Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

समृद्धी बाधितांबाबत लवकरच तोडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाला दिशा देणारा प्रकल्प आहे. राज्यातील शेतकरी या महामार्गासाठी जमिनी देण्यासाठी वाजत-गाजत आमच्याकडे येऊ लागले आहेत. यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी मी तसेच मुख्यमंत्री स्वत: चर्चा करण्यास तयार आहेत. त्यांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी नाशिकमध्ये दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी महाजन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिन‌धििंशी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील पाच ते सहा गावांमधून समृद्धी महामार्गाला विरोध होत आहे. मात्र राज्यात अन्य ठिकाणी शेतकऱ्यांकडून या महामार्गाच्या भूसंपादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महामार्गासाठी बागायती जम‌निी जिरायती दाखवून त्यांचे भूसंपादन करण्याचा घाट जात असल्याच्या आरोपाचे महाजन यांनी खंडण केले. जमिनींची मोजणीच होऊ दिली नाही तर पाण्याखालच्या जमिनी कोणत्या हे कसे समजणार, असा सवाल महाजन यांनी उपस्थ‌ति केला. महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला वेळेत दिला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या महामार्गावर कुणीही राजकारण करू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


…आता तसे होणार नाही

पूर्वी घोटी-शिर्डी रस्त्यासाठी संपदित केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होण्याची वेळ आल्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. परंतु या विषयाची माहिती घ्यावी लागेल असे सांगत या महामार्गाच्या बाबतीत असे होणार नाही. शेतकऱ्यांना लगेचच मोबदला मिळेल असे आश्वासन महाजन यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफी विकासाच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ९०० कोटी ५२ लाखांचा संभाव्य आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडून सादर करण्यात आला; मात्र तो फसवा ठरणार आहे. आराखडा बनविताना जिल्हा नियोजन समितीने हात सैल सोडला असला तरी शेतकरी कर्जमाफी धोरणामुळे निधीत ३० टक्के कपात अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला गेल्या वर्षीपेक्षा अधिक निधी मिळण्याची अपेक्षा फोल ठरण्याचे संकेत आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत २०१६-१७ मध्ये विविध योजनांतर्गत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सदस्या सुधा कोठारी, जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलिस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्यानुसार सरकारकडून जो निधी वर्ग होतो त्याचे नियोजन या बैठकीत केले जाते. जिल्हा नियोजन समितीकडून सर्वसाधारण योजनांसाठी ३२१ कोटी ३८ लाख रुपये, आदिवासी उपयोजनांसाठी ४८१ कोटी ५९ लाख रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनांवर ९७ कोटी ५५ लाख रुपये खर्च असे एकूण ९०० कोटी ५२ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वसाधारण योजनेसाठी २७ कोटी २५ लाख रुपयांचे वाढीव नियतव्यय मंजूर झाले, ही यंदाच्या आराखड्यातील समाधानकारक बाब आहे.

२०१६-१७ मध्ये हा आराखडा ८६९ कोटी ८० लाखांचा होता. सरासरी ९७.७७ टक्के निधी खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी यांनी बैठकीत दिली. यंदा मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सरकारच्या धोरणानुसार निधी वितरणाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सर्वसाधारण योजनांसाठी ७० कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी ९६ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी २० कोटींच्या निधीला कात्री लागू शकते. त्यामुळे ९०० कोटींच्या आराखड्यापैकी १८९ कोटींचा निधी कापला जाण्याची शक्यता आहे.

संभाव्य विकास आराखडा

सर्वसाधारण योजना : ३२१ कोटी ३८ लाख, आदिवासी उपयोजना : ४८१ कोटी ५९ लाख, अनुसूचित जाती उपयोजना : ९७ कोटी ५५ लाख, एकूण : ९०० कोटी ५२ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची दुसरी यादी आज

$
0
0

सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीतील आपला प्रवेश निश्चित केलेला नाही, असे विद्यार्थी आता ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीतही आपले प्रवेश निश्चित केलेले नाहीत त्यांची प्रवेशप्रक्रिया शासनाच्या निर्णयानंतरच होईल, अशी माहिती इयता अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी बुधवारी दिली. अशा विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १६०० इतकी असून, अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी, २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे.

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्र‌ियेची पहिली फेरी नुकतीच पार पडली. त्या पार्श्वभुमीवर या फेरीतील प्रवेश झालेल्या आकडेवारीचा आढावा बैठक बुधवारी दुपारी समितीच्या सदस्यांच्या उपस्थ‌ित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात पार पडली. या बैठकीत रामचंद्र जाधव यांनी वरील माहिती दिली. याप्रसंगी सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, अशोक बागुल आदी उपस्थ्ति होते. बैठकीत पहिल्या फेरीतील प्रवेशित विद्यार्थी संख्येचा आढावा घेण्यात आला. तर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षणसंचालक यांच्याकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी गुरूवारी, २० जुलै रोजी सायंकाळी ५ वा जाहीर होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांनी २१, २२ व २४ जुलै रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचे आवाहन प्रवेश समितीने केले आहे. दि.१५ ते १८ जुलै या कालावधीत ३५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नव्याने ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार दुसऱ्या फेरीसाठी केला जाणार आहे.

विद्यार्थी अभिप्राय द्यावा

ज्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमापैकी पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले असुनही काही कारणास्तव प्रवेश घेता आला नसेल अशा विद्यार्थ्यांनी nashik.11thadmission.net या संकेतस्थळावर स्टुडंट फिडबॅक द्यावा, असे आवाहन प्रवेश समितीने केले आहे.


