Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निफाड-पिंपळगाव मार्गाचा होणार कायापालट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
निफाड-पिंपळगाव या खड्डेमय झालेल्या मार्गाच्या दुरुस्तीस सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर सुरुवात केली आहे. या मार्गासह निफाड तालुक्यातील अन्य रस्त्यांची चाळण झाल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. पिंपळगाव मार्गावरील दावचवाडी गावातील मोठे खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
गुजरातमधील साईभक्तांच्या सूरत-शिर्डी मार्गात निफाड-पिंपळगाव हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र, याच मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे ‘मटा’ने लक्ष वेधल्यानंतर निफाडचे आमदार अनिल कदम यांनी गेल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांच्यासह अधिकारी डी. एस. पवार, महेश पाटील यांना सोबत घेऊन तालुक्यातील रस्त्यांचा खडतर प्रवास स्वतः घडवून आणला. यानंतर निफाड येथे पत्रकारपरिषद घेत तालुक्यातील रस्त्यांसाठी मंजूर असलेला निधी व दुरुस्तीच्या कामांचा निधी याबाबत माहिती दिली.
निफाड तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण, मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते आणि पिंपळगाव निफाड या मुख्य रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्डयाचे साम्राज्य यामुळे वाहतूक व्यवस्थेवर झाला होता. विशेषतः निफाड-पिंपळगाव मार्गाबाबत लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया होत्या. दावचवाडी या गावाजवळ तर पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नदी वाटावी इतके मोठे निर्माण झाले होते. बांधकाम विभागाने या ठिकाणचे खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे. या मार्गाचे लवकरच रुंदीकरण केले जाणार आहे. नामपूर-सिन्नर अंतर्गत निफाड तालुक्यातील हद्दीपर्यंत या मार्गासाठी १४७ कोटी रुपयांचे टेंडर निघणार आहे.

स्वतःच करणार रस्त्यांची कामे
अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामाला मंजुरी आहे. मात्र जीएसटीमुळे ही कामे करणे परवडत नाही यासह अन्य कारणांमुळे ठेकेदार कामे करण्यास तयार नाहीत. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या. एकाच कामाच्या चार-चार वेळा निविदा काढूनही कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे ही कामे करण्याचे सूतोवाच बांधकाम विभागाने दिले आहे. परंतु, या कामांसाठी अधिकारी वर्ग पैसा कुठून उपलब्ध करणार असा प्रश्न आहे.

अशी आहेत मंजूर कामे आणि निधी
- चांदवड-निफाड मार्ग : ६० कोटी
- पिंपळगाव-निफाड-नांदूर मध्यमेश्वर रुंदीकरण : १४७ कोटी
- निफाड-शिवडी-भोयेगाव-गणूर-चांदवड : १७ लाख ३० हजार
- निफाड रेल्वे स्टेशन-रानवड-खडकजांब मार्ग : ७२ लाख ६६ हजार
- मोहाडी-साकोरे-शिरसगाव-वडाळी-पिंपरी कोठुरे : २९ लाख
- पिंपळगाव-निफाड-सिन्नर : १९ लाख ९३ हजार
- शिरवाडे-वणी-पिंपळगाव ते वडाळी-कसबे सुकेणे : ६५ लाख
- चाटोरी-सायखेडा-भुसे-मांजरगाव : २९ लाख आठ हजार
- पिंपळगाव-पालखेड-लासलगाव-मनमाड : दोन कोटी ४६ लाख
- मोहाडी-कोकणगाव-शिरसगाव-वडाळी-पिंपरी कोठुरे : दोन कोटी ८९ लाख
- ओझर-सुकेणे-पिंपळस-कोठुरे : दोन कोटी ८९ लाख
- ओझर-सायखेडा-पांचाळे-वावी : दोन कोटी ८६ लाख ८० हजार
- सुकेणे-पिंपरी मार्गावर बाणगंगा नदीवर पूल : चार कोटी ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्मलवारीवर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वरच्या निर्मलवारीसंदर्भात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव होऊन जिल्हा प्रशासनाला प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दीड कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवाल मंजूर झाला आहे. त्यासाठी शासकीय स्तरवर मुख्यमंत्री निधीतून खर्च मंजुरीचे प्रतीक्षा आहे.

पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर आषाढी कार्तिकी वारीनंतर मानवी मलमूत्रामुळे निर्माण होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी निर्मलवारीचा प्रयोग यशस्वी ठरला. तोच धागा पकडत वनवासी कल्याण आम या स्वयंसेवी संस्थेने त्र्यंबकेश्वर येथे पौषवारी म्हणजेच श्री संत निवृत्तीनाथांच्या यात्रेत हा उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. त्र्यंबकच्या या यात्रोत्सवात किमान पाच लाख भाविक हजेरी येतात. दशमी एकादशी आणि द्वादशी असा सलग तीन दिवस शहरात लाखोंचा राबता राहतो. यात्रा नियोजनात स्वच्छतागृहांची तात्पुरती सुविधा केली जाते. मात्र, ती अत्यंत तुटपुंजी ठरली. भाविक परतल्यानंतर स्थानिक नागरिकांना दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागतो. शहरालगत मोकळ्या जागेचा वापर उघड्यावर शौचास बसण्यासाठी होत असे. शहराचा विस्तार वाढला तसा लगतच्या माळरानांवर रहिवासी वस्ती होत आहे. जागोजाग कुंपणांचा वेढा वाढला आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्वच्छतागृहाची निकड भासते. सद्यस्थितीला असलेली मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था गरजेपेक्षा अनेक पटींनी कमी आहे. निर्मलवारीच्या प्रयोगातून यात्रेतील समस्या दूर होणार आहे.

प्रत्यक्ष भेटीतून सर्वेक्षण
वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या माध्यमातून सेवाभावी व्यक्ती एकत्र आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर येथे वारंवार भेट दिली आणि माहिती जाणून घेतली. यात्रोत्सवात स्वच्छतागृहाची गरज असलेली नेमकी किती ठिकाणे आहेत आणि तेथे कशा प्रकारे योजना होईल याचा आराखडा तयार केला. यामध्ये नगरपालिका शहर अभियंता आणि नगरसेवक यांची मदत घेतली. त्यानंतर पालिकेने प्रकल्प अहवाल तयार करून त्याची मंजुरी घेतली आहे.

१३ ठिकाणांची निवड
यात्रोत्सव कालावधीत १३ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गर्दीचे ठिकाण आहे तसेच रस्त्यांचा बाजुचाही समावेश केला आहे. गरजेप्रमाणे त्या-त्या भागात एकूण १६०० टॉयलेट ब्लॉक ठेवण्यात येणार आहेत. या सेवाभावी कार्यासाठी तीन हजार स्वयंसेवक आपले योगदान देणार आहे.

दररोजची निर्मलवारी कधी?
शहरात दररोजच भाविकांची अलोट दाटी होत असते. मंदिर परिसरात एकमेव शौचालय आहे. त्याची दुरवस्था झालेली आहे. तेथून पुढे कुशावर्तावर तीन मजली वस्त्रांतरगृहासह स्वच्छतागृह आहे; मात्र त्याची भाविकांना माहितीच होत नाही. सकाळी भाविक मेनरोड परिसरात रहिवांशाच्या घरात याची विचारपूस करतात. वाहनतळ परिसरात अद्यापही हागणदारी असल्याचे चित्र कायम आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने भाविकांची खास करता महिला भाविकांची होणारी कुचंबना दूर झालेली नाही.

