Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

श्रावणासाठी सज्जता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

यंदा श्रावण महिन्याची सुरुवातच सोमवारपासून होत असल्यामुळे त्र्यंबक येथील श्रावण पर्वकालसाठी नियोजन सुरू आहे. या नियोजनाची प्राथम‌कि बैठक बुधवारी प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर नियोजनाची मुख्य आढावा बैठक २१ जुलैला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे स्वतः घेणार आहेत. बुधवारी झालेल्या प्राथमिक बैठकीत शासनाच्या विविध सेवा देणाऱ्या यंत्रणांची तयारीबाबत आढावा घेण्यात आला. तहसीलदार महेंद्र पवार, उपाधिक्षक शामराव वळवी, नगराध्यक्षा तृप्ती धारणे, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव, पोल‌सि निरीक्षक सुधाकर मांडवकर, डॉ. भागवत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

अन्न आणि औषध प्रशासन व अबकारी कर विभागाचे अधिकारी गैरहजर होते. त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना देवस्थान ट्रस्टने सुविधा देणे आवश्यक आहे, असे प्रांताधिकारी पाटील यांनी बैठकीत सांगितले. कुशावर्तावर सीसीटीव्ही सुविधा देवस्थानने कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिवसैनिक विशाल जोशी आणि नितीन पवार यांनी वाहतूक नियोजनाबाबत सूचना केल्या. तसेच नाशिक-त्र्यंबक मार्गावरील दारू विक्रीसह भांग-गांजा, गुटखाच्या विक्रीवर बंदी करावी, अशी मागणी केली.

वीजप्रश्नावर झाली चर्चा

बैठकीत नगरसेवक राहुल फडके यांनी शहरातील व‌जिेच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. वीज वितरण सहायक अभियंता सरनाईक यांनी सविस्तर माहिती दिली. सिंहस्थमध्ये शहरात भूमिगत केलेली वायरिंग ४० टक्के खराब झाली आहे. ही वायरिंग दोन संचात केली आहे. त्यातील एक संच सिंहस्थातच जळाला. आता त दुसऱ्या संचातील केबलवर लोड आहे. या केबल दुरूस्त करण्यासाठी रस्ता फोडण्याची गरज असून, त्याबाबतची परवानगी मिळत नाही. तसेच तो खर्च कोण करणार असा त‌ढिा निर्माण झाला आहे. ओव्हरहेड वायरिंगसाठी खांब नाहीत. ते होते ते सिंहस्थात काढून टाकण्यात आले.

पाणीपुरवठा सुरळीत राहणार

अंबोली धरणावर त्र्यंबक नगर परिषदेच्या पाणीपुरवठा पंपहाऊस येथे कधीही वीज खंड‌ति होत नाही, याकडे लक्ष वेधले. कारण तेथे तीन पर्याय आहेत. त्याचप्रमाणे सोमवारच्या गर्दीच्या कालावधीत वीज कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्र्यंबकचा पाणीपुरवठा वीज नाही म्हणून विकस्ळीत झाला अशी समस्या निर्माण होणार नाही, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले.

असे असणार नियोजन

तिसऱ्या सोमवारी खासगी वाहने खंबाळे, अंबोली, पहिने, तळवाडे वाहनतळावर थांबविण्यात येतील, तेथून बस सुविधा.

हे नियोजन फक्त श्रावण सोमवारकरिता असेल

गरजेप्रमाणे साधुग्रामच्या जागेवर वाहने थांबविण्यात येतील

फेरी मार्गावर पोलिस बंदोबस्त राहणार

पहिला, दुसरा, चौथा व पाचव्या सोमवारी रुग्णालयात यंत्रणा सज्ज

तिसऱ्या सोमवारी आरोग्य व्यवस्थेत वाढ

त्र्यंबकेश्‍वर मंदिर, जव्हार फाटा, सापगाव फाटा कुशावर्त तीर्थ येथे फिरते आरोग्य पथक

१0८ सह इतरही रुग्णवाहिकांचा सोय

एस. टी. महामंडळातर्फे तिसऱ्या सोमवारव्यतिरिक्त नेहमीच्या बसेससह जादा बसेस रविवारी, सोमवारी सोडण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महासभा ठरणार वादळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

पावसाळी गटार योजना, नाले सफाईसह मनसेच्या काळातील दीडशे कोटींच्या कामांवर फुली मारण्याच्या विषयावरून गुरुवारी होणाऱ्या महासभेत वादंग होण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षातील १५२ कोटींची विकासकामांना कात्री लावण्याला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे मनसेसह विरोधकांकडून या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळी गटार योजनेच्या प्रश्नोत्तरामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान दीडशे कोटींच्या कामांना कात्री लागल्याने स्पील ओव्हर (महासभेत मंजूर पण काही कारणास्तव रखडलेली कामे) हा सव्वाचारशे कोटींवर आला आहे.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महासभा होत आहे. या महासभेत विकास कामांच्या प्रस्तावासह समित्यांचे अधिकार, पावसाळी गटार योजनेची प्रश्नावली, नालेसफाई, मनसेच्या काळातील दीडशे कोटींच्या कामांना कात्री लावण्याच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे पुन्हा सत्ताधारी व विरोधक आमने सामने येणार आहे. दीडशे कोटींच्या कामांना कात्री, महासभेची मंजुरी न घेताच परस्पर विषय रद्द करणे, नालेसफाई आदी विषयांवर राष्ट्रवादी, मनसे व शिवसेना जाब विचारणार आहे. तर भाजपनेही विरोधकांकडून होणाऱ्या हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी तयारी केली आहे.