काही विद्यार्थ्यांच्या अजूनही शाळांत खेटा

ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या अर्जात तांत्रिक चुका पालकांच्या निदर्शनास येत असल्याने अशा विद्यार्थ्यांना अद्यापही शाळांत खेटा घालाव्या लागत आहेत. काही विद्यार्थ्यांनी अद्यापही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरलेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंचाळेत रस्त्यांवर सांडपाणी मोकाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत समावेश असतानादेखील चुंचाळे गावाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. चुंचाळे गावातील वरच्या चुंचाळे भागातील सांडपाणी थेट उघड्यावर साचत असल्याने यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनदेखील न्याय दिला जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या शाळेच्या समोरच सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. दोन प्रभागाच्या सीमारेषेवर चुंचाळे गावाचा परिसर येत असल्याने स्थानिक नगरसेवकही समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यावर त्यामध्ये आजूबाजूच्या २२ खेड्यांचा समावेश करण्यात आला होता. यात चुंचाळे गावाचाही समावेश महापालिकेत झाला होता. परंतु, महापालिकेत समावेश होऊनदेखील नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात दिल्या जात नाही. गावाच्या बाजूला झपाट्याने लोकवस्ती वाढली आहे. सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुविधा देण्यात दुजाभाव

चुंचाळे गावाचा समावेश वरचे व खालचे अशा दोन भागात झाला आहे. यात वरच्या चुंचाळे गावातील सांडपाणी उघड्यावर वाहून येत खालच्या चुंचाळे गावाच्या मोकळ्या भूखंडावर जमा होत असते. ते सांडपाणी जमा होत असलेल्या ठिकाणी बस थांबा व महापालिकेची शाळा आहे. उघड्यावर सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनदेखील समस्या सुटत नसल्याने आता उपाययोजना आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. महापालिकेत समावेश होऊनदेखील चुंचाळे गावाला सुविधा देण्यात दुजाभाव केला जात असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक वर्षांपासून चुंचाळे गाव दोन प्रभाग टाकले जात असल्याने नगरसेवकही लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, दोन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

पुणे- नाशिक महामार्गावर सिन्नरजवळील बायपासवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पुणे येथील दोन तरुण ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास झाला.

पुण्यातील आकुर्डी येथील सहा तरुण नाशिककडे इटिऑस कारने (एमएच १४/एफसी ४३६८) जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. यात चालक दत्ता शहाजी गवळी (वय २३) व रोहित किरण गंगावणे (२४, रा पुणे) ठार झाले, तर विष्णू संजू शिगवण (१९), विकास अंकुश भिशे (२३), सूरज प्रताप गुप्ता (२१), अविनाश शिवाजी पेंढारकर (१९, सर्व रा. आकुर्डी, पुणे) गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातून लांबविले ९१ हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलवरून पेन्शन खात्याची माहिती मिळवित वृद्ध निवृत्ताच्या बँक खात्यातून ९१ हजार रुपयांची रोकड परस्पर लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अशोक यशवंत देशमुख (वय ७० रा. प्रभातनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. काही भामट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. वेळोवेळी पेन्शन खात्याची माहिती घेतली. यानंतर १४ ते १५ जुलै दरम्यान संशय‌तिांनी एसबीआयच्या मेरी शाखेतील खात्यातून परस्पर ९१ हजार ३९६ रूपयांची रोकड काढून घेतली.

वाळूसह ट्रक पळविला

नाशिक ः मर्यादेपेक्षा अधिक गौणखनीजाची वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आलेला सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मालट्रक चोरट्यांनी भरलेल्या वाळूसह पळवून नेला. गंगापूररोड परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील आनंदनगर भागात राहणाऱ्या घनश्याम नामक चालकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २ जुलै रोजी घनश्याम यांच्या मालट्रकवर महसूल विभागाने कारवाई केली. मर्यादेपेक्षा अधिक गौणखन‌जिाची वाहतूक केली जात असल्याने मालट्रकचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर गंगापूररोडवरील ऑरम इस्टेटच्या आवारात सील करून हा ट्रक पार्क केला होता. दातार ट्रान्सपोर्ट आणि बिल्डींग मटेरियल सप्लायर्सने हा ट्रक पळवून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

दोघांना अटक

मालेगाव : तालुक्यातील ज्वार्डी येथील रोशन दैतकार (२०) या तरुणास विहिरीत उडी मारून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी निमगाव येथील आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी रोशनचा भाऊ प्रशांत दैतकार (१९, रा. ज्वार्डी) याने तक्रार दाखल केली आहे. दीपक नामदेव आहिरे, सचिन नंदू आहिरे, दिनेश नंदू आहिरे, संजय विष्णू आहिरे, सोनू हिरामण मोरे, रवींद्र बाबुलाल आहिरे, बबन पुंजाराम आहिरे, विशाल बागूल (सर्व रा. निमगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांनी एका युवतीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून रोशनसह त्याच्या जोडीदाराला रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच रोशनला आम्ही जिवंत सोडणार नाही, असे धमकावले होते. संशयित आरोपींच्या भितीपोटी निमगाव शिवारात विहिरीत रोशनने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकाचा मृतदेह आढळला

त्र्यंबकेश्वर : बेपत्ता झालेल्या सिन्नर येथील आयटी विद्यार्थ्याची त्र्यंबकेश्वर येथे गंगाद्वार पर्वतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर येथील प्रवीण राजेंद्र काटे (वय २३) हा इंज‌निीअरिंग शिक्षण घेणारा युवक बेपत्ता असल्याची नोंद १७ जुलै रोजी त्याचे नातेवाईक राजेंद्र पाटील (रा. सिन्नर) यांनी त्र्यंबकेश्वर पोल‌सि ठाण्यात दिली होती. मंगळवारी (१८ जुलै) सायंकाळी उशिरा त्याच वर्णनाच्या मृतदेह गंगाद्वारच्या पाठीमागील बाजूस आढळून आला आहे. या युवकाने गंगाद्वारच्या मागच्या बाजूने वरून खाली उडी मारली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कारमधून गायीची वाहतूक

