आजारावर चुकीचे उपचार केले जात असल्याने व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागतात, असे प्रतिपादन मर्क्युरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत चौधरी यांनी केले. दुर्गा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्यातर्फे झालेल्या ‘जल्लोष स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. चौधरी म्हणाले, की सध्याच्या या धकाधकीच्या युगात कोणताही माणूस ताण तणावाशिवाय जगू शकत नाही. ताण तणावामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते, त्यात माणसांचा स्वभावही अनेक आजारांना आमंत्रण देतो. कंबरदुखी, मणक्याचे दुखणे, गुडघेदुखी अशा प्रकारच्या दुखण्याला स्त्रियांना समोर जावे लागते. त्यामुळे आहार आणि व्यायाम यांना जीवनात महत्त्व दिले पाहिजे. तणावामुळे ऍसिडिटीत ९० टक्के वाद होत असते. आहाराद्वारे केवळ १० टक्के अॅसेडिटी वाढू शकते. दुधयुक्त चहा पिणे हेदेखील अॅसेडिटी वाढविण्यास कारणीभूत ठरते. निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीतून आहार संतुलित करून आरोग्य चांगले ठेवता येते.
डॉ. मनोज मोरे यांनी चांगले आरोग्य राहण्यासाठी सर्व प्रकारच्या आहाराचा नियमितपणे समावेश करण्याचा सल्ला दिला. गायिका गीता माळी आणि मोहित माळी यांनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गीता माळी प्रस्तुत श्रावणसरींनी भरलेल्या गीतांचा कार्यक्रम झाला त्यात त्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट