Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नर्सिंगची इमारत महिनाभरात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सामान्य रुग्णालयानजीक उभारण्यात येत असलेल्या मालेगाव नर्सिग महाविद्यालयाची ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत येत्या १५ दिवसात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्या इमारतीत विद्यार्थ्यांची राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले.

येथील मालेगाव नर्सिंग महाविद्यालयास सन २०१७-१८ साठी महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई यांनी मान्यता दिल्यानंतर या महाविद्यालयासाठी एक ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. सद्यस्थितीत याठिकाणी ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून, नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्यांची तात्पुरत्या स्वरुपात सामान्य रुग्णालयात राहण्याची व्यवस्था केली आहे. येत्या १५ दिवसात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्या इमारतीत त्यांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले. चालू शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून २८ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवून नाशिकच्या मेरिटप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सद्यस्थितीत या महाविद्यालयात ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून ४ शिक्षक व प्राचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

महिला रुग्णालयाचे काम जानेवारीत मार्गी

सटाणा रोडवरील स्वंतत्र महिला रुग्णालयाविषयी माहिती देतांना भुसे म्हणाले की, गेल्या बऱ्याच वर्षांपासून ही इमारत पडून असल्याने दुरुस्तीसाठी व इतर कामकाजासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच जानेवारीपर्यंत सदर रुग्णालयाचे काम मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड तासात सहा चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सक्रिय झालेल्या चोरट्यांनी गुरूवारी सकाळी शहरात धुमाकूळ घालत तब्बल सहा ठिकाणी स्नॅचिंग केली. अवघ्या दीड ते पाऊणे दोन तासात गंगापूररोड, द्वारका आणि पंचवटी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष्य करण्यात आले. यात सुमारे आठ तोळे वजनाचे सोने चोरीस गेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी एका ठिकाणी हेल्मेट घालून चेन स्नॅचिंग केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

सहापैकी चार घटना गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तर उर्वरित दोन घटना भद्रकाली आणि पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडल्या. पंचवटीतील घटनेबाबत सायंकाळपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. सकाळी पाऊणेसात वाजेपासून साडेआठ वाजेपर्यंत कॉलेजरोडवरील बिग बाजार चौक ते गंगापूररोडवरील मर्चंट बँकेदरम्यान काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी तब्बल चार महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन ओरबोडून नेले. या प्रकरणी चंदा पुखराज जैन (५९, रा. पंपिंग स्टेशन, गंगापूररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित तीन महिलांना यात साक्षिदार म्हणून नोंदवण्यात आले. जैन यांच्या फिर्यादीनुसार, गुरूवारी सकाळी फिरण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या. घरापासून थोडे दूर गेल्यानंतर काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे आणि ३६ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबोडून नेले. या गुन्ह्याबाबत आरडाओरड सुरू असतानाच चोरट्यांनी थोड्याच अंतरावर मालती रामचंद्र कुलदेवरे यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे आणि ३६ हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडले. दोन गुन्ह्यानंतरही चोरट्यांनी याच परिसरात पायी फिरणाऱ्या उषा हरिभाऊ थेटे यांना लक्ष्य केले. त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे आणि ३६ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून धूम ठोकली. दरम्यान, चेन स्नॅचिंगची तिसरी घटना घडल्यानंतर पोलिसही सावध झाले. काही ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. चोरट्यांनी याच परिसरात पुष्पा श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या गळ्यातील २० हजार रुपयांचे आणि १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. सर्व महिला ५५ ते ६० वयोगटातील आहे. यामुळे गंगापूरसह कॉलेजरोड परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, चेन स्नॅचर्सने तपोवनरोड आणि पंचवटी परिसरातही हात साफ केला. तपोवनरोडवरील जैन स्थानकाजवळ सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास स्नॅचिंगचा प्रकार घडला. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या शंकुतला आर. पाटील (५३, गणेशनगर, काठेगल्ली) या देवपूजेसाठी फुले तोडत असताना हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांचे आणि पावणे दोन तोळा वजनाचे मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील टकलेनगर येथेही चेन स्नॅचिंग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नव्हता.

नाकाबंदीचा फायदा नाही

एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांनंतर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सहायक आयुक्त, सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी लावली. चोरटे आले त्या मार्गी लंपास झाले. या गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हेगारांसह महिलांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते.


चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये बाहेरच्या काही सराईत गुन्हेगारांचा हात असावा. एकाच वेळी झालेल्या या घटनांची पोलिसांनी गंभीर नोंद घेतली असून, त्याचा सर्वांगाने तपास करून संशयितांना जेरबंद करण्यात येईल. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथक तैनात असून, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आंबिवली येथे जाऊन शोध घेतला.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य’तर्फे फेलोशिपसाठी प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षातील फेलोशिप अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. राज्यभरातील विविध संलग्नित मेडिकल कॉलेजेसमध्ये याअंतर्गत उमेदवारांना प्रवेश घेता येईल. त्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

याबाबत कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, की आरोग्य विद्यापीठातर्फे राज्यातील आरोग्य शिक्षण देणाऱ्या कॉलेजेससमवेत विविध विषयांतील तज्ज्ञांची उपलब्धता आणि उत्तम दर्जाची रुग्णसेवा व मूलभूत सुविधा असणाऱ्या रुग्णालयांना फेलोशिपचे अभ्यास केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या फेलोशिप अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेल्या डॉक्टरांना अधिक कौशल्याधिष्ठित ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळावी, असा आहे. या अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट सिस्टिम पद्धती आहे. एकूण २०० क्रेडिट मिळविणारा विद्यार्थी अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे.

--

९४ अभ्याक्रमांसाठी ६७५ प्रवेशक्षमता

वैद्यकीय शाखेच्या ९४ फेलोशिप अभ्यासक्रमांसाठी ६७५ प्रवेशक्षमता आहे. दंत विद्याशाखेच्या १७ फेलोशिप अभ्यासक्रमासाठी १८५, आयुर्वेद विद्याशाखेच्या ८ फेलोशिप अभ्यासक्रमासाठी २२५, नर्सिंग विद्याशाखेच्या एका फेलोशिप अभ्यासक्रमासाठी ६, फिजिओथेरपी विद्याशाखेतील एका फेलोशिप अभ्यासक्रमासाठी ५ आणि ऑक्युपेशनल थेरपी विद्याशाखेच्या एका फेलोशिप अभ्यासक्रमासाठी ५ याप्रमाणे प्रवेशक्षमता असल्याची माहिती प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी दिली.