मालेगाव : कारमध्ये गायीस बांधून तिची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अंजुमन चौक येथे कारवाई झाली. निवृत्ती नामदेव भामरे (२५, रा. पोहाणे), समा, रवी (रा. चिंचवे) आणि फिरोज (रा. मालेगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पणन महासंघ अध्यक्षपदी उषा शिंदे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षपदी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषाताई माणिकराव शिंदे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. शिंदे यांच्या निवडीने नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महासंघाच्या उपाध्यक्षपदी प्रसेनजीत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या आजवरचा इतिहास पाहता शिंदे यांच्या निवडीमुळे प्रथमच विदर्भ सोडून उत्तर महाराष्ट्राला अध्यक्षपद मिळाले आहे. तसेच शिंदे यांच्या रुपाने या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला विराजमान होत आहे.

महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात घेण्यात आलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शिंदे, उपाध्यक्षपदासाठी पाटील यांचेच अर्ज आले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सतिष भोसले यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरीष्ठ पातळीवरील नेत्यांमधील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमधील चर्चेच्या फेऱ्या अन् वाटाघाटीअंती आपसात ठरलेल्या धोरणानुसार अध्यक्षपद हे राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे निश्चित झाले होते.

शिंदे यांच्या निवडीमुळे शहरातील विंचुर चौफुलीवर शिंदे समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

यावर्षी कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय खरेदीची गरज निर्माण झाल्यास शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून खरेदीची योजना कार्यक्षमपणे राबविली जाईल.

- उषाताई शिंदे, अध्यक्षा, कापूस पणन महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुंदरपूरची ‘दहशत’ जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सुंदरपूर, काथरगाव, जळगावसह परिसरात धुमाकूळ घालणारा नर बिबट्या वन विभागाने सुंदरपूर येथे लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. गेल्या अने‌क दिवसांपासून या बिबट्याची परिसरात दहशत पसरली होती. मात्र या घटनेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सुंदरपूर येथे चिंचबन भागात रवींद्र जनार्दन चिखले यांच्या शेतात अनेक वेळा बिबट्या नजरेस पडला होता. याबाबत वनविभागाला कळव‌ल्यिानंतर शेतात पिंजरा लावला होता. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल पी. एस. पाटील, विंचुरचे वनरक्षक विजय टेकणर आदींच्या पथकाने या बिबट्याला ताब्यात घेतले. गेल्या महिन्यात २४ जून रोजी तारुखेडले येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला होता. यावर्षी निफाड तालुक्यात आतापर्यंत पाच बिबटे पिंजऱ्यात जेरबंद केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनाचा कल ओळखूनच निवडा करिअर

$
0
0

करिअरची निवड करताना ज्यामध्ये स्वत:चे मन रमते त्या विद्याशाखेची निवड करावी. मनाच्या नैसर्गिक कलास न्याय देताना त्याच्या जोडीला समर्पणाचा भाव मात्र आचरणात नक्की हवा. या सूत्रातून तुमचे खरे करिअर आकार घेईल, असा संदेश भोसला मिल‌िटरी कॉलेजच्या प्राचार्या सुचेता कोचरगावकर यांनी ‘मटा’ शी बोलताना दिला.


प्रश्न : मिल‌िटरी एज्युकेशन या संबोधनामुळे आपल्या कॉलेजकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन व अपेक्षा वेगळ्या आहेत?

उत्तर : अकॅडम‌िक्स शिक्षणाच्या बरोबरीलाच मिल‌िटरी एज्युकेशनमधून येणाऱ्या मूल्यांचे संस्कार व्हावेत, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडावा यावर आमचा कटाक्ष नक्कीच आहे. येथे निवासी विद्यार्थ्यांसाठी मिल‌िटरी एज्युकेशन सक्तीचे आहे. अभ्यासक्रमाच्या पलीकडे राष्ट्राभिमुख विद्यार्थी घडविण्याची संस्कार पध्दती आम्ही राबवितो. या अंतर्गत इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘रामदंडी’ म्हणजे प्रभू रामांचा आदर्श घेऊन पुढे चालणारा विद्यार्थी असे संबोधले जाते. समाजाच्या अपेक्षांना अनुकूल धोरण असल्याने त्या पूर्ण होतात.

g प्रश्न : आपल्याकडे उपलब्ध असणारे अभ्यासक्रम?

उत्तर : ‘केजी टू पीजी’ अशा स्तरातील शिक्षण आमच्याकडे उपलब्ध आहेत. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांसह मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, डिफेन्स स्टडीज आणि स्ट्रॅटेजीकसह विविध विद्याशाखांचा अंतर्भाव आहे. याशिवाय एनडीएसाठी तयारी करून घेण्याकरिता स्पेशल बॅचही प्रशिक्षित केली जाते.

g प्रश्न : नव्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा भविष्यात काही मानस?

उत्तर : विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान मिळत राहावे यासाठी गरजेनुसार आवश्यक ते बदल घडविले जातात. अलीकडेच ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ हा समुद्री संपत्तीसंदर्भातील एक नवा अभ्यासक्रम संस्थेने सुरू केला आहे. या अंतर्गत डिफेन्स आणि स्ट्रॅटेजीक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.

g प्रश्न : मिल‌िटरी एज्युकेशन प्रत्येकास सक्तीचे असावे असे वाटते का?

