येथील महापालिकेने हागणदारीमुक्त अभियानानंतर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफसफाई व स्वच्छतेबाबत नागरिकांकडून उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत दक्ष राहून होणार मनपास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संगिता धायगुडे यांनी केले आहे.
पालिका प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफसफाई व स्वच्छतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या जुलैमध्ये झालेल्या महासभेत याबाबत ठराव करण्यात आला आहे. पालिकेने नेमून दिलेल्या जागे व्यतीरिक्त केरकचरा, मलमूत्र विसर्जन केले तर दंडात्मक रक्कम वसूल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यानुसार पालिका क्षेत्रात स्वच्छतेबाबत उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या आदेशानुसार रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, प्रशासकीय कार्यालय, उद्याने इत्यादी ठिकाणी थुंकल्यास, तसेच मोसम नदीत कचरा टाकलस पाच हजार हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे. पालिकेने शहर स्वच्छतेबाबत कारवाईचा बडगा उगारला असून, शहरवासीयांनीच स्वच्छतेबाबत दक्ष राहावे लागणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट