Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्वच्छता मोहीमेसाठी सज्ज व्हा!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून शहरात शुक्रवारी २२ सप्टेंबरला ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी यंत्रणेने सज्ज व्हावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या विशेष मोहीमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. बैठकीला आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपककुमार मीना, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, शशिकांत मंगरुळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की २२ सप्टेंबर रोजी शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यासाठी विभागवार नियोजन करण्यात आले असून डेंगूसारख्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वच्छता उपक्रमाला चालना देणे आणि त्यात जनतेचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. आयुक्त डॉ. कृष्णा यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, की शहरात अधिक कचरा असणारे ४४८ ठिकाणे असून मोहिमेत तेथील स्वच्छतेवर भर असेल. मोहीम यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन सुरू असून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ७० पेक्षा अधिक संस्था या उपक्रमात सहभागी होतील. साडेतीन हजार महापालिका कर्मचारी आणि २०० घंटागाड्यांची मोहिमेत मदत होणार आहे.

त्र्यंबकमधून आज प्रारंभ
जिल्ह्यात सोमवार (दि. १८) जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्‍घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ‌त्र्यंबकेश्वर येथे करण्यात येणार आहे. अस्वच्छता असलेल्या त्र्यंबक शहरातील सात ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नगरपालिका, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, गजानन महाराज ट्रस्ट, आनंद मठ, सपकाळ कॉलेज, ब्रम्हा व्हॅली या महाविद्यालयाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. दुपारी एकपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाव कोसळल्याने टोमॅटो फेकला रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
भाव अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत आपला असंतोष व्यक्त केला. कांद्याचे वांधे आणि टोमॅटोची बिकट अवस्था अशी शेतकऱ्यांची कठीण स्थिती दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

सफरचंदापेक्षा महाग झालेला टोमॅटो एक महिन्याच्या आत अत्यल्प दराने विक्री होत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी आहे. सध्या टोमॅटोचे बाजारभाव मोठ्या बाजार समितीत सरासरी प्रती क्रेट ९० ते १४० रुपये असे आहेत. तर काही बाजार समित्यांमध्ये निव्वळ २० रुपयांपासून ४० ते ५० रुपये क्रेटचे भाव मिळत आहेत. यामुळे औषधांचा खर्च, मजुरी व वाहतूकखर्च वजा करता पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला आहे. यंदा चांगला भाव मिळाल्याने टोमॅटोने आशा पल्लवित केल्याने शेतकऱ्यांनी टमाटयावर लक्ष केंद्रीत केले होते. महागडे औषधे, पावडरी, स्प्रे, मजुरी, वाहतूक यामुळे हा भाव परवडत नसल्याचे भावड्याचे युवा शेतकरी अशोक मोरे यांनी सांगितले. परंतु, आवक वाढल्याने व पावसाळी वातावरणामुळे ओला माल निर्यात करण्यास मर्यादा पडत आहे. परिणामी टोमॅटोचे भाव पडले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एकंदरीत यावर्षी टोमॅटोचा पुन्हा लाल चिखल होणार तर नाही ना अशी धास्ती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांवर भारनियमनाचा भार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्याने राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजनकरण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ऐन खरिप हंगामातच कृषिपंपांवर दोन तासांच्या आतिरिक्त वीज भारनियमनाचा भार टाकण्यात आल्याने शेतकरी वर्गाला महावितरणने पुन्हा शॉक दिला आहे.

राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व रात्री आठ तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री दहापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा आठ तास व रात्री सहा तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीजखरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कोळसा उपलब्ध करण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्न करीत आहेत.

कृषिला दुय्यम स्थान

राज्यात तांत्रिक अडचणीमुळे विजेच्या उपलब्धतेत कमतरता निर्माण होते त्या वेळी कृषी वीज ग्राहकांवर भारनियमनाचा भार टाकण्यास प्राधान्य दिले जाते. या प्रकारामुळे सरकार व महावितरण कंपनी कृषीला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीमुळे उत्पादनात घट आल्याने वीज उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून महावितरणने तात्पुरते भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनाचा भार शेतकऱ्यांवरच टाकण्यात आला आहे. पूर्वी १८ तास दोन टप्प्यात चक्राकार पद्धतीने अखंडित वीजपुरवठा कृषी ग्राहकांना केला जात असे. आता पुरेशी उपलब्धता होईपर्यंत दोन टप्प्यात आठ-आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महोत्सवात १०० हून अधिक रानभाज्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या सौजन्याने आयोजित रानभाजी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल १०० हून अधिक भाज्यांच्या या प्रदर्शनात होत्या.
जयंतराव कुलकर्णी यांनी रानभाज्या महोत्सवाचे उद्‍घाटन केले. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत नाशिकरांनी भाज्या खरेदीसह त्या बघण्यासाठी गर्दी केली. महोत्सवाचे संयोजन डॉ. विक्रांत मुंगी, रोहित वाघ, चैतन्य गायधनी यांनी केले. यावेळी रवींद्र बेडेकर, राजेंद्र वाघ, जयंत गायधनी यांची उपस्थिती होती.
प्रदर्शनात मांडलेल्या भाज्या, त्यांची चव, त्या कशा बनवाव्या यांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी उपस्थित सर्वांनी रानभाज्यांचे महत्त्व जाणून घेतले. संयोजकांनीही पारंपरिक भाज्यांव्यतिरिक्त सकस पौष्टिक व औषधी रानभाज्यांची ओळख करून दिली. रुचीपालट तसेच सुदृढ आरोग्यासाठी या भाज्यांचा उपयोग केला जातो. भाज्या तयार करण्याच्या पद्धतीही येथे सांगण्यात आल्या.