निर्मलवारीसाठीचा कामनिहाय अपेक्षित खर्च
टॉयलेट ब्लॉक, फिटिंग, व्हॅक्युम एमटीआर : ६७ लाख २० हजार
जलनिस्सारण प्रक्रिया केंद्र सक्षमीकरण : १८ लाख
एलईडी लाईट : १६ लाख
मनुष्यबळ : १३ लाख ५० हजार
जमीन सपाटीकरण, जागा तयार करणे : १२ लाख
प्रचार प्रसिद्धी बॅनर : पाच लाख
भोजन खर्च : साडेचार लाख
निवास व्यवस्था : चार लाख २० हजार
वाहतूक : तीन लाख
पाणीपुरवठा : एक लाख १० हजार
मजुरी / मनुष्यबळ खर्च : ६७ हजार ५००
वीज खर्च : ५७ हजार ५७५
एकूण : एक कोटी ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंठशहनाईवाद सिन्नरकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ज्येष्ठ कंठशहनाईवादक गोकुळ नीळकंठ सिन्नरकर यांचे खुटवडनगर, यमुनानगर येथील घरी शुक्रवारी पहाटे २ वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

कंठशहनाईवादक म्हणून पंचक्रोशीत सिन्नरकर परिचित होते. सनई वाद्याशिवाय केवळ कंठाद्वारे स्वरनिर्मिती करून कंठशहनाई ते सादर करीत. १९८० च्या दरम्यान श्याम पाडेकर, हेमंत शिंगणे, सुधीर करंजीकर यांनी एकत्र येऊन गणेशोत्सवाच्यानिमित्ताने ‘रसिका तुझ्याचसाठी’ हा प्रथम कार्यक्रम सादर केला. तेव्हापासून गोकुळ सिन्नरकर कंठशहनाईवादक म्हणून सर्वांना परिचित झाले. पुढे बागेश्री वाद्यवृंदाच्या माध्यमातून त्यांनी ३०० हून अधिक कार्यक्रम केले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यांनी ‘छंदातून आगळा आनंद’ या नावाने मुलाखतीच्या माध्यमातून सुमारे पाचशे प्रयोग केले. त्यांचा स्वभाव मुळातच विनोदी असल्याने कंठशहनाई वादनाच्या वेळी घडलेले किस्से ते कार्यक्रमाच्या वेळी सांगत. ‘छोटाभाई’ आणि ‘भाभी की चूडियाँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. तसेच ‘क्रांतिचक्र’, ‘शिल्परंग’ आणि ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. मैफलींमध्ये उत्तम निवेदकाची भूमिका ते पार पाडत. राज्यनाट्यस्पर्धेत त्यांना पार्श्वसंगीताचे प्रथम पारितोषिक प्राप्त होते. सिन्नरकर यांनी सुवर्णकार समाजाच्या एका मासिकाचे कार्यकारी संपादकाची जबाबदारीही सांभाळली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देवीकर यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कैलास पाटील यांची नियुक्ती झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच पध्दतीने राजेंद्र कुटे यांच्याकडील कारभार देवीकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत गुरुवारी सकाळी चार चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर देवीकर यांची बदली झाल्याचे सांगितले जाते. या तत्कालीक कारणांव्यतिरिक्त देवीकर यांच्या कार्यपध्दतीवर वरिष्ठ नाराज होते. गंगापूररोड परिसरातील अनेक तक्रारदार थेट पोलिस आयुक्तालयात धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडत असल्याचे वारंवार पुढे आले. पोलिस स्टेशन पातळीवर काम होत नसल्याने तक्रारदारांना वरिष्ठांकडे जावे लागत असल्याचे यातून प्रतित होत होते, असे सूत्रांनी सांगितले. प्रशासकीय कामांना गती नव्हती, असेही बोलले जाते. त्यातच एकाच दिवशी झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांनंतर देवीकर यांची बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. देवीकर यांच्या जागी वाहतूक विभागाच्या युनिट चारचे पोलिस निरीक्षक कैलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्याकडील कारभार काढून देवीकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तर, कुटे यांना त्याच पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

$
0
0

शिवसेनेकडून धुळ्य ात निषेध

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेकडून धुळ्यात निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी व महानगरप्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. १६) शहरातून मुख्य रस्त्यावरून बैलगाडीत मोटारसायकल मिरवत हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने वाढवलेले पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याचा शिवसेना निषेध करीत असून, सरकारने या दरवाढीला मागे घ्यावे, या मागणीसाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार पेट्रोल डिझेल व गॅस सिलिंडरसोबत आता अन्न धान्यांच्या किमतीतदेखील वाढ होत असल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे, असेही यावेळी आंदोलकांनी सांगितले.

तीव्र आंदोलन करणार

नोटबंदीचा फटका आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या त्रुटी कायम असून, त्यात आता महागाईने भडका घेतला आहे. पेट्रोल, डिझेल गॅसचे भाव कमी करण्याऐवजी मोदी सरकारने भाववाढ केली आहे. त्यामुळे हे सरकार देशात महागाई कमी करण्यास अपयशी ठरल्याचे जिल्हाप्रमुख माळी यांनी सांगितले. त्यामुळे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आता रस्त्यावर उतरली आहे. येत्या काही दिवसांत महागाईचा उच्चांक कमी झाला नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गंगाधर माळी, संजय गुजराथी, राजेंद्र पाटील, सुनील बैसाणे, पंकज गोरे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दमदाटी करून शाळेच्या बसमध्ये घुसलेल्या युवकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केला. ही घटना दिंडोरीरोडवरील वडनगर भागात घडली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून, तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी तरुणाने मुलीला दिली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास पोलिसांनी अटक केली.

संजय शेरसिंग करणसिंग एैर (रा. बोरगड, म्हसरूळ) असे या संशयिताचे नाव आहे. अवतार पॉईंट भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीस संजय मागील तीन महिन्यांपासूत्न त्रास देतो. वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून त्याने पीडित मुलीला एसएमएस केले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पी‌डित मुलगी शाळेच्या बसमधून घरी परतत असताना वडनगर भागात संशयिताने चालकास दमदाटी करीत बस थांबवली. त्यानंतर त्याने युवतीच्या तोंडावर पाणी फेकत विनयभंग केला. त्याने मुलीला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. युवतीने घरी जाऊन हा प्रकार सांगितला असता कुटुंबातील सदस्यांनी तिला लागलीच म्हसरूळ पोलिस स्टेशनला आणले. संशयितास पोलिसांनी गजाआड केले असून, अधिक तपास उपनिरीक्षक जोपळे करीत आहेत.

विवाहितेचा विनयभंग

सोशल मीडियावरील मैत्रीच्या माध्यमातून परजिल्ह्यातील तरुणाने विवाहितेचा विनयभंग केला. व्हॉट्सअॅपवर केलेली चॅटिंग तरुणाने पतीस दाखविण्याची धमकी देत थेट घर गाठून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला.

महेंद्र नागरे असे संशयित आरोपीचे नाव आहे. जेलरोड भागातील बोराडे मळा परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, साधारणतः सहा महिन्यांपूर्वी पीडित महिलेची आणि संशयितेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. सतत चॅटिंग होत असल्याने दोघांमध्ये व्हर्चुअल मैत्री झाली. दोघे एकमेकांशी नेहमी फोनवरही बोलत असत. या काळात दोघांमध्ये अश्लिल मॅसेजचीही देवाण घेवाण होत होती. या दरम्यान संशयित तरुणाने महिलेच्या वास्तव्यासह सर्व माहिती संग्रहित करून तिचे घर गाठले. यावेळी त्याने पतीस चॅटिंग व मॅसेज दाखविण्याची धमकी देत विनयभंग केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक हांडोरे करीत आहेत.

नाशिकरोडला घरफोड्या

नाशिकरोड परिसरात गुरुवारी लोखंडे मळा व चेहडी भागात एकाच दिवशी भरदिवसा झालेल्या वेगवेगळ्या दोन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सुमारे दोन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी उपनगर व नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

जुना सायखेडा रोड भागातील राजेंद्र शामगीर गोसावी (रा. सहारा दीप अपार्ट. लोखंडे मळा) यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी गोसावी कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच लोखंडी कपाटातील लॉकरमधील रोकड, घड्याळ व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

दुसरी घटना चेहडी शिवपरिसरातील खर्जुल मळा भागात घडली. येथील प्रगती प्राईड, गजानन पार्कसमोर राहणारे दीपक नाकराणी आपल्या कुटुंबीयांसमवेत गुरुवारी सकाळी घराबाहेर पडले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून लॉकरमधील रोकड व दागिने असा सुमारे ७७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