--

फेलोशिपसाठी ११७ अभ्यास केंद्रे

विद्यापीठाच्या फेलोशिप अभ्यासक्रमासाठी राज्यभरात ११७ अभ्यास केंद्रे आहेत. त्यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेची ९२ अभ्यास केंद्रे आहेत. दंत विद्याशाखेची ९ अभ्यास केंद्रे, आयुर्वेद विद्याशाखेची १३ अभ्यास केंद्रे, तर नर्सिंग, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी विद्याशाखेकरिता प्रत्येकी एक अभ्यास केंद्र आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम त्यांची नावनोंदणी करावी लागणार आहे. या अर्जासाठी एकूण सहा टप्पे आहेत. फेलोशिप अभ्यासक्रमांबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

--

२०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षासाठी १२२ विषयांच्या फेलोशिप कोर्सेसला विद्यापीठाने मान्यता दिली आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर अत्याधुनिक ज्ञान संकलनासाठी फेलोशिप अभ्यासक्रम गरजेचे आहेत. विशिष्ट विषयातील सखोल ज्ञान मिळविण्यासाठी परदेशातील शिक्षणास पर्याय नव्हता. आता विद्यापीठाच्या १२२ फेलोशिपमुळे ११०१ विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

-डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या लपंडावाने संताप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन सर्वांना चोवीस तास वीज देण्याचे आश्वासन देऊन २४ तास उलटत नाहीत तोच वीज वितरण कंपनीकडून इंदिरानगरवासीयांची परीक्षा पाहिली जात आहे. इंदिरानगर भागासह राजीवनगर भागात वारंवार होणारा विजेचा लंपडाव गुरुवारीही सुरूच राहिला. इंदिरानगर भागात तर दुपारी सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला.

इंदिरानगर भागात विजेचा लंपडाव हा नित्याचाच प्रकार झाला आहे. दररोज इंदिरानगर भागातील वीजपुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणाने खंडित केला जाताना दिसतो. शहरात बुधवारीच ऊर्जा मंत्र्यांचा दौरा झाला असूनही यावर काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. इंदिरानगर भागात सलग दोन दिवसांपासून दुपारी चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता दररोज नवनवीन कामे सुरू असल्याचे सांगून नागरिकांची बोळवण केली जात अाहे. पाऊस आल्यानंतर तर विजेचा पुरवठा खंडित होणे हा अलिखित नियमच झालेला असून, केवळ पावसाळी वातावरण झाले तरी वीजपुरवठा बंद होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असून, त्यातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिाकंची लाहीलाही होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रस्त झालेले नागरिक वीज वितरण कंपनीकडे विचारणा करतात. मात्र, काही तरी कारण सांगून एक तासात लाइट येईल, असे सांगितले जाते. सर्वत्र भारनियमन बंद असताना केवळ इंदिरानगर भागातच भारनियमन करण्याचे काय कारण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रश्नाकडे सध्या एकाही राजकीय पक्षाचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे. इंदिरानगर भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--

राजीवनगरवासीयांनाही झळ

राजीवनगर भागातही आता अशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. राजीवनगर भागात पाच-पाच मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची विद्युत उपकरणेसुद्धा खराब झाली आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

---

केवळ येथेच भारनियमन कसे?

इंदिरानगर भागात लोडशेडिंग जाहीर करण्यात आले असून, याबाबतची माहिती नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी नगारिकांना दिली आहे. मात्र, सध्या कोठेही भारनियमन नसताना केवळ इंदिरानगरवासीयांवरच हा अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान सकाळी ६ ते ८.३०, तर दुपारी २ ते ४, तर गुरुवार ते रविवारदरम्यान सकाळी ८.३० ते १०.४५ व दुपारी ४ ते ६.३० अशा पद्धतीने हे भारनियम जाहीर करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या पाच अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महावितरण कंपनीच्या कारभाराचा गुरूवारी (दि. १४) झालेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर जनतेकडून तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. त्यामुळे कामचुकार भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जनता दरबारात घाम थांबेना झाला होता. महावितरण कंपनीचे बहुतेक अधिकारी सरकारी पैशांवर डल्ला मारतात. तर कुटुंबासह कंपनीच्या वाहनावर भटकंतीला जातात, असे गैरप्रकार जिल्ह्यातील अधिकारी करीत असल्याचा आरोपही जनतेकडून मंत्री बावनकुळे यांच्याकडे करण्यात आले. त्याची तत्काळ दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी धुळे जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांना तडकाफडकी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभरात जनतेशी संवाद सादर असून, धुळ्यात गुरूवारी (दि. १४) शाहू नाट्यमंदिरात जनता दरबार घेण्यात आला. त्यावेळी जनतेने मंत्री बावनकुळे यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या तक्रारी खुलेपणाने सांगितल्या. त्यामध्ये शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या पावर हाऊसमध्ये अधिकारी व कर्मचारी एसी, पंखे, विद्युत दिवे अहोरात्र सुरूच ठेवतात. महावितरणचे काही अधिकारी अॅट्रॉसिटीची धमकी दाखवितात, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकूंद कोळवले यांनी यावेळी केला.

नवीन मीटर देणे, विद्युत पुरवठा बंद झाल्यावर त्वरित सुरू करणे, धोकादायक वीजतारांना ताण देणे यासह अन्य कामांना कर्मचारी हेतूपुरस्कर उशीर करतात. शहरालगत असलेल्या वलवाडी परिसरात तर रात्रंदिवस रस्त्यावरील पथदिवे सुरूच असतात मग विजेची बचत होते का, अशा तक्रारी नागरिकांकडून ऊर्जामंत्र्यांना करण्यात आल्या. मंत्री बावनकुळे यांनी यावर जे अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची मानसिक चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षाच्या मुलाची हत्या झाल्यानंतर शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा मुद्दा समोर आला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना हानी पोहोचवल्याची उदाहरणे गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समोर आल्याने आता शिक्षक, शिक्षकेतरांची मानसिक चाचणी करण्याचा फतवा ‘सीबीएसई’ने काढला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व शिक्षक, शिक्षकेतरांच्या चाचण्या पूर्ण व्हाव्यात, असा निर्देशही या बोर्डाकडून देण्यात आला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याचा दिवसातील मोठा कालावधी शाळेत व्यतित होत असतो. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशीही त्याचा सातत्याने संपर्क होत असतो. मात्र, या वर्गाकडूनच त्यांना इजा पोहोचणार असेल तर विद्यार्थी सुरक्षेचे काय, हा मुद्दा आता चिंतेचा ठरत आहे. सुप्रीम कोर्टानेही या विषयाच्या सुनावणीत विद्यार्थी सुरक्षा विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातील गांभीर्य लक्षात घेता ‘सीबीएसई’ संलग्न सर्व शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर, कंडक्टर, स्वीपर्स, वाहनचालक अशा सर्वांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