स्पील ओव्हर घटला

दरम्यान, दीडशे कोटींची कामे कमी केल्यामुळे प्रशासनावरील स्पील ओव्हरचा बोझा काहीसा कमी झाली आहे. पालिकेचा स्पील ओव्हर हा ६३० कोटींपर्यंत पोहचला होता. मात्र महापौरांनी मनसेच्या काळातील १५२ कोटींची कामे रद्द केली आहेत. तसेच काही कामांचे देयके अदा झाले आहेत. त्यामुळे सध्या स्पील ओव्हर हा ४२४ कोटींपर्यत आला आहे. त्यामुळे लेखा विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आणि अंतर्गत वादावरून नाशिक दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी महापौरासह सर्वच पाच पदाधिकाऱ्यांना पाचारण केले होते. परंतु वेळेअभावी पालकमंत्र्यांना या पदाधिकाऱ्यांची चर्चा करता आली नाही. परंतु पालिकेतील वादाची त्यांनी गंभीर दखल घेतली असून, पदाधिकाऱ्यांच्या कानउघाडणीसाठी त्यांना पाचारणही केले होते. मात्र पुढील दौऱ्यात थेट पदाधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन समित्या म्हणजे पुनर्वसनाचा खटाटोप!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत सत्ताधारी भाजपने नव्याने स्थापन केलेल्या तीनही समित्या या केवळ भाजप नगरसेवकांचे पुनर्वसन करण्यासाठी आहे. या समित्यांमुळे शहराचे प्रश्न सोडविण्याऐवजी गुंतागुत वाढणार आहे. त्यामुळे समित्यांना अधिकारच मिळणार नसल्याने त्या बरखास्त करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.

महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी स्थापन केलेल्या शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन समित्यांसाठी गुरुवारच्या महासभेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समित्यांची रचना आता वादात सापडली आहे. या समित्या म्हणजे भाजप नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठीचा खटाटोप असल्याचा टोला बोरस्ते यांनी लगावला आहे. पया समित्या म्हणजे नाशिककरांच्या पैशांचा अपव्यव आहे. पालिकेत अगोदरच भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. त्यात तीन तोंडाची भर पडणार आहे, असा टोला बोरस्ते यांनी लगावला आहे. या समित्यांना कायद्याचा आधार नसल्याने त्यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांचे हसू होणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचाही हल्लाबोल

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या समित्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या समित्या बोगस समित्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी केला आहे. हा मसुदा हा आयुक्तांनीच ठेवायला हवा होता, असा दावाही त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फीच्या मोहाने घेतला असता जीव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

हल्ली सेल्फीसाठी कोण काय आचरटपणा करील, हे सांगताच येत नाही. स्वप्रतिमेत आकंठ बुडालेले लोक असे विचित्र प्रकार करून स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. अनेकदा अशा दुःसाहसातून अनेकांचे बळी जात असल्याच्या घटना रोज घडत आहेत. मात्र, त्यातून धडा घ्यायला कोणीच तयार नाही.

असेच सेल्फीसाठी केलेला स्टंट एका कामगाराच्या जीवावर बेतता बेतता राहिला. अंबड औद्योगिक वसाहतीत एका नावाजलेल्या कारखान्यात खासगी ठेकेदाराकडून शेडचे पत्रे बदलण्‍याचे काम सुरू होते. यासाठी जाधव नावाच्या व्यक्तीला कंपनीने कंत्राट दिले होते. ठेकेदाराकडे कामासाठी असलेल्या आठ कामगारांनी कंपनीचे पत्र बदल्याचे कामही पूर्ण केले. काम संपल्यानंतर येथील आठवण म्हणून कुणाल डांगळे नावाच्या कामगाराला सेल्फी घेण्याची लहर आली. बरं सेल्फी घेण्यासाठी हा कामगार चक्क २७ फूट उंच बांधलेल्या भिंतीवर चढला. मग काय, सेल्फीची पोज घ्यायच्या नादात जे व्हायचे तेच झाले. या‌ भिंतीवर या कामगाराचा तोल गेला आणि तो भिंतीवरून खाली कोसळला. यात या कामगाराला गंभीर दुखापत झाली. कंपनी व्यवस्थापनाने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागानेही दखल घेतली आहे.

..तेथे जाण्याची गरजच काय?

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डी. बी. गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार डांगळे यांनी त्यांचे काम पूर्ण केले होते. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लागणारी सर्वच उपकरणे होती. परंतु, ज्या ठिकाणी जाण्याची गरजच नव्हती अशा ठिकाणी डांगळे सेल्फी काढण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी लावलेला सेफ्टी बेल्ट पाच फूट कमी पडला. त्यामुळे त्यांनी तो काढून टाकला. त्यातच त्यांचा तोल गेल्याने ते २७ फूट उंचीवरून ते खाली पडल्याने जखमी झाले असल्याचे सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक गोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींचे आंदोलन मागे

$
0
0

नाशिक : नामांकित शाळेतील प्रलंबित प्रवेश आणि चौथीपर्यंत आश्रमशाळांमधील वर्ग बंद करू नये, या मागणीसाठी आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेले आंदोलन आद‌विासी विभागाच्या वतीने कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर गुरुवारी मागे घेण्यात आले.

आश्रमशाळांमधील हे वर्ग बंद करण्यात येऊ नयेत, या मागणीसाठी आदिवासी पालकांसह विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या. मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यावा या मागणीसाठी मंगळवारपासून (दि. १८) ठिय्या मांडून असलेल्या पालकांनी आयुक्तालयाला टाळेही ठोकल्याची घटना घडली होती. तर कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून पालक यावेळी शासनाविरोधात आक्रमक झाले होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारोंची वीजबिले भरणार तरी कशी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महावितरण कंपनीने चुकीची आकारणी करीत दिलेल्या अवास्तव बिलांमुळे गिरणारे परिसरातील वीज व वीजपंप ग्राहकांची फसवणूक झाली आहे. अनेक बिलावर वजा रक्कम आकारली आहेत तर काही बिलांची रक्कम हजारो रुपयांची असल्याने ती भरायची कशी, असा प्रश्न स्थानिकांपुढे निर्माण झाला आहे.
महावितरण अवेळी वीजबिले देते, अनेक बिलांवर मीटरमधील रिडिंग नोंद होत नाही. ठोस आकारणी न करता बिले पाठविली जातात. दरमहा वीजबिले दिली जात नसल्याने अचानक एकदाच येणारी हजारोंची वीजबिल भरायची कशी, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केलेला आहे.
अनेक वीजमीटर दोषपूर्ण आहे. ती बदलून देण्याची ग्राहकांची जुनीच मागणी आहे. मात्र, त्याबाबत महावितरणकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याविषयी तक्रार करायला गेल्यावर गिरणारे येथील महावितरणचे अधिकारी सातपूर कार्यालयाकडे पाठवतात; मात्र सातपूरला तक्रार करूनही अद्याप समस्या सुटू शकलेल्या नाहीत, असे गिरणारे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्राहकांची दिशाभूल
महावितरणकडून दरमहिन्याला घरपोच वीजबिले मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गिरणारे परिसरात असे अद्याप होऊ शकलेले नाही. काहीवेळा तर वीजबिले वजा किंवा शून्य रुपये मिळते. वजा रक्कम आकारून महावितरण ग्राहकांची दिशाभूल करीत आहे. प्रत्यक्षात वीजबिल व मीटरमधील रीडिंग यात प्रचंड तफावत असल्याने अधिक रिडिंग नोंदवून एकाच वेळी हजारो रुपयांची बिले पाठविली जातात. ती भरली नाही तर वीज कनेक्शन तोडले जाते. महावितरण वीज ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचे गिरणारे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कोटींचा हिशेब द्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

