Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कल्याणाकरिता जोपासा सेवाभाव

$
0
0

सावन कृपाल मिशनकडून नागरिकांना संदेश

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मनुष्याने जीवन जगत असताना मानवजातीच्या कल्याणाकरिता प्रेम देत सेवाभाव जोपासावा व आनंदी व परिपूर्ण राहावे, असा संदेशसावन कृपाल रुहानी मिशनचे संत राजिंदर सिंहमहाराज यांच्या जन्मदिनानिमित्त देवळालीतील सत्संग परिवाराने उपस्थित नागरिकांना दिला.

येथील सावन कृपाल रुहानी मिशनच्या देवळालीत कृपाल आश्रम येथील शाखेत संत रजिंदर सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा सिंधी पंचायत समितीचे अर्जुन खटपाल, भगवानदास मोटवानी, विमनदास पंजवानी, शीतलदास बालानी आदी मान्यवर उपस्थित होते.

भजनांचे सादरीकरण

प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सत्संग परिवाराच्या युवा कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या नाटिकेमधून 'कर्माचे विधान' तर दर्शन अकॅडमीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यछटेमधून सामाजिक संदेश दिला. महिला भजनी परिवाराने मुखानी व गुरू महिमा ही भजने सादर केली. नाशिकची गायिका प्रतिक्षा भाटिया हिने सादर केलेले 'दमादम मस्त कलंदर' या गाण्याने कार्यक्रमात रंगात आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण लुल्ला यांनी केले तर आभार जितेंद्र भाटिया यांनी व्यक्त केले. शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी दिवसभर आश्रम परिसरात रक्तदान, आरोग्य, नेत्र तपासणी शिबिरे घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा दशकांपासून रामलीला अन् दुर्गापूजेचे ‘व्रत’

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

रामलीला हा उत्तर भारतीयांचा, तर दुर्गापूजा हा बंगाली बांधवांचा वारसा आहे. मात्र, नाशिकचे वैशिष्ट्य असे, की हे दोन्ही उत्सव गांधीनगरमध्ये एकाच वेळी गेल्या साठ वर्षांपासून साजरे होत आहेत. वाल्मीकी आणि तुलसी रामायणाचे एकत्रीकरण करून गेल्या ६२ वर्षांपासून रामलीला सादर होते. त्यात सर्व धर्मांचे कलाकार सहभागी होतात. परिसरातील बंगाली बांधवांच्या दुर्गापूजेत गेल्या ६३ वर्षांपासून फक्त गंगेतील मातीचीच मूर्ती घडविली जात आहे.

नाशिकरोडला प्रतिभूती व नोटांच्या प्रेसनंतर गांधीनगर हा तिसरा सरकारी प्रेस आहे. येथे कामानिमित्त देशभरातून आलेले विविध जातिधर्मांचे कामगार स्थायिक झाले. पूर्वी साडेतीन हजार प्रेस कामगार होते. आता ही संख्या सव्वादोनशेवर आली आहे. सहा दशकांपूर्वी उत्तर भारतीय, गढवाली समाज व मराठी अधिकाऱ्यांनी रामलीलेची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे डॉ. मंडल, ए. के. विश्वास एस. एम. राय, सुदिन गुप्ता आदी बंगाली बांधवांनी १९५४ पासून दुर्गापूजा सुरू केली.

--

इको फ्रेंडली दुर्गापूजा

नाशिकमध्ये वीस हजारांवर बंगाली बांधव आहेत. त्यांनी गांधीनगरला सार्बोजनिन दुर्गापूजा महोत्सव सुरू केला. १९५४ मध्ये डॉ. मंडल यांनी आपल्या बंगल्यातील गॅरेजमध्ये देवीची मूर्ती घडवून हा उत्सव सुरू केला. यंदा अध्यक्ष सुजॉय गुप्ता, उपाध्यक्ष दीपक घोष, खजिनदार बीरुदास गुप्ता, शंकर डे, डॉ. रिता कुंडू, श्वेता गुप्ता, रीना घोष आदी पदाधिकारी आहेत. उत्तर महाराष्ट्रातील हा सर्वांत मोठा दुर्गा उत्सव आहे. बंगाली कलाकार तेथील गंगा नदीतील माती आणून गांधीनगरला देवीची मूर्ती घडवितात. वीस फुटांची ही मूर्ती आकर्षक असते. देवीचे हावभाव दररोज बदलतात व देवी नवस पूर्ण करते, अशी श्रद्धा आहे. दसऱ्याला नदीत विर्सजन न करता अग्निशमन दलाचा बंब बोलावून मूर्तीचे जागेवरच विसर्जन होते. अंध कारागिरानेही काही काळ देवीची मूर्ती घडविली होती. बंगालचे पंडित मुहूर्त पाहून देवीची पूजा करतात. येथील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पाण्यासाठी स्थानिक नागरिक गर्दी करतात. दिवंगत संगीतकार रवींद्र जैन, गायिका कविता कृष्णमूर्ती, प्रमिला दातार, हेमलता आदी दिग्गजांनी येथे कला सादर केली आहे. बॅले कलाकार सचिन शंकर, ऑकेस्ट्रा झपाटा, रागिनी, सेव्हन कलर्सने येथे एक काळ गाजवला होता.

--

वैशिष्ट्यपूर्ण रामलीला

देशाच्या फाळणीनंतर उत्तर भारतातून अनेक जण नाशिकरोडला आले. त्यांनी १९५५ मध्ये रामलीला सुरू केली. सुरुवातीला दोन वर्षे ती उर्दूत होती. प्रारंभी काही वर्षे जसवंतसिंह यांच्या उर्दू रामायणाचा आधार घेत रामलीला झाली. उर्दू समजत नसल्याने १९५७ पासून दिग्दर्शक सुरेंद्रसिंह बिश्त, देवीलाल शर्मा यांनी वाल्मीकी व तुलसी रामायण यांचा मेळ साधत हिंदी अनुवाद लिहिले. दिलबागराय त्रिखा यांनी ४० वर्षे लक्ष्मणाची भूमिका केली. दिवंगत दिग्दर्शक फ्रान्सिस वाझ यांनी इंद्रिजतची, शरीफ शेख यांनी परशुरामची आणि तस्लिम पठाण यांनी रावणाची भूमिका केली. प्रारंभी रामलीलेतील स्त्री भूमिका पुरुष कलावंतच करीत असत. शब्बीर अली, लियाकत अली पठाण, विष्णू गंगतानी, कृष्णा गवांदे, बालमसिंह, हजरीलाल शुक्ला, बिंदरसिंह, सुरिंदरसिंह यांनी केलेल्या स्त्री भूमिका अजरामर ठरल्या. संगमनेरचे जमीर फायर वर्क्स १९५५ पासून या उत्सवासाठी मोफत फटाके पुरवत आहे. १९६५ मध्ये श्यामा हिंदळेकर यांनी प्रथमच शूर्पणखेची भूमिका केली. त्यानंतर स्त्रियांनी रामलीलेत सहभाग सुरू केला. सुनील मोदियानी रावणाचा पुतळा तयार करतात. गुरुदयाल त्रिखा स्टेज व्यवस्था बघतात. रामलीलेत भूमिका केलेले मनोज कदम (न्यूझीलंड), सचिंदर पालसिंग मारवा (दिल्ली), प्रकाश राजानी (इंदूर), मनोज कुलथे (ठाणे) आदी आर्थिक मदत करतात. धीमन यांनी सर्वांत प्रथम फिरता रंगमंच केला होता. रामलीलेत शास्त्रीय गीतरचना सादर केली जाते. सन १९५९ ते १९६५ या काळात वेल्फेअर क्लब हॉलमध्ये रामलीला होत असे. लोक कुटुंबीयांसमवेत बैलगाडीत येत असत. गर्दी वाढल्याने रामलीला मोकळ्या मैदानावर होऊ लागली. दसऱ्याला येथे रावणाच्या ६० फुटी पुतळ्याचे दहन केले जाते. याप्रसंगी रामाची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्या ‘युद्ध’ होते. भव्य आतषबाजीही होते.