नाशिककरांसाठी अनोखी पर्वणी
प्रदूषणमुक्त अस्सल नैसर्गिक वातावरणात तयार झालेल्या आणि शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या या रानभाज्या आहेत. डोंगर कपाऱ्यातून, जंगलातून शोधून आणलेल्या रानभाज्यांचा महोत्सव नाशिककरांसाठी अनोखा ठरला. रानभाजी महोत्सवात रानातील शरीरास उपयुक्त असणाऱ्या खरशेंगा, करडू, नाळभाजी, कोहरेल पाला, बाफलीचा पाला, आघाडा, आकर घोडा यासारख्या विविध औषधोपचारी असणाऱ्या भाज्यांबद्दलही अनेकांनी माहिती करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातील तब्बल ७२ हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी विदेशात खरेदी करून लांबवले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरालाल रामदास जाधव (६०, रा. कल्पतरूनगर, अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, अॅक्सिस बँकेत जाधव यांचे खाते आहे. अज्ञात संशयिताने १३ व १४ सप्टेंबर दरम्यान जाधव यांच्या बँक खात्यासह डेबिट कार्डची माहिती मिळवली. त्या आधारे जाधव यांच्या बँक खात्यातील ७२ हजार रुपयांचा विदेशी व्यवहार केला. खात्यातील पैस लंपास झाल्याची बाब लक्षात येताच जाधव यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

भरदिवसा घरफोडी
आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरात भरदिवसा घरफोडी करीत चोरट्याने ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी संदीप सखाराम भामरे (३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. गुरुवारी (दि. १४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास चोरट्याने भामरे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरातील सुमारे अडीच तोळे वजनाचे आणि ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सदाफुले करीत आहेत.

आयपॅड, लॅपटॉप लंपास
महात्मानगर परिसरातील पार्क ऍव्हेन्यू इमारतीतील घर फोडून चोरट्याने आयपॅड, मोबाइल, लॅपटॉप असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. किशोर तुकाराम नंदेश्‍वर (२९, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत नंदेश्वर यांच्या घरी कोणी नव्हते. याचा फायदा घेत चोरट्याने घरफोडी करून घरातील दोन मोबाइल, डेल कंपनीचा लॅपटॉप, आयपॅड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार उगले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगावात फसला चेन स्नॅचिंगचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
आडगाव शिवारात दुकानाममध्ये बिस्कीटचा पुडा खरेदी करण्याचा बहाणा करून चोरट्याने दुकानातील महिलेचेच मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. पण, महिलेने प्रसंगावधान साधत विरोध केला तसेच आजूबाजूच्या लोकांना आवाज दिल्याने चोरट्याने पळ काढला.
रंजना लोहकरे असे चोरट्याला विरोध करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांचे बळीराज जलकुंभसमोरील स्वप्निल शॉपी नावाचे दुकान आहे. तेथे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज चोरट्याने सुमारे १५ मिनिटे टाइमपास केला होता. त्यानंतर त्याने लोहकरे यांचे मंगळसूत्र पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. लोहकरे यांनी आडगाव पोलिसांना तात्काळ संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक काकाराव पाटील, हवालदार भगवान आडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वायरलेस वरून मेसेज देऊन चोराचे वर्णन दिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा सर्व प्रकार कैद झाला आहे. काहीही चोरीस न गेल्याने पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. दरम्यान, चेनस्नॅचिंगचे स‌त्र सुरूच असून नागरिकांनी विशेषत: महिलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अखेर गुन्हा दाखल
शहरात एकाच दिवशी झालेल्या सहा चेन स्नॅचिंगच्या घटनेपैकी एका घटनेची पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अखेर नोंद करण्यात आली. पंचवटी परिसरातील टकलेनगर परिसरात हा प्रकार गुरूवारी (दि. १४) सकाळी घडला होता. शोभा अरुण चंद्रात्रे (६०, रा. टकलेनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराजवळ मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शोभा यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किंमतीचे आणि चार तोळे वजनाची पोत ओरबाडून चोरून नेली होती. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक एम. एम. शेख करीत आहेत. दरम्यान, एकाच दिवशी शहरात सहा चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधणार अखेरचा ‘मुहूर्त’?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
येत्या सात ऑक्टोबर रोजी होणाऱ्या येवला तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या‍ सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (दि. २२) मुदत आहे. मात्र, सध्या पितृपक्ष सुरू असल्याने इच्छूक उमेदवारांकडून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे तसेच प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रथमतः ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्जाची प्रत काढून संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे. ही प्रत सादर केल्याशिवाय अर्ज दाखल झाल्याचे ग्राह्य धरले जाणार नाही. येवला तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात आठ ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्ररित्या आठ टेबलांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवार व शनिवार या पहिल्या दोन दिवसात एकाचाही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती तहसील कार्यालय सूत्रांनी दिली. येत्या २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. घटस्थापनेनिमित्त गुरुवारी (दि. २१) सुटी आहे. त्यामुळे मधल्या दरम्यानच्या उर्वरित चार दिवसात कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच अन् सदस्यपदांसाठी नेमके कुणाचे अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच या चार दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.

