Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉ. गावितांसाठी पुन्हा ‘अभयसमिती’

$
0
0

राज्य सरकारकडून कारवाई टाळण्याचे प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागातील विविध योजनांमधील सुमारे ७८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या माजी आदिवासी विकासमंत्री व भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना अभय देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. न्या. गायकवाड समितीने दोषारोप ठेवले असतानाही या अहवालाचा अभ्यास व योग्य व्यक्तींवर कारवाईसाठी निवृत्त अधिकारी प्रभाकर करंदीकर यांची एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. तीन वर्षे चाललेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या छाननीसाठी पुन्हा समिती नेमल्याने गावितांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

आदिवासी विकास विभागाने २००४ ते २००९ या काळात राबविलेल्या योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या न्या. एम. जी. गायकवाड समितीने माजीमंत्री डॉ. विजयकुमार गावितांसह २० अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला होता. या समितीने सखोल चौकशीत सुमारे ७८ कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल मे महिन्यात शासनास सादर केला होता. त्यात डॉ. गावितांवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे डॉ. गावितांची राजकीय कारकिर्द ही संपुष्टात येणार होती. डॉ. गावित हे सध्या विधानसभेत भाजपचे प्रतिनिधित्व करीत असून, त्यांची कन्या हिना गावित भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सध्या पक्षाला परवडणारे नाही.

सहा महिने दिलासा

न्या. गायकवाड समितीच्या अहवालाच्या छाननीसाठी निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर यांची एकसदस्यीय समिती नियुक्त केली असून, ही समिती सहा महिन्यांत अहवाल देणार आहे. नेमकी किती जणांवर कारवाई करावी अशी सिफारस ही समिती करणार असल्याने आता कारवाईबाबत संशय निर्माण झाला आहे. डॉ. गावितांवरील कारवाई टाळण्यासाठी पुन्हा समितीचा फार्स केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूल्यधिष्ठित शिक्षणाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ग्रामीण विद्यार्थ्यांनी न्यूनगंड काढून टाकावा. मूल्यधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. त्याला तिलांजली न देता काळाशी सुसंगत शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचा व देशाचा विकास साधावा, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी पिंपळगाव बसवंत येथे केले.
पिंपळगावच्या क. का. वाघ कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उद्‍घाटनप्रसंगी कुलगुरू बोलते होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे अध्यक्षस्थानी होते. सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस सुनील ढिकले, संचालक प्रल्हाद गडाख, जयंत पवार, भाऊसाहेब खताळे, सचिन पिंगळे, नानासाहेब दाते, मंदा सोनवणे, पुणे विद्यापीठाचे डीन डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रतापदादा मोरे, विश्वासराव मोरे, शरद आहेर, एस. के. शिंदे आदी मंचावर होते. प्राचार्या डॉ. एस. एस. घुमरे यांनी प्रास्ताविक केले.
कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, की मूल्यांची घसरण सुरू आहे. आई-वडिल, शिक्षकांप्रती आदर कमी झाला आहे. यशासाठी शॉर्टकट शोधला जात आहे. चैनीसाठी व स्पर्धेत टिकण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला जात आहे. शिक्षणातील बदलांचा संबंध देशाच्या प्रगतीशी हवा. प्रगतीशी सुसंगत शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य देऊन चांगले उद्योजक घडविलेत तरच वाढत्या शहरीकरणाला आळा बसेल.

डॉ. शेवाळे म्हणाले, की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळण्यासाठी, भविष्यात चांगले प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. सरचिटणीस नीलिमा पवार म्हणाल्या, की मेरीट असेल तरच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता. विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढवून स्वयंरोजगार मिळवावा. शेतीला प्राधान्य द्यावे. ग्रामीण व शहरी दरी कमी झाली पाहिजे. शिक्षणाच्या दर्जाशी संस्था तडजोड करणार नाही. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचलन केले. उपप्राचार्य डॉ. एस. वाय. माळोदे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७१ गावांसाठी शनिवारी मतदान

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १७१ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी ७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठीची तयारी निवडणूक विभागाने पूर्ण केली असून ६८८ केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित तालुक्यांना जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक साहीत्याचे वाटप करण्यात आले आहे.



१७१ ग्रामपंचायतीत निवडणूक

एक हजार ६४७ जागांसाठी निवडणूक

त्यापैकी ६२७ जागा बिनविरोध

१०२० जागांसाठी २१४० उमेदवार रिंगणात

७ सप्टेंबर रोजी मतदान

६८८ कंट्रोल युनिट, १३७६ बॅलेट युनिट

प्रत्येक केंद्रावर पाच याप्रमाणे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती



असे आहेत उमेदवार

सिन्नर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये २२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पेठमध्ये एका ग्रामपंचायतीसाठी २ उमेदवार बिनविरोध झाले असून ९ उमेदवार रिंगणात आहेत. निफाडमध्ये ३८९, कळवणमध्ये १३२, बागलाणमध्ये २७६, येवल्यात ७०, नाशिकमध्ये १५५, दिंडोरीत ७८, मालेगावात १९६ शिल्लक, देवल्यात १९६, त्र्यंबकेश्वरमध्ये १०, चांदवडमध्ये ४०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरपासूनच टँकरवारी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वरुणकृपेने यंदाच्या पावसाळ्यात धरणक्षेत्रात पावसाचे भरभरून दान पडल्याने एका बाजूला दिलासा मिळाला असला तरी, दुसऱ्या बाजूला येवला तालुक्यावर पावसाने मेहरबानी न केल्याने आगामी काळात तालुका पाणीटंचाईच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. घसरलेले पर्जन्यमान अन् त्यातून न उंचावली गेलेली भूगर्भातील पाणीपातळी लक्षात घेता तालुक्यातील गावोगावच्या विहिरींचा येत्या दीड दोन महिन्यातच कातळ उघडा पडून जनतेवर ‘टँकर द्या हो टँकर’ची आर्त साद घालण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