उत्तर : अनेक भिन्न मतप्रवाहांमुळे काही प्रसंगी तरूणांमध्ये देशाबद्दल निराशेची भावना तयार होते. ज्यांच्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांनीच असे निराश होऊ नये यासाठी मिल‌िटरी एज्युकेशन हा महत्त्वाचा संस्कार वाटतो. त्यासाठी हे शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे व्हावे, असा एक प्रस्ताव शासनाला दिला आहे. किमान आमच्या संस्थेतील शक्य त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही तशी व्यवस्था केली आहे.

g प्रश्न : सैन्यदलाशी संबंधित काही उपक्रम आपल्याकडे सुरू आहेत.

उत्तर : मुलींच्या सैनिकी शिक्षणासाठीची व्यवस्था याशिवाय सैन्यदलाचे मानसशास्त्र अभ्यासण्यासाठी ‘मिल‌िटरी सायकॉलॉजी’ आणि ‘जम्मू अँड काश्मिर’ हे सर्टीफिकेट अभ्यासक्रम दिल्लीतील जम्मू आणि काश्मिर केंद्राद्वारे चालविले जातात. यासाठी मर्यादीत प्रवेश व मर्यादीत दिवसांचे शिक्षण आहे.

g प्रश्न : काही प्रेरणादायी उपक्रमही आपल्याकडे सुरू आहे आहेत?

उत्तर : जीवनात प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या आपल्या भोवतालच्या आदर्श व्यक्तींचे संघर्षमय जीवन विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चित्रपटाद्वारे दाखविले जाते. याशिवाय आपण जी फळे खातो त्यांच्या बिया कचऱ्यात न फेकता त्या एकत्रित करून त्या कागदाच्या पुडीवर फळाचे नाव लिहायचे आणि मध्यवर्ती ‘सीड बँक’मध्ये या बिया जमा करायचा असा एक उपक्रम सुरू केला आहे. योग्य ऋतूत विद्यार्थ्यांच्याच हस्ते या बियांचे रोपण करायचे, असा शिरस्ता आहे.

g प्रश्न : विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीवही जागृत व्हायला हवी?

उत्तर : त्यासाठी शनिवारचा दिवस महत्त्वाचा असतो. ‘रामदंडी’ अर्थात आमचे विद्यार्थी शनिवार कॅम्पसमधील विख्यात श्रीराम मंदिरासमोर परेड सादर करतात. यानंतर त्यांना सण परंपरा यांपासून तर एखादा प्रासंगिक सामाजिक विषय घेऊन त्याचे त्यांच्या स्तरावर विश्लेषण केले जाते. त्यांच्या विचार प्रक्र‌ियेला सामाजिकदृष्ट्या चालना दिली जाते. याशिवाय परिसरातील संत कबीर नगर या सेवावस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकविण्यापासून तर त्यांना इंग्रजी भाषा किंवा व्यक्त‌िमत्त्व विकासाची कौशल्यही शिकविली जातात.

g प्रश्न : पालक आणि विद्यार्थ्यांसमोर कुठले आव्हान महत्त्वाचे वाटते ?

उत्तर : पालक आणि पाल्याचे नाते घट्ट असायला हवे. अलीकडे कुटूंब व्यवस्थांसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या आव्हानांमुळे यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आहे. याशिवाय सोशल मीडिया, मीडिया आणि इंटरनेटसारखी आधुनिक माध्यमांची हाताळणीचे धडे विद्यार्थ्यांना देणे आणि या आधुनिक माध्यमांच्या नकारात्मक परिणामांपासून विद्यार्थ्यांना वाचविणे महत्त्वाचे आव्हान वाटते.

g प्रश्न : विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?

उत्तर : करिअरची निवड करताना ज्यामध्ये स्वत:चे मन रमते त्या विद्याशाखेची निवड करावी. मनाच्या नैसर्गिक कलास न्याय देताना त्याच्या जोडीला समर्पणाचा भाव मात्र आचरणात नक्की हवा. या सूत्रातून तुमचे खरे करिअर आकार घेईल.

(शब्दांकन : जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण येथील शेतकरी भगवान जगन्नाथ पगार (वय ५५) यांनी कर्जाला कंटाळून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले सून नातवंडे दोन बंधू असा मोठा परिवार आहे, नापिकी व ट्रान्स्पोर्ट व्यवसायात आलेल्या अपयशाने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. भगवान पगार अल्पभूधारक शेतकरी असून, शेतमालाला भाव मिळत नसल्याने दोन एकर शेती त्यांनी विकली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस स्थानकात साचले तळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहर परिसरातील विविध भागात सुटणाऱ्या बसेस ज्या निमाणी बस स्थानकावरून सुटतात, त्या बस स्थानकावर दिवसभरात बसच्या शेकडो फेऱ्या होतात. हजारोंच्या संख्येने प्रवासी या बस स्थानकावरून ये-जा करतात, अशा बस स्थानकाची अवस्था खड्डे पडून एखाद्या तळ्यासारखी झाली आहे. स्थानकावर पडलेले खड्डे बुजविण्याचे कामच करण्यात येत नसल्यामुळे येथील अवस्था बिकट झाली आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

सात वर्षांपूर्वी खासदार निधीतून निमाणी बस स्थानकात सुधारणा करून विविध सुविधा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी हायफाय वाटणाऱ्या या बस स्थानकाकडे दुर्लक्ष होत गेले. आता तर बस स्थानकात जातानाच खड्ड्यांतून वाट शोधण्याची वेळ आली आहे. मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असल्याने त्या पाण्यातूनच बस स्थानकात जावे लागत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसमुळे येथील पाणी बाजूला बसच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडते. अशा परिस्थितीत येथे थांबणेदेखील प्रवाशांना मुश्किल होऊ लागले आहे.
डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

सिन्नर फाटा : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा येथील हनुमान मंदिरालगतच्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असल्याने या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे सिन्नर फाटा येथे महामार्गालगत नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे सिन्नर फाटा परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पाण्यामुळे दुर्गंधी

सिन्नर फाटा परिसरातील डबक्यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी उघडे नालेही असून, या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. तरी पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने या भागातील डबक्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांत लर्निंग लायसन्स कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांना थेट कॉलेजमध्ये लर्निंग लायसन्स देण्याची घोषणा केली. परंतु, नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केवळ एका कॉलेजमध्ये शिबिर घेऊन खुद्द परिवहन मंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे.

