Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ असा अनुभव देवळा तालुक्यातील मुली घेत असतानाच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे धूळखात पडलेल्या देवळा पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाच्या सायकली संबंधित लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. जि. प. सदस्या नुतन आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींना देण्यात आल्या.

देवळा पंचायत समितीच्या ११९ सायकली लाभार्थ्यांकडे जातीचे दाखले उपलब्ध नसल्याची सबब सांगून त्यांच्यासाठी आलेल्या सायकल धूळखात पडून होत्या. याबाबत जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर, पंचायत समितीच्या सभापती केसरबाई अहिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर यांनी स्टिंग ऑपरेशन करून सदरची बाब उजेडात आणली होती. शालेय विद्यार्थ्यांना शाळेतूनच जातीचे दाखले मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर समाजकल्याण विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील, सुनील आहेर, कृष्णा अहिरे, पप्पू हिरे, शरद भदाणे, रिंकू पाटील आदींसह विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सप्तशृंग गडावर दरड कोसळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

श्री सप्तशृंग गड ते नांदुरी दरम्यानच्या रस्त्यावर गणेश घाटात रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ एका वाहनाचे नुकसान झाले. या वाहनाची मागील व पुढील काच फुटली. वाहनात बसलेले दाम्पत्य सुखरुप बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली. अतिवृष्टीमुळे सप्तशृंग गड घाटात कोसळणाऱ्या दरडींमुळे भविष्यातील दुर्घटनांची अशीच शृंखला सुरू राहिली तर काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सप्तशृंग गड घाटात व मंदिर (डोंगर) परिसरात अधूनमधून दरडी कोसळत असतात. शासनाने मंदिर परिसरात संरक्षक जाळ्या बसविलेल्या असल्याने दोन महिन्यांपूर्वी मोठा अनर्थ टळला होता. एक अडीच टनाचा व तर दुसरा आठशे किलो वजनाचा असे दोन दगड मंदिर परिसरात बसवलेल्या जाळ्यांमध्ये अडकले होते. त्यावेळीही कुठलीही जीव‌ितहानी झाली नव्हती. मात्र हा प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे उर्वरित ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी वेळोवेळी झाली आहे. मात्र शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे हे काम रखडले आहे.

शनिवारी सप्तशृंग गडावर मुक्कामी असलेले पुणे येथील भाविक वसंत घाटगे हे सपत्नीक दर्शन करून रविवारी सकाळी परतत होते. घाटात सकाळी वाजेच्या सुमारास त्यांच्या कारच्या (एमएच-१२,५९३४) दोन्ही बाजूला दरड कोसळली. त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र हे दाम्पत्य बालंबाल बचावले. काही क्षणात ते कारच्या बाहेर आले.

स्थानिकांनी केली मदत

घटनेचे वृत्त समजताच गडाचे माजी सरपंच संदीप बेनके, नाना सदगीर, पोल‌िस हवालदार सुनील मोरे, अशोक ब्राह्मणे, देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व कर्मचारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे किशोर केदार व भाविकांनी तत्काळ रस्त्यांवर असलेले दगड बाजूला केले. तासाभरात मदतकार्य करणाऱ्यांकडून रस्ता सुरळीत करण्यात आला. मदतकार्य करण्यासाठी पुढे येणाऱ्यांमध्ये अनेक भाविक, स्थानिक ग्रामस्थांनी चांगली भूमिका बजावली. दरम्यान, या घटनेमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ८.३० नंतर वाहतूक सुरळीत झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सातत्याने पडणाऱ्या दरडींबाबत कायमस्वरूपीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच संदीप बेनके यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देव द्या, देवपण घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीं ना निरोप देतेवेळी पर्यावरण रक्षणाचाही मंत्र जपला जावा, या उद्देशाने शहरातील विविध पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थांनी यंदाही पुढाकार घेतला आहे. गणेश मूर्ती संकलन, पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन, निर्माल्य संकलन, प्लास्ट‌िक प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि भाविकांचे पर्यावरण विषयक प्रबोधन अशा विविध आयामांवर या संस्था गणेश विसर्जन सोहळ्यात काम करित आहेत.

नाशिक पोलिस :

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची विसर्जनानंतर विटंबना टाळण्यासाठी अमोनिअम बायकॉर्बोनेट या पावडरचा वापर केला जातो. ही पावडर शहरातील किमान सहा पोलिस स्टेशनमध्ये मोफत वितरित करण्यात येणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.



पालवी फाऊंडेशन :

पालवी फाऊंडेशनने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने यंदा विघ्नहर्ता प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयात लघुपटाचे प्रदर्शन, निबंध स्पर्धा आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पालवी फाऊंडेशनच्या डॉ. सुवर्णा पवार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील यांनी दिली.


प्रयास फाऊंडेशन :

प्रयास संस्थेच्या वतीने दशरथ घाटावर मूर्ती व निर्माल्याचे संकलन केले जाणार आहे. सुमारे १५० सदस्यांची टीम यासाठी कार्यरत असेल. मूर्ती संकलन करून येथे स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल.


राजसारथी फाऊंडेशन :

या संस्थेतर्फे जेलरोड परिसरात दसक घाटावर प्रबोधन करण्यात येईल. मूर्ती व निर्माल्य संकलनासोबतच अमोनिअम बायकॉर्बोनेट या पावडरचे वितरण नागरिक व मंडळांना केले जात आहे. या केमिकलच्या सहाय्याने पीओपीची मूर्ती विरघळून त्यापासून खत तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. या सुविधेचा नागरीकांनी उपयोग करावा, असे आवाहन फाऊंडेशनचे रोहन देशपांडे यांनी केले आहे.


डे केअर स्कूल :

या शाळेच्या वतीने इंदिरानगर परिसरात पाच ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. शाळेच्या समोरील परिसरासह कलानगर, रथचक्र सोसायटी परिसर आदी ठिकाणी केंद्र आहेत. याशिवाय प्लास्ट‌िक पिशव्यांचेही संकलन केले जाणार आहे. गत पाच वर्षांपासून विसर्जन सोहळ्यातील हा उपक्रम सुरू आहे.