दुष्काळ अन् त्यातील अस्मानी संकटांची मालिकाच जणूकाही पाचवीला पुजलेल्या येवला तालुक्याला आजवर अनेकदा वरुणराजाने जणूकाही वाऱ्यावर सोडलेले आहे. पालखेड डाव्या कालव्याचा कमांड एरिया वगळता केवळ आभाळमायेवरच भवितव्य अवलंबून असलेल्या तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यातील गावोगाची कथा अन् व्यथा ही या भागाला सातत्याने जाणवणारे पाण्याचे दुर्भीक्ष्य व तीव्र पाणीटंचाई अधोरेखित करणारीच. २०१३ ते १५ अशी सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीत शेतीची वाताहत होताना पाणी टंचाईच्या अवकळा देखील सोसाव्या लागल्या. २०१५ च्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे तर हिवाळ्यातच काही ठिकाणी प्रशासनाला टँकर सुरु करावे लागले होते. पुढे २०१६ सुरू होताना उन्हाळ्यात तर तब्बल सव्वाशेच्या वर गावे आणि वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. २०१६ मध्ये पावसाळ्यात तहानलेल्या येवला तालुक्याच्या झोळीत मात्र पावसाचे भरभरून दान पडल्याने दिलासा मिळाला होता. तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावोगावचे जलस्त्रोत उंचावले गेल्याने तालुक्याचे दुष्काळी संकट दूर गेले होते. गतवर्षीच्या या दमदार पावसामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्याने मार्च-एप्रिलपर्यंत तग धरत तालुक्यातील पाणी टँकरची संख्या घटली होती.

संकटाची चाहूल

गेल्यावर्षी वरुणराजाची कृपादृष्टी होताना येवला तालुक्याच्या पदरी पावसाचे भरभरून दान पडल्याने साहजिकच यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईची धग कमी प्रमाणात जाणवली होती. यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे मात्र तालुक्यासमोर संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे. यंदा तालुक्यात आजवर झालेल्या एकूण पावसावर नजर टाकली तर सर्वच ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी दिसत आहे.

गावांमध्ये सुरू होणार टँकर

करंजवण धरण समूह क्षेत्रात यंदा झालेल्या दमदार पावसातून समूहातील पालखेडचे पाणी मिळताना तालुक्यातील पालखेड डावा कालवा कमांड एरियातील खरीपाचा प्रश्न मार्गी लागला. तर नॉन कमांड एरिया असलेल्या तालुक्यातील संपूर्ण उत्तर व पूर्व पट्ट्यातील बराच भागातील खरीप चक्र झालेल्या पावसावर कसेबसे पुढे सरकले गेले. करंजवण धारण समूहातील करंजवण, पालखेड, वाघाड, ओझरखेड ही धरणे सध्या तुडुंब भरली असल्याने पुढील काळात पालखेडचे पिण्याचे आवर्तन मिळून तालुक्यातील कमांड एरियातील गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेलही, मात्र कमांड एरिया नसलेल्या गावांची तहान कशी भागवणार? हा प्रश्न येत्या काळात नक्कीच उभा ठाकणार आहे.

परतीच्या पावसाची आस

परतीचा पाऊस हा साधारणतः १५ ते २० ऑक्टोबरपर्यंत पडत असतो. त्यामुळे येत्या दहापंधरा दिवसात पाऊस पडला तर काही प्रमाणात संकट कमी होईल. अन्यथा डिसेंबरमध्येच तालुक्यातील अनेक गावे अन् वाडयावस्त्यांवरुन टँकरची मागणी होताना टँकर्सनी गावोगावची वाट धरली असल्याचे चित्र समोर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण संचालकांसमवेत शिक्षकांची शनिवारी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा मुख्याध्यापक संघ, विभाग टीडीएफ व विभाग माध्य शिक्षक संघ व शिक्षकेत्तर संघटना यांच्यातर्फे जिल्ह्यातील व विभागातील सर्व शाळा मुख्याध्यापकांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सोडविण्यात यावे या मागणीसाठी शिक्षण संचालक गंगाधर मम्हाणे यांच्यासोबत शनिवारी (दि. ७) बैठक होणार आहे. इंदिरानगर, पाथर्डी रोडवरील गुरूगोविंदसिंग पब्लिक स्कूलमध्ये सकाळी ११ वाजता बैठक होईल.
अनेक मागण्या प्रलंबित असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी ही सभा घेण्यात येत आहे. यामध्ये चौथ्या टप्यातील सर्वच शाळांना सरसकट आयसीटी लॅब मिळावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यता दुरुस्ती त्वरित करून मिळावी, मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचे धोरण रद्द करावे, शालेय गुणवत्तेसाठी माध्यमिक शाळा संहितांमधील कार्यभारानुसारच शिक्षक संचमान्यता करण्यात यावी अशा मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय, २०१६-१७ च्या संच मान्यतेमधील त्रुटींची दुरुस्ती होऊन नाईक व प्रयोगशाळा परिचर पदे पूर्वीप्रमाणे दखविण्यात यावे, संच मान्यतेतील प्रस्तावित पदांना मान्यता मिळावी या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. यावेळी पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आदी उपस्थित राहणार असून शिक्षकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भरतपूर’ गजबजले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जागतिक पाणथळ स्थळ म्हणून घोषित असलेले व महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नावाजलेले नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात वन्यजीव सप्ताह अंतर्गत पक्षीगणना सुरू झाली असून, आतापर्यंत या गणनेत १४ हजार ३४२ देशी स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांची नोंद वनविभागाच्या कॅमेराने केली आहे.

