Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कौशल्याधिष्ठीत शिक्षण मिळणे शक्य

0
0

कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘मुक्स’ हे माहिती तंत्रज्ञानावर आधारित शिकण्यास उपायुक्त असे नवीन शैक्षणिक साधन आहे. त्याद्वारे हवे त्याला, हवे तेथे, हवे तेव्हा शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील नवीन शैक्षणिक धोरणास अनुरूप असलेल्या स्वयंम आणि स्वयंप्रभा सुविधांमार्फात समाजाला कौशल्याधिष्ठीत शिक्षण मिळविणे सहज शक्य होईल. मुक्सच्या माध्यमातून ‘गरजेनुसार शिक्षण’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वयंम आणि स्वयंप्रभा प्रकल्पाच्या राष्ट्रीय संयोजक डॉ. उमा कांजीलाल, उपसंचालक डॉ. के. गौथमन, आशिष अवधिया उपस्थित होते.

डॉ. उमा कांजीलाल यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने सुरू केलेल्या स्वयंम आणि स्वयंप्रभा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुक्त विद्यापीठास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. श्वेता मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कविता साळुंके, प्राजक्ता देशमुख यांनी परिचय करून दिला. निशिगंधा पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बससाठी विद्यार्थी रस्त्यावर

0
0

म टा वृत्तसेवा, कळवण

विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बस दर शनिवारी बंद राहत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. ही बससेवा शनिवारीही सुरू ठेवण्यात यावी या मागणीसाठी सुरगाणा येथील होळी चौकात स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

मानव विकास योजने अंतर्गत तालुक्यात विविध भागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र दर शनिवारी या बस बंद ठेवल्या जात असल्याने तोरणडोंगरी, श्रीभूवन, खुंटविहीर, करंजूल, वाळूठझिरा, उंबरठाण, बर्डीपाडा, बाळओझर, खोकरविहीर आदी ठिकाणी बस जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे इतर दिवसांप्रमाणे दर शनिवारीही बस सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी एसएफआयने केली आहे. या मागणीसाठी येथील होळी चौकात रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून नायब तहसीलदार एम. के. खैरनार यांना निवेदन दिले. सुरगाणा बस स्थानकातील व्यवस्थापक चौधरी यांनी तालुक्यात सात बस सुरू असून शनिवारी बस सुरू करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी एसएफआयचे द्यानेश्वर भुसारे, मनोज देशमुख, गिरीधर भूसारे, नर्मदा चौधरी, ललिता भोये, रोहिणी गावित, पूजा महाले, लक्ष्मण महाले, खंडू देशमुख, प्रणित चौधरी, अजय टोपले, देवेंद्र महाले आदींसह विद्यार्थी आंदोलनात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारस्वतांचा जिल्हा मेळावा

0
0

मंगेश पाडगावकरांची मुलाखत घेताना मी त्यांना प्रश्न केला होता, की ‘तुमचा देवावर भरवसा आहे का?’ काही कवितांमध्ये थोडा उल्लेख येतो, त्यावर त्यांनी ‘माझा भरवसा नाही’असे जाहीर उत्तर दिले. पण, मुलाखत संपल्यावर मला खासगीत सांगितले की ‘देवावर माझा भरवसा आहे!’

--

प्रा. प्र. द. कुलकर्णी

नाशिक जिल्हा साहित्यिक मेळावा प्रौढ होऊन पन्नास वर्षांचा झाला. मधल्या काळात तो लहान लहान होत गेला. सुवर्णमहोत्सवी वर्षाचा यंदाचा साहित्यिक मेळावा भरगच्च कार्यक्रमांनी साकार होत आहे. सावाना कार्यकारिणीने खूपच मनावर घेतलेले दिसते. कार्यक्रमांची रेलचेल, पाहुण्यांची मांदियाळी, साहित्यप्रेमींचा उत्साह आणि सावाना पदाधिकाऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

मी १९६८ पासून कविता लिहू लागलो. त्या सुमारास मुक्तछंदात कविता लिहिणारी कवी मंडळी कमी होती. सावानाच्या वरच्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर संदर्भ ग्रंथालयाच्या बाजूला मेळावा रंगला होता. मी मुक्तछंदातील कविता सादर केली होती. पंढरीनाथ सोनवणी, योगेश्वर अभ्यंकर, नीना रावदेव वगैरे मंडळी कविता सादर करणाऱ्यांत होती. सुमारे ५० रसिकांची उपस्थिती होती.

पुढे सहा वर्षे १९७७ पर्यंत पुण्यात स्थलांतरित झाल्यामुळे काही वेळा अनुपस्थित होतो. पण, १९७८ पासून पुन्हा नाशिकवासी झालो. सुरुवातीस एक दिवसाचा मेळावा दीड दिवसाचा झाला. कवींची संख्या वाढल्यामुळे कवी संमेलन आदल्या दिवशी घेण्यात येऊ लागले. त्या दीड दिवसाच्या मेळाव्याचेही नावीन्य हरवले होते. ‘दीड दिवस बोळवावा असा साहित्य मेळावा’ या शीर्षकाचा टीकात्मक लेख मी १९८४ च्या सुमारास लिहिला होता.

जिल्हा साहित्यिक मेळावा खरोखर नाशिक जिल्ह्याच्या साहित्यिकांसाठी होता. सटाणा, मनमाड, येवला, मालेगाव वगैरे तालुक्यांमधून साहित्यिक येऊन मेळाव्यात सहभागी होत असत. परिसंवादामध्ये व काव्य मेळाव्यात नाशिकबाह्य साहित्यिकांना सामावून घेतले जात होते. तेही अभ्यासपूर्ण मते मांडत असत. पूर्वी मेळाव्यातला परिसंवाद खऱ्या अर्थी साहित्यिकांच्या सहभागाचा होता. बीजभाषण झाले, की खुलेपणाने साहित्यिक संबंधित विषयावर आपली मते मांडत असत. सुमारे १० ते १५ साहित्यिक मुद्दे खोडण्याचा प्रयत्न करीत व शेवटी समारोपाचे भाषण होई. परंतु, नंतरच्या काळात परिसंवाद म्हणजे दोन भाषणे असे त्याचे स्वरूप झाले. यावर्षीचा एक परिसंवाद सर्वांसाठी खुला ठेवण्यात आल्याचे शंकर बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले आहे.

एका वर्षीच्या मेळाव्यात प्रसिध्द कथालेखक चंद्रकांत वर्तक यांची मुलाखत चंद्रकांत महामिने व मी घेतली होती. त्यांच्या प्रत्येक कथेत ‘स्मशान’ का येते, असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी घरातल्या ज्येष्ठांच्या लागोपाठच्या मृत्यूंचा परिणाम असल्याचे सांगितले होते. सारे सभागृह स्तब्ध झाले होते.

मंगेश पाडगावकरांची मुलाखत घेताना मी त्यांना प्रश्न केला होता, की ‘तुमचा देवावर भरवसा आहे का?’ काही कवितांमध्ये थोडा उल्लेख येतो, त्यावर त्यांनी ‘माझा भरवसा नाही’ असे जाहीर उत्तर दिले. पण, मुलाखत संपल्यावर मला खासगीत सांगितले, की ‘देवावर माझा भरवसा आहे!’

मेळाव्यात पूर्वी माधव मनोहर, अ. वा. वर्टी, तात्यासाहेब तथा कुसुमाग्रज, चंद्रकांत वर्तक, मनोहर शहाणे, योगेश्वर अभ्यंकर, बा. वा. दातार, वि. वा. आंबेकर, शं. क. कापडणीस, एकनाथ पगारे, यशवंत पाठक, प्रा. राजगुरू, चंद्रकांत महामिने, प्रा. साळुंके वगैरे साहित्यिक मंडळी सहभागी होत असत.