तरुणांमध्ये दुचाकी चालविण्याचे प्रमाण मोठे आहे. बहुतांश विद्यार्थ्यांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसते. मात्र, तरी ते वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. आरटीओ कार्यालयात असलेली गर्दी व दलालांचा सुळसुळाट यामुळेदेखील विद्यार्थी लायसन्स काढण्याचे टाळतात. यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे लायसन्स काढावे, अशी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व कॉलेजच्या अनास्थेमुळे ही योजना बासनात गुंडाळली गेली. आतापर्यंत नाशिक शहरातील फक्त एकाच कॉलेजमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे. याबाबत दोन्ही यंत्रणांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात आहे. कॉलेजच्या म्हणण्यानुसार परिवहन विभागाकडून आम्हाला पत्र मिळाले. परंतु, त्यानंतर परिवहन विभागाने कार्यवाही करायला हवी, ती केलेली नाही. केवळ वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध केल्या. लायसन्स काढून देण्यासाठी आम्ही जागा आणि इंटरनेट सेवा पुरवण्यास तयार आहोत. मात्र, लायसन्स देण्याचे काम कॉलेजचे नाही. परिवहन मंत्र्यांनी जी सूचना केली ती अत्यंत योग्य आहे. आज कॉलेजला येणाऱ्या ५० टक्के विद्यार्थ्यांकडे लायसन्स नसते. तरीही गाड्या चालवल्या जातात. आरटीओ कार्यालयाचा कारभार सर्वश्रुत आहे. येथील दलालांच्या विळख्याने अनेकदा वाहनधारक या कार्यालयात जाण्याचे टाळतात. त्यामुळे कॉलेजने याबाबत उत्साह दाखवला नाही, हे म्हणणे कामाची जबाबदारी झटकण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील अनेक कॉलेजेसमध्ये ही योजना सुरू आहे. केवळ नाशिक शहरातच या योजनेला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांचे ‘सरकारी’ उत्तर

आरटीओ अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आदेशांची पायमल्ली होत आहे. आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना या योजनेबाबत विचारले असता त्यांनी सरकारी उत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही कॉलेजला पत्र पाठवले. परंतु, कॉलेजने उत्तर दिले नाही. त्यामुळे ही योजना राबविण्यात आली नाही. केवळ पत्र देऊन आपले काम झाले, अशी भूम‌िका आरटीओ कार्यालयाने घेतली. या उपक्रमाचा पाठपुरावा अद्याप करण्यात आला नाही. उलट अपयशाचे खापर कॉलेजवर फोडून मोकळे झाले. दर आठवड्याला एका कॉलेजमध्ये ही योजना सुरू करावी किंवा कॉलेजच्या पार्किंगजवळ ज्या विद्यार्थ्यांकडे लायसन्स नाही अशा विद्यार्थ्यांना त्वरित लायसन्स द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. नाशिक शहरात अनेक मोठी कॉलेजेस आहेत. त्याच्याकडे चांगल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. केवळ परिवहन विभागाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे. नाशिक वगळता राज्यात अनेक ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. ही योजना व्यवस्थित राबविल्यास शहरातील प्रत्येक शिक्षण संस्थेत आठवड्याला शंभर विद्यार्थी सहज मिळतील.


आम्ही कॉलेजेसला पत्र दिले आहे. परंतु कॉलेजकडून उत्तर न आल्याने ही योजना राबविण्यात अडचण आली. पुन्हा एकदा कॉलेजशी संपर्क साधू.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नार-पारचा प्रश्न मार्गी लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दमणगंगा-पिंजाळ नार-पार नद्यांमधील पाणी पूर्वेकडे वळवित त्यांचा राज्याला फायदा मिळवून देण्याबाबत राज्य सरकार आग्रही आहे. केंद्र सरकारही त्यासाठी हवा तेवढा निधी देण्यास तयार असून, महिनाभरातच यावर सकारात्मक परिणाम दिसेल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी नाशिकमध्ये दिले.

जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस पडत नाही. जेथे अधिक पाऊस पडतो त्या पश्चिम भागातील पाणी पश्चिम वाहीनी नद्यांमधून गुजरातसह समुद्रात वाहून जाते. हे पाणी वळविण्यासाठी गेली अनेक वर्ष सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. परंतु दोन-तीन राज्यांशी संबंधित हा प्रश्न असून, त्यावर तोडगा काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातमध्ये जात असून, त्यावरून वाद निर्माण झाले आहेत. नाशिक येथे बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही काही आमदारांनी पश्चिमेस वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील नद्यांना वळवून आपल्या राज्यातील शेती समृद्ध करण्याची मागणी केली. त्यावर महाजन म्हणाले, राज्याच्या हिताच्या दृष्टीने या विषयावर अत्यंत वेगाने काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर रात्री एकपर्यंत बैठक घेतली. केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासमवेत याबाबत बैठक होणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचेच सरकार असल्याने हा विषय तातडीने मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भविष्यात कुठलेही सरकार मागेल तेवढा निधी देण्यास तयार होईल, याची शाश्वती नसल्याने आताच या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यामुळे महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल तसेच या पाण्याचेही योग्य नियोजन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत डेंग्यूसदृश रुग्ण