घनकचरा, सांडपाण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेल्या दोन वर्षांच्या शंभर कोटीचा हिशेब सरकारला त्वरित द्या, अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ, अशा कडक शब्दात राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला झापले. गोदावरीत कचरा टाकणाऱ्या घंटागाडी ठेकेदारावर गुन्हा दाखल न केल्यास मी आयुक्तांवर गुन्हा दाखल करेन, असा सज्जड दमही त्यांनी भरला.

गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने काय उपाययोजना केल्या याची माहिती घेण्यासाठी येथील विभागीय महसूल कार्यालयात कदम यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच रामकुंडावर फिल्टरेशन प्लॅन्ट बसवा, गोदावरी बारमाही वाहण्यासाठी नदीच्या वरच्या भागात बंधारा बांधा, मलजल शुध्दीकरण केंद्राचे आधुनिकीकरण करा, प्लॅस्टिक पिशव्या कारखानदारांवर कारवाई करा, अशा महत्त्वाच्या सूचनाही कदम यांनी केल्या.

रामकुंडावर प्लॅन्ट
रामदास कदम म्हणाले, की देशभरातून येणाऱ्या भाविकांना रामकुंडातील दूषित पाण्यात स्नान करावे लागते. ते टाळण्यासाठी रामकुंडावर पावसाळ्यानंतर फिल्टरेशन प्लॅन्ट कार्यरत करा. गोदावरी बारमही प्रवाही करण्यासाठी नदीतील नैसर्गिक झरे मोकळे करा. नदीच्या वरच्या भागात बंधारे बांधा. पावसाळ्यात पाणी साचल्यावर ते नदीत सोडा. बंधाऱ्यांसाठी संबंधित खात्यांबरोबर बैठक घ्या. गोदावरीत सांडपाणी येऊ नये म्हणून त्याचे स्त्रोत बंद करा, चांगल्या दर्जाचे पाइप टाका, चेंबर्स बांधा. घनकचरा व्यवस्थापन आणि नदी प्रदूषणाबाबत कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन करा.

आयुक्तही फैलावर
राजसारथी प्रतिष्ठानचे राहुल देशपांडे तसेच राजेश पंडित यांनी गोदावरीत घंटागाडी कचरा टाकत असल्याचे पुरावे देताच मंत्री कदम संतापले. घंटागाडीचा ठेका रद्द करा, केवळ दंड नको, तर ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अन्यथा मी आयुक्तांवर गुन्हा दाखल करेन, असा इशारा दिला. प्रदूषणाला कारणीभूत प्लॅस्टिक पिशव्या विक्रेत्यांवर नव्हे तर पिशव्या उत्पादकांवरच कारवाई करा. त्यांचे मशिन जप्त करा, असे आदेशही त्यांनी दिले.

... मगच हात पसरा!

महापालिकेचे अभियंता वंजारी यांनी सांगितले, की शहराला ४२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यातून २८५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. पैकी २७५ एसपीटी प्लॅन्टमध्ये शुध्दीकरणासाठी येते. उर्वरित पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेला सरकारच्या अमृत योजनेतून ६५ कोटींची गरज आहे. यावर मंत्री कदम भडकले. ते म्हणाले, की सांडपाणी शुध्दीकरणासाठी महापालिकेच्या विकासनिधीच्या २५ टक्के रक्कम खर्ची करण्याचा कायदा आहे. आधी स्वतःचे पैसे खर्च करावे, मग सरकारकडे हात पसरा. महापालिकेने कार्यक्षमतेने गोदा स्वच्छता मोहिम राबवली तर स्वयंसेवी संघटनांची मदत घेण्याचीही गरज भासणार नाही.

नाही तर मीच स्टे देईन!
गोदा उगम पावते त्या त्र्यंबकेश्वरचे डोंगर फोडून नदीत भराव घातला जात आहे. तेथील अडीचशे एकर जमीन यलो करण्याचा घाट घातला जात असल्याचे पत्रकारांनी कदम यांच्या निर्दर्शनास आणताच ते म्हणाले, की जिल्हाधिकाऱ्यांना मी स्टे देण्यास सांगतो. त्यांनी नाही दिला तर मी स्टे देईन. ते म्हणाले की, गोदावरी प्रदूषणाचा आढावा मी दर सहा महिन्यांनी घेत आहे. प्रदूषणमुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी व नद्यांचे प्रदूषण थांबण्यासाठी मी सर्व महापालिकांना भेटी देत आहेत. विकासनिधीच्या २५ टक्के रक्कम प्रदूषण नियंत्रणावर खर्ची करण्यासाठी पालिकांचे ठराव घेण्यात येत आहेत. मुंबईसारखी यंत्रणा राबवली तर नाशिकमध्येही पाणी साचणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणारी टोळी अखेर जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पिंपळगाव बसवंतसह परिसरातील दुकाने, घरे यामध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करणे पोलिसांना शक्य झाले आहे. टोळीतील चोरट्यांनी तब्बल सात ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ‘मटा’ने परखड भूमिका घेतली होती.

