहिल्या नऊ महिन्यांतच हा आकडा ८० च्या घरात पोहचला. ऑक्टोबर महिन्यात आणखी सहा बळींची संख्या झाली असून, यंदा स्वाइन फ्लू रोखण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वच्छता अन् असुविधेचे आगार

$
0
0

नवे बस स्टँड, मालेगाव

--

अस्वच्छता अन् असुविधेचे आगार

--

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील नवीन बस स्टँडवरील महिलांसाठीचे स्वच्छतागृह नावालाच स्वच्छतागृह असून, खरे तर ते अस्वच्छता व असुविधेचे आगार झाले आहे, अशी प्रतिक्रिया स्वच्छतागृहातून बाहेर येणाऱ्या महिला देतात. या ठिकाणी दोन ते पाच रुपये घेऊनही महिलांना अस्वच्छतेचाच सामना करावा लागतो. देखभालीचा अभाव, दुर्गंधी यांसारख्या समस्यांनी हे स्वच्छतागृह वेढले आहे.

शहरात सर्वत्रच महिलांच्या स्वच्छतागृहांची वानवा असतानाच नवीन बस स्टँडवरदेखील पुरेशा सोयी-सुविधा असलेले स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नाही. येथून नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांसाठी बससेवा दिली जात असून, दिवसाला किमान १५ ते २० हजार प्रवासी येथून ये-जा करतात. त्यातील महिलांची लक्षणीय संख्या पाहता त्यांच्यासाठी येथे पुरेशा प्रमाणत स्वच्छतागृहे नाहीत. येथे केवळ पाच शौचालये आहेत. जे स्वच्छतागृह आहे तेदेखील अस्वच्छ असते. विशेष म्हणजे कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नसताना येथे महिलांकडून २ ते ५ रुपये घेतले जात असल्याने आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा अनेक महिलांचा अनुभव आहे. स्वच्छतागृहात स्वच्छता, देखरेख करण्यासाठी असलेल्या महिला कर्माचाऱ्यांना ठेकेदारकडून कोणतेही मानधन वा पगार मिळत नसल्याचे त्या सांगतात. स्वच्छतागृहातील पाण्याचे पाइप फुटलेले असून, छतदेखील गळके आहे. आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. पावसाळ्यात तर येथे तळेच साचत असल्याने स्वच्छतागृहापर्यंत वाट काढत जाणे मोठे कठीण होते.

--

सुविधांअभावी अडचणींत भर

नवीन बस स्टँडमध्ये असलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेमुळे मासिक पाळीच्या दिवसांत प्रवासी महिलांची अधिकच अडचण होते. येथे चेंजिंग रूम, सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन अशा कोणत्याही सुविधा नसल्याने महिलांसाठी हे स्वच्छतागृह म्हणजे असून, अडचण नसून खोळंबा झाले आहे.

--

नोकरीनिमित्त मी धुळे-मालेगाव असा प्रवास नियमित करते. त्यामुळे नवीन बस स्टँडवर असलेल्या स्वच्छतागृहातील समस्यांचा रोजच सामना करावा लागतो. एसटी महामंडळाने ठेकेदारकडून सर्व सुविधांची खात्री करून घ्यावी. किमान स्वच्छतागृह तरी स्वच्छ असावे ही अपेक्षा.

-अर्चना पगार, प्रवासी

--------

जुने बस स्टँड, मालेगाव

--

निव्वळ चार भिंतींचा सांगाडा

--

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील जुन्या बस स्टँडमधील महिलांसाठीचे स्वच्छतागृह निव्वळ चार भिंतीचा सांगडा बनले आहे. गेली अनेक वर्षे येथे महिलांसाठी स्वच्छतागृहच नव्हते आणि आता बांधण्यात आलेले स्वच्छतागृह सुरक्षित नसल्याचे महिला सांगतात.

शहर पोलिस ठाण्यासमोर असलेल्या जुन्या बस स्टँडवरून औरंगाबाद, कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव, साक्री, नामपूर, वणी (सप्तशृंगगड) यांसह गुजरातमध्ये बससेवा दिली जाते. मोठ्या संख्येने ‘कसमादे’तील प्रवासीही येथून ये-जा करतात. नवीन बस स्टँड झाल्यापासून जुन्या बस स्टँडकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. येथे पूर्वी स्वच्छतागृह होते. मात्र, तेदेखील पडक्या अवस्थेत असल्याने त्याचा वापरच होत नसे. त्यामुळे आधीपासून या बस स्टँडमध्ये महिलांची गैरसोय होत आली आहे. अलीकडेच या बस स्टँडचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, यात सर्व सोयी-सुविधांयुक्त स्वच्छतागृह उभारण्यात आलेच नाही. जे स्वच्छतागृह आहे त्याच्या भिंतींची उंची कमी आहे. आत पाण्याची, विजेची सोयच नाही. स्वच्छता कर्मचारीही नाहीत. त्यामुळे स्वच्छतागृह नावालाच असल्याचे पाहायला मिळते.

--

भाविक, विद्यार्थिनींचे हाल

या बस स्टँडमधून कळवण, वणी, सप्तशृंगगडावर जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते. चैत्रातील यात्रोत्सव काळात महिलांची विशेष गर्दी दिसून येते. मात्र, येथील स्वच्छतागृहात सुविधा आणि सुरक्षिततेचा अभाव असल्याने या महिलांना ताटकळत राहावे लागते. येथून कसमादेतील असंख्य विद्यार्थिनी अप-डाऊन करतात. त्यांना तासन तास बसची वाट पाहत बसावे लागते. अशावेळी स्वच्छतागृह असले, तरी ते सुरक्षित नसल्याने तरुणींना अन्यत्र जावे लागते. त्यामुळे स्वच्छतागृह तर बांधले, पण उपयोग काय, अशी प्रतिक्रिया त्या व्यक्त करतात.

--

आम्ही दर वर्षी नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगगडावर जातो. जुन्या बस स्टँडमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव असल्याचे जाणवते. आता जे स्वच्छतागृह उभारले आहे, तेदेखील नावालाच आहे. विद्यार्थिनींची अडचण नित्याचीच आहे. एसटीने याचा विचार करावा.