मोबाइल, पर्सची चोरी

उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी दोन मोबाइलसह पर्स चोरी केली. भिला गणेश जाधव (रा. लवटेनगर जयभवानीरोड) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (दि.१) जाधव कुटुंबिय कामात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकीद्वारे हात घालून टेबलावर ठेवलेले दोन मोबाइल आणि पर्स चोरून नेली. पर्समध्ये रोकडसह कानातील झुमके असा सुमारे ४९ हजार रुपये किमतीचा ऐवज होता. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार विंचू करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसेसना थांब्यांचे वावडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शहर बससेवा तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत एसटी महामंडळाने शहरातील जवळपास ४० ते ४५ टक्के बसफेऱ्या कमी केल्या आहेत. त्यामुळे बहुतांश शहर बसथांब्यांवर प्रवाशांना तासन् तास वेटिंग करावे लागत असून, अनेक चालकांकडून थांब्यावर बस न थांबविण्याचे प्रकारही घडत आहेत. चालकाच्या मुजोरीमुळे बसमध्ये चढताना सहा विद्यार्थी खाली पडल्याचा असाच धक्कादायक प्रकार आडगाव येथे घडल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आडगाव येथील बसथांब्यावर शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांची मोठी गर्दी बघून चालकाने बसचा वेग मंद करीत न थांबताच बस पुढे दामटली. त्यावेळी बसमध्ये बसणारे सहा विद्यार्थी या बसमधून खाली पडले. त्यातील एक विद्यार्थी बससोबत फरफटत पुढे जात असल्याचा ओरडा विद्यार्थ्यांनी केल्यावर चालकाने बस थांबविली. यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नसली, ती चालकाची मुजोरी पाहून स्थानिकांनी बस अडवून चालकाला जाब विचारत धक्काबुक्की केली. एसटी कर्मचारी व स्थानिकांची बाचाबाची झाल्याने येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

एसटी कर्मचाऱ्यांनी आडगाव येथून जाणाऱ्या-येणाऱ्या बसेस या परिसरात उभ्या केल्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांना बसफेऱ्या वाढवून देण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर हा वाद मिटला.

--

फेऱ्या घटविल्याने हाल

एसटी महामंडळाने शहर बससेवा तोट्यात असल्याने ती बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले असून, शहर बससेवा महापालिका प्रशासनाने चालवावी असा रेटा लावला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून शहर बससेवा चालविण्यासाठी असमर्थता दर्शविली जात आहे. मात्र, या दोघांच्या वादात बसफेऱ्यांचे प्रमाण घडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

--

बस न थांबविल्याने धावपळ

आडगाव परिसरात समाजकल्याण विभागाचे एक हजार मुलांचे वसतिगृह, मेडिकल कॉलेज, भुजबळ नॉलेज सिटी, न्यू इंग्लिश स्कूल शाळा, महापालिका शाळा असल्याने विद्यार्थ्यांचा मोठा वावर परिसरात असतो. शहर परिसरातील शाळा-कॉलेजेसमध्येही मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. नियमितपणे प्रवास करणारे प्रवासी व मासिक पासधारकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. एकाच वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशावेळी एखादी बस थांब्यावर न थांबता गेल्यास गर्दी वाढत जाते. त्यामुळे धावपळीत दुर्घटना होण्याची भीती शुक्रवारच्या घटनेनंतर अधोरेखित झाली आहे.

--

एक-एक तास वेटिंग

शहर बसच्या फेऱ्या जवळपास ४० ते ४५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. पूर्वी बस थांब्यावर उभे राहिल्यानंतर १५ मिनिटांत दुसरी बस यायची. पण, अनेक दिवसांपासून बसफेऱ्या कमी झाल्याने एक-एक तास बस मिळत नाही. त्यामुळे मासिक पासधारक कर्मचारी आणि विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. या मार्गावरून नाशिक ते ओझर ४५ आणि नाशिक ते सय्यदपिंप्री १२ अशा बसफेऱ्या सध्या सुरू आहेत. मधल्या मार्गांच्या बहुसंख्य फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

--

चालक-वाहकांची मुजोरी

एसटीचे काही चालक-वाहक एसटी आपल्याच मालकीची असल्याच्या आविर्भावात वावरत असतात. शाळा-कॉलेजेसच्या वेळेमध्ये गर्दी बघून थांब्यावर सिटी बसेस थांबविणे टाळले जाते. तेथे उतरणारे प्रवासी असल्यास बस मागे किंवा पुढे थांबतात. परिणामी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची बस पकडण्यासाठी धावपळ होते. त्यामुळे बऱ्याचदा अपघात घडतात. पण, एसटीच्या कर्मचाऱ्यांना कुठलेही सोयरसुतक नसते. त्यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहर बसससेवा सर्व्हिसरोडने सुरू झालेली आहे. मात्र, अनेक चालक बस सर्रासपणे महामार्गावरून नेत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

--

आडगाव परिसरात शैक्षणिक संस्था मोठ्याप्रमाणात असल्याने सकाळी ७ ते १२ या वेळेत विद्यार्थी संख्या मोठी असते. अपुऱ्या बसेसमुळे अनेक विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजाला लटकून धोकादायक प्रवास करावा लागतो.

-पोपट शिंदे , स्थानिक रहिवासी

--

बसफेऱ्या कमी केल्यापासून बऱ्याचदा परिसरात बस थांबत नाहीत. आमचा विद्यार्थी पास असतो, त्यामुळे इतर वाहनांनी प्रवास करू शकत नाही. कॉलेजमध्ये उशीर झाल्यास शिक्षक आम्हाला बसू देत नाहीत. त्यामुळे नाहक गैरसोय होते.

-गौरव लभडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंदीकरणाच्या कामाला मुहूर्त कधी?

$
0
0

आडगावकरांची वर्षभरानंतरही समस्या कायम

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव गावातील जुना महामार्ग व गावातील मुख्य रस्ता हा अद्यापही राष्ट्रीय महामार्ग यांच्या अखत्यारीत येतो. राष्ट्रीय महामार्ग जरी गावाच्या बाहेरून जात असला तरी आडगाव गावातील हा रस्ता अजूनही बांधकाम विभागाने महापालिकेकडे हस्तांतरित केलेला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाकडे दोन्हीही विभागांनी दुर्लक्ष केल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

याबाबतचे वृत्त 'मटा'ने मागीलवर्षी प्रसिद्ध केले होते. पण गावाच्या विकासात केंद्रस्थानी असलेल्या या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी अद्यापही दुर्लक्षच केले आहे. स्थानिक नागरिकांकडून अनेकवेळा याबाबत पाठपुरावा केला गेला. पण ढीम्म झालेल्या प्रशासनाकडून या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुहूर्त केव्हा लागणार, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

आडगाव हे पारंपारिक असून पूर्वी गावाची लोकसंख्या मर्यादित होती. पण जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेस २३ खेड्यांचा यामध्ये समावेश केला गेला. पण शहरापासून टोकाला असलेल्या या गावाच्या विकासात प्रशासनाचे व लोकप्रतिनिधी यांचे कायम दुर्लक्ष झाले आहे. नागरी सुविधांबाबत परिसरातील नागरिकांना नेहमीच प्रशासनाकडे मागणी करावी लागली आहे. अनेकवेळा मागणी करूनही काही समस्या अद्यापही कायम असल्याचेही नागरिकांनी बोलताना सांगितले. त्यामुळे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात मुसळधार पाऊस

$
0
0

शहरात २४ तासांत ५० मिमीहून अधिक पाऊस

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत जेमतेम झालेला पाऊस गेल्या पंधरा दिवसांत चांगलाच मेहेरबान झाला आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने शहर व तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले, तलाव, ओढे पाण्याने भरले आहेत. उशिराने का होईना पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला असून, पीकपाणी चांगले येईल या आशेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. शनिवारीदेखील दुपारी एकच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बसस्थानक तसेच शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते जलमय झाले होते.