थंडीची चाहूल लागताच दरवर्षी ऑक्टोबरच्या दरम्यान वन्यजीव सप्ताहात पक्ष्यांची गणना केली जाते. वन विभागाच्या येथील मार्गदर्शक टीमने दुर्बिणीच्या साहाय्याने पक्ष्यांची गणना केली आहे.

ऑस्प्रे ईगल, स्पोटेड ईगल, फ्लेमिंगो (रोहित), कॉमन पोचाड, प्यालीड हॅरीअर, ओयल बिल स्टोर्क,स्पून विल, व्हाइट ईव्स, शॉवलर, गढवाल, लेसर व्हीसलिंग, गार्गणी, स्पॉटविल डक, लिटेल ग्रेब, रिव्हर्टन, मार्श हॅरीअर, गॉड वीट, सी कॉमन सॅण्ड पाईपर, बॅक विंग, स्टील्स, ग्रेटर कोर्मोनट, ब्लॅक काईट, जकाना, व्हाइट बिल अशा सुमारे चाळीस पेक्षा अधिक जातीच्या पक्ष्यांचा यात समावेश आहे

नुकतीच थंडीची चाहूल लागली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नांदूरच्या या पाणथळ क्षेत्रावर देशी विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. पक्ष्यांचे हिवाळी संमेलन भासावे असे मनोहारी चित्र अभयारण्य पाहायला येणाऱ्या पक्षी प्रेमी व पर्यटकांना नजरेत भरते. सध्या नांदूर माध्यमेशवेर धरण ओसंडून वाहत आहे. दरवर्षी येथील पाणवठ्यावर विपुल मत्स्यसंपदा, निरनिराळ्या पाणवनस्पती, शेवाळ असे मुबलक खाद्य मोठ्या प्रमाणात असल्याने पक्ष्यांचा मुक्त वावर या ठिकाणी असतो.

यंदा थंडीची तिव्रताही तेव्हडीच असणार त्यामुळे पक्षांचा मुक्त, स्वछंदी विहार पाहायला मिळणार असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले. सैबेरिया, उत्तर अमेरिका, लेह लडाख, रशिया या देशातून आणि भारतातून उत्तर हिमालय, गुजरात अशा ठिकाणाहून हजारो पक्षी नांदूरच्या जलाशयावर उतरून पक्षीप्रेमींना भुरळ घालतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर बदलले परिपत्रक

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या युथ फेस्टमध्ये माय मराठीला वगळण्यात आले होते. ‘मराठी ऐवजी फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच व्यक्त व्हा!’ अशी तुघलकी अट विद्यापीठाने घातली होती. या प्रकरणाचा ‘मटा’ने पाठपुरावा केल्यानंतर चुकीने मराठीचा उल्लेख राहिला असा पवित्रा विद्यापीठाने घेतला. या संदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय तसेच इंद्रधनुष्य स्पर्धेत व निवड चाचणीत मराठी माध्यमाचा सातत्याने समावेश झाला आहे. या संदर्भात प्रत्येक कॉलेजमधील विद्यार्थी विकास अधिकारी सर्वज्ञात आहेत. मात्र, या संदर्भात जिल्ह्यातील नाशिक विभागीय फेरीत संदिग्धता निर्माण झाली. तरी जिल्ह्यातील अशा विद्यार्थ्यांनी पुणे येथे होणाऱ्या ५ व ७ ऑक्टोबर रोजीच्या निवड चाचणीत सहभागी व्हावे. असे नवे परिपत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर मंगळवारी (दि. ३) सायंकाळी अपडेट करण्यात आले. विद्यापीठाने आपली चूक मान्य करून नवीन सुधारित पत्र अपलोड केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थी कलावंतांना मराठी भाषेत व्यक्त होण्याची संधी देण्यात आल्याने उत्साहाला उधाण आले आहे.

नियमावलीही मराठीत!
युवक महोत्सवाच्या पहिल्या परिपत्रकात मराठी भाषेत व्यक्त होत येणार नाही. या अटीसोबतच जाहीर केलेली नियमावली देखील इंग्रजीत होती. यामुळे विद्यापीठाला मराठीचा तिटकारा असल्याची टीका केली जात होती. मात्र, आता जाहीर झालेल्या नव्या पत्रकात नियमावलीही मराठीत अपलोड करत विद्यापीठाने आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीलाच प्राधान्य
इंद्रधनुष्यसाठी संघ तयार करताना मुख्यत्वे मराठी माध्यमावर विद्यापीठाकडून भर दिला जाणार आहे. याबाबत कुठलाही संभ्रम नसावा. तरी सदर बाब प्रत्येक कॉलेजमधील विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांना सूचित करावे. तसेच जिल्ह्यातील मराठी भाषेतून कलाविष्कार करणारे विद्यार्थी पुढील फेरीत उपस्थित राहतील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाने नव्या परिपत्रकात केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्येष्ठांना मिळावे सन्मानाचे जीवन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

वयाच्या साठीपर्यंत आपले कुटुंब, समाज यासाठी अपार परिश्रम घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना समाजात सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे. चंगळवादी होत असलेल्या समाजात ज्येष्ठ नागरिकांची स्थिती दयनीय होत असून, त्यासाठी सन १९८० पासून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अनंतराव घोलप यांनी केले.