प्रतीक्षा पितृपक्ष संपण्याची
सरपंचपदाची निवडणूक पहिल्यांदाच जनतेमधून थेट प्रत्यक्ष मतदानाद्वारे होत असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व आले आहे. अनेक इच्छुक आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. तर, काहींनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुहूर्तावर नजरा खिळल्याची चर्चा रंगली आहे. सध्याचा ‘पितृपक्ष’ लक्षात घेता अनेकांना भाद्रपद महिना संपण्याची प्रतीक्षा आहे. येत्या बुधवारी (दि. २०) भाद्रपद महिना संपताना २१ तारखेच्या घटस्थापनेने नवरात्र सुरू होत आहे. मात्र, त्याच दिवशी सुटी असल्याने शुक्रवारी २२ तारखेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच अनेक जण मुहूर्त साधणार असल्याचे मानले जात आहे.

सरपंचपदाचे आरक्षण असे
ग्रामपंचायत............आरक्षण
नांदेसर............ओबीसी
कोटमगाव बुद्रुक......ओबीसी स्त्री
सुरेगाव रस्ता......ओबीसी स्त्री
एरंडगाव खुर्द......ओबीसी स्त्री
कुसूर............सर्वसाधारण
आडगाव चोथवा......सर्वसाधारण स्त्री
नायगव्हाण......सर्वसाधारण स्त्री
चांदगाव............अनु. जमाती स्त्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहिवडमध्ये ३० जण रिंगणात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
देवळा तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या दहिवड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी माघारीनंतर चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित सरपंचपदासह ११ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवारी (दि. २६) दहिवडची निवडणूक होत आहे. येथील आपल पॅनलच्या चंद्रभागा पिंपळसे, वंदना ठाकरे, गुंताबाई सोनवणे आणि गुंताबाई ठाकरे या अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला बिनविरोध निवडून आल्या. तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या थेट सरपंचपदासाठी आदिनाथ सूर्यवंशी, गंगाधर बर्डे आणि समाधान सोनवणे हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग एकमध्ये सहा, तर प्रभाग दोनमध्ये दोन सर्वसाधारण महिला जागेसाठी तीन, प्रभाग तीनमध्ये (अनुसूचित जमाती) दोन, सवसाधारण महिला जागेसाठी दोन, प्रभाग चारसाठी (अनुसूचित जाती) तीन अनुसूचित जमाती जागेसाठी दोन, प्रभाग पाचमध्ये सर्वसाधारण जागेसाठी तीन तर सर्वसाधारण महिला जागेसाठी दोन, नामा प्रवर्ग महिला जागेसाठी दोन असे एकूण ३० उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटीत भाऊ-बहिणीचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी
आईसोबत धुणे धुण्यास गेलेल्या भाऊ-बहिणीचा वनविभागाच्या तलावात बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुले बुडत असल्याचे पाहून आईने आरडाओरड करीत मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली असता तीसुध्दा बुडू लागली होती. मात्र, जवळच असलेल्या भावाने धाव घेत एका तरुणाच्‍या मदतीने तिचे प्राण वाचविले.
घोटी शहरातील श्रीपादबाबानगर विभागात राहणारी ज्योती जगदीश लहामगे (३५) ही महिला रविवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली होती. नेहा (१४) आणि साहिल (१०) ही तिची दोन्ही मुले कपडे धुण्यासाठी मदत करीत होती. साहिलचा पाय घसरल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात नेहाही खोल पाण्यात पडली. दोन्ही मुले बुडत असल्याचे पाहून ज्योती लहामगे यांनी आरडाओरडा करीत मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्यात तीसुद्धा पाण्यात बुडत असताना तिचा भाऊ शिवाजी चोथे यांनी धाव घेऊन स्थानिक तरुणाच्या मदतीने तिला बाहेर काढले. दोन्ही मुलांनाही पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. आई ज्योती लहामगे हिच्यावर घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेहा लहामगे ही घोटी येथील आदर्श कन्या विद्यालयात नववीच्या वर्गात तर साहिल लहामगे हा सरस्वती विद्यालयात चौथीच्या वर्गात शिकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या पिढीची शेतीविषयी अनास्था चिंताजनक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
शेतीतून येणार पैसा हा बरकतीचा असतो. त्यामुळे शेतीवरील निष्ठा अढळ राहिली पाहिजे. नवीन पिढी शेतीकडे वळत नाही हा चिंतेचा विषय आहे. शेतीत चांगली प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मुला-मुलींना शेतीसाठी उभे करता आले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.
द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. आमदार सीमा हिरे अध्यक्षस्थानी होत्या. नांदूरनाका येथील शेवंता लान्स येथे झालेल्या कार्यक्रमास कृषिथॉनच्या संचालिका अश्विनी न्याहारकर, मविप्र संस्थेच्या सुप्रिया सोनवणे, आरगॅनिक मल्टीस्टेटचे डॉ. कांजीभाई कलावडीया, द्राक्षतज्ज्ञ एन. डी. पाटील, प्रगतशील द्राक्ष शेतकरी मारोतराव चव्हाण आदी उपस्थित होते.
सूर्यकांता पाटील म्हणाल्या, की देशभरात शेतीचा खरा भार महिलाच वाहत आहेत. त्यांच्या राबण्याला पर्याय नाही. शेतीत कष्ट उपसताना या महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना रासायनिक खतांची आणि औषधांची वारेमाप उधळण होत आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांचा भयानक विळखा पडू लागला आहे.
सीमा हिरे म्हणाल्या, की नाशिक जिल्हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. प्रतिकुल वातावरण, पाणीटंचाई, मजुरांचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जात द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. त्यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे. हरीत क्रांतीच्या जनक महिला आहेत, तसेच प्रगतशेतीत महिलांचे योगदान मोठे हे नाकारून चालणार नाही. द्राक्ष विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मारोतराव चव्हाण आणि एन. डी. पाटील यांनी द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन केले.