पूर्वी ‘सत्यकथा’ हे वाङ्मयीन मासिक दर्जेदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यात कविता, कथा, छापून आली की तो साहित्यिक मोठा मानला जायचा. मी एकदा एका मेळाव्यात ‘सत्यकथा’ मासिक हे काही साहित्याचा मापदंड होऊ शकत नाही, अशी टीका केली. त्यावर तात्यासाहेबांनी (कुसुमाग्रज) आपल्या भाषणात माझा मुद्दा खोडून काढला. ते म्हणाले, ‘ग्रिनिचवरून जाणारे रेखावृत्त शून्य रेखावृत्त जगाने मान्य केले आहे. तसे ‘सत्यकथा’ साहित्यिकांनी मान्य केले आहे.’

जिल्हा साहित्यिक मेळाव्याने जिल्ह्याला अनेक साहित्यिक दिले आहेत. आजचे आघाडीचे साहित्यिक हे जिल्हा मेळाव्यात सहभागी झालेले आहेत. एक वर्षी माझ्या कवितेला मेळाव्यात कवी गोविंद पुरस्कार मिळाला आहे. तीही घटना मजेशीर आहे. मी स्पर्धेत भाग घेतला त्यावेळी माझ्या समकालीन कवी सावानात कार्यरत होते. परीक्षक मंडळातही असण्याची शक्यता होती. त्यामुळे मी ‘प्रभाकर पाराशरे’ या नावाने कविता पाठविली. वर्टींनी प्रभाकर पाराशरे या नावाने पुरस्कार घोषित केल्यावर मी उभा राहिलो, तेव्हा सारेच आश्चर्यचकित झालेत. माझ्या नावाचा स्पर्धेवर परिणाम होऊ नये म्हणून मला तसे करावे लागले.

अ. वा. वर्टी हे मेळाव्याचे खास आकर्षण असायचे. खुमासदार शैलीत काही वेळा कुणाला टपल्या मारत ते दिवसभर सूत्रसंचालन करायचे. हास्यकल्लोळ व्हायचा. हलकेफुलके वातावरण होत असे. तो हसरा शिडकावा आता हरवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिका यात्रोत्सवात रंगत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गर्दीने दुथडे भरून वाहणारे रस्ते, पार्किंगला खचाखच वाहने, मध्येच येणारा भोंग्यांचा आवाज, पाळण्यात बसण्यासाठी लागलेली लांबच लांब रांग, देवी मंदिराच्या दर्शनासाठी असलेली मोठी रांग, नारळ-फूल विक्रेत्यांची चाललेली आर्जवे, संथगतीने देवीच्या दिशेने पडणारी पावले, फुले-अगरबत्तीचा दरवळणारा गंध, मंदिराच्या प्रांगणात जमिनीवरच बस्तान मारत भेळभत्त्यावर मारला जाणारा ताव आणि बच्चेकंपनीचा हट्ट... असे उत्साहाने, आनंदाने भारलेले वातावरण कालिकामातेच्या यात्रोत्सवात पाहायला मिळत आहे.

एरवी नीरव शांतता असलेला गडकरी चौक ते मुंबई नाकादरम्यानचा भाग नवरात्रोत्सवात भरलेल्या कालिका देवी यात्रोत्सवामुळे चांगलाच गजबजला आहे. शुक्रवारी दुसऱ्या माळेला पहाटेपासूनच मंदिरात विविध विधी करण्यास प्रारंभ झाला. दिवसभर येथे भाविकांची गर्दी दिसून आली. सायंकाळनंतर देवी दर्शनाबरोबरच यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या भाविकांची रांग दुतर्फा लांबच लांब लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दर्शनासाठी किमान तास दीड तासाचा वेळ लागत आहे. सीसीटीव्हीमुळे भाविकांना रांगेत असतानाच देवीचे मुखदर्शन होत आहे.

--

खेळणी, खाद्यपदार्थांची चंगळ

दर्शन घेतल्यानंतर टोराटोरा, जायंट व्हील, ब्रेक डान्समध्ये बसून यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी होत आहे. या गर्दीला कॅश करण्यासाठी काही पाळणेचालक दामदुप्पट तिकीट लावत असूनही तेथील गर्दी कमी होत नसल्याचे दिसून आले. परतीच्या वाटेवर एलईडी लाइट्सच्या वस्तू, बाहुल्यांसाठी चाललेला बच्चेकंपनीचा हट्ट आणि त्यानंतर खरेदी असा बहुतांश भाविकांचा प्रवास गरमागरम जिलेबी, शेव, रेवडी आणि भत्त्याच्या पार्सलपर्यंत येऊन ठेपत आहे. देवीदर्शन आणि यात्रोत्सवातला गोडवा घेऊन परतणाऱ्या भाविकांची गर्दी पहाटेपासून अगदी रात्री अकरा वाजेनंतरही कायम होती.

--

मुंबई नाक्यावर नाकाबंदी

गडकरी चौकाच्या पुढे थोडे अंतर गेल्यानंतर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याची नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनधारकांना फिरून सुयश हॉस्पिटलच्या रस्त्याने जावे लागत आहे. त्यामुळे येथे प्रचंड कोंडी होत असून, दुतर्फा वाहतूक न झाल्याने आणखी आठवडाभर या कोंडीला वाहनधारकांना सामोरे जावे लागणार आहे.

--

भक्त निवासाचे लोकार्पण

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत श्री कालिकामाता मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचे लोकार्पण शुक्रवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे केशवराव पाटील, प्रतापराव कोठावळे, सुभाष तळाजिया, आबासाहेब पवार आदी उपस्थित होते.

संस्थानच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त करून श्री. महाजन म्हणाले, की समाजातील उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. श्री कालिकामाता संस्थानने विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. भक्त निवासाच्या माध्यमातून परिसरातील रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही सुविधा होणार असल्याने भक्त निवासाचा विस्तार करण्यासाठी संस्थानला शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. प्रास्ताविकात पाटील यांनी भक्त निवासाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागामार्फत एक कोटी १४ लाखाचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. संस्थानतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता नवीन स्ट्रक्चरल कन्सल्टंटचा प्रस्ताव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सफाईकामांचे आउटसोर्सिंग वाढविण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कौल वाढत असतानाच, प्रशासनानेही आपल्या कामांच्या आउटसोर्सिंगवर भर देण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः महापालिकेच्या विविध कामांसाठी थेट कन्सल्टंट नियुक्तीचा प्रघात दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता महापालिकेच्या स्ट्रक्चरल कामांसाठी कन्सल्टंट पॅनलची पुनर्नियुक्ती केली जात आहे. महापालिकेच्या स्थापत्य विषय कामांचे प्राकलने, नकाशे, निविदा, स्ट्रक्चरल डिझाइन तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्त केले जाणार आहे. पाच जणांचे पॅनल नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला आहे.