येथील श्री विनायक ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भीमराव बागुल यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाची व्यथा मांडणारे गीत सादर केले. बी. के. नागपुरे यांनी ज्येष्ठांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी समुपदेशक व कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. संस्थेचे खजिनदार अशोक वारुळे यांनी २००७ च्या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. सर्वश्री देवरे, पुरुषोत्तम ठाकूर, भास्कर तिवारी, बी. एम. महाजन, बबनराव जैन यांनी सभेत आपले विचार मांडले. नगरसेवक मदन गायकवाड, भरत बागुल, सुवर्णा शेलार, राजेंद्र शेलार यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थेची पालिकेकडील कामांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या सभेचे सूत्रसंचालन एल. पी. भालेराव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक मतदार यादी १९ जानेवारीला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
निवडणूक आयोगाने मुंबई व नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू झाले असून १३ व २५ ऑक्टोबरला याद्यांची वर्तमानपत्रात पुनरप्रसिद्धी केली जाईल. दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर असा आहे. अंतिम मतदार यादी १९ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी महेश झगडे यांनी दिली.
नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा मिळून शिक्षक मतदारसंघ आहे. विद्यमान प्रतिनिधीचा कार्यकाळ सात जुलै २०१८ रोजी संपत आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत ५३ हजार ४८४ मतदार होते. यापैकी पुरुष ४२ हजार १११ तर स्त्री मतदार ११ हजार ३६९ होते. यामध्ये वीस टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वेळी ८३ टक्के मतदान झाले होते. माध्यमिक ते विद्यापीठापर्यंतचे शिक्षक मतदार म्हणून नाव नोंदवू शकतात. मात्र, जे शिक्षक एक नोव्हेंबर २०१७ पूर्वी नोकरीस लागलेले आहेत व या कालावधीच्या सहा वर्षांपैकी किमान तीन वर्षे कार्यरत आहेत, तेच मतदानासाठी पात्र आहेत. विभागातील ५४ तहसीलदार आणि ३० विभागीय अधिकारी अशा ८४ जणांकडे फार्म १९ द्वारे मतदारनोंदणी करता येईल तसेच उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.

असे असणार पुनरीक्षणाचे टप्पे
शिक्षक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले असून २८ सप्टेंबर रोजी याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबरला प्रारुप यादी प्रसिद्ध केली जाईल.
- १३ ऑक्टोबर : वर्तमानपत्रातील नोटिसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी
- २५ ऑक्टोबर : द्वितीय पुर्नप्रसिध्दी
- ६ नोव्हेंबर : नमुना १९/१८ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत
- २० नोव्हेंबर : हस्तलिखिते व प्रारुप मतदार याद्यांची छपाई
- २१ नोव्हेंबर : प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी
- २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दावे व हरकती स्वीकारण्याचा काळ
- १५ जानेवारी २०१८ : दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादीची छपाई करणे
- १९ जानेवारी २०१८ : अंतिम मतदार यादी प्रसिद्धी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा, तर मनोरंजन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेला नौटंकी पक्षाची उपमा देणाऱ्या सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यावर शिवसेनेने पलटवार करीत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. दिनकर पाटील यांचे वागणे, बोलणे आणि पोषाख बघता ते पालिकेतील मनोरंजनाचा विषय असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. काँग्रेसमध्ये नागीन डान्स, भाजपात हाफ चढ्ढी घालून नौटंकी करणाऱ्या पाटलांना भाजपातच गांभीर्याने घेतले जात नसल्याचा टोला बोरस्ते यांनी लगावला आहे. दिनकर पाटलांमुळे भाजपच्या अडचणीत भर पडल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

दोनवेळा पाणीपुरवठ्याच्या विषयांवरून भाजप व शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दिनकर पाटील यांनी शिवसेनेला गांभीर्याने घेण्याची गरज नसून, शिवसेना नौटंकी पक्ष असल्याची टीका केली होती. त्यावर शिवसेनेनेही पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. पाटील यांचे बोलणे, त्यांचा पोषाख, त्यांची कृती हा केवळ मनोरंजनाचा विषय आहे. ते कॉँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असताना रस्त्यावर नागीन डान्स करीत होते, भाजपात आल्यानंतर 'अर्ध्या चड्डीत' संचलन करताना दिसले. तर हत्तीसोबतही दिसलेत. त्यामुळे दर निवडणुकीला पक्ष बदलणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलून आपले हसे करून घेऊ नये असा टोला बोरस्ते यांनी लगावला. त्यांच्या बोलण्यातून अनेकवेळा त्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांनाच अडचणीत आणले आहे. त्यामुळे त्यांचे आरोप गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही, असे बोरस्ते यांनी म्हटले आहे.

पाणीपुरवठ्यात अन्याय

शिवसेनेने दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यावर पाटील यांनी तोंडसुख घेतल्याने बोरस्ते यांनी पाटील यांना उत्तर दिले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात दोनवेळा पाणीपुरवठा केला जाते. तसेच दोन वेळा पाणीपुरवठ्याला विरोध करणाऱ्या दिनकर पाटील यांच्याच प्रभागात दोनवेळा पाणीपुरवठा केला जातो. शहरातील अन्य भागात राहणाऱ्या नागरिकांचा दोन वेळ पाणीपुरवठ्याचा अधिकार नाही का, याचे उत्तर पाटील यांनी नाशिककरांना द्यावे, असा सवाल बोरस्ते यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचन प्रेरणा दिन यंदा दोन दिवस अगोदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. यंदा मात्र, रविवार तसेच दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने हा दिवस १३ ऑक्टोबर रोजीच साजरा केला येणार आहे. त्यासंबंधित शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे बीज रुजविण्यासाठी डॉ. कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी वाचनाचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने काय उपक्रम राबविले जावेत, याविषयी सूचना शाळांना देण्यात आलेल्या असतात. यंदाही विविध उपक्रमांद्वारे हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत मित्र, कुटुंबातील सदस्यांना पुस्तक भेट देणे, व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारित करणे, चालू वर्ष हे कवी विंदा करंदीकर यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्या अनुषंगाने कमी संमेलन, व्याख्यान, भाषणे, चर्चासत्र, सामूहिक वाचन, विविध स्पर्धा आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.