--

मानधन न घेता काम

रामलीलेतील कलावंत नाटक, चित्रपटसृष्टीत चमकत आहेत. त्यामध्ये महेश बोराडे, हरीश परदेशी, प्रदीप भुजबळ, सुजाता देशमुख, प्रिया तुळजापूरकर आदींचा समावेश आहे. प्रेस कामगार, हौशी कलावंत मानधन न घेता काम करतात. काही कुटुंबांतील तिसरी-चौथी पिढी आजही रामलीलेत योगदान देते. सध्या दिग्दर्शक हरीश परदेशी, संजय लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश बोराडे (राम), प्रदीप भुजबळ (लक्ष्मण), नीता चौहान (सीता), ज्ञानेश्वर कुंडारिया (रावण), सुभाष वाणी (विभिषण), अरुण पवार (कुंभकर्ण), प्रकाश भालेकर, सुनील साधवानी, सुमित पवार, साहिल शर्मा आदी कलाकार ही अनोखी रामलीला सादर करतात.

--

हे सांभाळताहेत धुरा

गांधीनगर प्रेसमधील अधिकारी हरिलाल यांनी सन १९६० मध्ये रामलीला समितीची स्थापना केली. ‘पीडब्ल्यूडी’चे मुख्य अभियंता सरदार महेंद्रसिंग हे प्रथम अध्यक्ष होते. गेल्या पंधरा वर्षांपासून या रामलीलेची धुरा कपिल शर्मा, हरीश परदेशी, प्रदीप भुजबळ, प्रकाश भालेकर, अशोक लोळगे, संजय गंगातीरकर, जितेंद्र गवारे, सुनील मोदियानी, आदी सांभाळत आहेत. रामलीलेचा खर्च दर वर्षी चार-पाच लाखांच्या घरात जातो. मुंबईहून ड्रेसेस व अन्य साहित्य आणावे लागते. पूर्वी हौशी कलाकार सहज उपलब्ध होत असत, आता नोकरी-धंद्यामुळे कलाकारांची वानवा जाणवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाणी यांना पुन्हा दोन दिवस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शोरूमच्या फायलीतील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी उद्योजक इंद्रपालसिंग सहाणी यांना सातपूर पोलिसांनी अटक केलेली असून, न्यायालयाने यापूर्वी त्यांना दिलेली सहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या शोरूमच्या फाइलमधील कागदपत्रे गेल्या वर्षी गहाळ करण्यात आली होती. त्यानंतर एमआयडीसीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. मे महिन्यात क्षेत्र व्यवस्थापक राजाभाऊ काळे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांना गुन्हा दाखल केला होता. त्यात मुख्य संशयित असलेले उद्योजक इंद्रपालसिंग सहाणी यांना अटक करून सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर सहाणी यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्योजक सहाणी यांच्याबाबत नेहमीच एमआयडीसीच्या उद्योग भवनात वादावादी होत होती. त्यातच एमआयडीसीकडून एखादा भूखंड कुणी घेत असेल, तर त्यावेळी सहाणी यांच्याकडून त्रास दिला जात होता, तसेच अव्वाच्या सव्वा भावाने भूखंड घेण्यासाठी सहाणींचा हातखंडा असल्याचा आरोप होत होता. अखेर शोरूमच्या महत्त्वाच्या फाइलमधील कागदपत्रे गहाळ प्रकरणात सहाणी हाती लागल्याने उद्योजकांनाही धक्का बसला होता. पहिल्यांदाच मोठ्या उद्योजकावर कारवाई झाल्याने छोट्या उद्योजकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

--

दिल्लीतील वृद्धाचीही तक्रार

दरम्यान, उद्योजक सहाणी यांना नेहमीच मदत करणारे ‘भाई’ अचानक गायब झाल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिस सहाणींची सखोल चौकशी करीत असून, अधिक तपास सहाय्यक आयुक्त अशोक नखाते करीत आहेत. विशेष म्हणजे दिल्लीतील एका वयोवृद्ध व्यक्तीने सहाणी यांनी फसवणूक केल्याची ऑनलाइन तक्रार पोलिसांकडे केली असल्याचे नखाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम प्रवास सुकर करणारी ‘सुनीता’

$
0
0

स्मशानभूमी हे नाव कानावर पडताच अनेकांच्या मनात धस्स होते. मृतदेहाजवळ आक्रोश करणारे नातलग, भडकणाऱ्या चिता आणि इतर वेळी भयाण शांतता अशा वातावरणातील स्मशानभूमीची सर्वसामान्य माणसाला भीती वाटत असते. अशा ठिकाणी सुनीता पाटील ही महिला मृतदेह स्वच्छ करणे, हाता-पायांना, तोंडाला तेल-तूप लावणे आणि त्या मृतदेहाला व्यवस्थित सरणावर ठेवण्याचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे करीत आहे. अजूनही अनेक समाजांतील महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही. मात्र, एक महिला असूनही मृतदेहाची सेवा करून अंतिम प्रवास सुकर करण्याचे काम त्या करीत आहेत.

पंचवटीतील अमरधाममध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या सुनीताताई यांचे आई-वडील याच स्मशानभूमीत लाकडे आणि गोवऱ्या पुरविण्याचे आणि सरण रचण्याचे काम पिढ्यान् पिढ्यांपासून करीत आहेत. लग्नानंतर त्र्यंबकेश्वरला गेलेल्या सुनीताताई पुन्हा पंचवटी अमरधामला परतल्या. स्मशानभूमीतच अंत्यसंस्कारांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीचे छोटेसे दुकान त्यांनी थाटले. स्मशानातील वातावरणाशी त्या समरस झाल्या, जवळच्या नातलगांनाही मृतदेहाची भीती वाटत असताना महिला असूनही त्यांना कधी भीती वाटली नाही. त्यांच्या मते माणसे जिवंतपणी त्रास देतात, मृत्यूनंतर नाही. मृतदेहाच्या सेवेतच खरे पुण्य गवसते.

स्मशानभूमीत येणारे मृतदेह वेगवेगळ्या अवस्थेतील असतात. काही दुर्धर रोगाने, काही अपघाताने, काही जळून, काही पाण्यात बुडून, काही वृद्धापकाळाने, काही आत्महत्या करून मृत झालेले असतात. अशा कोणत्याही अवस्थेतील मृतदेह येत असतात. आजाराने, जळून, बुडून मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवाजवळ नातेवाईकही थांबत नाहीत. नाकाला रुमाल बांधून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न ते करतात. अशा अवस्थेतही सुनीताताई या हातात काही न घालता आणि तोंडाला रुमाल न बांधता मृतदेहांची सेवा करतात.