हे नियमही पाळा
शिक्षकांच्या मानसिक चाचणीसह शाळेचा सर्पोटिंग स्टाफ हा नामांकित संस्थांमधील असणे आवश्यक असून त्यांच्या योग्य कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. शाळेच्या आवारात सुस्थितीत सीसीटीव्हीची कॅमेरे असणे, विद्यार्थी सुरक्षित राहावे यासाठी शाळेच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात यावे अशा वेगवेगळ्या सूचनाही ‘सीबीएसई’कडून शाळांना देण्यात आल्या आहेत.


शिक्षक, शिक्षकेतरांची मानसिक चाचणी घेण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. यामुळे त्यांच्या अंतर्मनात काय चालले आहे, त्यांची विद्यार्थ्यांप्रती मानसिकता काय आहे, परिस्थितीनुसार त्याच्या वागण्यात काय बदल होतात, हे जाणून घेणे सोपे होईल.
- सचिन जोशी, सचिव, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मानसिकरित्या सक्षम आहेत की नाही हे पाहण्यासाठी हा निर्णय अतिशय चांगला आहे. इंग्लिश मीडियममधील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर कार्यरत असतात. त्यामुळे ते तितक्या गांभीर्याने विद्यार्थ्यांकडे पाहत नाही. यासारखे अनेक मुद्दे या शिक्षकांना अस्वस्थ करतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर राग व्यक्त करण्यापर्यंत होतो. अशा चाचण्यांमधून त्यांची मानसिकता समजून ते शिक्षकी पेशासाठी पात्र आहेत की नाही हेदेखील ठरेल.
- विलास पाटील, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याच्या उत्पन्नात ५० कोटींची भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जीएसटी करपद्धतीने राज्याला ५० कोटी रुपये जास्त मिळाले असून ते अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यात व्हॅटचाही समावेश आहे. आम्हाला केंद्र सरकारकडून १५ हजार कोटी रुपये घ्यावे लागेल असे वाटत होते. पण त्यातून दिलासा मिळाला आहे. अजूही आयात वस्तूचा कर बाकी आहे पण रिफंडमध्ये तो जाईल. महाराष्ट्र जीएसटीचे टार्गेट पूर्ण करेल अशी माहिती राज्याचे अर्थ राज्यमंत्री डॉ. दीपक केसरकर यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर व पूना मर्चंट्स चेंबर यांनी आयोजित जीएसटी राज्यपरिषदेसाठी ते नाशिकला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की जीसटीबद्दल व्यापाऱ्यांचा गैरसमज जास्त आहे. अन्नधान्यावर कर नाही पण ब्रॅण्डेडवर आहे.पूर्वी त्यावर व्हॅट होताच. दोन दिवसापूर्वी झालेल्या हैदराबाद येथे झालेल्या परिषदेत ४० वस्तूवर कमी केले आहे. त्यात मोटारीपासून चिंचेचा सुद्धा समावेश आहे. ७५ लाखापर्यंत जीएसटी नाही पण त्याची मर्यादा वाढावी व ती एक कोटी असावी अशी आम्ही अगोदरच मागणी केली आहे. जीएसटीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. हा कर शेतकऱ्यांना अनुकूल आहे. यातील त्रुटी दूर करून अधिकची शिबिर व परिपत्रक काढून त्याची पद्धती सोपी केली जाईल. त्यासाठी सहा महिन्याचा कालावधी जावा लागेल. नंतर प्रत्यक्ष कर कमी होईल. रिफंड सिस्टीमध्ये आलो की सर्व सुरळीत होईल, असेही ते म्हणाले.

खरेदीवर एलबीटी नाहीच
मुद्राक कार्यालय मालमत्ता खरेदी-विक्रीवर महापालिका क्षेत्रात एक टक्का एलबीटी घेत असलेल्या प्रश्नावर केसरकर यांनी एलबीटी रद्द झाला असल्याचे सांगून तो कोणीही वसूल करू नये असे सांगितले. त्यासाठी राज्य पैसे देते. त्याबाबत मी चौकशी करेल व योग्य ती कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला.

मी मुळचा व्यापारीच
परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. दीपक केसकर म्हणाले, की मी राजकारणी असलो तरी मुळचा व्यापारी आहे. छोट-छोटे मुद्दे आहे. व्हॅटमध्ये सुद्धा ते होतेच. काही परिपत्रका काढायचे बाकी आहे. ७५ लाखाची मर्यादाही वाढवली जाण्यासाठी प्रयत्न करू. अनेक गोष्टीबद्दल जीएसटी कौन्सिलकडे मांडून त्यात सुधारण केल्या जात आहे. सुरुवातीला सहा महिने रिझल्ट मिळणार नाही. एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी घाई केली. त्यासाठी आंदोलन केले त्यामुळे तो अगोदर रद्द करावा लागला. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले. केंद्राकडून भरपाई मिळाली नाही. त्यामुळे जीएसटी बाबत व्यापाऱ्यांनी श्रद्धा व सबुरी ठेवावी. त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. काही काळ वाट बघू. महाराष्ट्र सर्वांच्या प्रयत्नामुळे मोठा झाला आहे.

तर त्यांना दारे कायमची बंद होतील
पैशाच्या जोरावर राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आता तर कोर्टाकडे कोणत्या नेत्याकडे किती संपत्ती जास्त वाढली याची यादी आली आहे. त्यातून पैसे कुठून आले याचा हिशोब द्यावा लागणार असल्याचे सांगत अर्थ राज्यमंत्री डॉ. दीपक केसरकर यांनी राणेच्या भाजप प्रवेशाबाबत चिमटा घेतला. राणे आपल्या भागातले असून त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी राणे हा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोठा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॉलेरन्स टू झिरो करप्शन ही घोषणा केली आहे. त्यामुळे अशा नेत्यांना भाजपने प्रवेश देतांना मोदीच्या घोषणेची अमंलबजावणी करावी. अशी अमंलबजावणी भाजपने केली तर अशा नेत्यांची दारे कायम बंद होतील, असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाने मालेगावकर त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात सध्या भारनियमन सुरू असून, संध्याकाळी व रात्री वीजपुरावठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरणकडून करण्यात येणारे सायंकाळ व रात्रीचे भारनियमन त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही मालेगावकर संघटनेने दिला आहे.