महापालिकेतील अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने प्रशासनानेही आपल्या कामांचा जोर आउटसोर्सिंगच्या दिशेने वाढवला आहे. गेल्या पंधरवड्यातच रोड सेफ्टीच्या कन्स्लटंटवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, त्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच महापालिकेच्या स्ट्रक्चरल कामांसाठी कन्सल्टंट पॅनलची पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या स्थापत्य विषय कामांची प्राकलने, नकाशे, निविदा, स्ट्रक्चरल डिझाइन तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्त केले जाणार आहे. शैलेश धुमणे, कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सी, फेरिकॉन कन्सल्टन्सी, सिव्हिल टेक., दीपक कुलकर्णी या पाच कन्सल्टंटची नियुक्ती केली जाणार आहे. पुढील पाच वर्षे या पाच जणांकडून महापालिकेला सल्ला दिला जाणार असून, त्या मोबदल्यात त्यांना प्रोजेक्ट कॉस्टच्या एक टक्के रक्कम अदा केली जाणार आहे. सोमवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा फैसला होणार असून, आता स्थायीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

४५ ग्रीन जिमचा प्रस्ताव

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमधील मैदानांमध्ये ४५ नव्याने ग्रीन जीम बसविल्या जाणार आहेत. ग्रीन जिम हा पॅटर्न महिलांमध्ये जास्त लोकप्रिय होत असल्याने नगरसेवकांकडून या ग्रीन जिमला अधिक मागणी होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नगरसेवक निधीतून तब्बल ४५ ठिकाणी ग्रीन जिम लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यावर २ कोटी ६५ लाखांचा खर्च येणार आहे. या संदर्भात ठेकेदारही निश्चित झाला असून, ग्रीम जिमचे काम देण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला आहे. सोमवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नमो देव्यै महादेव्यै...!

0
0

मुळातच देवी या शब्दाचा अर्थ शक्ती आहे. ही स्वयंभू असल्याने तिला 'आदिशक्ती' असे संबोधले जाते. हिचे वैशिष्ठ्य असे की, तिला 'आदि' असला तरीही 'अंत' नाही. नवरात्री' म्हणजे नऊ रात्रींची उपासना. यात प्रत्येक दिवसाच्या देवतेची विविध रूपे आहेत.

पूर्वा लक्ष्मण सावजी

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. म्हणून प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीनवरात्रास 'शारदीय नवरात्र' असे म्हणतात. या कालात षष्ठी ते नवमीपर्यंत सरस्वती आवाहन, सरस्वतीपूजन, सरस्वती बलिदान आणि सरस्वती विसर्जन असे चार विधी केले जातात. नवरात्रातील महानवमीस 'खंडेनवमी' म्हणतात. नवरात्री' म्हणजे नऊ रात्रींची उपासना. यात प्रत्येक दिवसाच्या देवतेची विविध रूपे आहेत. ती आपण पाहुया...

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।

त्रुतीयं चंद्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच।

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्।।

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता।

उक्तांन्येतानि नमानि ब्रह्मण्येव महात्मना।।

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्‌।

वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्‌॥

भगवती शैलपुत्री ही दुर्गेच्या नऊ स्वरूपातील प्रथमस्वरूप. पर्वतराज हिमालयाची ही कन्या शैलपुत्री नावाने प्रसिद्ध आहे. ही उजव्या हाती त्रिशुल आणि डाव्या हातात सुंदर कमलपुष्प धारण करते. शैलम् म्हणजे पर्वत. पर्वतात माणिक, रत्ने व इतर मौल्यवान प्रकारचा साठा आहे, असा पर्वत. हा मौल्यवान साठा पाहूनही भौतिक सुखाकडे आकर्षित न होता त्याचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणारी ही शैलपुत्री आहे.

ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे स्वरूप. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करणे हा जिचा स्वभाव आहे ती ब्रह्मचारिणी. हिचे स्वरूप अत्यंत भव्य आहे. उजव्या हाती जपमाला, डाव्या हाती कमंडलू आणि डोक्यावर स्वर्णमुकुट. येथे ब्रह्म म्हणजे तपस्या. हिच्या उपासनेने मनुष्यामध्ये त्याग, वैराग्य आणि असीम धैर्याची वृद्धि होते. हिची कृपा सर्वत्र सिद्धी आणि विजय प्रदान करणारी आहे.

दुर्गेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा. हिच्या मस्तकावर घंटाकार चंद्र आहे. हिला दहा हात असून उजव्या हातात अभय मुद्रा, धनुष्यबाण, कमळ आहे, तर डाव्या हातात कमंडलू, वायुमुद्रा, खड्ग आणि त्रिशूल आहे. कंठी पुष्पहार, कानामध्ये स्वर्णभूषण व डोक्यावर स्वर्णमुकुट आहे. माता चंद्रघटा उपासकांना भुक्ती आणि मुक्ती प्रदान करते.

दुर्गेच्या चौथ्या स्वरूपाला कूष्मांडा म्हणतात. आपल्या स्मित हास्याने अंड आणि ब्रह्मांडाला उत्पन्न करणारी असल्याने ही कूष्मांडा नावाने प्रसिद्ध आहे. हिच्या शरीराची कांती सूर्यासमान देदिप्यमान आहे. हिला आठ हात आहेत. म्हणून हिला अष्टभुजादेखील म्हणतात. हिच्या उजव्या हातात कमंडलू, धनुष्यबाण व कमळ सुशोभीत आहे, तर डाव्या हातात अमृतकलश, जपमाला, गदा व चक्र आहे. हिच्या डोक्यावर स्वर्णमुकुट आणि कानात स्वर्णाभूषणे आहेत. माता कूष्मांडा भक्तांना रोग, शोक यांच्यापासून मुक्त करते त्याचबरोबर आयू, यश आणि आरोग्य देते.

स्कंदमाता हे दुर्गेचे पाचवे स्वरूप. हिला चार हात असून, उजव्या एका हाताने कुमार कार्तिकेयाला आपल्या मांडीवर घेतले आहे आणि दुसऱ्या हाती कमलपुष्प धारण केलेले आहे. डाव्या हाती वरमुद्रा व दुसऱ्या हाती कमल सुशोभीत आहे. डोक्यावर स्वर्णमुकुट आणि कानात स्वर्णाभूषण आहे. हिच्या उपासनेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, जे मोक्षद्वाराचे साधन होय.

दुर्गेचे सहावे स्वरूप म्हणजे कात्यायनी. महर्षी कात्यायनाच्या घरी अश्विन कृष्ण चतुर्दशीला पुत्रीरूपाने उत्पन्न झाल्यामुळे हिचे नाव कात्यायनी. त्याआधी अश्विन शुक्ल सप्तमी, अष्टमी आणि नवमीला तिने महर्षीद्वारा पूजा ग्रहण केली. अश्विन शुक्ल दशमीला तिने महिषासुराचा वध केला. हिचे स्वरूप भव्य आहे. चार हात, उजव्या बाजूकडील दोन हात अभय व वरमुद्रा आहेत. डाव्या बाजूकडील दोन हातात खड्ग आणि कमळ आहे. डोक्यावर स्वर्णमुकुट आहे. हिच्या उपासनेने साधकाला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष साधना सुलभ होते.

दुर्गेच्या सातव्या रूपाचे नाव कालरात्री. हिच्या शरीराचा रंग पूर्ण काळा. डोक्यावरील केस अस्ताव्यस्त पसरलेले. गळ्यामध्ये विजेप्रमाणे चमकणारी माळा. हिला तीन नेत्रे आहेत. उजव्या बाजूकडील दोन्ही हातात अभय व वरमुद्रा तर डाव्या बाजूकडील दोन्ही हातात लोखंडी काटे व तलवार सुशोभीत आहे. ही माता कालरात्री भयावह रूपात असूनही शुभ फलदायी आहे. आपत्ती व संकट आणणाऱ्या अयोग्य लहरींचा विनाश करणारी ही कालरात्री.

महागौरी हे दुर्गेचे आठवे स्वरूप. वर्ण गोरा, चार हात आणि वस्त्रभूषणेही श्वेत. हिचे वय आठ वर्षे मानले आहे. हिच्या उजव्या हाती एक वरमुद्रा आणि त्रिशूल, तर डाव्या हाती डमरू व अभयमुद्रा आहे. हिच्या उपासनेने पूर्वसंचित पापांचा नाश होतो. ही अनेकसिद्धी देणारी माता आहे.