जय बजरंग युवक मंडळ :

मंडळ आणि नवीन नाशिक परिसरातील नागरीकांच्या वतीने नुकतीच गोदा संवर्धन मोहीम राबविण्यात आली. विसर्जन सोहळ्यातही आता आयटीआय पूल आणि म्हसोबा महाराज मंदिर, उंटवाडी येथे मूर्ती, निर्माल्य व प्लास्ट‌िक संकलन केंद्र कार्यरत राहणार आहेत. नवीन नाशिक परिसरातील नागरिकांना सहकार्यासाठी अमित कुलकर्णी यांनी मंडळातर्फे आवाहन केले आहे.


काँग्रेस सेवा दल

निर्माल्य टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारा प्लास्ट‌िकचा वापर निसर्गासाठी हानीकारक आहे. यासाठी निर्माल्य संकलनाकरिता खास बनविलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप विविध गणेश मंडळे , शासकीय व खाजगी कार्यालये आणि नागरीकांमध्ये करण्यात आले. या निर्माल्याच्या पिशव्या संकलित करून मनपा गाडीत जमा करणार असल्याची माहिती दलाचे वसंत ठाकूर यांनी दिली.

निर्मल ग्राम केंद्र :

या संस्थेच्या वतीने यंदा नाशिककरांच्या प्रबोधनावर भर देण्यात आला आहे. निर्माल्याच्या नावाखाली सरळपणे फळे, वस्त्र, प्लास्ट‌िकच्या वस्तूही पाण्यात समर्पित होतात. एकेकाच्या हस्ते ही भर पडत गेल्यास हजारोंची संख्या नदीला संकटात पकडते. शक्यतो मूर्ती दान करा, निर्माल्य मनपाच्या निर्माल्य संकलन व्यवस्थेत जमा करा, याबाबत भाविकांचे प्रबोधन विसर्जन सोहळ्यात संस्था करणार आहे.

रूद्र प्रतिष्ठान :

नाशिकरोड परिसरातील रूद्र प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीनेही मूर्ती व निर्माल्याचे संकलन केले जाईल. अमोनिअम बायकार्बोनेट पावडर नागरिकांना मंडळाच्या वतीने दिली जाईल. नागरिकांनी घरीच विसर्जन करावे याबाबतही प्रबोधन केले जाईल, अशी माहिती मंडळाचे प्रतिक वाजे यांनी दिली.


भुजबळ नॉलेज सिटी :

संस्थेच्या वतीने आठ वर्षांपासून निर्माल्य व मूर्ती संकलनाचे काम केले जाते. यंदाही चोपडा लॉन्स, घारपुरे घाट या परिसरात हा उपक्रम राबविला जाईल अशी माहिती प्राध्यापक चौबे यांनी दिली.

संवेदना फाऊंडेशन, हिरावाडी :

हिरावाडी, पंचवटी परिसरातील संवेदना फाऊंडेशनच्या वतीने गंगा घाटावरील म्हसोबा महाराज पटांगण येथे मूर्ती संकलन सुरू राहणार आहे. सुमारे ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे मूर्ती संकलनासाठी प्रबोधन केले जाईल. मनपाच्या निर्माल्य व्यवस्थेत निर्माल्य अर्पण करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जाईल, अशी माहिती फाऊंडेशनचे अॅड. अजय निकम यांनी दिली.


विद्यार्थी कृती समिती :

संघटनेच्या वतीने ‘देव द्या, देवपण घ्या’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोदेचे प्रदूषण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा विसर्जन सोहळ्यात मूर्ती दान म्हणून समितीच्या वतीने स्वीकारल्या जातील. मूर्ती दान करू इच्छीणाऱ्यांनी ९४२१५६३५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहमार्गाला ब्रेक?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे मंत्रिपदाच्या खातेबदलामुळे नाशिक जिल्ह्यातील दोन नव्या रेल्वेमार्गांच्या कामाचा वेग कमी होण्याची चिन्हे आहेत. सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत या कामाला वेग मिळाला होता. पण, आता या बदलाचा फटका या कामाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गांच्या कामाला प्रभू यांच्या कारकीर्दीत गती मिळाली होती.

मावळते रेल्वेमंत्री प्रभू यांना राज्यातील बहुतांश जिल्ह्यांची खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्यांनी अनेक निर्णय घेऊन राज्याचा फायदा करवून दिला. नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वीच धुळे व नाशिक येथे दौराही केला होता. त्यामुळे सर्वांच्या आशाही उंचावल्या होत्या. पण, आता प्रभू यांच्या खातेबदलामुळे या कामावर परिणाम होण्याची धास्ती व्यक्त होत आहे. नवे रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबईचे असले, तरी त्यांना रेल्वेचा कारभार समजून घेण्यातच बराच काळ जाणार असल्याने जिल्ह्यातील कामे पुन्हा रखडण्याची शक्यता वाढली आहे.

महाराष्ट्राला दीर्घ काळाने रेल्वेमंत्री मिळाल्यानंतर प्रभू यांनी आपल्या पदाचा वापर करून राज्यात रेल्वेच्या विविध कामांना मंजुरी देऊन गती दिली होती. पंधरा दिवसांपूर्वीच नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्य रेल्वेने प्रशासकीय मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविलेला आहे. त्यात नाशिक-पुणे रेल्वे लाइनचा अंदाजित खर्च २४२५ कोटींवरून रुपयांवरून ४८६४.३६ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे प्रभू यांना हा विषय व महत्त्व माहिती होते आणि ते त्याला चांगली गती देऊ शकले असते, असे मत व्यक्त होत आहे.

---

...तर मिळाली असती गती

नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या लोहमार्गांसाठी यापूर्वी अनेक वेळा सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले आहे. पण, आता नाशिक-पुणे मार्गाच्या नव्याने केलेल्या सर्वेक्षणानंतर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला, तर मनमाड-इंदूर मार्गाचे डीपीआर सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे हे काम सुरेश प्रभू रेल्वेमंत्री कायम राहिले असते, तर अधिक गतीने होऊ शकले असते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशदर्शनाचा ‘सुपरसंडे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव अंत‌िम टप्प्यात येत असताना शहरातील रस्ते गर्दीने फुलले असून, शनिवारी व रविवारी सुट्टीचा दिवस साधत नाशिककरांनी गणपती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. शहरातील मेनरोड, शालिमार परिसर, जुन्या नाशिकमध्ये तर अफाट जनसागर लोटला होता.