शहरात सुरू असलेल्या भारनियामनाबाबत आम्ही मालेगावकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता संजय आढे यांची भेट घेवून निवेदन दिले. यात सर्वत्र भारनियमनाची वेळ सायंकाळी व रात्रीची आहे. तर काही भागात सकाळी देखील वीज नसते. या भारानियामानाच्या वेळेत महापालिकेचा पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागात महिला वर्गास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. आगामी काळात नवरात्र, दसरा, मोहरम व दिवाळी सारखे सण उत्सव असल्याने शहरातील बाजारपेठेत सायंकाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भारानियामानामुळे अंधराचा सामना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ वृक्षांवर कुऱ्हाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

सिव्ह‌लि हॉस्प‌टिलच्या आवारात माता व बालसंगोपन केंद्राच्या नवीन इमारतीस अडथळा ठरणारे ३० वृक्ष हटविण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने गुरुवारी परवानगी दिली. येथील तीस वृक्षांपैकी २७ वृक्षांचे पुनर्रोपण तर तीन वृक्ष तोडली जाणार असून, त्याबदल्यात सिव्ह‌लि हॉस्पीटलला प्रतीवृक्ष दहा याप्रमाणे तीनशे वृक्ष नवीन लावावे लागणार आहे. वृक्ष प्राध‌किरण समितीने परवानगी दिली असली तरी, हॉस्प‌टिल प्रशासनाला हायकोर्टात प्रमाणपत्र सादर करून अंतिम परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच इमारतीचे काम सुरू करता येणार आहे.

महापालिकेच्या वृक्ष व प्राधिकरण समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीवर नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांनी त्यात सहभाग घेतला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, चंद्रकांत खाडे, ऋची कुंभारकर, नगरसेवक श्‍यामकुमार साबळे, शेखर गायकवाड, संदीप भवर, मनोज घोडके,योगेश निसाळ यांच्यासह तज्ञ समिती सदस्य उपस्थित होते. सिव्ह‌लि हॉस्पीटलमध्ये इन्क्‍युबेटरची संख्या कमी असल्याने पाच महिन्यांत १८७ बालकांना जीव गमवावा लागला आहे. हॉस्प‌टिलच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालसंगोपन केंद्राची (एनसीएच विंग) इमारत मंजूर झाली आहे. त्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी पडून आहे. महापालिकेने येथील ३० वृक्ष तोडण्यास परवानगी न दिल्याने विस्तार होवू शकला नाही, असे कारण देत महापालिकेवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न सिव्ह‌लि प्रशासनाकडून केला जात होता. परंतु पालिकेने हा आरोप फेटाळला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा लिलाव बंद; शेतकरी संतप्त

$
0
0

टीम मटा

प्राप्तीकर विभागाने लासलगाव, चांदवड, सटाणा, येवला, पिंपळगाव, कळवण, उमराणे छापे टाकल्यामुळे शुक्रवारी कांदा लिलावावर त्याचा परिणाम झाला. या कारवाईचा निषेध करीत अनेक ठिकाणी रास्ता रोको करून ल‌लिाव बंद पाडण्यात आले. तसेच येत्या दोन ते दिवस जिल्ह्यातील कांदा ल‌लिाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

लासलगावात

आज लिलाव बंद

निफाड ः प्राप्तीकर विभागाच्या या धाडसत्रमुळे सकाळच्या सत्रात येथील बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू न झाल्याने शेतक-यांमध्ये संभ्रमावस्‍था निर्माण झाली होती. बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर सचिव बी. वय. होळकर यांनी

कांदा खरेदीदारांशी चर्चा करून लिलाव सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बैठक झाल्यानंतर मार्केटच्या आवारावर विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा दुपारी लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र व्यापाऱ्यांकडे असलेला कांद्याचा निकास करण्यासाठी शुक्रवारी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

२०१३ मध्येही

पडला होता छापा

लासलगाव परिसरातल्या मुख्य व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. हे व्यापारी आधीपासूनच आयकर विभागाच्या रडारवर होते. यापूर्वी २०१३ अशीच कांद्याचे भाव वाढल्याने लासलगाव येथील व्यापाऱ्यांवर छापे मारण्यात आले होते.

शेतकरी परतले माघारी

लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव दुपारी तीन वाजता सुरू करण्यात आले. कांद्याचे बाजारभाव बुधवारच्या तुलनेत ३०० ते ३५० रुपयांनी कमी पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पडले. या दरम्यान बाजार समिती प्रशासन शेतकरी व व्यापारी यांच्यात समजोता सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास पाऊस चालल्याने कांद्याचे ट्रॅक्‍्टर घेऊन आलेले शेतकरी परतले. गुरुवारी बाजार समिती आवारात एकूण ४२४ ट्रॅकटर आले होते. त्यापैकी फक्त १९ ट्रॅक्टरमधील

कांद्याचा लिलाव झाला. ४०५ ट्रॅक्टर परत गेले.

सटाण्यातही लिलाव बंद

प्राप्तीकर विभागाच्या धाडसत्रामुळे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दुपारी १ वाजेनंतर बाजार समिती मधील कांदा लिलाव बंद करण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजी सूर उमटला होता. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज सुमारे ६०० हून अधिक ट्रॅक्टरची आवक कांदा व्रिकीसाठी दाखल झाली होती.

देवळ्यात चर्चेला उधाण

कळवण ः कळवण येथील एका व्यापाऱ्याकडे छापे पडल्याची वृत्त सोशल मीडियावरून पसरल्याने दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात मात्र असे काहीही घडले नसल्याचे बाजार समितीचे व्यापारी गटाचे संचालक हेमंत बोरसे यांनी सांगितले. महसूल यंत्रणेकडून संबंधित कांदा व्यापाऱ्यांना कांदा तत्काळ पुढे पाठवण्यात यावा म्हणून तगादा लावला आहे. मात्र घेतलेला माल त्याच दिवशी निर्यात करणे अशक्य ठरत असल्याने व आलेल्या आवकसाठी जागा उपलब्ध नसल्याने देवळा तालुक्यातील देवळा व उमराणा बाजार समितीतील लिलाव १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान बंद राहणार आहेत.