-स्वाती पाटील, प्रवासी


----------


येवला बस स्टँड

--

रूप तसं देखणं, अंतरंग मात्र किळसवाणं

--

म. टा. वृत्तसेवा, येवला

दररोज हजारोंच्या संख्येने विद्यार्थिनी आणि महिलांची ये-जा असलेल्या येवला बस स्टँडवरील महिला स्वच्छतागृहाबाबत ‘रूप तसं देखणं, अंतरंग मात्र किळसवाणं’ असेच म्हणता येईल. स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष, अपुऱ्या सुविधा, डास व दुर्गंधीचा फैलाव अशा जंजाळात हे स्वच्छतागृह सापडले आहे. त्यामुळे महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

१९८५ मध्ये पूर्णत्वास गेलेले राज्य परिवहन महामंडळाच्या येवला शहरातील बस स्टँडला विस्तीर्ण आवार लाभलेले आहे. याच स्टँडमधील पुरुष व स्त्रियांसाठीची शौचालये साधारणतः १९८७ दरम्यान उभारण्यात आली. सध्या ही इमारत चांगली असली, तरी आतून मात्र तिची दुरवस्था झालेली आहे. सुलभ इंटरनॅशनलला देखभालीचे काम दिले आहे. येथे महिलांसाठी प्रसाधनगृह अन् शौचालयाची संख्या फक्त दोन आहे. त्यातील दोन प्रसाधनगृहे तर जणूकाही बाथरूमच. आतील सिमेंटच्या कोबा शेवाळ साचून निसरडा झाला आहे. अनेकदा महिलांना घसरून दुखापत झाली आहे. महिला कर्मचारी येथे कार्यरत आहे. मात्र, सुलभने आखडता हात घेतल्याने महिला शौचालयात येणाऱ्या महिलांकडून मिळणाऱ्या दोन रुपयांवर स्वच्छता करते. मात्र, ती पुरेशी दिसत नाही. या शौचालयासाठी ‘एसटी’ने स्वतंत्र नळ कनेक्शन उपलब्ध करून दिलेले होते. मात्र, पाच वर्षांपासून ते बंद झालेले आहे. परिणामी बस स्टँडमधील एका उपाहारगृहाच्या बोअरवेलचे पाणी सुलभमार्फत शौचालयावरील टाकीत घेतले जाते. उन्हाळ्यात बोअरवेलला पाणी नसल्यास गैरसोय होते. शौचालयातील टॉयलेटला स्वतंत्र नळ नाहीत. त्यातून आतील हौदातूनच प्रवाशांना स्वतःच्या हाताने बादलीने पाणी घ्यावे लागते. बस स्टँडच्या पूर्वेला मोठा नाला आहे. त्याची दुर्गंधी व डासांचे साम्राज्य येथे पसरले आहे. शौचालयाच्या नाल्याच्या बाजूचे चेंबर्स गेल्या काही वर्षात फुटल्याने चेंबरमधील मैल्यास नाल्यातच वाट करून दिलेली आहे. ‘सुलभ’ची वाट धरणाऱ्या प्रवाशांना सुलभ वाटावे याकडे एसटीने लक्ष घालण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

--

महिलांची मोठी वर्दळ

येवला बस स्टँड हे मनमाड-नगर आणि नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावरील असल्याने साहजिकच येथे मोठी गर्दी असते. येथे दररोज दोन हजारांच्या आसपास महिलांची वर्दळ असते. मंगळवारचा आठवडेबाजार व अन्य सणांच्या दिवशी हा आकडा तीन हजारांवर जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महिला प्रवासी संख्येच्या तुलनेत प्रसाधनगृह व शौचालयांची संख्या अपुरी आहे.

--

स्वच्छतेच्या दृष्टीने प्रभावी यंत्रणा उभारावी. शौचालयात गेल्यावर अनेकदा नाल्याच्या बाजूने येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाक दाबून धरावे लागते.

-सायली जाधव, प्रवासी

--

येथील बस स्टँडमधील शौचालयाची दुरवस्था होत चालली आहे. संख्यादेखील कमी आहे. बऱ्याचदा बाहेरच कुठेतरी आडोसा शोधावा लागतो. प्रसाधनगृह व शौचालयांच्या संख्येत वाढ करण्याची गरज आहे.

- मंदाबाई साबळे, प्रवासी

------------

लासलगाव बस स्टँड

--

प्रवासी शेकडो, शौचालये अवघी दोन

--

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ आणि कांद्याची मोठी आर्थिक उलाढाल होणारे लासलगाव चांगलेच प्रसिद्ध आहे. मात्र, येथील बस स्टँडमध्ये असलेले महिला शौचालयाचा वापर नक्की करायचा कसा, असा प्रश्न महिलांपुढे आहे. जे स्वच्छतागृह आहे तेथे पुरुषांचीच मोठी गर्दी असते. महिलांसाठी स्वतंत्र आणि मोठे शौचालय नसल्याने येथे महिला, विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय होत आहे.

लासलगाव या वीस हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील बस स्टँडमध्ये इतर समस्या तर आहेतच. पण, त्यापेक्षाही येथील महिलांच्या शौचालयाची परिस्थिती अतिशय बिकट आणि संतापजनक आहे.

शहरातून नाशिक, चांदवड, येवला अशा ठिकाणी शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या लासलगाव येथील विद्यार्थिनी आणि आजूबाजूच्या खेड्यांतून शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी येथे येत असतात. शिवाय महिला प्रवासीही मोठ्या संख्येने येतात. मात्र, त्यांच्यासाठी लासलगाव बस स्टँडमध्ये फक्त दोन शौचालये आहेत, तेही पुरुष शौचालयांच्या अगदी शेजारी. त्यामुळे गरज असूनही महिला व मुलींना केवळ गर्दीमुळे याचा उपयोग करता येत नाही. तीन हजार विद्यार्थिनी रोज शाळा- कॉलेजच्या निमित्ताने या बस स्टँडमध्ये येतात. त्यासाठी केवळ दोन शौचालये असूनही त्यांची स्वच्छता नीट ठेवली जात नाही, त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते.

---

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लासलगाव हे येवला विधानसभा मतदारसंघात येते. माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना लासलगावमधून चांगले मतदान मिळाले असल्याने त्यांनी लासलगावच्या बस स्टँडचा लूक बदलण्याची घोषणा केली होती. पण, नंतर सरकार बदलले आणि त्यांना तुरुंगवास झाल्याने या बस स्टँडच्या सुविधांसाठी पाठपुरावा करायला कोणीही नसल्याने येथील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

---

लासलगाव बस स्टँडवरील महिला शौचालय प्रवासीसंख्येच्या मानाने अपुरे आहे. जे आहे, त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. पुरुष शौचालयाला अगदी खेटूनच असल्याने तेथे जायला संकोच वाटतो. हात धुण्यासाठी बेसिन नाही. स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरल्याने गरज असूनही वापर करण्याची हिंमत होत नाही.

-शुभांगी मोरे, विद्यार्थिनी

-------------

निफाड बस स्टँड

--

पडद्याआडचा अस्वच्छ कारभार

--

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्य परिवहन महामंडळाच्या निफाड येथील बस स्टँडमधील प्रसाधनगृहात सुविधांची मोठी कमतरता आहे. अवघी तीनच शौचालये येथे आहेत. पुरुष आणि महिला स्वच्छतागृहाला पडद्याने वेगळे करण्यात आले आहे. तसेच, असंख्य समस्यांनी या स्वच्छतागृहाला घेरले आहे.

निफाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. मोठी जागा असूनही येथे बस डेपो मात्र नाही. २००९ मध्ये नवनिधी सामाजिक सेवा संघ, नाशिक यांनी या ठिकाणी शौचालय बांधले. एकाच जागेत महिला आणि पुरुष यांच्यासाठी प्रसाधनगृह उभे आहे. या प्रसाधनगृहात पुरुषांच्या तुलनेने महिलांसाठी निम्मी म्हणजे फक्त तीन शौचालये आहेत. पुरुषांसाठी प्रसाधनगृहाच्या डाव्या बाजूला स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. मात्र, महिलांसाठी शौचालय व स्वच्छतागृह एकाच ठिकाणी आहे. सीट्सची संख्याही फक्त तीन आहे. शिवाय महिला आणि पुरुष यांना आत येणारा दरवाजा एकच आहे. महिलांच्या बाजूला असलेल्या शौचालयासाठी दरवाजा नसून, फक्त एक पडदा लावलेला आहे. महिला स्वच्छतागृह असा फलकही अतिशय छोटा आहे. लांबून तो दिसतही नाही. त्यामुळे नवीन महिलेला येथे स्वच्छतागृह आहे की नाही, याची माहिती होत नाही. समोरच वाहने लावलेली असल्याने आत जायलाही अवघड जाते. हे स्वच्छतागृह प्रवासी संख्येच्या मानाने खूपच छोटे आहे.

निफाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. निफाड येथे शाळा, कॉलेजात रोज शिकण्यासाठी बसने येणाऱ्या मुली, शासकीय कार्यालयांत येणाऱ्या महिला आणि इतर प्रवासी महिला यांची संख्या आणि उपलब्ध असलेल्या शौचालयांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे येथे गर्दी असेल, तर काही महिलांवर नाइलाजाने शौचालयाच्या मागे उघड्यावर जाण्याचीही वेळ येत आहे.

---

निफाड बस स्टँडवर येणाऱ्या महिलांच्या संख्येच्या मानाने येथील शौचालय अपुरे आहे. वॉश बेसिन पुरुषांच्या बाजूकडे असल्याने तेथे जाणे शक्य नसल्याने हात धुण्याचा प्रश्न येतो. शिवाय पुरुष आणि महिला स्वच्छतागृह अगदी खेटून असल्याने अवघडल्यासारखे होते.

- योगिता गांगुर्डे, विद्यार्थिनी

--------------

संकलन ः संजय लोणारी, सुनील कुमावत, तुषार देसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजार कायमचा उठला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत नेहमीच वादग्रस्त असलेल्या अनधिकृत भंगार बाजारावर पुन्हा दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. अनधिकृतपणे वसलेली दुकाने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. महापालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाईने पहाटेपासूनच भंगार बाजारात भूखंडांवर पडलेल्या वस्तू सातपूरच्या क्लब हाऊसच्या मैदानावर हलविण्यात आल्या. दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत कोर्टाच्या आदेशावरून महापालिका व पोलिसांनी अनधिकृत भंगार बाजार हटविला होता. तब्बल चार दिवस चाललेल्या अतिक्रमण मोहिमेत महापालिकेने ७६८ भंगार दुकानांवर कारवाई करत त्यांचे शेड जमीनदोस्त केले होते. यानंतर महापालिकेच्या हद्दीबाहेर भंगाराची दुकाने टाकावीत, असे आदेश महापालिकेने अंबड-लिंक रोडवरील भंगार बाजारात लावले होती. परंतु, असे असतानाही काही महिन्यांत पुन्हा भंगार बाजार थाटण्यात आला होता. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी पुन्हा महापालिका आयुक्तांकडे अनधिकृत भंगार बाजार हटविण्याची मागणी केली होती. त्यातच कोर्टाने भंगार व्यवसायिकांना फटकारल्याने दुसऱ्यांदा अनधिकृत भंगार बाजारात

अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. दिवसभर चाललेल्या या कारवाईत महापालिका व पोलिसांच्या मदतीने काढण्यात आलेले भंगार सातपूरच्या क्लब हाऊसच्या मैदानावर टाकण्यात आले.