पाऊस थांबल्याने नागरिकांनी शहरात गणपती पाहण्यासाठी तोबा गर्दी केली. एरवी, पावसाच्या काळात सामसूम असलेले रस्ते रविवारी ओसंडून वाहत होते. शहराचा मध्यवस्ती भाग समजला जाणाऱ्या शालिमार परिसरात ग्रामीण भागातूनदेखील भाविक देखावे पाहण्यासाठी आले होते. आपल्या बच्चे मंडळींना खांद्यावर घेऊन देखाव्यांचा आनंद घेत होते. शालिमार परिसरात गणेश मंडळांची संख्या जास्त असल्याने येथे नागरिकांचा ओघ जास्त होता. त्यामुळे शालिमार ते सीबीएस येथील वाहतूक धिम्यागतीने पुढे सरकत होती. गर्दी जास्त असल्याने पोलिसांनी खडकाळी सिग्नल ते शालिमार व बी. डी. भालेकर शाळेच्या ग्राऊंडपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने टू व्हीलरवरुन देखावे बघणाऱ्यांची निराशा झाली. अनेकांना गाडी पार्क करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा लागत होता. त्याचप्रमाणे शालिमार ते महात्मा गांधीरोड सिग्नल परिसरातही गर्दीने उच्चांक मोडला होता. चांदवडकर गल्लीकडून येणारी वाहने व रेडक्रॉसकडून येणारी वाहने नेहमीपेक्षा जास्त असल्याने पोलिसांना कंट्रोल करणे अवघड झाले होते. महाबळ चौक ते शालिमार हा रस्ताही संध्याकाळनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचप्रमाणे यशवंत व्यायाम शाळा ते मेहेर सिग्नल या परिसरात अस्ताव्यस्त लावलेली वाहने वाहतुकीला अडथळा ठरत होती. मेहेर ते अशोकस्तंभ या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची संख्या अपुरी असल्याने मुंगीच्या गतीने वाहने पुढे सरकत होती. नवीन तांबट गल्लीत अरुंद रस्त्याने गर्दीत भर पडत होती. शनीगल्ली, गाडगीळ गल्ली या ठिकाणीही मोठी गर्दी होती. रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीजवळही गर्दीचा महापूर होता. नागरिक लांबून देखावे पाहण्यासाठी येत होते. रविवार कारंजा ते महाबळ चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे मेनरोड, जुने नाशिक, पंचवटी परिसरातही नागरिक देखावे पाहण्यासाठी फिरत होते.


ज‌िवंत देखावे पाहण्यासाठी गर्दी

गणेशोत्सवात ज‌िवंत देखावे सादर करण्यावरही भर दिला जातो. यंदाही शहराच्या विविध भागात देखावे सादर करण्यात कलाकार तल्लीन झालेले दिसत आहेत. सोमवार पेठेतील वेलकम सहकार्य मित्र मंडळाने मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रजांशी कशा प्रकारे लढा दिला, याचा देखावा सादर केला आहे. यात मंडळाचेच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या देखाव्यामुळे स्वातंत्र्य चळवळ कशी बहरत गेली व स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्यांनी इंग्रजांशी कशी टक्कर दिली हे दाखवण्यात आले आहे.

गणेशोत्सवात लोककला

राजेबहाद्दर मित्र मंडळाने महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण केले आहे. यात गोंधळ, लावणी इत्यादी प्रकार सादर केले जात आहेत. बीडी भालेकर येथे एचएएल कामगार मित्र मंडळाने स्त्री पुरुष समानता या विषयावर देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी दूरवरुन भाविक येत आहेत. जुनी तांबट लेन येथील मित्र मंडळाने विविध सामाजिक विषय हाताळले आहेत. नागरिकांनी स्वच्छता कशी राखावी, आरोग्य कसे सांभाळावे, गुन्हेगारी थांबविण्यासाठी काय करावे आदी विषयांवर होर्डिंगच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. भद्रकाली येथील धनगर मित्र मंडळाच्या वतीने ‘व्यथा शेतकऱ्यांच्या’ हा देखावा सादर केला आहे. यात परिस्थितीशी सामना करीत शेतकऱ्यांनी कशा प्रकारे जीवन जगावे हे त्यात दाखवण्यात आले आहे.

खाद्य पदार्थांचे स्टॉल

नागरिकांची गर्दी लक्षात घेता रस्त्यावर अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यात आईस्क्रिम, मक्याची कणसे, कुल्फी या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच लहान मुलांसाठी फुगे, खेळणी याच्याही स्टॉल्सवर गर्दी पहायला मिळत आहे.

हॉटेल्स फुल्ल

गणेशोत्सवाच्या काळात शहरात असलेली सर्वच हॉटेल्स फुल्ल असलेली पहायला मिळत आहेत. गणपती पाहण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेली मंडळी हॉटेलमध्येच जेवण करणे पसंत करतात. त्यामुळे पंचवटी रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, सीबीएस परिसरातील सर्व हॉटेल्समध्ये वेट‌िंग पहायला मिळाली.

विक्रेत्यांकडून गर्दी ‘कॅश’

उत्सवातील उच्चांकी गर्दी कॅश करण्यासाठी विक्रेत्यांनीही त्या पुरेपूर लाभ करून घेतला. मोठ्या शॉपिंग सेंटर्सपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांनीही जोरदार सेल लावत गल्ला वाढवला. कपड्यांपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत विविध वस्तूंचे सेल लागले होते.