येथील मसगा महाविद्यालयातील वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिवसभरात २९ मि.मी. तर गेल्या चोवीस तासांत ५० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून वाढलेला उकाडा आणि त्यात भारनियमन यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने दिलासा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

तालुक्यात झोडगे, करंजगव्हाण या गावांसह माळमाथा परिसरातील अनेक गावांना गेल्या दोन दिवसांत पावसाने चांगलेच झोडपून काढले. कंधाणे, अस्ताने, जळकू आदीगावांसह परिसरात नाले, तलाव ओढे पाण्याने भरून गेले आहेत. जूनपासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी यंदा देखील पीक हाती येते की नाही या चिंतेत सापडला होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

वडनेर, झोडगे, करंजगव्हाणवर मेहेरबानी

मालेगावात आतापर्यंत ३०६ मि.मी. म्हणजेच ६९ टक्के इतका पाऊस झाला असून, वडनेर परिसरात सर्वाधिक ३४० मि.मी. इतका पाऊस झाला आहे. त्याखालोखाल झोडगे, करंजगव्हाण, दाभाडी, कौळाणे, सायने या परिसरातदेखील १०० मि.मी.हून अधिक पाऊस झाला आहे. गिरणा, मोसम नदीक्षेत्रात देखील पाऊस चांगला झाल्याने गिरणा धरण ६४ टक्के, चणकापूर ९३ टक्के, तर हरणबारी १०० टक्के भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिलाव सुरू करा; अन्यथा परवाने रद्द

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

बाजारात कांद्याचे भाव वधारण्यामागे साठेबाजी हे कारण असून बंद लिलावप्रक्रियेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सोमवारपर्यंत लिलाव सुरू करा; अन्यथा कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करून परवाने रद्द करावेत, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याच्या नोटिसा पाठव‌िल्या आहेत.

प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जिल्ह्यातील सात व्यापाऱ्यांच्या २५ गोदामांवर छापे टाकल्याने या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. महानगरांमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विक्री होऊ लागल्याने केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाकडून कांद्याच्या सद्य:स्थितीविषयी अहवाल मागविला. गत महिन्यात कांद्याचे भाव २२०० ते २७०० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, कालांतराने त्यामध्ये घसरण झाली. कांदा लिलावाचे पैसे शेतकऱ्यांना न मिळता थेट व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा निष्कर्ष सरकारने काढला. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने बड्या व्यापाऱ्यांची घरे आणि गोदामांवर छापासत्र सुरू केले असून, त्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंदची हाक दिली असून, त्यामुळे जिल्हयातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. या संदर्भात शनिवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवापासून लिलाव सुरू करावेत, अशा आशयाची नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना पाठव‌िली आहे. तरीही लिलाव सुरू न केल्यास परवाने रद्द केले जातील, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, शनिवारीदेखील प्राप्तिकर विभागाचे छापासत्र सुरूच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकटची ‘वकिली’ पोलिसांच्या रडारवर!

$
0
0

नाशिक : डीजे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते गजानन शेलार यांचे समर्थन करून गुन्हे दाखल झाल्यास फुकट वकिली करीन, असे फेसबुकवर आवाहन करणाऱ्या वकिलाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. एवढेच नव्हे, तर बार असोसिएशनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारदेखील करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडे मारुती हनुमान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि नगरसेवक शेलार यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात शेलारांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून, त्यावर अंतिम निर्णय बाकी आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की कोर्टाच्या आदेशानुसार पोलिस शेलारांना केव्हाही अटक करू शकतात. त्यांची शोधमोहीम सुरू असून, त्यांच्या घरीही दोन ते तीन वेळा पोलिसांनी तपासणी केली. या दरम्यान फेसबुकवर कायदा मोडल्याचे काही व्यक्तींनी समर्थन केल्याची बाब समोर आली. अॅड. राजेश आव्हाड यांनी मिरवणुकीत डीजे वाजवण्याचा निर्णय समर्थनीय असल्याची पोस्ट फेसबुकवर केली. डीजेसंदर्भात मंडळावर, तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास सर्वांना मोफत जामीन व कायदेशीर मदत करणार असल्याचे आश्वासन अॅड. आव्हाडांनी दिले. एवढेच नव्हे, तर त्यांचे दोन मोबाइल क्रमांकही पोस्टमध्ये दिले. यामुळे गुन्हा करण्यास कार्यकर्त्यांना बळ मिळाले. कायदा मोडण्यास एक प्रकारे चिथावणी दिली गेली असून, संबंधित वकिलावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. समोरील व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाचे आमिष दाखवून केस घेता येत नाही, असा बार असोसिएशनचा नियम आहे. संबंधित वकिलाने हा नियम मोडल्याने बार असोसिएशनकडेदेखील तक्रार करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सोशल मीडियावर तारतम्य बाळगा

भावनेच्या भरात सोशल मीडियावर व्यक्त होणे सोपे आहे. कोणत्याही बाबींचा, कायदेशीर चौकटींचा विचार न करता पोस्ट करून बरेच नेटिझन्स मोकळे होतात. या प्रकरणात मात्र पोलिसांनी उत्साही कार्यकर्त्यांमागे चौकशीचा फेरा लावला आहे. संबंधित वकिलासह अन्य काही व्यक्तींविरोधात दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये कारवाई होणार आहे. असे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी भविष्यात सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून सोशल मीडियावर व्यक्त व्हावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांची हलगर्जी चिमुकल्यांच्या जिवावर

$
0
0

गुडगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या झाल्याच्या घटनेनंतर दोन दिवसांतच बेंगळूरूमधील एका शाळेत चारवर्षीय विद्यार्थिनीवर सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली. मोठ्या शहरांतील बड्या शाळांमधील या घटनांमुळे शाळांमधील विद्यार्थी सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एेरणीवर आला असून, शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणाच विद्यार्थ्यांच्या जिवावर उठत असल्याचे समोर आले आहे. मोठी फी घेऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करणाऱ्या अशा शाळांविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. नाशिकमधील शाळांची परिस्थितीही सुरक्षेच्या दृष्टीने काही वेगळी नसून, प्राथमिक सुविधांपासूनही विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरक्षेसाठी आवश्यक नियमावलीही या शाळा डावलत असून, शिक्षण विभागाचे दुर्लक्षही या प्रकरणांमध्ये समोर येत आहे.

--

सीसीटीव्ही मॉनिटरिंगचा अभाव

गेल्या वर्षी मुंबईतील एका शाळेत लहानग्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला होता. या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालनाये प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बंधनकारक करण्याची सूचना दिली. त्यानुसार राज्यातील बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. काही शाळांनी मात्र सीसीटीव्हीसाठी शाळेची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे सांगत या सूचनेकडे कानाडोळा केला. अनेक शाळांमधील सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याचेही चित्र आहे. अनेक शाळांचे प्रशासनदेखील या मुद्याकडे तितकेसे गांभीर्याने बघत नसल्याने विद्यार्थी सुरक्षा रामभरोसे असल्याची स्थिती उद्भवली आहे. शाळांमध्ये सध्या होत असलेल्या गैरप्रकारांची चाचपणी करण्यासाठी सीसीटीव्हीचे मागितले जाणारे फुटेज देण्यासही बहुतांश शाळा नकार देतात. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या शाळांमध्ये कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणाऱ्या घटना तपासण्यासाठी यंत्रणाच नसल्याचीही वस्तुस्थिती आहे. केवळ सीसीटीव्ही बसवून विद्यार्थी सुरक्षेबाबत शाळा प्रशासन किती जागरूक आहे, इतकेच दाखविण्याचा प्रयत्न शाळांकडून केला जात आहे. यात कैद झालेल्या घटनांचे मॉनिटरिंग करणाऱ्या व्यवस्थेची गरज यातून पुढे आली आहे.

--

पालकांनी करावी शहानिशा

विद्यार्थी सुरक्षेबाबत पालकांची भूमिकाही महत्त्वाची असून, जितकी सजगता आपल्या पाल्यासाठी शाळा निवडण्यासाठी पालक घेतात, तितकीच दक्षता त्या शाळेत आपला पाल्य किती सुरक्षित आहे, यासाठी ते घेत नसल्याचे वरचेवर घडणाऱ्या या प्रकरणांमुळे समोर आले आहे. नाशिकमध्येही पालकवर्ग शाळा व्यवस्थापनाच्या मुजोरीविरोधात, बेकायदेशीर फीविरोधात आंदोलने करीत असला, तरी यात विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा फार ठळक असल्याचे दिसून येत नाही. शाळेत कोणत्याही मानसिक, शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे का, याची शहानिशा वेळोवेळी पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद साधून केली पाहिजे, असा मुद्दाही या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात समोर आला आहे. पालकांचा पाल्याबरोबर वेळोवेळी सुसंवाद असेल, तर त्यांच्यासोबत घडणाऱ्या गंभीर घटनांना आळा बसू शकेल.