स्मशानभूमीत कॅन्सरसारख्या आजाराचे आणि जळालेल्या अवस्थेतील रुग्ण आल्यानंतर त्यांची सेवा करणे अवघड काम असते. कॅन्सरने काहींचे गालच गेलेले असतात. जळालेल्या मृतदेहाला त्वचाच शिल्लक नसते, अशावेळी मालिश करता येणे शक्य नसते. पाण्यात बुडून सडलेल्या मृतदेहाचे तर अवयवच निघून हातात येण्याचे प्रसंगही घडल्याचे त्या सांगतात. कधी-कधी एकाच दिवशी आठ-दहापेक्षाही जास्त मृतदेह स्मशानभूमीत येतात. अशावेळी न थकता सर्वच मृतदेहांची सेवा करते, माझी ही सेवा बघून माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले लोक जेव्हा पाया पडायला येतात, तेव्हा कसेतरीच वाटते. त्यांना थांबवून माझे सेवेचे कामच असल्याचे सांगते, असे त्या म्हणतात. त्यांच्या सेवेची दखल सर्वच प्रसारमाध्यमांनी घेतली असून, राज्य शासनाच्या हिरकणी पुरस्कारासह त्यांना अटलसेवा गौरव पुरस्कार, सावित्रीबाई सन्मान आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

--

(शब्दांकन ः रामनाथ माळोदे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहतूक सुरूच

$
0
0

रामकुंडाजवळील चौकात पार्किंगचे तीनतेरा; फलकाचा उपयोग शून्य

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंड परिसरात येण्यासाठी पंचवटीतून पाच वेगवेगळे मार्ग आहेत. या मार्गांनी येताना काही मार्गावर एकेरी वाहतूक असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. तरी त्या फलकांना न जुमानता बेशिस्तपणे वाहतूक सुरूच आहे. हे रोखण्यासाठी मालेगाव स्टॅण्डच्या उताराला प्रवेश बंदचा फलक थेट रस्त्याच्या मध्येच उभा करण्यात आला आहे. अचानकपणे लावण्यात आलेल्या या फलकावर वाहने धडकण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

रामकुंडावर मालेगाव स्टॅण्डचा उताराचा रस्ता, इंद्रकुंडसमोरील पंचवटी वाचनालयाकडून येणारा उताराचा रस्ता, कपालेश्वर मंदिराच्या मागील बाजूच्या पूरिया रोडकडून येणारा रस्ता, शनी चौकाकडून तसेच गंगाघाटाचा असे पाच रस्ते रामकुंड परिसराला येऊन मिळतात. यापैकी मालेगाव स्टॅण्डकडील उताराच्या रस्त्याने फक्त रामकुंडाकडे येण्याचा मार्ग आहे. रामकुंडाकडून मालेगाव स्टॅण्डच्या सिग्नलकडे जाण्यासाठी वाहनास प्रवेश नाही, तसा प्रवेश बंदीचा फलकही येथे लावण्यात आलेला आहे. मात्र या मार्गाने सर्रासपणे वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक रोखण्यास वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश मिळत नसल्यामुळे त्यांनी शक्कल लढवीत थेट प्रवेश बंदीचा फलक रस्त्यावरच उभा करण्यात आला आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेल्या या फलकामुळे नेहमीप्रमाणे या मार्गाने सुसाटपणे वाहने घेऊन जाताना या फलकावर दुचाकीस्वार धडकले जात आहे. येथे फलक लावण्यात आल्यामुळे पुढे सिग्नलकडे जाणारी वाहने वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अचानक मार्ग बंदीमुळे अनेकांना एकेरी मार्गाचा नियम पाळला नसल्याचा दंड भरण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी यावर उपाय काढण्याची आवश्यकता आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपडेटेड दांडिया हिट!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नवरात्रोत्सवाच्या धामधूमीत अपडेटेड ट्रेंड अनुभवायला मिळत आहे. प्रत्येकाला हवी असणारी प्रायव्हसी अन् फुल्ल एन्जॉयमेंट नवरात्रोत्सवात नव्याने इन झाली आहे. शहरातल्या अनेक दांडिया इव्हेंटमध्ये रोज फक्त एकच मोठा ग्रुप किंवा संस्था दांडिया रास अथवा गरबा खेळेल, असा नवा ट्रेंड यंदा शहरात हिट होताना दिसत असून, त्याला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळत अाहे.

नवरात्रोत्सवात नामांकित लॉन्स आणि मंडळांत होणारा दांडिया रास, गरबा यंदा एका खास स्वरूपात सेलिब्रेट होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत हाय प्रोफाइल गरबा इव्हेंटच्या पासेससाठी २०० ते १५०० रुपयांपर्यंत खर्च नाशिककरांना करावा लागत होता. हे पासेस खरेदी करूनदेखील गर्दीअभावी हवा तसा गरबा खेळता येईल याची शाश्वती नव्हती. मात्र, यंदाच्या वर्षी हे चित्र पुरते पालटले आहे. अनेक नामांकित मंडळे व इव्हेंटचे आयोजन करणाऱ्या लॉन्समध्ये नवरात्रीचा प्रत्येक दिवस एकाच संस्थेला किंवा ग्रुपला देण्यात आला आहे. त्यामुळे फक्त त्याच ग्रुपने किंवा संस्थेने पासेस दिलेल्या व्यक्तींना गरबा खेळता येणार आहे. यासाठी कोणतीही फी ग्रुप्सतर्फे घेतली जात नसून, मोजकीच पण हौशी मंडळी गरबा नाइट एन्जॉय करताना दिसून येते आहेत. बाहेरून पास विकत घेऊन गरबा इव्हेंटमध्ये धुडगूस घालणाऱ्या तरुणांना या नव्या ट्रेंडमुळे चाप बसला आहे. विशेष म्हणजे हा नवा ट्रेंड इन झाल्यापासून अनेक जण आपला मोठा ग्रुप, संस्था, मंडळ यांच्यासोबत मनसोक्तपणे दांडिया रास, गरबा एन्जॉय करीत आहेत.

--

सर्व दिवस फुल्ल...

शहरातील नामांकित इव्हेंटचे नऊच्या नऊ दिवस फुल्ल झाले आहेत. गेल्याच आठवड्यात अनेक लॉन्स आणि मंडळांनी कोणत्या दिवशी कोणता ग्रुप गरबा नाइट एन्जॉय करणार आहे, याचे फ्लेसदेखील लावले आहेत. ज्या ग्रुपचे नाव आहे तोच ग्रुप त्या तारखेला गरबा नाइट एन्जॉय करू शकतो, इतर कोणालाही त्या दिवशीचे पासेस किंवा एन्ट्री मिळणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले.