सिडकोतील रस्ते फुलले

सिडको ः सिडको व इंदिरानगर भागातील रस्ते या भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. सिडको व इंदिरानगर भागात दरवर्षी यंदाही शेकडो गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला आहे. आकर्षक देखाव्यांबरोबरच विविध प्रकारची खेळणी किंवा यात्रेचे स्वरुप देऊन नागरिकांना आकर्षित करण्याचे विविध प्रयत्न या मंडळांनी केल्याचे दिसत आहे. सिडकोतील शुभम पार्क येथे असलेला कुंभकर्णाचा देखावा तर सावतानगर येथे श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक व युवक मंडळाने उभारलेला देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. राणेनगर येथे उभारण्यात आलेला महालाचा देखावा हा सर्वांचे आकर्षण ठरल्याचे दिसत आहे. रविवारचे औचित्य साधून अनेक मंडळांनी सत्यनारायण पूजेचे आयोजन केल्याचे दिसत होते. राजीवनगर येथे युनिक ग्रुपच्यावतीने महिलांनी सामूहिक अर्थवशीर्ष पठण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अथर्वशीर्ष पठणाने अवतरले चैतन्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नऊवारी साडी, नाकात नथ अन् विविध प्रकारचे दागिने परिधान केलेल्या महिलांनी एकसुरात केलेल्या अथर्वशीर्ष पठणाने भद्रकाली परिसरात चैतन्य पसरले होत. ठेवा संस्कृतीचा आणि भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात गणरायाची आराधना करण्यासाठी शहरातील विविध भागातून महिलांना एकत्रित करून हा अनोखा उपक्रम घेण्यात आला.

भद्रकाली येथील साक्षी गणपती मंदिराच्या आवारात शहर परिसरातून पाचशेपेक्षा जास्त महिलांनी अथर्वशीर्ष पठणात सहभाग नोंदविला. त्यांच्यासह पडसाद कर्णबधिर विद्यालयातील २० विद्यार्थिनीही यात सहभागी झाल्या. राणी भवन येथील महिला पुरोहितांनीही अथर्वशीर्ष पठण केले. प्रारंभी शिवनाद ढोलपथकाचे ढोलवादन आणि ध्वज मिरविण्याचा कार्यक्रम झाला. अथर्वशीर्ष पठणास महिलांनी प्रारंभ करताच रिमझिम पावसाच्या सरींनी हजेरी लावली. या सरी झेलत अथर्वशीर्ष पठण सुरू होते. अभिनेत्री विद्या करंजीकर, नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठेवा संस्कृतीचा संस्थेच्या संस्थापिका पल्लवी पटवर्धन, वैशाली साठे, गायत्री बेळगे, सोहा लाळे, गीतांजली आव्हाड, मनाली गार्गी, वैशाली शुक्ल, सुचिता सौंदाणकर, सायली सप्रे, त्रिवेणी सानप, हेमा जोशी, अनघा धोडपकर आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सज्ज सारे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मिरवणुकीनंतर आता गणेश विसर्जनसाठीची सज्जता महापालिकेने केली असून, शहरात सहा विभागांत २८ कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. तसेच, गोदावरी व तिच्या उपनद्यांमध्ये गणेश विसर्जनासाठी सहा विभागांत २६ नैसर्गिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

शहरातून दरवर्षी दोन लाखांच्या आसपास लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. अकरा दिवस पूजाअर्चा झाल्यानंतर या मूर्ती गोदावरी, वाघाडी, वालदेवी, दारणा, तसेच नासर्डी या प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनवलेल्या असल्याने त्या पाण्यात लागलीच विरघळत नाही. विर्सजनानंतर मूर्तींची विटंबना होते. सोबत नदी व पर्यावरणाचे प्रदूषण होते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने दरवर्षी मूर्तीदान कार्यक्रमासह गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जातात. महापालिकेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे दरवर्षी हजारो मूर्तींचे संकलन करण्यात येते. तसेच, नद्यांमधील प्रदूषण रोखण्यात महापालिकेला यश मिळते. गेल्या वर्षी कृत्रिम तलावांना मोठा प्रतिसाद लाभल्याने यंदा महापालिकेने २८ कृत्रिम तलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक गणेश विसर्जनासाठी नदीकाठावर २६ ठिकाणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पालिकेच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जाणार असून, गणेशभक्तांनी मूर्तिदान करून प्रदूषणमुक्तीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृत्रिम तलावांची ठिकाणे

नाशिक पूर्व : रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामीनगर बसस्टॉप, शिवाजीवाडी पूल (नंदिनी नदीलगत), कलानगर चौक, राजीवनगर शारदा शाळेजवळ, साईनाथनगर चौफुली.

नाशिक पश्चिम : चोपडा लॉन्स, लायन्स क्लब पंडित कॉलनी, चव्हाण कॉलनी, फॉरेस्ट नर्सरी, महात्मानगर जलकुंभ, येवलेकर मळा, दोंदे पूल म्हसोबा मंदिराजवळ, पालिका बाजार.

सातपूर : सोमेश्वर मंदिर गंगापूर रोड, पाइपलाइनरोड, अशोकनगर, शिवाजीनगर.

सिडको : डे केअर स्कूल, राजे संभाजी स्टेडियम, जिजाऊ वाचनालय, पवननगर स्टेडियम.

पंचवटी : पेठ रोड आरटीओ कॉर्नर, दत्त चौक गोरक्षानगर, कोणार्कनगर.

नाशिकरोड : महापालिका शाळा क्रमांक १२३, जेतवननगर, जय भवानीरोड, नारायणबापू चौक, चेहेडी ट्रक टर्मनिन्स.

नैसर्गिक ठिकाणे

नाशिक पूर्व : शीतळादेवी मंदिर, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण पूल, टाकळी संगम पूल.

नाशिक पश्चिम : यशवंत महाराज पंटागण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटागंण, घारपुरे घाट, हनुमान घाट.

पंचवटी : रामवाडी चिंचबन गोदापार्क, म्हसरूळ सीता सरोवर, राजमाता मंगल कार्याल, नांदूर मानूर गोदावरील पूल, तपोवन, कपीला संगम, रामकुंड परिसर.

नाशिकरोड : चेहडी दारणा घाट, वालदेवी नदी विहीतगाव, देवळाली गाव, वडनेर गाव पंपिंग स्टेशन, दसक घाट, दसक जेलरोड.

सातपूर : मते लॉन्स गंगापूररोड, आनंदवल्ली गावाजवळ, सोमेश्वर धबधबा, नासर्डी नदी (पपया नर्सरीजवळ), गणेश घाट औंदुबरचौक.

नवीन नाशिक : वालदेवी नदीघाट.

