Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाजपचा अभ्यास कच्चाच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकारी सतत पायावर धोंडा पाडून घेत असल्याचा प्रत्यय पदोपदी येत असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच सर्वांसाठी ठाण्यात मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारी झालेल्या महासभेत भाजपचीच पुन्हा कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अभ्यास दौऱ्याचा काही उपयोग झाला नसल्याचे बुधवारच्या महासभेत दिसून आले.

शहरात रात्रपाळीची स्वच्छता पालिका कर्मचाऱ्यांकडून बंद करून ते आऊटसोर्सिंगने करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावापासून आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी अंतर राखले. या प्रस्तावावरून मनसे गटनेते सलिम शेख आणि सतीश कुलकर्णी हे आपसातच भिडले. रात्रपाळीच्या स्वच्छतेवरून शेख यांनी आरोप केल्यानंतर रात्रपाळीची स्वच्छता मनपा सफाई कर्मचाऱ्यामार्फत न करण्याच्या विषयाशी आपला काही संबध नसून तो महासभेचा निर्णय असल्याचे सांगत, महापौरासंह पक्षालाच तोंडघशी पाडले आहे. दरम्यान, तीन दिवसीस प्रशिक्षणात काय शिकलेत, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

सत्तेत येऊन कारभाराचा सूर सापडत नसल्याने विरोधक अल्पसंख्याक असतांनाही, ते भाजपवर भारी पडत आहेत. भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेचे गुणगान गातांना विरोधकांकडून स्वतःची खिल्ली ओढावून घेतली. भाजपच्या नगरसेवकांनी किल्ला लढवण्यासाठी भाषणे केली असली, तरी त्याच्यामुळे पक्षाला बॅकफुटवरच येण्याची वेळ आली. सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी भाजपचे गुणगान गातांना त्याचा दोष नागरिकांवर टाकून नामनिराळे होण्याचा प्रयत्न केला. तर काही नगरसेवकांनी चुकीची विधाने करून महापौरांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापौरांना सभा तहकूब करण्याची वेळ ओढावली होती. अभ्यास दौऱ्याचा नगरसेवकांना भाजपला कोणता फायदा झाला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

सुवर्णा मटाले संतापल्या

शहरात एकीकडे स्वाइन फ्लू व डेंग्यूने नागरिकांचा बळी जात असतांना भाजप नगरसेवक प्रशासनाची पाठराखण करीत असल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा मटाले संतापल्या. भाजपचे नगरसेवक उपाययोजना सूचवण्याऐवजी नगरसेवकांचेच प्रबोधन का करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. अजून बळी जाण्याची वाट बघणार का असा सवाल करत, सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.

डॉ. पाटलांचे चिमटे

डॉ. हेमलता पाटील यांनी शहरात नागरिकांचे बळी जात असतांना, सभागृहात मात्र माझे-तुझे असे केले जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. पक्षांतर केल्यावर माणसे कशी झूल पांघरतात असा टोला पाटील यांनी लगावल्याने भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने पदावरून हटवा, अशी मागणी अपक्ष नगरसेवक गुरूमीत बग्गा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोमॅटोची निर्यात पाकमध्ये सुरू करावी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
सीमा बंद करण्यात आल्याने पाकिस्तानला दररोज तब्बल दोनशे ट्रक होणारी टोमॅटो निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी टोमॅटोच्या दरात घसरण सुरूच आहे. त्यामुळे टोमॅटो निर्यातीसाठी प्रयत्न करावेत, असे साकडे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना घातले आहे.