यांचा झाला गौरव
सुरेखा पाटील, विद्या पगार, जयश्री पिंगळे, सुरेखा ढुमणे, कल्पना नाठे, विद्या रकीबे, रुपाली गायकवाड, मंगला राजोळे, कमल रिकामे (सर्व नाशिक), शीतल झगडे, सुजाता गायकवाड, रेश्मा वाईकर (सर्व पुणे), सुजाता देशमुख, छाया बावके (अहमदनगर), चंद्रकला चव्हाण (जालना), मनीषा काळे (सोलापूर) यांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शरणपूर पोलिस चौकीजवळ घडली.
सुधाकर जोशी (६२, एकदंतनगर, उत्तमनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री श्री ज्ञान विकास केंद्र, आर्ट ऑफ हापाईस्ट लिव्हिंग संचालित सात दिवसीय योगा क्लासचा रविवारी सांगता दिवस होता. जोशी हे या ग्रुपचे कायम सदस्य होते. पंचवटीतील पेठरोडवरील पवार लॉन्स येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जोशी पहाटे घरातून बाहेर पडले. शरणपूर पोलिस चौकी येथे भरधाव वेगात आलेल्या एका भरधाव वाहनाने जोशी यांच्या दुचाकीस जोरधार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. गंभीर जखमी असलेल्या जोशींचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यास दौऱ्याचा खर्च अधिकाऱ्यांच्याच माथी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
सुशासनाचे धडे गिरवण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे कूच करणाऱ्या भाजप पदाधिकारी व नगरसेवकांची आर्थिक तंगी दूर करण्याची जबाबदारी काही अधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे. परंतु, अगोदरच महापालिका तिजोरीतील खडखडाटीमुळे हैराण असलेल्या काही अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याचा खर्च सोसण्यास नकार दिला, तर काहींनी तोकडे दान पदाधिकाऱ्यांच्या पदरात टाकून आपली सुटका करून घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्याचा खर्च काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालिकेतच तळ ठोकल्याची चर्चा आहे.
महापालिकेतील वाद-विवाद दूर करणे तसेच नगरसेवकांना सुशासनाचे धडे देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत नेऊन तिथे अभ्यासवर्ग घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पदाधिकारी व नगरसेवक उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे कूच करणार आहेत. परंतु, या तीन दिवसीय अभ्यासवर्गासाठी खर्चही मोठा येणार आहे. त्यामुळे हा खर्च पेलण्याची जबाबदारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. मात्र, या पदाधिकाऱ्यांनीही खर्चाचा हा चेंडू महापालिकेतील काही अधिकाऱ्यांकडे टोलावला आहे. अभ्यास दौऱ्याचा खर्च ऐनवेळी या अधिकाऱ्यांच्या माथी आल्याने काहींनी आढेवेढे घेतले तर काहींनी काहीतरी दान पदरात टाकून सुटका करून घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार महापालिका कारभाराची वेळ संपल्यावर सुरू झाल्याने अधिकारीही आश्चर्यचकीत झाले असून या अनोख्या वसुलीमोहिमेची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगावला पावसामुळे कांदा भिजला