--

विद्यार्थ्यांसाठी संवाद माध्यमाची वानवा

अलीकडच्या काळात शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांत झालेली वाढ पाहता प्रत्येक शाळेत समुपदेशकाची नेमणूक असावी, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिलेल्या आहेत. मात्र, अपवाद वगळता बहुतांश शाळांमध्ये असे समुपदेशकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणवत असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी कोणतेही माध्यम उपलब्ध नाही. एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल, तर त्याला त्याच ठिकाणी वाचा फोडता येईल, अशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. नाशिकमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनीच त्यांच्या वर्गमैत्रिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा समुपदेशकांचा मुद्दा समोर आला. मात्र, आजच्या परिस्थितीत शाळांकडून यासंदर्भात सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शालेय आवारात विद्यार्थ्यांची होणारी घुसमट त्यांना एखाद्या गंभीर प्रकरणाकडे नेत असल्याचे अशा प्रकरणांवरून दिसून येते.

--

मूलभूत सुविधांकडे कानाडोळा

हजारो, लाखो रुपये फी घेऊन व त्यात दर वर्षी वाढ करूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही अनेक शाळांमध्ये पुरविल्या जात नाहीत. स्वच्छतागृहांमधील तुटलेले नळ, पाण्याचा अभाव, अस्वच्छता अशा स्वच्छतागृहांचा वापर विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संसर्गाची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ४१५ शाळांना कंपाऊंड नसल्याची व काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत कंपाऊंड असल्याची परिस्थिती आहे. शहरातही अशा अनेक शाळा असून, कंपाऊंड नसल्याने मोकाट जनावरांचा मोठा वावर या ठिकाणी असतो. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडूनही अशा ठिकाणी शाळांजवळ वाहन पार्किंग करणे, टवाळखोरी करण्यासारखे प्रकार केले जातात. यामुळेही विद्यार्थ्यांना इजा पोहोचण्याचा धोका असला, तरी शाळा प्रशासन अनेकदा गाफील राहते.

--

महिला सुरक्षारक्षकांची निकड

बोटांवर मोजता येतील इतक्या शाळांची संख्या सोडल्यास महिला सुरक्षारक्षकांची संख्या शाळांमध्ये फारशी आढळत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांशीही सुरक्षारक्षकांकडून अरेरावीची भाषा केली जाते. अशा परिस्थितीत महिला सुरक्षारक्षकांची गरज पालकांकडून पुढे आली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठीही हा मुद्दा समोर येत आहे. शिवाय, खासगी संस्थांमधून सुरक्षारक्षकांची नेमणूक शाळा करीत असल्याने सुरक्षारक्षकांच्या योग्य कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबदारीही शाळांनी स्वीकारणे आवश्यक आहे.

--

पालक-शिक्षक, परिवहन समिती नावालाच

सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या शाळांमध्ये पालक-शिक्षक संघाची स्थापना अनिवार्य आहे. पालक आणि शाळेला जोडणारी व विद्यार्थीनिगडित महत्त्वाचे निर्णय घेण्यास आवश्यक असणारी पालक-शिक्षक समितीही अनेक शाळांमध्ये अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी ती केवळ नावालाच आहे. प्रशासनाकडून सर्व शाळांमध्ये ही समिती स्थापन झाल्याचे गोडवे गायले जात असले, तरी अद्याप अनेक शाळांमध्ये अशी समितीच नसल्याचे वास्तव आहे. ज्या शाळांमध्ये ही समिती आहे, त्यांच्या महिनोन् महिने बैठकीच होत नसल्याची स्थिती आहे. हेच चित्र शालेय परिवहन समितीबाबतही आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याच्या घटना घडल्यानंतर या समितीबाबत शाळा प्रशासन, पोलिस, आरटीओ सजग झाले. मात्र, समन्वयाच्या अभावामुळे ठराविक कालावधीनंतर पुन्हा समित्या ठरत आहेत. सीबीएसई बोर्डानेही पालक-शिक्षण समितीच्या बैठकींमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या गरजेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

--

‘सीबीएसई’चे संलग्न शाळांना निर्देश...

प्रत्येक विद्यार्थ्याचा दिवसातील मोठा कालावधी शाळेत व्यतित होत असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशीही त्याचा सातत्याने संपर्क होत असतो. मात्र, या वर्गाकडूनच त्यांना इजा पोहोचणार असेल, तर विद्यार्थी सुरक्षेचे काय, हा मुद्दा आता चिंतेचा ठरत आहे. सुप्रीम कोर्टानेही या विषयाच्या सुनावणीत विद्यार्थी सुरक्षा विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातील गांभीर्य लक्षात घेता सीबीएसईकडून संलग्न शाळांना सुरक्षेविषयी विविध निर्देश देण्यात आले आहेत. शाळेच्या आवारात सुस्थितीत सीसीटीव्हीची कॅमेरे असणे, विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी शाळेच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात यावे, शिक्षक-शिक्षकेतरांची मानसिक चाचणी केली जावी, असे अनेक निर्देश सीबीएसईने संलग्न शाळांना दिले आहेत. शिक्षक, शिक्षकेतर, कंडक्टर, स्वीपर्स, वाहनचालक अशा सर्वांच्या चाचण्या याअंतर्गत घेतल्या जाणे अभिप्रेत आहे.

--

गुडगाव प्रकरणानंतर समोर आलेल्या बाबी

--

-शैक्षणिक संस्थांबाबत माहिती अधिकार कायदा लागू असावा.

-केजी टू पीजीसाठी केंद्रीयकृत प्रवेशप्रक्रिया राबविली जावी.

-प्रशिक्षित शिक्षकांचीच नेमणूक केली जावी.

-सुरक्षारक्षक व इतर स्टाफची पडताळणी केली जावी.

...


शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता तपासण्यासाठी आम्ही सहा पथकांची नेमणूक केली आहे. ही सुरक्षा पथके शाळांमध्ये जाऊन सर्व बाबींची पाहणी करीत आहेत. मराठी माध्यमाच्या व महापालिकेच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये समस्या उद्भवत असल्याने शहरातील इंग्रजी माध्यमाच्या ११० शाळांना या तपासणीत प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शाळा बसची सुविधा पुरवितात त्यांच्यावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण समिती

--

कोणतीही मोठी घटना घडण्याअगोदर लहान-लहान घटना घडलेल्या असतात, ज्याकडे शाळांनी दुर्लक्ष केलेले असते. अशा घटना शाळा दाबून टाकतात आणि त्यातून मोठी दुर्घटना घडते. याबाबत पालकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. शाळेचे कामकाज किती कायदेशीर पद्धतीने चालते आहे, याची शहानिशा त्यांनी वेळोवेळी केली पाहिजे. शाळांना कामकाजात पारदर्शकता नको असल्याने अशा घटनांवर अंकुश नसल्याचे दिसते.

-डॉ. मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच

--

केवळ मोठ्या आकड्यांची फी घेण्याकडे अनेक शाळांचा कल दिसून येतो. मात्र, त्या फीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिटसारख्या महत्त्वाच्या बाबींविषयीदेखील बहुतांश शाळा अनभिज्ञ असतात. त्यामुळे शाळांमधील सुरक्षाविषयक नियमावलीच्या अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणांनी पुरेशी तत्परता दाखविणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

-मकरंद वाघ, पालक

--

शहरातील शाळांची संख्या

--

महापालिका प्राथमिक १२७

महापालिका माध्यमिक १३

खासगी अनुदानित १८०

विनाअनुदानित १४०

कायम विनाअनुदानित ११०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है?

$
0
0

नाशिक ः सार्वजनिक वाचनालय नाशिकचा जिल्हा साहित्यिक मेळावा म्हणजे साहित्यप्रेमींना, आपल्या स्नेहांकितांना भेटण्याचे एक छानसे स्थळ व निमित्त. खेळीमेळीच्या, मनमोकळ्या वातावरणात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यिक मेळाव्याला या असे नेहमी आवर्जून सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यंदा साहित्यिकांच्या मांदियाळीऐवजी राजकारण्यांचीच भाऊगर्दी अधिक केल्याने ‘मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है,’ असे म्हणण्याची वेळ साहित्यिकांवर आली आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षातील मेळावा आणि सावाना पदाधिकाऱ्यांच्या नव्या कार्यकारिणीचा निवडून आल्यावर पहिलाच म्हणून या मेळाव्याकडून प्रचंड अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यक्रमपत्रिका पाहिल्यावर या अपेक्षांवर पाणी फेरले गेल्याचे चित्र आहे. पालकमंत्र्यांपासून, तर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यापर्यंत सर्वांनाच झाडून या ना त्या कारणाने निमंत्रित करण्यात आले आहे. राजकारण्यांना त्यांची व्यासपीठं कमी पडायला लागली, की काय अशी शंका यातून यावी इतक्या जणांना उद्घाटन व समारोपाला निमंत्रित करण्यात आले आहे.