महिनाभरापासून टोमॅटोचा हंगाम सुरू झाला आहे. सुरुवातीस ६०० ते ८०० रुपये प्रती वीस किलो क्रेटसाठी मिळणार टोमॅटो आता ७० ते ८० रुपये दरापर्यंत घसरला आहे. गेल्या आठवडाभरापासून या परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. पिंपळगाव बाजार समितीमधून दुबर्इ, बांगलादेश येथे टोमॅटोची निर्यात होते. मात्र, त्याचे प्रमाण अल्प आहे. पाकमधून भारतीय टोमॅटोला प्रंचड मागणी आहे. देशातून दररोज किमान दोनशे ट्रक टोमॅटो पाकमध्ये जातो. त्याचा शेतकरयांना ५०० ते ६०० रुपये प्रती क्रेट भाव मिळत होता. मात्र, आता निर्यात बंद असल्याने टोमॅटोला मातीमोल भाव मिळत आहे. तरी पाकमध्ये टोमॅटो निर्यात पुन्हा सुरू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव मोरे, रवींद्र मोरे, अशोक मोरे, शामराव मोरे, दिंगबर मोरे, कोंडाजी मोरे आदींनी खासदार चव्हाण यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटोची लाली गायब!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
यंदाच्या हंगामातील सुरुवातीला महिनाभरात चांगले दाम हाती टेकवत उत्पादक शेतकऱ्यांच्या गालावर लाली आणणाऱ्या ‘टोमॅटो’ने गेल्या चारपाच दिवसात शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. येवला बाजार समितीत मंगळवारीही टोमॅटो बाजारभावात मोठी घसरण होताना प्रतिक्रेट किमान ५० ते कमाल १०१ (सरासरी ८०) रुपये असा बाजारभाव मिळाला.
गेल्या काही दिवसात बाजारभावात घसरण होताना उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले असताना हक्काचे दोन अधिक पैसे हाती टेकवणाऱ्या ‘टोमॅटो’नेही तीच वाट धरली आहे. यंदाच्या हंगामातील टोमॅटो शेतशिवारातून बाहेर पडताना महिन्यातील १५ तारखेपासून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत येण्यास सुरुवात झाली. येवल्यातील सुरुवातीच्या मुहर्तालाच टोमॅटोला प्रतिक्रेट किमान ७५१ ते कमाल ८५१ (सरासरी ७५१ रुपये) असा भाव मिळाला. पुढे गेल्या महिनाभरात येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेल्या टोमॅटोने प्रतिक्रेट किमान ४०० ते कमाल ७५१ रुपये (सरासरी ६५० रुपये) असे दाम उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती टेकवले. यंदाच्या हंगामात सुरुवातीलाच चांगला बाजारभाव देणारा ‘टोमॅटो’ पुढील काळातही हंगाम संपेपावेतो बाजारभावाबाबत टिकून राहिल्यास या ना त्या कारणामुळे उभं ठाकलेलं ‘अर्थसंकट’ काही अंशी तरी दूर होण्यास मदत होईल, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, दिवसागणिक टोमॅटो बाजार खाली येत गेल्याने महिनाभरातील शेतकऱ्यांच्या गालावर आलेली लाली गुल झाली आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक खर्चाचाही मेळ बसवत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येवला बाजार समितीच्या शहरातील मुख्य आवार भाजीपाला शेडमध्ये दररोज दुपारी टोमॅटोचे लिलाव होतो. जवळपास ५ ते १० हजार क्रेटसची आवक होते. मंगळवारी साडेपाच हजारच्या आसपास टोमॅटो क्रेटची आवक झाली.

टोमॅटोच्या भावातील उतरंडी
दिवस...किमान...कमाल...सरासरी (प्रतिक्रेट)
रविवार...७० रुपये...१३१ रुपये...११५ रुपये
सोमवार...८० रुपये...१३६ रुपये...१२० रुपये
मंगळवार...५० रुपये... १०१ रुपये... ८० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सातपूर एमआयडीसीत असलेल्या प्रिसिजन कंपनीत सोमवारी (दि. १८) सिलिंडरचा स्फोट झाला होता. या प्रकरणी बुधवारी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
शान शोरूमच्या बाजूलाच असलेल्या कंपनीत मुद्दाहून स्फोट घडविण्यात आल्याचा आरोप मालकाने पोलिसांकडे केला होता. यानंतर पोलिस हवलदार आर. पी. दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला आला आहे. स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. मात्र, आग कशामुळे लागली याचा खुलासा होऊ शकला नव्हता. दरम्यान घटना घडली त्या दिवशी प्रिसीजन कंपनीतील कामगार कुठे गेले? तसेच शोरूमलगत कंपनीत जाण्याचा मार्ग ठेवण्यात आला होता. स्फोट झाल्यानंतर कामावर असलेल्या कामगारांना चारचाकी वाहनांमधून तात्काळ गायब करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. याबाबत पोलिसांना सखोल तपास करावा अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमसे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल करा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
पंचवटी प्रभाग क्रमांक दोनचे भाजप नगरसेवक यांच्या सांगण्यावरून किरण निमसे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने दोघांवर अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदूर नाका परिसरातील रहिवासी अमोल गांगुर्डे यांनी पोलिस आयुक्तांकडे केले आहे.

अमोल गांगुर्डे हे ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या पान दुकानावर बसलेले होते. तेथे मद्यप्राशन केलेल्या किरण निमसे यांनी नगरसेवक निमसे यांच्या सांगण्यावरून आमच्याविरुद्ध कितीही तक्रारी केल्या तरी फरक पडणार नाही. तुम्ही गावात आहे तरी किती? असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केल्याची गांगुर्डे यांची तक्रार आहे.
या सर्व प्रकारानंतर गांगुर्डे यांनी आडगाव पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी जातीवाचक शब्द मागे घेण्यास सांगितले. त्यास नकार दिल्याने तक्रारीची प्रत दिली नाही. त्यानंतर आडगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी परस्पर गुन्हा नोंदणी रजिस्टरवर खाडाखोड करून जातीवाचक शब्द खोडले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पत्रकाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ‘मिशन ऑल आउट’