सकाळी आठ वाजेपासूनच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचे पथक मोहिमेसाठी सज्ज झाले होते. अंबड लिंकरोडच्या सातपूर भागापासून अनधिकृत भंगार दुकाने हटविण्यास सुरुवात करण्यात आली. महापालिकेने नेमलेल्या सहा पथकांसाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये नाही यासाठी पोलिस अधिकारीदेखील अतिक्रमण मोहिमेच्या ठिकाणीच तळ ठोकून होते. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मोहीम सायंकाळी साडेपाच वाजता बंद करण्यात आली. आज शुक्रवारी पुन्हा सकाळी साडेसात वाजेपासून संजीवनगरच्या समोरील खाडी भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोंधळ घालणारे ताब्यात

दत्तमंदिर चौकात लावण्यात आलेल्या बॅरिकेडिंगच्या ठिकाणी काही भंगार व्यावसायिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी गोंधळ घालणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर दिवसभर मोहीम सुरळीत सुरू होती.

पालक, विद्यार्थ्यांची पायपीट

अनधिकृत भंगार बाजार हटविताना अंबड-लिंकरोड बंद करण्यात आला होता. यामुळे खासगी वाहनांनी शाळेत जाणारे विद्यार्थी व कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांना पायपीट करतच त्र्यंबकरोड गाठावा लागला. भंगार दुकानातील सामान नेण्यासाठी अवजड वाहनांचा वापर केला जात असल्याने इतरांसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. यामुळे साहज‌िकच पालक, विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची वेळ आली. सात वाजेच्या आत शाळेत खासगी वाहनांनी गेलेले विद्यार्थी शाळेतून परतताना पपया नर्सरीवरच अडकून पडले. यानंतर शाळेतील शिक्षक व बसचालकांनी पालकांना फोन करून विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बोलावून घेतले. आजही रस्ता बंद राहणार असल्याने शाळा व पालकांनी याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


कोल डेपोजवळ वाद

मोहीम सुरू असताना सद््गुरू कोल डेपोच्या ठिकाणी परवानगीवरून वाद सुरू झाला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. परंतु, आवश्यक ती परवानगी कोल डेपोचालकांकडे नसल्याने साहित्य उचलून घेण्यासाठी महापालिकेकडून वेळ देण्यात आला.

पोलिस आयुक्तांचा दौरा

सातपूर ः भंगार बाजारात अतिक्रमण मोहिम सुरू असताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी धावता पहाणी दौरा केला. याप्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करत काही अडचण तर नाही ना याबाबत विचारणाही सिंगल यांनी केली. मोहिमेचा आढावा घेत आयुक्त सिंगल कार्यालयाकडे रवाना झाले.


दक्ष राहण्याच्या सूचना

अंबड-लिंकरोडवर दिवसभर चालेल्या अतिक्रमण मोहिमेचा समारोप सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आला. यानंतर पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी महापालिकेचे सहा पथकांचे अधिकारी व पोलिसांची एकत्र‌ित सभा घेतली. यात अतिक्रमण काढताना पोलिसांनी दुर्लक्ष करू नये, तसेच महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्त घेतल्याशिवाय अतिक्रमण हटवू नये, असे आदेशही कोकाटे यांनी दिले. विना पोलिसबंदोबस्त अतिक्रमण मोहिमेत काही झाल्यास त्यास पथक प्रमुख व नेमण्यात आलेला पोलिस अधिकारी जबाबदार राहणार असल्याचेही कोकाटे यांनी म्हणाले.

साहित्य वाचविण्याची लगबग

अनेक भंगार व्यावसायिकांनी आपले साहित्यच हटविले नसल्याचे समोर आले. यानंतर मोहीम सुरू झाल्यावर भंगार व्यावसायिकांची वाचेल ते साहित्य वाहून नेण्यासाठी धडपड सुरू होती. हलके साहित्य वाहून नेता आले. अवजड साहित्य मात्र भंगार व्यावसायिकांना वाचवता आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी अनास्थेला कंटाळून सोडले गाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शिधापत्रिकेवर धान्य नाही, दारिद्रय रेषेखाली असूनही घरकुलाचा लाभ नाही यासर्व प्रकाराला कंटाळून आपण कुटुंबीयांसह गाव सोडून जात आहोत. १५ दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास गावातल्या मारुती मंदिरासमोर आत्मदहन करू, अशा आशयाचे निवेदन चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील बाळकृष्ण नथू देवरे या तरुणाने दिले आहे. बाळकृष्‍ण याने सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे निवेदन देवून गाव सोडले आहे.

बाळकृष्ण यांचा दरेगाव येथे शेती व टेलरिंग व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या होरपळबाबत

जिल्हाधिकारी यांच्याकडेही कैफियत मांडली. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. तसेच तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांनीही आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असे त्याने निवेदनात म्हटले आहे. दारिद्र्य रेषेखाली असून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही. शिधा पत्रिकेवर धान्य मिळत नाही.

त्यामुळे आपण पत्नी, दोन मुली, मुलगासह गाव सोडून जात असल्याचे देवरे यांनी निवेदनात म्हंटले आहे. तसेच १५ दिवसात न्याय न मिळाल्यास गावात येऊन मारुती मंदिरासमोर आत्मदहन करू, असा इशाराही देवरे यांनी दिला आहे. बाळकृष्ण यांच्या या अनोख्या निवेदनामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीचा निकाल, अधिकारी निलंबित