$
0
0

निफाड : लासलगाव परिसरात चार दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील कांदा व्यापाऱ्यांचे एकूण अंदाजे ५० टनाहून अधिक कांद्याचे चार लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आंनदा गिते, एस. ताराचंद, युवा ग्लोबल एक्सपोर्ट येथील कांदा व्यापाऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दरम्यान,
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांमध्ये पाणी साचल्याने खरेदी केलेला कांदा साठवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लासलगाव येथे सोमवारी (दि. १८) कांदा लिलाव बंद राहील; मात्र विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुठे बरसल्या सरी, कुठे पाटी कोरी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अधूनमधून बरसणाऱ्या परतचीच्या पावसाने सोमवारी नाशिककरांना चकवा दिला. महानगरातील काही भागात मुसळधार पावसाने झोडपले, तर काही ठिकाणी पावसाचा लवलेशही नव्हता. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांची त्रैधातिरपीट उडाली. पाऊस असलेल्या ठिकाणाहून रेनकोन घालणाऱ्या दुचाकीस्वारांना काही अंतराने मात्र हा रेनकोट पुन्हा काढावा लागला. या पावासाने शहरात २४ तासात ०.४ मी. मी पावसाची नोंद झाली तर सकाळी ८.३० ते ५.३० यावेळेत १.१ मी.मी पाऊस झाला.

नाशिकरोड येथे मुसळधार पाऊस झाला. तर इतर ठिकाणी मात्र त्याने केवळ हजेरी लावली. ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही तेथील गैरहजेरीसुद्धा चर्चेची ठरली. गेल्या काही दिवसांपासून हवामानातही बदल झाल्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. ऑक्टोबर हिटची चाहूल लागल्यानंतर मध्येच बरसणारा पावसाने अनेकांचे अंदाज फोल ठरवले आहे. यावर्षी पावसाने समाधानकार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणात ८७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

नाशिकरोडला झोडपले

सिन्नर फाटा ः असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नाशिकरोड व परिसरातील गावांना सोमवारी चार वाजता मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नागरिक, व्यावसायिकांसह प्रवाशांचे हाल झाले. बाजारपेठांतील रस्त्यावरील सर्वच व्यावसायीकांची दैना उडाली. नेहमीप्रमाणे वीजेची बत्तीही गुल झाली.

सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान नाशिकरोड सह शिंदे, पळसे या भागात मुसळधार पाऊस झाला. ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाट हा परिसर काही काळ हादरला. सुमारे पाऊण तास झालेल्या या जोरदार पावसाने शहरातील सर्वच रस्त्यांसह सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले.

महामार्ग आणखी उखडला

कालच्या पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा ते चेहेडी दरम्यान आनखी खड्डे निर्माण झाले. अस्वले मळा, निसर्ग लॉन्स येथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. चेहेडी शिव येथे महामार्ग पुर्णपणे उखडल्याने येथे दुचाकी वाहने घसरुन पडल्याच्या घटनाही घडल्या.

वीज पुरवठा खंडित

मुसळधार पावसादरम्यान नेहमीप्रमाणी शहरातील वीजपुरवठा पुन्हा एकदा खंड‌ति झाला. सायंकाळी चारवाजता खंड‌ति झालेला वीज पुरवठा अडीच तासांनंतर साडेसहावाजताही सुरळीत झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला आता अधिकाऱ्यांचीही गळती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कधी जकात गळती, कधी पाणी गळतीने चर्चेत असलेल्या महापालिकेला आता अधिकाऱ्यांच्या गळतीने सतावले आहे. भाजपच्या बेधुंद कारभाराने महापालिकेतील वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकारी अक्षरशः वैतागले असून, त्यांचा ओघ आता स्वेच्छानिवृत्तीकडे सुरू झाला आहे. भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारेंपाठोपाठ आता विधी व मिळकत विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनीही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर तीन अभियंत्यांचेही स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज वाटेवर असल्याने कर्मचाऱ्यांपाठोपाठ अधिकाऱ्यांच्या गळतीने प्रशासनासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे.

एकीकडे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीने प्रशासन जेरीस आले असताना आता थेट विभागप्रमुखांकडूनच स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जांचे रतीब सुरू झाले आहेत. महापालिका प्रशासन सध्या विकासकामे, तसेच जनतेच्या प्रश्नांऐवजी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गळतीने चिंताग्रस्त झाले आहेत. महापालिकेची पदोन्नती क वर्गातून ब वर्गात झाली असली तरी महापालिकेकडे असलेला कर्मचारी व अधिकारी वर्ग मात्र तोच असून, त्यात सुधारणा होत नाही. दर महिन्याला दहा ते पंधरा कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवृत्ती होत आहे. २०१९ पर्यंत सध्या कार्यरत असलेले पाच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी अडीच कर्मचारी निवृत्त होत आहेत, तर दुसरीकडे नोकरभरतीला सरकारने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे प्रशासनाची अगोदरच पंचाईत झाली असताना आता अधिकाऱ्यांच्या गळतीचे नवे संकट प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

भाजपच्या सत्तेने धास्तावलेले तत्कालीन शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर यांनी स्वेच्छानिवृत्ती यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. गेल्या सात महिन्यांत भाजपचा कारभार भरकटला असून, महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत त्रस्त झाले आहेत. महापालिकेतील काही पदाधिकारी व नगरसेवकांच्या जाचाने अधिकारी त्रासले असून, त्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. त्यामुळे त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करला आहे. गेल्या महिन्यात भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला असून, तो महासभेवर ठेवण्यात आला आहे. विधी व मिळकत विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनीही सोमवारी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे. यापूर्वीही अग्निशमन विभागाच्या प्रमुखांना स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला होता. शहर अभियंता, पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद हे प्रभारी अधिकाऱ्याकडे आहे, तर काही उपायुक्तांकडे दोन ते तीन विभागांचा पदभार आहे. त्यात पदाधिकाऱ्यांच्या जाचामुळे तर अधिकच त्रास होत असल्याने आता त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करला आहे.