मनपातर्फे सहा टन मोफत बेकिंग सोडा

महापालिकेकडून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात आला आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यासोबतच पीओपीच्या गणेश मूर्तीपासून होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा) चे मोफत वितरण केले जाणार आहे. महापालिकेने आरसीएफकडून सहा टन अमोनियम बायकार्बोनेट मागविले असून, नागरिकांना मोफत दिले जाणार आहे. पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमधून हे अमोनियम बायकार्बोनेट घेऊन जावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

सीसीटीव्हीची नजर

दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या पारंपरिक विसर्जन मिरवणूक मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीवर १४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. वाकडी बारव, दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड येथे व विसर्जनस्थळी चारही बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यांचे नियंत्रण भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्यात ठेवण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही लावले जातात. मिरवणुकीचे पोलिसांकडूनही चित्रीकरणही केले जाणार आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नजर राहणार नाही, अशा शहरातील अन्य भागांमध्ये पोलिसांकडूनच व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदायचे नाही? खावटीही नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीने पतीचा स्वतःहून त्याग केला, तसेच नांदण्यासाठी येण्यास वेळोवेळी नकार दिला, या दोन प्रमुख कारणांवरून शहादा कोर्टाने पत्नीचा खावटीचा अर्ज रद्द केला आहे. कोर्टाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात असून, पुरुष हक्क संरक्षण समितीने कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, की नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि एका विद्यापीठात काम करणाऱ्या विनय (नाव बदललेले आहे.) यांचा विवाह २०१२ मध्ये शहादा येथील मीना (नाव बदललेले आहे.) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर मीना सासरी म्हणजे नाशिकला आली. मीनाचे उच्चशिक्षण पूर्ण व्हावे म्हणून विनयने तिचे एका कॉलेजमध्ये अॅडमिशन करून दिले. मात्र, शहरात राहण्याची सवय नसल्याने मीनाचे मन रमलेच नाही. कोणतेही ठोस कारण नसताना ती माहेरी निघून गेली. अनेकदा मध्यस्थी करूनही ती परतलीच नाही.

दरम्यान, यासंदर्भात विनयने पुरुष हक्क संरक्षण समितीचे सचिव धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे कैफियत मांडली. अॅड. चव्हाण यांनी दोन वेळेस शहादा येथे राहणाऱ्या मीनाला नांदण्यास येण्याबाबत नोटिसा पाठविल्या. मात्र, तरीही मीना आली नाही. या प्रकरणी कौटुंबिक न्यायालयातदेखील विनयने दाद मागितली. दरम्यान, या कालावधीत मीनाने शहादा येथील एम. बी. सोनटक्के यांच्या कोर्टात खावटीसाठी अर्ज सादर केला. सुनावणीवेळी अॅड. चव्हाण यांनी विनयची कोणतीही चूक नसल्याची बाजू मांडली. विनय मीनाला नांदवायला तयार असून, ती येण्यास तयार नसल्याचा मुद्दा अॅड. चव्हाण यांनी कोर्टासमोर मांडला. तसे पुरावे समोर आल्याने कोर्टाने मीनाचा खावटीचा अर्ज रद्द केला. याबाबत बोलताना चव्हाण यांनी सांगितले, की कौटुंबिक वादात बहुतांश वेळी अवलंबित असलेल्या महिलेला आर्थिक मदत म्हणून खावटी मिळते. एखाद्या प्रकरणातच महिलेचा अर्ज रद्द होतो. त्यामुळे या निकालास महत्त्व अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीनंतर ४० सिटीबस बंद होणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात चालेल्या सिटीबसच्या अनेक फेऱ्या रद्द केल्यानंतर आता दिवाळीनंतर पुन्हा ४० बसेस कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, तसे संकेत दिले आहेत. याअगोदरच एसटीच्या २२५ बसेस शहरातून धावत होत्या. त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने कपात केल्यामुळे त्यांची संख्या आता १४५ झाली आहे. त्यातून या ४० बसेस आता कमी केल्या जाणार आहेत.

सिटीबस शहरातील रस्त्यांवर तीन शिफ्टमध्ये धावत असतात. सकाळच्या शिफ्टमध्ये १४५ बसेस असतात तर दुपारच्या शिफ्टमध्ये १२० व रात्री अवघ्या ३५ बसेस असतात. त्यातील काही बस बंद असल्यामुळे दररोज या बसेसचा आकडाही बदलत असतो. एसटीच्या या निर्णयामुळे पुन्हा अनेक मार्गांवरील बस बंद होणार आहेत. सिटीबसमुळे एसटीला गेल्या पाच वर्षांत १०८ कोटी रुपयांचा तोटा झाला. या आर्थिक वर्षातही १७ कोटी ७९ लाख ६२ हजारांचा फटका बसला. त्यामुळे हा आकडा आता १२५ कोटींपर्यंत गेला आहे. यावर्षी सिटी बसच्या माध्यमातून एसटीला ६५ कोटी ११ लाख ५५ हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर खर्च ८२ कोटी ३१ लाख ४४ हजार झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने या बस महानगरपालिकेने ताब्यात घ्याव्यात, असे पत्र पाठवले. पण, त्यातून प्रतिसाद न मिळाल्यामुळे एसटीने टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकबरोबरच राज्यातील सहा शहरांत अशाच पद्धतीने ही सेवा बंद केली जाणार आहे.

सिटीबस सेवेचा वर्षभरात ५ कोटींहून अधिक प्रवासी लाभ घेतात. २४ तास सेवा देणारी ही सिटी बस शहरातील ५०८ मार्गांवरून धावत होती. पण आता अनेक मार्ग बंद करण्यात आले आहे. ट्राम ते सिटीबस असा प्रवास करीत एसटीने १९७५ साली आपली सेवा सुदृढ केली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत एसटीचा तोटा वाढू लागल्यामुळे ही सेवा बंद करणे हेच एसटीच्या हाती असल्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अमंलबजावणी सुरू केली आहे.

लोकप्रतिनिधींची उदास‌िनता

सिटीबस सेवा बंद होत असताना लोकप्रतिनिधी मात्र याबाबत उदास‌ीन आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांचा संताप वाढला आहे. अनेक मार्ग बंद केल्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना याबद्दल कोणी ब्र काढत नसल्यामुळे या विषयावरुन नाराजी वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात मिरवणुकीवर सीसीटीव्हीचे लक्ष

$
0
0

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस दलाची काय सज्जता आहे?