$
0
0

शिंगवे ग्रामपं‌चायत निकाल प्रकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीमध्ये चुकीची मतमोजणी केल्याने जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा निफाडचे तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. पाटील यांना निलंबित केले आहे. निफाडचे तहसीलदार विनोद भामरे आणि नायब तहसीलदार संघमित्रा बावीस्कर यांची कायमस्वरुपी दोन वेतनवाढ रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान, फेरमतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत निवडणूक आयोगाकडून कुठलाही आदेश आलेला नाही. या निवडणुकीत मतमोजणीमध्ये अनुसूचित गटातील महिला उमेदवारांची मतं इतर मागासवर्ग प्रवर्गातील पुरुष उमेदवाराला, तर इतर मागासप्रवर्गातील पुरुष उमेदवारांची मतं महिला उमेदवाराला दाखवून चुकीचे उमेदवार विजयी म्हणून घोषित केल्याचा गोंधळ झाल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यात ७ ऑक्टोबरला ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. शिंगवे येथे चुकीचे निकाल जाहीर करताना अनिता कोरडे यांना पडलेली मत भास्कर डेरले यांना दाखवली तर दुसऱ्या प्रवर्गात सुशिला पवार यांना पडलेली मतं संजय डेरले यांना पडल्याचे जाहीर करीत दोन्ही निकाल परस्पर जाहीर केले. त्यानुसार, विजयी म्हणून जाहीर झालेल्या उमदेवारांनी जल्लोषात मिरवणुका काढल्या. त्यानंतर निफाडच्या तहसीलदारांना महिलांच्या मतदानावर पुरुष उमेदवार विजयी केले गेल्याचे लक्षात आले. निफाडच्या तहसीलदारांनी हा गोंधळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर निवडणूक अधिकारी तथा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी तातडीने हा प्रकार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना कळवला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोटरी’तर्फे दातृत्वाचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंबांमधील दिवाळी गोड होतेच. पण, काही कुटुंबे दिवाळीच्या या गोड प्रकाशाला मुकतात. अशा कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटी व चैतन्य आश्रमातर्फे १२३० गरजूंना कपड्यांपासून घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले.

सिडकोत भरविण्यात आलेल्या रोटरी शेअर बाजाराच्या माध्यमातून लहान मुले, मुलींना चांगल्या स्थितीतील कपडे, खेळणी आणि महिला व पुरुषांसाठी चांगले कपडे, घरातील भांडी व इतर वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या चेहेऱ्यावर आनंदी भाव उमटले होते.

या उपक्रमांतर्गत लहान मुला-मुलींचे कपडे, खेळणे, जीन्स पँट, शर्टस, पंजाबी ड्रेस, सलवार कुर्ता, ओढणी, महिलांसाठी साडी, पंजाबी ड्रेस, स्वयंपाक घरातील विविध भांडी, प्रवासातील बॅग, चप्पल, बूट, ब्लँकेट, बेडशीट व घरातील वापरावयाच्या अनेक वस्तू, तसेच पुरुषांसाठी शर्ट-पँट आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या चेहेऱ्यांवरील आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी संपूर्णानंद यांनी प्रत्येक लाभार्थ्यांना प्रसादाचे वाटप केल्यानंतर या वस्तू देण्यात आल्या. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा अलका सिंग, आशा वेणुगोपाल, दुर्गा साळी, अचम्मा अलूर, मीनाक्षी मित्तल, शीला पांचाळ, अरविंद पांचाळ, कविता डगावकर, अंजली मेहता, मनोरमा अग्रवाल, मेधा सायखेडकर आदी उपस्थित होते.

--


लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लासलगाव हे येवला विधानसभा मतदारसंघात येते. माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना लासलगावमधून चांगले मतदान मिळाले असल्याने त्यांनी लासलगावच्या बस स्टँडचा लूक बदलण्याची घोषणा केली होती. पण, नंतर सरकार बदलले आणि त्यांना तुरुंगवास झाल्याने या बस स्टँडच्या सुविधांसाठी पाठपुरावा करायला कोणीही नसल्याने येथील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा लिलाव दिवाळीत सुरू ठेवण्याची सूचना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कांद्याचे भाव घाऊक बाजारात २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढल्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी कांदा व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. दिवाळीमध्ये आठ दिवस खरेदी बंद न ठेवता ती फक्त सणाच्या दिवशीच बंद ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत त्यांनी कांद्याच्या स्टॉकची माहिती प्रशासनाला असावी, यासाठी सेल्फ डिक्लरेशन दररोज देण्याच्या सूचना सर्व व्यापाऱ्यांना केल्या.

कांद्याचे भाव वाढल्यानंतर प्राप्तिकर विभागाने काही दिवसांपूर्वीच कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले. त्यातून कांदयाचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर महिनाभरातच पुन्हा कांद्याचे भाव वाढल्याने थेट केंद्रानेच आता दबाव वाढवला आहे. जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली तातडीची बैठक केंद्राच्या दबावामुळे घेण्यात आल्याची चर्चानंतर व्यापाऱ्यांत रंगली. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर या बैठकीसाठी जिल्हाभरातून व्यापारी व कृऊबाचे पदाधिकारी शॉर्ट नोटीसवर उपस्थित झाले. व्यापाऱ्यांनी आपले प्रश्न समोर ठेवले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने व्यवहार असावा, अशा सूचना करून त्याचा फायदा सर्वांनाच होईल, असे सांगितले. कांदा व्यापाऱ्यांना काही अडचणी आल्या तर त्यांनी तातडीने प्रशासनाला सांगावे त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत व्यापाऱ्यांनी सणाच्या दिवसांत लेबर उपलब्ध नसल्याची अडचण मांडली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी ज्याला शक्य होईल व कामगार उपलब्ध होईल त्याप्रमाणे सोमवार व मंगळवारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

दिवाळी सणात जेथे कामगार उपलब्ध आहेत, तेथे खरेदी केली जाईल. दक्षिण भारतात पावसामुळे नुकसान झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक सूचना केल्या. आमच्यावर भाववाढीचे आरोप होतात. त्यामुळे काही योजना त्यांनी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे काम करू.

- सोहनलाल भंडारी, जिल्हाध्यक्ष, कांदा व्यापारी असो.

दिवाळीत आठ दिवस कांदा खरेदी बंद न करता केवळ सणाच्या दिवसात ती बंद करावी या चर्चेसाठी व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली. त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा केली.

राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरजवान मिलिंद यांना अखेरचा सलाम

$
0
0

बोराळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जम्मू-काश्मीरमधील बंदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या हवाई दलाच्या गरूड पथकातील सार्जंट मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. १२) सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिलिंद यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी हवाईदलाच्या विमानाने नाशिकमधील ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी शहीद मिलिंद खैरनार यांच्या कुटुंबाने अत्यंत शोकाकुल वातावरणात आपल्या लाडक्याला निरोप दिला. यावेळी प्रशासनातर्फे मानवंदना देऊन लष्कराच्या वाहनाने साक्रीमार्गे नंदुरबारकडे नेण्यात आले. मिलिंद यांचे पार्थिव साक्री शहरात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी साक्री पोलिस दलाकडून मानवंदना देऊन तहसीलदार संदीप भोसले पोलिस निरीक्षक एस. आर. पाटील यांच्यासह नागरिकांना अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील बोराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, नायब तहसीलदार जी. एम. पाटील यांच्यासह सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीस बसणार आळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव उपविभागीय वनपरीक्षेत्रातील गाळणे, पोहणे, च‌चिावे, तळवाडे, नागझरी, रामपुरा भागातील खैर वृक्षांची तोड झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला आहे. विशेष पथकाने परिसरात पंचनामा केल्यानंतर खैरचे ३१० नग (३६ हजार) जप्त केले असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांनी ‘मटा’ला दिली. तसेच गाळणा परिक्षेत्रातील वृक्षतोड रोखण्यासाठी दोन विशेष टीम तयार करून गस्त वाढव‌ण्यिात येणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

मालेगावच्या वन परिक्षेत्रात खैरसारख्या अनेक दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती असून, त्यांची अवैध तोड होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत वनविभागाकडून अधिक तपासासाठी गाळणे आणि परिसरातील जंगलात विशेष पथक पाठविले. या पथकाने ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान जंगलातील ९० हेक्टरमध्ये रेकी करून खैरचा साठा जप्त केला. वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील, विभागीय वनाधिकारी घुले, जगदीश येडलावर यांच्यासह २० अधिकारी कर्मचारी असलेल्या पथकाने पंचनामा केला. दरम्यान ३७० खैरांची बुंधे आढळून आली. त्याचा काही भाग आजूबाजूच्या परिसरातही सापडला. याबाबत शुक्रवारी मुख्य वन संरक्षक यांना वनविभागाच्या दक्षता पथकाकडून अहवाल देण्यात येणार आहे.

ठोस कारवाईकडे लक्ष

गाळणे परिसरात गेल्या अनेक ‌वर्षांपासून अवैधपणे लाकूडतोड सुरू आहे. गेल्या आठवड्यात याबाबत असाच एक प्रकार समोर आला आहे. याबाबत अनेकदा तक्रार करुनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वनव‌भिागाने कठोर पाऊले उचचली आहेत. मात्र आता वनविभागाने दोन पथके कार्यान्वित केल्यामुळे अवैधपणे लाकूड चोरीवर आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.
या परिसरातील वृक्षतोड प्रकरणात स्थानिकांची मदत झाल्यानेच अवैध खैर तोड झाल्याचा संशय आहे. वनविभाग त्यादिशेने तपासा करीत आहे. या टोळीचा शोध घेण्यासाठी मालेगाव शहराच्या प्रवेशजवळ नाकाबंदी करण्यात येणार आहे. तर गाळाणा व परिक्षेत्रात देखील दोन विशेष टीम तयार करून गस्त वाढव‌ण्यिात आली आहे.

- व्ही. डी. कांबळे, वनपरीक्षेत्र अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल’ युवक अधिक आशावादी

$
0
0

jitendra.tarte

@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

नाशिक : सामाजिक जाणीव जपत समाजातील चांगलं ते जतन करण्याचा वसाही तरुणाईने घेतल्याचे चित्र आहे. ‘सोशल’ वर्तुळात कार्यशील झाल्यामुळेही तरुणांची मनोवस्था भक्कम आणि आशावादी राहते, असेही मानसशास्त्राचे अलिकडील संशोधन आहे. या संशोधनाच्या निष्कर्षास अनुसरून काम करणारी तरूणाई इतरांसाठीही प्रेरक ठरत असल्याचा प्रत्यय शहरातील तरूणांच्या उपक्रमांमधून येत आहे.

सामाजिक क्षेत्रात भरीव कामे करतानाच शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणरक्षण, साहस आणि क्रीडा या सर्व क्षेत्रात युवक स्वत:चा व्यवसाय, नोकरी, शिक्षण या जबाबदाऱ्या सांभाळून योगदान देत आहेत. आंतरिक प्रेरणेमुळे कुठल्याही राजकीय आणि आर्थिक पाठबळाशिवाय हे युवक कार्यरत आहेत.

तरुणाईच्या प्रेरक उपक्रमांवर एक नजर

दुर्गम भाग आणि शहरातील स्लम वस्त्यांमधील शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षित करण्याचे काम उचलणारा ‘आय मॅड्स’ असाच हटके ग्रुप म्हणून परिचित आहे. या ग्रुपच्या उपक्रमांविषयी सांगताना मोटीवेशनल वक्ते आकाश पटेल म्हणाले, ३०० पेक्षाही अधिक युवक ग्रपुमध्ये आहेत.सुटीच्या दिवशीचा पूर्ण वेळ स्लम आणि परिसरातील दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमधील मुलांना शिक्षणाच्या

प्र्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला जातो.

अनोखा दृष्ट‌किोन

फोटोग्राफीचा छंद जोपासताना नाशिकच्या ‘व्टेंटी फस्ट ऑफ फोटोग्राफर्स’ या संघटनेने अनोखा उपक्रम सुरू केला. फोटोग्राफीच्या नियमित विषयांच्या पलिकडे जात या ग्रुपने विशेष मुलांवर आधारीत एक डॉक्युमेंट्री तयार केली. प्रबोधिनी विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांवर आधारीत ‘अ स्माईल दॅट नेव्हर फेड्स’ या डॉक्युमेंट्रीने विशेष मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होण्यास मोठी मदत होत असल्याचे ग्रुपचे संस्थापक सागर कोल्हे सांगतात.