$
0
0

देवळाली कॅम्प ः येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या वीसवर्षीय युवतीला डेंग्यू सदृश्य आजार झाल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिंगवे बहुला येथील रेश्मा लोणे या युवतीला तीन दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात सारखा ताप असल्याने मंगळवारी (दि. १८) रात्री ९ वाजता कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे तपासणी केली असता तपासणीत डेंग्यू सदृश्य आजाराचे निदान झाले. त्यावेळी त्यांना प्राथमिक उपचार देत पुढील उपचाराकरीता बुधवारी (दि. १९) नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे डॉ. जयश्री नटेश यांनी दिली आहे. शहरात बुधवारी आणखी डेंग्यूचा एक रुग्ण आढळल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरपातळी कळणार आता सेन्सरद्वारे!

$
0
0

नाशिक ः जिल्ह्यातील तब्बल २९ मोठ्या पुलांवर नदीची पूरपातळी दर्शविणाऱ्या अत्याधुनिक सेन्सर्सची उभारणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्कालीन योजनेत मैलाचा दगड रोवला आहे. नागपूरच्या ऑटोमेशन मनिपोल्ड सर्व्हिस या कंपनीने ही सेन्सर्स उभारणी केली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना मोबाइलवरूनच अॅलर्ट अर्थात धोक्याची घंटा समजणार आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंडळाने नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पुलांवरील अनेक कामे सुरू केली होती. गेल्या महिन्यात सहा धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करण्याचाही निर्णय घेतला गेला होता. पाऊस किंवा पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून जाऊ नये यासाठी डागडुजीबरोबरच अनेक उपाययोजना करण्यात येत होत्या. पूरपातळी दर्शविणारे सेन्सर्स ही त्याची पुढची पायरी आहे. या सेन्सर्समुळे पूरपातळीचा अंदाज येऊन तातडीने उपाययोजना करता येऊ शकेल. सौरऊर्जेवर चालणाऱ्या या सेन्सर्समुळे वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणीही ते व्यवस्थित काम करू शकतात.

जिल्ह्यात मालेगाव उपविभाग, दक्षिण उपविभाग, सुरगाणा, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण या उपविभागांतील पुलांवर हे सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात ७ व धुळे जिल्ह्यातील ३ पुलांवर हे सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

सेन्सर्स बसविण्यात आलेल्या पुलांची संख्या

गोदावरी नदी ः ३, गिरणा नदी ः ७, दारणा नदी ः ४, पार नदी ः १, नार नदी ः १, कडवा नदी ः १, पुनद नदी ः १, सुकी नदी ः एक पूल, मौसम नदी ः ३, वाघ नदी ः १, गिरणार नदी ः १, कश्यपी नदी ः १, आळंदी नदी ः १, व्हिलेज नदी ः १.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्या मुलांसाठीही तीळ तीळ तुटतो जीव...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तम बुद्धिमत्ता आणि जिद्दीने आयुष्याकडे बघण्याची वृत्ती असणाऱ्या ‘मटा हेल्पलाइन’ने निवडलेल्या मुलांसमोर केवळ परिस्थितीमुळे प्रश्नचिन्ह उभे राहते. या मुलांसाठी आम्हा ज्येष्ठांचा जीव तीळ तीळ तुटतो. त्यांना आम्ही आमचीच मुले समजून शक्य तेवढी मदत नक्कीच करीत आहोत. प्रत्येक समाजघटकाने या मुलांच्या पारड्यात मदतरूपी आशीर्वादाचे पाठबळ द्यावे, असे भावनिक आवाहन एका आजींनी केले आहे.

‘मटा’च्या कार्यालयात शोधाशोध करत या आजी थरथरत्या देहाने एकट्याच पोहोचल्या, तेव्हा तुमच्यासोबत घरातलं कुणी आलेलं नाही का? या प्रश्नावर स्मितहास्य करत त्या उत्तरल्या, ‘‘माझं देणं तिळाएवढं आहे. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या या मुलांसाठी फारसं काही करता येत नसल्याची खंत आहे; पण शक्य तितका खारीचा वाटा मीही उचलते आहे. माझं दातृत्व दुसऱ्या कुणास कळलं तर देण्याचं पावित्र्य भंग होईल, म्हणून कुणालाही माहिती न होऊ देता मला माझ्या वाट्याची जबाबदारी उचलायची आहे. म्हणूनच एकटी शोधाशोध करीत आले.’’

माझ्या नातवांसारखं दर्जेदार शिक्षण या मुलांनाही मिळावं अशी मनापासून अपेक्षा आहे. या मुलांनीही अनेक दात्यांच्या भावनेची जाणीव जपून आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती करावी, असा आशीर्वाद देत या आजीबाईंनी आम्हाला एक विनंतीही केली. ‘‘मला शक्य आहे तितकेच मी करते आहे. कृपया माझे नाव छापू नका हं! नाहीतर हे देण्याचं पुण्य मला मिळणार नाही...!’’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानधनाचा वाढता भार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेच्या नगरसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे. येथील ड वर्ग असलेल्या महापालिकेच्या नगरसेवकांचे मानधन ७ हजार ५०० वरुन दहा हजार झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक स्थिती बिकट असलेल्या महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाला एक कोटीचा भार पडणार आहे.