येवल्यात दोन दिवस बंद

येवला ः येवला बाजार समितीमधील रामेश्वर लालचंद आट्टल यांच्या खळे आणि घरातील छाप्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली. यामुळे येवला समितीत सकाळी लिलाव होऊ शकले नव्हते. मात्र दुपारी व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतल्याने कांदा लिलाव सुरळीत झाले. येते दोन दिवस लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे.

उमराण्यात आठवडाभर लिलाव बंद

मालेगाव ः तालुक्यातील उमराणे बाजार समितीतील कारवाईमुळे कांदा व्यापारी, शेतकरी यांच्यात एकाच खळबळ उडाली. गुरुवारी नेहमीप्रमाणे उमराणे बाजार समितीतच्या आवारात सकाळी १० वाजता कांदा लिलावाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्याभरापासून कांद्याचे भाव सरासरी २०० रुपयांनी खाली आले आहेत. सकाळच्या सत्रात कांदा लिलावात सरासरी एक हजार १५० इतका भाव मिळाला. मात्र आयकर विभागाचा छापा पडल्याचे वृत्त येताच दुपारी लिलाव बंद करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चार वाजता लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला. तसेच १५ ते २२ सप्टेबर दरम्यान कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारसह दोन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इनोव्हा कारसह दोन पल्सर दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसांकड चोरट्यांनी पळवून नेल्याप्रकरणी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
अवेस जिलानी कोकणी (रा. भाभानगर) यांची इनोव्हा कार (एमएच ०४ एफएफ ७०७२) एका ओळखीच्या व्यक्तीने लंपास केली. रविवारी सकाळी सारडा सर्कल येथील एक्सप्रेस टॉवर भागात हा प्रकार घडला. एका दिवसासाठी वाहन घेऊन गेलेला व्यक्ती पुन्हा परत आलाच नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
रवींद्र प्रकाश महाजन (रा. साळुंखेनगर, गोदावरी पार्क मागे) हे मंगळवारी दुपारी कार्यक्रमासाठी सोमेश्वर परिसरातील पाटील लॉन्स येथे गेले होते. लॉन्स परिसरात पार्क केलेली त्यांची पल्सर (एमएच १९ एव्ही ०३११) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत. दरम्यान, सिडकोतील किरण रमेश दराडे (रा. श्रीरामनगर, पवननगर) यांचीही दुचाकी चोरी झाली. दराडे हे नातेवाईक रुग्णास भेटण्यासाठी काकतकर हॉस्पिटल येथे गेले होते. हॉस्पिटल परिसरात पार्क केलेली त्यांची पल्सर (एमएच १५ डीव्ही ६६८६) चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार राठोड करीत आहेत.

सिडकोत भरदिवसा घरफोडी
सिडकोतील उत्तमनगर भागात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी रोकड आणि दागिने सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अविनाश दत्तात्रेय मोरे (रा. कृष्णा अपा. गणेश कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी मोरे कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर पडले. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा सुमारे २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार मल्ले करीत आहेत.

रिक्षाचालकाचा अपघातात मृत्यू
नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकाचा अपघातात मृत्यू झाला. सतीश रघुनाथ जाधव (४०, मराठा कॉलनी, चेहेडी फाटा, नाशिकरोड) असे त्याचे नाव आहे. सतीश जाधव हे बुधवारी (दि. १३) रात्री आपल्या रिक्षाने (एमएच १५ झेड ७६३५) तपोवन मार्गाकडून नाशिकरोडकडे येत होता. रिक्षा वेगात होती. रात्री रात्रीची वेळ असल्याने त्यांना अंदाज आला नसावा. त्यामुळे तो एका झाडावर जाऊन आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला द्राक्ष उत्पादकांचा रविवारी सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्राक्ष विज्ञान मंडळाच्या निवड समितीने राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक गौरव पुरस्कारासाठी १६ महिलांची निवड करण्यात आली आहे. नांदूर नाका येथील शेवंता लॉन्स येथे रविवारी (दि. १७) दुपारी बारा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नीलिमा पवार असणार आहेत. यावेळी आमदार सीमा हिरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. महाराष्ट्रात द्राक्ष शेतीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक महिला आपल्या कष्टातून व कल्पकतेतून अभिनव प्रयोग करून द्राक्षशेतीला रोजगाराचा नवा पर्याय म्हणून पाहत आहे. अशा महिला अनेक आव्हानांना सामोरे जाताना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्षशेतीला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. अशा महिलांचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा आणि त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली जावी या हेतूने द्राक्ष विज्ञान मंडळ या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमांतर्गत द्राक्ष शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा व महिलावर्गास प्रेरणा मिळावी या हेतूने राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वाटपाचे यंदा दुसरे वर्ष असून विविध जिल्ह्यातील १६ महिला द्राक्ष उत्पादकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी गुजरात येथील ऑरगॅनिक मल्टीस्टेट को-ऑप संस्थेचे चेअरमन डॉ. कांजीभाई कलावाडिया, प्रयोगशील द्राक्ष शेतकरी मारोतराव चव्हाण (सांगली) आणि द्राक्ष शेती तज्ज्ञ नरेंद्र पाटील पिलीवकर हे उपस्थित द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

यांचा होणार सन्मान
विद्या पगार, जयश्री पिंगळे, सुरेखा ढुमणे, सुरेखा पाटील, कल्पना नाठे, विद्या रकिबे, रुपाली गायकवाड, मंगला राजोळे, कमल रिकामे (सर्व नाशिक), शीतल झगडे, सुजाता गायकवाड, रेश्मा वाईकर (सर्व पुणे), सुजाता देशमुख, छाया बावके (सर्व अहमदनगर), चंद्रकला चव्हाण (जालना), मनीषा काळे (सोलापूर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीसाठी गेला; दुकानातच फसला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यावरील बापू बंगला चौकातील स्टेशनरीचे दुकान चोरट्यांनी फोडल्याचा प्रयत्न केला. या चोरीतील एक जण दुकानातच अडकला तर त्याचा सहकारी फरार झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बापू बंगला परिसरात श्री विद्यालक्ष्मी स्टेशनर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात बुधवारी (दि. १३) रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, यातील एक चोर या दुकानातच अडकला. त्याला बाहेर येताच आले नाही. सकाळी नागरिकांची वर्दळ सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी तातडीने दुकानमालकासह पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना दुकानात एक जण असल्याचे आढळून आले. दुकानातील सुमारे तीन हजार रुपयांचा माल लंपास झाल्याचे समजते.