तसेच विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती, साहित्यिक संस्था, सार्वजनिक ग्रंथालये यांचे सहकार्य घेऊन सामुदायिकरित्या पुस्तक वाचनाचे कार्यक्रमांचे आयोजनही शाळांतर्फे करण्यात येणार आहे. ‘पुस्तकांचे गांव’ या सरकारी अभिनव प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच शक्य असल्यास या गावाला भेटही द्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विम्याला महिला कर्मचाऱ्यांचा विरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या आरोग्य विमा हप्त्यांच्या रकमेत दुपटीने वाढ झाल्याने महिला कर्मचाऱ्यांनी या विम्याला विरोध दर्शविला आहे. आरोग्य विमा ऐच्छिक करण्याच्या मागणीसाठी महिला कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मह‌लिांसोबत चर्चा केल्यानंतर या विषयावर महापालिका आयुक्तांची भेट घेऊन म्हणणे मांडण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

महापालिकेकडून आपल्या साडेपाच हजार कर्मचाऱ्यांचा दरवर्षी आरोग्य विमा दरवर्षी काढला जातो. दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर करताना गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य विम्याच्या हप्त्यापैकी एक हजार रुपये महापालिकेकडून अनुदान स्वरूपात कपात केला जात आहे. गेल्या वर्षी आरोग्य विम्याच्या हप्त्याची रक्कम दोन हजारांच्या आसपास होती. त्यात सानुग्रह अनुदानातून एक हजार व पालिकेकडून एक हजार रुपये अनुदान मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु काही कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून आरोग्य विभाग्याची रक्कम यंदा एक लाखावरून दोन लाख करण्यात आली. त्यातच जीएसटी देखील लागू झाला. त्यामुळे आरोग्य विम्याच्या हप्त्याची रक्कम ही साडेचार हजाराच्या घरात गेली आहे. तर पालिकेकडून एक हजारच मिळणार आहे. त्यामुळे विम्याची एवढी रक्कम ही महिला कर्मचाऱ्यांना डोईजड झाली आहे. अगोदरच काहींचे खासगी आरोग्य विमे असल्याने जास्त भार पडत आहे. त्यामुळे महापालिकेने सरसकट काढलेल्या आरोग्य विम्याचा दुहेरी हप्ता कर्मचाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळ महिला कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सेना पदाधिकाऱ्यांची तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत विम्याला विरोध दर्शविला. यासंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यात येईल. आरोग्य विमा बंधनकारक न करतान ऐच्छिक केला जावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी सादर केली जाईल, अशी माहिती अजय बोरस्ते, कामगार सेनेचे प्रवीण तिदमे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी साकारले आकाश कंदील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
दिवाळसण आला की बच्चेकंपनीला वेध लागतात. सुट्या आणि रंग‌बेरंगी आकाश कंदिलांचे. विद्यार्थ्यांना शाळेतच आकाश कंदील बनविण्याचे प्र‌शिक्षण देण्यासाठी देवळालीच्या नूतन हायस्कूलमध्ये कार्यशाळा झाली. यात नूतनसह वासुदेव अथनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आकाश कंदील साकारले.

आपल्या घरासमोरील आकाश कंदील स्वतः बनवून लावला तर चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणित होईल, या भावनेने नूतन विद्यामंदिरात पर्यावरण पूरक आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी मुख्याध्यापिका ल. चं. जोशी, उपमुख्याध्यापक श. रा. वैद्य, अ. भि. कवडे आदींच्या सहकार्याने सहावी ते दहावीच्या सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. दीपावलीला आवश्यक असणाऱ्या आकाशकंदिलाचे महत्त्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात असल्याचे कार्यशाळा प्रमुख कलाशिक्षक संदीप गायकवाड यांनी सांगितले. फाइल बोर्ड पेपर, फ्लोरसन पेपर, कापडी रिबन, डिंक दोऱ्याच्या वापर करीत विद्यार्थ्यांनी शेकडो पर्यावरणपूरक आकाश कंदील साकाराले. कलाशिक्षक विशाल शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी कृष्णा लोखंडे, नीलेश गोसावी, माधुरी कनोजिया, माधुरी गोडसे, गणेश गायकवाड आदी प्रयत्नशील होते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेट
लामरोडवरील श्री दत्त पेट्रोलियमचे संचालक बापू वावरे यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण जपण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून १० बॉलपेनचा संच भेट म्हणून दिला. कार्यशाळेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना बापू वावरे यांच्यासह सचिन हांडोरे यांच्या हस्ते या बॉलपेन संचाचे वाटप करण्यात आले.