--

उपनगरांमध्ये उत्साह

शहरासह पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प आदी उपनगरांमध्ये नवरात्रीचा उत्साह दिसून येत अाहे. मोठ्या सार्वजनिक मंडळांकडून लॉन्स व कार्यालयांत, तसेच काही सोसायट्यांकडून आपापल्या परिसरात दांडिया रास व गरब्याचे आयोजन केले असून, त्याला तरुणाईसह मध्यमवयीन नागरिकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्मज्ञानवर्धिनी शैलपुत्री घाटनदेवी

$
0
0

विजय गोळेसर

श्रीदुर्गा सप्तशतीमधील ‘प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी...’ या सुप्रसिद्ध श्लोकातली पहिली जी ‘शैलपुत्री’ हिचं मंदिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे. या देवीचे मंदिर कसारा-इगतपुरीच्या घाटमाथ्यावर आहे म्हणून तिला घाटनदेवी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते, त्यावेळी खुद्द त्यांनी घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून दर्शन घेतले असल्याची ऐतिहासिक नोंद आहे.

--

प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी।

तृतीयं चंद्राघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच।

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टकम।।

नवमं सिद्धिदात्रीच नवदुर्गा: प्रकीर्तिता।

उक्तांन्येतानि नमानि ब्रह्मण्येव महात्मना।।

वन्दे वात्रि तलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम।

वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम।।

श्रीदुर्गा सप्तशतीमधील या सुप्रसिद्ध श्लोकात दुर्गेची नऊ रूपं वर्णन केली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धिदा. यातली पहिली जी शैलपुत्री तिचं मंदिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे. भगवती शैलपुत्री ही दुर्गेच्या नऊ रूपांतील प्रथम रूप. पर्वतराज हिमालयाची ही कन्या शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध आहे. ही देवी उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमलपुष्प धारण करते. शैलम म्हणजे पर्वत. पर्वतात माणिक, रत्ने व इतर मौल्यवान प्रकारचा साठा उपलब्ध आहे. हा मौल्यवान साठा सहज उपलब्ध असूनही भौतिक सुखाकडे आकर्षित न होता त्याचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणारी ही शैलपुत्री घाटनदेवी आहे.

सिंहारूढ, अष्टभुजाधारी...

मंदिरात घाटनदेवीची अतिशय प्रसन्न व सुबक मूर्ती आहे. देवीची ही मूर्ती संगमरवरी असून, देवी सिंहावर बसलेली आहे. शैलपुत्री अष्टभुजांची असून, तिच्या प्रत्येक हातात आयुध आहे. देवीचे लोभस आणि तेजस्वी रूप आजही भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य कारण आहे. सिंहावर आरूढ झालेली घाटनदेवी माता प्रसन्न मुद्रेने भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचा पुढील प्रवास सुखाचा होवो, याचे वरदान देते. म्हणूनच मंदिराच्या आसपास आजवर कुठलाही

आघात किंवा अपघात झाला नाही आणि गावावरही विशेष संकट आले नाही, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. शेंदूरचर्चित असलेली घाटनदेवीची जुनी मूर्ती म्हणजे तांदळा नवीन मंदिरातही तसाच अचल स्वरूपात पूर्वीच्याच ठिकाणी जसाच्या तसा ठेवलेला आहे.

घाटमाथ्यावर मंदिर

या देवीचे मंदिर कसारा-इगतपुरीच्या घाटमाथ्यावर आहे म्हणून तिला घाटनदेवी संबोधले जाते. शैलाधिराज तनया असलेली ही तेजस्वी देवी वज्रेश्वरीहून निघाली. रस्त्यात तिने या ठिकाणी विश्रांती घेतली. इथला सुंदर व नयनरम्य निसर्ग पाहून ती येथेच कायमची स्थिर झाली, असे म्हणतात. मुंबईहून येताना कसारा मार्गाने घाटमाथ्यावर आल्याबरोबर थळघाटाच्या तोंडाशीच असलेल्या घाटनदेवीचे दर्शन घेऊनच इगतपुरी परिसरांत प्रवेश केला जातो.

--

घाटनदेवीची वैशिष्ट्ये

‘श्रीदुर्गा-सप्तशती’ या ग्रंथात घाटनदेवीचा उल्लेख सापडतो तो ‘शैलपुत्री’ या नावाने. देवीला घाटातील निसर्ग आवडल्यामुळे ती कायमची येथे राहिली, असे मानले जाते. मंदिरासमोर उंटदरी नावाचे ऐतिहासिक स्थान आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा नदीचा उगम याच उंटदरीत झाला आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह घाटनदेवीची यथासंग व शास्रोक्त पूजा करून दर्शन घेतल्याची ऐतिहासिक नोंद आहे. घाटनदेवीचा पूर्वी जुन्या ठिकाणी ‘तांदळा’ होता तो जसा होता तसाच आजही कायम आहे. घाटनदेवीचे देवस्थान १९९६ मध्ये धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत करण्यात आले आहे. विश्वस्त म्हणून नऊ जण मंदिराची व्यवस्था पाहतात.

--

निसर्गरम्य उंटदरी

उंटदरी नावाचे सृष्टिसौंदर्याने नटलेले निसर्गरम्य ऐतिहासिक स्थान घाटनदेवी मंदिराजवळच आहे. पूर्वी जव्हारकडून पुण्याकडे मावळ भागात जाणारा रस्ता याच उंटदरीवरून जात होता. भातसा नदीचा उगमही याच दरीत झालेला आहे. उंटदरीपासून जवळच घाटनदेवीचे मंदिर आहे. शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळघाटावर आले, त्यावेळी त्यांनी या घाटनदेवीची यथासांग पूजा केली व दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. कल्याणचा खजिना लुटून या दरीत उंट लोटले म्हणून या दरीला उंटदरी असे नाव पडल्याचे सांगितले जाते.

--

उंटदरीत दुसरे पीठ

घाटनदेवीचे दुसरे पीठ जवळच असलेल्या उंटदरी येथे आहे. १९७३-७४ मध्ये या मंदिराची उभारणी झाली. या दोन्ही ठिकाणी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जातो. पहाटे पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी असते. महानवमी व विजयादशमीला गर्दीचा उच्चांक गाठला जातो.

--

घंटांमुळे वैशिष्ट्यात भर

नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही देवीच्या मंदिरात पाहायला न मिळणारे वेगळेपण इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिरात पाहायला मिळते, ते म्हणजे या मंदिरात पितळेच्या लहान-मोठ्या अनेक घंटा जागोजागी बांधलेल्या दिसतात. भाविक स्त्री-पुरुष देवीला नवस करताना ‘माझी अमुक इच्छा सफल होऊ दे, म्हणजे मी देवीला पितळी घंटा वाहीन,’ असा नवस करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाली, की घाटनदेवीच्या मंदिरात त्यांच्याकडून घंटा बांधली जाते.

--

लोकसहभागातून जीर्णोद्धार

शैलपुत्री घाटनदेवीचे हे मंदिर वैदिक काळापासून अस्तित्वात आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही मंदिर असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. परंतु, काळाच्या ओघात जुने मंदिर जीर्ण झाले. मोडकळीस आले, तेव्हा गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात केली. दोन-तीन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर मंदिराची उभारणी करण्यात आली. पूर्वीचे प्राचीन मंदिर पाडल्यानंतर भाविका व दानशूर मंडळींच्या आर्थिक मदतीतून हल्लीचे देखणे व प्रशस्त मंदिर बांधण्यात आले आहे. २१ एप्रिल १९८० रोजी गावातील ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजलाल रावत यांच्या हस्ते देवीच्या सध्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भाविकांकडून मिळालेल्या देणगीतूनच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. नवीन मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन सिमेंटचे हत्ती सोंड उंचावून विजयश्री गळ्यात घालण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसते. मंदिर प्रशस्त असून सर्वत्र टाइल्स असून, बसायला सिमेंटचे बाक ठेवलेले आहेत. मंदिरापर्यंत चांगला रस्तादेखील तयार करण्यात आलेला आहे.