पोलिसांचा दरारा घटला

इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी या मुख्य रस्त्यावर चौकातील दुकान फोडण्यात येत असतानाही पोलिस कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे दिसून आले आहे. इंदिरानगर परिसरात पोलिसांचा दरारा कमी झाल्याने अशा पद्धतीने सर्रासपणे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे मानले जात आहे. रात्री-अपरात्री पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घातली जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. इंदिरानगरमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेलारांना आठवडाभराची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज करणाऱ्या नगरसेवक गजानन शेलार यांना सात दिवसांचा दिलासा मिळला आहे. या काळात मिरवणुकीत सहभागी नव्हते, तसेच चिथावणी दिली नाही, हे शेलार यांना सिद्ध करायचे आहे. पोलिसही आपले पुरावे सादर करणार असून, त्यानंतरच शेलाराच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम निर्णय होणार आहे.
ध्वनी प्रदूषण कायद्याचे दोन गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवक गजानन शेलार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काही दिवसांपूर्वी जिल्हा कोर्टाने फेटाळून लावला. यानंतर पोलिसांनी त्यांची शोध मोहिम सुरू केली. त्यामुळे शेलारांनी लागलीच हायकोर्टात अर्ज सादर केला. या अर्जावर सुनावणी झाली. यात, शेलारांचा या घटनेशी थेट संबंध नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. मिरवणुकीवेळी शेलार उपस्थित नसताना तसेच त्यांनी चिथावणी दिली नसताना पोलिसांनी जाणीवपूर्वक त्यांचे नाव या गुन्ह्यात घुसविल्याचे बचाव पक्षाच्यावतीने हायकोर्टात स्पष्ट करण्यात आले. बचाव पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद शेलारांना सिद्ध करावा लागेल, असे कोर्टाने स्पष्ट केले. पुढील सात दिवसात शेलारांनी आपण त्यावेळी उपस्थित नव्हतो, तसेच आपण कोणतीही चिथावणी दिलेली नाही, हे सप्रमाण सिद्ध करावे, असा आदेश कोर्टाने दिला. सुनावणी दरम्यान काही वर्तमानपत्रांच्या बातम्या सादर करण्यात आल्या.याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले, की सरकारी पक्षातर्फे कोर्टात सर्व पुरावे सादर करण्यात येतील. शेलार मिरवणुकीत होते. त्यांनी चिथावणी दिले याचे पुरावे सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात येतील. तुर्तास कोर्टाने सात दिवसांची मुदत दिली आहे. या सुनावणीनंतरच शेलारांच्या अटकपूर्व जामीनावर हायकोर्ट आपला निर्णय देणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

कोर्ट अवमानाची कारवाई
ध्वनी प्रदूषण कायद्यासह इतर तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि गटनेते शेलार यांच्यासह त्यांच्या दंडे हनुमान मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे, हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ४७ कॉलेजेसवर कारवाईचे निर्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात ४७ इंजिनीअरिंग व व्यावसाय‌िक अभ्यासक्रमाच्या कॉलेजांनी परिषदेची मानके धुडकावून लावत मान्यतेसाठी खोटा अहवाल संचालनालयास सादर केला. या कॉलेजांना संचालनालयाने पाठीशी घालण्याची धडपड चालविली होती. आता या ४७ कॉलेजेसवर कारवाई करण्याच्या स्पष्ट लेखी सूचना देत डीटीईच्या संचालकांनी विभागीय कार्यालयांचे कान उपटले आहेत.

याबाबत ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक डी. पी. नाथे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सद्यस्थितीत बोलण्यास नकार दिला. ‘इंजीनिअरिंग कॉलेजांचा कारभारच संशयास्पद’ या मथळ्याखाली ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रकाशिक केले. विभागातील संस्थांनी मान्यता पदरात पाडून घेण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे या वृत्ताद्वारे उघड झाले होते. दरम्यान, हे प्रकरण ‘डीटीई’च्या संचालकांपर्यंत जाऊन पोहचल्यानंतर आता या सर्व संबंधित नाशिक विभागातील ४७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजेसवर कारवाई करण्याच्या सूचना संचालक मिता लोचन यांनी दिल्या आहेत. शैक्षणिक संस्थांबाबत डीटीईला खोटी माहिती सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉलेजांची पहिल्या टप्प्यात कारवाईसाठी चौकशी सुरू होणार आहे. ही चौकशी सुरू करण्याच्या सूचना ‘डीटीई’च्या सहसंचालकांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणासंबंधात पुण्यातील आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनाही या संभाव्य कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४७ इंजिनीअरिंग व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॉलेजांनी परिषदेने घालून दिलेली मानके धुडकावून लावत मान्यता पदरात पाडून घेण्यासाठी खोटा अहवाल संचालनालयास सादर केला होता. खोटी माहिती सादर करणाऱ्या कॉलेजांमध्ये नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थांचाही समावेश असल्याने त्यांच्याबाबतच्या कारवाईत डीटीई नेमकी कशी भूमिका घेते, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