पालिकेच्या नगरसेवकांना या निर्णयाआधी दरमहा सात हजार ५०० रुपये इतके मानधन मिळत होते. त्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून दरवर्षी ७५ लाख ६० हजार रुपये नगरसेवकांना दिले जायचे. यात महासभा उपस्थिती भत्त्याचे १०० ते २०० रुपये वेगळे अदा केले जात. त्यामुळे वर्षाकाठी पालिकेला नगरसेवक मानधन व उपस्थिती भत्त्यापोटी एकूण ७७ लाख रुपये इतका भार सोसावा लागत होता. नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाने यात आणखी वाढ होणार असून, दरमहा १० हजार प्रमाणे ८४ नगरसेवकांना एक कोटी ६ लाख ८० हजार रुपये इतका निधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेचे बजेट ३१ लाख २० हजार रुपयांनी वाढणार आहे.

आता तरी कामे करा?

नगरसेवकांना जनतेची कामे करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची तरतूद म्हणून हे मानधन दिले जाते. नगरसेवकांचे मानधनही आता वाढले आहे. त्यामुळे आता नगरसेकांनी विकासकामे करावीत, अशी प्रतिक्रिया या निर्णयानंतर मालेगावकर व्यक्त करीत आहेत.

५० कोटींहून अधिक देणी

पालिकेचे ३७८ कोटीचे अंदाजपत्रक नुकतेच मंजूर करण्यात आले. उपमहापौर घोडके यांनी महासभेत पालिकेची उत्पन्न किती व देणी किती? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी लेखाधिकारी कमरुद्दीन शेख यांनी मार्च २०१७ अखेर ४७ कोटीची देणी असून त्यानंतर झालेल्या कामंचा समावेश केल्यास हा आकडा ५० कोटीहून अधिक जातो. पालिकेची महसूल वसुली दरवर्षी जेमतेम ४० टक्के असते. या पार्श्वभूमीवर मानधनात झालेली वाढ आर्थिक भार वाढवणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दाम्पत्याची रवानगी कारागृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सीबीएस चौकात नियमभंग करूनही वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून त्यांना मारहाण करणाऱ्या दाम्पत्याला जिल्हा कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे शहरातील बेशिस्त वाहनचालक चांगलेच धास्तावले आहेत.

उज्ज्वला कैलास बोरसे (वय २५) व कैलास मल्हार बोरसे (वय २६, रा. मोरे मळा, उत्तमनगर, सिडको) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी युवराज गोपीचंद गायकवाड यांना मंगळवारी सीबीएस चौकातील सिग्नलवर उज्ज्वला यांनी श्रीमुखात भडकावली. या दाम्पत्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून या दांम्पत्यास बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या दांम्पत्याची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक महापालिका देणार ‘स्मार्ट कार्ड’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डिजिटलायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्मार्ट नाशिकची स्वतंत्र ओळख तयार करण्यासाठी महापालिका १५ ऑगस्टपासून नाशिककरांसाठी क्रेड‌िट कार्डच्या धर्तीवर ‘नाशिक स्मार्ट सिटी कार्ड’ लाँच करत आहे. येस बँकेच्या सहकार्याने नियम‌ित करदात्यांना ५० हजार कार्डांचे मोफत वाटप केले जाणार आहे. क्रेड‌िट कार्डप्रमाणेच या कार्डाचा वापर नागरिकांना करता येणार असून, पालिकेच्या ४५ सेवांसह कर भरण्यासाठी या कार्डचा वापर करता येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. विशेष म्हणजे या कार्डच्या माध्यमातून कर भरणाऱ्यांना विशेष सवलत देण्याचा विचारही केला जात आहे.

केंद्राच्या डिज‌िटलायजेशन योजनेलाही पालिका आता हातभार लावणार आहे. महापालिकेने अगोदरच विविध सेवांसाठी ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच्याच भाग म्हणून आता नागरिकांना क्रेडिट कार्डच्या धर्तीवर येस बँकेच्या सहकार्याने नाशिक स्मार्ट सिटी कार्डची सुविधा देणार आहे. येत्या १५ ऑगस्टला या नाशिक स्मार्ट सिटी कार्डचे लाँचिंग केले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर नियमित करभरणा करणाऱ्या ५० हजार नागरिकांना या कार्डचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या कार्डचा वापर आर्थिक व्यवहारांसाठीही करता येणार असून, महापालिकेशी संबंधित कोणतेही पेमेंट या कार्डद्वारे करण्याआधी ते रिचार्ज करावे लागणार आहे. महापालिकेच्या ग्राहक सेवा केंद्रात हे कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. या कार्डबरोबरच ऑनलाइन पेमेंट करताना वॉलेटद्वारेदेखील हे कार्ड रिचार्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.


करवसुली वाढण्यासाठी उपयुक्त

अधिकाधिक कार्ड नाशिककरांकडे असावेत यासाठी येस बँक काही मोठ्या व्यापाऱ्यांशी बोलून ते वितरीत करण्याची व्यवस्था उभारण्यावर विचार करत आहे. करभरणा करताना नागरिकांचा अधिकाधिक वेळ वाचावा यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे. सुरुवातीला या कार्डमधून महापालिकेला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळणार नाही. परंतु, महापालिकेची करवसुली वाढविण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरेल अशी माहिती आयुक्तांनी दिली.


सवलतीचा विचार सुरू

या कार्डद्वारे महापालिकेचा कर भरणा करणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात सवलत देण्यावरही विचार सुरू आहे. डिजिटल पेमेंटला चालना मिळावी, यासाठी हे कार्ड लाँच करण्यात येत आहे. नागरिकांसमोर डेब‌िट कार्ड, क्रेडिट कार्ड हे पर्याय उपलब्ध असले, तरी स्मार्ट सिटीची ओळख म्हणूनही हे कार्ड वेगळे ठरेल.