अंकुश संदीप खैरनार, कल्पेश अंबादास देवरे, राजेंद्र भास्कर मोरे, महेश ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शाहरुख सलिम खाटीक अशी घरफोडी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. सर्व संशयित उंबरखेड रोडवरील झोपडपट्टीत राहतात. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाला ताब्यात घेतला आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते. पोलिसांनी तीन दिवसात आठ चोरट्यांना पकडून मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी चार मोटरसायकल चोरी केली होती. यातील तीन गाड्या जप्त करण्यात आल्या. चोरीसाठी वापरलेली पिकअप, मोबाइल, होमथिएटर असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला.

पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडे, निरीक्षक वासुदेव देसले, बिपीन शेवाळे, उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्यासह कॉन्स्टेबल मनोज बोराळे, तुषार झाल्टे, र‌वींद्र चिणे, दुर्गेश बैरागी, र‌वींद्र बाराहाते, शांताराम निंबेकर, ऋषिकेश देवरे, निवृत्ती गिते, नंदू जाधव, चिंधू खांदे आदींनी चोरट्यांना जेरबंद केले. पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनसाखळ्या ओरबाडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात बुधवारी एका पाठोपाठ घडलेल्या दोन घटनांमध्ये महिलांचे सुमारे ८० हजार रुपयांचे दागिने दुचाकीवरील चेन स्नॅचर्सने ओरबाडून नेले. या प्रकरणी मुंबई नाका आणि इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनंदा लक्ष्मण आहिरे (६२, रा. नवकार हॉस्पिटलजवळ, शिवरामनगर) या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिवरामनगर रोडने सुधाकर रो हाऊस समोरून पायी जात असताना ही घटना घडली. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आणि निळ्या रंगाचा शर्ट व काळी पॅण्ट परिधान केलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सुमारे २८ हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक वराळ करीत आहेत. चेन स्नॅचिंगची दुसरी घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात घडली. माया राजेंद्र नेरपगार (४९, रा. दत्तात्रेय बंगला, जीवनस्वप्न सोसा.) या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असतांना स्नॅचिंगचा प्रकार घडला. भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ६२ हजार रुपयांची सोन्याची पोत व सोनसाखळी खेचून पोबारा केला.

नामको बँकेत २० हजारांची चोरी

कॅशिअर जागेवर नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कॅश काऊंटरच्या काचेतून हात घालत कांउटरमधील २० हजार रुपयांची रोकड चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक मर्चंट बँकेच्या शालिमार शाखेत घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरस्वती सुरेश सूर्यवंशी (रा. गणेशवाडी, पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सूर्यवंशी नामको बँकेत कॅशिअर पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी (दि. १८) दुपारी एक वाजेच्या सुमारास त्या सेवा बजावत असतांना कॅशिअर कॅबिनमधील कॅश काउंटर लॉक करून अल्पावधीसाठी कॅबीनबाहेर पडल्या असताना चोरीचा प्रकार घडला. रांगेत उभ्या असलेल्या दोघा भामट्यांनी कॅश काउंटलमध्ये कोणी नसल्याची संधी साधत काचेतून हात घातला. तसेच, गल्यातील २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीसाठी संस्थाही सरसावल्या पुढे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हेल्पलाइन उपक्रमाला व्यक्तिगत प्रतिसाद तर मिळतो आहेच, परंतु आता या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी संस्थाही सरसावल्या आहेत. अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थांसोबतच जॉगर्स क्लब, ज्येष्ठ नागरिक संघटना यादेखील मागे राहिल्या नसून, त्यांचेही चेक येत आहेत.

नांदूर नाक्यावरील श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ‘मटा हेल्पलाइन’च्या दहाही मुलांना मदत करण्यात आली असून, कळवण येथील एका पतसंस्थेतर्फे भरघोस मदत करण्यात आली आहे. जिल्हाभरातून मदतीचे धनादेश येत आहेत. शहरातील जॉगर्स पार्कवर गप्पा रंगवणारे वृद्ध आपल्या थरथरत्या हातांनी चेक लिहितात आणि मदत करतात. सोबत आशीर्वादाचे चार शब्दही लिहितात. तेव्हा या मुलांच्या श्रीमंतपणाची जाणीव होते. ‘मटा हेल्पलाइन’ची मुले आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत; परंतु त्यांच्या डोक्यावर सरस्वतीमातेने वरदहस्त ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. त्यांची स्वप्नेही फार मोठी आहेत. कुणाला देशसेवा करायचीय, तर कुणाला सीए व्हायचेय. ग्रेड वनचे अधिकारी बनून कुणाला आईवडिलांना खूप सुखात ठेवायचे आहे. या त्यांच्या कथा वाचून धनादेश येत आहेत. संस्था मदतीला सरसावल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे स्वप्न नक्की साकार होणार, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळिंब आले हो…

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले लासलगाव बाजारपेठ आता डाळिंबाची बाजारपेठ म्हणून उद्यास येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून येथून येथे डाळिंब लिलाव सुरू झाले आहेत. येथून दररोज दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारसह इतर राज्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब निर्यात केले जात आहे. लासलगावसह निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यात डाळिंबाची लागवड झाली आहे.


तीन वर्षांचा आढावा

जुलै २०१५

आवक-४ हजार ७०० क्रेट

भाव – जास्ती जास्त १२५००, सरासरी ५ हजार प्रती क्रेट

जुलै २०१६

आवक-२ हजार ९० क्रेट

भाव – जास्ती जास्त १२५०५, सरासरी ६,१४२ प्रती क्रेट

जुलै २०१७

आवक-५० हजार क्रेट

भाव – जास्ती जास्त ७ हजार, सरासरी ४५०० प्रती क्रेट

शेतकऱ्यांनी क्रेटमध्ये एकसारखा माल प्रतवारी करून आणावा. रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी साडे नऊ ते दुपारी एकपर्यंत अथवा आवक संपेपर्यंत लिलाव सुरू राहील.