फौजदारी कारवाईची प्रतीक्षा
तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकांनुसार, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षणाचा दर्जा अबाधित राहावा, यासाठी जमीन, इमारत, पुरेसा शिक्षक वर्ग यासह पायाभूत सुविधांच्या संदर्भातील त्रुटींची पूर्तता करून अहवाल सादरीकरणाचे आवाहन संचालनालयाने इंजिनीअरिंग कॉलेजांना १९ जानेवारी २०१७ च्या पत्रान्वये केले. यानंतर विभागीय संचालनालयास कॉलेजांकडून या विषयासंदर्भात मिळालेल्या अहवालांमध्येही मोठ्या प्रमाणावर संदिग्धता आढळून आली. कॉलेजांनी परिषदेची मानके पूर्ण केली नसून ही माहिती दिशाभूल करणारी व संदिग्ध असल्याचे १७ मार्च २०१७ रोजी कॉलेजांना पाठविलेल्या पत्रात संचालनालय स्पष्टपणे मान्य करते. यानंतरही केलेली चूक सुधारण्याची परवानगी विभागीय कार्यालयाने दिलीच कशी, यावरही तक्रारकर्त्यांचा आक्षेप आहे. या प्रकरणी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांनी खोटी माहिती पुरवून दिशाभूल केल्याचे तंत्रशिक्षण संचलनालय ३१ जुलैच्या पत्रात मान्य करते आहे. यात दोषी कॉलेजेसची चौकशी व त्यांवर कारवाईच्या सूचना स्पष्ट असल्या तरीही कारवाई नेमकी कुठल्या प्रकारची याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे दोषी आढळणाऱ्या कॉलेजांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशी अपेक्षा तक्रारकर्त्यांसह पालक आणि विद्यार्थ्याकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जखमी पवारांचा जीवनसंघर्ष संपला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेले पोलिस कर्मचारी पोपट पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. मागील आठवड्यात एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवारांवर पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता.
शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पवार यांचा शुक्रवारी (दि. ८) दुचाकी धडकून अपघात झाला होता. यात डोक्याला दुखापत झाल्याने पवार कोमात गेले. बिटको परिसरात झालेल्या अपघातानंतर त्यांच्याही काही सहकाऱ्यांनी त्यांना बिटको परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्याला मार लागल्याने त्यांना आणखी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय पोलिस सहकाऱ्यांनी घेतला. दुर्दैवाने त्यांना दाखल करून घेण्यास वेगवेगळ्या हॉस्पिटल्सने नकारघंटा दाखवली. जखमी पवारांना घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजविल्या. अनेक डॉक्टरांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी फोनही केले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. कसेतरी पंचवटीतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ वाया गेला होता. उपचार सुरू असताना बुधवारी (दि. १३) सकाळी पवार मृत्युमुखी पडले.

पोलिस पॅनलवरील हॉस्पिटलमध्येही पवारांची हेळसांड झाल्याची भावना पोलिसांमध्ये आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले असून, पवार कुटुंबियास पोलिस कल्याण निधीतून मदत दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांवर आयटीची धाड; कांदा ३५% स्वस्त

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांच्या घरांवर तसेच गोदामांवर आयकर विभागाने काल धाड टाकताच आज कांद्याचे दर तब्बल ३५ टक्क्यांनी घसरले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात काल काद्यांचा भाव प्रतिक्विंटल १४०० रुपये होता तो आज ९०० रुपयांवर घसरला.

आयकर विभागाने बुधवारी सात व्यापाऱ्यांच्या घरांवर, कार्यालय आणि गोदामांवर धाड मारली होती. आज कांद्यांचा भाव ३५ टक्क्यांनी कमी झाला. आयकर विभागाच्या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात खळबळ उडाली आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी दिली. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी कमी किंमतीत कांदा विकण्यास नकार
दिल्यानंतर लिलाव बंद पडला.

व्यापाऱ्यांकडून कांद्यांचा साठा?

नाशिकमधील व्यापाऱ्यांनी कांद्यांचा साठा केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. पिंपळगाव, लासलगाव, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने कारवाई करीत घरे, कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती घेतली होती. कांदा व्यापाऱ्यांच्या महिन्याभरातील खरेदी-विक्री व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करणार आहे. व्यापाऱ्यांच्या कार्यालयांतील महत्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तश्रृंगी गडावर यंदापासून बोकडबळी बंदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

गेल्यावर्षी नवरात्रोत्सव नंतर दसऱ्याच्या दिवशी बोकडबळी देतांना मानवंदनेप्रसंगी (हवेत गोळीबार) १२ जण जखमी झाले होते. यामुळे भाविकांची सुरक्षा लक्षात घेत यंदापासून बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वर्षानुवर्षाची ही परंपरा बंद करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय असून याबाबत सर्वत्र प्रशासनाचे कौतुक होत आहे. मात्र श्रध्दा म्हणून पाहणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने हा धक्कादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रुंग देवी गडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबतची नियोजन बैठक कळवणचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, गड व नांदुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षी मोठ्या बाका प्रसंगाचा सामना करावा लागला होता. ज्या देशात काळानुरूप सती व अन्य प्रथा बंद होऊ शकतात. तेव्हा चेंगराचेंगरी आणि कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकणारी तसंच भाविकांच्या जीवाला धोका असणारी ही प्रथा बंद करण्यात यावी, असं अवाहन करण्यात आलं होतं, असं तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितलं. देवस्थान ट्रस्ट तर्फे बोकडबळीची ही प्रथा सुरू असून गेल्या वर्षी १२ जण जखमी झाले होते. यंदापासून ही प्रथा बंद करून यासाठी पुढाकार घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. बोकडबळी प्रथेबाबत कोणीही अफवा पसरवत भाविकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. गड व परिसरात अवैध दारू विक्री होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभागाने सतर्क राहावे. आरोग्य, आग प्रतिबंधक यंत्रणेचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सप्तश्रुंग मंदिर परिसरात दिल्या जाणाऱ्या बोकडबळीवर बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांमार्फत वैयक्तिक रित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नाही. मंदिर परिसरात बंदी कायम राहील. स्थानिक पातळीवर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय घडते याकडे आता लक्ष लागून आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज

१ अतिरिक्त अधीक्षक, २ डीवायएसपी, १० निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, २५० होमगार्ड, एसआरपीएफची एक टीम व घातपात विरोधी एक पथक, नागरी सुरक्षा व सेवाभावी यंत्रणेची ५० अशी यंत्रणा यात्राकाळात सज्ज राहील, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.

स्वछता अभियान राबविण्यात येणार असल्याने सेवाभावी संस्थांनी या कार्यात पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. अंतिम चाचणी न झाल्याने नवरात्रोत्सव काळात रोप वे सेवा मिळणार नाही. उत्सव काळात मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले राहील. प्रदक्षिणा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी १५ ठिकाणी बाऱ्या धरण्यासाठी दिवस रात्रसाठी एकूण ९० कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. २० सुरक्षा रक्षक, ३ बंदूकधारी सुरक्षारक्षक, वीज पुरवठा खंड पडू नये म्हणून २ जनरेटर, भाविकांसाठी मोफत अन्नदान सेवा संपूर्ण यात्रा काळात ठेवण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्यासाठी आवश्यक यंत्रणा, गड व परिसरात ६७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.



सप्तश्रृंग गडावर वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे पर्यावरण बचाव मोहिमेतून प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत संबंधितांवर दंडात्मक व व्यावसायिक परवाने रद्द करण्याची कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या.