गणेशोत्सव, तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली सज्जता ठेवली असून, त्यात वाढ करण्यात आली आहे. तालुकानिहाय बंदोबस्त तैनात असून, मिरवणूक मार्गांवर जवळपास २०० सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारपर्यंत १६२ सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, उर्वरित काम दोन दिवसांत पूर्ण होईल. मालेगावमध्ये महापालिका, तसेच पोलिसांनी मिळून सीसीटीव्ही यंत्रणा उभी केली आहे. याव्यतिरिक्त सिन्नर, येवला, चांदवड, निफाड, कळवण, इगतपुरी, सटाणा अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये व्यापारी संघ, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच स्थानिक पोलिस स्टेशन यांच्यामार्फत काम सुरू आहे.

बंदोबस्त कसा असेल?

ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सव आणि २ सप्टेंबर रोजी झालेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ४० पोलिस स्टेशन हद्दीत, तसेच आठ विभागीय स्तर आणि मालेगाव शहरासाठी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले. अधीक्षक, दोन अप्पर अधीक्षक, नऊ उपअधीक्षक, ५० पोलिस निरीक्षक, १२० उपनिरीक्षक, तसेच २,६०० पोलिस कर्मचारी असा फौजफाटा बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आला. या बंदोबस्तासाठी बाहेरच्या जिह्यातील दोन उपअधीक्षक, पाच निरीक्षक, दोन एसआरपीएफच्या तुकड्या व १,४०० होमगार्डसना पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे व राष्ट्रपुरुषांचे पुतळे या ठिकाणी फिक्स पॉइंट नेमण्यात आले आहेत. या काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहा दंगानियंत्रण पथके, दोन शीघ्र कृती दल, एक वज्र व वरुण वाहन सतर्क ठेवण्यात आले आहे. पोलिस स्टेशननिहाय गुड मॉर्निंग स्कॉड व गोपनीय यंत्रणेचे काम सुरू आहे. गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी ४,०२३ नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गेल्या वर्षी, तसेच त्यापूर्वी ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत आणि समाजविघातक कृत्य करणारे समाजकंटक, सराईत व अभिलेखावरील गुन्हेगारांचा यात समावेश आहे, त्यांच्यावर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १०७, १०९, ११०, १४९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

‘एक गाव एक गणपती’ योजनेस प्रतिसाद कसा लाभला?

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा एक गाव एक गणपती या योजनेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. ज्या गावांमध्ये ही योजना राबवली तिथे किरकोळ वाददेखील झालेले नाहीत. अशा गणेश मंडळांचा सत्कार करण्यात येईल. ही योजना जिल्ह्यातील छोट्या, तसेच मोठ्या शहरांत यशस्वी करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जात आहेत?

ध्वनिप्रदूषणासह जलप्रदूषण रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली असून, त्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत केली जाईल. ध्वनिप्रदूषणाचे तोटे दाखवणारा एक व्हिडीओदेखील आम्ही तयार केला असून, तो दाखवला जात आहे. या संबंधी जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांपर्यंत पोलिस पोहोचले आहेत. स्थानिक पोलिस स्टेशनला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्रबोधनानंतर अनेक मंडळांनी कर्णकर्कश डॉल्बी साउंडला तिलांजली देण्याचा निर्णय घेतला आहे. जी मंडळे कायद्याचा मान राखणार नाही, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन’वर मिळणार मोफत लस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लू आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करावी. स्वाइन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सीएसआर निधीतून सर्व शासकीय रुग्णालयांत प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते. या वेळी महाजन म्हणाले, की जिल्ह्यात यंदा स्वाइन फ्लूमुळे ४६ मृत्यू झाले आहेत आणि ३११ रुग्णांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. आजार नियंत्रणात आणण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा महापालिका स्तरावर घेण्यात यावी, स्वाइन फ्लूची सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनीदेखील जवळच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा महापालिका रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील गर्भवतींना स्वाइन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

१० सप्टेंबरपर्यंत लस होणार उपलब्ध

स्वच्छतेमुळे आजारासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करावे. नाशिक शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या स्वच्छता व्यवस्थेच्या धर्तीवर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. सीएसआरमधून प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री प्रयत्न करणार असून, १० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस आरोग्य विभाग आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात १० पासून सीटूचे साहित्य संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)तर्फे पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन १०, ११ सप्टेंबर रोजी जालना येथे होणार आहे. संमेलनाचे उद््घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध विचारवंत इतिहासतज्ज्ञ डॉ. आ. ह. साळुंखे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. संमेलाच्या समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लेखक पी. साईनाथ, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे प्रमुख पाहुणे असतील.

श्रमिक साहित्य संमेलनात दोन दिवस विविध विषयांवर तीन परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ सन्मान मिरवणूक, विशेष गौरव यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, ज्येष्ठ कांदबरीकार दीनानाथ मनोहर, ज्येष्ठ पत्रकार लेखक महावीर जोंधळे उपस्थित राहतील. सोमवार, ११ सप्टेंबर रोजी संमेलन समारोपात ‘श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने’ या विषयावर सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद होईल. यात ज्येष्ठ पत्रकार लेखक पी. साईनाथ, लेखक विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, शेतमजूर युनियन महाराष्ट्राचे संस्थापक कुमार शिराळकर यांचा सहभाग राहणार आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, माकप नेते श्रीधर देशपांडे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट सरपंच निवडणुकीसाठी भाजपने बनविले पॅनल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या १७३ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीत थेट पॅनल उभे करून ग्रामीण भागात पाया भक्कम करण्यासाठी निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

या निवडणुकीसाठी पक्षाचे चिन्ह नसले तरी पक्षाला फारशी अडचण येणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. थेट सरपंचासाठी सर्वमान्य उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली असून, त्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपने आपले उमेदवार उभे केले. पण त्यांना महापालिका वगळता इतर ठिकाणी फारसे यश मिळालेले नसले तरी या निवडणुकानिमित्ताने भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपने आपले बस्तान आता ग्रामीणमध्ये वाढवण्यासाठी थेट सरपंच निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी कार्यकर्त्यांसह ग्रामीण भागातील आपले दौरे सुरू केले आहेत.