जिल्हा साहित्यिक मेळाव्याची संकल्पना कुसुमाग्रजांची. त्यांनी अतिशय सूत्रबद्धपणे ती आखली होती. परंतु, यंदा त्यात साहित्य संमेलनासारखी ग्रंथदिंडी घुसविण्यात आली असून, मेळाव्याच्या अध्यक्षांचा उल्लेख पत्रिकेत सर्वच ठिकाणी संमेलनाध्यक्ष असाच करण्यात आला आहे. जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे रुपांतर व्यापक संमेलनात व्हावे यासारखा दुसरा चांगला विचार नाही. परंतु, केवळ साहित्यप्रकार बदलून काल, आज आणि उद्या असे विषय ठेवणार असाल, तर त्या संमेलनाची कीव यावी असेच आहे. ये रे माझ्या मागल्याप्रमाणे नाटक आणि कवितेचा विषय परिसंवादात ठेवण्यात आला. नृत्य, चित्र, शिल्प, संगीत यंदाही पारखेच राहिल्याचे चित्र आहे. त्यातच आता परिसंवादात दोनच वक्ते बोलणार, असा नवा पायंडा सावाना पाडणार असल्याचे पत्रिकेतून दिसते. कवितेच्या परिसंवादात तर फक्त एकच वक्ता बोलणार असून, मग त्याला व्याख्यानच म्हटले असते तर काय बिघडले असते, असा विचार डोकावून जातो.

शारदीय उत्सव म्हणून गौरवला जाणारा हा मेळावा खरोखरच जिल्हा पातळीवर होतो का, याचे उत्तर या दोन दिवसांच्या मेळाव्यानंतरही मिळत नाही. एक काळ असा होता, की जिल्हाभरातून कविसंमेलनासाठी येत, येथे कविता म्हणत व स्वत:ला कृतकृत्य समजून पुन्हा गावी जात. यंदा आता तसे काही जाणवत नाही.

--

कार्यक्रमांत विविधतेचा अभाव

भरगच्च कार्यक्रम दिले आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षांच्या

लेखनावर आधारित सादरीकरणाचा खास कार्यक्रम ठेवला आहे. यात विविधता लांबूनही डोकावताना दिसत नाही. ४९ वर्षांत जिल्हा साहित्यिक मेळाव्याने काय दिले असा विषय घेऊनही एक कार्यक्रम होणार आहे. मात्र, शिवाजी तुपे, यास्मिन शेख, चंद्रकांत महामिने, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, मीना वैशंपायन, भीष्मराज बाम असे अध्यक्ष व अनिल अवचट, विनायकदादा पाटील, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. श्रीपाद जोशी यांसारखे उद्घाटक लाभलेल्या मेळाव्यांनी मोठे विचार व साहित्यिक महाराष्ट्राला दिले आहेत. त्या अंगणात राजकारण्यांची गर्दी करून मेळाव्याला राजकारणाचा आखाडा करून नका, असे पदाधिकाऱ्यांना सांगण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयच्या ७०० विद्यार्थ्यांना शून्य गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मॉडेल आयटीआय म्हणून महाराष्ट्रातून एकमेव नाशिकच्या आयटीआयचे नाव यादीत घेण्यास आठवडाही उलटला नसताना याच आयटीआयमध्ये अप्रेंटिसशिप करणाऱ्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांच्या पदरात प्रॅक्टीकलमध्ये शून्य गुण मिळाल्याचे धक्कादायक वृत्त शनिवारी उघड झाले. एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागला. तब्बल पाच महिने लागलेल्या या निकालात पारदर्शकता नसल्याचा व ही पेपर तपासणी सदोष असल्याचा आरोप करत शेकडो विद्यार्थ्यांनी सातपूर आयटीआयमध्ये शनिवारी दुपारी निदर्शने केली.

आयटीआयच्या विविध ट्रेड्ससाठी ऑगस्ट २०१६ मध्ये वार्षिक परीक्षा नियोजित होती. परीक्षेच्या स्वरूपातील बदलांमुळे ही परीक्षा तब्बल ७ महिने उशिरा म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आली. यानंतर परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत लावणे बंधनकारक असताना तब्बल पाच महिने उशिरा म्हणजे सप्टेंबर २०१७ मध्ये हा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शनिवारी दुपारी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आयटीआय संस्थेच्या आवारात गर्दी करीत प्रशासनाला निकालातील गोंधळाबाबत जाब विचारला. मात्र, रिचेकिंग आणि रीपिटर्स परीक्षेचे अर्ज भरा, अशा अजब सूचना त्यांना संस्थेच्या वतीने देण्यात आल्या. या उत्तराने सदोष निकाल असल्याच्या आरोपाचे समाधान न झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

या निकालात ड्राफ्ट्समन अँड मेकॅनिकल या ट्रेंडचेच सर्वाधिक विद्यार्थी भरडले गेले आहेत. २२०० विद्यार्थ्यांनी अप्रेंटिस परीक्षा दिली होती. पैकी तब्बल ११०२ विद्यार्थी यात नापास असल्याची माहिती आहे, तर यातील ७०० विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल विषयात थेट शून्य गुण टेकविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांनी तर थिअरीचे पेपर व्यवस्थित देऊनसुद्धा त्यांना चक्क अॅब्सेंट दाखविण्यात आले आहे.

‍रिचेकिंगचा अर्ज कसा भरू?

या निकालाने अन्यायाची भावना झालेल्या एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भावना मांडल्या. तो म्हणाला, ‘‘गुणांमध्ये तफावतीची शक्यता असल्यास रिचेकिंगचा पर्याय वापरला जातो. जर प्रॅक्टीकल परीक्षेतच शून्य गुण शेकडो विद्यार्थ्यांना टेकविण्यात आले असतील तर रिचेकिंगचा अर्ज भरण्याचा अजब सल्ला संस्था प्रशासन देतेच कसे? असा अर्ज भरून नेमके काय फलित मिळणार आहे.’’

..अन् वाया गेली दोन वर्षे

आयटीआय परीक्षेच्या स्वरूपातील बदलांमुळे ऑगस्ट २०१६ मध्ये नियोजित असणारी ही परीक्षा चक्क एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे सात महिने परीक्षेस उशीर झाल्याने वाया गेले. त्यात एप्रिल २०१७ मध्ये परीक्षा झाल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात निकाल लागणे अपेक्षित होते. हा निकाल सप्टेंबरच्या मध्यावर जाहीर झाला आहे. निकालाच्या प्रतीक्षेत तीन महिने वाया गेले. असे विद्यार्थ्यांचे एकूण १० महिने वाया गेले आहेत, तर हाती पडलेला निकाल सदोष असल्याच्या भावनेमुळे नकळत दोन वर्षे वाया गेल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमध्ये आहे.

आश्वासनांवर बोळवण

विद्यार्थ्यांनी निकालाच्या मुद्द्यावरून शनिवारी दुपारी गोंधळ घातल्यानंतर प्रशासनास जाग आली. अगोदर विद्यार्थ्यांना न जुमानणाऱ्या संस्थेने या प्रकारावर सोमवारी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या प्रकारासंदर्भात नवीन सूचना असल्यास सोमवारी संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. संस्थेच्या या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आता सोमवारकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तयार व्हा, गरबा वर्कशॉपसाठी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीत मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे.. पारंपरिक गुजराती गाण्यांबरोबर महाराष्ट्रीयन, रिमिक्स, बॉलिवूड गाण्यांवर गरब्याचा ताल धरण्यासाठी तरुणांबरोबर प्रौढ वयोगटही उत्सुक असतो. पण गरबा खेळायला आवडत असले तरी अनेकांना गरबा, गरब्याच्या स्टेप्स काही जमत नाहीत. अशा सर्वांना गरब्याच्या टेक्निक्सविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये संजय सोनार हे बॉलीवूड स्टाइल गरबा शिकवणार आहेत.