- जयदत्त होळकर,
सभापती, लासलगाव बाजार समिती


१३ जुलैनंतर ड‌ाळिंबाची आवक वाढली; दरात ४५० रुपयांनी वाढ

दररोज ३ ते ४ हजार क्रेटची आवक

जास्तीत जास्त दीड हजार, सरासरी १०५० रुपये २० किलोच्या क्रेटला भाव

यंदा १० एप्रिलपासून आतापर्यंत ५० हजार क्रेट डाळिंबाची आवक

तीन वर्षांतील आवक (क्रेटमध्ये)

सन २०१५ मध्ये ९५ हजार

सन २०१६ मध्ये १ लाख ६५

यावर्षी ५ ते ६ लाख क्रेटची आवक होण्याची शक्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्रमानांकितांच्या आक्रमक चाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेषा असोसिएशनतर्फे नाशिक येथील स्वामीनारायण मंदिराच्या बँक्युट हॉलमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन स्पर्धेत गुरुवारी चौथ्या फेरीअखेर अग्रमानांक‌ित खेळाडूंनी पटावर आक्रमक चाली रचत आपली आघाडी टिकवून ठेवली आहे.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम फेरीत अग्रमानांकितांच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यात पहिल्या पटावर खेळताना स्पर्धेतील सर्वोच्च मानांक‌ित तामिळनाडूचा सर्वाना कृष्णन पी. याच्याविरुद्ध खेळतांना मुंबईच्या अग्रमानांकित प्रणव शेट्टीला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या पटावर मात्र महाराष्ट्राच्या निख‌िल दीक्षितने आंतरराष्ट्रीय मास्टर राजेश व्ही. ए. व्ही. याच्याविरुद्ध खेळताना सावध चालीचा पवित्रा घेत डाव बरोबरीत साधत धक्कादायक निकालाची नोंद केली. तिसऱ्या पटावर तामिळनाडूचे मुथैय ए. आय. व सेन्थली मारन के. यांनी आपल्या पटावर बरोबरी साधत स्पर्धेत आगेकूच केली. सम्मेद शेटे, पवन दोडेजा, आंतरराष्ट्रीय मास्टर चक्रवर्ती रेड्डी यांनी आपली विजयी मोहीम यशस्वी करत स्पर्धेत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आघाडी घेतली आहे.

जागतिक बुद्धिबळ दिन असल्याने गुरुवारी स्पर्धेसाठी भारतभरातून आलेल्या खेळाडू आणि पालकांसाठी रेषा असोसिएशनने आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी आनंद वैशंपायन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नाशिककधील पहिल्या महिला पंच महाशब्दे, जीवन गौरव पुरस्कारप्राप्त डॉ. महाशब्दे, अॅड. कडवे, प्रख्यात खेळाडू व प्रशिक्षक भूषण ठाकूर, स्पर्धेतील दिव्यांग खेळाडू सौंदर्यकुमार प्रधान यांच्यासह फिडे मास्टर सौरव खर्डेकर, कोल्हापूरचे पंच सूर्याजी भोसले, संधेश नगरनाईक, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, रेषा आसोसिएशनच्या संचाल‌िका अर्चना कुलकर्णी आदी उपस्थित होते. नाट्यलेखक शिरीष हिंगणे यांनी जागतिक बुद्धिबळ दिनाचे महत्व सांगितले. नाशिकचा बालखेळाडू इंद्रजीत जोशी याचा वाढदिवस साजरा करुन कार्यक्रमाची सांगता झाली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून पुण्याचे नितीन शेणवी व सहपंच म्हणून नंदुरबारचे शोभराज खोंडे काम पाहत आहेत.

नाशिकच्या खेळाडूंची चमक

नाशिकचा नवोदित खेळाडू आर्य बहाळकर याने मानांक‌ित खेळाडू वरद देव याला पराभूत करत जागतिक क्रमवारीसाठीची आपली गुणवत्ता सिद्ध केली. नाशिकच्या वेदांत पिंपळखरे, कार्तिक सिंग, गणेश ताजणे, हर्षल पाटील, हर्षल वालदे, शंतनू भांबुरे, ऋषिकेश शिंपी, सिया कुलकर्णी, प्रच‌िती चंद्रात्रे आदी खेळाडू आपली चमक दाखव‌ित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर बंदोबस्तात ५० टँकर इंधन रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भारत पेट्रोलियम कंपनी प्रशासन आणि मालवाहतूकदार यांच्यात वाहतूक दराबाबत कोणतीही तडजोड न झाल्याने पानेवाडी येथे मालवाहतूकदारांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पानेवाडीत शेकडो टँकर अद्याप उभे असून, संभाव्य पेट्रोलटंचाई लक्षात घेऊन अखेर पोलिस बंदोबस्तात ५० टँकर इंधन गुरुवारी रवाना करण्यात आले. यामुळे इंधनटंचाईचे सावट तूर्तास टळले असले तरी सलग तीन दिवसांपासून संप सुरू असल्याने गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनीही संपकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, कंपनी प्रशासनाकडून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका मालवाहतूकदारांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रेत्यांना फूटपाथ आंदण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील निमाणी बसस्थानक ते दिंडोरी नाका या पादचारी मार्गावर अनेक विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. महापालिका व शहर वाहतूक शाखा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने विक्रेते फूटपाथवर अन् पादचारी रस्त्यावर, अशी स्थिती येथे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, यासंदर्भात तातडीने

उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

दरम्यान, फूटपाथवर केलेले अतिक्रमण, या मार्गाचा केला जाणारा दुरुपयोग याबाबत शरणपूररोड व कॉलेजरोडवरील व्यावसायिकांना शहर वाहतूक शाखेने नोटिसा काढल्या आहेत. त्याप्रमाणेच पंचवटी परिसरातील संबंधित व्यावसायिकांनाही नोटिसा काढाव्यात आणि हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दिंडोरी नाका ते निमाणी बसस्थानक या मार्गावर फूटपाथ हा कधीच मोकळा नसतो. जणू हा मार्ग फळे आणि इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठीच आहे की काय, अशा थाटात येथे दुकाने थाटलेली असल्याचे दिसून येते. अाख्खा फूटपाथच या दुकानदारांनी व्यापल्यामुळे पादचाऱ्यांवर थेट मुख्य रस्त्यावरून ये-जा करण्याची वेळ येत आहे. फूटपाथवर निर्माण होणारा हा अडथळा येथील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरताना दिसतो. कायमच प्रचंड वर्दळ असणाऱ्या या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, बसस्थानकावर जाणारे, तसेच स्थानकामधून बाहेर पडणारे प्रवासी थेट मुख्य रस्त्यावरूनच जाताना दिसतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडण्यासह अपघाताची शक्यता वाढल्याचे चित्रदेखील दिसून येत आहे.