सिद्धीदात्री हे नवदुर्गेचे नववे स्वरूप. ही आपल्या उपासकाला आठ प्रकारच्या सिद्धी देते. ही चार हातांची आहे. उजव्या हाती गदा व चक्र आणि डाव्या हाती पद्म आणि शंख आहे. डोक्यावर स्वर्णमुकुट व गळ्यामध्ये श्वेतपुष्पांची माळा धारण केलेली आहे. सिद्ध, गंधर्व, यक्ष, देवता, असूर सर्वचजण हिची आराधना करतात.

प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत देवीच्या अंगावरील वस्त्र व फुले विशिष्ठ रंगाची असावित, असे सांगितले गेले आहे. पहिल्या दिवशी पांढरे वस्त्र व फुले, दुसऱ्या दिवशी निळी फुले व वस्त्र, तिसऱ्या दिवशी लाल वस्त्र व फुले, चौथ्या दिवशी हिरवे वस्त्र व फुले, पाचव्या दिवशी पिवळे वस्त्र व फुले, सहाव्या दिवशी जांभळे वस्त्र व फुले, सातव्या दिवशी गुलाबी वस्त्र व फुले, आठव्या दिवशी पांढरे वस्त्र व फुले, नवव्या दिवशी पिवळे वस्त्र व फुले आणि दहाव्या दिवशी पांढरे वस्त्र व पांढरी फुले वाहिल्याने प्रत्येक रंगाच्या वस्त्रांतून व फुलांतून उत्सर्जित होणाऱ्या तेजाचा परिणाम दर्शन घेणाऱ्या व्यक्तिंवर होतो.

स्त्री ही या सर्वांचा मूळ पाया आहे. खरंतर आपले आयुष्य सुखासमाधानात घालवायचे असेल, तर आपल्याला धर्माचरण करून महालक्ष्मीकडून तेजस्विता, महासरस्वतीकडून ज्ञानसंपदा व महाकालीकडून वीरश्री घ्यावी लागेल. तेव्हाच आपण सामर्थ्याने, अभिमानाने आणि आनंदाने जगू शकू. स्त्री ही घर, समाज अन् राष्ट्र यांचे दैवत आहे. त्याचबरोबर त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणाची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहेत. सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिलाच आहेत. राष्ट्रीय राजकारणांत महिलांची संख्या नगण्य आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढते आहे.

म्हणूनच आपण सर्व स्त्रीशक्तीचा सन्मान करुया.

(लेखिका या बेटी बचाअो बेटी पढाअो अभियानाच्या सदस्या आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात आजारांचे थैमान

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहर स्वच्छतेच्या गप्पा मोठ्या प्रमाणात होत असल्या तरीही शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्ण ढासळली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग व पाण्याचे डबके साचून डास व मच्छरांची उपत्ती होवून साथींच्या आजारांनी शहरवासीयांना त्रस्त केले आहे. यात व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून शहारातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यामध्ये रुग्णासंख्या वाढली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जाताजाता हजेरी लावल्याने आठ दिवसांपासून शहरातील वातावरणात बदल झाला आहे. शहरात सर्वत्र पाण्याचे डबके, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नववसाहत परिसरात तर दुर्गंधी पसरू लागली आहे. नववसाहत परिसरात अद्यापही बहुतांश भागात कच्चेरस्ते व खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. तर बहुतांश ठिकाणी गवतांचे साम्राज्य असल्याने डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. नववसाहतीत घंटागाडीत सातत्य नसल्याने ओला व सुका कचरा घराबाहेर अथवा सार्वजनिक जागांवर फेकला जात आहे.

जनावरे मोकाट

पालिका प्रशासनाने सुरुवातीला उघड्या भूखंडांसह शहरातील गवत काढले होते. मात्र परतीचा पाऊस येताच शहरातील बहुतांश ठिकाणी गवत वाढले आहे. काही भागात तणनाशक मारल्याने स्वच्छता दिसत असली तरी कचऱ्यांची विल्हेवाट लागत नसल्याने नववसाहत पसिरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरांसह डुक्कारांनीही उच्छाद मांडला आहे. पालिका प्रशासनाने डांस व मच्छर निर्मूलन करण्यासाठी फवारणी करणे गरजेची असल्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य धोक्यात!

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरात साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाच अपयश येत आहे. डेग्यूंचे सुमारे १३ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. स्वाइन फ्लूचे देखील १० रुग्ण आढळून आल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत देण्यात आली. यामुळे सलग दुसऱ्या सभेत साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी उपायोजनांवर चर्चा करण्यात आली.

सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त चंद्रकांत कहार व शहर अभियंता दाभाडे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. सभेत सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, मजूराच्या बडतर्फीच्या प्रशासनाच्या प्रस्तावास मान्यता देणे, साप्ताहीक लेखा तपासणी अहवालांची माहीत घेणे आदी विषय सर्वानूमते मंजूर करण्यात आले.

सफाई मक्त्यास विरोध

गोलाणी मार्केटमध्ये दैनंदिन सफाईकरिता भीम ज्योत महिला बचत गटास मासिक ४ लाख रुपये मक्ता देण्याच्या विषयास भाजपने विरोध केला. ३ लाख १० हजार रुपयात पूर्ण प्रभागांची सफाई केली जात असतांना फक्त एका मार्केटसाठी ४ लाख रुपये योग्य होणार नाही, अशी भूमिका पृथ्वीराज सोनवणे यांनी घेतली. हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला.

उपायोजनांची माहीती

अखेर महापौर ललित कोल्हे व प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्वत: लक्ष घातल्यानतंर साथीचे रोग नियंत्रणासाठी १०० कर्मचाऱ्यांचे पथक फवारणी व पाण्यात अळीनाशके टाकण्यासाठी नियुक्त केल्याचेही अनंत जोशी यांनी सांग‌ितले. यावेळी सर्व सदस्यांनी उपाययोजनांसाठी प्रशासनाला सूचना केल्यात.

सहा महिन्यांपूर्वी शहरातून कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री टाकण्याच्या सूचना देवूनही कारवाई होत नसल्याने ज्योती इंगळे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांना धारेवर धरले. त्यामुळे यावरून मोठी खडाजंगी झाली. यासाठी ५० ताडपत्री खरेदी करूनही कारवाई होत नसल्याचे नितीन बरडे यांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्यावर पडलेल्या फांद्या उचलण्यासाठी प्रत्येक प्रभागात ४ या प्रमाणे १६ टॅक्टर भाड्याने लावण्याच्या सूचना जोशी यांनी केल्यात.

साथीच्या आजारांवरून खडाजंगी

स्थायी सभेत पृथ्वीराज सोनवणे व मनसेचे अनंत जोशी यांनी शहरात साथीच्या रोगांचा फैलाव होत असल्याने अवघ्या शहराचे आरोग्य धोक्यात आल्याची माह‌िती दिली. शहारात डेंग्यूचे ४२५ संशयित डेंग्यूचे असल्याची माहिती डॉ. राम रावलानी यांनी दिली. यावर सोनवणे यांनी हा आकडा १२०० पर्यंत असल्याचे सांग‌ितले. प्रशासनाला गेल्या दीड महिन्यांपूर्वी डेंग्यूचा प्रार्दूभाव होत असल्याने सांगूनही वेळीच काळजी न घेतल्याने जळगाव शहरात ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप अनंत जोशी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसच निघाला दरोडेखोर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

नेरी-औरंगाबाद रोडवरील एका नादुरूस्त असलेल्या ट्रक चालकास लुटल्या प्रकरणी दोन संशयितांसह एका पोल‌िस कर्मचाऱ्यास देखील अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या दरोड्यात वापरलेले गावठी कट्टे घेण्यासाठी हा पोलिस त्यांच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसच दरोडेखोर निघाल्याने जळगाव पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले आहेत. या गुन्हेगारांकडून दोन पिस्तुलसह चोरीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.

एकीकडे जळगावातील डॉक्टरचा खून, भादली येथील हत्याकांड याचा तपास लागत नसतांनाच दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसाचा सहभाग निघाल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेरी ते औरंगाबाद रोडवरील माळपिंप्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर १२ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता नादुरूस्त ट्रक (एमएच १७ एजी ७३३३) उभा होता. ट्रक चालक दत्तात्रय फुलारे (रा. कोपरगाव जि. अहमदनगर) कॅबीनमध्ये झोपला असतांना त्यास तिघा जणांनी गावठी कट्याचा धाक दाखवून लुटले. त्याच्याकडून चार हजार रुपये हिसकावून घेतले.

चालकाच्या फिर्यादीवरुन जामनेर पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर पोलिसांनी तपास करून फुलारे यांनी सांग‌ितलेल्या वर्णनावरून भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (रा.उमाळा) यास ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरुन गणेश उत्तम पाटील (रा. नेरी) व एमआयडीसी पोलिस ठाण्याचा कर्मचारी सुशील अशोक मगरे (रा.पहूर) यास अटक करण्यात आली. या गुन्ह्यात पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

मगरेवर बडतर्फीची कारवाई

या गुन्ह्यात पोलिसाचा सहभाग असणे दुर्दैवाची बाब आहे. त्याचे निलंबन करण्यात आले आहे. डीवायएसपींकडून त्याची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.

‘त्या’ पोलिस बॉइजला अधिकाऱ्यांकडून तंबी

जळगाव : मेहरूण परिसरात हॉटेलमध्ये मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टी सुरू असताना शाब्दीक वादातून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी पोलिस बॉईजने हुज्जत घातली होती. याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बॉईजसना तंबी दिली. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून हॉटेलमध्ये धिंगाणा घालत महाविद्यालयीन युवकांनादेखील जबर मारहाण केली होती. नंतर या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल करण्याचा निर्धार केला होता. परंतु तडजोड झाल्याने हा वाद थांबला. यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिस बॉईजला समोर उभे करून तंबी दिली. ही अंत‌िम संधी आहे, यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, अशा शब्दात त्यांचे कान टोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितेशिवाय साहित्य अपूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गुणगुणता येते ते गाणे आणि अंतर्मुख करते ती कविता. कविता जशी सौंदर्यवती असते तशीच ती सामाजिक आणि वैश्विकही असते. कवितेशिवाय साहित्य अपूर्ण आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता रवींद्र उपासनी यांनी व्यक्त केले.
शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालयाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कविवर्य किशोर पाठक, कवी संजय चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे, नरेश महाजन, शरद पुराणिक आदिंची उपस्थिती होती. कविता हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे. एक कविता सादर केल्याने काही पुस्तके वाचण्याचा आनंद मिळतो, असेही ते म्हणाले.
मधुरा फाटक यांनी स्वागत केले. हेमंत पोतदार यांनी प्रास्ताविक केले. संजय चौधरी यांनी स्वागताची कविता सादर केली. विवेक उगलमुगले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात सूर्यवंशी पतसंस्थेचे चेअरमन सतीश भोरकडे, व्हा. चेअरमन जयंत जाधव, सचिव आनंद कांगणे यांचा सत्कार उपासनी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा. गंगाधर अहिरे, अशोक बनसोडे, राजेंद्र उगले, प्रशांत केंदळे आदि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूजा वाघ यांचा गौरव
वाचनालयाच्या स्थापनेपासून एका वाचकाला सर्वोत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार सेट परीक्षा उत्तीर्ण सभासद पूजा वाघ यांना उपासनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमानंतर कवी रवींद्र देवरे, रवींद्र कांगणे, भीमराव कोते आणि विष्णु थोरे या निमंत्रितांचे बहारदार कवीसंमेलन झाले. संदीप गुजराथी यांनीही कविता सादर केली. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन जयश्री वाघ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सफाई

0
0

नाशिक : स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना समजावे अन् ते प्रत्यक्ष कृतीद्वारे करण्यासाठी गुरुवर्य मोतीराम सोंडाजी गुरुजी ज्युनिअर कॉमर्स कॉलेजच्या व मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थांनी प्रत्यक्ष परिसराची स्वच्छता मोहीम राबविली. मुंबई नाक्यावर उपमहापौर प्रथमेश गिते सुद्धा या अभियानात सहभागी झाले. यावेळी प्राचार्य मधुकर बच्छाव, प्रा. रोहिणी जगताप, ज्योती मोरे, कटारे प्रा. हर्षल गांगुर्डे, तानाजी माळी, मोहन माळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळून शालेय परिसर, भाभानगर, मुंबई नाक्यापर्यंत स्वच्छता मोह‌ीम राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय संस्थांचा जनजागृतीवर भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल अॅण्ड फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजीतर्फे (डी फार्मसी) विद्यार्थ्यांनी जनजागृती प्रभात फेरी काढली. तसेच कपिला गोदावरी संगम, गोदाकाठ, उद्यान, तपोवन रस्ता, हनुमान कुटी हा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी स्वच्छता राखण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्राचार्या वंदना पाटील, प्रा. व्ही. जी. बोरसे, संयोजक प्रा. अमोल पाटील शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सुखदेव विद्यामंदिर
इंदिरानगर येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिर येथे संस्थेचे सरचिटणीस संजय काळे यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचे उद्‍घाटन झाले. मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व व गरज पटवून दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. मोहीम यशस्वीतेसाठी कविता पवार, सुनील जाधव,भारती जाधव व नंदकुमार झनकर प्रयत्नशील होते.

बिटको गर्ल्स हायस्कूल
वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व जुनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी शालेय परिसर व हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबवले. यावेळी महापालिकेच्या वतीने १०० मास्क, हॅण्डग्लोज व झाडू वाटण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी पिंगळकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या अभियानाचा प्र्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी यांनी मोहिमेस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले, मुख्याध्यापिका शुभलक्ष्मी कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका जोशी, उपप्राचार्य चौहाण आदी उपस्थित होते.

हिरे महाविद्यालय
पंचवटीतील हिरे कॉलेजचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काट्या मारुती चौकापासून स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. नागचौक, काळाराम मंदिर, सितागुंफा, गुरुद्वारा रोड, मालवीय चौक, गणेशवाडी, दहीपूल, शनिमंदिर, कृष्णानगर, टाकलेनगर, नवीन आडगाव नाका ते निमाणी, पंचवटी कारंजा ते मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड परिसर आदी ठिकाणच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. उपप्राचार्य डॉ. रवी देवरे यांनी विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज, डॉ. टी. आर. महाले, डॉ. विनीत रकिबे, ‍उपप्राचार्य प्रा. प्रकाश झालसे, प्रा. जे. एन सोनवणे, एनसीसी विभागप्रमुख प्रा. सचिन सोनवणे, एनएसएस अधिकारी प्रा. जी. यू. हरकर, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. विजय बच्छाव, क्रीडा संचालक डॉ. संतोष पवार, प्रा. रोशनी गुजराथी, प्रा. किशोर राजगुरू आदीसह विद्यार्थी सहभागी झाले.