दि. १८, १९ आणि २० सप्टेंबर असे तीन दिवस हे वर्कशॉप होणार आहे. ४५ नीलरत्न बांगला विसे मळा, कॅनडा कॉर्नर या ठिकाणी संध्याकाळी ७ ते ८ या वेळात, विश्वकर्मा गार्डन हॉल, महालक्ष्मी नगर महाराष्ट्र कॉलनी, हिरावाडी रोड पंचवटी या ठिकाणी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत, के. एन. केला स्कूल, करन्सी नोट प्रेसच्या समोर, जेलरोड या ठिकाणी दुपारी ३.३० ते ४. ३० वाजता तर आर के लॉन ,पाथर्डी फाटा या ठिकाणी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत गरबोली अर्थात बॉलीवूड स्टाईल गरबा शिकवला जाणार आहे. तेव्हा तुमच्या घराजवळ असलेल्या मटा कल्चर क्लब गरबा वर्कशॉपसाठी लगेच नोंदणी करा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

नोंदणी करणे अनिवार्य

या वर्कशॉपसाठी प्रत्येकाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी २०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये नोंदणी फी आहे. महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड याठिकाणी गरबोली वर्कशॉपचे नोंदणी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रायफलधारींचा पहारा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सुरक्षारक्षकांकडून महापालिकेत प्रवेश करणाऱ्या आगंतुकांना आवरणे शक्य होत नसल्याने, तसेच आमदार बच्चू कडूंच्या राड्यानंतर दक्ष झालेल्या प्रशासनाने महापालिकेची संपूर्ण सुरक्षाच खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयाला आता रायफलधारी सुरक्षारक्षकांचा वेढा पडणार आहे.

जवळपास ४५ सुरक्षारक्षकांचा वेढा महापालिकेभोवती पडणार असून, त्यात १८ सुरक्षारक्षक शस्त्रधारी राहणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हे सुरक्षारक्षक नेमले जाणार असले, तरी महापालिकेला एवढ्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. या निर्णयाने असामाजिक तत्त्वांचा महापालिकेतील प्रवेश रोखला जाणार असला, तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र ते जाचक ठरणार असल्याची चर्चा आहे.

आपले दैनंदिन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून राजीव गांधी भवनची ओळख आहे. सर्वसामान्यांशी निगडित असलेले प्रश्न महापालिका मुख्यालयातच सोडविले जातात. प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक निवडले जात असले, तरी प्रश्न सुटतीलच यादी गॅरंटी नसल्याने असंख्य नागरिकही थेट महापालिकेत येतात, तर नगरसेवकांच्या नावाने महापालिकेत काही गुन्हेगारही प्रवेश करीत असतात. महापालिकेतील निवडणुकांवेळी तर सर्रास गुंडांचाच प्रवेश होतो. काही दिवसांपूर्वी तर बंदुकधारी व्यक्तीलाच महापालिकेत पकडण्यात आले होते.

महापालिकेच्या गेटवर सुरक्षारक्षक असले, तरी त्यांना कोणी जुमानत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, या प्रकरणांना आवर घालण्यासाठी महापालिकेची संपूर्ण सुरक्षाच आता खासगी सुरक्षारक्षकांच्या हातात देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांच्या सुरक्षेसाठी मुंबईस्थित एका सुरक्षा महामंडळाकडून ४५ खासगी सुरक्षारक्षक प्रायोगिक तत्त्वावर घेतले जाणार आहेत. त्यातील १८ सुरक्षारक्षक रायफलधारी राहणार असून, उर्वरित २७ सुरक्षारक्षक साधे राहणार आहेत. त्यांच्यावर महापालिका मुख्यालयासह संपूर्ण परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे. सध्या ही जबाबदारी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांकडे असून, त्यांना येथून हलवून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. महापालिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या तपासणीसह प्रवेश देण्याचा हक्क या सुरक्षारक्षकांकडे राहणार आहे. प्रत्येक सुरक्षारक्षकावर महिन्याला २५ ते ३५ हजारांपर्यंत खर्च होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाने सत्ताधाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

--

सर्वसामान्यांची अडवणूक

महापालिकेची सुरक्षा व प्रवेश करणाऱ्या असामाजिक तत्त्वांना रोखणे हा प्रशासनाचा उद्देश असला, तरी त्याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांना होणार आहे. शस्त्रधारी सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून प्रवेश करण्यास सर्वसामान्य नागरिक अजूनही घाबरतो. त्यामुळे तो मुख्यालयापासून अंतर राखण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महापालिकेत प्रवेश करणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आणि सुरक्षारक्षकांमध्ये हमरीतुमरी होऊन कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या गुंडांनाही त्याचा फटका बसून वादविवाद होण्याची शक्यता आहे.

--

महापालिका पोलिसांच्याही पुढे

नाशिककरांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिस आयुक्तालयात जवळपास पाच ते सहा शस्त्रधारी सुरक्षारक्षक आहेत. दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्याने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असतो. परंतु, महापालिकेत तब्बल १८ रायफलधारी सुरक्षारक्षक तैनात होणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील गुन्हेगारी वाढल्याने कदाचित महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाच असुरक्षित वाटत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिस आयुक्तांच्या दोन पावले पुढे जात शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालक-शिक्षक संघ नावालाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक : शुल्क नियंत्रण कायद्यानुसार प्रत्येक शाळेला पालक-शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य असले, तरी शाळा मात्र या नियमाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेबाबत भयावह परिस्थिती असताना व शुल्कवाढीबाबत सातत्याने पालक, शाळा प्रशासन यांच्यात वादंग निर्माण होत असतानाही अद्याप पालक-शिक्षक संघाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

अनेक शाळांमध्ये हा संघ स्थापन केल्याचे सांगितले जात असले, तरी तो केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहत असून, या संघाच्या बैठकीही होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचे सत्र सुरू होण्यापूर्वीच पालक-शिक्षक संघाची स्थापना व शुल्क निश्चित करणे आवश्यक असते. मात्र, २०१७-१८चे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असला, तरी बहुतांश शाळा या संघाच्या स्थापनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. शालेय शुल्कासारख्या महत्त्वाच्या निर्णयाचे स्वातंत्र्य या संघामुळे हिरावत असल्याच्या भावनेतून शाळा सोयीस्करपणे या कायद्याच्या अंमलबजावणीलाच तिलांजली देऊ पाहत आहेत. याचा परिणाम शाळा प्रशासन व पालक यांच्यात वादाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरत असून, शाळेचे शुल्क निश्चित करण्यासही मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे सामान्य पालकाला रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ येत असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

--

अशी असते रचना

पालक-शिक्षक संघाची रचना कायदेशीर पद्धतीने ठरवून देण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून प्राचार्य, मुख्याध्यापक, उपाध्यक्ष म्हणून पालकांमधून एक, सचिव म्हणून शिक्षकांमधून एक, सहसचिव दोन, पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक, सदस्य प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक, प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य), या समितीत ५० टक्के महिला सदस्य, समितीची मुदत दोन वर्षे, दोन महिन्यांतून किमान एकदा पालक-शिक्षक संघाची बैठक होणे अपेक्षित असते.

--

-शाळांची हलगर्जी चिमुकल्यांच्या जिवावर पान २

--

पालक-शिक्षक संघ न स्थापिलेल्या शाळांबाबत तपासणी करून त्यांना ताबडतोब नोटीस बजावणार आहोत. त्यांना संधी देण्यात येईल. त्यानंतरही या संघाची स्थापना न केल्यास कठोर कारवाईचा प्रस्ताव आम्ही देणार आहोत.

-रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक

--

पालक-शिक्षक संघाची स्थापना केली, तर शाळेला महत्त्वाच्या निर्णयांमध्ये, तसेच शुल्क निश्चित करण्याबाबत पालकांची संमती घेणे आवश्यक असते. शाळेचा ऑडिट रिपोर्ट दाखविणेही शाळा प्रशासनाला अनिवार्य बनते. त्यामुळे हा संघ स्थापन करण्याबाबत टाळाटाळ होते.