दिवाळीत बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकपेक्षा आपल्या पाल्याने साकारलेला आकाशकंदील घरासमोर लावल्याचा अधिक आनंद होईल. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आदर वाढत आहे.
- सारिका रुपवते, पालक

कार्यशाळेमुळे आकाश कंदील बनविणे किती सोपे असते याचा अनुभव मिळाला. यापुढे त्यात अजून नाविन्यता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
- वैष्णवी भालेराव, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून लॅपटॉप लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गडकरी चौकात लोगोन कारची काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. मुंबईनाका पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
ललीत सतीश उपाध्ये (रा. प्रथमेश पॅराडाईज, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. उपाध्ये हे कामानिमित्त २९ सप्टेंबर रोजी शहरात आले होते. गडकरी चौकातील एलआयसी कार्यालयासमोर त्यांनी कार (एमएच ०२ बीजे ७१८३) उभी केली होती. चोरट्यांनी कारची काच फोडून सुमारे ४५ हजार रुपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले.

एटीएम कार्डद्वारे गंडा
नाशिक : एटीएम सेंटरमध्ये मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करीत एका संशयिताने बँक खात्यामधील सुमारे ७० हजार रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद फारूख हुसेन सय्यद (रा. गोकुळ चाळ, बागवानपुरा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते मंगळवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता द्वारका परिसरातील के. के. ट्रॅव्हल्सजवळील एटीएम सेंटरवर गेले. यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देण्याचा बहाणा करीत एटीएमकार्डची अदलाबदल केली. काही वेळानंतर त्यांच्या बँक खात्यातून ६९ हजार ९९० रुपयांची रोकड काढल्याचा एसएमएस त्यांच्या मोबाइलवर आला. सय्यद यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून नंतर पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

शिंदेनगरला १२ जुगारी ताब्यात
नाशिक : मखमलाबादरोडवरील शिंदेनगर परिसरात पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकला. तेथून बारा जुगारींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २१ हजार ५०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. शिंदेनगर येथील मांडव सोहळा लॉन्स भागात काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. उदय कॉलनीत राहणारा उमेश इंचाळे याच्यासह १२ जुगारी पत्यांच्या कॅटवर जुगार खेळताना आढळून आले. संशय‌ितांकडून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

विवाहितेची आत्महत्या
नाशिक : सिडकोतील उत्तमनगर परिसरात २४ वर्षीय विवाहितेने घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे अंबड पोलिसानी सांगितले.
अनिता पुष्कराज पवार असे तिचे नाव आहे. घटना मंगळवारी (दि. ३) सकाळी लक्षात येताच पती पुष्कराज पवार यांनी अनिताला सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमध्ये दाखल केले. परंतु, त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मृतदेहाची ओळख
पटविण्याचे आवाहन
अमरधामरोड परिसरात चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पंचवटीतील गणपती कारखाना भागात रविवारी ही घटना उघडकीस आली. संबंधित तरुणाचे वय ३० ते ३५ वर्ष आहे. उंची साडे पाच फुट, रंग काळा, चेहरा गोल, अंगावर लाल रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅण्ट असे त्याचे वर्णन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ट्रकसह पाच दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून काही दिवसांत मालट्रकसह पाच मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. नाशिकरोडसह पंचवटी, भद्रकाली, गंगापूर रोड, अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत हे गुन्हे घडले आहेत.

एकलहरा येथील दंडे वस्ती भागात राहणारे सुकदेव गंभीर वारडे यांचा सुमारे तीन लाख रुपयांचा मालट्रक (एमएच १२ एचडी ७९४४) २६ सप्टेंबर रोजी चालक शाखीर शेख यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केला होता. चोरट्यांनी ट्रक पळवून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हनुमानवाडी परिसरातील राजेश मोहन राठोड हे मेनरोड परिसरात कामानिमित्त आले होते. त्यांची अ‍ॅक्टिवा मोपेड चोरट्यांनी पळवून नेली. काठे गल्लीतील सचिन सदाशिव खोडे यांची पल्सर (एमएच १५ डीआर ५९४९) मंगळवारी सायंकाळी भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीमधील गुरूकृपा अपार्टमेंटमधून चोरीस गेली. सिडकोतील शांतीनगर परिसरात राहणारे सतीश उद्धव गटकळ जॉगिंगसाठी गोल्फ क्लब मैदानावर गेले होते. तरण तलावासमोर पार्क केलेली त्यांची डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच १५ सीझेड २५९१) चोरट्यांनी चोरून नेली. महात्मानगर येथील डेबाशिट कृष्णचंद्र डे यांची यामाहा (एमएच १५ इटी १३५३) १९ सप्टेंबर रोजी रात्री आपार अपार्टमेंटमधून चोरीस गेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर कामटवाडे येथील योगेश छगन पाटकर यांची पॅशन मोटरसायकल (एमएच १५ ईआर ६७१५) १० सप्टेंबर रोजी त्यांच्या विठ्ठलनगर येथील घरासमोरून चोरीस गेली. वाहनचोरीच्या घटना घडत असल्या तरी चोरट्यांना गजाआड करणे आणि या घटना रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे.