निमाणी बसस्थानकावर येणाऱ्या बसेसमुळे येथे वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. त्यात येथे बेशिस्तपणे थांबणाऱ्या रिक्षांची भर पडते. अशा वाहनांच्या गर्दीतून वाट काढणे प्रवाशांना आणि शाळकरी मुलांना कठीण होत अाहे. बऱ्याचदा नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या जागेवरच वाहने थांबलेली असतात. येथील व्यावसायिकांसाठी अन्य ठिकाणी दुकाने मांडण्याची व्यवस्था करून हा फूटपाथ मोकळा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--


वरदहस्त असल्याचा आरोप

येथील फूटपाथवर फळविक्रेत्यांनी दुकाने मांडल्याची तक्रार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे केली असता या विभागाच्या अधिकाऱ्यांनीच त्या फळविक्रेत्यांना जाऊन सांगितले, की नगरसेवक पवार यांनी तुमच्याविरोधात तक्रार केली आहे, असा किस्सा नगरसेवक अरुण पवार यांनी पंचवटी प्रभाग समिती सभेत सांगितला. त्यामुळे फूटपाथवरील दुकाने कुणाच्या तरी वरदहस्तावरच सुरू आहेत, असा आरोपही परिसतून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभागाच्या गैरकारभाराचे वाभाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांची दुरावस्था आणि या शाळांमधील शिक्षक आणि काही मुख्याध्यापकांकडे असलेल्या बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांवरून विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची कोंडी केली. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत, सदस्यांनी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या गैरकारभाराचा पाढाच वाचला. शिक्षण विभागाच्या कारभारावर सभागृहनेते दिनकर पाटील आणि शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी टीकास्र सोडत गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केली. नगरसेवकांनी शाळांची दयनीय स्थिती चव्हाट्यावर आणल्यानंतर महापौरांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सर्व शाळांची तपासणी करून सद्यःस्थिती अहवाल पुढच्या महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोगस प्रमाणपत्रांच्या तक्रारी असलेल्या ४९ शिक्षक, मुख्याध्यापकांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गुरुवारच्या महासभेत महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेवर आणि शिक्षण विभागाच्या गैरकारभारावर वादळी चर्चा झाली. केंद्रप्रमुख जयश्री पंगुडवाले यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून सुरू झालेल्या प्रश्नोत्तराने विषयांतर होऊन थेट पालिका शाळांची दुरावस्थाच सदस्यांनी चव्हाट्यावर आणली. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी हे २० लाख नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. त्यांचा कारभार यापूर्वी वादग्रस्त राह‌िला असताना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे. आरटीईनुसार प्रवेश नाहीत, तरीही खोट्या बातम्या ते देत असतात. त्यामुळे शिक्षण विभागात चुकीचे काम सुरू असल्याचा आरोप करत, भाजपच्या कारभाराची खिल्ली उडवली. सुधाकर बडगुजर यांनी पंगुडवाले यांच्याबाबत सभागृहाची कशी दिशाभूल केली जात आहे, याचे पुरावेच सभागृहात मांडले. त्यामुळे सत्ताधारी बॅकफूटवर गेले. शांता हिरे, शिवाजी गांगुर्डे, चंद्रकात खाडे, हेमलता पाटील, शशिकांत जाधव, किरण गामणे यांनी शाळांची स्थिती आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिनकर पाटील यांनी उपासनी यांच्या चौकशीची मागणी केली.


विद्यार्थी वाढल्याचा दावा

उपासनी यानी १२७ शाळांमध्ये ३४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थी वाढल्याचा दावा केला. तसेच ५४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे सांग‌ितले. महापौर रंजना भानसी यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली. पालिकेतील सर्व शाळांची तपासणी तत्काळ करून त्यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश दिले. किती शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, कुठे शाळांना इमारती नाहीत त्याची सविस्तर माह‌िती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. ज्या ४९ शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात तक्रारी आहेत. त्यांचीही सत्यता पडताळून त्याबाबत सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

बडगुजरांनी पाडले उघडे

जयश्री पंगुडवाले यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या विषयावरूनही भाजपचीच कोंडी झाली. त्यांची पदवी बोगस असल्याचा आरोप करणाऱ्या भाजप सदस्यांना सुधाकर बडगजुर यांनीच उघडे पाडले. पंगुडवाले यांची बदली आणि त्यांच्यावरील आरोपामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे विद्यापीठाने त्यांनी बीएडची डीग्री ही बीएची पदवी तपासूनच दिली असेल, असे सांगत त्यांना २०१० मध्येच मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाशी २०१४ च्या डीग्रीचा काय संबंध, असा सवाल केला. शिक्षण क्षेत्रात राजकीय हेतूने कारवाई होऊ नये, असा टोला हाणत त्यांना निवड श्रेणी ही उपासनी यांनीच दिली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पलटी खाल्ली, तर आरोप करणाऱ्यांची बोलतीच बंद झाली.


नितीन उपासनी हे यापूर्वीही वादग्रस्त राह‌िले आहेत. जिल्हा परिशदेचे शिक्षक त्यांनी महापालिकेत वर्ग करून घेतले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

- दिनकर पाटील, सभागृहनेते

केंब्रिज शाळेतील प्रवेश प्रकरणात संस्थाचालकावर गुन्हा दाखल होण्याऐवजी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाला. संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई शिक्षण विभागाकडून अपेक्षित होती. परंतु ती झाली नाही.