डिज‌िटलायजेशनच्या दिशेने पालिकेचे पाऊल पडत असून, नाशिककरांना अधिकाधिक स्मार्ट केले जाणार आहे. त्यासाठी विविध सेवा व कर भरण्यासाठी येस बँकेच्या सहकार्याने ‘स्मार्ट सिटी कार्ड’ लाँच केले जाणार आहे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त

ऑनलाइन सुविधा एक ऑगस्टपासून

नागरिकांना विविध प्रकराच्या सुविधा एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी महापालिकेने १९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे आता डिज‌िटल होणार असून, येत्या १ ऑगस्टपासून या केंद्रांमधून ४५ नागरी सेवा ऑनलाइन मिळणार आहेत.

महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर भरणा, विविध कर वसुली, नळजोडणी, डॉग लायसन्स, जन्म-मृत्यूचे दाखले, भोगवटा प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, बांधकाम परवानग्या, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण दाखले अशा विविध प्रकारच्या ४५ सेवा दिल्या जातात. या प्रमाणपत्रांसाठी कागदपत्रे मुख्यालय किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी नागरिकांना या कार्यालयामंध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यातच या सेवांसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे माग‌ितले जातात. त्यामुळे भ्रष्टाचारालाही वाव मिळतो. पारदर्शक कारभारासाठी नागरिक आणि महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शहरात येस बँकेच्या मदतीने १९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांना चागंला प्रतिसाद मिळाल्याने ती आता संपूर्ण ऑनलाइन केली जाणार आहे. पारदर्शक व गत‌िमान कारभारासाठी पालिकेचा कारभार डिज‌िटल करण्यात येणार आहे.


‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प होणार कार्यान्व‌ित

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने नाशिकमध्ये उभारण्यात येणारा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प १५ ऑगस्टपासून कार्यान्वीत होणार आहे. या प्रकल्पातून दर महिन्याला एक लाख युनिट वीज तयार केली जाणार आहे. त्यासाठी जर्मनीने सात कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत.

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत नाशिकमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जर्मनीने या प्रकल्पाला सात कोटी रुपये दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील ३० मेट्र‌िक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. हा देशातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट आहे. जर्मनीची जीआयझेड कंपनी या प्रकल्पाची सल्लागार कंपनी आहे. हैदराबादच्या रामकी या कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले असून, संबंधित कंपनीने विदेशातून यासाठी मशिनरी मागवून तो पूर्ण केला आहे. दर महिन्याला एक लाख युनिट वीज महापालिकेला मिळणार आहे. यासाठी २० टन ओला कचरा व १० टन मलजल महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून तयार होणारी वीज महापालिका विविध प्रकल्पांसाठी वापरणार असून पालिकेची आर्थिक बचत होणार आहे.

इंजिनीअरिंग क्लस्टर देणार ‘स्मार्ट डेमो’

नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर अंबड येथील नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरने (एनईसी) पुढाकार घेऊन सोलर, इलेक्ट्र‌िसिटी व जलव्यवस्थापन कसे करता येईल, यासाठी संपूर्ण परिसर स्मार्ट केला आहे. त्यासाठी ‘स्मार्ट सिटी लॅब प्रोग्रॅम’ या क्लस्टरने तयार केला असून, त्यासाठी एक डिव्हाइससुध्दा तयार केले आहे. आज, गुरुवारी दुपारी तीन वाजता या लॅबचा शुभारंभ व प्रात्यक्षिक होणार आहे.

‘मेक इन इंडिया’चा नारा देत नवउद्योजकांना वाव देण्यासाठी तसेच नाशिकला स्मार्ट करण्यासाठी काय योजना राबविता येतील, यासंदर्भात या कार्यक्रमात प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरने केलेल्या या प्रयोगाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. नाशिकच्या सर्व उद्योगांमध्ये अशा प्रकारचे स्मार्ट डिव्हाइस व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सुरुवातीला या क्लस्टरने शेतीसह विविध गोष्टींवर फोकस केला असून, त्यात संशोधन केले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी कसे असावे, यासाठी या कार्यक्रमात प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. शिवाय, स्थानिक टॅलेंटला कशी मदत होईल, गुंतवणूक कशी वाढेल व नवीन उद्योग कसे आणता येतील, यावरही उद्योजक प्रेझेंटेशन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तालयास टाळे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नामांकित शाळेतील प्रलंबित प्रवेश आणि चौथीपर्यंत आश्रमशाळांमधील वर्ग बंद करू नये, या मागणीसाठी आदिवासी पालकांसह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यावा या मागणीसाठी मंगळवारपासून ठिय्या मांडून असलेल्या पालकांनी बुधवारी आयुक्तालयाला टाळे ठोकले. कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून पालकांनी यावेळी शासनाविरोधात घोषणा दिल्या. प्रवेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे.

आदिवासी विभागाने नामांकित शाळेत प्रवेश योजनेसाठी आदिवासी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागव‌लिे होते. नाशिक प्रकल्पातून ५८६ अर्ज आलेले असून प्रत्यक्षात केवळ २०६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असे विभागाकडून कळवण्यात आले. त्यामुळे उर्वरित ३८२ विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. हा प्रश्न कायम असतानाच विभागाने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंद करण्याचा जो घाट घातला आहे त्याविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात मंगळवारपासून आंदोलन सुरू आहे. मंगळवारी पालकांनी इंग्रजी वर्ग भरून प्रशासनाच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले.

बुधवारी पालक आणि आदिवासी विकास परिषदेने थेट आयुक्तालयाला कुलूप ठोकून कार्यालयाचा प्रवेश बंद केला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देवून तातडीने प्रवेश देण्याची मागणी केली. बुधवारी सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images