0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
नवरात्रोत्सवासह सणासुदीच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामिण पोलिसांनी मंगळवारी जिल्ह्यात मिशन ऑल आउट मोहिम राबविली. पोलिसांचा मोठा ताफा रस्त्यावर उतरल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले. कारवाईत सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. १६३ सराईतांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ही मोहीम राबविण्यात आली. अपर अधीक्षक हर्ष पोतदार, विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह जिल्ह्यातील आठ उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ४० पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्यासह ३५० कर्मचाऱ्यांनी ऑल आउट नाकाबंदी कारवाईत सहभाग नोंदवला.
महामार्ग व मुख्य रस्त्यांवरील हॉटेल, ढाबे, लॉजेस चेक करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल व ढाबे मालकांवर मुंबई पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पोलिस ठाणे हद्दीतील मुख्य रस्ते, बाजार पेठ, सराफ बाजार, बँक व एटीएम, धार्मिक स्थळे, रेल्वे व बसस्थानक, टोल नाके अशा अनेक ठिकाणांवर सशस्त्र पेट्रोलिंग करून संशय‌ित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यात पोलिसांनी अवैध धंद्यानाही लक्ष केले. नऊ सराईतांच्या हद्दपारीची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. तालुकास्तरासह खेड्या पाड्यावरील अवैध धंदे उद्‍ध्वस्त करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यांच्यावर झाली कारवाई
मालाविरुद्धचे गुन्हे-दरोडा, जबरीचोरी, घरफाडी, चोरी यामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे व फरार असलेले आरोपी, हिस्ट्रीशिटर यांना चेक करण्यात येऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित व विनानंबरची मोटर वाहने, भरधाव वेगाने व दारू पिऊन वाहन चालविणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी, मुख्य चौकात विनाकारण हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसे यांची एसीबीकडून चौकशी; कारण गुलदस्त्यात

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची बुधवारी (दि.२०) नाशिकमध्ये लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी केली. सुमारे एक तास चाललेल्या या चौकशीबाबत एसीबीने कमालीची गुप्तता पाळली आहे. खडसे व कुटुंबीयांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात जमविलेल्या मालमत्तांबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, खडसे यांनीही या चौकशीबाबत मौन पाळले आहे.

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याचे अजूनही नाव घेत नाही. जमीनप्रकरण व बेहिशेबी मालमत्ता प्रकरण त्यांचा पिच्छा पुरवत आहे. दरम्यान, नाशिक येथील एसीबीच्या कार्यालयात खडसे बुधवारी दुपारनंतर दाखल झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सुमारे तासभर चौकशी केली. मंत्रिपदाच्या काळात खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत का?, कोठे आणि कोणत्या मालमत्तांची खरेदी केली याबाबतची विचारणा त्यांना करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एसीबीच्या नंदुरबारमधील युनिटकडे या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी या युनिटचे अधिकारी चौकशीवेळी उपस्थ‌ित नसल्याचे समजते. ही चौकशी नेमकी कशाबद्दल करण्यात आली त्यातून काय हाती लागले याबाबत माहिती देण्यास एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तेजश्री’ने दिल‌े पाच जणांना जीवदान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी , नाशिक

आपल्या वाट्याचे दुःख विसरून इतरांचे आयुष्य फुलविण्याकरिता स्त्री शक्तीचा महिमा नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच पुन्हा एकदा अनुभवास आला आहे. ब्रेनडेड असलेली सिन्नर तालुक्यातील शिवडे गावातील शेतकऱ्याच्या ११ वर्षीय कन्येने पाच रुग्णांना अवयवदान करून जीवदान दिले आहे. मेंदुत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला पुरवठा कमी झाल्यामुळे तिचे ब्रेनडेड झाल्यानंतर पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

तेजश्री रमेश शेळके असे त्या मुलीचे नाव असून, शिवडेपासून जवळ असलेल्या पांढूर्ली येथील जनता विद्यालयात सहावीत शिकत होती. १५ सप्टेंबर रोजी शाळेच्या मैदानावर फुटबॉलचा सामना पाहत असताना त‌लिा भोवळ आली. उपचारासाठी तिला नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्व तपासण्यांनंतर त‌लिा ब्रेनडेड सांगण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तिच्या नातेवाईकांचे सांत्वन करत त्यांना अवयवदानाची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला ऋषीकेश हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथे सर्व चाचण्यांनंतर झेडटीसीसीच्या नियमाप्रमाणे वैद्यकीय पथकान तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

अशी होती डॉक्टरांची टीम
डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांबरोबरच ऋषीकेश हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब मोरे, समन्वयक डॉ. संजय रकीबे व डॉ. प्रीतम अहिरराव, आयसीयू युनिट तज्ज्ञ डॉ. किशोर बाफना, ओटी तंत्रज्ज्ञ चंद्रकांत हुशार, भूलतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध चिमोटे यांनी वैद्यकीय कौशल्य वापरले.

समृद्धीमुळे शिवडे चर्चेत
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहीत प्रश्नावरून शिवडे गाव चर्चेत होते. त्याच गावाच्या शेतऱ्याच्या मुलीने पाच रुग्णांला अवयवदान देऊन ‘समृद्ध’ केले.

स्त्री शक्तीची प्रचिती
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच शेतकरी कन्येने पाच जणांना जीवदान दिल्याने ही बाब सर्वत्र कौतुकाची ठरली आहे. शेतकरी कुटुंबातील कन्येचे मौल्यवान अवयव गरजूंना लाभल्याने त्यांना नवे जीवन लाभले आहे. स्त्री शक्तीचा हा आविष्कारच असल्याची भावना जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून व्यक्त होत
आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक ऑक्टोबरपासून शिर्डीत समाधी शताब्दी

0
0

राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ; मुख्यमंत्रीही येणार

म. टा. प्रतिनिधी, शिर्डी
सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ येत्या १ ऑक्टोबरला शिर्डीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजवंदन करून केला जाणार आहे. या वेळी राज्यपाल, मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. वर्षभर चालणारा हा शताब्दी सोहळा शिर्डीसह संपूर्ण देश-विदेशात सुरू ठेवण्याचे नियोजन साई संस्थानने केले आहे.

साईबाबा कोणत्या जातीचे, गावातले आणि त्यांचा जन्म कधीचा याचा थांगपत्ता शेवटपर्यंत कोणालाच लागला नसला तरी दीर्घकाळ शिर्डीत वास्तव्य केल्यावर १५ ऑक्टोबर १९१८ रोजी ‘विजया दशमी’च्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली. त्याला पुढील वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा शताब्दी सोहळा वर्षभर सुरू राहणार आहे. याविषयी मटाशी बोलताना साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे म्हणाले, शिर्डीसह देश–विदेशात साई शताब्दी महोत्सव भरविला जाणार आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधन आणि साई पादुकांचे दर्शन या पाच प्रकारच्या कार्यक्रमाने हा महोत्सव साजरा होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शिर्डीच्या साई मंदिर प्रांगणात ध्वजवंदन करून प्रारंभ करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. वर्षभर हा सोहळा कसा, कोणत्या शहरात, कोणत्या देशात किती तारखेला सुरू असेल याचे वेळापत्रक असलेले कॅलेंडर तयार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा शनिवारपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि कै. के एन. डी. मंडळ आणि क्रीडा साधना यांच्या सहकार्याने दि. २३ आणि २४ सप्टेंबर रोजी ५३ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धामध्ये १२ वर्षातील मुले आणि मुली तसेच १४ वर्षातील मुले आणि मुली अशा दोन गटांचा समावेश असणार आहे. या कॅरम स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या अंबड पोलिस स्टेशन जवळील महेश भवन, सिडको, नवीन नाशिक याठिकाणी करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सुमारे २५० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस आणि छत्रपती पुरस्कार प्राप्त अरुण केदार, पंच प्रमुख परमिंदरसिंग आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाशिकमध्ये होणाऱ्या या ५३व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूच्या कामगिरीच्या आधारे त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात येणार आहे आणि हे निवड झालेले खेळाडू पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील अशी माहिती नाशिक जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव अशोक कचरे यांनी दिली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या संघासाठी या दोन्ही गटाच्या मुलांच्या आणि मुलींच्या जिल्हा संघाची निवड करण्यासाठी दि. १५ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या दोन्ही गटांच्या मुलांची आणि मुलींची नाशिक जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. हे निवड झालेले खेळाडू दि. २३ आणि २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक प्रशांत भाबड यांनी दिली.

नाशिक जिल्हा संघातील खेळाडूंची नावे

१२ वर्षे मुले १) अर्जुन भवर २) सिद्धेश पाटील

१२ वर्षे मुली १) तनिष्का सोनार २) संयुक्ता सावंत

१४ वर्षे मुले १) रोशन खैरनार २) वैभव शिरसाठ ३) अनिकेत तुरे ४) दर्शन सानप ५) ओंकार धात्रक ६) चेतन क्षीरसागर

१४ वर्षे मुली १) उमावती सोनावणे २) प्रज्ञा सापनर ३) वैष्णवी बेंडखळे ४) साक्षी मानकर ५) अक्षरा जाधव ६) धनश्री क्षीरसागर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीने पालिकेचं चांगभलं!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम यंदा दिसून येत असून, वसुलीत गेल्या वर्षाच्या तुलनेत चौदा कोटी ५४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बड्या थकबाकीदारांकडून १५ कोटींची वसुली झाली आहे, तर पाणीपट्टीतही चार कोटींची वाढ झाली आहे. बड्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने सुरू केलेले नोटीससत्र पालिकेला चांगलेच पावले आहे.

एलबीटी हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बंद झाल्याने पालिकेने आता आपल्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जीएसटीमध्ये तर शासनाने अनुदान पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीवर अधिक लक्ष देत थेट वसुलीची धडक मोहीम यंदा राबवली जात आहे. घरपट्टीचे उत्पन्न सक्षम करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन कर भरणा व देयके हाती पडण्यापूर्वीच कर अदा करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सवलत योजना सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत चांगली वाढ झाली आहे. वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांना नोट‌िसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत पालिकेची ३९ कोटी २७ लाखांची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. यंदा एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ५३ कोटी ८१ लाखांची वसुली झाली आहे. त्यात १५ कोटी ७२ लाख रुपये हे गेल्या वर्षीच्या थकबाकीचे वसूल झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत चौदा कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल महापालिकेला अधिक मिळाला आहे.