--

नवरात्रोत्सवात यात्रा

नवरात्रीत नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते. विविध प्रकारची संसारोपयोगी व खेळण्यांची दुकाने त्यात लागतात. देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची गर्दी खूप वाढते. राज्याच्या विविध भागातून भाविक येथे खास घाटनदेवीच्या दर्शनार्थ येतात. येथे भाविकांची पहाटेपासून रात्री दहापर्यंत दर्शनासाठी रीघ लागते. यावेळी हिरवळ व आल्हाददायक धुके पडलेले असते. अशा या निसर्गरम्य वातावरणात यात्रेसाठी येण्याऱ्या भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे.

--

अन्य देवी मंदिरांत उत्सव

देवीच्या या दोन मंदिरांशिवाय इगतपुरीत आग्रारोडवरील चारणदेवी, गांधी चौकातील शीतलादेवी, लोयारोडवरील दुर्गादेवी, वरच्या पेठेतील सातआसरा किंवा मरिमाता, अन्नपूर्णा देवी, कुंडगर यांची देवी, चांदवडकरांची महालक्ष्मी आदी देवी मंदिरे परिसरात आहेत. या सर्व मंदिरांत देवीची नित्यपूजा केली जाते, तसेच मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरेत परिवर्तन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी घोषित करण्यात आले. यंदा प्रथमच सरपचंपदी थेट जनतेमधून निवड करण्यात आली असून, एकलहरे येथील प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये ग्रामविकास पॅनलच्या मोह‌निी जाधव यांनी बाजी मारली. मात्र सर्वाधिक १० जागा जिंकून परिवर्तन पॅनल सत्तेत आले. रेखा कडाळे (लाडची), इंदू पारधी (साडगाव) तर मंगला निंबकर (तळेगाव अंजनेरी) येथून विजयी झाल्या. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य पदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. नाशिक तालुक्यातील मोठी एकलहरे ग्रामपंचायत वगळता इतर अनेक ग्रामंपचायतीत जागा बिनविरोध आल्या. लाडची येथे काही जागांवर उमेदवारच मिळाले नाहीत. तर साडगावला सर्व जागा बिनविरोध झाल्या.

एकलहरे येथे जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे, राजाराम धनवटे यांच्या ग्रामविकास तर नगरसेवक विशाल संगमनेरे, मोहन निंबाळकर यांच्या परिवतर्न पॅनलमध्ये चुरशीची न‌विडणूक झाली.

ग्रामपंचायतीत १७ पैकी १० जागा जिंकून परिवर्तन पॅनलने बहुमत मिळविले. पण थेट जनतेमधून निवडून द्यावयाच्या सरपंचपदाच्या जागेवर ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी जाधव विजयी झाल्या. त्यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत मात्र मिळू शकले नाही. सात जागांवर पॅनलला समाधान मानावे लागले. अनुसुचित जाती गटातील महिलेसाठी सरपंचपद राखीव होते. बहुमत मिळूनही परिवर्तनच्या कार्यकर्त्यांच्या हातून सरपंचपद निसटल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

एकलहरेतील विजयी उमेदवार

प्रभाग १ : विश्वनाथ होलीन, न‌र्मिला इंगळे, रुपाली कोकाटे (ग्रामविकास).

प्रभाग २ : नीलेश धनवटे, कांताबाई पगारे (ग्रामविकास पॅनल)

प्रभाग ३ : जयदेव वायदंडे, श्रीराम नागरे, शोभा म्हस्के (परिवर्तन पॅनल)

प्रभाग ४ : अशोक पवळे, सुरेखा जाधव, मुक्ता दुशिंग (परिवर्तन)

प्रभाग ५ : रत्नाबाई सोनवणे, शोभा वैद्य, निर्मला जावळे (परिवर्तन)

प्रभाग ६ : संजय ताजनपुरे, सुरेश निंबाळकर, (परिवर्तन), वैशाली धनवटे (ग्रामविकास)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदगाव तालुक्यात शिवसेनेची मुसंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा प्रमुख सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. १५ पैकी १० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दोन ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाल्याने १३ ग्रामपंचयातीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी नांदगाव तहसील कार्यालय येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निकालावर शिवसेनेचे प्रथम पासून वर्चस्व दिसून आले.

नागापूर, मुळडोंगरी, बोयेगाव, भारडी, नवसारी, धनेर, तळवाडे, हिरेनगर, कसाबखेडा, शास्त्रीनगर या दहा ठिकाणी शिवसेनेचे थेट सरपंच निवडून आले. तर भाजप तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून हिसवळ बुद्रुक, धोटाणे खुर्द व लक्ष्मीनगर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसला पिंपरखेड व लोंढरे या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळून काँग्रेसचेच सरपंच निवडून आले. आमदार पंकज भुजबळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत खाते उघडता आलेले नाही. शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे व माजी आमदार भाजप नेते संजय पवार यांच्यात या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळाली. कांदे यांनी सेनेला निर्भेळ यश मिळवून देत १० ग्रामपंचायतीत भगवा फडकाविला. इंधन कंपन्यामुळे श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नागापूर मध्ये देखील सेना भाजप सत्ता संघर्षात सेनेने अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, नांदगाव तालुक्यात उल्लेखनीय यश मिळवल्याने शिवसैनिकांनी जल्लोष करीत घोषणा दिल्या. यावेळी सुहास कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप, मनमाड नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, गणेश धात्रक, मयूर बोरसे आदी उपस्थित होते.

निवडून आलेले सरपंच

नागापूर-ताराबाई पवार (शिवसेना)

मूळडोंगरी- मंगला नावंदर (शिवसेना)

बोयेगाव- अश्विनी नाईकवाडे (शिवसेना)

भारडी-मनीषा मार्कंड (शिवसेना)

नवसारी- मंगल पवार (शिवसेना)

धनेर- चंद्रकांत कदम (शिवसेना)

तळवाडे- नामदेव सोनवणे (शिवसेना)

हिरेनगर- वामन पवार (शिवसेना)

कसाबखेडा- तुळशीराम चव्हाण (शिवसेना)

शास्त्रीनगर- छाया मुंजाळ (शिवसेना)

हिसवळ बु.- जनाबाई बेंडके (भाजप)

धोटाणे- बेबी काळे (भाजप)

लक्ष्मीनगर- बापू जाधव (भाजप)

पिंपरखेड- उत्तम सोनवणे (काँग्रेस)

लोंढरे- संयोग निकम (काँग्रेस).