- शाम बडोदे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे स्टेशनवर अवतरणार ज्ञानाचा खजिना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विद्यार्थ्यांसह मोठ्यांनाही बहुविध ज्ञानाचा खजिना याचि देही याचि डोळा अनुभवण्याची संधी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दि. २४ ते २६ जुलैदरम्यान मिळणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे वैशिष्ट्यपूर्ण सायन्स एक्स्प्रेस येत्या सोमवारी येथे येणार असून, त्यानिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने जय्यत तयारी केली आहे. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत फ्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सकाळी दहा ते सायंकाळी सहादरम्यान मोफत पाहता येईल. त्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटातूनही सूट देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना देशातील महत्त्वाची निसर्गसंपदा, पर्यटनस्थळे माहिती व्हावीत, पर्यावरण जागृती व्हावी, विज्ञानातील करामती, ग्रह-ताऱ्यांची माहिती मिळावी म्हणून भारतीय रेल्वेने १७ फेब्रुवारी ते ८ सप्टेंबरदरम्यान सायन्स एक्स्प्रेस सुरू केली आहे. ती नाशिकसह ६८ स्थानकांत थांबणार आहे.

कोचनिहाय ज्ञानवर्धनाची पर्वणी

सायन्स एक्स्प्रेस म्हणजे तेरा डब्यांची आधुनिक एसी रेल्वेगाडी आहे. त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन आहे. माहिती देण्यासाठी तज्ज्ञ असून, मानवामुळेच जलवायू परिवर्तन होऊन पृथ्वी संकटात कशी सापडली आहे याची माहिती पहिल्या कोचमध्ये देण्यात येते. दुसऱ्या कोचमध्ये भारताने जलवायू बदलाबाबत का चिंता करावी, जलवायू बदलामुळे मानवाचे आरोग्य कसे धोक्यात आले आहे व जागतिक तापमानवाढ कशी होते, याची माहिती आहे. प्रदूषण टाळण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात काय पर्याय उपलब्ध आहेत हे तिसऱ्या आणि चौथ्या कोचमध्ये सांगितले जाते. माणसाची जीवनशैली तातडीने बदलली आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा व स्रोतांचा वापर केला, तरच पृथ्वीचा विनाश टळणार आहे. ते कसे करता येईल, याचे ज्ञान पाचव्या कोचमध्ये मिळते. जलवायू परिवर्तन थांबविण्यासाठी भारताने धोरणे, वित्त, तंत्रज्ञान, प्रशिक्षण याद्वारे अनेक उपाय सुरू आहेत. त्यांची माहिती सहाव्या कोचमध्ये देण्यात येईल.

जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, करार करण्यात आले आहेत. याबाबत कोच सातमध्ये माहिती मिळते. पर्यावरण वाचविण्यासाठी कोणत्या शंभरावर कल्पना आहेत याची माहिती आठव्या कोचमध्ये मिळते. प्रवाळ, कासव, वाघ, साप आदी पर्यावरणरक्षणात कशी भूमिका बजावतात याची माहिती कोच नऊमध्ये मिळते. नागरिकांमध्ये पशू-पक्षी, झाडे याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उपाय येथे सांगितले आहेत. कृषी, औषध, लसीकरणबाबत झालेले नवीन संशोधन, आघाडीच्या संशोधन संस्था यांची माहिती कोच दहामध्ये मिळते. अकरा नंबर कोच हा सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विकसित केला आहे. प्रदर्शन पाहणाऱ्यांनी प्रेरणा घेऊन समस्या कशा ओळखाव्यात आणि स्वतःच तंत्रज्ञान तयार करून समस्या कशा सोडवाव्यात, याची माहिती कोच नंबर अकरात मिळते. या कोचमध्ये एनर्जी इफिशिएंट स्टोव्ह, नैसर्गिक डायपासून केलेली खेळणी, हातपंप, मल्टी ट्री क्लायम्बर, शुगरकेन बड चिपर आदी प्रयोग केलेले आहेत.

--

मुलांसाठी स्पेशल

लहान मुलांसाठी कोच नंबर बारा आहे. येथे दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना विज्ञानाच्या जादू, तसेच वैज्ञानिक प्रयोग शिकविले जातील. वैज्ञानिक खेळ, कोडी सोडवून घेतली जातील. मुलांमध्ये गणित व विज्ञानविषयक दृष्टिकोन वाढीस लागावा हा या मागील उद्देश आहे. तेरा नंबर कोचमध्ये इयत्ता सहावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करता येतील. या कोचमध्ये गणित, विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, जलवायू परिवर्तन, जैव तंत्रज्ञान आदींचे मॉडेल असून, मुलांना त्यांची जिज्ञासा शमवता येणार आहे. या कोचमध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण मिळणार आहे. याशिवाय प्लॅटफॉर्मवरही वैज्ञानिक खेळ, प्रश्नोत्तरे आदी स्पर्धा होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ घरच्या घरी ‘चॉकलेट मेकिंग’ची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. २३) दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराजवळ, पंचवटी येथे हे वर्कशॉप होणार आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर्स आणि बंपर प्राइज जिंकण्याची संधीही सहभागी झालेल्यांना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांच्या आवडीचा विषय असतो, तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट ठरतो. त्यासाठी सर्वांनाच आवडणारे चॉकलेट्स तुम्हाला घरी बनवता आलेत तर? सर्वांची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी होणाऱ्या या वर्कशॉपमध्ये सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे तसेच, चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राउनिज आदी बनवून दाखविणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत असून, या वर्कशॉपसाठी नावनाेंदणी आवश्यक अाहे. त्यासाठी ७०४०७६२२५४ किंवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

सेल्फी विथ पॅरेंट स्पर्धेचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे सेल्फी विथ पॅरेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वाचकांनी पालकांसोबतचा सेल्फी events.mata@gmail.com या ई-मेलवर शनिवार (दि. २२)पर्यंत पाठवायचा आहे.