संत आंद्रिया शाळा
संत आंद्रिया शाळेत मुख्याध्यापक दादाजी आहिरे यांच्या हस्ते अभियानाला प्रारंभ करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. शरणपूर रोड, कमिशनर ऑफिस, रचना विद्यालय या परिसरातून फेरी काढण्यात आली. तसेच या परिसरांमध्ये वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली. यावेळी भावना जावळे, कविता ओहोळ, वैशाली आवळे, मंगला पवार, हेमा जाधव आदी शिक्षिका उपस्थित होत्या.


सीडीओ मेरी हायस्कूल
नाशिक : पंचवटी व मेरी म्हसरुळ परिसरात महापालिका आरोग्य विभाग यांचे वतीने दिंडोरी रोडवरील सीडीओ-मेरी हायस्कूलमधक्षल स्काउट व गाइड विभाग तसेच इतर विद्यार्थी आणि शिक्षक-पालकांनी सफाई केली. पालक संघाचे कार्याध्यक्ष सचिन निरंतर, सदस्य मुळाने, मुख्याध्यापिका आशा डावरे, कृष्णा राऊत यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ झाला. स्काउट मास्टर दिलीप अहिरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना स्वच्छतेची शपथ दिली. आरटीओ कॉर्नर, म्हसरुळ पोलिस ठाणे आणि बाजारपेठ येथे नगरसेवक अरुण पवार, गणेश गिते, पूनम धनगर, बांधकाम विभागाचे निकम, स्वच्छता निरीक्षक संजय तिडके, किरण काकड यांच्या पुढाकाराने साफसफाई करण्यात आली.

एनएसआयसी-उद्योग मित्र
सिडको : अंबड येथे एनएसआयसी आणि उद्योगमित्र यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उद्योग मित्रचे अध्यक्ष तथा भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कार्पोरेशनचे विभागीय व्यवस्थापक रामदास टेकम, नगरसेवक राकेश दोंदे आदी उपस्थित होते. अभियानात मलेश बिरारीस, संजय गायकवाड, नीळकंठ पगार, नाना फड, भरत पटेल आदींनी सहभाग घेतला.

मनपा शाळा क्रमांक ६९
आडगाव : महापालिका शाळा क्रमांक ६९ तफे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका, शिक्षक, प्रभागाच्या नगरसेविका शीतल माळोदे, नितीन माळोदे यांनी सहभाग घेतला. शाळेचे प्रांगण, राजवाडा परिसर तसेच गावातील काही भागात विद्यार्थ्यांनी झाडून काढत सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला. परिसरातील सफाई कामगारांनीही या मोहिमेत उ‌त्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पंचवटी परिसर
पंचवटी : पंचवटीमधील महपालिकेच्या प्रभाग तीनमध्ये हिरावाडी कालव्यापासून ते जेन्स शाळेपर्यंत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत प्रभाग समितीच्या सभापती प्रियंका माने, विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांची उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक दोनमधील विडी कामगारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. नगरसेवक उद्धव निमसे, सुरेश खेताडे, पूनम सोनवणे, गणेश आवनकर, श्याम पिंपरकर यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली.

उपनगरला स्वच्छतेचा आवाहन
नाशिकरोड : उपनगर येथे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी स्वच्छता पंधरवाड्यास प्रारंभ करण्यात आला. नगरसेविका सुषमा पगारे, राहुल दिवे, अनिल ताजनपुरे, आशा तडवी, रफिक तडवी, रवी पगारे, दर्शन पाचोरकर स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते. सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. परिसरातील वाढलेले गावात, प्लास्टिक, कचरा गोळा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीनशे टन कचरा संकलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील डेंग्यू, स्वाइन फ्लू तसेच वाढत्या रोगराईवर उपाययोजनांसाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शुक्रवारी राबविण्यात आलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात ३५२ टन कचरा उचलण्यात आला.
पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या उपस्थितीत सकाळी शाल‌िमार चौकातून या मोहिमेस प्रारंभ झाला. शहरातील ४४९ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात १९४ संस्था, शहरातील १४२ शाळांमधील विद्यार्थ्यांसह २८ हजार ८१९ नागरिकांनी सहभाग नोंदवल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

महात्मा गांधी यांचे १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात महास्वच्छता अभियान मोहीम राबविली जात आहे. शहरात शालीमार चौक येथून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वच्छतेविषयक शपथ देऊन आकाशात फुगे सोडून प्रारंभ केला. या प्रसंगी स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, सावंत बंधू, अशोक दुधारे, प्रसाद पवार आदींचा सत्कार करण्यात आला. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सभापती स्थायी समिती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे उपआयुक्त हरीभाऊ फडोळ, शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर निमा-आयमाचे प्रतिनिधी, स्काऊट गाईड प्रतिनिधी, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थिती होते.
शहरातील स्वच्छता मोहिमेत सुमारे २८ हजार ८१९ नागरिकांनी तर ३ हजार १५५ महापालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सोबतच १९४ संस्था, १४२ शाळा, १९ हजार ७४१ विद्यार्थी आणि सहा हजार नागरिकांनी हातभार लावला. मोहिमेसाठी ३३ जेसीबी, ४१ डंपर, ११७ घंटागाड्या, ३० ट्रॅक्टर्स लावण्यात आले. दुपारपर्यंत राबविलेल्या या मोहिमेत सुमारे ३५२.५ टन कचरा संकलित करण्यात आला.

घरापासून स्वच्छतेचे व्रत घ्या
स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांपासून शहर मुक्त करण्यासाठी नागरिकांनी परिसराची स्वच्छता राखावी आणि वर्षभर कर्तव्यभावनेने स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. नागरिकांनी स्वच्छतेबाबत नियमितपणे जागृत राहणे गरजेचे आहे. पाश्चात्य देशात चॉकलेट खाल्ल्यानंतर त्यांचा कागदही रस्त्यावर टाकत जात नाही. ते घरी आल्यानंतर कचराकुंडीत टाकतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही. सर्वांना आपल्या घरापासून ते रस्त्यापर्यंत स्वच्छतेचे व्रत हाती घेणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

फक्त फोटोसेशन नको
महापालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही सहभाग घेतला. मात्र, शिवसेनेने या मोहिमेवर टीका केली आहे. स्वच्छतेसाठी मोहीम घ्यावी लागते यातच सर्व दडले आहे. स्वच्छता मोहीम फोटोसेशन पुरती नसावी, असा टोला विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी लगावला आहे. स्वच्छता वर्षभर राखली गेली पाहिजे. ही मोहीम औटघटकेची न राहता कायमस्वरुपी कशी राहील यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. केवळ फोटोसाठी मोहीम राबवता कामा नये, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

झाडूही पळवले
महापालिकेने स्वच्छता मोहीमेसाठी २५ हजार झाडू, ४० हजार मास्क आणि ४० हजार ग्लोज वाटप केले. नागरिक व संस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला असला तरी महापालिकेने वाटप केलेले झाडू नागरिकांनी जमा न करताच घरी नेले. तर मास्क व ग्लोज विनाकामाचे असल्याने स्वच्छतेनंतर फेकून दिले.

चमकोगिरीवर भर
शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत अनेक ठिकाणी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी केली. मोहिमेतील सहभागाचे केवळ फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्यात आले. नगरसेवकांनी प्रभागात या मोहिमेचे नेतृत्व केले असले तरी अनेक ठिकाणी केवळ फोटो काढल्यानंतर मोहीम आटोपती घेण्यात आली. पंधरा दिवस मोहीम असल्याने टप्प्या-टप्प्याने सफाई करू असा दावा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियुक्ती शंभर जणांची, हजर फक्त चाळीसच...