एकीकडे भाजपनेे या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेने आपली ताकद पणाला लावत या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या निवडणुकीत ज्या ठिकाणी आपले वर्चस्व आहे. तेथे लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामपंचायतीच्या जिल्ह्यातील सर्वच निवडणुका भाजप पॅनल तयार करुन लढवणार आहे. त्यासाठी दौरे व चाचपणीही सुरू केली आहे. थेट सरपंचासाठी सर्व समावेश उमेदवार आम्ही देणार आहोत. जास्तीत जास्त थेट सरपंच निवडून आणणे हे आमचे लक्ष्य असून, भाजप सदस्यांची संख्या वाढविणे हे देखील लक्ष आहे.

-दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गांत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंगळवारी (दि.५) सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील काही ठिकाणावरील मिरवणूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड आणि गंगापूर या ठिकाणी हा परिणाम दिसून येईल.

असा असेल मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग

वाकडी बारव (चौक मंडई) येथून जहांगिर मशिद - दादासाहेब फाळके रोड - फुले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगेमहाराज पुतळा - गो. ह. देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बँक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाण.

शहरातील पर्यायी वाहतूक व्यवस्था

या कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. दरम्यान, पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.

नाशिकरोड गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग

नाशिकरोडला बिटको चौकातून मिरवणुकीस सुरुवात होईल. बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वेस्टेशन पोलिस चौकी - सुभाषरोड - सत्कार पॉईंट - देवळालीगाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावपर्यंत जाणार आहे.

वाहतुकीतील बदल

पंचवटी डेपो, निमाणी बस स्टॅण्ड, महामार्ग, सिडको इत्यादी विभागांतून नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसेस दत्तमंदिर सिग्नलपर्यंत जातील व तेथूनच परत येतील. सिन्नरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व इतर वाहने उड्डाणपुलावरून ये-जा करतील.

गंगापूर पोलिस ठाणे (आनंदवली नदीपात्र)

आनंदवली नदीपात्रात विसर्जनासाठी गर्दी होते. यासाठी चांदशीगाव ते आनंदवली नदीपात्र आणि आनंदवली नदीपात्र ते चांदशी गावापर्यंतचा मार्ग दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिककडे येणाऱ्या व नाशिकहून चांदशीकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी आनंदवली पुलाकडे न जाता चांदशीगावरोडने नाशिक तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालव्यामार्गे मखमलाबाद रोडने लागून रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोड अशी ये-जा करावी.

जेलरोड विभाग

नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ९१८ खेळाडू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे योगासनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज योग विद्यापीठ स्थापण्याकरिता प्रयत्न करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना योगासनाचे उत्तम प्रात्यक्षिके पाहता यावीत यासाठी नाशिक येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात येईल आणि त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

नक्षत्र लॉन्समध्ये नाशिक योगा कल्चर क्लबतर्फे आयोजित ३० व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ते बोलत होते. कार्यक्रमाला योगासन संघटनेचे यू. के. शर्मा, प्रज्ञा पाटील, व्हीनस वाणी, डॉ. मीनाक्षी गवही, दीपेंद्र शहा, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, की गेल्या ३० वर्षांत प्रथमच ही स्पर्धा भरविण्याचा मान राज्याला आणि विशेष करून नाशिकला मिळाला आहे. स्पर्धेत उत्तमोत्तम खेळाडू सहभागी झाल्याने योगासनाचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे ही प्राचीन विद्या जगभरातील १८० देशात पोहोचली आहे. चांगले आरोग्य आणि मन:शांतीसाठी योगासने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, महाजन यांनी खेळाडूंनी सादर केलेली विविध आसने पाहिली आणि खेळाडूंना टाळ्या वाजूवन प्रतिसादही दिला. खेळाडूंचे कौशल्य पाहून आपल्यालाही योगासनाविषयी अधिक आकर्षण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी देशभरातून ९१८ खेळाडू आणि ५३ पंच सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किरकोळ वादातून भावाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजीबरोबर भांडण का करतोस, असे म्हणत एकाने भावाचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

सागर बालाजी एखडे (वय १९, रा. श्रमिकनगर, गंजमाळ) असे संशयिताचे नाव आहे. सागरने त्याचाच मोठा भाऊ असलेल्या शिवराम बालाजी एखडे (वय २२, श्रमिकनगर) याची चाकूने वार करीत हत्या केली. सागरच्या आईचे दोन विवाह झाले असून, तिला पहिल्या पतीपासून एक, तर दुसऱ्या पतीपासून चार मुले आहेत. दुसरा पती मखमलाबाद परिसरात राहतो. ही महिला आपल्या मुलासह आणखी काही सदस्यांसह श्रमिकनगर परिसरात राहते. सागर आणि त्याच्या आजीचे शनिवारी रात्री वाद सुरू झाले. वादाचे प्रसंग नेहमीच उद्भवत असल्याने सागरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवराम ऐकत नव्हता. त्या वेळी सागरने घरातील बाथरूमजवळ पडलेला चाकू उचलला आणि तिथेच त्याच्या पोटावर भोसकला. त्यात गंभीर जखमी झालेला शिवराम खाली कोसळला. या वेळी घरात उपस्थित असलेल्या मनोज किसन गायखे (वय ५०, श्रमिकनगर, गंजमाळ) या सागरच्या मामाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सागरच्या हल्ल्यात तोही किरकोळ जखमी झाला. या दोघांना काही वेळातच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, अधिक रक्तस्राव झाल्याने शिवरामचा मृत्यू झाला. या प्रकरणी रफिक किसन गायखे (वय ५०, श्रमिक नगर, गंजमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपी सागर एखडे याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी तपास करीत आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असून, चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तीचे स्वागत अन् बेशिस्तीवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्तीसह कायद्याचे पालन सर्वांनी करावे. सार्वजनिक मिरवणुका शांततेत पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांसह संबंधित मंडळांवर देखील आहे. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा केल्यास त्वरित कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिला आहे.