दुचाकींचा अपघात
सातपूर : त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीजवळ दुचाकींची बुधवारी समोरासमोर अपघात झाला. सुदैवाने यात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाले होते. परंतु, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी चालकामुळे नाहक दुसऱ्या दुचाकीचालकाला जखमी व्हावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, सातपूर पोलिसांनी दोनही दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅन्सरविरोधी बिया विकणारा तरुण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/सिडको
फेसबुकवरून मैत्री करीत कॅन्सरविरोधी तसेच इतर आजारांवर उपयुक्त असलेल्या औ‍षधी बियांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या भामट्याने लाखो रुपये उकळले असून, यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
निल्स हॅम्पे (३०, नवी मुंबई, मुळ देश नायजेरिया) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी सापळा रचून नवी मुंबई येथे हॅम्पेला जेरबंद केले. सायबर पोलिस स्टेशनमध्ये २२ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यात संशयित आरोपीने औषधी बिया पुरवण्याचे आश्वासन देत तीन लाख रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत पोलिसांनी निल्स हॅम्पेला जेरबंद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताची एक तरुण मैत्रिणीने तक्रारदाराशी फेसबुकवरून ओळख वाढवून अडचणीत असल्याचे भासवले. आमची कंपनी वेबसाइटवरून ५ लाख पौंडाला औषधे खरेदी करते. परंतु, भारतातून यापूर्वी पुरवठा करणाऱ्यांनी तो अचानक बंद केला आहे. यामुळे आपलीही नोकरी धोक्यात आहे. जर त्या औषधी बिया तुम्ही भारतातून आम्हाला पुरवल्या तर आपली नोकरी वाचेल. तसेच, तुम्हालाही चांगला फायदा होईल. या बिया भारतात अवघ्या ५० हजार ते १ लाख रुपयांत मिळतात. तर यासाठी आमची कंपनी ५ लाख रुपये मोजते. अशी माहिती देऊन ही औषधे खरेदी करून आमच्या कंपनीस पुरवण्याची गळ घातली होती. फिर्यादीने एक किलो औषधी बियांची मागणी केली होती. नवी मुंबई येथे ही औषधे घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी पैसे देऊन औषधी बिया विकत घेतल्या. मात्र, औषधांच्या नावाखाली त्या केवळ करंज झाडाच्या बिया फिर्यादीस सोपवण्यात आल्या. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करून मुंबई येथून एका नायजेरीयन संशयितास ताब्यात घेतले. सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवराज बोरसे, जयश्री मूर्ती, किरण जाधव, मंगेश काकुळते, शेखर बडगुजर आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात उद्योजकांना पुन्हा एमआयडीसीची नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) वापरासाठी दिलेल्या भूखंडावर व्यावसायिक वापर केल्याबद्दल सात उद्योगांना दुसरी नोटीस पाठवली आहे. यानंतर या उद्योगांनी प्रतिसाद न दिल्यास तिसरी नोटीस पाठवून पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या बांधकाम विभागाने दिली आहे.
काही दिवसांपासून औद्योगिक वापरासाठी दिलेल्या भूखंडावर व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने एमआयडीसीने कारवाई सुरू केली आहे. या सात उद्योगांमध्ये चार उद्योग अंबड एमआयडीसीत तर दोन उद्योग हे सातपूर एमआयडीसीतील आहे.

अंबड येथील उद्योगात उज्ज्वल अॅटो हिल्स, इंडोलाईन इंडस्ट्रीज, अॅटोमोटिव्ह प्रा. लि. अश्वमेध पॅकर्स यांचा समावेश असून सातपूर येथील वसाहतीत सुदर्शन फेब्जीकल व प्रेसिजन इंडस्ट्रीजचा समावेश आहे. औद्योगिक व व्यावसायिक भूखंडाचे दर वेगवेगळे असल्याने यातून मोठा महसूलही एमआयडीसीला मिळणार आहे. गेल्या आठवड्यात फाइल गहाळ प्रकरणात उद्योजक इंद्रपालसिंग सहाणी यांना पोलिसांनी अटक करून कारवाई केली. यामध्ये औद्योगिक वापराच्या भूखंड व्यावसायिक वापर केल्याचे कागदपत्र होते. त्यामुळे भूखंडाच्या वापराचा मुद्दा चर्चेत आला. गेल्या काही दिवसापासून हे भूखंड व्यापारासाठी वापरले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. एमआयडीसीने आता कडक पाऊले उचलत ही कारवाई केली आहे. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातही ही कारवाई केल्यानंतर अनेकांनी व्यापारी वापर बंद केला आहे.

वृक्षसंवर्धन भूखंडातही उल्लंघन
जोटो अॅब्रेसिव्हज प्रा. लि. या कंपनीला वृक्षसंवर्धनासाठी दिलेल्या भूखंडावरही शर्थीचा भंग व नियमाचे उल्लंघन झाले असल्याचे तपासणीत आढळल्याची माहिती एमआयडीसीच्या बांधकाम विभागाने दिली आहे. बांधकाम विभागाने पुढील कारवाईसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे ही फाईल पाठवली असून त्यावर आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा भूखंड परत ताब्यात घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाली’ काळवंडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सध्या टोमॅटोचा हंगाम सुरू असून, कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या निफाड तालुक्यात टोमॅटोचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र पाक‌िस्तानने भारताकडून शेतमाल आयात बंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे. त्यामुळे सुरुवातीला टोमॅटोच्या चढत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आलेली लाली आता काहीशी कमी होत आहे.

टोमॅटोचे दर मध्यंतरी एक हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र टोमॅटोची निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने टोमॅटो आज दोनशे रुपये भावाने विक्री होत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या हाती प्रतिकिलो दहा रुपये इतकाच भाव पडत आहे. सप्टेंबर महिन्यात टोमॅटोची ३ लाख ३१ हजार ३२६ क्रेट्स इतकी आवक झाली असून, जास्तीत जास्त ४२१, सरासरी २०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दहा रुपये किलोप्रमाणे टोमॅटो विकण्याची वेळ आली आहे.