भाग्यवान ५० विजेत्यांना हेल्थ चेकअप व्हाउचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइज जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

पालकांसोबतचा सेल्फी वरील ई-मेलवर मेल करा आणि चॉकलेट कसे बनवायचे हे शिकण्यासाठी आजच चॉकलेट मेकिंग वर्कशॉपसाठी नावनोंदणी करा, सोबत व्हाउचर्स आणि बंपर प्राइजेस जिंकण्याची संधीही मिळवा. अधिक माहितीसाठी ०२५३-२६६३७९८७ किंवा ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकाचौकात कचराकोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील कचरा संकलनाचे घंटागाडी ठेकेदारांकडून योग्य नियोजन होत नसल्याने शहरात सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने निर्माण होणाऱ्या कचराकोंडीने चौकाचौकांना ओंगळवाणे स्वरूप आल्याची स्थिती असून, दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील विविध चौकांत सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात कचरा संकलनाची घंटागाडीची वेळ दुपारनंतरची आहे, अशा भागात विशेषतः कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जीपीएस प्रणालीचा वापर होत असल्याने आता घंटागाडी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या मार्गावरील सर्व कचरा संकलित करावा लागत आहे. परिणामी कचरा संकलनासाठी उशीर होताना दिसत आहे. काही प्रभागांत तर दुपारनंतरच कचऱ्याचे संकलन केले जाते. त्यामुळे अशा प्रभागांत दिवसभर कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे.

--

वर्दळीच्या भागात ढीग

शहरातील बहुतांश चौकांत आजूबाजूच्या व्यावसायिकांसह नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. परिणामी असे चौक आता चौक न राहता त्यांना कचराकुंडीचे स्वरूप येऊ लागले आहे. शहरासह नाशिकरोड भागातील विशाल मॉल, वॉस्को चौक, जयराम हॉस्पिटल चौक, राजेंद्र कॉलनी अादी वर्दळीच्या परिसरातील चौकांत दररोज कचऱ्याचे ढीग साचलेले आढळून येत आहेत. या भागात घंटागाडी येण्याची वेळ उशिराची असल्याने होणारी कचराकोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

--

कारवाईशून्य कारभार

सार्वजनिक जागेवर व उघड्यावर कचरा टाकणे कायदेशीर कारवाईस पात्र असतानाही महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

--

स्थानिक रहिवासी बेजार

सध्या रिमझिम पाऊस पडत असल्याने ज्या चौकांत कचरा साचलेला आहे अशा ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्यात पावसाचे पाणी साचत असल्याने कचरा कुजण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच काही ठिकाणी भटकी जनावरेही कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त करीत असल्याने काही ठिकाणचा कचरा आजूबाजूला पसरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी बेजार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदोष मीटरची बिले भरू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नियमितपेक्षा वेगात फिरणाऱ्या सदोष मीटर्सच्या आधारे येणाऱ्या ब‌िलांच्या माध्यमातून ग्राहकांकडून लाखो रुपयांची वसुली केली जाते. अशा ग्राहकांनी वीज‌बिले भरू नयेत, असा खुलासा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केला आहे.

शहरात वीज कंपनीकडून वेगात चालणारी सदोष मीटर्स परस्पर बसवून अवास्तव वीज बिलाची आकारणी केली जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दरमहा येणाऱ्या नियमित वीज बिलापेक्षा दुप्पट, तिप्पट जादा वीज बील, वीज मीटर्सचे फोटो न काढता अवास्तव बील देणे हे ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ व वीज कायदा २००३ नुसार बेकायदेशीर असून, वीज कंपनी अनुचित व्यापारी प्रथेने अशा प्रकारची वीज बिले देत आहे. ग्राहकांना मीटरचे फोटो काढून दरमहा वीज बिल देणे व २१ दिवस अगोदर बील देणे वीज कायदा, २००३ नुसार बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांना स्वतः नवीन मीटर विकत आणून बसविण्याचा अधिकार आहे. ग्राहकाने स्वतःचे मीटर बसविण्यास असमर्थ असल्याचे वीज कंपनीला लेखी कळविले तरच वीज कंपनी आपले मीटर बसवू शकते. वीज कंपनीने मीटर बसवल्यास मीटर योग्य चालू असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. ‘आधी वीजब‌िल भरा मगच तक्रार करा’ या पध्दतीने वीज कंपनी सक्ती करते ते बेकायदेशीर आहे. वीज कायदा २००३च्या कलम ५६ नुसार अंदाजे, सरासरी, अवास्तव वीज बिलापोटी हक्क राखून मागील महिन्याच्या ब‌िलाएवढी बील रक्कम चेकद्वारे कंपनीत भरता येते व वादग्रस्त ब‌िलाची तक्रार निकाली निघेपर्यंत कंपनीस ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसांची लेखी नोटीस दिल्याशिवाय वीज पुरवठा बंद करता येत नाही. जादा ब‌िलाच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण केंद्रात तक्रार करावी, मात्र अवास्तव बिल भरू नये असे आवाहन नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या कातड्यासह नाशिकच्या एकास अटक

$
0
0

टीम मटा नाशिक/ठाणे

बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या नाशिकच्या एका व्यक्तीस गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले असून, ५० हजार रुपये किमतीच्या या कातड्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४० लाख रुपये किंमत असल्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पेठ तालुक्यातील करंजाळी येथील रामचंद्र एकनाथ भुसारे (वय ५९) असे या आरोपीचे नाव आहे. या बिबट्याची शिकार नाशिकमध्ये करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पेठच्या मुली नाशिकला

नाशिक : पेठ येथील अनाथ बालगृहात एका बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन जागे झाले आहे. महिला व बालकल्याण उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी या बालगृहाला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या ५८ मुलींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे, तर या गुन्ह्यातील आरोपी तथा बालगृह संचालिका सुशीला अलबाड आणि त्यांचा मुलगा अतुल अलबाड यांना त्र्यंबकेश्वरच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीबाबत आणि त्यांना आढळलेल्या बाबींबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

बंधारा फुटल्याने पिकांचे नुकसान

कळवण ः मुळाणे वणी (ता. कळवण) येथील वनबंधारा फुटल्याने पिकांचे नुकसान झाले, तर पश्चिम पट्ट्यात बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बिलवाडी येथील नदीला पूर आला. या पुरात पाच जनावरे वाहून गेल्याने १ लाख ६८ हजारांचे नुकसान झाले आहे. मोकभणगी येथील काही घरांची पडझड झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळवणमध्ये ३३ मिलिमीटर, तर तालुक्यात एकूण सरासरी २२२.४७ मिमी पावसाची बुधवारी नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images