आयुक्तांना पडला पेच

अधिकाऱ्यांसोबत अभियंते, कार्यकारी अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. कार्यकारी अभियंतापदाचा पदभार अभियंत्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिकेतील आणखी तीन बड्या अभियंत्यांनी स्वेच्छानिवृत्तीची तयारी केली असून, आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली आहे. मात्र, तूर्तास आयुक्तांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला आहे. स्वेच्छानिवृत्ती हा अधिकाऱ्यांचा अधिकार असल्याने त्यांना रोखायचे कसे, असाही त्यांच्यासमोर पेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीजीपनगरला तरुणाचा गळफास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपी नगर परिसरात जॉगिंग ट्रॅकवरील झाडाला तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी - वडाळागाव परिसरातील राजवाडा येथील रहिवासी सुरेंद्र रमेश साळवे (२५) याने रविवारी (दि. १७) जॉगिंग ट्रॅक येथील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब त्याचा आतेभाऊ चंद्रकांत पगारे यांना समजताच त्यांनी उपनगर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांनी सहकाऱ्यांसह जाऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.

तरुणीचा मृत्यू
दुचाकीच्या धडकेने जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे. कस्तुरी रवीकांत जाधव (१८, रा. जेतवन नगर, नेहरूनगर, नाशिकरोड) ही तरुणी शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिखरेवाडी येथून घरी पायी जात होती. हॉटेल करी लिव्हसमोर रस्ता ओलांडताना नाशिकरोडकडे वेगाने जाणाऱ्या दुचाकीची (एमएच १५ के एएम ५१४१) तिला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार गाडी सोडून फरार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसाहित्यात समृद्धतेचा अभाव खेदजनक

$
0
0

आधुनिक काळातील पिढी वाचनाच्या संस्काराला दुरावत असून, व्हर्च्युअल जगाशी एकरूप होत आहे. नव्या पिढीला वाचनाचे व्यसन जडावे इतकी समृद्धता आपल्याकडील बालसाहित्यात नसल्याचा खेद व्यक्त केला आहे मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका ‘एक होता कार्व्हर’कार वीणा गवाणकर यांनी. मात्र, त्या दिशेने सुरू असलेली मराठी बालसाहित्यिकांची धडपड ही एक जमेची बाजू आहे, असे मतही त्यांनी मांडले. नाशिकरोड येथे आयोजित राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलानाच्या उद्घाटनाला नाशिकमध्ये आलेल्या गवाणकर यांनी सध्याची साहित्य संमेलने, मराठीतील उपलब्ध बालसाहित्य आणि बालसाहित्याचा पुढील प्रवास याबाबत ‘मटा’कडे व्यक्त केलेल्या भावना...

--

-प्रभावी बालसाहित्याची वैशिष्ट्ये कोणती?

-बालसाहित्याची भाषा सहज-सुलभ, बालकांच्या भाषेशी जुळणारी असते. ओघवती कथनात्मक शैली असते. असे साहित्य बालकांच्या भावविश्वाचा ठाव घेते. त्यांची उत्सुकता, उत्कंठा वाढविते. सचित्र मांडणीसह त्यात वैविध्यता असते.

--

-सध्याचे बालसाहित्य बालमनाचा वेध घेण्यास समर्थ आहे असे वाटते का?

-नाही, सध्याच्या बालसाहित्यात अजून नवीन प्रयोग होणे गरजेचे आहे. तसे ते सुरूही आहेत. परंतु, त्यांची गती खूपच संथ आहे. आजच्या बालकांचा प्रत्यक्ष पुस्तकांचे वाचन करण्याऐवजी व्हर्च्युअल जगाशी जास्त संबंध येतो. आजची आधुनिक पिढी साहित्यापासून दुरावतेय, कारण आजचे साहित्य तितके समृद्ध नाही. समृद्ध साहित्यनिर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. साहस कथा, शोध कथांची उणीव जाणवते.

--

-हल्लीच्या पिढीला वाचते करण्यासाठी कोणते उपाय सुचवाल?

-गाव व शाळा तेथे वाचनालय हवे. प्रत्येक वाचनालयात चिल्ड्रेन वाचनालय हवे. व्यसनी वाचक तयार करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. वाचनालये संस्कारांची केंद्रेच असतात. शालेय अभ्यासक्रमांतही केवळ कृतियुक्त लिखाणावर भर न देता डिस्क्रिप्टिव्ह लिखाणालाही मोठा वाव ठेवायला हवा.

--

-बालसाहित्याचे विद्यार्थ्यांच्या विकासात महत्त्व काय?