ढोलबारेच्या सरपंचपदी किसन डोमाळे

सटाणा : ढोलबारे ग्रामपंचायतीत बागलाण तालुक्यातील थेट सरपंच पदाची पहिली निवडणूक पार पडली. किसन मांगू डोमाळे यांनी सरपंच पदावर बाजी मारल्याने बागलाणमधून पहिला थेट सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. आव्हाटी ग्रुप ग्रामपंचायतीतून नव्यानेच स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्त्वातत आलेल्या ढोलबारे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ढोलबारे ग्रामपंचायतीसाठी सातही सदस्य बिनविरोध निवडून आले होते. सरपंच पदासाठी किसन डोमाळे आणि सयाजी कुलाळ यांच्यात दुरंगी लढत रंगली. मंगळवारी थेट सरपंच पदाची निवडणूक शांततेत पार पडल्यावर बुधवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. त्यात डोमाळे यांचा ७३ मतांनी विजय झाला. डोमाळे यांना ३१८ तर कुलाळ यांना २४५ मते मिळाली. ५२ मतदारांनी नोटाचा वापर केला.v

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनवेळ पाणीपुरवठा करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणात भरपूर पाणीसाठा असतानाही, शहरात सध्या काही भागात एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिकसह भाजपला चिंता असलेल्या धरणही फुल्ल भरल्याने संपूर्ण शहरात आता दोन वेळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडे करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेत दोन वेळ पाणीपुरवठा करण्याबाबत दबाव वाढविला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. मात्र, तरीसुद्धा नाशिककरांवर पाण्याचे संकट आहे. सध्या उत्सवाचे वातावरण असतांना नागरिकांना पाण्यासाठी परवड करावी लागत आहे. नाशिकरोड, सातपूर, सिडको या भागात पाण्याचा तुटवडा आहे.

धरणातील पाणीसाठा चांगला असला तरी, सध्या एकच वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या आहे. विशेष म्हणजे भाजपला जास्त चिंता असलेले जायकवाडी धरणाही यंदा फुल भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा बघता पूर्वीप्रमाणे दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सहा विभागात हाट बाजार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सध्या शहरात विशिष्टच हाटबाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यात महिला बचत गटांना स्थान मिळत नाही. त्यामुळे शहरातील सहा विभागात सहा ठिकाणी महिला बचत गटांसाठी हाटबाजार सुरू करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नाशिकरोड येथे प्रायोगिक तत्वावर पहिला हाट बाजार सुरू केला जाणार आहे. यामध्ये महिला बचत गटांनाच सहभागी होणार आहे. महिला व बालकल्याण विभागाची बैठक सभापती सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला महिला सदस्यांसह उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यावर चर्चा झाली. महिला बचत गटांसाठी स्वतंत्र हाट बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली असून प्रायोगिक तत्वावर पहिला हाट बाजार नाशिकरोड विभागीय कार्यालयातील पार्किंगच्या जागेत सुरू होणार आहे. त्यानंतर सातपूर, नाशिक पूर्व, पश्चिम,पंचवटी सिडको अशा सहा ठिकाणी सुरू केला जाणार आहे. या हाट बाजारमध्ये सहभागी होणाऱ्या बचत गटांसाठी नियमावली तयार केली जाणार आहे. या बैठकीत महीलांसाठी कराटे प्रशिक्षण,योग उपचार व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेवकांची कानउघाडणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आपल्याच पक्षाच्या स्थायी समिती सभापतीविरोधात बंड करणाऱ्या भाजपच्या चारही नगरसेवकांची शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी बुधवारी कानउघाडणी केली.
विरोधकांशी हातमिळवणी केल्याबद्दल संबंधित चारही नगरसेवकांना जाब विचारण्यात आला. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सानप यांनी दिली. तर सदरील प्रकार हा गैरसमजुतीने झाल्याचा खुलासा दोन नगरसेवकांनी केला आहे. भाजपचे नगरसेवक एकत्र असल्याचा दावा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी केला असला तरी जगदीश पाटील मात्र आपल्या आक्षेपावर ठाम आहेत.
स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काही स्थायीच्या बैठकांमधील विषयांबाबत १६ पैकी १० सदस्यांनी आक्षेप घेत नगरसचिवांना पत्र दिले आहे. यात भाजपच्या जगदीश पाटील, मुकेश शहाणे, सुनिता पिंगळे, श्यामकुमार बडोदे यांचाही समावेश आहे. भाजपच्याच सभापतीच्या कामकाजावर भाजपच्या चार सदस्यांनी आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली होती. या पत्रामुळे भाजपमधील सुंदोपसुदी उघड झाली असून पक्षातील वाद थांबत नसल्याचे चित्र आहे. भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेतेलेले विषय हे आर्थिक विषयाशी निगडीत असल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या चार सदस्यांनी थेट पक्षालाच आव्हान दिले होते.

महापालिकेतील या वादाची गंभीर दखल शहराध्यक्ष सानप यांनी घेतली. त्यांनी बुधवारी स्थायीच्या सभापतींसह या चारही सदस्यांना बोलावले. यावेळी श्यामकुमार बडोदे आणि सुनिता पिंगळे यांना या सह्यांबाबत हात वर करत गैरसमजुतीमुळे प्रकार झाल्याचे स्पष्टीकरण दिले. सानप यांनी स्थायीमध्ये सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे फर्मान सोडले. आता समज देतो, यापुढे थेट कारवाई करू असाही दम भरला आहे. त्यामुळे स्थायीतील बंडाचे वादळ शांत होण्याची शक्यता आहे. तर वादावर पडदा पडला असून भाजपचे सर्व नगरसेवक एकत्र असल्याचा दावा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी केला आहे.

जगदीश पाटील आक्षेपांवर ठाम
स्थायी समिती सभापतींविरोधात दिलेल्या पत्रावरून काही सदस्यांनी घुमजाव केले असले तरी भाजपचे जगदीश पाटील पत्रातील काही आक्षेपांवर ठाम आहेत. आपण पत्रात दिलेल्या काही मुद्द्यांवर यापूर्वीही स्थायीत बोललो आहे. त्यामुळे मी नोंदवलेल्या मुद्द्यांबाबत आपला आक्षेप कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपण बाहेरगावी असल्याने नेत्यांशी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी बंड शांत होण्याची शक्यता दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेत मोलाची कामगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गावपातळीवर सुदृढ आरोग्य राखण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. साथीचे आजार, बालमृत्युदर, मातामृत्युदर रोखण्यास त्यामुळे मोठी मदत होते. ग्रामीण भागात काम करणे सोपे नाही. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे मोठे काम त्यांच्याकडून केले जात आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी वितरण झाले. यावेळी अध्यक्षा सांगळे बोलत होत्या. आरोग्यसेवेसाठी तळागाळात कार्य करणाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती यतीन पाटील, अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती मनिषा पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्या आरोग्य केंद्रांना, आशा कार्यकर्ते, गटप्रवर्तक, कायाकल्प पुरस्काराने या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
समाजकल्याण समिती सभापती सुनिता चारोस्कर, आरोग्य समिती सदस्य सयाजीराव गायकवाड, सारिका नेहरे, यशवंत ढिकले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम आदी उपस्थित होते. डॉ. शैलेश निकम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दावल साळवे यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान
डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजनेत प्राथमिक आरोग्य केंद्र या श्रेणीत मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण, इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, देवळा तालुक्यातील लोहणेर या आरोग्य संस्थांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. आरोग्य उपकेंद्रांतर्गत बोरटेंभे, देवळा तालुक्यातील गुंजाळनगर व नाशिक तालुक्यातील पिंपळद आरोग्य संस्थांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालय नांदगाव यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ३० आशा, गुणवत्ता आश्वासन व स्वच्छतेचे निकष पूर्ण केलेल्या अकरा आरोग्य संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भाव पाडण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांवर छापे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कांदा भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागाचे कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
अपंगाच्या प्रश्नासाठी नाशिक जिल्हा परिषदेत आल्यानंतर आमदार कडू यांनी पत्रकार परिषदेत प्राप्तिकराच्या छाप्यांचे गुपित पत्रकारांसमोर मांडले. ‘प्राप्तिकर’च्या छाप्यांमुळे व्यापारी मागे हटले आणि कांद्याचे भाव पडले. कांद्याचे भाव अगोदर तीन हजारपर्यंत गेले होते; पण छाप्यानंतर ते पडले. केवळ मुंबई व दिल्लीला कांदा स्वस्त मिळावा, यासाठी केंद्राची ही बदमाशी केली. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची ५ व ६ सप्टेंबरला दिल्ली येथे बैठक झाली. यात छापा टाकण्याचा निर्णय झाल्याचा आरोप करीत कडू यांनी केंद्र सरकारवरील संताप व्यक्त केला. कांद्याला चांगले भाव मिळत असतांना छापे टाकण्याची गरज नव्हती, असे छापे अगोदर किंवा नंतरही टाकता आले असते, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या भवितव्याबद्दल आमदार कडू म्हणाले, की शरद पवारांचे मोदींवर आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मुख्यमंत्र्याच्या जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत भाजप सरकारला धोका नाही. त्यांचा प्रेमभंग झाल्यानंतर सरकार कोलमडेल. राज्य सरकार निष्क्रीय आहे. एका रक्तपेढीच्या कामासाठी तात्काळ अहवाल पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले पण त्याचा अहवाल दोन वर्षानंतर आला. यापुढे तात्काळचा अर्थ दोन वर्षे असा काढावा लागेल, असेही ते म्हणाले.