८० जणांना हजार नोटिसा

घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीतही घसघशीत वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालिकेने १५ हजार बड्या थकबाकीदारांना नोट‌िसा बजावल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वी आणखी ६५ हजार थकबाकीदारांना पालिकेने रडारवर घेत नोट‌िसा बजावल्या. गेल्या वर्षी एक एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान पाणीपट्टी वसुली ८ कोटी ६४ लाख रुपये इतकी झाली होती. यंदा मात्र त्यात चांगली वाढ झाली आहे. एप्र‌िल ते सप्टेंबरदरम्यान १३ कोटी ५६ लाखांची वसुली झाली आहे. यात पाच कोटींची वाढ नोंदवली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल गुरुवारपासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आलेले असताना व्यापारी आपले प्रश्न प्रकर्षाने मांडतील असे वाटत होते. मात्र ही चर्चा एकतर्फी झाली.
शुक्ल यांनी सरकारचे धोरण व करयोग्य उत्पन्न असूनही कर भरला जात नसल्यावरच जास्त भर देऊन करभराचा संदेश दिला. यावेळी व्यापाऱ्यांना फारसे बोलताही आले नाही. गडकरी चौक येथे प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सीए टॅक्स प्रॅक्टिशर्नबरोबर त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. यात व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा विषयसुद्धा प्रकर्षाने मांडला गेला नाही.पण, अनावश्यक त्रास देऊ नका अशी भूमिका मात्र चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी मांडली. तसेच ऑनलाईन पद्धतीबाबतही त्यांनी याअगोदर पेपरलेस काम काही कार्यालयात सुरु झाले आहे. तेथे मात्र प्रत्यक्ष भेटल्यानंतर काम केले जाते. असे प्राप्तिकरच्या बाबतीत घडू नये, असेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीटी इंज‌िनीअरिंगला नॅकची ‘अ’ श्रेणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडेशन कौन्सिल यांच्या वतीने मविप्रच्या अॅड. बाबुराव ठाकरे इंज‌िनीअरिंग कॉलेजला ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे. या यशाबद्दल कॉलेजमध्ये समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघो अहिरे , चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, प्रल्हाद गडाख, रायभान काळे, डॉ. प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, उत्तमबाबा भालेराव, अशोक पवार, सचिन पिंगळे, सेवक सदस्य नानासाहेब दाते, गुलाब भामरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कैलास होळकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ढिकले यांनी संस्थेतील गुणवत्ताधारक शिक्षकांमुळे संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत असून, भविष्यकाळात संस्था यशाच्या शिखरापर्यंत पोहचेल, असा विश्वास व्यक्त केला.

संचालक डॉ. प्रशांत देवरे यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची गरज विषद करतांना महाविद्यालय त्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. सचिन पिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कॉलेजला नॅशनल अॅक्रीडीटेशन अॅण्ड अॅसेसमेंट कौन्सिल (बंगळूरू) यांच्याकडून मिळालेले मानपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आले. यावेळी नॅक समन्वयक व्ही. सी. शेवाळे, सहसमन्वयक बी. ए. न. शिंदे व नॅक कमिटीतील सदस्यांचा सन्मान

करण्यात आला. कॉलेजसोबत करार केलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही अधिकारी होणारच’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २३ जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे हसू फुलले होते. ‘आम्ही शिकणार, मोठ्ठे अधिकारी होणार’, असा निश्चय करत या विद्यार्थ्यांनी रोटरीच्या उपक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रोटरी क्लबने ‘टीच’ उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण, ई-लर्निंग, प्रौढ शिक्षण, मुलांचा शैक्षणिक विकास आणि आनंदी शाळा असा पाच कलमी कार्यक्रम आखला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून रोटरीने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मदतीचा हात पुढे केला आहे. इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी, पत्राचीवाडी, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी, उभाडेवाडी, उंबरकोन, उघडेवाडी, खैरगाव, पाटीलवाडी, पिंपळगाव मोर, आघानवाडी, आडवाण यांसह २३ जिल्हा परिषद शाळांत इयत्ता चौथी आणि पाचवीच्या ११०० गरजू विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश, शूज, सॉक्स, पेन्सिल बॉक्स, कंपास पेटी, पाण्याची बाटली, पाच वह्या अशा वस्तूंचा समावेश असलेल्या दर्जेदार किटचे वाटप रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

विविध शालेय वस्तू मिळालेल्या पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. असंख्य शाळांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्याने वातावरणात रंगत आली. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दलही ओढ निर्माण झाली. हे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचतात हे पाहून रोटरी पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

मदतीचे आवाहन

सामाजिक उपक्रमांतून समाजाचा विकास साधण्याच्या टीच या उपक्रमाला शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता आहे. या कार्यात गरजूंना मदतीचा हात देवू इच्छिणाऱ्या दानशुरांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक, दूरध्वनी २३१११२३ यांचेशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर, कोचिंग क्लासेसवर लक्ष

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आता डॉक्टर व कोचिंग क्लाससह बिल्डर व सराफ असणार असल्याचे संकेत पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिले.

करयोग्य उत्पन्न असूनही अनेक जण आयकर भरत नसल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. अशा करदात्यांनी रिटर्न फाईल करुन कर भरावा. आमच्याकडे १० प्रकारची माहिती असून त्यामुळे करयोग्य उत्पन्न असूनही कर न भरल्यास दंडात्मक कारवाई आम्ही करू, असाही इशारा शुक्ल यांनी दिला.

गडकरी चौकातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात शुक्ल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमची डॉक्टरांवर करडी नजर असून ते रोखीने पैसे घेतात आणि खरे उत्पन्न दाखवत नाही. त्यांनी वास्तव उत्पन्नावर कर भरावा. गेल्या काही दिवसात अनेक सर्व्हेमध्ये आम्हाला हे आढळून आले आहे. त्याचबरोबर कोचिंग क्लास, ज्वेलर्स व बिल्डरही यांनीही आपले उत्पन्न योग्य दाखवून आयकर भरावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पुणे विभागात मुंबई व विदर्भ वगळून राज्यातील सर्व जिल्हे असल्याचे सांगून कामगिरीचा आढावा घेतला. गेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर वसुलीचे ४२ हजार २०० कोटींचे लक्ष्य होते; पण अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी करून ही वसुली ४२ हजार २८० कोटी केली. कर वसूलीमध्ये देशात पुणे विभाग ग्रास ग्रोथमध्ये दुसरा तर नेट ग्रोथमध्ये दुसरा आहे. सर्वांनी वेळेवर कर भरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही. करपद्धती पारदर्शक व सोपी केली आहे. आता सर्व ऑनलाइनही झाले आहे येत्या काही दिवसात स्कुटणी सुद्धा ऑनलाइन होईल.

४५ सर्व्हेत १०५ कोटी
पुणे विभागाने केलेल्या ४५ सर्व्हेत १०५ कोटी रुपयाचे उत्पन्न घोषित झाले असून त्यात ५० कोटी नाशिकचे असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त शुक्ल यांनी दिली. आयकर अधिकाऱ्यांनी चांगली कमागिरी केल्यानेच हे शक्य झाले असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना शाबासकी दिली.

कांदा व्यापाऱ्यांकडून धागेदोरे
जिल्ह्यातील सात कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने २४ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हवाला व दुबई कनेक्शनची चर्चा आहे . या मुद्यावर ‌पत्रकारांनी विचारले असता शुक्ल यांना अनेक धागेदोरे मिळाले असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

रिटर्न भरण्यासाठी टीम
करयोग्य उत्पन्न असणाऱ्या आयकर भरावा यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा एक सदस्य, सीए व टॅक्स प्रॅक्टिशनर्सचा एक सदस्य व प्राप्तिकर विभागाचे अधिकारी यांची एक टीम तयार करण्यात येईल. त्यानंतर ते प्रत्यक्ष कर भरावे यासाठी भेटी घेऊन प्रचार करतील व कार्यशाळाही घेतील, अशी माहितीही शुक्ला यांनी दिली. तसेच कर भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी व काही तक्रारी असल्यास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दुपारी ३ ते ४ या वेळेस भेटतील. यात ते सर्व अडचणी समजून घेतील, असेही ते म्हणाले.

सज्जन को सहारा!
‘सज्जन को सहारा.. दुर्जन को डर!’ असे सांगत आयुक्त ए. सी. शुक्ल यांनी करयोग्य उत्पन्न असणाऱ्या व खरे उत्पन्न लपवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. कर भरणाऱ्यांना मुक्त वाटावे व न भरणाऱ्याला भीती वाटावी असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉपिंग फ्लाइटची ओझरला सेवा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत ओझरला हॉपिंग फ्लाईटची सेवा मिळण्याची शक्यता आहे. जेटएअरवेज आणि एअरअलायन्स या दोन कंपन्या अहमदाबाद-नाशिक-बेंगळुरू सेवेसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या उडाण या योजने अंतर्गत या अगोदर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना (आरसीएस) यामध्ये महाराष्ट्रातील दहा एअरपोर्ट याअगोदर आले होते. त्यामध्ये एअर डेक्कन या विमान कंपनीला नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे हे मार्ग मिळाले होते आणि हि विमानसेवा ३० सप्टेंबरपर्यंत सुरु करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, मुंबईला तिने स्लॉट न मिळाल्या कारणाने सदरची विमान सेवा हि लांबणीवर पडली आहे परंतु, ‘आरसीएस’च्या नियमाप्रमाणे ज्या एअरपोर्टला एका आठवड्याला १४ लँडिंग व टेकोफ झाल्यास तो एअरपोर्ट ‘आरसीएस’ योजनेच्या बाहेर निघणार होता. त्यानुसार नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे यामुळे नाशिक एअरपोर्ट ‘आरसीएस’च्या यादीतून निघून गेला होता. परंतु, खासदार गोडसे यांनी संयुक्त सचिव उषा पाधी या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपण ही विमान सेवा सुरू झाली असा अंदाज ठेऊन नाशिक ‘आरसीएस’च्या यादीतून वगळल. मात्र, अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही आणि म्हणून जो प्रयत्न अखंडित सेवा सुरू होत नाही तोपर्यंत नाशिक वगळल्या जाऊ नये. आणि म्हणून खासदार गोडसे यांनी मांडलेल्या विषयाची दखल घेऊन केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने त्यांची सूचना मान्य केली. त्यानुसार नाशिकचा ‘आरसीएस’च्या दुसऱ्या यादीमध्ये समावेश झाला असून त्यामध्ये जेटएअरवेज आणि एअरअलायन्स या दोन कंपन्या अहमदाबाद-नाशिक-बेंगळुरू या मार्गाकरिता प्रयत्न करत होत्या त्यांनाही निश्चितच बिडिंगसाठी संधी मिळणार आहे. पुन्हा काही प्रमाणामध्ये आपल्या विमानसेवेच्या आशा पल्लवित झालेल्या असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरंभ’कडून कॅन्सर रुग्णांना नवी उमेद