गणेशात्सवाची मिरवणूक मंगळवारी (दि.५) दुपारी १२ वाजता सुरू होण्यासाठी अनेक मंडळांनी सहमती दर्शवली आहे. मिरवणूक वेळेत सुरू झाल्यास रात्री धांदल होणार नाही. ध्वनी प्रदूषण कायद्याचे तसेच, कोर्ट आदेशाचे तंतोतत पालन करण्यात येईल. ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गतवर्षी तब्बल ३६ गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा हे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, काही मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. उत्साही तरुण मंडळींसाठी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात. पासपोर्ट व्हेरिफिकेशन असो की नोकरीचे काम, सर्वच ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागते. ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी पुरेसे यंत्र उपलब्ध असल्याचे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. यंदा ब्रेथ अॅनालायझर देखील पोलिसांना देण्यात येणार आहे. मिरवणुकीत सहभागी मद्यपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या बरोबर ठिकठिकाणी व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान क्षणाक्षणाचे चित्रीकरण करण्यात येईल. मिरवणूक शांततेत पार पडावी, ही पोलिसांची इच्छा आहे. मात्र, यासाठी कायदा मोडणाऱ्यांना सुट देता येणार आहे. चित्रीकरणाचा पुरावा ग्राह्य मानून दुसऱ्या दिवशीदेखील गुन्हे दाखल करण्याची रणनीती पोलिसांनी आखली आहे. यासाठी पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून, मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी लागलीच पोलिसांना नियोजनासाठी बोलविण्यात आले आहे.


आनंद आणि उन्माद यात फरक असून, त्यानुसार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. गणराय ही बुध्दिची देवता आहे. ध्वनी वा जल प्रदूषण रोखण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा रस्त्यावर आंदोलन करणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पालिकेच्या अधिकृत कत्तलखान्याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी कुर्बानी होत असल्याने मोसमनदी पत्रात रक्तमिश्रित पाणी येत आहे. मंगळवारी होणाऱ्या गणेशविसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न चांगलाच तापला असून, भाजपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीने देखील पालिकेने वेळीच रस्ते, वीज, गणेशकुंड, रक्तमिश्रितपाणी याबाबत उपयोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

एकता सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अद्वय हिरे बोलत होते. बकरी ईदच्या निमित्ताने शहरात अनधिकृत कत्तल होते. कुर्बानीचे रक्तमिश्रित पाणी गटारीतून मोसमनदी पत्रात येत असल्याने पर्यायाने ते गणेशकुंडात वाहत येते. गणेशकुंड तसेच मोसम व गिरणा नदीत गणेश विसर्जन होते. प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे रक्तमिश्रित पाण्यात गणेश विसर्जन करण्याचे जनतेच्या निशिबी येणार आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रशासनाने याबाबत वेळीच कारवाई करावी. अन्यथा विसर्जनाच्या दिवशी मालेगाव बंदची हाक देण्यात येईल. भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी गणेशकुंडांची पाहणी करून अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व मनपा उपायुक्त राजू खैरनार यांना निवेदन दिले.

कामे वेळेत पूर्ण करा

रविवारी सकाळी महापालिका सभागृहात मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे, उपाध्यक्ष देवा पाटील, निखील पवार आदींसह पालिकेचे उपायुक्त राजू खैरनार, स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे, सचिन माळवाळ, सचिन महाले यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी गणेशोत्सव समितीच्या सदस्यांनी पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावे, पाणपोईची व्यवस्था करावी, अतिक्रमण हटवावे, पथदिवे सुरू करावेत, मोकाट जनावरांना पायबंद घालावा आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॉमाचा ड्रामा सुरूच…

$
0
0

कैलास येवला, सटाणा

सटाणा येथील ट्रॉमा केअर युनिटचा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते उद‌्घाटन समारंभ होऊन त्यांची पाठ वळते न वळते तोच ट्रॉमा केअर युनिटमध्ये पुन्हा ग्रामीण रूग्णालय सुरू करून प्रशासनाने एक प्रकारे लोकप्रतिनिधींचीच थट्टा उडविली आहे. ट्रॉमा केअर युनिटचा मंजूर असलेला स्टाफ नसल्याने युनिट बंद आहे.

तब्बल पाच वर्षांपासून ट्रॉमा केअर सेंटरची सुसज्ज इमारत तयार आहे. पदे न भरल्यामुळे इमारत व वैद्यकीय उपकरणे धुळखात पडून होती. या युनिट लगतच सटाणा ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी आहे. युनिटची इमारत पूर्ण होवून पाच वर्ष उलटले. याच काळात ग्रामीण रुग्णालयाला नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये मिळाल्याने त्याची डागडुजी व नूतनीकरणासाठी ट्रॉमा युनिटमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे नुतनीकरण होऊनही ते ट्रॉमा केअर युनिटमध्येच सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर कोसळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कितीही कारवाया केल्या तरीही निफाड तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शनिवारी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या रस्त्यावरून वाळू वाहून नेणारा एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह ३० फूट खाली कोसळला. यात या ट्रॅक्टरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी कादवा, गोदावरी, विणता नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. अनेक वेळा कारवाया करूनही अवैध वाळू उपसा सुरू असल्याने गावपातळीवरील महसूल यंत्रणेच्या प्रतिनिधींच्या सहकार्याशिवाय हे सुरू राहू शकत नाही हे समोर येते.

शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या रस्त्यावरून वाळू वाहतूक होत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह डाव्या बाजूला पडला. जर हा ट्रॅकर उजव्या बाजूला पडला असता तर चालक ट्रॅक्टरसह धरणात बुडण्याची शक्यता होती. या धरणाच्या रस्त्यावरून वाहतुकीला बंदी असताना वाळूचा ट्रॅक्टर धावतो कसा? याचा अर्थ धरणावरील सुरक्षा व्यवस्थाही काय करते हा प्रश्न आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीपात्रातून दिवसा वाळू वाहतूक केली जाते. जवळपास वाळू साठवून रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू असते. अनेकदा महसूल यंत्रणेला माहिती देऊनही कोणतीच कारवाई होत नाही.

- संतोष पगारे, नांदूरमध्यमेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images