कर्जमाफीत वेळकाढूपणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी ही धूळफेक आहे. सरकारकडे पैसा नाही; त्यामुळे ते वेळकाढूपणा करत आहे. बँकेकडे सर्व व्यवहार असतांना कधी ऑनालाइन तर कधी नवीन पत्रक काढत आहे. सरकार शेतकऱ्यांना बदनाम करीत आहे. या योजनेतून फक्त १० हजार कोटींचे कर्जमाफ होणार आहे. सहकारमंत्र्याच्या कारखान्यातील अनेक जणांनी शेतकऱ्यांच्या ‍नावावर कर्ज काढून कारखानदारीसाठी वापरल्याचा आरोप कडून यांनी केला.

पैसे कुठे आहे?
सरकारकडे पैसे कुठे आहे? असा प्रश्न करीत यांनी ३० हजार कोटी बुलेट ट्रेनला, २० हजार कोटी समृद्धीसाठी त्यानंतर २० हजार कोटी सातवा वेतन आयोगासाठी जाणार आहे. त्यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही. त्यामुळे ते वेळकाढूपणा करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अच्छे दिनचे स्वप्नच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी
अच्छे दिन कधी येणार? असा सवाल करत तळागाळातील माणसांचे प्रश्न सुटले तरच खरे अच्छे दिन येतील. पण हे सरकार शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना लुटणारे सरकार आहे. त्यामुळे यांच्या राज्यात कधीच अच्छे दिन येणार नाहीत, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर केला. वाडीवऱ्हे येथे शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
इगतपुरी तालुक्यात प्रथमच वाडीवऱ्हे येथे कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्‍घाटन आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा झाला. त्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसेच वाडीवऱ्हेचे उपसरपंच आंबादास कातोरे, दिलीप शेजवळ, माजी उपसरपंच रावसाहेब कातोरे, बाणेश्वर मालुंजकर, भास्कर गुंजाळ, विलास मालुंजकर, चेअरमन भारत कातोरे, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब मालुंजकर, नितीन गवळी, विनोद कातोरे, रामा कातोरे, सनील मालुंजकर, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

कडू म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. अपंगांचे प्रश्न सोडविले गेले पाहिजे. जातीपातीच्या राजकारणाला स्थान न देता काम करणाऱ्या माणसाला मतदान करा; तरच सगळे सुखी होतील, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने अपंगांना प्रातिनिधिक स्वरूपात निधीचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस अपंग शिक्षकांवर कारवाई करा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा परिषदेत बोगस अपंग प्रमाणपत्र घेऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बदल्या करून घेतल्याप्रकरणी महिन्याभरात कठोर कारवाई करावी, अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून बाद करून त्यांना बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईची मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपककुमार मीना यांच्याकडे केली.
अपंगांसाठीच्या तीन टक्के राखीव निधीतील चार वर्षांपासून अखर्चित असलेले ५ कोटी रुपये अपंगासाठी सुविधांसाठी खर्च करावे तसेच जिल्हा परिषदेत अपंगासाठी लिफ्टची व्यवस्था करण्याचीही मागणी आमदार कडू यांनी केली. त्यांच्या या सर्व मागण्यांना सीईओ यांनी प्रतिसाद देत हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दोन महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या या भेटीदरम्यान पोलिसांनी जिल्हा परिषदेत बुधवारी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १९९५ चा अपंग पूनर्वसन कायद्याची जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमध्ये अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून आमदार कडू यांनी ही भेट घेतली. विशेष म्हणजे ‘सीईओं’च्या दालनात आमदार कडू यांच्यासोबत फक्त पाच जणांनाच प्रवेश देण्यात आला. यावेळी वरिष्ठ दोन पोलिस अधिकारी सुद्धा दालनात होते. कडू यांच्या आक्रमक स्वभावामुळे अधिकाऱ्यांनी घेतलेली काळजी मात्र सामान्यांसाठी त्रासदायक ठरली. बैठकीच्या वेळी ‘सीईओं’च्या कॅबिनकडे जाण्यास बंदी करण्यात आली. ‘सीईओं’नी सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कडू यांनी समाधान व्यक्त केले.

महिनाभरानंतर पुन्हा येऊ
‘सीईओं’ यांच्याबरोबरच झालेल्या बैठकीनंतर आमदार कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अखर्चित निधीतून अपंगासाठी काम सुरू करावे त्यासाठी महिनभरानंतर पुन्हा येऊ असे सांगितले. यावर्षी ७३ लाख खर्च झाले आहे. उर्वरित रक्कमही खर्च करावी, अशीही मागणी केली.

१० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी
अपंगाची नोंदणी झाली नसल्याचे कारण चर्चेत पुढे आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहिम घेऊन २ ते १० ऑक्टोबरपर्यंत अपंगाची जिल्हा भरातून नोंदणी ग्रामपंचायतद्वारे करावी अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही कडू यांनी सांगितले.

मनपाचे अभिनंदन
दोन महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी वाद झाल्यानंतर महापालिकेने अपंगासाठी विविध कामे सुरु केली असल्याचे निदर्शनात आणून दिल्यानंतर आमदार कडू यांनी महापालिकेचे अभिनंदन केले. अपंगाचे प्रश्न सुटावे, हीच आमची अपेक्षा आहे. अमंलबजावणी होत नाही म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत पोलिस छावणी
जिल्हा परिषदेत आमदार बच्चू कडू येणार असल्याने संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी एक पोलिस व्हॅनही बाहेर उभी करण्यात आली. मुख्य गेटपासून ‘सीईओं’च्या कॅबिनपर्यंत सर्वच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांच्यासह भद्रकाली पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला पोलिसही मोठ्या प्रमाणात हजर होत्या.