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगावात सुरू असलेल्या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापौर ललित कोल्हे यांच्या सूचनेनुसार गुरुवारी प्रशासनाने १०० कर्मचारी यांचे पथक स्थापन केले. या सर्व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सकाळी सह वाजता शाहू महाराज रुग्णालयात बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात ४० कर्मचारीच हजर झाल्याने महापौर कोल्हे संतप्त झाले. जे कर्मचारी येत नसतील अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापालिकेने गुरुवारी साथरोग नियंत्रणासाठी १०० कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन केले. या पथकातील सर्व कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता शाहू महाराज रुग्णालयात हजेरी देण्यास सांगण्यात आले होते. सकाळी उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार या अधिकाऱ्यांसह महापौर ललित कोल्हे व नगरसेवक अनंत जोशी देखील उपस्थित होते.

सकाळी पथकाची हजेरी घेतली असता, नियुक्त केलेल्या १०० पैकी केवळ ४० कर्मचारीच हजर होते. तब्बल ६० कर्मचारी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सूचना देवूनही हजर न झाल्याने महापौर कोल्हे संतप्त झाले. त्यांनी उपायुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांना बोलावून या ६० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या, उद्या पुन्हा हजर न झाल्यास निलंबित करा, अशा सूचना दिल्या. यामुळे सतप्त उपायुक्तांनी देखील अस्थापना अधीक्षक मराठे यांची कानउघाडणी केली.

वॉर्डनिहाय २ कर्मचारी

शहरातील ७४ पैकी प्रत्येक वॉर्डात स्प्रे पंपासाठी १ कर्मचारी व साठवलेल्या पाण्यात अळीनाशके टाकण्यासाठी १ कर्मचारी असे दोन कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ किलो सोने लंपास

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्स या नामांकित सराफी पिढीतून चोरट्यांनी तब्बल पंधरा किलो सोने चोरून पोबारा केला. या घटनेमुळे पिंपळगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या धाडसी व तितक्याच रहस्यमय चोरीमुळे पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तपास, जबाब व गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पिंपळगावच्या प्रवेशद्वारावरच उडाणपुलाला लगत मुंबर्इ-आग्रा महामार्गावर अशोक शांतीलाल चोपडा यांचे अनेक वर्षांपासून श्रीनिवास ज्वेलर्स आहे. चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान अत्यंत सफार्इदारपणे घरात प्रवेश करून कोणतीही तोडफोड न करता लॉकरची चावी हस्तगत करीत तब्बल पंधरा किलो सोने लंपास केले. सकाळी पावणेआठ वाजता काही कामगार कामावर आल्यानंतर दुकानाची चावी सापडली नाही. त्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. पिंपळगाव पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीने पोलिस श्वानपथक व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सराफ दुकानात काम करणाऱ्या सर्व कामगारांची बारकार्इने व सविस्तरपणे चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सर्व कामगारांचे ठसेही घेतले. प्राथमिक अंदाजानुसार, चोर हे माहितगार आणि जवळचेच व्यक्ती असण्याची शक्यता आहे. चोरीचा घटनाक्रम लक्षात घेता अनेक शंका व प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रमुख व्यवस्थापक कर्मचाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान सराफी दुकानाच्या हिशोब पूर्ण केला. दुकानातील सर्व ऐवज सोने मौल्यवान दागिने स्वतंत्र लॉकरमध्ये ठेवले. शटर कुलुप लावून लॉकर बंद केले आणि चावी डब्यात ठेवून अशोक चोपडा यांच्या हवाली करून कामगार निघून गेले. चोपडा यांचे निवासस्थान आणि दुकानाची जागा एकाच इमारतीत आहे. निवासस्थान आणि दुकानांच्या मधल्या जागेत लॉकरची व्यवस्था आहे.
निवासस्थानातून दुकानात जाण्याचा भुलभुलय्यासारखा मार्ग आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि भक्कम शटर लॉकरची व्यवस्था आहे. मात्र, चावी हस्तगत करून भुलभुलय्याचा मार्ग यशस्वीपणे पार करून दोन वेगळ्या चावीच्या साहाय्याने लॉकर उघडून सुमारे पंधरा किलो सोने लंपास करण्यात चोरटे यशस्वी झाले.

सीसीटीव्ही यंत्रणा नष्ट
आश्चर्याची बाब म्हणजे चोरटे घरात घुसले कसे? आणि इतकी मोठी लूट केलीच कशी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणाच नष्ट केली. वायर कापत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सर्व यंत्रणाच सुद्धा लंपास केली. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या या सोने चोरीबाबत गुढ वाढले आहे. चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॉम्ब निकामी अन् दहशतवादी गजाआड

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
‘हॅलो, तुमच्या कंपनीत बॉम्ब ठेवला आहे’, असा खळबळजनक निरोप देणारा निनावी खणखणतो अन क्षणार्धात कट होतो. हा फोन कॉल गांभीर्याने घेऊन यंत्रणा सतर्क होते. काही क्षणांतच दहशतवाद विरोधी कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथकासारखी यंत्रणा एचपीसीएल कंपनीत पोहोचते. कंपनीतील कामगार आणि अधिकाऱ्यांना सुखरूप ठेवण्यात ही यंत्रणा यशस्वी ठरते.
सिन्नर एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी हे नाट्य रंगले. एचपीसीएलचे प्लांट प्रमुख निकुंज कुमार शुक्ला यांना अज्ञात व्यक्तीचा फोन येतो. ही व्यक्ती जाणीवपूर्वक त्याचे नाव सांगत नाही. परंतु, कंपनीत दोन बॉम्ब ठेवले असल्याबाबत माहिती देते. या फोनमुळे सुरुवातीला एकच गोंधळ उडतो. पोलिस व त्यांच्याशी संबंधित वेगवेगळी पथके, अग्न‌िशमन विभाग. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण केले जाते. सर्वांची एकत्रितरित्या चर्चा होते. कृती आराखडा तयार करून जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात. त्यानुसार प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होते. बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे कर्मचारी कारखान्याचे ३३ एकर परिसरात मेटल डिटेक्टर व श्वानाच्या सहाय्याने शोध घेण्यास सुरुवात करतात. त्याचवेळी एका विभागात बॉम्बचा स्फोट होऊन आग पसरण्यास सुरुवात होते. कंपनीतील आग विझविण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्व‌ित होते. फायर ब्र‌िगेडचे अधिकारी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करतात. बॉम्ब शोधण्याचे काम सुरू असतानाच तो ९० मेट्रिक टन क्षमतेच्या एलपीजी बुलेटखालील भागात असल्याचे निदर्शनास येते. अत्याधुनिक बॉम्बनाशक सामग्रीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी नेऊन या बॉम्बची विल्हेवाट लावली जाते. कंपनीतील एका जुन्या खोलीत संशयित व्यक्ती दबा धरून बसलेली असते. शीघ्र कृती दल आणि दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी सावधगिरी आणि अत्यंत चलाखीने त्या संशयित व्यक्तीस पकडतात. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू असते. ही वास्तवातील घटना नसून मॉकड्रील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते अन सर्वांचाच जीव भांड्यात पडतो. मॉकड्रील यशस्वी करण्यासाठी कंपनीचे अधिकारी सुजित रॉय, मयंक शर्मा, निकुंजकुमार, रवींद्र गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या पैशांना फुटले पाय