-बालकांना गोष्टीरुपातील साहित्य आवडते. त्यातील मानवीकरण केलेल्या अनुभूती त्यांना भावतात. त्यातून त्यांची शब्दसमृद्धी, चौकसबुद्धी वाढते. अभिव्यक्तीलादेखील चालना मिळते.

--

-आजच्या साहित्यावर सोशल मीडियाने आक्रमण केल्यासारखे वाटते का? त्याचा परिणाम काय?

-सध्या तरी सोशल मीडियाचा दुष्परिणामच जाणवतो. तंत्रज्ञानाची ओळख इथपर्यंत ठीक. पण, त्याचे धोकेच अधिक आहेत. पुस्तके प्रत्यक्ष हाताळण्याऐवजी नेटसॅव्ही पिढी स्क्रीनपुढेच जास्त वेळ घालविते. अर्थव्यवस्थेचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे या अर्थव्यवस्थेने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाला कमवायला भाग पाडले आहे. त्यामुळे पाल्यांकडे लक्ष देण्यासाठी पालकांकडेही वेळ नाही. नेमक्या याच वेळी सोशल मीडियाचे आगमन वेगाने झाल्याने साहित्यात रस घेणारी पिढी आपण हरवून बसल्यासारखे झालेय.

--

-आजचे बालसाहित्य आणि भविष्यातील आव्हाने याबद्दल आपले मत काय?

-भविष्यातील आव्हानांचा सामना करू शकणाऱ्या बालसाहित्याची निर्मिती जुन्या साहित्यिकांकडून झालेली नाही. आजही राज्यभरात बालसाहित्याचा एकही एडिटर नाही. बालसाहित्य समीक्षकही एकच आहे, विद्या सुर्वे, मालेगाव. पाश्चात्त्यांप्रमाणे बालसाहित्य निर्मितीत आपण कमी पडलो. आपल्याकडील बालसाहित्य आजही प्रयोगशील आहे. सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. काही तरी अननोन निर्माण करण्याचे आव्हान आजही आहे.

--

-साहित्य संमेलनांविषयीच्या वादाबद्दल आपल्याला काय वाटते?

-सॉरी! (साहित्य संमेलन नसते साहित्य उत्सव असतो. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नसतो असेच साहित्य संमेलनांवर वाद उपस्थित करतात. या वादांमुळे साहित्य संमेलनात साहित्याविषयी आता काही नसतं. केवळ सेलिब्रेटींसोबत सेलिब्रेशन असतं...)

--

(शब्दांकन ः नवनाथ वाघचौरे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दांडिया वर्कशॉपला वेग

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दांडिया आणि गरबा वर्कशॉपला शहरात ठिकठिकाणी वेग आला अाहे. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून ठिकठिकाणी दांडिया व गरबा वर्कशॉपला सुरुवात झालेली आहे. तरुणाईसह या वर्कशॉपमध्ये सर्व वयोगटांतील व्यक्तींचा सहभाग दिसून येत आहे.

टीव्ही, सोशल मीडिया यामुळे दांडिया, गरबा यांचे नवनवीन प्रकार सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. दररोज वापरावयाच्या साध्या कपड्यांवर गरबा, दांडियाचा सराव केल्यावर आता घागरा, चनिया-चोली यांसारख्या पारंपरिक वेशभूषेेत सराव करण्याकडे वर्कशॉप प्रशिक्षकांचा कल दिसून येत आहे. दांडिया, गरबा हे नवरात्रात खेळले जाणारे पारंपरिक प्रकार असले, तरी ते आजच्या काळात व्यायामाचे उत्तम पर्याय असल्याचे मार्गदर्शनदेखील वर्कशॉपमध्ये होत आहेत.

--

या प्रकारांना प्राधान्य

सालसा गरबा, सनेडो, ठकडी, धोडिओ, बेली गरबा यांसारखे निरनिराळे गरबा व दांडियाचे प्रकार वर्कशॉपमध्ये शिकविले जात आहेत. त्याचप्रमाणेे एक ताली गरबा प्रकारापासून ते सहा ताली गरबा प्रकारापर्यंतचे प्रशिक्षण वर्कशॉपमध्ये दिले जात आहे.

--

दर वर्षीप्रमाणेे यावर्षीदेखील दांडिया, गरबा वर्कशॉपला सर्वच वयोगटांतील व्यक्तींचा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी खास तरुणाईसाठी वेगळ्या पद्धतीने सराव सुरू आहे. पारंंपरिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारांत सराव सुरू असून, गुजराथी पद्धतीचा मूळ गरबा हे यावर्षीच्या वर्कशॉपचे खास आकर्षण आहे.

-कौस्तुभ जोशी, प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला डेंग्यूचा डंख

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत सुरू असलेल्या उपाययोजना व विविध प्रकारची जागृती फार्स ठरत असून, या दोन्ही आजारांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या १८ दिवसांत महापालिका हद्दीत डेंग्यू संशयित रुग्णांचा आकडा दीडशेवर गेला असून, पॉझ‌िट‌िव्ह रुग्णांचा आकडा ६२ वर गेला आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत डेंग्यूने चांगलेच डोक वर काढले असून, यंत्रणांसमोर आव्हान उभे केले आहे. डेंग्यूबरोबरच स्वाइन फ्लूनेही कहर केला असून, १८ दिवसांत दहा जणांचा बळी गेला आहे. शहराच्या हद्दीत जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचे २५ बळी गेले असून, जिल्ह्यातील मृतांचा आकडा ६१ पर्यंत गेला आहे. स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना आरोग्य यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसली आहे.