सर्वात जास्त शेतमालाची आयात करणाऱ्या पाकिस्तानने भारताकडून कुठलाही शेतमाल न घेण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानची बॉर्डर लासलगावच्या टोमॅटोसाठी बंद पडली आहे. त्यामुळे त्याचा फटका टोमॅटोसह इतर पिकांनाही बसला आहे. हजार रुपयांचा टोमॅटो आज कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रतलाम शिवपुरी (मध्य प्रदेश) या ठिकाणी स्थानिक मालाचे आगमन झाल्याने तेथेही नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला मागणी नाही. अशा परिस्थितीत दररोज वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे टोमॅटो खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

आपल्याकडे कांद्याचे दर वाढले की भारत सरकारकडून कांदा पाकिस्तानातून आयात केला जातो. मात्र आज टोमॅटोच्या बाबतीत आपल्यावर ही वेळ आल्याने भारत सरकार टोमॅटोचे दर

वाढण्यासाठी पाकिस्तानची बॉर्डर खुली करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाकिस्तान बॉर्डर खुली झाली

तर शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल. त्यामुळे भारत सरकारच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक लक्ष लावून आहेत.

नुकसानीचे कारण

केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे धरसोडीचे निर्णय चुकीचे

पाकिस्तानची बॉर्डर बंदचा जिल्ह्यातील टोमॅटोला फटका

वातावरणात दररोज होणाऱ्या बदलाचा फटका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमएसबीटीईतून ‘संदीप’ला वगळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेल्या शासन निर्णयातून संदीप विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस (डी. फार्मसी) या महिरावणी (त्र्यंबकेश्वर) येथील संस्थेला वगळण्यात आले आहे. याबाबत संस्थेशी संपर्क साधला असता संदीप विद्यापीठाकडे ही संस्था आता वर्ग झाली आहे. नाव वगळण्याची ही प्रक्रिया आमच्या मागणीनुसारच झाली. यात एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल जाधव यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा या विषया संदर्भातील अध्यादेश बुधवारी सकाळी वेबसाइटवर जाहीर करण्यात आला. या अध्यादेशात नाशिकमधील या संस्थेच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमाचे नाव वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या विषयाची पार्श्वभूमी अध्यादेशात समाविष्ट नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये काहीवेळ संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे संस्थेशी संपर्क साधला असता प्राचार्य डॉ. अनिल जाधव यांनी सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, ‘आमच्या संस्थेकडे स्कूल ऑफ फार्मसी अंतर्गत दोन डिप्लोमा कॉलेजेस आहेत. प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमता असणारे एक कॉलेज डीटीई आणि एमएसबीटीई या पालक संस्थांशीच संलग्नित ठेवण्यात आले आहे. तर दुसरे कॉलेज हे एमएसबीटीई आणि डीटीई या पालक संस्थांच्या यादीतून वगळून ते संदीप विद्यापीठाशी तत्काळ संलग्न करण्यात आले आहे. यामुळे संदीप या स्वतंत्र विद्यापीठासोबत आता डिप्लोमाचे ५० विद्यार्थी क्षमतेचे हे कॉलेज संलग्नित राहणार आहे. या कॉलेजच्या प्रवेशापासून तर परीक्षा प्रक्रियेपर्यंतच्या जबाबदाऱ्या विद्यापीठच सांभाळेल. या प्रक्रियेत एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसून त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती प्राचार्य डॉ. जाधव यांनी दिली.

एमएसबीटीईच्या यादीतून स्कूल ऑफ फार्मसीचे नाव वगळण्याची प्रक्रिया तांत्रिक आहे. आता हे कॉलेज संदीप विद्यापीठाशी संलग्नित राहील. यातून प्रवेशापासू तर परीक्षेपर्यंत अधिक दर्जेदार शिक्षण दिले जाईल. या प्रक्रियेत एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही.
- डॉ. अनिल जाधव, प्राचार्य
स्कूल ऑफ फार्मसी, संदीप विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अभियंत्यांना नागरिकांचा घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
महापालिका हद्दीतील वडनेर दुमाला, दाढेगाव, पिंपळगाव खांब, पाथर्डीगाव या भागात महावितरण कंपनीकडून अघोषित भारनियमन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यावसायिक यांचे हाल होत आहेत. हे भारनियमन दोन दिवसात न थांबवल्यास महावितरण कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी दिला.
खासदार गोडसे, बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवक केशव पोरजे यांनी नागरिकांसह महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, शहर अभियंता थोरात यांना घेरावा घातला. यावेळी भिकाभाऊ ढेमसे, गणेश जाधव, सोमनाथ बोराडे, योगेश पोरजे, किरण कर्डीले, विजय कदम, नीलेश कर्डिले, सोमनाथ कोकणे, बबन पोरजे, राहुल थोरात, अशोक उन्हवणे आदी उपस्थित होते.
कुमठेकर यांना निवेदन देण्यात आले. वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब दाढेगाव, पाथर्डीगाव आदी गावांमध्ये महावितरण मनमानी करीत आहे. दररोज ठरलेल्या भारनियमनाशिवाय ग्रामीण भागातील गावांमध्ये भारनियमन केले जाते. दररोज १३ ते १५ तास भारनियमन असते. सततच्या भारनियमामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. पाण्याअभावी पिकांचेही नुकसान होत आहे. सध्या परीक्षांचा काळ आहे. भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. व्यावसायिकांचेही नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सणांचे दिवस आले आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात वीज पुरवठा करावा. दोन दिवसात अघोषित भारनियमन बंद न झाल्यास कंपनीच्या मुख्य कार्यालयास कुलूप लावण्यात येईल.
- हेमंत गोडसे, खासदार

शहरात २४ तास वीज दिली जाते. परंतु, शहराच्या लगत ग्रामीण भागात १३ ते १५ तास भारनियम केले जाते. बील न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा बंद करा. मात्र, गावांचा वीजपुरवठा खंडीत करू नका.
- शिवाजी चुंभळे,
सभापती, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images