दुर्ग संवर्धनाचे

अनमोल कार्य

जिल्ह्यातील गड आणि किल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ५१ दुर्गांवर संवर्धन मोहीम राबविण्यात आली. प्रा. आनंद बोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन मोहिमेतंर्गत गड, किल्ल्यांच्या स्वच्छता आणि

संवर्धनाचे काम केले जाते. आतापर्यंत सुमारे २०० युवक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. दर रविवारी एका किल्ल्याची निवड केली जाते. तेथे श्रमदानातून दुर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले जाते.

विक्रमी ढोल पथक

सुमारे ३५० सदस्यांच्या मदतीने शिवराय ढोल पथकाने ५१ ताल आणि ६४ संस्कृत श्लोक एकाच सुरात सादर करत जागतिक विक्रमही केला होता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ससह विविध प्रतिष्ठेच्या विक्रमांमध्येही शिवराय ढोल पथकाच्या उपक्रमाची नोंद आहे. युवकांच्या योगदानातून साकारलेल्या या ढोल पथकाचा उद्देश शहराची संस्कृती आणि वारसा जतन करून तरूणाईतील स्फूर्ती जागविण्याचा असल्याचे संस्थापक शौनक गायधनी सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिंद्रा कामगारांची दिवाळी होणार गोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरातील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कामगारांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. युनियन पदाधिकाराऱ्यांसोबत कंपनी व्यवस्थापनाच्या मुंबईत नुकत‌ीच बैठक झाली. यात कामगारांना प्रत्येकी किमान ४५ ते ८१ हजार बोनस मिळणार असल्याचे महिंद्रा युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलतांना सांगितले.

कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात एकमत होत असल्याने उत्पादन प्रक्रिया योग्य दिशेन वाटचाल करीत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. महिंद्रा कंपनीवर शेकडो वेंडर अवलंबून आहेत. महिंद्राला चारचाकी वाहनांचा पुरवठा करणाऱ्या शेकडो कंपन्यांमध्येही हजारे कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे महिंद्रा व नाशिकचे अतूट नाते निर्माण झाले आहे. दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी महिंद्राने कामगारांना जब्बो बोनस जाहीर केला आहे.

दरवर्षी प्रमाणे बोनसमध्ये वाढ करण्यात आल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कामगारांच्या सर्व्हिसनुसार बोनस देण्याची परंपरा महिंद्रा कंपनीत आहे. यामुळे प्रत्येक कामगाराला दिवाळ सण साजरा करण्यासाठी किमान ४५ हजार ते ८१ हजार बोनस मिळणार आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या फेडरेशनच्या बैठकीला युनियनचे सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव परशुराम कानगेकर, सहसचिव लॉरेन्स भंडारी, सदस्य सुनील अवसरकर व भुवणेश्वर पोई उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाना नसलेली औषधे अन्यत्र विका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गुरुवारी नाशिक अॅग्रो डिलर्ससोबत बैठक झाली. परवाना नसलेली कृषी औषधे दुसऱ्या दुकानात विकण्याचा अजब सल्ला यावेळी खोत त्यांनी दिला.

परवानाधारक दुकानात मात्र सरकारने मान्यता दिलेल्या कृषी औषधेच विका. परवाने नसलेली जैविक किटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके यांची विक्री केल्यास कारवाई केली जाईल, असेही खोत यांनी बजावून सांगितले. खोत यांच्या परस्परविरोधी वक्तव्यामुळे अॅग्रो डिलर्सचाही गोंधळ उडाला. बैठकीनंतर पत्रकारांनी या विषयावर छेडले असता त्यांनी घुमजाव करत मी फक्त परवाने असलेलीच कृषी औषध विकण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगून अॅग्रो डिलर्सला केलेल्या सूचनांना बगल दिली.

अॅग्रो डिलर्सच्या नाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचलित कृषीनिष्ठा कायद्यामध्ये समाविष्ट नसलेल्या बिगर नोंदणीकृत पीकवाढ संजीवके व इतर उत्पादनांची विक्री न करणेबाबत सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशावर खोत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले. सरकारने एका दिवसात असे अध्यादेश काढल्याने आमचे लाखो रुपयाचे नुकसान होईल. त्यामुळे कृषीनिविष्ठांमध्ये समाविष्ट नसलेली उत्पादन विक देण्याची विनंती केली. त्यावेळी खोत यांनी हा अजब सल्ला दिला आणि नंतर घुमजावही केले.

खोत यांनी बैठकीत परवाने नसलेल्या कृषी औषधांचे बिल देण्याची सूचना केली. तसेच तक्रार आल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अॅग्रो डिलर्सला गोंधळ उडाला. बैठकीत परवाने नसलेल्या औषधांबाबत तीन महिन्यात समिती स्थापन करुन निर्णय घेण्याचे आश्वसानही त्यांनी दिले. तसेच काही कृषी औषधे हे पत्र्याचे शेड लावून तयार केले जाते. दारुभट्टीसारखा हा प्रकार आहे त्यावर त्वरित कारवाई करा. गुजरात, आंध्र प्रेदशमधून परवानगी नसलेल्या औषधांचा साठा जप्त करा, भरारी पथक नेमा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कृषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा
सर्टिफिकेट नसताना जिल्ह्यात ३०० ते ३५० कृषी डॉक्टर शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देतात. त्यांच्याकडून फी पोटी पैसेही वसूल करतात. अशा डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा. राज्यात कृषी विद्यापीठ व कृषी खाते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे या डॉक्टरांची गरज नाही. हे डॉक्टर चुकीचे औषधे वापरण्याचा सल्ला देतात. ज्या शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे. त्यांनी तक्रार करावी असे आवाहनही खोत यांनी केले. दरम्यान, बैठकीत चीनच्या औषधांची चर्चा झाली. ही औषधे स्वस्त मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषिग्राम’ पॅटर्न राज्यभर राबवणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. यात नाशिकचा कृषिग्राम समितीचा पॅटर्न राज्यभर राबविणार आहे. या पॅटर्नसाठी अध्यादेश काढणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