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

कॅन्सरसारखा आजार जेव्हा आयुष्यात अकस्मात समोर येतो तेंव्हा उपचारांबरोबर मनाला उभारी आणि धीर देणारी मदत मिळाली तर? तर, या आजाराला, उपचारांना आणि त्याच्या दुष्परिणामांना तोंड देणे थोडे सुसह्य होऊ शकते. हीच भावना अनुभवली पहिल्याच कॅन्सर जीवनशैली कार्यशाळेत सहभागी झालेल्या तेरा रुग्णांनी. ‘आरंभ’ ह्या गटातर्फे आयोजित ही दोन दिवसाची कार्यशाळा शनिवार आणि रविवारी डॉ. सुळे यांच्या क्लिनिकच्या परिसरात पार पडली. कॅन्सर रुग्णांना उपचारादरम्यान येणारे वैद्यकीय कक्षेबाहेरचे प्रश्न आणि त्या काळातील जीवनशैली हे मुद्दे डोळ्यापुढे ठेवून ह्या कार्यशाळेची आखणी करण्यात आली होती. या कार्यशाळेत रुग्णांचे शारीरिक आणि त्यांना नाऊमेद करणारे मानसिक अशा दोन पातळीवरील प्रश्नांबाबत सत्र घेण्यात आली. तीन वेळा कॅन्सरच्या अनुभवातून गेलेल्या वंदना अत्रे ह्यांनी हा अनुभव कसा अंतर्बाह्य बदलून टाकणारा होऊ शकतो हे सांग‌ितले. योग्य तऱ्हेने या आजाराकडे बघितले तर कॅन्सर हा आयुष्य आरपार बदलून टाकणारा मित्र ठरू शकतो, असे अत्रे म्हणाल्या. ‘आरंभ’च्या डॉ. नीरजा कणीकर यांनी दोन दिवसाच्या या कार्यशाळेचे सूत्र गुंफण्याचे काम केले. या प्रयत्नांतून एक सपोर्ट ग्रुप उभा राहावा, अशी अपेक्षा सगळ्या सहभागींनी व्यक्त केली. अशाच प्रकारची दुसरी कार्यशाळा ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी 'आरंभ'च्या वंदना किंवा डॉ. नीरजा कणीकर यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया महिला पोलिसास कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कामगारांसाठी बांधलेल्या चाळीत अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची धमकी देत दूध व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या तोतया महिला पोलिसास कोर्टाने गुरूवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
प्रतिभा राजेंद्र भुजबळ (३२, रा. सिद्धेश्वर चौक, सिडको) असे कोठडी सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. अमृतधाम परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे संतोष कारभारी खैरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. दूध व्यावसायिक खैरे सोमवारी आपल्या दूध डेअरीवर असतांना एमएच ०२ सीव्ही ६८९४ या वाहनामधून प्रतिभासह तिचे चार साथिदार आले. खोली आहे का अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर तिथे भाडेकरू ठेवलेले असल्याचे खैरे यांनी सांगितले. यावर महिलेसह तिच्या साथीदारांनी मोबाइलवर परिसरातील चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. खैरे यांनी विचारपूस केली असता महिलेने आपण मुंबई पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याची बतावणी केली. यानंतर खैरे तेथून निघून गेले. मात्र, संशयित महिलेसह तिच्या साथीदारांनी तेथेच तळ ठोकला. तसेच खैरे यांचा मोबाइल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधून भेटायला बोलावले. संशयित महिलेने खैरे यांच्यावर घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करीत त्यांच्याकडे सहा लाखांची मागणी केली. मात्र, खैरे यांनी पंचवटी पोलिस स्टेशनशी संपर्क केल्याने घटनेची वाच्यता झाली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी महिलेस अटक केली आहे. पोलिस तिच्या फरार साथिदारांचा शोध घेत आहेत. दम्यान, या महिलेने पत्रकार असल्याचे भासवूनही यापूर्वी अनेकांना गंडा घातल्याचे पुढे आले असून, कोर्टाने तिला सोमवारपर्यंत (दि. २५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक अश्विनी मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू दुकानांवर गावकऱ्यांचा हल्लाबोल