आंदोलनाची दिली आठवण
नाशिक जिल्हा परिषदेत ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र घेऊन बदली, पदोन्नतीचा लाभ घेतल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद व कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. पण त्यावर कठोर कारवाई न झाल्यामुळे आमदार कडू यांनी या प्रश्नाकडे बुधवारी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
येथील युवा लेखक कृष्णा पवार लिखित ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. एक ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता होणार आहे. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा अनोखा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आर्य योगेश ठोके या लहानग्या मुलाच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. आर्यच्या संघर्षगाथेच्या सत्यघटनांवर आधारित हे पुस्तक आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी कवी अशोक बागवे, बाळासाहेब जोशी, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुनील कुटे हे उपस्थित असणार आहेत. यावेळी कवी अशोक बागवे यांचे ‘ओढ शाश्वत अनुभूतीची’ या विषयावर व्याख्यानही आयोजित केले आहे.

दुर्धर आजाराशी झुंज देण्याच्या बिकट परिस्थितीत सुद्धा जगण्यातला आनंद कसा जपावा, याचा संदेश विज्ञान व अध्यात्म देऊ शकते अशी मांडणी या सत्य घटनेवर आधारीत पुस्तकात करण्यात आली आहे. नाशिककरांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सुजप चॅरिटेबल फाऊंडेशन आणि हृदयाक्ष हार्ट अॅण्ड केअर सेंटरच्या वतीने डॉ. हिरालाल पवार आणि डॉ. स्मिता पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेपत्ता मोहनदासांची सरकारने घ्यावी दखल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
बेपत्ता महंत मोहनदास यांच्याबाबत राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेतली पाहिजे, अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे. याच विषयावरून महामंत्री महंत हरिगिरी महाराज येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते.
बेपत्ता झालेले महंत मोहनदास हे मूळचे मुंबईचे आहेत. त्यांचा बहुतांश रहिवास मुंबईमध्येच होता. राज्य सरकारने त्याच्या बेपत्ता होण्याची दखल घेतली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्याशी संपर्क करणे गरजेचे आहे. शासन पातळीवर तपासास चालना मिळावी अशी अपेक्षा साधूंनी व्यक्त केली. महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीच कळविले आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचीही आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. अष्टमीला विशेष तर दसऱ्यासही पूजा असते. सर्व आखाड्यांमध्ये आदिमाया शक्तीची पूजा होत आहे. साधू-महंत यात व्यस्त आहेत. उत्सव संपताच महंत मोहनदास यांच्या बाबत चौकशीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यास साधू बाहेर पडणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. महंत मोहनदास यांनी देशभरातील १४ भोंदू महाराजांची यादी जाहीर केली होती. दरम्यान, वेळ पडल्यास आणखी भोंदूंची नावे केली जातील, अशी चर्चा साधू-महंतांमध्ये सुरू आहे.

महंत मोहनदास याचे बेपत्ता होणे चिंता निर्माण करणारे आहे. त्यांचा शोध लागला पाहिजे. साधू-संत अशा दहशतीला घाबरणारे नाहीत.
- नरेंद्रगिरी महाराज,
अध्यक्ष, आखाडा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर चूल मांडून निदर्शने

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
पेट्रालची मूळ किमंत प्रती लिटर ३१ रुपये असताना ८० रुपये दराने त्याची विक्री सुरू आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनांवरील अन्य कर काढून केवळ जीएसटी लागू करावा तसेच इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. प्रवेशद्वारावरच रिकामे सिल‌िंडर, गॅस शेकडी आणि लाकडे मांडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्यात प्रचंड प्रमाणात इंधनाची दरवाढ लागू करण्यात आली असून महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाजप सरकारने जनतेची लूट थांबवावी या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकवटले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारचा निषेध असो, फडणवीस सरकारचा निषेध असो यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस सिलिंडर, शेगड्या आणि लाकूड रस्त्यावर मांडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या ७२ दिवसांमध्ये इंधनाचे दर प्रती लिटर १६ रुपयांनी वाढल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या दरवाढीमुळे जनतेच्या मनात रोषाचे वातावरण आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर साडे सहाशे रुपयांच्यावर गेले आहेत. इंधनाच्या किमती सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत कडधान्ये, तेल, तुपाच्या किमती वाढल्या आहेत. रेशन दुकानांवर साखर तसेच धान्य मिळणेही कमी झाले आहे. या जीवनावश्यक वस्तुंच्या किमती कमी करून दर नियंत्रणात ठेवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला नाही. तर यापुढे रस्त्यांवर उतरून अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेच्या लुटीतून निवडणूक पॅकेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
निवडणुकीपूर्वीच्या सहा महिन्यांत जनतेसाठी काहीतरी ठोस घोषणा करण्याची पंतप्रधान मोदी यांची रणनीती असते. सध्या जनतेच्या खिशातील पैसे लुटण्याचे काम मोदी सरकारकडून सुरू असून याच पैशांतून आगामी काळात ते मोठे पॅकेज जाहीर करतील, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बुधवारी नाशिकमध्ये केली.

इंधन दरवाढी विरोधात नागरिकांचे प्रबोधन करण्याचे काम युवक काँग्रेसने राज्यभरात हाती घेतले. त्यासाठी ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या की नागरिकांसाठीही इंधन स्वस्त व्हायला हवे होते. परंतु तसे होताना दिसत नाही. २००९ मध्ये १५० डॉलर प्रति बॅरल असलेले इंधनाचा दर गतवर्षी २८ डॉलरपर्यंत खाली आला. आताही तो ५० डॉलर प्रती डॉलर आहे. एक डॉलरने दर कमी झाले तरी देशाचा आठ हजार ५५६ रुपयांचा फायदा होतो. आता तर हे दर खूपच कमी झाले आहेत. तरीही आपल्याकडे इंधनाचे दर वाढत आहेत. या माध्यमातून भाजप सरकार सामान्यांची लूट करीत असल्याचा आरोप तांबे यांनी केला.
दुष्काळात इंधन व तत्सम अनेक वस्तुंवर उपकर लावण्यात आले. गतवर्षीपासून राज्यात चांगला पाऊस पडतो आहे. तरी हे कर कमी केले नाही. जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा उद्योग भाजप सरकारकडून सुरू असून इंधनावरील सर्व कर रद्द करून केवळ जीएसटी लावावा, अशी मागणी तांबे यांनी केली. इंधन दरवाढीविरोधात अनेक पक्ष स्वतंत्ररित्या आंदोलने करीत आहेत. जनहितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलने करायला हवीत, अशी अपेक्षा तांबे यांनी यावेळी व्यक्त केली.

घरोघरी जाऊन प्रबोधन
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर वाढले, की आपल्याकडेही दर वाढतात, असा सर्वसामान्य नागरिकांचा समज आहे. म्हणूनच लोकांचे प्रबोधन करण्यासाठी कॉलेजेस, पेट्रोलपंप तसेच घरोघरी जाऊन याबाबतची माहितीपत्रके वाटण्याचा निर्णय युवक काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पुढील पाच दिवस ही मोहीम राबविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images