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विविध बँकांच्या एटीएममध्ये रोकड भरणा करण्याची जबाबदारी असलेल्या एका खासगी संस्थेच्या वाहनातील तब्बल ५६ लाख रुपयांची रोकड गायब झाली. रोकड असलेली ट्रंक गहाळ झाल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २२) दुपारी एमजीरोडवरील रेड क्रॉस सिग्नल येथे घडला. यामुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिस रात्री उशिरापर्यंत सर्वच अंगाने घटनेची चौकशी करण्यात व्यस्त होते.
शहरातील विविध बँकांच्या एटीएम मशिनमध्ये रोकड पैशांचा भरणा करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या खासगी संस्था पार पाडतात. त्यापैकी एक असलेल्या सिक्युअर एजन्सीची एक व्हॅन (एमएच १२, के. पी. ८८३४) सकाळी आपले कर्तव्य बजावण्यासाठी निघाली. वाहनात मोठी रोकड असल्याने चालकासह दोन सुरक्षारक्षक व दोन कर्मचारी सोबत होते. रविवार कारंजा परिसरातील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी सर्वांची लगभग होती. रविवार कारंजा तसेच दहीपूल या दोन ठिकाणी एटीएममध्ये रक्कम भरल्यानंतर हा ताफा रेड क्रॉस सिग्नल जवळील आयसीआयसीआय या बँकेच्या एटीएममध्ये पोहचला. येथे एटीएम मशिनमध्ये रक्कम भरण्याचे काम सुरू असतानाच सुरक्षारक्षकासह कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाहनातील तब्बल ५६ लाख रुपये असलेला ट्रंक गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की ही घटना गंभीर असून, त्यामुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी पैशांनी भरलेली बॅग गहाळ होण्याचा प्रकार उमगत नाही. तसेच संबंधितांनी खरोखर पैसे आणले होते का? हे ही तपासायला हवे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले असून, सदर कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठ पोलिस अधिकारी सातत्याने चौकशी करीत आहे. लवकरच या प्रकरणातील तथ्य समोर येण्याची शक्यता असून, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. या रक्कमेचा इन्शुरन्स असल्यानेही पोलिसांनी सावध पवित्रा घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजानन शेलारांची जामिनावर मुक्तता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते गजानन शेलार यांना जिल्हा कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. पोलिसांच्या ताब्यात बुधवारपासून असलेल्या आणि दोन्ही गुन्ह्यात जामीन मिळाल्याने शेलारांना दिलासा मिळाला. सरकारवाडा पोलिसांनी त्यांना गुरूवारी अटक केली होती.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडे हनुमान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच नगरसेवक शेलार यांना गुरूवारी (दि. २१) सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. याच दिवशी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात शेलारांना जामीन मिळाला होता. जिल्हा कोर्टासह हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने शेलार बुधवारी (दि. २०) भद्रकाली पोलिस स्टेशनला हजर झाले. भद्रकाली पाठापोठ सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जामीन मिळाल्याने शेलारांपाठीमागे लागलेले डीजे प्रकरणाचे शुक्लकाष्ट काही दिवसांसाठी संपुष्टात आल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहीम एकच; उद्‌घाटन दोनदा

0
0

म. टा. वृत्तसेवा ,सिडको

सिडको परिसरात एकाच स्वच्छता मोहिमेचे शुक्रवारी दोनवेळा उद्‌घाटन करण्यात आल्याचा अजब प्रकार घडला. पालकमंत्री गिरीश महाजन येईपर्यंत शिवसेनेचे नेते थांबण्यास तयार नव्हते. त्यांनी मोहिमेस प्रारंभ करून टाकला. पण पालकमंत्री आल्यानंतर याच मोहिमेचा पुन्हा शुभारंभ करण्यात आला. या प्रकारामुळे शिवसेना व भाजपमधील वाद पुन्हा समोर आला.

स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी पालकमंत्री महाजन सकाळी साडेआठ वाजता येणार असल्याने सर्व नगरसेवक आवर्जून उपस्थित होते. मात्र, दहा वाजून गेल्यावरही पालकमंत्री न आल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी नारळ फोडून मोहिमेस सुरुवात केली. पालकमंत्री आल्यानंतर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असला तरी यावेळी शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित नसल्याचे दिसून आले. याचवेळी प्रत्येक प्रभागात ही मोहिम असल्याचे सांगून नगरसेवक निघून गेल्याचे समजते. मात्र, एकाच मोहिमेचे दोनदा नारळ फोडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सिडकोतील मोहिमेच आमदार सीमा हिरे यांच्यासह विद्यार्थी, प्रभागातील नागरिक, विविध सामाजिक संस्थां सहभागी झाल्या. यावेळी महाजन यांनी सांगितले की, प्रशासनाने परिसराची स्वच्छता केलीच पाहिजे. पण नागरिकांनीही स्वच्छता कायम राहिल यासाठी प्रयत्न करण्याचे गरज आहे. आमदार सीमा हिरे यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करत नागरिकांना स्वच्छतेचे विषयी प्रबोधन केले. त्‍याचबरोबर संभाजी स्टेडियमच्या स्वच्छतेसाठी तसेच येथील शौचालय, पिण्याची पाण्याची व्यवस्था व वृक्षांच्या जाळ्यांसाठी शहरातील एका कंपनीकडून १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, असे हिरे यांनी सांगितले. किरण गाडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे, महेश हिरे, रत्नमाला राणे, भगवान दोंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महास्वच्छता अभियान विद्यार्थ्यांच्या भरवशावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
महास्वच्छता अभियानाच्या सातपूरमधील कार्यक्रमास विभागीय कार्यालयाबाहेर नगरसेवकांसह महापालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. अभियानास प्रारंभ झाल्यानंतर ही मंडळी गायब झाली आणि शालेय विद्यार्थ्यांनीच खऱ्या अर्थाने परिसराची स्वच्छता केली.
सातपूरला सभापती माधुरी बोलकर यांच्या उपस्थितीत अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, शिवसेना गटनेते विलास शिंदे, मनसे गटनेते सलिम शेख, आरोग्य उपसभापती योगेश शेवरे, नगरसेविका पल्लवी पाटील, अलका आहिरे, हर्षदा गायकर यांच्यासह बांधकाम, नगररचना, ड्रेनेज, भुयारी गटार, वीज, आरोग्य, विविध कर या विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नंतर मात्र ही सर्व मंडळी गायब झाली. विद्यार्थ्यांसह स्वच्छताप्रेमी नागरिकांनी अभियानात हिरीरीने सहभाग घेतला. कामगारनगर, स्वारबाबानगर, खुटवडनगर, सातपूरगाव, महादेववाडी, संतोषी मातानगर, सीपीटूल (प्रबुद्धनगर), सातपूर कॉलनी, अंबडलिंकरोड, चुंचाळे शिवार, जाधव टाउनशिप, जाधव संकुल, अशोकनगर, नीळकंठेश्वरनगर, सावरकरनगर, राज्य कर्मचारी वसाहत, विश्वासनगर, वास्तूनगर, पवार संकुल, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, ध्रुवनगर, गंगापूरगाव, सोमेश्वर मंदिर परिसर, गंगापूररोड व आनंदवली गावात स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, शिवाजीनगरच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात टाकण्यात आलेला कचरा परिसरातील नागरिकांनी स्वच्छ केला. आरोग्य विभागाने किमान आठवड्यातून एकदा तरी बंधाऱ्याच्या कडेला स्वच्छता करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

कचरा संकलन पिशव्याच कुचकामी
कचरा संकलन करण्यासाठी वाटप झालेल्या पिशव्याच कुचकामी होत्या. कचरा टाकल्यावर या पिशव्या फाटल्याचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. पर्यायी व्यवस्थाच नसल्याने संकलित केलेला कचरा रस्त्याच्या बाजूला टाकण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images