शहर व ग्रामीण परिसरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना महापालिका व जिल्हा प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले असून, डेंग्यूच्या रुग्णांत प्रतिदिन वाढ होत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरच्या १८ तारखेपर्यंत डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा १६५ पर्यंत पोहोचला आहे, तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ पर्यंत गेली आहे. दोन आठवड्यांपर्यंत हा आकडा शंभरपर्यंत होता. मात्र, आठ दिवसांत त्यात ६५ संशयित रुग्ण, तर ५० पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या अहवालात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले होते. संशयित रुग्णांची संख्या १७४ होती. सप्टेंबरमध्ये त्यात मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ५६२ संशयित रुग्ण असून, पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २१३ पर्यंत पोहोचला आहे. खासगी रुग्णालयांमध्येही संशयितांचा आकडा मोठा असल्याने डेंग्यू संशयितांचा आकडा दोनशेपार, तर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरीपार जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वाइन फ्लूचे ६१ बळी

स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, गेल्या १८ दिवसांत तब्बल १० जणांचा बळी गेला आहे. यातील चार जण शहर, तर सहा जण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या वाढत चालली आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ४१ रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यात विविध ठिकाणी ७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूने ६१ जणांचा जीव घेतला आहे. त्यात महापालिका हद्दीतील २५, तर ग्रामीण भागातील ३१ जणांचा समावेश आहे.

डेंग्यूचे रुग्ण

जुलै : संशयित ९४, पॉझिटिव्ह १४

ऑगस्ट : संशयित १७४, पॉझिटिव्ह ९७

सप्टेंबर : संशयित १६५ पॉझिटिव्ह ६२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला पर्यटनाचे बुकिंग सुरु

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ‘पर्यटन मार्ट’नंतर आता पर्यटकांचे पाऊले नाशिककडे वळू लागले आहे. देशभरातून हळूहळू बुकिंग सुरू झाले असल्याने ट्रॅव्हल एजंट व हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या सुट्यांसाठी अनेक पर्यटकांनी नाशिकलाही पसंती दिली आहे. त्यात पर्यटनांचे सर्किट महत्त्वाचे ठरले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनने यांनी देशभरातील सहाशेहून अधिक ट्रॅव्हल एजंट्स, पर्यटन विषयावर लिहिणारे लेखक व ब्लॉगर्सना नाशिकच्या पर्यटनस्थळांचे महत्त्व पटवून देण्यात तीन दिवसीय ट्रॅव्हल मार्ट घेतला होता. त्यात नाशिकला केंद्रस्थानी ठेवून शिर्डी, वेरूळ, अजिंठा, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, तोरणमाळ तसेच गुजरातमधील सापुतारा असे पाच-सहा दिवसांचे सर्किटची माहिती देण्यात आली. त्यात आता पर्यटकांनी या सर्किटला पसंती दिली आहे. यात दोन दिवस हे पर्यटक नाशिकचे पर्यटन स्थळे बघणार आहे. पर्यटकांच्या बरोबरच विद्यार्थ्यांच्या ट्रीपने हे सर्किट निवडले आहे.

धार्मिक स्थळांबरोबरच ऐतिहासिक पर्यटनस्थळे, वायनरीज, गड- किल्ले, पक्षी अभयारण्य, पुरातन लेणी हे सगळे नाशिक व परिसरात आहे. त्यांचे महत्त्व सांगण्याबरोबरच त्यांचा प्रसार जसे महत्त्वाचे होते. तसे त्याच्या जोडीला इतर जवळचे पर्यटन स्थळही जोडणे गरजेचे होते. हे पर्यटन मार्टमधून पोहचल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. यात ट्रॅव्हल एजंटची भूमिका महत्त्वाची होती. मार्टसाठी देशभरातून नाशिकला आलेले हे ट्रॅव्हल एजंट आता पर्यटकांना नाशिकचे सर्किट सुचवू लागले, त्याला प्रतिसादही मिळू लागला आहे.

‘पर्यटन मार्ट’मध्ये देशभरारतून ट्रॅव्हल्स एजंट आले. त्यांनी नाशिकमधील सर्व पर्यटन स्थळे बघितली. आता ते त्यांच्याकडे आलेल्या पर्यटकांना नाशिकचा पर्याय सुचवू लागले आहे. नाशिकच्या पर्यटनांसाठी सर्किट व बुकिंगबाबत विचारणा होऊ लागली असून काहींनी बुकिंगही केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ट्रिपही बुक झाल्या आहेत. पर्यटन टूरिझम वाढवण्यासाठी सुरुवात चांगली झाली आहे.
- दत्ता भालेराव, अध्यक्ष,
ट्रव्हल्स एजंट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images