उंटवाडी येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत खोत बोलत होते. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी. एन. जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष जगदाळे यांच्यासह विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, क्षेत्रीय कर्मचारी आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत राज्यमंत्री खोत यांनी अधिकाऱ्यांना बांधावर जाण्याच्या सूचना करून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या, असे सांगितले. तब्बल दोन तास चालेल्या या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्याचे कौतुक केले तसेच चुकीच्या मुद्यावरून धारेवरही धरले. बैठकीत खोत यांनी यवतमाळ प्रकरणाचा उल्लेख करून जिल्ह्यात औषध फवारणी व योजनांचा आढावा प्रत्येक गावात जाऊन घ्या. शेतकरी फवारणीसाठी कोणती औषधे वापरतात ते बघा. स्टाफ कमी आहे, संख्या कमी आहे असे म्हणत बसू नका, काम तर करावेच लागणार आहे. आपण किती गावांना भेटतात हे महत्त्वाचे आहे. कार्यालयात बसून काम करणार असेल तर ते चालणार नाही. आता मी तीन महिन्याचा आढावा घेणार असून त्यात कोणता कृषी अधिकारी कुठल्या गावात गेला, बैठका घेतल्या, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केले याची नोंद घेणार असून त्याचा रिपोर्टही मागवणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.


ठिंबक सिंचन समाधानकारक नाही

ठिंबक सिंचनाचे काम कोणत्याही जिल्ह्याचे समाधानकारक नाही, असे सांगत खोत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाच-पाच महिने झाले तरी काम होत नसले तर कसे चालेल? अनुदान देणार की नाही असे फोन शेतकरी करतात. त्यामुळे आलेले प्रस्ताव त्वरित निकाली काढून अनुदान वाटप करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

घटनेची जबाबदारी आपली

शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि शेतात घडणाऱ्या घटनेची जबाबदारी आपली आहे. आता शेतीचे संदर्भ बदलेले आहेत. तरुण पिढी या व्यवसायात उतरली आहे. इंटरनेटचा वापर केला जात आहे. त्यामुळे गावात गेले पाहिजे. कॉम्प्युटर म्हणजे आपले शेत आहे. शेत प्रश्न विचारतो व तोच उत्तर देतो. शेतीच्या बांधापेक्षा आता जलयुक्तच्या बंधाऱ्यांकडे उभे राहण्याचा कल वाढल्याचा टोलाही खोत यांनी लावला.

अधि‌काऱ्यांची खरडपट्टी

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी नाशिक विभागात कोट्यवधी रुपये देऊनही ही योजना प्रभावीपणे सुरू होऊ शकलेली नाही. ज्या योजना सुरू आहेत त्याही कासवगतीने आहेत. त्यामुळे या सर्व कामांची दिवाळीनंतर प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यात कामचुकारपणरा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देत राज्यमंत्री खोत यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कृषी बैठकीनंतर पाणीपुरवठा आढावा बैठक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय मानांकनापासून नाशिक कोसो दूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

स्वच्छता दर्पण उपक्रमांतर्गत राज्यातील जिल्ह्यांचे राष्ट्रीय व राज्य स्तरीय रँकिंग घोषित करण्यात आले. विभागातील नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील १६८ व्या तर राज्यस्तरावरील १० व्या क्रमांकावर मिळाली आहे. राष्ट्रीय मानांकनापासून नाशिक कोसो दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ दर्पण उपक्रमात स्वच्छतेबाबतचे राष्ट्रीय रँकिंग घोषित करण्यात आले. प्रथम क्रमांकाची रँकिंग प्राप्त महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ राज्य स्वच्छता ही सेवा हा २०१७ सालचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले.

देशभरातील नागरिकांना मिळणारे पिण्याचे पाणी व सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचविण्यासाठी केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयातर्फे स्वच्छता दर्पण हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत राज्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या दर्जानुसार सर्व राज्ये व जिल्ह्यांना राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मानांकन केले जाते.

एकाही जिल्ह्याला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झालेले नसल्याने विभागातील सार्वजनिक पाणी पुरवठा गुणवत्ता व स्वच्छतेचा दर्जा उंचावण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. याशिवाय राष्ट्रीय मानांकनापासून विभागातील जिल्हे कोसो दूर असल्याचे उघड झाले आहे. कोट्यावधी रुपयांची खिरापत पाणी पुरवठा, शौचालये योजनांसाठी वाटण्यात आली असतांनाही विभागातील प्रशासन पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा राखण्यात अपयशी ठरले आहे.

विभागातील जिल्ह्यांचे मानांकन

यंदा देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. तर नाशिक विभागातील जिल्ह्यांचे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मानांकनेही जाहीर झाली आहेत. त्यात नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील १६८ वे तर राज्य स्तरावरील १० वे, नगर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील १७६ वे ते राज्य स्तरावरील ११ वे, नंदुरबार जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील २२३ वे तर राज्य स्तरावरील १६ वे, धुळे जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील २९४ वे तर राज्य स्तरावरील २० वे आणि जळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील ३२२ वे तर राज्य स्तरावरील २२ वे मानांकन प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणी गावातील आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आल्यानंतर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना झालेल्या आपल्या कारवाईमुळे आश्रमशाळेतील ‌शिक्षकही संभ्रमात सापडले आहेत.

महिरावणी आश्रमशाळेतील संतोष डगळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांनी शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत प्रशासनाने आश्रम शाळेचीच मान्यता रद्द करून टाकली. यानंतर या आश्रमशाळेतील चारशे विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही चिंता पडली आहे. आदिवासी विकास विभागाने एखाद्या नवीन संस्थेला महिरावणीतील आश्रमशाळा चालविण्यास द्यावी, तसेच आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली शाळा सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.

महिरावणीतील आश्रमशाळेचा कारभार अनेकदा वादग्रस्त राहिलेला आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरल्याच्या मुद्यावरून या शाळेची यापूर्वीही मान्यता रद्द करण्यात आली होती. तेव्हाही विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी आदिवासी विकास भवनाने घ्यावी, अशी मागणी शिक्षकांसह पालकांनी केली आहे. दरम्यान, संस्थाचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे दूरध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images