0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी
वेळोवेळी घोटी पोलिसांकडे कारवाईची मागणी करूनही अवैध गावठी दारूधंदे सुरुच असल्याने इगतपुरी तालुक्यातील वैतरणा जवळील धारगाव गावातील संतप्त ग्रामस्थांनी दारु धंद्याविरोधात हल्लाबोल केला. यावेळी अवैध दारूविक्रेत्यांवर संतप्त महिला धावून गेल्याने काहींनी पोबारा केला तर काहींनी धंदे बंद करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. धारगाव परिसरात दुपारी काही वेळ तणावाचे वातावरण होते.
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा व धारगाव हा धरण परिसर म्हणजे मुंबई, नाशिक येथील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. येथे पर्यटकांची वर्दळ असून यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळत आहे. मात्र, त्याचबरोबर अवैध गावठी दारूधंदेही येथे सर्रास सुरू असून याचा ग्रामस्थांना मोठा त्रास आहे. व्यसनाधिनतेमुळे गावातील अनेकांचा अकाली मृत्यू झाला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पती मारझोड करतात, पैसे हिसकावुन घेतात, घरातील वस्तु विकुन दारू पितात, अशा अनेक महिलांनी यावेळी तक्रारी केल्या. धारगाव परिसरातील आठ छोटछोट्या वाड्यांवरील शेकडो ग्रामस्थांनी हल्लाबोल केला. काही धंदेचालकांनी घराला कुलुप लावून पोबारा केला तर काहिंनी घरातील महिलानां पुढे करत बचाव केला. दरम्यान, संतप्त महिलांचा रुद्रावतार पाहून यापुढे दारूविक्री बंद करू, असे आश्वासन अवैध दारू विक्रेत्यांनी दिले.
मोर्चाचे नेतृत्व सरपंच वंदना पुंजारा, उपसरपंच सुनंदा खातळे, गोविंद खातळे, सोमनाथ नव्हाटे, गोविंद पुंजारा, बाळू खातळे, दगडू बोराडे, विनायक खातळे, योगेश खातळे, कान्हव, अरुण ठाकूर आदिंनी केले. याप्रसंगी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईची चौकशी गुलदस्त्यात?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जूनमध्ये पावसाळापूर्व कामातील भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी नालेसफाईच्या कामांच्या चौकशीची घोषणा केली होती. परंतु, ही घोषणा होऊन तीन महिने लोटले तरी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शिवसेना नगरसेवक शामकुमार साबळे यांनी बुधवारी महासभेत प्रश्न विचारल्यावर चौकशी सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले. चौकशीला फाटा फोडण्याचे प्रयत्न सुरू असून ठेकेदारांसह अधिकाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शहरात १४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहराची दैना झाली होती. गोदावरी नदीत पाणी नसताना शहरातील गल्लीबोळात पुराचे लोट आले. पावसामुळे नाशिककरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा झालेल्या पावसाने शहराची धूळधाण उडाली होती. महापालिकेकडून नालेसफाईचे काम झाले नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांसह नगरसेवकांनी केला होता. या प्रश्नी १९ जूनच्या महासभेत विरोधकांनी लक्षवेधी उपस्थित करण्यात आला. वाद निर्माण झाल्याने महापौरांनी सभाच गुंडाळली होती. त्यामुळे प्रशासनाला पाठीशी घातल्याचा आरोप होऊन महापौरच संशयाच्या घेऱ्यात आल्या होत्या.
विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर महापौर रंजना भानसी यांनी अखेर २९ जून रोजी नालेसफाईत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, असे पत्र आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त दोन यांच्याकडे सोपवली. परंतु आता आदेशाला तीन महिने लोटले तरी, चौकशी पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे पावसाळा संपत आला तरी चौकशी पुढे सरकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेच्या शामकुमार साबळे यांनी नगरसचिवांना पत्र लिहून याची माहिती मागवली असता, चौकशीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असून लवकरच अहवाल प्राप्त होईल असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्याच भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून ठेकेदार व अधिकाऱ्यांना अभय देण्यासाठीच चौकशी लांबवली जात असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.

चौकशीचा केवळ फार्स
नालेसफाईतील कामांच्या चौकशीबाबत सत्ताधाऱ्यांनी सुरूवातीपासूनच टाळाटाळ केली होती. महापौरांनी चौकशीचे पत्र २९ जून रोजी तयार केले असले तरी प्रत्यक्षात त्यानंतर १५ दिवसांनी आयुक्तांकडे पोहचले. त्यावरून सत्ताधाऱ्यांनाच चौकशीत रस नसल्याचे समोर आले. परंतु, विरोधकांच्या दबावानंतर चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तर केवळ फार्स ठरवला जात आहे. तीन महिने लोटले तरी कागदोपत्रांचीच पडताळणी केली जात असून पावसाळा संपला तरी नालेसफाईच्या चौकशीचा अहवाल येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images