गड ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे व यात्रेपूर्वी ते दुरुस्त करावेत. गड व नांदुरी भागात बीएसएनएल सेवेचा सतत बोजवारा उडालेला असतो त्याबाबत संबंधित विभागाने लक्ष द्यावे. गडावर यात्राकाळात व्यावसायिकांनी अतिक्रमणे करू नये. प्लॅस्टिक बंदी कायम ठेवून कापडी पिशव्यांना प्राधान्य द्यावे. गडावरील सांडपाणी, स्वछतागृह हागणदारी मुक्ती यावर संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या. यात्रा काळात अखंडपणे वीजपुरवठा होईल याबाबतची माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी खैरनार यांनी दिली. खासगी रित्या होणाऱ्या अन्नदान यंत्रणेवरही या बैठकीत चर्चा झाली. रोख किंवा शिधा स्वरूपात आपली देणगी देवस्थानकडे देत अन्नदान करावे जेणेकरून अन्नाची नासाडी व पर्यावरण समतोल बिघडणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

बीडीओ बहिरम, देवस्थान विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, गडाचे सरपंच श्रीमती सुमन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, नांदुरीचे भाऊ कानडे, अभोण्याचे निरीक्षक राहुल फुला, वन अधिकारी बशीर शेख, ग्रामसेवक आर. बी. जाधव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता किशोर केदार, परदेशी हे या बैठकीत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा व्यापाऱ्यांची चौकशी सुरूच

$
0
0

मनमाड, सटाणा वगळता, इतरत्र लिलाव ठप्प

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गुरुवारी सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर जिल्ह्यात कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. मनमाड, सटाणा वगळता जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी शुकशुकाट होता. शुक्रवारीही प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी काही कांदा व्यापाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच, या व्यापाऱ्यांचे व्यवहार तपासण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतूनही खरेदीचे आकडे गोळा केले आहेत. आज, शनिवारीसुध्दा प्राप्तीकर विभागाकडून व्यापाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

कांदा व्यापाऱ्यांच्या चौकशीनंतर गुरुवारी कांदादरात थोडी घसरण झाली. मात्र शुक्रवारी लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणा या प्रमुख बाजार समित्यांसह, येवला, चांदवड, मालेगाव येथे लिलाव झाले नाहीत. आज (दि. १६ ) व उद्या (दि.१७) बाजार स‌मित्यांमधील लिलाव नियमित सुटींमुळे बंद राहणार आहेत. यामुळे सोमवारीच बाजार समित्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंडरपासचे व्हावे फेरनियोजन

$
0
0

म. टा. प्रत‌िन‌िधी, नाशिक

वाहतूक समस्येच्या बाबतीत नेहमीच सर्वांची डोकेदुखी ठरलेल्या इंदिरानगर अंडरपास परिसरातील बऱ्याच समस्या अजूनही जैसे थेच आहेत. अंडरपासमार्गे एकेरी वाहतुकीला परवानगी असली, तरी अन्य विविध अडथळ्यांमुळे हा रस्ता निम्म्याहून अधिक व्यापला गेला आहे. येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी, तसेच रस्त्याने मोकळा श्वास घ्यावा यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावर मुंबई नाका ते राणेनगर यादरम्यान अंडरपास बनविण्यात आला. परंतु, चुकीच्या रचनेमुळे तो नेहमी टीकेचाच विषय ठरला आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी येथे वाहतुकीचा फज्जा उडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. इंदिरानगर, नाशिकरोड, गोविंदनगरमार्गे त्र्यंबकरोडकडे ये-जा करण्यासाठी हा रस्ता शॉर्टकट ठरतो. शहरातील गर्दी टाळण्यासाठी असंख्य नागरिक याच मार्गाचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे हा चौक म्हणजे वाहतुकीचा फज्जा असे समीकरणच बनले आहे. एकेरी मार्गाचा पर्याय येथे अवलंबिण्यात आल्याने वाहतुकीचा ताण कमी होण्यास काहीशी मदत झाली आहे. परंतु, एकेरी मार्गासाठीच हा अंडरपास पूर्णत: मोकळा केला गेला, तर वाहतुकीचे अधिक चांगले नियोजन होऊ शकेल, अशा सूचना पुढे येऊ लागल्या आहेत.

--

...तर वाचेल मोठा फेरा

या अंडरपासचा अर्धा रस्ताच सध्या वापरला जातो. अर्ध्या रस्त्यात विविध वस्तू पडल्या आहेत. हे सर्व अडथळे काढून संपूर्ण अंडरपास वाहतुकीसाठी वापरला जावा. इंदिरानगरकडून कॅनॉलरोडने येणाऱ्या व सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या वाहनांसाठी डावीकडे रो करावी. ज्यांना मुंबई नाक्याकडे वळायचे आहे ते उजवीकडून जाऊ शकतील. रात्री साडेआठ ते सकाळी साडेआठ या वेळेत हा अंडरपास दुतर्फा वापरू द्यावा. वाहनांची वर्दळ नसताना वाहनधारक तो वापरू शकतील. मुंबई नाक्याहून इंदिरानगरकडे जाण्यासाठी जशी नवीन ओपनिंग देण्यात आली आहे, तशी प्रकाश पेट्रोलपंपाजवळ दिल्यास वाहनधारकांचा मोठा फेरा वाचेल.

-मदन पारख, इंदिरानगर

--

वाहतुकीच्या समस्या कळवा...

त्रिमूर्ती चौकात विक्रेत्यांनी हायजॅक केलेला रस्ता, जुन्या सीबीएससमोरचा प्रश्न, शालिमारवरील रिक्षांची मनमानी, रविवार कारंजा येथे अवैध अतिक्रमण या आणि अशा विविध प्रकारच्या समस्यांमुळे शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी ‘ट्रॅफिक इश्यू’ हे व्यासपीठ मोलाचे ठरणार आहे. म्हणूनच शहरातील वाहतुकीशी संबंधित समस्या, तक्रारी, अडी-अडचणी, तसेच अनुभव आपण आमच्याकडे पाठवू शकता. त्यासाठी मटा सिटिझन रिपोर्टर हे अॅप तुम्हाला मदत करू शकेल. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. लेखी स्वरूपातही ‘मटा’च्या डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथील कार्यालयात आपण तक्रारी देऊ शकता. समन्वयक ः प्रवीण बिडवे- ९८८११२०१३१.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images