-योगेश पालवे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्ती अडचणीत?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्यानंतर जिल्ह्याभरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाटी सार्वजनिक बांधकाम विभागीने १६२ कामांचे ८७ कोटींचे वार्षिक टेंडर काढले आहे. त्याचबरोबरच नव्या ४२ कामांचे १२० कोटींचे टेंडरही प्रसिद्ध केले आहे. पण, ही कामे करणारे शासकीय ठेकेदार हे टेंडर भरणार नसल्यामुळे बांधकाम विभागाची कोंडी झाली आहे. जीएसटीमुळे शासकीय ठेकेदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसले असून, त्यामुळेही कामे अडचणीत येणार आहे. बहिष्कार कायम राहिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग यातील काही कामे करणार आहे.

जिल्ह्यातील २८०० कि.मी. मार्गावर हे दुरुस्तीचे काम दिले जाणार असून, ८०० कि. मी. अंतरावरील रस्त्याचे नव्याने काम केले जाणार आहे. त्यात रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे. या दोन्ही कामांत रस्त्यांची पुढील दोन वर्षे दुरुस्ती ठेकेदारांनाच करावी लागणार आहे. जिल्ह्यात पावसाळा व त्यापूर्वी या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अगोदरच वाहनचालकांमध्ये संताप आहे. त्यामुळे ही कामे जर वेळत झाली नाही, तर त्यातून अपघाताचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे ही कामे लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असले तरी शासकीय ठेकेदारांचा असहकार त्यात अडथळा आहे.

१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्याभरातच शासकीय ठेकेदारांनी या करपद्धतीवर आक्षेप घेवून त्याविरुद्ध भूमिका घेतली. या नव्या करपद्धतीमुळे शासकीय कामातील बिल्डिंग कामात ६ ते ७, रस्ते कामात १० ते १३ टक्के व धरण बांधकामात १६ ते १७ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे हे पैसे सरकारने द्यावे किंवा त्याचा टेंडरमध्ये अंतर्भाव करावा, अशी ठेकेदारांची मागणी आहे. त्याचप्रमाणे अगोदर केलेल्या कामांसाठी लागणार जीएसटी सरकारने भरावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. १ कोटी रुपयांसाठी १८ लाखांच्या आसपास जीएसटी लागणार असेल तर कामे कशी करायची असा प्रश्नही ते उपस्थित करतात.

बांधकाम विभागाची होणार कोंडी

बिल्डर्स असोशिएन ऑफ इंडिया या संघटनेने या करपद्धतीच्या विरोधात महिनाभरापूर्वी बैठक घेतली. त्यात सरकारने जीएसटीबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे सर्वच शासकीय कामांच्या निविदा न भरण्याचा निर्णय घेवून त्यावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास १८ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलनही केले. या शासकीय ठेकेदारांनी हे आंदोलन करतांना त्यांची भूमिकाही स्पष्ट केली. त्यात जीएसटी १ जुलै रोजी लागू झाला, पण तो लागू होण्यापूर्वी झालेल्या निविदेमध्ये जीएसटीचा अंर्तभाव नसल्याने ठेकेदार त्या कामावर जीएसटी भरू शकणार नाही. या कामावर लागणारा जीएसटी सरकारने ठेकेदाराला द्यावा. तसेच १ जुलैनंतर प्रसिद्ध होणाऱ्या निविदेवर वेगळा जीएसटी सरकारने द्यावा, अशी मागणी या असोसिएशनने केली आहे. यासर्व प्रकारात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुरुस्तीच्या व नवीन कामांची कोंडी होणार असून त्याचा फटका मात्र वाहनचालकांना बसणार आहे.

रस्ता दुरुस्तीचे ८७ कोटी व रुंदीकरण व मजबुतीकरणाचे १२० कोटींच्या कामांचे टेंडर काढले आहे. काही कामांना शासकीय ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. पण, तो न दिल्यास बांधकाम विभाग ही कामे करेल.
आर. आर. हांडे, अधीक्षक अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौतमी तलावातील माशांचा गूढ मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तलावतील मासे रात्रीतून कसे मेले याचे याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.

मंदिराचे दक्षिण बाजूस विस्तीर्ण असा गौतम तलाव आहे. गत काही वर्षांपासून येथे मासे जोपासले जात आहेत. दर्शनास आलेले भाविक, यात्रेकरू या तलावातील माशांना खाद्यपदार्थ खाऊ घालत असत. पूर्वी येथे बेकरी होती. या बेकरीतून डजनवारी पाव घेऊन भाविक माशांना खायला देत. मध्यंतरी ती बेकरी येथून हलविण्यात आली. त्यानंतर काही महिला येथे पाव विक्री करत. विष्णुच्या दशावतरात मस्य अवतार हा प्रमुख अवतार आहे. माशांना खायला दिल्यास पुण्य मिळते आदी, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तलावात पाव टाकणाऱ्यांच्या संख्येत दिवसोंदिवस वाढ होत गेली. काही स्थानिक भाविक कणीक मळून तेही टाकत.

मात्र शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्थानिक भाविक तलावावर गेले असता तेथे पाण्यावर मृत मासे तरंगताना दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सकाळी काही तरुण हे मासे गोण्यांमध्ये भरून रिक्षा, टेम्पोद्वारे घेऊन गेले. याबाबत त्यांना हटकणाऱ्यांना त्यांनी हे मासे दुर्गंधी निर्माण करतील म्हणून जाळण्यासाठी अथवा पुरण्यासाठी घेऊन चाललो, असे सांग‌तिले. मासे साधरणत: एक ते ५ किलो वजनाचे होते, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किनो शिक्षा गौरव’ने शिक्षकांचा सन्मान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील किनो एज्यु. सोसायटीच्या वतीने यंदादेखील जिल्ह्यातील १८ तर राज्यस्तरीय दोन आदर्श शिक्षकांना किनो शिक्षा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील दरेगाव परिसरातील संस्थेच्या अलकबीर इंग्लिश मीड‌िअम स्कूलमध्ये हा सोहळा झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयशानगर पोल‌सि ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे होते. संस्थेचे अध्यक्ष रईस शेख, उपाध्यक्ष सोहेल कुरैशी, विश्वस्त मतीन कुरैशी, शिक्षणविस्तार अधिकारी डी. एस. गायकवाड, आत्माराम अहिरे, नितीन चौधरी, केंद्रप्रमुख सुनंदा पवार, मुख्याध्यापिका अर्चना गरुड आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या योगदानातून केवळ विद्यार्थी घडतात असे नाही तर त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याने समाजाला दिशा मिळते. अशा कार्याची दखल सामाजिक पातळीवर घेतली जाणे कौतुकास्पद आहे. पुरस्काराने माणसाचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो व जबाबदारी देखील वाढते, असे शोभा पारधी म्हणाल्या.

शासनाच्या सरल प्रणालीचे राज्य समन्वय पुणे जिल्ह्यातील शिक्षक प्रदीप भोसले व म. फारुक अ. कुद्दुस (अमरावती) यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय गुणवंत शाळा म्हणून देवळा तालुक्यातील फगंदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तर तालुकास्तरीय गुणवंत शाळा म्हणून मालेगाव तालुक्यातील खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सन्मान करण्यात आला. पारधी यांनी शिक्षक समाजाचा दुवा असल्याचे सांगून शिक्षकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. रईस शेख यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारार्थी शिक्षकांच्या वतीने दीपक हिरे व वर्षा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

या शिक्षकांचा झाला सन्मान

जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकांमध्ये ज्ञानेश्वर नवसरे (पेठ), गोरक्ष सोनवणे(सिन्नर), विलास जमदाडे (दिंडोरी), नीलेश भामरे (कळवण), देवीदास कदम (सटाणा), वर्षा चौधरी (इगतपुरी), प्रकाश चव्हाण (निफाड), हनुमंत काळे (येवला), देवीदास शेवाळे (देवळा), विलास गवळे (नाशिक), प्रदीप देवरे (चांदवड), वैशाली भामरे (मालेगाव), दीपक हिरे (मालेगाव), नीलेश नहिरे (मालेगाव), जिभाऊ जाधव (मालेगाव) या शिक्षकांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images